Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लाच प्रकरणात कारकुनाला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मावळ प्रांत कार्यालयातील कारकुनाला ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी १७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ​विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
प्रवीण किसन ढमाले (वय ४०, पिंपळे गुरव) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. संदीप जयसिंग घाडगे (३८, आंबेगाव बुद्रुक) यालाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी विनायक शिवाजी काळभोर (३५, आकुर्डी) यांनी तक्रार दाखल केली आहे. काळभोर आणि त्याचे मामा गणेश काटे यांनी मावळ येथे १३ एकर सहा गुंठे जागा विकत घेतली होती. त्यातील ४२ गुंठे जागाही एम. आय. डी. सी. संपादनासाठी प्रस्तावित झाल्याने त्याचा मोबदला म्हणून काळभोर व त्यांच्या मामांना मिळून एक कोटी ६६ लाख ४३,००० रुपये आणि १५ टक्के जमीन परतावा मिळणार होता.
ही रक्कम व परताव्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे यांची फाइल बनवून काळभोर मावळ प्रांत कार्यालयात गेले असता आरोपी ढमाले यांनी ‘साहेबांचे काहीतरी करावे लागेल,’ असे सांगून एकूण रकमेच्या १२ टक्के रकमेची मागणी केली. त्यावर काळभोर यांनी एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यावर ‘मामांचा धनादेश निघाला असून, दोघांनी मिळून दोन दिवसांच्या आत एक लाख रुपये दिले तरच तो धनादेश खात्यावर जमा करण्यात येईल,’ असे ढमाले यांनी सांगितले. त्यातले ५० हजार रुपये लगेच देण्यास सांगितले. काळभोर यांनी ती रक्कम दिली असता त्यांच्या खात्यावर ५५ लाख ४७,६६६ रुपये रक्कम जमा झाली. ढमाले यांच्या कार्यलयातून उर्वरित रक्कम देण्यासाठी फोन येत असल्याने काळभोर यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. अटक आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्याकडे अधिक तपास करण्यासाठी त्यांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन कोटींची फसवणूक; एकाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गुंतवणूकदारांना दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी टेम्पल रोझ रियल इस्टेट कंपनीच्या पुणे शाखा कार्यालय प्रमुखाला २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवाणी यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
या प्रकरणात यापूर्वी कंपनीचा प्रमुख आणि या गुन्ह्याच्या सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, नऊ कंपन्या स्थापन करून त्याद्वारे तब्बल पाच हजार गुंतवणूकदारांची सुमारे ३०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसाचा अंदाज आहे.
रमेश जियंदमल अघीचा (वय ५७, रा. रहाटणी) याला या प्रकरणात अटक करण्यात आली. यापूर्वी मुख्य सूत्रधार देविदास गोविंदराम सजनानी (६७, रा. मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे.
दीपा देविदास सजनानी, वनिता देविदास सजनानी (दोघेही, रा. मुंबई), मार्क्स योहान थोरात (रा. मुरबाड), केशव नारायण इदिया (रा. मुंबई) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात सरकारी वकील सुनील हांडे यांनी काम पाहिले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना पाच जुलै २०१३ ते १९ मार्च २०१७ या कालावधीत पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात घडली. प्लॉट नावावर करून देण्याचे अमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अघीचा याला अटक करून कोर्टात हजर केले. त्याने अनेक गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आहे. त्याला यातून मोठी रक्कम मिळाली आहे. त्याबाबत तपास करण्यासाठी त्याची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील सुनील हांडे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ निविदांवर आज पुन्हा चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट संचालक मंडळाचे (पीएससीडीसीएल) अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी ‘अॅडप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (एटीएमएस) बसवण्याच्या २६०.८७ कोटी रुपयांच्या निविदांवर उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केल्याचा दावा कंपनीने केला आहे. या निविदा शनिवारी होणाऱ्या बैठकीत पुन्हा चर्चेसाठी ठेवण्यात येणार असून, त्यावर काय निर्णय होणार, याबाबत पालिका वर्तुळात चर्चा आहे.
‘स्मार्ट सिटी’च्या उद् घाटनाला येत्या २५ जून रोजी एक वर्ष पूर्ण होत असताना या निविदा मंजूर करून या कामाचे उद् घाटन करण्याची प्रशासनाची योजना आहे. मात्र, या निविदांवर गेल्यावेळच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला नव्हता. डॉ. करीर बैठकीला अनुपस्थित होते. मात्र, त्यांनी या निविदांवर शंका उपस्थित करणारा मेल पाठवला होता. ‘स्मार्टसिटी’च्या संचालक मंडळाची बैठक बाणेरमध्ये एका हॉटेलमध्ये शनिवारी होत असून, त्यामध्ये या निविदा मंजूर करण्याचा निर्णय अजेंड्यावर घेण्यात आला आहे. डॉ. करीर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
‘एटीएमएस’च्या कामासाठी एल अँड टी या कंपनीने सुरुवातीला ३२६ कोटी रुपयांची निविदा भरली होती. त्यानंतर या कंपनीने सुधारित प्रस्तावाद्वारे ही निविदा २६०.८७ कोटी रुपयांची भरली आहे, तर स्मार्टसिटीच्या सल्लागारांनी या कामाचे ‘एस्टिमेट’ २२१.१७ कोटी रुपये दिले आहे. ‘एस्टिमेट’ आणि ठेकेदार कंपनीने निविदेत भरलेल्या रकमेत मोठी तफावत असल्याची शंका डॉ. करीर यांनी उपस्थित केली आहे. ‘एवढ्या मोठ्या फरकाची निविदा मंजूर करायची असल्यास त्याचे समर्थन कसे करायचे, याबाबत स्पष्टता असावी,’ असे करीर यांनी आपल्या ‘मेल’मध्ये म्हटले आहे. डॉ. करीर या बैठकीसाठी अनुपस्थित होते. मात्र, त्यांनी मेलद्वारे या निविदांतील काही त्रुटींवर स्पष्टीकरण मागावले होते. करीर यांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यानुसार शंकांच्या निरसनासह या प्रस्तावावर शनिवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे.

डॉ. करीर यांनी उपस्थित केलेल्या शंका
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची या प्रकल्पासाठी मंजुरी आहे का?
- पोलिसांकडील सध्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कशी मदत होणार?
- २०० मीटरपेक्षा जास्त अंतरावरील वाहतुकीचे नियोजन कसे होणार?
- ई-चलन सिस्टिम पोलिसांकडे अस्तित्वात आहे. नवीन सिस्टिममधून काय साध्य होणार?
- सध्याचे खांब वापरले जाणार, की नव्याने खांब उभारणार?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेला हवी ८४ हेक्टर जागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पंतप्रधान आवास योजनेतर्गंत ९३ हजार अर्ज आले असून, त्यापैकी पात्र अर्जदारांना घरे देण्यासाठी ८४ हेक्टर जागांचा शोध महापालिकेने सुरू केला आहे. या जागा ताब्यात घेण्यासाठी तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा ‘टीडीआर’ पालिकेला द्यावा लागणार आहे. महापालिका प्रशासनाने आरक्षित जमीन मालकांना जागा ताब्यात देण्यासाठी पत्र पाठवण्यास सुरुवात केली असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीने जागांचा शोध सुरू केला आहे. महापालिकेने शहरामध्ये आरक्षित असलेल्या जागा मालकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय सध्या ताब्यात असलेल्या जागांवर किती घरे बांधता येतील, याचा आढावा घेण्यात आला आले. पालिकेकडे सध्या सुमारे दोन हेक्टर जागा ताब्यात असून त्यावर दोन हजार घरे बांधता येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याशिवाय आगामी काळात महापालिकेत येणाऱ्या समाविष्ट गावांमध्ये किती जागा उपलब्ध आहेत, याचाही आढावा घेण्यात आला आहे.
शहरातील महापालिकेच्या मालकीच्या जागांशिवाय एस. टी. महामंडळ, वीज वितरण कंपनी अशा सरकारी विभागांकडे असणाऱ्या जागांबाबतही महापालिकेने विचार सुरू केला आहे. या जागा ताब्यात घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. ‘टीडीआर’, वाढीव ‘एफएसआय’ या नव्या पद्धतीनुसार संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे. काही जागा मालकांनी प्रतिसादही दिला असल्याचे समजते.
दरम्यान, केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ज्यांना आपले हक्काचे घर नाही, अशा नागरिकांसाठी ही योजना आहे. हे अर्ज भरल्यानंतर त्याची ​‘प्रिंट’, घोषणापत्र; तसेच इतर कागदपत्रे महापालिकेत येऊन सादर करावी लागतात.
अर्ज दुरुस्तीचे आवाहन
नागरिकांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांमध्ये तर चुका, त्रुटी आहेतच; त्याशि‍वाय अर्जातील आणि घोषणापत्रातील माहितीत तफावत असल्याचे छाननीत निदर्शनास आले आहे. अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी मेळावे घेण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. ऑनलाइन अर्जात दुरुस्ती करण्यात येऊ शकते. ऑनलाइन दुरुस्त करून त्याची ‘प्रिंट’ महापालिकेत सादर केल्यास असे अर्ज पात्र ठरू शकतात. नागरिकांनी चुकीचे; तसेच अपुरी माहिती असलेले अर्ज दुरुस्त करावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरांपासून सावधान!

$
0
0

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com
ShrikrishnaMT
पुणे ः रस्त्याने चालताना गर्दीत मोबाइल फोनवर बोलत असाल किंवा चॅटिंग करीत असाल, तर सावधान ! तुम्ही बेसावध असताना मोबाइल हिसकावून पळवून नेला जाण्याची शक्यता आहे. रस्त्यावरील साखळीचोरीचे प्रकार कमी झालेले असताना आता चोरट्यांनी मोबाइलकडे मोहरा वळविल्याचे समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांत मोबाइल पळवण्याच्या घटनांनी साखळीचोरीला मागे टाकले आहे.
शहर व परिसरातील गुन्हेगारीत हे नवे प्रकार सुरू झाल्याचे पोलिसांना आढळून आले. पुण्यात दोन ते तीन वर्षापूर्वी साखळीचोरीच्या गुन्ह्यांनी उच्चांक गाठला होता. रोज दिवशी आठ ते दहा घटना घडत होत्या. त्यामुळे महिलांना सोने घालून बाहेर पडणे कठीण होऊन बसले होते. पोलिसांनी या गुन्ह्यांना गंभीरपणे घेऊन आरोपींचा शोध सु्रू केला. मोठ्या प्रमाणात आरोपींना अटक केली; तसेच त्यांच्याकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफांनादेखील पोलिसांनी सोडले नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. त्यामुळे सोने विक्रीसाठी या चोरट्यांना अलीकडे अडचण येऊ लागली; तसेच पोलिस या गुन्ह्यांचा गंभीरपणे तपास करून अटक करू लागले. यामध्ये मोक्काचीदेखील कारवाई करण्यात येऊ लागली. त्यामुळे साखळीचोरी करणाऱ्या चोरट्यांना चांगलाच धाक बसला.
साखळीचोरीचे गुन्हे कमी होत असताना पुण्यात मोबाइल चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. रस्त्यावरून मोबाइलवर बोलत अथवा चॅटिंग करत चालत जाणाऱ्या अथवा थांबलेल्या व्यक्तीचे पूर्ण लक्ष मोबाइलवर असते. त्याचाच फायदा घेऊन चोरटे हातातील मोबाइल हिसकावून नेऊ लागले आहेत. गेल्या सहा महिन्यांत पुण्यात ५० पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. त्यापैकी ४० घटना पोलिसांनी उघडकीसदेखील आणल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत साखळीचोरीच्या ४१ घटना घडल्या होत्या. त्यापैकी ३८ घटना पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत.
मोबाइल विकणे सोपे
चोरट्यांना सोन्यापेक्षा मोबाइल फोन विकणे सोपे झाले आहे. अलीकडे दहा हजारांपेक्षा जास्त किंमतीचे महागडे स्मार्टफोन नागरिक वापरत आहेत. हे मोबाइल चोरल्यानंतर ग्रामीण भागाव अथवा गरीब लोक पाच ते सात हजारास हा मोबाइल विकत घेतात. मोबाइल इंटरनेट वापरण्याची सोय झाल्यामुळे चोरलेले मोबाइल कमी किंमतीत नागरिक विकत घेतात. त्या बरोबरच मोबाइलचा आयएमआई नंबर बदलण्याचे सॉफ्टवेअर आल्यामुळे हा क्रमांक काढून परराज्यात मोबाइलची विक्री केली जाते; तसेच चोरल्यानंतर मोबाइल बाहेरच्या राज्यात विक्रीसाठी पाठविण्यात येतात. मोबाइल चोरल्यानंतर पोलिसांकडून त्याचा गंभीरपणे तपास होत नाही. कधी-कधी तर मोबाइल घेतल्याची पावती घेऊन या, असे सांगण्यात येते. नागरिकांकडे पावती नसेल, तर ते परत पोलिसांकडे जात नाहीत. कधी-कधी तर ‘प्रॉपर्टी मिसिंग’चा गुन्हा पोलिसांकडून दाखल करून घेतला जातो. त्यामुळे चोरट्यांचे फावते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनचा प्रवाह थंडावला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेले तीन-चार दिवस राज्यांत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लागली असली, तरी मान्सूनची प्रगती मात्र थंडावली आहे. मान्सूनची प्रगती दर्शवणारा इस्ट वेस्ट शिअर झोन (वातावरणात तीन किलोमीटर उंचीवर विरुद्ध दिशांच्या वाऱ्यांचा मिलाफ होणारे क्षेत्र) सध्या महाराष्ट्रावर स्थिरावला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनाही अपेक्षित जोर नसल्यामुळे मान्सूनची प्रगती संथपणे होत असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे म्हणणे आहे.
अरबी समुद्रातील अनुकूल हवामानामुळे दक्षिण कोकणात आठ तारखेला मान्सूनचे आगमन झाले. पुढील चार दिवसांत त्याने राज्याची पश्चिम किनारपट्टीही व्यापली. मात्र, अनुकूल हवामानाच्या अभावी राज्याच्या इतर भागांत मान्सूनची वाटचाल वेगाने झाली नाही. पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. सुनीता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वातावरणात तीन किलोमीटर उंचीवर असणारे पूर्व आणि पश्चिम अशा विरुद्ध दिशांच्या वाऱ्यांच्या मिलाफाचे क्षेत्र (ईस्ट वेस्ट शिअर झोन) सध्या १८ अक्षांशावर म्हणजेच महाराष्ट्रावर स्थिर आहे. या क्षेत्राच्या उत्तरेकडील प्रगतीवरून मान्सूनचीही प्रगतीही दिसून येत असते. नैऋत्य मोसमी वाऱ्यांना हवा तसा अद्याप जोर नसल्यामुळे हे क्षेत्र उत्तरेकडे सरकत नसल्याचे स्पष्ट आहे.’
‘महाराष्ट्रावर सध्या समुद्रावरून आलेले बाष्प उपलब्ध आहे; तसेच ईस्ट-वेस्ट शिअर झोनमधील विरुद्ध दिशांनी येणाऱ्या वाऱ्यांच्या मिलाफातून उंच ढगांची निर्मिती होत आहे. मान्सूनच्या कमी उंचीवरील ढगांकडून मिळणाऱ्या पावसापेक्षा हा पाऊस निराळा असून, पूर्वमोसमी पावसासारखी त्याची वैशिष्ट्ये आहेत. येत्या २० तारखेपासून मान्सूनची उत्तरेकडील प्रगती पुन्हा सुरू होण्याची शक्यता असल्याचे मॉडेलवरून दिसून येत आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
मराठवाडा व्यापला
राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी लागत असतानाच मान्सूनने शुक्रवारी संपूर्ण मराठवाडा व्यापून विदर्भात प्रवेश केला. मान्सूनच्या प्रगतीची उत्तर सीमा नाशिक, बुलडाणा आणि यवतमाळवरून जात असून, पुढील दोन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांत मान्सूनची प्रगती अपेक्षित असल्याचे आयएमडीने नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाईचा अहवाल पदाधिकाऱ्यांनी फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मान्सूनच्या पहिल्याच सरींनी स्मार्ट सिटीतील पायाभूत सुविधांची दैना झाली असतानाही पालिका प्रशासनाने शहरातील नालेसफाई आणि पावसाळ्यापूर्वीची कामे अत्यंत दर्जेदार झाली असल्याचा दावा महापौर मुक्ता टिळक यांना सादर केला. दरम्यान, महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या या अहवालाची चिरफाड करून तो फेटा‍ळला. सद्यस्थितीचा उहापोह करून दोषींवर काय कारवाई करणार, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी शुक्रवारी दिले.
शहरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी करून ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर टिळक यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी तत्काळ १५ अधिकाऱ्यांची नेमणूक करून नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने एक सर्वसमावेशक अहवाल तयार करण्यात आला होता.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी हा अहवाल महापौर टिळक यांना शनिवारी सादर केला. ​महापौरांनी याप्रकरणी एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि विरोधी पक्षनेते चेतन तुपे या बैठकीस उपस्थित होते. त्याशिवाय अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, देशभ्रतार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सर्व झोनचे उपायुक्त, खाते प्रमुख आणि वार्ड ऑफिसर या बैठकीस उपस्थित होते.
प्रशासनाने सादर केलेल्या अहवालावर स्थायी समितीचे अध्यक्ष मोहोळ यांनी शंका उपस्थित केली. ‘पावसाच्या पाण्याने शहरात दैना केली. नाले तुंबल्याने काही घरांमध्ये पाणी शिरले, नालेसफाईची किती टक्के कामे झाली, याची माहिती अहवालात नाही. ही कामे करताना कोणीही दिरंगाई केल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे हा अहवाल केवळ कागदावर रंगवण्यात आलेला असून तो फेटाळावा,’ अशी सूचना मोहोळ यांनी केली. शहरात किती टक्के नालेसफाईची कामे झाली, उर्वरित कामे कधी पूर्ण करणार, कोणी दिरंगाई केली असल्यास त्यावर काय कारवाई करणार, असा स्पष्ट उल्लेख असलेला नवीन अहवाल सादर करण्याच्या सूचना या वेळी महापौरांनी दिल्या.
नालेसफाईच्या कामांबाबत तयार करण्यात आलेल्या अहवालावर महापालिकेत बैठक सुरू असताना बाहेर धो-धो पाऊस पडत होता. रस्त्यांवर पावसाच्या पाण्याने तळी साचली होती. वाहतुकीचा वेग कमी झाल्याने वाहनांच्या रांगा रस्त्यावर लागल्या होत्या. त्याच वेळी प्रशासनाकडून मात्र नालेसफाईची कामे अत्यंत दर्जेदार झाला असल्याचा दावा या बैठकीत करण्यात येत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरिनामाच्या गजरात तरुणाई दंग

$
0
0

वारकरी शिक्षण घेणाऱ्यांकडून वारीच्या जय्यत तयारीवर भर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टाळ-मृदंगाचा जयघोष करीत विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला जाण्याचे वेध लाखो वारकऱ्यांना लागले आहेत. या वारकऱ्यांमध्ये तरुणांचाही उत्साहही काही कमी नाही. सध्या आळंदी आणि देहूच्या परिसरात वारकरी शिक्षण घेणारे विद्यार्थी वारीचीही जय्यत तयारी करीत आहेत. मोबाइलच्या जमान्यात व्हॉट्सअॅप, फेसबुकने तरुणाईला विळखा घातला असतानाही हजारो तरुण टाळ-मृदंगाच्या साथीने हरिनामाचा गजर करीत आहेत.
सध्या शहरांमध्ये पाश्चिमात्य गोष्टींचे अनुकरण मोठ्या प्रमाणावर केले जाते. पुण्यासारख्या शहरामध्येही पाश्चिमात्य संगीताचे महत्व वाढले आहे. एकीकडे पियानो, गिटार, ड्रम्स अशा वाद्यांची चलती असतानाच आळंदीत मात्र, टाळ, मृदंग, पेटी, तबल्याचा नाद कानी पडत आहे. ही वाद्ये कुणी ज्येष्ठ व्यक्ती नाही तर वारकरी प्रशिक्षण घेणारे तरुण विद्यार्थी वाजवत असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस गायन, कीर्तन आणि वादनाचे प्रशिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे.
वारकरी शिक्षणासाठी आळंदीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचीं संख्या कमी होईल, अशी भीती वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थांनी व्यक्त केली होती. मात्र, दर वर्षी प्रशिक्षणासाठी येणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढच होत आहे. डॉक्टर, इंजिनीअर, वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेले शेकडो विद्यार्थी वारकरी संप्रदायाकडे वळत आहेत. मृदंग, टाळवादनाबरोबरच समाजप्रबोधन करण्यापर्यंत सर्वप्रकारच्या कला विद्यार्थी आवडीने आत्मसात करीत आहेत. सध्या दर वर्षी ३ ते ४ हजार विद्यार्थी आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. सर्व जाती, पंथांचे हे विद्यार्थी असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. हे विद्यार्थी वारीतही प्रत्येक दिंडीत सहभागी होऊन त्यांची कला सादर करतात. सध्याच्या दिंड्यांमध्ये मृदंग, पेटी वाजवणारे बहुतांश कलाकार वारकरी प्रशिक्षण घेतलेलेच आहेत.
‘दर वर्षी आमच्या संस्थेत ४०० ते ५०० विद्यार्थी दाखल होतात. त्यापेक्षा जास्त विद्यार्थी घेण्याची क्षमता नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने परत जावे लागते. सध्याचे तंत्रज्ञानाचे युग आहे मात्र, तरीही वारकरी संप्रदायाची ओढ आणि पारंपारीक वाद्यांची आवड असल्याने तरुणाई या प्रशिक्षणाकडे वळत आहे. या तरुणांना प्रशिक्षण देणारे प्राध्यापकही उच्चशिक्षित आहेत. वारकरी सांप्रदायामध्ये वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांचा मानवी शरीरावर होणार चांगला परिणामही वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजवण्याचे काम प्राध्यापक करीत आहेत. टाळ वादनातून अॅक्युप्रेशरची व्यवस्था सुधारते तसेच मृदंगाच्या नादातून तयार होणाऱ्या लहरी वातावरणात चैतन्य निर्माण करतात. विद्यार्थ्यांना अशाप्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिकवले जात असल्याने तरुण वारकरी शिक्षणाकडे आकर्षित होत आहेत,’ अशी माहिती आळंदीतील प्रसिद्ध वारकरी शिक्षण संस्थेचे समन्वयक तुकाराम मुळीक महाराज यांनी दिली.

वारकरी शिक्षणाची गोडी वाढली
एकीकडे कलेचे पाश्चात्यांचे अनुकरण होत असताना आळंदीमध्ये पारंपरिक कला आजही जोपासल्या जात आहेत. तरुणांना या कलेत पारंगत करून राज्यभर त्याचा प्रसार केला जात असल्याने वारकरी शिक्षणाचे महत्त्व वाढत चालले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चित्रपट रखडणे हा रसिकांवर अन्याय

$
0
0

दिग्दर्शक सुमित्रा भावे यांची भावना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘कासव कधी प्रदर्शित होणार, हा प्रश्न मला सतत विचारला जातो. चित्रपट व्यावसायिककृष्ट्या यशस्वी करणे हे माझे काम नसून सर्जनशील चित्रपट तयार करणे, हे माझे काम आहे. कासव लोकांना पाहायचा आहे; पण तो प्रदर्शित न होणे व्यवस्थेचा भाग असून चित्रपट रसिक, दिग्दर्शक, कलावंत यांच्यावर अन्याय आहे,’ अशी उद्विग्न भावना कासव चित्रपटाच्या दिग्दर्शक सुमित्रा भावे यांनी गुरुवारी पत्रकारांशी औपचारिक संवाद साधताना बोलून दाखवली.
संवाद पुणे, कोहिनूर ग्रुप, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, कला सांस्कृतिक परिवार यांच्यातर्फे सिटी प्राइड कोथरूड येथे आयोजित सुवर्णकमळ विजेत्या चित्रपटांच्या ‘सुवर्णपंचमी’ महोत्सवाचा समारोप ‘कासव’ या चित्रपटाने झाला. सुमित्रा भावे आणि अभिनेता आलोक राजवाडे यांना कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सिटी प्राइडचे प्रमुख प्रकाश चाफळकर, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, निकिता मोघे, संवादचे सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.
संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचलन केले. महोत्सवात कासवसह, श्यामची आई, श्वास, देऊळ, कोर्ट या चित्रपटांचा रसिकांनी आस्वाद घेतला.

कासव प्रदर्शित करण्यासाठी सहनिर्माते मोहन आगाशे यांची बोलणी सुरू आहे. विविध महोत्सवांमध्ये चित्रपटाचे कौतुक झाले आहे. लोकांना तो पाहायचा आहे, हे महोत्सवात पाहायला होणारी गर्दी आणि कधी प्रदर्शित होणार या प्रश्नावरून लक्षात येते. चित्रपटाचे निर्माते डॉ. प्रकाश लोथे आधी म्हणाले होते की, मला कोट्यवधींचा चित्रपट करायचा नाही, तर एक चांगला चित्रपट हवा आहे. कासव पाहिल्यानंतर त्यांना मनस्वी आनंद झाला. चित्रपट पाहून आनंद झाला, असे म्हणणारे निर्माते मिळायला हवेत.
- सुमित्रा भावे, दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टिळक दर्शन’ची नवी आवृत्ती भेटीला

$
0
0

भा. द. खेर जन्मशताब्दीची गुरुवारी होणार सांगता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विविध वाङ्मयप्रकारात लीलया संचार करताना आपल्या प्रतिभेची ठसठशीत नाममुद्रा उमटविणारे ख्यातनाम साहित्यिक भा. द. खेर यांच्या जन्मशताब्दीची सांगता होणार आहे. या निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात भा. द. खेर लिखित ‘लोकमान्य टिळक दर्शन’ या चरित्र ग्रंथाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी, अरविंद गोखले, खेर यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध लेखक राजेंद्र खेर, परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, निबंध, चरित्र, चरित्रात्मक कादंबरी, कुमार वाङमय, संतचरित्रे अशा विविध वाङ्मयप्रकारात खेर यांनी बहुमोल योगदान दिले. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना सर्जनशील साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळविणारे खेर ‘केसरी’चे सहसंपादक आणि ‘सह्याद्री’चे संपादक होते. त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातील कर्जत येथे झाला. १९३९मध्ये वकिलीची पदवी मिळवतानाच त्यांचा ‘नादलहरी’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. १९६८ पर्यंत त्यांच्या जवळपास पन्नास सामाजिक, कौटुंबिक कादंबऱ्या, चरित्र आणि इतर पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचे मामेबंधु ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्याशी झालेल्या चर्चेतून ते चरित्रात्मक कादंबऱ्याकडे वळले. ‘यज्ञ’ ही त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील लिहिलेल्या पहिल्या चरित्रात्मक कादंबरीची प्रकाशनापूर्वीच ११ हजार प्रतींची नोंदणी झाली होती. त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृतींचे गारुड आजही रसिक वाचकांच्या मनावर कायम आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावरील ‘अमृतपुत्र’ ही कादंबरी लिहिण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना ताश्कंदला आणि ‘हिरोशिमा’ ही कादंबरी लिहिण्यासाठी जपानला राज्य अतिथी (स्टेट गेस्ट) म्हणून पाठविले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील ग्रंथांलये शरपंजरी

$
0
0

सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत; ग्रंथपालांच्या समस्या ‘जैसे थे’च

Chintamani.Patki@timesgroup.com
Tweet : @chintamanipMT

पुणे : राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून भिलार हे पुस्तकांचे गाव साकारले. पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. ब्रिटनमधील ‘हे ऑन वे’ या गावाच्या धर्तीवर पुस्तकांचे गाव वसविण्यात आले. या अनोख्या प्रयोगाचे कौतुकही झाले. सरकारने पुस्तकांचे गाव साकारले; पण गावातील ग्रंथालयांचे काय, असा सवाल आता राज्यातील ग्रंथालये आणि ग्रंथालय चळवळीतील मंडळी करू लागली आहेत. राज्यातील ग्रंथालयांची अवस्था अत्यंत दयनीय असून, काही ग्रंथालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याला सरकारी ग्रंथालयेही अपवाद नसल्याचे चित्र आहे. राज्याला ग्रंथालयांची समृद्ध परंपरा लाभली असून, किमान शंभर ग्रंथालयांनी शताब्दीपूर्ती केली आहे. राज्यातील विविध भागात ही ग्रंथालये तग धरून वाचन संस्कृती टिकविण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, आता या ग्रंथालयांनाच वाचविण्याची वेळ आली आहे. शताब्दी पार केलेल्या ग्रंथालयांचे अधिवेशन चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या पुढाकाराने दोन वर्षांपूर्वी घेण्यात आले होते. ग्रंथालयांच्या प्रमुखांनी तेव्हा वाचलेला तक्रारींचा पाढा ‘जैसे थे’ आहे.
‘पुस्तकांचे गाव प्रयोग चांगला आहे; पण या नादात आहे, त्या समृद्ध वारशाकडे डोळेझाक करण्याचेच सरकारने ठरवले आहे का, असा सवाल लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी ‘मटा’शी बोलताना केला.
‘भिलारच्या प्रयोगाला काहीच धोरण नाही. हा उपक्रम किती काळ टिकेल हे सांगता येणार नाही. लोक पुस्तक वाचायला येणार की फिरायला व विरंगुळा म्हणून येणार,’ असा सवाल एका ग्रंथपालांनी उपस्थित केला. ‘पुस्तकांचे गाव हे केवळ सेल्फीचे गाव झाले आहे. त्यापेक्षा आहे त्या ग्रंथालयांना बळ दिले पाहिजे,’ यावर त्यांनी बोट ठेवले.
विश्रामबागवाड्यातील सरकारी ग्रंथालयात सुमारे साडेतीन लाख पुस्तकांचा खजिना आहे; पण त्यांची म्हणावी तशी काळजी घेतली गेलेली दिसत नाही. हीच परिस्थिती सर्व शासकीय ग्रंथालयांची आहे. अजित पवार अर्थमंत्री असताना अनुदानामध्ये वाढ झाली होती. जिल्हा ग्रंथालयामार्फत हे अनुदान देण्यात येते. याची माहिती तेथील कर्मचाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ‘मटा’ला दिली.

राज्यातील ग्रंथालये एका दृष्टिक्षेपात
प्रकार संख्या
जिल्हा अ वर्ग ७ लाख २० हजार
तालुका अ वर्ग ३ लाख ८४ हजार
तालुका ब वर्ग २ लाख ८८ हजार
तालुका क वर्ग १ लाख ४४ हजार
इतर अ वर्ग २ लाख ८८ हजार
इतर ब वर्ग १ लाख ९२ हजार
इतर क वर्ग ९६ हजार
इतर ड वर्ग ३० हजार

राज्यातील ग्रंथालयांची स्थिती अत्यंत वाईट आहे. अ वर्ग ग्रंथालयामध्ये २४०० रुपये वेतनामध्ये सेवक कसा काम करेल? ग्रंथपालांची स्थिती अशीच आहे. पुस्तकांचे गाव प्रकल्प वेगळा असला तरी गावातील ग्रंथालयांचे काय? या ग्रंथालयांना बळ देणे ही सरकारची जबाबदारी आहे. काही ग्रंथालये केवळ अनुदान लाटण्यासाठी स्थापन झाली आहेत. त्यांच्या मुसक्या आवळून चांगल्या ग्रंथालयांना सरकारने बळ द्यायला हवे.
प्रकाश देशपांडे, कार्याध्यक्ष, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपीचे कामकाज मराठीतूनच चालावे

$
0
0

मराठी भाषा संवर्धन समितीची आग्रही भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) सर्व कामकाज मराठीतूनच व्हावे, अशी आग्रही भूमिका मराठी भाषा संवर्धन समितीने घेतली आहे. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार कार्यालयीन कामकाज मराठीमधूनच झाले पाहिजे, यासाठी समितीने कंबर कसली आहे. यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मराठी भाषेच्या प्रचार व संवर्धनासाठी महापालिकेच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन समितीची बैठक महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीला डॉ. न. म. जोशी, प्रा. अनिल गोरे, प्रा. मिलिंद जोशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी भाषाविभाग प्रमुख तुकाराम रोंकटे, प्रा. श्याम भुर्के, संजय भगत, बापूसाहेब (गुरूजी) कर्णे, विरोधी पक्ष चेतन तुपे, सम्राट थोरात, महेश लडकत, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, रवी चौधरी आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते.
पीएमपीचे सर्व कामकाज मराठीतूनच व्हावे, यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. पीएमपीच्या कामकाजात इंग्रजी भाषेचा वापर होतो, हे आकड्यांमधून दिसते. त्यामुळे यासंबंधी पीएमपी प्रशासनाकडे पालिकेकडून पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मराठीत होणाऱ्या परिक्षांची माहिती नागरिकांना देण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पाच वर्षांपूर्वी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात भाषेच्या संवर्धनासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार वर्षभर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांसदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.
महापालिकेने सुरू केलेला ‘साहित्यिक कट्टा’ हा उपक्रम चांगला असूनही, छत्रपती संभाजी उद्यान आणि कमला नेहरू पार्क या दोनच उद्यानांमध्ये तो चालविला जात आहे. आगामी काळात ज्येष्ठ नागरिक संघटनांकडे या उपक्रमाची जबाबदारी देण्यात येणार आहे. समितीच्या दैनंदिन कामकाजासाठी एक पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त करण्याबरोबरच महापालिकेच्या पाच परिमंडळ कार्यालयात मराठी भाषा संवर्धनाचा प्रभार एका अधिकाऱ्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आखाडा’ मराठीवाचकांच्या भेटीला

$
0
0

महावीरसिंह फोगट यांच्या प्रवासावरील पुस्तकाचे प्रकाशन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुस्तीसारख्या खेळाच्या माध्यमातून हरियाणासह देशभरात सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या महावीरसिंह फोगट यांचा जीवनप्रवास आता मराठी वाचकांच्या भेटीला आला आहे. क्रीडापत्रकार सौरभ दुग्गल लिखित ‘आखाडा’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करण्यात आला आहे. लीना सोहोनी यांनी पुस्तकाचा अनुवाद केला असून, मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
‘दंगल’ या चित्रपटात अभिनेता आमीर खान याने फोगट यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून फोगट यांचे कार्य देशभरात पोहोचले. पुरुषांप्रमाणेच महिलाही कुस्तीसारख्या खेळात सक्षमपणे देशाचे प्रतिनिधित्व करू शकतात हे फोगट यांनी दाखवून दिले. चित्रपटात फोगट यांनी त्यांच्या मुलींना दिलेले प्रशिक्षण, त्यासाठी घेतलेली मेहनत दाखवण्यात आली आहे. मात्र, स्वतः फोगट यांचे बालपण, कुस्तीपटू असतानाचे त्यांचे किस्से, कुटुंबासाठी त्यांनी केलेली ओढाताण याचे चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे.
लीना सोहोनी म्हणाल्या, ‘सौरभ दुग्गल यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत हे पुस्तक लिहिले आहे. दंगल हा चित्रपट फोगट मोठे झाल्यानंतर त्यांचा आणि त्यांच्या मुलींच्या प्रवासावर बेतलेला आहे. परंतु, फोगट यांचा लहानपणापासून सुरू झालेला प्रवास पुस्तकात मांडलेला आहे. फोगट यांचे दाहवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण नाही. मात्र, त्यांच्यामध्ये एक विलक्षण जिद्द आहे. त्या जिद्दीने त्यांनी कुस्ती खेळात भारताचे नाव अव्वल स्थानी रहावे यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना या पुस्तकातून न्याय देण्यात आला आहे.‘
पश्चिम महाराष्ट्र हे कुस्तीचे विद्यापीठ मानले जाते. त्यामुळे या पुस्तकाचा मराठीत अनुवाद व्हावा, अशी इच्छा होती. या पुस्तकात फोगट यांच्या जीवन प्रवासाबरोबरच वडील आणि मुली यांचे नाते, खेळासाठी केलेला संघर्ष, महिला खेळाडूंच्या सामाजिक समस्या मांडण्यात आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कुस्तीपटूंना फोगट यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी, असाही या अनुवादामागचा उद्देश आहे, असे दुग्गल म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी नऊपूर्वी परीक्षाकेंद्रांवर जावे

$
0
0

‘यूपीएससी’च्या परीक्षेसाठी प्रशासनाचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा १८ जूनला होत असून, याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी असल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी सकाळी नऊ वाजेपर्यंत केंद्रात पोहोचणे आवश्यक आहे. सकाळी ९ वाजून ४० नंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.
‘ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा वाजता पहिले सत्र असून, दुसरे सत्र दुपारी अडीच ते साडेचार वाजता होणार आहे. या दिवशी दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामासाठी असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यात अडचण निर्माण होऊ शकते. ही बाब विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले. ‘ परीक्षेसाठी ८३ उपकेंद्रे आहेत. त्या केंद्रांवर ३० हजार ५५७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यांनी सकाळी नऊ वाजेपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. या परीक्षेसाठी तीन हजार ९४० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. चार निरीक्षक आणि ३३ समन्वय अधिकारी आहेत,’ असेही मुठे म्हणाले.
‘परीक्षेच्या कालावधीत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी पाच पोलिस नेमण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका आणि उत्तरप​त्रिकांसाठी असलेल्या वाहनांसोबत ३२ शस्त्रधारी पोलिस असणार आहेत,’ असेही मुठे म्हणाले.

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी वेळेत पोहोचणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने संबंधित विद्यार्थ्यांनी नियोजन करावे. सकाळी नऊ वाजून ४० मिनिटांनंतर परीक्षा केंद्रात कोणालाही​ प्रवेश दिला जाणार नाही.
राजेंद्र मुठे
निवासी उपजिल्हा​धिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांसाठी आता स्वतंत्र ट्रॅक

$
0
0

आयडीटीआर’मध्ये होणार वाहनपरवाना चाचणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चाकचाकी वाहन चालविण्याचा पक्का परवाना काढण्यासाठी यापुढे पुणेकरांना स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होणार आहे. सध्या भोसरी येथील इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग अॅण्ड ट्रेनिंग रिसर्च (आयडीटीआर) येथे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतील भावी वाहनचालकांच्या चाचण्या घेतल्या जातात. मात्र, आता मोशी येथील ट्रॅफिक पार्कमध्ये पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र ट्रॅक सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ‘आयडीटीआर’ येथे केवळ पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गतच्या ड्रायव्हिंग चाचणी होणार आहेत.
मोशी येथे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मालकीचा ट्रॅफिक पार्क आहे. या पार्कमध्ये ‘आयडीटीआर’च्या धर्तीवर अत्याधुनिक पद्धतीचे ‘ट्रॅक’ आहेत. या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्ससाठीच्या टेस्ट घेण्यात याव्यात, अशी मागणी यापूर्वी परिवहन विभागाने राज्य सरकारकडे केली होती. मात्र, आता प्राधिकरणाने हे पार्क टेंडर प्रक्रियेद्वारे टेस्टसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आयडीटीआर’च्या धर्तीवरच या पार्कमध्ये आरटीओचे कामकाज चालेल. अर्जदार ‘आयडीटीआर’ला ‘टेस्ट’साठीचे शुल्क देतात. त्याप्रमाणे ट्रॅफिक पार्कमधील कंत्राटदार कंपनी किंवा संस्थेला शुल्क देतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.
‘आयडीटीआर’ येथे सध्या एका दिवसात केवळ १७६ उमेदवारांना लायसन्ससाठी टेस्ट देता येते. त्यामध्ये नुकतीच ३० ने वाढ करण्यात आली आहे. मात्र, हा वाढीव कोटा लर्निंग लायसन्सची वैधता संपणाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी हा कोटा अपुरा पडत आहे. त्यामुळे नवीन ‘टेस्टिंग ट्रॅक’ उपलब्ध झाल्यानंतर दोन्ही शहरातील आरटीओंवरील ताण हलका होणार आहे.

कॅमेऱ्याद्वारे सेन्सर
‘आयडीटीआर’प्रमाणे मोशी येथील ट्रॅफिक पार्कमध्ये ‘आठ’, ‘एस’ आणि ‘एच’ आकारातील ट्रॅक उपलब्ध आहे. तसेच, ग्रेडिएंट देखील आहे. मात्र, या ठिकाणी बोगद्याचा देखील समावेश आहे. टेंडर प्रक्रियेद्वारे कंत्राट मिळविणाऱ्या कंपनी किंवा संस्थेने या ट्रॅकवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्याद्वारे ‘सेन्सर’ प्रणाली विकसित करावयाची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्चीला मिळणार दहा अतिरिक्त गुण?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सैराट चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रिंकू राजगुरू उर्फ आर्चीला दहावीच्या परीक्षेत आणखी दहा गुण मिळू शकणार आहेत. अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे तिला अतिरिक्त गुण देण्यात यावेत, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे आला आहे. त्यावर विचार सुरू असून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंडळातर्फे सांगण्यात आले.
सैराटमुळे लोकप्रियता वाढल्याने रिंकूला शाळेत जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळेच तिने दहावीत शाळेत न जाता बाहेरून परीक्षा दिली. चित्रिकरणामुळे तिला अभ्यासासाठी फारसा वेळ मिळू शकला नाही. त्यामुळे जेमतेम महिनाभर केलेल्या अभ्यासातून तिने ६६.४० टक्के मिळवले. चित्रकलेसाठी तिला पाच गुण अतिरिक्त देण्यात आले होते. मात्र, तिने भूमिका केलेला चित्रपट व्यावसायिक असल्याने मंडळाने तिला दहा अतिरिक्त गुण दिले नव्हते.
दरम्यान, जानेवारी २०१७ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षेत दहा गुण अतिरिक्त देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. रिंकूला सैराटमधील भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे तिला हे दहा गुण देण्यात यावेत, अशी मागणी होत होती. तसा प्रस्तावही विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आला होता. ‘रिंकू राजगुरू हिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने तिला अतिरिक्त गुण द्यावेत, असा प्रस्ताव मिळाला आहे. त्यावर विचार सुरू आहे. मात्र, त्यावर निर्णय झालेला नाही,’ असे पुणे विभागीय मंडळाचे सचिव बी. के. दहिफळे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याहून दररोज रात्री सात उड्डाणे

$
0
0

कोलकाता, कोची, बेंगळुरू, नवी दिल्ली, हैदराबादसाठी सेवा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रवासी वाहतुकीचा बदलता ट्रेंड लक्षात घेऊन भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पुणे विमानतळावरून रात्री सात नवी उड्डाणे सुरू केली आहेत. कोलकाता, कोची, बेंगळुरू, नवी दिल्ली आणि हैदराबाद येथे रात्री साडेदहा ते सकाळी सहा या वेळेत नव्या फ्लाइट सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रात्रीचा प्रवास करून वेळ वाचविण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे.
पुण्यातून हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे विमानतळाच्या विस्ताराची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे वेळेच्या उपलब्धतेनुसार नागरी उड्डाणे वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, गेल्या चार वर्षात प्रथमच पुण्याहून रात्री आणि विशेषतः मध्यरात्रीनंतर सात फ्लाइट सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये पाच फ्लाइट एप्रिलपासून सुरू करण्यात आल्या आहेत तर, दोन फ्लाइट जून महिन्यात सुरू केल्या आहेत.
प्रवाशांची थेट फ्लाइटची मागणी असल्याने एप्रिलच्या अखेरीस पुणे-बेंगळुरू, पुणे-दिल्ली आणि पुणे-कोलकाता या मार्गावर पाच फ्लाइट सुरू करण्यात आल्या होत्या. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान विमानतळ प्राधिकरणाने केलेल्या सर्व्हेमध्ये प्रवाशांनी रात्रीच्या प्रवासाला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले. त्यामुळे कोची आणि हैदराबाद येथे फ्लाइट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हैदराबादवरून पहाटे अडीच वाजता उड्डाण करून पहाटे तीन वाजून ५० मिनिटांनी ते विमान पुणे विमानतळावर दाखल होईल. तर, चार वाजून २० मिनिटांनी पुण्यातून उड्डाण करून ते साडेपाच वाजता पुन्हा हैदराबादला पोहोचेल.
कोची फ्लाइट मध्यरात्री १२ वाजून २५ मिनिटांनी निघून पहाटे दोन वाजून पाच मिनिटांनी पुण्यात दाखल होईल. त्यानंतर पुण्यातून दोन वाजून ३५ मिनिटांनी उड्डाण करून कोचीला पहाटे सव्वाचार वाजता पोहोचेल.

१२ चेक इन काउंटर्स सुरू
सध्या पुणे विमानतळावरून दररोज १५४ फ्लाइट उपलब्ध असतात. त्यामुळे प्रतिदिन प्रवास करणाऱ्यांची सरासरी संख्या २० ते २५ हजारांच्या दरम्यान आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे विमानतळ प्रशासनाने १२ नवीन ‘चेक इन काउंटर्स’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असून, सुरक्षिततेच्या दृष्टिनेही उपाययोजना करण्यात येत आहे.

या पाच मार्गांवरील एप्रिल महिन्यातील प्रवासी संख्या

मार्ग प्रवासी
पुणे-कोची-पुणे १६ हजार ९२२
पुणे-दिल्ली-पुणे दोन लाख नऊ हजार ४८९
पुणे-कोलकाता-पुणे २३ हजार २५२
पुणे-हैदराबाद-पुणे २९ हजार ७५४
पुणे-बेंगळुरू-पुणे एक लाख ५३९

प्रवाशांच्या सेवेसाठी सात व्हेंडिंग मशिन

प्रवासी आणि त्यांच्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांच्या सोयीसाठी विमानतळ परिसरात सात ऑटोमॅटिक व्हेडिंग मशिन बसविण्यात येणार आहे. ऑटोमॅटिक मशिन बसविण्याची ही पहिलीच वेळ असून, येथील विक्री केंद्रांवर मिळणाऱ्या शीतपेयांच्या तुलनेत दर कमी असणार आहेत.
पुणे विमानतळावरील प्रवासीसेवांचा गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. फ्लाइटची संख्या वाढण्याबरोबरच प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या प्रतिदिन सरासरी २० ते २५ हजार प्रवासी येथून ये-जा करतात. त्याबरोबरच त्यांचे नातेवाइक आणि मित्र परिवार यांची संख्याही वाढली आहे. या सर्वांच्या सोयीसाठी विमानतळ प्राधिकरणाने व्हेंडिंग मशिन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुण्यासह गोवा आणि इंदूर येथील विमानतळांवर एकूण २२ मशिन बसविली जाणार आहेत. त्यापैकी सात मशिन पुणे विमानतळासाठी आहेत.
पुणे विमानतळाच्या टर्मिनलच्या आतील बाजूस जुने, नवीन चेक इन आणि आगमनाचे ठिकाण या ठिकाणी व्हेंडिंग मशिन बसविण्यात येणार आहेत. मशिनधारकाला पाच वर्षांसाठी परवाना दिला जाणार आहे. तसेच, व्हेंडिग मशिनद्वारे दिल्या जाणाऱ्या कोणत्याही पेयाची किंमत २० रुपयांपेक्षा अधिक असू नये. यामध्ये व्हेडिंग मशिनधारकांना दर तीन महिन्यांनी विमानतळ प्रशासनाला पेयांचे दर सादर करणे बंधनकारक असणार आहे. विमानतळ प्राधिकरणाने याबाबतची टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेद्वारे मशिन पुरवठादारांची निवड केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खाकी’ चोरट्यांनी लुटले

$
0
0

औरंगाबादच्या नागरिकाची ई-मेलद्वारे तक्रार; एक अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

औरंगाबाद येथील व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन फरासखाना पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांनी २५ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने पुणे पोलिसांकडे ई-मेलद्वारे तक्रार केल्यानंतर दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर फरासखाना पोलिसात गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली.
गणेश मारुती सोनवणे आणि अनिल हनुमंत रासकर (पोलिस शिपाई फरासखाना) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. सोनवणे याला रात्री अटक करण्यात आली. या प्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने ई-मेलद्वारे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुंबई येथे मंत्रालयात त्यांच्या कामानिमित्त गेले होते. त्यानंतर ते सहा मे रोजी कारने मित्रासह पुण्यात आले. त्यांनी मित्राला पुण्यात सोडले आणि सदाशिव पेठ येथील एका लॉजवर जाण्यासाठी निघाले. त्यावेळी ते लक्ष्मी रस्त्याने रविवार पेठ चौकीसमोरील चौकात आले. त्यावेळी रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली होती.
सोनवणे आणि रासकर तेथे नेमणुकीस होते. त्यांनी रासकर यांची कार अडविली. त्यांना कारची तपासणी करण्यासाठी थांबवून घेऊन त्यांच्या कारची चावी काढून घेतली. तसेच, मोबाइल, लायसन्स हिसकावले. तुम्ही रेडलाइट एरियामध्ये आल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल, अशी धमकी दिली. त्यानंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी तीस हजार रुपयांची मागणी केली. झालेल्या प्रकारामुळे तक्रारदार घाबरून गेले आणि भीतीपोटी २५ हजार रुपये देण्यास तयार झाले. त्यावेळी दोघांनी त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेऊन २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पैसे मिळाल्यानंतर त्यांना त्यांचा मोबाइल, कारची चावी, लायसन्स परत दिले.
औरंगाबादला परतल्यानंतर त्यांनी ई-मेलद्वारे तक्रार केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची दखल घेऊन सोनवणे आणि रासकर विरोधात गुन्हा दाखल केला. या बाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. जी. अंबुरे म्हणाले की, ‘ तक्रादाराने ई-मेलवर तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.’

वरिष्ठांचा धाक नसल्याची चर्चा
गेल्या आठवड्यात डिझेलचोरीच्या गुन्ह्यात थेट पोलिस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी त्यांना अटक झाली. आता फरासखाना पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी नागरिकाला दमदाटी करून त्याच्याकडून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे पोलिस दलावर वरिष्ठांचा वचक नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळ्यासाठी लाक्षणिक उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरीतील पुतळा चौकात माता रमाई आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक उभारण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस धुराजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

पुतळा परिसरात पिंपरी-चिंचवड महापालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील प्रसंग दाखविणारे समूहशिल्प उभारत आहे. हे काम प्रगतीपथावर आहे. या महत्त्वाच्या चौकामध्ये असंख्य अनुयायी येत असतात. याशिवाय येथे नेहमी उपोषण, आंदोलने होत असतात. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक दलित समाजाचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकरांना जीवनभर मोलाची साथ देणाऱ्या माता रमाईचे देखील स्मारक या ठिकाणी व्हावे, अशी अनुयायांची जुनी मागणी आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी नगरसेवक उत्तम हिरवे, बहुजन ऐक्यचे शहराध्यक्ष अरुण मैराळे, दिपक निकाळजे सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, राष्ट्रीय दलीत पँथरचे सुनील रसाळ, दलित मुक्ती सेनेचे विनोद सूर्यवंशी आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारीतून होतेय समाजप्रबोधनाचे कार्य

$
0
0

पिंपरी : वारीत लाखोंच्या संख्येने लोक सामील होत असल्याने वारी हे समाजप्रबोधनाचे मोठे साधन आहे. या माध्यमातून प्रबोधन करण्याचे कार्य खंडोबा प्रासादिक दिंडी, आव्हाळवाडी यांच्या वतीने केली जात आहे. सामाजिक संदेश देणारे जॅकेट घातलेले हे वारकरी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. झाडे लावा, स्त्रीभ्रूण हत्या करू नका, पाणी वाचवा आदी विविध संदेश जॅकेटवर लिहिण्यात आले आहेत. दिंडीत यंदा प्रथमच लोकप्रबोधनाचा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचप्रमाणे वारीत मुक्कामाच्या ठिकाणी एक ते दीड हजार झाडे लावण्याचा त्यांचा संकल्प आहे. या दिंडीत २५० वारकऱ्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images