Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वाळू भरलेले वाहन पकडल्यावर पडते बंद

$
0
0

पुणे ः अवैध वाळू उपसा करणारी वाहने पकडल्यानंतर ती जप्त होऊ नयेत, म्हणून वाळू माफियांनी नवीन शक्कल लढवली आहे. वाहने पकडल्यावर मोबाइल रिमोटद्वारे ते जागेवरच बंद पाडण्याचे प्रकार वाळू माफियांकडून होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता भरारी पथकासोबत प्रशासनाला पोलिसांसह मोबाइल रिमोटने बंद पाडलेली वाहने दुरुस्त करणारे मेकॅनिक बरोबर घेऊन कारवाई करावी लागत आहे.
जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. बेकायदा वाळू उपसा करणारी वाहने पकडण्यासाठी भरारी पथकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. मात्र, पकडलेली वाहने पथकाला जप्त करता येऊ नयेत, यासाठी मोबाइल रिमोटच्या साह्याने वाहने जागेवर बंद पाडण्याचे तंत्रज्ञान वाळू माफियांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संबंधित वाहने भरारी पथकांना जप्त करणे अवघड होत आहे.
जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू उपसा होणाऱ्या संवेदनशील ठिकाणी पथकांची गस्त वाढविली आहे. या पथकांमध्ये तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्याबरोबर शस्त्रधारी पोलिस ताफा देण्यात आला आहे. त्यांना कारवाई करण्यात अडचण येऊ नये म्हणून अत्याधुनिक वाहने पुरविण्यात आली आहेत. त्यामुळे वाळू माफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. बंद केलेले वाहन हलविता येत नसल्याने अधिकाऱ्यांपुढे प्रश्न निर्माण होऊ लागला होता. त्यावर उपाय म्हणून आता या पथकांसोबत मेकॅनिक देण्यात आले आहेत. वाळू माफियांनी मोबाइल रिमोटद्वारे वाहने बंद केली, तरी मेकॅनिकच्या साह्याने ते दुरुस्त करून जप्त करण्यात येत असल्याचे ​जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मा‌फियांकडून मोबाइल रिमोट यंत्रणा कार्यान्वित
वाळू माफियांकडून वाहन सुरू करण्याच्या मुख्य बटणामध्ये इलेक्ट्राॅनिक चीप लावण्यात आलेली असते. भरारी पथकाकडून वाहन पकडण्यात आल्यावर संबंधित वाहनचालक पळून जातो. त्यानंतर मोबाइलमध्ये असलेल्या चीपच्या माध्यमातून वाहनाचे इंजिन बंद करण्यात येते. त्यामुळे वाहन पुन्हा सुरू करणे अवघड होते. मात्र, आता मेकॅनिकच्या साह्याने वाहने सुरू केली जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्य नाट्य स्पर्धेत पुण्याचा संघ प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्याच्या सांस्कृतिक संचलनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याच्या ‘एमएच १२ जे १६’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावून यंदाचे विजेतेपद मिळवले आहे. नाशिकच्या ‘गांधीहत्या आणि मी' या नाटकास द्वितीय आणि ओम क्रिएशन, पुणे या संस्थेच्या ‘डेहिल्स क्लॉ’ या नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
२२ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान पुण्यातील भरत नाट्य मंदिर व टिळक स्मारक मंदिर येथे ही स्पर्धा पार पडली. त्यामध्ये राज्यातील आणि बृहन्महाराष्ट्रातील अनेक केंद्रांवर प्राथमिक फेरीत प्रथम क्रमांक पटकावलेले २२ संघ अंतिम फेरीत सहभागी झाले होते. त्यातून परीक्षकांनी तीन नाटकांची निवड केली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विश्वास मेहेंदळे, मनोहर जोशी, सुरेश गायधनी, हेमंत एदलाबादकर आणि वसुधा देशपांडे यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे. लवकरच राज्य शासनातर्फे होणाऱ्या कार्यक्रमात स्पर्धेचे पारितोषिक वितरण केले जाणार आहे. भरत डाके यांनी पुण्याच्या स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

सागर रौप्यपदकाचा मानकरी पण...
यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत चटका लावून जाणारी एक घटना घडली. कोल्हापूर केंद्रातून अंतिम फेरीत दाखल झालेल्या सागर चौगुले या कलाकाराचा टिळक स्मारक मंदिर येथे ऐन प्रयोगात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नाटकाचे सादरीकरण सुरू असताना त्याच्या अभिनयाचे कौतुक होत होते. अंतिम फेरीतील अभिनयाचे रौप्यपदकाचा तो मानकरी ठरेल अशी, चर्चा होती. पण काळाने त्याच्यावर रंगमंचावरच घाला घातला. मात्र, त्याच्या दमदार अभिनयासाठी सागरला स्पर्धेचे रौप्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने ते स्वीकारण्यासाठी सागर या जगात नाही.

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
दिग्दर्शन : प्रथम - सुबोध पंडे (एमएच - १२ जे १६), द्वितीय - मिलन राठोड (डेहिल्स क्लॉ), तृतीय - अनिल बांदोडकर (काठाघोडा), नेपथ्य : प्रथम - अरुण कदम (कॅप्टन-कॅप्टन), द्वितीय हिंदुराव पाटील (अग्निदिव्य), तृतीय- दीपक ओहोळ (मानसीचा शिल्पकार तो), प्रकाश योजना : प्रथम शीतल तळपदे (काठा घोडा), द्वितीय गोरक्षनाथ राणे (काळीमा), तृतीय - मिलन पाटील (विठ्ठल विठ्ठल), संगीत दिग्दर्शन : प्रथम - भानुदास गायकवाड (बैल अबोलबाला), द्वितीय - तेजस बिल्दिकर (गांधी हत्या आणि मी), तृतीय - नितीन काशीकर (एमएच- १२ जे-१६), उत्कृष्ट अभिनय : (रौप्यपदक) सागर चौगुले (अग्निदिव्य), जयदीप मुजुमदार (एमएच-१२ जे-१६), गोपाळ जोशी (नाटक- एझिट), शिवशैलेश कोरडे (एक परी), स्त्री कलाकार :- सोनल शिंदे (कॅप्टन-कॅप्टन), ज्योती राऊळ (विठ्ठल विठ्ठल), वैशाली पिंपळखरे (एमएच-१२ जे-१६), अश्विनी तडवळकर (वारुठ), सुप्रिया उकिडवे (एक्झिट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानभवनात बैलगाडी नेण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी विधानभवनात बैलगाडीने ‘एन्ट्री’ करण्याचा प्रयत्न सोमवारी केला. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने लांडगे यांना बैलगाडी घेऊन विधान भवनात जाता आले नाही. दरम्यान, ही बंदी उठविण्यासाठी विधेयक आणण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे लांडगे यांनी सांगितले.
तमिळनाडूतील जलीकट्टूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत विधेयक मंजूर करून अध्यादेश काढण्याचे आश्वासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती लांडगे यांनी दिली. राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडण्यात येणार आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लांडगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील गाडामालक बैलगाडा घेऊन अधिवेशनात धडक देणार होते. या वेळी मावळचे आमदार बाळा भेगडे, तालुकाध्यक्ष अतुल देशमुख आणि अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर यांच्यासह राज्यातील बैलगाडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस अधीक्षकांनी बैलगाडा विधानभवन परिसरात आणण्यास मनाई केली. ही गोष्ट समजल्यावर मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट विधानभवनातून भाजप कार्यालयासमोर आले आणि त्यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारले.
लांडगे म्हणाले, ‘बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्रातील एक संस्कृती आहे. शर्यतीसाठी शेतकरी बैलांना विशेष प्रशिक्षण देतात. शेतीच्या कामाला शर्यतीचे बैल उपयोगात येत आहेत. शर्यतीचे बैल सांभाळणे आर्थिकदृष्ट्या जोखमीचे असते. बैलगाडा शर्यत बंद झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तसेच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी, अशी राज्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमआरडीए’चे बनावट फेसबुक पेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) बनावट फेसबुक पेज तयार करून ते अधिकृत असल्याचे भासविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बनावट फेसबुक पेजवर नागरिकांनी तक्रारी किंवा मेसेज पाठवू नयेत, असे आवाहन ‘पीएमआरडीए’च्या वतीने करण्यात आले आहे.
‘पीएमआरडीए’ची www.pmrda.gov.in ही अधिकृत वेबसाइट आहे. मात्र, कोणीतरी www.punemetro politanregionaldevelo.elisting.in या नावाने बनावट फेसबुक पेज तयार केले आहे. हे फेसबुक पेज ‘पीएमआरडीए’कडून सुरू करण्यात आले असल्याचे भासविण्यात आले आहे. त्यावर नागरिकांकडून येणाऱ्या मेसेजना तिऱ्हाईत व्यक्तींमार्फत प्रतिसाद देण्यात येत आहे. संबंधित व्यक्तींविरूद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यालय औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड भवन येथे असून, शाखा कार्यालय पाषाण येथील साई ट्रिनिटी, वेस्ट विंग येथे कार्यरत आहे. बनावट फेसबुक पेज तयार करून त्यावर नागरिकांकडून तक्रारी किंवा
मेसेज आल्यानंतर त्यावर नकारात्मक पोस्ट अपलोड करून ‘पीएमआरडीए’ची प्रतिमा मलीन करण्यात आली आहे. संबंधित बनावट फेसबुक पेजवर नागरिकांनी मेसेज
किंवा तक्रारी पाठवू नयेत, असे आवाहन ‘पीएमआरडीए’कडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर पेपर सुरू झाल्यानंतर उशिरा जाणाऱ्या विद्यार्थ्यांची यादीच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तयार करणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच व्हॉट्स अॅपवरून प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
मंडळाच्या वतीने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी ही माहिती दिली. दहावीची परीक्षा आजपासून (दि. ७) सुरू होत आहे.
परीक्षा केंद्रात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र याद्या तयार करून त्याचे रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. जे विद्यार्थी प्रत्येक विषयाच्या पेपरला उशिरा येत आहेत, अशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल. परीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्यात तसेच व्हॉट्स अॅपवरून प्रश्नपत्रिका व्हायरल करण्यात विद्यार्थ्यांचा काही संबंध आहे का, हे पाहण्यासाठी रेकॉर्ड तपासण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर शिक्षक, विद्यार्थ्यांनी मोबाइल नेऊ नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या असल्याचे म्हमाणे यांनी सांगितले.

तपास लवकरच
बारावीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सर्वाधिक व्हायरल मुंबई विभागातून होत आहेत. या गुन्ह्यात सापडणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध मंडळ फौजदारी कारवाई करत आहेत. काही दिवसांपूर्वी व्हॉट्स अॅपवरून प्रश्नपत्रिका व्हायरल कारणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम सेलकडे तक्रार दिली असून त्याबाबत तपास सुरू आहे. प्रश्नपत्रिका व्हायरल कशी झाली याची माहिती लवकरच मिळेल, असे म्हमाणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपरफुटी केंद्रांवरून?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बारावीच्या पेपरच्या प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी फुटून व्हॉट्स अॅपवरून व्हायरल होत आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ठोस उपाययोजना आखण्याऐवजी केवळ कारवाई करण्याचे पोकळ आश्वासन देत असल्याचे चित्र आहे. ‘परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि परीक्षा केंद्रांची संख्या लक्षात घेता केंद्र संचालक व्हॉट्स अॅपवरून पेपर व्हायरल करण्याची शक्यता असू शकते,’ अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सोमवारी दिली. दरम्यान, बारावीच्या पेपरफुटीच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज, मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे.

मंडळाद्वारे दहावीच्या परीक्षेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी म्हमाणे आणि मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील उपस्थित होते. आजपासून सुरू होणारी परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळाद्वारे १ एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहे. राज्यात एकूण १७ लाख ६६ हजार ०९८ जण परीक्षा देणार असून त्यामध्ये ९ लाख ८९ हजार ९०८ विद्यार्थी; तर ७ लाख ७६ हजार १९० विद्यार्थिनी आहेत. परीक्षा देण्यासाठी राज्यात एकूण ४ हजार ७२८ परीक्षा केंद्रे आहेत. दरम्यान, एकूण विद्यार्थ्यांपैकी ६४ हजार ४१६ पुनर्परीक्षार्थी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या ३८ हजार ६०२ वे वाढली आहे. ही वाढ २.२३ टक्क्यांची आहे.

परीक्षा काळात होणाऱ्या कॉपी प्रकरणांना आळा बसावा, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सात याप्रमाणे २५० भरारी पथके नेमण्यात आली आहे. राज्यात अपंग प्रवर्गातून एकूण ७ हजार ४१४ विद्यार्थी परीक्षा देत असून त्यांना सोयीचे परीक्षा केंद्र, वेळेची सवलत, लेखनिक, विषय योजना आदी सवलती देण्यात आल्या आहेत, असे म्हमाणे यांनी सांगितले. दरम्यान, पेपर सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका फुटून दररोज व्हॉट्स अॅपहून व्हायरल होत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी मंडळ आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांची संख्या आणि परीक्षा केंद्रांची संख्या लक्षात घेता केंद्र संचालक व्हॉट्स अॅपहून पेपर व्हायरल करण्याची शक्यता असू शकते, असे म्हमाणे यांनी सांगितले. या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व विकास करण्याच्या दृष्टीने इंग्रजी भाषा विषयाप्रमाणेच मराठी, हिंदी, संस्कृत या भाषा विषयांना कृ‌तिपत्रिका लागू करण्यात आली होती. त्यानुसार यंदाची दहावीची परीक्षा सर्व भाषा विषयांसाठी ‘कृती पत्रिका’ असणारी पहिली परीक्षा राहणार आहे. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे म्हमाणे यांनी सांगितले. दरम्यान, व्हॉट्स अॅपवरून फिरणाऱ्या विविध प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन म्हमाणे यांनी केले.

दहावीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पेपर सुरु होण्यापूर्वी काही मिनिटांपूर्वी व्हॉट्स अपहून व्हायरल होऊ नये, यासाठी मंड‍ळाने विशेष खबरदारी घेतली आहे. एखाद्या केंद्रांहून संबंधित विषयांची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यास केंद्र प्रमुख आणि केंद्र संचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, संबंधित प्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात येईल. लातूर येथील परीक्षा केद्रांवर झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांची बदली करण्यात आली आहे, असे म्हमाणे यांनी सांगितले.


विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक

पुणे - ९४२३०४२६२७
अमरावती - ०७२१ -२६६२६०८
नागपूर - ०७१२ -२५६५४०६, २५५३५०७,२५५३५०३
औरंगाबाद - ९४२२७१५५४६
मुंबई - ०२२ - २७८९३७५६, २७८८१०७५
नाशिक - ०२५३ - २५९२१४३
कोल्हापूर - ०२३१ - २६९६१०१,०२,०३
लातूर - ०२३८२ - २५१६३३
कोकण - ०२३५२ - २२८४८०

....

राज्यस्तर - ०२० -२५७०५२७१, ७२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. धनागरे यांचे निधन

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचे चिंचवडमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, सुना आणि नात असा परिवार आहे.

गेल्या महिन्यात पुद्दुचेरी येथे व्याख्यान देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यानच्या काळातही त्यांच्या भेटी गाठी व लिखाण सुरू होते. त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रियाही करण्यात येणार होती. मंगळवारी चिंचवडमधील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांचे डायलिसिस सुरू होते, त्याचवेळी रक्तदाब कमी होऊन त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. धनागरे यांचा जन्म व महाविद्यालयीन शिक्षण वाशीम येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी नागपूरची वाट धरली. अमेरिकेतील प्रतिष्ठित एमआयटी विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रातील उच्चशिक्षणही घेतले. त्यानंतर आग्रा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून ते रूजू झाले. पुढील काळात कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्राध्पापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष अध्यापन केले. त्यानंतर तत्कालिन पुणे विद्यापीठात ते रूजू झाले. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी त्यांची निवड झाली. त्यांची ही कारकीर्द खूप गाजली. भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीच्या जीवनगौरव पुरस्कारासह अन्य काही संस्थांचे जीवनगौरव तसेच अन्य पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे ते विश्वस्त होते. त्याचबरोबर विदर्भवासी पुणे निवासी या संघटनेसह काही संस्थांमध्ये ते कार्यरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्पदंशाबाबत जागृतीचा वसा

$
0
0

पुणे : साप दिसला, तर पुरुषांचीही घाबरगुंडी उडत असताना एका महिलेने सर्पदंशाबाबतच्या अंधश्रद्धा दूर करून जनजागृती करण्यासाठी चळवळ उभारली आहे. सर्पदंशाबाबतच्या अंधश्रद्धा दूर करणे, प्रथमोपचाराची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे, देशातील हॉस्पिटलमध्ये प्रतिविष उपलब्ध करून देणे, या उद्देशाने मुंबईच्या प्रियांका कदमने स्नेकबाइट हीलिंग अँड एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली असून छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये प्रियांकाचे काम सुरू आहे.
याबाबत बोलताना प्रियांका म्हणाली, ‘सर्पदंशाशी अनेक सामाजिक आणि आर्थिक बाबीही निगडीत आहेत. सर्पदंश झाल्यावर घ्यावयाची काळजी, प्रथमोपचार याची माहिती लोकांना मिळावी, याबाबत असणारे गैरसमज दूर व्हावेत, हा संस्था स्थापनेच्या मागे मुख्य हेतू आहे.’
सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी व्हावेत, या हेतूने प्रियांकाने नियोजनबद्ध कार्यक्रम राबविणे सुरू केले आहे. त्याअंतर्गत देशातील विविध भागांमधील शाळा-कॉलेजांमध्ये, वाड्या-वस्त्यांवर व्याख्याने आयोजित करणे, हॉस्पिटलमध्ये प्रतिविष ची उपलब्धता करून देणे, सापांबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे असे उपक्रम देशभरात राबविण्यात येतात.
प्रियांका कदम मूळची मुंबईची आहे. पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर तिने सर्टिफाइड अँटी मनी लाँडरिंग स्पेशालिस्टचे सर्टिफिकेशन घेतले. त्याशिवाय मुंबई विद्यापीठातून ह्युमन राइट्सवरील पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमाही केला आहे. पक्षिनिरीक्षण आणि भारतीतील सर्प हे दोन्ही विषय ती छंद म्हणून अभ्यासत होती. सापांविषयी तिला अधिक कुतूहल होते. त्यामुळे ती ज्येष्ठ सर्पतज्ज्ञ रोम्युलस व्हिटेकर यांच्या सर्पविषयक एका कार्यशाळेत सहभागी झाली. त्या कार्यशाळेत तिला भारतात दर वर्षी ५० हजार जणांचा सर्पदंशाने मृत्यू होत असल्याची माहिती समजली आणि या गंभीर समस्येबाबत भारतात जनजागृती करण्याचा निश्चय तिने केला. त्यासाठी तिने स्नेकबाइट हिलिंग अँड एज्युकेशन सोसायटी या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.
याबाबत बोलताना प्रियांका म्हणाली, ‘मी ज्या वेळी काम सुरू केले, तेव्हा सर्पदंशावर काम करणारे खूप कमी लोक होते. सर्पदंश झाल्यावर नेमके काय करावे, याची माहिती अनेकांना नसते. त्याचप्रमाणे सर्पदंशाबाबत अनेक अंधश्रद्धांचा विळखा आपल्या समाजाला आहे. माझ्या संस्थेच्या माध्यमातून मी या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करते आहे.’

अल्प दरात उपचारांसाठी प्रयत्नशील
भारतातील दुर्गम भागात सर्पदंशावर तातडीने उपचार मिळावेत, यासाठी त्या ठिकाणी असणाऱ्या मिशनरी हॉस्पिटलशी प्रियांकाने संपर्क साधला. विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर अॅक्टिव्हिटीद्वारे तिने या दुर्गम भागांमधील हॉस्पिटलमध्ये प्रतिविष उपलब्ध करून दिले आहे. याकरिता प्रियांकाने भारतातील प्रथम दोन क्रमांकाच्या प्रतिविष तयार करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला. तिच्या प्रयत्नांमुळे मिशनरी हॉस्पिटल्सना प्रतिविष आधी ज्या किमतींना मिळायचे त्यापेक्षा ४० टक्के कमी किमतीत मिळत आहे. हॉस्पिटलला ही प्रतिजैविके कमी दरात मिळावीत आणि पर्यायाने ती रुग्णालाही कमी पैशांत मि‍ळावीत अशा पद्धतीने हे काम चालते. यात कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी हॉस्पिटलमध्ये अँटी व्हेनम कोणासाठी वापरले गेले, त्याचा दर काय याची माहिती ती काटेकोरपणे ठेवते. या कामाचे ऑडिटही केले जाते, अशी माहितीही प्रियांकाने दिली.

सर्पदंश जनजागृतीची चळवळ स्वखर्चातून चालविण्यात येते. या उपक्रमात लोकही स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत. सर्पदंशाने भारतात होणारे मृत्यू कमी व्हावेत, सर्पदंश झाल्यावर हलगर्जीपणा होऊ नये आणि रुग्णाला तातडीने योग्य उपचार मिळावेत, यासाठी आमची संस्था प्रयत्नशील आहे.
- प्रियांका कदम, संस्थापक, स्नेकबाइट हीलिंग अँड एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका

$
0
0

पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, तरी आजही अनेक महिला छोटा किंवा मोठा निर्णय घेताना तो दुसऱ्यांना विचारूनच घेतात. सक्षम महिला म्हणून उभे राहायचे असेल, तर प्रत्येकीने स्वतःचे छोटे, मोठे निर्णय घ्यायला शिकले पाहिजे. घेतलेल्या निर्णयावर आपण ठाम आणि प्रामाणिक असू, तर कुटुंबातून आणि समाजाकडूनही आपल्याला प्रोत्साहन मिळते. प्रत्येकीने धाडसाने स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे, असे मत वकिलीच्या क्षेत्रात कार्यरत असलेली अॅड. भाग्यश्री गुजर-मुळे व्यक्त करते.
वकिलीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकील म्हणजे अॅड. भाग्यश्री गुजर. वकिलीच्या क्षेत्रात आता पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही आपला ठसा उमटविला आहे. ‘वकिलीच्या क्षेत्राची मनापासून आवड असल्यामुळे मी हे क्षेत्र​ निवडले. शाळा आणि कॉलेजमध्ये असताना अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी भाग घेतला होता. त्यामुळे अनेक विषयांची या निमित्ताने तोंडओळख झाली होती. वकिली करण्यासाठी मला कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळाला आहे. लग्नानंतर सासरच्या लोकांकडून आणि वकील असलेल्या पतीकडूनही प्रोत्साहन मिळते आहे. कोणतेही क्षेत्र असो तिथे तुमच्या कुटुंबीयांकडून मिळणारा पाठिंबा अधिक महत्त्वाचा असतो,’ असे अॅड. भाग्यश्री सांगते.
वकिलीच्या क्षेत्रात आलेल्या अनेक महिला वकील फौजदारी प्रॅक्टीसकडे फारशा गांभीर्याने पाहत नाहीत. कारण अशा केसमध्ये आरोपींशी जास्त संवाद साधावा लागतो. मात्र, सुरक्षिततेचे कारण आणि आरोपींकडून त्रास होण्याच्या शक्यतेमुळे अनेक महिला वकील फौजदारी प्रॅक्टीस पासून लांबच राहतात. मात्र, आता हे चित्रही बदलू लागले आहे. आपल्या पक्षकारांशी संवाद साधून योग्य ती माहिती घेऊन केस लढविण्यासाठी आपल्याला तयारी करता यायला पाहिजे, असे गुजर हिने सांगितले.
ज्युनिअर वकील म्हणून काम करताना सुरुवातीला वकिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वकिलांना त्यांच्या सीनिअरकडून पुरेसे स्टायपेंडही मिळत नाही. अशा परिस्थितीत वकिली करताना महिला म्हणून खंबीर राहावे लागते. सध्याच्या काळात वकिलीची पारंपरिक पद्धत बदलली आहे. आता तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अनेक केसचे दाखले सहज उपलब्ध होत आहेत, असे भाग्यश्री सांगते.
प्रॅक्टीस करताना वकिलाला सतत अभ्यास करावा लागतो. नवीन माहितीविषयी ‘अपडेट’ राहावे लागते. महिला म्हणून घर आणि वकिली या दोन्हींचा ताळमेळ करताना टाइम मॅनेजमेंट करावे लागत असल्याचे ती सांगते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलमुळे जोडप्यांमध्ये वाद

$
0
0

पुणे : एकमेकांवरचा कमी झालेला विश्वास... दोघांमधील ‘मी’पणाची भावना...महिलेला घरात दिले जाणारे कमी महत्त्व...नाते टिकविण्याबाबत दोघांची उदासीनता...अशा विविध गोष्टी पती-पत्नीच्या वादाचे कारण ठरत आहेत. अलीकडे सासू-सासऱ्यांमुळे पती-पत्नींचे भांडण होण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी मोबाइल हा दोघांच्या वादात भर घालत असल्याचे दिसून आले आहे. पुणे पोलिसांच्या महिला सहायता कक्षाकडे येणाऱ्या तक्रारी वाढत असून गेल्या वर्षात तक्रारी ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
पुणे पोलिसांच्या महिला सहायता कक्षामध्ये पती-पत्नीमधील वाद मिटविण्याचे काम केले जाते. पती-पत्नीमधील भांडणे कोर्टात अथवा पोलिसांकडे दाखल करून घेण्याअगोदर या ठिकाणी मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. दोघांनाही बोलावून त्यांच्यात संवाद घडवून आणला जातो. तसेच, त्याचे कौन्सिलिंग केले जाते. त्यानंतर वाद सोडविण्यात येतो. ते शक्य नसेल, तर त्यानंतर महिलेला पोलिसांकडे अथवा कोर्टात दावा दाखल करण्यास सांगितले जाते.
महिला सहायता कक्षाकडे २०१५ मध्ये महिलांचे १२८४ तक्रारअर्ज आले होते. त्यापैकी ३६८ तक्रार अर्जांमध्ये पती-पत्नीमधील वाद सोडविण्यात आले होते. तर, नऊशे अर्ज कोर्ट किंवा पोलिस ठाण्यांकडे पाठविण्यात आले. २०१६ मध्ये महिलांच्या तक्रार अर्जांमध्ये वाढ झाली आहे. २०१६ मध्ये १८५१ महिलांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी ७२१ प्रकरणांत पती-पत्नीमध्ये समेट घडवून आणण्यात यश आले आहे. नऊशे अर्ज कोर्ट अथवा पोलिस ठाण्यांकडे पाठविण्यात आले आहेत. महिला सहायता कक्षाकडे येणाऱ्या अर्जांत २०१६ मध्ये वाढ झाली आहे. तसेच, पती-पत्नीतील वाद मिटविण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले आहे.
महिला सहायता कक्षाकडे तक्रार घेऊन येणारी बहुतांशी जोडपी सुशिक्षित असतात. दोघांकडूनही आपल्या नात्यास महत्त्व दिले जात नाही. ‘पती मोबाइल लॉक करतो’, ‘कोठे जातो हे सांगत नाही’, ‘सतत संशय घेतो’, ‘पगाराची विचारणा करतो’, ‘पत्नी पार्टीला न सांगता जाते’, अशी विविध कारणे पती-पत्नीमधील वादाला कारणीभूत ठरत आहेत. घरात दोघेही कमावते असल्यामुळे ‘मी’पणा हा वादाचे कारण ठरतो. सासू-सासऱ्यांमुळे होणारे वाद कमी झाले आहेत. मात्र, काही मध्यवर्गीय कुटुंबांत सासूसुद्धा वादाचे कारण ठरते. ‘सासूकडून छळ होतो’, ‘सतत टोचून बोलतात’, ‘काम येत नसल्याचे कारण काढून माहेरच्यांना काहीही बोलतात’, या कारणांवरून मध्यवर्गीय कुटुंबांतील जोडप्यांमध्ये वाद होतात. पण, शहरात एकत्र कुटुंबपद्धती कमी प्रमाणात असल्यामुळे भांडणांचे कारण ती दोघेच असल्याचे दिसते. महिला शिकून डॉक्टर, प्राध्यापक झाली तरी, तिला कुटुंबात कमी महत्त्व दिले जाते. त्यातूनच वादाची ठिणगी पडत असल्याचे काही सुशिक्षत कुटुंबांत दिसून येते.
महिला सहायता कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये पती-पत्नींतील वाद मिटविण्यात बऱ्यापैकी यश येत आहे. अनेकांचे संसार पुन्हा रुळावर आले आहेत, अशी माहिती कक्षात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्गांची अंतिम रचना उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गिकांची अंतिम रचना (अलाइनमेंट) येत्या गुरुवारी (९ मार्च) होणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महा-मेट्रो) पहिल्या बैठकीत मान्य केली जाणार आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेवरील एक भुयारी स्टेशन कमी होण्याची दाट शक्यता असून, शिवाजीनगर धान्य गोदामाच्या जागेवर तीन मेट्रो मार्गांचे ‘इंटर-चेंजिंग स्टेशन’ करण्यावरही शिक्कामोर्तब केले जाण्याचे संकेत मिळत आहेत.
केंद्र सरकारने पुण्याच्या मेट्रोला मान्यता देतानाच, महामेट्रोतर्फे त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची पुनर्रचना करून महामेट्रोची स्थापना करण्यात आली आहे. महामेट्रोचे अध्यक्ष आणि केंद्रीय नगरविकास विभागाचे मुख्य सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची पहिली बैठक येत्या गुरुवारी नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीमध्ये मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांच्या अलायनमेंट अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेच्या रचनेतही अंशतः बदल केला जाण्याचे संकेत मिळत असून, शिवाजीनगर येथील भुयारी स्टेशननतर सविस्तर प्रकल्प आराखड्यात (डीपीआर) दर्शवण्यात आलेले ‘एएसआय’चे स्टेशन रद्द होण्याची शक्यता आहे. शिवाजीनगरनंतर ही मार्गिका थेट कोर्टासमोरील धान्य गोदामापाशी येईल आणि तिथून ती बुधवार पेठ-मंडई मार्गे स्वारगेटला नेण्यात येईल. याच ठिकाणी वनाज-रामवाडी आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) राबविण्यात येणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मार्गाचे स्टेशन असेल. त्यामुळे, नागरिकांना एकाच ठिकाणी तीन मेट्रो लाइनचा पर्याय उपलब्ध असेल.
शहराच्या पुढील १५ वर्षांचा विचार करून ‘इंटर-मॉडेल इंटीग्रेटेड प्लॅन’वरही संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मेट्रो, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी), रिक्षा-टॅक्सी आणि सायकल या सर्वांचा एकत्रित विचार करून संचालक मंडळातर्फे धोरण निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, शहरातील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांच्या ब्रँडिंगसाठी एकसमान व्यवस्था अंमलात आणण्याच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कॉलेजच्या वर्गामध्ये सीसीटीव्ही

$
0
0

पुणे ः सरकारी, खासगी मेडिकल कॉलेजमधून प्राध्यापक डॉक्टरांच्या पळवापळवीला लगाम लावण्याबरोबर आता वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवितात की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी थेट वर्गामध्ये ‘सीसीटीव्ही’ लावण्यात यावेत, असा आदेश मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) दिला आहे. कॉलेजमध्ये शिक्षक नसल्यास त्या मेडिकल कॉलेजची मान्यता रद्द करण्याची कारवाईदेखील होणार असल्याने कॉलेजच्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षकांची पुरेशी संख्या नसते. त्याशिवाय वैद्यकीय शाखांच्या विद्यार्थ्यांना अनेकदा शिक्षक शिकविण्यासाठी येत नाहीत. त्याऐवजी ते खासगी हॉस्पिटल अथवा क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या तक्रारींची गंभीर दखल ‘एमसीआय’ने घेऊन शिक्षकांच्या अनुपस्थितीवर देखील ‘वॉच’ ठेवला आहे.
सरकारी, खासगी मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक डॉक्टरांची पळवापळवी होत आहे. त्यावर ‘एमसीआय’ने कडक पावले उचलली आहेत. त्याशिवाय हॉस्पिटल तसेच मेडिकल कॉलेजच्या ‘क्लासरूम’मध्ये विद्यार्थ्यांना शिकविले जाते की नाही, त्यांचे अध्यापन किती वेळ असते, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना पेशंट तपासणी, निदान व उपचाराबाबत मार्गदर्शन करतात की नाही, यावर देखरेख ठेवण्यासासाठी क्लासरूम आणि हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, असे आदेश ‘एमसीआय’ने दिले आहेत. या संदर्भात कॉलेजच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयोगाविरोधात ८० दावे दाखल

$
0
0

पुणे ः महापालिका निवडणुकांमध्ये सदोष ईव्हीएम वापरण्यात आल्याचा आरोप पराभूत उमेदवारांकडून करण्यात येत असून यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवाजीनगर कोर्टातील लघुवाद कोर्टात विविध दावे दाखल करण्यात येत आहेत. आतापर्यंत ८० हून अधिक दावे दाखल झाले आहेत.
मतदार यादीतून नावेच गायब करण्यात आली. काही मतदारांचे पत्तेच सापडले नाही. तर मशिन सदोष असल्यामुळे निकालावर परिणाम झाले अशा अनेक कारणांवरून पराभूत उमेदवारांनी कोर्टात दावे दाखल करून निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३० अ मधून निवडणूक लढविलेल्या अॅड. वैशाली चांदणे यांनी राज्य निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि राज्य सरकार यांच्याविरुद्ध दावा केला आहे. स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सुशीला नेटके, प्रीती बधे, अशोक जगताप, विजय खळदकर, रेश्मा बराटे, राजू पवार, वैशाली शेलार, विलास कामठे, बाबू वागस्कर आदी उमेदवारांनी आपल्या प्रभागातील निवडणूका रद्द कराव्यात म्हणून कोर्टात अर्ज दाखल केले आहेत. ईव्हीएम जप्त करून कोर्टात मागविण्यात यावीत. निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बजाज’कडून लष्कराला देणगी

$
0
0

पिंपरीः बजाज ऑटोने सेना झेंडा दिवस निधीला (एएफएफडीएफ) एक कोटीची रुपयांची देणगी दिली. तसेच पुणे स्थित पक्षघातबाधित पुनर्वसन केंद्राला (पीआरसी) ३१ लाखांचे साह्य दिले. ‘एएफएफडीएफ’साठीचा धनादेश बजाज ऑटोचे सीएसआर सल्लागार सी. पी. त्रिपाठी यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना नवी दिल्ली येथे सुपूर्त केला. खडकीत मज्जा संस्थेच्या दुखापतीमुळे सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांची देखभाल व पुनर्वसन ही कामे केली जातात. या केंद्राला बॅटरीवर चालणाऱ्या चाकांच्या खुर्च्यासाठी ३१ लाख रुपयाची देणगी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदासाठी भाजपमध्ये चुरस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार बुधवारी (आठ मार्च) निश्चित होणार आहेत. या महत्त्वाच्या पदांसाठी सत्तारूढ भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार चुरस निर्माण झाली असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे काय निर्णय घेतात? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत एकहाती सत्ता प्राप्त केल्यानंतर आता प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे लक्ष लागले आहे. सत्तारूढ पक्षनेतेपदी एकनाथ पवार यांची निवड झाली आहे. महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक १४ मार्चला होणार आहे. उमेदवारी अर्ज नऊ मार्चला दुपारी तीन ते पाच वेळेत सादर करावयाचे आहेत. त्यापूर्वी नावे निश्चित होतील, असे स्पष्ट करण्यात आले.

यंदाचे महापौरपद इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहे. त्यामुळे या प्रवर्गातील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. चिंचवड किंवा भोसरी विधानसभा मतदारसंघातील सदस्याला संधी

मिळण्याची दाट शक्यता गृहीत धरून इच्छुकांच्या मुंबई वाऱ्या चालू आहेत. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांची शिफारस मिळविण्यासाठी इच्छुक प्रयत्नशील आहेत. सद्यःस्थितीत नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, संतोष लोंढे, नितीन काळजे, वसंत बोराटे यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, अंतिम निर्णय झालेला नाही. यासंदर्भात स्थानिक पातळीवरील शिफारस विचारात घेतली जाणार आहे. एखाद्या जागेसाठी एकमत न झाल्यास अंतिम निर्णयाचे अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे राहणार आहेत.

याशिवाय पालकमंत्री गिरीश बापट यांच्या शिफारशीचाही विचार होऊ शकतो, असे पक्षाच्या गोटातून सांगण्यात आले. पक्षाचे संघटन सरचिटणीस सुजीतसिंग ठाकूर यांनी पिंपरी-चिंचवडमधील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांचा अहवालही विचारात घेतला जाणार आहे.

स्थानिक अधिकारी घेणार निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदासाठी निवडणूक लढवायची किंवा नाही, याबाबतचे अधिकार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

त्यासंदर्भात माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे आणि अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या गटनेतेपदासाठी योगेश बहल, मंगला कदम, नाना काटे, दत्ता साने, उषा वाघेरे, अजित गव्हाणे यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, त्याबाबतचा निर्णय पवारच घेतील. त्यांच्याच उपस्थितीत येत्या शनिवारी किंवा रविवारी पराभूत उमेदवारांसमवेत बैठकीचे आयोजन केले जाईल, असे वाघेरे-पाटील यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार बुधवारी (आठ मार्च) निश्चित होतील. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे. एकमतानेच उमेदवार निश्चित केले जातील.

- लक्ष्मण जगताप, आमदार आणि भाजप शहराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुरेश बेलसरे यांचे निधन

$
0
0

पुणेः ज्येष्ठ तबलावादक सुरेश शंकर बेलसरे (वय ८५) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी सुरेखा बेलसरे आणि कन्या चारुशीला बेलसरे आहेत. त्यांनी मेहबूबखाँ आणि छोटेखाँ यांच्याकडे तबलावादनाचे शिक्षण घेतले. तसेच बालगंधर्व यांच्याबरोबर नाटकात भूमिकाही केल्या होत्या. बेलसरे यांनी पं. भीमसेन जोशी, गजानन वाटवे, बबनराव नावडीकर, तसेच सुधीर फडके यांना साथसंगत केली. तिरखवाखाँ यांनी त्यांना तालमणी पुरस्कराने गौरविले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिन यांना ‘जीवन कलागौरव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्यातर्फे कविसंमेलन व यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विविध जुन्या, नवोदित कवींच्या कविता ऐकण्याची संधी या कार्यक्रमातून साहित्य रसिकांना मिळणार आहे. कार्यक्रम १२ मार्च रोजी टिळक स्मारक मंदिरात रात्री ८.३० वाजता होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बाबासाहेब जाधव, संजय ढेरे, कुणाल जाधव यावेळी उपस्थित होते.

प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ 'जीवन कला गौरव पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. पंचवीस हजार रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिवाजीराव ढेरे यांच्या स्मृत्यर्थ पुरस्कार वेंगुर्ले येथील वीरधवल परब यांना 'मम म्हणा फक्त' या कवितासंग्रहासाठी देण्यात येणार आहे. शांताबाई अमृतराव ढेरे यांच्या स्मृत्यर्थ पुरस्कार वाशी येथील साहेबराव ठाणगे यांना 'पाऊस पाणी' या कवितासंग्रहासाठी देण्यात येणार आहे. धनाजी जाधव यांच्या स्मृत्यर्थ पुरस्कार उस्मानाबाद येथील डी. के. शेख यांना 'दंगल आणि इतर कविता' या कवितासंग्रहासाठी देण्यात येणार आहे.कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनोद तावडेंना आश्वासनाचा विसर

$
0
0

Aditya.Tanawade@timesgroup.com

Tweet : @AdityaMT

पुणेः राज्य सरकारकडून मराठी चित्रपटांना देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेत अपात्र ठरवलेल्या चित्रपटांचे पुनःपरीक्षण करण्याचे आश्वासन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र, अद्याप एकाही चित्रपटाचे पुनःपरिक्षण होऊ शकलेले नाही. त्यामुळे, सांस्कृतिक मंत्र्यांनी केवळ आश्वासनाचा फार्स दाखवून वेळ मारून नेली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळामार्फत मराठी चित्रपटांना दरवर्षी अनुदान देण्यात येते. गेल्या वर्षी जवळजवळ महामंडळाकडे शंभराहून अधिक चित्रपटांनी अनुदानासाठी अर्ज केले होते. त्यातील अनेक दर्जेदार चित्रपटांना अनुदानासाठी निवडण्यात आलेल्या परिक्षण समितीने अपात्र ठरवल्याचा आरोप काही निर्मात्यांनी केला होता. ‘मटा’ने या प्रकरणाला वाचा फोडली. चित्रपटांच्या परिक्षणासाठी नेमण्यात आलेली अनुदान समिती निर्मात्यांचे हितंसंबंध जपत चित्रपट पात्र ठरवते, हा आरोपही काही निर्मात्यांनी केला. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांच्यासह महामंडळाचे संचालक सतीश रणदिवे, पितांबर काळे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, कार्यवाहक विजय खोचिकर, चैत्राली डोंगरे अभिनेते सुशांत शेलार यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

बैठकीत ‘चित्रपटांच्या अनुदानाचा तिढा सोडवण्यासाठी सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर वीस अपात्र चित्रपटांचे पुनःपरीक्षण करण्यात येईल. त्यातून चित्रपट पात्र ठरले तर सर्व अपात्र चित्रपटांचे पुन्हा परिक्षण केले जाईल,’ असे तावडे यांनी सांगितले. परंतु, ही बैठक होऊन चार महिने होत आले तरी अद्याप एकाही चित्रपटाचे पुनःपरीक्षण झाले नाही. त्यामुळे, पुन्हा एकदा चित्रपटांचे परिक्षण करू, असे आश्वासन देऊन तावडे यांनी फक्त वेळ मारून नेली, अशी चर्चा रंगली आहे.

यासंदर्भात निर्माते आनंद ओरोसकर म्हणाले, ‘चित्रपट अनुदानाच्या या प्रक्रियेच्या विरोधात अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या १२ चित्रपटांच्या निर्मात्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. अनुदानासाठी जी परिक्षण समिती नेमण्यात आली, त्या समितीच्या कार्यप्रणालीत अनियमितता आहे. चित्रपटाच्या परिक्षणासाठी जे परिक्षक उपस्थित नसतात त्यांच्याकडूनही गुणांकन केले जाते, असा आरोप याचिका दाखल केलेल्या निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. माहिती अधिकारात काढलेल्या माहितीत हे उघड झाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. चित्रपटांच्या पुनःपरीक्षणासंदर्भात अद्याप कोणत्याही सूचना निर्मात्यांना प्राप्त झालेल्या नाहीत.

निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे चित्रपटांच्या पुनःपरीक्षणाची प्रक्रिया पुढे ढकलली असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. चित्रपटांच्या परीक्षणासाठी नव्याने परीक्षण समिती नेमण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २० चित्रपटांचे परीक्षण केले जाईल, त्यामध्ये चित्रपट पात्र ठरले तर आणखी २० चित्रपटांचे परीक्षण होईल, ही प्रक्रिया संथगतीने सुरू असून शासन या बाबतीत उदासीन असल्याचे जाणवते आहेत.

- मेघराजराजे भोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’च्या सर्वेक्षणाचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्वाइन फ्लू’चा संसर्ग वाढत असल्याने या दोन्ही शहरांतील संशयित पेशंटचे सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य खात्याने अधिकाऱ्यांना दिले. त्याशिवाय संशयित पेशंटना वर्गवारीनुसार तातडीने टॅमी फ्लूचे औषध सुरू करून त्यांच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये ‘स्वाइन फ्लू’च्या पेशंटची संख्या वाढत आहे. कालपर्यंत सहा जणांचा पुण्यात, तर पिंपरी चिंचवडमध्ये तिघांचा बळी गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर वाढत्या संसर्गाचा धोका ओळखून आरोग्य खात्याने अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीला आरोग्य खात्याचे विविध अधिकारी उपस्थित होते.

‘पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचे पेशंट वाढत आहेत. काही पेशंट दगावले आहेत. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील स्वाइन फ्लूच्या संशयित पेशंटचे सर्वेक्षण करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा हॉस्पिटल; तसेच महापालिकेच्या क्षे‌त्रीय पातळीवर पेशंटचे सर्वेक्षण सुरू ठेवावे. संशयित पेशंटवर ए, बी, सी या ठरलेल्या वर्गवारीनुसार उपचार सुरू करावेत, संशयितांना टॅमी फ्लूचे औषध द्यावे; तसेच त्यांच्या घशातील लाळेचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ अशी माहिती आरोग्य खात्याचे सहसंचालक डॉ. मुकुंद डिग्गीकर यांनी ‘मटा’ला दिली. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूच्या पेशंटचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना संबंधित जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘खासगी प्रयोगशाळांना स्वाइन फ्लूच्या पेशंटची चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्या प्रयोगशाळांनी चाचणी सुरू करावी, त्याशिवाय सध्या स्वाइन फ्लूला रोखण्यासाठी टॅमी फ्लूच्या औषधांचा पुरेसा साठा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे,’ असेही डॉ. डिग्गीकर यांनी सांगितले.

आणखी एकाचा बळी

स्वाइन फ्लूच्या संसर्गाने पिंपळे गुरव येथील एका पेशंटचा खासगी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. ४४ वर्षांच्या या व्यक्तीच्या घशातील लाळेचे नमुने एक मार्चला घेण्यात आले. त्याचा अहवाल तीन मार्चला आला. त्यात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. आतापर्यंत शहरात सात जणांचा बळी गेला आहे. तर आणखी आठ पेशंट व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. चार जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले.

अतिजोखमीच्या पेशंटचे सर्वाधिक मृत्यू

पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूच्या संसर्गामुळे दोन्ही शहरांमध्ये नऊ जणांचा बळी गेला आहे. बळी गेलेल्या पेशंटमध्ये अतिजोखमीच्या गटातील पेशंटचा समावेश आहे. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारखे अन्य आजार असलेल्या पेशंटना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. अशा पेशंटना नियमित स्वाइन फ्लू प्रतिबंधक लसीकरण करावे. यासाठी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू करावेत, अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडकवासला धरणात पाण्याचा पुरेसा साठा

$
0
0

पुणे : ‘खडकवासला धरणात पाण्याचा पुरेसा साठा असून, उन्हाळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंढवा जॅकवेलची क्षमता वाढविली जाणार आहे. गेल्यावर्षी पाण्याचा साठा कमी असतानाही पाण्याचे व्यवस्थित वितरण होऊ शकले. यावर्षी खडकवासला धरणात पाण्याचा पुरेसा साठा आहे,’ असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.

‘उन्हाळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये याबाबतचा निर्णय होईल. भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंढवा जॅकवेलची क्षमता वाढविली जाणार आहे. याबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली आहे,’ असे राव म्हणाले.

‘शहर आणि जिल्ह्यातील सर्व बँकांमधील बचत खातेधारकांचे आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक लिंक करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. हे काम मार्च महिन्याअखेर संपविण्यात येणार आहे. काही खातेधारकांचे विविध बँकांमध्ये एकापेक्षा जास्त खाती असल्याने ही संख्या जास्त आहे. आतापर्यंत सुमारे ५० टक्के बचतखातेधारकांच्या आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांकाची नोंद झाली आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

रंगपंचमीला पाण्यात मज्जाव

‘रंगपंचमीच्या दिवशी अनेकजण रंग लावलेल्या अवस्थेत खडकवासला धरणातील पाण्यात जातात. त्यामुळे रासायनिक रंगांमुळे पाणी दूषित होते. यावर्षी खडकवासला धरणाच्या पाण्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी पोलिस आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे,’ असेही राव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images