Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालखी सोहळ्याची माहिती मिळणार विशेष अॅपद्वारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष अ‍ॅप तयार केले आहे. या अॅपमध्ये प्रशासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, सूचना आणि संपर्क क्रमांकांची माहिती देण्यात आली असून, दोन दिवसांत सुमारे एक हजार वारकऱ्यांनी हे अॅप डाउनलोड केले आहे.
‘पालखी सोहळा २०१७’ या नावाने हे मोबाइल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. १२ जूनपासून हे अ‍ॅप खुले करण्यात आले असून, आतापर्यंत सुमारे एक हजार भाविकांनी ते डाउनलोड केले आहे. त्यामध्ये १६ जून ते नऊ जुलै या कालावधीत होणाऱ्या आषाढी वारीतील व्यवस्थापनाची माहिती मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या अॅपमध्ये पुणे, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांतील सुविधांची माहिती, देहू, आळंदी आणि पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, दिंडी प्रमुख, जिल्हाधिकारी, तहसीलदार, नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक आदी माहिती देण्यात आली आहे.
वारकऱ्यांना वेळीच उपचार मिळण्यासाठी आरोग्य केंद्रांची माहिती या अॅपमध्ये दिलेली आहे. दिंडीत सहभागी होणऱ्या वारकऱ्यांना पाण्याचे टँकर, धान्य, रॉकेल, गॅस सिलिंडरचा पुरवठा या अत्यावश्यक सुविधांची माहिती या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. वारीत हरवलेल्या व्यक्तींची माहिती देण्यासाठी ‘आपण यांना पाहिलत का?’ हा ऑप्शन देण्यात आला आहे. त्याद्वारे हरवलेल्या व्यक्तींची माहिती दिली जाणार आहे.
...
माहिती पुस्तिकाही तयार
अ‍ॅपची सुविधा नसलेल्या वारकऱ्यांसाठी पालखी सोहळ्याच्या नियोजनातील व्यक्तींचे दूरध्वनी क्रमांक आणि अन्य अत्यावश्यक माहिती देणारी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. सुमारे दोन हजार पुस्तिका असून, त्या वारकऱ्यांना वितरीत केल्या जाणार आहेत.
.............
अॅपवरूनही करता येणार तक्रार
वारीच्या काळात वारकऱ्यांना अनेक असु​विधांना सामोरे जावे लागते. याबाबतच्या तक्रारी वारकऱ्यांना करता येणार आहेत. त्या तक्रारींची ताबडतोब दखल घेऊन उपाययोजना केल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देहू-आळंदी गजबजले

$
0
0

तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान; पावसाच्या सरी अन् भक्तीच्या लहरींमुळे वातावरणात रंग
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांमुळे देहू आणि आळंदी गर्दीने गजबजू लागली आहे. दोन्ही ठिकाणी पालखी प्रस्थानाची तयारी पूर्ण झाली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या मुख्य कार्यक्रमाला शुक्रवारी (१६ जून) दुपारी अडीच वाजता प्रारंभ होणार आहे.
राज्यात मान्सूनचे वेळेत आगमन झाल्यामुळे वारकरी आनंदित झाले असून, ते यंदा आषाढी वारी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार देहू आणि आळंदीत भाविकांची गर्दी वाढली आहे. आभाळातून बरसणाऱ्या पावसाच्या सरी अन् टाळमृदंगातून उमटणाऱ्या भक्तीच्या लहरी यामुळे वातावरणात अनोखा रंग भरला आहे. धर्मशाळा आणि इंद्रायणी काठच्या राहुट्यांमधून भजन-किर्तनाची सुरावट ऐकू येत आहे. ‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोषाने दोन्ही तीर्थक्षेत्रे दुमदुमून गेली आहेत.
‘परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. त्यानुसार देहूतील मुख्य मंदिरात पहाटे साडेचार वाजता काकड आरती होणार आहे. त्यानंतर काल्याचे कीर्तन होईल. इनामदार वाड्यातून दुपारी साडेबारा वाजता पादुका मुख्य मंदिरात आणण्यात येणार आहेत. त्यानंतर अडीच वाजता प्रस्थान कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. पालखी सोहळ्याचे यंदाचे ३३२ वे वर्ष आहे. तेवढ्याच संख्येच्या दिंड्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यंदा पावसाचे वेळेत आगमन झाल्यामुळे वारकरी आनंदात आहेत, ’असे पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे यांनी सांगितले.
माउलींच्या पालखीचे शनिवारी प्रस्थान
आळंदी संस्थान, नगरपालिका यांच्या वतीने पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. माउलींच्या पालखीचे शनिवारी (१७ जून) प्रस्थान होणार आहे. मुख्य मंदिरात संस्थानच्यावतीने खबरदारी घेण्यात येत आहे. चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून, ठिकठिकाणी शिस्त लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पालखी प्रस्थान कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित झाली आहे.
माईर्स एमआयटी पुणे आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाअंतर्गत लोकशिक्षणपर व्याख्यान, प्रवचन, कीर्तन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी प्रवचने होत आहेत. याशिवाय रोज रात्री भक्तिसंगीताचा कार्यक्रम होत आहे.

....
आळंदी पालखी प्रस्थान कार्यक्रम रूपरेषा

पहाटे ४ : घंटानाद.

पहाटे ४.१५ : काकडा, पवमान अभिषेक.

पहाटे ५ : भक्तांच्या महापूजा.

सकाळी ९ ते ११ : कीर्तन.

दुपारी १२ : ‘श्रीं’ना महानैवेद्य.

दुपारी २.३० : प्रस्थान सोहळा दिंड्याप्रवेश.

दुपारी ४ : पालखी प्रस्थान कार्यक्रम प्रारंभ.

रात्री १० : दर्शन मंडपात मुक्काम.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पहिल्या दिवशी हाती झाडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत होत असताना बारामती येथील एका शाळेत मुलांना स्वागताऐवजी झाडू घेऊन शाळेची स्वच्छता करावी लागली. तर, दुसऱ्या शाळेत मुले शिक्षकांच्या आदेशाने बाके उचलताना आढळली.

विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेची भीती दूर व्हावी आणि त्यांना शिक्षणाची गोडी वाटावी, यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे, असे आदेश असतानाही बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गुणवडी व मळद गावांतील शाळांमध्ये मात्र चित्र वेगळे आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना कामाला लावल्याचे उघड झाले आहे. शाळेतील शिक्षकांना या घटनेचे वैषम्य वाटणे दूरच; उलट ‘खिचडी खाण्यासाठी मुलांनी स्वच्छता केली, तर काय बिघडले, मुलांना बसण्यासाठी बाक नसल्याने ते स्वतः दुसरीकडून उचलून नेत आहेत. त्यात वेगळे काय,’ अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या. सरकारच्या नियमाप्रमाणे आम्ही ‘प्रवेशोत्सव’ साजरा केला आहे, असेही येथील शिक्षकांनी ‘मटा’ला सांगितले.

मळद व गुणवडी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी काम करायला लावले, हे योग्य नाही. संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाई केली जाईल. असा प्रकार पुन्हा घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

- किशोर पवार, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती बारामती

शाळेचा पट २०वरून ९३वर

बारामती तालुक्यातील नीरावागज हद्दीतील मदने-डोंबाळेवस्ती शाळेचा पट २०वरून ९३ असा वाढला आहे. मात्र, हे सर्व येथील शिक्षकांचे कौशल्य असल्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर पवार यांनी सांगितले.

‘प्रवेशोत्सवा’ने विद्यार्थी भारावले

मळद व गुणवडी शाळेतील अपवाद वगळता अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी जोरदार स्वागत झाले. महात्मा गांधी बालक मंदिर शाळेत पहिलीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेशोत्सव कार्यक्रम आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात आले. या वेळी संस्थेचे अधीक्षक खंडागळे सतीश, मुख्याध्यापिका सुनीता भोसले आदी उपस्थित होते.


‘प्रत्येक दिवस सुरक्षेचा’

जुन्नर : ‘जीवनात सुरक्षा महत्त्वाची आहे. यशापयशाच्या गोष्टी कमी अधिक होऊ शकतील; परंतु, जर सुरक्षा नसेल, तर काहीच नाही,’ असा विचारप्रबोधनाचा धडा बल्लाळवाडीच्या विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये गिरवण्यात आला. निमित्त होते, शाळेच्या पहिल्या दिवसाचे.

वेगाला आवरा, जिवाला सावरा, रस्ता ओलांडताना सतर्क रहा, सुरक्षित रहा, वाहतुकीचे नियम पाळा, वेगाची मर्यादा ओलांडू नका अशा प्रकारचे रस्ते सुरक्षा विषयक फलक हातात घेऊन मुलांचे शाळेत आगमन झाले. मुलांना शाळेत सोडवण्यासाठी आलेल्या पालकांमध्येही अनोख्या उपक्रमाची विशेष चर्चा होती. लहान मुलांना बाइक चालवायला दिल्या जातात किंवा पालकांची नजर चुकवून लहान मुले दुचाकी चालवतात. त्यामुळे पालकांसह मुलांनादेखील सुरक्षेची जाणीव व्हावी, या हेतूने ‘पहिला दिवस सुरक्षेचा’ हा उपक्रम राबविण्यात आला. ‘विद्या स्कूल’च्या विश्वस्त अक्षता गाडेकर यांनी ही माहिती दिली. शाळेसाठी नव्याने दाखल झालेल्या स्कूल बसचे उद्धाटनदेखील या औचित्याने पालकांमधून चिठ्ठी टाकून निवड झालेल्या पालकाच्या हस्ते करण्यात आले. रस्ते सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्याची प्रतिज्ञा या वेळी मुलांनी घेतली.

दुर्गम साकुर्डी गावात मुलांचे जोरदार स्वागत

राजगुरुनगर : साकुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पहिला दिवस खासच होता. या विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन मुलांचे जोरदार स्वागत केले. शिक्षकांच्या या स्वागतामुळे विद्यार्थी भारावले. सर्व उपस्थित विद्यार्थांना पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके देण्यात आली. तसेच, खाऊ वाटण्यात आला. दुपारच्या जेवणात विद्यार्थांना शिरा देण्यात आला. इयत्ता पहिलीत चार, तर पाचवीमध्ये दोन नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी अशा सात तुकड्या असून विद्यार्थ्यांची संख्या अवघी ७० आहे. या शाळेत तीन शिक्षक असून, कमी पटसंख्येमुळे शाळेला मुख्याध्यापकाचे पद नाही. शाळेत दीडशेपेक्षा अधिक विद्यार्थी असेल, तर मुख्याध्यापकाचे पद दिले जाते. साकुर्डी हे गाव चासकमान धरणालगत वसले आहे. दुर्गम भागात असल्यामुळे या गावात दळणवळणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत.

पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप

येरवडा : शाळेच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप करून मुलांची मने जिंकली. पहिल्याच दिवशी नवी कोरी पुस्तके हातात मिळाल्याने विद्यार्थी आनंदी झाले होते.

खराडी चंदननगर प्रभागाचे नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव, नगरसेविका संजीला पठारे आणि सुमन पठारे यांच्या हस्ते खुळेवाडी येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक १८१, ९० जी, १७ जी, १५८ बी, १०२ बी आणि विद्यानिकेतनमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. महेंद्र पठारे म्हणाले, ‘शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करून आपल्या शाळेचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल करावे.’ या वेळी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून पुणे महापालिकेच्या येरवडा येथील जेल लाइनजवळील भाऊसाहेब आप्पासाहेब जाधव शाळेतील मराठी, इंग्रजी व उर्दू विभागातील विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल व पेढा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष अॅड. नानासाहेब नलावडे, गौतम (आबा) खरात, बापू निकम, सुरेश डेकाटे आदी उपस्थित होते.

गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

दौंड : तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सोव’ पुस्तके, गुलाबपुष्प व चॉकलेट यांचे वाटप करून करण्यात आला. यवत येथे जिल्हा परिषद व शाळा नंबर एक व दोन यांनी संयुक्तपणे नव्याने शाळेत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते इयत्ता पहिलीच्या मुलांना पुस्तके, गुलाबपुष्प व चॉकलेट वाटण्यात आले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे, दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे, गट शिक्षणाधिकारी गौतम बेलखेडे, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

शाळांचे व्हरांडे फुलले

शिरूर : दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर गुरुवारी अनेक शाळांचे व्हरांडे मुलांच्या गर्दीने फुलून गेले होते. शिरूर शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे कार्यक्रम झाले. काही जणांच्या शालेय शिक्षणाचा गुरुवारी श्री गणेशा झाला. शाळेचा पहिल्याच दिवस असल्याने अनेक मुलांना आई वडील शाळेत सोडवायला आले होते. शाळेतील पहिल्या दिवशी परिसरात सजावट करण्यात आली. विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ आणि खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. ‘आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन’ या विशेष मुलांच्या संस्थेतील शाळेत ‘चार्टर्ड अकाउंटंट’ आदेश गुंदेचा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, शालेय गणवेश देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी संस्थेच्या संस्थापिका राणी चोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मनीषा साखरे, डॉ.मनीषा चोरे, सतीश केदारी, पालक व विद्यार्थी व संस्थेतील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ दोन वर्षांत २३ पोलिस निलंबित

$
0
0

संदीप भातकर, येरवडा

पुणे पोलिस आयुक्तालयातील खडकी विभागात गेल्या दोन वर्षांत तब्बल तेवीस पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच, चोरी आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. खाकी वर्दी घालून पोलिस दलात दाखल होणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘सद् रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचा विसर पडत असल्याचे चित्र यातून निर्माण झाले आहे.

लोहगाव येथील ‘हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी’च्या (एचपीसीएल) पाइपलाइनला व्हॉल्व्ह बसवून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने नुकताच पर्दाफाश केला. या टोळीत दोन उपनिरीक्षक आणि एक कर्मचारी सामील असल्याने परिमंडळ चारचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी तिघांना निलंबित केले. यात चंदननगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र भिडे (वय ३५), कर्मचारी अविनाश शिवशरण (वय ३४) यांचा समावेश आहे. खडकी विभागात विविध कारणांमुळे गेल्या दोन वर्षांत तेवीस पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची नामुष्की ओढवली आहे.

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या सहायक पोलिस आयुक्त खडकी विभागात येरवडा, खडकी, विश्रांतवाडी, दिघी, विमानतळ आणि चंदननगर पोलिस ठाण्याचा समावेश होतो. दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात लाच घेताना, लॉकअपमधून आरोपी पळाल्याने, चोरीची स्कॉर्पिओ गाडी वापरत असल्याने आणि डिझेल चोरी केल्यामुळे पाच अधिकारी आणि सोळा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

भोसरीतून चोरीला गेलेली स्कॉर्पिओ गाडी मिळाल्यानंतर ती मालकाला परत न करता गाडीचा नंबर प्लेट बदलून दोन तीन महिने तपासासाठी वापरणे. तसेच, इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला खोलीत डांबून मारहाण केल्यामुळे विमानतळ पोलिस ठाण्यातील तपास पथकातील उपनिरीक्षक आणि चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर येरवडा पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील सहायक निरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.

दिघीत जुगार खेळणाऱ्या लोकांना रंगेहाथ पकडूनही कारवाई न करता गुपचूप सोडून दिल्याने आयुक्तांनी पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तर, खडकी पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून दोन आरोपी फरार झाल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि चार कर्मचारी निलंबित करण्यात आले. त्यानंतर एचपीसीएल कंपनीच्या पाइपलाइनमधून डिझेल चोरी केल्यामुळे चंदननगर पोलिस ठाण्यातील एक उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले.

प्रतिमा सुधारण्याचे आव्हान

गेल्या दोन वर्षांत खडकी विभागातील एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि १६ पोलिस कर्मचारी निलंबित झाले. यातील काही जणांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. पण एकूणच पोलिस दलात विविध कारणांमुळे निलंबित होण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. भविष्यात प्रतिमा सुधारण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाटघरचे उपकेंद्र ‘महापारेषण’कडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भोर

भाटघर वीजनिर्मिती उपकेंद्र महानिर्मिती कंपनीकडून महापारेषण कंपनीकडे हस्तांतरित करण्याबाबतचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. आमदार संग्राम थोपटे यांनी ही माहिती दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्यात सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत नाही.

सन १९७८पासून भाटघर येथे १३२/२२ केव्ही वीजनिर्मिती केंद्र कार्यान्वित आहे. त्यातून भोर शहर व ग्रामीण फीडर यांना वीजपुरवठा होतो. गेल्या ३५ वर्षांत या केंद्रातील वीजनिर्मितीची साधनसामग्री वापरात आहे. त्यात वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. जुलै २०१६मध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होऊन अनेक दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. खराडी येथील ट्रान्सफॉर्मर वीजनिर्मिती केंद्राला उपलब्ध झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. राज्यात महानिर्मिती केंद्राकडे भाटघर हे एकमेव वीजनिर्मिती उपकेंद्र राहिले आहे. त्याच्या दुरुस्ती व देखभालीसाठी त्यांच्याकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे वारंवार वीजनिर्मितीमध्ये अडचणी येतात. परिणामी शहर व ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होतो. त्यामुळे थोपटे यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे भाटघर वीजनिर्मिती उपकेंद्र महानिर्मिती कंपनीकडून महापारेषण कंपनीकडे हस्तांतरित करण्याबाबतचे पत्र दिले. त्यावर बावनकुळे यांनी राज्य महापारेषण कंपनीचे कार्यकारी संचालक बिपिन व राजीव मित्तल यांना या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

कचरा वाहन, कुंड्यांसाठी २७ लाख

भोर : कचरा उचलण्याचे यंत्र, कचरा कुंड्यांसाठी २७ लाख ३० हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती नगराध्यक्षा तृप्ती किरवे यांनी दिली आहे. किरवे यांनी सांगितले, की नगरपरिषदेकडे सध्या कचरा वाहून नेण्यासाठी विविध प्रकारची आठ वाहने आहेत. परंतु, वाढती लोकसंख्या तसेच, शहराचा वाढता विस्तार यांमुळे ती अपुरी पडतात. ही समस्या लक्षात घेउन आमदार थोपटे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून वाहन खरेदीसाठी ८ लाख ६४ हजार रुपये; तसेच पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर कचरा उचलण्यासाठी यंत्र खरेदीसाठी ८ लाख ७१ हजार असे १७ लाख ३५ हजार रुपयांचा निधी दिला आहे. विधान परिषदेचे आमदार अनंत गाडगीळ यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून १० लाख रुपयांचा निधी कचरा डंपिग ग्राउंडपर्यंत वाहतूक करणे व लोखंडी कचरा कुंड्यांसाठी देण्यात आला आहे. वाहन व कचरा कुंड्या खरेदी करणेसाठी नगरपालिका प्रशासन व जिल्हाधिकारी यांची मान्यता मिळाली आहे. शहरातील वीस ठिकाणी या कचराकुंड्या ठेवण्यात येणार आहेत. या सुविधांमुळे शहरातील कचरा समस्या लवकरच कायमची दूर होईल, असा विश्वास किरवे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समान पाणीपुरवठा योजनेसाठीही कक्ष

$
0
0

समान पाणीपुरवठा योजनेसाठीही कक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे
समान पाणीपुरवठा योजनेचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या आदेशानुसार हा कक्ष स्थापन करण्यात आला असून, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांना याची जबाबदारी देण्यात आली आहे. या कक्षासाठी नऊ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, गेडाम यांच्यासह एक कार्यकारी अभियंता एक उप अभियंता आणि सहा कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश असणार आहे. शहरात सुमारे ३३०० कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. या योजनेसाठी आवश्यक ते कर्ज; तसेच कर्जरोखे घेण्यास राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिल्याने या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला पुढील काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण व्हावा, तसेच प्रकल्पाच्या दैनंदिन कामकाजावर नियमित लक्ष असावे, यासाठी आयुक्तांनी हा कक्ष स्थापन केला आहे.
ही योजना पूर्ण होईपर्यंत या कक्षासाठी नेमणूक करण्यात आलेले कर्मचारी पूर्ण वेळ या योजनेचे काम करतील, असे आयुक्तांनी काढलेल्या या आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण व्यवस्थेला बळकटी यायला हवी

$
0
0

शिक्षण व्यवस्थेला बळकटी यायला हवी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘चांगला समाज घडवण्यासाठी चांगली शिक्षण व्यवस्था गरजेची आहे. संस्कार आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे शिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळेल, त्या दृष्टिकोनातून शाळा हे ज्ञानाचे केंद्र व्हायला हवे,’ अशी अपेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांनी व्यक्त केली. समाजात एकीकडे नागरिकरणाच्या माध्यमातून सभ्यता प्रस्थापित होत असताना तरुणांमध्ये सांस्कृतिक मूल्यांचाही विकास व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
गंधर्व वेद प्रकाशनातर्फे डॉ. नवलगुंदकर यांनी लिहिलेल्या ‘सभ्यता आणि संस्कृती – आत्मशोध एका शिक्षकाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक डॉ. अशोक कुकडे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्या वेळी नवलगुंदकर यांनी प्राथमिक, तसेच माध्यमिक शाळांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. सर्व शाळा या ज्ञानाची केंद्रे होतील, अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था असायला हवी, याकडे त्यांनी लक्ष वेधले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मुकुंद दातार, मिलेनिअम स्कूलचे संचालक अन्वित फाटक, गंधर्व वेद प्रकाशनाचे दीपक खाडीलकर आदी या वेळी उपस्थित होते.
‘समाजातील सध्याच्या वातावरणात बदल करण्यासाठी आदर्शांची गरज आहे. संस्कार आणि संस्कृतीच्या माध्यमातूनच तो निर्माण होऊ शकतो. सध्या वैयक्तिक पातळीवर टीका करण्याचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकावर अर्ध्या चड्डीवरून टीका केली जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही वारंवार वैयक्तिक टीका होते. टीका ही विचारांवर व्हायला हवी, व्यक्तीवर नको,’ असेही नवलगुंदकर यांनी नमूद केले.
‘सध्या इंग्रजी शब्द मराठीच्या आधी शिकवले जातात. त्याचप्रमाणे नागरीकरण आणि सभ्यतेचे धडे आधी मिळतात. मात्र, संस्कृतीची शिकवण दिली जात नाही,’ अशी खंत डॉ. मुकुंद दातार यांनी व्यक्त केली. नागरीकरणाला जीवनमूल्यांचा आचार-विचार जोडला, तर चांगला समाज घडेल, असेही त्यांनी सांगितले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’तर्फे उद्या, परवा ‘मटा’तर्फे उद्या, परवा ‘एज्युफेस्ट’

$
0
0

‘मटा’तर्फे उद्या, परवा ‘मटा’तर्फे उद्या, परवा ‘एज्युफेस्ट’

पुणे ः विद्यार्थी आणि पालकांना करिअर आणि उच्च शिक्षणाविषयीची माहिती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, या उद्देशाने उद्या, शनिवारी (१७ जून) आणि परवा (१८ जून), रविवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे ‘एज्युफेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे.
‘महाराष्ट्र टाइम्स’ सध्या ‘प्लॅनेट कॅम्पस’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर आणि उच्च शिक्षणाविषयी विविध लेखांतून माहिती देत आहेच. त्याच जोडीला आता ‘एज्युफेस्ट’ या प्रदर्शनाच्या माध्यमातूनही या संधींची माहिती विद्यार्थी आणि पालकांपर्यंत थेट पोहोचणार आहे. विविध शिक्षण संस्थांच्या स्टॉलमध्ये विविध कोर्सेसची माहिती मिळेलच; शिवाय त्या कोर्ससाठी असलेल्या प्रवेश प्रक्रियेचीही सविस्तर माहिती मिळेल.
कोर्सेसच्या माहितीबरोबरच शाखानिवड कशी करायची, आपल्या करिअरचे नियोजन कसे करायचे, कल आणि क्षमता ओळखून पुढे कसे जायचे आदी विषयांवर मार्गदर्शन सत्रेही आयोजिण्यात आली आहेत. तज्ज्ञ व्यक्ती या सत्रांमध्ये मार्गदर्शन करतील. द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या आवारात होत असलेले हे ‘एज्युफेस्ट’ सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थी वाहतूक महागली

$
0
0

विद्यार्थी वाहतूक महागली

म. टा. प्रतिनिधी, पुणे
खासगी स्कूल बसचालकांनी दहा टक्क्यांनी आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाने स्कूल बसच्या शुल्कात दुपटीपेक्षा अधिक वाढ केल्याने शहरातील शालेय विद्यार्थी वाहतूक महागली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पालकांना शुल्कवाढीचा फटका बसला. काही शाळांनी शुल्कवाढीमुळे पीएमपीची बससेवा नाकारल्याने विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी त्याचा फटका बसला.
पीएमपीकडून गेल्या वर्षापर्यंत १३ खासगी शाळांना आणि महापालिकेच्या ४६ शाळांना स्कूल बस सेवा दिली जात होती. गेल्या वर्षी या शाळांकडून ६९ रुपये प्रतिकिमी दर आकारण्यात येत होता. मात्र, तेव्हा महापालिकेने सबसिडीची २५ टक्के रक्कम पीएमपीला देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे पीएमपीने कमी दर आकारला होता. महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची सबसिडी मिळालेली नाही. त्यामुळे यंदा पीएमपीने शाळांना प्रतिकिमी १४१ किमी रुपये दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक सुनील गवळी यांनी दिली.
पीएमपी शाळा व्यवस्थापनांकडून बस सेवेसाठी किलोमीटरनुसार शुल्क आकारणी करते. त्या खर्चानुसार शाळा प्रशासन विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करतात. एका शाळेतील स्कूल बसच्या एका दिवसाला किमान तीन फेऱ्या होतात. पीएमपीने त्यांना येणाऱ्या खर्चानुसार यंदा शुल्क वाढविले आहे. त्यामुळे १३ पैकी ११ खासगी शाळांनी पीएमपी बस सेवेला नकार दिला, तर दोन शाळांनी वाढीव दरानुसार सेवा स्वीकारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिलखुलास गाण्याची संधी

$
0
0

दिलखुलास गाण्याची संधी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘वर्ल्ड म्युझिक डे’निमित्त (दि. २१ जून) ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे ‘गानतंत्र’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आहे वाचकांमधील गायकांसाठी. तुम्ही बाथरूम सिंगर असा किंवा गृहिणी... गाणे हे तुमच्या-आमच्या सर्वांच्याच मनात येत असते. कुणी गुणगुणतं, तर कुणी कट्ट्यावरच्या मित्रांमध्ये ही हौस भागवतं. ‘गानतंत्र’च्या निमित्ताने तुमच्यातील गायकाला सर्वांसमोर आणण्याची नामी संधी आहे.
आपल्याकडील सांगीतिक वारशाला अभिवादन हा तर या स्पर्धेमागचा हेतू आहेच; त्याशिवायही आत्तापर्यंत लोकांच्या कानापर्यंत न पोहोचलेल्या उत्तमोत्तम आवाजांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचाही उद्देश यामागे आहे. आपला आवाज उत्तम असूनही आपल्याला केवळ चांगले व्यासपीठ न मिळाल्यामुळे आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचता आले नाही, अशी खंत वाटणाऱ्या सर्वांसाठी ‘गानतंत्र’ ही स्पर्धा आहे.
आपला आवाज मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचावा आणि उत्तमोत्तम तज्ज्ञांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळावे, अशी इच्छा असलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांनी स्वतःच्या आवाजातील गाणे रेकॉर्ड करून mtgaantantra.pun@gmail.com या ई-मेलवर पाठवायचे आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ई-मेलवर ध्वनीमुद्रण पाठवण्याची अंतिम तारीख १७ जून आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेचे परीक्षण प्रथितयश गायक राहुल देशपांडे आणि गायिका सावनी रवींद्र करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा पुन्हा गजबजल्या

$
0
0

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मिकी माउस, डोरेमॉन, छोटा भीम, बॅटमॅन या सुपरहिरोंची साथ, सोबतीला चॉकलेट आणि लाडू...बँडपथकाचे शिस्तबद्ध वादन...आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या....विविध प्रकारच्या फुलांचे आणि रोपांचे वाटप...अशा वैविध्यपूर्ण गोष्टींनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुरुवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्ले ग्रुप आणि ज्युनियर केजीच्या मुलांनी शाळेत पाय ठेवताच घरी जाण्याचा हट्ट धरला. तर, पहिली आणि पाचवीत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, वातावरणात गारवा असल्याने विद्यार्थी आणि पालकांसाठी शाळेचा पहिला दिवस आनंददायी ठरला.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शहरातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद होत्या. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार या शाळा गुरुवारी उघडल्या. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी जय्यत तयारी केली होती. विद्यार्थ्यांना शाळा हे आपले दुसरे घरच वाटावे, यासाठी जमिनीवर फुलांच्या आणि रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरल्या होत्या.
भावे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन करण्यात आले. या वेळी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त पुस्तकतुला करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध कार्टुन्स देखील हजर होती. न्यू इंग्लिश शाळेत विद्यार्थ्यांसाठी लहान सायकली आणि खास खेळणी आणली होती. हुजूरपागा शाळेत आकाशात फुगे सोडून विद्यार्थीनींचे स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी महात्मा फुले यांच्या वेशात कुमार आहेर आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशात त्यांच्या सहकारी उपस्थित होत्या. अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलमध्ये सरस्वती पूजन करून विद्यार्थीनींना रोपांचे वाटप करण्यात आले.
नूमवी प्राथमिक शाळेत ‍विद्यार्थ्यांचे स्वागत बँडपथकाने केले. तसेच, विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. रानडे बालक मंदिरात प्ले ग्रुप आणि ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मिकी माउस, डोरेमॉन, छोटा भीम, बॅटमॅन अशा सुपरहिरोंच्या पोस्टर्सची फौजच डेरेदाखल होती. मोठ्या प्रमाणावर फुगे लावण्यात आले होते. दरम्यान, शहरातील विविध शाळांमध्ये असणाऱ्या प्ले ग्रुप, ज्युनियर केजीमधील चिमुकल्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने त्यांनी घरी जाण्यासाठी रडण्याचाच पर्याय निवडला. मात्र, इयत्ता पहिली आणि पाचवीच्या वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, पहिला दिवस असल्याने उत्साह असल्याचे सांगितले. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने पालकांला पाल्याच्या तयारीसाठी चांगलीच धापवळ करावी लागली. नोकरी करणाऱ्या पालकांसाठी पहिला दिवस तारेवरची कसरत करण्यासारखाच ठरला.

पालिका शाळाही गजबजल्या
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळेतही विद्यार्थ्यांचे खाऊ व चॉकलेट वाटप करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तके आणि डीबिटी कार्डचे वाटप नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी महापालिकेच्या शाळा देखील चकाचक करण्यात आल्या होत्या. तसेच, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये ठिकठिकाणी फुलांचे पुष्पगुच्छ आणि रंगीबेरंगी फुगे लावण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोंदणी केलेल्यांनाच ‘डीबीटी’ कार्ड प्राप्त

$
0
0

उर्वरित विद्यार्थ्यांना जुलैची प्रतीक्षा करावी लागणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांबरोबरच महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळा गुरुवारी सुरू झाल्या. मात्र, शाळेच्या पहिल्या दिवशीच केवळ नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच महापालिकेचे डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) कार्ड मिळाले. तसेच, या शाळांमध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशातच काही शाळांमध्ये महापालिकेकडून कार्ड देखील आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, वह्या, बूट, दप्तर आदी शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी जुलै महिन्याची वाट पहावी लागणार आहे.
महापालिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध होत नाही, अशी पालकांची तक्रार असते. यावर तोडगा म्हणून महापालिकेच्या शिक्षण मंडळाने महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना डीबीटी कार्डामार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणित साहित्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या कार्डांमार्फत विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, पुस्तके, बूट, मोजे, स्वेटर, चित्रकला साहित्य, वह्या, पाटी, स्वेटर, बनियन, पेटिकोट (विद्यानिकतेनसाठी) हे साहित्य महापालिकेने ठरवून दिलेल्या दुकानातून घ्यावे लागणार आहे.
पहिल्या दिवशी निवडक शाळांमधील मोजक्याच विद्यार्थ्यांना कार्डाचे वाटप झाले. काही शाळांमध्ये मंडळाकडून कार्डच पोहोचले नाहीत. यात भर म्हणजे काही शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांची डीबीटी कार्डासाठी नोंदणी करत आहेत. विद्यार्थ्यांची ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती महापालिकेला पाठविण्यात येते. त्यानंतर महापालिकेकडून संबंधित माहिती बँकेला दिल्यानंतर विद्यार्थ्याच्या नावाने कार्ड मिळते. त्यामुळे या कार्डासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक, युडाएस क्रमांक, दूरध्वनी क्रमांक आदींची माहिती घेऊन नोंदणी करावी लागत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्याला साधारण दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना डीबिटी कार्ड मिळणार आहे. मात्र, अद्याप शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणीच सुरू असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळण्यासाठी जुलै महिना उजाडण्याची वाट पाहावी लागेल. दरम्यान, शाळांमध्ये पहिल्या दिवशी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटण्यात आल्याचे शिक्षकांनी सांगितले.

गोंधळच गोंधळ
पालिकेकडून शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी ठरविलेल्या दुकानांची यादी शाळांना पाठविण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना डीबीटी कार्ड मि‍ळाले आहे, त्यांना शैक्षणिक साहित्य खेरदी करण्यासाठी दुकानाची माहितीच नाही. त्यामुळे डीबीटी कार्ड वेळेत मिळून देखील फायदा झाला नसून, विद्यार्थ्यांना पहिला दिवस शैक्षणिक साहित्याशिवायच काढावा लागला.

डीबीटी कार्ड वेळेत मिळण्यासाठी विद्यार्थी व पालकांना १० जूनपासून शाळांमार्फत नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, याला विद्यार्थी आणि पालकांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अजून कार्डासाठी नोंदणी सुरू आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याला अजून सात दिवस लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना कार्ड देता येईल
- शुभांगी चव्हाण, शिक्षण प्रमुख, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्याच दिवशी डीबीटी कार्डवाटप

$
0
0

तीन हजारांपर्यंतची खरेदी शक्य; ‘स्मार्टकार्ड’ही देणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शालेय साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांना ‘डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्स्फर’ (डीबीटी) कार्ड वाटण्याचा कार्यक्रम पालिकेने हाती घेतला असून, गुरुवारी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रातिनिधीक स्वरुपात कार्डवाटप करण्यात आले. दरम्यान, सर्व शाळांमध्ये कार्डवाटप सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
शिक्षण मंडळांत होणाऱ्या गैरव्यवहारांवर तोडगा काढण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’ कार्डद्वारे रक्कम देण्यात येणार आहे. त्यांनी थेट शालेय साहित्य खरेदी करावे, असे सरकारचे आदेश असून त्यानुसार विद्यार्थ्यांना ‘स्मार्टकार्ड’ही देण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाच्या शाळा-कॉलेजमध्ये सुमारे एक लाख दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना शालेय साहित्य; तसेच इतर वस्तूंचे वाटप करण्यात येते. या वस्तूंची खरेदी करण्यासाठी ‘डीबीटी’ कार्ड वितरित करण्यात येत आहे. इयत्तांनुसार या कार्डवरून दीड हजार रुपये ते तीन हजार रुपयांपर्यंतची खरेदी करता येणार आहे.
पालिकेने वेगवेगळ्या बँकांशी संपर्क साधल्यानंतर ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने ही योजना राबवण्यास तयारी दर्शवली आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला ‘डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्स्फर’ (डीबीटी) कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांनी हे कार्ड विद्यार्थ्याला दिल्यानंतर विद्यार्थ्याचे नाव, क्रमांक आणि ‘डीबीटी’ कार्ड क्रमांक ही सर्व माहिती ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ला मेलद्वारे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर बँकेकडून कार्ड सुरू (अॅक्टिवेट) करण्यात येतील. शाळांनीही ‘डीबीटी’ कार्डचे वाटप केल्यानंतर विद्यार्थ्याचे नाव, विद्यार्थ्यांचा क्रमांक आणि ‘डीबीटी’ कार्ड क्रमांक ही माहिती तत्काळ महापालिकेला पाठवण्यास सांगण्यात आले आहे. महापालिकेकडून ही माहिती मेलद्वारे लगेचच बँक ऑफ महाराष्ट्रला पाठवण्यात येणार आहे. या सर्व कार्यवाहीला दोन दिवसांचा कालावधी लागेल आणि विद्यार्थ्यांचे कार्ड वाटप केल्यापासून दोन दिवसांत सुरू होतील, असे अपेक्षित आहे. महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ​ भिमाले यांनी प्रातिनिधीक स्वरूपात कार्ड वाटपाला गुरुवारी सुरुवात केली.

शाळा/ प्रभाग समितीमध्ये वस्तूंचे वाटप
‘डीबीटी’कार्डद्वारे शालेय वस्तू खरेदी करण्याची सोय शक्य तेथील शाळा किंवा प्रभाग समितीच्या कार्यालयांमध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून पुढील दोन दिवसांत त्यावर निर्णय घेऊ, असे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. विद्यार्थी-पालकांचा या वस्तू खरेदीसाठी गोंधळ होणार नाही, यासाठी काळजी घेऊ असेही भिमाले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

$
0
0

कोथरूड येथे प्रेमसंबंधांतून घडला होता गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुजरात कॉलनी येथे २७ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी चौकशीअंती तरुणीसह तिच्या मित्रावर गुन्हा दाखल केला.
प्रतीक मुरलीधर कचरे (वय २२, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी २२ वर्षीय तरुणीसह मनीष बाबा धुमाळ (रा. वारजे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक याच्याकडे मिळालेल्या सुसाइड नोटच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणी आणि तिच्या मित्रावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
प्रतीक आणि तरुणीचे प्रेमसंबंध होते. मात्र, तिने काही कालावधीनंतर त्याच्यासोबत बोलणे बंद केले. त्याने अनेकदा तिला याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, तिने प्रतिसाद दिला नाही. या निराशेतून प्र​तीकने​ सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना प्रतीककडे सुसाइड नोट सापडली होती. त्यामध्ये त्याने आत्महत्येबाबत लिहिलेले होते. घटनेच्या चौकशीअंती पोलिसांनी तरुणीसह मनीषवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मुलीने फसविल्याचे नमूद
‘मी जे काही केले, त्यामध्ये घरच्यांचा दोष नाही. एका मुलीसोबत माझे प्रेमसंबंध होते. तिने मला फसवले. लग्नाचे आश्‍वासन देऊन ती मला सोडून गेली. मी तिच्याशिवाय राहू शकत नसल्याने, त्याचा मला खूप त्रास होत आहे. तिने हल्ली पोलिसांकडे जाण्याची धमकी द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच मी आत्महत्या करीत आहे. यामध्ये माझ्या घरच्यांचा दोष नाही. तिने माझ्याकडून तीन हजार घेतले. त्यानंतर मी पैसे घेतलेच नाहीत, असा तिचा दावा आहे. तिच्याकडून पैसे परत घ्यावेत, ही नम्र विनंती. कृपया, मला माफ करावे,’ असे प्रतीकने सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगी नियंत्रणासाठी सर्वेक्षणाचे आदेश

$
0
0

उद्रेक झालेल्या गावांवर लक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरापाठोपाठ पुणे जिल्ह्यातील डेंगी नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, डेंगीच्या डासांची उत्पत्ती होत असलेल्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरात गेल्या वर्षी डेंगीच्या आजाराने थैमान घातले होते. त्याची लागण पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागालाही लागली होती. त्यामुळे जिल्ह्यातील पेशंटना उपचारासाठी पुण्याकडे यावे लागत होते. साथ आटोक्यात आणण्यासाठी अखेर उशिरा का होईना, जिल्हा आरोग्य यंत्रणेने हातपाय हलविण्यास सुरुवात केली होती; परंतु मागील वर्षीचा अनुभव पाहता यंदा जिल्हा आरोग्य यंत्रणेने आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
‘गेल्या काही वर्षांत डेंगीचा उद्रेक झालेल्या गावांवर यंदा लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यंदाही सर्वेक्षणावर भर देण्यात येत आहे. यंदा डेंगीचे अद्याप फारसे पेशंट आढळलेले नाहीत. खेड शिवापूर, माण, हिंजवडी भागात काही जणांना डेंगीची लागण झाल्याचे आढळले आहे. मात्र, वैद्यकीय कार्यकर्त्यांमार्फत घरोघरी जाऊन तापाच्या पेशंटचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ अशी माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यात जनजागृती
विविध औषधांसह धूर फवारणी करण्याचे आदेश स्थानिक ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत; तसेच डेंगीच्या डासांची उत्पत्ती होऊ नये, या संदर्भात काळजी घेण्यात यावी, डासांमुळे होणारे आजार, त्याची लक्षणे याबाबत जिल्ह्यात जनजागृती सुरू करण्यात आली आहे, याकडेही आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिवर्तन पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

$
0
0

आडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी विलास भुजबळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आडते असोसिएशनच्या अटीतटीच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष विलास भुजबळ यांच्या परिवर्तन पॅनेलने १९ पैकी १५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्यांच्या पॅनेलने विद्यमान अध्यक्ष शिवलाल भोसले यांच्या पॅनेलचा धूळ चारली.
संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी मतदान झाले. रात्री उशिरा मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर कऱण्यात आला. गेल्या नऊ वर्षांपासून शिवलाल भोसले आडते असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. यंदा पुन्हा ते अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले होते. त्यांच्या विरोधात माजी अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दंड थोपटले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भुजबळ यांनी ४३९ मते मिळवून विजय साकार केला. भोसले यांना ३७१ मते मिळाली.
भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली शारदा गजानन पॅनेल, भुजबळ यांच्या नेतृत्त्वाखाली परिवर्तन पॅनेल रिंगणात उतरले होते. केळीबाजार आणि पान बाजारातील प्रत्येकी एक अशा दोन जागांवर शारदा गजाननचे अनुक्रमे फिरोज मोहम्मद हाजी सांचे आणि सुरेश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरीत १७ जागांमध्ये भाजीपाला विभागातून परिवर्तन पॅनेलचे सागर केदारी, अंकुश कुंजीर, प्रदीप खताळ, महेश शिर्के, अरविंद वाडकर, अमोल घुले, सचिन पायगुडे, सूर्यकांत पवार यांनी विजय संपादन केला. फळ विभागातून परिवर्तनचे युवराज काची, रोहन उरसळ, युवराज उरसळ यांचा तर शारदा गजानन पॅनेलचे किशोर लडकत निवडून आले.
कांदा-बटाटा विभागातून परिवर्तन पॅनलेचे राजेंद्र कोरपे, सूर्यकांत थोरात, बाजीराव दिघे यांनी तिघांनी विजय मिळविला. निकालानंतर परिवर्तन पॅनलेच्या कार्यकर्त्यांनी मार्केट यार्डात जल्लोष केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारिका पुरस्कार ठोंगची यांना जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ईशान्य भारताला मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या व्यक्तींना सरहद संस्थेतर्फे दर वर्षी ‘भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते. यंदाचा पुरस्कार अरुणाचल प्रदेश साहित्य संस्थेचे अध्यक्ष तसेच तेथील साहित्याची जगाला ओळख करून देणारे लेखक येशे डोरजी ठोंगची यांना जाहीर झाला आहे.
‘सरहद’तर्फे सप्टेंबर महिन्यात काश्मीर येथे होणाऱ्या दुसऱ्या बहुभाषिक संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेल्या पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष आहे,’ अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी दिली. ठोंगची यांचा जन्म १३ जून १९५२ला अरुणाचल प्रदेशात झाला. गुवाहाटी येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ठोंगची यांच्या लिखाणाला शालेय वयातच सुरुवात झाली. शेर्दुकपेन ही त्यांची मातृभाषा असून, केवळ सहा हजार लोक ही भाषा बोलतात. ठोंगची यांनी आसामी भाषेत लिखाणास सुरुवात केली. एका कादंबरीसाठी २००५ मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. अरुणाचल प्रदेशचे माहिती आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले असून, तेथील लेखक चळवळीचे ते प्रमुख आहेत. अरुणाचल ते आसाम दरम्यान नुकत्याच खुल्या झालेल्या सर्वात मोठ्या पुलाला भूपेन हजारिका यांचे नाव देण्यात ठोंगची यांचे योगदान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाळ-मृदंगाच्या गजरात दुमदुमले देहू; तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या हजारो वारकऱ्यांसह टाळ-मृदंगाच्या गजरात विठूनामाचा जप करत आज जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे यंदाचे ३३२ वे वर्ष आहे. इंद्रायणी नदीच्या काठी सुरू झालेल्या या यंदाच्या पालखी सोहळ्यात रथाच्या पुढे आणि मागे असे मिळून ३३१ दिंड्या सहभागी झाल्या आहेत.

पंढरपूरकडे निघालेल्या पालखीचा आजचा मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे. उद्या सकाळी १० वाजता पालखी आकुर्डीकडे प्रस्थान ठेवणार आहे. दुपारनंतर पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन होणार आहे.

आज पहाटे साडेचार वाजता संत तुकाराम महाराज शीळा मंदिरात महापूजा करण्यात आली. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा करण्यात आली. तसेच सकाळी ७ वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी येथे महापूजा करण्यात आली. तर, सकाळी ९ वाजता संभाजी महाराज देहूकर यांचे पालखी सोहळा सप्ताहाचे काल्याचे किर्तन झाले. यंदा पादुका पूजनाचा मान ज्येष्ठ वारकरी रामभाऊ हटकळे यांना देण्यात आला. हटकळे हे परभणी जिल्ह्यातील इटुलीचे रहिवाशी आहेत.

दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी सपत्निक पालखीतील पादुकांचे पूजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झेडपी’चे १८९ कोटी थकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) मुद्रांक शुल्काची १८९ कोटी ५७ लाख ७८ हजार रुपयांची थकबाकी राज्य सरकारकडे थकीत असून, निधीअभावी झेडपीचा विकास खुंटला आहे. परिणामी मुद्रांक शुल्कापोटीची थकीत रक्कम झेडपीला तातडीने द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे कऱण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी राज्य सरकारच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांसह ग्रामविकास विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. गेल्या सहा ते सात वर्षांचा मुद्रांक शुल्क थकला असून, त्यामुळे विकास कामे करता येत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील खरेदी-विक्री व्यवहारांच्या प्रमाणानुसार राज्य सरकारकडे एक टक्के मुद्रांक शुल्क जिल्हा परिषदेस देण्यात येतो. या शुल्क जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींना निम्मे निम्मे करून देण्यात येते. ग्रामपंचायतींना देण्यात येणारी रक्कम संबंधित गावाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या प्रमाणानुसार देण्यात येते.
जिल्हा परिषदेचे २०१६ ते १७ या वर्षाचे अंतिम अंदाजपत्रक २१५ कोटी ५० लाख रुपयांचे होते. मुद्रांक शुल्क विभागाकडून जिल्हा परिषदेला २००९ ते २०१४-१५; तसेच २०१५ ते २०१७ या काळातील एकूण १८९ कोटी ५७ लाख ७५ हजार रुपयांची थकबाकी राज्य सरकारकडे आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा सन २०१७ ते १८ च्या मूळ अंदाजपत्रकात फक्त १६८ कोटी ७० लाखांचे झाले आहे. या अंदाजपत्रकामध्ये गेल्या वर्षापेक्षा जवळपास ७० कोटींची तूट आहे. निधीची कमतरता असल्याने मूळ अंदाजपत्रकात अनेक विभागाच्या निधींना कात्री लावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वेध लागल्याने तत्कालीन पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी निधी खर्च करण्याचा सपाटा लावला होता. गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकातून दीडपट नियोजन केले होते. या नियोजनातील कामे सध्या सुरू आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांना काम करण्यासाठी निधी उपलब्ध नसून तिजोरीच रिकामी झाली आहे. परिणामी, नवीन योजना राबविण्यासाठी झेडपी प्रशासनाला अडचणी येत आहेत.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट, मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक अनिल कवडे यांना मुद्रांक शुल्काची थकीत रक्कम देण्यासंदर्भात मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या पावसाचा येरवड्याला फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
नालेसफाईचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला असून, पहिल्याच पावसात नाले, गटारे तुंबून वाहू लागल्याने येरवडा आणि परिसरातील रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून महापालिकेने केलेले नालेसफाईचे दावे फोल ठरले.
पावसाचे पाणी शेकडो घरांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि प्रेरणा देशभ्रतार यांनी गुरुवारी सायंकाळी आंबेडकर चौक आणि परिसराची पाहणी करून आढावा घेतला. आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, स्थानिक नगरसेविका शीतल सावंत, कनिष्ठ अभियंता सूर्यवंशी आणि नागरिक उपस्थित होते.
येरवडा आणि परिसरातील अनेक नाले आणि गटारांची कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसून आले. बीईजी आणि फुलेनगर येथील हरी गंगा सोसायटीने भूमिगत नैसर्गिक नाले बंद केल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पालिकने तातडीने बंद केलेले नाले खुले करण्याची सूचना पालिका प्रशासनाला केली असल्याचे उपमहापौर डॉ. धेंडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images