Quantcast
Channel: Maharashtra Times

शंकरशेठ मला लेकासारखे, आमच्या कुटुंबातील वावटळ... अश्विनी जगतापांची स्पष्टोक्ती

$
0
0

पिंपरी : ३० वर्षांपासून आमचं एकत्र कुटुंब आहे. आम्ही प्रत्येक निर्णय एकत्र कुटुंबात घेतला. लग्नसुद्धा एकत्र कुटुंबातून झालेली आहेत. त्यामुळं जगताप कुटुंब हे वेगळं नाही. शंकर शेठ मला मुलासारखे आहेत. आम्ही सर्व एकच आहोत. खोटी वावटळं विरोधकांनी आता किंवा येणाऱ्या काळातही उठवू नयेत, अशी विनंती भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि आगामी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी केली आहे.

चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे तिकीट मिळाल्यानंतर अश्विनी जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला. कुटुंबात वाद असल्याच्या चर्चांवर त्यांनी मोठे भाष्य केले. आमच्या कुटुंबात कुठलाही वाद नाही. विरोधक याचं भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कोणतंही तथ्य नाही, असंही अश्विनी जगताप म्हणाल्या. दोन दिवसांपूर्वी दोघांनीही उमेदवारी अर्ज आणल्यामुळे दोघेही इच्छुक असल्याचं चित्र होतं. पण, पक्षाने तिकीट अश्विनी जगताप यांना दिलं आहे.

उमेदवारी कोणालाही दिली तरी त्याला जगताप कुटुंबाचा पाठिंबा होता. गेली ३० वर्षे पडद्याच्या पाठीमागे काम करत असले तरी निवडणूक कशी लढायची हे मला माहीत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचं अश्विनी म्हणाल्या.

आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली. कसब्यातून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप या भाजपच्या अधिकृत उमेदवार असतील.

चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि पत्नी अश्विनी जगताप यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता होती.

हेही वाचा : हाडाचा कार्यकर्ता, जातीय गणितं जुळवण्यात माहीर, 'ओंकारेश्वरा'चा वरदहस्त; कसब्यात हेमंत रासनेंना उमेदवारी का मिळाली?

दुसरीकडे, भाजपने मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल यांना प्रदेश प्रवक्तेपदी दिल्याने कसब्याच्या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाबाहेरील व्यक्ती असेल, हे निश्चित झालं होतं. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपातच पाचहून अधिक इच्छुक उमेदवार होते. मात्र पुण्यातील नेत्यांच्या बैठकीनंतर मुंबईतही राज्य पातळीवरील नेत्यांमध्ये खलबतं झाली आणि हेमंत रासने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार रिंगणात उतरतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा : नाना पटोलेंनी १० तास माझ्या माणसाला बसवून ठेवलं आणि चुकीचे एबी फॉर्म पाठवले: सत्यजीत तांबे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यातील पेठेतील संतापजनक प्रकार! बळजबरीने केला विवाह, शरीरसंबंधाचा बनवला व्हिडिओ आणि धमकी देत...

$
0
0

पुणे : आपला भलताच हेतू साध्य करून घेण्यासाठी अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक झाल्याच्या अनेक घडना घडलेल्या आपण वाचल्या आहेत. प्रेमाच्या खोट्या शपथा घेऊन केवळ लैंगिक शोषण करण्याच्या हेतूनेही अनेकांनी विवाह केल्याचे स्पष्ट झालेले आहे. मात्र, यापेक्षाही धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. येथे एका मुलीशी बळजबरीने विवाह करत शरीरसंबंधाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तिला ब्लॅकमेल केल्याचा संतापजनक प्रकार पुण्यात घडल्याचे उघड झाले आहे. या पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

या धक्कादायक प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ सुपेकर असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपी सौरभ सुपेकर याचे पीडित तरूणीशी पूर्वीपासूनची ओळख होती. सौरभने तिला लग्नाची मागणी घातली आणि पुढे लग्नासाठी आग्रहच धरला. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सौरभने बळजबरी करत तिच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाह झाल्यावर सौरभने पीडित तरुणीशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. हे संबंध ठेवतानाचा व्हिडिओच त्याने रेकॉर्ड केला.

क्लिक करा आणि वाचा- फरार नाना पाटेकरला तामिळनाडूतून अटक, फटाका कारखाना स्फोटातील आहे मुख्य आरोपी, पोलिसांना मिळाली टिप

पुढे सौरभ या व्हिडिओचा वापर तिला धमकावण्यासाठी करू लागला. सौरभ तिच्याकडे पैशांची मागणी करू लागला. जर पैसे दिले नाहीस तर हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर व्हायरल करीन अशी धमकी तो तिला देऊ लागला. या प्रकारामुळे पीडित तरुणी घाबरली. निमूटपणे ती सौरभला पैसे देऊ लागली. असे करता करता या पीडित तरुणीने सौरभला तब्बल १० लाख रुपये दिले.

क्लिक करा आणि वाचा- पतीचे अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंध, पत्नी कंटाळली, शेवटी पतीचा असा काढला कायमचा काटा

पुढे सौरभने या तरुणीला आपल्या घरी राहायला बोलावलं. मात्र तिने सौरभच्या घरी जाण्यास नकार दिला. मग तो तिच्यावर बळजबरी करू लागला. तिला शिवीगाळही करू लागला. ती जिथे जाईल तिथे तो तिचा पाठलागही करू लागला. या सर्व छळाला कंटाळून शेवटी या पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत सौरभविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीत तिने तिचा कसा छळ झाला हे नमूद केलं आहे.

ही पीडित तरुणी मंगळवार पेठ येथील रहिवासी असून आरोपी सौरभ सुपेकर हा भवानी पेठेतील रहिवासी आहे. तरुणीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सौरभला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! शिक्षक आणि विद्यार्थिनीचे जुळले प्रेम, संयम सुटला आणि दोघे क्लासरूममध्ये नको ते करताना पकडले गेले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Pune : 'एपीआय'सह पोलिस कर्मचारी निलंबित; घरझडतीदरम्यान आरोपीने पळ काढल्याप्रकरणी कारवाई

$
0
0

पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केलेल्या आरोपीने पळ काढल्याप्रकरणी एका सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मार्केट यार्ड पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक रामदास झुंबर मुंढे आणि पोलिस कर्मचारी महेश राजेंद्र जाधव (दोघे नेमणूक) यांचे निलंबन करण्याचा आदेश पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी काढला आहे.

असा आहे प्रकार

संतोष बाळू पवार असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर ‘मकोकां’तर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याला मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केल्यानंतर साथीदारासह घरझडतीसाठी त्याच्या गावी खानापूर (ता. हवेली) येथे घेऊन गेले होते. त्या वेळी त्याने हातातील बेडीने पोलिसांवर हल्ला करून पळ काढला. आरोपीला तुरुंगातून बाहेर काढताना नियमानुसार दोन अधिकारी व सहा पोलिस कर्मचारी बरोबर घेणे गरजेचे असते, हा नियम पवार याच्यावेळी पाळण्यात आला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही परवानगी घेतली नाही. पोलिस कर्मचारी जाधव यांनी आरोपी साई कुंभार याच्या मोबाइलवर संपर्क करून संतोष पवार व साई कुंभार या दोघांना घरझडतीसाठी घेऊन येत असल्याचे कळविले. दोन्ही आरोपींच्या सुरक्षेबाबत खबरदारी न घेतल्याने आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज घेणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक तरुण; कंपनीच्या सर्वेक्षणातून माहिती उघड

$
0
0

पुणे : गेल्या वर्षभरात बँक किंवा पतसंस्थांकडून कर्ज घेणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक तरुण असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशभरात तरुण कर्जदारांची संख्या वाढली असून, अर्थिक वर्षाच्या गेल्या तिमाहीत कर्जांना चांगली मागणी मिळाली आहे. ‘ट्रान्सयुनियन सिबिल’ या कंपनीने देशभर केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

सीएमआय अहवालानुसार, कर्जे घेणाऱ्या १८ ते ३० या वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण कर्ज चौकशीच्या आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण ४३ टक्के आहे. सप्टेंबर २०२२अखेर संपलेल्या तिमाहीत ग्राहक नव्या कर्जासाठी अर्ज करीत असल्याचे हे द्योतक आहे. या ट्रेंडला उपभोगावर आधारित कर्ज उत्पादने, म्हणजेच क्रेडिट कार्ड्स, ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी घेतले जाणारे कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यांमुळे मोठी चालना मिळाली असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

कर्ज चौकशी आणि कर्ज घेण्याबाबत शहरातील तरुण सर्वांत पुढे आहेत. शहरातील ३१ टक्के तरुणांनी कर्जांची चौकशी केली आहे. ग्रामीण भागातील तरुणांकडूनही कर्जांची मागणी वाढत असून, यंदा २२ टक्के तरुणांनी कर्जाची मागणी केली आहे. निमशहरी भागातही कर्ज मागणीमध्ये तरुणांचाच वाटा मोठा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्जांच्या एकूण व्यवस्थेमध्ये तरुणांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या काही दिवसांमध्ये तरुण कर्जदारांची संख्या सर्वांत मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या उपभोक्ता कर्जे घेण्याकडे तरुणांचा कल असून, त्यामुळे कर्जांमध्ये वाढ होत आहे. त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे.- राजेश कुमार, संचालक, ट्रान्सयुनियन सिबिल



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Pune : डेंगी, चिकनगुनिया, मलेरिया रुग्णांच्या संख्येत घट; आरोग्य विभागाकडून जादा दंडवसुली

$
0
0

पुणे : पुणे शहरात गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत जानेवारी महिन्यात डेंगी, चिकनगुनिया, मलेरिया रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने जानेवारीत सर्वेक्षणातून जादा दंड वसूल केला आहे.

महापालिका आरोग्य विभागाने डासांच्या उत्पत्तीबाबत केलेल्या सर्वेक्षणातून ऑक्टोबर महिन्यात ३० हजार रुपये दंड वसूल केला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये २९ हजार रुपये, तर डिसेंबरमध्ये २७ हजार ७५० रुपये दंड वसूल केला. जानेवारीत डेंगी आणि चिकनगुनियाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही; पण ३४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरात ऑक्टोबरमध्ये १,०५३ डेंगीच्या संशयित रुग्णांची नोंद झाली, यातील १४८ पॉझिटिव्ह होते. नोव्हेंबरमध्ये डेंगीचे ८३० संशयित रुग्ण आढळून आले होते. यातील ९९ रुग्णांचा तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. डिसेंबरमध्ये ३१५ संशयित होते, यातील ४० रुग्णांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. यंदाच्या जानेवारीत डेंगीचे १२३ संशयित रुग्ण आढळले आहेत. मात्र, यातील एकाही रुग्णाचा तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आलेला नाही. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत जानेवारीत डेंगीच्या रुग्णांची संख्या घटल्याचे दिसून येते.

शहरात डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांच्या रुग्णांची संख्या घटली असली, तरी सध्या शहरात व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर आहे. व्हायरल इन्फेक्शनचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत आहे. त्यामुळे सर्वच रुग्णालयातील बालरोग विभागातील ओपीडी वाढली आहे. सकाळी थंडी, तर दुपारी उकाडा अशा प्रकारचे वातावरण सध्या शहरात आहे. यामुळेच व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगतिले.

नोटीस आणि वसूल दंड

महिना नोटीस दंड

ऑक्टोबर ५१९ ३० हजार

नोव्हेंबर २३७ २९ हजार

डिसेंबर ८३ २७ हजार ७५०

जानेवारी ५८ ३४ हजार



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांबे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणले; पटोलेंचा अजित पवारांवर निशाणा

$
0
0

पुणे :‘तांबे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणण्याचे काम विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच केले,’ असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केला. आ. सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपांना काँग्रेस प्रवक्ते उत्तर देतील, असे सांगत पटोले यांनी ‘माझ्याकडेही खूप मसाला असून, वेळ आली की सर्व बाहेर काढू,’ असा इशाराही दिला.

कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत पटोले यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांच्यावर नेम धरला. ‘तांबे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणण्याचे काम अजित पवार यांनीच केले. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आमच्यावर टीका केली. तांबे यांच्या उमेदवारीबाबत बाळासाहेब थोरात, तसेच माझ्याशी बोलल्याचे अजित पवार सांगत होते. आता पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मते आम्ही मारली, असे म्हणत आहेत. या ‘हाय व्होल्टेज ड्रामा’मध्ये आम्हाला फसायचे नाही. भाजप देशातील घटनात्मक व्यवस्था संपवित असून, काँग्रेस जनतेची लढाई लढत आहे,’ असे त्यांनी नमूद केले. अजित पवारांच्या टीकेनंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी विचारणा केली असता पटोले म्हणाले, ‘एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाद नाहीत का, राधाकृष्ण विखे पाटील आणि फडणवीस यांच्यामध्ये सर्व आलबेल आहे का, त्याकडेही माध्यमांनी लक्ष द्यावे.’

कसब्याचा उमेदवार आज जाहीर करणार

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक सात उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आली असून, आज, रविवारी पक्षातर्फे उमेदवारीची घोषणा होईल, असे पटोले यांनी सांगितले. कसब्यात टिळक कुटुंबीयांना उमेदवारी न देणाऱ्या भाजपवर पटोले यांनी निशाणा साधला. ‘भाजपची गरज संपल्यावर एखाद्याला फेकून देण्याची क्रूर प्रवृत्ती आहे. मुक्ता टिळक आजारी असतानाही पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी येत होत्या. भाजपने निष्ठावंतांना डावलणे योग्य नाही,’ असेही ते म्हणाले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील निवडणुकांचं चित्र पालटणार? राज ठाकरेंची मोक्याची क्षणी महत्त्वाची भूमिका, म्हणाले...

$
0
0

पुणे : शहरातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचं निधन झाल्याने या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने कालच आपल्या उमेदवारांची घोषणा केली. भाजपपाठोपाठ महाविकास आघाडीनेही या पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली असून मविआकडूनही लवकरच उमेदवारांची नावे निश्चित करण्यात येणार आहेत. दोन्ही बाजूने ही निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद झोकून दिली जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा वेगळी भूमिका घेत ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं आहे.

'अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा,' असं म्हणत राज ठाकरे यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला साद घातली आहे. राज ठाकरेंनी केलेल्या या आवाहनाला मविआचे नेते कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज ठाकरेंनी पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

"सस्नेह जय महाराष्ट्र,
महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचं नुकतंच दुःखद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणुका होत आहेत.
मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.
कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.
आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा."


मविआकडून कोणते नेते उमेदवारीच्या स्पर्धेत?

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून आज, रविवारी उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असल्याचे सुतोवाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. दरम्यान, कसब्यातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याची चर्चा असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीची शनिवारी मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये उमेदवारांबाबत एकमत होऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर आज, रविवारी पुन्हा बैठक होणार आहे. त्यामध्ये कसबा काँग्रेसकडे आणि चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना (ठाकरे गट) लढवणार असल्याबाबत एकमत केले जाईल आणि तशी औपचारिक घोषणा होईल. त्यानंतर संबंधित पक्षांकडून उमेदवारांची नावेही जाहीर केली जातील. महाविकास आघाडीनेही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन केले असून, त्यासाठीची तयारीही केली आहे.






मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात आईने नवजात बाळाला कालव्यात फेकलं अन् केला अपहरणाचा बनाव; मात्र 'असा' लागला सुगावा

$
0
0

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या नवजात मुलीबाबत एका धक्कादायक सत्य समोर आलं आहे. स्वतःच्या आईनेच पोटच्या गोळ्याला पिंपळगाव जोगा डावा कालव्यात फेकून दिल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या मुलीच्या अपहरणाचा बनाव उघड झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे वास्तव्यास असलेल्या एका परप्रांतीय महिलेने शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास १५ दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा बनाव करत आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र, तक्रार नोंदवताना पोलिसांना महिलेने सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानुसार पोलिसांनी तपासही सुरू केला. मात्र, पोलिसांना काही सुगावा लागेना. त्यानंतर महिलेच्या सांगण्यावर आणि तिच्या वागण्याचा पोलिसांना संशय वाटू लागला.

पुण्यातील निवडणुकांचं चित्र पालटणार? राज ठाकरेंची मोक्याची क्षणी महत्त्वाची भूमिका, म्हणाले...

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलीसी खाक्या दाखवताच संबधित महिलेने आपणच आपल्या पोटच्या बाळाला पिंपळगाव जोगा कालव्यात फेकल्याची कबुली दिली.

दरम्यान, पोलिसांकडून या महिलेची कसून चौकशी केली जात असून, पोटच्या बाळाला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात टाकलेल्या बाळाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. या महिलेने केलेल्या कृत्यामागे नेमके काय कारण आहे? याची माहिती समोर आली नसली तरी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. या घटनेने आळेफाटा परिसरात एकच खळबळ उडाली होती. कालव्याला पाणी सुरू असताना ते अर्भक पाण्यात फेकले होते. महिलेने कबुली दिल्यानंतर कालव्याचे पाणी कमी करून ते शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून युद्ध पातळीवर केला जास आहे.

लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज ब्लॉक; 'या' फेऱ्या रद्द तर काही गाड्या १५ मिनिटे विलंबाने धावणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Pune : 'गृहस्वप्ना'ला सहकाराचा आधार; स्पर्धेत टिकण्यासाठी सहकारी बॅंकांनी कर्जाचे दर केले कमी

$
0
0

पुणे : पुण्यातील सहकारी बँकांनी आपल्या गृह कर्ज, वाहन कर्जांचे दर एक ते दीड टक्क्यांनी कमी केल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी सहकारी बँकांनी हे पाऊल उचलले असून, त्याचा फायदा सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. सहकारी बँकांच्या या निर्णयामुळे गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये सहकारी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या कर्जदारांच्या संख्येमध्ये २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.

पुण्यात कार्यरत असलेल्या कॉसमॉस, सारस्वत, पुणे पीपल्स, जनता सहकारी बँक, जनसेवा बँक या सर्वच आघाडीच्या सहकारी बँकांनी त्यांच्या गृह कर्जाचे दर एक ते दीड टक्क्यांनी कमी केले आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि रिझर्व्ह बँकेने सर्व बँका एका पातळीवर आणण्यासाठी आखलेल्या धोरणामुळे हे दर उतरवण्यात आल्याचे बँकांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. या सर्वच सहकारी बँकांनी कर्ज देण्याची प्रक्रियाही अतिशय सुलभ केल्याने सहकारी बँकांमधून कर्ज घेण्याची प्रक्रिया आणखी सुलभ झाल्याचे ग्राहकांकडूनही सांगितले जात आहे.

करोनापूर्वीच्या काळाचा विचार केला, तर पुण्यातील बहुतांश सहकारी बँकांकडून ८ ते ८.५० टक्क्यांनी गृह कर्ज दिले जात होते. याच वेळी राष्ट्रीयीकृत बँका आणि काही खासगी बँकांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ६ ते ६.५ टक्के कर्जदर आकारला जात होता. साहजिकच नागरिकांचे राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण अधिक होते. करोनानंतर विशेषत: गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये दोन वेळा वाढ झाल्याने सर्वच बँकांचे कर्जदर वाढले असून, आता राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांचे गृह कर्जाचे दर ८ ते ८.५ टक्क्यांच्या सुमारास स्थिरावले आहेत. सहकारी बँकांनीही तेच दर लागू केल्याने या बँकांचे गेल्या काही महिन्यातील कर्जाच्या वाटपाची रक्कम सरासरी ६० ते ७० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
------------------
या मुळे झाले दर कमी...

१. सहा महिन्यांपूर्वी सहकारी बँकांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या गृह कर्जांची मर्यादा दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतला.

२. मोठ्या सहकारी बँकांकडून एका ग्राहकाला एक कोटी ४० लाखापर्यंतचे गृह कर्ज देण्याची मुभा.

३. करोनामुळे सहकारी बँकांच्या व्यवसायात झालेली घट भरून काढण्यासाठी कर्जदरात कपात.

४. बँकेच्या ठेवी आणि कर्ज यांच्यातील दरी कायम राखण्यासाठीही कर्जाचे दर उतरवले.

५. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना एका पातळीवर आणण्याचे धोरण लागू केले आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम.
-----------------
बांधकाम व्यावसायिकांचे करार

नवे गृहप्रकल्प बाजारात आणणारे बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना गृह कर्ज मिळवून देण्यासाठी यापूर्वी राष्ट्रीयीकृत बँका आणि खासगी बँकांना प्राधान्य देत होते. गेल्या काही महिन्यांत व्यावसायिकांनी सहकारी बँकांशीही मोठ्याप्रमाणावर करार केले आहेत. कर्जाचे दर उतरल्याने बांधकाम व्यावसायिकही सहकारी बँकांकडून कर्ज घेण्यास ग्राहकांना प्रवृत्त करीत असल्याचे चित्र आहे.
---------------
गेल्या पाच महिन्यांतील गृहकर्जाची आकडेवारी

जनता सहकारी बँक : ~ ७० ते ८० कोटी

जनसेवा सहकारी बँक : ~ ५० ते ६० कोटी

कॉसमॉस बँक : ~ ८० ते ९० कोटी

पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक : ~ ३० कोटी
--------------
बँकांच्या व्यवसायाच्या स्पर्धेसह आणखीन तीन ते चार कारणांनी सहकारी बँकांनी त्यांचे गृह कर्जांचे दर कमी केले आहेत. हे दर कमी झाल्याने आमच्या व्यवसायातही मोठी वृद्धी झाली असून, नागरिकांना याचा मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे.- डॉ. राजेंद्र हिरेमठ, अध्यक्ष, जनसेवा बँक
----------------
रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांची कर्ज देण्याची क्षमता दुपटीने वाढवल्याने व्यवसायात वृद्धी करण्याची संधी होती. ही संधी सोडायची नाही, म्हणून अनेक सहकारी बँकांनी त्यांचे कर्जदर कमी केले आहेत. या मुळे भविष्यामध्ये सहकारी बँका अधिक सक्षम होतील, असा विश्वास वाटतो.- महेश काळे, सरव्यवस्थापक, जनता सहकारी बँक
------------------
सहकारी बँकांनी गृहकर्जाचे दर कमी करण्यास अनेक कारणे आहेत. यातून व्यवसाय थोड्याप्रमाणात वाढला आहे; पण अजूनही अनेक अडचणी आहेत.- ॲड. सुभाष मोहिते, अध्यक्ष, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकर आजोबांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले, लग्न करायचे म्हणत तरुणीने १ कोटी रुपये उकळले, अन्

$
0
0

पुणे: पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना दिवसांदिवस डेटिंग आणि सेक्सटोर्शनच्या गुन्ह्यांमध्ये ही वाढ होताना दिसत आहे. तरुणांना सोबत जेष्ठ नागरिकांना देखील प्रलोभन दाखून आर्थिक गंडा घातला जात आहे. नागरिक हनी ट्रॅप मध्ये अडकल्यानंतर त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे उकळले जातात. त्या मुळे नागिरकानी अश्या आमिषाला बळी पडू नये असं वारंवार सायबर पोलिसानी आवाहन करूनही अश्या प्रकरची प्रकरण वाढताना दिसत आहे.

के. बी. टेलिकॉम या डेटिंग कंपनी मधील डेटिंग सर्विस देण्याच्या नावाखाली एका नामांकित कंपनीतून सेवा निवृत्त ७८ वर्षीय जेष्ठ व्यक्तीला स्पेशल सर्विसच्या नावाखाली दोन वेग वेगळ्या बँक खात्यातून पैसे भरल्याचे सांगून तब्बल १ कोटी २ लाखाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

वाचाः पुण्यात आईने नवजात बाळाला कालव्यात फेकलं अन् केला अपहरणाचा बनाव; मात्र 'असा' लागला सुगावा

या प्रकणी रजत सिन्हा, नेहा शर्मा आणि ज्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झालेत ते खातेधारक अश्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत एका ७८ वर्षीय जेष्ठ नागरिकांनी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. हा प्रकार २०२२ पासून सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका मोठ्या कंपनीतून निवृत्त झाले आहेत. ते अमेरिकेतील एका कंपनीसाठी काम करतात. त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांना एकदा नेहा शर्मा या नावाने महिलेचा फोन आला. तिने आपली के. बी. टेलिकॉम ही डेटिंग कंपनी आहे, असे सांगितले. डेटिंग सर्व्हिस देण्यासाठी त्यांच्याकडून सुरुवातीला काही पैसे ऑनलाइन भरायला सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तसेच रिफंडेबल चार्जेस असल्याचे सांगून त्यांना वेगवेगळ्या खात्यांत पैसे भरायला सांगितले. त्यानुसार ते पैसे भरत गेले. त्यानंतर या महिलेने 'हनी टॅप'मध्ये अडकविले. 'तुमच्याशी लग्न करायला तयार आहे,' असे सांगून त्यांना आपल्या जाळ्यात अडकविले.

वाचाः फुकटात साड्या मिळवण्यासाठी महिलांची धावपळ; चेंगराचेंगरीत चार जणींनी जीव गमावला

प्रत्यक्षात या महिलेशी त्यांची कधी भेट झाली नाही. तरीही ती सांगेल त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या खात्यांत पैसे भरत गेले. मात्र आपली फसवणूक होत असल्याचं कळल्या नंतर जेष्ठाने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर तिने व रजत सिन्हा नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना धमकावून पैसे देण्यास भाग पाडले. आतापर्यंत त्यांनी तब्बल १ कोटी २ लाख १२ हजार रुपये भरले. आपली बदनामी होऊ नये म्हणून ते इतके दिवस पैसे देत राहिले. तरीही तिची मागणी न थांबल्याने शेवटी त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक संगीता माळी तपास करीत आहेत.

वाचाः महिला अंघोळीला गेली, इकडे शेजाऱ्याने डाव साधत केलं भयानक कृत्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या बसचा ब्रेक फेल, धावत्या बसमधून चालकाची उडी अन्...; पुण्यातील धडकी भरवणारा VIDEO

$
0
0

पुणे : बारामतीच्या मोरगाव मधील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन घेलेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. बसचे ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात येताच बस चालकाने रस्त्यावरच्या नागरिकांना सावध करत, चालत्या बसमधून उडी मारून चाकाखाली दगडं टाकून बस थांबवली. चालकाने दाखवलेल्या ह्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला आहे. बस वरंधघाट मार्गे रायगड किल्ल्यावर विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात असताना पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात ही घटना घडली. बसमध्ये एकूण ३४ विद्यार्थी होते.

स्थानिकांनी दिलेली माहितीनुसार, मोरगावमधील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. बसचे ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात येताच चालकाने रस्त्यावरच्या नागरिकांना सावध करत चालत्या बस मधून उडी मारून चाकाखाली दगडं टाकून बस थांबवली. चालकाने दाखवलेल्या ह्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.


Pervez Musharraf Passed Away: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन

सहलीसाठी मोरगावमधील खासगी क्लासच्या ३४ विद्यार्थ्यांना घेऊन मांढरदेवीचे दर्शन करून बस क्रमांक MH12 HC 9119 भोर वरंधघाट मार्गे रायगडला जात असताना भोर चौपाटीजवळ बसचा ब्रेक एअर पाईप फुटल्याने बसचे ब्रेक निकामी झाले. बसचे ब्रेक निकामी झाल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान दाखवले. चालत्या बसमधून उडी मारून बसच्या चाकाखाली दगड टाकून बस थांबवली.

दरम्यान, बसमधले सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच, पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून चालक आणि विद्यार्थ्यांना धीर देत रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत केली.

राज ठाकरेंचा पुन्हा पत्र प्रपंच; कसबा-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मविआला साद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवऱ्याला लागली अफेअरची कुणकुण, तरुणाला संपवण्याची धमकी; प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

$
0
0

पुणे : एका विवाहितेचे तरुणासोबत प्रेमसंबंध विवाहितेच्या पतीला समजलं तर काय होऊ शकतं? याच उत्तम उदाहरण पुण्यातल्या लोणी काळभोर परिसरात घडलं. एका विवाहितेचं आणि तरुणांचे प्रेमसंबंध विवाहितेचा पतीला समल्यानंतर पतीने प्रियकराला (आत्महत्या करणारा व्यक्ती) धमकावत शिवीगाळ करत मारून टाकण्याची धमकी दिली म्हणून तरुणाने थेट आत्महत्या केली. ही घटना २फेब्रुवारीला घडली आहे.

या प्रकरणी प्रेम सबंध ठेवणारी विवाहितेवर आणि तिच्या पतीवर आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश सुरेश जाधव (वय ३१ रा.टाटा पावर, नीता पार्किंग ठाणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील सुरेश मारुती जाधव (वय ५३) त्यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

IND vs AUS:ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी पुन्हा एकदा झटका, स्टार गोलंदाज पहिल्या कसोटीतून बाहेर

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत मंगेश याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती विवाहित महिलेच्या पतीला समजल्यानंतर त्याने मंगेश जाधव याला फोन करून ठार मारण्याची धमकी दिली होती. हे दोघं पती-पत्नी मंगेश याला वारंवार मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

विद्यार्थ्यांच्या बसचा ब्रेक फेल, धावत्या बसमधून चालकाची उडी अन्...; पुण्यातील धडकी भरवणारा VIDEO

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणाच्या घरात जायचं हे कळत नाही? मांजरीवरून पुण्यात महिलांमध्ये वाद, भांडण थेट पोलिसांपर्यंत

$
0
0

पुणे : आज काल कोणाचा कशावरून वाद होईल याचा अंदाज नाही. पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरात दोन शेजाऱ्यांमध्ये पोपटावरून झालेला वाद पोलीस ठाण्यात गेला होता. आता पुण्यातल्या खडकी परिसरात राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांमधील वाद चर्चेत आला आहे. मांजरीवरून शेजारी राहणाऱ्या दोन बायकांमध्ये जुंपली. हा वाद एवढा विकोपाला गेली की हे प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. दोन्ही शेजाऱ्यांनी एकमेकांवर आरोप केलेत. त्यांच्या तक्रारींवरून अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी उषा मधुकर वाघमारे (वय ४५ रा. सावंत नगर बपोडी खडकी पुणे) आणि रेश्मा सलिम शेख (वय ४५ रा. शेजारी) यांनी तक्रारी केल्या आहेत. उषा आणि रेश्मा या महिला पुण्यातल्या खडकी परिसरात शेजारी राहतात. रेश्मा यांच्याकडे एक भटकी मांजर आहे. जिला त्या सांभाळतात. शनिवारी दुपारच्या वेळेत उषा वाघमारे या घरात कपडे धुवत असताना मांजर त्यांच्या घरात गेली. हे पाहून रेश्माने उषाच्या घरात जाऊन तिला परत आणलं. मात्र, परत आणत असताना रेश्माने मंजिरला दरडावलं. कोणाच्या घरात जायचं हे कळत नाही? असं बोललं.

नवऱ्याला लागली अफेअरची कुणकुण, तरुणाला संपवण्याची धमकी; प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

रेश्मा या मांजरीवरून घालून पाडून बोलल्याने उषाही संतापल्या. यामुळे दोघंमध्ये वादाल सुरुवात झाली. या वादात नंतर एकमेकांना शिव्या देऊ लागल्या. हा वाद टोकाला जात उषा आणि रेश्मा यांच्यात हाणामारी झाली. आणि हा वाद थेट खडकी पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकून घेतली. या प्रकरणी दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अदाखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

विद्यार्थ्यांच्या बसचा ब्रेक फेल, धावत्या बसमधून चालकाची उडी अन्...; पुण्यातील धडकी भरवणारा VIDEO


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवारही इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे चाहते; म्हणाले, 'इंदुरीकराचं कीर्तन ऐकण्याची इच्छा होती'

$
0
0

पुणे : आपल्या तडफदार शैलीत, आणि कीर्तनाच्या वेगळ्या अंदाजात जनसागराला पोट धरून हसवणाऱ्या इंदुरीकर महाराजांचं कीर्तन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही आवडतं. मात्र संसदेच्या अधिवेशनाला जावं लागणार असल्यानं त्यांना इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकता येणार नाही. म्हणून कार्यक्रमातल्या भाषणातला समारोप करताना शरद पवारांनी आपली खंत जाहीरपणे बोलून दाखवली. पण इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा लाभ पुन्हा घेतल्या शिवाय राहणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणनिमित्त निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून शरद पवार उपस्थित होते. मात्र दिल्लीला जाण्यासाठी आज रात्रीची फ्लाइट असल्याने त्यांना कार्यक्रममध्येच सोडून जावं लागलं. मात्र, इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम पुढे नक्की ऐकेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मध्यंतरी कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे काही आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. यामुळे इंदुरीकर महाराज प्रचंड ट्रोल झाले होते. या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी वादाची मोठी राळ उठवली होती. महाराजांचे अनेक जुने व्हिडिओ काढून इंदुरीकर महाराजांवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांनी काही काळ विश्रांती घेतली. मात्र, महाराजांचा एक कार्यक्रम आज पुण्यात आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमात शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. शरद पवारांनी या कार्यक्रमात जाहीरपणे बोलून दाखवलं. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन बघायला आवडतं, असं पवारांनी सांगितलं.

पुण्यातील निवडणुकांचं चित्र पालटणार? राज ठाकरेंची मोक्याची क्षणी महत्त्वाची भूमिका,

'दिल्लीमध्ये उद्या अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी सुरू होत आहे. हिवाळ्याच्या वातावरणामुळे सकाळचे फ्लाइट कॅन्सल होतात. म्हणून घाईगर्दीत मला आताच निघावं लागेल. नाही तर मला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकायची इच्छा होती. त्यांच्या कीर्तनामध्ये गमती असतात. मी अनेकदा ते टीव्हीवर पाहात असतो. याची अॅक्शन कर, त्याची दिशा काढ, त्यांची टाळ, नृत्य बदल. आता सागळ्या गोष्टी सांगत नाही', असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

राज्यात वडील पळवायची शर्यत; रेकॉर्ड करून ठेवा, शरद पवार हे माझेच वडील आहेत : सुप्रिया सुळे

'पण एक जनमाणसांमध्ये सहजपणे चांगले संस्कार कसे करता येईल, सहज विचार कसे राबवता येतील? याचं उत्तम उदाहरण कीर्तनकार इंदुरीकर महाराज. आणि याचं लोणी महाराष्ट्रमध्ये सामान्य माणसांपर्यंत पोहचलं आहे. आजही या ठिकाणी मला त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली नाही. पण त्याचा लाभ मी पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही', असं शरद पवार यांनी सांगितलं.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-नाशिक रेल्वेला बूस्टर! सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला अखेर तत्त्वत: मंजुरी

$
0
0

पुणे : बहुप्रतीक्षित पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या थंडावलेल्या कामाला आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वेचा तिढा अखेर सुटला असून, प्रकल्पासोबत या भागातील विकासाला आता बूस्टर मिळणार आहे.

पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प म्हणून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकडे पाहिले जाते. शिंदे-फडणवीस सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते. संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. दरम्यान, पुण्यात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजित केलेल्या पुणे सुपरफास्ट कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी २७ जानेवारीला बैठक होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्या वेळी ती बैठक रद्द झाली होती. त्यानंतर रेल्वेमंत्री आणि फडणवीस यांची दिल्लीत रविवारी बैठक झाली. या बैठकीकडून अनेकांच्या अपेक्षा होत्या. अखेर ही बैठक होऊन या प्रकल्पाला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे या प्रकल्पास आता खऱ्या अर्थाने गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

औद्योगिक कॉरिडॉरचे काय होणार?

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला पर्यायी औद्योगिक कॉरिडॉर म्हणून महामार्गाचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक भागातील उद्योगांना दळणवळणाची सुविधा मिळेल, असा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, सेमी हायस्पीड रेल्वेला आता हिरवा कंदील मिळाला असला तरी त्यासोबत औद्योगिक कॉरिडॉरच्या या प्रकल्पाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेल्वेमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. ब्रॉडगेजवर ही रेल्वे होणार का, हा अनुत्तरित प्रश्न आहे. या मार्गावरील रेल्वे ब्रॉडगेजवर होणार असेल तरच शेतकरी आणि उद्योगाला त्याचा फायदा होईल. संपूर्ण प्रकल्पाला मंजुरी मिळाली की त्यात काही बदल करून मान्यता मिळाली, याचे स्पष्टीकरण मिळायला हवे. -डॉ. अमोल कोल्हे, खासदार

पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी बैठक झाली. त्यांनी या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. सादरीकरणानंतर महारेल कंपनी आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यातील तांत्रिक बाबीवर एकमत होईल. या प्रकल्पामुळे या दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

पुणे, नाशिक ही दोन्ही ऐतिहासिक शहरे आहेत. या शहरांच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यातील तांत्रिक अडथळे दूर करून या प्रकल्पाला गती देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.- अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वेमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Pune : वाहनविक्री पूर्वपदावर; करोनाकाळानंतर शहरात दोन लाख ५५ हजार वाहनांची नोंदणी

$
0
0

पुणे : करोनानंतर दोन वर्षांनी शहरातील वाहनखरेदी वाढताना दिसत आहे. २०२२मध्ये शहरात वाहनखरेदीचा वेग करोनापूर्वीच्या टप्प्यावर पोहोचला असून, गेल्या वर्षी दोन लाख ५५ हजार नवीन वाहनांची भर पडली आहे. करोनाच्या पूर्वी २०१९मध्ये दोन लाख ४० हजार वाहनांची विक्री झाली होती, तर २०२२मध्ये दोन लाख ५५ हजार ९२५ वाहनांची विक्री झाली आहे.

पुण्यात इतर शहरांच्या तुलनेत नेहमीच वाहनखरेदी जास्त असते. पुणे हे दुचाकीचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात सध्या ३४ लाख ७९ हजार वाहने आहेत. त्यामध्ये दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. करोनापूर्वी प्रत्येक वर्षी वाहनखरेदीमध्ये वाढ होत होती; पण २०२०मध्ये करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर वाहनखरेदीला ब्रेक लागला होता. या वर्षी वाहनखरेदीचे प्रमाण ३७ टक्क्क्यांनी घटल्याचे दिसून आले होते. त्यानंतर २०२१मध्येदेखील करोनाची दुसरी लाट आली होती. त्यामुळे वाहनखरेदी पूर्वपदावर आलेली नव्हती; पण २०२२मध्ये करोनाचे सर्व निर्बंध उठले आणि वाहनखरेदीने पुन्हा वेग पकडल्याचे दिसून आले.

पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार शहरात करोनाच्या पूर्वी २०१९मध्ये दोन लाख ४० हजार वाहनांची विक्री झाली होती, तर २०२२मध्ये दोन लाख ५५ हजार ९२५ वाहनांची विक्री झाली आहे. २०२१च्या तुलनेत २०२२मध्ये ५० टक्क्यांनी वाहनखरेदी वाढल्याचे दिसून आले आहे. हा वाहनखरेदीचा वेग २०२३मध्येदेखील सुरू आहे. पहिल्या महिन्यातच २३ हजार ९९२ वाहनांची विक्री झाली आहे. वाहनखरेदी वाढल्यामुळे ‘आरटीओ’च्या महसूलामध्येदेखील मोठी वाढ झाली आहे.
------------------
२०२२मध्ये विक्री झालेल्या वाहनांची माहिती

दोन लाख ५५ हजार ९२५

विक्री झालेली एकूण वाहने
---
एक लाख ६१ हजार ८३९

दुचाकी वाहने
---
६७ हजार ८६९

चारचाकी वाहने (कार)
--
दोन दोन ४४४

कॅब
---
सहा हजार ८६८

तीन चाकी प्रवासी वाहने
---
१३९३

मालवाहू वाहने
--------------------------
वर्षानुसार वाहन नोंदणी

वर्षे वाहनांची नोंदणी

२०१९ २,४०,७५१

२०२० १,४९,७९४

२०२१ १,६९,७९४

२०२२ २,५५,९२५

करोनाच्या दोन वर्षांत वाहनखरेदी घटली होती. २०२२मध्ये वाहनेखरेदीचे प्रमाण वाढले आहे. आता वाहनखरेदीने करोनापूर्वीचा टप्पा ओलांडला आहे. नेहमीप्रमाणे दुचाकी खरेदीचे प्रमाण सर्वाधिक आहे.- संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुम्हीदेखील घराबाहेर चावी लपवून ठेवताय?; पुण्यात घडलेली ही धक्कादायक घटना एकदा वाचाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणेः घराबाहेर जाताना कुलूप लावून सवयीप्रमाणे दाराबाहेर लपवून ठेवलेल्या चावीचा वापर करूनच चोरट्यांनी घरातील ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना नारायण पेठेत घडली. ही घटना भर दिवसा दुपारी बारा ते सव्वाच्या सुमारास घडल्याने परिसरात या घरफोडीची चर्चा होती.

नारायण पेठेत मोदी गणपती मंदिराजवळ वैष्णवी अपार्टमेंटमध्ये चार फेब्रुवारीला भरदिवसा घरफोडी करून ९७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरण्यात आला. या प्रकरणी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वैष्णवी अपार्टमेंट येथे राहतात. त्या चार फेब्रुवारीला घराच्या दरवाजाला कुलूप लावून कामासाठी बाहेर गेल्या होत्या. त्या वेळी जाताना त्यांनी घराबाहेरील गादीखाली चावी ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी गादीखाली ठेवलेली त्यांची चावी घेऊन घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर घरात प्रवेश करून लोखंडी कपाट आणि कपाटातील ड्रॉवर उचकटून त्यातील ३५ हजार रुपयांची रोकड, ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पाचशे रुपये किमतीचे चांदीचे तोडे, असा ऐवज चोरून नेला.

शहरात सात घटना

शहरात नारायण पेठेसह कोथरूड, नऱ्हे, हडपसर आणि कोंढवा येथे बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी केल्याच्या एकूण सात घटना शनिवारी घडल्या. सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नऱ्हे येथील मल्हार हाइट्समध्ये दोन फेब्रुवारीला बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा एक लाख १३ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी महिलेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार महिला कुटुंबीयांसह दोन फेब्रुवारीला कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. त्या वेळी चोरट्यांनी तेथे घरफोडी केली. धायरी परिसरातील आंबामाता रस्त्यावरील ओंकार सुपर मार्केट या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ड्रॉवरमधील ९० हजार रुपयांची रोकड चोरली.

कोथरूडमध्ये घरफोडी

कोथरूडमधील अवंती सोसायटीतील बंद घराचे कुलूप तोडून एक लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना एक ते दोन फेब्रुवारीला घडली. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार कुटुंबीयांसह राहतात. ते एक आणि दोन फेब्रुवारीला कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून एक लाख ८४ हजारांचा ऐवज चोरून नेला. ते गावाहून आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरूड पोलिस तपास करीत आहेत.

घरफोडीच्या अन्य घटना

- कोंढव्यातील भाग्योदयनगर येथे घरफोडी करून भरदिवसा एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

- फुरसुंगी येथील बंद फ्लटचा कडीकोयंडा तोडून घड्याळे, चांदीचे दागिने, सोन्याचे दागिने असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरला.

- ससाणेनगर येथे पान टपरीचा पत्रा उचकटून १५ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे-फडणवीस सरकारची ७ महिन्यांत कोट्यवधींची उधळपट्टी! दिवसाला जवळपास २० लाख खर्च

$
0
0

बारामती : जनतेच्या हिताची कामे करत असल्याचा शिंदे फडणवीस सरकारचा दावा फोल ठरू लागला आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून फक्त ७ महिन्यांत जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारामती तालुक्यातील करंजेपूल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत माहिती अधिकारात माहिती विचारली होती. शिंदे फडणवीस सरकारच्या २१५ दिवसांच्या कार्यकाळात हा खर्च करण्यात आला आहे. राज्य सरकारला खरंच लोकहिताची कामं करायची आहेत, की नुसती खोटी जाहिरातबाजी करून जनतेमध्ये परफेक्शन तयार करायचं आहे का? असा सवाल नितीन यादव यांनी केला आहे.

राज्य सरकारकडून नुकतीच ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जाहिरात खर्चाची सरासरी काढली तर दिवसाला जवळपास १९ लाख ७४ हजार रुपये सरकारी तिजोरीतील पैशांची वारेमाप उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशातून शासनास जाणाऱ्या या पैशांच्या उधळपट्टीवर आतातरी अंकुश लावण्यात येईल का? जाहिरातबाज सरकार फक्त जाहिरातबाजी न करता प्रसिद्धीचा हव्यास सोडून खरोखरच राज्याच्या विकासासाठी काम करेल का? असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी उपस्थित केला आहे.

कुठल्या जाहिरातींवर केला खर्च?

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम, केंद्र शासनाचा उपक्रम असलेला बुस्टर डोस, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा, मराठी भाषा उपक्रम, जी २०, उद्योग (रत्नांचा सागर), इंडियन सायन्स कॉंग्रेस, राज्यस्तरीय रोजगार मेळावा, एमएमआरडीए, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती या उपक्रमासाठी ७ महिन्यांत ४२ कोटी ४४ लाख रुपये जाहिरात खर्च करण्यात आला आहे.

शरद पवारही इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे चाहते; म्हणाले, 'इंदुरीकराचं कीर्तन

मागील भाजप शासनाच्या काळातही जाहिरातींवर खर्च करून पैशांची उधळपट्टी केली जात होती. सध्याच्या सरकारनेही तोच कित्ता गीरवत जाहीरातींवर वारेमाप खर्च चालवला आहे. विकासाच्या नावाखाली डंका वाजवायचा. मात्र सर्वसामान्य जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायची असाच हा उद्योग सध्याचे सरकार करत असल्याचा आरोप होत आहे. जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च करण्याऐवजी जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन ते अंमलात आणण्याची गरज यानिमित्ताने राज्यातील जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे-नाशिक रेल्वेला बूस्टर! सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला अखेर तत्त्वत: मंजुरी




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का?, कसब्यातील बॅनर चर्चेत

$
0
0

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यासाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसब्यात उमेदवारी देताना भाजपला मोठी कसरत करावी लागली. अखेर उमेदवारीची माळ माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या गळ्यात पडली. पण आता टिळकांच्या घरात उमेदवारी न देता भाजपने घराबाहेरील उमेदवार दिल्याने मोठी नाराजी उफाळल्याचे चित्र आहे.

मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी देखील याबात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा भाजपमधील नाराजी नाट्य उघड झाले आहे. 'कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. आता नंबर बापटांचा का?' अशा आशयाचा मजकूर लिहिलेले बॅनर्स कसबापेठेत लागले आहेत. त्यामुळे कसब्यात भाजपविरोधातील नाराजी उफाळून आल्याचे दिसत आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आज हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वीच कसब्यात 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला... टिळकांचा मतदारसंघ गेला... आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार?' अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले आहेत. या बॅनरवर कोणाचेही नाव नसून कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलेले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारची ७ महिन्यांत कोट्यवधींची उधळपट्टी! दिवसाला जवळपास २० लाख खर्च

भाजपने उमेदवारी देताना काही सर्वे केले होते, त्यात भाजपला ही पोटनिवडणूक सोपी नाही, असा निष्कर्ष निघाल्याची माहिती आहे. त्यातही समोर महाविकास आघाडी रवींद्र धंगेकर यांच्यासारखा तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याने भाजपने लोकांत असणारा चेहरा उमेदवार देण्याचे ठरवले आणि म्हणूनच शैलेश टिळक यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र, यातून आता ब्राम्हण समाजच भाजपवर नाराज झाला आहे.

शरद पवारही इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे चाहते; म्हणाले, 'इंदुरीकराचं कीर्तन

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडच्या स्टँडिंग आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कपात तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली होती. तर आता या पोटनिवडणुकीत टिळकांचे तिकीट कपात ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप भाजपवर केला जात आहे. दुसरीकडे आजारी असलेले भाजप खासदार गिरीश बापट यांनाही डावलून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप नवीन चेहरा देण्याचा तयारीत असल्याने असे बॅनर कसब्यात लागले आहेत.

आजारी असतानाही राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुक्ता टिळक मतदानाला मुंबईत आल्या होत्या. रुग्णवाहिकेतून त्या आल्या होत्या. पक्षासाठी एवढी निष्ठा दाखवूनही त्यांच्या कुटुंबीयांना का डावलले गेले आहे? असा प्रश्न कसब्यात विचारला जात आहे. यावरूनच शैलेश टिळक यांनी उघड नाराजी बोलून दाखवली होती.

ब्राम्हण महासंघाची भाजपवर टीका

जगताप कुटुंबाला न्याय आणि टिळक कुटुंबावर अन्याय आधी मेधा ताई, नंतर देवेंद्रजी आणि आत्ता टिळक कुटुंबीय यांना संधी नाकारण म्हणजेच भाजपला काही जातींची केवळ मते हवी असतात त्या जाती नकोच असतात, अशी टीका ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे.

पक्षाचे काम करणे हे जेव्हा हेटाळणीचे असायचे, लोक चिडवायचे तेव्हा ज्यांनी पक्ष वाढवला आज त्यांनाच खड्ड्यात ढकलले जात आहे. खुल्या प्रवर्गाचा आवाज दाबण्याचा आज पुन्हा प्रयत्न झाला आहे. सर्वच जातींना योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असेही आनंद दवे म्हणाले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात काँग्रेसची डोकेदुखी वाढली; कसब्यात बंडखोरीची भीती तर मोठा नेता भाजपच्या वाटेवर?

$
0
0

पुणे: आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आज भाजपकडून हेमंत रासने उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याचे चित्र आहे. रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने ग्रीन सिग्नल दिल्याने नाराज झालेले काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर हे बंडखोरी करण्याचा तयारीत आहेत.

कसब्यात पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जाहीर केली असली तरी उमेदवारी मात्र अधिकृतरीत्या जाहीर केली नाही. मात्र, रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना काँग्रेस पक्ष नेतृत्वाने दिल्या आहेत. धंगेकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामुळेच काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर नाराज झाले असून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

मनसेमधून काँग्रेसवासी झालेल्या रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिल्याने दाभेकर नाराज आहेत. बाळासाहेब दाभेकर यांनी निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या उमेदवारांना तिकीट दिल्यास बंडखोरी करणार असल्याचे आव्हान दिले आहे. तर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

वाचाः तुम्हीदेखील घराबाहेर चावी लपवून ठेवताय?; पुण्यात घडलेली ही धक्कादायक घटना एकदा वाचाच

तर दुसरीकडे माजीमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. काल काँग्रेस भवन येथे झालेल्या कार्यक्रमात माजी नगरसेवक रशीद शेख यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिल्याने अविनाश बागवे नाराज आहेत. त्यांना पक्ष प्रवेश नको होता. तस त्यांनी पक्ष नेतृत्वाला कळवले देखील होते.

रशीद शेख यांना पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नका असा अविनाश बागवे यांचा आग्रह होता. पक्ष नेतृत्वाने बागवे यांना तसा विश्वास देखील दिला होता. मात्र अखेर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रशीद शेख यांना प्रवेश दिल्याने बागवे नाराज आहेत. त्यामुळे रविवारी दिवसभर काँग्रेस भवन येथे नेत्यांची रेलचेल असताना देखील बागवे इकडे फिरकले देखील नाहीत. दुसरीकडे यामुळे नाराज झालेले अविनाश बागवे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

वाचाः लहान असतानाच आईच्या मायेला पोरकी, १३ वर्षांची होताच बापाने केला वारंवार अत्याचार, अखेर...

तिकडे नगरमध्ये आधीच काँग्रेसला सत्यजित तांबे यांच्या बंडानंतर धक्के बसत असताना काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या सोबत काम करणे शक्य नसल्याचे पत्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठीना लिहले आहे. त्यामुळे आधीच काँग्रेस संकटात असताना पुण्यात देखील नाराजीनाट्य सुरु झाल्याने काँग्रेसच्या अडचणीत भर पडली आहे.

वाचाः VIDEO: सलग दोन भूकंपांनी तुर्की हादरले; ७.८ रिश्टर स्केलची तीव्रता, अनेक इमारती जमिनदोस्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणधुमाळीला आज प्रारंभ; कसबा, चिंचवड अर्ज भरण्यासाठी होणार शक्तिप्रदर्शन

$
0
0

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचे रणशिंग आज, सोमवारी शक्तिप्रदर्शनाद्वारे फुंकले जाणार आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने येतील. आपापल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचे दर्शन घेऊन मिरवणुकीद्वारे दोन्ही उमेदवार आपले अर्ज दाखल करतील. त्यामुळे या निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.

या निवडणुकीसाठी मंगळवार, सात फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. भारतीय जनता पक्षाने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस ही जागा लढविणार असून, उमेदवाराच्या नावाची घोषणा रविवारी रात्रीपर्यंत करण्यात आलेली नव्हती. मात्र, काँग्रेसचा उमेदवार सोमवारी सकाळी अर्ज भरेल, असे काँग्रेसतर्फे अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.

रासने यांचा अर्ज भरण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमोद उर्फ नाना भानगिरे, रिपब्लिकन पक्षाचे शैलेंद्र चव्हाण यांच्यासह शहरातील प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता कसबा गणपतीचे दर्शन घेऊन तेथून मिरवणुकीने रासने अर्ज दाखल करण्यासाठी जातील.

धंगेकर यांचे नाव आघाडीवर

काँग्रेसतर्फे उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नसली, तरी माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहतील. सकाळी पावणेदहा वाजता कसबा गणपतीचे दर्शन घेऊन काँग्रेसची मिरवणूक सुरू होणार आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत.

आम आदमी पक्षही रिंगणात

आम आदमी पक्षानेही कसब्याच्या रणधुमाळीत उडी घेतली आहे. पक्षातर्फे ही पोटनिवडणूक लढविण्यात येणार आहे. यासाठी पक्षाचे राज्य संघटक विजय कुंभार आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी गोपाळ इटालिया यांनी नऊ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. सोमवारी सायंकाळी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल, असे कुंभार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा पेठ पोटनिवडणुकीत 'मविआ'चा उमेदवार जाहीर, 'जायंट किलर'चं नाव ऐकून भाजपचं टेन्शन वाढलं!

$
0
0

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राजकीय धुरळा उडणार आहे आणि राजकारण रंगणार आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे एकीकडे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीनेही मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीने रासने यांच्याविरोधात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरले आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आज भाजपतर्फे हेमंत रासने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, काँग्रेसतर्फे ही निवडणूक कोण लढवणार याचा निर्णय होत नव्हता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जाहीर केली होती. पण उमेदवार जाहीर केला नव्हता. काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत होती. तर जेष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी न मिळाल्यास आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर मोठ्या खलबतांनंतर नाना पटोले यांनी ट्विट करत रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचं जाहीर केलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सकाळी काही वेळापूर्वीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. 'पुणे जिल्ह्यातील कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे', असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे.

काँग्रेसतर्फे तब्बल १६ जण इच्छुक होते. त्यात रवींद्र धंगेकर, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, जेष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर, माजी महापौर कमल व्यवहारे यांचे नावं आघाडीवर होते. मात्र शनिवारी भाजपने हेमंत रासने यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्याच तोडीचा उमेदवार देण्यासाठी काँग्रेसमध्ये मोठे खलबतं झाली. नाना पटोले यासाठी दोन दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून होते. अखेर आज ट्विट करत पटोले यांनी धंगेकर यांच्या नावर शिक्कामोर्तब केले आहे.

तत्पूर्वी उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर होण्याआधीच धंगेकर यांना पक्ष नेतृत्वाने अर्ज भरण्यासाठी तयारी करण्याचा सूचना दिल्या होत्या. रवींद्र धंगेकर यांनी आज सकाळीच मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी दाखल होत टिळक कुटुंबीयांची भेट घेतली होती.

कोण आहेत रवींद्र धंगेकर?

पूर्वाश्रमीचे मनसेचे बडे नेते राहिलेले धंगेकर यांची राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख होती. मनसेमध्ये असताना त्यांनी अनेक पदावर कामे केली आहेत. मात्र मनसेच्या अंतर्गत वादातून त्यांनी जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आपल्या राजकीय करिअरच्या सुरवातीला शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून दहा वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहिले आहे. भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून धंगेकर यांची ओळख आहे.

२००९ मध्ये मनसे तर्फे कसब्यातून विधानसभा निवडणूक लढवत असताना धंगेकर यांनी बापटांना अक्षरशः घाम फोडला होता. त्यावेळी त्यांचा अवघ्या ७ हजार मतांनी पराभव झाला होता. २०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीची राज्यात लाट असतानाही धंगेकर यांनी आव्हान दिले होते.

कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का?, कसब्यातील बॅनर

शरद पवारांची घेतली होती भेट

महाविकास आघाडी पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची काल भेट घेतली होती. कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या तोंडावर इच्छुक उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. माझं आजोळ आणि घर हे बारामती असल्यामुळे आम्ही नेहेमी पवार साहेबांची भेट घेत असतो, असं भेटीनंतर रवींद्र धंगेकर यांनी रविवारी सांगितलं होतं.

शिंदे-फडणवीस सरकारची ७ महिन्यांत कोट्यवधींची उधळपट्टी! दिवसाला जवळपास २० लाख खर्च



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेचा निर्णय; वर्तमानपत्रासह विविध सोशल मीडियावर थकबाकीदारांची नावे होणार जाहीर

$
0
0

पिंपरी : शहरात ज्या मालमत्ताधारकांकडे चार वर्षांपेक्षा जास्त काळापासून मूळ कराची थकबाकी एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा मालमत्ताधारकांची नावे पुढील आठवड्यापासून वर्तमानपत्रासह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केली जाणार आहेत. या थकबाकीदारांमध्ये केवळ निवासी मालमत्ताधारक नव्हे, तर विविध कंपनी, संस्था, व्यावसायिक आदींचा समावेश आहे. शहरात चार वर्षांपासून थकबाकी असणाऱ्या मालमत्तांची संख्या एक लाख १८६ असून, त्यांच्याकडे एकूण ३०५ कोटी ६९ लाख ७५ हजार रुपयांची थकबाकी आहे.

महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने यंदाच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता करवसुलीचे १००० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून म्हणजेच एक एप्रिल २०२२पासून आतापर्यंत ६०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. त्यातच आता या आर्थिक वर्षातील मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे करआकारणी व करसंकलन विभागाने थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

करसंकलन विभागाने वारंवार नोटीस देऊनही कर भरत नसलेल्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वांत प्रथम प्रामुख्याने ज्यांच्याकडे चार वर्षांपासून मूळ मालमत्ताकराची थकबाकी एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा मालमत्ताधारकांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यातही प्रथम बिगर निवासी मालमत्ताधारक म्हणजेच औद्योगिक, व्यावसायिक आदी प्रकारच्या मालमत्ताधारकांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मालमत्ताधारकांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
-----------------------
गेल्या चार वर्षांपासून थकबाकीदार असणाऱ्यांची संख्या

मालमत्तेचा प्रकार मालमत्ताधारकांची संख्या एकूण थकीत रक्कम

निवासी ८४ हजार ५५७ १६८ कोटी ४८ लाख ८,१४३

बिगर निवासी १२ हजार ९७३ ८७ कोटी ७८ हजार ४२७

औद्योगिक ३९२ १० कोटी ५७ लाख ६७ हजार ३३९

मोकळा भूखंड दोन हजार २२२ ३९ कोटी ५४ लाख १६,८२९
-------------------------
महापालिकेचा करआकारणी व करसंकलन विभाग मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खूपच परिश्रम घेत आहे. थकबाकीदारांना नोटीस देणे, जप्ती करणे अशी कार्यवाही करण्यात येत आहे; परंतु मनुष्यबळाची मर्यादा पाहता प्रत्येक ठिकाणी जप्तीची कारवाही करणे शक्य नाही. त्यामुळे चार वर्षांपासून मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, करआकारणी व करसंकलन विभाग
-------------------------
महापालिकेचे आर्थिक वर्ष २०२२-२३ चे मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट १००० कोटींचे आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करआकारणी व करसंकलन विभागाचे अधिकारी-कर्मचारी प्रयत्नशील आहेत; पण वारंवार नोटीस देऊनही काही मालमत्ताधारक मालमत्ता कर भरत नसल्यामुळे महापालिकेला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Pune : बनावट नियुक्तीपत्र देणाऱ्या टोळीला अटक; रेल्वेप्रशासनाच्या नावाने फसवणूकीचा प्रकार

$
0
0

पुणे : रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून आणि नियुक्तीची बनावट पत्रे देऊन दहा जणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश संतराम माने, नीलेश संतराम माने (रा. ताडीवाला रस्ता) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

अशी आहे घटना

या प्रकरणी एका व्यक्तीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि संशयित आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाइकांना पुणे रेल्वेच्या ‘रेल्वे मेल सर्व्हिस’ (आरएमएस) विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांनी दहा जणांकडून दहा लाख ८१ हजार रुपये घेतले. काही दिवसांनंतर आरोपींनी संबंधितांना भारतीय रेल्वेची मुद्रा असलेले ‘आरएमएस’ विभागातील नोकरीचे बनावट स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र दिले. तक्रारादारसह सर्व दहा व्यक्ती नियुक्तीपत्र घेऊन रेल्वे प्रशासनाकडे गेल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दरम्यान, अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड यांना या प्रकरणातील दोन संशयित आरोपी पुणे रेल्वे स्थानकाच्या पार्सल गेट येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहायक निरीक्षक शैलजा जानकर यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने पार्सल गेट सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून बँकेचे चार चेकबुक, पाच बँकांचे पासबुक, सेंट्रल रेल्वेची बनावट नियुक्तीपत्रे, दोन मोबाइल, रेल्वेचे बनावट ओळखपत्र असा ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या बालेकिल्ल्यात रासनेंसमोर कडवे आव्हान, कसब्याचा इतिहास धंगेकर बदलणार? वाचा ग्राउंड रिपोर्ट

$
0
0

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या तीस वर्षांपासून कसबा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अशात ही जागा राखण्याचे मोठे आव्हान रासने यांच्यासमोर असणार आहे. कारण त्यांच्यासमोर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचे कडवे आव्हान आहे.

२००२, २०१२, २०१७ मध्ये पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून तर, २०१९-२० ते २०२१-२२ सलग चार वेळा पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलेले हेमंत रासने यांच्यावर भाजपने कसब्याचा गड राखण्याची जबाबदारी सोपवली आहे. गणेश मंडळ कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असणाऱ्या रासने यांना कसब्यातून उमेदवारी देताना भाजपने लोकांतील कार्यकर्ता हाच निकष ठेऊन उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, कसबा विधानसभा मतदारसंघातील तगडा जनसंपर्क हाच मुख्य निकष ग्राह्य धरत काँग्रेसने धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.

रवींद्र धंगेकर यांनी याआधी २००९ आणि २०१४ मध्ये मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. २००९ मध्ये रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या गिरीश बापट यांना कडवी झुंज दिली होती. या निवडणुकीत धंगेकर यांना ४६ हजार ८२० इतकी मते मिळाली होती. तर गिरीश बापट यांचा ५४ हजार ९८२ इतकी मते मिळून विजय झाला होता. तर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत कसब्यातून धंगेकर यांना २५ हजार ९९८ इतकी मते मिळाली होती. त्यामुळे गिरीश बापट यांना कडवी झुंज देणारे रवींद्र धंगेकर यांची पुण्यात 'जायंट किलर' अशी ओळख बनली होती.

आता गिरीश बापट यांनी २५ वर्षे कसब्याचे प्रतिनिधित्व केले आणि मुक्ता टिळक यांनी २०१९ पासून कसब्याची धुरा सांभाळली होती. त्यामुळे कसबा भाजपचा बालेकिल्ला मनाला जातो. अशात काँग्रेसकडे गमवण्यासारखे काहीच नाहीये. तर भाजपने मात्र, ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत 'मविआ'चा उमेदवार जाहीर, 'जायंट किलर'चे नाव ऐकून भाजपचं टेन्शन वाढलं!

भाजपला अंतर्गत नाराजीचा फटका

भाजपला या पोटनिवडणुकीत अंतर्गत नाराजीचा फटका बसू शकतो. भाजपकडून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, धीरज घाटे, गणेश बिडकर हे इच्छुक होते. मात्र, भाजपने रासने यांच्यावर विश्वास दाखवला आहे. दुसरीकडे, भाजपने कसब्यातून ब्राह्मण समाजाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी होत होती. पण रासने यांची वर्णी लागल्याने भाजपचा पारंपरिक मतदार मनाला जाणारा ब्राह्मण समाज नाराज झाल्याचे चित्र आहे. अशा आशयाचे बॅनरही कसब्यात लागले आहेत.

दुसरीकडे, रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे अनेक स्थानिक नेते गैरहजर राहिल्याने पक्षांतर्गत उघड नाराजी दिसत आहे. तर शैलेश टिळक हे देखील नाराज असल्याने याचा फटका भाजपला बसू शकतो.

शिंदे-फडणवीस सरकारची ७ महिन्यांत कोट्यवधींची उधळपट्टी! दिवसाला जवळपास २० लाख खर्च

हेमंत रासने यांना गिरीश बापट यांचा कार्यकर्ता म्हणून पाहिले जाते. उमेदवारी देताना बापट यांच्या मताचा विचार केला गेला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रासने यांच्या मागे बापटांची ताकद उभी आहे. पर्यायाने रासने यांना याचा फायदा होणार असला तरी धंगेकर यांच्या मागेही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद असल्याने कसब्यात जोरदार लढत होणार हे नक्की.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट





Latest Images