Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘प्रतिभा’ योजना पुन्हा येणार

$
0
0

जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे जिल्ह्यातील अॅनेमियाग्रस्त ४८ टक्के महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रतिभा आरोग्य योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नव्हती. मात्र, आता ही योजना या वर्षी पुन्हा राबविण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, तसेच अर्थ व शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी प्रतिभा आरोग्य योजना राबविली. त्यासाठी गेल्या वर्षी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जिल्ह्यातील ११ लाख ३८ हजार ६९८ महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ८३ हजार ४९३ इतक्या महिलांमध्ये रक्ताक्षय अर्थात अॅनेमिया झाल्याचे निदान झाले. त्यानुसार अॅनेमिया असलेल्या महिलांचे प्रमाण हे ४८ टक्के होते. त्यामुळे अॅनेमियाग्रस्त महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यांना लोहयुक्त गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते. रक्तामध्ये सातपेक्षा कमी हिमोग्लोबीन असणाऱ्या महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रांत इंजेक्शन देण्यात आले होते.

त्यानुसार ० ते १९ वयोगटातील मुलींना शाळेसह अंगणवाडी, कॉलेजमध्ये लोहयुक्त गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अॅनेमियाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली होती. महिलांमध्ये दीड टक्क्याने हिमोग्लोबीन वाढल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, ही योजना राज्यात सर्वत्र राबविण्याची सूचना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. परंतु, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी राबविलेल्या योजनेला प्रशासनाने खो घातल्याने अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले होते. या संदर्भात ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध करताच जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली.

‘पुणे जिल्ह्यात ५ लाख ८३ हजार ४९३ एवढ्या महिला अॅनेमियाग्रस्त असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचा आरोग्याचा विचार करता ही योजना आणखी प्रभावीपणे राबविणे अपेक्षित होते. त्यासाठी भरीव तरतूद करणे अपेक्षित होते. परंतु, २०१७ ते १८ या वर्षीचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी सादर केला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात प्रतिभा आरोग्य संपन्न योजनेसाठी तरतूद केली नसल्याचे दिसून आले. परंतु, जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पुनर्विनियोजनाचे अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना देण्यात आले आहेत. त्यामुळे सुधारित अर्थसंकल्पात प्रतिभा आरोग्य संपन्न योजना बंद केलेली नाही. ही योजना पुन्हा राबविण्यात येणार असून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात येईल,’ असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका देणार पुनर्वसनासाठी निधी

$
0
0

‘भामा-आसखेड’बाबत स्थायीची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरासाठी महत्त्वाची योजना असलेल्या भामा-आसखेड प्रकल्पाबाबत कोणताही तोडगा काढण्यास भारतीय जनता पक्षाला यश मिळत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना पालिकेच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्याचा विचार पालिकेने सुरू केला आहे. राज्य सरकार या भागातील शेतकऱ्यांचे पुनर्वसन करत नसल्याने सरकारने पालिकेला कळवावे, त्यानुसार आवश्यक तो निधी पालिका देइल, अशी भूमिका स्थायी समितीने घेतली आहे. परिणामी पालिकेच्या तिजोरीवर १२० ते १३० कोटींचा भार पडणार आहे.

शहराचा पूर्व भाग असलेल्या नगररोड, वडगावशेरी, या भागातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याची योजना पालिकेने सुरु केली आहे. या भागातील शेतकऱ्यांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत या प्रकल्पाचे काम होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत स्थानिक नागरिकांनी विरोध करत प्रकल्पाचे काम बंद पाडले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा विरोध सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महापौर मुक्ता टिळक यांनी मध्यस्थी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिक ऐकण्याच्या स्थितीत नाही. तसेच, या भागातील भाजपच्या एका उपाध्यक्षाचा या आंदोलनासाठी पाठींबा असल्याने पालिकेसह राज्य आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पाधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.

स्थानिकांशी चर्चा करून कोणताही तोडगा अद्याप निघालेले नाही. पुनर्वसन झाल्याशिवाय काम होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली जात असल्याने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काही कोटी रुपयांचा निधी पालिका देइल, अशी भूमिका पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री बापट यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत बापट यांनी पालिकेने प्रत्येक नागरिकाला दहा लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावे, अशी सूचना केली आहे. या भागातील तेराशेहून अधिक शेतकऱ्यांना ही मदत करावी लागणार असल्याने पालिकेला १३० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे.

...............
भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना आवश्यक तो निधी पालिकेने द्यावा, अशा सूचना राज्य सरकारने दिल्यास त्याचा पालिका सकारात्मक विचार करून निधी उपलब्ध करून देईल. हा प्रकल्प पूर्ण होणे शहराच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असल्याने वेळ पडल्यास प्रकल्पग्रस्तांना मदत करावी लागेल.

- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका
000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विनोदी माणसांमुळेच समाज स्वास्थ्य टिकून’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘विनोदानंतर रसिकांनी हसून दाद द्यावी यासाठी विनोद करणारी माणसे झटत असतात. चेहऱ्यावर विनोदी दिसणाऱ्या माणसाच्या आत दुःख दडलेले असते. विनोदी माणसांमुळेच समाजाचे स्वास्थ्य टिकून आहे. त्यामुळे, अशी माणसे अनेक वर्षे जगायला हवीत,’ अशा भावना ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी व्यक्त केल्या.
मारुती यादव लिखित ‘हसरे जग’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी मेहेंदळे यांनी विनोद आणि विनोद घडवणाऱ्या माणसांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. चंद्रकांत पांढरीपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. न. म. जोशी, अनुराधा यादव आदी या वेळी उपस्थित होते.
‘काही विनोद हे अजरामर आहेत, तर काही विनोद काळाप्रमाणे घडत जातात. पण ते घडवण्याचे कसब सगळ्यांकडे नसते. त्यातही एकपात्री कलाकारांना तारेवरची कसरत करावी लागते. दोन तास संगीत, नेपथ्य, सहकालाकारांशिवाय रसिकांना खिळवून ठेवणे सोपी गोष्ट नाही,’ असे मेहेंदळे यांनी सांगितले. समाजाने विनोदी माणसांचे महत्त्व जाणायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
न. म. जोशी म्हणाले, ‘हसवता हसवता आपल्या जीवनातील वैफल्याची यादवी नष्ट करणारे मारुती यादव आहेत. मारुती यांनी विनोदाचा वसा घेतला आहे.’ या वेळी मारुती यादव यांचीच फिरकी घेत जोशी यांनी सभागृहात हशा पिकवला.
कार्यक्रमात ‘आम्ही एकपात्री’ संस्थेतर्फे मारुती यादव यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे बंडा जोशी, संतोष चोरडिया, वंदन नगरकर, वृंदा जोशी आदी कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले, तर संतोष चोरडिया यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपद्रव शुल्काला ताम्हिणीत स्थगिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोकसहभागातून पर्यटन नियोजन आणि गावकऱ्यांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने वन विभागाने राबवविलेले सिंहगड मॉडेल यशस्वी झाले; पण या मॉडेलच्या धर्तीवर ताम्हिणीत सुरू केलेल्या पावसाळी उपद्रव शुल्काला मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांनी कचऱ्याची टोपली दाखवली आहे. दोन वर्ष गावकऱ्यांकडून वारंवार मिळालेल्या असहकार्यामुळे वन विभागाने ताम्हिणीतील उपद्रव शुल्काचा उपक्रमाला स्थगिती दिली आहे.
धबधब्यांची मजा लुटण्यासाठी ताम्हिणीमध्ये जाणाऱ्या पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी वन विभागातर्फे दोन वर्षांपूर्वी उपद्रव शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. अभयारण्यातील पर्यटनाला चालना आणि गावकऱ्यांना रोजगार देण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येणार होता. पावसाळा सुरू झाल्यावर दोन्ही वर्षे तीन महिने पर्यटकांकडून दुचाकी वाहनांना दहा रुपये, तर चारचाकी वाहनांना वीस रुपये शुल्क आकारण्यात आले. पर्यटकांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने गेल्या वर्षी अवघ्या दोन महिन्यांतील सुट्टीच्या दिवशी आकारण्यात आलेल्या शुल्कातून समितीकडे लाख रुपये जमा झाले होते. पण यंदा धबधबे सुरू झाले असले तरी उपद्रव शुल्काचा स्टॉल अद्याप सुरू झालेला नाही.
दरवर्षी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान हजारो पर्यटक मुळशी, अॅम्बी व्हॅली, प्लस व्हॅली, ताम्हिणी घाटात धबधब्यांची मजा लुटण्यासाठी जातात. मात्र बहुतांश धबधबे वनक्षेत्रात असल्याने या उपद्रवी पर्यटकांचा फटका जंगलाला बसतो आहे. या काळात दर वर्षी जंगलात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा फेकला जातो. काही पर्यटक दारूच्या बाटल्याही जंगलात फेकतात. पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत वन विभागाकडे मर्यादित कर्मचारी असल्याने पर्यटकांवर कोणाचेच नियंत्रण राहत नाही. या धर्तीवर बेशिस्त पर्यटकांला वैतागलेल्या वन विभागाने मनुष्यबळ वाढविण्यासाठी या परिसरातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सभासदांसमोर सिंहगडाच्या प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडला होता. शुल्कातून जमा होणाऱ्या रकमेतून स्वच्छता गृहे, पॅगोडा उभारणी, स्थानिकांना गाईड प्रशिक्षण, प्लास्टिक संकलन आणि विघटन योजना आणि पार्किंग असे उपक्रम राबविण्यात येणार होते. मात्र या वर्षी गावकऱ्यांनी प्रवेश शुल्काबाबात असहाकार्याची भूमिका घेतली आहे.

संयुक्त वन व्यवस्थापन समितीसमोर आम्ही प्रस्ताव मांडला होता. मात्र गावकऱ्यांमध्ये काही बदल सुचवले असल्याने आम्ही तात्पुरती शुल्क आकारणी थांबवली आहे. मात्र पुढील पावसाळ्यापूर्वी या भागात समिती आणि स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून पर्यटनस्नेही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या परिसरातील पिंपरी, आंबवणे या भागाच्या विकासासाठी आमचे नियोजन सुरू आहे.
- रघुनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक

धुक्यात जरा जपून
मुसळधार पावसामुळे ताम्हिणी वनक्षेत्रातील निसर्ग सौंदर्य सगळ्यांना खुणावते आहे, हे मान्य असले तरी निसर्गात जाताना तेथील शिस्त पाळणे गरजेचे आहे. जंगलात सध्या दाट धुके असून गवत वाढल्याने पायवाटा पुसल्या गेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी माहितगार व्यक्तीशिवाय जंगलात भटकंती टाळावी. डोंगर कड्यांवर फोटोग्राफी करू नये. वनक्षेत्रात कचरा फेकताना अथवा मद्यपान करताना आढळण्यास पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपवनसंरक्षक रघुनाथ नाईकडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिका साडी ड्रेपिंगचे प्रकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
श्रावण म्हणजे जणू सणांची रेलचेल. या महिन्यात महिलांना खास पारंपरिक पेहराव करण्याची पर्वणी मिळते. दर वेळी नव्या पद्धतीने तयार होण्यासाठी साड्यांचे वेगळे प्रकार माहीत असायला पाहिजेत. यासाठी खास श्रावणाचे औचित्य साधून ‘साडी ड्रेपिंग कार्यशाळा’ महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या वतीने शनिवारी २२ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.
साडी हा पारंपरिक पेहराव महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती येत असतील तर दर वेळी काहीतरी नवा प्रकार ‘ट्राय’ करता येतो. याच विचाराने २२ जुलै रोजी निगडीच्या थिएटर वर्कशॉप कंपनीच्या हॉलमध्ये इन्स्पिरिया मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर ही कार्यशाळा होईल. ही कार्यशाळा दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळात होणार असून प्रशिक्षिका निवेदिता गुर्जर या मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेत साधी साडी, साधी नऊवारी, ब्राह्मणी नऊवारी, बंगाली साडीचे दोन प्रकार, घागरा, राजस्थानी, गुजराती या प्रकारच्या साड्या शिकायला मिळतील. तसेच अॅडव्हान्स साडी प्रकारात महाराणी, मुमताज, मर्मेड, हैद्राबादी, फिशकट, जवानी दिवानी स्टाइल (पार्टीवेअर साडी), बागबान हे फेमस साड्यांचे प्रकार असे एकूण १५ प्रकार शिकण्याची संधी मिळणार आहे. या वेळी १५ प्रकारांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळेल आणि नऊवारी साडी प्रत्यक्ष कृतीसह शिकता येईल. याकरिता येताना महिलांनी आपली नऊवारी साडी घेऊन यायची आहे.
ही कार्यशाळा सगळ्यांकरिता खुली असून यासाठी प्रवेशमूल्य आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सदस्यांना यात विशेष सवलत असेल. त्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून ९९७५४०४०२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकांना ‘शांताबाई’ आवडते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‍‘मी अशी गुलजार नार, अशा अस्सल लावण्या हल्ली लोकांना रुचतच नाहीत. त्यांना शांताबाई आवडते. रसिकांची आवड बदलली आहे. तरी मी लावणी रेटत आहे. आयुष्याच्या शेवटापर्यंत लावणी टिकवणार आहे...,’ लावणीसम्राज्ञी मंगला बनसोडे सोमवारी उद्विग्न होऊन बोलत होत्या. ‘लावणी ही जिवंत कला आहे. तिला नावे ठेवू नका,’ असे त्यांनी निक्षून सांगितले.
पूना गेस्ट हाउस स्नेह मंचातर्फे आयोजित ‘रंग लावणीचे, विचार मंथन कलारत्नांचे’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लावणी कलेसाठी योगदान देणाऱ्या बनसोडे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, नृत्यगुरु लीला गांधी, जयमाला इनामदार, लावणी निर्माता संघाचे मेघराज राजेभोसले, रेश्मा मुसळे-परितेकर यांच्याशी शोभा कुलकर्णी यांनी संवाद साधला.
‘कलेवर अनेकांचे संसार अवलंबून असतात. लोककला टिकविण्याचा मी मनोमन प्रयत्न करत असून आयुष्याच्या शेवटापर्यंत लावणी टिकवणार आहे. या कलेतील आमची पाचवी पिढी आहे. नात डॉक्टर आणि इंजिनीअर असल्याने पुढची पिढी मात्र या क्षेत्रात नसेल...’ बनसोडे सांगत होत्या.
‘मी लहानपणी पहिल्यांदा नृत्य पाहिले ते तमाशामुळे... वडील वनाधिकारी होते. त्यांचा सहकारी तुकाराम मला तमाशाला घेऊन जायचा. तेव्हा मी पाच- सहा वर्षांची होते. नृत्याच्या आवडीतून कथक शिकले. पुढे लावणीवर प्रेम जडले,’ अशी भावना काळे यांनी व्यक्त केली. इनामदार म्हणाल्या, ‘कुटुंबाला जगविण्यासाठी या क्षेत्राकडे वळले. गाढवाच्या लग्नावेळी माझेही लग्न झाले. नृत्याचे शिक्षण घेतले नव्हते; पण घरामध्ये कलाझंकार नृत्य पार्टी होती. त्यातून शिकायला मिळाले.’
‘लावणीला लोक नाक मुरडतात, याचा अनुभव मीही घेतला आहे,’ असे गांधी यांनी सांगितले. ‘लावण्यांच्या कार्यक्रमांना थिएटर मिळावे यासाठी प्रयत्न करू,’ असे आश्वासन भोसले यांनी दिले. माडीवरती उभी राहूनी, पोटासाठी नाचते पर्वा कुणाची, अशा दुर्मिळ लावण्यांचा दृकश्राव्य आस्वाद रसिकांनी घेतला. दृकश्राव्य व्यवस्था संदीप आगवेकर यांची होती. किशोर व अभय सरपोतदार यांनी स्वागत केले.

‘लावणीवर पीएचडी’
‘परिस्थिती नसताना आईने शिकवले. आता मी एमएचे प्रथम वर्ष पूर्ण केले असून पीएचडी करणार आहे. कलेला पोषक ठरेल असा विषयच त्यासाठी निवडणार आहे,’ असा विश्वास परितेकर यांनी व्यक्त केला. ‘आम्ही माणसेच आहोत. मग आम्हाला वेगळी वागणूक का दिली जाते? तमाशाला वाईट का म्हटले जाते? ‘झाला तमाशा’ अशी टिप्पणी का केली जाते? कलाकाराला वाईट नजरेने का बघितले जाते?’ अशी प्रश्नांची सरबत्ती परितेकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुम्हाला कोण व्हावसं वाटतंय?

$
0
0

जयदीप कर्णिक
..
रोहन मित्रमंडळीत रमणारा. कॉलेज संपले तरी अजून शाळेतल्या मित्रांशी गप्पा ठोकल्याशिवाय, कट्ट्यावर बाता मारल्याशिवाय एक दिवसही काढता येणे अशक्य आहे असे मानणारा. आज रोहन ऑफिसमधल्या त्याच्या क्युबिकलमध्ये तासनतास लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेला असतो. कोणत्यातरी कोडमधला एक तुकडा बनवणे हे त्याचं काम. दिवसातले दहा बारा किंवा त्याहूनही अधिक तास कोणाशीही न बोलता कीबोर्ड आणि स्क्रीनकडे बघत काहीतरी लिहित राहणे त्याला आता अमानवी वाटू लागलंय. बरे इतके तास डोक्याला मुंग्या आणणाऱ्या कामानंतर कोणाशी बोलणही त्याला शक्य वाटत नाहीये.

मुक्ताचं काम आणखी वेगळं. तिला रोज ऑनसाइट टीमबरोबर त्यांच्या वेळेत मिटिंग असतात. दिवसभर ऑफिसमध्ये यायचे आणि रात्री घरून मीटिंग घ्यायच्या अशी दुहेरी कामे घरादाराकडे लक्ष देत तिला करायची असतात. रात्रीबेरात्रीच्या तिच्या मिटिंगमुळे घरच्यांच्या झोपेचेही खोबरं होतंय ह्याची अपराधी भावना घेत मुक्ता जरा बरा जॉब कुठे मिळतोय का ह्याचा शोध घेत रहात असते. त्यातच सहा महिन्यासाठीतरी दोन वर्षाच्या मुलीला इथेच ठेऊन ऑनसाइट जावे लागेल हे कळल्यापासून तिची झोपच उडाली आहे.

मोहित सतत काट्यावर चालणाऱ्या प्रोजेक्टवर काम करतोय. कस्टमरला आणि त्यामुळे त्याच्या मॅनेजरला प्रत्येक काम आत्ताच्या आत्ता ताबडतोब हवे असते. गेल्या तीन वर्षात त्याने मुलांचे स्नेहसंमेलन, घरातले लग्न किंवा घरच्यांबरोबर लांबच्या सुट्टीतला प्रवास असे काहीही केलेले नाहीये. बँकेत नोकरी करणाऱ्या बायकोशी ह्या कारणावरून होणारे वादविवाद त्याला आता नकोसे व्हायला लागलेत.कोणत्याही प्लानिंगशिवाय सतत फायर फाइटिंग करायला लावणाऱ्या कामाचा त्याला आता उबग आलाय....

अमोल आणि स्मिता दोघंही चांगल्या हुद्द्यावर. दोघांपैकी एकजण सतत परदेशी, त्यामुळे लग्न होऊन तीन चार वर्षं झाली तरी दोघांनाही नुकतच लग्न झाल्यासारखं वाटतंय. आता मूल हवे असा घरच्यांचा धोशा सुरू झाल्यापासून स्मिताच्या मनात करिअर विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालय...

सुखदा स्वतःतच रमणारी, कविता वगैरे करणारी. आपण बरं आणि आपलं काम बरं अशा स्वभावाची. सॉफ्टवेअर सेल्स इंजिनीअरची नोकरी करताना सुरुवातीला प्रवासाची मजा आली. पण आता सतत फिरती, क्लायंटना भेटणे आणि प्रेझेंटेशन्स याचा तिला कंटाळा येऊ लागलाय. कामाव्यतिरिक्त आपल्याला आणखी काही आयुष्य आहे की नाही असा प्रश्न तिला पडू लागलाय....

आकर्षक पगार, हुद्दा देऊ करणारी नोकरी सृजनला चालून आलीय. फक्त किमान वर्षभर नाइट शिफ्ट करावी लागेल असे त्याला सांगण्यात आलेय. कुटुंब, त्याचे इतर छंद या साऱ्याशी ह्या नोकरीचा मेळ कसा घालायचा असा विचार करत आज तरी सृजनने ह्या नोकरीला नकार दिलाय.....

ही सगळी आयटी नोकरी करणाऱ्यांची उदाहरण पाहिली आणि मला मध्यंतरी एका व्याख्यानाला गेलो होतो, ते आठवलं. तिथल्या संवादकाने एक मस्त प्रश्न विचारला. ‘तुम्हाला कोण व्हायला आवडेल? मासा की पक्षी की आणखी कुणी?’ करिअरविषयी विचार करतानाही आपण हाच प्रश्न स्वतःला विचारला तर?

मध्यमवर्गीय मराठी माणसाला करिअर म्हटले की नोकरीच आठवते आणि तीही आयटी कंपनीतली गलेलठ्ठ पगाराची. नोकरी मिळाली की काही वर्षांत टू बीएचके फ्लॅट, दाराशी येणारी गाडी, धुमधडाक्यात लग्न अशी हुरळून टाकणाऱ्या स्वप्नांची रांगच लागते. इवली इवली स्वप्न बघणाऱ्या आपल्याला आणखी काय हवे असते? हे सगळे मिळाले की ‘अपनी तो लाइफ बन गयी’ म्हणत एक लक्झुरिअस आयुष्य जगायला आपण अगदी उतावीळ होऊन जातो. यात वावगे काहीच नाही. एका चांगल्या आर्थिक सामाजिकदृष्ट्या उच्चवर्गीय आयुष्य जगण्याची स्वप्न बघणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे यात चुकीचे काहीच नाही. पण फायद्यांकडे बघून घेतलेल्या प्रत्येक निर्णयाबरोबर ‘फ्री गिफ्ट’ म्हणून काही रिस्कही येतात. आपण आपले निर्णय तराजूत घालून तोलून घेतले की झाले. पण प्रश्न असा आहे की तराजू घेऊन विवेकबुद्धीने वापरून किती निर्णय घेतो? बी.टेक, एम.टेक, आयटी किंवा इतर कोणत्याही इंजिनीअरिंग शाखेमधून शेवटच्या वर्षी कँपस इंटरव्ह्यूमध्ये आपण निवडले जातो आणि बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत नोकरी मिळाली या आनंदातच आपले जॉब प्रोफाइल काय आहे, कामाचे तास किती, वेळ काय अशा चौकशी करतच नाही. आयटी कंपनी म्हटले तर सॉफ्टवेअर इंजिनीअर, नेटवर्क इंजनीअर, वेब डेव्हलपर, डाटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर, इन्फर्मेशन सिक्युरिटी अॅनॅलिस्ट, गेम डेव्हलपर, प्रॉडक्ट टेस्टिंग अशी किती तरी कामे असतात.

प्रत्येक कामाची पद्धत वेगळी, त्यासाठी लागणारे कौशल्य वेगळे, त्यासाठीची कार्यसंस्कृती वेगळी. तेव्हा आपल्याला नेमके कोणते काम आवडेल याचा अंदाज घेणे महत्त्वाचे ठरते. कोणत्याही क्षेत्रामध्ये असतात, तसे चढउतार इथेही आहेत, पण मनापासून काम करणाऱ्यासाठी अजूनही इथे खूप काही मिळवण्यासारखे आहे. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्टाची गरज असतेच पण हे क्षेत्र तुमच्या आयुष्यातील गरजेपेक्षा जास्त वेळ मागते आहे का, तो देणे तुम्हाला शक्य आहे का? याचा विचार व्हायला हवा. आर्थिक सुबत्ता, चकाचक ऑफिस, परदेशगमनाची संधी या जमेच्या बाजू असल्या, तरी याची दुसरी बाजू तुम्ही लक्षात घेतली आहे का? नवनवीन टेक्नॉलॉजीमुळे सतत अपडेट राहण्याची गरज, स्पर्धेतून बाहेर जाण्याची भीती, अस्थिरतेची टांगती तलवार, अनियमित वेळा, प्रकृतीवर होणारे परिणाम या गोष्टीही लक्षात घ्यायला हव्यात.

आपले स्वभाव, आपली आणि आपल्या कुटुंबाची गरज आणि आपण करत असलेल्या कामाची गरज ह्यांचा मेळ घालू न शकलेल्यांना काम झोकून देऊन करणे अवघड होते. तेव्हा फक्त आपण आपल्याला ओळखायला हवे. आपल्याला काय व्हायचय मासा, पक्षी की आणखी काही, ते ठरवायला हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवतावादाची आज गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘सर्व जाती-धर्मांतील स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशाला मिळालेले स्वातंत्र्य कोणा एका समाजाचे नाही. मात्र, तरीही स्वातंत्र्यासाठी लढलेल्या महापुरुषांना आज जाती-धर्माच्या विळख्यात का कोंडले जाते,’ असा परखड सवाल माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला. साम्यवाद, समाजवाद आणि मानवतावादाची समाजाला गरज असून सर्व महापुरुषांच्या मूल्यांची गोळाबेरीज महाराष्ट्राला तारू शकेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
झोपडपट्टी सुरक्षा दल, दलित विकास आघाडी आणि कामगार सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठी राज्याचा उद्देश सफल झाला आहे का?’ या विषयावरील महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सबनीस बोलत होते. लेखक रतनलाल सोनग्रा, प्रा. शिवाजी जवळगेकर, प्रवीण बराथे आदींनी महाचर्चेत आपले विचार मांडले. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवान वैराट, भा. ल. ठाणगे आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात गायक मिलिंद शिंदे आणि सुदाम पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महापुरुषांना जाती-पातींमध्ये कोंडण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. एकीकडे जाती धर्मातील अनिष्ट रूढी वाढत असताना महापुरुषांच्या विचारांची सर्रास विभागणी केली जात आहे. महाराष्ट्राच्या जडण-घडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान यांचा समाजवाद हा आंबेडकरांच्या समाजवादाला जोडणारा आहे. तो मानवतावादाशी संवाद साधणारा आहे, असे डॉ. सबनीस यांनी सांगितले. विद्रोही चळवळीतील वाढते एकांगीपण देशाला आणि राज्याला परवडणारे नाही, याची जाणीव सध्याच्या पिढीने ठेवायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भगवान वैराट यांनी प्रास्ताविक केले, काशीनाथ गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लग्नाच्या आमिषाने वकील महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिळक राष्ट्रीय युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत.
या बाबत पौड फाटा परिसरात राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हायकोर्टामध्ये वकिली करतात. त्यांचे लग्न झाले असून, गेली काही वर्षे त्या पतीपासून वेगळ्या राहतात. दोन वर्षांपूर्वी कार्यक्रमात टिळक यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांची अनेक ठिकाणी भेट झाल्याने ओळख वाढली. त्यानंतर टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने बलात्कार केला. लग्नाविषयी विचारल्यानंतर शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारदार महिलेने टिळक यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचे ठरवले होते. तसे पत्रही तिने पोलिसांना दिले होते. मात्र, ते आंदोलन झाले नाही. गेल्या आठवड्यात तिने पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. संबंधित महिलेने विश्रामबाग पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्या अर्जाची चौकशी करून विश्रामबाग पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. या प्रकरणी टिळक यांना अटक करण्यात आलेली नाही. सहायक निरीक्षक व्ही. एन. शिंदे तपास करत आहेत.

महिला अधिकारी नाही
विश्रामबाग पोलिस ठाणे हे मध्यवस्तीमधील महत्त्वाचे पोलिस ठाणे आहे. मात्र, येथे महिला पोलिस अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टिळक यांच्यावर दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी फरासखाना पोलिस ठाण्यातील महिला अधिकाऱ्याला बोलवावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदनाची झाडे चोरणारे अटकेत

$
0
0

पालिका आयुक्तांच्या बंगल्यातील चोरी उघड

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात चंदनाची झाडे चोरणाऱ्या दोघांना संघटित गुन्हेगारी पथकाने (दक्षिण) अटक केली आहे. त्यांच्याकडून महापालिका आयुक्त, शिमला ऑफीस, पोस्ट मास्तर कार्यालय येथील चंदनचोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विष्णू विठ्ठल गायकवाड (वय ३२, रा. कवठेयमाई, ता. शिरुर), किसन लक्ष्मण गायकवाड (वय ३५, रा. बाबुली घुमट, नगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून चंदनाच्या झाडाचे लाकडू, झाड तोडण्यासाठी लागणारे कुऱ्हाडी, छोट्या कुदळी, वाकस, कानशी अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारी पथकाकडून अवैध धंद्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू होती. त्यावेळी गस्त सुरू असताना साधु वासवानी चौकाजवळील परमार चेंबरसमोर दोन व्यक्ती थांबल्या असून, त्यांच्याजवळील पोत्यात चोरीचे चंदन असल्याची माहिती पोलिसांना कळाली. त्यानुसार संघटित गुन्हेगारी पथकाचे पोलिस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, भालचंद्र बोरकर, प्रवीण तारकीर, विवेक जाधव, नितीन रावळ यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या पाणी पुरवठा केंद्रातील दोन झाडे चोरून नेल्याचे उघडकीस आले. त्यांना कोर्टाने १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
पोलिस कोठडी दरम्यान त्यांच्याकडे तपास केल्यानंतर त्यांनी पालिका आयुक्तांच्या बंगल्यातील, शिमला ऑफीस, पोस्टमास्तर कार्यालय येथून चंदनाची झाडे चोरल्याचे निष्पन्न झाले.
पुणे परिसरात राहून दिवसभर झाडांची टेहळणी करून, रात्री चंदनाची झाडे चोरायची, अशी त्यांची पद्धत होती. चोरलेले चंदन गुजरातमध्ये विक्री करण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठरावीक मंडळांना वेगळा न्याय का?

$
0
0

गणेश मंडळांची पोलिस, पालिकेला विचारणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वांनी एकत्र यावे, या प्रमुख उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये शहराचा गणेशोत्सव हा काही ठरावीक मंडळांपुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र दिसून येते. गणेशोत्सवात मानाच्या मंडळांना एक न्याय आणि अन्य मंडळांना दुसरा न्याय, असा भेदभाव पालिका आणि पोलिसांनी न करता सर्वांनाच सहकार्य करावे, अशी अपेक्षा गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांपैकी कोणत्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांना मान्यता देण्यात येणार आहे, त्याची माहिती उत्सवापूर्वीच जाहीर करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.
गणेशोत्सव महिन्यावर आल्याने प्रशासनाकडून कोणत्या सुविधा पुरविल्या जात आहेत, याची माहिती देऊन गणेश मंडळांकडून सूचना मागविण्यासाठी पालिकेच्या वतीने मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, अतिरिक्त पालिका आयुक्त शीतल उगले, उपमहापौर डॉ‌. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आणि दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवात पालिका तसेच पोलिस खात्याकडून मंडळांमध्ये भेदभाव केला जातो. मानाच्या गणेश मंडळांना एक न्याय तर इतर मंडळांना दुसरा न्याय असा प्रकार केला जातो. त्यामुळे मंडळांचे कार्यकर्ते नाराज होतात, अशी तक्रार काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. विसर्जन मिरवणुकीत मानाच्या मंडळांच्या ‘श्रीं’चे विसर्जन आठ ते दहा तास चालते. ठरावीक मंडळे विसर्जन मार्गावरुन मार्गस्थ झाली की,‌ पोलिस अन्य मंडळांना त्रास देतात, हे कुठेतरी थांबले पाहिजे. मांडव टाकण्यासाठी खड्डे खोदल्यास, ढोल ताशा पथकांमध्ये ‘टोल’ वाजविल्यास गुन्हे दाखल केले जातात. पालिकेने आणि पोलिस खात्याने आवश्यक त्या परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी, नियमांमध्ये काही बदल करावेत, तसेच चुकीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे राज्य सरकारने मागे घ्यावेत, यासाठी महापौरांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
गणेश मंडळांना त्रास होऊ नये, यासाठी ऑनलाइन परवानगी तसेच एक खिडकी योजना राबविणार असल्याचे महापौरांनी सांगितले. कमानीसाठी पालिकेच्या वतीने आकारल्या जाणाऱ्या शुल्कात सवलत देता येइल का, या विषयी चर्चा सुरू आहे. १ ऑगस्टपासून मंडळांना परवानगी देण्यात सुरुवात होईल. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी पालिकेने दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे महापौरांनी सांगितले.

पुण्याचा गणेशोत्सव देशाप्रमाणे विदेशातही पोहोचला आहे. त्यामुळे उत्सवासाठी विदेशातूनही पर्यटक येतात. या पार्श्वभूमीवर यंदा उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जाणार आहे. मंडळांच्या मदतीसाठी पोलिस यंत्रणा तत्पर राहणार आहे. मंडळांना सहकार्य करण्याची भूमिका पोलिसांची राहणार आहे.
रश्मी शुक्ला, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाचा धरणसाठा ३ टीएमसीने कमी

$
0
0

टेमघर धरणाच्या दुरुस्तीमुळे आवर्तनही घटणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात तीन टीएमसी पाण्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे यंदा कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे एक आवर्तन रद्द करावे लागणार असल्याची शक्यता उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केली. टेमघरच्या दुरूस्तीसाठी जानेवारी महिन्यापर्यंत धरण पूर्णपणे मोकळे केले जाणार असल्याने त्याचा फटका पुणे शहरासह लाभक्षेत्रातील अनेक गावांना बसणार आहे.
टेमघर धरणाची ३० टक्केहून अधिक दुरुस्तीची कामे झाली असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी यंदा १५ ऑक्टोबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे. एक जानेवारी २०१८ पर्यंत धरण पुन्हा रिकामे करून उर्वरित कामे पूर्ण केली​ जाणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. धरणाच्या गळतीची कामे पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. पावसाळ्यातही काम सुरू राहणार आहे. धरणाची​ लांबी एक हजार ७५ मीटर आहे. त्यापैकी ३०० मीटर लांबीचे काम करण्यात आले असून, जूनअखेर आणखी ३०० मीटरचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उर्वरित कामे करण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून धरणातील पाणी सोडण्यास सुरवात केली जाणार आहे.
टेमघर धरणातील पाणी सोडण्यात येणार असल्याने त्याचा थेट फटका तीन टीएमसी पाण्याला बसणार आहे. कालव्यातून सोडण्यात येणारी पाण्याची आवर्तने त्यामुळे कमी होऊ शकतात, असे वृत्त आहे. टेमघर धरणातील पाणी सुरुवातीच्या टप्प्यात वापरण्याचे नियोजन आहे. धरणातील पाणी १५ ऑक्टोबरपासून सोडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या पाणीसाठ्यात तीन टीएमसी पाण्याचा फटका बसणे अपेक्षित आहे, अशी माहिती महापालिकेतील उच्चपदस्थांनी दिली.

प्रशासन सज्ज
पुणे शहराच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागणार असल्याने शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे आवर्त​न कमी होण्याची शक्यता दाट आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यंदाच्या मोसमात पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये पाणी साठा कमी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाकेला धावणार ‘पोलिस काका’

$
0
0

शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात आयटीतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेला ‘बडीकॉप’ उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर आता पुणे पोलिसांकडून शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘पोलिस काका’ हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
छेडछाड, रॅगिंग, उडानटप्पू मुलांकडून होणार त्रास अशा विविध कारणांसाठी विद्यार्थी पोलिसांकडे मदत मागू शकणार आहेत. उपक्रमात कार्यरत पोलिसांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत असून, पुढील आठवड्यापासून ‘काका’ विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तत्पर राहणार आहेत. आयटी इंजिनीअयर रसिला राजू हिच्या खुनानंतर आयटीतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आयटीतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘बडीकॉप’ हा उपक्रम सुरू केला. त्याला आयटीतील महिलांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून अनेक महिलांना मदतही मिळाली. ‘बडीकॉप’मध्ये सध्या एक लाख महिला सहभागी आहेत. या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. बाहेरील शहरातील पोलिसांकडून हा उपक्रम सुरु केला.
‘पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. या ठिकाणी शाळा, महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शाळांच्या परिसराबाहेर विद्यार्थिंनींची छेड काढणे, त्यांचा पाठलाग करणे असे प्रकार घडत आहेत. किरकोळ भांडणात बाहेरची मुले बोलावून विद्यार्थ्यांमध्ये मारामारीचे प्रकारही घडत आहेत. गरीब विद्यार्थ्यांचे गुंड मुलांकडून रॅगिंग केले जाते. वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जातो. पुण्यात महिलांसाठी बडीकॉप उपक्रम सुरू केला. त्यावेळी आमच्या मदतीसाठी काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात होता. त्यामुळे आम्ही पोलिस काका उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला,’ अशी माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली.

पाच शाळांसाठी एक काका
शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पोलिस काका आता तत्पर असतील. प्रत्येकी पाच शाळांसाठी एक पोलिस काका तैनात करण्यात येणार आहेत. शाळेच्या बाहेर पोलिस काकांचा मोबाइल क्रमांक लावण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास विद्यार्थी तत्काळ पोलिस काकांना फोन करून थेट मदत मागू शकतील. सध्या या पोलिस काकांना प्रशिक्षण दिले जात आहे. पुढील आठवड्यापासून पोलिस काका विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात भासतोय लसीचा तुटवडा

$
0
0

पालिकेला लस खरेदीचे सरकारचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस खरेदी राज्य सरकारकडून करण्यात येत असली तरी, आरोग्य विभागाकडून अद्याप लसींचा पुरवठा न झाल्याने तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे सर्व पालिकांना स्वतंत्रपणे लसी खरेदी करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता पालिकेला ऐन पावसाळ्यात लस खरेदीची प्रक्रिया करावी लागणार आहे.
स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असताना प्रतिबंधक लस खरेदीची प्रक्रिया राज्य सरकारकडून राबविली जाते. त्यानंतर राज्यातील सर्व महापालिकांना त्या वितरीत कऱण्यात येतात. त्यानंतर गर्भवतींसह गरजूंना लस दिली जाते. मात्र, यंदा आऱोग्य खात्याने लस खरेदीला उशीर केला. महाराष्ट्र संसर्गजन्य आजार प्रतिबंधक व नियंत्रण तांत्रिक समितीची बैठक गेल्या आठवड्यात झाली. त्या वेळी पालिकांना त्यांच्या पातळीवर लस खरेदी करण्याच्या सूचना देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार राज्यातील सर्व २६ महापालिकांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस खरेदीचे आदेश देण्यात आले आहे. त्यासंदर्भात सहसंचालक डॉ. मुकुंद डिग्गीकर यांनी पत्रक जारी केले. परिणामी, राज्य सरकारचे आदेश आल्याने आता महापालिकांची पळापळ सुरु झाली आहे.
‘राज्य सरकारकडून स्वाइन फ्लू लसी खरेदीचे आदेश प्राप्त झाले असून, टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टेंडर निश्चित झाल्यानंतर त्याची खरेदी सुरू केली जाईल. सुमारे दहा लाख रुपयांच्या ३७०० लसी खरेदी केल्या जाणार आहेत. गर्भवती, मधुमेह, रक्तदाबग्रस्तांसह ज्येष्ठांना लस दिली जाणार आहे. या लसींचा गेल्या १५ दिवसांपासून तुटवडा भासत आहे. येत्या महिन्याभरात लस उपलब्ध करण्यात येईल,’अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आऱोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाहीरांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील संस्था आणि संघटनांनी मंगळवारी विविध कार्यक्रम आयोजित करून अभिवादन केले. सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दलित पँथर संस्थेतर्फे शहराध्यक्ष प्रकाश साळवे यांनी साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, विशाल खिलारे, संगीता दिवटे आदी या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या वतीने अध्यक्ष कैलास हेंद्रे यांनी साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या वेळी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भोसले, सुरेखा हेंद्रे, रामदास सुर्वे उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. साठे यांना शासनाने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. परशुराम वाडेकर, अशोक कांभळे, असित गांगुर्डे, महेश शिंदे आदी उपस्थित होते. मातंग समाज संस्थेच्या वतीने सारसबाग परिसरात झालेल्या कार्यक्रमात साठे यांना अभिवादन करण्यात आले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरसेवक अविनाश बागवे, एकनाथ सुगावकर, मधुकर चांदणे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे शहर जिल्हा मातंग समाज साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती संयोजन समितीतर्फे साठे यांना अभिवादन करण्यात आले. या निमित्त आयोजित कार्यक्रमात हनुमंत साठे, प्रकाश वैराळ, अंकल सोनावणे, विष्णू कसबे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी रमेश बागवे, हुनमंत साठे, अशोक लोखंडे आणि राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. लोहियानगर येथील अजिंक्य मित्र मंडळाच्या वतीने साठे यांच्या सारसबाग जवळील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर चांदणे, रमेश चांदणे, विलास कसबे आदी उपस्थित होते. समता सामाजिक संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग, मिशन ऑफ आंबेडकर, रमाबाई महिला विकास संस्था आदी संस्थांतर्फे साठे यांना अभिवादन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जैववैविध्य संवर्धनासाठी कृती आराखडा

$
0
0

जैवविविधता मंडळाचा उपक्रम; अभ्यासकांच्या सूचना मागवणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पश्चिम घाटासह राज्यातील विविध परिसंस्थांमधील जैववैविध्याचे संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशाने राज्य जैवविविधता मंडळातर्फे पुढील दहा वर्षांचा कृती आराखडा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकारी, अभ्यासक, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सूचनांचाही आराखड्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.
राज्य जैववैविविधता मंडळाने कृती आराखड्याची जबाबदारी भारती विद्यापीठाच्या जैवविविधता विभागाला दिली आहे. आतापर्यंत नागपूर, दापोली, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे अभ्यासक, प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांच्या बैठका घेऊन जैवविविधता विभागाने कच्चा आराखडा तयार केला. या संदर्भात स्वयंसेवी संस्था आणि अभ्यासकांची मते जाणून घेण्यासाठी भारती विद्यापीठात बैठक घेण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर आणि डॉ. एरक भरूचा यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला निसर्गसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटाबरोबरच उर्वरित महाराष्ट्रातील खेड्यांच्या लगतच्या जंगलांमध्ये मुबलक नैसर्गिक संपदा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत वाढते शहरीकरण, वनक्षेत्रातील अतिक्रमणे, शेतीमुळे नष्ट होत असलेली माळराने, वाढते प्रदूषण, शेतीमध्ये होत असलेला रसायनांचा वापर याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम वन्यजीव आणि जैववैविध्यावर होत आहे. गेल्या काही वर्षांत व्यावसायिक कारणांसाठी वनक्षेत्र आणि लगतच्या परिसरातून होणारी वनसंपदेची अनियंत्रित लूट वाढली आहे. विविध विद्यापीठे, स्वयंसेवी संस्थांबरोबरच व्यावसायिक कंपन्या ग्रामस्थांच्या पारंपरिक ज्ञानाचा गैरफायदा घेत आहेत. नैसर्गिक संपत्तीच्या व्यावहारिक मूल्याबद्दल अनभिज्ञ असलेल्या गावकऱ्यांना अंधारात ठेवून या कंपन्या नैसर्गिक संपत्तीतून कोट्यवधी रुपये कमवत आहेत. हे गैरप्रकार रोखण्यासाठी जैविक संपत्तीच्या वापरावर बंधने आणण्यासाठी पहिल्या टप्प्यात त्यांचे ‘डॉक्युमेंटेशन’, दुसऱ्या टप्प्यात वनसंपदेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. यासाठीच मंडळातर्फे पुढील दहा वर्षांचा कृती आराखड्याचे काम हाती घेण्यात आले आहे,’ अशी माहिती बर्डेकर यांनी दिली.

काम अंतिम टप्प्यात
स्थानिक वनसंपत्तीचा वापर करून नफा मिळविणाऱ्या कंपन्यांनी उत्पन्नातील काही वाटा गावकऱ्यांना द्यावा, यासाठी केंद्रीय जैवविविधता मंडळ आग्रही आहे. प्रस्तावित कृती आराखड्यामध्ये गावकऱ्यांना समन्यायी वाटप करण्याचीही तरतूदही प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे या आराखड्यासाठी जर्मन कॉर्पोरेशनचे आर्थिक सहकार्य मिळाले आहे. उपक्रमासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र आणि उत्तराखंड या दोन राज्यांची निवड केली आहे. भारती विद्यापीठाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे, असे बर्डेकर म्हणले.

येथे पाठवा सूचना
भारती विद्यापीठाच्या जैवविविधता विभागातर्फे आराखड्यामध्ये समाजातील विविध घटकांच्या सूचना, मार्गदर्शन, प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यामध्ये शहराबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, स्वयंसेवी संस्थांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. इच्छुकांनी http://msbsap.bvieer.edu.in/index.php या वेबसाइटवर त्यांच्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहसीन शेख हत्या: रोहिणी सालियन वकीलपत्र घेणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यात जमावाकडून हत्या करण्यात आलेल्या मोहसीन शेख हत्याप्रकरणी वकीलपत्र घेण्यास ज्येष्ठ वकील रोहिणी सालियन यांनी तयारी दर्शविली आहे. सालियन यांनी मोहसीनचे वडील मोबीन शेख यांना तसे पत्रही दिले आहे. त्यामुळे हा खटला पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

२ जून २०१४ रोजी पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या मोहसीन शेखची जमावाने हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह २१ जणांना येरवड्यातून अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी राज्यसरकारने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. मात्र नंतर निकम यांनी कोणतेच कारण न देता या खटल्यातून अंग काढून घेतले. त्यामुळे बरेच महिने या खटल्याची सुनावणी झाली नाही. आता सालियन यांनीच हा खटला लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने या खटल्याला पुन्हा गती मिळणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस अपघातात सहा महिन्यांत १४ मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसखाली गेल्या ३४ दिवसांत सात जणांचा, तर सहा महिन्यांत चौदा जणांचा अपघाती मृत्यू झाला असून, पीएमपी प्रशासनाचे प्रवाशांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पीएमपी प्रवासी मंचाने केला आहे.

पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना मंचाने याबाबतचे निवेदन दिले आहे. त्यामध्ये अपघातांची संख्या कमी करून, प्रवासी सुरक्षितता वाढविण्याची मागणी मंचाकडून करण्यात आली आहे. मंचाने तीन जानेवारी ते आठ जुलै या कालावधीतील पीएमपी बसच्या अपघातांची आकडेवारीच सादर केली आहे. या काळात अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे देखील त्यात नमूद केली आहेत. त्यामुळे या अपघातांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी, या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अपघात टाळण्यासाठी शिफारशी तयार करून त्याची ठराविक वेळत अंमलबजावणी करावी, आदी मागण्या मंचाकडून करण्यात आल्या आहेत.

कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी. पीएमपीची प्रतिमा उंचवावी, यासाठी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना हजारो रुपयांचा दंड करण्यात येत आहे. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असे मंचाच्या जुगल राठी यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारनगरमध्ये सहा लाखांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून सहकारनगर परिसरात मंगळवारी भर दुपारी बंद बंगल्याच्या तळमजल्यावरील खोलीच्या खिडकीचे ग्रील तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा सहा लाख १८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास पानसे (वय ६५, रा. सहकारनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास पानसे यांचा सहकारनगर येथे दुर्वांकूर नावाचा बंगला आहे. कामाच्या निमित्ताने मंगळवारी ते घर बंद करून बाहेर गेले होते. सकाळी अकरा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या तळमजल्यावरील खोलीच्या खिडकीचे ग्रील तोडले. त्यानंतर खिडकीवाटे घरात प्रवेश केला. पहिल्या मजल्यावरील दोन बेडरूमचे कुलुप कशाच्या उचकटून बेडरूममध्ये गेले. त्या ठिकाणी असलेल्या कपाटातील रोख १६ हजार रुपये व सोन्याचे दागिने, असा एकूण सहा लाख १८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. पानसे सायंकाळी घरी आले. त्या वेळी त्यांना घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी दत्तवाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. मात्र, अद्यापही घरफोड्या करणाऱ्यांना अटक करण्यात यश आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी शिकले माणुसकीचा पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘बच्चा हिंदू है न मुसलमान, बच्चा है मासूम सा इन्सान...’ उर्दूतील ज्येष्ठ कवी नझीर फतेहपुरी यांची ही नज्म मंगळवारी विद्यार्थ्यांना माणुसकीचा पाठ देत होती. कमालीच्या टोकदार सामाजिक परिस्थितीत आणि पावसाळी वातावरणात विद्यार्थ्यांनी या शब्दांमधून खऱ्या अर्थाने विचारांचा ओलावा अनुभवला. एरवी पाठपुस्तकातून भेटणारे लेखक पुढ्यात येऊन संवाद साधू लागल्याने विद्यार्थी वेगळ्या विश्वात रममाण झाले होते.

निमित्त होते, संवाद पुणे आणि महाराष्ट्र मराठी अध्यापक संघ यांच्यातर्फे आयोजित विद्यार्थ्यांशी संवाद सोहळ्याचे. बालसाहित्यकार नझीर फतेहपुरी, ल. म. कडू तसेच युवा लेखक राहुल कोसंबी यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नूतन मराठी विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात साहित्यिकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, कवयित्री डॉ. संगीता बर्वे, संवादचे सुनील महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका संजीविनी ओगले, निकिता मोघे उपस्थित होते.

‘मैं बच्चों में आकर बच्चा बन जाता हूँ... सीधा साधा सच्चा बन जाता हूँ दिनभर फिरता रहता हूँ झोपडों की बस्ती में, रात में घर आकर सच्चा बन जाता हूँ बच्चा हिंदू है ना मुसलमान बच्चा है मासूम-सा इन्सान बच्चा मंदिर में भी जाए, बच्चा मस्जिद में भी जाए बच्चे का है धर्म मोहब्बत, बच्चे का ईमान है चाहत...’ या कवितेतून फतेहपुरी यांनी मुलांचे निरपेक्ष भावविश्व मांडले. 2मुलांनो एखाद्या नेत्याचे किंवा महापुरुषाचे नाव सांगा?’ असा प्रश्न सबनीस यांनी विद्यार्थ्यांना केला. कुणी पं. जवाहरलाल नेहरू, कुणी अटलबिहारी वाजपेयी, कुणी अबुल कलाम आझाद अशी नावे घेतली. ‘या नेत्यांचा जात किंवा धर्म पाहायचा का? महापुरुषांना जातीत बंदिस्त करायचे का ?’, सबनीस यांच्या पुढील प्रश्नांनी मुले काहीशी बावचळली; पण त्यांनी सावध होत ‘नाही’ असे उत्तर दिले. अशा संवादातून सबनीस यांनी विद्यार्थ्यांना माणुसकी, सर्वधर्मसमभाव असे विचारांचे संचित देऊन समृद्ध केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images