Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हंगामी निवेदकांचे काम बंद होणार?

$
0
0

पुणे : आकाशवाणी पुणे केंद्राचा वृत्त विभाग बंद करण्याचा घाट घातला जात असतानाच हंगामी वृत्तनिवेदकांचे काम बंद होण्याची भीती आहे. पुण्यासाठी एकच पूर्णवेळ वृत्तनिवेदकाचे पद मंजूर असताना दुसऱ्या पूर्णवेळ वृत्तनिवेदकाची नेमणूक करण्यात आल्याने हंगामी वृत्तनिवेदकांचे काम थांबवावे लागणार आहे.
पुण्यामध्ये कायमस्वरूपी एक पूर्णवेळ वृत्तनिवेदकाचे पद मंजूर असून, ते कार्यरत आहे. त्याचबरोबर सध्या वृत्तविभागात २८ हंगामी वृत्तनिवेदकांचे पॅनेल मंजूर आहे. सध्या त्यापैकी २२ हंगामी वृत्तनिवेदक कार्यरत आहेत. त्यांना दररोज दीड शिफ्ट या प्रमाणे काम दिले जाते. मात्र, आता दुसऱ्या पूर्णवेळ वृत्तनिवेदकाची नेमणूक झाल्याने हंगामी वृत्तनिवेदकांना दररोज दीड ऐवजी अर्धीच शिफ्ट काम मिळणार आहे.
‘हंगामी वृत्तनिवेदकांची संख्या कमी केली तर खर्च वाचतो, असा दावा सरकारी यंत्रणेकडून केला जात आहे. मात्र, मुंबईत पूर्णवेळ वृत्तनिवेदकाची दोन पदे मंजूर आहेत. तिथे सध्या एकच पूर्णवेळ वृत्तनिवेदक कार्यरत आहे. त्यामुळे तिथेही मोठ्या संख्येने हंगामी वृत्तनिवेदकांची नेमणूक करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनासाठी अतिरिक्त खर्च करावाच लागत आहे. त्याचबरोबर पुण्यात दुसऱ्या पूर्णवेळ वृत्तनिवेदकाची नेमणूक केल्यामुळे त्यांच्या वेतनासाठी मोठी रक्कम खर्ची पडते. त्यामुळे पुण्यातील हंगामी वृत्तनिवेदकांची संख्या कमी करून खर्चात कपात होण्याचा दावा चुकीचा ठरतो,’ अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
‘पुण्यातील प्रादेशिक वार्तापत्र बंद झाले अथवा नाही झाले नाही, तरी हंगामी वृत्तनिवेदकांचे काम मात्र येत्या काही दिवसात बंद करावे लागणार आहे. दोन पूर्णवेळ वृत्तनिवेदक असल्याने इतर हंगामी वृत्तनिवेदकांना काम देता येणे शक्य होणार नाही. सध्याच्या व्यवस्थेनुसार दररोज एकूण दीड शिफ्टमध्ये हंगामी वृत्तनिवेदकांना काम दिले जाते. दोन पूर्णवेळ वृत्तनिवेदक असल्याने ही शिफ्ट दीडवरून अर्ध्या शिफ्टवर येणार आहे. त्यामुळे दरमहा जास्तीत जास्त चार किंवा सहा हंगामी वृत्तनिवेदकांनाच काम मिळू शकणार आहे,' असेही सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा @ ४० रुपये किलो

$
0
0

उत्तरेच्या राज्यांकडूनही मागणी, टोमॅटोपाठोपाठ कांदाही रडविणार ?

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टोमॅटोपाठोपाठ आता कांदाही सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे. लांबलेला पाऊस, परराज्यातून वाढलेली मागणी आणि बाजारात निर्माण झालेला तुटवडा यामुळे कांद्याचे भाव घाऊक बाजारात तिपटीने वाढले आहेत. त्यामुळे सध्या किरकोळ बाजारात कांद्याचा दर प्रति किलो ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
‘जून महिन्यात राज्यातील लांबलेला पाऊस, त्यामुळे गरवी कांद्याचा हंगाम लांबला आहे. हळवी कांदा सप्टेंबरमध्ये येणे अपेक्षित असताना उशिरा झालेल्या पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी कांद्याचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे गरवी कांद्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच, परराज्यातूनही पावसामुळे गरवी कांद्याला मागणी वाढली आहे. कर्नाटक राज्यातूनही लाल कांदा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येतो. परंतु, तो कांदा न आल्याने गरवी कांद्याला भाव आला आहे. मागणी वाढल्याने पुण्यासह अन्य ठिकाणी कांद्याचे रविवारपासून दर वाढायला सुरुवात झाली आहे. घाऊक बाजारात कांद्याच्या एका किलोसाठी २५ रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत,‘ अशी माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष आणि व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
मार्केट यार्डातील कांद्याचे व्यापारी विलास रायकर म्हणाले, ‘पुण्यात पुण्यासह नगर भागातून १५० ट्रक गाड्यांची तर सोमवारी ६० ते ७० ट्रक गाडी कांद्याची आवक झाली. सध्या कर्नाटकात पाऊस नसल्याने तेथून राज्यात कांदा यायला वेळ लागणार आहे. सध्या मध्य प्रदेशातून दिल्ली, हरियाणा, पंजाब, कोलकात्ता या राज्यांना कांदा पुरविला जातो. परंतु, मध्यंतरी मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांकडून ८ रुपये किलो दराने मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केला. त्यानंतर सरकारने तो कांदा व्यापाऱ्यांना दोन ते अडीच रुपये किलो दराने विकला. त्यामुळे ७५ टक्के कांदा शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडे गेला. २५ टक्के कांदा शेतकऱ्यांकडे राहिला. त्यामुळे मध्य प्रदेशातून उत्तरेच्या राज्यांना पुरवठा होत नसल्याने दक्षिणेतील राज्यांसह उत्तरेकडून महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी वाढत आहे.’
‘मागील काही महिन्यात एक किलो कांद्यासाठी घाऊक बाजारात ४ ते ५ रुपये किलो दर मिळत होता. १५ जुलैनंतर घाऊक बाजारात कांद्याला ८ रुपये किलो दर मिळू लागला. १५ दिवसांत कांद्याचे भाव तिपटीने वाढले. त्यामुळे घाऊक बाजारात कांदा २५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. तीन वर्षांनंतर कांद्याची दरवाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यावर पुढील काळाता कांद्याचे भाव टिकून राहतील,‘ असा विश्वास व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला.

कर्नाटक, तामिळऩाडू, आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यातून पुण्याच्या कांद्याला मागणी होऊ लागली आहे. काही राज्यांमध्ये चांगला पाऊस झाल्याने कांद्याचे पीक नष्ट झाले आहे. तर काही ठिकाणी पाऊस नसल्याने पीक कमी आहे. सप्टेंबरमध्ये कांद्याचे दर असेच चढे राहतील. त्यामुळे ३० ते ४० रुपयांपर्यंत दर टिकून राहतील.
विलास रायकर, कांद्याचे व्यापारी, मार्केट यार्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढगांच्या गर्दीतही दिसले चंद्रग्रहण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आकाशात ढगांची गर्दी असूनही पृथ्वीच्या सावलीत शिरलेल्या राखीपौर्णिमेच्या चंद्राची छबी टिपण्यासाठी आकाशप्रेमींचा उत्साह सोमवारी शिगेला पोहोचला. चालू वर्षातील एकमेव खंडग्रास चंद्रग्रहणाचे पुण्यासह देशाच्या अनेक भागांतून दर्शन झाले. सोमवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी ग्रहणाचा मध्य पाहता आला. या वेळी चंद्राचा चतकोर भाग पृथ्वीच्या दाट छायेने व्यापला होता.
चालू वर्षातील एकमेव खंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहणाच्या विविध अवस्था टिपण्यासाठी आकाशप्रेमींनी आपले टेलिस्कोप, कॅमेरे सज्ज ठेवले होते. पुण्यातून पाहताना रात्री नऊ वाजून २० मिनिटांनी चंद्राने पृथ्वीच्या उपछायेत प्रवेश केला. मात्र, ढगांच्या गर्दीआड ही अवस्था साध्या डोळ्यांना जाणवली नाही. दहा वाजून ५२ मिनिटांनी चंद्राने पृथ्वीच्या दाट सावलीमध्ये प्रवेश केला. ग्रहणाचा मध्य ११ वाजून ५० मिनिटांनी झाला. या वेळी चंद्राचा चतकोर भाग पृथ्वीच्या सावलीने व्यापल्याचे दिसून आले. रात्री बारा वाजून ४८ मिनिटांनी ग्रहणाची खंडग्रास अवस्था संपली, तर दोन वाजून २० मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून बाहेर आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध मागण्यांसाठी शास्त्रज्ञ येणार रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मूलभूत संशोधनाला आणि उच्च शिक्षणाला पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, अवैज्ञानिक संकल्पनांना प्रतिष्ठा न देता वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा आदी मागण्यांसाठी येत्या नऊ ऑगस्ट रोजी पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये ‘इंडिया मार्च फॉर सायन्स’ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेश दधिच, डॉ. विनिता बाळ आणि डॉ. सत्यजित रथ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या मोर्चाविषयी आपली भूमिका मांडली.
यंदा २२ एप्रिल रोजी वैज्ञानिक जगताच्या वतीने जगभर ‘मार्च फॉर सायन्स’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच उपक्रमाच्या धरतीवर कोलकाता येथील ब्रेकथ्रू सायन्स सोसायटीच्या पुढाकाराने देशातील १२ प्रमुख शहरांमध्ये नऊ ऑगस्ट रोजी इंडिया मार्च फॉर सायन्स या मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘देशात अवैज्ञानिक संकल्पनांना सध्या मिळत असलेली प्रतिष्ठा खेदजनक असून, दुसरीकडे मूलभूत संशोधनाला पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. देशाच्या वैज्ञानिक विकासाच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक आहे,’ असे मत डॉ. रथ यांनी व्यक्त केले.
डॉ. बाळ म्हणाल्या, ‘मार्च फॉर सायन्सच्या पुण्यातील मोर्चाची सुरुवात नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता होईल. पुणे स्टेशन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघेल. निवृत्त शास्त्रज्ञ, संशोधक, महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.’
नियमानुसार सरकारी संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञ अधिकृतरित्या मोर्चात सहभागी होणार नसले, तरी अनेकांनी आमच्या उपक्रमाला पाठिंबा जाहीर केला असल्याचे डॉ. रथ यांनी नमूद केले.

डॉ. नारळीकर यांचे पत्रक
वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे देशाला इतिहासात वेळोवेळी किंमत चुकवावी लागली आहे. इतिहासातील चुकांमधून शिकून त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर पत्रकाद्वारे व्यक्त केले. डॉ. नारळीकर यांनी शास्त्रज्ञांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. ‘देशाचा विकास साधायचा असेल तर समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारासोबत मूलभूत संशोधनासाठी जीडीपीच्या किमान दोन टक्के तरतूद करायला हवी,’ अशी अपेक्षाही त्यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोच्या कर्जासाठी फ्रान्सचा पुढाकार

$
0
0

एएफडीचे शिष्टमंडळ उद्या करणार मेट्रोची पाहणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) पुणे मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक कर्जपुरवठा करण्यासाठी फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) शिष्टमंडळ उद्या, बुधवारी (९ ऑगस्ट) पुण्यात येणार आहे. मेट्रोच्या सध्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासह अडीचशे मिलियन युरोच्या (अठराशे कोटी रुपये) कर्जासाठी या बैठकीत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाचा खर्च ११,४२० कोटी रुपये असून, त्यापैकी निम्मा खर्च केंद्र-राज्य सरकार व महापालिका करणार आहेत. तर, उर्वरित निधी कर्जाच्या माध्यमातून उभा करण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सहा हजार दोनशे कोटी रुपयांच्या कर्जांपैकी साडेचार हजार कोटी रुपये (सहाशे मिलियन युरो) देण्याची तयारी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने दाखवली आहे. उर्वरित अठराशे कोटी रुपये कर्ज स्वरूपात देण्यासाठी ‘एएफडी’ इच्छुक आहे. त्यादृष्टीने, पुणे मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेऊन कर्ज पुरवठ्याच्या पुढील प्रक्रियेला गती देण्यासाठी बँकेचे शिष्टमंडळ येत्या बुधवारी पुण्यात येणार असल्याची माहिती ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
या भेटीमध्ये बँकेचे शिष्टमंडळ पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स दरम्यान सुरू झालेल्या मेट्रोच्या कामाची पाहणी करणार आहे. तसेच, त्यानंतर कर्ज पुरवठ्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे संकेत दीक्षित यांनी दिले. एएफडीला यापूर्वीच पुणे मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल पाठविण्यात आला होता. या अहवालाचा अभ्यास करूनच कर्ज देण्याची तयारी दाखविण्यात आली असून, त्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा बुधवारी होणार आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पासाठी जागतिक बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेने कर्ज पुरवठा करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, केंद्र सरकारने युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आणि एएफडीची शिफारस केली आहे. युरोपियन बँकेने यापूर्वी लखनौ मेट्रोसाठी कर्जपुरवठा केला आहे, तर एएफडीने नागपूर मेट्रोसाठी एक हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.

मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी त्यासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या वित्तीय संस्थांचा शोध घ्यावा लागतो. महामेट्रोच्या माध्यमातून पुणे मेट्रोचे काम होत असल्याने या प्रक्रियेत जाणारा वेळ वाचला आहे. मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळाली असतानाच, आता कर्जपुरवठ्यासाठी आर्थिक प्रक्रियाही लवकर पूर्ण होईल, असा विश्वास वाटतो.
ब्रिजेश दीक्षित
व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लता धायकरांच्या चौकशीचे आदेश

$
0
0

बनावट शैक्षणिक कागदपत्रांचे प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भाजपच्या नगरसेविका लता धायकर यांनी खोटे शपथपत्र आणि बनावट शैक्षणिक कागदपत्रे दाखल केल्याच्या फिर्यादीवरून त्यांची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. लष्कर कोर्टाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. पी. पुजारी यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
या प्रकरणी फिर्यादी पूनम हर्षद बोराटे यांनी लष्कर कोर्टात दावा दाखल केला आहे.
धायकर यांनी केलेल्या फसवणुकप्रकरणी, शासकीय व महापालिकेच्या फसवणुकीबाबत फौजदारी खटला भादंवि कलम १६७,१२९,२००,४०६,४२०, ४६३, ४६८ आणि ३४ नुसार धायकर यांच्यासह इतर साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा खटला दाखल करावा, अशी मागणी कोर्टात करण्यात आली होती. या प्रकरणात शैक्षणिक पात्रतेबाबतची त्वरित चौकशी करुन चार सप्टेंबरपर्यंत संबंधित पोलिस स्टेशनने कोर्टात अहवाल सादर करण्याचा आदेश कोर्टाने दिला.
फिर्यादी बोराटे यांच्यातर्फे अॅड. प्रताप परदेशी आणि अॅड. महेश राजगुरु यांनी खटला दाखल केला. नगरसेविका धायकर या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २१ ब गटातून निवडून आल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वी फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांनी ऑनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता १९७५मध्ये एसएससी उत्तीर्ण असे नमूद केले आहे. या कागदपत्रांमध्ये त्यांनी दाखल केलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर अर्जदार या एसएससी परीक्षा मार्च १९७४मध्ये अणुत्तीर्ण असा उल्लेख आहे. संबंधित शाळेत धायकर यांनी १९७५ मध्ये कुठलीच परीक्षा दिली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
२०१२ मध्ये झालेल्या सार्व​त्रिक महापालिकेच्या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये धायकर यांनी दिलेल्या माहितीमध्ये १९७३ - ७४ मध्ये अकरावी झाल्याचा उल्लेख आहे. दोन्ही वेळेस महापालिका प्रशासन, महाराष्ट्र निवडणूक आयोग, पुणे महापालिका, शासकीय यंत्रणांची जाणून बुजून खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. त्याबाबत कोर्टाने सर्व कागदपत्रांची पडताळणी करून वरील आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवास योजनेसाठी लाखभरांची नोंदणी

$
0
0

पात्र अर्जदारांची यादी लवकरच तयार होणार

म. टा. प्रतिनिधी‌, पुणे

प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे, यासाठीच्या पंतप्रधान आवास योजेनेंर्गत सुमारे १ लाख १३ हजार नागरिकांनी ऑनलाइन अर्ज पालिकेकडे दाखल केले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत सोमवारी संपली. योजनेसाठी आलेल्या अर्जांच्या छाननीचे काम सुरू असून, पात्र अर्जदारांची यादी लवकरच तयार होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. गेल्या आठ दिवसांमध्ये पालिकेकडे २० हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत.
देशात कोठेही मालकी हक्काचे घर नसलेल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना जाहीर केली. स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेची आपल्या पातळीवर अंमलबजावणी करावी, अशा सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. त्यानुसार पालिका प्रशासनाने नागरिकांकडून अर्ज मागविले होते. योजनेच्या माध्यमातून अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. योजनेच्या माध्यमातून शहर तसेच ग्रामीण भागातील गरीब आणि वंचित घटकातील जनतेला अल्प व्याजदरात परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शहरी भागामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए), गृहकर्जाच्या व्याजावर सवलत, परवडणाऱ्या किमतीत घरे आणि स्वतःच्या मालकीच्या जागेवर घर बांधण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे अशा चार घटकांसाठी ही योजना राबिवण्यात येणार आहे.
नागरिकांना अर्ज दाखल करता यावेत, यासाठी पालिकेने सावरकर भवन येथे स्वतंत्र कक्ष उभारला होता. तसेच या योजनेची माहिती देण्यासाठी जनजागृतीही केली होती. पालिकेकडे ऑनलाइन पद्धतीने आलेल्या १ लाख १३ हजार अर्जांपैकी सुमारे तीस हजार नागरिकांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी झाली असून, उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे. ऑनलाइन अर्ज भरताना अर्जदारांनी काही तांत्रिक त्रुटी केल्याचे निदर्शनास येत आहे. अर्जाच्या रकान्यांमध्ये भरलेल्या माहितीतही काही विसंगती आहेत. या तांत्रिक चुकांमुळे अर्जदार योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी त्रुटी दूर करण्यासाठी आणखी एक संधी अर्जदारांना दिली जाणार असल्याने प्रशासनाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर विरुद्ध हॉस्पिटल

$
0
0

टीव्ही, होर्डिंगद्वारे उपचारांच्या दरपद्धतीचा भडीमार; नियमांचे उल्लंघन

पुणे : कॅन्सरचे अद्ययावत उपचार देणार...कमी खर्चांत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीपासून सांध्याच्या आजारापर्यंत उपचार करणार, सिझेरियन, डिलिव्हरीसाठी किमान खर्चातील उपचारांच्या ग्राहकांना भुलविणाऱ्या पॅकेजचा भडीमार सध्या करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांप्रमाणे हॉस्पिटलवरही कायद्याचा बडगा उगारण्यात यावा, अशी अपेक्षा वैद्यकविश्वातून व्यक्त होत आहे.
शहराच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत मोक्याच्या ठिकाणी अनेक नामवंत हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटरचे फ्लेक्स, होर्डिंग्ज झळकू लागले आहेत. या होर्डिंग्जने दुचाकी, चारचाकी, बस अथवा रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधले जात नसेल, तरच नवल. अनेकदा जाहिरातीमध्ये मजकुरासह गोंडस बाळासह सेलिब्रेटीचा चेहराही झळकतो. त्यामुळे अनेकांना या जाहिराती आकर्षित करतात. शिवाय कमी खर्चात विविध उपचारांचे पॅकेज देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांना हॉस्पिटलकडे खेचण्याचा अप्रत्यक्षरित्या प्रयत्न शहरातील बड्या हॉस्पिटल्सकडून सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय जगतात ‘डॉक्टर विरुद्ध हॉस्पिटल’ अशी छुपी लढाई रंगल्याचे चित्र आहे. अनेक वर्षांपासून ‘कट प्रॅक्टिस’चे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत पेशंटना तक्रार करता येत नव्हती. डॉ. हिंमतराव बाविस्कर यांच्या धाडसामुळे या प्रकाराला वाचा फुटली. त्यामुळे वैद्यकविश्वात खळबळ उडालीहे. डॉक्टरांना ‘कट प्रॅक्टिस’मध्ये आणले जात असल्याने अनेक बड्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, दुसरीकडे छोट्या मध्यम स्वरुपाची प्रॅक्टिस असलेल्या डॉक्टरांमध्ये खासगीत चर्चा रंगली आहे. ‘आम्ही कट घेतो असा आरोप होतो. पण हॉस्पिटल्सकडून ठरावीक कंपन्यांची औषधे वापरण्याची सूचना केली जाते. त्याची अंमलबजावणी आम्हाला करावी लागते. त्या वेळी हॉस्पिटलला फायदा होतो. त्यात डॉक्टरांना काहीच मिळत नाही. तरीही आरोप होतात. मग परस्पर कट घेणाऱ्या हॉस्पिटलला कायद्याच्या कक्षेत कधी आणणार?,’ असा सवाल डॉक्टरांच्या एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर उपस्थित केला.
सध्या शहरभर उपचारांच्या जाहिराती आणि पॅकेज यांनीच बरीचशी जागा व्यापली आहे. त्यामुळे सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) कायद्यानुसार डॉक्टरांना व्यवसायाची जाहिरात करता येत नाही. मग, सध्या सुरू असणाऱ्या हॉस्पिटलच्या जाहिरातींवर कोणाचे नियंत्रण आहे असा सवाल तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

‘कट प्रॅक्टिस’ म्हणजे काय?
औषध कंपन्यांकडून डॉक्टरला देण्यात येणाऱ्या भेटवस्तू अथवा ‘कट’ला कायद्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कंपन्यांच्या डॉक्टरांना परदेश वाऱ्या, गिफ्ट, मोबाइल ते लॅपटॉपर्यंत अथवा हॉस्पिटलच्या इंटेरिअरपासून ते टीव्ही, बॅनर्स किंवा पेंटिग्जसारखी विविध कामे करून देण्यात येतात. त्या बदल्यात संबंधित हॉस्पिटलने कंपनीच्या औषधांपासून ते स्टेंटसाररखी साधने वापरण्यावर भर द्यावा, असा अप्रत्यक्ष अलिखित करारच हॉस्पिटल आणि कंपन्यांमध्ये होतो. त्यालाच ‘कट प्रॅक्टिस’ म्हटले जाते.

खासगी डॉक्टर कट प्रॅक्टिस करीत असल्याचा आरोप होत असला तरी, त्यात काही अंशी तथ्य आहे. परंतु, या प्रकारात हॉस्पिटलही सहभागी आहेत. कंपन्यांशी त्यांचे थेट संबंध प्रस्थापित होत असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कट प्रॅक्टिस होत आहे. त्यातून नफेखोरी वाढली आहे. त्यामुळे डॉक्टरांसह खासगी हॉस्पिटल ही कट प्रॅक्टिसच्या कायद्याच्या कक्षेत आली पाहिजे. याचा राज्य सरकारने विचार करायला हवा.
डॉ. अभिजित मोरे, सहसमन्वयक, जन आरोग्य अभियान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चुकांचा अहवाल लवकरच अपेक्षित

$
0
0

जिल्हा परिषदेने पाठवले गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा परिषदेच्या तिसरीच्या मराठीच्या पुस्तकांमध्ये आढळून आलेल्या अक्षम्य चुकांसंदर्भात जुन्नर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे विचारणा करणारे पत्र जिल्हा परिषदेने पाठविले आहे. पुस्तकातील चुकांबाबत लवकरच अपेक्षित अहवाल असून, संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना नव्याने पुस्तके देण्यात आली आहेत.
दरम्यान, राज्यातील प्राथमिक विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये काही धडे ‘रिपीट’ झाल्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. या प्रकारामुळे ‘बालभारती’तील सावळागोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला असून, शिक्षण विभागातील कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात येत आहे. ‘बालभारती’च्या वतीने राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप केले जाते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वैष्णवधाम शाळेतील विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेल्या मराठी विषयाच्या पुस्तकांमध्ये सहा धडे ‘रिपीट’ झाल्याची माहिती पुढे आली. तसेच पृष्ठ क्रमांक ८ पर्यंत अनुक्रमणिका व्यवस्थित आहे. त्यानंतर पान क्रमांक ४१ ते ५६ असा क्रम लावण्यात आला आहे. पुन्हा पान क्रमांक २५ची छपाई कऱण्यात आली आहे. त्यामुळे तिसरीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना एकच धडा पुन्हा वाचावा लागणार का, असा सवाल जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य आशा बुचके यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारला होता. त्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘शालेय विद्यार्थ्यांना दिलेल्या पुस्तकांमध्दये चुका आढळल्या आहेत. ती पुस्तके बदलण्यात आली आहेत. तसेच, याबाबत बालभारतीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला असून, येत्या काही दिवसांत तो अपेक्षित आहे. चुका असलेल्या पुस्तकांची संख्या अधिक असल्यास त्याबाबत बालभारतीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ती पुस्तके बदलून देण्याची तयारी करण्यात येईल.’

तोंडी बदल्यांचे आदेश रद्द
जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेमणुका कऱण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्जीतील काही गटशिक्षणाधिकाऱ्यांना थेट पुण्यातच शिक्षण विभागात काम कऱण्याची जबाबदारी सोपविली होती. कागदोपत्री त्यांची संबंधित तालुक्याच्या ठिकाणी नेमणूक केली जात होती. परंतु, तोंडी त्यांच्या बदली ही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात केली जात असे. त्यामुळे अनेक गटशिक्षणाधिकाऱ्यांचा थेट साहेबांजवळचे असा रुबाब तयार होत होता. परिणामी, तालुक्याच्या ठिकाणच्या शिक्षण व्यवस्थेचे काय असा सवाल उपस्थित होता. या तोंडी बदल्याबाबत मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्या संदर्भात ‘तोंडी बदल्याचे आदेश रद्द करण्यात आले असून त्या संबंधितांना त्यांच्या जागी पाठविण्यात आले आहे’ असे प्राथमिक शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाज ‘पुरुषोत्तम’चा आजपासून घुमणार

$
0
0

यंदा विजेतेपदासाठी ५१ महाविद्यालये आमने-सामने

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाविद्यालयीन तरुणांच्या नाट्यकलेला व्यासपीठ देण्यासाठी ‘महाराष्ट्रीय कलोपासक’तर्फे आयोजित केल्या जाणारी ‘पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा’ आज, मंगळवारपासून भरत नाट्य रंगमंदिर येथे रंगणार आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न ५१ महाविद्यालये स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी आमनेसामने उभी ठाकली आहेत.
स्पर्धेची प्राथमिक फेरी २३ ऑगस्टपर्यंत रंगणार असून, दररोज सायंकाळी ५ ते ८ या वेळेत तीन एकांकिकांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या महाविद्यालयांनी अंतिम फेरी गाठण्यासाठी जय्यत तयारी केली असून, संहिता, दिग्दर्शन, अभिनय, सादरीकरणावर भर देण्यात आला आहे. विविध सामाजिक विषयांवर रंजकपणे भाष्य करणाऱ्या एकांकिकांवर भर देण्यात आला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या एकांकिकाही यंदाचे वैशिष्ट्य ठरणार असल्याची चर्चा ‘पुरुषोत्तम’च्या वर्तुळामध्ये रंगली आहे. आनंद पानसे, सचिन पंडित आणि रुपाली भावे हे यंदाच्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
गेल्या वर्षी स्पर्धेत दर्जा खालावलेल्या दहा एकांकिकांना यंदाच्या स्पर्धेत पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला लागल्याने विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पाच ते सहा महाविद्यालयांना यंदा स्पर्धेत प्रथमच सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या महाविद्यालयांच्या सादरीकरणावरही स्पर्धकांचे विशेष लक्ष असणार आहे. याशिवाय गेल्या वर्षी विजेतेपद पटकावणाऱ्या स. प. महाविद्यालय, पीआयसीटी, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यातही अंतिम फेरीसाठी चांगलीच चुरस असणार आहे. गणेशोत्सव ऑगस्ट महिन्यातच आल्याने महाराष्ट्रीय कलोपासकने स्पर्धा अलिकडे घेण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्येही दोन महिन्यांपासून स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे, अंतिम फेरीत कोणती महाविद्यालये धडक मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आजच्या एकांकिका
१. वेध, व्हीआयटी महाविद्यालय, सायं. ५ वा.
२. साकव, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय, सायं. ६ वा.
३. ड्रायव्हर, प्रेमराज सारडा महाविद्यालय, नगर, सायं. ७ वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाभाऊंची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. संघटनेने नेमलेल्या चौकशी समितीने हा निर्णय जाहीर केला असून सरकारमध्ये राहायचे की नाही, याबाबत येत्या आठ दिवसांत संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे सदाभाऊ आणि खासदार राजू शेट्टी यांची गेल्या १३ वर्षांची दोस्ती संपुष्टात आल्याने ‘सख्खे मित्र, पक्के वैरी’ झाले आहेत. चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णयांची घोषणा केली.

‘सदाभाऊ खोत यांनी आजवर केलेले काम आणि त्यांच्यावर गेल्या काही दिवसांत झालेल्या आरोपांमुळे संघटनेची बदनामी होत आहे. त्यामुळे त्यांना संघटनेतून काढून टाकण्याचा निर्णय तत्काळ घेण्यात आला आहे. समितीने घेतलेल्या या निर्णयाची माहिती संघटनेचे प्रमुख खासदार शेट्टी यांना देण्यात आली आहे’, असे चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत म्हणाले.

‘खोत यांना चौकशी समितीकडून प्रश्नावली देण्यात आली होती. त्या प्रश्नावलीला उत्तरे देताना त्यांनी काही महत्त्वाच्या धोरणात्मक आणि नैतिक प्रश्नांना तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेऊन बगल दिली आहे. त्यांनी उत्तरांतून केलेला शब्दच्छल समितीला अनावश्यक वाटला. त्यानंतर त्यांना संघटनेतून काढून टाकण्याचा निर्णय समितीने घेतला आहे’, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

सदाभाऊंची वाट व चाल!

•शेतकरी संघटनेमध्ये १९९० पासून कार्यरत.

n २००४ नंतर खासदार राजू शेट्टी यांच्याशी दोस्ती.

n स्वाभिमानी शेतकरी संघटनेत २००९ पासून सामील.

n २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून निवडणूक लढविली. विजयसिंह मोहिते पाटील यांना कवडी झुंज देऊन सुमारे २५ हजार मतांनी पराभव.

n भाजपतर्फे जून २०१६ मध्ये विधान परिषदेवर निवड.

n राज्याचे कृषी, पणन राज्यमंत्री म्हणून जुलै महिन्यात मंत्रिमंडळात स्थान.

n जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सदाभाऊंच्या मुलाचा पराभव झाल्यावरून शेट्टी यांच्याबरोबर मतभेद.

मंत्रिपद राहणार

राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाली असली, तरी त्यांच्याकडील राज्यमंत्रिपद कायम राहणार आहे. खोत हे विधान परिषदेवर भाजपचेच सदस्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्याना पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे खोत यांना राज्यमंत्रिपदावरून हटविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी रचलेल्या मनसुब्यावर पाणी पडेल, असे भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू झाला होता. त्यात खोत यांना भाजपने विधान परिषदेचे सदस्य बनविले. तसेच त्यांना राज्यमंत्रीही केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना

वाढविण्यात शेट्टी यांच्याइतकीच खोत यांचीही मेहनत आहे. परंतु खोत यांच्या चौकशीसाठी शेट्टी यांनी पक्षाच्या नेत्यांची समिती नेमली. खोत यांनी पक्षविरोधी काम केलेले आहे, असा ठपका ठेवून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आहे. संघटनेला एक राज्यमंत्रिपद दिलेले आहे. खोत यांना पक्षातून काढल्यामुळे त्यांनी राज्यमं‌‌त्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

मुख्यमंत्री निर्णय घेतील ः खोत

आपल्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढले आहे. मात्र राज्य मंत्रिमंडळातून कोणाला काढायचे आ‌‌णि ठेवायचे हा अधिकार मुख्यमंत्री फडणवीस यांचा आहे. तेच माझ्याबाबत निर्णय घेतील, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. यापुढे नवा पक्षा काढायचा की अन्य पक्षात प्रवेश करायचा, याबाबतचा निर्णय हा माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गांवरील प्रवास टाळण्याचे आवाहन

$
0
0

मराठा मोर्चामुळे मुंबईकडे वाहनांची लगबग वाढण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नगर येथून मुंबई येथे उद्या, बुधवारी (ता.९) होणाऱ्या मराठा मूक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे आणि जुन्या महामार्गावरून मंगळवारी दुपारपासूनच वाहनांची लगबग वाढण्याची शक्यता आहे. वाहनांची मोठ्या प्रमाणावरील संख्या लक्षात घेऊन येत्या दोन दिवसांत मुंबईसह सोलापूर, सातारा आणि नगर महामार्गावरील प्रवास शक्यतो टाळावा, असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.
मुंबई येथे नऊ ऑगस्टला मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आयोजकांकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चासाठी आज, मंगळवारपासून (ता.८) सातारा, सोलापूर आणि नगरहून मुंबईला मोठ्या प्रमाणावर वाहने जाण्याची शक्यता आहे. ही सर्व वाहने पुण्यामार्गे एक्स्प्रेस-वे आणि जुन्या मुंबई महामार्गाने मुंबईला दाखल होतील. त्यामुळे सोलापूर रस्त्याने येणारी वाहने हडपसर गाडीतळ-कोंढवा-कात्रज बासपास-बेंगळुरू महामार्गावरून मुंबईकडे जातील. साताऱ्याकडून येणारी वाहने बेंगळुरू महामार्गाने मुंबईकडे जातील. नगर रस्त्याने चाकणमार्गे न गेलेली वाहने शहरात येऊऩ वाघोली, येरवडा होळकरपूल, बोपोडीमार्गे मुंबईला जातील. ही वाहतूक मंगळवारी दुपारनंतर होणे अपेक्षित आहे. मोर्चानंतर गुरुवारी (ता. १०) परतीचा प्रवासही त्यांचा याच मार्गाने होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या सर्व मार्गांवर आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मराठा मूक मोर्चाला तुफान प्रतिसाद मिळाला होता. लाखोंच्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी महामार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईला जाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांना पुण्यामार्गे जावे लागणार आहे. तसेच, मुंबईला जाण्यासाठी एक्स्प्रेस-वे आणि जुना महामार्ग हे दोनच प्रमुख रस्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर अधिक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिंतींवरची झाडे धोकादायक

$
0
0

पुणे : भिंतींवर, कोनाड्यांवर आलेले पिंपळाचे झाड चांगले दिसते, म्हणून त्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांसाठी या झाडांची मुळे डोकेदुखी बनली आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वाडे, ऐतिहासिक वास्तू, जुने पूल आणि इमारतींच्या भिंतींवर वाढलेली वड, पिंपळ, उंबराची झाडे बांधकाम कमकुवत करण्यास जबाबदार ठरत आहेत. या झाडांच्या दुष्परिणामांबाबत माहिती नसल्याने खासगी वास्तूंबरोबरच ऐतिहासिक इमारतींवरही या मुळांचे जाळे पसरले आहे.

मध्यवर्ती पुण्यात भटकंती करताना बहुतांश वाडे, जुन्या मंदिराच्या भिंती, कौलांवर किंवा कोनाड्यात, नदीच्या पुलांवर उंबर, वड किंवा पिंपळाची झाडे वाढलेली पाहायला मिळतात. अलीकडे नवीन इमारतींवरही या झाडांनी बस्तान बसवले आहे. लांबून पाहताना ही झाडे भिंतीची शोभा वाढवत असल्याचे दिसत असले, तरी बांधकामाच्या दृष्टीने ती धोकादायक ठरत आहेत. भितींवर वाढलेल्या वृक्षांमुळे पावसाळ्यात वाडे पडल्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील सार्वजनिक आणि खासगी घरांवर वाढलेल्या या झाडांची संख्या काही हजारांवर असल्याचे वनस्पती अभ्यासक सांगत आहेत. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. पुण्यातील शनिवारवाडा असो, ऐतिहासिक मंदिरे, विहिरी किंवा किल्ल्यांच्या तटबंदीवर या वृक्षांची ‘वस्ती’ वाढत आहे.

जुन्या वास्तूंमध्ये भिंतींवर वाढलेल्या झाडांचे प्रमाण अधिक आहे. महापालिकेच्या वास्तू; तसेच पुलांची देखभाल करताना ही झाडे वेळोवेळी कढली जातात. नागरिकांकडून आम्हाला दर काही दिवसांनी झाडे काढण्याबद्दल अर्ज येतात. घटनास्थळाची पाहणी केल्यावर आम्ही झाड काढण्याची परवानगी देतो. पण, अनेक लोकांना या झाडांमुळे बांधकामावर दुष्परिणाम होऊ शकतो, याची जाणीव नाही, असे उद्यान विभागाचे अधिक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.

वनस्पती अभ्यासक श्रीकांत इंगळहळीकर यांनी या झाडांचे शास्त्रीय पद्धतीने उच्चाटन करण्याची पद्धती विकसित केली आहे. इंगळहळीकर म्हणाले, ‘या झाडांची मुळे भिंतींमध्ये खोलवर गेलेली असतात. त्यामुळे त्यांची छाटणी करून उपयोग होत नाही. पावसाळा सुरू झाल्यावर ती पुन्हा जोमाने वाढतात. पर्यायाने मुळांचे जाळेही अधिक होते. मुळापासून उच्चाटन हा एकच पर्याय असतो. शास्त्रीय पद्धतीने ही झाडे काढण्यासाठी झाडांच्या विशिष्ट फांद्यावर जखम करून त्यामध्ये औषध भरले जाते. बँडेज लावले जाते. काही दिवसांनी हे झाड वाळते आणि बांधकामात पसरलेली मुळे निर्जीव होतात.’

‘महात्मा फुले मंडई आणि विश्रामबागवाड्यावर आलेली काही झाडे आम्ही यापूर्वी हेच टेक्निक वापरून यशस्वीरीत्या काढली होती. त्यानंतर इतर वास्तूंवरही हा प्रयोग करण्याचे ठरले होते. पण, पुढे काही घडले नाही. महापालिकेसह पुरातत्त्व विभागानेही या झाडांची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे’, असे इंगळहीळकर यांनी सांगितले.


जागेच्या भांडात झाडे वाढतात

जुने वाडे आणि इमारतींच्या भिंती, कोनाडे आणि छतांवर वड, उंबर, पिंपळाची झाडे आहेत. या वाड्यांमध्ये वर्षानुवर्षे राहणारे भाडेकरूंकडून आम्हाला यासंदर्भात सातत्याने अर्ज येतात. पण, नियमानुसार झाडाच्या मूळ मालकाच्या परवानागीशिवाय झाड तोडायला होकार देता येत नाही. जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वैमनस्य, तर काही ठिकाणी त्यांच्यातील अपुऱ्या संवादामुळे पुढे काहीच घडत नाही. रोपटे असतानाच ते काढून टाकल्यास नुकसान टाळणे शक्य आहे. आज अनेक घरांवर मोठ्या उंचीची आणि लांबवर मुळे पसरलली झाडे आहेत.

अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक,महापालिका


‘वृक्षप्राधिकरणा’तही राजकीय ‘वाटाघाटी’

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वृक्षप्राधिकरण समितीच्या सदस्यपदी स्वयंसेवी संस्थांतील सात सदस्यांच्या निवडीतील गोंधळात आणखी भर पडली आहे. या सदस्य निवडीबाबत राजकीय पक्षांचे ‘वाटाघाटी’वरून वाद सुरू झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची (भाजप) कोंडी करण्याचा येथेही प्रयत्न चालला असल्याने ही निवड प्रक्रिया लांबत आहे.

वृक्ष प्राधिकरण समितीवर सात नगरसेवकांची यापूर्वी निवड करण्यात आली आहे. तर, हायकोर्टाच्या आदेशानुसार स्वयंसेवी संस्थांतील सात सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने जाहिरात काढली होती. त्याची अर्ज प्रक्रिया, छाननी करण्यात आली आहे. या सात सदस्यांची नावे निश्चितीची बैठक गणसंख्येभावी होऊ शकली नव्हती. त्यामुळे उद्या (गुरुवारी) आयोजित बैठकीत स्वयंसेवी संस्थांवरील सदस्यांबाबत निर्णय अपेक्षित आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार या समितीच्या सदस्यपदी स्वयंसेवी संस्थांतील व्यक्तींची निवड करणे अपेक्षित आहे. ही निवड करताना राजकीय पक्षांकडून कायद्याच्या चौकटीत आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या सात सदस्यांच्या निवडीमध्ये भाजपकडून पाच सदस्यांची मागणी होत आहे. तर, उर्वरित दोन जागा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायच्या, अशी भाजपची भूमिका आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

भाजपच्या या मागणीमुळे माशी शिंकली असून काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत किमान एक जागा हवीच, असा आग्रह धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही दोन जागा मिळाल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्नशील आहेत. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचा भाजपसाठी पाच जागांचा हट्ट आहे. त्यामुळे भाजपला पाचपैकी एक जागा विरोधकांना द्यावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, या समितीवर नेमण्यात आलेल्या सात नगरसेविकांपैकी नगरसेविका फरजाना अय्यूब शेख यांचा जातीचा दाखला जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे कायद्यानुसार त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने वृक्षसंवर्धन समितीच्या सोमवारच्या बैठकीस त्या उपस्थित नव्हत्या. या समितीच्या सर्व सदस्य नगरसेवकांची उपस्थिती असेल, तरच स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांची नियुक्ती करणे शक्य आहे. परिणामी गणसंख्येच्या अभावी ही बैठक तहकूब करण्यात आली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीने या संधीचा फायदा उठवण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या वाट्याला एक जागा मिळणार नसेल तर काँग्रेसचा सदस्य या बैठकीला अनुपस्थितीत राहण्याची शक्यता अधिक आहे. या स्वयंसेवी संस्थामधून निवडण्यात येणाऱ्या सदस्यांच्या बैठकीला एक सदस्य जरी गैरहजर राहिला तर इतर कुठल्याही सदस्याची निवड करणे शक्य नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चॅनेल्सवरही उपचारांच्या जाहिराती

$
0
0

पुणे : शहरातील विविध भागांत हॉस्पिटलच्या उपचारांची जाहिरात करणारे फलक झळकत असताना गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही चॅनेल्सवर आयुर्वेदासह अन्य पॅथींच्या डॉक्टरांच्या जाहिराती झळकत आहेत. आजार बरा होत असल्याचा दावा करता येत नसतानाही जाहिरातींतून आजार बरा होत असल्याचा दावा केला जात आहे. जाहिरातींच्या भूलथापांना अनेक पेशंट बळी पडत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. परंतु, या जाहिरातींवर नियंत्रण नसल्याने त्यावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त होत आहे.

आयुर्वेदासह अन्य पॅथींच्या जाहिरांतीद्वारे विविध प्रकारचे आजार बरे होत असल्याचा दावा केला जात आहे. त्याशिवाय, थेट ग्राहक, पेशंटना औषध खरेदीसाठी पैसे पाठविण्याचे आवाहन करताना त्यांना सवलतीच्या दरात औषधे दिले जात असल्याचे आमिष दाखविले जात आहे. काही चॅनेल्सवर दिवसा आणि रात्री ठराविक सेलिब्रिटींच्या माध्यमांतून विविध औषधांचा प्रचार करणाऱ्या जाहिराती दाखविण्यात येत आहेत. त्या जाहिरातींना बळी पडून अनेकांनी कंपन्यांशी संपर्क केला जात आहे.

पोटाचा वाढलेला घेर कमी करणे, लठ्ठपणा कमी करणे, डोळ्यांचे आजार, लैंगिक समस्या दूर करणे, मधुमेह, रक्तदाब बरा करणे, सौंदर्य वाढविणे, चेहऱ्यावरील मुरमे बरे करणे, केस लांब, तसेच काळेभोर करणे, उंची वाढविणे यासारख्या गोष्टींवर आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार करणे अथवा ऑपरेशनशिवाय आजार बरा करण्याचा दावा विविध औषध कंपन्या अथवा विविध पॅथींच्या डॉक्टरांकडून केला जात आहे. त्या संदर्भातील जाहिरातील दिसू लागल्या आहेत.

‘ड्रग मॅजिक रेमिडी’ (ऑब्जेक्शनेबल अॅडव्हर्टायझमेंट अॅक्ट) या कायद्यान्वये कोणताही आजार ठराविक उपचाराने बरा होतो असा दावा करता येत नाही. त्याबाबत कोणत्याही औषध कंपनी अथवा डॉक्टर हा दावा करू शकत नाही. तसेच, त्या प्रकारच्या जाहिराती ही करता येणार नाही,’ अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

कायद्यात तरतूद असतानाही त्याचे उल्लंघन करून लाखो रुपये खर्च करून जाहिराती दाखविल्या जात असल्याची वस्तुस्थिती समोर आहे. जाहिरातींमध्ये थेट डॉक्टरांसह त्या कंपन्यांचा संपर्क क्रमांक देणाऱ्या जाहिरातींचा टीव्ही चॅनेल्सवर धुमाकूळ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

कंपन्यांना कोणतीही जाहिरात करता येते. परंतु, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्टनुसार कोणताही डॉक्टर जाहिरात करू शकत नाही. आयुर्वेदाच्या औषधांद्वारे तज्ज्ञ वैद्यांमार्फत अनेक जाहिराती झळकत आहेत. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज असून कायद्याच्या कक्षेत ते यायला हवे. बरे न होणारे आजार बरे होत असल्याचा खोटा दावा या जाहिरातींमधून केला जात आहे. त्यामुळे पेशंटची फसवणूक होत असून त्याला आळा बसला पाहिजे.

डॉ. सुहास परचुरे, माजी सदस्य, सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन (सीसीआयएम)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपीचे सोमवारी दोन कोटींचे उत्पन्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राखीपौर्णिमेनिमित्त सोमवारी पीएमपीएमएलने १ हजार ६४५ गाड्या मार्गावर आणून १ कोटी ९७ लाख १९ हजारु रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. रोजच्या सरासरी उत्पन्नापेक्षा ३० ते ३५ लाखांनी ही रक्कम अधिक आहे. दर वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीएमएलच्या प्रवासी संख्येत वाढ होते. त्यामुळे जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले. यंदाही रोजच्या संचलनातील १ हजार ५७९ गाड्यांबरोबच ७१ जादा बसचे नियोजन केले होते. त्यातून १ कोटी ९७ लाख १९ हजारांचे उत्पन्न पीएमपीएमएलला मिळाले. दररोज सरासरी १ कोटी ६० ते ६५ लाखांचे उत्पन्न पीएमपीएलला मिळत असते.

विमानतळ-हिंजवडी एसी बस

पीएमपीएलतर्फे विमानतळ ते हिंजवडी माण (फेज ३) या मार्गावर वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससाठी पीएमपीएमएलकडून ऑनलाइन बुकिंगचीही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशाला १८० रुपये मोजावे लागणार आहेत. हिंजवडीतील आयटी उद्योगातील कर्मचारी अनेकदा विमान प्रवास करत असतात. त्यासाठी त्यांना खासगी वाहने किंवा कॅबचा वापर करावा लागतो. या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि भरवशाची प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पीएमपीएमएलने विमानतळ, विमाननगर, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, औंध गाव, वाकड, हिंजवडी गाव, फेज १, फेज २ आणि फेज ३ या मार्गाने ही सेवा सुरू केली आहे. माण फेज ३ पासून पहाटे ५.१५, ५.४५, ९, ९.४५, दुपारी १.१५, २.१५ तर, सायंकाळी ५.३० आणि ६.३० वाजता गाड्या सुटणार आहेत. तसेच, विमानतळापासून सकाळी ७.१५, ७.४५, ११.५, दुपारी १२, ३.१५, ४.१५ तर, रात्री ८ आणि ९ वाजता गाड्या सुटणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन परवान्यांकडे गणेश मंडळांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवान्यांसाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या ऑनलाइन वेब पोर्टलकडे गणेश मंडळांनी पाठ फिरवली आहे. पोलिसांनी ऑनलाइन पद्धतीने एकाच वेळी सर्व परवाने उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली असली, तरी मंडळांनी ऑफलाइन अर्ज भरण्यावरच अधिक भर दिल्याचे चित्र आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये ऑनलाइन पद्धतीने केवळ १०५ अर्ज पोलिसांकडे दाखल झाले असून अनेक गणेश मंडळांना ऑनलाइन अर्जांची प्रक्रियाच अद्याप समजली नसल्याचेही सांगितले जात आहे.

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून पुणे प्रशासन आणि पुणे पोलिस यांच्यातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याच संकल्पनेचा एक भाग म्हणून या वर्षापासून गणेश मंडळांना ऑनलाइन पद्धतीने सर्व परवाने देण्याची संकल्पना पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मांडली होती. त्यानुसार एक ऑगस्टपासून ही सेवा सुरू करण्यात आली. मांडव, मंडळाची जागा, मिरवणूक, विद्युत रोषणाई, तसेच वाहतूक शाखेशी संबंधित सर्व परवाने ऑनलाइन पद्धतीने देण्याची व्यवस्था वेब पोर्टलमध्ये करण्यात आली आहे. पोलिसांच्या punepolice.co.in या संकेतस्थळावर हे वेब पोर्टल उपलब्ध आहे. त्यामध्ये मंडळाने एकदा सर्व माहिती भरल्यानंतर पुढील एका आठवड्याच्या आत त्यांच्यापर्यंत इ-मेल द्वारे परवाने पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रक्रियेत मंडळांचा बराचसा वेळ वाचणार आहे. तरीही, मंडळांकडून या उपक्रमाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. ऑफलाइन अर्जांसाठी प्रत्येक ठिकाणी वेगळे अर्ज करावे लागत असले, तरीही मंडळांनी तोच मार्ग निवडल्याचे चित्र आहे.

गणेशोत्सव जवळ येईल तशी मंडळांची परवान्यांसाठी धावपळ होते. त्यामुळे ऑनलाइन परवान्यांसाठीचे अर्जही या आठवड्यात वाढत जातील, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मंडळांना परवान्यांसाठी अडचण येऊ नये म्हणून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरात लवकर मंडळांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावेत, यासंदर्भात आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे करण्यात येणाऱ्या अर्जांची मुदत २० ऑगस्टपर्यंतच आहे. त्या आधीच गणेश मंडळांना ऑनलाइन अर्जांची पूर्तता करावी लागणार आहे.

एक ऑगस्टपासून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू केली आतापर्यंत १०५ मंडळांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. या आठवड्यात अर्जांमध्ये लक्षणीय वाढ होईल. ही प्रक्रिया पहिल्यांदाच राबवली जात असल्याने त्याची मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे.

सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्त, अर्थिक व सायबर गुन्हे शाखा

केवळ एकाच मंडळाला ऑनलाइन परवानगी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांसाठी सुरू केलेल्या ऑनलाइन परवानगीअंतर्गत महापालिकेने आत्तापर्यंत केवळ एकच परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेच्या परवानगीविनाच शहराच्या अनेक भागांत मंडळांचे मंडप उभे राहात असून, अशा मंडपांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेने गेल्या वर्षी सण-उत्सवांसाठी मंडप धोरण आखले होते. या धोरणातील नियमांनुसार मंडळांना परवानगी दिली जात होती. यंदा पोलिसांच्या सहकार्याने सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. पोलिसांकडे मंडळांकडून शंभरहून अधिक अर्ज दाखल झाले असले, तरी पालिकेने अधिकृतरित्या आत्तापर्यंत केवळ एकाच मंडळाला परवानगी दिली आहे. येत्या काही दिवसांत हे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी वाहतूक पोलिस आणि इतर संबंधित विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पालिकेकडून अंतिम परवानगी दिली जात असल्याचे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शहराच्या वेगवेगळ्या भागांत मंडळांकडून मंडप उभारण्यास सुरुवात झाली असली, तरी पालिकेच्या आकडेवारीनुसार यातील अनेक मंडळांनी परवानगीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे दिसून येते.

मंडपांच्या संदर्भात मुंबई हायकोर्टाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंडपासाठी पोलिस/महापालिका यांच्याकडून प्राप्त झालेल्या परवानगीची प्रत दर्शनी भागात लावण्याचे बंधन मंडळांवर घालण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली नेमण्यात आलेल्या मंडप तपासणी समितीकडून सर्व मंडपांना दिलेल्या परवानग्यांचा आढावा घेण्यात येणार असून, त्यात दिलेल्या परवानगीपेक्षा जादा मंडप घातल्याचे दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना महापालिका-पोलिसांना देण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रत्येक खड्ड्याला दोन हजार रुपये दंड

हायकोर्टाच्या आदेशांनुसार पालिकेने केलेल्या मंडप धोरणामध्ये रस्ते-फूटपाथवर खड्डे घेऊ नयेत, असा नियम आहे. तरीही, दर वर्षी शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खोदण्यात येतात. काँक्रिटचे रस्ते खोदल्यास प्रति खड्डा दोन हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव आहे. गेल्या वर्षी महापौरांनी दिलेल्या आदेशांनुसार संबंधित मंडळांनी खड्डे बुजविल्याने दंड वसुली केली नसल्याचा खुलासा पालिकेने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शहरात उद्या पाणी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्वतीसह वडगाव, लष्कर, नवीन होळकर जलकेंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या विविध पंपिंग स्टेशनमध्ये स्थापत्य/विद्युतविषयक अत्यावश्यक कामे करायची असल्याने येत्या गुरुवारी (१० ऑगस्ट) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (११ ऑगस्ट) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग

पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती गाव, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, सहकारनगर, सातारा रोड परिसर, बिबवेवाडी परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणे, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मीठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र. (४२, ४६) कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, पर्वती व पद्मावती टँकर भरणा केंद्र.

वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.

लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी.

नवीन होळकर जलकेंद्र : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी परिसर.


एसएनडीटी, वारजेचा पाणीपुरवठा सुरू राहणार

चतुःशृंगी, एसएनडीटी आणि वारजे जलकेंद्रांतर्गत पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, गोखलेनगर, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, रामबाग कॉलनी, भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरु गणेशनगर, वारजे, रामनगर अहिरेगाव, पॉप्युलरनगर, सूस, सुतारवाडी या परिसराचा पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुरुषोत्तम’ला दिमाखात सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘अरे...आवाज कुणाचा.. व्हीआयटीचा’, ‘आवाज कुणाचा...कमिन्स कॉलेजचा’, अशा आरोळ्या आणि घोषणांच्या उत्साहात पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला मंगळवारी दिमाखात सुरुवात झाली. व्हीआयटी, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अहमदनगर प्रेमराज सारडा या महाविद्यालयांच्या एकांकिकांनी रसिकांची मने जिंकली.

‘व्हीआयटी’च्या ‘वेध’ या एकांकिकेने स्पर्धेला सुरुवात झाली. अंतराळातील ग्रहमालांमध्ये पृथ्वीप्रमाणे वस्ती असेल का, याचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांवर ही एकांकिका आधारली होती. त्यातून इस्त्रो आणि नासामध्ये चालणारी तात्विक स्पर्धा, शास्त्रज्ञांचे कुतूहल त्याच्याशी जोडली गेलेली राजकीय, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाबी मांडण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला. इस्त्रोमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी अर्धवट सोडलेले काम त्यांची मुलगी त्याच स्थानी येऊन पूर्ण करते. विद्यार्थी लेखक अमित भुसारी याने या एकांकिकेचे लेखन केले होते. सानिका पत्की, दिग्विजय अंधोरीकर यांनी नाटकाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली होती. संगीत आणि प्रकाशयोजनेची बाजू उत्कृष्टपणे सांभाळण्यात आली होती.

‘व्हीआयटी’ची एकांकिका सादर झाल्यानंतर कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाने ‘साकव’ ही एकांकिका सादर केली. मुंबईमध्ये पावसामुळे झालेल्या प्रलयात अडकलेल्या ‘एका कुटुंबाची गोष्ट’ या एकांकिकेद्वारे सादर झाली. त्यानंतर अहमदनगरच्या प्रेमराज सारडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘ड्रायव्हर’ ही एकांकिका सादर झाली. साध्या गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून काम करीत असलेला एक गृहस्थ एसटीमध्ये ड्रायव्हर होण्याचे स्वप्न पाहतो. त्यासाठी दहावी उत्तीर्ण होण्याची अट असल्याने तो परीक्षाही देतो. पण, त्यात अपयशी होतो. ड्रायव्हरच्या स्वप्नांचा हा प्रवास मांडण्याचा प्रयत्न या एकांकिकेत करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्ध्यावरती डाव मोडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया यादीत नाव नसल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली; तर ताथवडे येथे एका उच्चशिक्षित विवाहितेने अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिसऱ्या घटनामुळे चिखली जाधववाडी येथे युवकाने गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले. शहरात एकाच दिवशी मंगळवारी (८ ऑगस्ट) आत्महत्येच्या तीन घटनांमुळे खळबळ उडाली आहे.
अनिषा नंदकुमार ठाकुरे (१६, रा. विठ्ठल मंदिरामागे, दापोडी) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीने नाव आहे. दापोडी येथे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. अनिषा जवळ कोणतीही चिठ्ठी मिळाली नाही. मात्र, तिच्या आई वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला अकरावीसाठी महाविद्यालयात प्रवेश हवा होता. दहावीत तिला ६७ टक्के गुण मिळाले होते. तिच्यासोबतच्या मैत्रिणींचे महाविद्यालयील प्रवेश प्रक्रियेचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे घरात ती गेली काही दिवस निराश होती. याच निरोशेतून तिने ही आत्महत्या केली असल्याचे पालकांनी सांगितले.
अनिषा हिचे वडील तळेगाव दाभाडे येथे कामाला आहेत. ते नेहमीप्रमाणे कामाला गेले होते; तर आई घराजवळील किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती. या वेळी अनिषा घरात एकटीच होती. आई दुकानातून परतली असता अनिषाने घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे आईला दिसले. ही घटना अवघ्या १५ ते २० मिनिटांत झाल्याची माहिती भोसरी पोलिसांनी दिली.
दुसऱ्या घटनेत ताथवडे येथील सेंटोसा पर्ल या सोसायटीत राहणाऱ्या चेतल पाटील (२५, रा. ताथवडे) या विवाहितेने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. चेतल यांचे शिक्षण एमई इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत झाले आहे. त्या सध्या नोकरीच्या शोधात होत्या. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चेतलने केबल नेटवर्कची समस्या असल्याचे कारण सांगून सुरक्षारक्षकाकडून टेरेसची किल्ली घेतली. त्यानंतर काही वेळातच जमिनीवर जोरात काहीतरी आदळल्याचा आवाज आल्याने सोसायटीतील इतर सदस्य बाहेर आले. त्या वेळी चेतल या जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यामुळे तत्काळ त्यांना उपचारासाठी वाकड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चेतल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.
तिसरी घटना चिखलीतील जाधववाडीमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. स्वप्नील माने (२८, रा. जाधववाडी, चिखली) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्नील हा जाधववाडी येथे कुटुंबासह राहत होता. मिळेल ते काम तो करीत असे. स्वप्नीलच्या आत्महत्येचे कारणदेखील स्पष्ट झालेले नाही. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यास येत नसल्याने चिमुरडीला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
अभ्यास न केल्याने जन्मदात्या आईनेच चार वर्षांच्या चिमुरडीला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (७ ऑगस्ट) चिंचवडमध्ये घडली. यामध्ये मुलगी जखमी झाली असून, तिच्यावर खासगी आणि महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत.
संबंधित मुलगी चिंचवडमधील एका खासगी शाळेत ज्युनिअर केजी या वर्गात शिकत आहे. सोमवारी रात्री तिची आई तिचा अभ्यास घेत होती. अभ्यास येत नसल्याच्या कारणातून तिने मुलीला झाडूने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये मुलीच्या तोंडावर, पायावर आणि पाठीवर मारहाण केल्याने लाल वळ उठले असून ती जखमी झाली. मुलीचे वडील घरी आले असता त्यांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर त्यांनी मुलीला एका खासगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images