Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शौचालये पाडण्यासाठी चेक लिस्ट

$
0
0

आयुक्तांचा निर्णय; सार्वजनिक शौचालये पाडण्याबाबत प्रशासनावर टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सार्वजनिक शौचालये पाडण्याच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी धोरण ठरविणार असून, त्यासाठी एक ‘चेकलिस्ट’ तयार करणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले. दरम्यान, शहरातील सार्वजनिक शौचालये पाडण्यासाठी विविध कारणे पुढे करण्यात येत असून प्रशासनाही याबाबत ठोस भूमिका घेत नसल्याबाबत सर्वसाधारण सभेत यावर जोरदार टीका करण्यात आली.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजूर करत असताना त्यातील काही प्रस्तावांमध्ये सार्वजनिक शौचालयांसाठी आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली होती. हा धागा पकडून शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी सुलभ शौचालये नव्याने बांधायची असतील, तर त्यासाठी बांधकाम विभागाची परवानगी आवश्यकता आहे का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावरून सुरू झालेली चर्चा सार्वजनिक शौचालये पाडण्यापर्यंत जाऊन पोहोचली.
भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी त्यांच्या प्रभागातील आंबिल ओढा परिसरात सुरू असलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन योजनेद्वारे (एसआरए) बांधकाम सुरू असून या विकसकाने तेथील सार्वजनिक शौचालये पाडल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने नाराजी व्यक्त केली. एकीकडे फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना एका छताखाली दोन-दोन शौचालये आहेत तर दुसरीकडे ४० घरांपाठीमागे केवळ एकच शौचालय असल्याची विषमता पाहावयास मिळत आहे. या विकसकाने शौचालये बेकायदा पाडली असून त्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता धनकवडे यांनी ‘महिला बालकल्याण समितीपुढे सार्वजनिक शौचालये पाडण्याचे ६१ प्रस्ताव प्रलंबित आहेत. कुठलेही कारण सांगून सार्वजनिक शौचालये पाडण्याचा सपाटा लावण्यात आला आहे,’ अशा शब्दांत टीका केली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, अविनाश बागवे, भय्यासाहेब जाधव, दिलीप वेडेपाटील, अनिता कदम या नगरसेवकांनीही यावर चर्चा केली.
‘अधिकारी गैरहजर’
महिला बालकल्याण ​समितीच्या अध्यक्षा राणी भोसले यांनी महिला बालकल्याण समितीसमोर शौचालये पाडण्यात येत असल्याच्या प्रस्तावांचा समाचार घेतला. ‘या प्रस्तावांवर प्रशासनाचा अभिप्राय मागितला तर काही नागरिक या शौचालयांचा वापर करत असून ते पाडण्याचीही गरज आहे, असा अस्पष्ट अहवाल देतात. समितीच्या बैठकीला मागणी करूनही एकदाही अतिरिक्त आयुक्त उपस्थित राहत नाही,’ अशी टीका त्यांनी केली. यावर महापौरांनी आयुक्तांना आदेश देऊन अतिरिक्त आयुक्तांना या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले. ‘एवढ्या महत्त्वाच्या समितीला अधिकारी किंमत देत नसतील तर त्याला काही अर्थ नाही आणि शौचालये पाडण्याबाबत सुस्पष्ट अहवाल देण्यात यावा,’ असे महापौरांनी सांगितले.
...
धोरण ठरविणार - आयुक्त
घाटे यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून संबंधित विकसकाकडून मालमत्तेची ‘रिकव्हरी’ करण्यात येईल असे सांगितले. शौचालये पाडण्याच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी धोरण ठरविणार येईल. त्यासाठी एक चेकलिस्ट तयार करण्यात येईल. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून या बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.
000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विरोधकांनी वाजवले सभागृहात ढोल

$
0
0

भारतीय जनता पक्ष (भाजप) स्वप्रसिद्धीचे ढोल वाजवत असल्याचा आरोप करत त्याचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी सभागृहात ढोल वाजवून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. महापालिका प्रशासन केवळ गणेशोत्सवातील ‘इव्हेंट’ करण्यात मग्न असून महापालिकेतील कामकाज होत नसल्याचा आरोप विरोधकांनी सभागृहात केला.
महापालिकेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करत असून, त्याद्वारे स्वप्रसिद्धीचे ढोल वाजवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर टीका करण्यासाठी विरोधकांनी सर्वसाधारण सभेत ढोल घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना ढोल घेऊन सभागृहात घुसण्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. त्यानंतर सभागृहात प्रातिनिधिक वादन करून विरोधकांनी आंदोलन केले. काँग्रेसचे गटनेते अरविंद​ शिंदे, शिवसेनेचे संजय भोसले आणि मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी या प्रसंगी जोरदार भाषण करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यानंतर हे आंदोलन संपले आणि सभा कामकाज पार पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निविदांमधून ‘जीएसटी’ची वसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकारने १ जुलैपासून वस्तू आणि सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विकासकामांसाठी पालिकेने काढलेल्या निविदांमध्ये जीएसटी वसूल करण्यात येणार आहे. तसेच २२ ऑगस्ट पूर्वी काढलेल्या मात्र अद्यापही काम सुरू न झालेल्या सर्व निविदा रद्द करून अल्प मुदतीच्या फेरनिविदा काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. राज्य सरकारने याबाबत पालिका प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. सोमवारी पालिकेतील पक्षनेते आणि प्रशासनातील प्रमुख अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सात दिवसांच्या अल्प मुदतीच्या या निविदा काढण्यात येणार आहेत.
संपूर्ण राज्यभरात सुरू झालेल्या ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीमुळे सरकारी कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतील विविध करांच्या रचनेत मोठा बदल झाला आहे. काही वस्तूंचा कर कमी झाला आहे. तर काही वस्तूंचा कर वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने निविदा प्रक्रियांबाबत १९ ऑगस्टला नवीन आदेश काढले आहेत. यामध्ये २२ ऑगस्टनंतर काढण्यात येणाऱ्या सर्व निविदा जीएसटी करानुसार काढणे, त्यापूर्वी काढलेल्या निविदा मंजूर झाल्या असतील मात्र, वर्क ऑर्डर दिली नसेल तर त्या रद्द कराव्यात, असे म्हटले आहे. त्यानुसार राज्य सरकारने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिका प्रशासनाने २२ ऑगस्टपूर्वी विविध विभागांच्या काढलेल्या निविदा सुमारे ४०० ते ५०० कोटी रुपयांच्या असतील, अशी माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.
‘जीएसटीच्या अंमलबजावणी नंतर महापालिकेने विभागीय दरपत्रक (डीएसआर) तयार केला नसल्याने अनेक विभागांनी निविदा काढल्या नाहीत. याबाबत अनेक सभासदांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी सोमवारी मुख्यसभा झाल्यानंतर महापौरांच्या दालनात ही बैठक झाली. या चर्चेनंतर प्रशासनाच्या वतीने शासनाच्या आदेशाची अंमलबजाणी करून २२ ऑगस्टपूर्वी मान्य झालेल्या मात्र प्रत्यक्षात काम सुरू न झालेल्या सर्व निविदा रद्द करून अल्प मुदतीच्या फेर निविदा काढण्यात येतील,’ असे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.
पालिकेची लपवाछपवी
शासनाचा आदेश १९ ऑगस्टला आला आहे. त्या आठवड्याचा कालावधी उलटल्यानंतरही प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापौरांनी घेतलेल्या बैठकीत जीएसटी सुरू होण्यापूर्वी (१ जुलै) निविदा किती, १ जुलै नंतरच्या निविदा किती, तसेच २२ ऑगस्ट नंतरच्या निविदा किती याची कोणतीही माहिती सादर करण्यात आली नाही. तसेच या निविदांची रक्कमही देखील सांगण्यात आलेली नाही. काही ठराविक ठेकेदारांना पाठीशी घालण्यासाठी ही माहिती लपविली जात असल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक वृक्ष तोडण्यासाठीसमिती आवश्यकच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती नेमण्यासाठी होत दिरंगाईबद्दल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पुन्हा ताशेरे ओढले. वृक्ष प्राधिकरण समिती अस्तित्वात आल्यानंतरच धोकादायक वृक्ष तोडायला परवानागी द्यावी, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत.
शहरातील बेकायदा वृक्षतोडीसंदर्भात न्यायाधिकरणासमोर सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे आदेश देण्यात आले. विनोद जैन यांनी ही याचिका दाखल केली असून राज्य सरकार, पुणे महापालिका, वृक्ष प्राधिकरण समिती, पुणे पोलिस आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
शहरातील धोकादायक वृक्ष तोडण्याची परवानी देता येऊ शकते. पण ही झाडे नक्की धोकादायक आहेत का, याची पुन्हा तपासणी झाली पाहिजे. यासाठी वृक्ष अधिकाऱ्यांनी संबंधित झाडांची प्रत्यक्ष पाहाणी करावी, कायदेशीर बाबी तपासून झाड तोडण्याबद्दल निर्णय जाहीर करावा, असे आदेशात लिहिले आहे. ‘महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन झाल्यानंतरच धोकादायक वृक्षांसंदर्भात कायदेशीर पावले उचलावीत. महापालिकेने वृक्ष प्राधिकरणासंदर्भातील बैठकीच्या अहवालाचे प्रतिज्ञापत्र आठ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेशात न्यायाधिकरणाने दिले आहेत,’ असे जैन यांनी सांगितले.
सात दिवसात आयुक्तांचे प्रतिज्ञापत्र हवे

‘कायद्याने वृक्ष अधिकारी नेमण्याचे अधिकार वृक्ष प्राधिकरण समितीला दिले आहेत. पण ही समिती अस्तित्वात नसताना महापालिकेने दयानंद घाडगे यांची नियुक्ती कशी झाली. ही समितीतील सदस्य निवडीसाठी तज्ज्ञांची समिती नेमून देखील नियमबाह्य सदस्यांची निवड कशी झाली,’ असे प्रश्न राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने उपस्थित केले.

‘महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश या वेळी देण्यात आले. तज्ज्ञ समितीकडे पर्यावरण क्षेत्रातील अभ्यासकांचे अर्ज आलेले असताना आठवी, दहावी इयत्ता पास असलेल्या व्यक्तींची निवड केल्याबद्दल न्यायमूर्तींनी आश्चर्य व्यक्त केले,’ असे विनोद जैन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यविक्री करणाऱ्या हॉटेलचा परवाना निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील शाळा-कॉलेज आणि प्रार्थनास्थळांजवळील मद्य विक्रीची दुकाने आणि हॉटेल यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मुंबई येथील पथकाने कारवाई सुरू केली आहे. या पथकाने फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील एका हॉटेलचा परवाना निलंबित केला असून, आणखी दुकाने आणि हॉटेल रडारवर आहेत.
शाळा, कॉलेज आणि प्रार्थनास्थळांजवळील मद्यविक्रीबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्तमालिका केली होती. त्याची दखल घेऊन उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित मद्य विक्रीची दुकाने आणि हॉटेलांची तपासणी करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार मुंबई येथील एका पथकाने शहरात येऊन पाहणी केली. त्यामध्ये एका हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पुणे विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे म्हणाले, ‘मुंबई येथून आलेल्या पथकाने शहरातील शाळा, कॉलेज आणि प्रार्थनास्थळांजवळील दुकानांची पाहणी केली आहे. या पथकाकडून फर्ग्युसन रस्त्यावरील संत तुकाराम महाराज पादुका मंदिराजवळ असलेल्या ‘ओ लँड’ या हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.’
शहर आणि परिसरातील शाळा, कॉलेज आणि प्रार्थनास्थळांजवळ मद्यविक्री सुरू असल्याकडे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्तमालिकेद्वारे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन बावनकुळे यांनी शाळा, कॉलेज आणि प्रार्थनास्थळांजवळील वाइन शॉप, बार आणि रेस्टॉरंट यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी पथक स्थापन करण्यात आले होते. त्यानुसार संबंधित पथकाने तपासणी केली. या पथकाकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन अंतर मोजण्यात आले. याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला असून, तो पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आला आहे. शाळा, कॉलेज आणि प्रार्थनास्थळांपासून मद्य विक्री केंद्रांचे प्रत्यक्ष अंतर आणि त्यांना परवानगी देण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांमधील अंतर याचीही पडताळणी या पथकाकडून करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांलगतच्या मद्यविक्रीवर बंधने आली आहेत. मात्र, शाळा, कॉलेज आणि प्रार्थनास्थळांपासून ७५ मीटर अंतरावरील बंदीच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने केलेल्या पाहणीत आढळले होते. कायद्यातील पळवाट शोधून ही मद्य विक्री करण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले होते. शाळा आणि कॉलेजांच्या दारात मद्य विक्रीची केंद्रे आहेत. नियमांकडे डोळेझाक करून सुरू असलेल्या या मद्यविक्रीवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या वृत्ताची बावनकुळे यांनी दखल घेऊन मद्यविक्री केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एका दुकानावर कारवाई झाली असून, आणखी काही दुकाने आणि हॉटेल रडारवर असल्याचे सांगण्यात आल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला वाहकांना नऊ महिन्यांची प्रसुती रजा

$
0
0

कामगार संघटनेकडून प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) महिला वाहकांचे होणारे गर्भपात थांबविण्यासाठी आणि गर्भवती महिला वाहकांना आराम मिळण्यासाठी एसटी प्रशासनाने पावले उचलली आहे. त्यानुसार आता महिला वाहकांना नऊ महिन्यांची पगारी प्रसुती रजा मि‍ळणार आहे. एसटीने यापूर्वीच गर्भवती महिला वाहकांना ‘टेबल वर्क’ देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही निर्णयामुळे महिला वाहकांमध्ये आनंदाचे वातावरण असून एसटी कामगार संघटनेने एसटी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हा निर्णय सोमवारी मुंबईत जाहीर केला. खेड्यापाड्यांमधून प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमधून सातत्याने प्रवास, कामाच्या शिफ्टचे नियोजन नसणे, जादा कामाचा ताण आणि खडतर रस्त्यांवरून दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास आदी कारणांमुळे होणाऱ्या त्रासामुळे एसटी महिला वाहकांमध्ये गर्भपाताचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. साधारण १०० महिला वाहकांमागे गर्भपाताचे प्रमाण १० ते २० असल्याचे धक्कादायक वृत्त सर्वात प्रथम ‘मटा’ने प्रकाशित केले होते. महिला वाहकांची संख्या मोठी असूनही त्यांच्यासाठी ‘एसटी’तर्फे उपाययोजना आखलेल्या नाहीत. ‘एसटी’ने महिला वाहकांना प्रसुतीसाठी सहा महिन्यांची पगारी रजा दिली आहे. या रजांचा वापर प्रसुतीच्या शेवटच्या महिन्यात आणि प्रसुतीनंतर करता येतो. मात्र, वाहकांतर्फे प्राधान्याने रजांचा वापर प्रसुती झाल्यानंतरच करण्यात येतो. असे असले तरी गर्भवती महिला वाहकांना नऊ महिन्यांच्या कालावधीत हलके आणि बैठे काम (लाइट ड्युटी व टेबल वर्क) देण्याबाबत कोणत्याच प्रकारची योजना नाही. मागील कामगार करारान्वये गर्भवती हलके किंवा बैठे काम देण्याविषयीचा मुद्दा मांडण्यात आला होता. मात्र, त्यातून काहीही ठोस निष्पन्न झाले नाही.
याबाबतचा पाठपुरावा ‘मटा’ने गेल्या वर्षीच्या १०, ११, १२ जून तसेच २४ ऑगस्ट व ३० डिसेंबरच्या अंकात केला. त्यानंतर एसटी प्रशासनाला जाग येऊन प्रशासनाने महिला वाहक गर्भवती असतानाच्या काळातील काम ठरवण्याबाबत, त्यांचे काम कोणत्या महामार्गावर असावे, प्रसुतीकाळात देण्यात येणाऱ्या रजा वाढविणे याचा अभ्यास करण्यासाठी नाशिकच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती गठित केली होती. या समितीने अभ्यास करून प्रशासनाला अहवाल दिला होता. या अहवालानुसार काही महिन्यांपूर्वी गर्भवती महिलांना टेबल वर्क देण्यात आले. त्यानंतर आता महिला वाहकांना सहा महिन्यांची पगारी रजा वाढवून नऊ महिने मंजूर करण्यात आली आहे. एसटी कामगार संघटनेने याबाबत पाठपुरावा केला होता. संघटनेच्या उपाध्यक्षा शीला नाईकवडे यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहित दलित नसल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमूलाच्या हत्येनंतर त्याच्या समर्थनार्थ आंदोलन करताना त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांनी ऐन वेळी काढता पाय घेतला होता. आता कोर्टामार्फतच रोहित दलित नसल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे,’ अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केली.
हरिती पब्लिकेशन्सतर्फे ‘खैरलांजी ते रोहित- दशकाची अस्वस्थता’ या केशव वाघमारे यांच्या पुस्तकाचे अॅड. आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, युवा साहित्यिक राहुल कोसंबी, शर्मिष्ठा भोसले आदी उपस्थित होते. रोहित वेमुला याने जातिव्यवस्थेला कंटाळून आत्महत्या केली होती. त्याच्या समर्थनार्थ त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली; परंतु प्रत्यक्ष आंदोलनाच्या वेळी माघार घेतली. या तरुण पिढीमध्ये निर्णय घेण्याची असमर्थता असून ते प्रवाहाबरोबर वाहवत जात आहेत. तरुणांमधील निर्णयक्षमता नष्ट होत असल्यानेच चळवळी लयास जाताना दिसत आहेत,’ अशी खंतही डॉ. आंबेडकर यांनी व्यक्त केली.
‘भिडे वाड्याचे स्मारक व्हावे, यासाठी महापालिकेमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. अद्याप स्मारकाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. स्मारकासंदर्भातील प्रश्न न्यायप्रविष्ठ असून राज्य सरकारचे वकील सुनावणीला गैरहजर राहतात, ही दुर्दैवी बाब आहे,’ असे डॉ. धेंडे या वेळी म्हणाले.

‘माणूस’ केंद्रस्थानी हवा
देशमुख आणि सरदारशाहीच्या पेचातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्यांना थोपविण्यासाठी राज्यभरात मराठे मोर्चे काढले जात आहेत, अशी टीका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. आता समाजाची नवीन घडी बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. ती बसविताना ‘माणूस’ केंद्रस्थानी ठेवला पाहिजे. सध्याचा कालखंड अर्थव्यवस्थेशी जोडलेला असल्याने समाजातील प्रत्येक माणूस अर्थव्यवस्थेत कसा शाबूत राहील हे लक्षात घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ शिक्षकांचे पगार बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमध्ये सहा हजार ९१६ शिक्षकांची नियुक्ती करताना सरकारचे नियम पाळले नसल्याचे समोर आले होते. यातील तब्बल चार हजार ११ शिक्षकांच्या मान्यता या नियमबाह्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य धोक्यात असून प्रत्येक शिक्षकाची चौकशी करण्यात येणार असून नियमबाह्य मान्यता असणाऱ्या शिक्षकांचे पगार बंद करण्यात येणार आहे. तसेच, मान्यता दिलेल्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

शिक्षण विभागाने शालार्थ ही संगणक प्रणाली सुरू केल्यानंतर अनेक शिक्षकांची नावे प्रणालीमध्ये अपलोड करण्याचे काम सुरू होते. त्या वेळी काही शिक्षकांकडे त्यांची कागदपत्रेच नसल्याचे समोर आले होते. मान्यता देत असताना अनेक अधिकाऱ्यांनी प्रचंड अफरातफर करून मान्यता दिल्याचे उघडकीस आल्यानंतर तत्कालीन शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांच्या काळात नियमबाह्य मान्यतांच्या चौकशीला प्रारंभ झाला होता. त्यामध्ये अनेक शिक्षकांना शासनाचे नियम न पाळता मान्यता दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये अनेक शिक्षकांना नोटीसा देणे, त्यांच्या एकापेक्षा अधिक सुनावण्या घेणे आदी प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा सर्व स्तरावरील जवळपास सहा हजार ९१६ शिक्षकांच्या मान्यता प्राथमिक तपासणीत नियमबाह्य आढळल्या होत्या. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीकडून २ मे २०१२ सालानंतर देण्यात आलेल्या शिक्षक मान्यतांची चौकशी सुरू आहे.

याअंतर्गत साधारण सहा हजार ९१६ शिक्षकांना मान्यता देताना शैक्षणिक संस्थांनी नियम पाळलेले नसल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. त्यानंतर अधिक चौकशीनंतर यातील चार हजार ११ शिक्षकांच्या मान्यता या अनियमित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासणी केलेल्या मान्यतांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र नसणे, पदाची जाहिरात प्रसिद्ध न करता नियुक्ती, रोस्टर न पाळणे अशा प्रकारच्या अनियिमितता आढळून आल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये यातील प्रत्येक शिक्षकाची चौकशी होणार असून यात दोषी आढळल्यास त्या शिक्षकांचे राज्य सरकारकडून देण्यात येणारे पगार थांबविण्यात येणार आहेत. तसेच, या प्रकरणात शिक्षण विभागातील जे अधिकारी नियमबाह्य मान्यता देण्यात सहभागी आहेत, त्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शाळा पगार देतील?

राज्य सरकारने पगार देणे बंद केल्यानंतर या शिक्षकांची जबाबदारी ही शाळेच्या व्यवस्थापनाची राहणार आहे. शाळेच्या व्यवस्थापनाला संबंधित शिक्षकाला पगार द्यावा लागणार आहे. अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांना पगार चांगला मिळतो. मात्र, सरकारने त्यांचा पगार बंद केल्यानंतर त्यांना किती शाळा व्यवस्थापन पगार देऊ शकतात, याबाबत शंका असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ जपानमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणेकर जिथे जातात तिथे आपली संस्कृती रुजवतात, याचा प्रत्यय सध्या जपानमधील टोकियो शहरालगत असलेल्या म्योदेन या ठिकाणी येत आहे. ‘म्योदेन’मध्ये कामानिमित्ताने वास्तव्यास असलेल्या २०-२५ पुणेकरांनी म्योदेन मित्र मंडळाची स्थापना केली असून, गेल्या सहा वर्षांपासून ते दिमाखात गणेशोत्सव साजरा करत आहेत.

कामाच्या निमित्ताने पुण्यातील काही मंडळी जपानमध्ये स्थायिक झाले. सुरुवातीला त्यांची फारशी ओळख नव्हती. या गटातील काही जण गेली दहा वर्षे ‘म्योदेन’मध्ये वास्तव्याला आहेत, तर काही जण अगदी नुकतेच तिकडे गेले आहेत. या दरम्यान ‘म्योदेन’मध्ये राहणाऱ्या २०-२५ जणांचा एक ग्रुप तयार झाला. दर वर्षी गणेशोत्सवाच्या काळात आपण पुण्यात जाता येत नाही, याची खंत प्रत्येकाच्या मनात होती. मग जपानमध्येच गणेशोत्सव साजरा करायचे ठरले आणि गणेशोत्सवाला सुरुवात झाली. गेली सहा वर्षे पुणेकरांचा जपानमधील गणेशोत्सव दिमाखात सुरू आहे.

सुरुवातीला नेत्रा आणि नचिकेत मरकळे, अक्षय आणि सौम्या कोरडे, प्रमोद सोनाकुल, केदार आणि प्राजक्ता परांजपे या मंडळींनी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. घरातच पण थाटामाटात आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. शाडूच्या मातीची मूर्ती आणून त्यांनी घरातच बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली. रोज सकाळी किंवा संध्याकाळी जमेल तसे सारे जण आरतीला जमू लागले. सणासुदीच्या दिवशी पुण्यात असलेले वातावरण तिथे नसले, तरी प्रत्येक जण त्या उत्साहात भर घालू लागला. पाहता पाहता या उत्सवात अनेकांनी सहभाग घ्यायला सुरुवात केली. आशुतोष साठे, अभिषेक तेलंग, संकेत पांढरी, तेजस्विनी घाणेकर, वृषाली लोहोकरे, सुप्रिया आणि नीलेश शहाणे, केतन कुलकर्णी, अभिषेक लंके, दिगंबर सहस्रबुद्धे, नचिकेत मरकळे, सुहास पटवा, नितीन चौधरी हे तरुणही या उत्सवात सहभागी झाले. यंदा या सर्वांनी मिळून मोठ्या आनंदाने उत्सवाची तयारी केली आणि आता दररोज बाप्पाची सेवा करत आहेत. मंजिरी चुनेकरही पुणे-जपान-पुणे अशा वाऱ्या करत या उत्सवामध्ये सक्रिय सहभाग घेतात.

उत्सवाच्या या दिवसांमध्ये जपानमध्ये काम करणाऱ्या तरुण मंडळींना वर्षभराचा उत्साह आणि ऊर्जा मिळते. पुण्यापासून लांब असलो म्हणून काय झाले पण संस्कृतीला विसरायचे नाही, असा निश्चय या मंडळींनी केला आहे. त्यासाठी ते वर्षागणिक त्यांचा गणेशोत्सव अधिक उत्साहात आणि थाटात पार पाडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक उपक्रमांचे आयोजन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिरूर

शिरूर शहरातील विविध गणेश मंडळांनी देखाव्यांबरोबरच सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले आहे.

हलवाई गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने शहरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस बांधवांना, गृहरक्षक दलाच्या जवानांना शेंगदाणा, खोबरे व राजगिरा चिक्कीचे वाटप करण्यात आले. उपक्रमाविषयी सांगताना मंडळाचे अध्यक्ष सिंकदर मन्यार म्हणाले, ‘पोलिस बांधव निर्विघ्नपणे उत्सव पार पाडण्याची मोठी जबाबदारी पार पाडतात. पोलिस बांधवांच्या कामाप्रती कृतज्ञता म्हणून मंडळांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.’ या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश मोरे, पोलिस निरीक्षक राजेंद कुंटे उपस्थित होते. मोरे यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करून पोलिसांच्या कामाची दखल घेतल्याबद्दल आभार मानले. माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, मंडळाचे माजी अध्यक्ष रणजित गायकवाड, शरद परदेशी आदी या वेळी उपस्थित होते. मंडळाच्या वतीने रक्तगट तपासणी शिबिराचे व महिलांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आल्याचे अध्यक्ष मण्यार यांनी सांगितले. आभार पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी मानले.

डंबेनाला गणेश मित्र मंडळ यशवंतराव चव्हाण चौक यांच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सुमारे ३२ जणांनी रक्तदान केले. ‘अष्टविनायक ब्लड बँक’ अहमदनगर यांनी शिबिरास सहकार्य केल्याचे मंडळाच्या अध्यक्षा प्रिया संतोष रुणवाल, रोहिणी ओतारी व उर्मिला संजय बारवकर यांनी सांगितले.

पालिकेतर्फे ‘गणेश फेस्टिवल’

शिरूर नगरपालिकेच्या वतीने यंदा ‘गणेश फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत बुधवारी (३० ऑगस्ट) रोजी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याखेरीज एक सप्टेंबर रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम व डान्स स्पर्धा, गायन व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे नगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीचा सभापती उज्ज्वला वारे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागपूर, अमरावती वगळता राज्यात दमदार पाऊस

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

पावसाने एकीकडे मुंबईत थैमान घातले असताना राज्यातील नागपूर आणि अमरावती परिसर वगळता अन्य प्रदेशामध्ये दमदार सुरवात झाली आहे. पुणे, नाशिक आणि कोकण परिसरातील धरणे काठोकाठ भरली गेली असून, पुण्यातील धरणांमध्ये सुमारे ८२ टक्के आणि नाशिकमध्ये ६८ टक्के पाणीसाठा झाला आहे. कोकणात धुव्वाधार असल्याने सुमारे ९३ टक्के धरणे भरली गेली आहेत. मराठवाड्याला पावसाने दिलासा दिला असून, सुमारे ४० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राज्याचा सरासरी पाणीसाठा सुमारे ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. सोलापूर परिसराला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण हे सुमारे ९१ टक्के भरल्याने या भागातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे. कोयना धरणही सुमारे ८८ भरले आहे.

पुण्यात नऊ धरणे तुडुंब

जिल्ह्यातील पानशेत, खडकवासला, पवना, नीरा देवघर, चासकमान, कळमोडी, आंद्रा, भामा-आसखेड आणि वडिवळे ही नऊ धरणे शंभर टक्के भरली आहेत. पानशेत धरण हे शंभर टक्के भरल्यामुळे या धरणातून दिवसभरात सुमारे तीन हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सुमारे साडेचार हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पवना धरणातूनही मुळा नदीमध्ये दिवसभरात सुमारे पाच हजार ९७० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

उजनी, कोयना, वारणात समाधानकारक

सांगलीतील वारणा धरण पूर्ण भरले आहे. साताऱ्यातील कोयना सुमारे ८९ टक्के, उरमोडी सुमारे ८८ टक्के, कन्हेर ९२ टक्के, तारळी ९६ टक्के, धोम बलकवडी ९९.५७ टक्के भरले आहे. उजनी भरणाची पातळी वाढून या धरणाचा पाणीसाठा सुमारे ९१ टक्के झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत सुमारे ३० टक्के पाणीसाठा जास्त झाला आहे.

मराठवाड्याला दिलासा

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्र तेरणा, औंरंगाबादमधील पैठण आणि बीडमधील मांजरा धरण परिसरात पावसाने जोर धरल्याने ही धरणे भरू लागली आहेत. या प्रदेशातील अन्य भागातही पावसाने हजेरी लावली असल्याने धरणांची पातळी वाढू लागली आहे. नांदेडमधील निम्र मनार या धरणाची पातळी अद्याप सुमारे २० टक्क्यांपर्यंतच पोहोचली आहे. सिना कोळेगाव आणि येलदरी या धरणक्षेत्रात तुलनेने कमी पाऊस आहे. अन्य ठिकाणी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे.

नागपूर अद्याप कोरडेच

नागपूर विभागात पावसाने जोर धरला नसल्याने अनेक धरणे अद्यापही कोरडी आहेत. नागपूर प्रदेशातील नांद आणि वडगाव ही धरणे सुमारे ८९ टक्के भरली आहेत; तसेच नागपूरमधीलच कामठी खैरी आणि गडचिरोलीतील दिना ही धरणे अनुक्रमे सुमारे ५३ टक्के आणि ५८ टक्के भरली आहेत. अन्य धरणांपैकी गोंदियातील सिरपूर, भंडाऱ्यातील बावनथडी या धरणांमध्ये दहा टक्केही पाणीसाठा होऊ शकलेला नाही.

अमरावतीत कमी पाणीसाठा

अमरावती विभागातील धरणांमध्ये राज्यातील अन्य धरणांच्या तुलनेत सर्वांत कमी पाणीसाठा आहे. या प्रदेशातील धरणांतील पाणीसाठा जेमतेम २४ टक्के झाला आहे. या भागातील वाण धरण हे सुमारे ५८ टक्के, तर ऊर्ध्व वर्धामध्ये ५० टक्के पाणीसाठा होऊ शकला आहे. अन्य धरणे सुमारे २५ टक्केही भरू शकलेली नाहीत.

खडकपूर्णा धरणात शून्य पाणी

राज्यात पावसाने हजेरी लावली असताना बुलढाणा येथील खडकपूर्णा या धरणामध्ये अद्याप पावसाचा थेंबही साचलेला नाही. त्यामुळे या धरणात शून्य टक्के पाणी आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत हे धरण सुमारे ३५ टक्के भरले गेले होते.

नाशिकमध्ये संततधार

नाशिकमध्ये असलेल्या संततधारेमुळे धरणांची पाणीपातळी वाढली आहे. या विभागातील नगरमधील भंडारदरा, नाशिकमधील ओझरखेड, कडवा, तिसगाव आणि वाघडा ही धरणे शंभर टक्के भरली गेली आहेत. ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झालेल्यांमध्ये नगरमधील निळवंडे, नाशिमधील करंजवण, गंगापूर, दारणा, पुणेगाव, भावली, वैतरणा आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिवंत देखाव्यांचे आकर्षण

$
0
0

काल्पनिक महालांवरही मंडळांचा भर
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्याच्या दक्षिण भागामध्ये येणाऱ्या सातारा रस्त्यालगतच्या मंडळांनी यंदा जिवंत देखाव्यांवर भर दिला आहे. समाजाचे प्रबोधन करणारे देखावे सादर करून नागरिकांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न मंडळांनी केला आहे. राष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करणारे जिवंत देखावेही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय काल्पनिक संकल्पनेवर आधारित उभारण्यात आलेल्या भव्य महालांनाही मंडळांनी पसंती दिली आहे. महालांची भव्यता पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
यंदा गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत असल्याने बहुतांश मंडळांनी भव्य महाल, मंदिरांच्या प्रतिकृती देखावा म्हणून साकार केल्या आहेत. याशिवाय समाज प्रबोधन करणाऱ्या जिवंत देखाव्यांचेही प्रमाण वाढले आहे. सातारा रस्त्यालगतच्या परिसरातील जिवंत देखावे या परिसरातील नागरिकांसाठी आकर्षण ठरणार आहेत. सामाजिक समस्या, रुढी परंपरा, देशाची सुरक्षा अशा अनेक विषयांवर भाष्य करणारे जिवंत देखावे सादर केले जात आहेत. अरण्येश्वर सहकारनगर येथील अरण्येश्वर मित्र मंडळाने चीन आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या छुप्या कारवायांबद्दल जनजागृती करणारा जिवंत देखावा सादर करण्यात आला आहे. ‘मिलके करेंगे रक्षा हिंदुस्थान की’ असे या देखाव्याचे नाव आहे. चीन आणि पाकिस्तानची आक्रमणे परतवून लावण्यासाठी सर्व धर्माचे, जातीचे भारतीय एकत्र यायला हवेत, असा संदेश देण्यात आला आहे. चिनी वस्तूंचा वापर बंद करून भारतीय बनावटीच्या वस्तू नागरिकांना वापराव्यात, असे आवाहनही या देखाव्यातून करण्यात आले आहे. हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन अशा सर्व धर्मातील लोकांना माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम एकतेचा संदेश देतात. भारताची प्रगती समाजाच्या एकत्रिकरणामुळेच शक्य आहे, असे ते सर्व धर्मीय नागरिकांना समजावून सांगतात.अशी या देखाव्याची संकल्पना आहे. गेल्या २५ वर्षांपासून अरण्येश्वर मित्र मंडळाने जिवंत देखाव्यांची परंपरा कायम राखली आहे.
सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग विद्यालयाजवळ असलेल्या दर्शन मित्र मंडळाने ‘जवान संपावर गेले तर...’ या विषयावरील जिवंत देखावा सादर केला आहे. या देखाव्यातून सीमेवर देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. जवान संपावर गेले, तर सामान्य माणसांचे काय होईल, देशाच्या सीमांचे रक्षण कोण करणार असे अनेक प्रश्न सादरीकरणातून उपस्थित करण्यात आले आहेत. जवानांना थेट मदत करू शकत नाही तर निदान त्यांचे मनोबल ढासळणार नाही, अशी विधाने नागरिकांनी टाळावीत या संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे.
सातारा रस्ता परिसरात काल्पनिक महल साकारण्यावरही भर देण्यात आला आहे. पर्वती येथील विनायक मित्र मंडळ, मार्केट यार्ड येथील श्री शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाने साकारलेला ‘शारदा गजानन महाल’ नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. सुबक नक्षीकाम साकारलेले खांब, त्याला लावलेले आकर्षत झुंबर, विद्युत रोषणाईच्या साह्याने केलेली रंगांची उधळण आणि अशा भव्य महालात विराजमान झालेली श्री शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाची शारदा गजाननाची मूर्ती मार्केट यार्ड परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. मंडळातर्फे दररोज किर्तन, प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे.
----------------------
आवर्जून पाहावेत असे देखावे
सातारा रोड
अरण्येश्वर मित्र मंडळ : जिवंत देखावा : मिलके करेंगे रक्षा हिंदुस्थान की
दर्शन मित्र मंडळ, सहकारनगर : जिवंत देखावा : जवान संपावर गेले तर ?
श्री शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळ : शारदा गजानन महाल
महात्मा गांधी मित्र मंडळ : तळजाई वसाहत : विद्युत रोषणाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोलासाठी ‘एलईडी’चे टिपरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बाप्पाच्या मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी पथकातले वादक आकर्षक पेहराव करून आपल्या वादनाने नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. यंदा या आकर्षणामध्ये ‘एलईडी’च्या टिपरूंची भर पडली आहे. फायबरमध्ये तयार केलेल्या ‘एलईडी’च्या टिपरूमध्ये वेगवेगळ्या रंगांचे ‘एलईडी’ लाइट बसवण्यात आले असून, रात्रीच्या वेळी हे टिपरू सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. टिपरांच्या या नव्या ट्रेंडला वादकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.
रात्रीच्या मिरवणुकीत एकाच वेळी तीस ते चाळीस वादकांच्या हातात ‘एलईडी’चे टिपरू देऊन पथकाची विशिष्ट रचना करण्याचा पायंडा अनेक पथकांनी सादर केला आहे. पहिल्या दिवशी काही तुरळक पथकाच्या वादकांनी ही टिपरू वापरली होती. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून शेवटच्या दिवशी काही पथके हा अभिनव प्रयोग करणार आहेत. पराग शेलार या तरुणाने ही संकल्पना प्रत्यक्षात आणली असून पाच रंगांमध्ये ही टिपरू उपलब्ध करण्यात आली आहेत. टिपरू पारदर्शक फायबरमध्ये तयार करण्यात आले आहे. त्याच्या दांड्याच्या बाजूला बटण देण्यात आले आहे. ते बटण दाबल्यानंतर ‘एलईडी’ लाइट सुरू होतो. सेलवर हे टिपरू चालत असल्याने संपूर्ण मिरवणुकीत त्याचा वापर करता येणे शक्य आहे.
पथकांच्या मागणीप्रमाणे विविध रंगांमध्ये ही टिपरे तयार केली जात आहेत. साधारण १५० ते ३०० अशा दरांमध्ये ती बाजारात उपलब्ध करण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षापूर्वी काही पथकांनी ‘एलईडी’ ढोल वाजवून एक नवी संकल्पना राबवली होती. आता यामध्ये टिपरांची भर पडली आहे. या नव्या ट्रेंडमुळे लाकडी टिपरांचे महत्त्व कमी झालेले नाही; परंतु रात्रीच्या वेळी वादनात आकर्षकता आणण्यासाठी पथकांनी ही युक्ती वापरली आहे. ताशांच्या काड्यांनाही फ्लुरोसंट प्रकारचे रंग देऊन ‘एलईडी’च्या रंगांमध्ये त्या चमकतील, अशी व्यवस्था काही व्यावसायिकांनी केली आहे. पथकाच्या व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये हे नवे ट्रेंड अधिक खुलून दिसत असल्याने त्याची क्रेझही वाढली आहे.
-------------------
ढोलांच्या पानासाठी रेनकोट
पावसाचा हंगाम असल्याने मिरवणुकीत ढोलाची पाने भिजू नयेत, याची पथकांकडून पुरेपुर काळजी घेण्यात आली आहे. रेनकोटच्या कापड्यासारखे हलके कव्हर्स तयार करण्यात आले असून, ते ढोलांच्या पानांना लावण्यात येत आहेत. एकप्रकारे ढोलाच्या पानांसाठी ही कव्हर्स रेनकोटसदृश भासत आहेत. प्लास्टिक आणि सॅटिन अशा दोन प्रकारांमध्ये ही कव्हर्स उपलब्ध करण्यात आली आहेत. पावसापासून वाचण्यासाठी या कव्हर्सचा चांगला उपयोग होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूजन गणेशाचे आणि सरस्वतीचेही

$
0
0

आनंद कानिटकर
गणेश या देवतेचा प्रवास बघत असताना लक्षात येणारी अजून एक गोष्ट म्हणजे विघ्नहर्त्या गणेशाचा बुद्धीची देवता म्हणून होणारा विकास. मागे आपण पहिल्याप्रमाणे उत्तर कोकणातील शिलाहार राजांच्या ताम्रपटांवरून असे लक्षात येते, की इ. स. दहाव्या शतकात गणेशाला अग्रपूजेचा मान मिळू लागला होता. त्याच काळात विद्येची देवता असणाऱ्या सरस्वतीबरोबर गणेशाचेही बुद्धीची देवता म्हणून पूजन होऊ लागले होते.
कोकणातील पन्हाळेकाजी येथे वज्रयान बौद्ध लेणी, शैव लेणी व नाथपंथीय लेणी आढळतात. साधारणपणे शिलाहार राजांच्या काळात कोरल्या गेलेल्या लेणे क्रमांक २२च्या मुखमंडपातील समोरासमोर असणाऱ्या भिंतींवर गणपती आणि सरस्वती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. यात सरस्वतीसोबत केलेल्या गणेशाच्या अंकनावरून गणेशाची केवळ विघ्नहर्ताच नाही, तर बुद्धीची देवता म्हणूनही पूजा होत असावी, असा अंदाज बांधता येतो. पन्हाळेकाजी येथीलच लेणे क्रमांक २९मध्ये लक्ष्मी, गणपती आणि सरस्वती यांच्या मूर्ती एकाच शिल्पपटात कोरलेल्या आहेत. हा वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीसमूह उत्तरशिलाहार काळात म्हणजे इ. स. बाराव्या शतकात कोरला गेला असावा, असे त्या शिल्पांवरून लक्षात येते. या मूर्तीसमूहात मध्यभागी असलेल्या चतुर्भुज गणेशाच्या हातात मोदकांनी भरलेले मोठे पात्र दाखवले आहे. या गणेशाने सोंडेत एक मोदक घेतलेला दाखवला आहे. या गणेशाच्या शेजारी वीणावादन करणारी सरस्वतीची बैठी मूर्ती आहे, तर गणेशाच्या उजव्या बाजूस लक्ष्मीची उभी मूर्ती आहे. गणेशाच्या तुलनेत शेजारील लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या मूर्ती लहान आकाराच्या आहेत, यावरून या मूर्तीसमूहात गणेश ही मुख्य देवता असल्याचे स्पष्ट होते. गणेशाच्या आजूबाजूला असणाऱ्या लक्ष्मी आणि सरस्वती यांचे हे इ. स. बाराव्या शतकातील अंकन आजकाल पुजल्या जाणाऱ्या लक्ष्मी, गणेश, सरस्वती यांच्या एकत्रित चित्राची आठवण करून देणारे आहे.
गणेशाचा सिद्धी आणि बुद्धी यांच्याशी असलेला संबंध काही ग्रंथातून, स्तोत्रांतूनही लक्षात येतो. गणेशाचे वर्णन काही ग्रंथांतून ‘सिद्धीबुद्धीसमन्वित’ असे येते. म्हणजे गणेशासोबत किंवा त्याच्या मागून सिद्धी (यश) आणि बुद्धी येतात. रुद्रयामलतंत्रातील गणेशस्तवराज या स्तोत्राच्या फलश्रुतीत खालील उल्लेख येतो.
तस्य श्रीरतुला स्वसिद्धि-सहिता श्रीशारदा सर्वदा।
स्यातां तत्परिचारिके किल तदा काः कामनानां कथाः।।
म्हणजे जो या श्रीगणेशस्तवराज स्तोत्राचे पठण करतो, त्याची स्वतः सिद्धी आणि शारदा परिचारिकेप्रमाणे सेवा करतात, तिथे इतर इच्छांची काय कथा? म्हणजे गणेश जेथे उपस्थित असेल, तेथे यश आणि विद्या हमखास येतात. गणेशपूजनाने भक्ताला लक्ष्मी आणि विद्या यांचा लाभ होतो, याच भावनेतून गणेशाची स्थापना, त्याचे पूजन विविध कार्यारंभी केले जाऊ लागले.
याच काळात इ. स. दहाव्या शतकातील गुर्गी (मध्यप्रदेश) येथे सापडलेल्या एका शिलालेखात शिवमंदिराची उभारणी करताना मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गणपती आणि सरस्वती यांच्या मूर्तींची स्थापना केल्याचा उल्लेख येतो. भेडाघाट (मध्यप्रदेश) येथील इ. स. बाराव्या शतकातील एका शिलालेखात विघ्नहर्त्या गणेशाची स्तुती केलेली आहे आणि नंतर सरस्वतीचे स्तवन केलेले आहे. याशिवाय कथासरित्सागर या ग्रंथाच्या सुरुवातीस शंकर आणि वाग्देवी (सरस्वती) यांच्याबरोबरच गणेशाचेही स्तवन केले गेले आहे.
विघ्नहर्त्या गणेशाचा बुद्धीची देवता या स्वरूपात झालेला विकास आपल्याला गणेश आणि सरस्वती यांच्या मूर्तीतून, त्यांच्या एकत्रित स्तवनातून दिसून येतो. यामुळेच मध्ययुगातील अनेक कवी, ग्रंथकार यांनी त्यांच्या लेखनकृतीच्या आरंभी गणेशाला आदरपूर्वक वंदन करून आपल्याला लेखनासाठी प्रेरणा देण्याचे आवाहन केलेले दिसून येते.
(लेखक भारतीय विद्येचे अभ्यासक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीचा गणेश

$
0
0

हरीश यमगर, सांगली
श्रीमंत पटवर्धन घराण्याचे कुलदैवत म्हणून सांगलीत कृष्णाकाठी भव्य मंदिरात विराजमान झालेले गणराय हेच संपूर्ण सांगली नगरीचे आणि पंचक्रोशीचे आराध्य दैवत आहे. पर्यटकांसाठी तीर्थक्षेत्र असलेल्या या मंदिराला ऐतिहासिक परंपरा आहे.
निजाम आणि तत्कालीन ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करीत रणांगण गाजविणारे पहिले चिंतामणराव पटवर्धन सन १८००मध्ये मिरजेत परतले. त्या वेळी जहागिरीच्या गादीबाबतचा घराण्यातला वाद त्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे परतलेल्या दिवशीच चिंतामणरावांनी कुलदैवत श्रीगणेशाची सिंहारूढ मूर्ती घेऊन मिरजेपासून काही अंतरावर सध्या सांगलीकर मळा म्हणून परिचित असलेल्या एका ठिकाणी रात्रीचा मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी ‘सांगलीत कृष्णेकाठी गणेशमूर्तीला साक्षी ठेवून आपण सांगलीत राजधानी वसवू शकलो, तर तुझे एक भव्य मंदिर बांधीन,’ असे साकडे गणरायाला घातले. सन १८०१मध्ये स्थापन झालेल्या राजधानीचा गणेश दुर्ग हा राजवाडा सन १८११मध्ये पूर्ण झाला. त्याच दरम्यान माधवनगर रोडवरील सध्याच्या चिंतामणीनगरमध्ये गणेश मंदिराची जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु, ते स्थान गणपतीसाठी योग्य नसल्याचे साधू वेषातील वाटसरूने सांगितल्याने १८०६मध्ये सध्या कृष्णाकाठी असलेल्या गणेश मंदिराची आखणी झाली. ही जागा त्या आगोदर राजवाड्याच्या सुरक्षेसाठी शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी निवडण्यात आले होते.
सांगलीच्या गणेश मंदिर आणि उत्सवाला सुमारे पावणेदोनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. चौकोनी पद्धतीच्या काळ्या पाषाणामध्ये साकारलेल्या मंदिरात रिद्धी आणि सिद्धी मूर्तींमध्ये श्री गणेशाची गारेच्या दगडापासून घडविलेली मूर्ती विराजमान आहे. या मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला सूर्यनारायण, चिंतामणेश्वर आणि डाव्या बाजूला लक्ष्मी-नारायण चिंतामणेश्वरी यांची सुबक मंदिरे आहेत. अशा पाच मंदिरांचे मिळून एक भव्य आणि तांबड्या दगडांत साकारलेले प्रवेशद्वार असलेले हे ठिकाण गणेश मंदिर या नावाने परिचित आहे. श्री गणपती पंचायतन संस्थान, सांगली या नावाने श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांचा खासगी ट्रस्ट या मंदिराचा कारभार पाहत आहे.
सुमारे पावणेदोनशे वर्षांपासून पटवर्धन घराण्याने पाच दिवसांच्या गणेशोत्सवाची परंपरा जोपासली आहे. शुद्ध चतुर्थीला सार्वत्रिक उत्सवाची सुरुवात होत असली तरी या संस्थानमध्ये मात्र, तीन दिवस अगोदरच म्हणजे प्रतिपदेपासून श्री गणेशाची प्रतिष्ठाना करून सुरू केला जातो. प्रतिपदेला मूख्य गणपती मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणारी मूर्ती ही पूर्णतः इको-फ्रेंडली असून कागदाच्या लगद्यापासून सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी तयार केलेली आहे. या दोन मूर्तीं असून, त्या कधीच विसर्जित केल्या जात नाहीत. उत्सवाच्या पाचव्या दिवशी त्या जागच्या हलवून नंतर सुरक्षित ठिकाणी ठेऊन पुन्हा पुढच्या वर्षी रंगरंगोटी करून प्रतिष्ठापनेसाठी तयार ठेवल्या जातात. हा गणपती कधी आला आणि कधी गेला हेच समजत नसल्याने त्याला ‘चोर गणपती’ म्हणून संबोधण्याची प्रथाही रुढ झालेली आहे. सार्वत्रिक उत्सवातील गणेशोत्सवातील मूर्तीची प्रतिष्ठापना राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये केली जाते. पाच दिवस विविध कार्यक्रम, पाचव्या दिवशी रीतीरिवाजांप्रमाणे रयतेतील प्रत्येक समाजाला पानसुपारी दिली जाते. नंतर लाकडी रथामधून उत्सवमूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होते. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सूर्यास्तापूर्वी कृष्णेच्या पात्रात मूर्तीचे विसर्जन केले जाते.
पहिल्या चिंतामणरावांनी भाविकांची श्रद्धा बसलेल्या मूर्तीला संकटकाळात काही इजा झाली तर पुन्हा हुबेहुब मूर्ती घडविण्यासाठी तोच दगड आणि तोच मूर्तिकार उपलब्ध असणार नाही. हे ओळखून दूरदृष्टीने पावणेदोनशे वर्षांपूर्वीच एकाच दगडातून आणि एकाच मूर्तिकाराकडून प्रत्येक मूर्तीला पर्यायी मूर्ती आणि कळस तयार करून घेतले होते. २००५मध्ये श्रीमंत विजयसिंहराजे यांनी मंदिराची रंगरंगोटी, काही सुधारणा करण्याचे ठरविले. त्या वेळी धातूंचे कळसही खराब झाल्याचे समोर आले. त्यांची पाचही मंदिरांवरच्या कळसाचे टेंडर दिले. परंतु, कळस तयार करण्याचे काम सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या माळ बंगल्याच्या तळघरात एका कोपऱ्यात पावणेदोनशे वर्षांपूर्वीच तयार करून सुरक्षित रीतीने ठेवलेले कळस सापडले. सध्या ते कळसच मंदिरांच्या शिखरांची शोभा वाढवत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्साही ‘पर्थ’वासीयांचा गणेशोत्सव

$
0
0

महाराष्ट्र मंडळ, पर्थ, ऑस्ट्रेलिया
गणेशोत्सवाची चाहूल लागली की घराघरात सुरू होणारी लगबग, मित्र मैत्रिणींना एकत्र बोलून डेरोकेशनसाठी रात्री होणारे जागरण, गणपतीच्या प्रसादाचे नियोजन.. उत्सवातील ही धमाल परदेशात गेल्यावर खंडित होऊ नये, तेथील वातावरणातही उत्सवाचे रंग भरता यावेत, या उद्देशाने ‘पर्थ’मधील महाराष्ट्र मंडळाने पाच वर्षांपूर्वी गणेशोत्सव साजरा करायला सुरूवात केली. दर वर्षी गणेश भक्तांची संख्या वाढत असून, यंदा पाचशेहून अधिक लोक उत्सवात सहभागी झाले होते.
पर्थ हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील मोठे शहर. पर्थच्या महाराष्ट्र मंडळामध्ये गुढीपाडवा, शिवजयंती, दसरा, कोजागिरी, दिवाळी असे सगळे सण उत्साहात साजरे केला जातात. गणेशोत्सव हा या मालिकेतील महत्त्वाचा सण. मंडळाने २००२ पासून गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. या उत्सवामध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग असतो. लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, मोठ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, आरती, महाप्रसाद असे नियोजन करून मंडळाचे सभासद एक दिवस गणेशोत्सव साजरा करतात. दीडशेहून अधिक कुटुंब यामध्ये सहभागी होतात. मराठी बांधवांबरोबर भारतीय लोकांचाही यात समावेश असतो.
नुकत्याच झालेल्या रविवारी पर्थ मंडळाने यंदाचा उत्सव साजरा केला. ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत, हे यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. मंडळातील हौशी कार्यकर्त्यांना ढोल-ताशा पथकाबद्दल विशेष आकर्षण असल्याने यंदा उत्सवात पथक असले पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. पुण्यातील गर्जना पथकाने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. पथकाने सहा ढोल आणि तीन ताशे पर्थमध्ये पाठविण्यासाठी सहकार्य केले. ढोल-ताशा आणण्यासाठी खर्च आहे, हे कळाल्यावर सभासदांनी स्वेच्छेने आर्थिक मदत केली. भारतातून येणाऱ्या काही जणांनी लेझीम आणले. उत्सवापूर्वी जोरदार सराव करून या हौशी मंडळींनी विविध रचना तयार केल्या.
उत्सवाच्या दिवशी सकाळीच या मंडळीने पुण्यातील मिरवणुकीप्रमाणेच जोशात ढोल आणि ताशा वादन करून गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. लहान मुलांसाठी हे वादन म्हणजे पर्वणी ठरले. विशेष म्हणजे पुढच्या आठवड्यात कर्नाटक मंडळाचाही गणेशोत्सव होणार असून, या ढोल पथकाला वादनासाठी निमंत्रण मिळाले आहे. मंडळाची मिरवणूक उत्सव सकाळी आठ वाजता सुरू झाली. काही उत्साही कार्यकर्त्यांनी मखर आणि आरासाची जबाबदारी उचलली होती. शास्त्रीय पद्धतीने श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यावर सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण आणि आरती झाली. दुपारी मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. याशिवाय गेल्या आठवड्यात घेतलेल्या लहान मुलांच्या चित्रकला आणि महिलांच्या पाककला स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संध्याकाळी सात वाजता आरती करून थाटामाटाने पुन्हा एकदा ढोल ताशांच्या गजरात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करून गणपतीच्या मूर्तीला निरोप देण्यात आला.

(समन्वय : चैत्राली चांदोरकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंडाचा गणपती

$
0
0

भागोजी गुंड यांच्या घराजवळील देवळीतला म्हणून याला गुंडाचा गणपती असे नाव पडले. कसबा पेठ घर क्रमांक ५९६ येथे हे मंदिर आहे. १९७५च्या काळात मूर्तीवरील शेंदराचे आवरण गळून पडले आणि आत अतिप्राचीन गणेशाची मूर्ती मिळाली.
मंदिराचा गाभारा दगडी आहे. अलीकडच्या काळात मंदिराची नव्याने डागडुजी केलेली दिसते. साधारण पाच फूट उंची असलेली उजव्या सोंडेची ही मूर्ती भव्य आहे. मूर्तीच्या वरच्या दोन्ही हातात पाश, अंकुश आहेत. खालच्या डाव्या हातात मोदक व परशू आणि उजव्या हातात कमळाचे फूल धारण केलेले दिसते. श्रींचा आशीर्वादाचा हात नागविभूषित आहे. नागयज्ञोपवीत आणि अंगभर पितांबर नेसलेली गणरायाची मूर्ती दगडी बैठकीवर थाटात विराजमान झालेली दिसून येते. समोरच्या बाजूला काचेमध्ये एक मूर्ती ठेवलेली आहे. ती पूर्वीची आहे. मूर्तीवरील गळून पडलेले शेंदराचे आवरण केळकर संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. भाद्रपद व माघ महिन्यातील उत्सव मंदिरात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.
‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि मल्हार प्रॉडक्शन्स यांच्या तर्फे ‘आराध्य अर्थात ओळखीच्या गणेश मंदिरांचा अनोळखी इतिहास’ या वेब मालिकेचा हा भाग खालील लिंकवर जाऊन किंवा सोबतचा क्यू आर कोड आपल्या मोबाइलवर स्कॅन करून पाहता येईल.
https://youtu.be/Zf9AjSc0-po

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवार वीर मारुती सार्वजनिक गणेशोत्सव

$
0
0

लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केल्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागांत त्याचा प्रचार झाला. १९ व्या शतकाच्या अखेरीस पुण्याचा परिसर मध्यवस्तीतील काही पेठांपुरता मर्यादित असला, तरीही प्रत्येक पेठेतून उत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. शनिवार पेठेत ‘शनिवार वीर मारुती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने लोकमान्यांपासून प्रेरणा घेत उत्सवाला सुरुवात केली. १८९३ मध्ये स्थापना झालेले हे मंडळ यंदा इतर प्रमुख मंडळांप्रमाणेच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे.
शनिवारवाड्याकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील या मंडळाने आत्तापर्यंत नेहमीच वेगवेगळ्या स्वरूपातील देखावे आणि सजावटीने गणेश भक्तांना आकर्षित केले आहे. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा मंडळाने तिरुपती येथील व्यंकटेश बालाजी मंदिराचा देखावा उभा केला आहे. हा भव्य देखावा आणि त्यावरील दिव्यांची रोषणाई अत्यंत नेत्रदीपक ठरत आहे. यंदाच्या उत्सवात संपूर्ण दहा दिवस वेगवेगळे कार्यक्रम/उपक्रम मंडळाने आयोजित केले आहेत.
गणेश उत्सवाप्रमाणेच वर्षभरात मंडळातर्फे इतरही वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात. यात प्रामुख्याने शिवजयंती, दत्तजयंती, गणेशजन्म आणि भारतीय स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचबरोबर इतरही अनेक सामाजिक उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात. मंडळाचे अनेक पदाधिकारी वाढदिवसावर केला जाणारा खर्च टाळून सामाजिक संस्थांना मदत करण्यात पुढाकार घेतात. त्याशिवाय, गणेशोत्सवात विधायक कार्यक्रमांवर भर देतानाच गुलालमुक्त आणि डीजे/डॉल्बीला फाटा देत पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ उपक्रमापासून प्रेरणा घेऊन मंडळानेही त्याचा प्रचार-प्रसार करण्यात पुढाकार घेतला आहे. मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या वर्गणीच्या पावतीवर ‘स्वच्छ रहें भारत, स्वच्छ रहें हम’ असा संदेश दिला जात आहे. तसेच, येत्या रविवारी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. मंडळात येणाऱ्या पाहुण्यांनाही पुष्पगुच्छ देण्याऐवजी रोप देऊन वृक्ष संवर्धनासाठी मंडळाने पुढाकार घेतल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रोहित धावडे यांनी दिली.
मंडळाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत ‘श्रीं’च्या दोन मूर्ती बदलण्यात आल्या आहेत. स्थापनेनंतरची पहिली मूर्ती २०-२५ वर्षांत बदलण्यात आली. त्यानंतरची मूर्ती सुमारे ६० वर्षे कायम होती. तर, आत्ताच्या मूर्तीलाही ४२ ते ४५ वर्षे झाली आहेत. मंडळाचे १२५ वे वर्ष सुरू असले, तरी सध्या मंडळाचे सर्व व्यवस्थापन तरुण पिढीच्या हाती असून, सरासरी वय पंचविशीच्या आत आहे. त्यामुळे, सव्वाशे वर्षांचा वारसा यापुढेही जोमाने सुरू राहील, हीच अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढक्कानिनादमुदितो

$
0
0

मंदार लवाटे
गणेश सहस्रनामामध्ये ‘ढक्कानिनादमुदितो’ असे नाव आहे. ढोलाच्या नादाने प्रसन्न होणारा, असा त्याचा अर्थ आहे. सध्या अनेक ढोल पथकांमधून ढोलाचे वादन करणाऱ्या तरुणाईला हे नाव नक्कीच आवडेल. नादामध्ये प्रतिष्ठित, नादानुसंधनाने प्राप्त होणारा असेही यात गणेशास म्हटले आहे. शिव, गणपती हे नाद, नृत्य प्रिय असलेले आहेत, हे आपणास ठाऊकच आहे. आजचे आपले रूप मात्र वेगळ्या श्लोकांमधून साकारले आहे. चिंतामणी हे गणपतीचे नाव अर्थात जो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो, भक्तानां हवे ते देतो तो. सहस्रनामात ही असे त्याचे एक रूप आहे ज्यात त्याने कल्पवल्ली धारण केली आहे. ‘कल्पवल्लीधरो विश्वाभयदैककरो वशी, अक्षमालाधरो ज्ञानमुद्रावन मुद्गरायुधा’ म्हणजे ज्याने हातात कल्पलता धारण केली आहे, ज्याचा प्रमुख हात संपूर्ण विश्वाला अभयदान देणारा आहे. अथवा ज्याने अभय मुद्रा धारण केली आहे. जो संपूर्ण विश्वाला आपल्या ताब्यात ठेवतो, त्याच्या एका हातात अक्षमाला असून एक हात ज्ञानमुद्रेत आहे. सहाव्या हातात मुद्गर नावाचे शस्त्र धारण केले आहे. अर्थात जो संपूर्ण जगाचा अधिपती, नियंता असून. भक्तांच्या मागे उभा राहणारा त्यांची चिंता, काळजी, भीती दूर करणारा आहे, व त्यांचे मागणे पूर्ण करणारा आहे. सहस्रनामातील या सहा हातांच्या रूपाचे शास्त्रात वर्णन करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या गणरायाला वंदन केले ते रूपही सहा भुजांचे आहे. परंतु त्यातील आयुधे मात्र निराळी आहेत. पुराणांमध्ये निरनिराळ्या युगातील गणपतीची वर्णने आहेत त्यातील त्रेतायुगातील गणपतीही षड्भुज असून तो मयुरारूढ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी हॉस्पिटलना दणका

$
0
0

खासगी हॉस्पिटलना दणका

कट प्रॅक्टिस कायद्याचा मसुदा अंतिम टप्प्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे
डॉक्टरांच्या माध्यमातून विविध औषध कंपन्यांसोबत ‘कट’चे दुकान चालवणारी खासगी हॉस्पिटल आणि डायग्नोस्टिक सेंटरही आता ‘कट प्रॅक्टिस’च्या कचाट्यात येणार आहेत. कायद्यात तशी विशेष तरतूद करण्यात येत असल्याने हॉस्पिटलनाही आता पळ काढता येणार नाही.
वैद्यकविश्वात डॉक्टर, हॉस्पिटल यांच्याकडून ‘कट प्रॅक्टिस’चा संसर्ग वाढत असल्याने त्याबाबत गांभीर्याने पावले उचलण्याबाबत राज्य सरकारला साकडे घातले जात होते. अखेर सरकारने ‘कट प्रॅक्टिस’ला रोखण्यासाठी माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या समितीची नुकतीच एक बैठक झाली. त्यात या संदर्भात निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, ‘कट प्रॅक्टिस’ करणारे डॉक्टर रडारवर असतात; पण खासगी हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर मोकाट सुटतात. या संदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सर्वप्रथम वृत्त देऊन हा प्रकार उघडकीस आणला. अनेकदा हॉस्पिटलचे पदाधिकारी थेट औषध कंपन्यांशी चर्चा करून देवाणघेवाण करतात. पण त्यात डॉक्टर बदनाम होत असल्याचे स्वतः अनेक डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे वैद्यक विश्वात डॉक्टर विरुद्ध हॉस्पिटल अशी छुपी लढाई सुरू आहे. याकडे बातम्यांमधून समितीच्या सदस्यांचे लक्ष वेधण्यात आले. समितीच्या सदस्यांनी या वृत्ताची दखल घेतली.
‘खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर कट प्रॅक्टिसनुसार कारवाईचा समावेश करण्यात आला आहे. कंपन्यांकडून पैसे घेणारी खासगी हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर आतापर्यंत मोकळे सुटत होते. त्यामुळे डॉक्टरांबरोबर खासगी हॉस्पिटल आणि डायग्नोस्टिक सेंटरला कट प्रॅक्टिसच्या कायद्याच्या कक्षेत आणले आहे. त्यांचा कायद्याच्या मसुद्यात समावेश करण्यात येत आहे. डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एक्स रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय यासारख्या निदान चाचण्या करणाऱ्या सेंटरचा समावेश केला आहे. ‘कट’ देणारे आणि घेणारे अशा दोन्हींना कायद्याच्या कक्षेत आणायचा समितीचा निर्णय आहे,’ अशी माहिती कट प्रॅक्टिसविरोधी कायदा समितीच्या एका ज्येष्ठ सदस्याने ‘मटा’ला दिली.
‘कट प्रॅक्टिस’संदर्भात अमेरिका, जपानसारख्या १५ देशांमध्ये कायदा आहे. त्या ठिकाणी या संदर्भातील प्रॅक्टिसला आळा घालण्यात आला आहे. त्या धर्तीवर आता महाराष्ट्रात अशा स्वरुपाचा कायदा करण्यात येत आहे. त्याची गरज आहे. सामान्य पेशंट कट प्रॅक्टिसमुळे आर्थिकदृष्ट्या भरडले जातात. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ‘कट’ घेऊन त्याचा फटका सामान्य पेशंटला बसत असेल, तर अशा गोष्टींवर निर्बंध लादले गेले पाहिजेत. त्याच दृष्टीने कायद्याच्या समितीत विचार होत आहे, असेही सदस्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images