Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एटीएममधील पैसा होणार मोठा

$
0
0

Prasad.Panse@timesgroup.com
Tweet : @prasadpanseMT

पुणे : कॅलिब्रेट झालेले कोणतेही एटीएम केंद्र बंद न ठेवण्याच्या आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा फक्त ‘एटीएम’मधूनच देण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने बँकांना दिल्याने शहरातील कार्यरत एटीएमची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बँकांमधील रांगा कमी करण्यासाठी आणि बँकांच्या शाखांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

रिझर्व्ह बँकेतर्फे रोकड वितरण करतानाच याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. बहुतांश बँकांना प्रामुख्याने पाचशेच्या नोटांचे वितरण करण्यात आले आहे. या नोटा बँकेतील काउंटरवर न देता एटीएममध्येच टाकण्यात याव्यात, असेही या आदेशात म्हटले आहे. कॅलिब्रेट झालेले कोणतेही एटीएम बंद ठेवू नये. त्यात पुरेशी रक्कम असेल, याची खबरदारी घ्यावी; तसेच प्रामुख्याने पाचशे व शंभर रुपयांच्या नोटांचा यामध्ये भरणा असावा, अशा रिझर्व्ह बँकेच्या सूचना असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘रिझर्व्ह बँकेकडून आम्हाला पाचशे रुपयांच्या नव्या नोटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एटीएममधून पैसे काढणे खातेदारांसाठीही सोयीचे ठरेल,’ असे कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सांगितले. एटीएममधून पैसे दिल्यास सर्व खातेदारांना समप्रमाणात पैसे मिळतील, असा रिझर्व्ह बँकेचा हेतू असल्याचे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या सरव्यवस्थापकांनी सांगितले.

‘गेल्या आठवड्यापर्यंत रोख रकमेच्या अभावी शहरातील १० ते २० टक्क्यांच्या आसपासच एटीएम सुरू होती. स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्वाधिक एटीएम सुरू होती. आता मात्र, २५ ते ४० टक्क्यांदरम्यान एटीएम सुरू झाली आहेत. बँकांना मिळणाऱ्या रोख रकमेचा मोठा हिस्सा एटीएममध्येच टाकायचा असल्याने लवकरच कार्यरत एटीएमची संख्या वाढेल,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या एटीएममधून प्रत्येक खातेदाराला प्रत्येक एटीएम कार्डावर चोवीस तासांत २५०० रुपये काढता येतात. रोकडटंचाई अजूनही कायम असल्याने एटीएमद्वारे रक्कम काढण्यावरील मर्यादा कायम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उसने पैसे मागितल्याने दूधवाल्याकडून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उसने घेतलेले पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने दूधवाल्याने महिलेला पळवून नेऊन तिचा खून केल्याचा प्रकार हडपसर येथे उघडकीस आला आहे. महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारीवरून तपास करून, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने खून करणाऱ्या व्यक्तीला अटक केली.

कमल वसंत शिंदे (वय ५५, रा. हिंगणे चाळ, ससाणेनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी संतोष किसन हंडगर (वय ३०, रा. हडपसर) याला अटक केली आहे. या प्रकरणी एका महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांचे पती लष्करात होते. त्यांचे निधन झाल्यानंतर त्या एकट्याच राहत होत्या. आरोपी हंडगर याचा दूध टाकण्याचा व्यवसाय आहे. महिलेच्या घरी दूध टाकण्यासाटी जात असल्यामुळे त्यांच्यात ओळख झाली होती. या ओळखीतून त्याने शिंदे यांच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. मात्र, ते देण्यासाठी त्या तगादा लावत असल्याने हंडगर याने पैसे परत देत असल्याचे सांगून त्यांना बाहेर नेले. ही घटना ११ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या. कमल शिंदे यांच्या भाचीने त्या हरवल्याची तक्रार हडपसर पोलिसांकडे नोंदविली होती.

समाजिक सुरक्षा विभागाचे निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक चंद्रकांत जाधव, कर्मचारी कर्मचारी अविनाश मराठे, गणेश जगताप, प्रमोद म्हेत्रे, नितीन तेलंगे यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्या वेळी हंडगर याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने खून केल्याचे आढळून आले. हंडगर याने कमल शिंदे यांच्याकडून ४० हजार रुपये आणि त्याच्या मित्राने ९० हजार रुपये घेतले होते. हे पैसे परत करण्याच्या बहाण्याने त्यांना बाहेर नेले आणि कुऱ्हाडीने वार करून हंडगरने त्यांचा खून केला.
कोर्टाने त्याला २८ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामती मतदारसंघातील ९५६ कोटींच्या कामांना मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, दौंड

बारामती लोकसभा मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अनेक विकासकामे मंजूर झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

बारामती लोकसभा मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत असणारी रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, मजबुतीकरण, रस्ते पुनर्बांधणी, तसेच गड-किल्ल्यांकडे जाणारे रस्ते व त्या अनुषंगाने असलेल्या विकासकामांबाबत खासदार सुळे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदने देऊन कामे मार्गी लावण्याबाबत चर्चा केली होती. २२ डिसेंबर रोजी खासदार सुळे यांनी पुण्यातील बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रहाणे यांची भेट घेऊन कामाचा आढावा घेतला होता. बारामती लोकसभा मतदारसंघातील मंजूर झालेल्या कामांच्या निविदा निघून सदर कामे २०१७मध्ये सुरू होतील, असा मनोदय रहाणे यांनी या वेळी व्यक्त केला. या बैठकीला सुळे, रहाणे यांच्यासह बारामती शाखा अभियंता धोंगडे, इतर तालुक्यांचे शाखा अभियंता आणि प्रवीण शिंदे उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुढील विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. ही कामे एकूण ९५६.७६ कोटी रुपये खर्चाची आहेत. ती अशी - खडकवासला-डोणजे-खानापूर-रांजणे-पाबे रस्त्याची सुधारणा करणे (ता. वेल्हे, जि. पुणे - लांबी ३१.३ किमी - ७६.४४ कोटी रुपये); जेजुरी-मोरगाव-बारामती-कळंब-बावडा-नरसिंगपूर रस्त्याची सुधारणा करणे (लांबी ८३ किमी - २३६.०४ कोटी रुपये); डाळज-कळस-वालचंदनगर-नातेपुते-शिंगणापूर-दहिवडी-पुसेवाडी-कराड रस्त्याची सुधारणा करणे (१२४ किमी - ७७.२८ कोटी रुपये); पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांची सुधारणा करणे (पानशेत, तोरणा, सिंहगड, पुरंदर, लोणावळा, राजमाची - लांबी ८९ किमी - १७८.०८ कोटी रुपये); पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची सुधारणा करणे (हिंजवडी, जेजुरी व अतिरिक्त जेजुरी, चाकण, तळेगाव, रांजणगाव - ३८८.९२ कोटी रुपये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षाच्या पहाटे रंगणार ‘स्वरकट्यार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी जल्लोष केला जातो; पण नववर्षाच्या पहिल्या दिवशी काहीच केले जात नाही. ‘दिवाळी पहाट’प्रमाणे नववर्षाची पहाट साजरी करून नव्या वर्षाचे संगीतमय स्वागत करता आले तर...? गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तसा कार्यक्रम रंगणार असून, नववर्षाचे स्वागत स्वरसाजात होणार आहे.

एक जानेवारी रोजी डीपी रोडवरील पंडित फार्म्स येथे सकाळी सहा वाजता या अनोख्या व नवसंकल्पनेवर आधारित मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी या संकल्पनेला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. यंदा प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे व महेश काळे यांची ‘स्वरकट्यार’ रसिकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. या दोन्ही कलाकारांच्या भजन आणि नाट्यगीतांची ही सुरेल मैफल असेल.

‘हा एक वेगळा प्रयोग आहे. मागील वर्षी जाणत्या रसिक-श्रोत्यांना ही संकल्पना खूप आवडली होती. या वेळी मी आणि महेश काळे कला सादर करणार आहोत. आमची स्वरकट्यार रसिकांच्या मनाचा ठाव घेईल, अशी माझी खात्री आहे,’ अशी भावना राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली.

‘आपण नववर्षाचे स्वागत जल्लोष व वेगळ्या स्वरूपात करतो; मात्र ही ‘नववर्ष पहाट’ साजरी करण्याची नवसंकल्पना अभिनव व उत्तम आहे. यंदा या मैफलीत मी प्रथमच गाणार आहे. ही मैफल नवी परंपरा घालून देईल. नववर्षाची सूरमयी सुरुवात अधिक मंगलमय होईल,’ असा विश्वास महेश काळे यांनी व्यक्त केला. रसिकांनी या अनोख्या मैफलीचा आनंद घेऊन नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्यांच्या बातम्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

$
0
0

सरकारच्या आदेशाला केराची टोपली

म. टा. प्रतिनिधी, बारामती

वृत्तपत्रांमध्ये दररोज येणाऱ्या समस्यांच्या बातम्यांबद्दल खुलासे करण्याचे आदेश राज्य सरकारने दहा महिन्यांपूर्वी दिले होते; मात्र प्रशासनाच्या सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना याचा विसर पडला आहे. सरकारकडून लोकहितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नागरिकांच्या विविध समस्या, तसेच विशिष्ट भागातील अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांकडून कामे होणे अपेक्षित आहे. सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करणेही अपेक्षित आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, महसूल, रस्ते, पाणी, वीज अशा अनेक महत्त्वाच्या विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम करून लोकाभिमुख प्रशासन राबवणे गरजेचे आहे; मात्र बहुतांश वेळी सरकारच्या विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सर्रास घडत असतो. या बाबीकडे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होते. अशा वेळी वृत्तपत्र, तसेच विविध वाहिन्यांच्या माध्यमातून बातम्या प्रकाशित करून समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होत असतो; मात्र काही निगरगट्ट अधिकाऱ्यांकडून अशा बातम्यांकडेही दुर्लक्ष होते. यामुळे नागरिकांच्या समस्या-अडचणी कायम राहतात. या प्रकाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने परिपत्रक काढून बातम्यांबाबत खुलासे सादर करण्याचे आदेश दिले होते; मात्र बारामती उपविभागातील प्रत्येक खात्याच्या विभागाकडून या महत्त्वाच्या आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारने लोकहितासाठी घेतलेल्या निर्णयाची पायमल्ली होत आहे. प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अमर्याद मनमानीला कोण आवर घालणार, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. जवळपास सर्वच प्रशासकीय विभाग नागरिकांच्या समस्या-अडचणींबाबत उदासीनता दाखवत असल्याचे या कृत्यातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदूकधारी सुरक्षारक्षक काढले

$
0
0

‘एफटीआयआय’मध्ये मुक्त वातावरणाची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) बंदूकधारी सुरक्षारक्षक नको, असा निर्णय घेण्यात आला आहे. ‘संस्थेची सुरक्षा व्यवस्था चांगली राहील; पण त्याचबरोबर संस्थेतील मुक्त वातावरणाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न होणार नाही. लोकांनाही संस्थेत प्रवेश दिला जाईल,’ असे ‘एफटीआयआय’चे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले.

‘लेटरबॉम्ब’च्या पार्श्वभूमीवर संस्थेतील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. ‘एफटीआयआय’मध्ये यापुढे महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक महामंडळाची सुरक्षा असेल. त्यातील काही सुरक्षारक्षक बंदूकधारी होते. संस्थेचे महत्त्व लक्षात घेता सुरक्षा आवश्यक असली, तरी कलेचे शिक्षण देणाऱ्या संस्थेतील मुक्त वातावरण त्यामुळे हरवत चालल्याचे बोलले जात आहे. नवीन वर्षारंभाआधी शैक्षणिक संस्थेचे रूपांतर कारागृहात व्हायला सुरुवात झाल्याची टीका विद्यार्थ्यांनी केली होती. याबाबत ‘मटा’मध्ये बुधवारी ‘फिल्म इन्स्टिट्यूट की कारागृह?’ हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर ‘संस्थेमध्ये यापुढेही मुक्त वातावरण राहील,’ असे आश्वासन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनादरम्यान संस्था चर्चेत आल्याने तेव्हापासून संस्थेतील मुक्त प्रवेशावर बंधने आली आहेत. यादरम्यान एफटीआयआय व रानडे इन्स्टिट्यूटला पार्सलद्वारे स्फोटके आणि धमकीचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणवेशातील ५० रक्षक सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

‘संस्थेची सुरक्षा वाढवली आहे; पण संस्थेत कारागृहासारखी परिस्थिती नाही. एक सुरक्षारक्षक बंदूकधारी होता; पण तशी आवश्यकता नसल्याचे कळवण्यात आले आहे. यापुढे बंदूकधारी सुरक्षारक्षक संस्थेत नसतील. कोणाच्याही स्वातंत्र्याचा संकोच करण्याचा उद्देश नाही. कामानिमित्त नागरिकांना संस्थेला भेट द्यायची असेल तर पूर्वीप्रमाणेच गेटजवळ नोंद करून आत सोडण्यात येईल; पण संस्था पाहण्यासाठी येणाऱ्या एखाद्या नागरिकाला ओळखीशिवाय आत सोडणे शक्य होणार नाही. व्यक्तीला आत सोडले तरी माहिती कोण देणार, हा प्रश्न आहे. शाळा, कॉलेज, संस्थेला किंवा नागरिकांना एक ग्रुप करून आत येता येईल. पूर्वसूचना दिली तर संस्थेचे कर्मचारी सर्व विभाग दाखवतील व माहिती देतील. विद्यार्थ्यांच्या मुक्त वावरावर कोणतीही बंधने येणार नाहीत,’ असे कँथोला यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतसाहित्यातून दिसतो वैश्विक मानवतावाद

$
0
0

डॉ. रामचंद्र देखणे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महाराष्ट्राची संतपरंपरा विवेकी विचाराने प्रेरित आहे. संतांनी आपल्या साहित्यात तत्त्व, सौंदर्य आणि वास्तव मांडले आहे. सामाजिक समतेची शिकवण देणाऱ्या संतसाहित्यातून वैश्विक मानवतावादाचे दर्शन घडते,’ असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान यांच्यातर्फे एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात उद्धव कानडे यांनी डॉ. देखणे यांची मुलाखत घेतली. या वेळी डॉ. नयनचंद्र सरस्वते लिखित ‘पत्रास कारण की’ या कादंबरीचे प्रकाशन झाले. संमेलनाध्यक्ष प्रकाश रोकडे, स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, डॉ. विकास आबनावे, प्रकाशक चंद्रकांत वानखेडे या वेळी उपस्थित होते.

डॉ. देखणे म्हणाले, ‘कविता हा कोणत्याही साहित्याचा आत्मा आहे. संतांनीही काव्य स्वरूपात रचना करून समाजाशी संवाद साधला. माझाही प्रवास कवितेकडून संतसाहित्याकडे झाला आहे. अवघड संकल्पना सोप्या करून सांगण्याची क्षमता कवितेमध्ये असते. भारूड, अभंग, लावणी या लोकवाङ्मयातून समाजप्रबोधन अधिक सहज होते. पत्र हा आपल्या जीवनातील जिव्हाळ्याचा विषय असतो. ‘पत्रास कारण की’ या पुस्तकातून नेमकेपणाने त्याची मांडणी केली आहे.’

‘बंधुता आणि संघर्ष’ या विषयावरील परिसंवादात हरिश्चंद्र गडसिंग, प्रा. शैलजा सांगळे, उद्धव कानडे आणि डॉ. अशोक पगारिया यांनी मते मांडली. ‘बंधुतेचे बीज पेरण्यासाठी कायम संघर्ष करावा लागतो,’ असा सूर या परिसंवादात निघाला. या वेळी उद्योजक विनोद गलांडे यांना पुणे पीपल्स बँकेचे बबनराव भेगडे यांच्या हस्ते ‘राजर्षी शाहू सामाजिक न्याय हक्क पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भालचंद्र भागवत यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरस्काराच्या रूपाने दलवाईंची पुनर्भेट

$
0
0

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे समाजकार्यासाठी जीवनगौरव (मरणोत्तर) जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांच्याशी मधुबन पिंगळे यांनी साधलेला संवाद...

...........

हमीद दलवाई यांना मिळालेल्या या जीवनगौरव पुरस्काराकडे कसे पाहता येईल?

- हमीद दलवाई यांनी मुस्लिम जगतामध्ये ऐतिहासिक अशा कार्याची सुरुवात केली. त्यांनी १९७०मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली आणि १९७७मध्ये मूत्रपिंडाच्या आजाराने त्यांचे वयाच्या ४५व्या वर्षी निधन झाले. म्हणजेच त्यांनी जेमतेम दहा वर्षेच काम केले; मात्र हे काम शतकभराएवढे मोठे आहे. संपूर्ण आयुष्यभर कार्य केल्यानंतर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते; मात्र दलवाई त्यासाठी अपवाद आहेत. तसेच महाराष्ट्र फाउंडेशननेही प्रथमच मरणोत्तर पुरस्कार दिला आहे. या पुरस्कारामुळे दलवाई यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित होतेच, त्याबरोबर त्यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या कार्यकर्त्यांनाही बळ मिळणार आहे. त्यामुळे या पुरस्कार समितीचे मी आभार मानतो.

सामाजिक चळवळ सुरू करताना दलवाईंचा द्रष्टेपणा कसा दिसतो?

- हमीद दलवाई हे निखळ बुद्धिप्रामाण्यवादी होते. या बुद्धिवादाला प्रमाण मानूनच त्यांनी धर्मचिकित्सा केली. इहवाद हा त्यांच्या विचारांचा गाभा होता आणि त्यामुळेच त्यांनी धर्मातील पोथीनिष्ठेवर हल्लाबोल केला. त्यामुळे मुस्लिम धर्माची आणि मुस्लिम राजकारणाची तर्कशुद्ध चिकित्सा केली. इहवाद, विज्ञान आणि विवेकवाद समोर ठेवूनच त्यांनी राष्ट्र आणि समाजहिताचे मुद्दे घेऊन कार्यास सुरुवात केली. धर्माच्या आणि व्यक्तिगत कायद्यामुळे मुस्लिम महिलांवर होणारे अन्याय, कुटुंब नियोजनाचा प्रसार, मदरशांऐवजी आधुनिक शिक्षणाचा आग्रह, मराठी भाषेचा स्वीकार, संवैधानिक आधुनिक मूल्यांचा प्रचार व त्यावर आधारित राजकारण या प्रश्नांवर त्यांनी समाजजागृती केली. या विचारांची प्रासंगिकता आजही कमी झालेली नाही.
दुर्दैवाने मुस्लिम आणि हिंदू, दोन्ही धर्मांतील जातीयवादी शक्तींनी दलवाई यांच्या विचारांचा सोयीप्रमाणे वापर केला, त्यांच्याविषयी अपप्रचारही केला. मुस्लिम समाजातील प्रबोधनाची सुरुवात दलवाई यांनी केली. हे काम अंतिमत: भारतीय समाज आणि मानवी समाजाच्या हिताचे होते. आपला जन्म मुस्लिम समाजात झाला आहे. हा समाज सुधारला पाहिजे, प्रबोधनाची चळवळ सशक्त झाली पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दाही प्रस्तुत वाटतो. देशातील धर्मवादी राजकारण व जगातील दहशतवादी शक्तींना थोपविण्याची क्षमता दलवाई यांच्या विचारातच आहे. यातूनच, त्यांच्या द्रष्टेपणाची जाणीव होते.

हमीद दलवाई यांच्या विचारांची आज कशी गरज आहे?

- हमीद दलवाई यांचे विचार त्यांच्या कार्यातून आणि साहित्यातून व्यक्त होतात. अगदी पु. ल. देशपांडे यांच्यापासून डॉ. रामचंद्र गुहा यांच्यापर्यंत सर्वांनीच दलवाई यांच्या विचाराची दखल घेतली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते, ‘देशातील हिंदूंनाही दलवाई यांचे विचार महत्त्वाचे आणि मार्गदर्शक आहेत.’ मुस्लिम महिलांचे कायदेशीर व न्यायालयीन हक्क आजही अनुत्तरित आहेत. तसेच, मुस्लिम जमातवाद व हिंदुत्ववाद या संदर्भातील त्यांचे विवेचन आजही पूर्णत: खरे वाटते. धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्माण करताना, धर्म हा पूर्णत: श्रद्धेचा भाग असावा. सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात धर्माचा अजिबात हस्तक्षेप नसावा, हा मुद्दा आजही तेवढाच महत्त्वाचा आहे. समान नागरी कायद्याचा मुद्दा त्यांनी ५० वर्षांपूर्वी मांडला होता. आजच्या पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी दलवाई हे दीपस्तंभ आहेत. या पार्श्वभूमीवर, दलवाई यांच्या विचारांची आवश्यकता स्पष्ट होते.

आजचा तरुण, हमीद दलवाई यांच्या विचारांकडे कशा पद्धतीने पाहतो?

- मुस्लिम समाजातील तरुणांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. समाजामध्ये वावरताना केवळ मुस्लिम असल्यामुळे दाखवण्यात येणारा संशय किंवा द्वेष, शिक्षण-नोकरीतील उदासीनता आणि मार्गदर्शनाचा अभाव यांमुळे तरुणाची होरपळ होत आहे. त्याचा गैरफायदा घेणारेही आहेत; मात्र शिक्षित तरुण अंतर्मुख होऊन जगाकडे पाहत असतो. त्यामुळेच धर्मातील पोथीनिष्ठता व सुधारणेविषयीची अनास्था या तरुणांना बेचैन करणारी आहे. या तरुणांच्या दृष्टीने दलवाई हे आशास्थान आहे. त्यामुळेच, दलवाई यांच्यावर विविध पातळ्यांवर संशोधन होत आहे. त्यांचे साहित्य, त्यांचे कार्य, मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या विविध चर्चासत्रांमध्ये सादर होणारे शोधनिबंध यातून हे संशोधन दिसून येते. हमीद दलवाई स्टडी सर्कलमध्ये तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. बकरी ईदच्या दिवशी ‘प्राण्यांची हत्या नको, रक्तदान करा’ हा उपक्रम राज्यभर पोहोचला आहे. तसेच ‘भारताचा अभिमान, संविधानाचा सन्मान’ हे घोषवाक्यही तरुणांना आकर्षित करत आहे. मुस्लिम महिलांच्या प्रश्नावर कार्य करणाऱ्या जवळपास ५० संघटना उभ्या राहिल्या आहेत. शहाबानो, शबानाबानो, सायराबानो अशा अनेक महिला उभ्या आहेत आणि त्यांना दलवाई यांच्या विचारांचा आधार वाटतो. त्यामुळेच दलवाई यांना अपेक्षित असणाऱ्या समाजनिर्मितीमध्ये युवक नक्कीच योगदान देतील.
महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारामुळे दलवाई यांच्या विचारांची पुनर्भेट होत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. गेल्या पाच-सात वर्षांमध्ये मंडळाकडे तरुण आकर्षित होत आहेत. विविध उपक्रम सुरू असून, मुस्लिम सत्यशोधक पत्रिका नियमित स्वरूपामध्ये प्रकाशित होत आहे. या पत्रिकेबरोबरच ‘साधना’ प्रकाशनाने दलवाई यांची अनेक पुस्तके पुनर्प्रकाशित केली आहेत. ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ या महत्त्वाच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित होत आहे. मंडळाच्या व दलवाई यांच्या पाठीशी असणाऱ्या प्रत्येकाचेच आम्ही ऋणी आहोत. या सहकार्याच्या बळावरच मंडळाचे कार्य राष्ट्रीय पातळीवर उभे करणार आहोत. या प्रयत्नांना पुरस्कारामुळे मोठे बळ मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शोध मराठी मनाचा’ संमेलन यंदा मुंबईत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जागतिक मराठी अकादमी व श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेले ‘शोध मराठी मनाचा’ हे संमेलन येत्या सात आणि आठ जानेवारी रोजी मुंबईत दादरला शिवाजी मंदिर येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी अमेरिका येथील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश राचमाले यांची निवड झाली आहे.

‘संमेलनाचे यंदाचे चौदावे वर्ष आहे. जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या समारंभात ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (रंगभूमी) व सचिन पिळगावकर (चित्रपट) यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,’ अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली आहे.

‘हे संमेलन चित्रपट, रंगभूमी, कला, साहित्य, क्रीडा, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यावर आधारित असून, यामध्ये विविध देशांतील लोक सहभागी होणार आहेत. विविध कार्यक्रमांसह संमेलनात परदेशातील व भारतातील कर्तृत्ववान मराठी माणसांच्या मुलाखती रंगणार आहेत. संमेलनाच्या समारोपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना निमंत्रण देण्यात आले आहे,’ असे फुटाणे यांनी सांगितले.

जागतिक पातळीवर मराठी भाषिकांना एकत्र आणावे, मराठी बाणा, संस्कृती यांची जपणूक करून ती वृद्धिंगत करावी, उद्योग-व्यवसायात मराठी माणसाने प्रगती साधण्याकरिता त्याला उद्युक्त करावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, अशा उद्देशाने शरद पवार, मनोहर जोशी, भा. कृ. देसाई व माधव गडकरी यांनी १९८९ साली जागतिक मराठी परिषदेची स्थापना केली. जागतिक मराठी परिषदेची एक शाखा म्हणून १९९४ साली जागतिक मराठी अकादमीची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत विविध शहरांमध्ये पार पडलेल्या या संमेलनाचे अध्यक्षपद प्रा. राम शेवाळकर, डॉ. श्रीराम लागू, विजय तेंडुलकर, प्रकाश भालेराव, निळू फुले, सुहास काकडे, मंगेश पाडगावकर, डॉ. विजय भटकर, अरुण फिरोदिया, आशुतोष गोवारीकर, मधू मंगेश कर्णिक, सुनील सूर्यवंशी, विक्रम गोखले यांनी भूषवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाईला ‘पंख’ नवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंख संस्था आणि क्विकहील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाळांगण’ प्रकल्पांतर्गत कासेवाडी झोपडपट्टीमध्ये नुकतेच व्यसनमुक्तीसंदर्भात विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आले. या वेळी कासेवाडीतील किशोरवयीन मुलांनी एकत्र येऊन ‘फ्लाइंग यंगस्टर्स’ हा ग्रुप सुरू केला.

पंख संस्थेतील स्वयंसेवकांनी ‘दारूमुक्ती आणि व्यसनमुक्ती’ या विषयावर पथनाट्य सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. दारू, सिगारेट, अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती पथनाट्यामध्ये देण्यात आली. स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे आणि खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलिस निरीक्षक संभाजी शिर्के, पोलिस अधिकारी भरत चापाईकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, ‘झोपडपट्टीतील मुलांचे पालक कामाला जातात. मुलांची शाळा आणि दिनचक्राबद्दल पालक अनभिज्ञ असतात. त्यामुळे अनेक मुले वाईट मार्गाला लागतात. या वस्तीतील मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.’

ग्रुपच्या मुलांना या वेळी त्यांचे अनुभव सांगितले. स्वप्नील शेलार म्हणाला, ‘पूर्वी आम्ही कट्ट्यावर बसायचो. माझे काही मित्र व्यसनाच्या आहारी गेले होते. काही मुले प्रेमभंग झाल्यामुळे व्यसन करायची, तर काही जण ‘क्रेझ’ म्हणून व्यसन करायचे. पंख संस्थेच्या प्रतिनिधींनी आम्हाला मार्गदर्शन करून व्यसनांपासून दूर आणले.’

बागवे यांनीही मनोगत व्यक्त केले. पंख संस्थेच्या विश्वस्त सीमा ननावरे आणि संचालिका स्मिता आपटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींचे सरकार हुकूमशाहीचे

$
0
0

अजित पवार यांची भाजपवर कडाडून टीका

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

‘बहुचर्चित पुणे मेट्रोचा पहिला टप्पा स्वारगेट ते पिंपरीऐवजी कात्रज ते निगडीपर्यंत असायला पाहिजे. तसे न केल्यास मेट्रोचा नागरिकांना भविष्यात काहीही उपयोग होणार नाही. पुणे मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमाला पक्षाचे नेते शरद पवार व्यासपीठावर उपस्थित असतानाही त्यांना बोलू दिले नाही. भाजपचे हे वागणे बरे नव्हे. पंतप्रधान मोदी यांचे सरकार हुकुमशाहीप्रमाणे देश चालवत आहे,’ अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

कळस प्रभागाचे स्थानिक नगरसेवक सतीश म्हस्के यांच्या प्रभागातील विविध विकासकामांचे अजित पवार यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते. या वेळी महापौर प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण, स्थायी सामिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी आमदार बापू पठारे, माजी महापौर चंचला कोद्रे, प्रकाश म्हस्के, मीनाक्षी म्हस्के आदी मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला पन्नास दिवस होत आले, तरी अद्याप जनतेचे ‘नोटाहाल’ संपलेले नाहीत. पाच ते सहा टक्के काळा पैसा नष्ट करण्यासाठी देशावर अभूतपूर्व असा ‘नोटाबंदी’चा निर्णय लादला गेला. परदेशातील काळा पैसा आणण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने एक रुपयासुद्धा परदेशातून आणला नाही. ‘नोटाबंदी’मुळे सामान्य जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.’

‘दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक तास रांगांमध्ये उभे राहावे लागत असताना धनदांडगे लोक बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून लाखो, कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करून घेत आहेत. ‘नोटाबंदी’मुळे भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळेनासा झाला आहे. मोदींच्या हट्टापायी देशाचे अतोनात नुकसान होऊ लागले आहे,’ अशी टीकाही अजित पवार यांनी केली.

‘इंदू मिलच्या जागेवर अद्याप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम सुरू झालेले नाही; पण मुंबईसह महत्त्वाच्या पालिकांतील सत्ता काबीज करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन केले जाते. धनगर, मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय घेण्यात अपयशी झालेले भाजप सरकार केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेची दिशाभूल करण्याचे राजकारण करत आहे. भाजपचे अनेक नेते गुजरात आणि दिल्लीमधील असल्याने त्यांना राज्याचे काही देणे-घेणे नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे,’ अशी विनंती पवार यांनी केली.

...........

समुद्राला जशी लाट येते, तशी ओहोटीदेखील येत असते. मोदींच्या लाटेत अनेक जण खासदार, आमदार झाले; मात्र मोदींच्या हुकुमशाहीमुळे भविष्यात भाजपला ओहोटी लागणार आहे. त्यामुळे केंद्रात सत्तेत आलेला भारतीय जनता पक्ष ओहोटीत आल्या पावली माघारी निघून जाईल.
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

.............................................................

पवारांच्या सभेसाठी मुलांना गारठ्याची ‘शिक्षा’

गर्दी दिसण्यासाठी पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना अडीच तास बसवले

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला अधिकाधिक नागरिकांची गर्दी दिसण्यासाठी कळसचे स्थानिक नगरसेवक सतीश म्हस्के यांनी पुणे महापालिकेच्या सीताराम देवकर विद्यालयातील शेकडो मुलांना कडाक्याच्या थंडीत गणवेशात अडीच तास खुर्चीवर बसवून ठेवले होते. मोकळ्या मैदानात वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे काही विद्यार्थी लपून घरी निघून गेले, तर अनेक विद्यार्थी थंडीत सभा संपेपर्यंत थांबून राहिले. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांसमोर सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी लहान मुलांचा वापर केल्याबद्दल अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली.

कळस प्रभाग क्रमांक पाचमध्ये स्थानिक नगरसेवक सतीश म्हस्के यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या विविध विकासकामांचे मंगळवारी अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर म्हस्के यांनी गावातील मोकळ्या जागेवर जाहीर सभेचे आयोजन केले होते.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी नव्याने उदयास आलेल्या कळस-धानोरी या प्रभाग क्रमांक एकमध्ये एससी आणि खुला (पुरुष) अशी दोन आरक्षणे पडली आहेत. आपल्यालाच उमेदवारी मिळावी या हेतूने म्हस्के यांनी पवार यांच्या जाहीर सभेच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांची जमवाजमव करून गर्दी केली होती. पुणे महापालिकेच्या कळस गावातील सीताराम देवकर विद्यालयातील पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सभेत पाठवण्याचे आदेश म्हस्के यांनी शाळा प्रशासनाला दिले होते, अशी माहिती एका शिक्षिकेने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

या आदेशानुसार, देवकर विद्यालयातील दोनशे ते अडीचशे विद्यार्थी शाळेच्या गणवेशातच मंगळवारी सायंकाळी सात वाजता सभेच्या ठिकाणी हजर झाले होते. मोकळ्या मैदानात कडाक्याच्या थंडीत दीड तास एकाच ठिकाणी बसून राहिल्यानंतर साडेआठ वाजता कार्यक्रम सुरू झाला. थंडीमुळे अनेक विद्यार्थी गारठले आणि लपून घरी पळून गेले. काही मुले थंडीतही सभा संपेपर्यंत खुर्चीवर बसून राहिली. मुलांना खाऊ म्हणून आयोजकांतर्फे सामोसे देण्यात आले. एका राजकीय सभेसाठी शाळेतील मुलांना थंडीत बसवून ठेवल्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी शुभांगी चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; पण तो होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरखरेदीला मिळणार चालना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सदनिका खरेदीवरील स्टँप ड्युटीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट, बिगरशेती परवान्याची गरज नाही, तसेच सरकारी आणि डोंगरमाथ्यावरील जमिनींचाही समावेश एकूण क्षेत्रात करण्यास मान्यता अशा विविध सवलतींचा वर्षाव राज्य सरकारने नगर नियोजन (टी. पी. स्कीम्स) वसाहतींसाठी केला आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात नगर वसाहत योजनांना, पर्यायाने घरखरेदीला मोठी चालना मिळणार आहे.

पुणे आणि कोकण विभागातील शहरे स्मार्ट करण्यासाठी विशेष न​गरवसाहत प्रकल्पांच्या नियमांमध्ये फेरबदल करून त्याचे ‘एकात्मिक नगरवसाहत प्रकल्प’ असे नामकरण करण्यात आले आहे. या संदर्भातील नियम नगरविकास खात्याचे अवरसचिव संजय सावजी यांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. या नव्या नियमांमुळे नगर वसाहत योजनांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या वसाहतींसाठी ४० हेक्टरच्या किमान क्षेत्राच्या अटीची पूर्तता करणे, हे मोठे आव्हान ठरले होते. आता त्यामध्ये डोंगरमाथा (हिल टॉप) आणि ब्लू लाइन मधील क्षेत्राचा एकूण क्षेत्रफळात समावेश करण्यास यानुसार परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या क्षेत्राचा एकूण क्षेत्रात समावेश केला, तरी त्यावर बांधकामाचे निर्बंध कायम राहणार आहेत. या क्षेत्रात दहा टक्क्यांपर्यंत सरकारने दिलेल्या जमिनींचाही समावेश या क्षेत्रफळात करण्याची मुभा देण्यात आली आहे. नगर वसाहतींना मान्यता देण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी आणि नगर नियोजन विभागाच्या सहसंचालकांकडे देण्यात आले आहेत. या नगर वसाहतींमध्ये मोकळी जागा ठेवण्याची (ओपन स्पेस) मर्यादा दहा टक्क्यांवरून साडेबारा टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे; तसेच हरित इमारतींचे निकष (ग्रीन बिल्डिंग) यासाठी बंधनकारक करण्यात आले आहेत. आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंधरा टक्के सदनिका राखून ठेवण्याचे बंधन आहे. त्यापैकी २५ टक्के सदनिका आर्थिक दुर्बल आणि उर्वरित ७५ टक्के सदनिका कमी उत्पन्न गटाच्या नागरिकांसाठी राखून ठेवण्यात येणार आहेत. बांधकामांच्या जोते तपासणीचे अधिकार संबंधित आर्किटेक्टकडे देण्यात आल्याचे यामध्ये म्हटले आहे.

स्टँप ड्युटीत सवलत

सदनिका खरेदीवरील स्टँपड्युटीमध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. त्याबरोबरच बिगरशेती परवानाही गरजेचा नाही, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी विकसन शुल्कही (डेव्हलपमेंट चार्जेस) लागू होणार नाहीत. यापूर्वी मान्यता मिळालेल्या नगर वसाहतींनाही नव्या नियमांचा फायदा घेता येणार आहे. या तरतुदींमुळे नगर वसाहतींना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, अशी आशा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नव्या तरतुदी

- सदनिका खरेदीवरील स्टँप ड्युटीत पन्नास टक्क्यांपर्यंत सवलत.
- ‘एनए’ची गरज नाही.
- विकसन शुल्क नाही.
- प्लिंथ चेकिंग आर्किटेक्टकडे.
- सरकारी जागा, डोंगरमाथा यांचा एकूण क्षेत्रफळात समावेश; मात्र बांधकामांवरील निर्बंध लागू.
- ग्रीन बिल्डिंग निकष बंधनकारक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा मुले जन्माला घाला असे सांगणे हा वेडेपणा

$
0
0

डॉ. कुमार सप्तर्षी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आयएसची चळवळ हा जसा वेडेपणा आहे, त्याचप्रमाणे ‘दहा मुले जन्माला घाला. परमेश्वर त्यांच्या संगोपनाची काळजी घेईल,’ असे सांगणे हादेखील वेडेपणा आहे. ‘आयएस’ला रोखणे आवश्यक आहे, तसेच मुले जन्माला घाला असे सांगणाऱ्यांनाही रोखणे आवश्यक आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी, दहा मुले जन्माला घालण्याच्या शं‍कराचार्यांनी दिलेल्या सल्ल्याची बुधवारी खिल्ली उडवली.

‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या पी. ए. इनामदार पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. पी. ए. इनामदार यांचा ७१वा वाढदिवस बुधवारी साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, नाटककार संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते बाबा शिंदे यांना ‘पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देण्यात आला. कुलकर्णी यांच्या वतीने राजेंद्र धारणकर यांनी सन्मान स्वीकारला. तसेच डॉ. आर. गणेसन, आणि सईद ए. मौलवी यांना ‘पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. या वेळी माजी सहायक पोलिस महासंचालक अशोक धिवरे, सुरेश (काका) धर्मावत, डॉ. ऊर्मिला सप्तर्षी, संदीप बर्वे, गौरी बीडकर उपस्थित होते.

डॉ. सप्तर्षी म्हणाले, ‘जगात अनेक देशांत एकच धर्मपद्धती असतात. भारत हा एकच देश असा आहे, ज्यात १२ धर्मांचे अनुयायी राहतात. इतक्या धर्मांसह आपण काळाच्या कसोटीवर टिकलो आहोत. भारत हा १२ धर्म एकत्र नांदणारा देश असल्याने आपल्याला १२ धर्मांचा गोडवा घेण्याची संधी आहे. ती संधी नाकारणे आणि धर्माच्या नावाने एकमेकांना भडकवणे थांबले पाहिजे. तरच दंगामुक्त समाज घडेल. ‘आयएस’ची चळवळ हा जसा वेडेपणा आहे, तसाच १० मुले जन्माला घाला असे सांगणे, हा वेडेपणा आहे. ‘आयएस’ला रोखणे आवश्यक आहे, तसेच यांनाही रोखणे आवश्यक आहे. अल्पसंख्य समाजातील मुलींना शिक्षणाची दारे उघडण्याचे पी. ए. इनामदार यांचे कार्य अतुलनीय आहे. मुलींना शिकवणे हे परमेश्वराचे काम करण्यासारखेच आहे.’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूमाना शेख यांनी, तर प्रास्ताविक दीपक बीडकर यांनी केले. लतिफ मगदूम यांनी आभार मानले.

रोज कशावर तरी बंदी येत आहे. ‘कॉस्मोपॉलिटन’ हा शब्द पुसण्याचे काम चालू आहे. अशा वेळी एकाने सांगून सव्वाशे कोटी जनतेने ऐकण्यापेक्षा सव्वाशे कोटी जनतेचे एकाने ऐकण्याची गरज आहे.
- संजय पवार, नाटककार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमेश सहस्रबुद्धे यांचे पुण्यात निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक रमेश सहस्रबुद्धे (वय ७८) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सहस्रबुद्धे यांनी वेगवेगळ्या विषयांवर एकूण ७६ पुस्तके लिहिली आहेत. अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांनी केलेले लेखन वाचकप्रिय ठरले. विज्ञान-कुतूहल, प्राणी-पक्षी निरीक्षण, बोधकथा, वैज्ञानिकांचे आणि थोरांचे किस्से असे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.
सहस्रबुद्धे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे राज्यातील पहिले मुख्य जनसंपर्क अधिकारी होते. अनेक वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिकांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले असून, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून देखील त्यांची व्याख्यानमाला प्रदर्शित झाली आहे. टेलिव्हिजन आणि विज्ञानसागरातील दीपस्तंभ या त्यांच्या दोन विज्ञानविषयक पुस्तकांना राज्यपुरस्कार लाभला असून, यातील एकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या इतर दोन पुस्तकांस बालकुमार साहित्य पुरस्कारही मिळाला आहे.
रोहा येथे १९८७ मध्ये झालेल्या विज्ञान परिषदेच्या संमेलनात त्यांच्या विज्ञानविषयक लेखन कार्याचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता. गोवा पाठ्यपुस्तक मंडळाने आठवीच्या पुस्तकात सहस्रबुद्धे यांचा पाठ समाविष्ट केला अूसन, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या टीवायबीएच्या अभ्यासक्रमासाठी त्यांच्या एका लेखाचा समावेश करण्यात आला आहे. निगडीतील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते अध्यक्ष होते. त्याचबरोबर अॅस्कॉप या पुण्यातील ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक संघांचा महासंघ फेस्कॉमच्या प्रादेशिक विभागाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबदलीसाठी फारशी गर्दी नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नोटाबंदीनंतर बाद झालेल्या नोटा बँकेत भरण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र, बँकेत पैसे भरण्यासाठी फारशी गर्दी होत नसल्याचे चित्र आहे. मोठी रक्कम बँकेत भरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या किरकोळ असून अधिकाधिक नागरिक दोन ते दहा नोटाच बँकेत जमा करत आहेत.
नोटाबंदीनंतर बाद नोटा बँकेत भरण्यासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. ही मुदत वाढवून देण्याविषयी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या नोटा बँकेत भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. परंतु, बँकांमध्ये आता या नोटा भरण्यासाठी फारशी गर्दी होत नसल्याचेच चित्र आहे.
‘आज दिवसभरात माझ्याकडे सुमारे १२५ व्यक्तींनी पैसे भरले. गेले काही दिवस हे प्रमाण २००-२५० च्या दरम्यान होते. आज पैसे भरलेल्यांपैकी ९० व्यक्तींनी बाद नोटा भरल्या. यामध्ये बहुतांश व्यक्तींकडील रक्कमही दोन ते पाच हजार रुपयांदरम्यान होती. सहाच व्यक्तींनी दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकेत भरली,’ असे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या रोखपालाने सांगितले.
दुसरीकडे बँकांना अजूनही तोकडी रक्कमच दिली जात आहे. त्यामुळे बँकांनाही रेशनिंग करावे लागत आहे. बुधवारीही अनेक बँकांतून दोन ते आठ हजारापर्यंत रक्कम देण्यात आली. काही खासगी बँकांनी बारा हजार किंवा त्याहून अधिक रक्कमही दिली. काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांना आज करन्सी चेस्टकडून कोणतीही रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी रेशनिंगवर भर दिला.

एटीएमच्या रांगाही घटल्या
रिझर्व्ह बँकेने आदेश देऊनही शहरातील कार्यरत एटीएमच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. मात्र, गेल्या आठवड्यापेक्षा अधिक एटीएम कार्यरत असल्याने एटीएम बाहेरच्या रांगा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत. अनेक एटीएममध्ये पाचशे व शंभरच्या नोटा मिळत असून, काही मोजक्याच एटीएममध्ये फक्त दोन हजार रुपयांची नोट उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाचखोर पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लाचखोर पोलिसांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शक्कल लढवून पोलिसांकडून पैशांची मागणी होत असल्यास मोबाइलमध्ये ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आवाहन तळीरामांना केले आहे.
वाहतूक पोलिसांकडून तळीरामांवर कारवाई करताना अनेकदा तोडपाणी करण्यात आल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर वाहतूक पोलिसांनी वरील तोडगा काढला आहे. ‘पुणे शहर वाहतूक पोलिसांतर्फे मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात कारवाई सुरू आहे. या वेळी पोलिस कर्मचारी पैशांची मागणी करत असतील तर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा. ०२० २६१२२००० आणि २६२०८२२५ या क्रमांकावर संपर्क साधा. पैशाची मागणी होत असेल, तर मोबाइलमध्ये ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग करा’, असे आवाहन तळीरामांना करण्यात आले आहे.
पोलिसांकडून तळीरामांवर कारवाई करत्यावेळी बॅरिकेडिंग केले गेले असले तर ती त्या बॅरिकेडिंगला वरील आशयाचा फलक लावण्यात येत आहे. त्यानंतर पोलिस ब्रेथ अॅनॉलायझरच्या माध्यमातून तळीरामांवर कारवाई करतात. अनेकदा पोलिसांकडून तळीरामांवर कारवाई करताना ‘तोडपाणी’ केल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर ही उपाययोजना करण्यात आली आहे. पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे भासवून तळीरामांना सोडण्यात येत होते. मात्र, मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास वाहतूक पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करण्यात येत नाही. पोलिस संबंधिताचा वाहन चालवण्याचा परवाना जप्त करतात आणि त्या चालकाविरुद्ध कोर्टात खटला पाठवतात. त्या वाहन चालकावर काय कारवाई करायची, याचा निर्णय कोर्टात होतो. अनेकदा पोलिसांकडून तोडपाणी करण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या वापरण्यात येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मान्यता

$
0
0

मुख्यमंत्र्यांचा निर्णय; लवकरच रिंग रोडही होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने विकासकामे मार्गी लावण्याचा झपाटा लावला आहे. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि रामवाडी ते वनाज या पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गाचे भूमिपूजन झाल्यानंतर आठवड्याच्या आतच दुसऱ्या टप्प्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग; तसेच वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी शहराबाहेरून रिंग रोड करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मान्यता दिली.
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण समितीची (पीएमआरडीए) बैठक मुंबईत झाली. या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे आदी उपस्थित होते. महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना, भाजपने आतापर्यंत रखडलेल्या विकासकामांना वेग देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग आणि रिंगरोड हे दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आहेत. या निर्णयांमुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. ‘पीएमआरडीए’ मार्फत हे प्रकल्प राबवले जाणार आहेत.
‘दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्गामुळे हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क येथील वाहतुकीची समस्या सुटणार आहे. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनकडून या मार्गाचा सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार झाला आहे. गेल्या शनिवारी झालेल्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजन सोहळ्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. या घोषणेला तीन दिवसच उलटले असताना हा सुपरफास्ट निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांना नववर्षाची भेट दिली आहे,’ असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
हिंजवडीतील आयटी पार्क येथे दोन लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुचाकी आणि चारचाकींसह सुमारे दीड ते दोन लाख वाहनांची वर्दळ या मार्गावर असते. सार्वजनिक आणि खासगी अशा ८८५ बसेस या मार्गावरून ये-जा करतात. पुण्यातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची वार्षिक उलाढाल १५०० कोटी रुपये आहे. त्यापैकी सुमारे ७५० कोटी रुपये उत्पन्न हिंजवडी आयटी पार्कमार्फत प्राप्त होते. मात्र, या परिसरात पायाभूत सुविधांची वानवा जाणवत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गाच्या जलद प्रक्रियेसाठी ‘पीएमआरडीए’ मार्फत हा प्रकल्प राबवला जाणार आहे, असे बापट यांनी स्पष्ट केले.
‘पुणे शहराच्या वाहतुकीचा प्रश्न या दोन्ही प्रकल्पांमध्ये मार्गी लागणार आहे. पुणेकरांसाठी नववर्षाची ही पर्वणी ठरणार आहे.’ असे ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी झगडे म्हणाले.

एका दृष्टिक्षेपात निर्णय
* २३ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग
* दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने तयार केला अहवाल
* ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारातून निधी उभारला जाणार
* १९९७ पासून रिंगरोडचा प्रस्ताव चर्चेत
* रिंगचा मार्ग १७० किलोमीटर लांबीचा
* रिंगरोडच्या मार्गातील २१ टक्के जमीन महापालिकेच्या मालकीची, तर २८ टक्के सरकारी. उर्वरित खाजगी.
* पूर्वीच्या आराखड्यात बदल करून ९० ऐवजी ११० मीटर रुंदीचा रस्ता असणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक भरतायत सेवापुस्तिका

$
0
0

महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाची ‘कामगिरी’

Harsh.Dudhe@timesgroup.com
@HarshDudheMT

पुणे : विद्यार्थ्यांना शिकविण्याखेरीज शिक्षकांना इतर शासकीय कामेही करावी लागतात, हे सर्वश्रुत आहेच. पण, त्याच बरोबर आता सेवापुस्तिका भरण्याच्या कामाचीही त्यात भर पडली आहे. पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर स्वत:ची सेवापुस्तिका (सर्व्हिस बुक) ‘अपडेट’ करण्यात आणि दुय्यम प्रत भरण्यात मग्न असल्याचे दृश्य बुधवारी पाहण्यास मिळाले.
राज्य सरकारकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने शिक्षकांना निवडणुकीची आणि इतर शासकीय कामे करावी लागतात. त्यातच आता महापालिकेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षकांवयर शिक्षण मंडळाने नवे काम लादले आहे. शिक्षकांना त्यांच्या सेवापुस्तिका अपडेट करण्याचे आणि भरण्याचे काम देण्यात आले आहे. या कामासाठी प्रत्येक शिक्षकाला दिवस आणि वेळ ठरवून दिली आहे. त्यानुसार शिक्षकाने शिक्षण मंडळाच्या इमारतीत यायचे आणि सेवापुस्तिका अपडेट करून त्याची दुय्यम प्रत तयार करण्याचे काम सोपविण्यात आले आहे.
सरकारी नियमानुसार शिक्षकांच्या अथवा सरकारी कर्मचाऱ्यांना सेवापुस्तिका भरण्याचे आणि अपडेट करण्याचे काम संबंधित आस्थापना विभागाकडे असते. मात्र, शिक्षण मंडळात या कामासाठी थेट शिक्षकांनाच जुंपण्यात आले आहे. बुधवारी या विभागातील कर्मचारी विभागाची कामे करण्याच मग्न होते. मात्र, सेवापुस्तिका अपडेट आणि भरण्याचे काम शिक्षकच करत होते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत सेवापुस्तिका भरणाऱ्या शिक्षकांकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘आम्हाला सेवापुस्तिका अपडेट करायला बोलावले आहे. या कामासाठी तारीख आणि वेळ ठरवून देण्यात आली आहे. मात्र, इथे आल्यानंतर सेवापुस्तिका अपडेट करण्याचे आणि सेवापुस्तिकेच्या दुय्यम प्रतमध्ये संपूर्ण नोंदी करण्याचे काम करावे लागत आहे. त्यामुळे आस्थापना विभागातील कर्मचारी नेमकी काय कामे करतात, असा प्रश्न पडला आहे.’ या कामासाठी शिक्षण मंडळाकडून शिक्षकांना पत्रही गेले आहे.
या विषयी विचारले असता, आस्थपना विभागाचे प्रमुख प्रकाश उमापे म्हणाले, की ‘शिक्षकांना केवळ सेवापुस्तिका अपडेट करण्याचे काम करण्यासाठी बोलावले आहे. प्रत्यक्ष सेवापुस्तिकेत नोंदी करण्याचे आणि सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत तयार करण्याचे काम आस्थापना विभागाच्या कारकुनांकडून करण्यात येणार आहे.’

निवृत्तांची सेवापुस्तिका अपडेट नाही
महापालिकेच्या शाळेतून जे शिक्षक निवृत्त झाले आहे, त्यांची सेवापुस्तिकाच ‘अपडेट’ नसल्याने त्यांना पेन्शन मि‍ळत नाही. त्यामुळे या शिक्षकांना केवळ सेवापुस्तिका अपडेट नसल्याच्या कारणामुळे पेन्शन रखडली आहे. साधारण जून महिन्यापासून त्यांची पेन्शन रखडली आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, असे शिक्षकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर वीस वर्षांनी रिंग रोडला मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी शहराबाहेरून रिंग रोड तयार करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. १९९७पासून रिंग रोडची चर्चा सुरू होते. त्यामुळे वीस वर्षांनी का होईना प्रतीक्षा संपली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी १९९७मध्ये रिंग रोडची आखणी करण्यात आली; पण भूसंपादन, निधीची अडचण आणि राजकीय दबावामुळे मूळ आखणीमध्ये बदल करण्यात आले. या रस्त्याचे सर्वेक्षण करून १७० किलोमीटर लांबीचा रस्ता अंतिम करण्यात आला. या रस्त्याच्या मूळ प्रस्तावात ९० मीटर रुंदी होती. त्याऐवजी ११० मीटर रुंदीचा रस्ता होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या दोन्ही विभागांनी रिंग रोडचे प्रस्ताव तयार केले होते. त्यापैकी कोणाचा प्रस्ताव मान्य करायचा, यावरूनही वाद झाला होता. आता ‘पीएमआरडीए’च्या पदरात झुकते माप पडले आहे.
या रस्त्याच्या आखणीत फेरबदल झाल्याने हरकती आणि सूचना मागवून प्रस्ताव राज्याच्या नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आला होता. या रस्त्याच्या मार्गातील सुमारे २१ टक्के जमीन ही महापालिकांच्या मालकीची, तर २८ टक्के जमीन ही सरकारी आहे. उर्वरित जमीन ही खासगी मालकीची आहे. त्यापैकी बहुतांश जमिनीवर सध्या अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणे हटवून हा रस्ता तयार करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

असा असेल मार्ग
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांच्या हद्दीबाहेरून हा रस्ता असणार आहे. उर्से, खेड-शिवापूर, लोणी, चाकणमार्गे तळेगाव स्टेशन असा हा रस्ता असेल. पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-मुंबई महामार्ग, एक्स्प्रेस वे, पुणे-बेंगरूळू आणि पुणे-नगर या प्रमुख महामार्गांना जोडणारा आणि छेदून जाणारा हा रस्ता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीविरोधात काँग्रेसचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेसकडून नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येणार असून, राज्यात ५ जानेवारीला सर्वत्र आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातही आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
‘नोटाबंदीचा निर्णय फसल्याची प्रचिती ५० दिवस पूर्ण होताना येत आहे. नोकरदार, सर्वसामान्य माणूस, शेतकरी, विद्यार्थी, तरुण सगळेच या निर्णयामुळे भरडले आहेत. बँकेत १५ लाख कोटी रुपयांच्या जुना नोटा जमा होत असतील, तर काळा पैसा गेला कुठे,’ असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. ‘बँकेत नागरिकांकडून जवळपास १५४ लाख कोटी रुपये भरले गेले आहेत. जिल्हा बँका, पतसंस्थांवर निर्बंध घालून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यात येत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्याला पीक कर्ज मिळालेले नाही. शेतकऱ्याला ऊस, दुधाचे पगार काढता येत नाहीत. एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. नाबार्डकडे पीक कर्जापोटीचे ३२ हजार कोटी पडून आहेत. जिल्हा बँकांमधून शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत नाही. सर्वसामान्यांची सहनशक्ती संपली असून लवकरच आक्रोश दिसेल, असेही पाटील म्हणाले.

भाजप नेत्यांकडेच नोटा कशा?
आतापर्यंत विविध यंत्रणांनी मारलेल्या छाप्यांमध्ये आणि जप्त केलेल्या नोटांमध्ये भाजप नेत्यांचीच सर्वाधिक नावे कशी येतात, या निर्णयाची त्यांना माहिती होती का, अशी टीका पाटील यांनी केली. भाजपनेही त्यांना आलेल्या देणगीची रक्कम जाहीर करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

‘राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर द्या’
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ६३ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावर भाजप किंवा पंतप्रधानांनी खुलासा केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images