Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

युरोपियन बँकेकडे कर्जासाठी शिफारस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी ‘युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँके’कडून साडेचार हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची शिफारस केंद्र सरकारने केली असून, उर्वरित पंधराशे कोटी रुपयांच्या कर्जउभारणीसाठी विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सोमवारी दिली.
पुणे मेट्रोच्या ११ हजार ४२० कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चापैकी तब्बल सहा हजार कोटी रुपये कर्जाच्या माध्यमातून उभे करावे लागणार आहेत. वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) मेट्रोच्या कर्जपुरवठ्यासाठी उत्सुकता दर्शवली होती. या दोन्ही बँकांऐवजी केंद्र सरकारने ‘युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँके’ला पसंती दिली असून, महामेट्रोच्या संचालक मंडळाच्या बैठकीतही नुकतीच त्याला मान्यता देण्यात आली होती.
मेट्रोसाठी तब्बल सहा हजार दोनशे कोटी रुपये (८४५ मिलियन युरो) खर्च येणार असून, त्यापैकी साडेचार हजार कोटी रुपये (सहाशे मिलियन युरो) कर्ज देण्याची तयारी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने दर्शवली आहे. उर्वरित निधी उभा करण्यासाठी फ्रान्स आणि जर्मनीतील काही बँकांशी चर्चा सुरू आहे. केंद्र आणि राज्याकडून प्राप्त झालेल्या निधीतून सध्या मेट्रोची कामे सुरू असून, आगामी आर्थिक वर्षापूर्वी कर्जपुरवठ्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच दीक्षित यांनी केले.
कृषी महाविद्यालय आणि कोथरूड येथील कचरा डेपो अशा दोन जागा मेट्रोच्या डेपोसाठी आवश्यक असून, इंटरजेंच स्टेशनसाठी धान्य गोदामाची जागा मेट्रोच्या ताब्यात मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आगामी दोन महिन्यांत या तिन्ही जागांचा ताबा मेट्रोला मिळेल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये तुकाराम नगर येथे मेट्रोची माहिती देण्यासाठी ‘माहिती केंद्र’ उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पर्यायी मार्गांचे नियोजन
कर्वे रस्त्यासारख्या गजबजलेल्या भागांत मेट्रोचे काम करताना ते दोनशे-अडीचशे मीटरच्या टप्प्यांत केले जाणार आहे. अशा वेळी वाहनचालकांना त्याचा फार त्रास होऊ नये, याकरिता वाहतूक पोलिसांच्या मदतीने पर्यायी मार्गांचे नियोजन करणार असून, त्याची सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे संकेत मेट्रोचे तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यांनी दिली.

पर्यावरणाची काळजी घेणार
नदीपात्रातील १.७ किमीच्या मेट्रो मार्गामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचा दावा करत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल करण्यात आली आहे. पर्यावरणावर होणारे संभाव्य परिणाम टाळण्यासाठी यापूर्वी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली असून, विस्तृत अभ्यासाद्वारे मांडण्यात येणाऱ्या निरीक्षणांनुसार पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी निश्चित घेण्यात येणार आहे, असे ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यावरणाचे सेनापती वाढले पाहिजेत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पर्यावरणीय समस्या दिवसेंदिवस वाढत असून ‘ग्लोबल वॉर्मिंग’, ‘क्लायमेट चेंज’ असे गंभीर शब्द आता डिक्शनरीच्या बाहेर आले आहेत. माणसाला जगविण्यासाठी वृक्ष तोडणारे नव्हे; तर वृक्षलागवड करणारे हात वाढविण्याची गरज आहे. यासाठी पर्यावरणाचे सेनापती वाढले पाहिजेत, असे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य महसूल आणि वन विभागातर्फे ‘चार कोटी वृक्ष लागवड’ उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी वन विभागातर्फे हिंगणे टेकडीवर साकारण्यात येत असलेल्या नागरी वन उद्यान प्रकल्पाचे मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. आमदार मेधा कुलकर्णी, जिल्हाधिकारी सौरभ राव, राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, अनुराग चौधरी, जीत सिंह, सामाजिक वनीकरण विभागाचे संचालक दिनेशचंद्र त्यागी, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर तसेच इतर पदाधिकारी आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
वृक्ष लागवड महोत्सवाला राज्य भरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यात १ कोटी ४४ लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. आम्ही त्यांचे जीपीएस लोकेशन नोंदवले आहे. उपक्रमासाठी पाच कोटींहून अधिक झाडांसाठी विविध संस्थांनी आमच्या वेबसाइटवर नोंदणी केली आहे. त्यामुळे या सप्ताहात निश्चितच चार कोटींचा टप्पा ओलांडणार आहोत. वाढत्या पर्यावरणीय समस्यांवर मार्ग काढण्यासाठी वृक्षाच्छादन वाढविण्याशिवाय पर्याय नाही. वृक्षारोपण ही केवळ वन विभागाची जबाबदारी नसून ऑक्सिजन घेणाऱ्या प्रत्येकाची आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीच्या मोहिमेत प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.
वृक्षसंवर्धनाच्या मोहिमेत आम्ही सर्वसामान्य माणसांना सहभागी करून घेण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित आहोत. वन विभागाने जाहीर केलेल्या ‘ग्रीन आर्मी’ अर्थात पर्यावरणाचे सेनापती या उपक्रमास राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंत २१ लाख ६६ हजारांहून अधिक नागरिक यात सहभागी झाले आहेत. पुण्यात १ लाख ३३ हजार नागरिकांनी ग्रीन आर्मीचा फॉर्म भरला आहे. याशिवाय ‘१९२६’ या हेल्पलाइनलाचा संपर्कही वाढला आहे. वन विभागाच्या कामात आम्हाला लोकसहभाग वाढवायचा आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
मेधा कुलकर्णी यांनी हिंगणे आणि म्हातोबा या टेकड्यांवर प्रस्तावित असलेल्या योजनांची माहिती देऊन त्यासाठी आर्थिक मदतीची मागणी केली. सौरभ राव यांनी पुणे जिल्ह्यात विविध सरकारी विभागांतर्फे वृक्षारोपणासाठी केलेल्या नियोजनाची आणि सुरू असलेल्या कामांची माहिती सांगितली. खांडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी आभार प्रदर्शन केले. असल्याचा दावा करत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल करण्यात आली आहे. पर्यावरणावर होणारे संभाव्य परिणाम टाळण्यासाठी यापूर्वी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली असून, विस्तृत अभ्यासाद्वारे मांडण्यात येणाऱ्या निरीक्षणांनुसार पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी निश्चित घेण्यात येणार आहे, असे ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसएमएस दाखविल्यास वीजबिल स्वीकारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वीज बिलाबाबत महावितरणच्या वतीने ग्राहकांना मोबाइलवर पाठविण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर वीजबिल भरण्याची सुविधा महावितरणने राज्यभरातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या सूचनेनंतर महावितरणने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
राज्यभरातील सुमारे एक कोटी ३९ लाख वीजग्राहकांनी आपल्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी महावितरणकडे केली आहे. या ग्राहकांना वीजबिलाचा तपशील एसएमएसद्वारे संबंधित मोबाइलवर पाठविण्यात येतो. त्यामध्ये ग्राहक क्रमांक, वीज बिलाची रक्कम आणि बिल भरण्याची अंतिम तारीख याचा समावेश असतो. राज्यभरातील अशा ग्राहकांना आता मोबाइलवरील एसएमएस दाखवून महावितरणच्या वीजबील भरणा केंद्रात बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांनी महावितरणच्या कॉलसेंटर १८००२००३४३५, १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर, किंवा महावितरणचे मोबाइल अॅप अथवा महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन ‘महावितरण’तर्फे करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता‘पीजीडीबीएम’अनधिकृत?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या ६० पेक्षा अधिक कॉलेजांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (पीजीडीबीएम) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) मान्यतेशिवाय सुरू आहे. एआयसीटीईने प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये मॅनेजमेंट विषयाशी निगडीत असणारे अभ्यासक्रम चालविण्यासाठी एआयसीटीईची मान्यता आवश्यक आहे. या नियमावलीला कॉलेजांसह विद्यापीठाने तिलांजली देत ‘पीजीडीबीएम’ अभ्यासक्रम मान्यतेशिवाय सुरू ठेवला आहे. मात्र, विद्यापीठाने पीजीडीबीएम अभ्यासक्रमाला एआयसीटीई मान्यतेची गरज नसल्याचा कांगावा केला आहे.
विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजांना व्यवस्थापन (मॅनेजमेंट) शाखेत येणाऱ्या मास्टर्स इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (पीजीडीबीएम) आदी अभ्यासक्रम चालविण्यासाठी एआयसीटीईची मान्यता आवश्यक आहे. तशी माहिती एआयसीटीईने वेबसाइट व प्रसारमाध्यमांतून वेळोवेळी प्रसिद्ध केली आहे. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या या कॉलेजांनी एमबीए अभ्यासक्रम चालविण्यासाठी मान्यता घेतली आहे. मात्र, पीजीडीबीएम चालविण्यासाठी मान्यता घेतली नसल्याचे पुढे आले आहे. विद्यापीठाने वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सुमारे ९४ कॉलेजांमध्ये एमबीए अभ्यासक्रम चालतो. यामध्ये पुणे जिल्ह्यासोबतच नगर आणि नाशिक जिल्ह्यातील कॉलेजांचा समावेश आहे. मॅनेजमेंट क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल दर वर्षी कमी होत असल्याने साधारण ६० पेक्षा अधिक कॉलेजांमध्ये पीजीडीबीएम अभ्यासक्रम मान्यतेशिवाय सुरू आहे.
एमबीए आणि पीजीडीबीएम हे दोन्ही अभ्यासक्रम दोन वर्षांचे आहेत. तसेच, एमबीएच्या तुलनेत या अभ्यासक्रमाचे शुल्क कमी असते. त्यामुळे एमबीएला प्रवेश न मिळालेले विद्यार्थी पीजीडीबीएम अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. मात्र, एआयसीटीईने यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या कॉलेजांमध्ये पीजीडीबीएम अभ्यासक्रमाला मान्यताच नाही. राज्यातील मुंबई विद्यापीठासोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आदी प्रमुख विद्यापीठांमध्ये देखील पीजीडीबीएम अभ्यासक्रम मान्यतेशिवाय सुरू असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, विद्यापीठांच्या नियंत्रणात असणाऱ्या कॉलेजांमध्ये पीजीडीबीएम, पीजीडीएम अभ्यासक्रम एआयसीटीईच्या मान्यतेशिवाय सुरू असल्यास त्यांची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाने थांबवावी. एआयसीटीईची मान्यता न घेणाऱ्या कॉलेजांची चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यापीठ प्रमुख प्रतिक दामा यांनी केली आहे.

कॉलेजांनी पीजीडीएम अभ्यासक्रम चालविण्यासाठी एआयसीटीईची मान्यता घेणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या कॉलेजांमध्ये पीजीडीबीएम अभ्यासक्रम चालविण्यासाठी एआयसीटीईची मान्यता आवश्यक नाही.

- डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता, कॉमर्स व मॅनेजमेंट शाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


प्रवेशापूर्वी चौकशी करा
पालक आणि विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या कॉलेजांमध्ये सुरू असणाऱ्या ‘पीजीडीबीएम’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी एआयसीटीई व विद्यापीठाची मान्यता आहे की नाही, याची कॉलेजांकडे चौकशी करावी. दरम्यान, विद्यापीठाशी संलग्नित नसणाऱ्या काही खासगी कॉलेजांमध्ये ‘पीजीडीएम’ अभ्यासक्रम चालतो. याला देखील राज्यातील काही कॉलेजांनी मान्यता घेतली नसल्याची शक्यता आहे, त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी चौकशी करावी, अशी माहिती एका एआयसीटीईच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेक्कन क्वीन ‘एक’वरून सोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
काही कारणास्तव दोन महिन्यांसाठी डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा प्लॅटफॉर्म बदलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र, ती मुदत उलटल्यानंतरही अद्याप डेक्कन क्वीन पूर्वीप्रमाणे प्लॅटफॉर्म एकवरून सोडण्यात येत नाही. त्यामुळे डेक्कन क्वीनच्या प्रवाशांमध्ये नाराजी आहे. ही गाडी तातडीने प्लॅटफॉर्म एकवरून सोडावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस, आझाद-हिंद एक्‍स्प्रेस, पुणे-पाटलीपुत्र एक्‍स्प्रेस या गाड्यांना नेहमीच्या २३ डब्यांऐवजी २४ डबे लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यासाठी १५ फेब्रुवारीपासून दोन जूनपर्यंत डेक्कन क्वीन गाडी प्लॅटफॉर्म एकऐवजी पाच प्लॅटफॉर्मवरून सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र, अद्यापही ही गाडी प्लॅटफॉर्म पाचवरून सोडण्यात येत आहे. सकाळी सव्वासात वाजता ही गाडी पुणे स्टेशन येथून सुटते. त्यामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्म पाचवर जाण्यासाठी धावपळ करावी लागते.
डेक्कन क्वीन एक्स्प्रेसची डायनिंग कार नूतनीकरणासाठी काढण्यात आली आहे. ती लवकरच आधुनिक, सुशोभित आणि आकर्षक स्वरूपात दाखल होणार आहे. त्यासाठी किमान एक महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्या या गाडीला पॅन्ट्री कार जोडण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

$
0
0

वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि परिवर्तन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल विठ्ठल वांजळे आणि मित्र परिवाराच्या वतीने ग्रामीण भागातील अडीचशे विद्यार्थ्यांना नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कुडजे, खडकवाडी, आगळंबे, ठाकरवाडी, मांडवी बुद्रुक, मांडवी खुर्द जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना हे साहित्य देण्यात आले. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही आणि आमचे सहकारी कटिबद्ध आहोत, असे मत पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा मुख्य भाग आहे. तो मागे राहून चालणार नाही, त्यांना विकसित समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमची संस्था सतत कार्यरत राहणार आहे, असे आश्वासन वांजळे यांनी दिले. पुणे शहर वृत्तपत्र संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, सचिव अरुण निवंगुणे, संघटक अमित जाधव, अरुण तांदळे आणि परिवर्तन प्रतिष्ठानचे पदाधिकारी शरद पारगे, संदीप वांजळे, तसेच शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसने दिला आंदोलनाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इयत्ता नववीच्या इतिहास आणि राज्यशास्त्राच्या पुस्तकात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा बोफोर्स तोफांच्या खरेदीतील कथित भ्रष्टाचाराचा उल्लेख करण्यात आल्याप्रकरणी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने गांधी यांना निर्दोष जाहीर केले असतानाही महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहे. या चुकीच्या छपाईबाबत माफी मागून त्वरीत चूक दुरूस्त करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. बोफोर्स प्रकरणाबाबत पुस्तकात लिहिताना सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा उल्लेख न करणे हा कोर्टाचा अवमान आहे. नरसिंहराव यांच्या १९९१ ते १९९५ च्या काळात आर्थिक क्रांती झाली होती. याच परिच्छेदामध्ये अयोध्या येथील रामजन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असे लिहिले आहे. परंतु, १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आल्याचा उल्लेख नाही. बाबरी पाडणाऱ्यांवर कारवाई झाली असून माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती हे प्रमुख आरोपी आहेत. याचा उल्लेख पुस्तकात करण्यात आलेला नाही, असा आरोप शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केला आहे.
बालभारतीच्या इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकातील राजीव गांधी यांच्याबाबात आक्षेपार्ह मजकूर छापला असल्याची तक्रार काँग्रेसने शिक्षण आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे. या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकूर तातडीने काढण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिक्षण संचालक सुनील मगर यांच्याशी चर्चा करण्यात आली. काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष शिवा मंत्री, शहर काँग्रेस सरचिटणीस बाबा नायडू, ऋषिकेश बालगुडे, सुखदेव शिंदे, ओंकार एरंडे आदी उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपत्तीत वाटेकरी नको म्हणून गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

माजी नगरेसवक कैलास गायकवा यांच्या दुसऱ्या पत्नीला मालमत्तेतील हिस्सा मिळू नये म्हणून त्यांच्या मुलीनेच योगेश शेलार याच्यावर गोळीबार घडवून आणल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. बांधकाम ठेकेदार असणाऱ्या योगेशवर २४ जूनला सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपळेगुरव येथे गोळीबार झाला होता. शेलार याच्या बहिणीशी कैलास गायकवाड यांनी दुसरे लग्न केले आहे.
अदिती कैलास गायकवाड (वय २४, गायकवाड नगर, औंध), मामेभाऊ सौरभ शिंदे (वय २०, सिद्धकमल निवास, नवी सांगवी), प्रणव गावडे (वय १९, मोरया हौसिंग सोसायटी, चिखली प्राधिकरण), आशुतोष उर्फ बंटी मापारे (वय १९, भैरवनगर, धानोरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या वेळी सहायक आयुक्त संजय निकम, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र तोडकर उपस्थित होते.
पुणे पालिकेचे माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी योगेश शेलारच्या बहिणीशी काही वर्षांपूर्वी दुसरा विवाह केला. आदिती उच्चशिक्षणासाठी इंग्लंड येथे राहत होती. शिक्षणानंतर ती पुण्यात परतली. तेव्हापासून शेलार हा बहिणीला गायकवाडांकडून संपत्तीमध्ये वाटा मिळवा यासाठी सांगत होता. पालिकेच्या २०१७ला झालेल्या सार्वत्रिक निडणुकीत शेलार आणि अदिती प्रचारासाठी समोरासमोर आले होते. तेव्हा त्यांच्यात वाद झाला होता. अदितीचा मामेभाऊ सौरभ शिंदे याची सराईत तडीपार गुंड बंटी जाधवशी ओळख होती. त्यामुळे सौरभला सांगून अदितीने शेलारला धडा शिकवण्याचा निश्चय केला. त्यासाठी पाच लाखांची सुपारी देण्याचे ठरले. त्यापैकी ५० हजार रुपये आधीच देण्यात आले. सौरभने गावडे, मापारे तसेच बंटी जाधव यांच्या मदतीने हल्ल्याचे नियोजन केले. त्यानंतर जाधवने काही मारेकऱ्यांना पैसे देऊन हल्ल्याचे निश्चित केले.
तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी शेलार आले असता, त्यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यात शेलारच्या पायाला गोळी लागली. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथक सांगवी पोलिसांबरोबरीने या प्रकरणाचा तपास करीत होते. तेव्हा प्रणव गावडे याचा सहभाग उघड झाला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, गुन्ह्याची उकल झाली. दरम्यान, घटनेनंतर फिर्याद दाखल होताच अदितीला सांगवी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर हा गुन्हा तपासासाठी युनिट चारकडे वर्ग करण्यात आला होता. सहायक निरीक्षक नितीन भोयर, गणेश पाटील, फौजदार विलास पलांडे, कर्मचारी दिलीप लोखंडे, संजय गवारे, प्रमोद लांडे, राजेंद्र शेटे, प्रमोद वेताळ, गणेश काळे आदींच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले.

नियोजन करून ‘तो’ गेला पंढरपूरला
अदितीने शेलारला अद्दल घडविण्यासाठी सौरभला तयार केले. त्यानंतर गावडे, जाधव आणि मापारे यांच्या मदतीने नियोजन करून सौरभ पंढरपूरला पालखीबरोबर निघून गेला. तेथून परतल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीएसटीचा अपप्रचार माध्यमांवर ‘व्हायरल’

$
0
0

माहिती दिशाभूल करणारी; अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हॉटेल व्यावसायिक तसेच दुकांनामध्ये जीएसटीची आकारणी करताना बिलावर नियोजित कराची रक्कम राज्य आणि केंद्र अशी विभागून दाखविण्यात येत आहे. तसेच, कराची रक्कम काही व्यावसायिक दुप्पट आकारत असल्याच्या तक्रारी व्हॉट्सअॅप आणि सोशल नेटवर्किंग साइटवरही नोंदविण्यात येत आहेत. काहींनी पावत्याही टाकल्या आहेत. ही अतिरिक्त रक्कम घेण्यात येत असल्याची माहिती दिशाभूल करणारी असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी स्पष्ट केले.
वस्तू आणि सेवा कराबाबतचा (जीएसटी) संभ्रम अजूनही कायम आहे. कोणत्या वस्तू किंवा सेवेवर किती टक्के जीएसटी आकारला जाणार आहे, याची पुरेशी माहिती ग्राहकांना झालेली नाही. काही ठिकाणी तर खुद्द व्यावसायिकही संभ्रमात असल्याचे चित्र होते. त्यामुळे ग्राहक व व्यावसायिकांमध्ये खटके उडत आहेत. ‘जीएसटी कायद्यानुसार एकूण कराचा अर्धा वाटा राज्य आणि केंद्र सरकारला द्यायचा आहे. त्यासाठी स्वतंत्र जीएसटीएन क्रमांक व्यावसायिकांना देण्यात आले आहेत. त्यासाठी बिल तयार करताना दोन्ही जीएसटीएनचा स्वतंत्र उल्लेख करून त्याची रक्कम दर्शविण्यात येते. मात्र, ते पाहिल्यानंतर आपल्याला दुहेरी कराची आकारणी होत असल्याचा संभ्रम होत आहे,’ असे एका व्यावसायिकाने सांगितले.
‘कोणत्या वस्तूवर, सेवेवर किती कर आकारण्यात येणार आहे, याची माहिती विविध वृत्तपत्रातून जाहीर करण्यात आली आहे. जीएसटीच्या वेबसाइटवर तसेच अन्य काही सरकारी वेबसाइटवरही ही माहिती उपलब्ध आहे. ग्राहकांनी ती माहिती आवर्जून वाचावी. व्यावसायिकाकडून अतिरिक्त कर आकारला जात असल्यास, त्याची तक्रार करावी,’ असे केंद्रीय जीएसटीच्या पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर यांची स्पष्ट केले.

क्रेडिट कार्डवर दुहेरी आकारणी नाही.
क्रेडिट कार्डच्या मदतीने केलेल्या व्यवहारांवर दुहेरी जीएसटी लागू नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. क्रेडिट कार्डाने कोणतेही बिल भरू नका, अशा बिलावर दोनदा जीएसटी लागू केला जाईल असा एक मेसेज व्हॉट्सअॅपवर सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे कार्डधारकांमध्ये प्रचंड प्रमाणात गोंधळ माजला आहे. मात्र ही केवळ अफवा असून, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनी तज्ज्ञांनी केले आहे. या संदर्भात जीएसटी तज्ज्ञ शंतनु बागवे यांनी महाराष्ट्र टाइम्सला सांगितले की, ‘क्रेडिट कार्ड देणारी बँक त्याच्या वापरासाठी वार्षिक तत्त्वावर ठरावीक दर आकारते. त्यावर आतापर्यंत १५ टक्के सेवाकर आकारण्यात येत होता. जीएसटी लागू झाल्यावर सेवाकर रद्द झाला. मात्र, जीएसटी १८ टक्के लावण्यात आला आहे. याचा अर्थ, तीन टक्के करवाढ झाली आहे. यात कुठेही दुहेरी करवाढ होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीचा उपकर रद्द होणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वगळला असला तरी, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वसूल केला जाणारा उपकर रद्द होण्याची शक्यता आहे. हा उपकर रद्द झाल्यास बाजार समितीचे उत्पन्न घटण्याची भीती आहे.
एक जुलैपासून देशात एकच करप्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये वसूल करण्यात येणारा उपकरही रद्द होण्याची शक्यता आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मार्केट यार्डात येणाऱ्या मालावर एक टक्का उपकर (सेस) वसूल केला जातो. हा उपकर व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यात येतो. उपकराच्या माध्यमातून बाजार समितीला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते.
जीएसटीनंतर उपकर रद्द होणार असल्याने बाजार समितीचे उत्पन्न घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या संदर्भात पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे म्हणाले, ‘बाजार समितीचा उपकर रद्द करून जीएसटी लागू होण्यासंदर्भात अधिकृत कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे याबाबत काहीच सांगता येत नाही. उपकराद्वारे बाजार समितीला दरवर्षी सुमारे ३६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. उपकर रद्द झाला तर, नव्याने देखभाल शुल्क आकारावे लागेल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुद्रांक शुल्का’त अद्याप बदल नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाला असला, तरी नोंदणी आणि मुद्रांक शुल्कामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुद्रांक शुल्कचे दर हे पूर्वीप्रमाणेच असल्याचे राज्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक अनिल कवडे यांनी सांगितले.
‘जीएसटी’ लागू झाल्यामुळे मुद्रांक शुल्कदेखील वाढल्याची चर्चा करण्यात येत आहे. मुद्रांक शुल्क वाढण्याच्या शक्यतेने ३० जूनपूर्वी अनेकांनी मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार केले. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर कवडे म्हणाले, ‘नोंदणी आीण मुद्रांक शुल्क विभागासाठी​ जीएसटी लागू नाही. जीएसटीमुळे मुद्रांक शुल्क वाढणार असल्याचा गैरसमज पसरविण्यात आला आहे. वास्तविक मुद्रांक कायदा हा स्वतंत्र आहे. त्याचा जीएसटीशी संबंध नाही. मुद्रांक शुल्काचा दर हा पूर्वीप्रमाणेच पाच टक्के आहे.’
‘बांधकामासाठी लागणाऱ्या सामग्रीच्या किमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे फ्लॅटच्या किमती वाढू शकतात. मुद्रांक शुल्क हे पूर्वीप्रमाणेच राहणार आहे,’ असे कवडे यांनी स्पष्ट केले.

दस्तनोंदणीत घट
जीएसटी लागू झाल्यानंतर तीन जुलै रोजी दस्तनोंदणीचा पहिला दिवस होता. या दिवभरात सात हजार ४८५ दस्तांची नोंदणी करण्यात आली. त्याद्वारे सुमारे ४६ कोटी ३५ लाख रुपयांचा महसूल जमा झाला. तुलनेने दस्तनोंदणीत घट झाली आहे. ३० जून रोजी सुमारे आठ हजार दस्तांची नोंदणी झाली होती, असे कवडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’मुळे शहरात दोघे दगावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळा सुरू झाल्याने स्वाइन फ्लूच्या ‘एच१एन१’ विषाणूसाठी पोषक वातावरण मिळत असल्याने संसर्ग वाढला आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दोघांचा संसर्गामुळे बळी गेल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली.
मार्च महिन्यामध्ये स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढला होता. परंतु, उन्हाच्या तीव्र झळांमुळे संसर्गाची तीव्रता कमी झाली. एप्रिल ते जूनदरम्यान स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पेशंट फारसे आढळले नाहीत. मात्र, जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. त्यानंतर विषाणूंच्या वाढीसाठी पोषक हवामान असल्याने स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे.
लोहगावमधील ३५ वर्षीय तरुणाला संसर्ग झाल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. त्याच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात लागण झाल्याचे निदान झाले. संबंधिताला सर्दी, ताप, खोकल्यासह अन्य कोणतेही गंभीर आजार नव्हते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील ५१ वर्षाच्या व्यक्तीला १५ जूनला संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवले होते. परंतु, त्यांचाही मृत्यू झाल्याने शहरातील स्वाइन फ्लूने दगावलेल्यांची संख्या ६१वर पोहोचली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’नोंदणीसाठी पुणेकरांची वणवण

$
0
0

‘ई-सेवा’ केंद्र, पोस्टातील यंत्रणा ठप्प

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा प्रशासनांतर्गत चालविण्यात येणाऱ्या केंद्रांमध्ये आधार कार्डची नोंदणी बंद झाल्याने तसेच, पोस्टाच्या कार्यालयातील यंत्रणा अद्याप सुरळीत न झाल्याने ‘आधार कार्ड’साठी पुणेकरांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे. ‘महा ई सेवा केंद्र’ तसेच ‘सेतू’मार्फत करण्यात येणारी आधार नोंदणीही ठप्प झाल्याने पुणेकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गेल्या आठवड्यापासून शहरातील आधार नोंदणीची आणि माहिती अपडेट करण्याची यंत्रणा ठप्प झाली आहे. त्याच वेळेस ‘आधार’ची संपूर्ण जबाबदारी घेतलेल्या पोस्टाच्या कार्यालयांमध्येही अजूनही यंत्रणा अपडेड करण्याचे काम सुरू आहे. मुख्य टपाल कार्यालय वगळता अन्य कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये ‘आधार’ची यंत्रणा नसल्याने नागरिकांची पळापळ सुरू आहे. नुकनीच पोस्टाच्या कार्यालयांमध्ये आधार नोंदणी आणि माहिती अपडेट करण्याच्या यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. येत्या १० ते १२ दिवसांमध्ये पोस्टाच्या वीस कार्यालयांमध्ये ही यंत्रणा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. तरीही आगामी आठवड्यात नागरिकांना मनस्ताप सोसावा लागणार आहे.
कोणतीही पर्यायी यंत्रणा न उभारता जिल्हा प्रशासनांतर्गत चालवण्यात येणाऱ्या आधार केंद्रांची यंत्रणा बंद करण्यात आली. पोस्टाकडे जबाबदारी सोपवून जिल्हा प्रशासन मोकळे झाले. मात्र, त्यामुळे नागरिकांना ‘आधार’साठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. एकीकडे राज्य आणि केंद्र सरकारने प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘आधार’ची सक्ती केली आहे. अशावेळी शहरातील सर्व यंत्रणा ठप्प असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

नागरिकांच्या संतापात भर
मुख्य टपाल कार्यालयात केवळ ‘आधार’चीच नोंदणी होत असल्याने येथील गर्दी वाढत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मुख्य टपाल कार्यालय जवळ पडते. मात्र, उपनगरात राहणाऱ्यांनी दररोज तेथे चकरा मारायच्या का, असा उद्विग्न सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी शहराच्या सर्व भागातील टपाल कार्यालयातील यंत्रणा परत सुरू करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीवर विळीने हल्ला; पती अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अंथरूण टाकले नाही म्हणून पतीने कांदा कापण्याच्या विळीने पत्नीवर वार केल्याची घटना शनिवारी रात्री धायरी येथे घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

प्रकाश दयानंद वाघमारे (वय ५५, रा. धायरेश्वर मंदिराच्या मागे, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कमल प्रकाश वाघमारे (वय ४५) यांनी तक्रार दिली आहे. प्रकाश आणि कमल यांना चार मुली, एक मुलगा आहे. हे दोघेही काहीच कामधंदा करीत नाहीत. त्यांच्या दोन मुली विवाहित आहेत. हे सर्वजण धायरी येथे भाड्याच्या घरात राहतात. प्रकाश नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घालत असत. याच कारणावरून त्यांची अनेकदा कडाक्याची भांडणे झाली आहेत.

शनिवारी रात्री प्रकाश घरी आले. त्यांनी पत्नीला अंथरूण टाकण्यास सांगितले. पण, कमल यांनी अंथरूण टाकले नाही. त्यावरून चिडलेल्या प्रकाशने लाकडी बांबूने कमलला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान, प्रकाशने घरातील कांदा कापण्याच्या विळीने कमल यांच्यावर वार केले. पण, ते त्यांनी चुकविले. मात्र, त्यातील एक वार हाताच्या करंगळीवर बसला. त्यानंतर प्रकाशने त्यांना दगडाने मारहाण केली. शेवटी मुली आणि शेजाऱ्यांनी मध्ये पडून वाद सोडवला. या प्रकरणी कमल यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर प्रकाशला अटक करण्यात आली आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे : महेशची मदतीची हाक...

$
0
0

Suresh.Ingale@timesgroup.com

Tweet : @sureshIngaleMT

पुणे : कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी सामान शिफ्टिंगची कामे करणारे वडील... शिवणकाम करून परिस्थितीला ठिगळ लावण्यासाठी धडपडत असलेली आई... घरभाडे वाचावे म्हणून काका-काकूंसह दोन पत्र्यांच्या खोलीत एकत्रित राहणारे कुटुंब... अशा परिस्थितीत महेश विलास जगताप याने दहावीच्या परीक्षेत ९३.८० टक्के गुण मिळवले. कुटुंबात दहावीपर्यंत शिकणारा महेश हा एकमेव असून, त्याने इंजिनीअर होण्याचे ध्येय बाळगले आहे. महेशच्या यशामुळे कुटुंब, नातेवाइक, शेजारी अशा सर्वांकडून कौतुक होत आहे.

खराडी येथील थिटे वस्तीत महेश त्याचे आई-वडील, लहान बहीण, काका-काकू यांच्यासोबत राहतो. महेशने जिद्दीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले. परंतु, महेशच्या कुटुंबीयांना त्याच्या पुढील शिक्षणाची चिंता सतावत आहे.

महेश कुटुंबातील पहिला ‘मॅट्रिक’

खराडी येथील सारथी विद्यालयातील विद्यार्थी महेश विलास जगताप याने दहावीच्या परीक्षेत ९३.८० टक्के गुण मिळवून शाळेत पहिला येण्याचा मान पटकावला. परिस्थिती हलाखीची असतानाही महेशने मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यातही कुटुंबात दहावीपर्यंत शिकणारा महेश पहिलाच असल्याने अधिक आनंद आहे. परंतु, महेशच्या आई-वडिलांना मात्र या आनंदापेक्षाही मुलाच्या शिक्षणाचा खर्च कसा पेलायचा, असा प्रश्न पडला आहे.

वडील विलास, आई रेश्मा, नववीत शिकणारी लहान बहीण वैष्णवी, काका संभाजी, काकू पल्लवी यांच्यासह महेश खराडी येथील थिटे वस्तीत दोन पत्र्यांच्या खोलीत भाड्याने राहतो. जगताप कुटुंब हे मूळचे उस्मानाबादच्या गौरगाव येथील. वडील विलास अशिक्षित, तर आई रेश्मा यांचे शिक्षण आठवीपर्यंत झालेले आहे. कामाच्या शोधात विलास जगताप हे कुटुंबासह पुण्यात आले खरे; पण अशिक्षित असल्याने त्यांना काम तरी काय मिळणार? अखेर ते हेल्पर म्हणून सामान शिफ्टिंगची कामे करू लागले. रोज २००-२५० रुपयांच्या हजेरीवर काम करीत असलेले विलास यांच्या एकट्याच्या उत्पन्नात भागत नसल्याने आई रेश्मा यांनी शिवणकाम करण्यास सुरुवात केली. त्यातून फार काही उत्पन्न नसले, तरी फाटलेल्या परिस्थितीला ठिगळ लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महेशचे काका संभाजी जगताप ड्रायव्हर म्हणून काम करतात; तर काकू गृहिणी आहे. एकट्याच्या कुटुंबासाठी सहा हजार रुपये भाडे परवडणार नाही, म्हणून हे दोन्ही कुटुंबे एकत्रितच राहतात. लहानपणापासूनच पहिला क्रमांक पटकावणाऱ्या महेशला क्रिकेटची आवड आहे. प्रज्ञाशोध परीक्षा, निबंध, हिंदी भाषा अशा अनेक स्पर्धांमध्येही त्याने यश मिळवले आहे.

‘माझ्या गरीब परिस्थितीची मला कधीच लाज वाटली नाही. ही परिस्थिती मी चांगला शिकलो, तरच बदलेल, याची मला जाणीव आहे. या जाणिवेतूनच मी जिद्दीने अभ्यास करतो. आतापर्यंत वर्गातील पहिला क्रमांक मी कधीच सोडला नाही. माझ्यातील ही अभ्यासाची जिद्द कायम आहे. या जिद्दीच्या जोरावरच मी यापुढेही शिकत राहीन. मला पुढे शिकून इंजिनीअर व्हायचे आहे. परंतु, आर्थिक परिस्थितीवर मात करणे हे माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या हातात नाही. त्यासाठी मला समाजाच्या मदतीची गरज आहे. कारण, आज मला गरज आहे. आज माझे हात घेणारे असतील. पण, उद्या नक्कीच माझे हात देणारे असतील,’ अशा शब्दांत महेशने भावना व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे : परिकथा सत्यात उतरावी

$
0
0

पुणे : अपघातात पायाला गंभीर इजेमुळे सुरक्षारक्षकाची नोकरी गमावलेले वडील, दृष्टीने अधू असलेली घरकाम करणारी आई... आठ बाय दहाचे भाड्याचे छोटे घर... अत्यंत तुटपुंजे उत्पन्न, अभ्यासासाठी फारशी अनुकूल नसलेली स्थिती... अशा वातावरणात साक्षी इनामदार हिने ९३.६० टक्के गुण मिळविले. दवाखान्यात बसलेल्या हतबल वडिलांना लहानपणापासून पाहिल्यामुळे त्यांच्यासारख्या अनेकांचा त्रास कमी करण्यासाठी साक्षीला डॉक्टर व्हायचेय. तिचे हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी गरज आहे, ती समाजाच्या दातृत्वाची!

साक्षी आणि तिचे कुटुंबीय कोथरूडमधील गुजरात कॉलनीत मोरे चाळीत राहतात. वडील रामदास हे काही महिन्यापूर्वीपर्यंत सुरक्षारक्षकाची नोकरी करीत होते. मात्र, पायाची जखम वाढल्याने फेब्रुवारीपासून त्यांची नोकरी थांबली आहे. घरखर्च भागविण्यासाठी आई एका आजी-आजोबांकडे घरकाम करते आहे. लहान बहीण संगीता सध्या महापालिकेच्या शाळेत सहावीत आहे. वडिलांची नोकरी गेल्यामुळे आईला मिळणारे अवघे दोन हजार रुपये घरात येतात. एवढ्याशा तुटपुंज्या उत्पन्नावर कुटुंबाचा खर्च भागविणे अशक्य होत असताना आता साक्षीला पुढे शिकविण्याचे आव्हान त्यांच्या कुटुंबापुढे आहे.

‘साक्षीचे यश कौतुकास्पद’

‘साक्षी ही अतिशय शांत मुलगी आहे. शाळेतदेखील ती कमीच बोलते. घरी प्रतिकूल परिस्थिती असताना सर्व संकटांवर मात करून साक्षीने मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. घरच्या परिस्थितीमुळे तिच्या शिक्षणाला, तिच्या स्वप्नांना कात्री लागू नये, असे आम्हा सगळ्यांना वाटते...’ अशी प्रतिक्रिया अहल्यादेवी शाळेतील तिच्या वर्गशिक्षिकांनी दिली.

साक्षीचे वडील मूळचे वाईचे, तर आई मध्य प्रदेशमधील. साक्षीची आई शुभांगी यांचे लग्नापूर्वीच डोळ्यांचे पडदे फाटले आणि दृष्टी अधू झाली. वडील रामदास यांचा तीस वर्षांपूर्वी एका टँकरने दिलेल्या धडकेत एक पाय कायमस्वरूपी अधू झाला होता. अपंगत्व हा समान धागा घेऊनच घरच्यांनी या दोघांचे लग्न लावून दिले. नोकरीसाठी हे कुटुंब गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ पुण्यातच राहते आहे. वड‌िलांनी आत्तापर्यंत सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केली; पण त्यांच्या पायाचे दुखणे सातत्याने डोके वर काढत असल्याने पगारातील मोठी रक्कम आत्तापर्यंत वैद्यकीय उपचारावरच खर्च करावी लागली. दहापेक्षा जास्त ऑपरेशन करूनही त्यांचा पाय अजूनही बरा झालेला नाही. आता दुखणे अधिक बळावले असून, त्यांना नोकरी करणेही अवघड झाले आहे. घरची एवढी बिकट परिस्थिती असतानाही साक्षीचे आई-वडील मुलींनी चांगले शिक्षण घेतले पाहिजे, या विचारावर ठाम आहेत. मात्र, शिक्षणासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून याची चिंता त्यांना दिवसरात्र सतावते आहे.

लहानपणापासूनच अभ्यासू असलेल्या साक्षीने पहिल्यापासूनच वर्गात चांगले गुण मिळवले आहेत. एरवी बुजरी पण मैत्रिणींमध्ये रमणारी, आई वडिलांना नेहमी समजून घेणारी साक्षी जिद्दी आहे. शिकण्याची संधी मिळाल्यास साक्षी मोठे नाव कमावेल, असा विश्वास तिच्या शिक्षिकांनी व्यक्त केला.

‘साक्षी आणि तिची बहीण दोघीही हुशार आहेत. आम्हाला शिकायला मिळाले नाही, मुलींना चांगले शिक्षण देण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. आर्थिक परिस्थितीने आम्हाला वेळोवेळी हतबल केले आहे. शाळेतील शिक्षक, शिकवणीचे सर, तिच्या मावशीमुळे आत्तापर्यंतचा शिक्षणाचा प्रवास तिने यशस्वी केला. आता आमची परीक्षा आहे. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे,’ असे सांगताना शुभांगी यांच्या डोळ्यात पाणी आले.

‘परिस्थितीने आम्ही हतबल आहोत. माझ्यावर उपचार करताना आलेल्या अडचणी पाहताना साक्षीला खूप वाईट वाटते. त्यामुळे ती मला नेहमी सांगते, मी मोठी झाल्यावर डॉक्टर होऊन सगळ्यांना मदत करणार आहे,’ अशा भावना रामदास इनामदार यांनी व्यक्त केल्या.

‘अनपेक्षित घडेल अन् स्वप्न पूर्ण होईल’

घराच्या सभोवताली सतत गोंधळ असल्याने साक्षीने कधी मावशीच्या घरी जाऊन, तर कधी शिकवणी संपल्यावर तिथेच बसून अभ्यास केला. दिवसा गोंधळ असायचा म्हणून ती पहाटे उठून अभ्यास करती होती. शाळेच्या पुस्तकांचा कंटाळा आला, की ती अवांतर पुस्तके वाचायची. ‘परिकथांमध्ये मला रमायला आवडते, या गोष्टी मला सकारात्मक विचार देतात,’ असे म्हणणाऱ्या साक्षीला तिच्या आयुष्यातही अशी काही अनपेक्षित घटना घडेल आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास वाटतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पीड पोस्ट सेवेवर ‘जीएसटी’चे मळभ

$
0
0

सुधारित दरांअभावी शहरात सेवा ठप्प

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जीएसटीचे कारण पुढे करून स्पीड पोस्ट सेवा बंद केल्याचा प्रकार सोमवारी शहरातील अनेक पोस्टाच्या कार्यालयांमध्ये घडला. जीएसटीनंतर सुधारीत दर अद्याप आलेले नाहीत, असे कारण देऊन स्पीड पोस्ट घेण्यास पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे, अनेकांची तारांबळ उडाली. पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र, सुधारीत दर लागू झाले असून, सेवा सुरळीत सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिले.
जीएसटी लागू झाल्याने पोस्टाच्या अनेक सेवांचे दर बदलले आहेत. त्यामध्ये स्पीड पोस्टचाही समावेश आहे. सोमवारी शहरातील नागरीक पोस्टाच्या कार्यालयात गेले असता सध्या ही सेवा बंद असून, आणखी दोन ते तीन दिवस बंदच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे अनेकांनी पोस्टाच्या यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली.
ग्रामीण भागामध्ये स्पीड पोस्टाच्या मदतीने कागदपत्रे तातडीने पाठवण्याची सोय होते. ग्रामीण भागामध्ये कुरिअर सेवा उपलब्ध नसल्याने स्पीड पोस्टचाच पर्याय उपलब्ध राहतो. अशा परिस्थितीत स्पीड पोस्टची सेवा बंद पडली तर, नागरिकांची मोठ्या प्रमाणावर अडचण होते. पोस्टाचे अधिकारी जरी ही सेवा सुरू असल्याचे सांगत असले तरी, कर्मचाऱ्यांनी पुढील दोन ते तीन दिवस स्पीड पोस्ट सेवा बंद ठेवली तर नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान कोणत्याही पोस्टाच्या कार्यालयात स्पीड पोस्टाची सेवा बंद केली नसल्याचे सहायक पोस्ट मास्तर जनरल एफ.बी. सय्यद यांनी स्पष्ट केले आहे. जीएसटी करासंबंधित सुधारित यंत्रणा सर्व कार्यालयांमध्ये अपडेट करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही सेवा बंद करण्यात आलेली नाही. जीएसटीची यंत्रणा सुरळीत व्हायला एक दोन दिवस लागतील. मात्र, त्यामुळे, सेवा बंद होणार नाहीत, असे सय्यद यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्वरीत सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमदार पावसामुळे धरणाठ्यात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाचे दमदार आगमन झाल्यामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, खडकवासला; तसेच वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये ५.९६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण २.२१ टीएमसी होते.

गेल्या आठवडाभरात धरण परिसरात पावसाने समाधानकारक सुरुवात झाल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. पानशेत धरण परिसरात आतापर्यंत सुमारे ५०६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे पानशेत धरणात ३.९४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण भागात आतापर्यंत सुमारे १७७ मिलिमीटर पाऊस झाल्याने ०.३७ टीएमसी पाणीसाठा आहे. टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या ठिकाणी पाणीसाठा करण्यात येत नाही. मात्र, सततच्या पावसामुळे पाणी साचले आहे. या परिसरामध्ये सुमारे ७९१ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणात ०.३८ टीएमसी पाणीसाठा आहे.
वरसगाव परिसरात सुमारे ५२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, धरणात १.२६ टीएमसी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा सुमारे ५.९६ टीएमसी झाला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. पिंपरी- चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात झालेल्या सुमारे ८९४ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा ३.१८ टीएमसीवर पोहोचला आहे. भामा आसखेड धरणात २.५२ टीएमसी, तर चासकमान धरणात १.९४ टीएमसी पाणीसाठा ​असल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

धरण आणि पाणीसाठा (टीएमसीत)

खडकवासला ०.३७
पानशेत ३.९४
पवना ३.१८
भामा आसखेड २.५२
चासकमान १.९४
माणिकडोह १.३६
डिंभे २.३५
मुळशी ४.३३
वरसगाव १.२६
टेमघर ०.३८
भाटघर ३.४२
वीर ०.७८
नीरा देवघर २.०६
कळमोडी १.३३
आंद्रा १.९९
उजनी ११.६० (उणे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटत्या व्याजदरांमुळे ‘यंग सीनियर’ चिंतेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) आणि नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (एनएससी) आदी अल्पबचत योजनांवरील व्याजदरात नुकतीच कपात केली आहे. त्यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची अडचण झाली आहे.
जुलै ते सप्टेंबर या तिमाहीकरिता जारी करण्यात आलेले व्याजदर छोट्या गुंतवणूकदारांना निराश करणारे आहेत. बदललेल्या व्याजदरांनुसार आता पीपीएफ व एनएससीवर ७.९ टक्क्यांऐवजी ७.८ टक्के व्याज मिळेल. किसान विकास पत्र अर्थात केव्हीपीवर ७.६ टक्क्यांऐवजी ७.५ टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिक बचत योजना व सुकन्या समृद्धी योजना यांचेही व्याजदर खाली आले आहेत. या दोन्ही योजनांवर अनुक्रमे ८.४ टक्क्यांऐवजी ८.३ टक्के व्याज मिळणार आहे. या सर्व योजनांचे व्याजदर १० वर्षीय सरकारी रोख्यांतून मिळणाऱ्या उत्पन्नाशी निगडित करण्यात आले आहेत. यापूर्वी सरकारने मार्च महिन्यात या सर्व योजनांचे व्याजदर ०.१० टक्क्यांनी कमी केले होते.
केवळ करातून वजावट मिळते म्हणून या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर त्याचा परिणाम झालेला नाही. मात्र, सुरक्षित पर्याय आणि सरकारी गुंतवणूक म्हणून अनेक जण यात गुंतवणूक करतात. त्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे.
पुण्यामध्ये अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या योजनेत असंघटित कामगार, मजूर, शेतकरी, विद्यार्थी आदींचा समावेश आहे. शेअर बाजारात किंवा अन्य पर्यायात गुंतवणूक करू न शकणाऱ्या घटकांनाही सुरक्षित गुंतवणूक म्हणून हा पर्याय आपलासा वाटतो. मात्र, आता त्यावरील व्याजदर कमी केल्याने या वर्गाची अडचण होणार आहे. काही जण तर या व्याजावरच अवलंबून आहेत, असे गुंतवणूक सल्लागार योगेश जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठलाच्या कृपेमुळे अपघातातून वाचलो

$
0
0

पंढरपूर : ‘विठ्ठलाच्या कृपेमुळे निलंग्यातील हेलिकॉप्टर अपघातातून वाचलो,’ अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते पंढरपुरात बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘निलंग्यात हेलिकॉप्टर अपघात झाला. या अपघाताच्या आदल्या दिवशी मी एका गावात कीर्तनाला गेलो. तिथल्या कीर्तनकारांनी मला विठ्ठल-रखुमाईची मूर्ती मला भेट दिली होती. दुसऱ्या दिवशी ती मूर्ती घेऊन मी प्रवासाला निघालो होतो. पण, त्यादिवशी हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यात हेलिकॉप्टरमधील सर्व साहित्याचे नुकसान झाले. पण, विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला थोडाही धक्का लागला नव्हता.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images