सणासुदीच्या काळात शहरातील रिक्षावाल्यांनी प्रवाशांची अडवणूक सुरू केली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणारे प्रवासी रिक्षावाल्यांच्या ‘मनमानी’चे बळी ठरत असून, महिन्याकाठी ६० तक्रारी ‘आरटीओ’कडे येत आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी भाडे नाकारण्याच्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत सुमारे सव्वाचारशे तक्रारी आल्या आहेत.
↧