सुट्ट्यांच्या कालावधीत शहरातील महत्त्वाची उद्याने दिवसभर खुली ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे. त्यामुळे, संभाजी बाग, पेशवे पार्क, थोरात उद्यान, पु. ल. देशपांडे उद्यान, लोहिया उद्यान आणि यशवंतराव चव्हाण उद्यान सकाळी सहा ते रात्री नऊ या कालावधीत खुली राहणार आहेत.
बागेची दारे दिवसभर खुली
↧
↧
हजार वृक्षांचे भवितव्य अधांतरी
वृक्षसंवर्धनासाठी महापालिकेने नेमलेली वृक्ष प्राधिकरण समिती वादग्रस्त ठरल्याने, सर्वसामान्य नागरिक, बांधकाम व्यावसायिक आणि सरकारी खात्यांकडून तोडणीच्या मागणीसाठी आलेल्या अर्जांतील तब्बल एक हजार वृक्षांचे भवितव्य पुन्हा एकदा अधांतरी राहिले आहे.
↧
‘एलबीटी’तून १३०० कोटींचा महसूल
महापालिका हद्दीत गेल्या वर्षीपासून लागू झालेल्या स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून पहिल्याच वर्षी तेराशे कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे. जकातीपेक्षा ‘एलबीटी’चे उत्पन्न अंशतः अधिकच असून, गेल्या महिन्यातही शंभर कोटी रुपयांहून अधिक महसूल पालिकेला प्राप्त झाला आहे.
↧
गायब मतदारप्रकरणी याचिका
शहरातील हजारो नागरिकांची नावे मतदारयादीतून गायब झाल्याप्रकरणी जयकर अँड पार्टनर्स या कायदेतज्ज्ञ संस्थेच्या वतीने मुंबई हायकोर्टात जनहितयाचिका दाखल करण्यात येणार आहे.
↧
‘हीट’ इज ऑन...
मागील काही दिवस चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाऱ्याने शनिवारी अखेर चाळीशीचा टप्पा पार केला. शनिवारी पुण्यात ४०.३ अंश सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील आठवडाभर पारा चाळीशीच्या आसपासच राहणार असल्याने येता आठवडा पुणेकरांचा घाम काढण्याचीच शक्यता आहे.
↧
↧
‘भांडारकर’ची निवडणूक प्रक्रिया सुरू
भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शी करण्यासाठी संस्थेकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांना मतपत्रिकांऐवजी ओएमआर (ऑप्टिकल मार्क रेकग्निशन) मतपत्रिका देण्यात येत आहेत. २५ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी ३९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, त्यातील पाच उमेदवार पुण्याबाहेरील आहेत.
↧
मराठा समाजासाठी इतर आरक्षणात बदल नको
मराठा समाजाला २० ते २५ टक्के आरक्षण देण्याचे नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या एकसदस्य आयोगाने जाहीर केले असले, तरी त्याची अंमलबजावणी होणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
↧
विवेकशीलतेचे संस्कार पत्रकारितेतून होतात
‘जात हे कधीही न संपणारे वास्तव आहे. जात लपविण्यापेक्षा, टाळण्यापेक्षा विवेकाने जगणे महत्त्वाचे आहे. या विवेकशीलतेचे संस्कार पत्रकारितेतून होतात,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक फ. मुं. शिंदे यांनी व्यक्त केले.
↧
तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
दुचाकीवरून चाललेल्या तरुणाला मारहाण करून त्याच्या गळ्यातील १८
ग्रॅम वजनाची, ३० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसका मारून
चोरून नेल्याची घटना नुकतीच धायरी रोड येथे घडली. अभिजित मुरारी बिराजदार (२९,
रा.
नऱ्हे धायरी) धायरी रोडवरून जात असताना हा प्रकार घडला. दुचाकीवरील दोघा
अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
↧
↧
भरधाव वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू
भरधाव वेगात आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत गाडी चालवणाऱ्यांमुळे शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांना प्राण गमवावे लागले. त्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे.
↧
भावनेच्या आहारी जाऊन इतिहासलेखन करायचे का?
‘भावनेच्या आहारी जात लेखन करायचे असेल तर, इतिहासातील
घटनांची अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणी करणार की नाही,’ असा सवाल
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शेषराव मोरे यांनी उपस्थित केला.
↧
मद्रास, केरळचा आंबा बाजारात
कर्नाटक आणि रत्नागिरी हापूस आब्यांबरोबरच मद्रास आणि केरळच्या आंब्याची आवक बाजारपेठेत वाढली आहे. रविवारी मार्केट यार्डमधील बाजारपेठेत आंब्याच्या ३० हजार पेट्यांची आवक झाली. त्यामध्ये कर्नाटक हापूसच्या २५ हजार आणि रत्नागिरी हापूसच्या पाच हजार पेट्यांचा समावेश आहे.
↧
उन्हामुळे पालेभाज्यांचा दर वाढला
उन्हाचा पारा वाढल्यामुळे पालेभाज्यांचे दर तेजीत आले आहे. किरकोळ बाजारपेठेत कोथिंबीर, मेथीच्या जुडीचा दर २० रुपयांपर्यंत गेला असून अन्य पालेभाज्यांच्या भावामध्ये वाढ झाली आहे. आले आणि हिरवी मिरचीच्या दरामध्ये १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. रविवारी मार्केट यार्डमधील घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याच्या १६० ते १७० गाड्यांची आवक झाली.
↧
↧
स्वस्त भाजीकेंद्राचा गाशा गुंडाळला
पुणेकरांना रास्त दरात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी मार्केट यार्डच्या परिसरात गाजावाजा करत सुरू केलेल्या स्वस्त भाजीकेंद्राचा कारभार गुंडाळला गेला आहे. या केंद्रामध्ये भाजीपालाच उपलब्ध नसल्याने या ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मुख्य बाजारपेठेचा ‘आसरा’ घ्यावा लागत आहे.
↧
बागेची दारे दिवसभर खुली
सुट्ट्यांच्या कालावधीत शहरातील महत्त्वाची उद्याने दिवसभर खुली ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे. त्यामुळे, संभाजी बाग, पेशवे पार्क, थोरात उद्यान, पु. ल. देशपांडे उद्यान, लोहिया उद्यान आणि यशवंतराव चव्हाण उद्यान सकाळी सहा ते रात्री नऊ या कालावधीत खुली राहणार आहेत.
↧
भोरमधील धनगर वस्ती हक्काच्या पाण्यापासून वंचित
भोर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या धनगर वस्तीमधील २५ कुटुंबे हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. गेल्या ६७ वर्षांत झालेल्या प्रत्येक निवडणुकीपूर्वी ‘आता तुम्हाला नक्की हक्काचे पाणी देऊ’ या आश्वासनापलीकडे लोकप्रतिनिधींकडून काहीही मिळाले नाही.
↧
सांस्कृतिक कार्यक्रमातून गारपीटग्रस्तांना मदत
गारपिटीमुळे कपाळाचे कुंकू पुसले गेलेल्या पाच महिलांना मदत करण्यासाठी पुण्यातील ‘सावित्रीच्या लेकी’ सरसावल्या. वानवडी येथे शनिवारी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामधून मिळालेला निधी गारपीटग्रस्त महिलांना देण्यात आला.
↧
↧
शेतकऱ्यांचा बाजार रस्त्यावर
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि घाऊक
ग्राहकांना कमी दरात माल मिळावा या उद्देशाने बारामती बाजार समितीमध्ये शेतकरी
बाजार चालू करण्यात आला होता. मात्र, तो महिन्याभरातच बंद झाल्यावर
रस्त्यावरच बाजार भरू लागला आहे.
↧
वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू
पुरंदर तालुक्यात १६ एप्रिल रोजी झालेल्या वादळी
पावसाने आणि काही ठिकाणच्या गारपिटीने शेतीमाल, फळबागांचे झालेले नुकसान
पाहून त्याचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार संजय पाटील यांनी दिले आहेत. ग्रामसेवक, कृषी
सहायक आणि तलाठी ही यंत्रणा निवडणुकीनंतर या कामाला लागली आहे.
↧
रेल्वेच्या महसुलाची ‘दुग्धगंगा’
दौंड जंक्शनला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवून
देणाऱ्या स्पेशल मिल्क ट्रेनची शंभरावी फेरी मंगळवारी होणार आहे. दौंडवरून राजधानी
दिल्लीकडे जाणाऱ्या या मिल्क ट्रेनने ३१ मार्च २०१४पर्यंत २७ महिन्यांत रेल्वेला १७
कोटी ३० लाख ८४ हजार ८२० रुपयांचा महसूल मिळवून दिला.
↧
More Pages to Explore .....