Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मोठ्या व्यवहारांवर ‘आयटी’चे लक्ष

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार, तर ५० हजारांपेक्षा जास्त बँकिंग व्यवहार करणाऱ्या करदात्याच्या प्रत्येक व्यवहारावर आता प्राप्तिकर विभागाची करडी नजर असणार आहे. करदात्याचे उत्पन्न आणि व्यवहार यात तफावत आढळल्यास त्या व्यवहाराचे स्पष्टीकरण देणे करदात्यांना बंधनकारक असेल,’ अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण विभागाचे महासंचालक आर. के. गुप्ता यांनी शनिवारी दिली.

‘क्रेडाई पुणे मेट्रो’ आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेबाबत गुप्ता यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्राप्तिकर विभागाचे प्रधान संचालक संजीव शंकर, अतिरिक्त संचालक के. के ओझा, उपसंचालक डॉ. शांतेश्वर स्वामी, ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे उपाध्यक्ष श्रीकांत परांजपे, रोहित गेरा, संचालक डी. के अभ्यंकर, आयसीएआय पुणे विभागाच्या अध्यक्षा रेखा धामणकर, उपाध्यक्ष सचिन परकाळे आदी या वेळी उपस्थित होते.

‘केंद्र सरकारतर्फे मर्यादित काळासाठी सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. या योजनेंतर्गत अघोषित संपत्तीच्या तीस टक्के कर, ३३ टक्के अधिभार व दहा टक्के दंड अशी रक्कम संबधित करदात्यास भरावी लागेल, तर अवैध संपत्तीच्या २५ टक्के रक्कम चार वर्षांसाठी व्याजरहित ठेव म्हणून ठेवावी लागेल. ही योजना मार्च २०१७पर्यंत खुली आहे,’ असे गुप्ता यांनी सांगितले.

‘करदात्याने बेहिशेबी संपत्तीची माहिती देऊन विवरणपत्र भरले, तर चुकविलेल्या उत्पन्नाच्या ७७.२५ टक्के कर व दंड मिळून त्याला भरावा लागेल. मात्र, प्राप्तिकर अधिकाऱ्याने असे उत्पन्न शोधून काढले, तर या करावर दहा टक्के दंड म्हणजे एकूण ८७. २५ टक्के दराने कर आकारणी होईल. परंतु, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घेतल्यास त्याचा संबंधित करदात्यालाही फायदा होईल. तसेच प्राप्तिकर विवरणपत्रात घोषित केलेल्या उत्पन्नासंदर्भात संपूर्णपणे गोपनीयता पाळली जाईल,’ असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.

कोट

बेहिशेबी मालमत्ता दडवून ठेवून सर्व काही गमावून बसण्यापेक्षा पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा फायदा घ्या. अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा.

आर. के. गुप्ता, महासंचालक, प्राप्तिकर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तडीपार गुंडाने तरुणाला लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईत गुंडांना तडीपार केल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे; मात्र ही तडीपारी केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. डायस प्लॉट येथे एका तडीपार गुंडाने तलवारीच्या धाकाने एका तरुणाला लुटल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तडीपार आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आबा राधाकिशन सरोदे (३५, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत मयूर कांबळे (२५, रा. गुलटेकडी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडीच्या दिवशी डायस प्लॉट येथे दोन गटांत भांडणे झाली होती. त्यामध्ये सरोदेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये कांबळे फिर्याद देणाऱ्यांच्या बाजूने होता. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कांबळे डायस प्लॉट येथील कॅनॉलवरून घरी जात असताना त्याला समोरून सरोदे येताना दिसला. त्यामुळे तो तेथून पळून जाऊ लागला. सरोदेने पाठलाग करून कांबळेला अडवले. ‘तू माझ्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करतोस काय,’ असे म्हणून सरोदेने कांबळेला धमकावले आणि त्याच्या मानेवर तलवार ठेवून त्याच्या खिशातील तीनशे रुपये काढून घेतले. या घटनेची माहिती कांबळेने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस सरोदेला पकडण्यासाठी गेले. त्या वेळी त्याने पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती स्वारगेट पोलिसांनी दिली. या आरोपीला कोर्टात हजर केले असता नऊ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेण्याचा आदेश कोर्टाने दिला. या प्रकरणी सहायक निरीक्षक पी. आर. मोरे अधिक तपास करत आहेत.

आबा सरोदे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मारामारी, दंगल, गंभीर दुखापत, घरफोडी असे १२ गुन्हे दाखल आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गुंडांना तडीपार करून त्यांच्यावर वचक बसवल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे; मात्र तडीपार गुंड शहरात फिरून दहशत निर्माण करत असल्याचे या प्रकारामुळे आढळून आले आहे. या पूर्वीदेखील तडीपार गुंडांनी दहशत निर्माण केल्याचे प्रकार घडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मार्क माँटॅग्यूज हॅरिअर’चा प्रवास उलगडणार

$
0
0

वन विभाग आणि पक्षी संशोधकांनी केले पहिल्यांदाच टॅगिंग

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रशिया, युरोपमधून थंडीमध्ये शेकडो मैलांचा प्रवास करून दर वर्षी महाराष्ट्रात येणाऱ्या ‘मार्क माँटॅग्यूज हॅरिअर’ या पक्ष्याचा प्रवास जाणून घेण्यासाठी वन विभाग आणि पक्षी संशोधकांनी त्याला सोलर ट्रान्समीटर बसविला आहे. देशात पहिल्यांदाच या पक्ष्याला टॅगिंग करण्यात आले असून, यामुळे हॅरिअरच्या स्थलांतरांचा संपूर्ण प्रवास उलगडणार आहे.

युरोपसह आफ्रिकेतील अनेक प्रकारचे पक्षी दर वर्षी हिवाळ्यात आशिया खंडात स्थलांतरासाठी येतात. या स्थलांतरित पाहुण्यांपैकी देखणा पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्क माँटॅग्यूज हॅरिअर या पक्ष्याची टॅगिंगसाठी निवड करण्यात आली आहे. हा पक्षी मुख्यतः युरोप, रशियाचा पश्चिम भाग आणि कझाकिस्तानमध्ये वास्तव्यास असतो. स्थलांतरादरम्यान युरोपातील बहुतांश पक्षी आफ्रिकेला जातात; तसेच रशिया आणि कझाकिस्तानमधील पक्षी भारतात येतात, अशी अभ्यासकांची प्राथमिक माहिती आहे.

अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्व्हायर्न्मेंट या संस्थेतील वरिष्ठ संशोधक डॉ. टी. गणेश, त्यांची टीम, पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी सोलापूरमधील माळरानात आलेला पूर्ण वाढ झालेला हॅरिअर आणि त्याच्या पिल्लाला नुकताच सोलार ट्रान्समीटर बसवला. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान अन्न आणि घरट्यांसाठी हे पक्षी भारतात येतात. सोलापूर परिसरात नान्नझ, सांगोला, मंगळवेढा या भागात ते वास्तव्यास असतात.

पक्षी होतोय दुर्मिळ

‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरर्स’ने प्रसिद्ध केलेल्या लाल यादीत ‘मार्क माँटॅग्यूज हॅरिअर’ पक्ष्याचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात त्यांची संख्या वेगाने घटली आहे. नष्ट होत असलेला अधिवास हे त्या मागील मुख्य कारण आहे. सोलापूर परिसरात येणाऱ्या या पक्षी दर वर्षी कमी होत आहेत. आंध्रप्रदेशमधील रोल्लापाडू पक्षी अभयारण्यातही पूर्वी हे पक्षी येत होते. मात्र, तिथे मोठ्या संख्येने सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात आल्याने या पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. सोलापूरबरोबरच राजस्थान आणि तामिळनाडूमध्येही ट्रस्टतर्फे या पक्ष्यांचा अभ्यास करण्यात येतो आहे.

‘मार्क माँटॅग्यूज हॅरिअर’ला सोलर ट्रान्समीटर बसविला आहे. भारतात प्रथमच अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने अभ्यास होत आहे. टॅगिंगमुळे हे पक्षी कोठे जातात, त्यांचा अधिवास, त्यांचा प्रवास, घरटे बांधण्याच्या जागा, एका दिवसभरात ते कापत असणारे अंतर या सगळ्याची माहिती उपलब्ध होणार आहे.’ - सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पुणे विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्चभ्रूंचा कल मतदानाकडे कमी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

विमाननगर, बालेवाडी, कोथरुड, एनआयबीएम या चार भागांतील उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित नागरिकांचा मतदान करण्याचा कल मध्य पेठा किंवा हडपसर परिसरातील मध्यमवर्गीय नागरिकांपेक्षा कमी आहे. एवढेच काय तर उच्चभ्रू भागांतील बहुतांश नागरिकांनी गेल्या दोन महापालिका निवडणुकांमध्ये जेमतेम एकदाच मतदान केलेले असून, त्याउलट मध्य पेठा आणि हडपसरच्या नागरिकांनी मतदान करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यामुळे, उच्चभ्रू-उच्चशिक्षितांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाविषयी उदासीनता असल्याचे आढळून येते.

गोखले अर्थशास्त्र संस्थेने केलेल्या पाहणीतून हे निष्कर्ष समोर आले आहेत. ‘नागरिक मतदान का करीत नाहीत,’ या विषयावर पाहणी करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने गोखले अर्थशास्त्र संस्थेवर सोपवली आहे. त्यानुसार संस्थेने, पुण्यातील एनआयबीएम, विमाननगर, बालेवाडी आणि कोथरूड हे कमी मतदान होणारे, तर हडपसर आणि मध्य पेठा हे अधिक मतदान होणारे भाग पाहणीसाठी निवडले होते. त्यात प्रत्येकी तीनशे अशा एकूण अठराशे विविध वयोगटांतील नागरिकांशी संवाद साधला. या सर्वेक्षमाची माहिती संस्थेचे प्रभारी संचालक प्रा. राजस परचुरे, प्रा. मानसी फडके, प्रा. अंजली शितोळे, ‘यशदा’चे प्रा. ज्ञानदेव तळुपे आदींनी पत्रकार परिषदेत दिली.

विमाननगर, बालेवाडी, कोथरुड, एनआयबीएम या चार वॉर्डातील उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित नागरिकांचा मतदान करण्याकडे कल हा अतिशय कमी आहे. या वॉर्डातील बहुतांश नागरिक हे गेल्या काही वर्षांत तेथे राहायला आले आहेत. त्यामुळे त्यांना स्थानिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोणत्याच प्रकारची आवड नाही. यातील बहुतांश नागरिकांनी गेल्या दोन महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मतदानच केले नाही. त्यानंतर काहींनी केवळ एका वेळेला मतदान केले आहे. याउलट मतदान करण्यात सातत्य राखणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. याउलट अलका टॉकीज व हडपसर वॉर्डात गेल्या दोन महापालिका निवडणुकीत मतदान करणाऱ्या नागरिकांची सख्या अधिक आहे. मतदान अजिबात न केलेल्यांची संख्यादेखील कमी आहे, असे प्रा. मानसी फडके यांनी सांगितले.

पुणेकरांमध्ये सातत्याने मतदान करणाऱ्या पुरुषांची टक्केवारी ही महिलांपेक्षा अधिक आहे. पुरुषांची टक्केवारी ही ३६.१ टक्के तर महिलांची टक्केवारी २४.३ टक्के आहे. त्यामुळे महिलांनी मतदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता असून त्यासाठी जनजागृती अभियान राबविण्याची आवश्यकता आहे. तसेच, ज्या नागरिकांना मुले आहेत ते निवडणुकीमध्ये मतदान करण्यात सातत्य राखतात, असे प्रा. फडके यांनी सांगितले.


प्रा. फडके म्हणाले, ‘या दोन्ही प्रकारच्या एकत्रित वॉर्डांचा विचार केल्यास ३० टक्के प्रातिनिधिक पुणेकर हे महापालिका निवडणुकीत नियमित मतदान करतात. तर, तेवढ्याच प्रमाणात म्हणजेच ३० टक्के पुणेकर हे मतदानच करीत नाही. तसेच, २००७ आणि २०१२ वर्षात झालेल्या गेल्या दोन महापालिका निवडणुकांमध्ये तब्बल ४० टक्के प्रातिनिधिक पुणेकरांनी केवळ एकाच निवडणुकीत मतदान केले आहे. दरम्यान, २० पुणेकरांना मतदान न केल्याबद्दल काहीच वाटत नाही.’ या सर्वेक्षणात ७० ते ९० टक्के नागरिकांनी मतदान करणार असल्याचे सांगितले आहे, असे प्रा. परचुरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेजमधून वाहून गेलेल्यामुलाचा मृतदेह सापडला

$
0
0

दोषींवर निष्काळजीपणाचा गुन्हा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
आंबिल ओढा येथून ड्रेनेजच्या चेंबरमधून वाहून गेलेल्या मुलाचा रविवारी सकाळी कसबा पम्पिंग स्टेशन येथील जाळीमध्ये मृतदेह सापडला. अग्निशमन दलाचे जवान आणि सांडपाणी विभागाकडून या मुलाचा शनिवारी सकाळपासून शोध सुरू होता. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात दोषी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश किशोर चांदणे (१४, रा. बिडकर वस्ती, आंबिल ओढा वसाहत, दांडेकर पुल) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मनपाच्या शाळेमध्ये सातवीमध्ये शिकत होता. शनिवारी सकाळी तो आंबिल ओढ्याजवळील मोकळ्या जागेत मित्रांसह क्रिकेट खेळताना चेंडू नाल्याच्या दिशेने गेला. तो चेंडू काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. पाण्याच्या प्रवाहासोबत तो चेंबरला पाडण्यात आलेल्या भगदाडामधून खाली पडला. मुलांनी आरडाओरडा करून अग्निशमन दलाला ही माहिती दिली.
अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, जेसीबी, सांडपाणी विभागाचे कर्मचारी आधुनिक साधनांच्या साह्याने दिवसभर त्याचा शोध घेत होते. २५ जवानांनी सायंकाळपर्यंत १७ ते १८ ड्रेनेज चेंबर उघडून मुलाचा शोध घेतला. तसेच, वैकुंठ स्मशानभूमीजवळील ड्रेनेजला जाळी लावली. शनिवारी सायंकाळी अंधार पडल्यानंतर शोधकार्य थांबविण्यात आले होते.
ड्रेनेजच्या साडेपाच फुटी व्यासाच्या पाइपलाइनमधून त्याचा मृतदेह वाहात जाण्याची शक्यता गृहित धरून वैकुंठ स्मशानभूमीजवळ जाळी बसवण्यात आली. या ड्रेनेजलाइनचे दुसरे टोक कसबा पम्पिंग सेंटरजवळ निघते. त्या ठिकाणी रविवारी सकाळी जाळीत मृतदेह अडकल्याचे दिसून आले. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालामध्ये त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. कात्रजकडून येणाऱ्या या नाल्यामध्ये भूमिगत ड्रेनेजलाइन टाकण्यात आलेली आहे. ही पाइपलाइन वैकुंठ स्मशानभूमी आणि कसबा पम्पिंग स्टेशनजवळ निघते. आंबिल ओढा येथील नाल्यामधील पाण्याचा प्रवाह चर खोदून आणि चेंबरला भगदाड पाडून त्या ठिकाणी वळवण्यात आलेला आहे. अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आलेल्या या कामामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात संबंधित काम करणारा ठेकेदार, मनपाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी बसपोर्टच्या कामाचे टेंडर निघाले

$
0
0

शिवाजीनगरचा समावेश; घोषणेनंतर तब्बल एक वर्षाने प्रक्रिया सुरू
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ठराविक बस स्टॅँडच्या जागी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे बस पोर्ट उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एसटी महामंडळाने या कामासाठीची टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सात स्टँडचा विकास केला जाणार असून, त्यामध्ये पुणे विभागातील शिवाजीनगर स्टँडचा समावेश आहे.
वर्षानुवर्षे नवीन बांधकाम न झाल्याने मोडकळीस आलेल्या इमारती, मोठी जागा असूनही जुन्या पद्धतीच्या नियोजनामुळे स्थानकावर सातत्याने होणारी कोंडी आणि प्रवाशांसाठी अपुरी पडणारी जागा यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाने राज्यातील प्रमुख १३ बस स्टँड पाडून त्या ठिकाणी नव्याने बसपोर्ट उभारण्याचा निर्णय एसटी महामंडळाने निर्णय जानेवारी २०१५ मध्ये घेतला होता. त्यानंतर तब्बल एका वर्षाने का होईना, पण या कामासाठीच्या टेंडर प्रक्रियाला सुरुवात झाली आहे. शिवाजीनगर, पनवेल, बोरिवली नँन्सी कॉलनी, सोलापूर मधील पुणे नाका, नाशिक महामार्ग, औरंगाबाद, नांदेड, अकोला या नऊ स्टँडचा विकसनासाठी टेंडर प्रसिद्ध केले असून २३ जानेवारीपर्यंत ते भरता येणार आहे.
०००
असे असेल बसपोर्टल
या बस पोर्टमध्ये प्रामुख्याने जागेनुसार, सुसज्ज बसस्थानकाची रचना करण्यात येणार आहे. त्यात बस टर्मिनल, प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा, बस डेपो, सुसज्ज विश्रांती कक्ष, महामंडळाचे कार्यालय, प्रवाशांसाठी वाहनतळ तसेच व्यावसायिकांसाठी जागाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवाजीनगर बस स्थानक सुमारे १५ हजार ७०० स्केअर मीटर भागात आहे. आता बसपोर्ट मध्ये तळ मजल्यावर बसथांबा, प्रवासी विश्रामकक्ष तसेच इतर सुविधा तर दुसऱ्या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय, तर तिसरा आणि चौथा मजला व्यावसायिकांसाठी असे नियोजन सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिला दिवस ‘शिस्ती’चा

$
0
0

भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना प्रारंभ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कार्यकर्त्यांची भली मोठी फौज, दुचाकीवरून रॅली, झेंडे-बॅनर अशा शक्तिप्रदर्शनाऐवजी इच्छुक उमेदवार आणि त्यासोबत केवळ एक व्यक्ती..., एका वेळी मोजक्याच इच्छुकांना मुलाखतीसाठी कार्यालयात प्रवेश..., सर्व इच्छुकांना रांगेतच सर्व सूचना... अन् पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थेट समोरासमोर चर्चा...... हे चित्र होते, ‘पार्टी विथ डिफरन्स’ असा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षातील इच्छुकांच्या मुलाखतीच्या पहिल्या दिवसाचे. पहिल्या १० प्रभागांतील १८३ इच्छुकांच्या मुलाखती रविवारी दिवसभरात पूर्ण झाल्या. आज, सोमवारी प्रभाग क्रमांक ११ ते २०मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने गेल्या आठवड्यात इच्छुकांकडून अर्ज मागवून घेतले होते. शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक अर्ज भाजपकडे दाखल झाले आहेत. त्यामुळे चार दिवसांचा मुलाखतींचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, रविवार सकाळपासून त्याची सुरुवात झाली. मुलाखतीला येताना शक्तिप्रदर्शन करू नये, अशी तंबीच शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सर्व इच्छुकांना भरली असल्याने सकाळच्या वेळेत पक्षाच्या जंगली महाराज रोडलगतच्या निवडणूक कार्यालयात तुरळक गर्दी होती. प्रभाग कोणताही असला, तरी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ अशा तत्त्वावर इच्छुकांना मुलाखतीच्या सभागृहात प्रवेश दिला जात होता. मुलाखत घेणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रभागात केलेल्या कामाची, सामाजिक कार्याची माहिती व्हावी, यासाठी बहुतेक सर्वांनी कार्य-अहवाल सोबत आणले होते. विविध प्रभागांतून इच्छुक महिला जोडीने मुलाखतीसाठी आल्या होत्या. ‘तुमच्या कामाविषयी माहिती द्या’, ‘प्रभागात निवडून येण्यासाठी काय करावे लागेल’, ‘आतापर्यंत कशा स्वरूपाचे काम केले आहे’ यांसारख्या प्रश्नांमधून इच्छुकांची माहिती घेतली जात होती आणि सरतेशेवटी सर्वांना ‘पक्ष योग्य निर्णय घेईल,’ असे सांगून आश्वस्त केले जात होते.

पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे व संजय काकडे, शहरातील आमदार विजय काळे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर आणि भीमराव तापकीर, पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, पालिकेतील गटनेते गणेश बीडकर यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उज्ज्वल केसकर, बाबा मिसाळ, गणेश घोष, महिला शहराध्यक्षा शशिकला मेंगडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पोटे, अनुसूचित जाती मोर्चाचे समन्वयक डॉ. भरत वैरागे यांच्या पॅनेलने सर्व मुलाखती घेतल्या.

..................
तिकिटापेक्षा ‘पाळणा’ महत्त्वाचा

भाजपच्या मुलाखतीसाठी आलेल्या एका इच्छुकाने प्रभागाची किंवा आपली माहिती देण्याआधी भजन, कीर्तन, प्रवचन अशामध्ये अधिक रस असल्याचे सांगितले. तसेच, ‘तुम्हा सर्वांना एक ‘पाळणा’ म्हणून दाखवण्याची परवानगी द्यावी,’ अशी विनंती त्याने केली. त्याला सर्वांनी संमती दिल्यावर त्याने शिवाजी महाराजांवरील पाळणा ऐकवला. ‘पालकमंत्री बापट यांना पाळणा ऐकवण्याची हौस फिटली, आता तिकीट नाही दिलेत, तरी चालेल,’ असे त्याने सांगताच, मुलाखती घेणाऱ्या पॅनेलच्या सदस्यांनाही हसू आवरले नाही.

..................
पक्षप्रवेश करणाऱ्यांच्या मुलाखती

शहराच्या पूर्व भागातील येरवडा-खराडीसह पुणे विद्यापीठ-औंध-बावधन या प्रभागातील मुलाखतींचे सत्र रविवारी झाले. यातील काही प्रभागांत अलीकडेच दुसऱ्या पक्षातील नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. त्यात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, काँग्रेसच्या सुनीता गलांडे यांचा समावेश असून, त्यांनीही मुलाखतींना हजेरी लावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेकडे उभी राहतेय कार्यकर्त्यांची फळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यमान नगरसेवक पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत असले, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तरुण कार्यकर्त्यांची फळी उभी राहत आहे. त्यामुळेच काही प्रभागांत १४ ते १८ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. काही प्रभागांत मुलाखतींना अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याने पक्षाला तेथे उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे.

पक्षातर्फे चार ते सहा जानेवारीदरम्यान इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाचे नेते राजन शिरोडकर, बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे आणि रीटा गुप्ता यांनी या मुलाखती घेतल्या. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करून मुलाखतींना हजेरी लावली होती. पक्षातर्फे उमेदवारी अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यामुळे तीन दिवसांत सव्वापाचशे उमेदवारांच्या मुलाखती होऊनसुद्धा अजून सुमारे ५० इच्छुकांच्या मुलाखती बाकी आहेत. गेल्या दोन दिवसांत पिंपरी-चिंचवडमधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर येत्या चार-पाच दिवसांत या उर्वरित इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येतील.

काही प्रभागांत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षाला उमेदवारी निश्चित करताना कसरत करावी लागणार आहे. या भागांत विद्यमान नगरसेवकांसह पदाधिकारी आणि कार्यकर्तेही इच्छुक आहेत. कर्वेनगर, बावधन, कोथरूड डेपो, ताडीवाला रोड, धनकवडी, पर्वती, खडकवासला या भागांतून इच्छुकांची संख्या मोठी आहे. कर्वेनगर प्रभागासाठी सर्वाधिक २१ कार्यकर्त्यांनी मुलाखत दिली.

दुसरीकडे कोथरूडमधील एक महत्त्वाचा प्रभाग, तसेच बाणेर-बालेवाडी पाषाण, औंध-बोपोडी या भागांतून सर्वांत कमी उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यापैकी काही प्रभागांसाठी चार उमेदवारही नसल्याने कार्यकर्त्यांना आयत्या वेळी फॉर्म देऊन मुलाखतीसाठी धाडण्यात आल्याची जोरदार चर्चा पक्षवर्तुळात आहे.

दरम्यान, मुलाखतींनंतर आता सर्व उमेदवारांची पडताळणी करण्याचे काम सुरू होईल. नेते आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होऊन त्यामध्ये उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार यादी तयार करून पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसकडून आता घंटानाद, थाळीनाद

$
0
0

नोटाबंदीविरोधातील भूमिका तीव्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात काँग्रेसने धरणे आंदोलन केल्यानंतर आता घंटानाद आणि था‍ळीनाद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. टिळक चौक (अलका टॉकीज चौक), नरपतगिरी चौक आणि सुभानशाह दर्ग्याजवळ काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून सोमवारी सकाळी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

नोटाबंदीमुळे देशातील बेरोजगारी वाढत आहे. चलनतुटवडा निर्माण झाला. कामे सोडून सर्वसामान्यांना रांगांमध्ये उभे राहण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत रांगांमध्ये १२० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. उद्योगधंदे ठप्प झाले असून, बेरोजगारी वाढत आहे. देशात आर्थिक आणीबाणीचे संकट आले असून, प्रामुख्याने शेतकरी, कष्टकरी वर्ग हैराण झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर लगेचच घंटानाद आणि थाळीनाद आंदोलन केले जाणार आहे. टिळक चौकात युवक काँग्रेस आंदोलन करणार आहे. या चौकात काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आंदोलनासाठी जमणार आहेत, अशी माहिती शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास लांडगे यांनी दिली. नरपतगिरी चौक आणि सुभानशाह दर्ग्याजवळ महिला काँग्रेस आणि काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे, असे शहर काँग्रेसचे प्रवक्ते रमेश अय्यर यांनी सांगितले.

काँग्रेसने नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेऊन सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी, ज्येष्ठ नेते या आंदोलनांसाठी रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असताना काँग्रेसने नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

.........

‘राष्ट्रवादी’ही उगारणार आंदोलनाचे अस्त्र
पुणे : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही आज, सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षाचे मुख्य आंदोलन मंडईतील टिळक पुतळ्यापाशी होणार असून, सर्व विधानसभा मतदारसंघांतही एकाच वेळी नोटाबंदीविरोधात आंदोलन केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा करताना ५० दिवसांत परिस्थिती सुधारेल, असे जनतेला सांगितले होते. दुर्दैवाने, ५० दिवस उलटून गेल्यानंतरही अजून नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून, परिस्थिती पूर्ववत होण्यास आणखी किती दिवस लागणार, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करून नागरिकांचे हाल कमी करावेत, यासाठी हे व्यापक जनआंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंडईतील टिळक पुतळा येथे सकाळी ११ वाजता आंदोलन केले जाणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेनऊ वाजता शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये नोटाबंदीच्या विरोधात निदर्शने केली जाणार आहेत.

येथे होणार निदर्शने
बँक ऑफ महाराष्ट्र-बाजीराव रोड, धायरी फाटा-नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड), गांधी चौक-हडपसर, लोकमंगल-शिवाजीनगर, खराडी-बायपास रोड-वडगाव शेरी, जनता सहकारी बँक-सहकारनगर, स्टेट बँक ऑफ इंडिया-जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आणि सारंग चौक-सहकारनगर येथे निदर्शने केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’ची पहिली यादी येत्या आठवड्याअखेर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये सर्वप्रथम जाहीरनामा प्रसिद्ध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच उमेदवारांची पहिली यादीही सर्वांत आधी जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवार निवडीसाठीच्या बैठका होणार असून, पक्षातर्फे पहिली यादी आठवड्याअखेर जाहीर केली जाऊ शकते, असे संकेत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिले.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून घेण्यापासून त्यांच्या मुलाखती घेण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या महिन्यातच पूर्ण केली आहे. ‘राष्ट्रवादी’तील काही नगरसेवक इतर पक्षांमध्ये दाखल होत असले, तरी पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. अजित पवार आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम गेल्या महिन्यात घेण्यात आला. तसेच, पहिली यादी लवकर जाहीर केली जाईल, असे संकेत खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच दिले होते. त्यामुळे सर्वांना पहिल्या यादीत आपले नाव असेल का, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्या दृष्टीने पहिली यादी लवकर जाहीर करण्यासाठी या आठवड्यात पक्षातर्फे प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली.

............

विद्यमान नगरसेवकांचा समावेश?

पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठका येत्या १२ ते १५ जानेवारीदरम्यान पुण्यात होणार आहेत. या बैठकीमध्येच पहिल्या यादीतील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, पक्षातर्फे त्यांची नावेही जाहीर केली जाण्याची चिन्हे आहेत. प्रामुख्याने पक्षासाठी अनुकूल असलेल्या भागांतून पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यमान नगरसेवकांचा समावेश पहिल्या यादीत असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताम्हिणी अभयारण्यालगतची बांधकामे थांबवण्याचा आदेश

$
0
0

दहा किलोमीटर अंतरातील कामांना मर्यादा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ताम्हिणी अभयारण्यालगत दहा किलोमीटर अंतरात सुरू असलेली फार्म हाऊसची बांधकामे तातडीने थांबविण्याचा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिला आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून अभयारण्य पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (बफर झोन) जाहीर झाल्याशिवाय या क्षेत्रात कोणतेही विकासकामे करायची नाहीत, अशा स्पष्ट सूचना न्यायाधिकरणाने दिल्या आहेत.

ताम्हिणी अभयारण्य जाहीर होऊन चार वर्षे उलटली, तरी अद्याप जंगलाचा बफर झोन जाहीर झालेला नाही. पुणे वन विभागाने अभयारण्याची मोजणी करून अडीच वर्षांपूर्वीच बफर झोनचा प्रस्ताव केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाला मंजुरीसाठी पाठवला आहे. मंत्रालयाकडून होत असलेला दिरंगाईचा फायदा घेऊन बांधकाम व्यावसायिकांनी अभयारण्य परिसरात फार्म हाऊस बांधण्याचा सपाटा लावला आहे. ठिकठिकाणी बांधकामाला सुरुवात झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अभयारण्याच्या हद्दीला लागूनही बंगल्यांचे प्लॉट पाडून कामांनी वेग घेतला आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशामुळे या सर्व कामांना आता स्थगिती मिळाली आहे.

वन विभागाने केंद्राला दिलेल्या प्रस्तावात अभयारण्याला लागून केवळ शंभर मीटर अंतर बफर झोन जाहीर केला आहे. पण या प्रस्तावावर केंद्राने शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे न्यायाधिकरणाने अभयारण्याला लगतच्या दहा किलोमीटर अंतरावरील सर्व कामे थांबविण्याचे आदेश दिले आहेत, असे अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.

देवराई फाउंडेशनने या अभयारण्य परिसरात सुरू असलेल्या बांधकामांवर आक्षेप घेऊन न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सरोदे फाउंडेशनची बाजू मांडत आहेत. न्यायाधिकरणाच्या निर्णयामुळे यापूर्वी झालेल्या बांधकामांना परवानगी मिळेल, पण नव्याने येऊ घातलेल्या मोठ्या प्रकल्पांना केंद्राचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय परवानगी मिळणार नाही. केंद्राकडून बफर झोनच्या प्रस्तावाबद्दल सरकार काय निर्णय घेते याची आम्ही वाट पाहत आहाेत, असे वन विभागाचे वकील अभिजित साकूरकर यांनी सांगितले.

‘वन क्षेत्रालगत सुरू असलेल्या बांधकामांमुळे जंगलामध्ये माणसांचा हस्तक्षेप वाढला असून मशीनच्या आवाजाने वन्यप्राण्यांना त्रास होतो आहे. बांधकाम व्यावसायिक सुरुवातीला कुंपण घालतात, मग जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी हळूहळू झाडे तोडायला सुरुवात करतात. या विकासाकामांमुळे तेथील नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे. मुख्यतः उन्हाळ्यात या वेळी वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात फिरण्यासाठी खूप मर्यादा आल्या. दोन महिन्यांपूर्वीच वन विभागाने एका मोठ्या अतिक्रमणावर कारवाई करून काम थांबविले होते,’ असे पुणे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकार महेश भावसार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नूमवि’त रंगला आठवणींचा महोत्सव

$
0
0

‘आम्ही नूमवीय’ आम्ही नूमवीय’च्या तिसऱ्या महामेळाव्यासाठी जमली दिग्गज माजी विद्यार्थ्यांची मांदियाळी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘‘नूमवि’सारख्या शाळेतून शिक्षण घेतानाच ‘हाती घ्याल, ते तडीस न्या’ ही शिकवण मिळाली आणि जगातील विविध ठिकाणी इमारतींचे डिझाइन करता आले..., मातृभाषेतून शिक्षण झाल्यानेच विविध विषय आत्मसात करता आले..., शिक्षकांच्या तळमळीने शिकवण्याच्या पद्धतीमुळेच आयुष्यात प्रगती करता आली...., चार भिंतींच्या आतील आणि भिंतींबाहेरील शिक्षण देत माणूस म्हणून घडवणारी शाळा आम्हाला लाभली,’ अशा गौरवोद्गारांनी ‘नूमवि’च्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींचा समृद्ध पट उलगडला अन् रविवारची संध्याकाळ ‘आम्ही नूमवीय’ या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याच्या हृद्य वातावरणाने भरून गेली.

‘आम्ही नूमवीय’च्या तिसऱ्या महामेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ‘आम्ही नूमवीय’चे अध्यक्ष अजित रावेतकर, सचिव मिलिंद शालगर, नूमवि शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी उमासे आदी उपस्थित होते. या वेळी माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सहस्रबुद्धे आणि डॉ. आगाशे यांच्या हस्ते ज्येष्ठ वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी यांना ‘नूमवि रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. संरक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ संशोधक डॉ. अजय लेले, खो- खो प्रशिक्षक श्रीरंग इनामदार, ज्येष्ठ नाट्यसमीक्षक माधव वझे, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे डॉ. मधुसूदन झंवर यांना ‘नूमवीय भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनादेखील ‘नूमवि रत्न’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

‘शाळेच्या ब्रीदवाक्यातून खूप मोठी शिकवण मिळाली. कोणत्याही कामाचा तटस्थ दृष्टीने विचार करावा आणि ते काम आवडल्यास चिकाटीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, हीच ती शिकवण आहे. इमारतींचे किंवा वास्तूंचे नवनिर्माण करताना केवळ व्यावहारिकदृष्ट्या विचार न करता त्यांचा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आणि सांस्कृतिकता वाढवण्यासाठी वापर कसा करता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे,’ असे मत दोशी यांनी मांडले. डॉ. आगाशे, माधव वझे यांचीही या वेळी भाषणे झाली. राजेश दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमावेळी ९४ वर्षीय माजी विद्यार्थी यशवंत नाडकर्णी यांचादेखील सत्कार करण्यात आला.
...............
‘सृजनाचा सोहळा’

‘नूमवि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा म्हणजे ‘सृजनाचा सोहळा’च आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले माजी विद्यार्थी एकापेक्षा एक दिग्गज आहेत. या विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळाल्यानेच त्यांची प्रगती झाली आणि शाळेशी नातेसंबंध टिकून आहे; मात्र आताच्या शिक्षण पद्धतीचा विचार केल्यास त्यात शालेय स्तरावर आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. पालकांनीसुद्धा पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, नूमवि शाळेने शहरातील इतर उदयोन्मुख शाळांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे,’ असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

माझ्या प्रगतीत ‘नूमवि’चे योगदान मोठे

‘नासा’तील संशोधकाची भावना

पुणे : ‘मातृभाषेतून शिक्षण मिळाल्याने विविध विषयांचे सिद्धांत माझ्या मनात आणि डोक्यात कायमस्वरूपी बसले. त्याचा फायदा मला सातासमुद्रापार केलेल्या संशोधनात आणि माझ्या कामात झाला. त्यामुळेच पुढे जाऊन एका ग्रहाचा आणि ग्रहांवर सापडणाऱ्या विविध मॉलिक्युल्सचा शोध लावण्यासाठी मला त्याचा उपयोग झाला,’ अशी भावना नूतन मराठी विद्यालयाचा १९९७च्या बॅचचा विद्यार्थी आणि सध्या ‘नासा’सोबत काम करणारा आझम थत्ते या संशोधकाने रविवारी व्यक्त केली.

‘आम्ही नूमवीय’च्या तिसऱ्या महामेळाव्यात थत्ते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी थत्ते यांनी आपल्या भावना ‍व्यक्त केल्या. थत्ते मूळचे दत्तवाडी येथील असून, २००३पासून ते कॅलिफोर्नियाला स्थायिक झाले आहेत. थत्ते यांनी ‘एचडी १८९७३३ बी’ या ग्रहाचा, तसेच ग्रहावर सापडणाऱ्या विविध मॉलिक्युल्सचा शोध लावला आहे.

‘आजी-आजोबांना भेटण्यासाठी पुण्यात आलो होतो. तेव्हा समजले, की शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा होत आहे. त्यामुळे या मेळाव्याला आलो. ‘नूमवि’तून मला उत्तम प्रकारचे शिक्षण मातृभाषेतून मिळाले. शिक्षकांनी गणित, विज्ञान आदी विषयांचे सिद्धांत मला उत्तमपणे समजावून सांगितले. त्यामुळेच ते आजदेखील माझ्या लक्षात आहेत. या सिद्धांतांवर मला अमेरिकेत ‘एमआयटी’ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठात काम करता आले. एवढेच काय, तर कॅलिफोर्नियात घर शोधत असताना मला तेथील घरमालकिणीने ‘संस्कृत येते का’ असे विचारले तेव्हा मी शाळेत शिकलेले संस्कृतचे एक सुभाषित म्हणून दाखवले. त्यानंतर मला घर भाड्याने मिळाले. शाळेत शिकलेल्या कविता अगदी आजही मला आठवतात आणि डोळे पाणावतात. माझ्या प्रगतीत शाळेचे योगदान मोठे आहे,’ अशी भावना थत्ते यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगसाठीही ‘एक्झिट टेस्ट’?

$
0
0

Siddharth.Kelkar@timesgroup.com

Twitter : @SiddharthkMT

पुणे : इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या उमेदवाराला पदवी शिक्षणादरम्यान आवश्यक ते ज्ञान मिळाले का इथपासून ते तो रोजगारक्षम आहे का, इथपर्यंतची पडताळणी करणारी चाचणी घेण्याबाबत केंद्रीय पातळीवर विचार सुरू आहे. मेडिकल अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित असलेल्या ‘एक्झिट टेस्ट’च्या धर्तीवरच इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठीची ही ‘एक्झिट टेस्ट’ असेल.

इंजिनीअरिंगची पदवी घेतलेले बहुतांश विद्यार्थी रोजगारक्षम नसल्याची ओरड गेली काही वर्षे उद्योग क्षेत्रातून होत आहे. त्यासाठी इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमात कालसुसंगत सुधारणा करण्यापासून प्रत्यक्ष शिक्षणात प्रात्यक्षिकांवर भर देण्यापर्यंतच्या उपाययोजना सुरू आहेत. त्यालाच पूरक म्हणून विद्यार्थ्याने घेतलेले ज्ञान; तसेच त्याची रोजगारक्षमता तपासणारी ‘एक्झिट टेस्ट’ घेण्याबाबतचा विचार सध्या सुरू आहे. तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) येत्या महिनाअखेर होत असलेल्या बैठकीत यावर विचारविनिमय होणार आहे. ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी ‘मटा’ला ही माहिती दिली.

देशभरातील विविध संस्थांत शिकवला जाणारा इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम, तो शिकवण्याची पद्धत, प्रात्यक्षिकांसाठी वापरली जाणारी साधने यामध्ये बऱ्यापैकी फरक असतो. त्यामुळे इंजिनीअरिंग कॉलेजांतून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेल्या ज्ञानसंपादनाची पातळीही वेगवेगळी असू शकते. ‘एक्झिट टेस्ट’च्या माध्यमातून त्याची पडताळणी करता येईल, असा विचार समोर आला आहे. उच्च शिक्षणासंदर्भात नेमलेल्या एका समितीनेही अशीच शिफारस केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आझम पानसरेंचा भाजपमध्ये प्रवेश

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आझम पानसरे यांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, अपक्ष सहयोगी आमदार महेश लांडगे उपस्थित होते. पानसरे यांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

आझम पानसरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पिंपरी-चिंचवडमधील राजकीय गणितं बदलणार आहेत. येथे लवकरच पालिका निवडणुका होत असून राष्ट्रवादीपुढे आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वरला हिमकणांची चादर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, महाबळेश्वर

देशासह राज्यात सर्वत्र थंडीचा कडका वाढत असताना महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वरही रविवारी त्याला अपवाद नव्हते. काश्मीर, कुलू-मनाली, सिमला येथे प्रचंड बर्फवृष्टी सुरू असतानाच महाबळेश्वरमध्येही थंडीचा जोर वाढल्याने प्रसिद्ध वेण्णा तलाव, लिंगमाळा परिसरात निसर्गाने हिमकणांची पांढरी शुभ्र दुलई पांघरलेली कायम पहावयास मिळाली.

निसर्गाच्या या चमत्काराची मौज मनमुराद लुटण्यासाठी पर्यटक, निसर्गप्रेमी, स्थानिक हौशींनी वेण्णा तलाव व लिंगमाळा परिसर बहरून गेला. हवामान खात्याच्या नोंदीनुसार शनिवारी या शहराचे किमान तपमान १०.६ अंश सेल्सियस होते, तर खात्यानेच नोंदविलेले दवबिंदू तपमान उणे ०.६ अंश सेल्सियस होते.

रविवारी भल्या पहाटेपासूनच वेण्णा तलावाच्या नौकाविहारासाठीच्या जेट्टीवर मोठ्या प्रमाणावर दवबिंदू गोठल्यामुळे हिमकण जम झाले, संपूर्ण जेट्टी पांढरीशुभ्र झाल्याचे दिसत होते. त्यामागील वेण्णा तलावाचा पृष्ठभाग थंड वाफांमुळे व्यापून गेल्याचे मनोहारी दृश्य निसर्गप्रेमींना पहावयास मिळाले. स्मृतिवन भागातही दवबिंदू मोठ्या प्रमाणात गोठल्यामुळे सर्व परिसर हिमकणांनी पांढराशुभ्र झाला. वनस्पतींची पाने, फुले, वेलींनी हिमकणांचा साज परिधान केल्याचे विहंगम दृश्य मोहून टाकत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मशिन खरेदीची खुली चौकशी

$
0
0

Rohit.Athavale

@timesgroup.com

Tweet - @AthavaleRohitMT

पिंपरी : हायपर बोलिक ऑक्सिजन थेरपी (एचबीओटी) मशिन खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आता संशयितांची खुली चौकशी करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटलसाठी आवश्यकता नसताना ७० लाख रुपयांचे हे मशिन ३ कोटी ७९ लाखांना खरेदी करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात अनेकांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करून अहवाल सरकारला सादर करण्यात आला होता. तसेच, तत्कालीन वैद्यकीय अधिक्षकांच्या पेशनमधील ठराविक रक्कम कपात करण्यात येत होती.

मशिन खरेदीच्या प्रक्रियेत सुरुवातीपासून वाद झाले होते. त्यासाठी तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद जगदाळे, तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. राजशेखर अय्यर आणि उपअधीक्षक डॉ. श्याम गायकवाड यांची चौकशी करण्यात आली. तसेच, दिवंगत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार यांच्यावरदेखील संशय व्यक्त करण्यात आला होता. खात्यांतर्गत चौकशी, विभागीय चौकशी, निवृत्त न्यायाधीशांमार्फतदेखील चौकशी यापूर्वी झाली आहे. महापालिकेने दोषारोपपत्रही सादर केले होते.

या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने (एसीबी) गोपनीय चौकशी केली होती. याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे पाठवून खुल्या चौकशीची परवानगी मागण्यात आली होती. ती आता मिळाली असून, एसीबीकडून अनेक संशयितांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘मटा’ शी बोलताना दिली आहे.

याप्रकरणात तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद जगदाळे यांच्या निवृत्ती वेतनातील १० टक्के रक्कम पुढील पाच वर्षांसाठी कपात करण्याचा ठराव करण्यात आला. त्यांच्यावर कारवाई करताना तत्कालीन सत्ताधारी पक्षाने नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषी डॉ. जगदाळे यांची पाठराखण केल्याची गंभीर आरोपही या काळात झाला होता. त्यावरून शिवसेनेने सह्यांची मोहीम राबविली होती. शिवनेता नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नागपूर येथे अधिवेशात याबाबत लक्षवेधी मांडली होती.

एचबीओटी मशिन खरेदी करताना ते परदेशातून खरेदी करणार असल्याचे दाखविण्यात आले होते. प्रत्यक्षात एका लघुउद्योजकाकडून हे मशिन बनवून घेण्यात आले. त्यानंतर हडपसर येथील पुरवठादारामार्फत ते महापालिकेला पुरविण्यात आले होते. खरेदी प्रक्रियेपासूनच वादात सापडलेले हे मशिन धूळखात पडून आहे. विशेष म्हणजे या खरेदीतील मशिनची अर्धी रक्कम संबंधित पुरवठादाराला महापालिकेकडून देण्यात करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे हे प्रकरण गाजल्यानंतर दोन वर्षांपूर्वी या मशिनच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांची उधळण महापालिकेकडून करण्याचे निश्चित झाले. त्यामुळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी व प्रशासन असा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता खुली चौकशी होणार असल्याने यावरूनही राजकारण रंगणार असल्याची चिन्ह आहेत.

यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा गदारोळ झाला होता. महापौरांसमोरील मानदंड याच प्रकरणावरून पळवून नेत गोंधळ घातल्याप्रकरणी तक्रारदार शिवसनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, शारदा बाबर, आता भाजपमध्ये असलेल्या नगरसेविका आशा शेंडगे यांचे निलंबन देखील करण्यात आले होते. नगरसेविका सीमा सावळे यांनी यावरून केलेल्या आरोपांवरून बराच गदारोळ माजला होता.

तत्कालीन पदाधिकाऱ्यांची देखील होणार चौकशी ?

एचबीओटी मशिन खरेदीची आवश्यकता आणि त्याच्या खरेदीत झालेला भ्रष्टाचार यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. एसीबीने मिळविलेल्या कागदपत्रांवरून प्रशासनासह तत्कालीन स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार असल्याचे समजते. येत्या काळात अनेकांच्या गळ्याभोवती लाचलुचपतच्या चौकशीचा फास आवळला जाणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीविरोधात मोर्चा, थाळी नाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेस पक्षाने सोमवारी पिंपरीत आंदोलन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. तेथून मुंबई-पुणे महामार्गाने मोर्चा पिंपरीत आला. पिंपरीतील आंबेडकर पुतळा चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात महापौर शकुंतला धराडे, माजी आमदार विलास लांडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे, भाऊसाहेब भोईर, हनुमंत गावडे, स्थायी समिती सभापती डब्बू आसवाणी, अतुल शितोळे, नाना काटे, नगरसेवक नाना लोंढे आदी सहभागी झाले होते. या वेळी महापौर धराडे, शहराध्यक्ष वाघेरे, मंगला कदम, भाऊसाहेब भोईर यांनी मार्गदर्शन केले. ‘तुमच्यावर विश्वास ठेऊन, देशाने रांगा लावल्या, किती काळा पैसा जमा झाला, आता देशाला सांगा, अशी मागणी करून, भाजप सरकाराच्या निषेधार्थ या वेळी घोषणा देण्यात आल्या.

काँग्रेसचा थाळी नाद

नोटाबंदीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने सोमवारी पिंपरीत ‘थाळी नाद आंदोलन’ करण्यात आले. पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नगरसेवक कैलास कदम, सरचिटणीस सजी वर्की, निगार बारस्कर, श्यामला सोनवणे, अॅड. नरेंद्र बनसोडे, संग्राम तावडे आदी सहभागी झाले होते. या वेळी साठे यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदी लादणाऱ्यांना जागा दाखवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सत्तेवर बसवण्याचा अधिकार नागरिकांना आहे; तसाच सत्ता राबविणारे चुकीचे वागले, तर त्यांना खाली खेचण्याचा अधिकारही त्यांच्याकडे आहे. नोटाबंदीमुळे झालेल्या त्रासाने सर्वसामान्य हैराण झाला असून, येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत हेकेखोरी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून द्या’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केले.

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंडईतील टिळक पुतळा येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. पक्षाचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक या वेळी उपस्थित होते. ‘बड्या घोषणा, पोकळ दावे, अर्थव्यवस्थेचे निघाले दिवाळे’, यांसारख्या घोषणांनी मंडईचा संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

‘काळा पैसा, भ्रष्टाचार याला आळा घालण्यासाठी आणि बनावट नोटा चलनातून रद्द करण्यासाठी सरकारच्या निर्णयाला पक्षाने सुरुवातीला पाठिंबाच दिला होता; पण ६० दिवसांनंतरही परिस्थिती बदललेली नाही. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, नोकरदार, मजूर, व्यावसायिक या सर्वांना नोटाबंदीचा फटका सहन करावा लागला आहे. बहुतांश नागरिकांकडे स्वकमाईचा पैसा असला, तरी अजूनही विविध बंधने असल्याने त्यांना पैशांचा वापरच करता येत नाही’, अशा शब्दांत केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर पवार यांनी कडाडून टीका केली.

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, आमदार जयदेव गायकवाड व अनिल भोसले, सभागृहनेते बंडू केमसे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार बापू पठारे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर व चंचला कोद्रे, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पानसरेंविषयी पिंपरीतच बोलीन

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आझम पानसरे यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याबद्दल विचारले असता, हा केवळ सत्तेसाठी केलेला प्रवेश असल्याची टीका करून त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. पानसरेंविषयी मी पिंपरीतच बोलीन, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस बनण्याचे स्वप्न; झाला चोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोलिस सेवेमध्ये जाण्याचे स्वप्न प्रयत्न करूनही पूर्ण न झाल्याने पोलिसाचेच बक्कल त्याने लंपास केले. मात्र, त्याची चोरी लपून राहिली नाही. पोलिस सेवेत जाण्याऐवजी त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला.

पोलिस शिपाई किसन रमेश चव्हाण यांनी याबाबत तक्रार दिली आहे. राहुल सुभाष जगताप (वय ३१, रा. डाळज क्रमांक, इंदापूर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. इंदापूर तालुक्यातील डाळज हे जगताप याचे मूळ गाव. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. जगताप याची पोलिस दलात भरती होण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी त्याने दोन वेळा प्रयत्न केला होता. तो पुण्यात वाकड परिसरात नातेवाईकाकडे राहत होता. काही महिन्यांपूर्वी शिवाजीनगर येथील मुख्यालयात तो पोलिस भरतीसाठी आला होता. त्यावेळीही त्याची निवड झाली नाही. परंतु, त्याला पोलिस होण्याची इच्छा असल्याने त्याने टोपी व बक्कल क्रमांक मिळवायचे ठरवले.

मुख्यालय आवारात पोलिसांच्या साहित्याचे भांडार आहे. त्या ठिकाणी पोलिस कर्मचारी संदीप गायकवाड यांचा बक्कल क्रमांक रंग लावून वाळत ठेवला होता. जगताप याने नजर चुकवून तो बक्कल क्रमांक चोरला. त्यानंतर दुकानातून टोपी, बेल्टही घेऊन त्याने पोलिस असल्याचा बनाव केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार ए. व्ही. सोनवणे रविवारी दुपारी बालाजीनगर परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी त्यांना येथील बसथांब्यावर एक व्यक्ती संशयास्पद दिसली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करून त्याची झडती घेतली. त्यावे ळी त्याच्याकडे टोपी, बक्कल क्रमांकाची प्लेट, बेल्ट मिळाला. त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. त्याने पोलिस म्हणून कोणाला त्रास दिला नसल्याचे तपासात आढळले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांत्रिक समितीने केली मेट्रो मार्गिकांची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील मेट्रो मार्गांवर जिओ-टेक्निकल आणि टोपोग्राफी सर्वेक्षण सुरू असतानाच, सोमवारी ‘महामेट्रो’च्या तांत्रिक समितीनेही प्रत्यक्ष प्रस्तावित मार्गातील विविध ठिकाणी भेटी दिल्या.

मेट्रोच्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) मेट्रो मार्गिकांच्या रचनेत काही बदल करावे लागणार का, याची चाचपणी करण्यात आली. त्यासाठी, ‘महामेट्रो’च्या तांत्रिक समितीचे तज्ज्ञ बेंगळुरूहून पुण्यात आले होते. गेल्या आठवड्यात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) मेट्रोच्या नदीपात्रातील कामाला स्थगिती दिली असली, तरी सर्वेक्षण आणि इतर कामांवर कोणतीही बंधने घातलेली नाहीत. त्यामुळे, शहराच्या सर्वच भागांमध्ये मेट्रोच्या सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू आहे. त्या अंतर्गत, महामेट्रोतर्फे नेमण्यात आलेल्या तांत्रिक समितीच्या सदस्यांनी सोमवारी मेट्रोच्या प्रस्तावित मार्गांची पुन्हा पाहणी केली. यामध्ये, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार यांच्यासह तांत्रिक समितीचे सदस्य आणि पुणे मेट्रोचे माजी ओएसडी शशिकांत लिमये, रेल्वे बोर्डाचे माजी सभासद सुधीर चंद्रा आणि इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सचे माजी सभासद अरविंद भटनागर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मेट्रोच्या डीपीआरनुसार प्रस्तावित मार्गिकांवर कोणत्या अडचणी येऊ शकतात, याची पाहणी त्यांनी केली. तसेच, या मार्गिकांमध्ये अंशतः बदल करायचे झाल्यास काय होऊ शकेल, याची पडताळणी करण्यात आली. प्रामुख्याने नदीपात्रातील मार्गाची आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना त्यांनी भेट दिली. सुधीर चंद्रा यांनी बेंगळुरू मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक म्हणून काम केले असून, त्यांचा या क्षेत्रातील अनुभव मोठा आहे. तांत्रिक समितीने केलेल्या या पाहणीनंतर महामेट्रोच्या कोरेगाव पार्क येथील कार्यालयात सविस्तर चर्चा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images