‘नोटाबंदीमुळे देशात १५ कोटी नागरिक बेरोजगार झाले असून आर्थिक आणीबाणीचे सावट आहे. देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे,’ असा दावा करून काँग्रेसने शहरातील विविध भागांत घंटानाद आणि थाळीनाद आंदोलन केले. टिळक चौक, सुभानशहा दर्गा आणि नरपतगिरी चौकात हे आंदोलन करण्यात आले.
टिळक चौकातील आंदोलनाची जबाबदारी युवक काँग्रेसकडे देण्यात आली होती. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ विश्वजित कदम, सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास लांडगे, देविदास भन्साळी, श्रीरंग चव्हाण, आबा बागुल, संगिता तिवारी, सतिश मोहोळ आदी टिळक चौकातील आंदोलनासाठी उपस्थित होते. नैसर्गिक आपत्तीने आधीच हैराण झालेला शेतकरी नोटाबंदीमुळे कठीण परिस्थितीतून जात असल्याची टीका पाटील यांनी केली. तर, देशात दोन कोटी नवीन रोजगार उपलब्ध करण्याची घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे १५ कोटी नागरिक बेरोजगार झाल्याची टीका शहराध्यक्ष बागवे यांनी केली.
नरपतगिरी चौकात सेवादल आणि एनएसयूआयतर्फे आंदोलन करण्यात आले. प्रदेश काँग्रेसचे सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, रवींद्र म्हसकर, भुषण रानभरे, लता राजगुरू, अविनाश बागवे, सदानंद शेट्टी आदी उपस्थित होते.
शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने सुभानशहा दर्गा येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे उपस्थित होत्या. रिझर्व्ह बँकेकडून दररोज निर्णय बदलण्यात येत आहेत. अर्थव्यवस्था ५० दिवसांनंतरही सुरळीत झालेली नाही, अशी टीका व्यवहारे यांनी केली. महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सोनाली मारणे, अंजनी निम्हण, भारती कोंडे, अनिल सोंडकर, नारायण चव्हाण, विलास वाडेकर, मिलिंद काची, अजित दरेकर, राजू शेख आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट