Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आंतरराज्य टोळी गजांआड

$
0
0

तळेगाव पोलिसांची कामगिरी; गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे-वर थांबलेल्या मोटारचालकाला लुटून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या टोळीला तळेगाव पोलिसांनी गजांआड केले आहे. अटक झालेल्यांमध्ये राज्याच्या विविध भागांसह नवी दिल्ली परिसरातील आंतरराज्य टोळीतील गुन्हेगारांचा समावेश आहे.
अटक केलेले सर्व जण नगर जिल्ह्यातील नेवासा येथील आहेत. त्यामध्ये अविनाश अरुण खंडागळे (वय २२) , कैलास लक्ष्मण चांदणे (वय २३ ) संतोष सुंदर घुणे (वय २३ ) संदीप कचरू भालेराव (वय २७), सचिन रतन कांबळे (वय २०), बाळकृष्ण ज्ञानेश्वर मंडलीक (वय २५) आणि प्रदीप ज्ञानेश्वर मंडलिक (वय २२) यांचा समावेश असून, त्यांच्यावर खून, अपहरण, दरोडा, खंडणी आणि बलात्कार आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगूट पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलसिंग लोणावळ्याहून पुण्याकडे कारने येत असताना पहाटे दोनच्या सुमारास पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे-वर थांबले. ही संधी साधून पाच ते सात आरोपींनी कोयता आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून पाच हजार रुपये रोख आणि सोने असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा ऐवज लाटला. कमलसिंग उर्से टोलनाका येथे आले असता, त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र, मुलगी आजारी असल्यामुळे ते तडक दवाखान्यात गेले. त्यांनी केलेल्या वर्णनानुसार फौजदार ज्ञानेश्वर बाजीगरे यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. त्या वेळी आरोपी पळून जाण्याच्या तयारी असल्याचे त्यांना समजले. दरम्यान, एक आरोपी गाडीत बसू न शकल्याने नजीकच्या डोंगरात पळून गेल्याचे समजले. त्यामुळे पोलिस आरोपीचा माग काढून एका ठिकाणी लपून बसले. त्यानंतर मागे राहिलेल्या आरोपीला घेऊन जाण्यासाठी उर्वरित आरोपी परतले. आरोपींनी पोलिसांना पाहताच धूम ठोकली. त्या वेळी टोळीचा प्रमुख प्रदीप मंडलिक पळून जाताना पुलावरून उडी मारली. त्यात त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले.

मागील आठवड्यातही लुटले
गेल्या आठवड्यात एका कुटुंबाला याच आरोपींनी लुटले होते. आरोपींवर नवी दिल्ली, अहमदनगर, बुलडाणा, पुणे ग्रामीण येथे दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरोधात मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनोदी अभिनेत्याचे गंभीर काम दुर्लक्षितच

$
0
0

मकरंद अनासपुरे यांची खंत; चित्रपट महोत्सवाचे उद् घाटन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘तुम्ही गंभीर भूमिका कधी साकारणार, असे विनोदी नटांना नेहमी विचारले जाते. मात्र तुम्ही विनोदी काम कधी करणार, असे गंभीर भूमिका करणाऱ्यांना कधीही विचारले जात नाही. विनोदी नटाने गंभीर काम केलेच तर, ते गांभीर्याने घेतले जात नाही,’ असे टीकास्त्र प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी गुरुवारी सोडले.
ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या नव्वदीनिमित्त द.मा. मिरासदार प्रतिष्ठान, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लब यांच्यातर्फे आयोजित मराठी विनोदी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन अनासपुरे यांच्या हस्ते झाले. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, उद्योजक कृष्णकुमार गोयल, मिरासदार यांच्या कन्या सुनेत्रा मंकणी, जावई आणि अभिनेते रवींद्र मंकणी, संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, आशयचे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार आदी या वेळी उपस्थित होते.
‘विनोद हे औषध आहे. विनोद अवघड आहे म्हणून हसण्याचे क्लब स्थापन झाले आहेत. रडण्याचे क्लब नाहीत,’ याकडे लक्ष वेधून अनासपुरे म्हणाले, की विनोदी कलावंत हसवून समाजसेवा करतात. दुसऱ्याचे कारुण्य समजणाराच उत्तम विनोद करू शकतो. विनोद करताना कुणाला त्रास होऊ नये तसे,च कोणी दुखावणार नाही, याची काळजी घेतली जाते. ‘विनोद हे भाष्य आहे. कलाकार तीव्रपणे विनोदातून काही सांगत असतो. पूर्वी दादा कोंडकेंच्या द्विअर्थी विनोदाचेही समाजाला वावडे नव्हते. सभ्य लोकही त्या विनोदाचा आनंद घेत असत. पण, मधील काळात पोरकट विनोदी चित्रपट निर्माण झाले. त्यामुळे प्रेक्षक दूर गेला,’ यावर कुलकर्णी यांनी बोट ठेवले. मराठी चित्रपट म्हणजे मारुतीच्या बेंबीत बोट घालून गार वाटून घेण्यासारखे आहे, कारण पैसाच मिळत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनाच्या आधी ’ब्रह्मचारी’ तर उत्तरार्धात ‘काय द्याच बोला’ हे चित्रपट दाखविण्यात आले.

पुणेरी किश्शातून पुणेकरांची फिरकी
चित्रपट संग्रहालयात आलेल्या चोखंदळ चित्रपट रसिकांसमोर मकरंद अनासपुरे यांनी पुणेरीपणाचा किस्सा सांगून पुणेकरांचीच फिरकी घेतली. ‘आशय’र्फे ‘सातच्या आत घरात’ हा चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटात माझ्या वडिलांची भूमिका निळू फुलेंनी केली आहे. चित्रपट संपल्यानंतर एका पुणेरी चित्रपट रसिकाने दिग्दर्शक संजय सूरकर यांना हटकले की, मुलगा मराठवाडी भाषा बोलतो आणि त्याचे वडील मात्र पश्चिम महाराष्ट्रातील भाषा बोलतात. हे तुम्ही जाणीवपूर्वक केले आहे का, या पुणेरी सवालाने सूरकर भांबावून गेले. तेव्हापासून मी आशय आणि येथील रसिकांचा धसका घेतला आहे,’ असे अनासपुरे यांनी सांगताच टाळ्यांची बरसात झाली. ‘चंद्रकांत कुलकर्णी यांनी काय द्याच बोला चित्रपटातून मला हिरो केले. आता मी खातापित्या घरचा वाटतो. तेव्हा मी केवळ ‘पित्या’ घरचा वाटायचो,’ अशी कोटी अनासपुरे यांनी आपल्या शैलीत करून धमाल उडवून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदव्युत्तरसाठी पदवीचे शिक्षक

$
0
0

राज्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस; विद्यार्थ्यांचा खेळखंडोबा

Harsh.Dudhe@timesgroup.com
tweet : @HarshDudheMT

पुणे : राज्यातील कॉलेजांमध्ये ‘बॅचलर ऑफ फाइन आर्टस्’ (बीएफए) इन स्कल्प्चर तसेच पेटिंग अभ्यासक्रम आणि एमएफए अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषेदच्या (एआयसीटीई) मान्यतेशिवाय सुरू आहेत. त्यातच आता राज्यात ‘एमएफए’ हा अभ्यासयक्रम ‘बीएफए’ पदवीधारक शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार उाडकीस आला आहे.
‘एआयसीटीई’च्या नियमानुसार ‘एमएफए’सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे अध्यापन करण्यासाठी ‘एमएफए’ आणि ‘पीएचडी’ झालेल्या प्राध्यापकांची आवश्यकता आहे. ‘एआयसीटीई’च्या अखत्यारित येणाऱ्या ‘अप्लाइड आर्टस् आणि क्राफ्ट’ या विद्याशाखेत ‘बीएफए इन स्कल्प्चर’ तसेच पेटिंग अभ्यासक्रमाचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे एमएफए इन अॅडव्हर्टाइजमेंट अँड पब्लिक रिलेशन, अप्लाइड आर्टस सीरॅमिक डिझाइन, फाइन आर्टस्, फॅशन टेक्नॉलॉजी, टेक्स्टाइल डिझाइन, स्कल्प्चर, पेटिंग आदी विषयांचा समावेश आहे. ‘एआयसीटीई’ने या दोन्ही अभ्यासक्रमांना शिकविणाऱ्या प्राध्यापकांची अर्हता निश्चित केली आहे. त्यानुसार ‘बीएफए’ला शिकविण्यासाठी ‘एमएफए’ पदवीधारक सहायक प्राध्यापकाची आवश्यकता आहे. ‘एमएफए’ अभ्यासक्रम शिकवायला ‘एमएफए’ आणि ‘पीएचडी’धारक व्यक्ती लागते.
मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, शासकीय चित्रकला कॉलेज (नागपूर आणि औरंगाबाद) या सरकारी कॉलेजांबरोबरच खासगी कॉलेजांमध्ये ‘एमएफए’ला शिकविण्यासाठी ‘बीएफए’ झालेले सहायक प्राध्यापक आहेत. बीएफए अभ्यासक्रमाला शिकविण्यासाठी समकक्ष बीएफए झालेले सहायक प्राध्यापक आहेत. अशी भीषण परिस्थिती असतानाच अनेक कॉलेजांमध्ये एमएफए आणि पीएचडी झालेल्या सहयोगी प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याचेही समोर आले आहे. राज्यातील अनेक कॉलेजांमधील प्राचार्यही पीएचडीधारक नसल्याचे तसेच प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे ‘एआयसीटीई’च्या आकडेवारीवरून समोर आले आहे. या सर्व प्रकारामुळे राज्यात कलाशिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. या प्रकरणी राज्याचा उच्चशिक्षण विभाग आणि ‘एआयसीटी’ पुरेसे गांभीर्य दाखवत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास यांनी सांगितले.

कला शाखेत शिकविण्यासाठी प्राध्यापकांच्या अनुभवाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. कला शाखेत पीएचडी करण्याची सुविधा मुंबई विद्यापीठात अजूनही उपलब्ध नाही. राज्यात बोटावर मोजण्याइतक्या विद्यापीठांमध्येच ही सुविधा आहे. त्यातच मान्यताप्राप्त एमएफए करण्याची सुविधाही फारच कमी कॉलेजांमध्ये आहे. त्यामुळे एमएफए आणि पीएचडी पदवीप्राप्त प्राध्यापक तुरळक संख्येने आढळतात.
- प्रा. विश्वनाथ साबळे, अधिष्ठाता, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दगडूशेठ गणेशोत्सव स्पर्धेचे पुरस्कार जाहीर

$
0
0

येत्या मंगळवारी महापौरांच्या हस्ते वितरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत ‘जय गणेश भूषण पुरस्कार’ कॅम्पमधील हिंद तरुण मंडळाला जाहीर झाला. धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांक, नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने द्वितीय, डेक्कन येथील आझाद हिंद मित्र मंडळाने तृतीय, बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने चौथे तर कोथरूड शास्त्रीनगर येथील संगम मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
‘वर्षभरातील मंडळांचे सामाजिक काम, स्पर्धेची चाळीस कलमी आचारसंहिता आणि सजावट या निकषांच्या आधारे पुरस्कार देण्यात येतात. स्पर्धेत सहभागी झालेल्या २३९ मंडळांपैकी १३९ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून, १७ लाख १४ हजार रुपयांची बक्षिसे मंडळांना देण्यात येणार आहेत,’ अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. महेश सूर्यवंशी, माणिकराव चव्हाण, सुनील रासने, कुमार वांबुरे, मंगेश सूर्यवंशी, यतीश रासने, अक्षय गोडसे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. ‘पुरस्कारांचे वितरण येत्या २७ जूनला महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे. ट्रस्टचे यंदा १२५ वे वर्ष असून, त्यानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत,’ अशी मा​हिती गोडसे यांनी दिली. पराग ठाकूर, विजय चव्हाण, राजेंद्र बवरे, अनिल घाणेकर, एकनाथ बुरसे, सुरेश वरगंटीवार, मोहन शेटे, चिंतामणी काळे, ओंकार वाघ, कमलेश खिंवसरा, वृषभ अंबिके, ॠषिकेश धनवडे, दीपक राणे यांनी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.

यांचाही होणार सन्मान
मध्य विभागातून प्रथम पारितोषिक साखळीपीर तालीम तरुण मंडळाने पटकावले आहे. मध्य दक्षिण विभागातून प्रथम पारितोषिक अकरा मारुती चौक मित्र मंडळ, पूर्व विभागातून श्रीकृष्ण तरुण मंडळ, पश्चिम विभागातून सुयोग मित्र मंडळ, दक्षिण विभागातून अष्टविनायक मित्र मंडळ, उत्तर विभागातून अष्टविनायक मित्र मंडळ यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. श्री गणेशोत्सव विशेष पारितोषिक अरणेश्वर मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट यांना देण्यात येणार आहे. बाल गणेशोत्सव मंडळात अथर्व मित्र मंडळाला प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या भरत मित्र मंडळ, मेहुणपुरा शनिवार पेठ मित्र मंडळ, आझाद हिंद मित्र मंडळ, अलंकार मित्र मंडळ, नवरंग मित्र मंडळ यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यक्षमतेवर देणार ग्रामपंचायतींना निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गतवर्षी उत्पन्नात वाढ करणाऱ्या जिल्ह्यातील १,४०१ ग्रामपंचायतींना यंदा कार्यक्षमतेच्या निकषावरच अतिरिक्त निधी मिळणार आहे. त्यामुळे सहा ग्रामपंचायती निधी मिळण्यासाठी अपात्र ठरल्या आहेत. यंदा केंद्राकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी १७.३० कोटी रुपयांचा परफॉर्मन्स निधी मंजूर झाला आहे.
चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगातील हा निधी मिळविण्यासाठी ग्रामपंचायतींना लेखे ठेवणे तसेच, लेखापरीक्षण करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न व खर्च आदी माहितीमध्ये स्पष्टता असावी. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्न वाढलेले असावे आदी अटींचा अंतर्भाव त्यामध्ये करण्यात आला आहे. केंद्रांकडून देण्यात येणारा निधी योजनांसह कार्यक्रमांवर खर्च करण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टांव्यतिरिक्त अन्य बाबींवर निधी खर्च केल्यास ती रक्कम संबंधित पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांक़डून वसूल कऱण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना परफॉर्मन्स निधीचे वाटप लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारे केले जाणार आहे. लेखापरीक्षणासाठी ८० गुण तसेच ग्रामपंचायतींनी उत्पन्न वाढविल्यास २० गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये ज्या ग्रामपंचायतींना १०० पैकी ८५ गुण मिळतील त्यांनाच निधी उपलब्ध होणार आहे.
ज्या ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण सदोष असेल त्यांचा निधी अन्य ग्रामपंचायतींना वर्ग कऱण्यात येईल.

जिल्ह्यातील १४०१ ग्रामपंचायतींना लवकरच निधी वितरित केला जाणार आहे. केवळ सहा ग्रामपंचायत यासाठी अपात्र ठरल्या आहेत. या निधीचा खर्च इतर कामांसाठी खर्च करता येणार नाही.
संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच हजार प्रकरणे फॅमिली कोर्टात पडून

$
0
0

घटस्फोटाच्या दाव्यांची संख्या अधिक; पक्षकारांच्या अडचणीत भर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाद न मिटल्यामुळे अनेकदा वैवाहिक जीवन घटस्फोटाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचते. कौटुंबिक स्वरुपाची अनेक प्रकरणे निकाली काढण्यासाठी फॅमिली कोर्टापर्यंत जाऊन पोहोचतात. अशा प्रकारची सुमारे पाचहजार प्रकरणे पुण्यातील फॅ​मिली कोर्टात प्रलंबित आहेत.
फॅमिली कोर्टात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये घटस्फोटासाठी दाखल प्रकरणांचे प्रमाण अधिक आहे. पतीकडून पोटगी मिळावी, मुलांचा ताबा मिळावा, परस्परसंमतीने घटस्फोट आदी प्रकरणे फॅमिली कोर्टाच्या अंतर्गत येतात. भारती विद्यापीठ भवन येथील सातव्या आणि नवव्या मजल्यावर फॅमिली कोर्ट कार्यरत आहे. डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत फॅमिली कोर्टात ४,९२५ प्रकरणे प्रलंबित होती. त्यातील ४,०१५ प्रकरणे २०१६ मध्ये दाखल झाली आहेत. त्यातील ३,९२३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत असल्याने पक्षकारांना न्याय मिळण्यात विलंब होत आहे.
‘फॅमिली कोर्टात सध्या दररोज १५ ते २० नवी प्रकरणे दाखल होतात. त्यातील किमान पाच प्रकरणे परस्परसंमतीने घटस्फोट मिळण्याची असतात. अन्य प्रकरणांमध्ये घटस्फोटाचे दावे, पोटगीचे दावे आदींचा समावेश असतो,’ अशी माहिती अॅड. आनंद शाळगावकर यांनी दिली. कौटुंबिक स्वरुपाचे वाद कोर्टात पोहचल्यानंतर एकमेकांवर करण्यात येणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये वेळ जातो. कोर्टाकडून संबंधितांना लवकर न्याय मिळावा असा प्रयत्न केला जात असला तरी, काही प्रकरणांमधील तांत्रिक मुद्दे असतात सिद्ध करावे लागतात. पतीकडून पोटगी मिळावी म्हणून दाखल करण्यात येणाऱ्या प्रकरणांमध्ये पगाराचा तपशील द्यावा लागतो. मात्रण् हे सिद्ध करताना अडचणी येतात. अशा कारणांमुळे सुनावणी लांबते, असेही अॅड. शाळगावकर यांनी नमूद केले.

प्रलंबित प्रकरणे
वर्ष दाखल निकाली प्रलंबित
२०१० ५,१५४ ४,७६४ ५,३४९
२०११ ४,०९४ ४,१७५ ५,२६८
२०१२ ४,३०६ ५,१०१ ४,४७३
२०१३ ४,२७२ ४,०७१ ४,६७४
२०१४ ४,२३४ ४,३४९ ४,५५९
२०१५ ४,०६७ ३,७९३ ४,८३३
२०१६ ४,०१५ ३,९२३ ४,९२५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भामा-आसखेड’ला अखेर निधी मिळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या पूर्व भागातील असमान पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या ‘भामा-आसखेड योजने’ला आता राज्य सरकारने निधीची संजीवनी दिली आहे. केंद्राकडून अपेक्षित असलेल्या निधीपैकी ८० टक्के रक्कम राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या वाढीव खर्चाचा महापालिकेवर पडणारा बोजा कमी होण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून (जेएनएनयूआरएम) भामा-आसखेड आणि वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. मार्च २०१७ पर्यंत प्रकल्प पूर्ण झाल्यास निधी देण्यात येईल, अशी अट केंद्राने घातली होती. पालिकेचा वडगाव प्रकल्प पूर्ण झाला, तरी शेतकरी आणि स्थानिक खासदार/आमदारांच्या विरोधामुळे भामा-आसखेड प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी, केंद्र-राज्याकडून अपेक्षित असलेल्या सुमारे शंभर कोटी रुपयांचा भुर्दंड पालिकेलाच सहन करावा लागण्याची शक्यता होती.
राज्य मंत्रिमंडळाने ‘जेएनएनयूआरएम’मधील अपूर्ण प्रकल्पांसाठी अनुदान स्वरूपात निधी देण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. त्यामुळे या प्रकल्पासमोरील निधीची अडचण आता दूर होणार आहे. भामा-आसखेडचा संपूर्ण प्रकल्प ३८० कोटी रुपयांचा आहे. यापैकी २५६ कोटी रुपये केंद्र-राज्याच्या निधीतून मिळणे अपेक्षित होते. मार्च अखेरपर्यंत त्यापैकी १७२ कोटी रुपये पालिकेला प्राप्त झाले आहेत. भामा-आसखेड प्रकल्पाचा केंद्राकडून मिळणारा ७० कोटी रुपयांचा अखेरचा हप्ता येण्याची शक्यता नसल्याने आता राज्याकडून या प्रकल्पाच्या उर्वरित खर्चासाठी अनुदान मिळणार आहे. केंद्र सरकारकडून देय असलेल्या एकूण निधीपैकी ८० टक्के वाटा राज्य सरकार उचलणार असून, बाकीची रक्कम महापालिकेला खर्च करावी लागणार आहे. भामा-आसखेडचा उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पालिकेला अतिरिक्त शंभर कोटी रुपये खर्च करावे लागले असते. आता, राज्याने काही प्रमाणात खर्चाची जबाबदारी उचलल्याने पालिकेवरील बोजा कमी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीबीटी’चा आदेश बदलण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत वस्तूऐवजी लाभाचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट बँकेत (डीबीटी) जमा कऱण्याचे आदेश आहेत. मात्र, आदेशाची अंमलबजावणी करताना कृषी, समाज कल्याण, महिला, बालकल्याण आणि पशुसंवर्धन आदी विभागांना अडचणी येत असल्याने तरतुदीत बदल करण्याची मागणी जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे केली आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध योजना आहेत. त्याद्वारे पिठाची गिरणी, शिलाई मशिन, स्टॉल, केश कर्तनालयातील खुर्ची, पिको फॉल मशिन, सायकल, सौरउर्जा कुकर, अपंगांसाठी तीनचाकी सायकल, श्रवणयंत्र, बियाणे, लहू हत्यारे, कृषी पंप, वीजपंप, पीक संरक्षण उपकरण, ताडपत्री आदी वस्तूंचे वाटप केले जाते.
गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील वस्तूखरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून येत आहे. कमी किमतीत मिळणाऱ्या वस्तू अधिक दराने विकत घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारने वस्तू खरेदी करण्याऐवजी वस्तूची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लाभार्थ्यांनी वस्तू घेतल्यानंतर त्याचे बिल संबंधित विभागाकडे सादर होते. त्या बिलाच्या आधारे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा केले जाणार आहे. अनेक योजनांमध्ये लाभार्थ्यांना पाच ते दहा हजार रुपयांच्या वस्तू दिल्या जातात.

‘डीबीटी’त स्पष्टता हवी
राज्य सरकारी अध्यादेशात स्पष्टता नसल्याने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण, कृषी व पशुसंवर्धन विभागांना वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजना राबविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे डीबीटीच्या नियमांसंदर्भात तपशीलवार माहिती द्यावी अशी मागणी या विभागांनी केली आहे. स्पष्टता नसल्याने लाभार्थी संभ्रमात आहेत. डीबीटीबाबत जिल्हा परिषदेचा प्रत्येक विभाग वेगवेगळे निकर्ष लावत आहे. परिणामी योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...तर गणेशोत्सव थांबवावा लागेल

$
0
0

अशोक गोडसे यांची भावना; मंडळांना नोटिसा बजावल्याने नाराजी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘गणेशोत्सवाच्या आधी मंडळांना नोटिसा पाठवणे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचा विषय नित्याचाच झाला आहे. गणेशोत्सव गेली १२५ वर्षे साजरा होत आहे. उत्सव, मंडळे आणि कार्यकर्ते कायद्याच्या विरोधात नाहीत. आम्हालाही कायद्याच्या चौकटीत राहूनच उत्सव साजरा करायचा आहे; पण सरकारला हा उत्सव बंद करायचा आहे का,’ असा सवाल करून ‘नागरिकांना त्रास होत असेल तर, उत्सव थांबविण्याचा विचार करावा लागेल,’ अशी उद्विग्न भावना श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण केल्याचे आढळल्यामुळे कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम मंडळ, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या पहिल्या पाच गणेश मंडळांसह दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, जिलब्या मारुती, राजाराम मंडळ यांसह ३५ मंडळांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या पाहणीत गणपती मंडळांसमोरील वाद्यांचा आवाज ९० ते १०५ डेसिबलपर्यंत गेल्याचे समोर आले होते. ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) २००० च्या कायद्यानुसार शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेसिबल, तर रात्री ४० डेसिबल, रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल, तर रात्री ४५ डेसिबल आवाजाचे बंधन आहे. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर गोडसे यांनी मंडळांची भूमिका मांडली.
‘कायद्याने आवाजाची मर्यादा आखून दिली आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच उत्सव साजरा करायचा आहे. डेसिबलवरून दर वर्षी अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रत्येकवेळी नोटिसा बजावणे तसेच गुन्हे दाखल करणे योग्य नाही. सरकारला हा उत्सव बंद करायचा आहे का, नागरिकांना त्रास होत असेल तर उत्सव बंद करण्याचा विचार करावा लागेल,’ अशी खंत गोडसे यांनी व्यक्त केली. ‘सरकार आणि यंत्रणांचीही जबाबदारी आहे. सर्वांनी मिळून काम केल्यास प्रश्न निर्माण होणार नाहीत. सर्वांनी संवाद साधल्यास तोडगा काढता येऊ शकतो. गणेशोत्सवातील कार्यकर्ते प्रसंगी अपमान सहन करून निरपेक्ष भावनेने काम करतात, हे लक्षात घेतले पाहिजे,’ याकडेही गोडसे यांनी लक्ष वेधले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष (१२५ वे) आहे. ट्रस्टतर्फे पालखी मार्ग, राज्य आणि राष्ट्रीय मार्ग यांवर पुढील पाच वर्षांत पन्नास लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या मोहिमेला आज, शुक्रवारी वेल्हे येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत सुरुवात होणार आहे. विविध संस्था आणि कंपनी यांबरोबर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात झाडांची जबाबदारी ग्रामस्थांवर सोपविण्यात येणार आहे. आतापर्यंत विविध ठिकाणी लागवड केलेल्या झाडांची स्थिती उत्तम असून, वृक्षारोपण केले आणि दुर्लक्ष केले असे होत नाही.
- महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निशमन यंत्रणेचा अभाव

$
0
0

मोजक्याच बसमध्ये उपलब्ध; आलटून-पालटून वापरण्यावर भर

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
Tweet : @kuldeepjadhavMT

पुणे : प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. चालत्या बसमध्ये प्रवासी असतानाही वाहनाने पेट घेतल्याच्या घटना गेल्या वर्षी घडल्या आहेत. मात्र, त्यातूनही पुणे महानगर परिवहन महामंडळाने धडा घेतलेला नाही. मंडळाच्या मोजक्याच बसमध्ये यंत्रणेचा अंतर्भाव करण्यात आल्याचे दिसून आले आहे. ‘आरटीओ’कडे नोंदणी करताना मोजक्याच बसमध्ये अग्निशमन यंत्रे बसवून तीच सर्वत्र आलटून पालटून वापरली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पीएमपीची दुरवस्था, आर्थिक तोटा या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या बसची ‘आरटीओ’कडे नोंदणी करताना सवलत देण्यात आली होती. बसच्या खिडकीला काचा नाहीत, सीट तुटलेले आहेत, अग्निशमन यंत्र-सिलेंडर नाही, अशा बाबींकडे काणा डोळा करण्यात येत होता. मात्र, आता नोंदणीसाठी येणाऱ्या प्रत्येक बसमध्ये आवश्यक बाबींची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरच बसला प्रमाणपत्र दिले जाईल, अशी भूमिका ‘आरटीओ’ने घेतली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी पीएमपीच्या संचालक मंडळावरही आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रवासी वाहनांमध्ये अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, अॅलर्ट बटन बसविणे बंधनकारक केले आहे. पीएमपी प्रशासनाकडील काही प्रमाणातच अग्निशमन यंत्रणा उपलब्ध आहे. मात्र, ती डेपोंमध्येच ठेवण्यात मध्येच ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. रात्रीच्या वेळी बस पार्किंगसाठी सुरक्षित जागा नसल्याने त्या रस्त्यावरच उभ्या करण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे डिझेलपासून बसच्या सुट्ट्या भागापर्यंत अनेक बाबींची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा बसमध्ये ठेवण्याचा धोका पत्करण्यास पीएमपी प्रशासन तयार नाही. दरम्यान, पीएमपीतील पासिंग विभागाने भांडार विभागाकडे आठशे अग्निशमन यंत्रणा खरेदी करण्याची मागणी नुकतीच केली आहे. मात्र, खरेदीचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने आणि कायद्यानुसार आवश्यक असल्याने अग्निशमन यंत्रणा खरेदीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यंत्रांची माहितीच उपलब्ध नाही
पीएमपीमध्ये बसचा पासिंगचा स्वतंत्र विभाग आहे. पूर्वी या विभागाची जबाबदारी मुख्य अभियंत्याकडे होती. मात्र, अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी या विभागाचे महत्त्व ओळखून स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. पीएमपीच्या ताफ्यात बससाठी एकूण किती अग्निशमन यंत्रे उपलब्ध आहेत, याची माहिती पासिंग विभागाकडे उपलब्ध नाही. ही यंत्रे डेपोनिहाय विभागून देण्यात आली आहेत, असे स्पष्टीकरण येथील अधिकाऱ्यांनी दिले.

स्वयंचलित यंत्रणा बसविणार
पीएमपीच्या ताफ्यात दोन्ही महापालिकांच्या माध्यमातून नव्याने दोनशे बस दाखल होणार आहे. या बसची खरेदी करतानाच त्यामध्ये स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असणार आहे. अग्निसूचक ‘सेन्सर’द्वारे अग्निशमन यंत्रणेला आगीची माहिती मिळून ती आटोक्यात आणण्यासाठीची प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने होणार आहे.

दरमहा नोंदणी केलेल्या बस
महिना संख्या
जानेवारी ९१
फेब्रुवारी ९५
मार्च ९०
एप्रिल ६८
मे १२२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महावितरण’कडून ५० कोटींचा परतावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे परिमंडळातील २६ लाख लघुदाब वीजग्राहकांना नियमानुसार ५० कोटी रुपयांचा परतावा देण्यात येणार आहे. गेल्या एप्रिलपासून ते जून महिन्यातील वीजबिलांमध्ये या रकमा वळत्या होणार आहेत.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. या ठेवीवर कालावधीनुसार बँकेच्या बेस रेटने व्याज देण्यात येते. त्यानुसार पुणे परिमंडळातील पुणे व पिंपरी-चिंचवड शहर, तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील लघुदाब वर्गवारीमधील घरगुती २१ लाख ६५ हजार वीजग्राहकांना ३२ कोटी रुपये, व्यावसायिक दोन ६१ हजार ग्राहकांना नऊ कोटी रुपये, औद्योगिक ३७ हजार ४६१ ग्राहकांना पाच कोटी रुपये, कृषीपंपधारक एक लाख ग्राहकांना अडीच कोटी रुपये आणि इतर १८ हजार ग्राहकांना एक कोटी रुपयांचा परतावा देण्यात येणार आहे.

यंदा पुणे परिमंडलात सुमारे पाच लाख ग्राहकांना ७२ कोटी रुपयांची अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी एप्रिल आणि मे महिन्याच्या वीज बिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिले देण्यात आली. ग्राहकांनी सुमारे आठ कोटी रुपयांचा भरणा केलेला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी बिलाएवढी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करावी लागते. ग्राहकांनी मूळ सुरक्षा ठेव पूर्वी जमा केली असली, तरी वीज दरवाढ आणि वीजवापर वाढल्याने मासिक बिलांच्या सरासरीतही वाढ झाली आहे. त्यामुळे मूळ सुरक्षा ठेव आणि गेल्या आर्थिक वर्षातील एका महिन्याचे सरासरी वीजबिल यातील फरकाच्या रकमेचे बिल अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून देण्यात येते. अद्यापही अतिरिक्त सुरक्षा ठेव भरलेली नाही, त्यांनी ही रक्कम भरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सुटीच्या दिवशी भरणा

थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र आजपासून (शनिवार) ते सोमवारपर्यंत (२६ जून) सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू असून वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहर, तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. त्यासह www.mahadiscom.in ही वेबसाइट, तसेच मोबाइल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाइन’ बिल भरता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पती व्हॉटसअॅपवर असतो, पत्नीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पती सारखा व्हॉट्सअॅपवर बोलतो, असे घरातील फळ्यावर लिहून औंध लष्कर परिसरात एका जवानाच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. संबंधित विवाहितेने १९ जूनला औंध येथील मिलिटरी क्वार्टर्समध्ये राहत्या घरी गळफास घेतला होता. उपचारांदरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.

स्वाती अमोल जगदाळे (वय २७, रा. औंध मिलिटरी क्वार्टर्स) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती जगदाळे यांनी सोमवारी गळफास घेतला होता. तेव्हा त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. आत्महत्येपूर्वी स्वाती यांनी घरातील फळ्यावर (व्हाइट बोर्ड) ‘पती दारू पितो, तसेच तो सारखा व्हॉट्सअॅपवर बोलत असतो,’ अशा आशयाचा मजकूर लिहिला होता.

मात्र, याप्रकरणी अद्याप कोणीही तक्रार दिलेली नाही. त्यामुळे सांगवी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित दाम्पत्य हे मूळचे पुरंदर तालुक्यातील आहे. नोकरीनिमित्त ते सध्या औंध येथे राहत आहे. स्वाती यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तीनच दिवसांपूर्वी सांगवी परिसरात एका जवानाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेडिकल’चा कट ऑफ वाढणार

$
0
0

‘नीट’मध्ये पुण्यातील उत्तीर्णांचे प्रमाण दीडपट वाढले

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशात आणि राज्यातील वैद्यकीय कॉलेजांमध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालानुसार राज्यातील शासकीय मेडिकल कॉलेजांमध्ये एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला सुमारे ४५० गुण लागण्याची शक्यता आहे. तर, बीडीएस प्रवेशासाठी ४००च्या आसपास गुण लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. दरम्यान, पुणे शहरातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात दीड पटींनी वाढ झाली असल्याने प्रवेशासाठी लागणाऱ्या गुणांचा कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) नीटच्या परीक्षेसाठी देशातील ११ लाख ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १० लाख ९० हजार ८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६ लाख ११ हजार ५३९ विद्यार्थी देशातील शासकीय आणि खासगी कॉलेजांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच आदी पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्र झाले आहे. राज्यातून सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर, पुणे जिल्ह्यातून साधारण ५० ते ७० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या वर्षी ‘स्टेट मेरिट लिस्ट’मध्ये एमबीबीएस प्रवेशासासाठी दोन हजार ९३, तर बीडीएस प्रवेशासाठी दोन हजार ५०० अंतिम क्रमांक होता.

‘देशात आतापर्यंत २०१३, २०१६ आणि २०१७ या तीन वर्षी नीटची परीक्षा झाली. त्यामध्ये २०१३ आणि २०१६ या दोन्ही वर्षी पुण्यातील साधारण दीडशे विद्यार्थ्यांना ७२० गुणांपैकी ३६० पेक्षा अधिक गुण मिळाले होते. मात्र, यंदाच्या निकालात पुण्यातून सुमारे ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ३६० पेक्षा अधिक गुण मि‍ळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी नीटची परीक्षा ऐनवेळी झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. मात्र, यंदा वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर एकच परीक्षा होणार असल्याचे काही महिन्यांपूर्वी सीबीएसईतर्फे जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर झाला असून प्रवेशासाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. साधरण, ४२५ पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्यातील सरकारी कॉलेजांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. तर, बीडीएस प्रवेशासाठी ४००च्या आसपास गुण लागण्याची शक्यता आहे,’ असे असल्याचे आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले.

‘यंदाच्या नीटच्या एकूण निकालात वाढ झाली आहे. त्यामुळे एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाला प्रवेशाचा कट ऑफ थोडा वाढण्याची शक्यता वाढण्याची शक्यता आहे. प्रवेशाचे चित्र ‘स्टेट मेरिट लिस्ट’ जाहीर झाल्यानंतर होईल. पुणे शहरातून साधारण चारशे विद्यार्थ्यांना ३६० पेक्षा अधिक गुण मिळाल्याची शक्यता आहे. परीक्षेत ४५० पेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. आमच्या क्लासेसमधून ४० विद्यार्थ्यांना ४५० पेक्षा अधिक गुण मिळाले,’ अशी माहिती देवधर क्लासेसचे संचालक सुनील देवधर यांनी दिली. दरम्यान, राज्यात बीडीएस प्रवेशासाठी सुमारे पाच हजार, तर एमबीबीएससाठी सहा हजार ८८० जागा आहेत.

एमबीबीएससाठी ४५० गुण आवश्यक

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डीएमइआर) अद्याप राज्याची ‘स्टेट मेरिट लिस्ट’ जाहीर केलेली नाही. ही लिस्ट जाहीर झाल्यानर प्रवेशाचे स्पष्ट चित्र सांगता येणार आहे. मात्र, ४५० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यातील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस, तर ४३०च्या सुमारास गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बीडीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. ज्या विद्यार्थ्यांना ४७५ पेक्षा अधिक गुण आहे, अशांनी एमबीबीएस प्रवेशाबाबत सेफ झोनमध्ये राहायला काहीच हरकत नाही. डीपरची परीक्षा दिलेल्यांपैकी साधारण हजार विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहे, असे डीपरचे संस्थापक हरिश बुटले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध स्कूल बसवर कारवाई

$
0
0

‘आरटीओ’कडून ३८ वाहने जप्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या ६६ स्कूल बसवर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली. त्यापैकी ३८ वाहने जप्त करण्यात आली. यामध्ये सात मोठ्या बस, १५ लहान बस आणि १६ व्हॅनचा समावेश आहे. येत्या काळात कारवाईची तीव्रता आणखी वाढविली जाणार असून, दोषी वाहनांचा परवाना रद्द केला जाणार आहे. तसेच, दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे.

‘शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या स्कूल बसवर तीव्र कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. आरटीओच्या ११ पथकांमार्फत शहर आणि उपनगरात कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी २२७ स्कूल बसची तपासणी करण्यात आली,’ अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.

वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नसणे, आरटीओच्या विशेष तपास मोहिमेत स्कूल बसची तपासणी केल्याचे प्रमाणपत्र नसणे, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक करणे, शालेय विद्यार्थी वाहतूक धोरणाची अंमलबजावणी न करणे आणि मुख्य म्हणजे स्कूल बस परवाना नसणे, आदी कारणास्तव स्कूल बस चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

‘शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूल बस वाहतूकदारांनी विद्यार्थी वाहतूक धोरणातील तरतुदींचे पालन करावे. विनापरवाना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये. परवाना नसलेल्या वाहन मालकांनी स्कूल बस विद्यार्थी वाहतुकीचे परवाने घ्यावेत. शाळा प्रशासनाने बस कंत्राटदाराबरोबर आवश्यक ते परस्परसामंजस्य करार करावेत. पालकांनी आपल्या पाल्यांसाठी अधिकृत स्कूल बसचा वापर करावा. त्यांना खासगी वाहनांतून मुलांना शाळेत पाठवू नये,’ असे आवाहन राऊत यांनी केले.
.....
सध्या आरटीओच्या पथकांमार्फत कारवाई सुरू केली आहे. लवकरच वाहतूक पोलिस या कारवाईत सहभागी होणार असल्याने कारवाईची व्याप्ती वाढणार आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांनी परवाना घेऊन सर्व नियमांची पूर्तता करावी. अन्यथा त्यांची सूटका नाही.
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-आळंदी रस्ता रुंदीकरणास विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पुणे-आळंदी रस्ता रुंदीकरणातील बाधित मिळकतधारकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दोन जुलैला आंदोलन करण्याचा इशारा पुणे-आळंदी-काळेवाडी नागरी कृती समितीने दिला आहे.
पुणे-आळंदी रस्त्यावरील काळेवाडी येथे दोन जुलैला सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी सांगितले. रस्ता रुंदीकरणाने बाधित मिळकतींतवर पूर्वेकडील एकाच बाजूने मोठ्या प्रमाणात भूसंपादन करून अन्याय होत असल्याचा दावा करून भूसंपादन प्रक्रिया, मोजणी आणि नकाशा प्रक्रियेस विरोध करण्याची भूमिका समितीने घेतली आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणेची चौकशी करावी, असेही काळे यांनी म्हटले आहे.
हवेली भूमी उपअधीक्षक यांनी मोजणीच्या फेरमागणीचा विचार करून रस्त्याच्या दुतर्फा मिळकतधारकांना नोटिसा देऊन पुन्हा मोजणी करण्याचे सूचना प्रशासनास दिल्या आहेत. रस्ता रुंदीकरणास आणि विकासकामास विरोध नाही. मात्र, एकाच गटनंबर मधून एकाच बाजूने जास्त जागा भूसंपादन करून होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बालगंधर्व रंगमंदिर आमचे घर

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com​
@chintamanipMT
पुणे : ‘बालगंधर्व रंगमंदिरात प्रयोग म्हणजे कलाकारासाठी धन्यता असते. आमचा आम्हीच सत्कार करून घेत आहोत, अशी भावना असते. बालगंधर्वांचा फोटो आणि माडगूळकरांचे काव्य हे कलाकारांसाठी आनंदाचा भाग आहे. येथे आले की घरी आल्यासारखेच वाटते. अशी ही वास्तू पन्नास वर्षांची होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या रंगमंचावर शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची संधी मिळावी, अशी उत्कट इच्छा प्रत्येक कलाकाराची असते...’ अशा शब्दांत कलाकारांनी शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिराविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कलाकारांसाठी मनाचा हळवा कोपरा असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला येत्या सोमवारी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त विविध कलाकारांच्या भावना ‘मटा’ने जाणून घेतल्या. बालगंधर्व रंगमंदिराच्या आठवणी, येथे काम करण्याची उत्कंठता, रंगभूमीवरील स्थान अशा भावना व्यक्त करताना कलाकार नॉस्टेलजिक झाले.
पुण्यातील रसिकांची दाद प्रत्येक कलाकारासाठी एक अलंकार असतो. त्यात पुन्हा बालगंधर्व रंगमंदिरातील दाद म्हणजे कलाकारांच्या कलेचे सार्थक झाल्यासारखे असते. पुण्यात दाद मिळाली की जगात कुठेही दाद मिळवता येते, असे कलाकार आवर्जून सांगत असतात. हीच भावना कलाकारांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.

बालगंधर्व रंगमंदिर बांधले गेल्यानंतर तेथील सुसज्जता पाहून आम्हाला अप्रूप वाटायचे. कलाकारांसाठी किती सुखसोयी केल्या आहेत, अशी भावना यायची. त्यासाठी पुलंचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. या रंगमंदिरात कलाकारांना विश्रांतीसाठी जागा आहे. त्यामुळे प्रयोगा दरम्यानही विश्रांती मिळू शकते. या रंगमंदिराने कलाकारांना खूप काही दिले; पण ही वास्तू चांगली कशी राहील हे पाहायला सगळे विसरले. हे आमचे थिएटर आहे हे विसरून ते अस्वच्छ करत राहिले. चांगल्या सुखसोयींच्या आम्ही लायकीचे नाही हे सर्वांनी दाखवून दिले. येथील रंगमंच अतिशय उत्तम आहे. पडद्यांमुळे रंगतीला एक वेगळा दर्जा आहे. येथे काम करून आमचा आम्हीच सत्कार करून घेत आहोत, अशी भावना असते. बालगंधर्वांचा फोटो आणि माडगूळकरांचे काव्य हे कलाकारांसाठी आनंदाचा भाग आहे. येथे आले की घरी आल्यासारखेच वाटते. अशी ही वास्तू पन्नास वर्षांची होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या रंगमंचावर शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची संधी मिळावी.
- जयंत सावरकर, ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यसंमेलनाध्यक्ष


तो परिसरच छान आहे. एकप्रकारची नाट्य ऊर्जा तिथे मिळते. जाणीवपूर्व सांस्कृतिक वातावरण निर्माण केलेले आहे. गेली २८ वर्षे व्यावसायिक रंगभूमीवर काम करत असून, माझ्या प्रत्येक नाटकाचा प्रयोग बालगंधर्वला झाला आहे. चारचौघीचा शुभारंभ येथेच झाला. अनेक प्रयोग हाउसफुल्ल झाले. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी या नाटकांचे सलग प्रयोग केले. नाट्यगृहाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये वावरलो आहे. पहिल्या प्रयोगाचे वातावरण वेगळे असते. रांगोळी, गजरा असा सारा आनंददायी माहोल असतो. येथील ध्वनी आणि प्रकाश व्यवस्थेकडे अधिक गंभीरतेने बघण्याची गरज आहे. राजकीय हस्तक्षेप होऊ नये. हे रंगमंदिर सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू आहे. माझे एक नाते निर्माण झाले आहे.
-चंद्रकांत कुलकर्णी, प्रसिद्ध दिग्दर्शक

रंगमंदिराची बालगंधर्वांच्या हस्ते पायाभरणी झाली तेव्हा आणि उद्घाटन अशा दोन्हीही वेळी मी हजर होतो. हे एक देखणे रंगमंदिर आहे. उद्घाटन सोहळ्यात पं. भीमसेन जोशी, ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर, वसंतराव देशपांडे या दिग्गजांनी म्हटलेली नांदी आजही कानात घुमते. या रंगमंदिराने राज्यातील कलावंतांना सामावून घेतले. बालगंधर्व रंगमंदिर हे कलाकारांसाठी बांधले आहे; पण राजकीय कार्यक्रम असेल तर तारीख काढून घेतली जाते. हे योग्य नाही. हे ठिकाण कलाकारांचे माहेर आहे. माझे महत्त्वाचे सर्व कार्यक्रम याच रंगमंचावर झाले. येथे चोखंदळ प्रेक्षक भेटतो. त्यामुळे बालगंधर्वला कार्यक्रम म्हटले की उत्कंठा वाटते. सभागृहात मध्येच खांब नसल्याने समोरील प्रेक्षकांशी छान संवाद होतो. माझे भावबंध या रंगमंदिराशी जुळलेले आहे.
- सुधीर गाडगीळ, प्रसिद्ध मुलाखतकार, निवेदक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटी अन् विकासाला गती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत अखेर पिंपरी-चिंचवडच्या समावेशावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल,’ अशा प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी चालू आहे.
शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्याने शहरवासीयांना आनंद झाला आहे. योजनेतून निधी मिळून त्याचा उपयोग विकासकामांसाठी होणार असल्यामुळे शहराचा सुनियोजित विकास होण्यास मदत होणार आहे. योजनेत शहराचा समावेश व्हावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे, असे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश झाल्याचा मनस्वी आनंद आहे. महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आल्यामुळे शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्याला अखेर यश आले. यामुळे शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरवासीयांच्या वतीने आभार मानतो.’
विरोध पक्षनेते योगेश बहल म्हणाले, ‘विकासाच्या बाबतीत शहर अग्रेसर आहेच. परंतु, गलिच्छ राजकारणामुळे यापूर्वी पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश झाला नव्हता, हे दुर्दैव म्हणता येईल. परंतु, ‘देर आये, दुरुस्त आये’ असे म्हणत यापुढील काळात विकासाच्या बाबतीत राजकारण होऊ नये, हीच अपेक्षा आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून जनतेने दिलेल्या सत्तेचा उपयोग विकासासाठी करावा.’
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘स्मार्ट सिटी अभियान शहरात राबविण्यासाठी विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यानुसार स्मार्ट सिटीच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. योजनेत समावेश असलेल्या कामांसाठी बजेटमध्ये तरतूददेखील करण्यात आली आहे. यापुढील काळात योजनेची कामे वेगाने करण्यावर भर राहील.’
दरम्यान, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली एसपीव्ही कंपनीचे संचालक मंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्यामध्ये महापौर काळजे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन चिखले, महाराष्ट्र शासनाचे चार संचालक, केंद्र सरकारचा एक संचालक, दोन स्वतंत्र संचालक, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत-इस्रायल संबंध दृढ व्हावेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश एकमेकांना पूरक आहेत, भविष्यात दोन्ही देशांनी आपले संबंध आणखी दृढ करावेत,’ अशी अपेक्षा इस्रायलचे भारतातील राजदूत डॅनियल कारमन यांनी व्यक्त केली.
भारत- इस्रायल या दोन देशांतील संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘भारत- इस्रायल, २५ वर्षीय संबंधांचा आढावा आणि भविष्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, विश्वस्त अभय फिरोदिया, इस्रायलचे व्यापार प्रतिनिधी डेव्हिड अॅकॉफ, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते. कारमन म्हणाले, ‘सुरुवातीला दोन्ही देशातील संबंध हे सामरिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे होते; मात्र गेल्या काही वर्षांत शेती, व्यापार, शैक्षणिक संबंध, सायबर सुरक्षा, तंत्रज्ञान, आरोग्य, उद्योजकता आणि अन्नसुरक्षा आदी क्षेत्रांतही ते मोठ्या प्रमाणात प्रस्थापित होताना दिसून येत आहे. नजीकच्या भविष्यात याच क्षेत्रांमध्ये संबंध आणखी वाढविण्याचा प्रयत्न इस्रायल सरकार करणार असून, भारत सरकारही त्याला सकारात्मक प्रतिसाद देईल,’ असा विश्वास आहे.
‘भारत सरकारच्या मदतीने शेती व्यवस्थापनात इस्रायल आणखी भरीव क्रांती करू इच्छित आहे. त्यासाठी भारतात विविध ठिकाणी एक्सलन्स सेंटरची उभारणी करण्याचा मानस असून महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा या ठिकाणी ही सेंटर्स सुरू होत आहेत. येथील विविध राज्यांशी संबंध वाढविणेही देखील गरजेचे असून गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्राशी आमचे सकारात्मक संबंध प्रस्थापित झाले आहेत,’ असेही कारमन यांनी नमूद केले.
‘इस्रायलमधील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थी १० टक्के आहेत. येत्या काही आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला भेट देणार आहेत. या भेटीत पुन्हा या दोन्ही देशांचे संबंध आणखी वाढतील,’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरड कोसळल्याने वरंध घाट ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भोर-महाड मार्गावरील वरंध घाटात वाघजाई मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. त्यामुळे यामार्गे कोकणला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटनासाठी चाललेल्यांची वाहतूक ठप्प झाल्याने गैरसोय झाली.
भोर-महाड मार्ग हा मुख्यत्वे पुण्यावरून कोकणला जाण्यासाठी वापरला जातो. या मार्गावरून दररोज राज्य परिवहन महामंडळाच्या दहा एसटी बसची वाहतूक चालते. तसेच, खासगी वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणावर असते. जोडून आलेल्या सुट्ट्यांमध्ये कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. दरडीमुळे रस्त्यावर मोठे दगड येऊन आणि मातीचा ढिगारा साठल्याने दोन्ही बाजूची वाहने जागेवरच थांबवावी लागली. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय झाली.
वरंध घाटात दर वर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. यंदाच्या हंगामातील ही पहिलीच घटना आहे. दरडीचा राडारोडा रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी रेलिंगवर पडल्याने रेलिंगचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग व आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचारी, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत दरडीचा राडारोडा हटविण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कर्मचाऱ्यासाठी ‘टॉस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यातील गुन्हे शाखेत एका कर्मचाऱ्याच्या नेमणुकीसाठी खंडणीविरोधी पथक व दरोडा प्रतिबंधक पथक यांच्यात चक्क ‘टॉस’ झाला. अखेर हा टॉस खंडणीविरोधी पथकाने जिंकला आणि त्यांना हवा असलेला कर्मचारी मिळाला.
पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेत बदलून आलेल्या ५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या नेमणुका खेळीमेळीच्या वातावरणात नुकत्याच पार पडल्या. गुन्हे शाखेतील सर्व पोलिस निरीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यात नेमणुकीसंदर्भात बैठक झाली. त्यामध्ये सर्व पोलिस निरीक्षकांना त्यांना हवा असलेला कर्मचारी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. त्यानुसार सर्व पोलिस निरीक्षकांनी त्यांच्या आवडीचा व त्यांच्या कामाचा कर्मचारी त्यांच्याकडे घेतला. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीची बैठक सुरू होती. आवडीनुसार सर्व कर्मचाऱ्यांना निवडून घेण्यात आले; पण एक पोलिस कर्मचारी खंडणीविरोधी पथक व दरोडा प्रतिबंधक पथक या दोन्ही पथकांना हवा होता.
सकाळपासून सर्व नेमणुका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या होत्या. एका कर्मचाऱ्यावरून वाद कशाला, असे धोरण वरिष्ठांनी घेतले. पण, दोघांपैकी एकाला कशा पद्धतीने कर्मचारी द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये भारतीय संघाने जिंकलेल्या ‘टॉस’वरून वाद सुरू आहे. त्यामुळे देशभरात टॉसची चर्चा सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठीदेखील अखेर वरिष्ठांनी ‘टॉस’ करायचे ठरविले. त्याला दोन्ही निरीक्षकांनी सहमती दर्शविली. वरिष्ठांनी टॉस उडविला; पण त्यांनी तो हातावरच झेलला. तो टॉस दरोडा प्रतिबंधक विभागाने जिंकला. पण, उडविलेला टॉस हातात झेलायला नको, तो खाली पडू द्यावा, असा आग्रह सर्वांनीच धरला. पुन्हा एकदा टॉस उडविण्यात आला. हा टॉस खंडणीविरोधी पथकाने जिंकला. गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या खेळीमेळीत पार पडल्या. पण, एका कर्मचाऱ्यांसाठी झालेला हा टॉस सर्वांसाठी चर्चेचा व उत्सुकतेचा विषय ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images