पाषाण फ्लॅट परिसरातील ओढा प्रशासनाने पाइप टाकून बुजवला आहे. ओढा बुजवण्याचा प्रकार हा अवैध असला तरी प्रशासनाने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ओढा बुजवल्याचे सांगण्यात येत आहे.
ओढे बुजविल्याने यंदाही पूरस्थितीचा धोका
↧
↧
टेकडी दरबारातदेखील बीडीपीबाबत मौन
शहरातील टेकड्या आणि वनश्रीसंदर्भात अतिशय कळीचा मुद्दा ठरलेल्या जैव विविधता अहवालासंदर्भात (बीडीपी) केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘टेकडी दरबारात’देखील मौन राखणेच पसंत केले.
↧
लोहगाव विमानतळावर विमान अपघात टळला
दिल्लीहून पुण्याला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे लोहगाव विमानतळावर उतरताना टायर फुटले. मात्र, विमानाचे लँडिंग व्यवस्थित झाल्याने संभाव्य अपघात टळला. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
↧
चारधाम यात्रांचे नियोजन नाहीच
उत्तराखंडमधील रौद्रावताराचा गेल्या वर्षी अनुभव घेतल्याने पुण्यातील बहुतांश पर्यटन कंपन्यांनी यंदा मे, जून आणि जुलैमधील यात्रांचे नियोजन ‘होल्ड’वर ठेवले आहे.
↧
त्रास नाही, पण बोलक्या खुणा अनुभवल्या
‘उत्तराखंडमध्ये महापूर येऊन वर्ष उलटले तरी तेथील इमारती, रस्त्यांवरील खुणा आजही निसर्गाने घेतलेल्या रौद्रावताराचे अनुभव सांगत आहेत. केदारनाथ मंदिराकडे जाताना गेल्या वर्षी भाविक किती भयानक प्रसंगाला सामोरे गेले होते, हे प्रचिती प्रत्येक पावलाला जाणवत होती.
↧
↧
विविध कोट्यांचे प्रवेश पहिल्या चार दिवसांत
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान कॉलेजपातळीवरील प्रवेशांसाठीच्या विविध कोट्यांचे प्रवेश पहिल्या चार दिवसांमध्येच करण्याच्या सूचना अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने शहरातील कॉलेजांना दिल्या आहेत.
↧
मान्सून दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात
सर्वांनाच प्रतीक्षा असलेला मान्सून येत्या दोन दिवसांत उर्वरित कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हजेरी लावण्याची शक्यता आहे. मध्य पूर्व अरबी समुद्रातील ‘नानौक’ चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रगती रोखली गेली होती.
↧
‘पालिकेचे केंद्राकडे प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणार’
‘महापालिकेचे केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न राहणार असून, शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन भूमिका घेण्याची गरज आहे,’ असे केंद्रीय माहिती प्रसारण व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी सांगितले.
↧
‘लिची’च्या फळांची आवक पूर्णपणे बंद
‘लिची’ फळे खाल्ल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तीन ते पाच वयोगटातील मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर पुण्याच्या बाजारपेठेत होणारी ‘लिची’च्या फळांची आवक पूर्णपणे बंद झाली आहे.
↧
↧
इमारतींमधील ट्रान्सफॉर्मर धोकादायक
टिळकरोड परिसरात ट्रान्सफॉर्मरच्या आगीमुळे इमारतींमध्ये लावण्यात येणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचा धोका पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये नियम धाब्यावर बसवून, असे ट्रान्सफॉर्मस निवासी इमारतींमध्ये लावल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
↧
शिक्षणातील दुकानदारीत नेते शामिल
भ्रष्टाचाराने बरबटलेले शिक्षणमंडळ बरखास्त करावे, अशा स्पष्ट सूचना कोर्टाने दिलेल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षणमंडळाला मुदतवाढ देत मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंडळाच्या दुकानदारीला आशीर्वादच दिला आहे.
↧
खासगी विद्यापीठांना मान्यता
आरक्षणासह अनेक वादांमुळे रखडलेल्या खासगी विद्यापीठांच्या प्रस्तावांवर राज्य सरकारच्या मंजुरीची अखेर मोहोर उमटली आहे. यामुळे राज्यात परदेशी विद्यापीठे स्थापन होण्याचा मार्गदेखील मोकळा झाला.
↧
इतिहासाला जेव्हा जाग येते...
क्रांतिकारकांचे एक एक करून घेतले जाणारे नाव... सभागृहात होणारा टाळ्यांचा गजर... त्यांच्या पराक्रमाचा सांगितला जाणारा इतिहास.. स्वाभाविकपणे अंगावर उभे राहणारे रोमांच.. ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘वंदे मातरम्’च्या घुमलेल्या घोषणा...
↧
↧
शाळांमध्येही सेवा आयोग परीक्षा
स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढविण्यासाठी आता शालेय पातळीपासूनच प्रयत्न केले जाणार आहेत. यंदापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर शालेय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठीची पूर्वतयारीही पूर्ण झाली आहे.
↧
कल्पकतेचा शिल्पकार...
गिफ्ट आलेले शोपीस, मेटलच्या टाकाऊ वस्तू, फायबर या गोष्टींतून एखादी सुंदर कलाकृती साकारणं एखाद्या हाडाच्या शिल्पकारासाठी फारसं अवघड नाहीच, पण या माध्यमातून ‘झाडं वाचवा’ हा संदेश देण्यासाठी हवी कल्पकता आणि संवेदनशीलताही.
↧
स्वागतासाठी अलंकापुरी सज्ज
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी अलंकापुरी सज्ज झाली आहे. येथे तयारीच्या कामांना आता वेग येऊ लागला आहे.
↧
अकरावी प्रवेशाची तयारी आजपासून
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारपासून शहरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियाही सुरू होणार आहे.
↧
↧
अकरावी प्रवेश: पंतप्रधान मोदींना साकडे
शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांविरोधात पालकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच धाव घेतली आहे. पालक वैशाली बाफना यांनी आपल्या पाल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मोदी यांच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून त्यांच्याकडे नुकतीच एक तक्रार केली.
↧
प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज करणाऱ्यांवर कारवाई
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या वेळी बाजारपेठेत येणाऱ्या प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वज तयार करणाऱ्या उत्पादकांवर कारवाई केली जाणार आहे.
↧
दाखले मिळणार दहा दिवसांत
विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले दाखले देण्यासाठी यापूर्वी दिलेली वीस दिवसांची मुदत कमी करण्यात येत असून, आता हे दाखले दहा दिवसांमध्ये देण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नागरी सुविधा केंद्रात या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
↧
More Pages to Explore .....