Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ठिय्या आंदोलनानंतर पालखी मार्गस्थ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

राज्य सरकारने रविवारी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची घोषणा केली होती. कराडमधील भाजप नेते अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एकूण नऊ जणांचा या समितीत समावेश आहे. मात्र, वारकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला असून, या समितीत वारकऱ्यांचा कुणीही प्रतिनिधी नसून, समितीत वाकऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी करीत वारकऱ्यांनी माउलींची पालखी सरगम टॉकीजसमोर थांबवून ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीत वारकऱ्यांच्या प्रतिनिधीचा समावेश करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सुमारे तीन लाख वारकऱ्यांनी दीड तास आंदोलन केले.

आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीची सरकारने घोषणा केली. कराडचे भाजप नेते अतुल भोसले समितीचे अध्यक्ष असून, आमदार रामचंद्र कदम, शकुंतला विजयकुमार नडगिरे, दिनेशकुमार कदम, सचिन अधटराव, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर, संभाजी हिरालाल शिंदे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना भोसले पदसिद्ध सदस्य आहेत.

‘या मंदिर समितीमध्ये राजकारण्यांचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे ही समिती बरखास्त करून वाकऱ्यांचे प्रतिनिधी असलेल्या नवी समिती स्थापन करण्यात यावी,’ या मागणीसाठी माउलींच्या पालखीतील वारकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सुमारे तीन लाख वारकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीत वारकऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेऊन पालखी मार्गस्थ झाली. सुमारे दीड तास आंदोलन सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन लाखांसाठी चिमुरडीचं अपहरण, खून

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

दोन लाख रुपयांसाठी चार वर्षीय मुलीचे अपहरण करून तिचा खून केल्याची घटना पुण्यातील हवेली भागात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या चिमुरडीचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. तनिष्का अमोल आरुडे (वय ४, रा. चऱ्होली, ता. हवेली) असे या मुलीचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी शुभम जामने आणि प्रतीक या दोघांना संशयावरून अटक करण्यात आली आहे.

तनिष्काच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तनिष्का बुधवारी सकाळी आठ वाजता शाळेत घरी परतली होती. त्यानंतर ती घरात खेळत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने तिला पळवून नेलं होतं. तेव्हापासून ती बेपत्ताच होती.

दिघी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हरीष माने यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीवरून माने यांनी एकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने मृतदेह जाळून टाकल्याची कबुली दिली आहे. पोलीस या मृतदेहाचा अकोला येथे शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टक्केवारीच्या आरोपामागे ‘राष्ट्रवादी’

$
0
0

गुन्हेगाराच्या मदतीने केली दिल्लीत तक्रार; भाजपचा पलटवार

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ठेकेदारांकडून टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप करून पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करणारी प्रमोद साठे नावाची व्यक्ती सराईत गुन्हेगार आणि मोक्कांतर्गत कारवाई झालेली आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या गुन्हेगाराला तक्रार करण्यास भाग पाडून राष्ट्रवादी काँग्रेसने खालची पातळी गाठल्याचे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे, माजी महापौर आझमभाई पानसरे, सरचिटणीस सारंग कामतेकर या वेळी उपस्थित होते. त्यांनी साठे यांच्याबाबतची धक्कादायक माहिती नमूद केली. साठे सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. तसेच तो खुनातील आरोपी असून, एका अंडरवर्ल्ड टोळीतील गुंड असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे जगताप यांनी नमूद केले. ‘राष्ट्रवादी’च्या स्थायी समितीच्या एका माजी सभापतीने आणि एका विद्यमान नगरसेवकाने साठे याच्याशी संगनमत करून त्याला पंतप्रधान कार्यालयाकडे खोटी तक्रार देण्यास भाग पाडले, असा आरोपही जगताप यांनी केला.

जगताप म्हणाले, ‘महापालिकेतील ठेकेदारांना आतापर्यंत नियमबाह्यपणे बिले दिली जात होती. मात्र, भाजपने सत्तेत आल्यानंतर यापुढे कायद्यातील तरतुदीनुसारच बिले देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली. त्याबाबत ठेकेदारांना कोणतीही अडचण नाही. मात्र, ठेकेदारांच्या आडून नियमबाह्यपणे पैसे कमविण्याचा धंदा चालविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भाजप नियमाने वागत आहे, हे रूचलेले नाही. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियमबाह्य कामांचे पैसे महापालिकेत अडकल्यामुळे ठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बिले मिळावीत, यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे.’

प्रमोद पुरुषोत्तम साठे (प्रत्यक्ष लेखी तक्रारीत केवळ प्रमोद साठे असा उल्लेख आहे.) याने ठेकेदारांची बिले देण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे केलेली तक्रार सुद्धा ‘राष्ट्रवादी’च्या दबावाचाच एक भाग आहे, असा दावा करण्यात आला. परंतु, साठे महापालिकेचा ठेकेदार आणि या शहरातील रहिवासी नाही. त्याने कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. तरीही तक्रारीची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रमोद साठे नावाची व्यक्ती भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांच्या खुनातील आरोपी असून, तो अंडरवर्ल्डमधील एका टोळीतील गुंड आहे. त्याचप्रमाणे त्याला विश्रामबागवाडा पोलिसांनी बिल्डरांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी अटकही केली होती. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई देखील झाली आहे, असे जगताप यांनी सांगितले.

‘भाजपने आत्मपरीक्षण करावे’

तक्रारदार कोण आहे, याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध नाही, असा दावा या पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘आमच्या सांगण्यावरून प्रमोद साठे नावाच्या व्यक्तीने तक्रार केलेली नाही. त्याच्याशी बोलून खात्री केल्यानंतरच आम्ही पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. त्याने धमकीचे फोन येत असल्याचे आम्हाला सांगितल्यावर आम्ही पोलिस संरक्षणाची मागणी केली. तो या देशाचा नागरिक आहे. पाकिस्तानचा नाही. त्यामुळे गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्यावर पलटवार करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. स्वतः काय दिवे लावले हे तपासावे, मगच आमच्यावर आरोप करावेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंसोबत ‘चाय पे चर्चा’

$
0
0

पिंपरीतील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
बससेवेबाबत पिंपरी-चिंचवडला दुजाभावाची वागणूक मिळत असल्याची तक्रार करणाऱ्या येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची सोमवारी रात्री ‘चाय पे चर्चा’ झाली. येत्या तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मुंढे यांनी दिले आहे, अशी माहिती स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली.

‘पीएमपीएमएल’ला मदत निधी देण्याच्या मुद्यावरून सावळे आणि मुंढे यांच्यात वाद निर्माण झाला होता. मुंढे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करावी. शहरातील अंतर्गत बसव्यवस्था सक्षम करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत आणि महिलांसाठी स्वतंत्र बसव्यवस्था सुरू करावी, अशा मागण्या सावळे यांनी केल्या होत्या. तोपर्यंत मदतनिधी देण्याचा प्रस्ताव तहकूब ठेवला होता. आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली होती.

या अनुषंगाने मुंढे यांनी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे आणि सावळे यांना चहाचे निमंत्रण दिले आणि ‘पीएमपीएमएल’च्या कार्यालयात ‘चाय पे चर्चा’ झाली, असा दावा केला जात आहे. दोन तासांच्या बैठकीत मुंढे यांनी पिंपरी-चिंचवडमधील बसव्यवस्थेबाबत सर्वांची मते ऐकून घेतली. त्यानंतर बसव्यवस्था सक्षम करण्याचे आश्वासन दिले. नव्याने घेण्यात येणाऱ्या ८० मिनीबस पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत वाहतुकीसाठी वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शहराच्या लोकसंख्येत झालेली वाढ आणि भौगोलिक परिस्थिती पाहता ‘पीएमपीएमएल’च्या जुन्या मार्गांचे पुनर्वोलोकन करण्याची सूचना सावळे यांनी केली. ती मान्य करण्यात आली. ‘पीएमपीएमएल’ने ‘एचपीसीएल’ कंपनीसोबत डिझेल दर कमी करण्याबाबत चर्चा केली. कंपनी प्रति लिटर ८० पैसे कमी दराने डिझेल पुरवठा करण्यास तयार झाल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

‘आयटी’ पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाशिक फाटा ते हिंजवडी मार्गावर ‘एसी’ बस सुरू करण्याची सूचना आमदार जगताप यांनी केली. त्यावर मुंढे यांनी पहिल्या टप्प्यात निगडी ते पुणे मनपा मार्गावर लवकरच ‘एसी’ बस सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. पिंपरी-चिंचवडमधील महिलांसाठी गर्दीच्या वेळी स्वतंत्र बसव्यवस्था किंवा बसमध्ये ७० ते ८० टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत येत्या आठवडाभरात निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. औद्योगिक भागात अंतर्गत बसव्यवस्था, तसेच ताथवडे परिसरातील महाविद्यालयांसाठी सर्वेक्षणानंतर बस सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

त्याचप्रमाणे संचलन तूट कमी करणे, ‘पीएमपीएमएल’ची चांगली बससेवा उपलब्ध करून देणे, बस मार्गांचे योग्य नियोजन करणे, त्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे मुंढे यांनी सांगितले.

‘बसव्यवस्था सक्षम व्हावी’

आमदार लक्ष्मण जगताप यांनी ‘पीएमपीएमएल’ला सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, मदतीच्या बदल्यात बसव्यवस्था सक्षम झाली पाहिजे, अशी अट घातली. पिंपरी-चिंचवडमधील कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक बदल्यांचाही मुद्दा बैठकीत उपस्थित केला. त्याचा फेरआढावा घेण्याचे आश्वासन मुंढे यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठलभक्तीत भाविक दंग

$
0
0

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरांमध्ये गर्दी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘भरपूर पाऊस पाडून राज्यातील शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या दूर होऊ दे,’ असे साकडे घालून भाविकानी मंगळवारी विठुरायाची मनोभावे पूजा केली. शहराच्या विविध भागातील मंदिरांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली.

एकादशीमुळे शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. मध्यवर्ती पुण्यातील निवडुंग्या विठोबा, पालखी विठोबा, लकडी पूल, विठ्ठलवाडी या प्रमुख मंदिरांसह उपनगरातील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

शहरातील विठ्ठलाची सर्व मंदिरे रंगरंगोटी, फुलांच्या रचना आणि रोषणाईने सजविण्यात आली होती. मूर्तीच्या गाभाऱ्यात फुलांच्या रचना सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होत्या. पावसाचा अंदाज घेऊन सकाळपासूनच नागरिकांनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारी पाऊस उघडलेला असल्याने गर्दी वाढत गेली. सर्व मंदिरांमध्ये पहाटे मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. दिवसभर कीर्तन-भजन आणि हरिपाठासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. काही मंदिरांमध्ये फराळाचा प्रसाद देण्यात आला.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. काही स्वयंसेवी संस्थांनी विविध उपक्रमही आयोजित केले होते. विठ्ठलवाडी येथील विठ्ठलाच्या मंदिरात दरवर्षी हजारो लोक दर्शनासाठी येतात. त्यामुळे या परिसराला चार दिवस जत्रेचे स्वरूप येते. या वर्षी देखील पूजा साहित्याच्या स्टॉलबरोबरच महिलांसाठी दागिने, तर लहान मुलांसाठी खेळण्याचे स्टॉल लागले होते. लहान मुलांसाठी पाळणे, चक्र, बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या असे विविध खेळही मांडण्यात आले होते. त्यामुळे मुले बराच वेळ रेंगाळली होती. मंदिरातर्फे देण्यात आलेल्या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.

दरम्यान, शांति निकेतन सेवा प्रतिष्ठान आणि स्वामी बॅग यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना ११ हजार तुळस आणि विविध फळे, फुले आणि शोभिवंत रोपांचे वाटप करण्यात आले. सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार कुमार गोसावी, आमदार भीमराव तपकीर, नगरसेवक श्रीकांत जगताप, तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि स्वामी बॅगचे राहुल जगताप, शांतीनिकेतनचे दीपक परदेशी विलास बनसोडे उपस्थित होते. ‘झाडे लावणे आणि जगवणे हा एक कार्यक्रम नसून तो पर्यावरण रक्षणासाठी पायाभूत उपक्रम आहे,’ असे मत सुळे यांनी व्यक्त केले. उपक्रमाचे यंदा सतरावे वर्ष होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेशकर आणि फीमध्ये संभ्रम

$
0
0

तिढा दूर झाल्यास वाचू शकतात साडेदहा कोटी रुपये

राजेश माने, खडकी
कँटोन्मेंट कायद्यांमध्ये वाहन प्रवेशकर आणि वाहन प्रवेश फी बाबत वेगवेगळ्या व्याख्या असल्यामुळे बोर्डाने उत्पन्न वाढीसाठी सुरू केलेली वाहन प्रवेश फी पुन्हा सुरू होऊ शकते. मात्र, यासाठी या दोन्ही व्याख्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांकडे मांडणे गरजेचे आहे. जीएसटी कौन्सिलच्या होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा करून वाहन प्रवेश फी पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळू शकते.

वाहन प्रवेश कर

कँटोन्मेंट बोर्डाच्या २००६मधील सुधारित कायद्यातील कलम ६६मध्ये कर संकलनाची व्याख्या दिली आहे. यामध्ये वाहन प्रवेश कराचा उल्लेख आहे. या अधारे बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या वाहनांमधील वस्तुंच्या किमतीनुसार त्यावर कर आकारण्यात येतो. जो पूर्वीच्या जकात कराच्या समांतर आहे. जकातीसारखाच वस्तूंवर आधारित प्रवेश कराच्या नावाने बिहार, आंध्र प्रेदश, गोवा, कर्नाटक, आसाम, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कर वसूल केला जात होता. तो आता बंद करावा लागला आहे. पुण्यामध्ये महानगरपालिका जकात वसूल करत होती. लोकसंखेच्या निकषानुसार महापालिका पुणे आणि खडकी कँटोन्मेंटला त्यांचा हिस्सा देत असल्याने या दोन्ही कँटोन्मेंटने वाहन प्रवेश कर कधीही थेट वसूल केला नाही. जीएसटीच्या चॅप्टर २६मधील कलम १६४/२नुसार प्रवेश कर बंद करावा लागणार आहे. त्यानुसार हा कर बंद करण्यात आला आहे.

वाहन प्रवेश फी

बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या वाहनांमधून कोणताही माल नेला जात असला, तरी केवळ वाहनांच्या आकारानुसार १५ ते २० रुपयांची फी आकारली जात होती. खडकी बोर्डाने उत्पन्न वाढीसाठी २०१०मध्ये वाहन प्रवेश फी सुरू केली होती. ही फी देखील बंद करण्यात आली आहे.

तरतुदीनुसार अनुदान

जीएसटीतील तरतुदीनुसार राज्यांना किंवा महापालिकांना होत असलेल्या नुकसानीबद्दल भरपाई देण्यासाठी ३१ मार्च २०१६चा आर्थिक निकष ग्राह्य धरला आहे. ज्यामध्ये दरवर्षी १४ टक्के वाढ गृहित धरली आहे. त्यानुसार राज्याचा किंवा महापालिकांकडून एन्ट्री टॅक्स, जकात, लोकल बॉडी टॅक्सच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नाच्या नुकसानीची भरपाई केंद्र सरकारतर्फे पुढील पाच वर्षे देण्यात येणार आहे. मात्र, जीएसटीच्या चॅप्टर २६/१६४/२ मध्ये वाहन प्रवेश कराबाबत उल्लेख आहे. मात्र, वाहन प्रवेश फीबाबत उल्लेख नाही. त्यामुळे कायद्यातील व्याखेनुसार वाहन प्रवेश कराची भरपाई देण्यात येईल, आणि वाहन प्रवेश फीची भरपाई दिली गेली नाही, तर वार्षिक साडेदहा कोटी रुपयांचा तोटा बोर्डाला होणार आहे. वाहन प्रवेश कर आणि फी यातील फरक मांडण्यात बोर्डाला यश मिळाले, तर हे पैसे वाचू शकतात.

योग्य मांडणी आवश्यक

अर्थ मंत्रालयात प्रत्येक कँटोन्मेंट बोर्डाला त्यांच्या तोट्याबाबत योग्य मांडणी करावी लागणार असून, त्याबाबतचा ठराव प्रिन्सिपल डायरेक्टर (पीडी) ऑफिसला पाठवावा लागणार आहे. त्यांच्या माध्यमातून ‘जीओसीएनसी’कडे हा विषय मांडवा लागेल. त्यांच्या मंजुरीनंतर हा विषय दिल्ली येथील महासंचालकांकडे आणि त्यांच्या माध्यमातून संरक्षणमंत्र्यांना द्यावा लागणार आहे. संरक्षण मंत्री हा मुद्दा अर्थ मंत्र्यांकडे मांडतील. पुणे आणि खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणचे पूर्वी पुण्यात पीडी म्हणून काम केलेले जोजनेश्वर शर्मा सध्या दिल्लीत महासंचालक म्हणून काम बघत आहेत. मात्र, हे सर्व प्रयत्न युद्धपातळीवर करावे लागणार आहेत. यामध्ये बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीईओ) भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
(क्रमशः)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मादाय संस्थांची हिशेबपत्रके ऑनलाइन भरण्याची सुविधा

$
0
0

विश्वस्तांचे हेलपाटे वाचणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोणत्याही धर्मादाय संस्थेला आता विवरणपत्रे (हिशोबपत्रके) थेट आता राज्यातील कोणत्याही धर्मादाय आयुक्तालयात जाऊन द्यावे लागणार नाहीत. आता संस्थेच्या विश्वस्तांना थेट ऑनलाइनद्वारे ही विवरणपत्रे धर्मादाय आयुक्तालयाच्या वेबसाइटवर अपलोड करता येणार असल्याने विश्वस्तांचे हेलपाटे वाचणार आहे.
राज्याचे धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे यांनी या संदर्भात परिपत्रक जारी करून सर्व विभागीय कार्यालयांना आदेश दिले आहेत. त्यानुसार धर्मादाय आयुक्तालयाकडून धर्मादाय संस्थांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५०च्या कलम ३४ नुसार हिशोबपत्रके सर्व संस्थांनी धर्मादाय आयुक्तालयाकडे जमा करणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने धर्मादाय संघटनेमध्ये नवीन कम्प्युटर सिस्टिम विकसित करण्यात आली आहे. सध्या ही ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून विविध धर्मादाय संस्थांना लेखी हिशोबपत्रके ऑनलाइन सादर कऱण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे कागदपत्रे अपलोड करणे शक्य होणार आहे. त्यामुळे यापुढे सर्व धर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांना ऑनलाइनद्वारे हिशोबपत्रके सादर करणे बंधनकारक राहणार असल्याचे धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे यांनी परिपत्रकात म्हटले आहे.
....
धर्मादाय संस्थांना देणार युजर आयडी
ऑनलाइन प्रक्रियेसंदर्भात विश्वस्तांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रणाली मार्गदर्शक या टॅबखाली अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीचा सर्वांगीण वापर होण्यासाठी विश्वस्त संस्थांचा सहभाग असणे आवश्यक आहे. यामुळे विश्वस्त, सनदी लेखपाल, लेखापरीक्षकांचा वेळ वाचणार असून त्यांना हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. परिणामी, धर्मादाय आयुक्तालयाचे कामकाज अधिक परिणामकारक होऊ शकेल. धर्मादाय संस्थांनी ऑनलाइन पद्धतीने हिशेबपत्रके सादर केल्यानंतर त्यांना कार्यालयाकडून तत्काळ यूजर आयडी देण्यात येणार आहे, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई खर्चाला स्थायी समितीची मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
औंध, बाणेर, बालेवाडी या भागातील पडीक हद्दीच्या साफसफाई करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च करण्यास मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा भाग केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत येत असल्याने खासगी जागा मालकांच्या जागा असतानाही यावर स्वच्छतेसाठी दोन कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतंर्गत निवड झालेल्या औंध, बाणेर, बालेवाडी या भागाची निवड करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक नऊमध्ये हा भाग येतो. या भागात असलेल्या पडीक जागांची स्वच्छता करण्यासाठी आउटसोर्सिंगद्वारे काम देण्यासाठी दोन कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, असा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे स्वच्छता करण्यात तरतूद करण्यात आलेल्या जागा खासगी मालकांच्या असून, त्याची स्वच्छता ठेवली जात नसल्याने हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शहराच्या हद्दीतील पडीक जागांच्या स्वच्छतेसाठी वर्षभरात एका क्षेत्रीय कार्यालयाला सर्वसाधारण एक कोटी रुपये खर्च येतो. मात्र, केवळ दोन प्रभागांसाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यास पालिका तयार असल्याने कोणाच्या हितासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, याची जोरदार चर्चा पालिकेत सुरू झाली आहे. समितीच्या बैठकीत केवळ दोन प्रभागांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात सफाईकामासाठी खर्च करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
.....
आयसीसी टॉवरच्या इमारतीमध्ये स्मार्ट सिटीचे कार्यालय
सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या आयसीसी टॉवर्स येथे महापालिकेच्या मालकीची जागा आहे. या जागेवा ‘आर ७’ चे आरक्षण असल्याने काही टक्के जागा पालिकेला मिळणार आहे. यापैकी काही जागा पुणे स्मार्ट ‌सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यालयासाठी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मान्य करण्यात आला. तीन वर्षांसाठी किंवा स्मार्ट सिटीचे काम पूर्ण होईपर्यंत ही जागा देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

‘अर्नेस्ट अँड यंग’ची नियुक्ती
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला साह्य करण्यासाठी अर्नेस्ट अँड यंग या सल्लागार कंपनीला एक कोटी ९८ लाख रुपये देऊन त्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव देखील समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या सल्लागारामार्फत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बायलॉज् प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट बायलॉज्, सीएनडी मॅनेजमेंट प्लॅन, प्रकल्प कार्यान्वित करणे, पुणे शहराचे मासिक सर्वेक्षण, स्वच्छ सर्वेक्षणाबाबतची माहिती संकलित करण्यास साह्य तसेच सार्वजनिक शौचालयांचा गॅप अॅनॅलिसेसची कामे करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चित्रपटांची छायाचित्रे सत्तर वर्षांनी उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मराठी चित्रपटांचा समृद्ध वारसा दर्शविणारी आणि सुवर्णकाळात घेऊन जाणारी एक हजार छायाचित्रे सत्तर वर्षांनंतर समोर आली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध छायाचित्रकार सदानंद आजरेकर यांनी काढलेली ही छायाचित्रे त्यांच्या कन्या शांभवी बाळ यांनी आस्थेने जपून ठेवली होती. बाळ यांनी मंगळवारी कृष्णधवल छायाचित्रे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केली. संग्रहालयाच्या ठेव्यामध्ये या छायाचित्रांचा समावेश झाल्याने हा ठेवा प्रथमच उघड झाला आहे.
आजरेकर यांनी १९४२ ते १९५६ या कालावधीत काढलेली ही छायाचित्रे कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना आहेत. आजरेकर हे चित्रपट सृष्टीत जॉनी या नावाने प्रसिद्ध होते. आचार्य अत्रे व मास्टर विनायक यांच्या नवयुग स्टुडिओमध्ये तसेच प्रभात फिल्म कंपनीमध्ये ते छायाचित्रकार म्हणून काम करत होते. या काळात विविध चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान काढलेल्या छायाचित्रांचा यामध्ये समावेश आहे. आजरेकर यांनी १९५६ नंतर वैयक्तिक स्तरावर छायाचित्रणाचे काम सुरू केले. त्यासाठी त्यांनी टिळक रस्त्यावर अशोक स्टुडिओ सुरू केला. या काळातीलही छायाचित्रे यामध्ये आहेत. या छायाचित्रांमुळे मराठी चित्रपटांचा मोठा पट उलगडला गेला आहे.
‘रोलिफ्लेक्स कॅमेरातून १.२० एमएमची ही छायाचित्रे काढली असण्याची शक्यता आहे. बाबा काम करत होते तेव्हा मी लहान असल्यामुळे तेव्हा फारशी जाणीव नव्हती; पण नंतर हा किती मोठा ठेवा आहे, ते समजत गेले. बाबांच्या पश्चात अनेक वर्षे ठेवा जपून ठेवला; पण तो यापुढेही सुरक्षित राहावा यासाठी संग्रहालयाकडे सुपूर्द केला आहे,’ अशी भावना बाळ यांनी व्यक्त केली. ‘छायाचित्रण करताना प्रकाश किती असला पाहिजे, कोणती लेन्स वापरली पाहिजे, यासाठीची बारीक नजर बाबांकडे होती, म्हणूनच अत्यंत सुंदर कलाकृती ठरतील अशी ही छायाचित्रे आकार घेऊ शकली,’ असे बाळ यांनी आवर्जून सांगितले.
‘संग्रहालयात प्रशिक्षण घेणाऱ्या ऋची शेवडे या विद्यार्थिनीमुळे ठेवा उपलब्ध झाला असून, सर्व छायाचित्रांचे डिजिटायझेन करणार आहोत. एक हजार पैकी पाचशे छायाचित्रे ओळखता येत आहेत. उर्वरित छायाचित्रांची ओळख पटविण्यासाठी चित्रपट अभ्यासकांची मदत घेतली जाईल,’ अशी माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली.
-------------------
दुर्मिळ छायाचित्रांचा खजिना
राजा परांजपे, सुलोचनादिदी, इंदिरा संत, बेबी शकुंतला, कुसुम देशपांडे, राजा गोसावी अशा अनेक मोठ्या कलाकारांची चित्रपटातील छायाचित्रे या संग्रहात आहेत. जागा भाड्याने देणे आहे (१९४९), वर पाहिजे (१९५०), शारदा (१९५१), नरवीर तानाजी (१९५२), इन मीन साडेतीन (१९५४), तीन मुले (१९५४) अशा अनेक चित्रपटांशी संबंधित छायाचित्रांचे दालन उघड झाले आहे. मराठी चित्रपटांच्या वैभवाची आणि सुवर्णकाळाची साक्ष देणारी ही छायाचित्रे संग्रहालयात पाहता येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगल कार्यालयांना एनजीटीचा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
म्हात्रे पूल ते राजाराम पुलादरम्यान नदीपात्रालगत बांधलेल्या सर्व लॉन्स आणि मंगल कार्यालयांची महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून दोन आठवड्यात अहवाल सादर करावा. तसेच नदीपात्र आणि पूररेषेच्या आतील सर्व अतिक्रमण चार आठवड्यांत काढून टाकावे, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत.
मुठा नदीपात्रातील लग्न कार्यालयाचे बेकायदा अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेला जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी सहकार्य करावे, असे न्यायमूर्ती यू. डी. साळवी आणि डॉ. अजय देशपांडे यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. डीपी रोडवर गेल्या काही वर्षांत उभी राहिलेली कार्यालये आणि लॉन्सने नदीपात्र तसेच पूररेषेमध्ये अतिक्रमण केले असल्याचा आक्षेप घेऊन सुजल सहकारी संस्थेतर्फे अॅड. असीम सरोदे यांच्या मदतीने न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. या रोडवर तसेच राज्यातील बहुतांश शहरांमध्ये लग्नातील वरातींमुळे होत असलेल्या ध्वनिप्रदूषणाची तक्रारही यात राज्यभरातील सर्व वकिलांनी नोंदवली होती.
सरोदे यांनी सुनावणीदरम्यान खुल्या लॉन्ससाठी ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचनांचा मसुदा न्यायाधिकरणाकडे सादर केला होता. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षण अहवालातून लॉन्स आणि मंगल कार्यालयांमध्ये ध्वनी प्रदूषण होत असल्याची माहिती पुढे आली होती.
आम्ही उपलब्ध केलेल्या पुराव्यांची गांभीर्याने दखल घेऊन न्यायाधिकरणाने लॉन्स आणि मंगल कार्यालयाच्या बाबतीत कठोर आदेश दिले आहेत. पुण्यातील हा निर्णय भारतातील सर्व मॅरेज लॉन्स आणि मंगल कार्यालयांना लागू होणार आहे, अशी माहिती अॅड. असीम सरोदे यांनी दिली. याचिकेसाठी ‘पर्यावरण समन्वयक वकीलांनी’ राज्यातील विविध शहरांमधून मंगल कार्यालये आणि ध्वनिप्रदूषणासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केली होती. यात रोशनी वानोडे, हेमा काटकर, समीर कुलकर्णी, विजय शेळके, संतोश सांगोळकर, स्मिता सरोदे-सिंगलकर यांचा समावेश होता. पुणे, कोल्हापूर, नागपूर, यांसह राज्यातील बहुतांश शहरातील महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस महासंचालक तसेच सर्व प्रशासकीय विभागांना प्रतिवादी केले होते.

लग्नातील प्रदूषणाबद्दल विवेक ढाकणे विरूद्ध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या याचिकेदरम्यानही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतल्याशिवाय मंगल कार्यालये आणि लॉन्स व्यवसाय कोठेही सुरू नये, तसेच सध्या अस्तित्त्वात असलेल्या या कार्यालयांनी दोन महिन्याच्या आत मंडळाची परवानगी घ्यावी, असे यात स्पष्ट केले आहे. या मार्गदर्शक सूचनांची दोन महिन्यात अंमलबजावणी करावी. नोंदणी न करणाऱ्यावर कारवाई करून तातडीने ती कार्यालये बंद करण्याचे आदेश आता न्यायाधिकारणाने दिले आहेत, असे अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.

आदेशातील प्रमुख मुद्दे
- कार्यालये, लॉन्समध्ये घनकचरा व्यवस्थापन सक्तीचे
- कचरा वर्गीकरण अथवा विल्हेवाट न लावणाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा दंड
- मंडळाच्या लेखी परवानगीशिवाय फटाके आणि ध्वनिप्रक्षेपकाच्या वापरास बंदी
- ध्वनिक्षेपक बसवून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा.
- शांतता क्षेत्रात साउंड सिस्टीम वापरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी.
- वरात काढणे आणि डीजेवर नाच करणे हा लग्नातील परंपरा, धर्माशी याचा संबंध नाही, त्यामुळे हे प्रकार म्हणजे सामाजिक उपद्रव आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या शाळांचा गणवेश बदलला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मागील वर्षीचे जुनेच गणवेश देण्याचा पालिका प्रशासनाचा हट्ट स्थायी समितीने मंगळवारी उधळून लावला. यंदाच्या वर्षी पालिकेच्या शाळांमध्ये ‌शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन रंगाचे गणवेश देण्याचा ठराव समितीच्या बैठकीत एकमताने मान्य करण्यात आला. यामुळे मर्जीतील ठेकेदाराकडून जुने गणवेश खरेदीचा पालिकेतील अधिकाऱ्यांचा डाव संपुष्टात आला आहे.
विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय साहित्य तसेच गणवेश खरेदीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे करण्यात आल्या होत्या. यावर उपाय म्हणून यंदाच्या वर्षीपासून शासनाने साहित्य तसेच गणवेशाची रक्कम थेट संबधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पालिकेने ‘डायरेक्ट टू बेनिफिट’ (डीबीटी) योजना सुरू केली आहे. गेल्या वर्षी ज्या ठेकेदाराला गणवेश पुरविण्याचे कंत्राट पालिकेने दिले होते, त्याच्याकडील जुनेच गणवेश यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना वाटण्याचा प्रकार सुरू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा होऊन यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना नवीन रंगाचे गणवेश देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांना जुनेच गणवेश दिले जात असल्याचे समोर आले होते. त्यावर गणवेशाचे वाटप करू नये, असे लेखी आदेश नसल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त‌ आयुक्तांनी दिले होते.
स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी नवीन रंगाचे गणवेश देण्यात यावे. तसेच प्रशासनाने लेखी आदेशाशिवाय याचे वाटप करू नये, असा ठराव नगरसेवक दिलीप बराटे यांनी मांडला. त्याला सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. सर्व विद्यार्थ्यांना १५ ऑगस्टपर्यंत हे नवीन गणवेश दिले जाणार आहेत.

असा असेल नवीन गणवेश
क्रीम रंगाचा हाफ शर्ट, नेव्ही ब्लू रंगाची कॉलर आणि नेव्ही ब्लू रंगाची पॅन्ट असा गणवेश विद्यार्थ्यांसाठी तर विद्यार्थिनींसाठीचा पिनोफ्रॉक हा डार्क ब्लू रंगाचा व क्रीम रंगाची मॅचिंग कॉलर तसेच पंजाबी ड्रेसचा कुर्ता हा क्रीम व डार्क नेव्ही ब्लू रंगाचा आणि सलवार डार्क नेव्ही ब्लू रंगाची असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना ‘भोसले स्मृती सन्मान’ जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान’ ज्येष्ठ विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना जाहीर झाला आहे. श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेचाही दर वर्षी सन्मान केला जातो. गेली १४३ वर्षे कार्यरत असलेल्या वसंत व्याख्यानमालेचा या वर्षी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. १४ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात माजी कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. ह. वि. सरदेसाई यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्रतस्थ वृत्तीने काम करणाऱ्या माणसांविषयी प्राचार्यांना विलक्षण आदर होता. चार दशकांहून अधिक काळ व्रतस्थ वृत्तीने आणि निष्ठेने समाजसेवा करताना दिब्रिटो यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून विचारजागर केला आहे. आपल्या सहजसुंदर वक्तृत्वाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले आहे. प्राचार्यांचा वसंत व्याख्यानमालेशी घनिष्ठ संबंध होता. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी व्याख्यानमालेत अनेक नामवंत वक्त्यांची व्याख्याने ऐकली आणि त्यांच्या मनात वक्तृत्वाची ज्योत प्रज्वलित झाली. सलग २८ वर्षांहून अधिक काळ वसंत व्याख्यानमालेत विविध विषयांवर व्याख्याने देऊन प्राचार्यांनी व्याख्यानमालेच्या इतिहासात विक्रम घडविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंडळे-पोलिसांमध्ये नेतेमंडळींची मध्यस्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी आयोजित केलेल्या बैठकीवर बहिष्कार घातल्यानंतर मंडळांची बाजू समजून घेण्यासाठी आता लोकप्रतिनिधी पुढे सरसावले आहेत. खासदार अनिल शिरोळे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी ही नेते मंडळी पुढाकार घेणार असून मंडळाचे कार्यकर्ते महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरही आपली बाजू मांडणार आहेत.
पोलिसांनी बजावलेल्या नोटिसा आणि गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी आज (बुधवार, ५ जुलै) प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून महापौर टिळक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत गणेश मंडळांना बजावण्यात आलेल्या नोटिसांविषयीही चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी बजावलेल्या नोटिसांसंदर्भात महापौरांनी लक्ष घालून नोटिसा रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या वेळी करण्यात येणार आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या समस्येकडे गांभीर्याने पाहावे, यासाठी गणेशमंडळांकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. खासदार अनिल शिरोळे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतली आहे. त्यामुळे, राजकीय स्तरावरही ही मंडळी मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा करणार असल्याचे समजते.
दरम्यान गणेश मंडळांना नोटिसा काढल्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सोमवारी बैठक घेऊन पोलिसांच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. नोटिसा मागे घेतल्याशिवाय पोलिसांशी चर्चा करणार नाही, असा सूरही या बैठकीतून उमटला. परंतु आता राजकीय स्तरावरही हे प्रकरण तापले असल्याने नेते मंडळी पोलिस आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.
यासंदर्भात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रताप परदेशी म्हणाले, ‘पोलिसांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना केवळ नोटिसा पाठवल्या आहेत. खटले दाखल केलेले नाहीत. या नोटिसांना साठ दिवसांच्या आत उत्तर देणे बंधनकारक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु, पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यातील विसंवाद दूर करण्याची गरज आहे. गणोशोत्सवासाठी दोन्हीही घटक महत्त्वाचे आहेत. पोलिस कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. ते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. पोलिसांची अडचण समजून घेऊन गणेश मंडळांनीही काही नियम पाळायला हवेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४७ तोळे दागिने चोरीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोमवार पेठेतील बंद फ्लॅटच्या दरवाज्याचे लॉक उघडून कपाटातील साडेनऊ लाख रुपये किंमतीचे तब्बल ४७ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अंकित सुरेश धोका (वय २६, रा. मयुरगंध सोसायटी, सोमवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील मयुरगंध सोसायटीत धोका कुटुंबीय राहतात. ही इमारत सहा मजल्याची आहे. तिसऱ्या मजल्यावर तक्रादार धोका यांचा फ्लॅट आहे. या सोसायटीला वॉचमन असतो. तक्रारदार यांचा ऑनलाइन मोबाइल विक्रीचा व्यवसाय आहे. ते कामाच्या निमित्ताने सतत बाहेर असतात. रविवारीदेखील ते कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. तर, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती रविवारी दुपारी एकच्या सुमारास गुरुवार पेठेतील नातेवाइकांकडे गेले होते. रात्री उशिरा परत आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. कपाटातील सहा लाख रुपये किंमतीचे ४७ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समजले. कुटुंबीयांनी घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलिस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीच्या वॉचमनने आपल्याला काही माहिती नसल्याचे चौकशीत सांगितले आहे. इमारतीजवळ सीसीटीव्ही नसल्यामुळे आरोपीच्या शोधासाठी बाहेरच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

हिंगण्यातही फ्लॅट फोडले

सिंहगड रोड परिसरातील हिंगणे खुर्द येथील लक्ष्मी रेसिडन्सी सोसायटीतील दोन फ्लॅट फोडून एक लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रमेश कुलकर्णी (वय ५७, रा. हिंगणे खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचा फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी कपाटातील एक लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तर, त्यांच्या सोसायटीतील विजया नाईक यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय वसतिगृहाची दुर्दशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या विश्रांतवाडी येथील वसतिगृहाचे काम पूर्ण होऊन काही महिने उलटल्यानंतर काही महिन्यातच दुर्दशा झाली आहे. इमारतीमधील प्रत्येक जिन्याचे रेलिंग तुटले आहे. रूममधील कपाटाची दारे निखळली आहेत. सिलिंगमधून पाणी झिरपत आहे, असे चित्र या वसतिगृहात पाहायला मिळत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून या वसतिगृहाची उभारणी करण्यात आली असून, अल्पावधीत याची दुरावस्था झाल्याने कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप केला जात आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६ हे वर्ष राज्य सरकारतर्फे समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. संपूर्ण राज्यात त्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमांसाठी १२५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. या अंतर्गत विविध शहरांमध्ये वसतिगृहे बांधण्यात आली. पुण्यात विश्रांतवाडी येथे सामाजिक न्याय भ‍वन साकारले जात आहे. त्याच आवारात एक हजार विद्यार्थी क्षमतेचे मुलांचे वसतिगृह उभारण्यात आले आहे. तर, मुलींच्या वसतिगृहाचे काम सुरू आहे. समाजकल्याण आयुक्तालयाच्या आवारातील संत ज्ञानेश्वर वसतिगृहात, आळंदी येथील वसतिगृह, कोरेगाव पार्क येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे येथे स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांत येथील विद्यार्थ्यांना समाधानकारक अनुभव आला नसल्याचे दिसून आले.
वसतिगृहाच्या इमारतीमध्ये अनेक जिने आहेत. यातील बहुतांश जिन्यांचे रेलिंग तळमजल्यापासून शेवटच्या मजल्यापर्यंत तुटलेले आहे. काही ठिकाणी रेलिंगला वेल्डिंग केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक रूममध्ये सामान ठेवण्यासाठी कपाट करण्यात आले आहे. त्याची अवस्था चांगली नाही. काही कपाटांचे दरवाजे निघाले आहेत. अनेक कपाटांचे कुलूप लागत नाही. रूमच्या छताला पाण्याची ओल येत आहे. वसतिगृहापासून काही अंतरावर स्वतंत्र ठिकाणी मेस आहे. त्या मेसमध्ये पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी वरील बाथरूमचे पाणी झिरपते आहे. या मेसच्या बाहेर उघड्या गटारातून स्वच्छतागृहातील पाणी वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते.

अंध विद्यार्थ्यांना धोका
या वसतिगृहात २० ते ३० अंध विद्यार्थी राहतात. त्यांना पहिल्या मजल्यावरील रूम देण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांना पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिन्याचाच वापर करावा लागतो. मात्र, येथील जिन्यात रेलिंग तुटलेले आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, वसतिगृहापासून रस्त्यापर्यंतच्या मोकळ्या जागेत रस्ता व्यवस्थित नाही. तेथे चालताना देखील विद्यार्थी पडत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली.

पाण्यात अळ्या
पिण्याच्या पाण्याच्या कूलरमध्ये तीन दिवसांपूर्वी अळ्या आढळल्या होत्या. सामान्य विद्यार्थ्यांना हे पाणी पिताना अळ्या आढळल्यानंतर, त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ते स्वच्छ करण्यात आले. मात्र, दरम्यानच्या काळात अंध विद्यार्थी ते पाणी पिऊन आजारी पडल्याचे इतर विद्यार्थ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची वानवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची ४८ पदे रिक्त असल्याने अनेक ठिकाणी डॉक्टरच पेशंटला भेटत नसून त्यामुळे उपचारसेवेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याशिवाय तृतीय आणि चतुर्थ श्रेणी वर्गाच्या कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यात २७९ पदे रिक्त आहेत.
पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. एका केंद्रांमध्ये दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येते. बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि अपघात झाल्यास पेशंटना गोल्डन अवर्समध्ये उपचार देणे सोपे होते. या आरोग्य केंद्रातील २३ डॉक्टर पदव्युत्तर शिक्षणासाठी रजेवर आहेत; तर उर्वरित १७ डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. एक डॉक्टर रीतसर रजेवर आहेत. तर सात जण वर्षांपासून अनधिकृत रजेवर गेले आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यासाठी डॉक्टरच पेशंटना भेटू शकले नसल्याची स्थिती समोर आली आहे. परिणामी ग्रामीण भागातील अनेक पेशंटना डॉक्टर नसल्याने उपचाराविना घरी हात हलवत परतावे लागत होते. वेळेवर उपचार मिळेनासे झाले आहेत.
त्याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिला आरोग्य सेवक, पुरुष आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अवैद्यकीय पर्यवेक्षक, छायाचित्रकार, आरोग्य सहायक महिला व पुरुष यांची सरळसेवा आणि पदोन्नतीची मिळून २७९ पदे रिक्त आहेत. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. ही पदे त्वरित भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आरोग्य विभागात डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आहेत. त्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. रिक्त पदाबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्यधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, वैद्यकीय संचालक यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर रिक्त पदांचा निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाभाऊंना अल्टिमेटम

$
0
0

‘स्वाभिमानी’च्या समितीसमोर २१ ला हजर राहण्याचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याचे कृषी राज्यमंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेवरून संघटना आणि त्यांच्यात ‘तारीख पे तारीख’ नाट्य सुरू झाले आहे. खोत यांना जाब विचारण्यासाठी संघटनेने स्थापन केलेल्या चार सदस्यीय चौकशी समितीसमोर ते मंगळवारी हजर राहिले नाहीत. आता त्यांना २१ जुलै रोजी समितीसमोर हजर राहण्याचा अंतिम इशारा देण्यात आला असून, त्यानंतर समितीकडून निर्णय जाहीर होणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक २८ जून रोजी पुण्यात अल्पबचत भवन येथे झाली होती. त्या बैठकीत खोत यांना जाब विचारून त्यांना म्हणणे मांडण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोकळे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवी तुपकर आणि सतीश काकडे यांचा समावेश आहे.
या समितीसमोर पुण्यात सर्किट हाउस येथे येऊन म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी दुपारी तीनची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, खोत आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे गेले. तेथून पुण्यात येऊ शकत नसल्याचा निरोप खोत यांच्याकडून देण्यात आला. त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. खोत यांच्या या निर्णयानंतर समितीने त्यांना म्हणणे मांडण्यासाठी आता २१ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. या बाबत समितीचे अध्यक्ष सावंत म्हणाले, ‘खोत पंढरपूर येथे असल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे २१ जुलैला दुपारी दोन वाजता पुण्यात सर्किट हाऊस येथे उपस्थित राहण्याबाबतचा ई-मेल पाठविण्यात आला आहे. त्यात बैठकीला उपस्थित राहणार आहात की नाही, हे लेखी कळविण्याचे सुचविले आहे. त्या दिवशीही खोत उपस्थित न राहिल्यास समितीकडून अंतिम निर्णय घेतला जाईल.’
‘स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, या विषयांवर संघटेनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी हे सहा ते १८ जुलै या कालावधीत किसान मुक्ती यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. १८ जुलैला दिल्लीत या यात्रेची सांगता येईल. यात्रेत समितीतील सदस्य सहभागी होणार आहेत. २० जुलै रोजी दिल्लीहून पदाधिकारी परत येतील. त्यामुळे २१ जुलै ही तारीख ठरविण्यात आली आहे,’ असे सावंत म्हणाले.

आरोपांचे स्पष्टीकरण मागितले
खोत यांनी संघटनेविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करून त्यांच्यावर काही आरोप ठेवण्यात आले आहे.त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र खोत यांना पाठविण्यात आले आहे. त्यातील आरोप या प्रमाणे...

- खासदार राजू शेट्टी यांनी काढलेल्या आत्मक्लेश यात्रेत सहभागी न होता भाजपच्या शिवार संवाद यात्रेत सहभागी का झालात?
- लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते न पाळता आम्हाला हे शक्य नाही, से सुप्रीम कोर्टात सरकारच्या वतीने लिहून दिले. ही भाजप सरकारने केलेली फसवणूक आहे, यावर आपले मत काय?
- राज्यात एक जून रोजी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपात स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यामध्ये सहभागी होती. संघटनेबरोबर सल्लामसलत न करता तो संप मोडीत काढण्याचे प्रयत्न करून पुणतांब्यामध्ये जाऊन संपात फूट का पाडली?
- पनवेल महानगरपालिकेच्या निवणुकीत संघटनेने शिवसेनेसोबत निवडणूक लढविली. मात्र, आपण भाजपच्या उमेदवारांचा प्रचार का केला?
खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली एक मार्च रोजी मुंबईत मंत्रालयासमोर तूर आणि कांदा प्रश्नी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आपण आंदोलनस्थळी आलात. त्या आंदोलनात खासदार शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक झाली असताना, आपण विचारपूस करण्याची तसदी का घेतली नाही?
- काँग्रेसच्या घराणेशाहीवर आपण वारंवार कठोर टीका केली. मात्र, आपल्या मुलाला निवडणुकीच्या राजकारणात आणण्यासाठी घाई केली. ही घराणेशाही नाही का?
- खासदार शेट्टी आणि कार्यकर्ते सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी दबाव टाकतात, असे वक्तव्य आपण खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले. त्याचा पुराव्यासह खुलासा करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेह अजूनही ढगफुटीच्या ‘दहशती’त

$
0
0

मयुरेश प्रभुणे, लेह- लडाख

‘आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरु झाला की आजही गावातील सर्वजण धावत घराबाहेर येतात. पाऊस असो किंवा नसो, ती रात्र आम्ही घराबाहेर जागून काढतो,’ लेह जवळील साबू गावातील वयोवृद्ध पुंगा नामियाल यांची ही प्रतिक्रिया लेहच्या ढगफुटीचा स्थानिकांनी किती धसका घेतला आहे हे समजण्यास पुरेशी आहे.
लेह परिसरात सहा ऑगस्ट २०१० च्या मध्यरात्री झालेल्या ढगफुटीचा शेकडो कुटुंबांना फटका बसला. सात वर्षांपूर्वीची ती काळरात्र नुकतीच घडून गेली आहे असे वर्णन करताना लेहवासियांचे डोळे पाणवतात. वार्षिक सरासरी ११५ मिलीमीटर पाऊस असणाऱ्या लेहमध्ये चोवीस तासांत सर्वाधिक ५१.३ मिलीमीटर पाऊस ऑगस्ट १९३३ मध्ये नोंदला गेला होता. या भागातील चार एक पिढ्यांना मुसळधार पाऊस कसा असतो हेही माहीत नाही. अशा स्थितीत सहा ऑगस्ट २०१० च्या मध्यरात्री ताशी १०० ते १५० मिलीमीटरच्या प्रमाणात लेह परिसरात पाऊस कोसळला. ध्यानीमनी नसताना एकाएकी आलेल्या पावसामुळे लेह परिसरातील दहाएक गावे जागी झाली. उजाडल्यावर त्यांनी जे भयावह चित्र पाहिले त्याची भीती आजही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते.
ढगफुटीमुळे काही मिनिटांत दहा ते पंधरा फूट उंचीचे पाण्याचे लोट गावांमधून वाहू लागले. डोंगराचे मोठंमोठाले भाग कोसळून पाण्यासोबत उतारावरून घसरू लागले. दगड- मातीच्या चिखलाने वाटेत येईल ते वाहून नेण्यास सुरुवात केली. माळीणसारख्या दहा एक घटना एकाच वेळी व्हाव्यात इतकी या घटनेची तीव्रता होती. सुमारे अडीचशे लोकांना या घटनेत आपले प्राण गमवावे लागले. मात्र, स्थानिकांच्या मते बिहारमधून कामासाठी आलेल्या आणि पाण्यासोबत वाहून गेलेल्या अनेक मजूरांची यात नोंद झाली नाही. साबू, निम्मू, शे, फियांग, तारू, तेर आदी गावांसह लेह शहरालाही ढगफुटीचा फटका बसला. अनेक घरांसह शेते, रस्ते, सरकारी इमारती, विजेचे खांब चिखलाच्या लोटासोबत वाहून गेले. ढगफुटीने उद्ध्वस्त झालेले गावांचे भाग आजही त्या घटनेची आठवण जागी ठेवतात. सात वर्षांपूर्वी एका रात्रीत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी नागरीक आणि प्रशासन आजही प्रयत्न करताना दिसतात.

मान्सूनचा असाही परिणाम
लेहच्या भौगोलिक स्थानानुसार पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि दक्षिणेकडून आलेल्या मान्सूनच्या वाऱ्यांचा संयोग होऊन ढगफुटीची असामान्य घटना घडल्याचा निष्कर्ष हवामानशास्त्रज्ञांनी काढला. मात्र, मोठ्या पावसाच्या अशा घटना मान्सून काळातच लेहमध्ये घडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सहा ऑगस्ट २०१० रोजी वाऱ्यांच्या संयोगासोबत स्थानिक भूरचनेचा प्रभाव पडून जमिनीपासून १५ किलोमीटर उंचीचे ढग तयार झाले. दगड आणि मातीचे ढीग रचावेत अशी तकलादू रचना असणाऱ्या डोंगरांवर ढगफुटी झाल्यामुळे भूस्खलन, दरडींच्या घटना घडल्या. त्यात पुन्हा वेगाने पाणी साठून 'फ्लॅशफ्लड'ची स्थिती निर्माण झाली आणि नुकसान वाढत गेले. अशाच पण कमी तीव्रतेच्या घटना २०१५ आणि यावर्षीही घडल्यामुळे लेह अजूनही ढगफुटीच्या दहशतीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणपडताळणी सुरू आहे!

$
0
0

पुरवणी परीक्षा आली, तरी पुनर्मूल्यांकनाचे निकाल प्रलंबितच

Prasad.Panse@timesgroup.com
Twitter - @PrasadPanseMT

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेची तारीख जवळ आली, तरी अजून पुनर्मूल्यांकन आणि गुणपडताळणीची प्रकरणे प्रलंबितच आहेत. त्याचप्रमाणे ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रतेसाठी बारावीच्या गुणांचीही आवश्यकता आहे, अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थीही गुणपडताळणी/पुनर्मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या निर्धारित वेळेत गुणपडताळणी/पुनर्मूल्यांकनाचा निकाल येणार का, असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे.
दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत. त्यातील अनेक अर्ज अजूनही प्रलंबितच आहेत. त्याच वेळी मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची पुरवणी परीक्षा ११ जुलैपासून, तर दहावीची परीक्षा १८ जुलैपासून सुरू होत आहे. पुरवणी परीक्षा आली, तरी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाचा निकाल हातात पडलेला नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी सध्या विभागीय मंडळाच्या पायऱ्या झिजवत असून, उत्तरपत्रिका कधी मिळणार, याची विचारणा करत आहेत. गुणपडताळणी आणि छायांकित प्रतींची वाट पाहायची, की परीक्षा द्यायची, असा संभ्रम आता विद्यार्थ्यांपुढे उभा राहिला आहे. पुणे विभागातून बारावीच्या ६०० विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी, तर ७७ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत. यासाठी उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती घेणे आवश्यक असल्याने सर्व विषयांच्या मिळून दोन हजार ७९५ छायाप्रतींसाठी अर्ज आले आहेत. यापैकी १५५ विद्यार्थ्यांची गुणपडताळणी बाकी असून, १४४ विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन प्रलंबित आहे. एकूण ३६१ छायाप्रती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे प्रलंबित आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी ३०९ विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्यांनी एकूण १४३१ उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मागविल्या आहेत. त्यापैकी ३२१ विद्यार्थ्यांची गुणपडताळणी बाकी असून, ६०४ विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती देणे बाकी आहे.
‘गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर उत्तरपत्रिका देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, या उत्तरपत्रिका गोपनीय ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आलेल्या असतात. संबंधित विद्यार्थ्याच्या संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिका शोधून त्याची प्रत काढून त्या विद्यार्थ्यांना देण्यात येतात. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याने त्याबाबत गडबड होऊ नये, याची दक्षता घेण्यात येत आहे,’ असे मंडळाचे प्रभारी विभागीय अध्यक्ष आणि सचिव बी. के. दहिफळे यांनी सांगितले.

इयत्ता दहावी
तपशील - गुणपडताळणी - छायांकित प्रती - पुनर्मूल्यांकन
अर्ज केलेले विद्यार्थी - ३०९ - १४३१ - ...
प्रलंबित अर्ज - ३२१ ६०४

इयत्ता बारावी
तपशील - गुणपडताळणी - छायांकित प्रती - पुनर्मूल्यांकन
अर्ज केलेले विद्यार्थी - ६०० - २७९५ - ७७
प्रलंबित अर्ज - १५५ - ३६१ - १४४
(प्रलंबित अर्ज ३ जुलैपर्यंतचे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणीसाठी चिमुरडीचे अपहरण करून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

घरातून अचानक गायब झालेल्या तनिष्का या चार वर्षांच्या चिमुरडीचा भाडेकरूनेच पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार चऱ्होली दिघी येथे उघडकीस आला आहे. मारेकऱ्यांनी चिमुरडीचा खून करून तिचा मृतदेह एक दिवस घरातच लपवून ठेवला होता. नंतर अकोला येथे जाऊन तिचा मृतदेह जाळून पुरल्याचे तपासात समोर आले आहे.

शुभम विनायकराव जामनिक (२२) व प्रतीक ऊर्फ गोलू अरुण साठले (२३ रा. दादरा नगर हवेली) या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हे दोघेही अकोला येथील मूर्तिजापूर येथील आहेत. शुभम हा सध्या तनिष्का यांच्या घरी भाडेतत्त्वावर राहतो. चऱ्होली येथील वडमुखवाडी येथे राहणारी तनिष्का अमोल आरूडे ही चिमुरडी २८ जून रोजी घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर तपास करताना संशयावरून सोमवारी (३ जुलै) शुभम व प्रतीक या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिष्का २८ जूनला घरी आली व तेथेच खेळत होती. तिचे वडील अमोल आरुडे आणि आई योगिता कामात होते. अमोल यांनी योगिता यांना त्यांच्या मालकीच्या किराणा दुकानात बसवले आणि ते गाडी सर्व्हिसिंगसाठी चिंचवडला गेले. काही वेळाने योगिता मोठ्या मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या. त्या वेळी तनिष्का घरात खेळत होती. दुपारी एक वाजता योगिता घरी परत आल्या असता, तनिष्का घरात नव्हती. बराच शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने आरुडे दाम्पत्याने पोलिसांकडे धाव घेतली.

शुभमने प्रतीकच्या मदतीने तनिष्काला आमिष दाखवून तो रहात असलेल्या आरूडे यांच्या मालकीच्याच खोलीत नेले. दोघांनी अमोल आरुडे यांच्याकडे पाच लाखांची खंडणी मागण्याचे ठरविले होते. मात्र, हा प्रकार उघड झाल्यावर आपल्यावर कारवाई होईल या भीतीपोटी दोघांनी तनिष्काचे तोंड उशीने दाबून तिचा खून केला. आरुडे दाम्पत्य तनिष्काला शोधत असताना, तिचा मृतदेह त्यांच्याच मालकीच्या दुसऱ्या खोलीत लपवून ठेवण्यात आला होता.

दुसऱ्या दिवशी शुभम व प्रतीक यांनी तनिष्काचा मृतदेह एका बॅगेत भरून मूर्तिजापूर गाठले. तेथे त्यांनी तनिष्काचा मृतदेह जाळून टाकला. मात्र, हा प्रकार येथील लोकांना समजण्याच्या भीतीने त्यांनी अर्धवट जळालेला तनिष्काचा मृतदेह रानात पुरून टाकला.

दरम्यान, संशयावरून शुभम आणि प्रतीक यांना ताब्यात घेतल्यावर तनिष्काचा खून झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोघांना मूर्तिजापूरला नेले. तेथे त्यांनी जमीन उकरल्यावर तनिष्काचा मृतदेह आढळून आला.

तपास पथकाचे फौजदार हरीश माने, शिवाजी भुजबळ, सहायक फौजदार टोके, हवालदार वसंत गायकवाड, बबन वणवे, संजय पवळे, विनोद तांदळे, बोयणे, रवी नाडे, धनंजय भोसले आदींनी पथकासह हा गुन्हा उघडकीस आणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images