पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारतर्फे आयोजित ११ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) उद्घाटन सोहळ्यात जितेंद्र आणि रमेश देव यांना चित्रपट क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन्मानित केले जाणार आहे.
जितेंद्र, रमेश देव यांना ‘पिफ’चा विशेष सन्मान
↧
↧
टेक्नॉलॉजीचा ‘टी’ टाइपरायटरऐवजी कम्प्युटरवर
टाइपरायटरच्या कमी होत चाललेल्या वापराची दखल घेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेही टायपिंगच्या परीक्षेचे स्वरूप बदलून टेक्नॉलॉजीचा ‘टी’ कम्प्युटरवर टाइप करायचे ठरवले आहे! पुढील वर्षीपासून टंकलेखनाऐवजी कम्प्युटर टायपिंगची परीक्षा घ्यावी, असा प्रस्ताव परिषद तयार करत आहे.
↧
कुस्तीच्या उधळपट्टीला दादांचा पाठिंबा
‘महापौर चषक कुस्ती स्पर्धेवर तीन तासांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असल्याची टीका निरर्थक असून, टीका करणा-यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेकडून कुस्तीवर झालेल्या उधळपट्टीला उघडपणे पाठिंबा दिला. राज्याच्या येत्या बजेटमध्ये कुस्तीसाठी अधिक अनुदानाची तरतूद करण्याची घोषणाही त्यांनी केली.
↧
वीस हजार रिक्षा सीएनजीविनाच
पुण्यातील नव्या रिक्षांना ‘सीएनजी’ची सक्ती केली. ती लागूही झाली. मात्र, जुन्या रिक्षांबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सुमारे वीस हजारांहून अधिक जुन्या रिक्षा ‘सीएनजी’विनाच रस्त्यावर धावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, प्रदूषण रोखण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नात जुन्या रिक्षा अडथळा ठरत आहेत.
↧
शिक्षकांच्या ‘इलेक्शन ड्युटी’वर हल्लाबोल
‘इलेक्शन ड्युटी’ लादण्यात आल्यामुळे शहर व परिसरातील बहुतांश मराठी माध्यमाच्या शाळांचे कामकाज ठप्प झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या सक्तीच्या ‘इलेक्शन ड्युटी’वर हल्लाबोल केला आहे. वीसहून अधिक शाळांमधील शेकडो विद्यार्थी व पालकांना सहभागी करून घेत मनसेतर्फे शुक्रवारी शहरभर निदर्शने करण्यात आली. तसेच, शनिवारी (ता. ५) शाळा बंदची हाक देण्यात आली आहे.
↧
↧
खासगी शाळांना पुनर्परवानगी आवश्यक
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) सर्व खासगी शाळांनी मार्चअखेरपर्यंत पुनर्परवानगी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने शुक्रवारी दिले. वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के आरक्षण देण्याच्या तरतुदीचेही पालन सर्व शाळांनी करावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
↧
विद्यापीठाने निकाल चुकविले; तपासनीस मात्र सुटले!
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने गुणांची फेरमोजणी आणि उत्तरपत्रिकांच्या पुनर्मुल्यांकनासाठी आलेल्या अर्जांमधून निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या गेल्या पाच वर्षांमध्ये दुप्पटीने वाढली आहे. पुनर्मुल्यांकनात बदललेल्या निकालांचा आकडा लक्षणीय असला, तरी त्यासाठी जबाबदार असलेल्या एकाही तपासनिसावर अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. माहिती अधिकाराखाली विद्यापीठाने दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.
↧
‘पत्रकारितेचे बदलते स्वरूप ही समस्या’
पत्रकारितेवरील वाचकांचा विश्वास उडत चालला असून पत्रकारितेचे बदलते स्वरूप ही समस्या बनत आहे, अशी खंत आऊटलूक समूहाचे संपादकीय अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार विनोद मेहता यांनी व्यक्त केली. केसरी मराठी ट्रस्टच्यावतीने मेहता यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
↧
येवलेवाडीही पुण्याच्या हद्दीत
कोंढव्याजवळील येवलेवाडीचा समावेश महानगरपालिकेच्या हद्दीत करण्यात यावा, अशा सूचना राज्य सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्या आहेत. यामुळे येवलेवाडीच्या समावेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.
↧
↧
सॉफ्टवेअर इंजिनीअर महिलेची आत्महत्या
येरवडा येथील ‘आयबीएम’ कंपनीतील ३८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर महिलेने कंपनीच्या सातव्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. अर्चना संदीप दसार (वय ३८, रा. वानवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
↧
पोलिसाच्या घरातच चोरी
शहरात वाढत असलेल्या घरफोड्यांच्या घटना सर्वांची डोकेदुखी ठरत असताना, चोरट्यांनी थेट पोलिसाच्या घरीच एक लाख रुपयांची चोरी केली आहे. हा प्रकार भोसरीत घडला. अतुल नंदकिशोर ढमढेरे (वय २४, रा. पोलिस वसाहत, इंद्रायणीनगर) हे मंगळवारी रात्री कामानिमित्त घराला कुलुप लावून बाहेर गेले होते.
↧
काळ्या बाजाराला लगाम ‘एसएमएस’चा
सरकारी गोदामातून निघालेल्या अन्नधान्याची माहिती देणारी एसएमएस योजना शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय अन्नधान्य गोदामातून धान्य घेऊन निघालेल्या ट्रकची माहिती गावातील पंचवीस व्यक्तींना ‘एसएमएस’ द्वारे मिळेल. रेशन दुकानदारांकडून होणा-या काळ्या बाजाराला यामुळे आळा बसणार आहे.
↧
पाकबरोबरच चीनकडेही हवे बारकाईने लक्ष
‘आपण शेजारील राष्ट्र म्हणून कायम पाकिस्तानकडेच अधिक लक्ष दिले. चीनचा आपण कधीच गांभीर्याने विचार केला नाही. पाकिस्तानबरोबरच चीनकडेही बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे,’ असे मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी गुरुवारी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र (आयएलसी) आणि भारती विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण सोशल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरतर्फे आयोजित ‘यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी’ व्याख्यानात ते बोलत होते.
↧
↧
थंडीचा कडाका वाढणार
शहर आणि परिसरात शुक्रवारी किमान तापमानात घट होऊन पारा १२.१ अंशांवर स्थिरावला. पुढील दोन दिवसांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
↧
दहशतवादापेक्षाही अपघातांचे आव्हान मोठे
कोणत्याही दहशतवादी हल्ल्यांपेक्षा जास्त जीवितहानी रस्ते अपघातांमधून होत असते. दरवर्षी या अपघातांमध्ये देशभरात हजारो लोक मरण पावतात आणि यामध्ये देशाची तरूण पिढीचेच प्राण जात आहेत, हा चिंतेचा विषय आहे, असे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले.
↧
नशिबाचे तारू अखेर किना-यावर...
सातत्याने समुद्रावरचा प्रवास, कमी लाइट आणि शीतकरण केलेले अन्न खाऊन आलेले आजारपण... आणि त्यातच करार संपल्यावरही केवळ कंपनीच्या थकबाकीमुळे त्याच्यासह १३ जणांना पुढचे दोन महिने जहाजावरच काढावे लागले. कोथरूडमधील मंगेश पालकर या मरीन इंजिनीअरवर गुदरलेला हा प्रसंग. मंगेश सात महिन्यांपूर्वी प्रतिभा शिपिंग कंपनीशी केलेल्या करारानुसार चार महिन्यांसाठी जहाजावर सेकंड ऑफिसर म्हणून रुजू झाला.
↧
वाहतूक सल्लागार बैठकीत समस्यांचा पाढा
पादचा-यांना रस्ता ओलांडण्यासाठी व्यवस्था नाही, बऱ्याच चौकातील झेब्रा क्रॉसिंग गायब झालेले आहेत, फुटपाथची अवस्था खराब आहे... आदी अनेक समस्यांचा पाढा सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी पोलिसांनी आयोजित केलेल्या वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत वाचला.पादचा-यांच्या सुरक्षेला सर्वप्रथम प्राधान्य द्यायला हवे, असे पुण्याचे सहपोलिस आयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी या वेळी स्पष्ट केले.
↧
↧
टिंगलखोरांपासून अखेर सुटका
गरवारे कॉलेजच्या असेंब्ली हॉलजवळ काही टिंगलखोर मुले त्रास देत आहेत. प्लीज तुम्ही लवकर या... ... कॉलेजमधून एक मुलगी पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार देते. पोलिसांच्या वायरलेस यंत्रणेवरून त्याची माहिती बीट मार्शलला मिळते. कर्वे रोडवरील सायंकाळच्या गर्दीतूनही मार्ग काढत दोन बंदूकधारी पोलिस अवघ्या दहा-बारा मिनिटांत तिथे पोहोचतात.
↧
श्रेयाचा वाद ‘चव बिघडवणारा’
एखादे नाटक गाजले, की त्याचे श्रेय कुणाचे यावरून होणाऱ्या वादातून व्यावसायिक नुकसान होते. ‘मोठं कोण’ या वादातून संबंधितांनी नाटक या पदार्थाची चव बिघडवू नये, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
↧
हरविलेले पाकीट सुखरुपपणे हातात
रस्त्यावर सापडलेले पैशाचे पाकिट डॉक्टर आणि पोलिस कर्मचा-यांनी सुखरुप मालकाकडे पोहचविले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नितीन शहा यांचे पैशाचे पाकिट रस्त्यावर पडले होते. डॉ. प्रसाद वाळिंबे यांना हे पाकीट सापडले.
↧
More Pages to Explore .....