Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अॅडाप्टिव्ह ट्रॅफिक सिस्टिममध्येटाटा प्रोजेक्ट लिमिटेड अपयशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी ‘अॅडप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (एटीएमएस) बसवण्याच्या निविदाप्रक्रियेत ‘टाटा प्रोजेक्टस लिमिटेड’ कंपनी तांत्रिक मूल्यांकनामध्ये अपयशी ठरल्याने तिच्या निविदा उघडण्यात आल्या नव्हत्या. ‘टाटा’ने त्यास आक्षेप घेऊन तांत्रिक मूल्यांकन अहवालची प्रत तपासणीसाठी मागितली आहे. दरम्यान, निविदा प्रक्रियेतील पारदर्शक जपण्यासाठी हा अहवाल ‘टाटा’ला देण्याचा निर्णय स्मार्ट सिटी कंपनीने घेतला आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होण्यास तूर्त उशीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘एटीएमएस’च्या कामासाठी एल अँड टी या कंपनीने २९१.९९ कोटी रुपयांची निविदा भरली आहे. तर, स्मार्ट सिटीच्या सल्लागारांनी या कामाचे ‘एस्टिमेट’ २२१.१७ कोटी रुपये दिले आहे. ‘एस्टिमेट’ आणि ठेकेदार कंपनीच्या निविदेत मोठी तफावत असल्याची शंका ‘पीएससीडीसीएल’चे अध्यक्ष डॉ. करीर यांनी उपस्थित केल्याने ‘एल अॅँड टी’च्या निविदा गत बैठकांमध्ये मंजूर करण्यात आली नव्हती.
या दरम्यान ‘एटीएमएस’च्या कामासाठी निविदा भरलेल्या ‘टाटा प्रोजेक्टस लिमिटेड’ या कंपनीने निविदा प्रक्रियेतील आपल्या सहभागाबाबत पुनर्विचार करण्याची विनंती ‘पीएससीडीसीएल’ केली होती. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत त्यांची ही विनंती मान्य करण्यात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ‘एटीएमएस’च्या कामाची सुरुवात होण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘पीएससीडीसीएल’च्या अकराव्या बैठकीत ‘एटीएमएस’ची ‘एल अॅँड टी’ने काढलेली निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. मात्र, कंपनीचे अध्यक्ष करीर यांनी काही शंका उपस्थित केल्या होत्या. या शंकाचे निरसन झाल्यानंतर​ निविदा प्रक्रियेवरील पुढील निर्णय अपेक्षित होता. या दरम्यान, ‘टाटा प्रोजेक्टस लिमिटेड’ या कंपनीने तांत्रिक मुल्यांकन अहवालाची कलेली मागणी ‘पीएससीडीसीएल’च्या संचालक मंडळाने मान्य केली. निविदा प्रक्रियेतील पारदर्शक जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात यावा, असे संचालक मंडळाच्या बैठकीत ठरले. या निविदेप्रक्रियेसाठी स्वतंत्र मूल्यांकन समिती तयार करावी. या समितीने या निविदेप्रकरणी उपस्थित होणाऱ्या समस्या सोडवाव्यात, अशीही चर्चा या वेळी करण्यात आली. मात्र, त्याच वेळी ​निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या कंपन्यांकडून कुठलेही अतिरिक्त कागदपत्रे घेण्यात येऊ नयेत, असाही निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

..................

तांत्रिक गुणांचा सारांश

तपशील कमाल गुण शापुरजी पालनजी एलअॅण्डटी टाटा

प्रोजक्टस्, कंपनीची क्षमता, तांत्रिक

उपायायोजना, गुणवत्ता,टीम, प्रकल्पाची ७५ ६८.९५ ७३.०८ ६२.४०

माहिती, दृष्टीकाने, कार्यपद्धती

प्रस्तावित उपायोजनांचे प्रात्यक्षिक, सादरीकरण २५ १७.९० २२.९० १०.७०

तांत्रिक मुल्यमापनावर आधारित एकूण गूण १०० ८६.८५ ९५.१८ ७३.१०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तालुका उपाध्यक्षाचा ‘भामा-आसखेड’ला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या पूर्व भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या भामा आसखेड योजनेच्या कामाला ‘पालिका ते पार्लमेंट’ या सर्वच ठिकाणी सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्याच युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षांनी विरोध केल्याने भाजपची चांगलीच अडचण झाली आहे. या योजनेच्या विरोधात स्था‌निक नागरिकांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेऊन प्रकल्पाचे काम सुरू करावे, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपच्या आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी यांनी वारंवार बैठका घेऊन चर्चा केली. मात्र, स्थानिक नागरिक आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने सत्ताधारी असलेले भाजपचे पदाधिकारी हतबल झाले आहेत.

शहराचा पूर्व भाग असलेल्या नगररोड, वडगावशेरी, खराडी, चंदननगर या भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा प्रकल्प पालिकेने सुरू केला आहे. सुमारे ४० ते ४५ किलोमीटरची पाइपलाइन टाकून हे पाणी आणले जाणार आहे. सुमारे ४०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. पाइपलाइन आणि जॅकवेल अशा दोन टप्प्यांत या प्रकल्पाचे काम केले जात असून, आतापर्यंत सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जुलै २०१८पर्यंत ठेकेदाराला हे सर्व काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असे स्पष्ट करून या पूर्वी अनेकदा या प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले होते. खेडचे शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली या अगोदर आंदोलने करून हे काम बंद पाडण्यात आले होते. हा प्रकल्प शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने हे काम सुरू व्हावे, यासाठी तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री बापट यांच्यासह जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची बैठक होऊन दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या निर्णयानंतर प्रकल्पाचे रखडलेले काम सुरू झाले होते.

सरकारने दिलेली नुकसान भरपाई मान्य नसल्याचे कारण पुढे करून या भागातील स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध करून काम बंद पाडले आहे. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून हे काम बंद पाडण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वेळी शिवसेनेच्या ऐवजी भाजपच्या युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ‘भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे, ८.१४ टीएमसी या धरणाची क्षमता आहे. त्यातील तब्बल पाच टीएमसी पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला दिले जाणार आहे. दीड टीएमसी पाणी आळंदीला, तर स्थानिक नागरिकांसाठी अवघे एक टीएमसी पाणी शिल्लक ठेवले जाणार आहे. हे अन्यायकारक असून स्थानिकांसाठी तीन टीएमसी पाणी राखीव ठेवावे, ज्या शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पात जात आहे, त्यांना जमीन देण्यात यावी, पुणे तसेच पिंपरी चिंचवड मध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण द्यावे, अशा मागण्या स्थानिकांच्या असून जोपर्यंत या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही,’ अशी भूमिका नवले यांनी मांडली.

महापालिका, राज्य सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये भाजपची सत्ता असतानाही पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या विरोधामुळे प्रकल्प रखडत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री बापट यांच्यासह युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनीही चर्चा केली. आंदोलकांनी जॅकवेलचे काम सुरू करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे. अद्यापही आपल्या मागण्यांवर स्थानिक नागरिक ठाम असल्याने भाजपचे पदाधिकारी हतबल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेट्रो’च्या विस्तारासाठी खासगी कंपन्यांना साद

$
0
0

पिंपरी परिसरातील कंपन्यांना खर्चाचा भार उचलण्याचे ‘महामेट्रो’चे आवाहन

Tweet: @suneetMT
पुणे : पिंपरी-चिंचवडपर्यंतची मेट्रो निगडीपर्यंत वाढवण्याची जोरदार मागणी होत असल्याने या परिसरातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे सहकार्य मिळविण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) चाचपणी सुरू केली आहे. बजाज, टेल्को यासह चाकण परिसरातील महिंद्रा अँड महिंद्रा, फोक्सवॅगन, मर्सिडीज आणि इतर मोठ्या कंपन्यांनी मेट्रोच्या विस्तारासाठी आर्थिक साह्य करण्याचे आवाहन ‘महामेट्रो’ने केले आहे. या कंपन्यांनी खर्चाचा भार उचलण्याची तयारी दाखविल्यास, उर्वरित खर्च ‘महामेट्रो’कडून करण्याची तयारी दाखविण्यात आली आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांना मान्यता मिळाली आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गावरील मेट्रोच्या कामास सुरुवात झाली आहे. हे काम सुरू होण्याआधीपासून या परिसरातील सर्वांनी मेट्रोचा विस्तार निगडीपर्यंत करावा, अशी जोरदार मागणी लावून धरली आहे. निगडी ते कात्रजच्या विस्ताराला यापूर्वी राज्य सरकारने मंजुरी दिली असली, तरी त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झालेला नाही. नागरिकांचा आग्रह लक्षात घेता, या मार्गासाठी खासगी कंपन्या पुढे येऊ शकतील का, या दृष्टीने ‘महामेट्रो’ने प्राथमिक तयारी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवडचा भाग सुरुवातीपासून औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जात असल्याने या भागांतील कंपन्यांनी मेट्रोच्या विस्तारित मार्गासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले आहे.

आकुर्डीतील बजाज ऑटो, चिंचवडमधील टेल्को अशा नावाजलेल्या कंपन्यांसह या भागांतील इतर मोठ्या कंपन्या आणि चाकण-तळेगाव औद्योगिक टप्प्यातील महिंद्रा, फोक्सवॅगन, मर्सिडीज अशा कंपन्यांनाही दीक्षित यांनी पत्र पाठविले असून, आर्थिक भार उचलण्याचे आवाहन केले आहे. निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी संबंधित कंपन्या काही प्रमाणात खर्च उचलण्यास पुढे आल्यास, उर्वरित खर्च ‘महामेट्रो’च्या माध्यमातून करण्याची तयारी असून, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दीक्षित यांनी दिली.
...............
कर्मचाऱ्यांना फायदा होईल

पिंपरी-चिंचवड ते निगडी (भक्ती-शक्ती चौक) हे अंतर साधारणतः चार ते साडेचार किमीचे आहे. या टप्प्यात मेट्रोचा विस्तार करायचा झाल्यास प्रति किमी अडीचशे कोटी रुपये खर्चानुसार एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येण्याची शक्यता आहे. या खर्चापैकी काही निधी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला, तर उर्वरित खर्च महामेट्रो करेल, असे संकेत दीक्षित यांनी दिले. या परिसरात कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना मेट्रोच्या विस्ताराचा फायदा होऊ शकणार असून, त्यांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल, असा दावा त्यांनी केला.
..................

‘मेट्रोच्या विस्ताराची निकड लक्षात घेता, परिसरातील खासगी कंपन्यांनी एक पाऊल पुढे टाकावे. त्यांच्या प्रतिसादानुसार महामेट्रोही एक पाऊल पुढे टाकेल आणि सर्वांनाच त्याचा फायदा होईल.’
- ब्रिजेश दीक्षित
व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनआरआय’ पतीसह पाच जणांना शिक्षा

$
0
0

कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी लष्कर न्यायालयाने सुनावली शिक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लग्नात हुंडा न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी ‘अनिवासी भारतीय (एनआरआय)’ पतीसह सासू, सासरे, नणंद, नणंदेचा पती यांना एक वर्षे शिक्षा आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लष्कर कोर्टाचे न्यायाधीश जे. एस. कोकाटे यांनी हा निकाल दिला.

सॅम्युअल मारुती गायकवाड (३९), विश्रांती डेव्हीड गायकवाड (६०), विश्‍वलता डेव्हीड गायकवाड (३८, तिघेही रा. राजा हौसिंग सोसायटी, एनआयबीएम रोड, कोंढवा), धनंजय महाबाला पुजारी (३८), करुणा धनंजय पुजारी (३२, दोघेही रा. सिध्दार्थवाडी, वाई, जिल्हा सातारा) यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी अपर्णा सॅम्युअल गायकवाड (३६) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या खटल्यात सरकारी वकील रजनी तहसीलदार यांनी काम पाहिले.

अपर्णा यांनी विवाहासाठी विनीत मॅरेजब्युरो येथे नोंद केली होती. त्यांची प्रोफाईल पाहून सॅम्युअल आणि तिच्या घरच्यांनी अपर्णाला मागणी घातली. नोव्हेंबर २०११ मध्ये एन्गेजमेंट झाल्यानंतर १६ डिसेंबर २०११ रोजी लग्नाची तारीख ठरली. लग्नाच्या दोन दिवस अगोदर तिच्या वडिलांना तुम्हाला लग्न करावे लागेल तसेच दोन लाख रुपये हुंडा द्यावा लागेल अशी मागणी अपर्णाच्या सासरच्यांकडून झाली. त्यावर तिच्या वडिलांनी लग्न करून देण्यास सहमती दर्शवून दोन लाख रुपये नंतर देण्याचे आश्‍वासन दिले. लग्नात तिच्या वडीलांनी तिला वीस तोळे दागिने घातले. सासरी नांदत असताना सासरच्यांनी तिला काम जमत नसल्याच्या कारणावरून टोचून बोलणे सुरू केले. तिला जबरदस्तीने घरातून बाहेर काढले. एवढा प्रकार होऊनही तिने पोलिसांत तक्रार दिली नाही. सासूने दागिने ठेवण्यास मागितल्यानंतर तिने लगेच दागिने दिले. त्यानंतर तिला सॅम्युअला घटस्फोट देण्यासाठी दबाव आणला गेला. परंतु, तिने घटस्फोटासाठी नकार दिला.

दरम्यान, सॅम्युअल ओमान येथून परत आल्यानंतर त्याने भाड्याने फ्लॅट घेतला. त्यानंतर सॅम्युअल पुन्हा ओमानला निघून गेला. त्यानंतर भारतात परत येऊनही तो पुन्हा तिच्याकडे गेलाच नाही. पतीबाबत विचारणा करण्यासाठी गेल्यानंतरही तिला घरात घेतले नाही. तिला एकटीला राहण्यास भाग पाडून तिला मानसिक त्रास दिल्याने तिने शिवीगाळ करून, मारहाण करून घरातून बाहेर बाहेर काढल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा लाखांचा गुटखा पकडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संघटित गुन्हेगारी पथकाने (उत्तर) शहरात दोन ठिकाणी छापा टाकून पंधरा लाख रुपयांचा गुटखा पकडला. पुढील कारवाईसाठी हा गुटखा व ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
राजेश आक्काराम चौधरी (वय २८, रा. थोपटे बिल्डिंग, तलाठी कार्यालय, पुणे) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. वाहनचोरी व घरफोड्यातील गुन्हेगारांची संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाकडून माहिती काढण्यात येत होती. त्या वेळी वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांना माहिती मिळाली की, पिकअप जीपमधून सेनापती बापट रोडने गुटखा घेऊन जात आहेत. त्यानुसार, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या पथकाने सापळा रचून सेनापती बापट रोडवर जीपला पकडले. त्या वेळी चालक राजेश चौधरी याच्याकडे असणाऱ्या जीपमध्ये आठ लाख ३१ हजार रपयांचा आरएमडी व विमल गुटखा मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुटखा प्रकाश पोमाराम भाटी (वय ३१, रा. व्हीव्हीआयटी कॉलेज, कोंढवा) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जीप व गुटखा असा एकूण नऊ लाख ५१ हजार रुपयांचा माल जप्त केला.
कोंढवा येथील प्रकाश चुनीलाल माळी (वय ५०) हा याने वृंदावननगर येथील लेन क्रमांक तीन मध्ये किरण इंडस्ट्रीजच्या मागे घरी गुटख्याची साठवणूक केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. त्या वेळी पोलिसांनी तेथून पाच लाख ३९ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा गुटखा व माल वाहतूक जीप जप्त करून या तिघांना ताब्यात घेतले. त्यांना पुढील कारवाईसाठी अन्न व औषध विभागाच्या ताब्यात देण्यात आले आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाड्या धुवून कैद्यांनी कमावले १० लाख!

$
0
0

कैद्यांनी वाहने धुऊन मिळवून दिले उत्पन्न

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
येरवडा तुरुंगात खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी शिक्षेच्या काळात वॉशिंग सेंटरवर काम करून वर्षभरात हजारो खाजगी वाहने धुऊन प्रशासनाला साडे दहा लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. वॉशिंग सेंटरवर वाहने धुणाऱ्या प्रत्येक कैद्याला दैनंदिन पंचावन्न रुपये मजुरी मिळते.

येरवडा तुरुंगात खुनाच्या गुन्ह्यातील अनेक कैदी शिक्षा भोगत आहेत. तुरुंगात शिक्षा भोगताना कैद्यांना प्रशासनाकडून विविध प्रकारची कामे दिली जातात. प्रशासनाच्या सूचनेनुसार प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि वर्तणूक चांगली असलेल्या कैद्यांना कालांतराने बंदीस्त तुरुंगातून काढून शेजारील खुल्या कारागृहात शेतीची कामे करण्यासाठी पाठवले जाते. त्यानंतर काही कैद्यांना तीन महिन्यांसाठी जेल रस्त्यावरील तुरुंग प्रशासनाच्या मालकीच्या वॉशिंग सेंटरवर वाहने धुण्यासाठी नियुक्त केले जाते. वॉशिंग सेंटरवर रोज सहा कैदी असतात. खासगी वॉशिंग सेंटरपेक्षा येथील धुलाईचे दर निम्मे असल्याने नागरिक या ठिकाणी वाहने धुण्यासाठी प्राधान्य देतात. रोज शेकडो वाहने सहा कैदी धुऊन काढतात. यामध्ये दुचाकी, चारचाकी, रिक्षा, टेम्पो, मिनी बस सारखी वाहने धुतली जातात. गाड्या धुणाऱ्या कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि धुतलेल्या गाड्यांचे मालकांकडून पैसे घेण्यासाठी एक तुरुंग कर्मचारी असतो.

तुरुंगाला उत्पन्न

गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल १६ ते मार्च १७ या कालावधीत खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी हजारो वाहने स्वच्छ करून साडे आठ लाखांचे उत्पन्न मिळवून दिले होते. तसेच या वर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केले. एकूण पंधरा महिन्यांच्या कालावधीत कैद्यांनी हजारो गाड्या धुऊन तुरुंग प्रशासनाला साडे दहा लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.

तीन महिन्यांनी कैद्यांची बदली

वॉशिंग सेंटरवर एकूण सहा कैदी काम करतात. तीन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा खुल्या तुरुंगात शेतीची कामे दिली जातात; तर त्यांच्या जागी तीन महिन्यांसाठी नवीन सहा कैद्यांची नेमणूक केली जाते.

तुरुंगाच्या वॉशिंग सेंटरचे उत्पन्न

एप्रिल १६ ते मार्च १७………८,५४,३५०
एप्रिल ते जून १७……………१,८३,३१०
एकूण…………………........१०,३७,६६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेडमध्ये भातलावणी सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
खेड तालुक्यात भातलावणीची कामे वेगात सुरू आहेत. संततधार पावसात आदिवासी बांधव भातलावणीच्या कामात व्यग्र आहेत. तालुक्यात साडेसात हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर भातलावणी केली जाते. यंदा पाऊस वेळेवर व चांगला होत असल्यामुळे जवळपास ७५ टक्के क्षेत्रावरील भातलावणी पूर्ण झाली आहे.

भात रोपांची स्थिती देखील चांगली असून वाढही पुरेशा प्रमाणात झालेली आहे. भात हे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. तालुक्याचा पश्चिम भाग हा भाताचे आगर म्हणून ओळखला जातो. महत्त्वाचे म्हणजे कामानिमित्त बाहेर गावी राहत असलेले अनेक आदिवासी बांधव भातलावणीसाठी हमखास गावी येत असतात. काही वर्षांपूर्वी या भागातील शेतकरी स्थानिक जातींच्या भाताचे पीक घेत असत. परंतु, हल्ली हे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. जवळपास सर्वच शेतकरी
प्राधान्याने इंद्रायणी जातीच्या भाताचीच लागवड करतात. हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच शेतकरी स्थानिक जातींचा तांदूळ पिकवतात. काळाच्या ओघात अनेक स्थानिक तांदळांच्या जाती संपल्या आहेत. इतर जातींच्या तुलनेत इंद्रायणी तांदळापासून अधिक उत्पन्न मिळते, हे यामागील प्रमुख कारण आहे. कमी उत्पन्नामुळे स्थानिक जातींच्या तांदळाची लागवड केली जात नाही.

भाताच्या स्थानिक जाती

खेड तालुक्यात प्रामुख्याने ढवळा, हळा कोळंबा, पठारी कोळंबा, तामकुड, गरा कोळंबा, जीर, चिमणसाळ, खडक्या, रायभोर, आंबेमोहोर आदी जातींच्या भात पिकवला जात असे. मात्र, आता या स्थानिक जातींच्या भाताचे प्रमाण कमी झाले आहे.

भात पिकवणारी गावे

अधिक पाऊस असलेल्या भोरगिरी, टोकावडे, भोमाळे, कारकुडी, मंदोशी, खरपुड, घोटवडी, कुडे, परसूल, वांद्रे, आंबोली, विऱ्हाम, तोरणे, डेहणे, औदर या गावांमध्ये भाताचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. अनेक ठिकाणी लावणी पूर्ण झालेली आहे.
.........
७५०० हेक्टर
क्षेत्रावर खेड तालुक्यात भातलावणी

७५ टक्के
क्षेत्रावरील भातलावणी पूर्ण

इंद्रायणी
मोठ्या प्रमाणावर पिकवला जाणारा तांदूळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपकडून जुन्या कामांची उद्‍घाटने

$
0
0

महापालिकेतील विरोधीपक्षनेते तुपे यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
समान पाणीपुरवठा योजनेसाठी बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्यांचे उद्‍‍घाटन गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केले होते. आता पुन्हा त्याच कामांचे उद्‍घाटन करण्याचा घाट भारतीय जनता पक्षाने (भाजप) घातला आहे. भूमिपूजनाचा हा खर्च म्हणजे पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी आहे. या सत्ताधाऱ्यांकडे दाखवण्यास काहीही नसल्याने अशा प्रकारे उद्‍‍घाटने करत असल्याची टीका ​महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी केली.

भाजपने या पाण्याच्या टाक्यांच्या कामांचे पुन्हा भूमिपूजन केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करेल, असा इशारा तुपे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळे पाण्याच्या टाक्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. या उद्‍‍घाटनांचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भ्रष्टाचार आणि पाण्याच्या टाक्यांच्या पूर्नभूमिपूजनाची अनोखी भेट भाजप देत आहे. भाजपने जलवाहिनीच्या वाढीव दराच्या निविदा मंजूर करण्याचा घाट घातला आहे. ‘भ.. भाजपचा नसून भ.. भ्रष्टाचारा’चा आहे, अशी टीका तुपे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडाळा लोहमार्गावर दरड कोसळल्याने इंजिन घसरले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
मुंबई- पुणे लोहमार्गावरील खंडाळा घाटातील मंकीहील ते ठाकूरवाडीदरम्यान एका बोगद्याजवळ मंगळवारी दुपारी लोहमार्गावर दरड कोसळल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, मुंबईवरून पुण्याच्या दिशेला येणाऱ्या सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या उशिराने धावल्याने प्रवाशांचे हाल झाले.
मुंबई- हैदराबाद एक्स्प्रेस ही मुंबईहून पुण्याच्या निघाली होती. मागील दोन-तीन दिवसांपासून लोणावळा व खंडाळा घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी दुपारी खंडाळा घाटातील मंकीहिल ते ठाकूरवाडी दरम्यान असलेल्या एका बोगद्याच्या तोंडाजवळ लोहमार्ग किलोमीटर क्रमांक ११५ जवळ दरड कोसळली होती. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या हैदराबाद एक्स्प्रेसने ठाकूरवाडी सोडल्यानंतर पुढे असलेला एक बोगदा पार करताच बोगद्याच्या तोंडाजवळ लोहमार्गावर कोसळलेली दरड लक्षात येताच मोटरमनने गाडीचा वेग कमी केला. मात्र, तोपर्यंत इंजिन कोसळलेल्या दरडीवरून गेल्याने इंजिन रुळावरून घसरले. सुदैवाने, मोटरमनला गाडीचा वेग कमी करण्यात काहीप्रमाणात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली.
या घटनेमुळे मुंबई-पुणे लोहमार्गावरील रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळित झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. हैदराबाद एक्स्प्रेसने आलेल्या काही प्रवाशांनी पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या जलद गाड्यांनी पुन्हा कर्जत ते कल्याण परतीचा प्रवास करून त्या ठिकाणाहून पर्यायी मार्ग व वाहनाने प्रवास केला.
या घटनेनंतर मुंबईहून पुण्याकडे येणारी मुंबई-कन्याकुमारी एक्स्प्रेस कल्याणला, वांगनी येथे मुंबई भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, मुबंई- नांदेड एक्सप्रेस ही कर्जतला थांबविण्यात आली होती. डेक्कन आणि प्रगती एक्सप्रेसही कल्याण व कर्जत येथे थांबविण्यात आल्या होत्या.
या घटनेची माहिती मिळताच कल्याण व लोणावळ्यावरून रेल्वेचे अपघात पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन पथक आणि यंत्रसामग्रीच्या साहाय्याने प्रथम कोसळलेल्या दरड बाजूला करून हैद्राबाद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून पूर्ववत आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’मध्ये धुसफूस?

$
0
0

विजय कोलते यांचा ‘घरचा आहेर’

म. टा. प्रतिनिधी, सासवड
‘लोकसभा-विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगर परिषदा; तसेच ग्रामपंचायतींमध्ये सातत्याने पक्षाचा पराभव होत असताना विद्यमान नेतृत्व कोणतेही चिंतन वा आत्मपरीक्षण करायला तयार नाही. या उलट पक्षातील जुन्या निष्ठावंतांवरच आगपाखड करीत असल्याने भविष्यात राष्ट्रवादीला काहीच भवितव्य राहणार नाही,’ अशी खंत शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि राज्य कृषी-शिक्षण संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केली.

‘पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाचे मला निमंत्रण देण्याचे टाळले जाते; त्यामुळे उपस्थित राहता येत नाही,’ असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे विद्यमान पक्षनेतृत्वाविरुद्ध नाव न घेता तोफ डागली. ‘राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार देश पातळीवर पक्षाचे नेतृत्व करत आहेत; त्यामुळे जिल्हा आणि स्थानिक पातळीवरील घडामोडी त्यांच्यापर्यंत पोचविल्या जात नाहीत. त्यामुळे आज राज्यात सर्वत्र पक्षाची वाताहत झाली आहे,’ असेही त्यांनी सांगितले. दुय्यम फळीच्या आक्रमकवृत्तीच्या नेतृत्वामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर यापुढे असेच दिवस येणार असल्याचेही ते म्हणाले.

‘शरद पवार यांनी दूरदृष्टीने निष्ठावंतांना जाणीवपूर्वक ताकद देताना अनेक पदांची संधी दिली आणि अवघ्या काही वर्षांत पक्ष देशातील केंद्रापर्यंत सत्तेत पोहोचला. साहेबांमुळे माझ्यासारखे अनेक तरुण पुढे आले; पण १९९२पासून पक्षात सतत अपमानास्पद वागणूक मिळत आहे. केवळ पक्षीय कारवाई झाली नसल्याने औपचारिकता म्हणून मी थांबलो आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

‘रिव्हॉल्व्हर घेऊन फिरणारे पदाधिकारी तालुकाध्यक्ष म्हणून लादल्यानेच सामान्य लोकांत पक्ष बदनाम होत आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामाही मंजूर केला जात नसेल, तर पक्षाला आता कोणत्या पदाधिकाऱ्यांची गरज आहे, हे मागील १० ते १२ वर्षांत पुढे आले आहे, असे सांगत कोणतेही संघटनात्मक बदल होणार नसतील, तर पक्ष वाढणार तरी कसा,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. केवळ गुंडागर्दी आणि भावकीचे राजकारण सुरू असल्यानेच अनेक निवडणुकांमध्ये पराभव वाट्याला आले, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

बारामतीतही गटबाजी?

बारामती : राष्ट्रवादीच्या बारामती येथील बालेकिल्ल्यातही सध्या काही कार्यंकर्त्यांमध्ये गटबाजीची चर्चा आहे. ‘तालुक्यातील आपले संघटन प्रबळ आहे. मात्र, संस्थेत व पक्षात पद नसलेले कार्यकर्ते स्वतःच्या नावासाठी गटबाजीचे राजकारण करत आहेत,’ अशी प्रतिक्रिया काही कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

प्रशासनावरील वचक व कडकपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या अजित पवार यांच्या दौऱ्याने राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस खडबडून जागी झाल्यासारखी दिसत आहे. मात्र, बालेकिल्ल्यात नगरसेवक, राष्ट्रवादीचे शहरातील कार्यालय, तालुका कार्यालये ही सर्व पदाधिकाऱ्यांचीच कार्यालये बनल्याने येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळत नसल्याची

खंत काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.

‘गटतट करणाऱ्यांनी पदावर राहू नये. जुन्या कार्यकर्त्यांना बळ द्यावे,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना अनेक वेळा कानपिचक्या दिल्या. मात्र, त्याचा कोणताही परिणाम बालेकिल्ल्यातील पदाधिकाऱ्यांवर झाला नसल्याचे हे कार्यकर्ते सांगतात. कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीच्या विळख्यात अडकला असल्याने हा विळखा तोडणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

स्थानिक गटबाजी असेल. मात्र, नागरिकांना नागरी सुविधा देण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष सक्षम आहे. कोणाचीही गटबाजी पक्ष खपवून घेत नाही. दादांच्या माध्यमातून सर्वजण काम करत आहेत. हे एक संघटन आहे. काम करताना मतभेद असू शकतात, असे माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वायसीएम हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयने रुग्णास लुटले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णाला वॉर्डबॉयने मारहाण करून लुटले. मंगळवारी (१८ जुलै) पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास तातडीच्या वैद्यकीय सेवा विभागात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे.
सुरेंद्र विठ्ठल रेणुसे ऊर्फ बंटी (वय २३) असे अटक करण्यात आलेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे. या प्रकरणी लक्ष्मण पळनाटे (२३, रा. नेहरूनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हे उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटल येथे गेले होते. त्यावेळेस त्यांचे दोन मित्र देखील होते. लक्ष्मण यांच्या डोक्याला मार लागल्याने मलमपट्टी करणे आवश्यक होते.
दरम्यान, वायसीएम हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सध्या बंद आहे. तर तातडीच्या वैद्यकीय विभागात असलेल्या शिशूगृहात (मायनर ऑपरेशन थिएटर) नेण्यात आले. तेथे सुरेंद्र ऊर्फ बंटीने लक्ष्मण व त्याच्या मित्राला मारहाण करीत खिशातील पंधरा हजार रुपये रोख आणि सात हजार रुपयांचा मोबाइल काढून घेतला. तसेच, जाताना लक्ष्मण व मित्राला जीवे मारण्याची धकमी देऊन निघून गेला. हा प्रकार घडल्यानंतर भेदरलेले लक्ष्मण व त्याचे मित्र राहत असलेल्या परिसरात गेले. ज्यांच्या घरी भाडेतत्त्वावर राहतात त्यांना घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर संबंधित घरमालक लक्ष्मण याच्यासह पुन्हा वायसीएम हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे रात्री नियुक्तीस असणाऱ्या डॉक्टरांना घटनेबाबत कल्पना दिली. परंतु, तोपर्यंत सुरेंद्र ऊर्फ बंटी तेथून गायब झाला होता. त्यामुळे सर्वांनी वायसीएम आणि संततुकारामनगर पोलिस चौकीत जाऊन याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बंटी याला अटक केली. फौजदार विठ्ठल बढे पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्ल्यू लाइनमधील सर्वेक्षण रेंगाळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान असलेल्या नदीपात्रातील निळ्या पूररेषेतील (ब्ल्यू लाइन) बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यास अद्यापही महापालिका प्रशासनाला शक्य झालेले नाही. अवघ्या दीड किलोमीटर अंतरातील मिळकतींचे सर्वेक्षण गेले अकरा दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे हरित लवादाने सर्वेक्षण करण्यासाठी दिलेली मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
नदीपात्रात झालेल्या बेकायदा बांधकामांच्या याचिकेच्या सुनावणीमध्ये मुठा नदीपात्रातील म्हात्रे पूल ते राजाराम पुलापर्यंतची निळ्या पूर रेषेतील सर्व बांधकामे तातडीने काढण्याचे आदेश ‘एनजीटी’ने पालिकेला दिले आहेत. ‘एनजीटी’ने ३ जुलैला हे आदेश दिले होते. मात्र, पालिकेला ७ जुलैला हे आदेश मिळाल्यानंतर प्रशासनाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी करून प्रशासनाने तातडीने पालिका आणि जलसंपदा विभाग यांचे संयुक्त सर्वेक्षण सुरू केले आहे. हे सर्वेक्षण २१ जुलैपूर्वी पूर्ण होऊन त्यानंतर पुढील दोन आठवड्यांत कारवाई होणे अपेक्षित आहे. एनजीटी दिलेली मुदत संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाही हे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कामात पावसाचा अडथळा येत असल्याचे कारण पाटबंधारे विभागाकडून पुढे करण्यात आले आहे.
...
काम प्रलंबित का?
सर्वेक्षणाचे काम अंतीम टप्प्यात आल्याचा दावा पालिकेकडून केला जात असताना दुसऱ्या बाजूला निळी पूर रेषा ठरविण्यासाठी पाटबंधारे विभागाने आणलेल्या यंत्रसामग्रीला पावसामुळे रेंज मिळत नाही, तसेच सॅटेलाइटवर पूररेषा ठरवता येत नसल्याचे कारण महापालिकेने पुढे केले आहे. ‘एनजीटी’ने ज्या भागात कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत, तेथे ३० ते ३५ मिळकती आहेत. त्यातील २२ मिळकतदार या पूर्वीच कोर्टात गेले आहेत. मग उर्वरित बांधकामांचे सर्वेक्षण करण्यासाठी एवढा वेळ का जातोय? असा प्रश्न विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेडछाड करणाऱ्यांची माहिती द्या

$
0
0

पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
शाळा भरताना आणि सुटताना छेडछाड, पाठलाग करून त्रास देणाऱ्यांची माहिती मुलींनी शिक्षकांना न घाबरता कळवली पाहिजे. शिक्षकांनीही संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना या रोडरोमिओंची तक्रार केल्यास तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांनी शाळांना दिले.

येरवडा, विश्रांतवाडी आणि नगर रोड परिसरातील शाळा भरताना आणि सुटताना मुलींची छेडछाड, शेरेबाजी आणि पाठलाग करण्याचे प्रकार वाढले आहे. रोडरोमिओंना कुणीही जाब विचारत नसल्याने या प्रकारांत वाढ होताना दिसते. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी परिमंडळ चारचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी पुढाकार घेत परिसरातील पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्याक व शिक्षकांची मुलींच्या सुरक्षेसाठी बैठक घेतली.

खडकी विभागातील खडकी, दिघी आणि विश्रांतवाडी पोलिस ठाणे विभागातील १२५ शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांची शुक्रवारी; तर येरवडा ,विमानतळ आणि चंदननगर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत दीडशे शाळांची शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये बैठक झाली. खडकी विभागाचे सहायक आयुक्त वसंत तांबे आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते.

येरवड्यातील सर्वांत मोठ्या नेताजी बोस शाळेसमोर शाळा सुटताना रोडरोमिओंचे टोळके जमा होते. शाळेत जाता व येताना मुलींवर शेरेबाजी करून काही वेळेस पाठलाग केला जातो. खासगी शिकवणीस जाताना आणि येतनाही मुलींना त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून शाळेच्या बाहेर गस्त वाढवली जाईल, मुलींना तक्रार करण्यासाठी शाळेत तक्रार पेटी लावली जावी, मुलींना त्रास होत असल्यास त्यांना शिक्षकांकडे तक्रार करण्यास सांगावे, शाळेच्या आवारात सीसीटीव्ही बसवावे, असे आवाहन उपायुक्त साकोरे यांनी शाळांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचलन तुटीपोटी देणार १४४ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन कंपनीला (पीएमपी) संचलन तुटीपोटी पालिकेच्या हिश्श्याचे १४४ कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. प्रत्येक महिन्याला बारा कोटी याप्रमाणे बारा महिने हप्त्याने हा निधी दिला जाणार आहे. २०१६ १७ या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या संचलनातील ही तूट आहे.
‘पीएमपी’ला वर्षभरात संचलनात जी तूट येईल, ती भरून देण्याची जबाबदारी राज्य सरकारने दोन्ही महानगरपालिकांवर टाकली आहे. पुणे महापालिकेने ६० टक्के, तर पिंपरी-चिंचवडने ४० टक्के तूट भरून देण्याचे ठरविण्यात आले आहे. ‘पीएमपी’ला २०१६-१७ या आर्थिक वर्षात २४० कोटी रुपयांची संचलन तूट आली आहे. पुणे महापालिकेच्या हिश्श्यानुसार १४४ कोटी रुपये ‘पीएमपी’ला देणे आहे. त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली होती. त्यानुसार हा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्याला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.
‘ही सर्व रक्कम एकरकमी न देता दरमहा बारा कोटी याप्रमाणे बारा हप्त्यांमध्ये ‘पीएमपी’ला देण्यात येणार आहेत, तर शेवटचा हप्ता एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीतील संचलन तुटीचे लेखापरीक्षण झाल्यानंतर ‘पीएमपी’ला दिला जाणार आहे,’ असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातपंचायतीच्या सहा पंचांवर गुन्हा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
जातपंचायत घेण्यास विरोध केला म्हणून वैदू समाजातील कुटुंबावर बहिष्कार घालणाऱ्या जातपंचायतीच्या सहा पंचांवर सांगवी पोलिस ठाण्यात मंगळवारी (१८ जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी कोंढवा येथे अशाच प्रकारे महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार कायद्यांतर्गत सोमवारी (१७ जुलै) पहिला गुन्हा दाखल झाला होता.
रामभाऊ लक्ष्मण लोखंडे (वय ७०, रा. वैदूवस्ती, पिंपळेगुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जातपंचायतीचे पंच माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेविकेचा पती राजू रामा लोखंडे याच्यासह प्रकाश रामा लोखंडे, दशरथ हुसेन लोखंडे, संभा बापू लोखंडे, शंकर यल्लपा लोखंडे, हनुमंत लक्ष्मण लोखंडे यांच्यासह पंचायतीच्या इतर सदस्यांवर महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण अधिनियम २०१६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामभाऊ लोखंडे हे सेवानिवृत्त असून, जडीबुटीचा व्यवसाय करतात. लोखंडे यांच्या फिर्यादीनुसार वैदू समाजात ज्या व्यक्तीच्या मुलीचे अथवा मुलाचे लग्न झाले आहे, त्यांनाच पंचायतीमध्ये सभासद म्हणून घेण्यात येते. त्याचा निर्णय पंचामार्फत केला जातो. २०१४ मध्ये रामभाऊ लोखंडे यांनी पंचायतीस विरोध केला होता. तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही. उलट पंचांनी पंचायत बोलावून रामभाऊ लोखंडे कुटुंबावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. तसेच, मुलीचे लग्न होऊ देणार नाही. अशी धमकी दिली. त्यांना कोणत्याही कार्यक्रमात सामावून घेण्यात येत नव्हते. ज्या मंदिरात पंचायत भरवली जात होती तेथे लोखंडे यांना जाण्यास मज्जाव करण्यात आला. आठ दिवसांनी लोखंडे पुन्हा त्याठिकाणी गेले तेव्हा त्यांना ५० हजारांचा दंड घेऊन समाजात सामावून घेण्यात आले.
दरम्यान, रविवारी (१६ जुलै २०१७) पंचायत घेण्यात आली. तेव्हा तेथील काही बाबींना रामभाऊ यांनी विरोध केला असता, ‘तुम्ही वारंवार समाज आणि पंचायत, पंच यांच्या विरोधात जात आहात; त्यामुळे तुम्हाला समाजातून बहिष्कृत करण्यात येत आहे,’ असे, सांगून हाकलवून दिले. त्यामुळे लोखंडे यांनी मंगळवारी (१८ जुलै) पोलिसांकडे तक्रार केली. सहायक पोलिस निरीक्षक अलका सरग पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डीपी रोडवर खड्ड्यामुळे धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
ससाणेनगर ते रामटेकडी या डीपी रोडवर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.

ससाणेनगर ते रामटेकडी मार्गावरील समर्थनगर गल्ली नं. पाच समोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचून तळे तयार झाले आहे. या ठिकाणी दर वर्षी खड्डे पडतात. रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण होत नसल्याने नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. समर्थनगर येथे रस्त्यावर पाच मोठे खड्डे आहेत.रात्रीच्या वेळेस येथे वाहनांना अपघात होण्याचा धोका आहे. धोकादायक खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवले जातील, असे वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संजय गावडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा लौकिक वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘पिंपरी-चिंचवडचा क्रीडा लौकीक वाढविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने कसोशीने प्रयत्न करावेत आणि मल्लखांब, योगा, जिन्मॅस्टिक्स राष्ट्रीय खेळ महापालिकेच्या सर्व शाळेत सुरू करण्याबाबतची कार्यवाही करावी,’ अशा सूचना महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
महापालिकेच्या क्रीडा आणि क्रीडा प्रबोधिनी विभागाच्या कामकाजाचा आढावा बैठक नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे झाली. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, माजी महापौर मंगला कदम, नगरसेविका भीमाताई फुगे, सहायक आयुक्त योगेश कडूसकर, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे उपस्थित होते.
बैठकीत शालेय क्रीडा धोरण, महापौर चषक क्रीडा स्पर्धा नियोजन, क्रीडा प्रबोधिनी कामकाज धोरण, गुणवंत खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंना आर्थिक सहाय्य देणे, महापालिका परिसरातील खेळाडूंना क्रीडा सुविधांचा लाभ देणे, क्रीडा विकासात स्वयंसेवी संस्था व क्रीडा संघटना यांचा सहभाग वाढविणे, अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, साहसी क्रीडा प्रकारांना उत्तेजन देणे, क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, उद्यानांमध्ये ओपन जिम सुरू करणे, महापालिकेच्या व्यायामशाळा स्वयंसेवी संस्था व क्रीडा संघटना यांना चालविण्यास देण्याबाबतचे धोरण निश्चित करणे, महापालिकेच्या व्यायामशाळांमध्ये अद्यावत व्यायाम साहित्य पुरविणे, अद्ययावत क्रीडा वसतिगृह व विश्रामगृह तयार करणे यासंदर्भात चर्चा झाली.
खेळांची मैदाने व स्टेडियम खेळाडूंना उपलब्ध करून देणे, खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे, एकूण खेळांची मैदाने व स्टेडियम देखभाल व वापराचे नियोजन करणे, क्रीडा ग्रंथालय व माहिती केंद्राची सद्यस्थिती, क्रीडा स्वरानंद नियतकालिक प्रसिद्ध करणे, खेळाडूंचा आहार व व्यायाम याबाबत मार्गदर्शन व राज्यस्तरीय पुरस्कार, सार्वजनिक संस्था व ट्रस्ट यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत धोरण निश्चित करणे या विषयांसह क्रीडा व प्रबोधिनी विभागातील अन्य कामकाजासंदर्भातील विषयांवर तसेच क्रीडा विभागाने करावयाच्या नियोजित कामकाजा संदर्भात सूचना करण्यात आल्या.
काळजे म्हणाले, ‘महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये जानेवारी ते डिसेंबर दरम्यान किमान २० प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात याव्यात. विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्हासह रोख रक्कम बक्षिस स्वरूपात द्यावी. क्रीडा शिष्यवृत्ती व बक्षीस रकमेतही वाढ करावी. पालिकेच्या सर्व शाळांमध्ये मल्लखांब, योगा व जिन्मॅस्टिक्स खेळांचा तातडीने समावेश करावा. कुस्ती, कबड्डी व खो-खो खेळांबाबतच्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. त्याबाबतचे वेळापत्रक आगाऊ तयार करून सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात यावे. कार्यरत नसलेल्या व्यायामशाळा तातडीने बंद कराव्यात. त्याबाबतचा अहवाल आठ दिवसांत सादर करावा.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोल-ताशा, सौर कंदील खरेदीची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे जिल्हा परिषदेने गेल्या वर्षी लाभार्थी नसतानासुद्धा खरेदी केलेल्या ३५ लाख रुपयांच्या ढोल-ताशांसह ४५ लाख रुपयांच्या सौर कंदील दिव्यांच्या खरेदीची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या काळात ग्रामपंचायतींसाठी पारंपरिक वाद्ये खरेदी करण्यात आली होती. ढोल-ताशांसाठी ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हवेली आणि शिरूर तालुक्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु, बहुतांश ग्रामपंचायतींनी हे ढोल-ताशे नेले नाहीत. यामुळे ढोल ताशांची दुरवस्था झाल्याचे भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सांगितले होते. जिल्हा परिषदेच्या सूचीमध्ये ढोला-ताशा खरेदीचा विषय नसल्याने याबाबत खमंग चर्चा झाली. त्यावरून ही खरेदी नेमकी ठेकेदारांच्या फायद्यासाठी केली आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

महिला व बाल कल्याण विभागाने सौर कंदिलांची खरेदी केली होती. त्यासाठी ४५ लाख रुपयांची तरतूद केली होती. तालुकानिहाय लाभार्थ्यांची यादी निश्चित केली नसल्याने सौर दिव्यांचे वाटप एक वर्षापासून झालेले नसल्याचे उघड झाले आहे. हा निधी चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे आर्थिक नुकसान झाल्याची बाब बुट्टे पाटील यांनी उघडकीस आणली.

मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्याकडे यासंदर्भात विचारणा करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सूचीमध्ये एखाद्या वस्तूचे नाव आहे की नाही, याची शहानिशा केली जाते. सूचीमध्ये वस्तूचे नाव नसले, तरी खरेदी करता येते. ढोल-ताशा आणि सौर कंदिलाच्या खरेदीबाबत नेमकी काय स्थिती आहे हे पाहावे लागेल. तसेच लाभार्थ्यांना वस्तू मिळाल्या की नाही याची माहिती घेण्यात येणार आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस वे’वर बसवणार मेटल क्रॅश बॅरियर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील अपघात रोखण्यासाठी थ्रॉयबीम क्रॅश बॅरियर आणि मेटल क्रॅश बॅरियर बसविण्यात येणार आहेत. या हायवेवर सुमारे ९४ किलोमीटर अंतरावर ही सुविधा करण्यात येणार असून, त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुमारे ६६ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.
एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचे प्रमाण आणि अपघातदेखील वाढले आहे. अनेकदा वाहने ही रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला गेल्याने मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता ‘एमएसआरडीसी’कडून ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानावर आधारित बॅरियर बसविण्यात येणार आहेत.

याबाबत ‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी म्हणाले, ‘या हायवेवरील सुमारे ९४ किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूला; तसेच रस्ता दुभाजकांवर थ्रॉयबीम क्रॅश बॅरियर आणि मेटल क्रॅश बॅरियर बसविण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी सुमारे ६६ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.’

‘या बॅरियरमुळे वाहने ही रस्ता सोडून खाली जाऊ शकणार नाहीत. हायवेला जोडणारे २२ अंतर्गत रस्ते आहेत. ही ठिकाणे वगळता सर्व ठिकाणी बॅरियर लावण्यात येणार आहेत.’ असेही औटी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरांमध्येही शाळांजवळ दारूविक्री

$
0
0

सिंहगड रस्ता, वडगाव बुद्रुक, धायरीतील परिस्थिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराचा उपनगरी भाग असलेला वडगाव बुद्रुक, धायरी, नऱ्हे; तसेच नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) या भागात अनेक बीअरबार आणि मद्य विक्रीची दुकाने ही प्रार्थनास्थळे आणि शाळांजवळ असल्याचे निदर्शनास आले आहे. सिंहगड रस्त्यावरील ‘अमित रेस्टो बार’, वडगाव बुद्रुकमधील हायवेवरील ‘चांदणी गार्डन’, ‘हॉटेल दावत’, ‘सोना गार्डन’, धायरीतील ‘हॉटेल धायरेश्वर’, ‘रोहन वाइन’, ‘प्रसाद रेस्टॉरंट’, ‘फाइव्ह स्टार बीअर शॉपी’, नऱ्हेतील ‘चंदन वाइन’ आदींचा समावेश आहे.

सिंहगड रस्त्यावर आपटे कॉलनीजवळ असलेल्या ‘अमित रेस्टो बार’जवळच गणपती आणि राम मंदिर; तसेच ‘ज्ञानगंगा’ ही शाळा आहे. शहरातील महामार्गांवरील बीअरबार बंद करण्याच्या आदेशामुळे सध्या बीअरबार बंद असून, हॉटेल सुरू आहे.

वडगाव बुद्रुकमधील दांगट पाटील नगर येथे ‘गोल्डमाइन इंटरनॅशनल स्कूल’ ही शाळा आहे. या शाळेपासून जवळच ‘चांदणी गार्डन’ आहे. तेथून पुढे गेल्यावर हायवेलगतच जुना टोलनाका परिसर आहे. त्या ठिकाणी ‘ज्ञानदीप’ शाळा, साई मंदिर, आणि सहयोग मित्र मंडळाचे गणपती मंदिर आहे. या शाळा आणि मंदिराजवळच ‘हॉटेल दावत’ आणि ‘सोना गार्डन’ हॉटेल आहे.

ग्रामपंचायतीचा परिसर असलेला नऱ्हे गावात प्रार्थनास्थळांनजिक मद्याचे दुकान आहे. या गावात ‘चंदन वाइन’ हे दुकान आहे. या दुकानापासून जवळ नऱ्हे गावठाणातील काळभैरव मंदिर आहे.

सिंहगड रस्त्यावर अभिरुची पोलिस चौकीजवळ महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर ‘फाइव्ह स्टार बीअर शॉपी, मंदिरापासून जवळ ‘प्रसाद रेस्टॉरंट’ आहे. तेथून पुढे धायरीमध्ये ‘हॉटेल धारेश्वर’ हे परमिट रूम आहे. या हॉटेलच्या समोरच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला ‘रोहन वाइन’ आहे.

सिंहगड रोडप्रमाणेच शाळा, कॉलेज आणि प्रार्थनास्थळांपासून ७५ मीटर परिसरात मद्यविक्रीच्या दुकानांना किंवा बारला परवानगी देऊ नये, या नियमाकडे कोंढवा, वानवडी परिसरात कानाडोळा केल्याचे चित्र आहे. या भागातही अनेक ठिकाणी शाळा व मंदिरांच्या अगदी जवळ सर्रास मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आले आहे. कोंढवा खुर्द येथे महापालिकेची संत गाडगे महाराज शाळा व देवी आई मंदिरापासून अगदी जवळच ‘मुघल सराय’ हे रेस्टॉ-बार आहे. वानवडी येथील जगताप चौक येथे भवानी मातेचे मंदिर आणि मिलेनिअम स्कूल आहे. तेथेच फ्रेंच वाइन आणि आर्या बिअर शॉपी आहे. फातिमानगर येथे विद्याभवन कॉलेजच्या परिसरात अंगुर रेस्टॉरंट अँड बार आहे. महामार्गावर असल्यामुळे सध्या तेथील बार बंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images