Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पतसंस्थेवर दरोडा; पंधरा हजारांची रोकड चोरीला, चेहरा झाकलेल्या चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद

$
0
0

जुन्नर : पुणे-नाशिक महामार्गावर १४ नंबर येथील अनंत नागरी पतसंस्थेसह काही दुकाने चोरट्यांनी गुरुवारी पहाटे फोडली. या घटनेत पतसंस्थेतील १५ हजार रुपयांची रोकड आणि अठ्ठावीसशे रुपयांच्या जुन्या फाटक्या नोटा चोरीला गेल्या. चेहरा झाकलेल्या दोन चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. खिडकीचे ग्रील उचकटून चोरट्यांनी संस्थेत प्रवेश केल्याचे नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सांगितले.

पतसंस्थेच्या परिसरातील काही दुकानेही चोरट्यांनी फोडली असून, एका परमिट रूममध्ये चोरी करून विदेशी मद्याच्या १३ बाटल्या चोरट्यांनी लांबवल्या आहेत. परिसरातील साई मेडिकल या औषध दुकानाचे कुलूप तोडून एक हजार रुपये रक्कम, गेनूजी भोर यांच्या बंद बंगल्यातील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे टांक आणि समया लांबविल्या आहेत. जुन्नरचे पोलिस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

गेल्या वर्षी व्यवस्थापकाचा खून

चोरी झालेल्या अनंत नागरी पतसंस्थेवर गेल्या वर्षी २४ नोव्हेंबरला भरदिवसा दरोडा टाकण्यात आला. त्या वेळी व्यवस्थापकाचा खून करून, अडीच लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबवला होता. वर्षभरानंतर पुन्हा चोरी झाल्याने येथील कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.

गुंजाळवाडीत सोने लांबविले

गुंजाळवाडी (बेल्हे) येथे दोन दिवसांपूर्वी १० दरोडेखोरांनी चाकू आणि सुऱ्याचा धाक दाखवून दोन ठिकाणांहून १३ तोळे सोने आणि एक लाखांचा ऐवज लांबवला. घराचा दरवाजा तोडून प्रवेश केलेल्या दरोडेखोरांनी भाऊसाहेब गुंजाळ यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून अंगावरील दागिने चोरले. दिनेश पिंगट यांच्या घरातही अशाचप्रकारे प्रवेश करून त्यांच्या आई आणि भावजयीकडील दागिने चोरून नेला होता. शस्राचा धाक दाखवून दागिने पळविण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याचे दिसून आले आहे. चोरी करून जाताना चोरटे अन्य घरांच्या दारांना बाहेरून कडी लावत असल्याचे आढळून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये होम हवन करणे नेत्यांना भोवणार? पक्षश्रेष्ठी 'अ‍ॅक्शन मोड'वर

$
0
0

पुणे : पुण्यातील काँग्रेस भवनात ११ डिसेंबर रोजी होम हवन करण्यात आले होते. पक्षाची भरभराट व्हावी, यासाठी काँग्रेस भवनमध्ये होम हवन केल्याचा प्रकार घडला. यावरून काँग्रेसला सर्वच स्तरातून टीकेचा सामना करावा लागला आहे. या सर्व प्रकाराची दखल घेत आता काँग्रेस पक्षश्रेष्ठी अ‍ॅक्शन मोडवर आले असून याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत काल काँग्रेस पक्षाची आगामी दिशा ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व राज्यांचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ नेते उपस्थित होते. त्यावेळी महाष्ट्रातील घटनेवर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे.

या बैठकीत जेव्हा महाराष्ट्राचा विषय निघाला तेव्हा काँग्रेसच्या एका नेत्याने पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये झालेल्या होम हवनची घटना हायकमांडच्या निदर्शनास आणून दिली. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी बैठकीतच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना या होम हवन प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. त्यावर पटोले यांनी निरीक्षक नेमून अहवाल सादर करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

96475014


दरम्यान, ८२ वर्षाच्या काँग्रेस भवनाच्या इतिहासात अशा पद्धतीने कधी होम हवन करण्यात आले नव्हते. मात्र शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा असे होम हवन करण्यात आल. यावर पक्षाला भरभराट यावी, यासाठी हे होमहवन केलं, असं शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या घटनेबाबत आता हायकमांड काय कारवाई करणार याकडे पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेश्याव्यवसायाप्रकरणी हडपसरमध्ये छापा; एकाला अटक, तीन मुलींची सुटका

$
0
0

पुणे : हडपसर येथील लॅाजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत एकाला अटक केली असून, तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे; तसेच दोघांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला.

हडपसर परिसरातील एस. के. रेसिडेन्सी लॅाज, लक्ष्मी कॉलनी, सोलापूर रोड, हडपसर येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनीषा पुकाळे, अण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे यांच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मला भरुन येतंय, जयकुमार गोरेंच्या पत्नीचं कार्यकर्त्यांना आवाहन; तर वडिलांना घातपाताची शंका

$
0
0

पुणे : साताऱ्यातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यांची गाडी पुलावरुन ५० फूटांहून अधिक खोल नदीत कोसळली. अपघातात जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान त्यांची पत्नी सोनिया जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांना मतदारसंघात परतण्याचे आवाहन केले आहे. तर जयकुमार यांचे पिता भगवान गोरे यांनी घातपाताची शंका व्यक्त केली आहे.

सोनिया जयकुमार गोरे काय म्हणाल्या?

पुढील सात ते आठ दिवसांत जयकुमार गोरे मतदारसंघात परततील, कार्यकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, ते बरे आहेत, पाय आणि बरगडीला थोडंसं फ्रॅक्चर आहे, त्यामुळे दोन-तीन दिवस आपल्याला फक्त थोडंसं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. अजून कुठे दुखापत आहे का वगैरे. आपण डॉक्टरांना सहकार्य करुयात, त्यांना त्यांचं काम करुद्यात, वरती आवरता आवरत नाहीत, माणसं खूप झालीत, माझं ऐकाल अशी विनंती करते, परमेश्वर चरणी प्रार्थना करा की लवकरात लवकर भाऊंची तब्येत बरी होऊ देत आणि तुमच्यात सामील होता येईल, अशी प्रार्थना करा, असं सोनिया गोरे म्हणाल्या

तुम्ही अजिबात चिंता करु नका, तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही इथे थांबताय, एकदा नजर टाकावी, भेटावं, असं तुम्हाला वाटत असेल, पण तिथे फोटो काढायलाही परवानगी नाही, नाही तर मी तो काढून व्हायरल केला असता, इथली यंत्रणा काम करत आहे, त्यांनी विनंती केली की तुम्ही तुमच्या माणसांना विनंती करा, आयसीयूमध्ये कोणाला भेटता येत नाही, दादांनासुद्धा (वडील) मोठ्या मुश्किलीने एकदा दाखवून आणलं. तुम्हाला भाऊंची काळजी आहे, मला भरुन येतंय, पण मी सांगते, ते स्टेबल आहेत, आता चिंता करायची काहीच गरज नाही, मी रात्रीपासून अखंड त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत असलेल्या दोघांवरही उपचार सुरु आहेत, ते सिरीअस आहेत, पण ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. फडणवीस, विखे पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांनी फोनवरुन चौकशी केली, चंद्रकांतदादा इथे येऊन गेले, अशी माहिती सोनिया गोरेंनी दिली.

हेही वाचा : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारमध्ये चौघे अडकले, वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

वडिलांना घातपाताची शंका

मी जयकुमारांशी बोललो आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र एक शंका मनात उत्पन्न होतेय. रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसताना गाडीला अपघात कसा घडतो असा प्रश्न पडलाय. ते देखील आमच्या गावात म्हणजे फलटण मध्येच हा अपघात घडतो यामुळे आणखीनच शंका येते. तिथे अपघात होण्यासारखे काही नाही. मला शंका वाटतेय. मला वाटतं ते बोललो. हे फलटणमध्येच घडतंय गावात. म्हणून मला शंका वाटतेय मी कोणावर संशय घेऊ शकत नाही, असं जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे म्हणाले.

हेही वाचा : कट्टर विरोधक समोरासमोर; दोन्ही आमदारांची उपोषणस्थळी हजेरी, साताऱ्यात चर्चांना उधाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घातपात नाही, 'या' कारणामुळे जयकुमार गोरेंचा अपघात, खासदार निंबाळकरांना खात्री

$
0
0

पुणे : साताऱ्यातील माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यांची गाडी पुलावरुन ५० फूटांहून अधिक खोल नदीत कोसळल्याने जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान जयकुमार गोरेंचे वडील भगवान गोरे यांनी लेकासोबत घातपात झाल्याची शक्यता व्यक्त केली होती. यावर माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देताना घातपाताची शक्यता फेटाळून लावत अपघाताच्या कारणाचा अंदाज व्यक्त केला.

जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी उपस्थित केलेल्या शंकेबद्दल खासदार निंबाळकर यांनी मोठा खुलासा केला आहे. "जयकुमार गोरे यांचा अपघातच झाला असावा, कोणताही घातपात नाही. मी थोड्या वेळापूर्वी आमदार गोरेंच्या वडिलांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली मला घातपाताची सुतराम शक्यता वाटत नाही. मी अपघात झाल्यानंतर 5 ते 6 मिनिटांत त्या ठिकाणी पोहचलो." असं जयकुमार म्हणाले.

अपघातानंतर जयकुमार यांचा कार चालक कॉन्शियस होता, त्याला झोप लागल्याच्या पलिकडे काही निदर्शनास आलं नाही. ड्रायव्हर शुद्धीवर आल्यावर त्याचे स्टेटमेंट देईल, पण आज तरी मी खात्रीशीर सांगू शकतो की पहाटेच्या डुलकीमुळे हा अपघात झालाय, असं खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले. जयकुमार गोरे यांची प्रकृती उत्तम असल्याची माहितीही त्यांनी दिली.

वडिलांना घातपाताची शंका

मी जयकुमारांशी बोललो आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र एक शंका मनात उत्पन्न होतेय. रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसताना गाडीला अपघात कसा घडतो असा प्रश्न पडलाय. ते देखील आमच्या गावात म्हणजे फलटण मध्येच हा अपघात घडतो यामुळे आणखीनच शंका येते. तिथे अपघात होण्यासारखे काही नाही. मला शंका वाटतेय. मला वाटतं ते बोललो. हे फलटणमध्येच घडतंय गावात. म्हणून मला शंका वाटतेय मी कोणावर संशय घेऊ शकत नाही, असं जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे म्हणाले.

हेही वाचा : जयंतरावांच्या निलंबनावेळी तुमची मवाळ भूमिका, पवारांनी खडसावलं? पत्रकाराच्या प्रश्नावर अजित पवार खवळले

निंबाळकरांनी केली मदत

जयकुमार गोरेंच्या फोननंतर खासदार निंबाळकर पुढच्या ५ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पाहिलेली भीषण परिस्थिती खासदार निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितली होती. "पहाटे ३ वाजता जयकुमार गोरे यांनी मला फोन करुन त्यांचा अपघात झाल्याचं सांगितलं. माझा फलटणजवळ अपघात झालाय पण मला लोकेशन सांगता येणार नाही, असं ते म्हणाले होते. त्यानंतरच्या पुढच्या ५ ते ७ मिनिटांत मी अपघातास्थळी पोहोचलो. त्यांची गाडी ५० फूट खोल नदीत पडली होती. पोलिसांच्या मदतीने तत्काळ आम्ही त्यांना गाडीबाहेर काढलं. त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालेलं. त्यांच्या गाडीतील सगळ्या सीट्स तुटल्या होत्या. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी पुण्याचा नेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत मी स्वत: पुण्याला आलो" असं निंबाळकरांनी सांगितलं होतं.

हेही वाचा : मला भरुन येतंय, जयकुमार गोरेंच्या पत्नीचं कार्यकर्त्यांना आवाहन; तर वडिलांना घातपाताची शंका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरचे सांगतात, पण मीही ऐकत नाही, जयकुमार गोरेंच्या अपघातानंतर पवारांनीही सांगितली ती चूक

$
0
0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील भीमथडी जत्रेला उपस्थिती लावली. शरद पवार यांनी त्यावेळी भीमथडी जत्रा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, जयकुमार गोरे यांचा अपघात आणि राजकीय नेत्यांनी कोणती काळजी बाळगली पाहिजे यावर भाष्य केलं. माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातासंदर्भात विचारलं असता शरद पवार यांनी राजकीय नेत्यांनी रात्री अपरात्री प्रवास टाळला पाहिजे आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीनं काळजी घ्यायला हवी, असं म्हटलं आहे.

आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी रात्री अपरात्री प्रवास टाळयाला पाहिजे, असं म्हटलं. मात्र, माझ्या स्वतः कडून त्याचं पालन होत नाही. त्याबद्दल घरातील लोक नेहमी बोलतात. परंतु राजकीय जीवनात काम करताना लोकांशी अधिकाधिक संपर्क ठेवण्याचा मोह टाळला जात नाही, असं असलं तरी सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने काळजी घ्यावी, असं शरद पवार म्हणाले.

भीमथडी जत्रेला राष्ट्रीय स्वरुप

भीमथडी जत्रा फक्त पुण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालं असून यावर्षी प्रचंड गर्दी आहे. सर्व घटक अभिनंदनास पात्र आहेत. भीमथडी जत्रेसाठी मुंबई मध्ये जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार असल्याचं शरद पवार म्हणाले.

२० वर्षीय अभिनेत्री ट्युनिशा शर्माने आयुष्य संपवलं, मालिकेच्या सेटवरच टोकाचा निर्णय

भीमथडी यात्रेचं शरद पवारांकडून कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात आयोजित भीमथडी जत्रेला भेट दिली. महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती, परंपरा तसेच जीवनशैलीच दर्शन भीमथडी जत्रेत घडतं. बारामतीतील शारदा महिला संघाच्या माध्यमातून ही जत्रा भरवण्यात येते. राज्यभरातील महिला बचत गट त्यामध्ये सहभागी होतात. भीमथडी जत्रेतील विविध कलाविष्कार तसेच खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज या जत्रेला भेट देऊन उपक्रमाचं कौतुक केलं.


प्रमोशनचा आनंद अल्पकाळच टिकला, सुट्टीसाठी मामाच्या घरी, पोलीस उपनिरीक्षकाला मृत्यूने गाठलं

कुस्ती वादावर शरद पवार काय म्हणाले?

कुस्ती परिषदेत दुर्दैवाने दोन गट पडले आहेत, हे खरंय पण मी भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षांना घरी बोलवून हा विषय मिटवलाय, असं शरद पवार म्हणाले. पण, दुसऱ्या गटाचीही नगरला स्पर्धा घेण्याची इच्छा आहे. मी म्हटलं की आधी पुण्याची महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्यवस्थित पार पाडू मग नगरच्या स्पर्धेचं बघू, असं पवार म्हणाले. पुण्याच्या कुस्ती स्पर्धेला हजर राहायचं की नाही हे तारखा बघून ठरवेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शाहिद आफ्रिदीच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, पाकिस्तानचा चेहरा बदलणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार होण्यासाठी मित्राने जीवाचं रान केलं, मैत्रीसाठी निंबाळकरही पाचव्या मिनिटाला निम्म्या रात्री धावले

$
0
0

पुणे : साताऱ्यातील माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यांची गाडी पुलावरुन ५० फूटांहून अधिक खोल नदीत कोसळल्याने जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सगळ्यात माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि जयकुमार गोरे यांचे अत्यंत जवळचे मित्र रणजितसिंह निबाळकर हे अपघात स्थळापासून ते पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये गोरे यांना दाखल करेपर्यंत त्यांची सावली बनून सोबतच होते. इतकंच नाही तर गोरे यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेऊन दिवसभर निंबाळकर हे दवाखान्यात ठाण मांडून आहेत.

निंबाळकर आणि गोरे यांची मैत्री संपूर्ण राज्याला खऱ्या अर्थाने माहित झाली ती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी. २०१९ ची लोकसभा निवडणूक गाजलीच मुळात ती माढा लोकसभा मतदारसंघातील लक्षवेधी लढतीमुळे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव सर्वात आधी चर्चेत होतं. मात्र पवारांनी माढ्यातून न लढण्याचा निर्णय घेतला आणि संजय शिंदेंना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले. आता सरळ लढत होती ती भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात...

राष्ट्रवादी-काँग्रेसची युती होती त्यामुळे काँग्रेस मित्रपक्षाला मदत करणार असंच गणित होत. मात्र हे गणित माण-खटाव मध्ये उलटं झालं. तत्कालीन काँग्रेस नेते आणि जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षाला नाही तर 'जिगरी मित्राला' मदत करण्याचा उघड निर्णय घेतला आणि काँग्रेसचे आमदार असताना उघडपणे भाजपचे उमेदवार असलेल्या निंबाळकर यांचा प्रचार सुरु केला. इतकंच नाही तर माण-खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला, त्यात त्यांनी आपण आपल्या मित्रासाठी राष्ट्रवादीला कदापी मत देणार नसल्याचे व्यासपीठावरून जाहीर केलं.

रणजितसिंह निंबाळकार हा माझा घरातील उमेदवार आहे. घरातील तसेच पक्षातला कोणी माझ्यासोबत नव्हता. तेव्हापासून तो माझ्या सोबत आहे. त्यामुळे सगळा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. रणजितसिंहचे वडील हिंदुराव नाईक-निंबाळकर हे खासदार होते त्यावेळी आपल्या भागातील अनेक योजनांचा पाया त्यांनी खांदला आहे. ते कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष होते. आता वेळ आली आहे. आपण ही त्यांना त्यांची राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करायची आहे. आपल्या मातील पाणी पाजण्यासाठी ज्यांनी कष्ट केलं त्यांचा हा पुत्र आहे. माझा मित्र नंतर, असे सांगत निंबाळकर यांना त्यांनी व्यासपीठावर बोलवून घेतले व कार्यकर्त्यांनि कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. या मेळाव्यानंतरच जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची 'जिगरी यारी' जी आधी माढा लोकसभा मतदारसंघात माहित होती ती संपूर्ण राज्याला कळाली. माढ्यात निंबाळकर विजयी झाले नंतर गोरे हे देखील भाजपात डेरेदाखल झाले.

हा मैत्रीचा अध्याय इथेच संपत नाही. 'खरा मित्र तो असतो जो जेव्हा गरज पडतो तेव्हा बचावासाठी येतो.' निंबाळकरांच्या मैत्रीसाठी पक्ष आणि राजकीय करिअर पणाला लावणाऱ्या गोरेंची मैत्री तर राज्याने पाहिली. मात्र आज मित्र अडचणीत असताना वेळ आणि काळ न पाहता धावून जाणाऱ्या निंबाळकर यांची मैत्री देखील राज्याने अनुभवली.

जयकुमार गोरेंना धोका नाही, गोरेंच्या भेटीनंतर आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांची माहिती

पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास जयकुमार गोरे यांचा फलटण जवळ अपघात झाला. गाडी ५० फूट खोल दरीत कोसळली. रात्री किर्रर्र अंधारात ठिकाण समजत नव्हतं... स्वीय सहाय्यक आणि चालक गंभीर जखमी होते. गोरे यांनी अपघातानंतर पहिला फोन आपल्या मित्राला म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना केला. 'माझा फलटणजवळ अपघात झालाय पण मला लोकेशन सांगता येणार नाही.' असं त्यांनी सांगितलं त्यानंतर ५ ते ६ मिनिटांत निंबाळकर हे घटनास्थळी दाखल झाले. आधी मित्राला दवाखान्यात दाखल केलं त्यानंतर पुण्यातील रुबी हॉस्पिटलला गोरे यांना हलवण्यात आलं.

तुम्ही फक्त देवाकडे प्रार्थना करा; जयकुमार गोरेंच्या पत्नीचं कार्यकर्त्यांना हात जोडून आवाहन

या सगळ्या प्रवासात रणजितसिंह हे त्यांच्यासोबतच होते. इतकच नाही तर आज दिवसभर देखील रणजितसिंह निंबाळकर हे गोरेंच्या प्रकृतीवर आणि त्यांना देण्यात येणाऱ्या उपचारावर स्वतः लक्ष ठेऊन होते. परिवाराला कार्यकर्त्यांना धीर देण्यास सुद्धा निंबाळकरच सर्वात पुढे होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मैत्रीचे उदाहरणं आहेत त्यातच आता गोरे-निंबाळकर यांच्या मैत्रीचा देखील उल्लेख करणे तितकेच महत्वाचे आहे.

घातपात नाही, 'या' कारणामुळे जयकुमार गोरेंचा अपघात, खासदार निंबाळकरांना खात्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेसीबीद्वारे गुलाल, डीजे, चिथावणीखोर भाषण... परवानगी घेतलीच नाही; ६ जणांवर गुन्हा दाखल

$
0
0

बारामती : ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी पॅनलच्या बाजूने काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण केल्याप्रकरणी पॅनल प्रमुखांसह माजी सरपंचांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोपट उर्फ कैलास सर्जेराव तावरे, निलेश हरिभाऊ केदारी, अक्षय यशवंत तावरे, सुरज प्रल्हाद तावरे, समीर कैलास जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. गुन्हा नोंद करण्यात आलेले हे सर्व कार्यकर्ते बारामती तालुक्यातील मोरगावचे रहिवासी आहेत. याबाबत पोलीस हवालदार तुषार शिवाजी जैनक यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

क्लिक करा आणि वाचा- चंद्रपुरात राजकीय तमाशा; मंत्री मुनगंटीवारांना येण्यास उशीर ; खासदार संतापले आणि थेट...

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मंगळवार दिनाक २० डिसेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान बारामती तालुक्यातील मोरगाव हद्दीत विजयी मिरवणूक काढण्यात आली. पोपट उर्फ कैलास सर्जेराव तावरे, निलेश हरिभाऊ केदारी, अक्षय यशवंत तावरे, सुरज प्रल्हाद तावरे, समीर कैलास जाधव यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयी उमेदवाराची ही विजयी मिरवणूक काढली. विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांनी ही विजयी मिरवणूक काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नव्हती.

क्लिक करा आणि वाचा- संजय राऊत यांचे 'ते' खंदे समर्थक थेट शिंदे गटाच्या सचिवपदी, उद्धव ठाकरेंनी केली होती हकालपट्टी

विनापरवाना काढण्यात आलेल्या या विजयी रॅलीदरम्यान या सर्वांनी जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण केली. तसेच या मिरवणुकीत विनापरवाना डीजेचा देखील वापर करण्यात आला. इतक्यावरच न थांबता मयुरेश्वर मंदिरासमोर विनापरवाना भाषण करून सभ्यता व नीतीमत्ता यांस धोका पोहचेल असे चिथावणीखोर भाषण केले, असाही त्यांच्यावर आरोप आहे. तसेच पोलिसांकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग केला अशा आशयाच्या फिर्यादीवरून या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, भाजप खासदाराची मोदींवर टीका; वाचा, टॉप १० न्यूज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्यमंत्री म्हणतात, करोना राज्यातून हद्दपार; नाताळ, नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, मुंबई/पुणेः जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातही चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, ‘महाराष्ट्रातून करोना हद्दपार झाला असून, राज्यात केवळ १३२ करोना रुग्ण आहेत. त्यामुळे जनतेने घाबरण्याचे काहीच कारण नाही’, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

करोनाच्या जुन्या यंत्रणेची तपासणी करण्यासाठी येत्या मंगळवारी मॉकड्रिल होणार आहे. संभाव्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी आपली आरोग्ययंत्रणा तयार आहे का, हे तपासले जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांना आवश्यक खबरदारी घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. एकीकडे करोना हद्दपार झाल्याचे म्हणत असताना, ‘करोनाचे संकट पुन्हा घोंगावत असताना नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःहून बंधने पाळावीत. सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. बंधने पाळून सण-उत्सव साजरे करावेत’, असेही त्यांनी पुण्यात बोलताना सांगितले. राज्यातील ९५ टक्के नागरिकांनी करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत; शिवाय ६० ते ७० टक्के नागरिकांनी ‘बूस्टर मात्रा’ घेतल्या आहेत. लसीकरणामुळे नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. प्रत्येकाने स्वतःहून काही बंधने पाळणे आवश्यक आहे’, असे सावंत यांनी सांगितले.

राज्यातील नागरिकांचे आरोग्यकार्ड तयार करणारे शिंदे-फडणवीस पहिले सरकार असल्याचा दावा करून सावंत म्हणाले, ‘सरकारने साडेतीन कोटी महिलांचा ‘आरोग्य डेटा’ तयार केला आहे. आता नर्सरी ते कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १८ वर्षांपर्यंतच्या मुलांचे आणि नंतर राज्यातील सर्व पुरुषांचा ‘आरोग्य डेटा’ तयार केला जाणार आहे. डेटा करून सरकार थांबणार नाही. प्रत्येकाला मोफत आरोग्य तपासण्या व उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनैतिक संबंधातून मैत्रीणीला संपवले; पिंपरीत १४ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचं गूढ अखेर उकललं

$
0
0

पिंपरी: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मैत्रिणीचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपीला चौदा वर्षानंतर पकडण्यात यश आले आहे. भोसरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यापासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांना तो पोलिसांच्या जाळ्यात सापडलाच. अप्पा गोगाजी मोहिते ( वय ५०) असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime News Today)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी अप्पा गोगाजी मोहिते हा भोसरी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या प्रकाश चव्हाण गँगचा सक्रिय सदस्य आहे. भोसरी परिसरात रहात असताना एका महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. मात्र या संबंधात तिची मैत्रीण अडथळा ठरत होती. अखेर आरोपीने तिचे पिंपरी येथून अपहरण केले आणि तिच्याच घरात ठेवून तिची निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर त्याच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो अनेक ठिकाणी नाव आणि पत्ता बदलून रहात होता. गेल्या १४ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच त्याचा कोणताही फोटो पोलिसांकडे नसल्याने जुन्या फोटोवरून त्याला ओळखणे अवघड होते.

वाचाः मला दारू पिण्यासाठी पैसे दे, पतीने केला हट्ट, पत्नीने नकार देताच पाजलं विषारी औषध

पोलिसांनी तपास वेगळ्या पद्धतीने करयचे ठरवले. त्यात १५ वर्षांपासूनचे सहआरोपी आणि चव्हाण गँगच्या माध्यमातून पोलिसांनी तपास करण्याचे ठरवले. तपास करत असताना तो खेड तालुक्यातील वाकी येथे राहत असल्याचे समोर आले. तर, चाकण एमआयडीसी येथे मजुरीचे काम करत असून लवकरच तो औरंगाबाद येथे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. माझ्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या मैत्रीचे अपहरण करून तिचा खून केल्याचे त्याने कबूल केले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

वाचाः महाराष्ट्रात करोनाच्या नव्या व्हेरियंटचा संसर्ग किती?; वैद्यकीय तज्ञांना दिलं दिलासादायक उत्तर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खास पुणेकरांसाठी! ताळेबंद सरत्या वर्षाचा; वर्षभरात काय घडले, काय घडायला हवे होते?

$
0
0

विकासकामे रखडलेलीच

निर्धारित मुदतीत महापालिकेच्या निवडणुका होऊ न शकल्याने गेल्या १६ मार्चपासून पालिकेचा कारभार प्रशासकांमार्फत सुरू आहे. महापालिका आयुक्तच प्रशासक असल्याने स्थायी समिती, सर्वसाधारण सभेचे अधिकार त्यांच्या हाती आहेत. गेल्या नऊ महिन्यांच्या काळात मैलापाणी शुद्धिकरण प्रकल्प, नदीकाठ सुधारणा प्रकल्प हे दोन मोठे प्रकल्प मार्गी लागले आहेत. वित्त समिती, ‘वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम’, ‘बायोमेट्रिक’ हजेरी यामुळे प्रशासकीय कारभारात सुधारणा होत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अनेक धोरणात्मक निर्णय प्रलंबित असून, लोकप्रतिनिधींअभावी नागरिकांची स्थानिक स्तरावरील कामे रखडलेलीच असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

काय दिले?

- समाविष्ट गावांसह शहरातील इतर मैलापाणी शुद्धिकरण प्रकल्पांची कामे सुरू झाली.

- मिळकतकर वसुलीमध्ये लक्षणीय वाढ.

- नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे दोन टप्पे सुरू. तिसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू.

- ‘वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम’मुळे प्रत्येक विकासकामाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध.

काय हवे होते?

- शहरात पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीची आवश्यकता.

- अतिक्रमणविरहीत पदपथ; तसेच इमारतींच्या साइड मार्जिनमधील अतिक्रमण काढण्याची आवश्यकता.

- महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांचा विकास आराखडा सादर करणे.

- नागरिकांची स्थानिक स्तरावरील विकास कामांना गती देणे गरजेचे

पुढील वर्षी काय मिळणार?

- निवडणुका होऊन लोकप्रतिनिधींकडे पुन्हा कारभार जावा.

- जी-२० निमित्ताने सुशोभीकण तात्पुरते न राहता शहराचे सौंदर्य कायम राहावे.

- गेले दोन वर्षे खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या पुणेकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळावेत.

-- पालिकेचे अपुरे राहिलेले नागरी प्रकल्प किमान या वर्षी मार्गी लागावेत.
--------------------------------------------------------
पाण्याचे प्रश्न मार्गी लागणार?


पिंपरी-चिंचवडमधील सरसकट शास्तीकर माफीचा निर्णय नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात नुकताच घेण्यात आला. त्यामुळे अनधिकृत बांधकामे नियमित होण्याचा मार्ग सुकर झाला. हा या वर्षातील शहरवासीयांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा निर्णय म्हणता येईल. मात्र, रोज मुबलक पाणी, पुनावळे कचरा डेपो, पवना थेट जलवाहिनी हे पालिकेशी संबंधित, भूमिहिन शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा जमीन हा राज्य सरकारशी संबंधित आणि रेडझोन, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी पुनर्वसन हे केंद्र सरकारशी संबंधित प्रश्न मार्गी लागण्याची आवश्यकता होती.

काय दिले?

- सरसकट शास्तीकर माफी

- पिंपरी-चिंचवड स्वतंत्र विद्यापीठ परवानगी

- स्वतंत्र न्यायालय इमारतीसाठी निधी

- बैलगाडा शर्यती सुरू करण्यास परवानगी

- खडकी-बोपखेल पूल वाहतुकीस खुला

काय हवे होते?

- दररोज पुरेसा पाणीपुरवठा

- मार्च २०२२ पालिका निवडणूक

- भूमिहीन शेतकऱ्यांना परतावा जमीन

- ललित कला अकादमी केंद्र उभारणीला गती

- पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण

पुढील वर्षी काय मिळणार?

- दिवसाआड ऐवजी रोज पाणी

- पवना थेट जलवाहिनीतून पाणीपुरवठा

- पुनावळे कचरा डेपो अस्तित्त्वात येणे

- एच. ए. कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक

- दीर्घ काळ प्रलंबित रेड झोनचा प्रश्न निकाली
-----------------------------
मेट्रोचे स्वप्न पूर्णत्वास


पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचे मेट्रोचे अनेक वर्षांचे स्वप्न २०२२ ने पूर्ण केले. दीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या या मेट्रोचे दोन्ही शहरांतील नागरिकांनी सुरुवातीला उत्स्फूर्त स्वागत केले. मात्र, त्यानंतर अवघ्या पाच-सात किमीसाठी सुरू झालेल्या या मेट्रोकडे प्रवाशांनी पाठ फिरविली आहे. मेट्रोचा पुढील मार्ग याच वर्षी सुरू करण्याचे उद्दिष्ट ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ने निश्चित केले होते; पण हा पुढील टप्पा आता नवीन वर्षातच सुरू होण्याची चिन्हे आहेत. भूमिपूजन झाल्यावर जवळपास तीन वर्षांनंतर ‘हिंजवडी-शिवाजीनगर’ या शहरातील तिसऱ्या मेट्रो मार्गिकेचे काम वेगाने सुरू झाले आहे.

काय दिले?

-- शहरवासीयांचे मेट्रोतून प्रवास करण्याचे स्वप्न अखेर पूर्णत्त्वास

-- वनाझ ते गरवारे कॉलेज आणि पिंपरी ते फुगेवाडी मार्गावर मेट्रो सेवा सुरू

-- पुणे मेट्रोच्या टप्पा-२ चा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार

-- हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला गती प्राप्त

काय हवे होते?


-- मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील उद्घाटनानंतर पुढील मार्ग प्रवाशांसाठी लवकर खुला होणे अपेक्षित

-- पिंपरी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या दोन मेट्रो मार्गिकांना मान्यता मिळायला हवी.

-- मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी ई-बाइक, ई-सायकल, ई-रिक्षाची सेवा हवी.

-- नागरिकांना मेट्रोची सवय व्हावी, यासाठी दैनंदिन पास, मासिक पास उपलब्ध करून द्यायला हवा.

पुढील वर्षी काय मिळणार?

-- शहरातील संपूर्ण ३२ किमीचा मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेसाठी सुरू व्हायला हवा.

-- उन्नत मार्गाप्रमाणे भुयारी मार्गावरील सर्व स्टेशन्स खुली होण्याची गरज.

-- मेट्रोच्या विस्तारित मार्गांना मान्यता आणि तेथील कामाला गती मिळायला हवी.

-- पुणे-पिंपरीतील अंतर्गत वर्तुळाकार मार्गावर मेट्रो निओच्या दृष्टीने पुढील कार्यवाही केली जावी.

-----------------------------------
पुण्याचं पर्यावरण वर्षभर चर्चेत


‘मेट्रो’ शहराच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पुण्यातील पर्यावरण चांगल्या-वाईट घडामोडींमुळे वर्षभर चर्चेत राहिले. सरासरीच्या तुलनेत १०६ टक्के पाऊस पडल्याने पाण्याची चिंता मिटली. हवेची गुणवत्ता या वर्षी लक्षणीय प्रमाणात ढासळली; पण शहरातील वृक्षसंख्या वाढल्याची सुवार्ता महापालिकेने दिली. नदीतील जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने जाहीर केलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांच्या प्रत्यक्ष विस्ताराला वर्षभरात मुहूर्त मिळाला नाही. प्लास्टिक बंदी काही अंशी यशस्वी ठरली; मात्र सार्वजनिक कचऱ्याची समस्या वादग्रस्त ठरली. गेल्या तीन-चार दशकांत चोहोबाजूने विस्तारलेल्या पुण्याने वेगाने प्रगती केली. मात्र, यात पर्यावरणीय समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे या वर्षीही अधोरेखित झाले.

काय दिले?

-- वन विभागाने पाचगाव पर्वतीवर ग्लिरिसिडिया निर्मूलन मोहीम सुरू केली.

--तीन टेकड्यांवर संयुक्त वन उद्यान प्रकल्पाला सुरुवात.

-- सिंहगडावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे अतिक्रमण काढले.

-- गडावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ईबसचा प्रयोग झाला.

-- महापालिकेच्या वृक्षगणनेतून शहरातील वृक्षांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले.

-- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेची गुणवत्ता नोंदविणारी तीन सेंटर वाढवली.

काय हवे होते?

-- नदी प्रदूषण रोखण्यासाठी नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित

-- समाविष्ट गावांच्या वेशीवर कचऱ्याचे साम्राज्य तातडीने दूर करणे गरजेचे

-- टेकडीवरील सुरक्षा, गस्त वाढविण्यासाठी वन विभागाने मनुष्यबळ वाढवणे गरजेचे

-- नैसर्गिक जलस्रोतांवरील अतिक्रमण तातडीने हटविणे आवश्यक

-- बंद पडलेले सॅनिटरी नॅपकीन विल्हेवाट प्रकल्प कार्यान्वित झाले पाहिजेत.

पुढील वर्षी काय मिळणार?

-- कडेपठारावर पुणे जिल्ह्यातील पहिला रोप वे होणार

-- वन विभागाचे पुण्यातील पहिले वन्यजीव उपचार केंद्र कार्यान्वित होणार

-- टेकड्यांवरील ग्लिरिसिडीया वृक्षांच्या जागेवर स्थानिक वृक्षांचे रोपण

-- वायू प्रदूषण रोखण्यासाठी पीएमपी नवीन ईबसची खरेदी करणार

---------------
सुसंस्कृत पुण्याला गालबोट


रस्त्यावरील गुंडगिरी आणि किरकोळ कारणांवरून खुनाच्या घटनांनी पुण्याच्या शांत, सुसंस्कृत आणि सांस्कृतिक नगरी या लौकिकाला वर्षभरात गालबोट लागले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे असुरक्षित पुणे ही ओळख गडद होऊ लागली आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये आर्थिक फसवणुकीच्या पुढे ‘सेक्सटॉर्शन’सारखे गंभीर गुन्हे शहरात घडू लागल्याने बदनामीच्या भीतीने तरुण जीवन संपवण्याचा मार्ग कवटाळत आहेत. करोनानंतरचे हे वर्ष शहरासाठी वाढत्या गुन्हेगारीचे ठरल्याने सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. कायदा आणि सुव्यवस्था टिकवून पुण्याची खास ओळख असलेले शांततामय सहजीवन अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी नव्या वर्षात उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे.

काय दिले?

- सायबर गुन्ह्यांत भरडल्या गेलेल्या नागरिकांना तत्काळ तक्रार देता यावी, यासाठी शहरातील सर्व ३१ पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र सायबर कक्ष सुरू करण्याचा निर्णय

- लोनअॅपचा तगादा लावणाऱ्या राज्यातील आणि राज्याबाहेरील टोळ्यांवर कारवाई करून काही कॉल सेंटर बंद करण्यात पुणे पोलिसांनी यश मिळवले.

- खंडणीसाठी अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करण्याच्या धमक्यांमुळे दोन तरुणांनी आत्महत्या केल्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी राजस्थानातील गुरूगोठडी गावातून एकाला अटक केली. या गावात ‘सेक्सटॉर्शन’च्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

- माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरातील शंभरपेक्षा जास्त टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करून गुन्हेगारांवर जरब बसवली.

काय हवे होते?

-- देशभरात सायबर गुन्ह्यांचा विळखा घट्ट होत असताना चालू वर्षात केवळ पुण्यात वीस हजारपेक्षा जास्त तक्रार अर्ज सायबर पोलिसांना प्राप्त झाले आहेत.

-- लोनअॅपसंदर्भात साडेतीन हजारांपेक्षा जास्त तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.

-- ‘लोनअॅप’मुळे आत्महत्या आणि खुनासारखे गंभीर गुन्हे घडत असल्याने लोनअॅपवर बंदी घालण्याचा प्रस्ताव सायबर पोलिसांच्या वतीने तयार करण्यात आला आहे.

-- प्लेस्टोअरवरील लोनअॅपबाबत तक्रार आल्यानंतर गुगल कंपनीला माहिती कळवून ही ॲप काढून टाकण्यात येणार आहेत. यासंदर्भातील कारवाई तातडीने होण्याची गरज आहे.

पुढील वर्षी काय मिळणार?

- आणखी एक सायबर पोलिस ठाणे सुरू करण्याचे संकेत पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी दिले आहेत.

- पोलिस भरतीमुळे शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार आहे.

-- रस्त्यावरील कोयता गँग व इतर गुन्ह्यांना आळा घालणे अपेक्षित
------------------------------
आरोग्य सुविधा सक्षम आहेत?


करोनाच्या लाटेमध्ये शहरातील आरोग्य यंत्रणेतील अनेक उणिवा समोर आल्यानंतर त्यामधून बोध घेऊन २०२२मध्ये शहराच्या आरोग्य क्षेत्रात अनेक सुधारणा अपेक्षित होत्या. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाशिवाय महापालिकेचे अत्याधुनिक रुग्णालय उभे राहिलेले नाही. बाणेर येथील कॅन्सर हॉस्पिटल व नायडू रुग्णालयाचे बाणेर येथे हस्तांतर करण्याची प्रक्रिया कागदावर आहे. वारजे येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. त्यामुळे पुन्हा करोनाने डोके वर काढल्यास पुणेकरांसाठी आरोग्याच्या पायाभूत सुविधा सक्षम असतील, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

काय दिले?

- महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयास सुरुवात.

- १०० विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू.

- वारजे येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पालिकेची तयारी.

- नागरिकांना उपचारासाठी महत्त्वाच्या शहरी-गरीब योजनेची ऑनलाइन नोंदणी

काय हवे होते?

- शहराची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी नवीन हॉस्पिटलची आवश्यकता

- वारजे व बाणेर येथील हॉस्पिटल उभारणीसाठी वेगाने प्रयत्न

- महापालिकेच्या सध्याच्या हॉस्पिटलमध्ये विविध पायाभूत सुधारणा

- वैद्यकीय महाविद्यालयास तत्काळ स्वतंत्र इमारत उभारणे आवश्यक

पुढील वर्षात काय अपेक्षित?

- वारजे, धनकवडीत हॉस्पिटल बांधून तयार झाली ती तत्काळ सुरू करण्याची आवश्यकता.

- ससून व औंध येथील ग्रामीण हॉस्पिटल अत्याधुनिक करणे.

- बाणेर येथे होणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलसाठी पाठपुरावा.

- पुणे स्टेशन येथील नायडू हॉस्पिटल बाणेर येथे तत्काळ उभारण्यासाठी प्रयत्न.

---------------------
सांस्कृतिक जीवन पूर्वपदावर


करोना साथरोग आणि लॉकडाउन यामुळे २०२० आणि २०२१ या वर्षात सांस्कृतिक क्षेत्रात फारशा घडामोडी घडल्या नाहीत. गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी होती. त्यामुळे पुस्तक प्रकाशने, व्याख्याने आणि नाटकांचे प्रयोग सर्वांवरच मर्यादा होत्या. करोना नियमावली शिथिल केल्यानंतरही सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी होत नव्हती. मात्र, २०२२ या वर्षात परिस्थिती तुलनेने चांगली होती आणि जनजीवनही सुरळीत झाले होते. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वाढ झाली. त्यातही आठवड्याच्या अखेरीस अधिक कार्यक्रम झाले. आगामी वर्षात पुन्हा विविध कार्यक्रम-उपक्रमांना पूर्वीप्रमाणे रसिकांची आणखी गर्दी होईल अशी अपेक्षा आहे.

काय दिले?

- करोना काळात थंडावलेल्या सांस्कृतिक क्षेत्राला पुन्हा चालना मिळाली.

- दोन वर्षाच्या खंडानंतर सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आणि इतर उपक्रम पूर्वीप्रमाणे सुरू झाले.

- ‘ओटीटी’चा दबदबा असूनही चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रेक्षकांची संख्या वाढली.

काय हवे होते?

- बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास

- उपनगरातील नाट्यगृहे कार्यान्वित होणे.

- भाषा धोरण, सांस्कृतिक धोरणाला मंजुरी

नव्या वर्षाकडून अपेक्षा काय?

- सध्या केवळ वीकेंडला नाटकांचे ‘शो’ होत असून, ते आणखी वाढणे अपेक्षित

- करोनापूर्व काळाप्रमाणे आठवड्यातील सातही दिवस सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत.

- बालगंधर्व रंगमंदिरासह इतर नाट्यगृहांचा प्रश्न मार्गी लागावा.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाताळ व थर्टीफस्टला लोणावळ्याला जाताय? मग ही बातमी खास तुमच्यासाठी

$
0
0

लोणावळा : करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाला आळा घालण्याच्या दृष्टीने लोणावळा, खंडाळ्यात नाताळ व थर्टीफस्टचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी मास्कचा वापर करण्याचे आवाहन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील यांनी केले आहे.

‘करोनाचा प्रसार काही देशांमध्ये झपाट्याने वाढू लागला आहे. भारतातदेखील काही प्रमाणात नव्या करोनाचे रुग्ण आढळल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. लोणावळ्यामध्ये महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. नाताळ व थर्टीफस्ट हे दोन्ही महत्त्वाचे दिवस शनिवार आणि रविवारी आल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून पर्यटकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करून सामाजिक अंतर राखावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. त्याचप्रमाणे स्थानिक व्यावसायकांनीही मास्कचा वापर करावा, पर्यटकांना मास्क व सॅनिटायझर वापरण्यासंदर्भात सूचित करावे,’ असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

पोलिसांनी हॉटेल, बंगले, कृषी पर्यटन केंद्रावरील टेन्ट व्यवसायिकांच्या मीटिंग घेत त्यांना सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत; तसेच ‘अवैध अथवा चुकीच्या घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घ्या. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर लोणावळा, खंडाळा शहरा व ग्रामीण परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी वाहने तपासणीसाठी चेकपोस्ट लावण्यात येणार आहेत.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेतत्त्वावरील मिडीबसचा करार रद्द; पीएमपी चालविणार १५० मिडीबस

$
0
0

पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळच्या (पीएमपी) देखभाल, दुरुस्तीसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास दिलेल्या १५० मिडी बसचा करार रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर पीएमपीकडून या सर्व बस संचलनात आणाव्यात,’ असा आदेश पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत.

पीएमपी प्रशासनाने ऑक्‍टोबरमध्ये ११७ मिडीबस आणि ३३ तेजस्विनी बस एका खासगी कंपनीला देखभाल, दुरुस्तीसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा करार केला होता. प्रति किलोमीटरसाठी ४२.९९ रुपये दर निश्‍चित केले होते. स्व-मालकीच्या बस ठेकेदाराला देखभाल, दुरुस्तीसाठी दिल्याने पीएमपी प्रशासनावर टीका झाली होती. पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी पीएमपीचा कारभार हाती घेण्यापूर्वीच हा करार झाला होता. बकोरिया यांनी १५० बसचा आढावा घेण्यासाठी नुकतीच बैठक बोलविली होती. पीएमपीचे अधिकारी आणि कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. या वेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी ही सेवा देणे परवडत नाही, असे सांगितले. यावर बकोरिया यांनी परवडत नसेल, तर करार रद्द करा आणि पीएमपीमार्फत बस संचलनात आणाव्यात, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. बकोरिया यांनी कारभार हाती घेतल्यानंतर पीएमपीची संचलन तूट कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. पीएमपीच्या मालकीच्या बस वाढविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत.

पीएमपीच्या मालकीच्या गाड्यांत वाढ

पीएमपीच्या ताफ्यात एकूण २,१४२ बस आहेत. यातील १,१३० बस ठेकेदाराच्या, तर १,०१२ बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. पीएमपीच्या स्वमालकीच्या बसच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पीएमपीची वर्कशॉप आहेत. यात तांत्रिक काम करणारे कर्मचारी आहेत. पीएमपीत कर्मचारी आणि वर्कशॉप असताना या बस ठेकेदारांना देखभाल दुरुस्तीसाठी भाडेतत्त्वावर दिल्याने पीएमपीवर टीका होत होती. या बस ठेकेदारांना चालवायला दिल्याने स्वमालकीच्या बसची संख्या कमी झाली होती; पण आता पुन्हा १५० बस पीएमपीच्या ताफ्यात आल्यामुळे स्वमालकीच्या बसची संख्या वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात गांजातस्करी सर्वाधिक; वर्षभरात सहा कोटी ६९ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

$
0
0

श्रीकृष्ण कोल्हे, पुणे : गेल्या वर्षभरात पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने तस्करांवर जोरदार कारवाई करून त्यांच्याकडून सहा कोटी ६९ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत शहरात गांजा व मेफेड्रोनची (एमडी) सर्वाधिक तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे.

पुण्याला ‘आयटी हब’, ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पुणे व परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. यासाठी कामगार वर्गदेखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहतो. त्यामुळे अमली पदार्थ तस्करांना एलएसडी, कोकेन, एमडी, चरस, ब्राउन शुगरपासून ते थेट गांजा, अफूची बोंडे चुरा यासारख्यांना ग्राहक मिळतो. कोकेन, ब्राउन शुगर विक्रीत नायजेरियाच्या व्यक्तींचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. अमली पदार्थ तस्करांवर कारवाईसाठी पुणे पोलिसांकडून अमली पदार्थविरोधी पथक एक व दोन अशी विभागणी करण्यात आली आहे. या पथकांकडून अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई केली जाते.

पथक एकने पकडले ८९ तस्करांना

‘अमली पदार्थ विरोधीपथक एक’ने जानेवारी ते १५ डिसेंबरपर्यंत एकूण ६५ गुन्हे दाखल केले आहेत. त्यात ८९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच कोटी २३ लाख ९३ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या पथकाने कोकेन तस्करीचे तीन गुन्हे दाखल केले असून, सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन कोटी ५४ लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. ब्राउन शुगरच्या विक्रीचे दोन गुन्हे दाखल करून दोन आरोपींना पकडले आहे. ‘अमली पदार्थ विरोधी पथक दोन’ने ४७ गुन्हे दाखल केले असून, ७० आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोटी ४५ लाख १२ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

गांजा तस्करांवर कारवाईत वाढ

गांजा अमली पदार्थ पूर्वी कामगार वर्ग व पैसे जास्त खर्च करण्याची क्षमता नसलेल्या व्यक्तींमध्ये सेवन केला जात होता; पण अलीकडे इतर अमली पदार्थांमध्ये असलेल्या रासायनिक पदार्थांचा शरीरावर परिणाम होतो. हे लक्षात आल्यानंतर आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाल्यामुळे अनेक उच्चशिक्षितांकडून पार्ट्यांमध्ये नशेसाठी गांजाचा वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यंदा गांजा विक्री करणाऱ्यांवरील कारवाईत वाढ झाली आहे. २०२१मध्ये गांजा विक्री करणाऱ्यांवर ५६ गुन्हे दाखल करून ८३ जणांना अटक केली होती. यंदा ६४ गुन्हे दाखल करून ७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अमली पदार्थ कारवाई
अमली पदार्थ केस आरोपी जप्त रक्कम


कोकेन ०४ ७ २ कोटी ५७ लाख ५४ हजार

गांजा ६४ ७८ १२ लाख ४३ हजार ३४ हजार

मेफेड्रोन ३२ ५० दोन कोटी ४६ लाख ४२ हजार

चरस ०३ ०४ २० लाख ९८ हजार

एकूण ११२ १५९ ६ कोटी ६९ लाख पाच हजार

शहरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवून व माहिती काढून कारवाई केली जाते. या वेळी पथकाने अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना अटक केली आहे. गांजा विक्रीसह एमडी विक्री करणाऱ्यांनादेखील अटक केली आहे. कोकेन विक्रीचे गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.- विनायक गायकवाड,वरिष्ठ निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक एक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांची उच्चांकी उड्डाण; शुक्रवारी १८६ विमान फेऱ्यांमधून ३१ हजार प्रवाशांची नोंद

$
0
0

पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी ३१ हजार प्रवाशांनी प्रवास केला. एका दिवसातील प्रवासीसंख्येचा हा उच्चांक आहे. नव्वदहून अधिक विमानांचे उड्डाण आणि आगमन झाल्याने १८६ विमान फेऱ्यांमधून पुणे विमानतळ सर्वाधिक गजबजले. सुट्ट्यांच्या हंगामात पुढील काही दिवसांतही हीच स्थिती कायम राहणार असून, डिसेंबरमध्ये सरासरी प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

करोनानंतर डिसेंबर २०२१पासून विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. तेव्हापासून उड्डाणांची संख्या हळूहळू वाढू लागली. करोनापूर्वी लोहगाव विमानतळावरून दिवसाला साधारण १८० विमानांचे उड्डाण होत होते. या माध्यमातून दररोज २० ते २२ हजार प्रवासी प्रवास करीत होते. गेल्या काही महिन्यांत सिंगापूर, बँकॉक येथे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात आली आहे; तसेच देशांतर्गत उड्डाणेदेखील वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवासीसंख्या वाढते आहे. सध्या सुट्ट्या असल्यामुळे प्रवाशांची संख्येत आणखी वाढ झाली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात ३१ हजार सात प्रवाशांनी येथून प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये पुण्यातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर ४ तास बैठक, उठावाचं बीज मीच पेरलं; शिवतारेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

$
0
0

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत आमदार-खासदारांना सोबत घेतलं आणि शिवसेनेत ऐतिहासिक बंड केलं. शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर न पडता थेट शिवसेनेवरच दावा सांगितला. एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात भाजप-शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली. हा सगळा घटनाक्रम उलटून जवळपास सहा महिने पूर्ण होत असताना आता शिंदे गटातील नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना खळबळजनक दावा केला आहे.

'महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांनंतरच मी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नंदनवन या बंगल्यावर चार ते साडेचार तास भेटलो. यावेळी मी शिंदे यांना सांगितलं की, हे सरकार जनतेच्या हिताचं नाही, उद्धवजींकडून चूक होत आहे. तुम्ही त्यांना निर्णय बदलायला सांगा, असं म्हणत या उठावाचं बीज मीच शिंदे यांच्या डोक्यात पेरलं होतं,' असा गौप्यस्फोट विजय शिवतारे यांनी केला आहे.

96491631


'महाविकास आघाडीची स्थापना निवडणुकीच्या आधीच'

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना आणि भाजप युतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे गेले. मात्र निवडणूक निकालानंतर भाजप ठरल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद विभागून घेत नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. मात्र महाविकास आघाडीचा निर्णय हा निवडणुकीनंतर नव्हे तर निवडणूक होण्याच्या आधीच झाला होता, असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

'उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीआधीच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत समझोता केला होता. कोणत्या जागा पाडायच्या, कोणत्या निवडून आणायच्या याची रणनीती ठरवण्यात आली होती,' असा आरोपही शिवतारे यांनी केला आहे.

दरम्यान, विजय शिवतारे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटावर आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने त्यांच्या गटातील नेत्यांकडून काही प्रतिक्रिया देण्यात येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Pune : तुला वडिलांनी बोलावले आहे... असं म्हणत नऊ वर्षाच्या मुलीला शाळेतून हॉटेलवर नेलं आणि...

$
0
0

खेड, पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शिकणाऱ्या मुलीला वडिलांनी तुला खेडला बोलावले आहे, असे त्या मुलीला सांगितले. आणि शाळेतून नेऊन तिच्यावर तिला हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर समोर आली आहे. खेड तालुक्यातील राक्षेवाडी परिसरात हा प्रकार घडला आहे.

कल्याण सोनबा राक्षे, असे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. त्याच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे. पीडित मुलगी शाळेत असताना तिच्या शाळेत जाऊन एका पस्तीस वर्षीय व्यक्तीने तिला फसवून बोलावले. तुला तुझ्या वडिलांनी खेडला बोलावले आहे, असे त्याने तिला सांगितले. मात्र त्याने त्या मुलीला खेड येथे न नेता एका हॉटेलवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिला पुन्हा शाळेत आणून सोडले. या घटनेने पीडित मुलगी घाबरून गेली होती. घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला. मुलीच्या आईने क्षणाचाही विलंब न करता खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून खेड पोलिसांनी संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

अनैतिक संबंधातून मैत्रीणीला संपवले; पिंपरीत १४ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचं गूढ अखेर

या घटनेमुळे शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळेत येऊन कोणीही काही करून जाते आणि शिक्षकांना याबाबत काही माहिती होत नाही? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. यामुळे शाळेत मुलींची सुरक्षा धोक्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

नाताळ व थर्टीफस्टला लोणावळ्याला जाताय? मग ही बातमी खास तुमच्यासाठी


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चमध्ये प्रार्थना करायला गेले, अन् घरातून २५ लाखांचा ऐवज लंपास, पुण्यात काय घडलं?

$
0
0

पुणे : संपूर्ण जगभरात नाताळ सणाची धूम सुरु आहे. मात्र एका कुटुंबाच्या नाताळ सणाच्या सेलिब्रेशनच्या आनंदावर पुण्यातील गुन्हेगारीने विरजण टाकलं आहे. पुण्यातील महंमदवाडी भागातील एक कुटुंब प्रार्थना करण्यासाठी रात्री चर्चमध्ये गेलं असता त्यांच्या सदनिकेतून चोरट्यांनी तब्बल २५ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. यासंदर्भात एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला या महंमदवाडी येथील न्याती व्हिक्टोरिया सोसायटीत राहतात. याच ठिकाणी असलेल्या त्यांच्या सदनिकेत चोरट्यांनी हात साफ केला. तक्रारदार महिला आणि तिचे कुटुंबीय २४ डिसेंबरच्या रात्री प्रार्थना करण्यासाठी चर्चमध्ये गेले होते. हीच संधी साधून सदनिकेची लोखंडी जाळी उचकटून चोरटे घरात शिरले आणि कपाट उचकटून १२ हजार रोकड, हिरेजडीत दागिने असा २४ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

मध्यरात्री १ च्या सुमारास या तक्रारदार महिला आणि त्यांचे कुटुंबीय प्रार्थना केल्यानंतर घरी परतले. तेव्हा हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर महिलेने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरी करून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण देखील ताब्यात घेतलं आहे. पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे.

पुणे मुंबई शहरात नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षातील हा शेवटचा सण असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून शहरांतल्या विविध ठिकाणी गर्दी केली होती.कोरोना काळातून बाहेर पडल्याच्या आनंदात सुरु झाल्याच्या वर्षाची सांगता पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाखालच्या विविध वृत्तांनी होत असल्याने नागरिकांच्या मनात धाकधूकही आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या वादाचा राग डोक्यात, मित्रासोबत गप्पा मारत असताना तरूणाला संपवलं; पुण्यात खळबळ

$
0
0

पुणे : पिंपरी चिंचवडमधून काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. चिखली येथील बैलगाडा घाटात किरकोळ कारणावरून एका २२ वर्षीय तरूणाची लोखंडी हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं एकच खळबळ उडाली. सुरज उर्फ सोन्या असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणात तीन आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्याचा मित्र संदीप शिंदे हे चिखली येथील बैलगाडा शर्यत घाटातील महादेवाच्या मंदिराजवळ गप्पा मारत बसले होते. यापूर्वी संदीप शिंदे याचा आरोपी आदित्य पाटोळे याच्यासोबत काही कारणांमुळे वाद झाला होता. जुन्या भांडणाच्या कारणातून संदीप आणि त्याचा मित्र जिथे गप्पा मारत होते तिथे आरोपी आदित्य पाटोळे, विशाल पवार, गणेश लोंढे हे आले. त्यांनी काही कळण्याच्या संदीप शिंदे याच्यावर लोखंडी हत्याराने सपासप वार केले. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.

96504805

या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आदित्य पोटोळे, विशाल पवार, गणेश लोंढे, सर्व रा. चिखली पुणे यांचा तात्काळ शोध घेत पोलिसांनी घटनास्थळावरून पळून जाता असताना ताब्यात घेतले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आपण ही हत्या केली असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

96505485

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेनं मित्रासोबत संपवलं आयुष्य; पुण्यातील खळबळजनक घटना

$
0
0

पुणे : परराज्यातून आलेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने तिच्या मित्रासोबत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १५ दिवसांपूर्वी कात्रज परिसरात त्या दोघांनी भाड्याने रूम घेतली होती. मात्र, रविवारी संध्याकाळी घरातून कोणताही आवाज, हालचाल दिसली नाही म्हणून स्थानिकांनी पाहिलं तर दोघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

भारती विद्यापीठ पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. बरखा मंडल (वय ३२, सध्या रा. सीताश्री निवास, कात्रज बसस्टॉपमागे, संतोषनगर), राजू फारुख शेख अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू शेख याची बहीण बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करायची. तिथेच बरखा ही वेश्या व्यवसायचं काम करत होती. राजूच्या बहिणीने राजू आणि बरखाची ओळख करून दिली होती. बरखा आणि राजू मूळचे पश्चिम बंगालमधील होते. १५ दिवसांपूर्वी दोघेजण कात्रज भागात राहायला आले होते. संतोष नगरमध्ये त्यांनी भाडे तत्वावर खोली घेतली होती. रविवारी (२५ डिसेंबर) सायंकाळी बरखा आणि राजूने गळफास घेऊन आत्महत्या केली.

96504805

रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. आत्महत्यामागचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
96505485

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>