Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जनतेच्या रक्षणात नेतृत्व ठरले अपयशी

0
0

शरद पवार यांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘गेल्या दोन-अडीच वर्षांत वर्षांत शेजारच्या देशातील अतिरेक्यांनी १०५ हल्ले केले; त्यामध्ये सुमारे शंभर जणांचा बळी गेला. हे हल्ले थांबविण्यासाठी देशाचे नेतृत्त्व अपयशी ठरले आहे,’ या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी टीकास्त्र सोडले. महापालिका-जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत पराभव झाला तरी चालेल, पण काहीही झाले तरी भाजप-शिवसेनेशी युती करणार नही, असेही सांगत समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे संकेत पवार यांनी दिले.
महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, नवाब मलिक, दिलीप वळसे-पाटील आदी या वेळी उपस्थित होते. ‘देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी माझ्या हातात सत्ता द्या. परदेशातील काळा पैसा बाहेर काढून गरिबांच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये भरण्याची आश्वासने दिली; ती फोल ठरली,’ असे पवार म्हणाले. देशाच्या सीमेचे आणि प्रत्येक नागरिकाचे रक्षण करण्याची जबाबदारी देशाच्या प्रमुखांची असते. अतिरेक्यांनी गेल्या दोन-अडीच वर्षांत केलेल्या हल्ल्यांमध्ये शंभराच्या आसपास मृत्युमुखी पडले. हे थांबविण्यास नेतृत्व अपयशी ठरले. नोटबंदीमुळे सामान्य जनतेला मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. बँकांच्या रांगांमध्ये गरीब माणूसच उभा आहे; धनवान नाही. परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी काही महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतचा कालावधी लागेल, असे सांगितले जाते. नोटाबंदीमुळे समाजामध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले असून, एकट्या मुंबईमध्ये काही दिवसातच एक लाख कामगारांच्या नोकऱ्या जाणार आहेत, असेही पवार यांनी नमूद केले.
आगामी निवडणुकीसाठी समविचारी पक्षांशी युती करण्यासाठी जिल्हा संघटनांना अधिकार देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. कार्यकर्त्यांना पाच वर्षे काम करण्याचे अधिकार या माध्यमातून मिळणार आहे. या बैठकीत काही जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची, तर काही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आघाडी न करण्याची भावना मांडली.

‘ओबीसी आरक्षणाला धक्का नाही’
कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजाला दिलेल्या सवलतींना धक्का न लावता त्यांच्या आरक्षणाचे जतन केले पाहिजे. दलितांना कायद्याने जे संरक्षण दिले आहे, त्यांना धक्का लागता कामा नये. ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. कोणाचे काढून कोणाला द्यावे, हा विचार आमचा नाही. मात्र हा विचार हिंदुत्ववादी जातीयवादी पक्षांकडून पसरवला जात असल्याचे पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसमधील इच्छुकांत मोठी वाढ

0
0

निवडणुकीसाठी मुलाखतींना सुरुवात; घोषणांनी काँग्रेसभवन दणाणले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘कोण म्हणतंय ५० टक्के.. हवे आहेत १०० टक्के’... ‘एकही भूल कमल का फूल’ काँग्रेस पक्षाचा विजय असो...या घोषणा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने काँग्रेस भवन दणाणले होते.
निमित्त होते... महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखतींचे. काँग्रेस भवनात बुधवारपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, चंद्रकांत छाजेड, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, सरचिटणीस अभय छाजेड, नगरसेवक आबा बागूल, अजित आपटे आदी मुलाखती घेण्यासाठी उपस्थित होते.
ढोलताशांच्या गजरात आपल्या नेत्याच्या जयजयकारात इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह काँग्रेसभवनात दाखल होत होते. आपणच कसे निवडून येऊ शकतो आणि आपल्यालाच कसे तिकीट मिळाले पाहिजे, हे पटवून देण्याची अहमहमिका त्यांच्यात लागली होती. प्रभागातील आपला जनसंपर्क कसा दांडगा आहे, निवडून येण्याची आपली क्षमता सांगतानाच ‘वॉर्डात कोणालाही विचारा; माझेच नाव समजेल,’ हे बजावण्यावर प्रत्येकाचा भर होता. प्रभागातील सर्वच गटांमधील इच्छुकांची वाढती संख्या पाहून मुलाखत घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. इच्छुकांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती.

इच्छुकांचे ६०० अर्ज
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी ५८९ इच्छुकांनी अर्ज नेले असून, त्यापैकी ५०९ अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित अर्ज पुढील दोन दिवसांत येतील. सर्वच प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून, आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.

एका प्रभागात तीनच अर्ज
आगामी निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेनुसार काँग्रेसला ४० प्रभागांमधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रभाग क्रमांक सातमधून २७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्याउलट प्रभाग क्रमांक चारमधून केवळ तीनच इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. काँग्रेसकडे प्रत्येक प्रभागात आणि सर्व विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुक असल्याचेही बागवे म्हणाले.

माजी आमदार बनणार निरीक्षक
आजी- माजी आमदारांना विधानसभा मतदारसंघानिहाय निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच, प्रमुख कार्यकर्त्यांना प्रभागनिहाय निरीक्षक म्हणून काम करावे लागणार आहे. येत्या निवडणुकीसाठी काँग्रेसने व्यूहरचना सुरू केली असून, प्रचारातही आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे.

आघाडी नकोच...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार वारंवार एकाच व्यासपीठावर दिसत आहेत. त्यातच ‘राष्ट्रवादी’कडून दिलेला शब्द पाळला जाण्याची कोणतीच शाश्वती नसते. त्यामुळे राष्ट्रवादीवर कसा विश्वास ठेवायचा, हा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत असल्याने आघाडी नकोच, अशी त्यांची भावना आहे. प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे, असा आग्रह धरण्यात येत असल्याचे बागवे म्हणाले.

पहिली यादी १० जानेवारीला

काँग्रेसच्या मुलाखती ३१ डिसेंबरपर्यंत संपतील. त्यानंतर इच्छुकांच्या नावांची छाननी करून अंतिम यादी तयार केली जाईल. प्रदेश कमिटीने अंतिम यादी ठरवण्याची जबाबदारी कार्ड कमिटीवर सोपवली आहे. कार्ड कमिटीचे एकमत झाले तर तीच यादी प्रदेश समिती मंजूर करील. काही जागांबाबत एकमत झाले नाही तर प्रदेश समिती त्यावर निर्णय घेईल आणि यादी मंजुरीची औपचारिकता पूर्ण करील असे आदेश आहेत. त्यानुसार मुलाखती संपल्यानंतर कार्ड कमिटीकडून छाननी सुरू होईल, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. त्यानुसार १० जानेवारीपर्यंत पहिली यादी जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न असेन, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’तही ‘इन्कमिंग’ सुरू

0
0

निवडून येणाऱ्यांना पक्षात घेण्याचे अजित पवारांचे संकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत विविध पक्षांतून भारतीय जनता पक्षाकडे जाणाऱ्या नगरसेवक-कार्यकर्त्यांचा ओढा वाढला असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही इतर पक्षांतील ‘दमदार’ उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी गळ टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुण्याचे कारभारी अजित पवार यांनीच बुधवारी त्याचे स्पष्ट संकेत दिले असून, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना पक्षात स्थान दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
पिंपरी-चिंचवडमधील सात विद्यमान नगरसेवकांनी बुधवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेस असाच धक्का देणार का, असे विचारले असता पवार यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. ‘एखाद्या प्रभागात आमचा पक्ष कमकुवत असेल आणि तेथे पक्षातील इच्छुकांची संख्याही मर्यादित असेल, तर अशा ठिकाणी सर्वांशी विचार-विनिमय करून इतर पक्षांतून एखादा सक्षम उमेदवार घेण्याबाबत चाचपणी केली जाऊ शकते. संबंधित उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आणि त्याची पार्श्वभूमीही तपासली जाईल आणि अंतिम निर्णय सर्वसहमतीनेच घेतला जाईल,’असेही पवार म्हणाले.
शहराच्या विकास आराखड्याला मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यामध्ये अनेक आरक्षणे बदलण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. भाजपच्या आमदारांनीच त्यासाठी पुढाकार घेतला असून, डीपी जाहीर झाल्यानंतर तसे स्पष्ट झाल्यास पक्षातर्फे पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

‘भाजपकडून फक्त गाजरंच’
निवडणुकीच्या तोंडावर हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या आयटी उद्योगातील तरुण पिढीला खुश करण्यासाठी शिवाजीनगर ते हिंजवडी या दरम्यानच्या मेट्रोला मान्यता देण्याचे गाजर दाखवण्यात आल्याची टीका अजित पवार यांनी केली. दोन-अडीच वर्षे प्रलंबित राहिलेल्या पुणे मेट्रोलाही याचप्रकारे महापालिका निवडणुकांपूर्वी मान्यता देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

काकडेंवरही निशाणा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात राज्यसभेची खासदारकी प्राप्त झालेल्या संजय काकडे यांचा समाचार घेताना ‘ज्यांचे सरकार त्यांच्यासोबत जाणारे हे धंदेवाईक आहेत’, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांच्याऐवजी पुढील काळात इतर कोणी पंतप्रधान झाले, तर ते संबंधित पक्षाचे सहयोगी सदस्यत्त्व स्वीकारतील, असा टोमणाही त्यांनी मारला.

तोलून-मापून बोलायचे ठरवले असल्याने कोणाच्या बापाला भीत नाही, असे म्हणण्याऐवजी कोणाच्या वडिलांना-डॅडींना भीत नाही, असे म्हणायला शिकलो आहे. बाप शब्द वापरला की कोणाला त्रास होतो, तसा वडील-डॅडी यामुळे होत नाही.
अजित पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे इच्छुकांची आज चिंतन बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इच्छुक उमेदवारांची महत्त्वाची बैठक आज, गुरुवारी कोथरूड येथील मोरेश्वर सभागृहात होणार आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीविषयी विचारमंथन होण्याची शक्यता असून, इच्छुकांना अर्ज प्रक्रिया आणि मुलाखतींच्या वेळापत्रकाची माहिती दिली जाणार आहे.
शहरातील प्रमुख राजकीय पक्षांनी पालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने विविध पातळ्यांवर नियोजन सुरू केले आहे. भारतीय जनता पक्षाने प्रा-रूप जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीने मुलाखतींचा टप्पा पूर्ण केला आहे. सध्या काँग्रेसच्या मुलाखती सुरू आहेत. इतर पक्षांच्या तुलनेत मनसेतून इतर पक्षांमध्ये जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आगामी निवडणुकीबाबत योग्य दिशा ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि अनिल शिदोरे मार्गदर्शन करणार असून, मोरेश्वर सभागृहात सकाळी ११ वाजता बैठक होईल. शहर पातळीवरील प्रमुख पदाधिकारी, विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष आणि सर्व प्रभागातील इच्छुक बैठकीला हजर असतील, अशी माहिती शहराध्यक्ष हेमंत संभूस आणि अजय शिंदे यांनी दिली.
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी पक्षातर्फे भांडारकर रोड परिसरात नवीन सुसज्ज कार्यालय सुरू करण्यात येणार असून, पक्षाच्या या ‘वॉर-रूम’मधूनच सर्व निवडणूक यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे. या कार्यालयाचे उद्घाटन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याचे संकेत पक्षातून देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरिदास चरवड यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हरिदास कृष्णा चरवड यांनी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेसचा राजीनामा देऊन नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर या वेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा कल्पना जाधव, वाहतूक सेना उपाध्यक्ष सुनील जाधव आणि भाजपचे कार्यकर्ते बाळासाहेब रोकडे, दीपक हेगडे यांनी बुधवारी शिवसेना संपर्कप्रमुख डॉ अमोल कोल्हे आणि शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शहर संघटक सचिन तावरे, शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र चिटणीस कीर्ती फाटक, राधिका हरिश्चंद्रे, अमोल हरपळे, शिरीष आपटे, श्रीकांत पुजारी या वेळी उपस्थित होते.

मी काँग्रेसमध्येच : सावंत
काँग्रेसच्या नगरसेविका शीतल सावंत यांनी आपण अद्याप काँग्रेसमध्येच असल्याचे स्पष्ट केले. येरवडा परिसरातून बुधवारी सावंत यांचे पती सचिन सावंत यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, आपण अद्याप काँग्रेसमध्येच असल्याचे शीतल सावंत यांनी सांगितले.

बागवे-अलगुडे यांच्यात जुंपली
मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपमहापौर मुकारी अलगुडे अनुपस्थित राहिल्याने काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या पार्श्वभूमीवर, अलगुडे सोमवारी मुलाखतींच्या कार्यक्रमांना काँग्रेस भवनात हजर होते. या वेळी, शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी अलगुडे यांना जाब विचारला असता ‘मी अजून काँग्रेसमध्ये आहे; कुठेही गेलो नाही,’ असा खुलासा त्यांनी केला. त्यावरून, बागवे-अलगुडे यांच्यात खडाजंगी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाशिंग बांधलेल्यांची भाजपवारी ऐनवेळी रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी ‘बाशिंग’ बांधून तयार असलेल्या काँग्रेसच्या दोन आजी-माजी पदाधिकाऱ्यांना पहिल्या पायरीपर्यंत पोहोचूनही रिकाम्या हातांनी माघारी फिरावे लागले आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणातून संबंधितांचा नक्की झालेला प्रवेश ऐनवेळी तडकाफडकी रद्द करण्यात आल्याने ‘जायचे कुठे’ असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फायदा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे, भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्यांची रांग दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात विविध पक्षांतील विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवकांना प्रवेश दिल्यानंतर आता इतर पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यातून, राष्ट्रवादीकडून स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलेल्या एका नगरसेवकाला भाजपमध्ये खेचण्यात आले आहे. विविध भागांमध्ये कमजोर स्थितीमध्ये असलेल्या पक्षाला उभारी देण्यासाठी संबंधित भागांतील ताकदवान नेत्यांच्या हाती ‘कमल का फूल’ देण्याची मोहीम जोरदार सुरू असून, त्या अंतर्गत काँग्रेसच्या दोन आजी-माजी पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. त्यातील एक पदाधिकारी तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपच्या नगरसेवकांच्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी आवर्जून हजेरी लावत होता.
गेल्या आठवड्यात काँग्रेसमधील माजी उपमहापौर, माजी नगरसेवक आणि इतर कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला. त्याचवेळी, काँग्रेसच्या आणखी एका पदाधिकाऱ्याचा प्रवेश जवळपास निश्चित झाला होता. त्यासाठी, संबंधित पदाधिकारी भाजपच्या कार्यालयाबाहेर घुटमळत होता. शेवटच्या क्षणी, भाजपमधील काहींनी थेट मुख्यमंत्र्‍यांशी संपर्क साधून हा प्रवेश तात्पुरता स्थगित करण्यात यश मिळविले. विद्यमान पदाधिकाऱ्याला धक्का दिल्यानंतर अगदी दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसमधून आणखी एक माजी पदाधिकारी भाजपच्या दारापर्यंत येऊन माघारी फिरल्याचे स्पष्ट झाले. या पदाधिकाऱ्याच्या प्रवेशासाठीही सर्व चर्चा, बोलणी झाली होती. मात्र, त्याच्या प्रवेशाला स्थानिक स्तरावरील नेतृत्वाने तीव्र विरोध केल्याने अखेरच्या काही क्षणांमध्ये त्यांचा पत्ता ‘कट’ झाला.

पक्षात वाढता असंतोष
भाजपमध्ये इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणात ‘इन्कमिंग’ सुरू असल्याने त्याविरोधात पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील असंतोष वाढत चालला आहे. बाहेरून पक्षात येणाऱ्यांना विविध आश्वासने दिली जात असली, तरी कधीतरी निष्ठावंतांचा विचार करा, ही मागणी जोर धरत आहे. त्यातूनच, बिबवेवाडी परिसरातील काही इच्छुकांनी पक्षाच्या जंगली महाराज रोड येथील कार्यालयातच उपोषण केले. रात्री उशिरा या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात पक्षाला यश आले असून, शहराध्यक्ष त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समुद्रतळाशी मानवी साखळीचा विश्वविक्रम

0
0

‘क्रिसलिस’च्या कामगिरीमुळे पुणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

समुद्र म्हटले, की भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळते. विशाल समुद्राशी मस्ती करू नये, असे म्हणतात; पण त्याच समुद्रात शिरून पुण्याच्या १८२ आबालवृद्धांनी थायलंडमध्ये एक अनोखा विश्वविक्रम साकार केला. स्कूबा डायव्हिंगच्या आधारे त्यांनी खोल समुद्राच्या तळाशी जाऊन मानवी साखळी उभारून जागतिक विक्रम नोंदवला. ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये पुण्याच्या शिलेदारांच्या या शौर्याची नोंद झाली आहे.

पुण्यातील क्रिसलिस आंत्रप्रेन्युअर फोरमच्या पुढाकाराने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. २७ डिसेंबर २०१६ रोजी थायलंड येथे १८२ जणांनी स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून एक अनोखा विक्रम करून भारताचे नाव पुन्हा एकदा ‘गिनेस बुक’मध्ये नोंदवले. त्यांनी पाण्याखाली आजपर्यंतची सर्वांत लांब मानवी साखळी तयार करून नवा विक्रम प्रस्थापित केला. थायलंडच्या कोहताव या बेटावर हा विक्रम करण्यात आला. अशा प्रकारे मानवी साखळी निर्माण करण्याचा या आधीचा विक्रम फेब्रुवारी २०१६मध्ये इटलीमधील १७३ जणांनी नोंदवला होता. पुण्याच्या ‘क्रिसलिस आंत्रप्रेन्युअर’ने हा विक्रम मोडीत काढून आता नवा विश्‍वविक्रम प्रस्थापित केला आहे.

‘क्रिसलीस’चे चेअरमन मनीष गुप्ता यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले होते. २०० लोकांच्या साह्याने एका वेळेस स्कूबा डायव्हिंगद्वारे मानवी साखळी तयार करण्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा भारतात उपलब्ध नसल्यामुळे थायलंडमधील कोहताव बेटाची निवड झाली. हे बेट स्कूबा डायव्हिंगसाठी स्वर्ग समजले जाते.

उपक्रमाचे प्रमुख मनीष गुप्ता म्हणाले, ‘सुरुवातीला एका मिनिटासाठी पाण्याखाली राहणे ही खूप मोठी गोष्ट वाटली नाही; पण २६ डिसेंबरला एक तास पाण्याखाली राहूनही आम्ही साखळी तयार करू शकलो नाही. त्यामुळे साहजिकच आम्ही खूप निराश झालो. दुसऱ्या दिवशी सकारात्मक भावनेने विक्रमाला गवसणी घालायचे ठरवले. राष्ट्रगीताने मोहिमेचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर सुमारे अर्धा तास पाण्याखाली राहून आम्ही १८२ लोकांची सर्वांत लांब मानवी साखळी निर्माण करून जागतिक विक्रमावर मोहोर उमटविली.’

मिस पॉलिना यांना गिनेस बुकच्या इंग्लंड ऑफिसतर्फे या विक्रमाची सत्यता पडताळण्यासाठी पाठवण्यात आले होते. अर्धा तास समुद्राच्या भूगर्भात मानवी साखळी साकारल्यानंतर पॉलिना यांनी विश्वविक्रम प्रस्थापित झाला असल्याचे जाहीर केले. ‘मानवी साखळीच्या आधारे संपूर्ण जगात एकात्मता आणि वैश्विक शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी हा विश्वविक्रम केला आहे,’ असे गुप्ता यांनी नमूद केले.

..........
हा विक्रम साकारताना ‘क्रिसलिस’ला बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. दोनशेपेक्षा जास्त लोकांना स्कूबा डायव्हिंगसाठी तयार करणे हे सगळ्यात पहिले आव्हान होते. मग या सगळ्यांना ट्रेनिंग देणेही जिकिरीचे होते. गंमत म्हणजे या लोकांपैकी खूप जणांना पोहायलासुद्धा येत नव्हते; पण कौन्सिल मेंबर्सचे अविरत कष्ट आणि सहभागी डायव्हर्सच्या मदतीने शेवटी १८२ जण विक्रमासाठी तयार झाले.
- मनीष गुप्ता, उपक्रमाचे संयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘म्युझिक मॅडनेस’ला सुरुवात

0
0

सनबर्न फेस्टिव्हलला संगीत चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतीय कलावंतांसह आंतरराष्ट्रीय कलाकारांनी संगीत आणि नृत्य बेफाम सादर करत ‘सनबर्न फेस्टिव्हल’चा पहिला दिवस चांगलाच गाजवला. जगातील सगळ्यांत मोठा ‘इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिव्हल’ अशी ख्याती असलेला ‘सनबर्न’ फेस्ट पुण्यात पहिल्यांदाच होत असताना त्याला पुणेकरांबरोबरच बाहेरून आलेल्या संगीत चाहत्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फेस्टिव्हलच्या ठिकाणी खच्चून भरलेला प्रेक्षकवर्ग आपले संगीतप्रेम भरभरून व्यक्त करताना दिसला.
‘निसर्ग’ ही संकल्पना असलेल्या दहाव्या ‘सनबर्न’ फेस्टिव्हलचे पुण्यात बुधवारी दणक्यात उद्घाटन झाले. नगर रोडवरील केसनंद येथे ३१ डिसेंबरपर्यंत हा फेस्टिव्हल जगभरातील ख्यातनाम संगीत-नृत्य कलाकारांना एकत्र आणणार आहे. या निमित्ताने ट्रान्स, हाउस, इलेक्ट्रो, टेक्नो, ड्रम अँड बास, एक्सप्रिमेंटल, सायकेडेलिक, रॉक असे विविध संगीतप्रकार चाहत्यांना ‘लाइव्ह’ अनुभवता येणार आहेत.
पहिल्या दिवशी (२८ डिसेंबर) सायना कॅथ्रिनच्या सादरीकरणाने मेन स्टेजच्या फेस्टिव्हलला सुरुवात झाली. तिला साथ देणाऱ्या ड्रमर बोसने कल्ला सादरीकरण केले. लुकास आणि स्टीव्ह यांनीही मेन स्टेजवर सायनाच्या सोबतीने बिट्सची जादू आणि त्याच्यावर चाहत्यांचे पाय लयीत कसे थिरकतात हे दाखवले. त्यांच्या सादरीकरणाला सगळ्यांत जास्त प्रतिसाद मिळाला. ‘हाउस म्युझिक डिवा’ प्रियंजनाने आपल्या सादरीकरणाने महोत्सवाला वेगळ्या उंचीवर नेले. मिस टारा, मोजोजो, ब्रोंझ रिड्स, टॉम स्वून, टेरी मिको, मिस केएट यांचेही विविध स्टेजवरचे परफॉर्मन्स रंगतदार झाले. ‘ट्रान्स लेजंड’ अशी ओळख असलेल्या वॅन बुरेनने ‘इंटेन्स’, ‘पल्सर’, ‘नॉट गिव्हिंग अप ऑन लव्ह’ अशा गाजलेल्या गाण्याने मेन स्टेजच्या परफॉर्मन्सची सांगता केली. त्याचे सादरीकरण झाल्यानंतरही ‘बिट्स’ चाहत्यांच्या मनात निनादत राहिले.
‘सनबर्न’चे सीईओ करण सिंग म्हणाले, ‘पुण्यात पहिल्यांदा हा फेस्टिव्हल होत असताना पहिल्याच दिवशी मिळालेला तुडुंब प्रतिसाद आम्हालाच अचंबित करणारा आहे. ३१ तारखेपर्यंत या प्रतिसादात आणखी वाढ होईल यात शंका नाही. जगविख्यात डीजेंना संगीताचा मूड तयार करण्यासाठी आणि त्यांची कथा संगीताच्या माध्यमातून सांगण्यासाठी आम्ही आकर्षक सेटचीही व्यवस्था केली आहे.’
विशेषतः पुण्यातील तरुणाईला या संगीतप्रकाराने वेड लावले आहे. अद्यापपर्यंत इंटरनेट व्हिडिओच्या माध्यमातून ते आत्तापर्यंत अशा संगीतप्रकारांचा अनुभव घेत होते. मात्र, ‘सनबर्न’च्या निमित्ताने प्रख्यात कलाकारांकडून ते प्रत्यक्षात ऐकायला आणि पाहायला मिळत असल्याने ते या फेस्टिव्हलचा ‘मॅडनेस’ अनुभवत आहेत. १५०हून अधिक कलाकार, पाच प्रकारच्या स्टेजवर एकाचवेळी होणारे भारतीय आणि पाश्चात्य बँड सादरीकरण ३१ डिसेंबरपर्यंत चाहत्यांना ‘लिव्ह लव्ह डान्स’ची किमया दाखवणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चालत्या एसटीवर पडले झाड

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चालत्या एसटीवर झाड पडल्याची थरारक घटना पौड रस्त्यावर गुरुवारी दुपारी घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. एसटीसह शेजारीच पार्क केलेल्या एका कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे परिसरातील वाहतूक विस्कळित झाली होती.
एसटी महामंडळाची स्वारगेट आगाराची (एमएच १४ बीटी ४२२८) ही बस खारावडेहून स्वारगेटकडे जात होती. ही बस पौड रस्त्यावर आयडियल कॉलनी बसस्टॉपजवळून जात असताना बसस्टॉप अलीकडे असलेले मोठे झाड अचानक कोसळले. झाडाच्या मोठ्या फांद्या एसटीवर कोसळल्याने मोठा आवाज झाला. एसटीची पुढील काच फुटली तसेच टपाचेही मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने एकही प्रवासी जखमी झाला नाही. शेजारीच पार्क केलेल्या एका कारच्या पुढच्या भागावरही फांदी पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी फांद्या कापून रस्ता मोकळा करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत पौड रस्त्यावरून कर्वे रस्त्याकडे जाणारी वाहतूक पौडकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वळविण्यात आली होती. मात्र, अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटीस देण्याचा अधिकार आहे का?

0
0

मुकारी अलगुडे यांचा अरविंद शिंदे यांच्यावर पलटवार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मेट्रोच्या भूमिपूजनासाठी गैरहजर राहिलेल्या उपमहापौर मुकारी अलगुडे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविणाऱ्या विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्यावर अलगुडे यांनीच पलटवार केला आहे. ‘पालिकेच्या बाहेर होत असलेल्या पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने नोटीस बजाविण्याचा अधिकार तुम्हाला आहे का?’ अशी विचारणा अलगुडे यांनी केली आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर पालिकेत उपमहापौरपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचा फोटो तसेच नावाचा साधा उल्लेखही नव्हता, त्यावर आपण खेद व्यक्त करायचे सोडून मलाच कारणे नोटीस बजाविता, हे योग्य नसल्याचे अलगुडे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात पुणे मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उद्घाटनापूर्वी एक दिवस अगोदर काँग्रेसने भूमीपूजनाचा कार्यक्रम घेतला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपमहापौर अलगुडे अनुपस्थित राहिले होते. पक्षाच्या कार्यक्रमासाठी गैरहजर राहिल्याने पालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी यांनी अलगुडे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले होते. त्यावर खुलासा करताना अलगुडे यांनी शिंदे यांच्यावर पलटवार केला आणि त्यांनाच कडक शब्दात सुनावताना अलगुडे म्हणाले, ‘उपमहापौरपद हे संविधानिक पद आहे. पालिकेच्या बैठकाबाबत पक्षनेते नोटीस बजावू शकतात, पण पालिकेच्या बाहेर पक्षाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिलो तर नोटीस बजाविण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? काँग्रेसकडे उपमहापौरपद असूनही भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या फ्लेक्स आणि बॅनर्स उपमहापौरांचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही, ही मोठी खेदाची बाब आहे.’
..
आरोप अमान्य
काँग्रेसने आयोजित केलेल्या भूमिपूजनाच्या दिवशी आपण हर्डीकर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तेथून परत येत असताना कार्यक्रम संपल्याचा निरोप मिळाला. त्यामुळे तेथून थेट कार्यालयात जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांची कामे केली. त्यामुळे या कार्यक्रमासाठी अनुपस्थित राहिल्याचा केला जाणारा आरोप अत्यंत चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत, हे आरोप अमान्य असल्याचे उपमहापौर अलगुडे यांनी शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’ला १०० कोटी

0
0

विकासकामांना गती देण्यासाठी पालिकेकडून निधी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटी योजनेतील विविध विकासकामांना गती देण्यासाठी केंद्र-राज्य सरकारनंतर आता महापालिकेकडूनही शंभर कोटी रुपये ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ला (पीएससीडीसी) प्राप्त होणार आहेत. या संदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे नियोजनाच्या पातळीवरच अडकून पडलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष कामे सुरू होण्याची अपेक्षा आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे महापालिकेने दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर स्मार्ट सिटी योजनेतील विविध प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात १५ प्रकल्पांची निर्मिती केली जाणार असून, त्यासाठीचे संपूर्ण नियोजन ‘पीएससीडीसी’ने केले आहे. हे प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कंपनीला २८६ कोटी रुपये यापूर्वीच प्राप्त झाले आहेत. मार्च २०१७ पर्यंतचा हा निधी कंपनीला प्राप्त झाला असल्याने महापालिकेनेही त्यांच्या हिश्शाचा दोन वर्षांचा शंभर कोटी रुपयांचा निधी कंपनीला द्यावा, अशा सूचना केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने महापालिकेला केल्या होत्या.
गेल्या आर्थिक वर्षासह (२०१५-१६) चालू आर्थिक वर्षाचा (२०१६-१७) प्रत्येकी ५० कोटी रुपये याप्रमाणे शंभर कोटी रुपयांचा निधी कंपनीला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने नुकताच मान्य केला आहे. हा निधी कंपनीच्या खात्यात जमा झाल्यावर गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील विविध प्रकल्पांना गती मिळेल, अशी शक्यता आहे. यामध्ये, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी ‘मी कार्ड’ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासह, औंध-बाणेर, बालेवाडी भागांतील इतर प्रकल्पांनाही वेग मिळेल, अशी अपेक्षा आहे. स्मार्ट सिटी योजनेत निवड झालेल्या सर्व शहरांना पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामध्ये केंद्र सरकारकडून पाचशे कोटी रुपये प्राप्त होणार असून, राज्य सरकार आणि स्थानिक महापालिकेकडून दर वर्षी प्रत्येकी ५० कोटी रुपये मिळणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नियोजित केलेल्या इतर सेवा-सुविधा पुरविण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी), कर्ज, कर्जरोखे अशा स्वरूपात निधी उपलब्ध करावा लागणार आहे.
0000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनबर्न फेस्टिव्हलकडे जाणूनबुजून दुर्लक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केसनंद येथे होत असलेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांकडे सरकारचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. गणेशोत्सवात, नवरात्रात डिजेंवर कारवाई केली जाते. त्या वेळी कारवाई करणारे पोलिस सनबर्न फेस्टिव्हलकडे कानाडोळा करत आहेत. गणेशोत्सव, नवरात्रात कारवाईबाबत सजग असणाऱ्या पोलिस यंत्रणेला सनबर्न फेस्टिव्हलचा आवाज ऐकू येत नाही का? असा सवाल हिंदू जनजागृती समितीने केला आहे.
केसनंद येथे होत असलेल्या सनबर्न या संगीत महोत्सवाला हिंदू जनजागृतीचा विरोध कायम आहे. सनबर्न फेस्टिव्हला केसनंदच्या ग्रामस्थांनी परवानगी दिलेली नाही. त्याशिवाय महोत्सवाच्या ठिकाणी उघडपणे दारूची विक्री केली जात आहे. पुणे आणि इतर भागातून या महोत्सवाला लाखो तरुण-तरुणी येण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या संख्येतील तरुणांसाठी रॉक संगीत डीजेच्या माध्यमातून वाजवले जाते. त्याचा आवाज मर्यादेपेक्षा निश्चितच जास्त आहे. न्यायालयाने दिलेल्या ध्वनिप्रदूषणासंदर्भातील आदेशांचा सर्रास बिमोड केला जात आहे. तरीही सरकार गप्प आहे. ही गोष्ट जाणूनबुजून केली जात आहे, अशी टीका हिंदू जनजागृती समितीच्या पराग गोखले यांनी केली आहे.
000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमएमसी’च्या पदाधिकाऱ्यांचीनियुक्ती लवकर व्हावी

0
0

राज्य सरकारने पाच सदस्यांची नावे निश्चित करण्याची ‘आयएमए’ची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या (एमएमसी) निवडणुकीत इंडियन मेडिकल असोसिएशनचा (आयएमए) झेंडा फडकला असला तरी राज्य सरकार नियुक्त पाच सदस्यांची सरकारने तातडीने नियुक्ती करावी. नियुक्ती झाल्यास ‘एमएमसी’च्या कार्यकारिणीला काम करण्याची संधी मिळणार आहे. या प्रक्रियेला विलंब लावण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्य पातळीवर नऊ जागांसाठी निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत ‘आयएमए’च्या पॅनेलचा दणदणीत विजय झाला. अठरा जागांपैकी नऊ जागा निवडून आल्या. आणखी चार जागा या पदसिद्ध असतात. त्यामुळे उर्वरित पाच जागा सरकारने नेमणूक करणे अपेक्षित आहे. २००९मध्ये निवडून आलेल्या ‘एमएमसी’ची कार्यकारिणी स्थापन व्हायला २०११ वर्ष उजाडले. त्या पार्श्वभूमीवर ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकार सदस्यांची त्वरित नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली. पुण्यातून ‘आयएमए’चे राज्य शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा तसेच सध्याचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे निवडून आले आहेत. या संदर्भात डॉ. सारडा यांनी पत्रकार परिषदेत मागणी केली. त्या वेळी पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी, नियोजित अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे, सचिव डॉ. बाळासाहेब देशमुख, डॉ. आरती निमकर, डॉ. संजय पाटील, डॉ. राजकुमार शहा, डॉ. अरुण हळबे, डॉ. जयंत नवरंगे, डॉ. पद्मा अय्यर आदी उपस्थित होते.
‘एमएमसी’चा पदभार स्वीकारल्यानंतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यावर भर राहणार आहे. येत्या फेब्रुवारी २०१७ मध्ये एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांच्या नोंदणीची मुदत संपत आहे. नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी पूर्वी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सोय होती. त्यामुळे सर्वांना मुंबईत कागदपत्रे, तपासणीसाठी जावे लागत नव्हते. आता कार्यकारिणी जाहीर होत नसल्याने सर्वच डॉक्टरांना मुंबईत हेलपाटे मारावे लागतील. त्यामुळे राज्य सरकारने पाच सदस्यांची त्वरीत नियुक्ती केल्यास कार्यकारिणी स्थापन होऊ शकते. त्यापाठोपाठ प्रत्येक जिल्ह्यात पुन्हा नोंदणीची नूतनीकरणाची सोय उपलब्ध करता येईल,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
...
कट प्रॅक्टिस रडारवर
‘एमएमसी’ची कार्यकारिणी जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या वेळी विविध कामांवर भर देणार असल्याचे ‘एमएमसी’चे सदस्य डॉ. दिलीप सारडा यांनी सांगितले. त्या वेळी ‘कट प्रॅक्टिस’विषयी विचारले असता ते म्हणाले, ‘डॉक्टरांनी कट प्रॅक्टिस करू नये. त्याबाबत डॉक्टरांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचे प्रमाण कमी आहे. तरीही त्याला रोखण्यासाठी आम्ही पावले उचलू. त्याशिवाय डॉक्टरांकडून कट प्रॅक्टिस होत असल्यास त्याची तक्रार नागरिकांनी करावी. एमएमसी त्यावर कार्यवाही जरूर करेल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतर्फी प्रेमातून मित्रानेच दिली सुपारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
सॉफ्टवेअर अभियंता अंतरा दास खूनप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अंतराच्या साफ्टवेअर अभियंता असलेला मित्र संतोष कुमार याला बुधवारी (२८ डिसेंबर) रात्री उशिरा अटक केली. त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संतोष याला वडगाव मावळ कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याची सात दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष कुमार (२४, रा. बिहार) याला हा मूळचा बिहारचा असून तो बंगळुरूमध्ये आयटी कंपनीत नोकरी करतो. अंतरा बंगळुरूमध्ये ट्रेनिंगला असताना तिची संतोषशी ओळख झाली होती. त्या वेळी संतोषने तिला मदत केली होती. पुण्यातील कंपनीत नोकरी मिळण्यासाठी आणि राहण्यासाठी रूम मिळण्यासाठी त्याने मदत केली होती. तो गेल्या ११ महिन्यापासून तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता.
अंतराने त्यांच्याशी लग्न करावे अशी मागणी तो तिच्याकडे वारंवार करत असे. तिच्या मोबाइलवर मेसेज पाठवून लग्नाचा तगादाही त्याने लावला होता. मात्र, अंतरा लग्न करण्यास तयार नव्हती. पण आपण केवळ मित्र राहू असे अंतराने संतोष याला सांगितले होते. तसेच वारंवार होणाऱ्या मेसेज आणि कॉलला कंटाळून अंतराने वेळोवेळी संतोषचा मोबाईल नंबर ‘ब्लॉक’ केला होता. त्यामुळे संतोष कुमारने पुण्यात येऊन ती अन्य कोणाच्या संपर्कात आहे का, तिचे कोणाशी प्रेमप्रकरण सुरू आहे का याची माहिती मिळवणे सुरू केले होते. त्याचप्रमाणे त्याच्या एका मित्राला त्याने अंतरावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. पण कालांतराने त्याचा हा मित्रच अंतराच्या मागे लागला होता. ही बाब अंतराने तिच्या बहिणीला सांगितली होती. संतोषकुमार थेट तिचा मारेकऱ्यांमार्फत खून करेल असे कोणाला वाटले नव्हते.
अंतरा तळवडे आयटी पार्कमधील कॅपजेमिनी या कंपनीत एप्रिलपासून नोकरी करीत होती. शक्यतो ती कॅबने प्रवास करीत असे. शुक्रवारी (२३) रात्री तळवडे येथील कॅनबे चौकातून पायी जात होती. त्या वेळी पाठीमागून आलेल्या अज्ञाताने तिच्या डोक्यावर आणि मानेवर वार करून खून केला होता.
संतोष याने कोणाला सांगून, किती पैसे देऊन हा खून करविला, त्याचे अन्य किती साथीदार आहेत याचा तपास सुरू आहे. पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव, अप्पर अधीक्षक राजकुमार शिंदे, स्थानिक गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांनी सलग दोन दिवस घटनास्थळी पाहणी करून तपासाबाबत सूचना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती करण्यासाठी बोलायचे कोणाशी?

0
0

पिंपरी : ‘राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या अनेक वर्षांमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांना चितपट करण्यासाठी आगामी निवडणुकीत समविचारी पक्षांनी युती करणे गरजेचे आहे. परंतु शहर भाजपमधील गृहकलहामुळे युतीबाबत नेमके कोणाशी बोलावे, हा संभ्रम कायम आहे’, असा टोला शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. तसेच पक्ष बदलून चेहरा बदलणार आहे का, असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये होणाऱ्या ‘इन्कमिंग’बद्दल कोल्हे यांनी टीका केली आहे.
महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-शिवसेना धडपडत आहे. त्यादृष्टीने रणनीतीदेखील आखली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप केले जात आहेत. त्यामुळे सत्ता काबीज करण्यासाठी युती होणार का, असे शिवसेने जिल्हा संपर्क प्रमुख अमोल कोल्हे यांना विचारले असता, त्यांनी शहर भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे. पक्षांतराच्या उड्यादेखील सुरू आहेत. भाजपची ताकद वाढण्यास सुरवात झाल्याने शिवसेनेतदेखील चलबिचल होत आहे. निवडणुकांसाठी युती करण्याबाबत आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनेकदा बोलून दाखविले आहे. अपक्ष आमदार महेश लांडगे भाजपवासी झाल्याने तसेच त्यांच्या काही समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याने राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली.
पण काँग्रसमधून भाऊसाहेब भोईर आणि त्यांच्या समर्थक सात नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेऊन अजित पवार यांनी यशस्वी ‘डॅमेज कंट्रोल’ केले. त्यामुळे युती व्हावी म्हणून शहरपातळीवर तसे प्रयत्न होत असल्याचेही दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. पण आता संपर्कप्रमुख यांनी भाजपमध्ये गृहकलह सुरू असल्याचे सांगत भाजपच्या वर्मावर बोट ठेवले आहे. युती करायला आम्ही शंभर टक्के तयार आहोत. पण त्याची चर्चा ही शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी करायची की अपक्ष सहयोगी आमदार महेश लांडगे वा राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्याशी करायची असा सवाल करीत यांच्यात गृहकलह सुरू असल्याची बोचरी टीका कोल्हे यांनी केली आहे.
मागील पंचवार्षिकला शहरात भाजपला दोन आकडी संख्येतदेखील नगरसेवक निवडून आणता आले नाहीत. तेव्हा राज्य तसेच केंद्रातदेखील आघाडी सरकार सत्तेत होते. आता दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेत असल्याने शहरातही भाजप मोठा पक्ष होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. परंतु मागील पंचवार्षिकला अपयशी ठरणाऱ्यांऐवजी शहराची सर्व सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने पक्षात आलेल्या आणि आमदार झालेल्या लक्ष्मण जगताप यांच्याकडे सोपविली आहेत. परंतु भाजपमधील जुने म्हणविले जाणारे काही पदाधिकारी स्वपक्षाबाबत चुकीच्या पद्धतीने जाहीर टीका-टिप्पणी करत आहेत. त्यामुळे आता मित्रपक्ष शिवसेनेकडूनदेखील याबाबत बोचऱ्या शब्दांत टीका होऊ लागली आहे. सत्ता काबीज करायची असेल, तर भाजपने वेळीच शहाणे होण्याची गरज आहे.

‘चेहरा बदलेल का?’
राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचार केला म्हणजे त्यांच्या नगरसेवकांनीच भ्रष्ट्राचार केला. त्यातच आता अनेक जण भाजपमध्ये दाखल होत आहे. पक्ष बदलला म्हणजे चेहरा बदलला असे होत नाही. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आललेल्यांना तिकिट मिळणार असेल तर युती कशी करायची हादेखील संभ्रमाचा मुद्दा आहे, अशी टिप्पणीदेखील अमोल कोल्हे यांनी केली आहे. तसेच स्थानिक बाबींचा विचार करता आम्ही युती करण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिला आहे. त्यांच्याकडून योग्य तो निर्णय येईल, असे सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्भवती महिला वाहकांनादेणार ‘टेबल वर्क’

0
0

Harsh.Dudhe@timesgroup.com
.........
@HarshDudheMT
पुणे : राज्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) महिला वाहकांचे (कंडक्टर) गर्भारपणातील काम आता हलके होण्याची शक्यता आहे. गरोदरपणाच्या काळात महिला वाहकांना शक्य असल्यास ‘टेबल वर्क’ देण्याबाबत, त्यांच्या ड्युट्या चांगल्या रस्त्यांच्या एसटी मार्गावर लावण्याबाबत आणि प्रसुती रजेवर जाण्यापूर्ली दोन ते तीन महिन्यांची रजा देण्यात यावी, अशा शिफारशी महिला अधिकाऱ्यांच्या समितीने तयार केलेल्या अहवालात एसटीला दिल्या आहेत. त्यावर आता एसटी प्रशासनाची अंतिम मान्यता मिळणे बाकी आहे, असे एसटीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला सांगितले.
खेड्यापाड्यांमधून प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमधून सातत्याने प्रवास, कामाच्या अनिश्चित वेळा कामाच्या शिफ्टचे नियोजन नसणे, जादा कामाचा ताण आणि खडतर रस्त्यांवरून दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास आदी कारणांमुळे होणाऱ्या त्रासामुळे एसटीच्या महिला वाहकांमध्ये गर्भपाताचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्यामुळे त्यांच्या कामामध्ये आणि खासगी जीवनामध्ये नकारात्मकता येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे एका संशोधनाद्वारे आढळले. यावर ‘मटा’ने १०, ११ आणि १२ जूनला वृत्तमालिका प्रकाशित केली होती.त्यावर महिला वाहकांना गर्भारपणाच्या काळातील काम ठरवण्याबाबत आणि त्यांचे काम कोणत्या मार्गांवर लावावे, याचा अभ्यास करण्यासाठी एसटीने नाशिक विभागाच्या यामिनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीत एसटीच्या अधिकारी मोनिका वानखडे, शुभांगी शिंदे आणि अश्विनी चपके यांचा समावेश आहे.
या समितीने नुकताच अहवाल तयार केला असून तो एसटीच्या प्रशासनाकडे पाठविला आहे. या अहवालात महिला वाहकांना त्यांच्या गर्भारपणात शक्य असल्यास ‘टेबल वर्क’ देण्यात यावे. महिला वाहकांच्या ड्युट्या शहरापासून चांगले रस्ते असणाऱ्या मार्गावर लावण्यात याव्यात, शक्य असल्यास त्यांना बसस्थानक अथवा आगारात हलके काम द्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहे. तसेच, त्यांना प्रसुती रजेवर जाण्यापूर्वी दोन ते तीन महिन्यांची रजा देण्याची सूचना केली आहे. समितीने अहवाल तयार केला असून मान्यतेसाठी एसटीच्या प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यावर येत्या काही दिवसात अंतिम निर्णय होणार आहे. एसटी प्रशासनाने अहवाल जशाचा तसा स्वीकारल्यास भविष्यात राज्यातील महिला वाहकांचे गरोदरपणातील काम हलके होण्याची शक्यता आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात एकूण महिला वाहक चार हजार ३५४ आहेत. पुणे विभागात सर्वाधिक २९५ आहेत. हा अहवाल तयार करताना राज्यातील सर्व विभागीय कार्यालये, प्रादेशिक कार्यालये आणि एसटी वर्कशॉप यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या.
..........
‘अहवाल तातडीने स्वीकारा’
राज्यातील महिला वाहकांना ‘टेबल वर्क’ देण्यात यावे आणि त्यांच्या डुट्या चांगले रस्ते असणाऱ्या एसटी मार्गांवर लावण्याची एसटी कामगार संघटनेची जुनी मागणी होती. एसटी प्रशासनाने महिला वाहकांबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल लवकर स्वीकारून त्याला मान्यता द्यावी, असे संघटनेच्या उपाध्यक्षा शीला नाईकवडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पोलिओ’च्या ‘इंजेक्टेबल’ लशींचा तुटवडा

0
0

खासगी हॉस्पिटलमध्ये देखील उपलब्धता नाही
म. टा. प्रतिनिधी, पुणे
लहान बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या ‘पोलिओ’च्या ‘इंजेक्टेबल’ (आयपीव्ही) लसीचा शहरात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता बालकांना लस देण्यात व्यत्यय येत आहे. यामुळे पालकांसह बालरोग तज्ज्ञ डोक्याला
हात लावून बसले आहेत. इंजेक्टेबल लस पुरेशी उपलब्ध होत नसल्याने बालकांना पूर्ण डोस दिले जात नाही,
याबाबत बालरोग तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने लस उपलब्ध
करून द्यावी अशी मागणी होत आहे. शून्य ते पाच वर्षांच्या आतील बालकांना ‘पोलिओ’ची लस दिली जाते. देशातून पोलिओ हद्दपार झाला असला तरी त्याला प्रतिबंध करणारी लस अद्यापही देण्यात येत आहे. यापूर्वी तोंडावाटे लस दिली जात होती. आता इंजेक्शनद्वारे लस देण्यात येत आहे. त्यामुळे या लसीची मागणी वाढली आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पोलिओच्या इंजेक्टेबल लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे. शहरातील बालरोगतज्ज्ञांनी याबाबत दुजोरा दिला.
‘पोलिओला प्रतिबंध करण्यासाठी तोंडावाटे लस देण्यात येत आहे. परंतु, त्याऐवजी आता हाताच्या दंडावर इंजेक्शनद्वारे लस देण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. आणखी काही महिने पुण्यासह राज्यात या लशीचा तुटवडा राहण्याची शक्यता आहे. पोलिओ हद्दपार झाला, त्या वेळी ‘इंजेक्टेबल’ लस बाजारात आणायला होती. केंद्र सरकारने त्याबाबतचे धोरण योग्य आखले नसल्याने त्याचा परिणाम सध्या जाणवत आहे. सध्या ‘आयपीव्ही’ ही लस परदेशातून आयात केली जात आहे. जागतिक पातळीवर सुद्धा इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीचा तुटवडा आहे,’ अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. शिशिर मोडक यांनी ‘मटा’ला दिली. ‘या लशींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची संख्या देखील मोजकी आहे. त्यामुळे उत्पादन फारसे होत नाही,’ अशीही माहिती डॉ. मोडक यांनी दिली.
इंजेक्टेबल लशीच्या एका डोसची किंमत पाचशे रुपये आहे. सरकारी दवाखान्यात देखील लस उपलब्ध नाही. खासगी हॉस्पिटलना काही कंपन्यांकडून लस विकत घ्यावी लागत आहे. परंतु, पुरवठाच कमी असल्याने लस उपलब्ध होत नाही. बालकांना वर्षातून तीन डोस देणे अपेक्षित आहेत. मात्र, लशीच्या तुटवड्यामुळे डोस पूर्ण होत नाहीत. केंद्र सरकारने इंजेक्टेबल लस देशभरात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल, याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला पाहिजे, अशी मागणी बालरोगतज्ज्ञांनी केली आहे.
या संदर्भात राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘इंजेक्टेबल लशीचा जागतिक पातळीवर तुटवडा आहे. त्यामुळे ही लस उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत.’
...
सध्या तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या लशीमध्ये विषाणू जीवंत आहेत. त्या विषाणूंची जातबदल झाल्याने त्यामुळे त्या लशीद्वारे ‘पॅरालेसिस’ होण्याचा धोका संभवतो. त्याचा वापर कमी करणे अपेक्षित आहे. तर ‘इंजेक्टेबल’ लशीत मृत विषाणूंचा समावेश असल्याने त्याचा वापर करणे हे फायद्याचे आहे असे जागतिक पातळीवर सिद्ध झाले आहे. त्यामुळे ‘इंजेक्टेबल’ लसीचा वापर सुरू करण्यात आला आहे.
- डॉ. शिशिर मोडक, बालरोग तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींनी देशाची माफी मागावी

0
0

आमदार प्रणिती शिंदे यांची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘सर्वसामान्यांना ‘एटीएम’, बँकांच्या रांगेत उभे करून देशभरातील ११५ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची जाहीर माफी मागावी,’ अशी मागणी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. शिंदे यांनी नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध श्वेतपत्रिका जाहीर करत काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाचे रणशिंगही फुंकले.
शिंदे यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी माजी आमदार दिप्ती चवधरी, सरचिटणीस अभय छाजेड, पालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, काँग्रेसचे अजित आपटे आदी उपस्थित होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५० दिवसांत परिस्थिती सुधारेल, असा विश्वास पंतप्रधानांकडून व्यक्त करण्यात आला होता. ५० दिवस वाट पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. हे ५० दिवस संपले असून नागरिकांच्या हालात वाढच होत आहे. हा निर्णय पूर्णपणे फसला असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. पुढील काळात ते तीव्र करण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाल्या.
बँकेत किती काळा पैसा जमा झाला, या निर्णयामुळे देशाचा किती आर्थिक तोटा झाला, किती जणांच्या नोकऱ्या गेल्या, रांगेत उभे राहत असताना मृत्युमुखी ठरलेल्या नागरिकांना मदत करणार आहात का, हा निर्णय घेण्यापूर्वी किती तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला, बँकांमध्ये २५ लाख रुपयांहून अधिक रक्कम भरलेल्या खातेदारांची नावे जाहीर करावीत, अशा विविध मागण्या शिंदे यांनी श्वेतपत्रिकेद्वारे पंतप्रधान मोदी यांना केल्या आहेत.
..
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
- पैसे काढण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध काढावेत.
- बँकेतील ठेवींना १८ टक्के वार्षिक दराने व्याज द्यावे.
- डिजिटल पेमेंटवर लावण्यात येणारा सरचार्ज रद्द करावा.
- दारिद्र्यरेषेखालील महिलांच्या खात्यांवर २५ हजार रुपये भरण्यात यावेत.
- व्यापाऱ्यांना प्राप्तिकर आणि विक्रीकरात ५० टक्के सूट मिळावी.
००
नोटाबंदीचे घोटाळे
कोलकता भाजपच्या बँक खात्यामध्ये भरण्यात आलेले तीन कोटी रुपयांबाबतचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. तसेच, बिहार येथे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आठ कोटी रुपयांच्या तर आसाम येथे १८ कोटी रुपयांच्या मालमत्ता खेरेदी केल्या आहेत, याचा खुलासा व्हावा. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी सप्टेंबर महिन्यांत देशातील विविध बँक खात्यांत पाच ते सहा कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. ही बँक खाती उघड करण्यात यावीत. भाजपचे मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे सापडलेली रोकड तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांच्याशी संबंधित बँक कर्मचाऱ्यांकडे २५ कोटी रुपये सापडले आहेत, याबाबत भाजप का मौन बाळगून आहे, असा सवाल शिंदे यांनी केला.
..
जिओ आणि पेटीएम
देशात घडणाऱ्या प्रत्येक डिजिटल पेमेंटवर अडीच टक्के सरचार्ज लावण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी हे ‘पेटीएम’चे ब्रँड अॅम्बॅसिडर असल्यासारखे आहेत. ‘जिओ’ने मोफत कनेक्शन वाटले असून त्याद्वारे होणाऱ्या पेमेंटवरील सरचार्जचा फायदा घेण्यात येणार आहे. हा निर्णय या बड्या कंपन्यांसाठीच घेतला असल्याचा आरोप शिंदे यांनी या वेळी केली.
..
आईची काळजी नाही...
आपल्या आईला रांगेत उभे करून पैसे काढणारे पंतप्रधान मोदी हे आपल्या आईची काळजी घेऊ शकत नसतील तर ते देशातील गोरगरीब जनतेची काय काळजी घेणार, असा सवाल शिंदे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गारठ्याच्या शिक्षे’ची गंभीर दखल

0
0

म. टा. प्रतिनिधी ,येरवडा

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कळस येथील सभेसाठी सीताराम देवकर शाळेतील शेकडो मुलांना कडाक्याच्या थंडीत बसविल्याच्या घटनेची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शुभांगी चव्हाण यांनी गुरुवारी शाळेला भेट देऊन मुख्याध्यापकांकडे विचारणा केली. तसेच, याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्यास प्रशासनाला सांगितले .
कळसमधील प्रभाग क्रमांक ५ चे स्थानिक नगरसेवक सतीश म्हस्के यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या विविध विकास कामांचे पवार यांच्या हस्त उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर म्हस्के यांनी गावातील मोकळ्या जागेवर जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला नागरिकांची गर्दी दिसण्यासाठी कळसचे स्थानिक नगरसेवक सतीश म्हस्के यांनी गावातील पुणे महापालिकेच्या सीताराम देवकर विद्यालयातील शेकडो मुलांना गणवेशात अडीच तास कडाक्याचा थंडीत खुर्चीवर बसवून ठेवले .मोकळ्या मैदानात वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे काही विद्यार्थी लपून घरी निघून गेले ,तर अनेक विद्यार्थी थंडीत सभा संपेपर्यंत तसेच बसून राहिले. आगामी पालिका निवडणुकीसाठी पवारांनी सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शाळेतील लहान मुलांना कडाक्याच्या थंडीत बसविले. त्यामुळे परिसरातील अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली होती.
या बाबतचे वृत्त ‘मटा’ने प्रसिध्य केल्यानंतर प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शुभांगी चव्हाण यांनी सीताराम देवकर शाळेला भेट दिली. या वेळी सभेसाठी किती मुलांना पाठविले होते,याची माहिती घेतली. अडीच तास गारठ्यात मुलांना बसविल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांना सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अजित पावर यांच्या सभेसाठी पालकांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन गेले असतील, असा हास्यास्पद दावा शाळा प्रशासनाने केला आहे. शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी स्थानिक नगरसेवक सतीश म्हस्के यांच्याशीही चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगाव पर्वती, वारज्यात वनउद्याने

0
0

राज्यात २६ वनउद्याने साकारणार

samarkhadas@timesgroup.com
Tweet : @samarkhadasMT

मुंबई : केंद्र सरकारच्या नगर वनउद्यान योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षांत राज्यात २६ वनउद्याने साकारणार असून, त्यात पुण्यातील पाचगाव पर्वती आणि वारजे येथील उद्यानांसह नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ येथील उद्यानांचा समावेश आहे.
देशभरातील २०० विविध शहरांमध्ये ही योजना राबविण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. यात ८० टक्के निधी केंद्र सरकारकडून मिळणार असून उर्वरित २० टक्के निधी राज्य सरकारांनी उभारायचा आहे. मात्र, या उद्यांनासाठी २० हेक्टरपेक्षा अधिक जमीन हा नियम ठेवण्यात आला आहे. यात सध्या असलेल्या उद्यानांचे पूर्ण सुशोभिकरण, हिरवळ लागवड, जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी जागा, लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य आदी गोष्टींची परिपूर्तता करण्यात येणार आहे. नागपूरमधील अंबाझरी, चंद्रपूर शहर, यवतमाळ मधील वडगाव, पुण्यातील पाचगाव पर्वती व वारजे या पाच ठिकाणी नगर वन उद्याने होणार आहेत.
शहरांची फुफ्फुसे म्हणून मौदाने व उद्याने ही शहर नियोजनातील महत्त्वाची बाब समजली जाते. मात्र, मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये बिल्डरांच्या आक्रमणामुळे उभे राहिलेले काँक्रिकटचे जंगल तसेच रिकाम्या जागांची कमतरता पाहता, तरुण मुले व लहानग्यांना खेळण्यासाठी मैदाने वा उद्याने उरलेली नाहीत. गाड्यांची प्रचंड वाढलेली संख्या व शहरांमधील वाढलेली लोकसंख्या पाहता एखादे असले तरीही वृद्धांना फिरण्यासाठी त्याचा काहीही फायदा नसल्याची तक्रार सत्तेवर असलेले व नसलेले दोन्ही राजकीय पक्ष सातत्याने करत असतात. प्रत्यक्षात मात्र सगळेच राजकीय पक्ष याबाबत ओरड करत असले तरी प्रत्यक्षात काहीही होत नसल्याची गेल्या अनेक वर्षांमध्ये दिसून आले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या वन विभागातर्फे ही योजना राबविण्यात येणार असून, त्यात वन विभागाची जमीन किंवा असलेले उद्यान अद्ययावत करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ अधिकाऱ्याने ‘मटा’शी बोलताना दिली. एका उद्यानासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार असून यातील ८० टक्के निधी म्हणजे एक कोटी साठ लाख रुपये केंद्राकडून येणार असून उर्वरित रक्कम राज्य सरकारने द्यायची आहे. या नव्या योजनेमुळे वेगाने शहरीकरण होणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये उद्यानांची संख्या वाढण्यास फायदा होणार असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

नागरी सहभागातून विकास
वारजे येथील वनउद्यान हे नागरी सहभागातून उभे राहिलेले देशातील पहिले वनउद्यान आहे. या खात्याचे पूर्वीचे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हा प्रकल्प सुरू झाला आहे. येथे नेचरवॉक आणि वनस्पती परिचय केंद्रही उभे राहत आहे. प्रामुख्याने चाफ्याचे उद्यान, नक्षत्रवन आणि फुलपाखरे या संकल्पनांमधून तीन उद्याने येथे उभी राहणार आहेत. येथील काम प्राधान्याने सुरू होत असून काही काळातच पाचगाव पर्वती येथील उद्यानाचे कामही सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images