Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘देवगड’मिळणार खराखुरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रस्त्यापासून शहराच्या कोणत्याही गल्लीत ‘देवगड हापूस’ म्हणून दुसराच कुठला तरी आंबा विकून उत्पादकांसह ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी देवगड तालुका आंबा बागायतदार आणि व्यापारी संघाने कंबर कसली आहे. देवगड हापूस आंब्याचे ‘ब्रॅन्डिंग’ करून त्याची अस्सल चव खव्वैय्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापारी संघ प्रयत्न करणार आहे.

देवगड तालुक्याच्या बागांमध्ये आंबा नैसर्गिकरित्या पिकवून थेट ग्राहकांना विकला जाणार आहे. देवगड हापूसची गुणवत्ता टिकविण्यासाठी उत्पादकांमध्ये संघाने जनजागृती केली आहे. यासंदर्भात आंबा बागायतदार व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. उत्पादक संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम ओगले म्हणाले, ‘पुण्यात कोठेही रस्त्यावरील विक्रेत्याकडे चौकशी केल्यास देवगड हापूस आंबाच विकत असल्याचे विक्रेता सांगतो. परंतु, प्रत्यक्षात देवगड हापूस आंबा थेट मार्केटयार्डात विक्रीला येतो. देवगड हापूस सांगून दुसऱ्या आंब्याची विक्री करीत असल्याचे प्रकार घडले. देवगड हापूस आंब्याच्या उत्पादकांसह ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. आमच्या संघाचे सदस्य शेतकऱ्यांकडून आंबा घेऊन तो बाजारात आणणार आहोत. एक एप्रिलपासून पुण्याच्या मार्केट यार्डातील आंब्याचे व्यापारी शेखर कुंजीर यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध होतील. त्याद्वारे देवगडची खरी चव, गुणवत्ता आणि प्रतवारीनुसार ग्राहकांसह शेतकऱ्यांना परवडतील, असे दर निश्चित केले जातील.’

उत्पादक संघाचे कोषाध्यक्ष विद्याधर जोशी म्हणाले, ‘पातळ साल असलेल्या नाजूक देवगड आंबा १५० ते ३५० ग्रॅम वजनापर्यंत असतो. त्याची साल हाताने सहज निघते. केशरी रंगाचा हा आंबा बाजारात उत्पादक संघाचे लेबल असलेल्या पॅकिंगमध्येच विकला जाईल. त्याशिवाय, त्या पॅकिंगवर संबंधित शेतकऱ्याला दिलेला बारकोड क्रमांक असणार आहे. आंबा चांगला आहे किंवा खराब यासंदर्भात तक्रार करण्यासाठी उत्पादक संघाचा संपर्क क्रमांक दिला जाणार आहे. बागेत आंबा नैसर्गिकरित्या ४० टक्के पिकवून त्याचे पॅकिंग केले जाईल. १५० ते २००, २२० ते २२५ अशा विविध पाच प्रकारांत वर्गवारी करून त्याचे पॅकिंग करण्यात येईल. पुण्यासह मुंबई, नाशिक, कराड येथे आंबा विक्री प्रतिनिधी नेमणार आहोत.’

उत्पादक संघ काय करणार

उत्पादक व व्यापारी संघाच्या शेतकऱ्यांकडून आंबा घेणार

नैसर्गिकरीत्या बागेतच आंबा पिकवून बाजारात आणणार

बागेत १५० ते ३०० ग्रॅम वजनाचे आंब्याचे वर्गीकरण, प्रतवारी करणार

प्रतवारीनुसार आंब्याचे पॅकिंग

प्रतवारीनुसार दर निश्चित

आंब्याच्या पेटीच्या पॅकिंगवर शेतकऱ्याच्या विशेष कोड क्रमांकासह संघाचे लेबल असणार


अनेक वर्षांपासून आम्ही देवगडच्या शेतकऱ्यांचा अस्सल चवीचा आंबा विकतो. चांगल्या दर्जाचा आंबा यापुढेही उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

सिद्धार्थ कुंजीर, आंबा विक्रेते, मार्केट यार्ड


तयार हापूस आंब्याला ‘डिमांड’

गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने रत्नागिरीच्या तयार हापूस आंब्याच्या खरेदीसाठी ग्राहकांसह व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डात गर्दी केली आहे. मागणीच्या तुलनेत तयार हापूस आंबा बाजारात उपलब्ध नसल्याने चार ते सहा डझनांच्या पेटीमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता असून त्यानंतर सामान्यांच्या आवाक्यात आंबा येऊ शकेल, असा अंदाज व्यापारी वर्गाने वर्तविला आहे.

गुढी पाडव्याच्या सणाला अनेक जण आंबा घरात आणला जावा, अशी सर्वसामान्य पुणेकरांची अपेक्षा असते. दर वर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा खरेदी केली जाते. परंतु, गेल्या काही वर्षापासून आंब्याला पोषक हवामान नसल्याने उत्पादनाला फटका बसल्याचे दिसून आले. परिणामी, आंब्याचे उत्पादन घटल्याचे आढळले. यंदा मात्र आंब्याच्या उत्पादनासाठी पोषक हवामान असल्याने उत्पादन चांगले हाती येण्याची शक्यता व्यापाऱ्यांसह उत्पादन बोलून दाखवित आहेत.

आंब्याचे व्यापारी करण जाधव म्हणाले, ‘गुढी पाडव्यानिमित्त मार्केटयार्डात चार ते सहा हजार हापूस आंब्याच्या पेट्यांची रत्नागिरीहून आवक झाली आहे. गेल्या आठवड्यात ही आवक कमी होती. बाजारात कच्च्या मालाची अधिक आवक झाली होती. कोकणातून मुंबई, अहमदाबाद येथे आंबा विक्रीसाठी जातो. परंतु, रविवारी तेथील बाजार बंद असल्याने ही आवक पुण्याकडे वळाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आवक झाली. आवक अधिक झाली असली, तरी कच्च्या मालामागे दोनशे रुपयांनी पेटीमागे दर उतरले आहेत. पाडव्यासाठी तयार हापूस आंब्याला अधिक मागणी होत आहे. तयार आंबा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे पेटीमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे.’

पाडव्यानंतर रत्नागिरीहून हापूस आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. चार ते पाच एप्रिलनंतर खऱ्या अर्थाने आंब्याचा हंगाम सुरू होईल. संपूर्ण हंगामात आतापेक्षा दीडपट अधिक आवक वाढण्याची शक्यता आहे. आवक वाढल्यानंतर आंब्याचे दर सामान्यांच्या आवाक्यात येतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दरात एक हजार रुपयांनी दर उतरले आहेत, अशी शक्यता आंब्याचे व्यापारी नाथ खैरे यांनी व्यक्त केली.

कर्नाटक आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, ‘कर्नाटक, मद्रास आंब्याची सध्या पाच ते सहा हजार पेटींची आवक झाली आहे. ही आवक वाढली, तरीही दर टिकून आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याच्या खरेदीला जोर वाढला आहे. आतापर्यंत पुण्यातून कर्नाटक आंब्याची खरेदी होत होती. परंतु, पुणे जिल्ह्यासह नजीकच्या परिसरातील व्यापाऱ्यांसह ग्राहकांकडून आंबा खरेदी होऊ लागली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्याची आवक ही खूप लवकर झाली आहे. तयार आंब्याला अधिक मागणी आहे.’

रत्नागिरीच्या आंब्याचे दर

रत्नागिरी हापूस आंबा (कच्चा) ४ ते ६डझन.............१४०० ते १८००

रत्नागिरी हापूस आंबा (तयार ) ६ ते १०......................... २००० ते ३५००

रत्नागिरी हापूस (तयार) ४ ते ६डझन................ २५०० ते ३०००

रत्नागिरी हापूस (तयार) ६ ते १० डझन............... ३००० ते ५०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेच्या उत्पन्नात अल्पशी घट

$
0
0

Tweet: @suneetMT
पुणे : गेल्या वर्षी मिळकतकर, स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि विकसन शुल्क (डेव्हलपमेंट चार्जेस) या तीन प्रमुख आर्थिक स्रोतातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळाले होते. यंदा मिळकतकरातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नसून, एलबीटीच्या उत्पन्नालाही फटका बसला आहे. तसेच, नोटाबंदी आणि एकूणच बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे विकास शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. शहरात येत्या वर्षात विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू होणार असल्याने ही मंदी दूर होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
महापालिकेचे उत्पन्न प्रामुख्याने मिळकतकर, एलबीटी आणि शहरात होणाऱ्या विकसन शुल्कावर अवलंबून असते. त्याशिवाय, केंद्र-राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान आणि होर्डिंग; तसेच फेरीवाला शुल्क यातूनही महापालिकेला उत्पन्न मिळते. गेल्या आर्थिक वर्षात मिळकतकरासाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली होती. त्याचा सर्वाधिक फायदा पालिकेला झाल्याने मिळकतकराचे उत्पन्न प्रथमच एक हजार कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. यंदाही अभय योजना लागू करण्यात आली होती, तर नोटाबंदीनंतरही कर भरणा करणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे, कराचे उत्पन्न एकराशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असले, तरी यंदा दिलेल्या उद्दिष्टापेक्षा हे उत्पन्न खूपच कमी आहे.
मिळकतकराप्रमाणेच एलबीटीमधून गेल्या तीन वर्षांत सातत्याने पालिकेचे उत्पन्न वाढत गेले आहे. यंदा मात्र गेल्या वर्षीएवढेच उत्पन्न मिळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत पालिकेला साडेबाराशे कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. एलबीटीची उलाढाल मर्यादा वाढवल्यानंतर पालिकांना होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून दर महिन्याला अनुदान दिले जात आहे. सरकारची आर्थिक स्थितीही भक्कम नसल्याने गेल्या दोन महिन्यांचे एलबीटीचे अनुदानच अद्याप पालिकेला प्राप्त झालेले नाही.
मिळकतकर आणि एलबीटीप्रमाणे विकसन शुल्कातूनही पालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर निधी गोळा होता. गेल्या वर्षी सुमारे आठशे कोटी रुपये पालिकेला मिळाले होते. यंदा सुरुवातीपासूनच विकसन शुल्काचे उत्पन्न घटले होते. नोटाबंदीनंतर तर त्यावर आणखी परिणाम झाला. त्यामुळे, विकसन शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही खूप मोठा परिणाम झाला आहे.
..............
अमृत योजनेतून निधी नाही
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी आणि अमृत या दोन योजनांमधून महापालिकेला साधारणतः तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये मिळतील, असा प्राथमिक अंदाज होता. त्यानुसार, केंद्र सरकारचे साधारणतः १९० कोटी रुपये राज्य सरकारचे साधारणतः शंभर कोटी रुपये पालिकेला प्राप्त झाले आहेत. परंतु, अमृत योजनेतून महापालिकेला एक रुपयाही मिळालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीलम गोऱ्हेंना मेसेज पाठविणारा अटकेत

$
0
0

पुणे : शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांना अश्लील मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याला कोर्टाने २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

दीपककुमार प्यारेलाल गुप्ता (वय ४०, रा. घरकुल शिवाजीनगर, जळगाव) असे कोठडी सुनावलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आर. एन. गट यांनी तक्रार दिली आहे. गुप्ता याला मुंबई पोलिसांनी अगोदर अटक केली होती. डॉ. नीलम गोऱ्हे यांना २१ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अशिल मेसेज पाठवून पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देणारे एसएमएस आले होते. या प्रकरणी त्यांनी पुण्यात ही तक्रार दिली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शिवाजीनगर पोलिसांनी गुप्ताला अटक करुन कोर्टात हजर केले. मेसेज पाठविण्याच्या मागे गुप्ताचा काय उद्देश होता, मेसेज पाठविण्याबाबत कोणी प्रवृत्त केले आहे. सीमकार्ड जप्त करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिल एस. जे. बागडे यांनी केली. ती कोर्टाने मान्य केली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) व्ही. एच. दरेकर अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिमत दर्जाची प्रतीक्षा

$
0
0

‘सीओईपी’बाबत यूजीसीकडून कार्यवाहीस दिरंगाई
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘शासकीय अभियांत्रिकी कॉलेजला (सीओईपी) अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्याचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही. ‘सीओईपी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा असून विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) याबाबत धीम्या गतीने पावले टाकत आहे. त्यामुळे ‘सीओईपी’ला अभिमतचा दर्जा मिळण्यात अडचणी येत आहे,’ असे ‘सीओईपी’चे संचालक डॉ. बी. बी. आहुजा यांनी शुक्रवारी सांगितले.
‘सीओईपी’ने रिगाटाबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. आहुजा बोलत होते. आहुजा म्हणाले, ‘कॉलेजला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठीची प्रक्रिया गेल्या एक ते दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, ‘यूजीसी’च्या प्रशासनाकडून अद्याप हा दर्जा मिळण्यासाठी जलदगतीने कारवाई होत नाही. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित कार्यालयांशी पत्रव्यवहार झाला आहे. ‘सीओईपी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. कॉलेजमध्ये नावीन्यपूर्ण संशोधनाला वाव देण्यासाठी आणि शैक्षणिक दर्जा अधिक उंचाविण्यासाठी तसेच विविध प्रकारचे कोर्स सुरू करण्यासाठी अभिमत विद्यापीठाचा दर्जा आ‍वश्यक आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम आणि संशोधनात्मक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविता येतील.’
‘यूजीसीची कारवाई तत्काळ होत नाही. कॉलेजला अभिमतचा दर्जा मिळण्यासाठी ‘यूजीसी’ला समिती नेमायची आहे. त्यानंतर या समितीद्वारे कॉलेजची पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. येत्या एप्रिल महिन्यात समितीची स्थापना होऊन ती कॉलेजला भेट देण्याची शक्यता आहे. ही कारवाई लवकर झाल्यास येत्या शैक्षणिक वर्षात कॉलेजला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळेल आणि त्यानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करता येतील. त्यामुळे ‘यूजीसी’ने लवकर कारवाई करावी. ‘सीओईपी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यावर नावीन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी मोकळीक मिळेल,’ असेही त्यांनी सांगितले.
....
गुणवत्तावाढीसाठी सीओईपी कटिबद्ध
सीओईपी राज्यातील खासगी आणि शासकीय अशा एकूण १४ इंजिनीअरिंग कॉलेजला शैक्षणिकदृष्ट्या उत्तम गुणवत्ता मिळण्यासाठी आणि संशोधनाला वाव मिळण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. याबाबत नुकताच राज्यातील दहा कॉलेजशी करार झाला आहे. तसेच, परराज्यात मोहाली आणि जयपूर येथील इंजिनीअरिंग कॉलेजला मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये ‘सीओईपी’च्या प्राध्यापकाला एका कॉलेजला शैक्षणिकदृष्ट्या उत्तम करण्याची जबाबदारी देण्यात येईल. यामध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) कॉलेजला २४ लाख रुपयांचा निधी दिला आहे, असे डॉ. आहुजा यांनी सांगितले. दरम्यान, ‘सीओईपी’मध्ये ‘इंटर्नशीप’ करण्यासाठी एनआयटी, बिट्स पिलानी यांच्यासारख्या शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी येत आहे. अशा नामवंत कॉलेजांमधील सुमारे १५ ते २० विद्यार्थी ‘इंटर्नशीप’ करण्यासाठी आल्याने देशात ‘सीओईपी’चे नाव शैक्षणिकदृष्ट्या अधिक नावारूपाला येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाणेरचा कचरा प्रकल्प तातडीने बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नोबेल’ कंपनीतर्फे चालविण्यात येणारा महापालिकेचा बाणेर येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प तातडीने बंद करण्याची एकमुखी मागणी रविवारी नगरसेवक आणि नागरिकांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली. हा प्रकल्प बंद केला गेला, तर कॉम्प्रेस बायोगॅसवर (सीबीजी) पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस चालविण्याचे स्वप्न अर्धवट राहण्याचा धोका आहे.

कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर आणि ज्योती कळमकर यांनी रविवारी या प्रकल्पाची पाहणी केली. आयुक्त कुमार आणि महापालिकेचे इतर वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. नोबेल कंपनीच्या या प्रकल्पामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि इतर त्रासाची गाऱ्हाणी या वेळी नागरिकांनी मांडली. या प्रकल्पातून अनेक घातक वायू बाहेर पडत असल्याना दावा नागरिकांनी केला. तसेच, केवळ कचरा वर्गीकरणाची परवानगी असताना, येथे त्यावर प्रक्रियाही केली जाते, असा आरोप करण्यात आला.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरणारा हा प्रकल्प असून, तो तातडीने बंद करण्यासाठी माझ्यासह या प्रभागातील सर्व नगरसेवक कटिबद्ध आहेत. हा प्रकल्प बंद करून पालिकेने तो दुसऱ्या जागेत हलवावा, अशी मागणी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली.

दरम्यान, नागरिकांच्या सर्व सूचना आणि आक्षेप ऐकून घेतल्यानंतरही प्रकल्प बंद करण्याबाबत आयुक्तांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. या प्रकल्पामुळे दुर्गंध सहन करावा लागत असल्याची कबुली त्यांनी दिली. परंतु, नागरिकांचे हित आणि कायदेशीर बाबी तपासूनच प्रकल्प बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे संकेत दिले.

या प्रकल्पातून नोबेल कंपनीच्या तळेगाव येथील प्रकल्पाला कच्च्या मालाचा पुरवठा केला जातो. तेथे निर्माण होणाऱ्या ‘सीबीजी’चा उपयोग पीएमपीसाठी करण्याचा विचार असून, त्यानुसार काही प्राथमिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. येत्या काही महिन्यांत या इंधनावर पीएमपी चालवण्याचा प्रयोग यशस्वी होण्याच्या टप्प्यात असतानाच, आता हा प्रकल्प बंद करण्याची मागणी सत्ताधारी भाजपनेच लावून धरली आहे. त्यामुळे, पीएमपी या इंधनावर चालविण्याचे स्वप्न कदाचित अधुरे राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक वसंत मोरे व भाजप नगरसेविकेच्या पतीमध्ये मारामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फेसबुक पोस्टवर कमेंट करण्यावरून झालेल्या वादामधून मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आणि भाजप नगरसेविकेच्या पतीमध्ये मारामारी झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी सुखसागरनगरमध्ये घडला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नगरसेवक वसंत कृष्णाजी मोरे (वय ४३, रा. कृष्णलिला निवास, कात्रज) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रवी एकनाथ संकपाळ (वय ४४, रा. आनंदनगर सोसायटी, सुखसागरनगर), राजाभाऊ कदम व राहुल कामठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, रवी संकपाळ यांच्या तक्रारीवरून वसंत मोरे यांच्यासह बंडू सूर्यवंशी आणि मंगेश रासकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजाभाऊ कदम यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे आणि त्यांचे मित्र सूर्यवंशी, रासकर हे सुखसागरनगर येथून जात होते. त्या वेळी त्यांनी संकपाळ यांना तू विनाकारण माझ्या फेसबुकवर कमेंट का करीत असतोस, अशी विचारणा केली. त्यामुळे चिडलेल्या संकपाळ, कदम आणि कामठे यांनी मोरे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सूर्यवंशी व रासकर यांनाही मारहाण करून मोरे यांच्या हातातील महागडे घड्याळ तोडून नुकसान केल्याचे मोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतकर बिले उशिरा मिळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यास अवघ्या पाच दिवसांचा कालावधी राहिला असताना, यंदा मिळकतकराची बिले नागरिकांच्या हातात उशिराने पडण्याची शक्यता आहे. तर, सर्वसाधारण करावर देण्यात येणाऱ्या ५/१० टक्के सवलतीचा कालावधीही एक महिन्याने कमी करून ३१ मे पर्यंतच केला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होईल. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांना महापालिकेच्या मिळकतीची बिले मिळण्यास सुरुवात होते. गेल्या वर्षी मिळकतकर विभागाने एक एप्रिलपूर्वीच बिले पोस्टाने पाठवायला सुरुवात केली होती. त्यामुळे, नागरिकांच्या वेळेत बिले मिळाली होती. यंदाही बिले वेळेत पाठवण्याचा कर विभागाचा प्रयत्न होता; पण महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे त्याला विलंब झाला. येत्या आठवड्यात महापालिका आयुक्त कुणाल कुमार त्यांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करणार आहेत. तर, त्यानंतर स्थायी समिती महापालिकेच्या अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप देणार आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतरच नागरिकांना बिले पाठवण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे संकेत मिळकतकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. नागरिकांना ऑनलाइन स्वरूपातही त्यांच्या बिलाची रक्कम किती, हे पाहता येणार असून करही ऑनलाइन स्वरूपात भरता येणार आहे. मिळकतकरधारकांनी गांडूळखत प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा सौर ऊर्जा यापैकी दोन प्रकल्प राबविले असल्यास सर्वसाधारण करावर १० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. गेल्या वर्षी जास्तीत जास्त नागरिकांना ही सवलत मिळावी, याकरिता नेहमीच्या दोन महिन्यांऐवजी एक महिना वाढवून ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, यंदा ही मुदत पुन्हा कमी करण्यात आली आहे. यंदा, ३१ मे पर्यंत कर भरणाऱ्यांनाच ही सवलत लागू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थरारक प्रात्यक्षिकांनी रंगले ‘रिगाटा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारत-पाकिस्तान युद्धाचा थरार...जम्मू-काश्मीरमधील सध्याची परिस्थिती आणि त्या परिस्थितीत भारतीय म्हणून जगणाऱ्या नागरिकांची आप-बीती...देशात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा पोस्टरांद्वारे गौरव...मशाल डान्स... अशा एकापेक्षा एक नौकांवरील ​थरारक प्रात्यक्षिकांनी ८९वा रिगाटा महोत्सव रविवारी रंगला. या वेळी नौकांच्या प्रात्यक्षिकांच्या जल्लोषपूर्ण सादरीकरणांनी उपस्थितांना तब्बल तीन तास खिळवून ठेवले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) बोट क्लबतर्फे आयोजित ८९वा रिगाटा महोत्सव रविवारी सीओईपीच्या बोट क्लबवर ‘महिला सक्षमीकरण’ संकल्पनेवर पार पडला. या वेळी अभिनेत्री रती अग्निहोत्री, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू नभा वांबूरकर, सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, उपप्राचार्य डॉ. बी. एन. चौधरी, डॉ. एस. एल. पाटील, प्रा. संदीप मेश्राम आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. आहुजा आणि वांबूरकर यांचा विषेष सत्कार करण्यात आला.

या उत्सवात अॅरो फॉर्मेशन, शेल गेम्स, कयाक बॅलेट, टेलिमॅचेस, पंट फॉर्मेशन असे थरारक आणि वातावरणनिर्मिती करणारे प्रकार विविध प्रकारच्या नौकांवर सादर करण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमधील १९४७पासूनचे संबंध आणि त्यांच्यातील युद्धे, जम्मू-काश्मीरमधील सध्याची परिस्थिती, दहशतवादाची स्थिती व माहिती, जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना भारतीय म्हणून असलेला अभिमान आदींची माहिती विविध लायटिंगद्वारे सजवलेल्या नौकांद्वारे आणि आतषबाजीद्वारे सादर करण्यात आली. ‘मशाल डान्स’मध्ये स्वच्छ अभियान, गणेशोत्सव असे विविध प्रकार सादर करण्यात आले. महोत्सवाची ‘महिला सक्षमीकरण’ ही संकल्पना होती. यामध्ये नोकांद्वारे; तसेच पाण्यात फुले पसरवून आणि रंगीबेरंगी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करून महिला सक्षमीकरणवर बोधचिन्ह तयार करण्यात आले. तसेच, देशात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचे पोस्टर्स या वेळी सादर करण्यात आले. या उत्सवात एकूण ३५० विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असून केवळ पंट फॉर्मेशनमध्ये प्रथम वर्षाचे १०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

लहानपणापासून कुटुंबात मुलगी म्हणून ही गोष्ट करू नको, असे पालकांनी कधीच सांगितले नाही. माझ्या पालकांनी मला चांगल्या गोष्टी करण्यासाठी सदैव प्रोत्साहनच दिले. त्यामुळे माझे सक्षमीकरण हे घरातूनच झाले आणि आज मी एक सक्षम महिला म्हणून जीवन जगत आहे. इतर पालकांनी देखील त्यांच्या मुलींना विविध चांगल्या गोष्टी करण्याची सूट दिली पाहिजे.

- रती अग्निहोत्री, अभिनेत्री


प्रात्यक्षिकादरम्यान नौका उलटली

दरम्यान, नौकांवर विविध प्रात्यक्षिके सादर करताना एक नौका मुळा नदीच्या पात्रात उलटली. या प्रकारामुळे ऐन वेळी सर्वांची तारांबळ उडाली. मात्र, तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सुखरूप पाण्यातून काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापराक्रमी शंभूछत्रपती

$
0
0

मिलिंद एकबोटे

औरंगजेबाच्या आक्रमणाच्या वावटळीत स्वराज्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी जिवापाड परिश्रम घेतले. प्रखर संघर्ष केला आणि स्वत:च्या बलिदानाने समाज जागवला. शंभूछत्रपतींचे हे महान राष्ट्रीय योगदान आहे. छत्रपती संभाज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त…

‘देशासाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावे आणि देशासाठी कसे मरावे, हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावे,’ असे एका प्रखर देशभक्ताने सांगितले होते. आपल्या पित्याने निर्माण केलेले स्वराज्य औरंगजेबाच्या प्रचंड आक्रमणाच्या वावटळीत उद्‍‍ध्वस्त होऊ नये, यासाठी त्यांनी जिवापाड परिश्रम घेतले. प्रखर संघर्ष केला आणि स्वत:च्या बलिदानाने समाज जागवला. शंभूछत्रपतींचे हे महान राष्ट्रीय योगदान आहे.

औरंगजेबाने १६८१ मध्ये महाराष्ट्रावर आक्रमण केले. त्या वेळी त्याच्याकडे आठ लाखांचे प्रचंड सैन्यबळ होते आणि ‘शिवाजीचे राज्य बुडवायचेच’ असे ठरवून त्याची वाटचाल चालू होती. त्या वेळी संभाजी महाराजांकडे होते फक्त ५० हजार सैन्यबळ. पण ते डगमगले नाहीत. लागोपाठ औरंगजेबाचे सोळा सरदार निरनिराळ्या ठिकाणी स्वराज्यावर चालून आले. परंतु, हंबीरराव मोहित्यांच्या सहकार्याने आखलेली शंभूछत्रपतींची व्यूहरचना कधीही फसली नाही.

साकी मुस्तैतखान या औरंगजेबाच्या दरबारातील लेखकाने एक प्रसंग नोंदवून ठेवला आहे. तो वाचल्यावर शंभूछत्रपतींच्या प्रबल पराक्रमाची ओळख आपल्याला होते. तो लिहितो तो काळ १६८२च्या उत्तरार्धाचा आहे. औरंगजेबाने सर्व सरदारांची एक सभा बोलावली. त्या सभेत सरदारांना उद्देशून तो म्हणाला, ‘दख्खनवर स्वारी करून दीड वर्ष झाले. परंतु, अद्याप हाती काही लागेलच नाही. आपला प्रचंड पैसा खर्च झाला आहे. तुमच्यापैकी कोणीतरी ही जबाबदारी स्वीकारावी,’ असे आवाहन त्याने साथीदारांना केले. परंतु, कोणीही पुढे आले नाही. संभाजीराजांच्या पराक्रमाचा धाक प्रत्येकाच्या मनावर होता. बादशहाने त्याचा मुलगा आजमशहा याला ही जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले. परंतु, त्याने त्याचा मित्र अमीरखान (जो अफगाणिस्तानच्या स्वारीवर गेला होता) याची मदत मागितली. त्याला हा प्रस्ताव बिलकूल पसंत पडला नाही. त्या वेळी औरंगजेबाने भर दरबारात आपल्या डोईवरचा किमाँश सर्व मानचिन्हांसह फेकून दिला आणि प्रतिज्ञा केली, ‘जोपर्यंत संभा हाती लागत नाही तोपर्यंत मी डोक्यावर किमाँश (मानाची पगडी) घालणार नाही.’

गोव्यात शंभूराजांनी स्वारी करून पोर्तुगीजांची पळता भूई थोडी केली. तीन चतुर्थांश गोवा संभाजी महाराजांनी पंधरा दिवसात जिंकून घेतला होता. पोर्तुगीजांची पाचावर धारण बसली होती. हताश झालेल्या विजरईने (व्हॉइसरॉय) ओल्ड गोवा सिटीने दरवाजे बंद करवून स्वत:ला एका खोलीत चार दिवस कोंडून घेतले होते. चौल, गुवे बेट, फोंड्याचा किल्ला, स्टीफन किल्ला हा सारा प्रदेश शंभूराजांनी पादाक्रांत करून पोर्तुगीजांवर दहशत बसवली होती.

पोर्तुगीज लोकांच्या कागदपत्रांमध्ये एका प्रसंगाचे वर्णन आहे. विरजई कोंद दि आल्व्हेर चार दिवस एका खोलीत एकांतात होता. शंभूराजांच्या आक्रमणाचा त्याने धसका घेतला होता. चार दिवसांनरत तो बाहेर आला आणि त्याने ओल्ड गोवा सिटीतील सर्व नागरिकांना घंटा वाजवून आमंत्रित केले. त्यांने सेंट झेवियरची शवपेटी उघडून आपल्या कमरेचे तलवार व राजदंड त्या ठिकाणी अर्पण केली. या प्रेतासमोर एक चिठ्ठी लिहून ठेवली. चिठ्ठीमध्ये त्याने झेवियरची करुणा भाकली. ‘आम्हा संभाजीपासून वाचवा. कृपा करा. नाहीतर आम्ही पोर्तुगालमध्ये पळून जातो,’ असे त्याने लिहिले होते. शंभूछत्रपतींना गोव्याची मोहीम कवि कलश आणि निळोपंत पेशवे यांच्यावर सोपवून शहाआलम या मुघल सेनापतीच्या पारिपत्यासाठी स्वराज्यात जावे लागले. त्यामुळे विरजई वाचला. परंतु, या प्रसंगात तो इतका खचला होता की त्याने आपली राजधानी गोव्यामधून मुरगाव बंदराच्या गावी हलवली.

फितुरीमुळे मुघलांच्या कैदेत सापडलेल्या शंभूराजांनी आपल्या प्रखरतेने शत्रूला निस्तेज आणि निष्प्रभ करून टाकले. अत्याचारी औरंगजेबाने त्यांना कठोर यातना दिल्या. ३९ दिवस त्यांचे हाल केले. परंतु, त्याच्या हाती काहीच लागले नाही. शंभूराजांनी औरंगजेबापुढे शरणागती न पत्करता धर्माचा अभिमान दाखवला. त्यामुळे त्यांच्या बलिदानाने महाराष्ट्र पेटून उठला आणि लढायला सिद्ध झाला. संतत्प महाराष्ट्राच्या क्रोधाग्निमध्ये औरंगजेबाच्या पाशवी महत्त्वाकांक्षा भस्मसात झाल्या. २७ वर्षांच्या प्रदीर्घ युद्धानंतर औरंगजेबाचा महाराष्ट्रातच अंत झाला आणि मराठ्यांचे राज्य प्रखर तेजाने तळपू लागले. जो शंभूराजांची ही तेजस्वी कथा ऐकेल तो जीवनाची लढाई कधीही हरणार नाही आणि देशसेवेमध्ये मागे राहणार नाही. ही शंभूचरित्राची फलश्रुती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुल्लानगर उड्डाणपुलाचे काम थांबले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लुल्लानगर येथील चौकात काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेले उड्डाणपुलाचे काम गेल्या महिनाभरापासून थांबलेले आहे. वास्तविक, गेल्या आठ महिन्यात अत्यंत संथ गतीने काम झाले असून, केवळ दोन ‘पिलर’ उभे राहिले आहेत. कामामुळे रस्त्याच्या मधोमध खोदकाम केले असल्याने वाहतुकीच्या कोंडीत वाढ झाली आहे.

लुल्लानगर चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही वर्षांपूर्वी महापालिकेने या चौकात उड्डाणपूल बांधण्यास मान्यता दिली होती. मात्र, संरक्षण खात्याच्या परवानगीअभावी त्याचे काम रखडले होते. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे विविध पक्षांतील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर, संरक्षण खात्याची मंजुरी मिळाली होती. त्यानंतर ३० जुलै रोजी पर्रीकर यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले. उद्घाटनानंतर सुमारे दीड महिने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नव्हती. या उड्डाणपुलाचे काम काही महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, गेल्या आठ महिन्यांतील येथील कामाचा वेग पाहता, काही वर्षे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उड्डाणपुलाच्या कामासाठी लुल्लानगर चौकात दोन्ही बाजूस मधोमध खोदकाम केलेले आहे. त्यासाठी रस्त्याचा बराचसा भाग व्यापला गेलेला आहे. त्यामुळे चौकात सकाळी व सायंकाळी वाहनांची गर्दी होते. विशेषतः कोंढव्याकडून व मार्केट यार्डकडून येणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागतात. कोंढव्याच्या दिशेला लुल्लानगर चौकापासून अगदी फक्री हिल्सपर्यंत वाहनांच्या रांगा असतात. त्यामुळे किमान दोन वेळा सिग्नल लागल्यानंतर वाहनचालकाला पुढे जाता येते. तसेच, फक्री हिल्स चौकातही अस्ताव्यस्त वाहनांमुळे कोंडी होते.

‘काम लवकरच सुरू होणार’

लुल्लानगर चौकापासून जवळच लष्कराचे नवीन कमांड हॉस्पिटल उभारले जात आहे. या नवीन हॉस्पिटलला जुन्या कमांड हॉस्पिटलशी जोडण्यासाठी भुयारी मार्ग करून देण्याची मागणी संरक्षण विभागाने केली होती. या प्रस्तावावर महापालिका प्रशासनाचा विचार विनिमय सुरू होता. त्यामुळे मधल्या काळात उड्डाणपुलाचे काम बंद होते. अखेरीस महापालिकेच्या पथ विभागाने या भुयारी मार्गाचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला असून, त्याबरोबरच लुल्लानगर येथील उड्डाणपुलाचे काम पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढे तरी पदभार स्वीकारणार का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तुकाराम मुंढे यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदावरून तडकाफडकी बदली केल्यानंतर, त्यांना दिलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्षपदावर ते नाखूश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंढे पदभार स्वीकारणार की यापूर्वी नियुक्तीचा आदेश दिलेल्या अण्णासाहेब मिसाळ यांच्याप्रमाणे मुंढे यांची नियुक्तीही कागदावरच राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गेल्या नऊ महिन्यांपासून पूर्ण वेळ अध्यक्षापासून वंचित असलेल्या पीएमपीच्या अध्यक्षपदी मुंढे यांची बदली झाल्याचे वृत्त शनिवारी सकाळी प्राप्त झाले. तत्पूर्वी एक दिवस अगोदर मुंढे यांच्या जागी राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक एन. रामास्वामी यांची नवी मुंबईचे आयुक्त म्हणून बदली केली गेली. मुंढे यांच्या बदलीमागे नवी मुंबईतील राजकीय व आर्थिक हितसंबंध धोक्यात आलेल्यांचा हात असल्याची चर्चा तिकडे सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंढे यांना देऊ केलेले पद म्हणजे, त्यांच्या अनुभवापेक्षा कमी दर्जाचे असल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. मुंढे यांना आणखी एखादे महत्त्वाचे पद देऊ केल्यास, पीएमपीचा अतिरिक्त कारभार पाहण्यास तयार असल्याचे राज्य सरकारमधील वरिष्ठ सूत्रांकडून कळाले आहे. त्यामुळे ते पदभार स्वीकारणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याबाबत नियुक्तीचे वृत्त समजल्यापासून मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, पीएमपीचे माजी अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने आदेश देऊनही त्यांनी अखेरपर्यंत पीएमपीचा पदभार स्वीकारला नाही. आता मुंढे पीएमपीचा पदभार केव्हा स्वीकारणार, याबाबत पीएमपी प्रशासनाकडे विचारणा केली असता, त्यांना काहीच कळविण्यात आलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.


‘अतिरिक्त’ असतील, तर मुंढे नकोच!

पुणे : सजग नागरी मंच प्रणीत पीएमपी प्रवासी मंचाने ‘पीएमपी’चा कारभार सुधारण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे मुंढे यांना कोणत्याही परिस्थितीत पीएमपीचा पदभार स्वीकारण्यास सांगावे, अशी मागणी मंचाने केली. मात्र, दुसऱ्या एखादे महत्त्वाचे पद स्वीकारून पीएमपीचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे दिला जाणार असेल, तर आम्हाला मुंढेदेखील मान्य नाहीत, असेही मंचाने स्पष्ट केले. पीएमपीला पूर्ण वेळ आणि सक्षम अधिकारी हवा, अशी मागणी मंचाने केली.

‘तेजस्विनी’साठी १० कोटी!

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात महिलांसाठी विशेष तेजस्विनी बस सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून दहा कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमधून किमान ७० ते ८० मिनी बस खरेदी करणे शक्य असल्याचे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतोष गणवेशातून भेटतात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘लहानपणापासूनच संतोष यांना देशसेवेचे वेड होते, तर मला लहान मुलांमध्ये रमण्याचा छंद होता. संतोष यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी लष्करात दाखल झाले. पूर्वी लष्कराच्या गणवेशाला कवटाळत होतो. मात्र, आता लष्करी गणवेश घातल्यामुळे संतोष माझ्यासोबत असल्यासारखे वाटते. त्यांनी पाहिलेली स्वप्ने मुलांना द्यायची आहेत,’ या शब्दांत शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी आपल्या भावनांना शुक्रवारी मोकळी वाट करून दिली.

पुण्यातील कलाकार आणि जनतेच्या वतीने शहीद संतोष महाडिक यांचा अर्धपुतळा पुण्याचे सहपोलिस आयुक्त सुनील रामानंद यांच्या हस्ते स्वाती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्या वेळी स्वाती महाडिक बोलत होत्या.

महाडिक म्हणाल्या, की ‘संतोष याना लहानपणापासूनच लष्करात जाण्याची आवड होती. संतोष शहीद झाले आणि माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. संतोष यांच्यासोबत पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लष्कराचा गणवेश अंगात घातला. त्यामुळे संतोष माझ्यासोबतच आहेत असे वाटते. सध्या मी लष्करात प्रशिक्षण घेत असून सप्टेंबरमध्ये लेफ्टनंटपदी

बढती होईल. संतोष यांच्यासह पाहिलेली स्वप्न पूर्ण करीत त्यांनी पाहिलेले आयुष्य मुलांना द्यायचे मी ठरवले आहे. मुलांनी काय करावे याचे बंधन त्यांच्यावर असणार नाही. मात्र, त्यांनी लष्करात यायचे ठरवले तर, मला आनंदच होईल.’

‘देशात सीमेवर आणि अंतर्गत भागात युद्ध लढले जाते. सीमेवर युद्ध लढताना तेथील परिस्थिती कठीण असते. मी अंतर्गत युद्ध जवळून पाहिले आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांच्या नातेवाइकांना अनेक सवलती मिळाल्या. पण, गडचिरोलीसारख्या ठिकाणी नक्षलवाद्यांशी दोन हात करताना शहीद झालेल्यांच्या नातेवाइकांना अजून काहीच मिळाले नाही. १९८१ पासून १९१ पोलिस नक्षलग्रस्त भागात शहीद झाले आहेत,’ असे रामानंद यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसाप’ची ‘साताऱ्याची तऱ्हा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध कार्यक्रमांसाठी साताऱ्याला झुकते माप दिले जात असल्याची चर्चा मसापच्या मध्यवर्ती आणि इतर शाखांमध्ये रंगली आहे. मसापच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना सातारा जिल्ह्यात निवडणुकीत चांगली मते मिळाल्यामुळे त्यांच्या पदरात कार्यक्रमांचे भरघोस दान पडत असल्याचे साहित्य वर्तुळात बोलले जात आहे.

नुकतीच महाबळेश्वर येथे मसापच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली त्या बैठकीनंतर या चर्चेला साहित्य वर्तुळात उधाण आले आहे. मसापतर्फे वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जातात. विभागीय साहित्य संमेलन आणि समीक्षा संमेलनाचाही त्यात समावेश असतो. कार्यकारिणीच्या बैठकीत सोलापूरच्या मसापच्या शाखेच्या कल्याण शिंदे यांनी यंदाचे समीक्षा संमेलन पंढरपुरात व्हावे, अशी मागणी केली होती. कार्यकारिणीतील काही सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनीही या मागणीला दुजोरा देऊन शिंदे यांना पाठिंबा दिला. मात्र, मसापच्या कार्याध्यक्षांनी समीक्षा संमेलनाची जबाबदारी साताऱ्याकडे सोपवली. ‘पुढच्या वर्षी तुम्हाला संधी देऊ,’ असे सांगून त्यांनी शिंदे यांची मनधरणी केली. मात्र, राज्याच्या १४ जिल्ह्यांमध्ये ७६ शाखा असा भलामोठा विस्तार असताना केवळ साताऱ्याला प्राधान्य का दिले जाते, असा प्रश्न या निमित्ताने साहित्य वर्तुळातून विचारला जात आहे.

मसापच्या निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यातून विद्यमान कार्याध्यक्षांना भरघोस एकगठ्ठा मतदान झाले. त्यामुळे, त्यांचे प्रेम या भागावर राहणे साहजिक आहे, पण मसापसारख्या संस्थेचे प्रतिनिधित्व करताना राज्यातील इतर सर्व शाखांना समान वाटा देणे आवश्यक आहे. विभागीय संमेलनाची जबाबदारी आणि शाखा मेळाव्यासाठी नगर आणि चाळीसगावला प्राधान्य दिले हे खरे; पण कार्यक्रमांपासून ते पदाधिकारी नेमणूकीपर्यंत सातारा सध्या नंबर वन असल्याचे दिसते आहे. राजकारणात एखादा लोकप्रतिनिधी मंत्रिपदावर विराजमान होतो आणि मग त्याच्या मतदारसंघात विकासकामांची जंत्री लागते. तसाच काहीसा प्रकार मसापकडून साताऱ्याबाबतीत होत असल्याच्या चर्चेला पेव फुटला आहे. मसापच्या पदाधिकाऱ्यांमध्येही कार्याध्यक्षांच्या सातारा प्रेमावरून कुरकुर सुरू आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना हे प्रेम मान्य नसल्याचे एका पदाधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

यासंदर्भात मसापचे कार्यकारिणी सदस्य कल्याण शिंदे म्हणाले, ‘महाबळेश्वर येथे झालेल्या कार्यकारिणी सभेत पंढरपूर येथे समीक्षा संमेलन व्हावे, अशी मागणी केली होती. मात्र, ते साताऱ्याच्या शाखेला देण्यात आले. पुढच्या वर्षी ते आम्हाला मिळेल, असे आश्वासन कार्याध्यक्षांकडून मिळाले आहे. त्यामुळे, पुढील वर्षी समीक्षा संमेलन अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू.’

‘आश्वासन मिळाले’

महाबळेश्वर येथे झालेल्या कार्यकारिणी सभेत पंढरपूर येथे समीक्षा संमेलन व्हावे, अशी मागणी केली होती. ते साताऱ्याच्या शाखेला देण्यात आले. पुढच्या वर्षी ते आम्हाला मिळेल, असे आश्वासन कार्याध्यक्षांकडून मिळाले आहे. त्यामुळे, पुढील वर्षी समीक्षा संमेलन अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू.

- कल्याण शिंदे, मसाप कार्यकारिणी सदस्य

‘झुकते माप नाही’

साताऱ्याच्या शाखेला झुकते माप देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी दोन विभागीय संमेलने झाली आहेत. त्यामुळे, ती संधी यंदा साताऱ्याच्या शाखेला देण्यात आली. साताऱ्याला झुकते माप दिले जात आहे, या विधानात तथ्य नाही. मसापच्या कोणत्याही शाखेवर अन्याय झालेला नाही.

मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हळदी-कुंकू’ निर्णयाची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘गुढीपाडवा, शाळेत प्रवेश वाढवा’ या टॅगलाइनवर ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात हळदी कुंकूसारखे उपक्रम राबविण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांना दिल्या. मात्र, या उपक्रमासाठी शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी प्राथमिक शिक्षण संचालनालयाची परवानगीच घेतली नाही. त्यामुळे शेख यांचे यासंदर्भातील स्पष्टीकरण मागविणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी दिली.

शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शेख यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘गुढीपाडवा, शाळेत प्रवेश वाढवा’ या टॅगलाइनवर ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उपक्रम यशस्वी होण्यासाठी आणि पालक-शिक्षक यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी शाळेत ‘हळदी-कुंकू’सारखे कार्यक्रम घेण्याच्या अफलातून सूचना शेख यांनी गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांना दिल्या आहेत. गुढीपाडवा २८ मार्चला आहे. त्यामुळे हा उपक्रम गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांनी २७ ते ३१ मार्चदरम्यान राबवायचा आहे. ‘गुढी पाडवा, शाळेत प्रवेश वाढवा’ अशी भन्नाट ‘टॅगलाइन’च या उपक्रमाला दिली आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षकांनी शाळेत हळदी-कुंकूसारखे विविध कार्यक्रम घ्यावेत, शाळेचे वातावरण प्रफुल्लित व स्वच्छ ठेवावे, शाळांचे सुशोभीकरण करावे अशा सूचना पत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्यापेक्षा नको त्या गोष्टींकडे लक्ष दिले जात असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

शिक्षकांना सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आज सोमवारी २७ ते ३१ मार्चदरम्यान विद्यार्थ्यांच्या घरी भेटी द्यायच्या आहेत. त्यामुळे शिक्षकांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे. यासंदर्भात नांदेडे म्हणाले, ‘२२ जून २०१५ रोजी एक शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयानुसार सर्व उपक्रमांना फाटा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी व विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठीच्या उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या स्तरावर कोणताही उपक्रम राबवत असताना त्याला प्राथमिक शिक्षण संचालनालयातून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, या उपक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. सर्व धर्मीयांना बरोबर घेऊनच शैक्षणिक धोरणे ठरविण्यात आलेली असतात. त्यामुळे शाळेमध्ये धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंधच करण्याचा प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी नको ते उपक्रम करण्यापेक्षा जर शाळेची गुणवत्ता चांगली असेल तर विद्यार्थी आपोआप शाळेत येतील.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वजनदार’ व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांचे ‘पारदर्शक’ भाषण

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे
सहकाराचे आ​णि त्यात साखर कारखानदारांच्या ‘वजनदार’ व्यासपाठीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पारदर्शक’ भाषण करत राज्यातील साखर कारखानदारीची सद्यस्थिती दस्तुरखुद्द माजी केंद्रीयमंत्री शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनाच समजावून सांगितली. ‘शेतकऱ्यांना ९८ टक्के ‘एफआरपी’ रक्कम दिली असल्याचे सांगत कारखान्यांनी गुंतवणूक आणि परताव्याचा विचार करूनच सहवीज निर्मिती प्रकल्प उभारावेत,’ असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.
विधीमंडळाच्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ‘सरकार विरुद्ध विरोधक’ यांच्यात जोरदार धुमचक्री सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा व पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राजकीय टोलेबाजीची शक्यता होतीच. फडणवीस यांनी ही संधी सोडली नाही. व्यासपीठावर बोलण्यास उभे राहिल्यावर त्यांनी उपस्थित मान्यवरांचा नामोल्लेख केला आणि पॉज घेतला. व्यासपीठाकडे वळून पाहत ‘चुकून कोणाचे नाव नाही ना राहिले घ्यायचे? हे वजनदार व्यासपीठ आहे, कोणाचे नाव राहिलेच, तर ते माझ्यासाठी अडचणीचे ठरेल,’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा ​पिकला.
मुख्यमंत्री मैदान मारण्यासाठी तरबेज तर आहेतच, त्यात साखर सम्राटांच्या व्यासपीठावर ते बॅटिंग करत होते. त्यांनी ‘पारदर्शी’ हा शब्द उच्चारला तेव्हा साउंडमधून एकाकी कर्कश आणि मोठा आवाज आला. त्यावर टिप्पणी केली नाही तर फडणवीस कसले. ते म्हणाले, ‘पाहा, पारदर्शी शब्द उच्चारल्यावर किती मोठा आवाज होतो.’ या वेळी व्यासपीठावरील सर्वांना हसू आवरले नाही. मात्र, त्याचवेळी शरद पवार यांनी अगदी साधेपणाने कारखानदारीची सद्यस्थिती, भविष्य, शेतकऱ्यांपुढील प्रश्नांवर भाष्य केले.
पवार यांनी साखर उत्पादनात महाराष्ट्र मागे पडल्याचे तसेच साखर कारखान्यांनी निर्माण केलेली वीज सरकार खरेदी करत नसल्याने कारखाने अडचणीत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. पवारांच्या या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात टिप्पणी केली. ते म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेशात साखरचे उत्पादन वाढले असले, तरी आपली साखर कारखानदारी शेतकऱ्यांच्या हिताची आहे. आपण ‘एफआरपी’च्या ९८ टक्के दर शेतकऱ्यांना दिला आहे.’
‘मध्यावधी निवडणुकांची चर्चा ही भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) दबावतंत्राचा वापर करण्यातसाठी केली जात आहे,’ असे पवार म्हणाले. त्याबाबत पवार यांना विचारले असता, ‘मध्यावधी निवडणुकीची चर्चा म्हणजे केवळ भाजपकडून केला जाणारा दबावतंत्राचा वापर आहे,’ असे पवार यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. तर, ‘काँग्रेसमधील अंतर्गत प्रश्न आम्ही पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करून सोडवू,’ असे पंतगराव कदम या वेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंपरीला स्थायीच्या अध्यक्षपदी सावळे निश्चित

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या सीमा सावळे यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. अध्यक्षपदासाठी सावळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (३१ मार्च) निवडणूक होणार आहे. समितीमध्ये १६ सदस्यांपैकी भाजपचे सर्वाधिक दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि शिवसेना, अपक्ष यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. केवळ उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबतची उत्सुकता होती. पक्षातर्फे सावळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे चार उमेदवारी अर्ज सादर केले. या वेळी महापौर नितीन काळजे, पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, माजी महापौर आझम पानसरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार उपस्थित होते. सावळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. त्याची औपचारिक घोषणा पीठासीन अधिकारी आणि साखर आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत होणार आहे.
महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. शिवाय समितीमध्ये पक्षाचे निर्विवाद बहुमत आहे. ‘विजयासाठी पुरेसे संख्याबळाचे गणित जुळत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्थायी समितीची निवडणूक लढणार नाही,’ असे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे सावळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सावळे तिसऱ्यांदा महापालिकेवर निवडून आल्या आहेत. समितीतील ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांना अध्यक्षपदाचा मान देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी दोनदा त्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या. यावेळी भाजपच्या तिकिटावर इंद्रायणीनगर प्रभागातून निवडून येऊन त्यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणून सावळे यांनी त्या पक्षाला जेरीस आणले होते. आता पारदर्शक कारभाराचे आश्वासन देणाऱ्या भाजपने सावळे यांच्याच हाती महत्त्वाचे पद दिले आहे. त्यामुळे त्यांच्या कारभाराकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
‘स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आमदार महेश लांडगे यांनी सावळे यांचे नाव सुचविले होते. त्याला मी अनुमोदन दिले. त्यामुळे पक्षात कोणत्याही गटातटाचे राजकारण न करता ही निवड झाली आहे,’ असे पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, महापालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर शहर भाजपमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. आमदार जगताप यांच्या कट्टर समर्थक सावळे यांना अध्यक्षपद देऊन आमदार लांडगे यांना शह दिल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे. विशेष म्हणजे, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सत्तारूढ पक्षनेता ही महत्त्वाची तिन्ही पदे भोसरी विधानसभा मतदारसंघाकडे असल्यामुळे अंतर्गत शह-काटशहाचे राजकारण भविष्यात अधिक रंगणार असल्याचीही कुजबूज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा दशकातील उच्चांकावर

$
0
0

शहराच्या मध्यवर्ती भागांत ३९.७ अंश तापमानाची नोंद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील पारा गेल्या दहा वर्षांतील सर्वांत उच्चांकी पातळीवर पोहोचलाआहे. सोमवारी शहराच्या मध्यवर्ती भागात ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. उत्तर आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता असून, पुण्यात मंगळवारी पारा चाळिशी ओलांडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.
पुण्यात गेल्या एक-दीड आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यातच तापमान पस्तीस अंशांच्या घरात होते. मात्र, आता पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने पुणेकरांना कडक उन्हाळा सहन करावा लागत आहे. तीव्र उन्हामुळे सकाळी अकरापूर्वीच रस्त्यावरील रहदारी कमी झाल्याचे दिसून येत आहे. कामासाठी बाहेर पडावे लागणारे नागरिक टोप्या, सनकोट, गॉगल, छत्री अशा तयारीनेच सावलीचा आडोसा शोधत बाहेर पडताना दिसत आहेत. उन्हामुळे होणारी काहिली शमविण्यासाठी रसवंती गृह, आइस्क्रीम पार्लर, ताक, सरबताची दुकाने आणि जलतरण तलावावर गर्दी होत आहे. सायंकाळी उन उतरल्यानंतरच रस्त्यावरील रहदारी वाढताना दिसत आहे.
‘आयएमडी’ने यंदा पहिल्यांदाच उन्हाळ्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरण्याची शक्यता असून, यंदा देशातील बहुतांश राज्यांत उष्णतेची लाट (हीट वेव्ह) राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचबरोबर देशातील बहुतांश भागांत तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाजही भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. यामध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याचाही समावेश आहे. त्यानुसार सध्या सर्वत्र तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे चित्र आहे.
राज्यात विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणचा काही भाग आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
सोमवारी राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला व चंद्रपूर येथे (प्रत्येकी ४३ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. जळगाव येथे ४२, कोल्हापूर येथे ३९.२, महाबळेश्वर येथे ३५.९, मालेगाव येथे ४२.२, सांगली येथे ३९.२, सोलापूर येथे ४१.३, सांताक्रूझ येथे ३८.४, रत्नागिरी येथे ३२.४, उस्मानाबाद येथे ४१.१, नांदेड येथे ४२, अकोला येथे ४३, चंद्रपूर येथे ४३, नागपूर येथे ४०.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.

यंदाचा उन्हाळा ठरणार असह्य
पुढील चार दिवस राज्यात हवामान कोरडे राहील. दरम्यान, सेंटर फॉर सिटिझन सायन्सच्या (सीसीएस) ‘सतर्क’ या सुविधेअंतर्गत उष्माघाताचा धोका असणाऱ्या भागांसाठी दोन दिवस आधीच सावधानतेची सूचना देणारा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुढील तीन दिवस पुण्यात कमाल तापमान ३९ ते ४१ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असल्याने हा उकाडा पुणेकरांसाठी असह्य ठरण्याची शक्यता ‘सतर्क’तर्फे वर्तविण्यात आली आहे.

गेल्या दहा वर्षातील मार्च महिन्यातील सर्वात उच्चांकी कमाल तापमान

वर्ष तापमान (अंश सेल्सिअस)

२०१६ ३९.१

२०१५ ३८

२०१४ ३८.८

२०१३ ३६.९

२०१२ ३९.१

२०११ ३८.१

२०१० ३९

२००९ ३९

२००८ ३८.६

२००७ ३९.६

पुणे कमाल तापमान

दिनांक तापमान (अंश सेल्सियस)

२७ मार्च ३९.७

२६ मार्च ३८.८

२५ मार्च ३८.३

२४ मार्च ३७.७

२३ मार्च ३६.९

२२ मार्च ३६.४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणे बोर्डाप्रमाणे प्रकल्प राबवावेत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नोकरदार महिलांसाठी वसतिगृह उभारण्यामध्ये बोर्डाने पुढाकार घेतला आहे. समाजासाठी सातत्याने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्मार्ट कँटोन्मेंटमध्ये ही पुणे कँटोन्मेंट बोर्डाने आघाडी घेतली आहे. अन्य कँटोन्मेंट बोर्डांनीदेखील पुणे बोर्डाप्रमाणे प्रकल्प उभारावेत,’ असे आवाहन लष्कराच्या मालमत्ता विभागाचे महासंचालक जोजनेश्वर शर्मा यांनी केले.

कॅंटोन्मेंट बोर्डातर्फे बाबाजान दर्ग्याजवळील कँटोन्मेंटच्या जागेत महिला वसतिगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन शर्मा यांच्या हस्ते झाले. या वेळी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी, दक्षिण मुख्यालयाच्या मालमत्ता विभागाच्या मुख्य संचालक गीता परती, संचालक भास्कर रेड्डी, के. जे. एस. चौहान, मालमत्ता विभागाचे अधिकारी राजेंद्र पवार, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. डी. एन. यादव, खडकीचे सीईओ अमोल जगताप, देहूरोड कँटोन्मेंटचे सीईओ अभिजित सानप, नगर कँटोन्मेंटचे सीईओ विनीत रोडे, बोर्डाचे सदस्य दिलीप गिरमकर, विनोद मथुरावाला, विवेक यादव, डॉ. किरण मंत्री, प्रियांका श्रीगिरी, रूपाली बिडकर उपस्थित होत्या.

या वेळी जोजनेश्वर शर्मा म्हणाले, ‘ग्रामीण भागातून येऊन शहरात नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. अशा महिलांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच केंद्र सरकारने महिला वसतिगृहाचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. वसतिगृह बांधल्यानंतर महिलांना सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी कँटोन्मेंटची आहे.’

परती म्हणाल्या, ‘नोकरदार महिलांना सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे. त्या दृष्टिने हे वसतिगृह महिलांसाठी महत्त्वपूर्ण असेल.’ ब्रिगेडिअर त्यागी यांनी विविध कामांचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, ‘आपल्या कारकिर्दीत १४ प्रकल्पांपैकी १३ प्रकल्पांना आर्थिक मंजुरी मिळाली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाला मालमत्ता विभागाने मंजुरी द्यावी.’

उपाध्यक्ष निवडीला राज्यमंत्र्यांना वेळ मिळेना?

पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर यांनी बोर्डाच्या उपाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला आहे. परंतु, कँटोन्मेंट बोर्डाचे आमदार सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना वेळ मिळत नसल्याचे सांगण्यात येत असून त्यासाठी उर्वरित सदस्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

गिरमकर यांच्या जागी बोर्डाचे उर्वरित सदस्य अतुल गायकवाड, विवेक यादव प्रियांका यादव यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात माळ पडणार, याची चर्चा सध्या बोर्डात सुरू आहे. पुणे कँटोन्मेंट बोर्डाची ११ जानेवारी २०१५ला निवडणूक झाली आहे. त्याचे परिपत्रक ११ फेब्रुवारी २०१५मध्ये काढण्यात आले. त्यानंतर त्या वर्षी ३ मार्चला माजी उपाध्यक्ष डॉ. किरण मंत्री यांची निवड करण्यात आली. ३ मार्च २०१६ला त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा ९ मार्चला स्वीकारण्यात आला. पुढील उपाध्यक्षपदाची १५ मार्च २०१६ला निवड होऊन दिलीप गिरीमकर यांची निवड करण्यात आली. आता ३ मार्चला या वर्षी त्यांची मुदत संपली होती. गिरमकर यांनी १६ मार्चला राजीनामा दिला. परंतु, अद्यापही त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही.

बोर्डाच्या सर्वसाधारण सभेची बैठक २९ मार्चला होणार आहे. त्या बैठकीतही गिरमकर उपाध्यक्षपदी राहणार आहेत. बोर्डाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीचे अधिकार आमदार सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे आहेत. सध्या ते अधिवेशनात व्यग्र असल्याने त्यांना उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी वेळ मिळत नसल्याचे सांगण्यात येते. परंतु, निवड होण्यास विलंब होत असल्याने उर्वरित सदस्यांना उपाध्यक्ष म्हणून काम पाहण्यास कमी कालावधी मिळण्याची शक्यता आहे. त्याकरिता लवकर ही निवड करावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅप्रेंटिस पेपरफुटी चौकशीचे आदेश

$
0
0

संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ट्रेड अॅप्रेंटिस भरती परीक्षेचा नॉन आयटीआय गटातील पेपर परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याची माहिती आमच्या विभागापर्यंत आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत,’ अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी नुकतीच ‘मटा’ला दिली.
ऑर्डनन्स फॅक्टरी रिक्रुटमेंट सेंटरमार्फत देशातील विविध ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ट्रेड अॅप्रेंटिस पदासाठी रविवारी ‘आयटीआय’ आणि ‘नॉन आयटीआय’ गटात परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा परीक्षा पुण्यासह भुवनेश्वर, चेन्नई, कोइमतूर, दिल्ली, हैदराबाद, जबलपूर, कोलकाता, कानपूर, मुंबई, नागपूर आणि त्रिची केंद्रांवर घेण्यात आली. मात्र, ‘ट्रेड अॅप्रेंटिस’ भरती परीक्षेचा ‘नॉन आयटीआय’ गटातील पेपर परीक्षेच्या एक दिवस आधीच म्हणजे शनिवारी फुटून व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला. तसेच, व्हायरल झालेल्या पेपरमधील काही प्रश्न रविवारी झालेल्या पेपरमध्ये ‘सेम टू सेम’ होते, असे परीक्षार्थ्यांनी सांगितले. परीक्षा ही दोन सत्रात तसेच प्रश्नपत्रिका ही तीन सेटमध्ये असल्याने प्रत्येक प्रश्नपत्रिकेत व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न होते. ‘मटा’ने ‘ट्रेड अॅप्रेंटिस’ भरती परीक्षेचे सविस्तर वृत्त रविवारी आणि सोमवारच्या अंकात प्रसिद्ध केले आहे..
‘ट्रेड अॅप्रेंटिस’ भरती परीक्षेचा ‘नॉन आयटीआय’ गटातील पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याची माहिती आणि तक्रारी माझ्यापर्यंत तसेच आमच्या विभागापर्यंत आल्या आहेत. त्यामुळे या भरती परीक्षेत नेमके काय झाले आहे, याची शहानिशा करण्यासाठी संपूर्ण प्रकणाची चौकशी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी ही तत्काळ करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे डॉ. भामरे यांनी सांगितले. दरम्यान, ‘ट्रेड अॅप्रेंटिस’ भरती परीक्षेचा पेपर पुण्यातून फुटल्याची चर्चा रविवारी शहरातील परीक्षा केद्रांवर होती. परीक्षेला हजारो विद्यार्था बसले होतो. त्यामुळे याबाबत विद्यार्थी संघटना रिक्रुटमेंट सेंटर तक्रारी करण्याच्या तयारीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथारी व्यावसायिकांवर अखेर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गर्दीच्या रस्त्यांवर दुहेरी पार्किंग करणारे वाहनचालक... वाहतूक कोंडीतही नो-एंट्रीतून विरूद्ध दिशेने जाणारे दुचाकीस्वार... फूटपाथवर अतिक्रमण करून पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर अखेर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन रोड) सोमवारी सायंकाळी पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्वतःच कारवाईत सहभागी होऊन वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला.
जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावर दुहेरी पार्किंग करण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. त्यात फूटपाथवर पथारी व्यावसायिकांकडून अतिक्रम होत असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी वाहनचालकांना जाण्यासाठी पुरेसी जागा मिळत नसल्याने गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज गेट दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी गर्दीच्या रस्त्यांवर कारवाईचा बडगा उगारला. सोमवारी सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावर कारवाई करण्यात आली.
डॉ. मुंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पादचाऱ्यांना चालण्यासाठी फूटपाथ मोकळा करण्याचा प्रयत्न केला. तसेच, दुहेरी पार्किंग करणारे वाहन चालक, दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. ही कारवाई सायंकाळी सातनंतर सुरू करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images