Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

येत्या सोमवारी वकिलांचे कामबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवाजीनगर न्यायालय परिसरात ज्येष्ठ वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी पुणे बार असोसिएशनने येत्या सोमवारी (१४ ऑगस्ट) बंद पुकारला आहे. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र दौंडकर, उपाध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड यांनी ही माहिती दिली.
ज्येष्ठ वकील राजेंद्र विटणकर यांना बुधवारी माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी न्यायालयाच्या आवारात मारहाण केल्याचा प्रकार घडला. एका दिवाणी दाव्यामध्ये कैलास गायकवाड यांची अॅड. विटणकर यांनी उलटतपासणी घेतली. त्या वेळी गायकवाडने त्यांना ‘बाहेर ये बघून घेतो,’ अशी धमकी दिली. त्यानंतर ते कोर्ट हॉल बाहेर आले असता गायकवाड आणि त्याच्या इतर साथीदरांनी त्यांना मारहाण केली. त्यात त्यांचा चष्मा तुटला. तसेच डोळ्याला इजा झाली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या दिवशी या घटनेचे शिवाजीनगर न्यायालयात पडसाद उमटले. पुणे जिल्हा बार असोसिएशनने या घटनेचा तीव्र निषेध केला. सोमवारी बंद पुकारण्याचा ठराव मंजूर केला. कैलास गायकवाड याचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने स्वीकारू नये, असे आवाहन पुणे बार असोसिएशनकडून करण्यात आले आहे. गायकवाड याचे वकीलपत्र स्वीकारणाऱ्यावर कडक कारवाईचा इशारा असोसिएशनने दिला आहे. या वेळी उपाध्यक्ष अॅड. संतोष जाधव, सचिव अॅड.विवेक भरगुडे, अॅड.आशिष ताम्हाणे, अॅड. कुमार पायगुडे, अॅड. दत्ता गायकवाड, अॅड. ओंकार चव्हाण, अॅड. स्वप्नील काळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी योजनेचा खर्च २०० कोटींनी घटणार

$
0
0

जीएसटीनंतरच्या सुधारित ‘डीपीआर’चा अंदाज

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या सर्व भागांत समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) करण्यासाठी फेरनिविदा काढण्यात येणार असून, त्याचा खर्च सुमारे दोनशे कोटी रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या विभागीय दरपत्रकानुसार (डीएसआर) हा खर्च कमी होण्याचा प्राथमिक अंदाज पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात आला असून, त्यामुळे या प्रकल्पासाठी उभारण्यात येणाऱ्या कर्जरोख्यांची रक्कमही कमी होऊ शकते.
पालिकेच्या २४ बाय ७ योजनेंतर्गत बहुतांश जलवाहिन्या बदलण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा २६ टक्के जादा दराने आल्या होत्या. तसेच, मीटरच्या निविदाही चढ्या दरानेच आल्याने ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली होती. जीएसटीमुळे दरांमध्ये बदल होणार असल्याने नव्याने प्रक्रिया करण्याचा दावा पालिका आयुक्तांनी केला होता.
गेल्या महिन्यात संपूर्ण देशभरात जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे, प्रत्येक विभागांचे दरपत्रक नव्याने करावे लागणार होते. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जीएसटीच्या नव्या दरांनुसार प्रत्येक कामाचा खर्च निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, पाणीपुरवठा विभागाच्या विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरांमध्ये १० ते १२ टक्के कपात झाली आहे. तसेच, केंद्र सरकारने नुकत्याच काढलेल्या अधिसूचनेनुसार ‘वर्क अॅक्ट’वरील जीएसटीचा दर १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. त्याचा फायदा निविदांच्या दरांमध्ये पडणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात येत असून, पाणीपुरवठ्याच्या निविदांचा खर्च सुमारे दोनशे कोटी रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.

‘खर्च घटण्याचा दावा फसवा’
वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) समान पाणीपुरवठा योजनेचा खर्च कमी होणार असल्याचा केला जाणारा दावा अत्यंत फसवा असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केला आहे. सिमेंट, पाइप यासारख्या वस्तूंचे दर जीएसटीनंतर वाढले असताना, दर कमी होणार असल्याचे सांगून पुणेकरांची दिशाभूल केली जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. पालिका प्रशासनाने याबाबत खुलासा करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.
जीएसटीमुळे सर्व दर बदलले असल्याने समान पाणीपुरवठा योजनेतील कामांच्या फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वीपेक्षा जीएसटी अंतर्गत काही दर कमी झाल्याने योजनेचा खर्च दोनशे कोटी रुपयांनी कमी होण्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून केला जात आहे. मात्र, सिमेंटवरील १७ टक्के जीएसटी आता १८ टक्के झाला आहे, तर एम एस पाइपसाठी दिली जाणारी सूट पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, जीएसटीच्या नावाखाली योजनेचा खर्च कमी होणार असल्याचे स्वप्न दाखवून पुणेकरांची दिशाभूल केली जात असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डे खोदलेत, तर खबरदार...

$
0
0

पालिकेची गणेश मंडळांना तंबी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवात रस्त्यावर मांडव टाकणाऱ्या मंडळांनी खड्डे खोदून जर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, तर अशा गणेशमंडळांवर महापालिका कायद्यानुसार फौजदारी कारवाई; तसेच दंडही वसूल करेन, अशी तंबी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली. गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरू असून गणेश मंडळांकडून मांडव टाकण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मांडवांबाबत महापालिका प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली.

महापालिकेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि देशभ्रतार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ‘गणेश मंडळांकडून रस्त्यांवर मांडव घालत असताना खड्डे खोदण्यात येत असल्याने महापालिकेची भूमिका काय,’ या प्रश्नाला उत्तर देताना देशभ्रतार यांनी अशा मंडळांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सांगितले. ‘गणेश मंडळांनी मांडव घालताना खड्डे खोदू नयेत. या वेळी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, तर महापालिका संबंधितांवर फौजदारी कारवाईची भूमिका घेईल; तसेच दंडात्मकही कारवाईही करण्यात येईल,’ असे देशभ्रतार म्हणाल्या.

‘अमोनिअम बायकार्बोनेट’चा वापर

गणेशोत्सवात शाडूच्या गणेश मूर्तींचा वापर व्हावा, यासाठी महापालिकेने प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री होत असलेल्या ठिकाणी ‘अमोनिअम बायकार्बोनेट’ हा रासायनिक पदार्थ ठेवण्यात आला आहे. या द्रावणामध्ये गणेशमूर्ती विरघळते आणि मूर्तीचे खत तयार होते. ‘नागरिकांनी गणेश मूर्तीचे घरात विसर्जन केल्यानंतर मूर्ती या द्रावणात ब़ुडवून ठेवावी आणि त्याचे खत तयार करावे,’ असे आवाहन महापौरांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपॉइंटमेंट तीन वर्षांनंतरची

$
0
0

रिक्षा परवाना प्रक्रियेतील ‘एनआयसी’चा गोंधळ संपेना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिक्षा परवान्यांच्या अर्ज प्रक्रियेपासून सुरू झालेली गोंधळाची मालिका अद्यापही कायम आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कामकाज सुरळीत सुरू असताना, नॅशनल इन्फर्मेंटिक्स सेंटरकडून (एनआयसी) अर्जदारांच्या अर्जांच्या छाननीसाठी सुमारे तीन वर्षांनंतरची अपॉइंटमेंट दिल्याचा प्रकार शुक्रवारी निदर्शनास आला. वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपॉइंमेंटच्या तारखांमध्ये चूक झाल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले.

‘मागेल त्याला रिक्षा परवाना’ ही घोषणा केल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनंतर परवान्यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली. ‘एनआयसी’कडून ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यामध्ये उशीर झाल्याने रिक्षा चालकांना खूप मोठी प्रतीक्षा करावी लागली. ही प्रणाली सुरू झाल्यानंतरही तांत्रिक समस्या कायमच राहिल्या होत्या. अर्ज प्राप्त झालेल्या इच्छुकांच्या अर्जांची छाननी गेल्या सोमवारपासून सुरू झाली. त्यासाठी ‘एनआयसी’कडून संबंधितांना अपॉइंटमेंट देण्यात येत आहे. अर्जदारांना थेट मेसेज पाठवून याची माहिती दिली जात आहे. गेले पाच दिवसांपासून ही प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होती. मात्र, शुक्रवारी अपॉइंटमेंटच्या तारखांचा घोळ सुरू झाला आहे. एका अर्जदाराला अर्ज छाननीसाठी फेब्रुवारी २०१९ मधील अपॉइंटमेंट मिळाल्याचा मेसेज प्राप्त झाला आहे. तर, अन्य एकाला ऑगस्ट २०१८ ची अपॉइंटमेंट देण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा परवान्याच्या अर्जासाठी आता दीड-तीन वर्षे वेटिंग आहे का, अशी विचारणा अर्जदारांकडून केली जात आहे.

वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपॉइंमेंटच्या तारखा चुकीच्या दिल्या जात आहेत. आतापर्यंत ११ हजार इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. दर दिवशी शंभर उमेदवार याप्रमाणे नोव्हेंबर २०१७ पर्यंतच्या अपॉइंटमेंट दिल्या गेल्या आहेत. ‘फेब्रुवारी २०१९’ किंवा ‘ऑगस्ट २०१८’ ही अपॉइंमेंट तांत्रिक बिघाडामुळे दिली गेली असण्याची शक्यता आहे. याबाबत ‘एनआयसी’शी चर्चा करून यामध्ये सुधारणा केली जाईल, तसेच संबंधित अर्जदारांना पुन्हा अपॉइंटमेंट दिली जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी स्पष्ट केले.

..............

अपॉइंटमेंट देणे बंद
‘एनआयसी’च्या यंत्रणेमध्ये त्रांत्रिक बिघाड झाल्याने अर्जदारांना तीन वर्षांपर्यंतची अपॉइंटमेंट मिळत आहे. अनेकांना अशा चुकीच्या तारखा मिळाल्याने अपॉइंटमेंटची प्रक्रिया सध्या थांबविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यांची तक्रार करण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नागरिक व व्यापाऱ्यांना वर्गणी मागणाऱ्यांकडून त्रास दिला जातो. पण, भितीपोटी ते तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे कोणी जबरदस्तीने कोणी वर्गणीची मागणी करत असेल तर त्याची पोलिसांकडे तक्रार करा. त्या व्यक्तीवर, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे,’ अशी माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिली.

उत्सवाच्या काळात अनेकजण त्यांच्या इच्छेनुसार वर्गणी देतात. पण, काही जण नागरिकांकडून जबरदस्तीने वर्गणी वसुल करतात. व्यापारी, दुकानदार यांना एवढीच वर्गनी द्या, नाही दिली तर दमबाजी करत पैसे वसूल केले जातात. त्या भागात व्यवसाय करायचा असतो, म्हणून बऱ्याचदा भितीपोटी व्यापारी, दुकानदार पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. पण, गेल्या काही वर्षापासून तक्रार आल्यानंतर जबरदस्तीने वर्गनी वसुल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. या वर्षी देखील पोलिसांनी व्यापारी, दुकानदार यांची बैठक घेतली आहे. तसेच, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली आहे.

‘खंडणी विरोधीपथकाकडून सर्व पोलिस ठाण्यांना निवेदन देण्यात आले आहे. जबरदस्तीने वर्गनी मागणाऱ्यांबाबत तक्रार आल्यास कळविण्यास सांगितले आहे. तसेच, पथकाकडून या गोष्टीकडे लक्ष दिले जात आहे. सध्या तरी एकही तक्रार आलेली नाही. पण, नागरिकांकडून कोणी जबरदस्तीने वर्गनी वसूल करत असेल तर न घाबरता त्याची पोलिस ठाणे किंवा खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार करा. त्याची तत्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही जाधव यांनी दिले.
00

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूगोळा कारखान्यात नोकरीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

खडकी येथील दारूगोळा कारखान्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अकरा तरुणांची अकरा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक झालेल्या तरुणांना दारूगोळा कारखान्याचा गोल शिक्का असलेले बनावट लेटरहेड देण्यात आले होते. त्यामुळे कारखान्यात नोकरी मिळाल्याचे भासवून फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी राहुल गायकवाड (३२), रोहित गायकवाड (२५) आणि प्रवीण गाडे (सर्व रा. गौतमनगर भिंगार, अहमदनगर) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अशोक सर्जेराव घोडके (३३, रा. राम सोसायटी, फुलेनगर, येरवडा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी विकास पटेकर हा फिर्यादीच्या घरी आला होता. त्याने प्रवीण गाडे ,राहुल गायकवाड आणि रोहित गायकवाड हे तिघे दारूगोळा कारखान्यात कामाला आहेत. त्यांची तिथे चांगली ओळख असल्याने ते कारखान्यात सुपरवायझर म्हणून कामाला लावतात असे सांगितले. बुधवारी २ ऑगस्ट रोजी तिघे आरोपी फिर्यादीच्या घरी आले. त्या वेळी फिर्यादी आणि त्यांचे मेव्हणे परशुराम उबाळे उपस्थित होते. त्या वेळी आरोपींनी नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी एक लाख द्यावे लागतील अशी मागणी केली. फिर्यादी यांनी नोकरीच्या आशेने एक लाख दहा हजार रुपये आरोपींना दिले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी दारूगोळा कारखान्याच्या बनावट लेटरहेडवर नोकरीची बनावट सही शिक्क्यासह अपॉइंटमेंट दिली. हे पत्र घेऊन फिर्यादी दारूगोळा कारखान्यात गेले असता, ते बनावट असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक देशमुख करीत आहे.

चौकट

अकरा युवकांची फसवणूक

खडकी दारुगोळा कारखानात सुपरवायझर पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून राहुल गायकवाड,रोहित गायकवाड आणि प्रवीण गाडे यांनी अकरा युवकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने या तिघांनी अकरा जणांकडून प्रत्येकी एक लाख रुपये उकळले होते. या युवकांपैकी आठ जण नगरचे असल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बीच्या संपामुळे तारांबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
साउंड सिस्टीम व्यावसायिकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचे शहरात शुक्रवारी तीव्र पडसाद उमटले. अनेक सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम साउंड सिस्टीमविनाच पार पडण्याची वेळ आयोजकांवर आली. काही आयोजकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या यंत्रणेची व्यवस्था करत वेळ मारून नेली. अनेक ठिकाणी सुरू असलेले कार्यक्रम बंद पाडण्यात आल्याने कलाकारांसह प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली.
विविध मागण्यांसाठी आणि पोलिसांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून साउंड सिस्टीम व्यावसायिकांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शुक्रवारी शहरात कोणत्याही कार्यक्रमाला बाहेरून ध्वनीव्यवस्था पुरवण्यात आली नव्हती. सभागृहात असलेल्या ध्वनी व्यवस्थेवरच आयोजकांना कार्यक्रम पार पाडावा लागला. व्हायोलिन अॅकॅडमीतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे पं. काशिनाथ बोडस संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला साउंड सिस्टीम देण्यास नकार दिल्याने अखेर संस्थेच्या स्वयंसेवकांनी संस्थेतील यंत्रणा बसवून कार्यक्रम पार पाडला. रसिकांना ऐकू जावे यासाठी त्यांना रंगमंदिरात पुढच्या बाजूस बसवण्यात आले होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्यातर्फे सुरू असलेल्या सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रम कोणत्याही अडथळ्याविना पार पडला. या महोत्सवासाठी साउंड सिस्टीम पुरवणाऱ्या व्यक्तीशी मंडळाने आधीच करार केल्याने त्यांना कार्यक्रम करणे भाग ठरले. इतर ठिकाणी मात्र व्यावसायिकांनी कडकपणे संपाची अंमलबजावणी केली.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पीकर देणार
आज, शनिवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी पोलिसांनी ६५ डेसिबलची मर्यादा घातली आहे. त्याचे पालन करण्यात येणार असून, पोलिसांच्या आदेशाप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात दोन स्पीकर पुरवण्यात येतील, असे साउंड अँड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय शहा यांनी स्पष्ट केले. आम्हाला दहिहंडी आणि गणेशोत्सवावर विरझण घालायचे नाही; परंतु आमच्या मागण्या रास्त असून, त्या मान्य व्हायला हव्यात, याकडे शहा यांनी लक्ष वेधले.

मंड‍‍ळांना पैसे परत ?
दहीहंडीसाठी जवळपास सर्वच आयोजक मंडळांनी साउंड सिस्टीम बुक केली होती. मंडळांनी व्यावसायिकांना त्याची आगाऊ रक्कमही देऊ केली. मात्र, संपावर जाण्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक साउंड व्यावसायिकांनी मंडळांच्या आगाऊ रकमा त्यांना परत केल्याची चर्चा रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडगाव पुलावर ट्रकचालकास लुटणाऱ्या दोघांना अटक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुंबई- बेंगळुरू बाह्यवळण महामर्गावरून जाणाऱ्या ट्रकचालकाला वडगाव पुलावर अडवून मारहाण करून लुटल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे; तर दोघांचा शोध सुरू आहे.
नितीन पोपट लोंढे (वय ३१), जितेश उर्फ बंटी भास्कर सोनवणे (२४, दोघे रा. वारजे) अशी अटक केली आहे. याबाबत विठ्ठल गुलाबराव घाडगे (वय २५, रा. सांगोला, जि. सोलापूर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाडगे हे त्यांचा ट्रक घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. बुधवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास मोटर सायकलवरून आलेल्या चौघांनी त्यांचा ट्रक अडवला. केबिनच्या दोन्ही दारातून दोघे आत घुसून घाडगे यांना मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडील मोबाइल व १२ हजार रुपये घेऊन चौघे पसार झाले. सिंहगड रोड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलिसांना त्या दोघांनी त्यांची दुचाकी एका लॉजसमोर लावल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लॉजची तपासणी केली असता लुटणारे दोघे तेथील एका खोलीत झोपल्याचे आढळले. लोंढे व सोनवणेला त्या ठिकाणाहून अटक केली. लोंढे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. अन्य दोघांचा शोध सुरू असल्याचे उपनिरीक्षक गिरीश सोनवणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३५३ विद्यार्थ्यांवर टांगती तलवार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन परिषदेने (डीएमईआर) अनुसूचित जमातीसोबतच सर्व राखीव प्रवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र देऊन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी शुक्रवारी जाहीर केली. राज्यातील ३५३ विद्यार्थ्यांनी हमीपत्राद्वारे राज्यातील विविध मेडिकल कॉलेजांमध्ये अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला असून, आता या विद्यार्थ्यांवर प्रवेश रद्द होण्याची टांगती तलवार आहे. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेले मात्र, कॉलेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी अद्याप डीएमईआरने जाहीर केलेली नाही.
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र देऊन राज्यातील मेडिकल कॉलेजांमध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंजुरी देण्याचा निर्णय दिला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता डीएमईआरने हमीपत्राच्या आधारे एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस आदी अभ्यासक्रमांसाठी मेडिकल कॉलेजांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार ३५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, त्यांचे प्रवेश रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच, याचप्रकारे डीएमईआरला प्रवेश प्रक्रियेत हमीपत्राच्या आधारे राखीव प्रवर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची यादी देखील प्रसिद्ध करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात या संपूर्ण प्रकारांबाबत येत्या १८ ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीनंतरच विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. डीएमईआरने संपूर्ण प्रकाराची माहिती विद्यार्थ्यांना कळवली आहे.
दरम्यान, राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्यानंतर संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांला गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येईल. तसेच, हमीपत्राद्वारे गुणवत्ता यादीत समाविष्ट झालेल्या मात्र कॉलेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश हा सामान्य प्रवर्गात होणार आहे. या प्रकारामुळे डीएमईआरला सर्व राखीव प्रवर्गासोबतच सामान्य प्रवर्गासाठी नवीन प्रवेशाची गुणवत्ता यादी तयार करावी लागणार आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय १८ ऑगस्ट रोजी होणार असल्याने डीएमईआरने पुढच्या कार्यवाहीसाठी १९ ऑगस्ट तारीख निश्चित केली आहे. डीएमईआरने दुसरी प्रवेशाची गुणवत्ता यादी वेबसाइटवर जाहीर केली असून, विद्यार्थ्यांना १९ ऑगस्टपर्यंत मिळालेल्या कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत स्वतंत्र आयुक्तालय लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी वित्तविभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी (११ ऑगस्ट) विधानसभेत दिली. पावसाळी अधिवेशनात स्थानिक आमदारांनी मांडलेल्या लक्षवेधी उत्तर देताना पाटील यांनी ही माहिती दिली. शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्वंतत्र आयुक्तालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. तसेच ‘मटा’ने सुरुवातीपासून हा मुद्दा उचलून धरला असून, त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. पाटील यांच्या उत्तरामुळे त्याला यश आले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी; तसेच वाढते शहरीकरण या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची गरज असल्याची बाब ‘मटा’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केली होती. दोन वर्षांपूर्वी ‘पुणे सुपर फास्ट’ कार्यक्रमात फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि ‘मटा’ने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अति उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र आयुक्तालयाच्या रचनेबाबत चर्चा केली होती. तसेच त्यानंतर या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती.
शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाच्या मागणीवर काय झाले, याबाबत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, आमदार शरद सोनावणे, आमदार राहुल कुल यांनी शुक्रवारी (११ ऑगस्ट) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. तसेच या आमदारांनी तसेच आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यापूर्वी अनेकदा स्वतंत्र आयुक्तालयाबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. सरकारच्या वतीने या लक्षवेधीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री रणजीत पाटील म्हणाले, ‘कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रश्नात लक्ष घातले आहे. त्यामुळे लवकरच आयुक्तालय स्थापन करण्याबाबत घोषणा होईल.’
‘महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजिक केलेल्या ‘पुणे सुपरफास्ट’ कार्यक्रमात राज्याचे तत्कालीन पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाच्या उभारणीसाठी महानगरपालिकेने खर्चाचा भार उचलण्याची तयारी दर्शवावी असे आवाहन केले होते. त्यानंतर महापौर व तिन्ही आमदारांनी त्याला पाठिंबा तर दिलाच होता. पण सर्वपक्षीय शहराध्यक्षांनीही सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सहकार्य करण्याची भूमिका स्वीकारली होती.

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे लवकरात लवकर आयुक्तालय व्हावे म्हणून लक्षवेधी सूचना मांडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांची याबाबत कायमच सकारात्मक भूमिका राहिली आहे. स्वतंत्र आयुक्तालयाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी अर्थ विभागाकडे दिल्याचे गृहराज्यमंत्री पाटील यांनी शुक्रवारी उत्तरादाखल सांगितले आहे. महाराष्ट्र टाइम्सनेही याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असून, लवकरच आयुक्तालय कार्यन्वित होण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत.
- आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप

वित्त विभागाकडे स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होईल. शहराची होणारी वाढ लक्षात घेता आम्ही याबाबत कायमच आग्रही आहोत. शहरात कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या, औद्योगिक पट्टा, २० लाखांवर गेलेली लोकसंख्या आणि कायदा-सुव्यवस्था या बाबींचा विचार करता लवकरात लवकर आयुक्तालय होणे आवश्यक आहे. त्यासाठी लक्षवेधी मांडली होती. त्यावर उत्तरादाखल गृहराज्यमंत्र्यांनी आयुक्तालय लवकरच कार्यान्वित होईल, असे सांगितले. लवकरच कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय होऊन पोलिस आयुक्तालय अस्तित्वात येईल.
- महेश लांडगे, आमदार

आयुक्तालय लवकरच कार्यान्वित होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. २०१५ ला आमच्या मागणीवरून महासंचालकांनी प्रस्ताव पाठविला होता. परंतु, गृहसचिवांकडून सुधारित प्रस्तावाची मागणी झाली. तो देखील पाठविण्यात आला आहे. राज्यातील रिक्त पदांमधूनच पोलिस आयुक्तालय होऊ शकेल असेही रणजीत पाटील यांनी सांगितले आहे. आयुक्तालयाच्या अडथळ्यांचा प्रवास आता संपला असून, दिवाळीच्या तोंडावर कामकाज सुरू होईल.
- अॅड. गौतम चाबुकस्वार, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्काराचा आरोप असलेल्याचा मुलगी व बापाकडून खून

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या तरुणावर मुलीने व तिच्या बापाने भरचौकात कोयत्याने वार करून खून केला. तरुणाला वाचविण्यासाठी आलेल्या आई-वडिलांवर वार केले. इंदापूर तालुक्यातील नीरा नृसिंहपूर येथे दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
नीलेश नागनाथ घळके (वय १७, रा. नीरा नृसिंहपूर, ता. इंदापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तरुणाच्या आईने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून नीलेश नागनाथ घळके व श्रीकांत पोपट घळके (रा. गणेशगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दोघांविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात श्रीकांत घळके यास अटक करण्यात आली होती; तर मृत नीलेश अल्पवयीन असल्याने त्याला बालन्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. त्यामुळे मुलीचा वडील त्याच्यावर चिडून होता. तो तक्रारदार यांच्या घरी येवून कोर्टाने त्याला सोडले असले तरी मी सोडणार नाही, अशी धमकी देत होता.
यामुळे घाबरलेल्या घळके कुटुंबीयांनी नीलेशला इंदापूर येथे शिक्षणासाठी होस्टेलवर ठेवले होते. नीलेशची परीक्षा संपल्याने तो गुरुवारी दुपारी तीन वाजता घरी आला. याची माहिती मिळताच आरोपी व त्याची मुलगी घरी आले. नीलेशच्या वडिलांनी आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. मुलीने तक्रारदार यांच्यावर वार केला. हा प्रकार पाहून नीलेश गावात पळाला; पण आरोपीने पाठलाग करून त्याला चौकात गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपीने केलेल्या वारामध्ये नीलेशच्या डाव्या हाताचा पंजा हाता वेगळा झाला. त्यात जागीच त्याचा मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने नीरा नृसिंहपूर चौकात खळबळ उडाली. या प्रकरणी इंदापूर पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुलीत हयगय केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘वीजबिलांच्या थकबाकी वसुलीमध्ये किंवा थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईत हयगय झाल्यास क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा ‘महावितरण’चे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिला आहे.
वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा करण्यासाठी उच्च व लघुदाब वीजग्राहकांविरुद्ध ‘महावितरण’ने वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ही मोहीम सुरू आहे.
याबाबत ताकसांडे म्हणाले, ‘वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित होणार असल्याचा संदेश वीजग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. पाचही जिल्ह्यांत वीजग्राहकांच्या दरमहा वीजबिलांसह थकीत रकमेची वसुली कमी झाली आहे. ही स्थिती चिंताजनक आहे. थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसुलीमध्ये हयगय किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणाऱ्या स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई केली जाणार आहे.’
तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल, तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई; तसेच वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी थकीत वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.

शनिवार आणि रविवारीही भरणा केंद्रे सुरू
पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या शहरी व ग्रामीण भागातील ‘महावितरण’चे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र शनिवारी (दि. १२) आणि रविवारी (दि. १३) रोजी सुरू राहणार आहेत. या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी आहे. वीजग्राहकांना वीजबिलाचा आणि थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी ही केंद्रे सुरू राहणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यक्रम एक, पत्रिका दोन

$
0
0

पालिकेच्या गणेशोत्सव कार्यक्रमांवरून सत्ताधाऱ्यांत दुफळी?

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सर्वी वर्षा‍निमित्त पालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उद्‍‍घाटन कार्यक्रमाच्या चक्क दोन स्वतंत्र पत्रिका काढण्यात आल्याचे समोर आले आहे. महापौर कार्यालयाने एक पत्रिका काढली असून दुसरी कार्यक्रमपत्रिका नक्की कोणी काढली, याची काहीही माहिती नसल्याचा खुलासा महापौर कार्यालयाकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी काढण्यात आलेल्या या दुसऱ्या पत्रिकेवर पालिकेचा लोगो, स्मार्ट सिटीचा लोगो यांच्यासह पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या फोटोसह पालिकेतील पदाधिकाऱ्यांचे फोटो देखील छापण्यात आले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सर्वी वर्ष असल्याने याचे औचित्य साधत पालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, शनिवारी (१२ ऑगस्ट) याचे उद्‍‍घाटन होणार आहे. शनिवारवाड्यावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठीची निमंत्रण पत्रिका दोन दिवसांपूर्वीच महापौर कार्यालयाने छापून सर्वत्र वितरित करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी महापौर कार्यालयाने नियमाप्रमाणे पत्रिका छापलेली असतानाच शुक्रवारी दुपारपासून अचानक याच कार्यक्रमाच्या नवीन पत्रिकांचे वाटप पालिकेत केले जात होते. या पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह पालिकेतील भाजपचे पदाधिकारी असलेले महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, तसेच पालिका आयुक्त कुणाल कुमार यांचे फोटो छापण्यात आले आहेत.

पालिकेच्या वतीने आयो‌जित करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून महापौर कार्यालयाने त्याची रितसर पत्रिका छापलेली असतानाही दुसरी निमंत्रण पत्रिका छापल्याने पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्याची चर्चा पालिकेत सुरू झाली आहे. पालिकेच्या प्रोटोकॉल अधिकारी योगिता भोसले यांना या नवीन निमंत्रण पत्रिकेबाबत विचारले असता, आम्ही एकच पत्रिका छापली असून दुसऱ्या पत्रिकेबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रिकेवर वापरण्यात आलेले पालिका लोगो, तसेच स्मार्ट सिटीचा लोगो नक्की कोणाच्या परवानगीने वापरण्यात आला, याची माहिती नसल्याचेही स्पष्टीकरण भोसले यांनी दिले.

खासदार समर्थक नाराज

महापालिकेच्या वतीने शनिवारवाडा येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमासाठी दोन पत्रिका छापण्यात आल्या आहेत. या पत्रिकेत शहरातील खासदारांचे फोटो छापले नसल्याने खासदार समर्थकांकडून टीका करण्यात येत आहे. ही पत्रिका कोणाच्या आदेशाने तयार झाली, अशी विचारणाच खासदार समर्थकांनी महापौरांना केली आहे.

ढोल ताशा वादनाची जागा बदलणार

शतकोत्तर रौप्य महोत्सर्वी वर्षानिमित्त गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी पालिकेच्या वतीने तीन हजार ढोल-ताशांचे वादन केले जाणार आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार असल्याचे प्रशासनाने यापूर्वी जाहीर केले होते. कार्यक्रम पत्रिकेत याचे स्थळ देखील निश्चित करण्यात आले होते. मात्र आता यामध्ये बदल करण्याची तयारी पालिकेने केली आहे. एकाच वेळी तीन हजार ढोल ताशा वाजणार असल्याने यासाठीच्या आवश्यक त्या परवानग्या न मिळाल्याने जागेत बदल केला जाणार आहे. शहराच्या बाहेरची जागा यासाठी नि‌श्चित केली जाणार असून पुढील आठवड्यात जागा निश्चित होईल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपती, लोकमान्यांची प्रतिमा बोधचिन्हात हवी

$
0
0

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळकांची प्रतिमा ही महापालिकेच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाच्या ‘लोगो’मध्येच हवीच, अन्यथा मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याची मागणी शिवसेनेने केली. तर, स्वातंत्र्यलढ्याच्या एका पर्वाचे नेतृत्व ज्या टिळकांनी केले त्यांचा फोटो महानगरपालिका वापरत नाही ही अत्यंत निषेधार्ह बाब असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव ही एक चळवळ उभी करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, यासाठी लोकमान्यांची प्रतिमा ही गणेशोत्सवामध्ये असणे आवश्यक असल्याची मागणी केसरीवाडा गणेशोत्सवाचे प्रमुख रोहित टिळक यांनी केली आहे. महापालिकेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या ‘लोगो’मध्ये लोकमान्यांची प्रतिमा वापरण्यात न आल्याने महापालिकेवर टीकेची झोड उठली आहे.

‘सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत कोणताही वाद असण्याचे कारण नाही. सव्वाशे वर्षापूर्वी म्हणजे पेशव्यांच्या काळातही गणेशोत्सव होत होता. परंतु, त्यास सार्वजनिक स्वरूप देण्यात लोकमान्यांनी पुढाकार घेतला. सार्वजनिक उत्सवाची मूळ प्रेरणा पुढच्या पिढीला मिळावी यासाठी लोकमान्यांची प्रतिमा महापालिकेच्या गणेशोत्सवात असणे आवश्यक आहे,’ अशी मागणी रोहित टिळक यांनी केली आहे.

‘स्वातंत्र्यलढ्याच्या एका पर्वाचे नेतृत्व ज्या टिळकांनी केले त्यांचा फोटो महानगरपालिका वापरत ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. त्याचा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करण्यात येत असल्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले. ‘पालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने टिळक यांना स्थान न देता सत्ताधारी पुणेकरांचा अपमान करत आहेत आणि तो सहन करणार नाही,’ अशी टीका शिवसेनेचे शहर संघटक श्याम देशपांडे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्र-कुलगुरूपदासाठी लॉबिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठांमध्ये प्र-कुलगुरू पदाची निवड करावी लागणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्र-कुलगुरूपदाची निवड येत्या काही दिवसांत होणार असून कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी या पदासाठी चार नावे राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठविली आहेत. मात्र, प्र-कुलगुरूपदासाठी आपली निवड व्हावी यासाठी शंभर जणांची शिफारस विद्यापीठाला शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे. त्यामुळे आता प्र-कुलगुरूपदासाठी देखील इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे चित्र आहे.

सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाला प्र-कुलगुरूंची नेमणूक करावी लागणार आहे. ही नेमणूक लवकर होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रशासन तत्पर आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी चार नावे कुलपती कार्यालयाकडे पाठविली आहे. तसेच, प्र- कुलगुरूपदासाठी आपली निवड व्हावी यासाठी कुलसचिव कार्यालयात दिवसाला एक ते दोन शिफारसींचे अर्ज येत आहे.

अशाच प्रकारचे अर्ज हे कुलपती कार्यालयात जात आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी दिली. त्यामुळे आतापर्यत प्र-कुलगुरूपदासाठी अर्जांची एकूण संख्या १००च्या आसपास झाल्याची माहिती आहे. मात्र, प्र-कुलगुरूपदासाठी येणाऱ्या अर्जांची संख्या पाहता ही निवड देखील चुरशीची होणार आहे. त्यामुळे या पदासाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील जाणकार व तज्ज्ञांनी जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे चित्र आहे. दरम्यान, डॉ. करमळकर आणि डॉ. शाळिग्राम यांनी नावे जाहीर करण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कौतुकासाठी उद्या नक्की या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मटा हेल्पलाइन’च्या यंदाच्या शिलेदारांना चेक प्रदान करण्याचा कार्यक्रम उद्या, रविवारी (१३ ऑगस्ट) आयोजिण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी ‘मटा’च्या वाचकांना आग्रहाचे निमंत्रण आहे.
बिकट आर्थिक स्थितीशी सामना करून इयत्ता दहावीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना ‘मटा हेल्पलाइन’ या उपक्रमाद्वारे आर्थिक मदत दिली जाते. यंदा या उपक्रमात १५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी वाचकांच्या मदतीचा प्रचंड ओघ अजूनही सुरू आहे.
वाचकांनी दिलेली ही मदत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांच्या मनात ‘विश्वास’ जागवणारे विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते यंदाच्या शिलेदारांना चेक प्रदान करण्यात येणार आहेत. हा केवळ चेक प्रदान करण्याचा समारंभ नाही, तर या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचा कौतुक सोहळाही आहे. त्याचप्रमाणे ‘मटा’चे वाचक दर वर्षी ज्या विश्वासाने मदत करतात, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही हे औचित्य आहे. आबासाहेब गरवारे कॉलेजच्या सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.
चैतन्यमयी शब्दांची ओंजळ
पुण्यात २०११ मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’ची आवृत्ती सुरू झाल्यानंतर त्या वर्षापासूनच पुण्यात हा उपक्रम राबविण्यात आला. पहिल्या वर्षापासूनच पुणेकरांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या सहा वर्षांत ‘मटा हेल्पलाइन’च्या चेक प्रदान करण्याच्या समारंभासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. शां. ब. मुजुमदार, डी. एस. कुलकर्णी, विठ्ठल कामत, अविनाश धर्माधिकारी असे प्रमुख पाहुणे लाभले आहेत. त्यांनी आपल्या शब्दांनी विद्यार्थ्यांच्या मनात चैतन्य जागवले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आत्मविश्वासही दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलासाठी भूसंपादन सुरू

$
0
0

चांदणी चौक उड्डाणपुलाला अखेर मुहूर्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या अनुषंगाने भूसंपादन करण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांनीच आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने महपालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. या उड्डाणपुलासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली असून ‘एनडीए’, मुळशी रस्ता, पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग आणि बावधन येथील जमिनी रस्त्यासाठी संपादीत करण्यात येणार आहेत.

महापालिका प्रशासनाने शुक्रवारी झालेल्या शहर सुधारणा समितीपुढे रस्त्यासाठीच्या जमिनी संपादीत करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे. चांदणी चौकात उड्डाणपूल बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे ‘एनडीए’, मुळशी आणि बावधनकडे जाण्या-येण्यासाठी वाहतुकीत बदल करावे लागणार आहेत. त्याशिवाय महामार्गावरून कात्रज, तसेच देहू रोडच्या दिशेकडून येणाऱ्या वाहनांना ‘एनडीए’, मुळशी आणि बावधनकडे जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र सोय करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असलेले रस्त्यांची आखणी बदलणार आहे. महापालिका प्रशासनाने या अनुषंगाने नवीन पाच रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील काही रस्ते चक्राकार वाहतुकीद्वारे एकमेकांना जोडले जाणार आहेत. हे रस्ते तयार करण्यासाठीचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीने मंजूर केला असून तो मुख्यसभेपुढे सादर केला जाणार आहे.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २७ ऑगस्टला भूमिपूजन होणार आहे. मात्र, या उड्डाणपूलाला लागणाऱ्या जागेचे भूसंपादन झालेले नाही. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध सर्वसाधारण सभेत केल्यामुळे वातावरण तापले होते.

काय बदल होणार?

मुळशी रस्त्यांकडून मुंबईकडे जाण्यासाठी १२ मीटर रुंदीचे एक लूप प्रस्तावित आहे. हा रस्ता बावधन येथील सर्व्हे नंबर ५५मधून अ ते ब १२ मीटर रुंदीचा आणि ३० मीटर लांबीचा रस्ता करण्याचे नियोजन आहे. तसेच, पाषाण रस्त्यावरून उड्डाणपालाचा एक फाटा (आर्म) ‘एनडीए’ रस्त्याकडे असणार आहे. तेथून हा रस्ता लूपद्वारे कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक ७५ आणि ७७ मधून मुंबईकडे जाण्यासाठी महामार्गाला जोडला जाईल. कात्रज बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गावरून ‘एनडीए’कडे जाण्यासाठी एक लूप सर्व्हे क्रमांक ७५ आणि ७७मध्ये प्रस्तावित केलेला आहे. दोन्ही लूप एकमेकांना जोडण्यासाठी सर्व्हे नंबर ७५मध्ये गोलाकार वाहतूक (रोटरी) प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी १२ मीटर रुंदीचे दोन लूप, रुंदीची एक रोटरी सर्व्हे नंबर ७५ आणि ७७ क-ड-इ-फ मध्ये प्रस्तावित आहे. यापैकी ५० मीटर लांबीचा रस्ता हा जैव विविधता उद्यान झोनमधील आहे, तर उर्वरित ६० मीटर रुंदीचा प्रस्तावित रस्ता निवासी झोनमधील आहे.

प्रस्तावित रस्ते

- सर्व्हे नंबर ५५ बावधन (खुर्द) अ ते ब ३० मीटर लांबी आणि १२ मीटर रुंदी
- कोथरूड सर्व्हे नंबर ७५ आणि ७७ क-ड-इ-फ ११० मीटर लांबी आणि १२ मीटर रुंदीचे दोन लूप रस्ते व रोटरी
- बावधन खुर्द सर्व्हे नंबर २० आणि कोथरूड सर्व्हे नंबर ९९ ग ते घ २३० मीटर लांबी आणि नऊ मीटर रुंदी
- बावधन खुर्द सर्व्हे नंबर २० च ते छ ६० मीटर लांबी आणि १२ मीटर रुंदी
- बावधन खुर्द सर्व्हे नंबर २० ज ते झ २२० मीटर लांबी आणि १२ मीटर रुंदी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कात्रजच्या कोंडीवर उड्डाणपुलाचा उतारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महामार्गालगतच्या मद्यविक्रीचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी शहराच्या हद्दीतून जाणारे महामार्ग पालिकेकडे हस्तांतर करण्याची मागणी लावून धरणाऱ्या पालिका प्रशासनाने, प्रत्यक्षात विकासकामे करायची वेळ आल्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जबाबदारी स्वीकारण्याची गळ घातली आहे.
कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे-सातारा रस्त्यावर उड्डाणपूल आणि कात्रज-कोंढवा रस्त्याने येऊन बायपास रस्त्याला जाण्यासाठी भुयारी मार्ग करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या दोन्ही प्रकल्पांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागेपैकी काही भाग सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे. या दोन्ही प्रकल्पांचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आर्थिक तरतुदीसाठी व प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.
पुणे-सातारा रस्ता, नऱ्हे-कात्रज बायपास रस्ता आणि कात्रज-कोंढवा रस्ता या तीन रस्त्यांची वाहतूक कात्रज चौकात येते. तसेच, या चौकापासून ५० मीटरच्या परिघात पुणे महानगर परिवहन महामंडळाचा डेपो आणि दोन मोठे बस स्टॉप आहेत. या ठिकाणाहून दर मिनिटाला काही बस सुटतात. या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून, खासगी वाहनांची संख्याही वाढली आहे. परिणामी, या चौकात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत आहे. काही वर्षांपूर्वी कात्रज-कोंढवा रस्त्यावर कात्रज चौक ते राजस सोसायटी या दरम्यान उड्डाणपूल उभारून कोंडी सोडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु, त्यामुळे चौकातील कोंडी सुटलेली नाही. त्यामुळे आता ही कोंडी फोडण्याच्या दृष्टीने उड्डाणपूल व भूयारी मार्ग करण्याचे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेडफोनच्या नादात ‘त्याने’ गमावला जीव

$
0
0

रूळ ओलांडताना रेल्वेखाली चिरडला

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

महाविद्यालयातील ‘त्याचा’ पहिलाच दिवस... नव्या मित्रांची ओळख आणि धमाल करून स्वारी घराकडे परतत होती...दरम्यान, कानात हेडफोन लावून रूळ ओलांडताना रेल्वेखाली त्याचा मृत्यू झाला.... अशी धक्कादायक आणि तेवढीच ह्रदयद्रावक घटना आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी (११ ऑगस्ट) घडली.
ओमकार दशरथ ओडाफे (वय १६, रा. तळेगाव) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ओमकारने नुकताच निगडी येथील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मेकॅनिकल शाखेच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. शुक्रवारी त्याचा कॉलेजचा पहिलाच दिवस होता. कॉलेजात नव्या मित्रांशी केलेल्या ओळखी मनात साठवून नव्या स्वप्नांसह घरी परतत असताना रेल्वेस्थानकावर हा अपघात घडला.
ओमकार कानात हेडफोन लावून रूळ ओलांडत होता. त्या वेळी पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसखाली तो सापडला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कॉलेज प्रशासनालाही धक्का बसला. ओमकारचे आई-वडील तळेगाव येथे माळीकाम करतात. तरुण मुलगा गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओमकारजवळ असलेल्या कॉलेजच्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदेशीर निर्बंध हिंदू सणांवरच का?

$
0
0

शहर दहीहंडी उत्सव समितीचा सवाल; प्रशासनाचा निषेध

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहीहंडी उत्सवातील साउंड सिस्टीमवर पोलिसांकडून लादण्यात येणारे निर्बंध अवास्तव आहेत. विविध नियमांवर बोट ठेवून आमच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे सातत्याने सांगितले जाते. हिंदू सणांवरच निर्बंध का, असा सवाल उपस्थित करून पुणे शहर दहीहंडी उत्सव समितीने प्रशासनाचा निषेध केला. पालकमंत्री आणि पोलिसांनी आमच्या मागण्यांवर विचार केला नाही तर, यंदा दहीहंडी फोडणार नाही असा इशारा समितीतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आला.
‘दहीहंडी आणि गणेशोत्सव जवळ आला की प्रशासनाला प्रदूषण आणि इतर नियम आठवतात. अशा वेळी नियमांचे कागद दाखवून मंडळाच्या कार्यक्रमांना वेठीस धरले जाते. यंदा पोलिस प्रशासनाने सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसाठी घेतलेल्या बैठकीत केवळ दोनच स्पीकर लावून कार्यक्रम साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. जास्त स्पीकर वापरल्यास गुन्हा दाखल करू, असे सांगितले आहे. प्रशासनाकडून सातत्याने हिंदू सणांवर निर्बंध का टाकले जातात. वर्षभरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमात तसेच जयंतीच्या मिरणुकांमधील ध्वनिप्रदूषणाबद्दल मौन बाळगले जाते. मात्र, आमच्या सणांना नियम का लागतात,’ असा प्रश्न उत्सव समितीचे राहुल म्हस्के यांनी उपस्थित केला.
प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी शहरातील विविध दहीहंडी मंडळे एकत्र आली आहेत. समितीचे सर्व सदस्य आज, शनिवारी पालकमंत्री आणि पोलिसांना भेटून मागण्यांचे निवेदन देणार आहेत. त्यांनी चर्चा करावी, मंडळांची बाजू समजून घ्यावी, ही आमची अपेक्षा आहे. आमच्या मागण्या त्यांनी मान्य न केल्यास शहरातील सर्व दहीहंडी मंडळे हंडी न फोडताच प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करणार आहोत, असे राजेंद्र देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images