Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्यात २ कोटी ९० लाखांच्या जुन्या नोटा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दोन कोटी ९० लाखाच्या जुन्या नोटा बदलून नवीन करण्यासाठी गेलेल्या पुण्यातील दोन बांधकाम व्यावसायिकासह तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मुबंई-पुणे महामार्गावर उर्से टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली.

बांधकाम व्यवसायिक नविंदू घनश्याम गोयल (वय ४३, रा. पिपले गुरव), दिलीप सत्यनारायण गुप्ता (वय, ४९, रा. पुणे) आणि मर्सिडीज कार
चालक गौरव भगवानदास आगरवाल (वय ३३, रा. खराळवाडी, पिंपरी) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

उपअधीक्षक जी.एस. माडगूळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथे जुन्या नोटा बदलण्यासाठी हे तिघे गेले होते. मात्र, ते शक्य झाले नाही. दरम्यान, मुबंईहुन पुण्याला येत असताना याबाबतची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या राज्य दहशतवाद विरोधी पथक व अधीक्षकांचे पथक यांना मिळाली. त्यावरून ही माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आली. परंतु, तोपर्यंत मर्सिडीज लोणावळ्यावरून पुढे निघाली होती. म्हणून तेथील पोलिसांनी मर्सिडीज (एमएच 14, सीके 400) चा पाठलाग सुरू केला. तर पुणे एसपी ऑफिसमधील पथक उर्से येथे सापळा रचून थांबले होते.

लोणावळ्याचे निरीक्षक चंद्रकांत जाधव, एसपी स्कॉडचे सहाय्यक निरीक्षक अर्जुन मोहिते, ग्रामीण एटीएसचे घोगुरकर व पथकाने ही कामगिरी केली. आयकर विभागाला याची माहिती देण्यात आली असून, तळेगाव पोलिस ठाण्यात नोटा मोजण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानाचा प्रवास वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहर आणि आजूबाजूच्या परिसरात परदेशी कंपन्याकडून होत असलेली वाढती गुंतवणूक आणि त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींमुळे केवळ राष्ट्रीयच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध शहरांबरोबर पुणे शहर जोडले गेले आहे. त्यामुळे हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही गेल्या काही वर्षात वाढत असल्याचा निष्कर्ष पालिकेने तयार केलेल्या पर्यावरण अहवालामध्ये काढण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दुप्पट झाली आहे. २०१३ मध्ये प्रत्येक दिवशी ९ हजार ८०० नागरिक विमानाने प्रवास करत होते. ही संख्या यंदाच्या वर्षी प्रतिदिन १७ हजार ४४१ वर पोहचली आहे.
शहराचा आजूबाजूचा भाग असलेला चाकण, हिंजेवाडी, तळेगाव या भागांत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले प्रकल्प उभे केले आहेत. शहराला हवाई मार्गाद्वारे जोडणाऱ्या विमानांची संख्याही वाढत असल्याने आपोआप विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. २०१६-१७ या वर्षात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या ६५ लाख १२ हजारावर गेली आहे. चार वर्षांपूर्वी ही संख्या अवघी ३५ लाख ९७ हजार इतकी होती. कमीत कमी वेळेत एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये जाता यावे, यासाठी अनेक विमान कंपन्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्याने याचा फायदा घेत विमानप्रवासाला नागरिक प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. याबरोबरच पुणे शहरातून दुबई, अबू धाबी या शहरांमध्ये थेट जाण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, पुढील काळात मस्कत, शारजा यांसह इतर देशांमध्ये जाण्यासाठी थेट सेवा उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक वाढणार आहे.

रेल्वे, बस प्रवासी घटले
विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एसटी महामंडळाच्या बसने तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मात्र घटत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी (२०५ १६) रेल्वेने प्रतिदिन २ लाख १८ हजार नागरिक प्रवास करत होते. यंदाच्या वर्षी ही संख्या २ लाख १७ हजारावर आली आहे. तर एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्येही मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी प्रतिदिन ३ लाख २३ हजार प्रवासी होते. ते आता ३ लाख ४ हजारांवर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दीच्या वादातून ६७ वाघांचा मृत्यू

$
0
0

पुणे : जमिनीच्या हद्दीवरून भावकीत होणारी भांडणे माणसांसाठी नवी नसली तरी जंगलात वर्चस्व आणि हद्द प्रस्थापित करण्यासाठी वाघांमध्ये सध्या होत असलेली भांडणे त्यांच्यासाठी जीवघेणी ठरत आहेत. राज्यात दर वर्षी होत असलेल्या वाघांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये हद्दीचा वाद हा गंभीर मुद्दा पुढे आला आहे. गेल्या पाच वर्षांत ६७ वाघांचा मृत्यू एकमेकांमधील भांडणातून झाला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारतर्फे व्याघ्र संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांमुळे गेल्या दहा वर्षांत वाघांची संख्या वाढविण्यात यश आले आहे. मात्र, वाघांच्या संख्येबरोबरच त्यांच्या समोरील आव्हानेही वाढली आहेत. जंगलात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी वाघांना संघर्ष करावा लागतो आहे. हद्द प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात काही वाघांनी अभयारण्यालगतच्या बफर झोनमध्ये कुटुंब विस्तारले आहे; तर काही ठिकाणी हद्दीच्या वादात होणाऱ्या भांडणातून वाघ जीव गमावत आहेत.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि केंद्रीय वन्यजीव संस्थेने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांत ४०७ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील २०० वाघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील ३३ टक्के अर्थात ६७ वाघ हे एकमेकांशी मारामारी करताना मृत्युमुखी पडले आहेत. तर ५२ घटनांमध्ये वाघांची शिकार झाली आहे. या वर्षात जुलै अखेरपर्यंत ६२ वाघांचा मृत्यू झाला असून, यातील ४९ वाघांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रत्येक वाघ हा स्वतःची हद्द राखून राहणारा प्राणी आहे. त्यांच्या हद्दीत इतर वाघांना प्रवेश मिळत नाही. एखाद्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्यांच्यामध्ये मारामारी होऊन ताकदवान वाघ त्या हद्दीचा मालक बनतो. ही नैसर्गिक प्रक्रिया असून, यापूर्वीही सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये हद्दीच्या भांडणातून वाघांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, अलीकडे आपण त्यांच्या हालचाली अधिक बारकाईने टिपत असल्याने वाघांचे भांडणातून मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसते, अशी माहिती केंद्रीय वन्यजीव मंडळाचे सल्लागार डॉ. विनायक सावरकर यांनी सांगितले.
‘काही व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या अधिक असल्याने त्यांना अधिक क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी गावांचे पुनर्वसन करण्यात येते आहे. ताडोबामध्ये वाघांची संख्या चांगली आहे, त्यामुळे प्रकल्पातील तसेच लगतच्या गावांना हलविण्याचे काम सुरू आहे. हद्द प्रस्थापित करण्यासाठी वाघांमध्ये मारामारी यापूर्वीही झाली आहे, आगामी काळात ही समस्या अधिक गंभीर होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’ असे केंद्रीय वन्यजीव संरक्षण संस्थेचे संचालक विनोद माथूर यांनी सांगितले.

महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
गेल्या सात महिन्यांत वाघांचे सर्वाधिक मृत्यू कर्नाटकमधील व्याघ्र प्रकल्पात झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आहे. गेल्या राज्यात वर्षभरात १७ वाघ मृत्युमुखी पडले होते, या वेळी पहिल्या सात महिन्यांत अकरा वाघ गमावले आहेत. यामागे प्रामुख्याने शिकार, हद्दीचा वाद आणि नैसर्गिक मृत्यू ही कारणे आहेत. याशिवाय चार वाघांचे अवयव आणि कातडी सापडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बांधकाम व्यावसायाला हवे सरकारी पाठबळ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी विकसकांना विविध योजनांच्या माध्यमातून सरकारी पाठबळ मिळायला हवे. सरकार आणि बांधकाम व्यावसायिक यांनी यासाठी एकत्रित प्रयत्न केले तरच २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर लाभेल,’ असे मत क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केले.
क्रेडाई महाराष्ट्राच्या २० विकसकांनी लखनौ येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘क्रेडाई’च्या (ईसीजीसी) या राष्ट्रीय परिषदेत आपला सहभाग नोंदवला होता. या प्रसंगी ‘परवडणारी घरे’ या विषयावर मार्गदर्शन करताना कटारिया बोलत होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा व अन्य मंत्री या वेळी उपस्थित होते. कटारिया म्हणाले, ‘परवडणाऱ्या घरांच्या उभारणीसाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे. परंतु, अशा घरांची निर्मिती करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना राज्य सरकारांकडूनही सहकार्य मिळाले, तर विकसक यासाठी स्वतः पुढे येतील.’ ‘राज्य आणि केंद्र सरकार यांच्या संपर्कात राहून क्रेडाई या विषयी सक्रीय असून विकसक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने आपण पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट्य साध्य करू शकू. यात विकसकांचा सिंहाचा वाटा असेल,’ असेही कटारिया यांनी सांगितले.
रेरा कमिटीचे सुहास मर्चंट यांनी ‘रेरा’ची महाराष्ट्रातील अंमलबजावणी याबाबत सादरीकरण केले. राज्य महिला समितीच्या संयोजक दर्शना परमार-जैन यांनी ‘महिला सबलीकरण’ या विषयावर सादरीकरण करून येत्या सहा महिन्यात देशभरातही अशा प्रकारच्या ७५हून अधिक शहरात महिला समितीची स्थापना करण्यात येईल, अशी माहिती दिली. या परिषदेत ‘क्रेडाई’चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर,आदित्य जावडेकर, सचिन कुलकर्णी, दिलीप मित्तल यांच्यासह क्रेडाई पुणे मेट्रोचे प्रातिनिधिक पदाधिकारी सहभागी झाले होते. या परिषदेत ‘क्रेडाई’च्या १५० पेक्षा जास्त शहराध्यक्षांनी हजेरी लावली. प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये शंकांचे निरसन, बांधकाम विषयक विविध कायद्यांची सविस्तर चर्चा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवना धरण भरले

$
0
0

धरणातून दोन हजार ७४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग
म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
मावळ आणि पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणारे व मावळातील शेती फुलविणारे मावळातील प्रमुख असलेले पवना धरण ९५.८० टक्के भरले आहे. यामुळे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता धरणाच्या चार दरवाजांमधून एक हजार ३५० व हायड्रोगेटद्वारे एक हजार ३९४ असा सुमारे दोन हजार ७४४ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग पवना नदीत सोडण्यात आला आहे. यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
‘पावसाचा जोर वाढल्यास आवशक्येतेनुसार पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे,’ अशी माहिती पवना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून मावळात पावसाचा जोर कायम असल्याने पवना धरणासह मावळातील सर्वच धरणांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. धरण भरल्याने शुक्रवारी धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत.
खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एन. एम. मठकरी, पवना पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मनोहर खाडे व ग्रामस्तांच्या उपस्थितीमध्ये पवना जलाशयाचे पूजन करण्यात आले. उपविभागीय अभियंता एन. एम. मठकरी म्हणाले, ‘पवना धरणाच्या मजबुतीकरणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. पवना धरणाची पाणी साठवण क्षमता १०.७८ टीएमसी आहे. मजबुतीकरणाअभावी ९.६८ टीएमसी इतकाच पाणीसाठा केला जातो.मजबुतीकरण झाल्यास यामध्ये जवळपास १.६० टीएमसी अशी पाणीसाठ्यात वाढ होईल.’ ‘मागील दोन वर्षात निधीअभावी दुरुस्तीची कामे रेंगाळली आहेत. आता धरणाच्या दुरुस्तीसाठी जवळपास साडेचौदा कोटी रुपये निधी उपलब्ध होणार असल्याने त्या माध्यमातून धरणाच्या सुरक्षेची कामे आणि इतर कामे करण्यात येणार आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेट्रो’च्या कामाला गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पुणे-मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट या पहिल्या मार्गापैकी नाशिकफाटा ते पिंपरी या दरम्यानच्या कामाला गती देण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्यातील मार्गावरील या दोन किलोमीटरचे काम पहिले पूर्ण होणार आहे. त्यासाठी ‘महामेट्रो’कडून कंत्राटदाराला मशिनरी वाढविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नाशिकफाटा ते पिंपरी या पट्ट्यावर प्रथम लक्ष केंद्रीत करण्याचे निश्चित करण्यात आले.
‘महामेट्रो’कडून पुणे मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याच्या पिंपरी ते स्वारगेट या पहिल्या मार्गापैकी पिंपरी ते रेंजहिल्स हे काम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. किमान पुढील दीड वर्षांत हे काम पूर्ण करण्याचा ‘महामेट्रो’चा मानस आहे. शुक्रवारी (२८ जुलै) हॅरिस पूल ते पिंपरी या पट्ट्यात सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीबाबत ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पुण्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
मेट्रोच्या कामाला गती देण्याबरोबरच वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्याचा प्रयोग नुकताच करण्यात आला. नाशिकफाटा ते खराळवाडी या दरम्यानचा ग्रेडसेपरेटर बंद ठेवून हा प्रयोग झाला. या वेळी रस्त्यावरील अतिक्रमण वेळीच न हटविल्याने या प्रयोगात काही अडथळे आले. तसेच प्रयोगिक तत्त्वावरील या बदलात काय काय झाले, याची माहितीही दीक्षित यांनी जाणून घेतली.
पुण्यातील सीओईपी कॉलेजकडून वाहतुकीचा आरखडा तयार करण्यात आला आहे. हॅरिस पूल ते खराळवाडी दरम्यानच्या ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक सेवा रस्त्याने वळवून कामाला गती द्यावी, तसेच वाहनचालकांची सुरक्षा याद्वारे कायम ठेवता येईल, असे या आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र, ग्रेडसेपरेटर बंद करण्यापूर्वी कोणत्या भागात कामाला गती द्यायची, त्यासाठी किती मशिनरी सध्या प्रत्यक्ष काम करीत आहे तसेच किती मशिनरीची गरज आहे याबाबत शुक्रवारी चर्चा करण्यात आली. त्यानुसार, सध्या सुरू असलेल्या नाशिकफाटा खराळवाडी या कामाला गती देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित कंत्राटदाराने मशिनरी वाढवाव्यात, दिलेल्या वेळेत काम पूर्ण करावे अशा सूचना दीक्षित यांनी उपस्थितांना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९३२ कोटी १३ लाखांचे कर्जवाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (पीडीसीसी) खरिप हंगामासाठी सुमारे ९३२ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असून, या वर्षी सुमारे ६०.२० टक्के कर्जवाटप झाले आहे.
गेल्या वर्षी सुमारे एक हजार १२६ कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांनी घेतले होते. या वर्षी एक लाख ३२ हजार २७६ शेतकऱ्यांनी हे कर्ज घेतले आहे. गेल्यावर्षी एक लाख ६७ हजार ६८४ शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आले होते, असे ‘पीडीसीसी’ बँकेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्ह्यात पीक कर्ज घेण्यात जुन्नर तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात सुमारे १७२ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. सर्वांत कमी कर्ज वितरण हे दौंड तालुक्यात झाले आहे. या वर्षासाठी एक हजार ५४७ कोटी ८४ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, ९३२ कोटी १३ लाख रुपयांचे वाटप झाले. गेल्या वर्षी एक हजार १२६ कोटी १७ लाख रुपये कर्ज देण्यात आल्याने हे प्रमाण सुमारे ८२.५७ टक्के होते, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

‘पीडीसीसी’चा शताब्दी सांगता समारंभ चार सप्टेंबरला
‘पीडीसीसी’ बँकेचा शताब्दी सांगता समारंभ चार सप्टेंबरला दुपारी दोन वाजता शिवाजीनगर येथील शेतकी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. या समारंभाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. याबाबत थोरात म्हणाले, ‘शताब्दी सांगता समारंभाच्या निमित्ताने बँकेतर्फे सहकारी संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी पाच गट तयार करण्यात आले आहेत. अ गटात विविध कार्यकारी सोसायट्या, ब गटात नागरी सहकारी पतसंस्था आणि सेवक पगारदार सहकारी पतसंस्था, क गटात सहकारी साखर कारखाने, दूध संघ आणि खरेदी विक्री संघ, ड गटात पाणीपुरवठा, गृहनिर्माण, ग्राहक संस्था, औद्योगिक आदी सहकारी संस्था, इ गटात नागरी सहकारी बँका यांचा समावेश आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डंपरच्या धडकेत दोघींचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चांदणी चौकात उतारावरून भरधाव येणाऱ्या डंपरने पायी जाणाऱ्या दहा वर्षांच्या विद्यार्थिनीसह तिघींना धडक दिली. यामध्ये ‘बीपीओ’मध्ये काम करणाऱ्या एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर, विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुसऱ्या तरुणीवर उपचार सुरू आहेत. चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असून, डंपर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका मोटारीला धडक देऊन थांबला. शुक्रवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी डंपर चालकास अटक केली आहे.

निकिता दत्ता नवले (वय १०, रा. चांदणी चौक), पूजा चव्हाण (वय २२, रा. विठ्ठलनगर, वारजे) अशी मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. शीतल राजू राठोड (वय २२, रा. विठ्ठलनगर, वारजे) जखमी आहेत. या प्रकरणात चालक तेजू भिकू राठोड (रा. अाष्टी, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता महापालिकेच्या शाळेत पाचवीत शिकत होती. तर पूजा आणि शीतल या दोघी कोथरूड येथील एका बीपीओ कंपनीमध्ये नोकरीला आहेत. या तिघीही चांदणी चौकाकडून कोथरूडकडे पायी जात होत्या. त्या वेळी राठोड पाठीमागून डंपर घेऊन येत होता. त्याचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्याकडे जाणाऱ्या तिघींना डंपरने उडविले. या अपघातामध्ये पूजा यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक राठोड पळून जात असताना नागिरकांनी त्याला पकडले. त्याला नागरिकांनी चोप दिला. तसेच, निकिता व शीतल यांना तत्काळ जवळच्या रुग्णालायत दाखल केले. मात्र, निकिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ रघुनाथ फुगे व सुहास खटके यांनी तत्काळ धाव घेतली. डंपर चालक राठोड याला ताब्यात घेतले. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या निकिताचे आई वडील मजुरीची कामे करतात. आरोपी राठोड याने लोणीकंद येथून डंपरमध्ये खडी भरली होती. ती घेऊन तो भूगाव येथे जात होता. उतारावर आल्यानंतर ब्रेक निकामी झाल्याचे डंपर चालक सांगत असून त्यामुळेच अपघात झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी कोथरूड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मदतीऐवजी फोटोग्राफी

डंपरच्या पाठीमागेच असलेले बंडी सातपुते म्हणाले, ‘डंपरने दोन महिलांना व मुलीला ठोकरले. अपघात झाल्यानंतर मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. सगळे जण फोटो काढण्यात गुंग होते. त्यापैकी एका व्यक्तीने फोटो काढणाऱ्यांना शिव्या देत मदत करण्यास सांगितले. तत्काळ मी १०८ क्रमांकावर फोन करून मदत मागविली. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या एका मोटारीला थांबवून दोघींना त्यामध्ये घालून रुग्णालयात पाठविले.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘टीबी’च्या पेशंटची राज्यात शोधमोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
क्षयरोगाच्या (टीबी) वाढत्या पेशंटची संख्या रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने क्षयरोग पेशंटच्या शोधमोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड महापालिकेसह १२ महापालिका आणि आठ जिल्ह्यांमध्ये पेशंटचा शोध घेतला जाणार आहे. पेशंटचा शोध घेऊन त्यांना तातडीने उपचार देण्याची सोय करण्यात येणार आहे.
क्षयरोग आणि कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक डॉ. संजीव कांबळे म्हणाले, ‘केंद्र सरकारने टीबीचे पेशंट आढळण्याची शक्यता असणाऱ्या राज्यांची यादी तयार केली आहे. या ‘हाय रिस्क’ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश आहे. केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार झोपडपट्टी, एचआयव्ही बाधित अतिजोखमीचा वर्ग, गिरणी कामगार, वीटभट्ट्या, बांधकामांची ठिकाणे, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, निराश्रित, बेघर, निराधार मुले, खाणकामगार, स्थलांतरितांची वस्ती, आदिवासी मुलांचे वसतिगृह, अतिकुपोषित क्षेत्र, भोंदू वैद्याकडून उपचार करून घेणारी गावे अशा भागात तपासणी केली जाणार आहे.’ ‘महाराष्ट्रातील १२ महापालिकांसह आठ जिल्ह्यांमध्ये टीबीच्या पेशंटचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात शोधमोहिमेस प्रारंभ करण्यात आला असून ३१ जुलैपर्यंत आठ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. कांबळे म्हणाले, ‘आठ जिल्ह्यांमध्ये सातारा, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, उस्मानाबाद, यवतमाळ, वाशिम आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पिंपरी चिंचवड, अहमदनगर, कोल्हापूर, नागपूर, नवी मुंबई, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर या सात महापालिकांमध्ये ३१ जुलैदरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे.’ ‘मुंबई आणि ठाणे महानगरपालिका हद्दीत सध्या पाऊस आणि मलेरियाचा उद्रेक असल्याने ही मोहीम १ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा १६ ते ३० जानेवारीदरम्यान झाला आहे. त्याचा तिसरा टप्पा ४ ते १८ डिसेंबर दरम्यान होणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांनी निविदांची चौकशी करावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) २४X७ पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनच्या निविदांमध्ये संगनमत झाल्याच्या तक्राराची दखल घेतली आहे. ‘सीबीआय’ने ही तक्रार महापालिका आयुक्तांकडे पाठवली असून, त्याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) या निविदांची चौकशी करावी,’ अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे.
संजय कानडे या व्यक्तीने २४X७ पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनच्या निविदांमध्ये संगनमत झाल्याची तक्रार ‘सीबीआय’कडे केली होती. ‘सीबीआय’ने या तक्रारीची प्रत महापालिका आयुक्तांना पाठवली आहे. ‘सीबीआय’ने पाठवलेल्या पत्रात त्यांच्याकडून या प्रकरणी कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट करतानाच तक्रारीची दखल घेतल्याचेही म्हटले आहे. ‘उपरोक्त विषय पर प्राप्त शिकायत मूल रूप में आवश्यक कारवाई हेतू संलग्न है,’ असा शेरा मारत ‘सीबीआय’ने ही तक्रार पुढील कारवाईसाठी महापालिका आयुक्तांकडे पाठवली आहे.
‘यातील पाइपालाइनच्या निविदांमध्ये संगनमत झाल्याच्या तक्रारी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करण्यात आल्या असल्या तरी, त्यावर महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नव्हती. ‘सीबीआय’नेच आता या तक्रारीची दखल घेतल्याने या निविदांची चौकशी त्यांच्यामार्फतच झाली पाहिजे,’ अशी मागणी शिंदे यांनी केली. कानडे यांनी पाइनलाइनच्या निविदा संगनमताने भरल्या असल्याची तक्रार महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे मे महिन्यात केली होती. हीच तक्रार ‘सीबीआय’ने महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रांमध्ये दिसते आहे. या निविदा भरताना सल्लागार कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्याचाही तपास होणे गरजेचे असल्याचे यामध्ये म्हटले आहे. विरोधी पक्षांनी या निविदांबाबत केलेल्या आरोपांमध्ये महापालिकेचे सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा दावा केला आहे.

सत्ताधाऱ्यांना त्यांची उत्तरे मिळाली का?
‘सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी या निविदांची चौकशी करण्याची मागणी केली होती. भिमाले यांच्या तक्रारीनुसार पालकमंत्री गिरीश बापट यांनी आयुक्तांशी चर्चा केली होती. या चर्चांमधून काय निष्पन्न झाले, सत्ताधारी जादा दराने आलेल्या निविदांबाबत काहीच बोलण्यास का तयार नाही? सत्ताधारी नेत्यांनी निविदांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली आहेत का,’ असा सवाल शिंदे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौदा लाखांच्या सीमा शुल्काचा अपहार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोहगाव विमानतळावर प्रवाशांकडून जमा केलेले सीमा शुल्क बँकेत न भरता सीमा शुल्क विभागाची १४ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राच्या दोन रोखपालांवर विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ज्ञानदेव साबळे (वय ५०, रा. मोरवाडी, पिंपरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात रमेश नंदू मगर (रा. यमुनानगर, विमाननगर ) व एका ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबळे हे बँक ऑफ महाराष्ट्रच्या विश्रांतवाडी शाखेत वरिष्ठ प्रबंधक आहेत. पुणे विमानतळावर उतरणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून सीमा शुल्क विभागाकडून आणलेल्या वस्तूवर शुल्क आकारले जाते. ते बँक ऑफ महाराष्ट्रमधील सीमा शुल्क विभागाच्या खात्यात भरला जातो. त्यासाठी २००७ पासून बँक ऑफ महाराष्ट्रच्या विश्रातंवाडी शाखेने विमानतळावरच एक काउंटर उघडले आहे. या काउंटरवर रक्कम घेण्यासाठी दोन रोखपालांची दिवस व रात्रपाळीसाठी नेमणूक करण्यात आली होती.
यातील ज्येष्ठ नागरिक हे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांना तात्पुरत्या काळासाठी रोखपाल म्हणून नियुक्त केले होते. ते दिवसपाळीचे काम करत होते; तर मगर हा रात्रपाळीचे काम करत होता. प्रवाशांकडून सीमा शुल्क आकारून ते बँकेत जमा करत होते. मात्र, जानेवारी ते एप्रिल २०१७ या कालावधीत दोघा रोखपालांनी प्रवाशांकडून सीमा शुल्काची रक्कम स्वीकारून चलनांवर सही केली. मात्र, ती रक्कम सीमा शुल्क विभागाच्या बँकेतील खात्यात भरली नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बँकेला कळविले असता बँकेने याबाबत माहिती घेतली. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रचे ज्ञानदेव साबळे यांनी विमानतळ पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पी. बी. कोलते करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच वर्षांत नऊ लाख वाहने रस्त्यावर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराचा वाढता विस्तार आणि सक्षम नसलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये खासगी वाहने रस्त्यावर येण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे नऊ लाख वाहने रस्त्यावर आल्याचे समोर आले आहे. २०१३ साली पुणे शहरात २४ लाख ४६ हजार ६९४ वाहने होती. ही संख्या मार्च २०१७ अखेरपर्यंत चक्क ३३ लाख ३७ हजार ३७० वर गेली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महापालिकेच्या ‘पर्यावरण सद्यस्थिती’ अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. पालिकेचा २०१६-१७ या वर्षाचा पर्यावरण अहवाल शुक्रवारी प्रशासनाने सर्वसाधारण सभेत सादर केला. त्यामध्ये पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांची माहिती देण्यात आली आहे. शहरात नोंदणी झालेल्या वाहनांची संख्या आणि शहराची लोकसंख्या याचा अभ्यास करता प्रती माणसी एकापेक्षा अधिक वाहने असे गुणोत्तर असल्याचे पुढे आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहराचा चारही दिशांना मोठा विस्तार होत आहे. एका भागातून दुसऱ्या भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या नागरिकांना परवडेल आणि कमीत कमी वेळेत उपलब्ध होइल, अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सद्यस्थितीला उपलब्ध नाही. त्यामुळे ये-जा करण्यासाठी दुचाकी, चारचाकी याबरोबरच इतर खासगी वाहनांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली असल्याचा निष्कर्ष पालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालामध्ये काढण्यात आला आहे.
खासगी वाहने रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढल्याने उपलब्ध असलेले रस्ते कमी पडत आहेत. मोठ्या संख्येने नागरिक वाहने घेऊन बाहेर पडत असल्याने प्रदूषणातही मोठी वाढ झाली आहे. वाहने लावण्यासाठी आवश्यक ते पार्किंग उपलब्ध होत नसल्याने सर्रास रस्त्यांवर वाहने लावली जातात. परिणामी वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याचे चित्र शहरातील विविध भागांत पाहायला मिळते. गेल्या वर्षी मार्च २०१६ अखेर पुणे शहरात वाहनांची संख्या ३० लाख ७२ हजार एवढी होती. त्यामध्ये यंदा २ लाख ६५ हजारने अधिक भर पडली आहे. गेल्या पाच वर्षांत रस्त्यावर येत असलेल्या वाहनांची संख्या पाहता यापूर्वी प्रत्येक वर्षी सर्वसाधारण २ लाख वाहनांची भर पडत होती. मात्र, यंदाच्या वर्षी त्यात चक्क २ लाख ६५ वाढ होऊन ही वाहने ३३ लाख ३७ हजार ३७० वर गेली आहेत.

यंदा ५० हजार नवीन कार
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कारची संख्या ५० हजारांनी; तर दुचाकींची संख्या पावणे दोन लाखांनी वाढली आहे. मार्च २०१६ मध्ये शहरात ४ लाख ९६ हजार ८११ कार होत्या. यंदा ही संख्या ५ लाख ४६ हजार ५५६ वर पोहचली आहे. तर गेल्या वर्षी दुचाकींची संख्या २३ लाख १७ हजार ६७० इतकी होती. ही संख्या यंदा २४ लाख ९७ हजार ३४३ वर पोहचली आहे.


आरोग्यावर गंभीर परिणाम
राज्याची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, आयटी सिटी याबरोबरच ‘दुचाकीचे शहर’ अशी नवीन ओळख पुणे शहराची निर्माण होत आहे. शहरात असलेल्या एकूण वाहनांच्या तुलनेत दुचाकी वाहनांची संख्या सर्वसाधारण ७५ टक्के एवढी आहे. शहरात वाढत असलेल्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीच्या सुविधांवर मोठा ताण पडत आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहने येत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते. तसेच वाहनांच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होत असून, नागरिकांच्या आरोग्यावर देखील त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे पर्यावरण अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेक्कन क्वीनची ‘डायनिंग कार’ दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देखभाल-दुरुस्तीसाठी गेल्या महिनाभरापासून ‘दख्खनच्या राणी’पासून विभक्त असलेली ‘डायनिंग कार’ सुशोभित होऊन पुन्हा चाकरमान्यांच्या सेवेत दाखल झाली आहे. मुंबईहून शनिवारी सायंकाळी पुण्याकडे रवाना झालेल्या गाडीला ‘डायनिंग कार’चा जोडण्यात आली.
डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये एक जून १९३० सालापासून ‘डायनिंग कार’चा समावेश आहे. त्यामुळे ही ‘डायनिंग कार’ या गाडीच्या नियमित प्रवाशांच्या प्रवासाचा अविभाज्य भाग बनली आहे. एक जुलै रोजी देखभाल दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी ही गाडी सेवेतून काढण्यात आली होती. त्याऐवजी पँट्रीकार लावण्यात आली होती. मात्र, अगदी २८ दिवसांतच ‘डायनिंग कार’चे रूप पालटवून ती पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.
मुंबईतील माटुंगा यार्डात ‘डायनिंग कार’चे नूतनीकरणाचे काम करण्यात आले. आता ‘डायनिंग कार’ची आसन क्षमता वाढविण्यात आली आहे. खुर्च्या, टेबलसह अन्य फर्निचर आकर्षक केले आहे. तसेच, डेक्कन क्वीन गाडीबाबतची संपूर्ण माहिती, जुने फोटो, तसेच मध्य रेल्वेची माहिती या कारमध्ये देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्टोन्मेंट घेणार वाहन प्रवेश शुल्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी
वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्यातील तरतुदीचा अंदाज नसल्याने पुणे व खडकीसह देशातील अनेक कॅन्टोन्मेंटमध्ये बंद करण्यात आलेली वाहन प्रवेश फी पुन्हा सुरू करण्याबाबतचे निर्देश डायरेक्टर जनरल कार्यालय, संरक्षण मंत्रालय मालमत्ता विभाग दिल्ली (डीजी) यांच्याकडून आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत वाहन प्रवेश शुल्क नाके पुन्हा सुरू होणार आहेत.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत आणि सीईओ अमोल जगताप यांनी ही माहिती दिली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड आणि सीईओ डॉ. डी. एन. यादव यांनी या माहितीला दुजोरा दिला. देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत बंद झालेली वाहन प्रवेश शुल्क आकारणी लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटीचा प्रवेश शुल्क आकारणीशी संबंध नसल्याने ही आकारणी पुन्हा सुरू होणार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून आदेश आले आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी उत्पन्नाचा मोठा मार्ग पुन्हा खुला होणार आहे. दरम्यान, याबाबत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे सोमवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
जीएसटीमुळे एलबीटीबरोबरच प्रवेश शुल्कही रद्द झाल्याने सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डांपुढे उत्पन्नाची मोठी समस्या निर्माण झाली होती. वाहन प्रवेश शुल्क बंद झाल्याने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दहा कोटी ४६ लाख, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे १२ कोटी, तर देहूरोड बोर्डाचे २० कोटी रुपयांचे वार्षिक नुकसान होणार होते. त्यामुळे सर्व बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत धाव घेऊन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
जीएसटीच्या तरतुदींचा अभ्यास करून संरक्षण मंत्रालयाच्या मालमत्ता विभागाने हा सुधारित आदेश दिला आहे. वाहन प्रवेश शुल्क हे जीएसटीअंतर्गत येत नसल्याने शुल्क आकारणी पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही, असे या आदेशात म्हटले आहे. हे पत्र पुण्यातील संरक्षण विभागाच्या मालमत्ता विभागाच्या प्रधान संचालकांना पाठविण्यात आले. तेथून ते सर्व बोर्डांना पाठविण्यात आले आहे.
‘जीएसटी लागू झाल्याने आमच्या उत्पन्नाचे सर्वांत महत्त्वाचे साधन असलेले वाहन प्रवेश शुल्क एक जुलैपासून बंद झाले होते. त्यामुळे आमच्या विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता होती. त्यामुळे दिल्लीला धाव घेऊन आम्ही वस्तुस्थिती मांडली होती. त्यावर अभ्यास करून संरक्षण मंत्रालयाने शुल्क आकारणीला मान्यता दिली आहे,’ असे सावंत व गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावणक्वीनसाठी उद्यापर्यंत करा नावनोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सौंदर्याला बुद्धीमत्ता आणि उत्तम व्यक्तिमत्त्वाची जोड असेल, तर कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊन आवडीच्या क्षेत्रात करिअर घडविणे अवघड नाही. स्वतःची ओळख वेळीच पटवून घेतली तर आत्मविश्वासाने कुठेही वावरणे अवघड नाही. ही संधी देणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ या स्पर्धेच्या नावनोंदणीला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी युवतींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या स्पर्धेसाठी सोमवारपर्यंत (३१ जुलै) नावनोंदणी करता येणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत ‘महाराष्ट्र टाइम’च्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रोड) कार्यालयातही नावनोंदणी करता येईल.
‘श्रावणक्वीन’ या स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या २ ऑगस्ट रोजी होत आहे. यंदा या स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. या फेरीच्या नावनोंदणीला स्पर्धकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोच आहे; तुम्हीही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक असाल, तर लगेच तुमचे प्रोफाइल अपलोड करा आणि स्पर्धेत सहभागी व्हा. ‘श्रावणक्वीन’ ही काही फक्त ब्युटी कॉन्टेस्ट नाही, तर ही आहे ‘पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट’! त्यामुळे आकर्षक व्यक्तिमत्त्व, देखणे रूप, कुठलीही एक कला आणि हजरजबाबीपणा असेल, तर ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे.
सध्या सुरू असलेल्या नावनोंदणीतून परीक्षक आणि प्रोफाइल व्होट्स या आधारावर प्राथमिक फेरीसाठी स्पर्धक निवडले जातील. रॅम्पवॉक करून आल्यानंतर मंचावर सर्वांसमोर उभे राहून करून दिलेली स्वतःची ओळख, त्यानंतर तुमच्यातील कलागुण सादर करण्याची संधी आणि नंतर परीक्षकांची प्रश्नोत्तरे अशा विभागांमध्ये ही प्राथमिक फेरी होईल. ओळख फेरीअंतर्गत स्पर्धकांनी स्वतःविषयी माहिती सांगणे अपेक्षित आहे. त्यानंतर होणाऱ्या ‘टॅलेंट राउंड’मध्ये कला सादरीकरण करायचे आहे. यात नृत्य, गायन, अभिनय, वाद्यवादन, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, निवेदन असे अनेक पर्याय असू शकतात. प्रश्नोत्तरांच्या फेरीत परीक्षक स्पर्धकांना प्रश्न विचारतील. यातून अंतिम फेरीसाठी स्पर्धक निवडले जातील. अधिक माहितीसाठी वाचत राहा, रोजचा ‘पुणे टाइम्स’...

अशी करा नावनोंदणी
- ‘श्रावणक्वीन’ नावनोंदणीसाठी अटी ः स्पर्धक तरुणी १८ ते २५ वयोगटांतील आणि अविवाहित असावी.
- www.mtshravanqueen.com या वेबसाइटवर जाऊन ‘पार्टिसिपेट नाऊ’ वर क्लिक करा.
- इथला फॉर्म भरल्यानंतर सोबत फोटो आणि दोन मिनिटांच्या व्हिडिओचीही लिंक अपलोड करायची आहे. यात तुमची ओळख आणि स्पर्धेत का सहभागी होत आहात, हे सांगावे.
- स्पर्धेचे नियम साइटवर दिलेले आहेत; त्याशिवाय फोटो आणि व्हिडिओ अपलोड कसे करायचे, याचीही माहिती तिथे आहे.
- जास्तीत जास्त लाइक्स मिळण्यासाठी प्रोफाइल शेअर करायचे आहे. लाइक्स आणि आमच्या परीक्षकांचा कौल यावर स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे.
- यासह येत्या सोमवारपर्यंत (३१ जुलै) सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंतच स्पर्धकांना ऑनलाइन फॉर्म किंवा ऑफिसमध्ये प्रत्यक्ष येऊन नावनोंदणी करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तंत्रनिकेतन संस्था कात टाकणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशातील पॉलिटेक्निक कॉलेज (तंत्रनिकेतन संस्था) कौशल्य विकास मंत्रालयाच्या अखत्यारित आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे सध्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारित असलेली ही कॉलेज येत्या काळात कौशल्य विकास मंत्रालयाच्या नियंत्रणखाली उत्तम मनुष्यबळ निर्माण करतील,’ अशी माहिती केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी शनिवारी दिली.
सिम्बायोसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीच्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ रूडी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी रूडी बोलत होते. राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार आदी उपस्थित होते.
रूडी म्हणाले, ‘देशात आतापर्यंत केवळ उच्च शिक्षणालाच महत्त्व देण्यात आले आहे. मात्र, उच्चशिक्षित लोकांकडे कौशल्याची कमतरता असते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली. मंत्रालयाद्वारे कौशल्य विकास केंद्रे, कॉलेज आणि विद्यापीठ याची निर्मिती करण्यावर भर दिला आहे. कौशल्य विकास पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम यांना जागतिक दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार आठवीनंतर दोन वर्षे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्याला दहावी उत्तीर्णचा तर दहावीनंतर दोन वर्षांचा आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्णचा दर्जा दिला जाणार आहे. आता डिप्लोमा कॉलेजही कौशल्य विकास मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढे डिप्लोमाला एखाद्या कोर्सची जोड देऊन इंजिनीअरिंग पदवीचा दर्जा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.’
निलंगेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. मुजुमदार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. स्वाती मुजुमदार यांनी युनिव्हर्सिटीतील पायाभूत सुविधांची माहिती दिली.

डिप्लोमाला ‘बीई’चा दर्जा
इंजिनीअरिंग डिप्लोमाला कौशल्य विकास अभ्यासक्रमाची जोड देऊन डिप्लोमाला बीटेक अथवा बीईचा दर्जा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यामुळे कॉलेज आणि विद्यापीठामध्ये कारपेंट्री, प्लम्बिंग, कन्स्ट्रक्शन यांसारखे प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम शिकविण्यासाठी कुशल प्राध्यापक उपलब्ध होतील, अशी माहिती केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भय इथले संपत नाही

$
0
0

‘स्मार्ट ग्राम’ माळीणमागील शुक्लकाष्ठ अद्याप कायम

अतुल काळे, राजगुरूनगर

निसर्गाने घरेदारे उध्वस्त केल्यानंतर आणि आप्तस्वकीय गमावल्यानंतर तीन वर्षे लोटली, तरी माळीणवासियांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ अजूनही थांबायला तयार नाही. ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून उल्लेख झालेल्या पुनर्वसनाच्या गावातही अडचणींचा फेरा कायमच आहे.
माळीण दुर्घटनेचा आज, (३० जुलै) तिसरा स्मृतीदिन. आजही या दुर्घटनेची भीषणता माळीणवासियांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवते. या दुर्घटनेत अपवाद वगळता माळीण गाव जगाच्या नकाशावरून पूर्णत: नाहीसे झाले होते. त्यामुळे या दुर्घटनेतून बचावलेल्यांचे शेजारील आमडे गावाच्या हद्दीतील जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत नव्याने उभारणी केलेल्या माळीण गावठाणाचे दोन एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी पुनर्वसन केलेल्या नवीन माळीणचा ‘स्मार्ट ग्राम’ असा उल्लेख केला होता. तसेच, भविष्यात राज्यात प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करताना स्मार्ट माळीण गावठाणाचा आदर्श समोर ठेवला जाईल, असेही गौरवोद्गार काढले होते. मात्र, दोन महिन्यातच पावसाळ्याच्या सुरवातीला ‘स्मार्ट ग्राम’ माळीण मधील बांधकामांच्या दर्जातील फोलपणा उघड झाला.
येथील भौगोलिक परिस्थिती आणि भागात पडणाऱ्या पावसाचा अंदाज तज्ज्ञांनाही आला नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच हा सर्व गोंधळ उडाल्याचे सांगण्यात येते. तसेच पावसाळ्यापूर्वीच माळीणचे उद्घाटन करण्यासाठी काही कामे घाईघाईने उरकण्यात आले.परिणामी कामांचा दर्जा चांगला राखला गेला नाही, असेही येथील रहिवासी सांगतात. यामध्ये प्रामुख्याने अंतर्गत रस्ते, गटार, जलवाहिनी आणि विजेचे खांब यांचा समावेश असून, सर्वाधिक नुकसान याच कामांचे झाले आहे. मुळातच नवीन माळीण गावठाणाची निर्मिती डोंगराच्या उतारावर करण्यात आली आहे. या ठिकाणी मातीचे प्रमाणही चांगले आहे. बांधकामांसाठी उतारावरील जमिनींचे सपाटीकरण करताना मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे. त्यामुळे माती भुसभुशीत झाली आहे. अगदी आठ ते दहा मीटर उंचीच्या भिंती बांधून त्यामध्ये मातीचे मोठमोठे भराव टाकण्यात आले आहे.
त्यातच पुन्हा पावसाच्या पाण्यामुळे भरावासाठी वापरलेली माती ओली झाली. त्यामुळे मातीच्या वजनाचा भार सहन न झाल्यामुळे अनेक ठिकाणी भराव आणि रस्ते खचले गेले. तसेच, डोंगर उतारावरील मातीही वाहून गेली. त्यामुळे अल्पावधीतच माळीणची दुरवस्था झाल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

माळीणकर भेदरलेलेच
नव्या ठिकाणी एकूण ६८ घरे बांधण्यात आली असून, पैकी ३५ ते ४० कुटुंबेच राहतात. उर्वरित मंडळी कामानिमित्त पुण्या-मुंबईला राहतात. जी कुटुंबे नवीन गावठाणात राहतात, त्यापैकी पाच ते सहा कुटुंबे भीतीमुळे पुन्हा जुन्या माळीण फाट्यावर तात्पुरत्या उभारलेल्या शेडमधील खोल्यांमध्ये राहावयास गेली आहेत. त्यामुळे माळीणवासियांच्या मागील शुक्लकाष्ठ अजून संपलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीएमएसची फेरनिविदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी बसविण्यात येणाऱ्या ‘इंटलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ची (आयटीएमएस) फेरनिविदा काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.
अत्यंत घाईगडबडीत काढण्यात आलेली ही निविदा एल अँड टी कंपनीने भरली होती. सुमारे ३३६ कोटी रुपयांची निविदा वादात सापडल्याने फेरनिविदा काढण्याचा निर्णय बैठकीत झाला. स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष आणि नगरविकास विभागाचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेत संचालक मंडळाची बैठक झाली. महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सिग्नल अद्यावत करण्यासाठी ‘आयटीएमएस’ यंत्रणा बसविण्याबाबत निविदा मागविण्यात आल्या होत्या. शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये तसेच शहरात मोफत वायफाय योजना राबविण्याचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे. त्याच कंपनीने ‘आयटीएमएस’ची निविदा भरली होती. ३३६ कोटी रुपयांची ही निविदा होती. ‌इतर कंपन्यांनी यापेक्षा अधिक दराने निविदा भरल्याने हे काम एल अँड टीला देण्यासाठी मान्यता द्यावी, असा प्रस्ताव संचालक मंडळापुढे तीन महिन्यांपूर्वी मांडण्यात आला होत.
आयटीएमएस यंत्रणेचा आराखडा, वाहनचालकांना नियंत्रित करण्याची पद्धत तसेच त्याची अंमलबजावणी याबरोबरच निविदेमध्ये काही त्रुटी होत्या. हा आराखडा तयार करताना त्यातील त्रुटींबाबत स्था‌निक पातळीवरच नव्हे तर स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष डॉ. करीर यांनाही शंका होत्या. दोन बैठकांमध्ये त्यांनी यावर स्पष्टीकरण मागितले होते. यावर कोणतेही समाधान न झाल्याने शनिवारी फेरटेंडरचा निर्णय घेण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले. गेल्या महिन्यात ही निविदा मान्य व्हावी, यासाठी पा‌लिका आयुक्त विशेष प्रयत्नशील होते. एल अँड टीबरोबर तडजोडीची चर्चा केल्यानंतर कंपनीने काम २९२ कोटीमध्ये करण्याची तयारी दाखविली होती. मात्र, बैठकीत सर्व संचालकांचे फेरटेंडर काढण्यावर एकमत झाले.

आचारसंहितेचा निर्णय लांबणीवर
स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीमध्ये होणारे निर्णय आणि चर्चेचा तपशील बैठकीबाहेर जावू नये, यासाठी आचारसंहिता असावी असा प्रस्ताव शनिवारी संचालक मंडळाच्या बैठकीपुढे ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यासह शिवसेनेने कडाडून विरोध केल्याचे तुपे यांनी सांगितले. पारदर्शकतेच्या मुद्दयावर केंद्र आणि राज्यात सत्तेत आलेल्या भाजपला स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीतील निर्णय आणि चर्चेचा तपशील पुणेकरांपर्यंत जाऊ नये, यासाठी आचारसंहिता लागू करण्याला आमचा विरोध असल्याची भूमिका या संचालकांनी बैठकीत मांडली. यावर पुढील बैठकीपासून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालिका आयुक्त बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकार परिषद घेउन प्रसिद्ध करतील, असे डॉ. करीर यांनी स्पष्ट केल्याचे तुपे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्वेनगरमधील उद्योजकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कर्वेनगर परिसरातील एका उद्योजक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले. तत्पूर्वी त्याने फेसबुकवर ‘मी जातो,’ अशी पोस्ट केली होती.
चैतन्य फडके (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे नाव आहे. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फडके यांनी कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य फडके यांचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला आहे. त्यांनी २०१४ मध्ये एनर्जी नेक्स्ट सोल्यूशन कंपनी सुरू केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यात होते, अशी माहिती देण्यात आली. शनिवारी सकाळी त्यांची पत्नी व आई कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यानंतर त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी फेसबुकवर ‘मी जातो,’ अशी पोस्ट केली होती. ही पोस्ट त्यांच्या मित्रांनी पाहिली. त्यांनी तत्काळ फडके यांच्या फोनवर संपर्क साधला. मात्र, ते फोन उचलत नव्हते. त्यानंतर याबाबत त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या वेळी हा प्रकार समोर आला. चैतन्य यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास अलंकार पोलीस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यक्तित्त्वाचा स्वर जेव्हा लागतो...

$
0
0

राहुल देशपांडे, आनंद भाटेंनी उलगडला वैयक्तिक पदर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

...ते दोघेही आजचे आघाडीचे शास्त्रीय गायक. त्यांची नावं समोर आली की डोळ्यासमोर तरळतो तो त्यांचा हसतमुख चेहरा आणि काळजाला भिडणारा स्वर...पण या पलीकडे त्यांच्या आवडी-निवडी, शिक्षण, आयुष्य असे व्यक्तित्त्व समोर येतच नाही.
मात्र, शुक्रवारची सायंकाळ न्यारीच होती. त्यांचे दडलेले व्यक्तिमत्त्व समोर आणणारी होती. गायनापलीकडे जोपासलेल्या चित्रकला, शिवणकाम, स्वयंपाक अशा आवडी-निवडी तसेच उच्च शिक्षण, कुटुंब असा त्यांच्यातील सर्वांगीण माणूस शुक्रवारी उलगडला... हे दोन गायक म्हणजे राहुल देशपांडे आणि आनंद भाटे. त्यांच्या गायकीमध्ये गुंग व्हावे तसे, रसिक त्यांच्या सुरेल गप्पांमध्येही तल्लीन झाले होते.
निमित्त होते, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टएंडतर्फे आयोजित आणि पीएनजी प्रायोजित ‘थेट भेट’ या गप्पांच्या मैफलीचे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही गप्पांची मैफल रंगली. ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी दोघांशी दिलखुलास संवाद साधला. ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ कार्यक्रमाचा माध्यम सहकारी होता. ‘लहान असताना गाण्याची आवड नव्हती. तबला किंवा सीए यापैकी क्षेत्र निवडेन; पण गायक होईल असं वाटल नव्हतं. मी तीन वर्षांचा असताना आजोबा (वसंतराव) गेले. मी गाणं शिकावं ही त्यांची इच्छा होती. कुमारजी गेले तेव्हा त्यांचे भजन ऐकत बसलो आणि गायनाकडे ओढला गेलो. बारा वर्षे रोज आठ-दहा तास आजोबांच्या फोटो समोर बसून रियाज केला,’ अशा आठवणी राहुल देशपांडे यांनी उलगडल्या. गाणं सुरू होताना आणि संपताना आजोबा समोर येतात. तुला काही येत नाही असे ते मला सांगतात. शंभर-दीडशे व्यक्ती मिळून वसंतराव देशपांडे घडतात,’ अशी भावना त्यांनी व्यक्त करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. चित्रकार ,स्वयंपाक, शिवणकाम या राहुल यांच्यातील अन्य कलांचे दर्शन त्यांच्या कुटुंबीयांनी दृकश्राव्य माध्यमातून घडवले.
‘नाथ हा माझा हे पद मी पावणे तीन वर्षांचा असताना पेटीवर वाजवले. चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे तालीम घेतली आणि चार वर्षांचा असताना पहिला कार्यक्रम केला. पुढे आनंदगंधर्व असा गौरव झाला. एमटेक पर्यंत शिक्षण घेतले. एक कोणते तरी क्षेत्र निवडा असं मोठे गायक सांगत असतात; पण भीमसेनजी उदार होते. त्यांच्यामुळेच गायन आणि शिक्षण दोन्ही पूर्ण करता आले,’ अशी भावना भाटे यांनी व्यक्त केली. रोटरीचे अध्यक्ष आदित्य देवधर यांनी स्वागत केले. सचिव नितीन वाशिकर यांनी उपक्रमांची माहिती दिली. पीएनजीचे जनरल मॅनेजर नीलेश कोळपकर आणि रमेश पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला.

पुलंमुळे घडले दोन गायक
एकदा भाईकाका (पु.ल.देशपांडे) म्हणाले, इतका अशक्त का दिसतोस ? त्यावर मी सीएचा अभ्यास, नोकरी आणि रियाज असा दिनक्रम सांगितला. ते म्हणाले, ‘रस्त्यावर तुला सीएच्या पाट्या दिसतील; पण गवयाची दिसणार नाही. ती तू तुझ्या घरावर लावायची आहे. सीए बाकीचे लोक होतील. तू गवई व्हायचे आहे,’ या त्यांच्या आदेशाने गायक झालो. भाईकाकांचा आदेश असल्याने तो घरीही मान्य झाला, असे राहुल देशपांडे यांनी सांगितले आनंद भाटे म्हणाले, ‘माझी आई गोखले इन्स्टिट्यूटमध्ये गणिताची प्राध्यापक तर वडिलांना गाण्याची आवड यामुळे घरात दोन्हीप्रकारचे वातावरण होते. एकदा पुलंकडचे मी क्रिकेटचे पुस्तक वाचत बसलो होतो. ते म्हणाले पुस्तक घेऊन जा. क्रिकेटपटू झाला तर चांगलंच आहे; पण गायक झालास तर मला जास्त आनंद होईल. हा त्यांनी दिलेला आशीर्वाद होता.’ या दोन गायकांच्या मनाच्या कुपीतील पुलंची अशी खास प्रतिमा यानिमित्ताने समोर आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images