Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दुर्मिळ वाद्ये अन् पेशवाईतील वस्त्रे

$
0
0

इतिहासप्रेमींसाठी मुजुमदार वाड्यात खजिना खुला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सूरसिंगार, सूरबहार, स्वरमंडळ ही वाद्ये तुम्ही कधी पाहिली आहेत का ? नाही ना? ही दुर्मिळ वाद्ये आणि पेशवाईतील वस्त्रे पाहायची आहेत का? तुम्ही संगीत आणि इतिहासप्रेमी असाल किंवा या सर्व परंपरेविषयी तुम्हाला कुतूहल वाटत असेल तर कसबा पेठेतील ऐतिहासिक सरदार मुजुमदारवाड्याला नक्की भेट द्या. गणेशोत्सवानिमित्त खुला झालेला हा अनमोल ठेवा तुम्हाला नक्कीच समृद्ध करील.
चौसष्ठ कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाच्या उत्सवानिमित्त ही अतिदुर्मिळ वाद्ये पाहण्याची संधी संगीतरसिकांना आणि जाणकारांना खुली झाली आहे. निमित्त ठरले आहे ते मुजुमदारवाड्यातील २५२ व्या गणेशोत्सवाचे.. पेशवेकाळापासून आगळी परंपरा जपलेल्या सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या मुजुमदार वाड्यातील गणेशोत्सवाला मंगळवारी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून दिमाखात सुरुवात झाली. दररोज सकाळी सनईवादन आणि सायंकाळी कीर्तन अशा पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होणार असून, शनिवारी ऋषिपंचमीला उत्सवाची सांगता होईल. आबासाहेब मुजुमदार यांचे नातू प्रताप मुजुमदार आणि नातसून अनुपमा मुजुमदार यंदा उत्सवी परंपरेत सहभागी होत आहेत.
‘मुजुमदार वाडा १७७० मध्ये बांधण्यात आला. या उत्सवाला गाण्याच्या बैठकींची परंपरा लाभली आहे. पं. रामकृष्णबुवा वझे, पं. भास्करबुवा बखले, मास्तर कृष्णराव, उस्ताद बडे गुलाम अली खाँ, अमानत अली खाँ, बालगंधर्व, छोटा गंधर्व, सनईसम्राट प्रभाशंकर गायकवाड, पं. भीमसेन जोशी अशा दिग्गज कलाकारांच्या गायन मैफली या गणरायाच्या चरणी सेवा रुजू करण्याच्या उद्देशातून तसेच कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी झाल्या आहेत. या उत्सवाबरोबरीनेच गणेश चतुर्थीलाही शाडू मातीची मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना केली जाते. या गणपतीचे गौरींबरोबर विसर्जन होते. अशा पद्धतीने दोनदा गणेशोत्सव साजरा केला जातो,‘ अशी माहिती अनुपमा मुजुमदार यांनी दिली.

उत्सवामध्ये दररोज सकाळी नऊ वाजता प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन होणार आहे. तर सायंकाळी वासुदेवबुवा बुरसे, मिलिंदबुवा बडवे, मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर, शेखरबुवा व्यास यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवारी पुंडलिकबुवा हळबे यांचे कीर्तन झाले. यंदाच्या उत्सवात दुर्मिळ वाद्यांसह वस्त्रे पेशवाईतील हे प्रदर्शन ऋषिपंचमीपर्यंत दररोज सायंकाळी पाच ते सात या वेळात पाहता येईल.
- अनुपमा मुजुमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रत्येक ढोलासाठी दीडशे रुपये देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त ढोल वाजविण्याच्या ‘विश्वविक्रमा’साठी सज्ज झालेली पुणे महापालिका प्रत्येक ढोलसाठी दीडशे रुपये खर्च करणार आहे. बालेवाडी स्टेडियममध्ये होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये एकाचवेळी पाच हजार ढोलांचे वादन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक ढोलासाठी दीडशे रुपये ढोलपथकांना देण्यात येणार आहेत.
बालेवाडी स्टेडियममध्ये ढोलपथकांचे येणे-जाणे, त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक ती साधने, वादक यांची जबाबदारी ढोलपथकांवर असणार आहे. महापालिकेकडून ढोलपथकांना त्यासाठी प्रती ढोल दीडशे रुपये देण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाने त्यासाठी सात लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला होता. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे, अशी माहिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
ढोल वाजवण्याचा उपक्रम २७ ऑगस्टला बालेवाडीच्या मैदानावर करण्यात येणार आहे. या उपक्रमावर पावसाचे सावट असले, तरी ढोल पथकांकडून वादन करण्यात येणार आहे. बालेवाडी स्टेडियमचे एक दिवसाचे भाडे सहा लाख ८४ हजार रुपये असून, दोन लाख रुपयांची अनामत रक्कम ठेवावी लागते. या खर्चालाही परवानगी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाहुबली, छोटा भीम रूपाचे यंदा आकर्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपल्याने बाजारामध्ये बाप्पाच्या विविध रुपातील आकर्षक मूर्ती दाखल झाल्या आहेत. बाहुबलीच्या रुपातील गणरायाची मूर्ती यंदाही दाखल झाली असून, मोटू-पतलू, छोटा भीम आदी पात्रांच्याही गणेश मूर्ती लक्षवेधक ठरत आहेत.
लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, शारदा गजानन या प्रसिद्ध गणपतींच्या पारंपरीक मूर्तींनाही प्रचंड मागणी आहे. शिवाय विविध रंगसंगती साधून तयार केलेले बाप्पाचे सुंदर रुपही नागरिकांच्या पसंतीस पडल्याचे चित्र आहे.

दर वर्षी बाप्पाच्या मूर्तींमध्ये नवे ट्रेंड पहायला मिळतात. गेल्या वर्षीपर्यंत दूरचित्रवाणीवर खंडेरायाची मालिका सुरू होती. तेव्हा खंडोबाच्या रुपातील मूर्ती नागरिकांचे आकर्षण होती. यंदा मात्र हा ट्रेंड बदलला असून, बाहुबलीच्या रुपातील मूर्तीची मोठ्या प्रमाणावर विचारणा मूर्तिकारांकडे होत आहे. शिवाय लहान मुलांना आकर्षक वाटतील अशी बाल गणेशाची विविध सुंदर रुपे बाजारात दाखल झाली आहेत. काही प्रसिद्ध असलेल्या कार्टून पात्रांच्या आकारातही गणेश मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. कलाप्रेमींसाठी पेटी वाजवणारा बालगणेश, गायन करणारा बालगणेश अशा छोट्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. वर्षानुवर्षे पारंपारीक गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करणाऱ्या भक्तांसाठी लालबागचा राजा, सिद्धीविनायक, दगडूशेठ हलवाई, मंडईतील शारदा गजानन, बाबूगेनू, जिलब्या मारुती, ग्रामदैवत कसबा गणपती, गुरूजी तालीम या प्रसिद्ध आणि मानाच्या गणपतींच्या छोट्या प्रतिकृती व्यावसायिकांकडून विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षी मुंबई येथील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या मूर्तीमागे घुबडाचा विशाल आकार साकारण्यात आला होता. यंदा त्या मूर्तीची प्रतिकृती बाजारात दाखल झाली असून, तिला प्रचंड मागणी आहे. त्याचप्रमाणे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या एक फूटापासून अडीच फूटापर्यंतच्या मनमोहक मूर्ती बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. शाडू आणि प्लॅस्टर ऑफ पॅरीस अशा दोन प्रकारांमध्ये या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.

शाळाशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले जात असल्याने व्यावसायिकांनी लहान मुलांचे आकर्षण ठरतील, अशा शाडूच्या मूर्तीही उपलब्ध केल्या आहेत. या संदर्भात मूर्तीकार राजेंद्र देशमुख म्हणाले, की ‘पारंपरीक गणेश मूर्तींचा विचार केला तर लालबागचा राजा आणि दगडूशेठ हलवाई या गणेश मूर्तींना सर्वाधिक मागणी आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागातही या मूर्ती मागविण्यात येत आहेत. लहान मुलांसाठी कार्टूनच्या स्वरूपातील मूर्तींचे यंदाही आकर्षण आहेच. शिवाय बाहुबलीच्या मूर्तीलाही मागणी आहे. काही प्रमाणात खंडोबाच्या रुपातील मूर्तीचीही विचारणा केली जात आहे.

शाडू मूर्तीला मागणी
पर्यावरणासंदर्भात शालेय आणि सामाजिक पातळीवर मोठ्याप्रमाणावर जनजागृती होत असल्याने अनेकांनी शाडू मातीच्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिकांकडे पलॅस्टर ऑफ पॅरीस ऐवजी शाडू मातीच्या मूर्तीची विचारणा होत आहे. समाजामध्ये मूर्ती संदर्भातील हा बदलणारा ट्रेंड पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने समाधानकारक आहे.

रंगसंगतीच्या मूर्तींनाही मागणी
घरगुती गणेश मूर्तींमध्ये विविध रंगसंगतीतील गणेश मूर्ती यंदा पसंतीस पडत आहेत. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या मूर्तीवर काळ्या रंगाची कलाकुसर आणि लाल रंगाचे वेल्वेटचे पितांबर असलेली देखणी मूर्ती, तसेच फर्निचरच्या तपकिरी रंगातील आकर्षक मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवाला ‘चाकरमानी चल्ले गावाक’...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने २४ ऑगस्ट पर्यंत सुमारे २५० बसचे नियोजन केले आहे. चिपळूण, मालवण, गुहागर, दापोली, देवरुख, खेड, रत्नागिरी, सावंतवाडी, महाड आणि पोलादपूर या ठिकाणी जादा बस धावणार आहेत. दरम्यान, मंगळवारी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांमुळे स्वारगेट एसटी स्टँड येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

नोकरी किंवा शिक्षणानिमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या कोकणवासीयांची संख्या मोठी आहे. कोकणात गौरी-गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून गौरी-गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. प्रवाशांची वाढती ही संख्या पाहून एसटीच्या पुणे विभागातर्फे दर वर्षी जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. स्वारगेट, पिंपरी चिंचवड, पुणे स्टेशन येथील एसटी स्टँडवरून जादा गाड्यांचे आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासी वाढविण्याच्यासाठी एसटीतर्फे दर वर्षी ग्रुप बुकिंगसाठी विशेष घरपोच गाडी देण्याची योजना जाहीर केली जाते. त्यानुसार एकाच ठिकाणहून कोकणात जाणाऱ्या ४० नागरिकांनी ग्रुप केल्यास, त्यांच्यासाठी संबंधित ठिकाणाहून जादा बस सोडण्याची व्यवस्था करण्यात येते.

विशेष रेल्वेही सोडणार
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने देखील गणेशोत्सवासाठी पुणे-सावंतवाडी ही विशेष गाडी (०१४६१) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी मंगळवारी (ता.२२) सायंकाळी पावणेसात वाजता पुणे स्टेशन येथून सुटली. ती आज, बुधवारी सकाळी आठ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. सावंतवाडी येथून ही गाडी बुधवारी (ता.२३) दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी निघून गुरुवारी पहाटे तीन वाजून ५५ मिनिटांनी पुण्यात दाखल होईल. या गाडीला स्लिपर क्लासचे सहा कोच आणि नऊ द्वितीय श्रेणीच्या जनरल कोच आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुपारी पावणेदोनपर्यंत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

व्रतवैकल्यांचा श्रावण महिना सुरू झाला की आनंदोत्सवांची मालिका सुरू होते. यंदाचा श्रावण महिना सरला असून, आता घराघरात लाडक्या गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यंदा गणेशोत्सव बारा दिवस असल्याने उत्सवात अधिक धमाल करण्याची संधी बच्चे कंपनीला मिळणार आहे. येत्या शुक्रवारी (२५ ऑगस्ट) श्री गणेशाचे आगमन होणार आहे. गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पहाटे ४.३० (ब्राह्ममुहूर्तापासून) वाजल्यापासून दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे.
या वर्षी श्री गणेशोत्सव बारा दिवसांचा आहे. येत्या गुरुवारी (२४ ऑगस्ट) हरितालिका पूजन आहे. शुक्रवारी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनंतर भद्रा असली तरी, श्री गणेश स्थापना, प्राणप्रतिष्ठा आणि पूजन करण्यास ती वर्ज्य नाही. त्यामुळे शुक्रवारी ब्राह्ममुहूर्तापासून दुपारी १.४५ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने कोणत्याही वेळी श्रीगणेश पूजन करता येईल, असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
दशमीची वृद्धी झाल्याने यंदा गणेशोत्सव बारा दिवसांचा असून, पाच सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे. त्या दिवशी मंगळवार असला तरी नेहमीप्रेमाणे गणेश विसर्जन करता येते. यापूर्वी २००८, २००९ आणि २०१०मध्ये सलग ती वर्षे गणेशोत्सव बारा दिवसांचा होता. आपल्या घरी जेवढे दिवस उत्सव तितके दिवस सकाळी पूजा आणि रात्री आरती, मंत्रपुष्पांजली म्हटल्याने केल्याने घरातील वातावरण प्रसन्न होते. घरातील मूर्ती सुमारे एक वीत म्हणजेच सात बाय आठ इंच उंचीची असावी. ही मूर्ती आसनस्थ आणि सुबक असावी तसेच ती मातीची अथवा शाडूचा असावी, असे आवाहन दाते यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा पेठेत भर दिवसा दरोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कसबा गणपती मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘क्विक कुरिअर’च्या कार्यालयावर पाच ते सहा जणांनी मंगळवारी दुपारी सशस्त्र दरोडा घातला. कुरिअर घेण्याच्या बहाण्याने आता येऊन पिस्तुलाच्या धाकाने कार्यालयातील तीन जणांना बांधून दोन लाखांची रोकड लुटली. गणेशोत्सवाची धामधूम असल्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त असतानाही भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

याबाबत कुरिअरचे विनोद मुंडे यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा गणपतीपासून काही अंतरावर फणीअळी तालमीशेजारी कौस्तुभ इमारतीत मुंडे यांचे ‘क्विक कुरिअर’ चे कार्यालय आहे. कुरिअरसह या ठिकाणी ऑनलाइन वस्तूंच्या विक्रीचे पैसेही जमा केले जातात. मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास मुंडे यांचा मुलगा आणि अन्य दोन कामगार कार्यालयात काम करत होते. त्या वेळी अचानक चार ते पाच जण कार्यालयात घुसले. त्यांनी दिवसभरात जमा झालेली एक लाख १८ हजार आणि कालची ८० हजार रुपये अशी एकूण एक लाख ९८ हजाराची रोकड चोरून कार्यालयाला बाहेरून कडी घालून पसार झाले. दरोडेखोर गेल्यानंतर एक जण पार्सल देण्यासाठी कार्यालयात आला. त्या वेळी त्याने दाराची कडी उघडली. एका कामगाराने मुंडे यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कसबा पोलिस चौकीत जाऊन माहिती दिली. त्यानंतर फरासखाना पोलिस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरांनी कार्यालयातील व्यक्तींचे मोबाइल चोरून नेले असून, त्यांचे शेवटचे लोकेशन सेव्हन लव्हज चौकात आढळले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवामान खात्याला १०० किलोची साखर भेट

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'हवामान खात्याचा पावसासंबंधीचा अंदाज खरा ठरल्यास तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन,' असं उपरोधिक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा शब्द पाळला आहे. पाऊस पडताच पवार यांनी हवामान खात्याला एक-दोन किलो नव्हे तर तब्बल शंभर किलो साखर पाठवली आहे. त्यामुळे सध्या पवार आणि बारामतीची साखर राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी शनिवारी हवामान खात्याची खिल्ली उडविणारं हे वक्तव्य केलं होतं. 'राज्यात पाऊस होण्यासंबधीचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरल्यास तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन,' असं ते म्हणाले होते. पवारांचं हे वक्तव्य मेघराजाच्या जिव्हारी लागलं की काय? दुसऱ्या दिवशीच मेघराजाने संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. एवढंच नव्हे तर कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात तर अतिवृष्टी झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात चांगला पाऊस झाल्याने पवारांनी वेधशाळेतील अधिकाऱ्यांसाठी बारामतीवरुन १०० किलो साखर पाठवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला. ही साखर अंकुश काकडे आणि पदाधिकारी दुपारी हवामान खात्यातील अधिकाऱ्यांना देणार आहेत.

हवामान खात्याने गेल्या आठवड्यात पावसासंबंधी व्यक्त केलेल्या अंदाजात आणि परिस्थितीत तफावत आढळली होती. त्यानंतर तर हवामान खात्याने मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. तसेच पुढचे दोन दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला होता. त्यावरून हवामान खात्याची खिल्लीही उडवण्यात आली होती. शरद पवार यांना याबाबत बारामतीत प्रश्‍न विचारल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य करत हवामान खात्याला चिमटा काढला होता. पवार यांनी आपल्या नेहमीच्या उपरोधिक शैलीत हवामान खात्याची `कार्यक्षमता` उघड केली होती. मात्र वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस होताच पवारांनी त्यांचा शब्द पाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता

$
0
0

जिल्हा परिषद प्रशासन बेफिकीर; सदस्य, नागरिकांमध्ये संताप
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे जिल्हा परिषद आता झीरो पेंडन्सीकडे वाटचाल करीत असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, प्रत्यक्षात जिल्हा परिषदेतील समाजकल्याण, महिला व बाल कल्याण, पंचायत यासारख्या महत्त्वाच्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच नागरिकांच्या कामांना केराची टोपली दाखवित आहेत. जिल्ह्यातून येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांसह नागरिकांची कामे तब्बल सहा महिने प्रलंबित राहिल्याचे समोर आले आहे. ‘अधिकारी मस्त आणि प्रशासन सुस्त’ असेच चित्र सध्या जिल्हा परिषदेत दिसून येत असल्याने सदस्यांसह नागरिकाकंडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी सारखेच कामात गुंतलेले असतात. कधी मिटिंगसाठी बाहेर जातात. त्यामुळे त्यांचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याची टीकाही सदस्यांकडून केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या मिटिंग घेऊन कामे करण्याचे आदेश दिले जातात. परंतु, अनेक कामांना कर्मचारी, अधिकारी वाटाण्याच्या अक्षता दाखवित असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. जिल्हा परिषदेची ‘झीरो पेंडन्सी’कडे वाटचाल सुरू आहे. अनेक वर्षानुवर्षे साठलेल्या फाइल्सवरील धूळ आता हटू लागली आहे. परंतु, दुसरीकडे पेंडन्सी दूर करण्याचा प्रयत्न होत असताना दररोज येणाऱ्या नागरिकांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
जिल्ह्यांत सर्वाधिक कामे ग्रामपंचायतीशी निगडीत असतात. त्यामुळे सहाव्या मजल्यावरील पंचायत विभागात अनेकांना चकरा माराव्या लागत आहेत. काही महिन्यांपूर्वी नव्याने आलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे तीन महिन्यांनंतर सत्कार सोहळे कार्यालयात सुरू आहेत. परंतु, त्यांच्याकडे येणाऱ्या ‘वजनदार’ व्यक्तींशिवाय अन्य व्यक्तींच्या कामांना मात्र ‘करतो’, ‘बघतो’, ‘सांगतो’, ‘फाइल पुट अप करतो’, या पलीकडे कोणतीही वाक्ये ऐकायला मिळत नाही. साहेबांनी ‘काम करतो’ असे सांगितल्याने अनेक जण खूष होतात. पण दिलेल्या मुदतीत काम न झाल्याने त्यांना पुन्हा हताश होत कार्यालयाच्या हेलपाटे मारावे लागत आहेत.
महिला व बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबाबतही हाच अनुभव नागरिकांना येतो. विविध कामे घेऊन येणाऱ्या सदस्यांसह नागरिकांना ‘तुमच्याच कामासाठी बसलो आहोत. काम सांगा. वेळेत होणार याची काळजी घेतो,’ असे सांगून खूष करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, प्रत्यक्षात काम काही होत नाही. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पोषण आहारात किडे आणि अळ्या सापडल्यामुळे उत्तरे देताना या अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आले होते.

विविध कामांना प्राधान्य देण्यासाठी समाज कल्याण विभागाला सरकारचा मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. परंतु, हा निधी समाजासह नागरिकांसाठी वापरला जाणे अपेक्षित आहे. परंतु, या संबंधित विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे येणाऱ्या नागरिकांसह जिल्हा परिषद सदस्यांसाठी वेळच नाही. अधिक माहिती घेतली असता ‘साहेब मुंबईला मिटिंगसाठी गेले आहेत,’ असे सांगितले जाते. वारंवार कार्यालयाबाहेर असल्याने अधिकारी नागरिकांना भेटणार कधी, त्यांच्या तक्रारी ऐकणार कधी आणि कामे होणार कधी असा सवाल सदस्य आणि नागरिक विचारत आहेत.

‘सीईओं’चे प्रशासनाकडे दुर्लक्ष?

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचाच त्यांच्या हाताखालील सर्व विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आशीर्वाद असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोणतेही अधिकारी, कर्मचारी सदस्यांसह नागरिकांना जुमानत नाहीत. त्यांची कामे वेळेत करीत नाहीत. हेलपाटे मारण्याशिवाय नागरिकांना पर्याय राहत नाही. जिल्हा परिषदेत निधी उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारीही सध्या फारसे फिरकत नाहीत. त्याचा गैरफायदा प्रशासन, अधिकारी घेत असल्याने अधिकारी मस्त, प्रशासन सुस्त झाल्याचा अनुभव जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांना येतो आहे. त्यामुळे झीरो पेंडन्सी राबवून काय फायदा, असा सवाल उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंपरीतील सर्पोद्यानातूनदोन अजगर चोरीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान’ या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यानातून सहा-सात फुटी दोन अजगर चोरीला गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रविवारी (२० ऑगस्ट) घडलेल्या या प्रकाराबाबत पोलिसांनी स्वतःहून बुधवारी (२३ ऑगस्ट) महापालिका प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी चौकीत गेल्याने महापालिकेचा गलथान कारभार उजेडात आला आहे. विकृत मनोवृत्तीच्या लोकांचा उद्यानाला बदनाम करण्याचा षड्‍यंत्र असल्याचा दावा प्रशासन करीत आहे.
रविवारी रात्री बारा ते सोमवारी पहाटे चार या वेळात हे उद्यान असलेल्या परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. याच काळात लोखंडी जाळ्या आणि काच फोडून साडेसहा आणि साडेसात फूट उंचीचे दोन अजगर चोरीला गेले. या घटनेनंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, अजगर चोरीला गेल्यानंतर तीन दिवसांपर्यंत याबाबत प्रशासनाकडून पोलिसांना कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बुधवारी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पोलिसांनी स्वतःहून महापालिका प्रशासनाशी संपर्क साधला. पोलिस स्वतःहूनच याबाबत विचारणा करीत असल्याने महापालिका प्रशासनाकडून सायंकाळी उशिरा याबाबत तक्रार देण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी पोलिस ठाण्यात दाखल झाले.
....
प्रशासनावर आरोप
केंद्र सरकारच्या झू अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या नवीन आराखाड्यानुसार या सर्पोद्यानाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी १४४ कोटी मंजूर झाले असून, या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे. तर दुसरीकडे याच उद्यानातून मगरीची पिल्ले चोरीला गेली होती. त्यामुळे तत्कालिन महापालिका आयुक्तांनी चौकशी समितीची नेमणूक केली होती. त्या वेळी हे उद्यानच बंद करण्याचा अहवाल समितीने दिला होता. या उद्यानाशी संबंधित अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद-कलह आणि हे उद्यान पीपीपी तत्त्वानुसार चालविण्यास देण्यासाठीच हा सर्व उद्योग चालविला जात असल्याचा आरोप सर्पमित्रांकडून आता केला जात आहे.
--------------
प्राण्यांची चोरी होतेच कशी?
साडेसात एकरच्या या उद्यानसाठी महापालिकेकडून रात्रपाळीसाठी दोन सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. यापूर्वी याच उद्यानातून मगरीची पिल्ले चोरीला गेली होती. एका मोराचा आणि काही सापांचा संशयास्पद मृत्यू देखील झाला होता. ज्या प्राण्यांना पाहून सामान्यांचा थरकाप उडतो असे, मगर-अजगर याठिकाणांहून चोरीला जातातच कसे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मोहिमेत हवाप्रत्येक नागरिकाचा सहभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘पिंपरी-चिंचवड फक्त स्वच्छ दिसून चालणार नाही. तर, प्रत्येक नागरिकास स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घ्यावे,’ असे आवाहन महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी केले.
केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत जानेवारी २०१८ पासून शहर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी हर्डीकर बोलत होते. या वेळी महापालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी विजय खोराटे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, ‘क्रिसिल’ संस्थेचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
मोहिमेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वेक्षणाच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी. शहर हागणदारी मुक्त होणेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. याकरिता वैयक्तिक घरगुती शौचालय, सामुदायिक किंवा सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविण्यात येऊन त्यांची दुरुस्ती व देखभाल करण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचना हर्डीकर यांनी दिल्या.

देशाच्या शहरांतील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी सुमारे चार हजार शहरांचे मूल्यमापन करून गुणानुक्रम ठरविण्यात येणार आहे. त्याबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्या अनुषंगाने महत्त्वाचे घटक, हेतू, उद्दिष्ट आणि कार्यपद्धतीबाबत कार्यशाळेत माहिती देण्यात आली. महापालिकेतील माहितीचे संकलन व कागदपत्रांची तपासणीसाठी एक हजार चारशे गुण, प्रत्यक्ष निरीक्षणातून माहितीचे संकलनासाठी एक हजार दोनशे गुण, स्थानिक नागरिकांच्या अभिप्रायातून नागरिकांच्या सहभागासाठी एक हजार चारशे गुण यानुसार मूल्यमापन केले जाणार आहे. त्याबाबात आत्तापासूनच तयारी करावी. उपक्रमात कमतरता भासू नये, यासाठी खबरदारी घ्यावी, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. गेल्या दोन दिवसांत राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेचा आढावा या वेळी घेण्यात आला.
....
कार्यशाळेतील निर्णय
- दर पंधरा दिवसांनी विशेष स्वच्छता मोहिम राबवावी.
- प्रभाग स्तरावर जनजागृती उपक्रम हाती घ्यावेत.
- प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने वेळापत्रक तयार करावे.
- सेवाभावी संस्थांची बैठक आयोजित करावी.
- कचरा विलगीकरण मोहीम शाळा, कॉलेजमध्ये राबवावी.
- ठिकठिकाणी खतनिर्मितीसाठी धोरण निश्चित करावे.
- श्रमदानाच्या माध्यमातून परिसर स्वच्छ ठेवावेत.
- वराह पालन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम विभागाचे ‘खड्डेताईं’शी लग्न

$
0
0

खड्ड्यांच्या विरोधात कामशेतमध्ये युवक काँग्रेसचे आंदोलन
म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे मावळातील सर्वच रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे मावळवासीय बेजार झाले असून, त्यांचे कंबरडे मोडले आहे. या खड्ड्यांना विरोध करण्यासाठी मावळातील कामशेत येथील युवक काँग्रेसने अनोखे ‘लग्न आंदोलन’ करण्याचे ठरवले आहे. या आंदोलनात खड्ड्यांना जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि खड्डयांचे लग्न लावण्यात येणार आहे. त्यानुसार उद्या, (गुरुवार, २४ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता कामशेत येथे हा सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्याची पत्रिकाही छापण्यात आली आहे. या पत्रिकेत महाराष्ट्र राज्य सरकारचे कनिष्ठ चिरंजीव वडगाव मावळचे बांधकाम विभाग खाते वर आहे, तर मावळातील सर्व रस्त्यांची कनिष्ठ कन्या खड्डेताई वधू आहेत.
पत्रिकेच्या सुरुवातीलाच आयोजकांनी खड्ड्याचे व वडगाव मावळच्या बांधकाम विभागाचे नाते सविस्तर सांगितले आहे. युवक काँग्रेसतर्फे या पत्रिकेत म्हटले आहे, की ‘हा प्रेमविवाह आहे. यामध्ये रस्ते तयार झाले नाही तोपर्यंत तेथे खड्डे तयार होतात. बांधकाम विभाग व खड्डेताई एक क्षणसुद्धा एकमेंकाशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यातील हे प्रेम पाहता हा विवाह लावून देण्यात येणार आहे.’ हा विवाहसोहळा कामशेत येथील शिवाजी चौकाच्या मध्यभागी गुरुवारी अकरा वाजता होणार आहे. ही जागा म्हणजे वधुवरांचे निवासस्थान असल्याचा उल्लेख पत्रिकेत करण्यात आला आहे.
....
बांधकाम ठेकेदार ‘मध्यस्थ’
या विवाहाचे मध्यस्थ बांधकाम विभागाचे सर्व ठेकेदार मंडळी आहेत. ‘नुसतीच लुडबुड’ या शीर्षकाखाली खडी, वाळू, सिमेंट, मुरूम असे छोटे निमंत्रक असणार आहेत.
प्रमुख निमंत्रक म्हणून मावळ तालुक्यातील काँग्रेस, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी असणार आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांनी या आगळ्यावेगळ्या सोहळ्याला उपस्थित राहावे आणि लग्नाची शोभा वाढवावी व वधुवरास पुढील संसारासाठी आशीर्वाद द्यावेत, असे निमंत्रण निमंत्रकांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेअरी फार्म बंदच्यानिषेधार्थ आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
केंद्रीय संरक्षण विभागाने देशभरातील ३९ मिलिटरी डेअरी फार्म १४ ऑक्टोबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाच्या निषेधार्थ खडकी-पिंपरी सिव्हिलियन एम्प्लॉइज मिलिटरी फार्म ट्रेड युनियनच्या वतीने बुधवारी (२३ ऑगस्ट) एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
डेअरी फॉर्म येथून सकाळी दहा वाजता कर्मचाऱ्यांनी रॅली काढली होती. त्यांनतर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात एकदिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात केली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आले. यामध्ये मिलिटरी डेअरी फार्म कर्मचाऱ्यांचे अध्यक्ष शिवाजी टाक, हरिशंकर यादव, रमेश यादव, संतलाल यादव, दत्तात्रय कांबळे, भारतीय मजदूर संघाचे अर्जुन चव्हाण, सुरेश भालेराव आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘गायरान वाचवा, गाय वाचवा, भविष्य वाचवा’, ‘गोचर गो का अधिकार है, उसे बचाओ, उसे बचाओ’, ‘मिलिटरी फार्म बंद, हजारो कामगारा बेघर’, ‘गाय बचाओ, देश बचाओ’ अशा मजकूराचे फलक आंदोलकांनी लावले होत. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
केंद्रीय संरक्षण विभागाने देशभरातील ३९ मिलिटरी डेअरी फार्म बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची झळ पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्मलाही बसणार आहे. देशभरातील डेअरी फार्ममध्ये हजारो गायी आहेत. डेअरी फार्म बंद झाल्याने गायीचे भवितव्य धोक्यात आले आहे. या फार्ममध्ये हजारो कामगार कार्यरत आहेत. फार्म बंद झाल्याने त्यांच्यावरही बेकारीचे संकट ओढावणार आहे.
....
गायींचे भविष्य धोक्यात
पिंपरी डेअरी फार्ममध्ये दोन हजार संकरित गायी असून, दररोज सात हजार लिटर दूध संकलन होत आहे. डेअरी फार्ममधून भारतीय सेनेला दूध, दुधाचे पदार्थ तसेच सीमेवर काम करणाऱ्या घोडे व खाचरांसाठी चारा तयार करून पुरविण्यात येतो. डेअरी फार्म बंद झाल्यास २५ हजारांपेक्षा अधिक साहिवाल व फ्रिजवाल जातीच्या गायींचे भविष्य अडचणीत येणार आहे. देशातील मिलिटरी फार्ममध्ये तात्पुरत्या स्वरूपातील चार हजारांपेक्षा अधिक मजूर प्रत्यक्षपणे तर १२ हजारांपेक्षा अधिक लोक अप्रत्यक्षरीत्या बेरोजगार होण्याची शक्यता असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात आठशे क्लस्टर

$
0
0

केंद्रीय सूक्ष्म आणि लघुउद्योग मंत्री कलराज मिश्र यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठीच भारतात ठिकठिकाणी आठशे क्लस्टरची उभारणी केली जात आहे,’ अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म आणि लघुउद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी बुधवारी दिली.
चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील इंजिनिअरींग क्लस्टरला केंद्र सरकारच्या वतीने ‘एनएबीएल’ (नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) प्रमाणपत्र मिश्र यांच्या हस्ते देण्यात आले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या अनुदानातून दिलेल्या लेझर कटिंग मशिनचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, मायक्रो, स्मॉल अँड मीडियम इंटरप्रायजेसचे (एमएसएमई) केंद्रीय संचालक राकेशकुमार राय, संचालक राजीव गुप्ते, अभय दप्तरदार, विश्वनाथ राजाळे, इंजिनीअरिंग क्लस्टर पुणेचे संचालक सागर शिंदे, विजय देशमुख, राजेश चव्हाण, संतोष तिडके या वेळी उपस्थित होते.
मिश्र म्हणाले, ‘भारतामधील औद्योगिक उत्पादनांना जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकून रहायचे असेल, तर दर्जेदार आणि किफायतीशर वस्तूंचे उत्पादन करणे आवश्यक आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एमएसएमई’ उद्योग मंत्रालय देशातील कारखानदारांना विविध योजनांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहाय्य करत आहे. ‘संकल्पाकडून सिद्धीकडे’ या उपक्रमांतर्गत देशभरात ठिकठिकाणी आठशे क्लस्टरची उभारणी केली जात आहे. त्यामध्ये पुणे परिसरातील सात क्लस्टरचा समावेश आहे.’
‘देशातील उद्योजक, कंपन्यांनी जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेला सक्षमपणे तोंड देऊन उभे राहिले पाहिजे. त्यासाठी उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाद्वारे किफायतशीर किंमतीत बहुपयोगी उत्पादने तयार झाली पाहिजेत, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. यासाठी देशातील उद्योगांना पोषक वातावरण, भांडवल पुरवठा, आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन-प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले आहेत. क्लस्टरच्या माध्यमातून उद्योजकांना कमी खर्चामध्ये उत्पादन शक्य आहे,’ असेही मिश्र म्हणाले.
प्रास्ताविकात संचालक सागर शिंदे म्हणाले, ‘या केंद्रामध्ये अकुशल कामगार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच लेझर कटिंग सुविधा, टर्न मिल सेंटर आदी सुविधा उपलब्ध आहेत. आत्तापर्यंत ८०० अकुशल कामगार आणि ५०० लघुद्योजकांना महाराष्ट्र स्किल डेव्हलप्मेंटच्या मान्यतेने सोलर प्रकल्प उभारणी व देखभाल दुरुस्ती, सीएनसी ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, मोटर मॅकॅनिकल, वेल्डर आदी विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या काळात दर वर्षी दीड हजार अकुशल कामगार आणि ३०० हून अधिक लघुद्योजकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्याचे नियोजन आहे.’
०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरस्कार निवडीमध्ये वाचकांचाही सहभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार श्रेष्ठता पुरस्काराच्या निवडीमध्ये आता वाचकांचे मतही महत्त्वाचे ठरणार आहे. साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुरस्कार निवडीसाठी असा निर्णय घेणारी ‘मसाप’ ही महाराष्ट्रातील पहिली साहित्य संस्था ठरली आहे. अनेक चांगली पुस्तके प्रकाशकांना आणि लेखकांना माहिती न मिळाल्यामुळे तसेच अनास्थेमुळे परिषदेकडे पाठवली जात नाहीत. चोखंदळ वाचकांनी चांगली पुस्तके वाचलेली असतात. ते अशा पुस्तकांची शिफारस परिषदेकडे या निर्णयामुळे करू शकतील.
परिषदेच्या कार्यकारी मंडळाची सभा परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या वेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांच्यासह ३२ सदस्य उपस्थित होते. या सभेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
प्रा. जोशी म्हणाले, ‘मसापच्या वतीने प्रतिवर्षी चाळीस ग्रंथ आणि ग्रंथकारांना श्रेष्ठता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मसाप जीवनगौरव, भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार आणि ग्रंथकार पुरस्काराची निवड पदाधिकारी समिती करते. ग्रंथ पुरस्कारासाठी निवेदन देऊन ग्रंथ मागविले जातात. प्रत्येक वाङ्मयप्रकारासाठी दोन तज्ज्ञ परीक्षक नेमले जातात. वाचकांनी सुचविलेल्या पुस्तकांचाही विचार करणे आता परीक्षकांसाठी बंधनकारक राहील. तसेच मसाप जीवनगौरव आणि भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारासाठी वाचकांना नावे सुचविता येतील. पुरस्कार निवडीची प्रक्रिया पारदर्शी व्हावी, हा त्यामागचा हेतू आहे. परिषदेच्या आजवरच्या वाटचालीतला हा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे.’

डिजिटायझेशनसाठी पुढाकार
‘मसाप’च्या वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनसाठी परिषदेने ‘ग्रंथ दत्तक योजने’चा प्रारंभ केला. या उपक्रमाची सुरुवात कार्यकारी मंडळातील सदस्य एका ग्रंथाचा डिजिटायझेशनचा खर्च उचलून करणार आहेत. तर कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष हे तीन पदाधिकारी प्रत्येक दहा ग्रंथाच्या डिजिटायझेशनचा खर्च उचलणार आहेत. तसेच अजनुज (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे मसापने पहिले शिवार साहित्य संमेलन घेतले. हाच प्रयोग मसापचे कार्यक्षेत्र असणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिटररी फेस्टिव्हलमध्ये कलावंतांची मांदियाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उस्ताद अमजद अली खाँ, आशा पारेख, शबाना आझमी, जावेद अख्तर, दिव्या दत्ता, कीर्ती कुल्हारी, विक्रम भट, इम्रान हाश्मी, एकता कपूर...अशी मोठी मांदियाळी पुण्यात एकाच कार्यक्रमात अवतरणार आहे. ८ ते १० सप्टेंबर दरम्यान यशदा येथे होणाऱ्या ‘पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’मध्ये साहित्यिक, कलावंत यांना अनुभवता येणार आहे. ‘महिलांचा आवाज’ हा या वर्षीचा विषय असून त्याअनुषंगाने पुस्तक प्रकाशन व विविध चर्चासत्र होणार आहेत.
लेखिका डॉ. मंजिरी प्रभू यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत महोत्सवाची माहिती दिली. विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे भरत अगरवाल, बिपीनचंद्र चौगुले, लीना प्रभू, सोनिया गुप्ता, ‘एमआयटी’च्या डॉ. माधुरी कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. महोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे.
महोत्सवाचे उद्‍घाटन अमजद अली खाँ यांच्या हस्ते ८ तारखेला दुपारी बारा वाजता होणार आहे. ‘युवर्स ट्रुली -उस्ताद अमजद अली खाँ’ या कार्यक्रमात ते विचार मांडतील. त्यानंतर शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांचे ‘माय स्टोरी, अवर स्टोरी’ हे चर्चासत्र होईल. याबरोबरच राजीव मेहेरोत्रा, डॅनियल हान, रोमन जेरॉडीमस, थॉमस बिबल, खासगी गुप्तहेर रजनी पंडित, रक्षांदा जलील, आयरिन ज्युडा, अशोक चोप्रा, उदयन मित्र पहिल्या दिवशी संवाद साधणार आहेत.
दुसऱ्या दिवशी प्रियंका चतुर्वेदी या माजी न्यायाधीश विद्यासागर कानडे यांच्याशी ‘युवर्स ट्रुली विद्यासागर कानडे’ या कार्यक्रमांतर्गत संवाद साधतील. याबरोबरच उदय माहुरकर, सागरिका घोष, राधाकृष्णन पिलाई, हरीष भट, सुदीप सेन, मीरा बोरवणकर, अनु आगा, अभिनेत्री दिव्या दत्ता, कीर्ती कुल्हारी, जयंत कृपलानी, फिटनेस गुरू मिकी मेहता, इरा त्रिवेदी, लेखक तुहीन सिन्हा, सुधा मेनन, दिग्दर्शक विक्रम भट, अश्विनी अय्यर तिवारी यांना भेटता येईल.
महेश कोठारे, अभिनेता इम्रान हाश्मी, निर्माती एकता कपूर, लेखक हुसैन झैदी, समीक्षक खालिद मोहमद, तनुजा चंद्रा, अभय वैद्य, ऍलिसन जोझफ हे रविवारी सहभागी होणार असून ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्या ‘आशा पारेख- द हिट गर्ल’ या विशेष सत्राने संमेलनाची सांगता होणार आहे. इंग्लंडच्या साहित्यातील ज्येष्ठ लेखिका जेन ऑस्टीन यांच्यावर आधारित एका खास प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात येणार आहे. www.pilf.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध असून महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपच्या आरती कोंढरे यांचे जात प्रमाणपत्र अवैध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आरती कोंढरे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. तर भाजपच्या नगरसेविका वर्षा साठे, कविता वैरागे यांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सहा महिन्यांच्या मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे पद रद्द ठरले असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपला जोरदार धक्का बसला आहे.
पालिकेच्या निवडणुकीत खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ या प्रभाग क्र. १८ ब मधून कोंढरे या निवडून आल्या आहेत. मात्र, त्यांच्या कुणबी जातीच्या प्रमाणपत्रावर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी बुलढाणा जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. समितीच्या चौकशीत कोंढरे यांनी खोटे बनावट कागदपत्र सादर केल्याचे आढळून आले, त्यामुळे समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले आहे. तसेच, खोटे कागदपत्र सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या विरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचे कोंढरे यांनी सांगितले.
आरक्षित जागेवरून निवडणूक लढवून विजयी झालेल्या उमेदवारांनी सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर करण्याचे बंधन निवडणूक आयोगाने घातलेले आहे. यासंबंधीचे हमीपत्रच उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक उमेदवाराकडून भरून घेण्यात आले आहे. या मुदतीत भाजपच्या नगरसेविका कविता वैरागे आणि वर्षा साठे यांनी प्रमाणपत्र न दिल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द ठरले असल्याचे महापालिकेचे निवडणूक अधिकारी सतिश कुलकर्णी यांनी सांगितले. यापुढील काळात या दोन्ही सभासदांना पालिकेच्या कामकाजात सहभागी होता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने या दोन्ही नगरसेविकांचे पद रद्द ठरल्याची कोणतीही माहिती दिलेली नाही, त्यामुळे त्यांना कामकाजात सहभागी होण्यापासून आम्ही थांबवू शकत नाही, असे नगरसचिव सुनील पारखी यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकारामुळे पालिकेतील दोन विभागातील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.

आयुक्तांनी बदनामी केली : दिशा माने
निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर करणे बंधनकारक होते. त्यानुसार अखेरच्या दिवशी (२२ ऑगस्टला) हे प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर केले. मात्र, याची काहीही माहिती न घेता पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आम्ही प्रमाणपत्र सादर न केल्याने पद रद्द ठरल्याची माहिती प्रसारमाध्यमांना देत बदनामी केली असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका दिशा माने यांनी केला. झालेल्या चुकीबद्दल कुमार यांनी साधी दिलगिरी देखील व्यक्त केली नसल्याची तक्रार त्यांनी केली. दरम्यान, आयुक्त कुमार यांनी दिलेली माहिती योग्य होती, त्यानंतर संध्याकाळी उशिरा माने यांनी प्रमाणपत्र दिले, ठरावीक वेळेतच कागदपत्रे द्यावी, असे कोणतेही बंधन नसल्याचे निवडणूक अधिकारी सतिश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा डेपोसाठी जागा दिलेल्या मालकांना सेवेत कायम करण्याचा निर्णय

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या कचरा डेपोसाठी जागा दिलेल्या ऊरळी देवाची आणि फुरसुंगी येथील जागा मालकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या दोन्ही गावांमधील ५७ जणांना पालिकेच्या सेवेत कायम केले जाणार असून, त्यासाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी सांगितले. पुढील महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल.
फुरसुंगी आणि उरळी येथील सुमारे १६३ एकर जागा कचरा डेपोसाठी पालिकेच्या ताब्यात आहे. प्रकल्पासाठी जागा दिलेल्या मालकांचे पुनर्वसन करण्यासाठी येथील ५७ जणांची २०१० पासून पालिकेत कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांना पालिकेच्या सेवेत कायम केले जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. या कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती. पालिका प्रशासनाने याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता, याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याचे बापट यांनी सांगितले.
या संदर्भातील निर्णयाचा अध्यादेश काढल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल. सध्या महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांत ५७ जणांची नेमणूक आहे. प्रत्येक विभागातील उपलब्ध जागा आणि गरज लक्षात घेऊन त्यांच्या नेमणुकीची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूच्या धाकाने कार रणाऱ्यांना सक्तमजुरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रवाशी असल्याचा बनाव करून तसेच चाकूचा धाक दाखवून इनोव्हा कारची चोरी केल्याप्रकरणी चौघांना सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
गणेश उर्फ मनोहर रामभाऊ पवार (वय १९, रा. केशवनगर, वडगाव मावळ), प्रदीप नामदेव आलोनकर (२१, रा. वडगाव मावळ, मूळ रा. मध्य प्रदेश), महंमद बिच्छू महंमद उस्मान खान (२३, रा. बिहार) आणि मच्छिंद्र किसन मोहिते (२२, रा. वडगाव मावळ) या चौघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी अंतोनी लतीसलास नाडार (३४, रा. धारावी, मूळ रा. तमिळनाडू) यांनी या प्रकरणी ​हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. या केसचे कामकाज सरकारी वकील विलास पटारे यांनी पाहिले. त्यांनी या केसमध्ये दहा साक्षीदार तपासले. नऊ नोव्हेंबर २०१२ रोजी रात्री दोनच्या सुमारास मुळशी येथील भूमकर वस्ती येथील शनी मंदिर ते कोळवण दरम्यान हा प्रकार घडला होता.
घटनेच्या दिवशी नाडार हे वाकड येथील भूमकर वस्तीपासून मुंबईकडे निघाले होते. त्या वेळी आरोपींनी प्रवाशी असल्याचा बहाणा करून जबरदस्तीने नाडार यांची गाडी थांबवली. त्यानंतर आरोपींनी त्यांना ड्रायव्हर सीटवरून मागील सीटवर ओढले. चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण केली. तसेच, त्यांचे दोन मोबाइल आणि पाकीट काढून घेतले. त्यानंतर हात, पाय आणि डोळे बांधून त्यांना कोळवण येथे सोडून दिले. त्यानंतर चोरटे त्यांची इनोव्हा कार घेवून फरार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचसीएमटीआर’ला मान्यता

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या ‘हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट’ (एचसीएमटीआर) प्रस्तावाला बुधवारी शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर पुढील सहा महिन्यांत याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. तब्बल सहा हजार ६४६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, हा प्रकल्प खर्च उभारणीसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीने मान्यता दिलेला एचसीएमटीआरचा मार्ग पूर्णपणे उन्नत (एलिव्हेटेड) राहणार असून, प्रस्तावित आराखड्यातील मार्गाची रचना बदलण्यात आली आहे. तसेच, मार्गाची लांबी देखील काही प्रमाणात वाढली असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश लडकत यांनी सांगितले.
मध्यवर्ती भागात होणारी वाहतुकीची गंभीर समस्या सोडविण्यासाठी तीस वर्षांपूर्वी मध्यवर्ती भागातून जाणारा ३५.९६ किलोमीटर लांबीचा वर्तुळाकार रस्ता तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पालिकेच्या १९८७ च्या विकास आराखड्यात (डीपीमध्ये) एचसीएमटीआर रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. या रस्त्याबाबत कोणतीही प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल सतत प्रयत्नशील होते. गेल्या महिन्यातच पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बागूल यांना हा प्रकल्प मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. बुधवारी झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याचे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष लडकत यांनी सांगितले. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर ठेवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी एकूण ६ हजार ६४६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यामध्ये प्रकल्पाचा मूळ खर्च ५ हजार ९६ कोटी; तर भूसंपादनासाठी १ हजार ५५० कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पाचा खर्च उभारणीसाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनशीप (पीपीपी) मॉडेलचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाची रक्कम कशी उभारायची यासाठी सल्लागार समिती स्थापन केली जाणार आहे. या संदर्भात केंद्र तसेच राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करण्याचे अधिकार आयुक्त कुमार यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगीच्या प्रादुर्भावावरून पाच हजार जणांना नोटिसा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
संपूर्ण शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढला असून, त्या संदर्भात गेल्या दोन महिन्यांत पाच हजार जणांना नोटिसा जारी करण्याची कारवाई करण्यात आली आहे. नोटिसांबरोबरच ४९२ मिळकतींकडून सुमारे २ लाख ६९ हजार ६९० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
त्यामध्ये सर परशुराम भाऊ कॉलेजला ११ हजार रुपयांचा; तर हिराबाई देसाई कॉलेजला, महर्षी नगर येथील मॅक हॅँड्री या शाळेलाही प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तर व्हीआयटी कॉलेजला पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला असून, त्यांनी दंड देण्यास नकार दिला. डेक्कन कॉलेजकडून दंड भरण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील घोले रोड, नगर रोड, संगमवाडी, हडपसर- मुंढवा, धनकवडी, सहकारनगर भागात मोठ्या प्रमाणात डेंगीचे पेशंट आढळत आहेत. शहरात आजमितीला आतापर्यंत ९३४ जणांना डेंगीचे संशयित पेशंट आहेत. त्यापैकी जुलै व ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे २२८ आणि ५३४ जणांना डेंगीचे संशयित पेशंट आहेत. तर जुलै महिन्यात ५८; तर ऑगस्टमध्ये १५६ जणांना डेंगीची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे शहरातील ४ हजार ८५१ एवढ्या सार्वजनिक ठिकाणी डेंगीच्या अळ्या सापडल्याची ठिकाणे आढळली आहेत. तर १३ हजार २४२ खासगी ठिकाणी डेंगीच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. १९ जून ते २३ ऑगस्टदरम्यान डेगींच्या अळ्या सापडलेल्या ५ हजार १६० ठिकाणी नोटिसा देऊन कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

धूर फवारणी मोहीम सुरू
शहरातील ४९२ मिळकतींमध्ये अळ्या सापडल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख ६९ हजार ६९० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये शाळा, कॉलेज, काही हॉस्पिटल, मल्टिप्लेक्स, तसेच मॉलचा समावेश आहे. आता पुन्हा शहरात डेंगीच्या अळ्यांचा शोध घेण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारपासून औषध तसेच धूर फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. त्यात अळ्या सापडल्यास पुन्हा कारवाई केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images