मावळ गोळीबार घटनेचे राजकीय पटलावर खोलवर प्रतिबिंब उमटले आहे. या दुर्घटनेनंतर झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला लाभ झाला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला. यापुढील काळातही या घटनेचा राजकीय लाभ उठविण्यासाठी प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
↧