Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

किल्ल्यांमधून इतिहास जिवंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विद्यार्थ्यांमध्ये इतिहास आणि भूगोलाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने किल्ले स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत शहरात सहा ठिकाणी हे किल्ल्यांचे प्रदर्शन पुणेकरांना बघायला मिळणार आहे.

शहरात जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजीराजे उद्यान, येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय, सिंहगड रोडवर पु. ल. देशपांडे उद्यान, कोथरूड येथील तात्यासाहेब थोरात उद्यान, हडपसर येथील राम मनोहर लोहिया उद्यान आणि धनकवडी येथील महापालिकेच्या १६२ क्रमांकाच्या शाळेत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

किल्ला स्पर्धेचे यंदा चोवीसावे वर्ष असून दरवर्षी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो आहे. यंदा स्पर्धेत १३९ स्पर्धक सहभागी झाले आहेत. इतिहास तज्ज्ञ जगजीवन काळे, उदय मुळे, कैलास चौधरी, मयुरेश लव्हे, सुमीत चव्हाण आणि अमोल उणेचा यांनी परीक्षण केले. स्पर्धकांनी सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, राजगड, सिंहगड, शनिवारवाडा, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, तोरणा, अंतुरगड, सज्जनगड, सिंधुदुर्ग, कोरीगड अशा विविध किल्ल्यांच्या हुबेहुब प्रतिकृती साकारल्या आहेत. किल्ल्यांचे नकाशे, सविस्तर माहिती आणि पर्यावरणावर आधारित घोषवाक्ये लिहिलण्यात आली आहे, अशी माहिती उद्यान अधिक्षक प्रीती प्रसाद आणि संतोषकुमार कांबळे यांनी दिली.

प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ आनंद पाळंदे आणि ज्येष्ठ भूगोल तज्ज्ञ सुरेश गरसोळे यांच्या शुक्रवारी प्रदर्शनाचे उद् घाटन झाले. संध्याकाळी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला महापालिका उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे, जयंत वाघ, वृक्ष प्राधिकरण समितीचे द. स. पोळेकर, कविराज संघेलिया, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य खुले राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फटाका स्टॉल असुरक्षित

$
0
0

स्टॉलचालकांच्या हमीव्यतिरिक्त कोणतीही सुरक्षा नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील मध्यवर्ती भागासह विविध भागात उभारण्यात आलेल्या फटाका स्टॉलमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नसल्याने या फटाका स्टॉलच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ‘अग्निशामक विभागाच्या अटींचे पालन करू,’ या स्टॉलचालकांच्या हमीव्यतिरिक्त येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे.

औरंगाबादमधील दीडशे फटाका स्टॉलना शनिवारी भीषण आग लागली. या मैदानात अग्निशामक दलाची गाडीच नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील फटका स्टॉलची पाहणी केली असता, अनेक ठिकाणी सुरक्षिततेची‌ काळजी घेण्यात न आल्याचे आढळून आले. फटाक्यांची विक्री होत असलेल्या एकाही ठिकाणी अग्निशामक दलाची गाडी नाही. त्यामुळे येथील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने शहराच्या मध्यवर्ती भागातील वर्तक उद्यानासह सुमारे पंधरा ठिकाणी फटाका स्टॉलना परवानगी दिली आहे. वर्तक उद्यानाजवळ ३० स्टॉल उभारण्यात आले आहेत.

शहरातील पंधरा ठिकाणी फटाके स्टॉल उभारण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने अग्निशामक दलाला कळविले होते. त्यानुसार फटाका स्टॉल उभारताना कोणती काळजी घ्यावी, यासाठी अग्निशामक दलाने नियमावली घालून दिली. दोन स्टॉल्सच्या मध्ये तीन फूट अंतर असावे, प्रत्येक स्टॉलधारकाने अग्निशामक यंत्रणा ठेवावी, पाण्याची तसेच वाळूची बादली स्टॉलजवळ ठेवावी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. त्यांची पूर्तता न केल्यास अग्निशामत दलाचा ‘ना हरकत दाखला’ रद्द होईल, असे अग्निशामक दलाने स्पष्ट केले आहे. मात्र अनेक ठिकाणी या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शहरात पंधरा ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले असले, तरी एकाही ठिकाणी आगीचा बंब उपलब्ध नसल्याने सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेंडू उत्पादकांना फटका

$
0
0

पुणे : दसऱ्याप्रमाणे दिवाळीला झेंडूच्या फुलांची प्रचंड प्रमाणात मार्केट यार्डातील फूलबाजारासह शहरातील विविध भागांत आवक झाल्याने अखेर फूल उत्पादकांचे दिवाळे निघाले. झेंडूच्या एका किलोला २ ते २० रुपये किलो असा दर निघाल्याने अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर अक्षरशः फुले फेकून दिली.

लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येलाच लक्ष्मी येण्याऐवजी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांच्यात नाराजी पसरली. दरवर्षी दिवाळीला लक्ष्मी पूजनासह पाडव्याकरिता फुलांना मागणी असते. गेल्या वर्षी दिवाळीला झेंडूच्या फुलांनी भाव खाल्ला होता. त्यामुळे किलोसाठी घाऊक बाजारात ५० रुपयांपर्यंत दर गेला होता, तर किरकोळ बाजारात २०० ते ३०० रुपयांपर्यंत विक्री झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचा फायदा झाला होता. परंतु, या वर्षी तसाच फायदा होईल या अपेक्षेने पुणे जिल्ह्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले. दसऱ्याला दरामुळे फटका बसला. त्यामुळे दिवाळीला चांगले दर मिळतील या अपेक्षेने झेंडूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येवर झेंडूच्या फुलांची मार्केट यार्डात शनिवारी १२० टन एवढी आवक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर

$
0
0

फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१७दरम्यान, तर दहावीची परीक्षा सात मार्च ते २९ मार्चदरम्यान होईल.

मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. फेब्रुवारी-मार्च २०१७मध्ये होणाऱ्या या परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येतील. या परीक्षांचे सविस्तर संभाव्य वेळापत्रक www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा, तसेच त्यांना अभ्यासाचे व तयारीचे नियोजन करता यावे, यासाठी हे वेळापत्रक लवकर उपलब्ध करून देण्यात येते. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्र असून, ते शाळेत किंवा ज्युनिअर कॉलेजमध्ये उपलब्ध करून दिले जाईल.

दरम्यान, वेबसाइटवर उपलब्ध असलेले हे संभाव्य वेळापत्रक असून, अंतिम वेळापत्रक परीक्षेपूर्वी सर्व शाळा, ज्युनिअर कॉलेजेसमधून उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी तेच अंतिम वेळापत्रक ग्राह्य धरावे, अन्य वेबसाइट्स अथवा संस्थांकडून देण्यात आलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील पारा घसरला १२.३ अंशांपर्यंत

$
0
0

पुण्यातील पारा घसरला १२.३ अंशांपर्यंत

पुणे : राज्यभर दिवाळीचा रंग चढू लागला असताना थंडीनेही आपले बस्तान बसवायला हळूहळू सुरुवात केली आहे. राज्यातील थंडीचा कडाका आता वाढला असून, पुण्यातील पारा १२.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. राज्यातही अनेक ठिकाणी किमान तापमानाची १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंद झाल्याने कडक थंडीत अभ्यंगस्नान करण्याची मजा नागरिकांना अनुभवता येत आहे.
देशभरातून नैऋत्य मोसमी वारे आता माघारी फिरले आहेत. त्यामुळे वातावरणातील बाष्पाचे प्रमाण कमी झाले असून, उत्तरेकडील राज्यातून महाराष्ट्राकडे थंड व कोरडे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात गारवा जाणवत आहे.
शनिवारी नरकचतुर्दशीच्या दिवशी पुण्यात ३०.१ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर १२.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. अभ्यंगस्नानासाठी पहाटेच उठलेल्या पुणेकरांना थंडीने हुडहुडी भरली होती, तर दुपारी ऑक्टोबर हीटमुळे काहीसा उकाडा जाणवत होता; परंतु सायंकाळनंतर पुन्हा हवेत गारवा जाणवू लागला. सायंकाळी उशिरा रस्त्यावर फिरणारे नागरिक स्वेटर, शाल, कानटोपी अशा जामानिम्यात दिसत होते.
पुण्यात शनिवारी नोंदले गेलेले किमान तापमान (१२.३ अंश सेल्सिअस) सरासरीपेक्षा चार अंशांनी कमी होते. त्याचवेळी कमाल तापमान ३०.१ अंश सेल्सिअस असल्याने सकाळ आणि संध्याकाळच्या तापमानात सुमारे १७ अंशांचा फरक होता. त्यामुळे दुपारी काही काळासाठी पुणेकरांना उकाडाही अनुभवायला मिळाला. पुढील दोन दिवसांत पुण्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दोन दिवसांत किमान तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यातही शनिवारी थंडीचा कडाका वाढला होता. राज्यातील सर्वांत नीचांकी किमान तापमान नाशिक येथे (११.४ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. उस्मानाबाद येथे १२.५, औरंगाबाद येथे १३.२, जळगाव येथे १३.८, महाबळेश्वर येथे १४.१, अकोला येथे १४.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. राज्यातही पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ‘बिघाडी’

$
0
0

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ‘बिघाडी’

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सातारा-सांगलीपाठोपाठ पुणे स्थानिक स्वराज्य मतदारसंघातही काँग्रेसने जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांची उमेदवारी शनिवारी जाहीर केली. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या नियोजित आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे; तसेच आतापर्यंत एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत रंगत येण्याची चिन्हे आहेत.
सध्या पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीचे अनिल भोसले आमदार आहेत. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून त्यापैकी पाच जागा लढविण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे, तर दोघांनी प्रत्येकी तीन जागा लढवाव्यात, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यावरून दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू होती. त्यातून पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांचे नाव पुढे आले. मात्र, त्यांनी फार उत्सुकता दाखविली नाही. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी जगताप यांचे नाव सुचविले, आमदार संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिल्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, तसेच विश्वजीत कदम, बाळासाहेब शिवरकर, अशोक मोहोळ, दीप्ती चवधरी, उल्हास पवार, मोहन जोशी, अभय छाजेड, देवीदास भन्साळी, सचिन साठे आदी यावेळी उपस्थित होते. येत्या बुधवारी (दाेन नोव्हेंबर) जगताप उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
शहर आणि जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी असल्याचे बोलले जात होते. मात्र, काँग्रेसने उमेदवार दिल्यास ही निवडणूक रंगतदार होणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक राष्ट्रवादीत असून दोन्ही महापालिकांमधील काही सदस्य भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने अद्याप येथील उमेदवारी जाहीर केलेली नसून, त्यावरून पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून नगरसेवक अशोक येनपुरे यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. विरोधकांचे गणित जुळल्यास निवडणूक रंगतदार होईल, असा अंदाज आहे.
.............
वर्तुळ पूर्ण होणार?
ही जागा पूर्वी काँग्रेसच्या ताब्यात असताना काँग्रेसने चंदुकाका जगताप यांना आघाडीतर्फे उमेदवारी दिली होती. मात्र, तेव्हा राष्ट्रवादीत असलेले लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी केली आणि ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. तेव्हा पराभव पत्करावा लागलेले चंदुकाका जगताप यांचे चिरंजीव संजय जगताप यांचीच उमेदवारी जाहीर करून काँग्रेसने राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. त्यामुळे राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद नितीन कोळी दिवाळीनंतर परतणार होते!

$
0
0

पुणे: माछिल सेक्टरमध्ये शुक्रवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात सांगलीचे सुपुत्र नितीन सुभाष कोळी (२८) या बीएसएफ जवानाला वीरमरण आले. त्यांच्यामागे पत्नी तसेच चार आणि दोन वर्षांची दोन मुले असा परिवार आहे. शहीद कोळी यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची सरकारी मदत केली जाणार आहे.

वीरमरण लाभलेले नितीन सुभाष कोळी (२८) यांनी दिवाळीनंतर सुटी घेऊन घरी जाण्याचा बेत आखला होता, असे त्यांच्या जवळच्या नातेवाईकाने सांगितले. नितीन यांनी गुरुवारी घरी फोन करून कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. परंतु शनिवारी सकाळी ही बातमी समजली व त्यांच्या कुटुंबीयांवर तसेच पूर्ण गावावर दु:खाचा पहाडच कोसळला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सक्षम नेतृत्वाचे माहेरघर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शहराचे नव्हे, तर तालुक्यातील राजकीय नेतृत्त्वांचे उगमस्थान म्हणून परिचित असलेल्या भोसरीतील प्रभाग क्रमांक सातमधील लढतीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. आजपर्यंत चार आमदार, तीन महापौर आणि अनेक महत्त्वाची राजकीय पदे भूषविण्याची संधी लाभलेल्या या भागातील लढत लक्षवेधी आणि प्रतिष्ठेची असणार आहे.

शहराचे प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे, भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे आणि सोपान फुगे यांची राजकीय कारकिर्द याच प्रभागातून घडली आहे. याशिवाय, स्थायी समितीचे अध्यक्षपद, शिक्षण मंडळाचे सभापतिपद, प्रमुख राजकीय पक्षाचे शहराध्यक्षपद भूषविण्याची संधीही याच भागातील कार्यकर्त्यांना मिळालेली आहे. त्यामुळे सक्षम नेतृत्त्वाचे माहेरघर म्हणून या प्रभागाकडे पाहिले जात आहे. त्या अनुषंगाने येथील लढतही तितकीच महत्त्वाची मानली जात आहे. विद्यमान आमदार लांडगे यांच्या नेतृत्त्वाला आव्हान निर्माण करण्याची अवघड कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेसला करावी लागणार आहे.

लांडगे, लांडे, फुगे, गव्हाणे, शिंदे, लोंढे अशी गावकी-भावकी प्रभागात आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारीदेखील याच समीकरणाभोवती फिरणार आहे. लांडगे-लांडे यांच्या सत्तासंघर्षात कोण बाजी मारणार? हे येणारा काळ ठरविणार असला, तरी सद्यस्थितीत लांडगे यांचे वर्चस्व दिसून येते. त्यामुळे भावकीतील वादाचा लाभ उठवून राजकीय पक्ष संधीचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. आमदार लांडगे यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिष्ठा टिकविण्याचे तगडे आव्हान आहे. शिवसेना आणि काँग्रेसला सक्षम उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल, अशी परिस्थिती आहे.

ग्रामीण संस्कृतीचा वारसा जतन केलेल्या या गावात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प आकाराला आले आहेत. काही येत आहेत. यामध्ये सहल केंद्र, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, संत ज्ञानेश्वर भाजीमंडईचे नूतनीकरण, जीवरक्षक बाळासाहेब लांडगे जलतरण तलाव, मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका या प्रमुख प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातील नवी पिढी येथून नेतृत्त्व करण्यासाठी इच्छुक आहे. एकाच घराण्यातील अनेक इच्छुक वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र येथे पहावयास मिळते.

विद्यमान नगरसेवक म्हणून अॅड. नितीन लांडगे, डॉ. श्रद्धा लांडगे, शुभांगी लोंढे, विश्वनाथ लांडे, सुरेखा गव्हाणे, जालिंदर शिंदे, अनुराधा गोफणे कार्यरत आहेत. तरीही, आमदार लांडगे यांच्या पसंतीवर उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचे मोठे वलय निर्माण झाले आहे. तूर्तास माजी आमदार लांडे यांनी संयमी भूमिका स्वीकारली असून, ते सुप्त राजकीय डावपेच आखत आहेत. शह-काटशहाच्या आणि प्रतिष्ठेच्या राजकारणामुळे येथील लढत महत्वाची मानली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सराईत गुन्हेगाराचा खून;२४ तासांत संशयित ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भोसरी येथे गोठण गँगचा सदस्य असणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात हत्याराने वार करुन खून केल्याची घटना शनिवारी (२९ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. विकास लक्ष्मण माळी (२०, रा. पांडवनगर, भोसरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर, मल्लेश कोळी, शांताराम वाघमारे, शिवप्रसाद, प्रशांत, अनिकेत ऊर्फ अंड्या, श्रीकांत (सर्व रा. भोसरी) आणि ज्ञानेश्वर लांडगे (सध्या रा. येरवडा जेल) आदींवर भोसरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी अक्षय काटे नामक युवकाचा भोसरी येथे खून करण्यात आला होता. त्यामध्ये विकास हा आरोपी होता. शनिवारी भोसरी आदिनाथनगर, गव्हाणेवस्ती येथे विकास याच्यावर टोळक्याने तलवारी-कोयत्याने हल्ला चढविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, पोलिस येत असल्याचे समजल्याने टोळक्याने तेथून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेतील विकास माळी याला उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. विकास याचा खून झाल्याचे समजताच वायसीएम हॉस्पिटल परिसरात त्याच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.

अक्षय याच्या खुनाच्या वेळेस विकास हा अल्पवयीन असल्याने लवकर सुटला. काही दिवसांपूर्वीच तो बाहेर आला होता. त्यानंतर त्याने त्याची गँग जुळविण्याचा प्रयत्न केला होता. वर्चस्वाच्या लढाईतून त्यावेळेस अक्षय याचा खून झाला होता. त्यानंतर शनिवारी विकास याच्या खून करण्यात आला.

सध्या येरवडा जेलमध्ये असणाऱ्या ज्ञानेश्वर लांडगे याच्या सांगण्यावरून तसेच, पूर्वीच्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेनंतर काही तासातच भोसरी पोलिसांनी बारामती येथून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालक-वाहकांसोबत दिवाळी साजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दिवाळीच्या दिवशी कर्तव्य बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी करता यावी, म्हणून वल्लभनगर आगारात रविवारी (३० ऑक्टोबर) पहाटे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विविध आगारातून वल्लभनगरमध्ये मुक्कामी आलेल्या चालक-वाहकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या दिवशी पहाटेच एसटी विभागाकडून मिळालेल्या या अनोख्या उपक्रमामुळे चालक-वाहकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

वल्लभनगर आगारामध्ये पहाटे २०० चालक-वाहकांना अभ्यंगस्नानासाठी सुंगधी उटणे, साबण, तेल देण्यात आले. त्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सर्वांना फराळ वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी सकाळी ड्युटीवर रवाना होण्याच्या अगोदर एकत्रित फराळाचा आस्वाद घेतला. दिवाळीच्या दिवशी घरापासून दूर असूनही कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी करता येण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा आणि वल्लभनगर येथील कर्मचाऱ्यांचा हा दिवाळीचा कार्यक्रम सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू होता. वल्लभनगर आगाराने केलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक चालक-वाहकांनी केले. या कार्यक्रमामुळे किमान आम्हाला दिवाळी असल्याचे जाणवले, नाही तर रोजच काम असते. वल्लभनगर आगाराकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे या वर्षाची दिवाळी ड्युटीवर असूनही साजरी करता आली, अशी प्रतिक्रिया चालक-वाहक देत आहेत. या कार्यक्रमप्रसंगी वाहतूक निरीक्षक हेमंत खामकर, वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर मलशेट्टी, वसंत रावते, सहायक वाहतूक अधीक्षक जयंवत लोंढे, सुरक्षारक्षक महेंद्रकुमार धांडे, विष्णू डगळे आदी उपस्थित होते. आगारप्रमुख अनिल भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागणी घटल्याने गहू महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीसाठी होणारी मागणी घटल्याने गूळ, मिरची, शेंगदाणा उतरला आहे. तर, सीझन संपत आल्याने गहू, ज्वारीच्या दरात वाढ झाली आहे.

गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील भुसार घाऊक बाजारात बाजरी, तांदूळ, खाद्यतेल, रवा, मैदा, नारळ, बेसन, पोहे, सर्व प्रकारच्या डाळी, तसेच कडधान्ये, साखर, साबुदाणा, भगर, हळद आदी वस्तूंचे दर स्थिर राहिले आहेत. ज्वारीचा हंगाम संपत आला आहे. नवीन ज्वारी आता जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात बाजारात येईल. गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने उत्पन्न घटले. त्यामुळे ज्वारीच्या क्विंटलमागे २०० रुपयांची, तर गव्हाच्या दरात १००रुपयांची वाढ झाली. दिवाळीमुळे आता ग्राहकांची गुळाला मागणी कमी आहे. व्यापाऱ्यांकडून आडत घेण्यास सुरुवात झाल्याने अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून माल खरेदी बंद केले आहे. इतर व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेला गुळाचा साठा पडून राहिला आहे. त्यामुळे क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची घट झाली आहे.

शेंगदाण्याचे नवे पीक आता बाजारात येऊ लागले आहे. निर्यातीला आता मागणी नसल्याने क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपये दर उतरले आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील नवीन आलेला मिरची माल पावसात भिजला आहे. त्यामुळे हलक्या प्रतीच्या मालाची आवक अधिक आहे. हलक्या मालामुळे बाजारात दर उतरले आहेत. चांगल्या प्रतीचे दर टिकून आहेत. नवीन मिरचीमध्ये क्विंटलमागे १००० ते १५०० रुपये तर शीतगृहातील मिरचीमागे क्विंटलमागे ५०० रुपयांनी घट झाली आहे.

फळभाज्यांची आवक घटली

दिवाळीमुळे गुलटेकडी मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक घटली आहे. मागणीअभावी कारली, वांगी, गाजर, घेवड्यासह कोथिंबिरीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. मार्केटयार्डात रविवारी विविध भागातून शंभर ट्रक एवढी फळभाज्यांची आवक झाली. परराज्यातून हिमाचल प्रदेश येथून दोन ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबीचे तीन ते चार टेम्पो, कर्नाटक आणि बुलडाणा येथून हिरव्या मिरचीचे दहा ते बारा टेम्पो, तर आंध्रप्रदेश येथून एक टेम्पो शेवग्याची आवक झाली आहे.पुणे विभागातून सातारी आल्याची ७०० ते ८०० पोत्यांची आवक झाली. टोमॅटोची चार ते साडेचार हजार पेटी, फ्लॉवरची १० ते १२ टेम्पो, कोबीची ८ ते १० टेम्पोची आवक झाली. हिरवी मिरचीची ६ ते ७ टेम्पो तसेच भुईमूग शेंगाची शंभर पोती, गाजरची पाच ते सहा टेम्पो, सिमला मिरचीची आठ ते दहा टेम्पो, पावट्याची दोन ते तीन टेम्पची आवक झाली.पुणे विभागातून जुन्या कांद्याची २० ते २२ ट्रक, नवीन कांद्याची ७ते८ ट्रक एवढी आवक झाली. कांद्याची ही आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली असून, दिवाळीनंतर ही आवक वाढणार आहे. गुजरात आणि आग्रा येथून नवीन आणि जुन्या बटाटयाची ४० ट्रक तर मध्यप्रदेश येथून लसणाची अडीच ते तीन हजार गोणींची आवक झाली. दिवाळीमुळे फळभाज्यांसह पालेभाज्यांना मागणी घटली आहे.

सातारी आल्याचा भाव उतरला

गेल्या वर्षाच्या तुलनेत सातारी आल्याची मोठी आवक झाल्याने त्याचा भाव उतरला आहे. समाधानकारक पावसामुळे सातारी आल्याची मोठी लागवड झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणात आवक झाली. यंदाच्या वर्षी आल्याचे उत्पादन अधिक असल्याने दरात सुधारणा होणार नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.मार्केटयार्डात सातारा भागातून दररोज १५०० ते १८०० पोती आल्यातची सरासरी आवक होत आहे. गेल्या महिन्यापासून ही आवक वाढत आहे.सध्या बाजारैच होणारी आवक ही जुन्या लागवडीची असून काही दिवसांत नव्या आल्याची काढणी सुरू होईल. त्या वेळी आल्याची आणखी आवक वाढण्याची शक्यता आल्याचे व्यापारी अप्पा पवार यांनी वर्तविली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी होणारी आल्याची आवक सर्वाधिक आहे. परिणामी आल्याचे दर उतरले आहेत. गेल्या वर्षी याच दरम्यान सातारी आले २० ते २२ रूपये किलो दराने विक्री होत होती. यंदा १४ ते १६ रुपये किलोस भाव मिळत आहे, असेही पवार यांनी सांगितले.सातारी आलं हे बेंगळुरू, औरंगाबाद आदी भागातील आल्यांच्या तुलनेत गुणकारी आहे. सातारी आले तिखट असल्याने सुंठ, मसाला, औषधनिर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे सातारी आल्याला मागणी अधिक असते. मात्र, बंगळूरू आणि औरंगाबाद येथील आले फक्त दिसायला आणि आकारास चांगले असते. तर, सातारी आले हे आकारास लहान असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीत फुलले चेहऱ्यांवर हास्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी याची दूरपर्यंत ओळख नसलेली कातकरी समाजाची वस्ती या वर्षी आकाशकंदिल, फराळ, फटाके आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली. पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पौडमध्ये डोंगर दऱ्यांमध्ये राहणारे कातकरी समाजातील शेतमजूर दिवाळीनिमित्त आयोजित आनंदोत्सवात उत्साहाने सहभागी झाले होते. तर, चिमुकल्यांनी कधीही न पाहिलेले फटाके पहिल्यांदाच उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला.

कसबा पेठेतील त्रिमूर्ती मित्र मंडळ, प्रभात प्रतिष्ठान, गुरुवार पेठेतील वीर शिवराय तरुण मंडळ आणि बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पौडमधील कलमशेत, अंधेसे आणि बेलवडे येथील कातकरी पाड्यांवर झालेल्या कार्यक्रमाला किरण सोनिवाल, डॉ. विजय पोटफोडे, सुशील अगज्ञान, पियूष शहा, विनय चाळणीवाले, राजेंद्र भोसले, प्रतीक निंबाळकर, विकास महामुनी यांसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

डोंगरावरील या वस्तीमध्ये प्रत्येक घरात जाऊन कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळ, उटणे, पुस्तके, पणत्या आणि कपडे देऊन कुटुंबांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, प्रत्येक घराच्या दरवाजामध्ये आकाशकंदिल लावून त्यांना दिवाळीचे महत्त्व सांगितले. चिमुकल्यांनी फटाके उडविण्यासह फराळाचे पदार्थ खाण्याचा आनंदही लुटला.

स्थानिक रहिवासी गणपत कोळी म्हणाले, ‘आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी झाली. फराळाच्या पदार्थांची नावेदेखील माहिती नसल्याने हे पदार्थ आमच्या घरी होत नव्हते. परंतु, पुणेकरांनी आमच्याबरोबर साजऱ्या केलेल्या दिवाळीमुळे वस्तीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सहस्त्र दिव्यांतून जवानांना मानवंदना

आपली मातृभूमी सुरक्षित राहावी, यासाठी सीमेवर लढताना प्राणांची बाजी लावणाऱ्या शहीद मेजर प्रदीप ताथवडे; तसेच भारतीय सैनिकांना शिवसाम्राज्य वाद्य पथकांच्या वादकांनी एक सहस्त्र दिव्यांतून मानवंदना दिली. कोथरूड येथील शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यानात हा दीपोत्सव करण्यात आला.

‘शिवसाम्राज्य वाद्य पथका’तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदा उपक्रमाचे पाचवे वर्ष होते. या वेळी पथक प्रमुख अक्षय बलकवडे, शर्वरी जगताप, प्रतिभा डांगळे, श्रद्धा साहनी, अनिरुध्द डाळवाले, अमित तरडे तसेच पथकातील वादक उपस्थित होते. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हौतात्म्याची तरुणांना जाणीव व्हावी, यासाठी उपक्रम घेण्यात येतो. पथकामार्फत दिवाळीच्या प्रत्येक दिवशी समाजातील वंचित विशेष घटकाला जगण्याचा आनंद मिळावा; तसेच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हा आमचा प्रयत्न असतो, असे बलकवडे यांनी सांगितले.

‘सर्वधर्मीय आणि कृतज्ञ दिवाळी’

‘प्रबोधन माध्यम संस्थे’तर्फे ‘सर्वधर्मीय आणि कृतज्ञ दिवाळी’ या उपक्रमाचे दौंड येथील केडगावातील पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष होते. दिवाळीच्या वसुबारस या पहिल्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमात सातशे अनाथ मुले, दृष्टिहीन आणि वृद्ध महिला तसेच लहान मुले सहभागी झाली होती.

‘प्रबोधन माध्यम’चे संस्थापक दीपक बिडकर, संचालक गौरी बिडकर, मिशनचे माजी अध्यक्ष मार्कस देशमुख, सारिका रोजेकर, सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते महिलांना व अनाथ मुलांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच, प्रबोधन माध्यम संस्थेच्या वतीने मिशनच्या अन्न कोठाराला शंभर किलो धान्य भेट देण्यात आले. या कार्यक्रमाला ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष, पी. ए. इनामदार, मिशनचे माजी अध्यक्ष मार्कस देशमुख, संचालक लॉरेन फ्रान्सिस, उपसंचालक अनिल फ्रान्सिस, मुख्याध्यापिका प्रमिला डोंगरे, सारीका रोजेकर, सचिन सूर्यवंशी उपस्थित होते.

दिवाळी हा आनंदाचा कृतज्ञतेचा सण आहे. त्यात सर्व धर्मियांना, सर्व समाजघटकांना सहभागी करून घ्यावे या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन सलग पाच वर्षांपासून केले जात आहे. या उपक्रमातंर्गत आत्तापर्यंत गरीब, अनाथ विद्यार्थी, कचरावेचक, काश्मीरमधील विद्यार्थी, मदरसामधील विद्यार्थी, वृत्तपत्र विक्रेते, बॅक स्टेज आर्टिस्ट, सामाजिक कार्यकर्ते आदी सहभागी झाले आहेत.

कचरावेचकांना संसारोपयोगी भेटवस्तू

क्लीन गार्बेज मॅनेजमेंट, जीवित नदी, माय अर्थ, गायत्री परिवार आणि टीएए सागरमित्र मोहीम यांच्या संयुक्त विद्यमाने कचरा वेचकांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली. सिंहगड रोड परिसरातील कचरावेचकांचा संसारोपयोगी भेटवस्तू आणि मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी सागरमित्र अभियानाचे विनोद बोधनकर, क्लिन गार्बेजचे ललित राठी, विलास पोकळे, अनंत घरत, गायत्री परिवाराचे शैलेंद्र पटेल, जीवित नदीचे निरंजन उपासनी, अनिल सिंग, प्रकाश म्हस्के आदी उपस्थित होते. या वेळी कचरावेचकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

दररोज सिंहगड परिसरात गोळा होणाऱ्या एक टन ओल्या आणि सुक्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करता येऊ शकते, यासाठी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या एकत्रित सहभागी गरज आहे, असे मत राठी यांनी व्यक्त केले.

गुरूकुल आश्रमाला किराणा भेट

सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने बाबूरावजी घोलप महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त गुरूकुल आश्रमाला किराणा साहित्य भेट दिले. उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष होते. या वेळी राजेश टाकले, विजय नवले, बजरंग म्हस्के, संजय काळे, शरद पवार, सोमनाथ जम्भूलकर, अमोल काटे आणि माधुरी साठे हे माजी विद्यार्थी उपस्थितीत होते.

वंचितांबरोबर दिवाळी साजरी

उपेक्षितांनाही दिवाळीचा आनंद लुटता यावा या उद्देशाने ‘आधार’ संस्थेतर्फे रस्त्यावर राहाणाऱ्या वंचित कुटुंबियांबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या वेळी सर्वांना फराळ आणि मिठाईचे वाटप केले. सामाजिक जाणि‍वेतून प्रत्येकाने आपआपल्या परीने वंचितांच्या आयुष्यात एक दीप लाऊन मांगल्याचा सण साजरा करावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले.


विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा, नवनिर्मितीचा आनंद मिळावा, या उद्देशाने एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानतर्फे यादववाडी येथील माध्यमिक विद्यालयात पर्यावरणपूरक आकाशकंदिल बनविण्याचे प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी ‘पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याची गरज’ याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वदेशी वस्तू वापरून देशाच्या आर्थिक विकासास मदत होईल. चिनी बनावटीच्या वस्तू वापरू नये असे आवाहनही त्यांनी केले. यादववाडी विद्यालयाबरोबर पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथील माध्यमिक विद्यालय आणि प्राथमिक हायस्कूल; तसेच कानिफनाथ विद्यालय भिवरी या शाळेतील एक हजार विद्यार्थ्यांना त्यांनी आकाशकंदिल बनवण्याचे प्रशिक्षण दिले. यासाठी लागणारे सर्व साहित्य प्रतिष्ठानमार्फत विद्यार्थांना मोफत दिले जाते. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप नेवसे गुणशेखर जाधव, प्रतिष्ठानचे बबलू जाधव उपस्थित होते. वसंत ताकवले, अब्दुलगनी तांबोळी, मंगेश बोरकर, अबोली भोंगळे, राजेंद्र शिरसाठ, हनुमंत निगडे, दीपक भोसले यांनी मुलांना आकाशकंदील बनविण्यासाठी मार्गदर्शन केले.


‘स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान हवा’

थंडी, ऊन आणि पावसाची तमा न बाळगता शहरात गर्दीने व्यापलेले परिसर असूनही स्वच्छता करण्याचे काम सफाई कर्मचारी वर्षभर अविरतपणे करतात. स्वच्छता हे समाजाच्या प्रगतीचे मूळ असून सार्वजनिक स्वच्छता ठेवणाऱ्यांचा असा सन्मान व्हायला हवा, असे मत चित्रपट संगीत अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी व्यक्त केले. आकार मित्र मंडळातर्फे डहाणूकर कॉलनीतील कमिन्स सर्कल गार्डन येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर दिवाळी आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, प्रकाश बारड, प्रदीप जोशी, आयोजक सचिन फोलाने, बाळासाहेब माने आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार मेधा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कुलकर्णी म्हणाल्या, ‘सण-उत्सवांच्या काळात स्वच्छता कर्मचाऱ्यांची खरी परीक्षा असते. स्वत:च्या घराची स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता हे ते दिव्य पार पाडतात. जेथे स्वच्छता असते, तेथेचे लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे कोथरूडमधील स्वच्छतेचे श्रेय येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांना जाते. कर्मचाऱ्यांनी कोणताही ताण न घेता काम करण्यासोबत व्यसनांपासून दूर राहायला हवे.’ सचिन फोलाने म्हणाले, ‘दिवाळीसारख्या सण-उत्सवाच्या काळातदेखील स्वत:च्या घरापेक्षा शहराच्या विविध भागात सफाई करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपली दिवाळी हा कार्यक्रम घेण्यात आला.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मरगळ झटकून कामाला लागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘स्वातंत्र्याची चळवळ आणि त्यानंतर राष्ट्र उभारण्याचे काम हे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाले असून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा त्यात मोठा वाटा आहे. निवडणुका येत असतात, त्यात जय-पराजय होत असतो. कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा हा देदिप्यमान इतिहास स्मरून आलेली मरगळ झुगारून द्यावी आणि राष्ट्र उभारणीच्या कामात स्वतःला झोकून द्यावे,’ असे आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केले.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘आयर्न लेडी’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड उपस्थित होते. इंदिरा गांधी यांचा ३१ आक्टोबर हा स्मृतिदिन आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. छाजेड यांच्या संकल्पनेतून सणस मैदानाजवळील ठाकरे कलादालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

महाजन म्हणाले, ‘देशाच्या इतिहासात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. काँग्रेसचा इतिहास हा देदिप्यमान आहे. इंदिरा गांधी यांनी कधीही जातपात न मानता शेवटच्या क्षणापर्यंत देशसेवा केली. निवडणुकांत जय पराजय होत असतो. त्याने आलेली मरगळ झुगारून तरुणांनी राष्ट्र उभारणीच्या कामात स्वतःला झोकून दिले ​पाहिजे.’

पवार यांनी इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या अनेक धाडसी निर्णय आणि त्यांचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. पुण्यात १९७२मध्ये इंदिरा गांधी यांची सभा झाली होती. या सभेची आठवण सांगताना पवार यांनी ग. दि. माडगुळकरांनी इंदिरा गांधी यांच्यावर रचलेली ‘आज सैनिका पुढे प्रगटली विजय राजदेवता’ ही कविता उपस्थितांना ऐकवली.

इंदिरा गांधी या खऱ्या अर्थाने ‘आयर्न लेडी’ होत्या आणि त्यांनी घेतलेले अनेक धाडसी निर्णय हे नवीन पिढीसमोर यावेत, हा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे अॅड. छाजेड म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद नितीन कोळींचं पार्थिव सांगलीला रवाना

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

जम्मू-काश्मीरमधील कुपवाड्यात पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले सांगलीचे सुपुत्र, जवान नितीन कोळी यांचं पार्थिव पुण्याहून सांगलीकडे रवाना झाले आहे. उद्या सोमवारी शदीद कोळी यांच्या सांगलीतील दूधगाव या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शहीद नितीन कोळी यांचं पार्थिव दर्शनासाठी श्रीनगरमधील लष्करी तळावर ठेवण्यात आलं होतं. तिथे शहीद नितीन कोळी यांना लष्कराच्या जवानांनी सलामी दिली. त्यांनंतर त्यांचे पार्थिव पुण्याला आणण्यात आलं. त्यांच्या मूळ गावी होणाऱ्या अंत्यसंस्कासाठी त्यांचं पार्थिव सांगलीकडे रवाना करण्यात आलंय. शहीद नितीन कोळी यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी गावकरी दूधगावात एकवटले आहेत.

मूळ सांगलीतील कुपवाडचे असणारे नितीन कोळी २००८ला सीमा सुरक्षा दलात रुजू झाले होते. त्यांच्यामागे पत्नी तसंच चार आणि दोन वर्षांची दोन मुलं असा परिवार आहे.

शहीद कोळी यांच्या परिवाराला राज्य सरकारनं १५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

सीमेवरील माछिल भागात गस्त घालत असताना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या पथकावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री हल्ला केला होता. या हल्ल्यात मनजित सिंह आणि नितीन कोळी हे दोन जवान शहीद झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​आतषबाजीमुळे १५ ठिकाणी आगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे रात्री उशिरापर्यंत १० ते १५ ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या आगी लागल्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये मोशी येथे गोडाऊनला आग लागली. ती विझविण्याचे प्रयत्न अग्निशामक दलाकडून सुरू होते.
लक्ष्मीपूजन झाल्यानंतर व्यापारी आणि व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठ, शनिवार पेठ यासह उपनगरांतील चंदननगर, धनकवडी, येरवडा, औंध अशा ठिकाणी फटाक्यांमुळे किरकोळ स्वरूपाच्या आगीच्या घटना घडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘राष्ट्रवादी’च्या उमेदवाराचे नाव गुलदस्तात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची घोषणा करून पत्ते खुले केले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप उमेदवारीचा चेहरा गुलदस्तातच ठेवला आहे. पुढील दोन दिवसांत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, तो थेट अर्जच दाखल करेल, असे सांगितले जात आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत. काँग्रेसला अतिरिक्त जागा लढवायच्या असून, राष्ट्रवादी जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे पुण्याच्या विधान परिषदेसाठी संजय जगताप यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली. तत्पूर्वीच, भाजपनेही नगरसेवक अशोक येनपुरे विधान परिषदेसाठी अर्ज भरतील, असे स्पष्ट संकेत दिले होते. या दोन्ही पक्षांकडून उमेदवारांचे नाव जाहीर झाल्याने आता ‘राष्ट्रवादी’कडून कोणाला निवडणूक लढविण्याची संधी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.
विधान परिषदेचे विद्यमान आमदार अनिल भोसले यांना पुन्हा संधी दिली जाण्याची दाट चिन्हे आहेत. त्याच वेळी पिंपरी-चिंचवडमधून विलास लांडे यांच्या नावावरही पक्षात बराच खल सुरू आहे. तसेच, पक्षाचे ज्येष्ठ नेते अप्पा रेणुसे यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. आझम पानसरे आणि प्रदीप कंद या नावांवरही चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या असल्या, तरी तूर्तास ही दोन्ही नावे मागे पडल्याचे चित्र आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास येत्या बुधवारपासून (२ नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत राष्ट्रवादीच्या उमेदवारावर पक्ष नेतृत्वाची मोहोर उमटण्याची शक्यता असून, थेट अर्ज दाखल करण्याच्या वेळेसच, उमेदवार कोण असेल हे समजेल.

आघाडी होण्याची शक्यता
विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. महापालिकांसह जिल्हा परिषद आणि इतर ठिकाणचे पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचा निर्णय आयत्या वेळी घेण्यात आला, त्याचप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येही शेवटच्या क्षणी आघाडी होऊ शकते. राज्यातील काही जागांवर सामंजस्य झाले, तर परस्परांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरणारे उमेदवार अर्ज मागेही घेऊ शकतात. अर्ज मागे घेण्याची मुदत ५ नोव्हेंबरपर्यंत असल्याने पुढील ४-५ दिवसांतील घडामोडींवर विधान परिषद निवडणुकीचे सर्व चित्र आठवड्याच्याअखेरीस स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातीच्या दाखल्यासाठी उमेदवारांची धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची जातीचे दाखले मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे शिवाजीनगर येथील नागरी सुविधा केंद्रात अर्ज स्वीकारणे आणि दाखल्यांचे वितरण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधा केंद्रांमध्ये जातीचे दाखले मिळण्यासाठी येणाऱ्या अर्जांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये कुणबी दाखल्यांसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या सर्वाधिक आहे. दररोज सुमारे शंभर ते १५० अर्ज येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
इच्छुक उमेदवारांची संख्या ​आगामी काळात वाढणार असल्याने अर्जांचे प्रमाणही वाढत जाणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर येथील नागरी सुविधा केंद्रात निवडणुकीसाठी दाखले मिळण्यासाठी येणारे अर्ज स्वीकारणे आणि वितरण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षण सोडत जाहीर झाल्या आहेत. आरक्षण सोडतीमध्ये अनेक खुल्या गटातील इच्छुकांच्या जागांवर इतर मागास वर्गाचे (ओबीसी) आरक्षण पडले आहे. संबंधित उमेदवारांकडून आता कुणबी जातीचा दाखला मिळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. कुणबी दाखला मिळण्यासाठी ६० वर्षांपेक्षा अधिक वर्षांचे पुरावे सादर करणे अत्यावश्यक असते. जुने पुरावे मिळण्यासाठी हवेली तहसीलदार कार्यालयामध्ये इच्छुकांची गर्दी होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिकांवर सुरांची बरसात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
थंडगार हवेत मिसळलेले मधुर बासरीचे स्वर त्याच्या साथीला अंगावर शहारे आणणारे तबल्याचे बोल आणि अंतर्मुख करणारे पखवाज, असा त्रिवेणी संगम रविवारी जुळून आला. पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मोहवून टाकणाऱ्या बन्सीला पं. विजय घाटे यांच्या तबलावादनाची आणि पं. भवानीशंकर यांच्या पखवाजची साथ मिळाली अन् रसिकांवर सूर-तालाची बरसात झाली.
शिवाजीराव भोसले प्रतिष्ठान आणि मटा कल्चर क्लब आयोजित भोसले एन्क्लेव्ह, भोसलेनगर येथे होत असलेल्या ‘सूर प्रभात’ महोत्सवाअंतर्गत ‘सूर-ताल’ या कार्यक्रमात पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. विजय घाटे आणि प्रसिद्ध पखवाजवादक पं. भवानीशंकर यांनी भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचे विविध प्रकार सादर करत सूर-तालाचा अनोखा स्वराविष्कार रसिकांसमोर पेश केला. सूर आणि ताल या एकाच नाण्याच्या दोन बाजू, दोघेही एकमेकांशिवाय अपूर्णच हे या निमित्ताने या दिग्गजांच्या त्रयीने सिद्ध केले. त्यांनी सादर केलेल्या विविध रागदारींतील रचनांना उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. तबला आणि पखवाजाचे बोल जसे वाजत होते, तसे प्रेक्षकांमधील रसिक सुखावत होता. कोणी हात वर उंचावून दाद देत होते, तर कुणाचे पाय तालात थिरकत होते.
चौरसिया यांनी नटभैरव या रागाने मैफलीला सुरूवात केली. त्याला जोड तालात भवानी शंकर यांनी सुरेल साथसंगत केली. पं. विजय घाटे यांनी रूपक तालात चौरसिया यांना साथसंगत केली. त्यानंतर चौरसिया यांची बासरी आणि घाटे यांच्या तबल्याचा सवाल-जवाब सुरू झाला. द्रुत तीन तालातील या जुगलबंदीला रसिकांनी डोक्यावर घेतले. उत्तरोत्तर ही जुगलबंदी रंगत गेली. कार्यक्रमाच्या सांगतेला रसिकांच्या फर्माइशीनुसार चौरसिया यांनी पहाडी रागात भजन सादर केले. त्यांनी ‘ओम जय जगदीश हरे’ या प्रार्थनेने मैफलीचा शेवट केला.
पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. भल्या पहाटे लांबून येऊन प्रेक्षक कलाकारांना पावती देतात. ही गोष्ट जगात कुठेही पाहायला मिळत नाही. पुढील वर्षीही याच ठिकाणी येऊन कार्यक्रम करायला आवडेल, अशा भावना या वेळी चौरसिया यांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावगीतांमध्ये हरवले श्रोते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मराठी ललित संगीताच्या क्षेत्रातील विलोभनीय दालन असलेल्या भावगीतांना घराघरात पोहोचविणाऱ्या गजाननराव वाटवे यांची एकाहून एक सरस, वैविध्यपूर्ण सुरेल गीते उलगडत गेली अन् नकळत भावगीतांच्या विविधांगी विश्वात श्रोते हरवून गेले. ‘मी निरांजनातील वात’, ‘दूर दूर त्या तिथे’, ‘गगनी उगवला सायंतारा’, ‘रानात सांग’... अशा सहाबहार गीतांनी वाटवे यांच्या सांगीतिक कारकीर्दीचा प्रवास उलगडला.
निमित्त होते, ‘संवाद’ आणि ‘प्रबोधन विचारधारा’ यांच्यातर्फे आयोजित ‘मोहुनिया तुजसंगे’ या दिवाळी पहाट मैफलीचे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाचा ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ हा कल्चरल पार्टनर होता.
भावगीतांचे जनक म्हणून गजाननराव वाटवे यांना ओळखले जाते. आपल्या स्वतंत्र गायनशैलीत त्यांनी स्वतःचे युग निर्माण केले. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणेकरांसाठी ही खास शब्दसुरांची मैफल आयोजित करण्यात आली होती.
मैफलीत प्रसिद्ध गायक प्रमोद रानडे, अपर्णा संत, प्राजक्ता रानडे, कविता जांभेकर, राजीव बर्वे आणि सुचेता अभ्यंकर यांनी गायन केले. रमाकांत परांजपे, नरेंद्र चिपळूणकर, राजेंद्र हसबनीस, अवधूत धायगुडे यांनी वादनाची साथसंगत केली.
वाटवे यांच्या रचनांमधील विविध रंग या मैफलीत अनुभवायला मिळाले. जुन्या पिढीतील कवी राजा बढे, कवी अनिल, भा. रा. तांबे, ग. दि. माडगूळकर, सुरेश भट यांसह आजच्या पिढीतील रमण रणदिवे, संगीता बर्वे, जयंत भिडे यांच्याही ताज्या रचना सादर करण्यात आल्या. गगनी उगवला सायंतारा, अजून लादलेची दार, मोहुनिया, रानात सांग, घर दिव्यात मंद तरी, मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला, मी निरांजनातली वात, यमुना काठी ताजमहाल, चंद्रावरती दोन गुलाब...या गीतांना भरभरून दाद मिळाली. अरूण नूलकर यांनी सूत्रसंचालनातून वाटवे यांचा सांगीतिक प्रवास उलगडला.
या कार्यक्रमाची संकल्पना सुनील महाजन आणि स्वरानंद प्रतिष्ठानचे प्रकाश भोंडे यांची होती. निकिता मोघे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाच्या मध्यंतरानंतर ‘संवाद’तर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील आठ महिला सफाई कर्मचाऱ्यांचा दिवाळीनिमित्त सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​संमेलनाध्यक्षपदाच्या उमेदवाराचेच नाव गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील गोंधळ याही वर्षी कायम असून, साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणूक मतदार यादीतून उमेदवार डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून नाव असलेल्या अशोक बागवे यांचे नावही यादीत नाही.
संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. अक्षयकुमार काळे, प्रवीण दवणे, डॉ. जयकुमार घुमटकर आणि डॉ. मदन कुळकर्णी यांच्यात लढत होणार आहे. राज्यासह बाहेरील मतदारांशी संपर्क साधणे, त्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेणे याचे उमेदवारांकडून नियोजन केले जात आहे. मात्र, मतदार यादी हातात पडल्यानंतर आपलेच नाव यादीत नसल्याचे पाहून डॉ. घुमटकर अवाक झाले आहेत. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी केलेल्या अशोक बागवे यांचेही नाव मतदार यादीत नसल्याची बाब समोर आली आहे.
डॉ. घुमटकर यांनी निवडणूक अधिकारी मकरंद अग्निहोत्री यांना पत्र पाठवून ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. मतदार यादीत नाव नसल्याचा खुलासा करण्यात यावा, असे पत्र पाठवूनही अद्याप त्याला उत्तर देण्यात आलेले नाही. दूरध्वनीवरून तुम्हाला मतपत्रिका पाठविण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले आहे.
‘अर्ज भरताना त्यावर मतदार नोंदणी क्रमांक दिला जातो. छाननीमध्ये माझा अर्ज बाद झाला नाही. पण, प्रत्यक्षात पाहिले, तर मतदार यादीमध्ये माझे नावच समाविष्ट करण्यात आलेले नाही. हे हेतुपुरस्सर केले आहे का, अशी शंका मनात येते. मतदारांमध्ये एकप्रकारे गोंधळ निर्माण करण्याचाच हा प्रयत्न आहे,’ असा आरोप घुमटकर यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images