‘सामाजिक चळवळींची स्थिती ढाळसण्याला आर्थिक व सामाजिक कारणे जबाबदार आहेत. जागतिकीकरणामुळे आपली मानसिकता अर्थकेंद्री झाली. त्यामुळे जनता आंदोलनापासून दूर गेली,’ असे असे मत ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी गुरूवारी व्यक्त केले. ‘आज जातींचे अस्तित्व मजबूत होत असून त्यामागे सत्ताकारण आणि अर्थकारणच कारणीभूत आहे,’ असेही डॉ. कोत्तापल्ले म्हणाले.
↧