देशाच्या सरहद्दीवर लढणाऱ्या जवानांचा एकटेपणा दूर व्हावा आणि देशातील नागरिक आपल्याशी संवाद साधून आपल्याला प्रेरणा देत आहेत, अशी भावना त्यांच्या मनात दृढ व्हावी यासाठी जवानांना शालेय विद्यार्थ्यांनी ग्रिटींग कार्ड पाठविण्याचा उपक्रम बी. एन. श्रीवास्तव फाऊंडेशनतर्फे राबवित आहे. यंदा एक लाख जवानांना ग्रिटींगकार्डद्वारे शुभेच्छा देण्याचा संकल्प असून, पुण्यातील सुमारे सत्तर शाळांनी त्यात सहभाग नोंदविला आहे.
↧