Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘ओंजळीत स्वर तुझे’लारसिकांची दाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सख्या रे घायाळ मी हरिणी’, ‘या डोळ्यांची दोन पाखरे’, ‘उष:काल होता होता, काळ रात्र झाली’, ‘येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील’ अशा गाण्यांनी रसिकांना सुरेल मराठी गीतांची अनुभूती दिली. प्रख्यात गायक रवींद्र साठे आणि गायिका प्रज्ञा देशपांडे यांनी आपल्या बहारदार गायकीने रसिकांना आनंद दिला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ‘ओंजळीत स्वर तुझे’ हा सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ‘सर्वांगे सुंदरू कासे पितांबरू’ या गणेशस्तवनाने झाली. यानंतर दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘मज सुखावितो श्याम मुरारी’ आणि सुधीर फडके यांचे ‘झाला महार पंढरीनाथ’ या गीतांच्या सादरीकरणाने रसिकांना भक्तिरस अनुभवता आला. ‘मोहुनिया तुज संगे नयन खेळले जुगार’ या संगीतकार गजानन वाटवे यांच्या गीताने रसिकांची विशेष दाद मिळविली. ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली’, ‘आम्ही ठाकर ठाकर’ या जैत रे जैत चित्रपटातील गाण्यांवर रसिकांना ठेका धरला.

‘माझ्या देहाची घोंगडी’, ‘माझे माहेर पंढरी’ अशा भक्तिगीतांना उपस्थितांची विशेष दाद मिळाली. आनंद मोडक, दत्ता डावजेकर, सुधीर फडके, गजानन वाटवे, राम फाटक, यशवंत देव अशा दिग्गज संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या मराठी गीतांचा सुवर्णमयी प्रवास या निमित्ताने रसिकांमोर उलगडला. डॉ. नरेंद्र चिपळूणकर (हार्मोनिअम), राजू जावळकर (तबला), केदार परांजपे (की-बोर्ड), रोहन वनगे (रिदम मशिन) आदींनी साथसंगत केली. रवींद्र खरे यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मोडी’ला प्रतीक्षा संशोधकांची

$
0
0

@AdityaMT

पुणे : पाचशेहून अधिक वर्षांच्या इतिहासाचे दाखले असलेली मोडी लिपीतील कागदपत्रे सध्या संशोधकांच्या प्रतिक्षेत आहेत. तरुणाईने मोडीतील संशोधनाकडे पाठ फिरवल्याने अजूनही लाखो कागदपत्रे प्रकाशात येऊ शकलेली नाहीत. मोडीच्या तज्ज्ञांनी याबाबतीत चिंता व्यक्त केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये मोडी लिपीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सुरुवातीच्या काळात त्या वर्गांना तरुणाईचा चांगला प्रतिसाद होता. मोडी लिहिता आणि वाचता येईपर्यंत या वर्गांमध्ये प्रशिक्षण दिले जात होते. त्यातून मोडी लिहिता आणि वाचता येणारा मोठा वर्ग तयार झाला मात्र, अनेक कारणांनी तो संशोधनाकडे वळू शकलेला नाही. त्यामुळेच आजमितीला महाराष्ट्रात मोडी पूर्णपणे समजणारी मंडळी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच उरलेली आहे. या उलट महाराष्ट्रात मोडी लिपीतील कोट्यवधी कागदपत्रे संशोधनाविनाच पडून आहेत. त्यांचा अभ्यास करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर संशोधक निर्माण होणे गरजेचे आहे. परंतु सध्याच्या पिढीमध्ये मोडीबद्दल कमालीची उदासीनता असल्याचे चित्र आहे.

पुणे शहराचा विचार केला, तर भारत इतिहास संशोधक मंडळाकडे १५ लाख मोडीतील कागदपत्रे आहेत. पेशव्यांच्या पाडावानंतर इंग्रजांनी जतन केलेल्या पेशवे दफ्तरात कोटींहून अधिक कागदपत्रे उपलब्ध आहेत. शिवाय पुण्यातील संशोधन संस्थांमध्येही मोडीची कागदपत्रे आहेत. या सर्वांचा अभ्यास केला तर महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक धागेदोरे सापडून त्याचे योग्य आकलन होईल. मात्र, एवढ्या विशाल संख्येने उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी सध्या महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या मोडीच्या संशोधकांना पुढची शेकडो वर्षे पुरणार नाहीत. त्यामुळे, इतिहास संशोधनाशी संबंधित असलेल्या तज्ज्ञांना यावर विचार करण्याची गरज आहे.

मोडीतील संशोधनाबाबतीत राज्य सरकारही अत्यंत उदासीन असल्याचे चित्र आहे. मोडीचा अभ्यास करणाऱ्या संस्थांनी अनेकदा राज्य सरकारने मोडीच्या परिक्षा घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. त्याबाबत सरकारने अद्याप चर्चाही केलेली नाही. सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडेही मोडी लिपीच्या तज्ज्ञांची वानवा आहे. त्यामुळे, मोडीतील ऐतिहासिक ऐवज प्रकाशात आणण्यासाठी जास्तीत जास्त संशोधक निर्माण करण्याची गरज भासू लागली आहे.

---------------------------------------

कोट

मोडी लिपीच्या अभ्यास, संशोधनात पैसा आणि प्रसिद्धी नसल्याने तरुणांनी पाठ फिरवली आहे. मोडीतील कागदपत्रे प्रकाशात येण्यासाठी संशोधनाचा ध्यास घेऊन या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अभ्यासकांची संख्या वाढली पाहिजे. दुर्दैवाने राज्य सरकारही उदासीन आहे. शेकडो वर्षांचा ऐवज महाराष्ट्रात उपलब्ध असला, तरी संशोधकांशिवाय तो प्रकाशात येणे शक्य नाही.

मंदार लवाटे, मोडी लिपीचे प्रशिक्षक व अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवडा तुरुंगात पुन्हा कैद्यावर हल्ला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
येरवडा मध्यवर्ती तुरुंगात एका कैद्यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच गुरुवारी एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात काठीने जबर मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये कैदी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर येरवडा पोलिसांनी वैद्यकीय प्रमाणपत्राचे कारण देत कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.
गेल्या आठवड्यात येरवडा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदी दिनेश सुरेश दबडेने सुखदेव मेहकारकर याच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. त्याच्यात पूर्वी झालेल्या वादातून हा प्रकार घडला होता. त्यानंतर पुन्हा वॉर्डन म्हणून नेमलेल्या कैद्यावर दुसऱ्या एका कैद्याने डोक्यात काठीने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. तुरुंग विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा तुरुंगात मानसिकस्थिती बिघडलेल्या कैद्यासाठी एक स्वतंत्र वॉर्ड आहे. या ठिकाणी हल्ला केलेल्या कैद्याला ठेवण्यात आले होते. जखमी कैदी वॉर्डन म्हणून नेमणुकीला आहे. गुरुवारी दुपारी तो तपासणीसाठी या वॉर्डजवळ गेला होता. त्यावेळी दुसऱ्या कैद्याने वॉर्डन कैद्यावर काठीने हल्ला केला. यामध्ये तो वॉर्डन कैदी गंभीर जखमी झाला. जागेवरच तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याला तत्काळ उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या कैद्याच्या डोक्यात गंभीर मार लागल्यामुळे शुक्रवारी सकाळी तो शुद्धीवर आला आहे. या प्रकरणी त्याच्यावर उपचार सुरू आहे. तुरुंग प्रशासनाकडून मारहाण झाल्याचे पत्र येरवडा पोलिसांना देण्यात आले आहे. या प्रकरणी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळालेले नसल्याचे कारण देत येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८४ वर्षीय वृद्धाकडून फसवणूक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
सैन्याच्या इलेक्ट्रॉनिक रिसर्च सेंटरकडून टेंडरद्वारे बॉम्बचे इलेक्ट्रॉनिक सर्किट चेक करण्याचे काम मिळवून देतो, असे सांगून माजी सैनिकाची लाखोंची फसवणूक करणाऱ्या ८४ वर्षीय वृद्धास अटक करण्यात आली आहेत. संबंधित वृद्धाने विविध कारणाने पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक येथील अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार देखील आता उघड होत आहे.
शिवचंद्र व्यकंटराव चिटणीस (वय ८४, रा. राधाकृष्ण कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे वृद्धाचे नाव आहे. त्याच्या एका साथिदाराचा पोलिस शोध घेत आहेत; तर माजी सैनिक विजय दिगंबर वराडे (४५, रा. उद्यमनगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिटणीस यांनी फसवणूक करताना कधी वकील, कधी निवृत्त रेव्हेन्यू कलेक्टर; तर कधी माजी विशेष अधिकारी असल्याचे अनेकांना सांगितले आहे.
अजमेरा कॉलनी येथील एका खानावळीमध्ये चिटणीस व वराडे यांची ओळख झाली. वराडे हे माजी सैनिक असल्याचे हेरून सैन्याचे अत्यंत गोपनीय काम मिळवून देतो असे चिटणीस यांनी सांगितले. पुण्यातील विविध दारूगोळा फॅक्टरी आणि रिसर्च सेंटरमध्ये बनणाऱ्या बॉम्ब व अन्य साहित्याचे टेस्टिंग करून देण्याचे टेंडर मिळवून देण्याची बतावणी चिटणीस यांनी वराडे यांना केली. त्यासाठी दिल्ली येथून रिलीज होणारे बॉम्ब इलेक्ट्रिक सर्किट चेक करण्याचे मशिन घ्यावे लागेल असे सांगितले.
रिटेंडरिंग प्रोसेसनुसार हे काम होणार असल्याचे देखील चिटणीस यांनी सांगितले होते. तसेच, हे मशिन दिल्ली येथून इंटरनेटद्वारे सकाळी दहा वाजता सुरू होईल आणि सायंकाळी सहा वाजता इंटरनेटद्वारेच बंद होईल, अशी बतावणी देखील केली. बॉम्ब टेस्टिंगचे काम सुरू करताना सध्या सैन्यात कार्यरत असलेला एक जवान त्यासाठी ठिकाणी हजर असेल. बॉम्ब व अन्य टेस्टिंग करण्याचे साहित्य सैन्याचे अधिकारीच घेऊन येतील आणि घेऊन जातील असे सांगत चिटणीस यांनी वराडे यांचा विश्वास संपादन केला.
टेक्निकल बाबी सांगताना चिटणीस अत्यंत खुबीने सैन्याचे बारकावे वराडे यांना सांगत होते. त्यामुळे सतरा वर्षे सैन्यात काम केल्यानंतर निवृत्त झालेल्या वराडे यांना चिटणीस यांचा संशय आला नाही. त्यामुळे टेस्टिंगचे मशिन खरेदी करण्यासाठी दोन लाख सहा हजार रुपये रोख वराडे यांनी चिटणीस यांना दिले. त्यानंतर विजय यांनी त्यासाठी दोन लाख रुपये दिले; तर चिटणीस यांनी ही रक्कम पोहोचल्याची रिफंडेबल डिपॉझिट बनावट पावती दिली. अनेक दिवस झाले तरी चिटणीस यांच्याकडे कामाबाबत बोलणी होत नव्हती.
चिटणीस हे पुण्यातील एका ट्रॅव्हल्सकडील कार भाडेतत्त्वावर घेऊन फिरत होते. चिटणीस यांच्यावर मुंबईमधील वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच काहीजण नाशिक, चिंचवड, मुंबई, जळगाव येथे तक्रार देण्यासाठी स्थानिक पोलिसांकडे गेल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, टेंडरच्या कामात प्रगती होत नसल्याने, तसेच चिंचवड, मुंबई आणि नाशिक येथील लोकांची पापड उद्योगाच्या नावाखाली फसवणूक झाल्याने वराडे व कारमालक अविनाश बोचरे हे एकत्र भेटले. त्यानंतर सुमारे ५० जणांनी चिटणीस यांचा नाशिक येथे शोध घेतला. त्यानंतर त्यांना पुण्यात आणून पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास शुल्काचा भुर्दंड पूर्वलक्षी प्रभावाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मेट्रो, मोनोरेल, जलद बस वाहतूक योजना (बीआरटी) यासारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी बांधकाम विकास शुल्कातील (डेव्हलपमेंट चार्जेस) वाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. पुण्यामध्ये २०१५ पासून ‘मेट्रो अॅक्ट’ लागू झाला असल्याने तेव्हापासून वाढीव शुल्काची वसुली करण्याचा फतवा महापालिकेने काढल्याने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
राज्य सरकारने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियमांत नुकतीच सुधारणा केली. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी बांधकाम विकास शुल्कात दुप्पट वाढ करण्याची मुभा पालिकेला देण्यात आली होती. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने गेल्या महिन्यात ही वाढ करण्यास मंजुरी दिल्यानंतर आता मेट्रो अॅक्ट लागू झाल्यापासून वाढीव शुल्क घेण्यात येणार असल्याचे निर्देश बांधकाम विभागाने दिले आहेत. बांधकाम विकास शुल्क आणि जमीन विकास शुल्क (लँड डेव्हलपमेंट चार्जेस) या दोन्हीची वसुली पूर्वलक्षी पद्धतीने करण्याचा फतवा काढण्यात आल्याने त्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विकास शुल्कात सरसकट दुप्पट वाढ केली असून, जुन्या प्रकल्पांना ती लागू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास बांधकाम व्यावसायिकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, पालिकेने सक्तीने त्याची वसुली सुरूच ठेवल्यास त्याचा भुर्दंड नागरिकांनाच बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये एखादा प्रकल्प पूर्ण झाला नसेल, तर त्यांना अंतिम पूर्णत्त्वाचा दाखला (कम्प्लिशन सर्टिफिकेट) देण्यापूर्वी विकास शुल्कातील वाढीव रक्कम भरा, अशा सूचना पालिकेने बांधकाम व्यावसायिक आणि संबंधित आर्किटेक्टना देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेल्या एखाद्या ठरावाची पूर्वलक्षी पद्धतीने अंमलबजावणी कशी केली जाते, अशी विचारणा आता बांधकाम व्यावसायिकांकडून केली जात आहे. अनेकांनी त्या संदर्भात बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

वाढीव विकास शुल्काची मागणी
याबाबत पालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘सार्वजनिक वाहतुकीच्या प्रकल्पांना मान्यता मिळाल्यानंतर हे विकास शुल्क आकारता येईल, अशी तरतूद कायद्यामध्येच आहे. त्यानुसार, जुन्या प्रकल्पांकडून वाढीव विकास शुल्काची मागणी करण्यात आली आहे. त्याविषयी काही तक्रारी असून, त्यातून मार्ग काढण्यात येईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे, पिंपरीत चोरट्यांचा उच्छाद

$
0
0

दोन दिवसांत दहापेक्षा जास्त घरफोड्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. दोन दिवसांत दहा पेक्षा जास्त घरफोड्या झाल्या असून त्यामध्ये चाळीस लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल चोरीला गेला आहे. शहरात गेल्या सहा महिन्यांत चारशेपेक्षा जास्त घरफोड्या झाल्या आहेत. नावापुरतेच पेट्रोलिंग, तसेच गुन्हेगारांना पकडण्यात येणारे अपयश यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोड्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात दिवसाला दोन ते चार घरफोड्या घडत असताना दोन दिवसांत चोरट्यांनी हद्द पार केली आहे. पुण्यात कोरेगाव पार्क येथे चौदा लाख, बाणेर येथे बंद बंगल्यातून वीस लाखांपेक्षा जास्त ऐवज चोरीला गेला आहे. तर, पिंपरी-चिंचवड परिसरात माजी राष्ट्रपतींच्या नातेवाईकांच्या घरात घरफोडी झाली आहे. सिंहगड रोड परिसरातही तीन फ्लॅट फोडल्याचे आढळून आले. शहरात स्थानिक पोलिसांकडून नावालाच पेट्रोलिंग सुरू आहे. बीट मार्शल पेट्रोलिंगऐवजी वेगळेच ‘उद्योग’ केले जातात. त्यामुळे चोरट्यांचे फावते. सोसायट्यांनी सुरक्षारक्षक नेमला नाही, सीसीटीव्ही बसविले नाहीत, अशी कारणे सांगून पोलिस जबाबदारी झटकतात.
पुणे आणि पिंपरी-चिचंवडमध्ये २०१६मध्ये सहा महिन्यात ५८१ घरफोड्या झाल्या होत्या. त्यापैकी २८१ घरफोड्या उघडकीस आल्या होत्या. २०१७मध्ये सहा महिन्यांत ४२६ घरफोड्या घडल्या असून त्यापैकी १५३ घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५५ घरफोड्या कमी झाल्या आहेत. मात्र, जून महिन्यात घरफोड्यांत वाढ झाली आहे. महिनाभरात शंभर घडफोड्या झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व पालकांसाठी ‘सासू सासरे होताना’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लग्न ठरणे ही मुलांसाठी किंवा मुलींसाठी जशी आनंदाची गोष्ट असते, तशीच ती त्यांच्या पालकांसाठीही आनंदाची गोष्ट असते. लग्नासाठी स्थळ शोधण्यापासून ते प्रत्यक्षात लग्न होईपर्यंत पालकांचा उत्साह दांडगा असतो. मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नानंतर पालकांच्याही भूमिकांत बदल होतात. या बदललेल्या भूमिका लक्षात घेऊन सुनेसोबत तसेच जावयासोबत असलेले नाते अधिक चांगल्या प्रकारे कसे निभावता येईल, मुलामुलींच्या लग्नाबाबतीत आपली पालक म्हणून आणि भावी सासू-सासरे म्हणून नेमकी काय भूमिका असावी, यासाठी ‘अनुरूप’ विवाहसंस्थेने ‘सासू-सासरे होताना’ या कार्यक्रमाचे आयोजनत केले आहे. हा कार्यक्रम खास पालकांसाठी असून,‘'महाराष्ट्र टाइम्स’ कार्यक्रमाचा माध्यम सहकारी आहे.
येत्या रविवारी (१६ जुलै) सायंकाळी ६ वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणारा हा कार्यक्रम सर्व पालकांसाठी विनामूल्य खुला आहे. कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शिवाय समुपदेशक श्रीरंग उमराणी, सुचित्रा तबीब, प्रीतम तिवारी, डॉ. सुखदा चिमोटे आदी वक्ते सहभागी होणार आहेत. सासू-सासरे होताना स्वतःच्या विचारात, मानसिकतेमध्ये बदल करणे का आवश्यक आहे आणि योग्य तो बदल कसा करावा?, प्रोत्साहन देणे म्हणजे नेमक काय करायचे?, नात्यांच्या नवीन जबाबदाऱ्या पार पाडतानाही समृद्ध कसे व्हायचे यांसारख्या अनेक विषयांवर मोकळेपणाने चर्चा या कार्यक्रमातून केली जाईल.
या संदर्भात ‘अनुरूप’च्या संचालका गौरी कानिटकर म्हणाल्या, ‘पहिल्यापासूनच सासू सुनेच्या नात्याकडे साशंक नजरेने बघितले जाते. परंतु, आजच्या काळात बदलत्या पिढीनुसार आपलीही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. कुणालाही समजून घेऊन पुढे गेल्यानेच नाते अधिकाधिक सुंदर होते. हे समजून घेण्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे.’
अधिक माहितीसाठी अनुरूप विवाहसंस्थेशी ०२०-२५४४४१११ / १२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी ऑफिसांत मिळणार ‘आधार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आधार कार्डसाठी नागरिकांची होणारी परवड दूर करण्यासाठी आता सरकारी कार्यालये, महापालिकांच्या शाळा आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. येत्या आठ दिवसांत ही केंद्रे सुरू होणार असून, तेथे नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
विधानभवन येथे झालेल्या ​जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आधार कार्ड नोंदणीवरून होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा करण्यात आली. त्या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी ही माहिती दिली. राव म्हणाले, ‘आधार नोंदणीचे काम खासगी कंपन्यांकडून काढून घेण्यात आले आहे. एकूण २७० पैकी २५९ मशिन शिवाजीनगर गोदामात जमा करण्यात आल्या आहेत. आता खासगी कंपन्यांऐवजी महा-ऑनलाइनकडून हे काम केले जाणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती मोफत केली जाणार आहे. पालिकांच्या शाळा, क्षेत्रीय कार्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये केंद्रे सुरू केली जाणार आहेत.’ येत्या आठ दिवसांमध्ये ही केंद्रे सुरू होणार असून, त्यावर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी लक्ष ठेवणार आहेत, असेही ते म्हणाले.
‘वयोमानामुळे ठसे उमटत नसलेल्या नागरिकांच्या डोळ्यांचे (आयरिस) स्कॅनिंग केले जाणार आहे. त्याद्वारे संबंधित नागरिकांना आधार कार्ड मिळणार आहे. आधार कार्डचे जिल्हा आणि शहरातील सुमारे ९१ टक्के काम झाले आहे,’ असेही राव म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात घरफोड्यांचे सत्र

$
0
0

दोन दिवसांत शहरात दहा घरफोड्या; लाखोंचा ऐवज पळवला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील साखळीचोऱ्यांवर नियंत्रण येत नाही तोच, आता पुण्यात घरफोड्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या ​दोन दिवसांत शहरात आठ घरफोड्यांचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामध्ये लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली आहे.
नऱ्हे-आंबेगाव येथील ऋतंबरा अॅनेक्स सोसायटीममधील दोन बंद फ्लॅट फोडल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या सोसायटीतील बाबूराव सदाशिव सावंत (वय ४३) आणि समाधान शिंदे या दोघांचे फ्लॅट चोरट्यांनी फोडले. सावंत यांच्या फ्लॅटमधून एक लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड पळविण्यात आली आहे. शिंदे यांच्या फ्लॅटमधून एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनसिटी येथील कमल हौसिंग सोसायटीमधील प्रशांत पतंगराव पाटील (वय ४७) यांच्या फ्लॅट बुधवारी फोडल्याचे आढळून आले. त्यांच्याही बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून चोरट्याने कपाटातील ३४ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली.
कात्रज परिसरातील श्रीराम सहकारी निवास सोसायटी येथील संदीप ज्ञानेश्वर दाते (वय ४०) यांच्या फ्लॅटचे कुलूप उचकटून घरफोडी केल्याचे बुधवारी उघडकीस आले. दाते यांच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी आत प्रवेश करून कपाटातील दोन अमेरिकन डॉलर आणि इतर ऐवज असा २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोज सोसायटीमधील फ्लॅटनाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. सोसायटीतील केदार रमेश सेनगावकर (वय ६७) यांचा बंद फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने आणि रक्कम असा ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस अधिक तपास करत आहेत. बाणेर येथील अलका श्रीकांत पांडे (वय ६५) यांचे घर फोडून एक लाख आठ हजार रुपये लांबवण्यात आले आहेत. पांडे अमेरिकेला गेल्या होत्या. त्या बुधवारी परत आल्यानंतर त्यांना जपानी चलनाच्या नोटा आणि अन्य ऐवज मिळून एक लाख आठ हजार रुपयांची चोरी झाल्याचे आढळले. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस तपास करत आहेत. वाकड येथील कल्पतरू हार्मनी सोससायटीतील फ्लॅट बनावट चावीने उघडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विनायक अग्रवाल यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डेक्कन येथील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’ या संस्थेच्या आवारातही घरफोडी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या ठिकाणाहून चोरट्यांनी वीस हजार रुपये किमतीचा एलइडी टीव्ही चोरला आहे. या प्रकरणी प्रवीण डांगे (वय ३२, रा. पौड रोड, कोथरुड) यांनी तक्रार दिली आहे. या शिवाय कोरेगाव पार्क आणि बाणेर परिसरात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये तीस लाखांपेक्षा जास्त ऐवज चोरीला गेला आहे.
बाणेरमध्ये लुटले सत्तर तोळे सोने
बाणेर येथील कुलूपबंद बंगल्यात घरफोडी करून तब्बल ७० तोळे सोने, दोन किलो चांदी आणि रोख दीड लाख रुपये लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सदाशिव रामा बंजन (वय ७२) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रोडवर बंजन यांचा बंगला आहे. बंजन यांची इंजिन मशिन टुल्सची फॅक्टरी आहे. तीन दिवसांपूर्वी ते कुटूंबियांसोबत कर्नाटक येथे गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून प्रवेश केला. बंगल्यातील कपाटातील ७० तोळे सोने, दोन किलो चांदी आणि दीड लाख रुपये लंपास केले. बंजन शुक्रवारी दुपारी पुण्यात आले. त्या वेळी त्यांना बंगल्याचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी बंगल्यात जाऊन पाहणी केली असता, चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच चतुःश्रुंगी आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात येत आहे.
कोरेगाव पार्कात १४ लाख लुटले
कोरेगाव पार्क येथील नेरल रोडवरील व्यावसायिकाचा बंद फ्लॅट फोडून १३ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेत ४६ तोळे सोने, हिऱ्याच्या चार अंगठ्या असा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
वासुदेव लक्ष्मणदास मेघानी (वय ४३ रा. महल सोसायटी, कोरेगाव पार्क) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरातील महल सोसायटीत चौथ्या मजल्यावर मेघानी यांच्या फ्लॅट आहे. मेघानी यांचा पाणीपंप विक्रीचा व्यवसाय आहे. मेघानी यांच्या पत्नीच्या ब्युटी पार्लरच्या उद्घाटनासाठी कुटुंबीय गुरुवारी सकाळी कॅम्प परिसरात गेले होते. हा कार्यक्रम उरकून चारच्या सुमारास परतल्यानंतर कुलूप उचकटलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केल्यानंतरचोरी झाल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ कोरेगाव पार्क पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या सोसायटीला सुरक्षारक्षक आहे. मात्र, त्याच्याकडूनही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.

‘सामान दुरुस्तीसाठी आलोय’

महल सोसायटीत सुरक्षारक्षक कार्यरत आहे. सुरक्षारक्षकाने साहित्य घेऊन जाताना चोरट्याला हटकले होते. मात्र, त्या वेळी त्याने आपण सामान दुरुस्तीसाठी आल्याचे सांगितले. चोरटा स्कूटरवरून एकटाच आला होता, असेही या सुरक्षारक्षकाने पोलिसांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी शाळा बंद होणार?

$
0
0

राज्य सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र; दीड लाख विद्यार्थ्यांचे नुकसान शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्यात तीन किलोमीटरच्या आत शाळांची सुविधा देणे बंधनकारक आहे. शिवाय दहा वर्षांपर्यतच्या मुलांना त्यांच्या पालकांबरोर राहण्याची सुविधा देणेही बंधनकार आहे, अशी कारणे पुढे करून राज्य सरकारच्या आदिवासी विभागाने आदिवासी आश्रमशाळेतील पहिली ते चौथीपर्यतचे वर्ग बंद करण्याचा घाट घातला आहे. याची कबुली दस्तुरखद्द विभागानेच मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी दिली. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे सव्वा ते दीड लाख विद्यार्थी प्रभावित होण्याची शक्यता आहे.
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्पदंश, आजारपण, अपघात, पाण्यात बुडून, आकस्मिक आणि अन्य कारणाने मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत. या संदर्भात रवींद्र तळपे यांनी सरकारी तसेच अनुदानित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या मृत्यूच्या संदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणी दरम्यान विभागाने प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात विभागाने विविध प्रकारच्या उपाययोजनांची आणि दीर्घकालीन धोरणांची माहिती दिली आहे.
राज्यात सुमारे ५५६ सरकारी, तर ५५५ अनुदानित आश्रमशाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे साडेचार लाख विद्यार्थी पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. ‘आरटीई’नुसार राज्यात प्रत्येक तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा असणे आवश्यक आहे. आदिवासीबहुल भागातही या शाळा आहेत. तसेच, शून्य ते दहा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांबरोबर राहणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. त्यामुळे आश्रमशाळेतील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग बंद करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र, जेथे आवश्यक असतील त्या ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग विशेष सुविधा म्हणून ठेवण्यात येईल, असेही प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, आदिवासी विभागाने दर वर्षी सुमारे २५ हजार विद्यार्थी राज्यातील विविध खासगी शैक्षणिक संस्थांच्या निवासी शाळांमध्ये टाकण्याची योजना आखली आहे. त्यासाठीचा खर्च आदिवासी विभाग करणार आहे. मात्र, प्रत्यक्षात शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दीड लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे योजनेचा लाभ न मिळणाऱ्या उर्वरित विद्यार्थ्यांनी घरी राहून जवळच्या शाळेत प्रवेश घ्यावा, असे धोरण विभागाने आखले आहे.

आदिवासी विभाग आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी झटकण्याचे काम करत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना स्वत:च्या शाळेत न शिकविता त्यांना कोणत्याही खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमध्ये घालण्याचे धोरण आखले आहे. यासाठी एका विद्यार्थ्यामागे वर्षाला ६० ते ७० हजार रुपये शाळेला द्यायचे, असे कंत्राटी धोरण विभागाने आखले आहे. या धोरणाचा अवलंब करून विभागाला आदिवासी आश्रमशाळा बंद पाडायच्या आहेत. आदिवासी विभागाला खरंच शिक्षणाची काळजी असेल तर विद्यार्थ्यांमागे पैसे देण्याऐवजी तालुक्याच्या ठिकाणी उत्तम दर्जाच्या आश्रमशाळा निर्माण कराव्यात.
- सीताराम जोशी, अध्यक्ष, आदिवासी कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल सिनेमा ‘रिळां’वर

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com
Tweet : @schintamanipMT

पुणे : डिजिटल माध्यम बेभरवशाचे असल्याचे ऑस्कर पुरस्कार देणाऱ्या ‘अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस’ (अॅम्पास) या संस्थेने मान्य केल्याने, यापुढे चित्रपटांची रिळे (फिल्म) पुन्हा तयार करावी लागणार आहेत. सध्या चित्रपट डिजिटल माध्यमात तयार केला जात असल्याने रिळांचा वापर थांबला आहे. पूर्वी चित्रपट जतन करण्यासाठी रिळे उपलब्ध असायची; पण आता डिजिटल चित्रपटांची रिळे संग्रहालयांना तयार करावी लागणार आहे. रिळांची निर्मिती केवळ चित्रपट संग्रहालयांच्या वापरासाठी असल्याने जगातील संग्रहालयांचे काम वाढले आहे.

जगात सर्वत्र दुर्मिळ चित्रपट, पुस्तके, छायाचित्रे असा ठेवा जतन करण्यासाठी डिजिटायजेशनवर भर दिला जात असताना, डिजिटायझेशन हे माध्यम दीर्घकाळासाठी फायदेशीर नाही, ते बेभरवशाचे आहे, असे संशोधन पुढे आले आहे. अॅम्पास संस्थेने हे संशोधन केले आहे. करोडो रुपये खर्च करून दुर्मिळ साहित्याचे डिजिटायजेशन करणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नांवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अॅम्पॉसचा ‘डिजिटल डायलेमा’ हा प्रबंध दोन भागांत प्रसिद्ध करण्यात आला आहे. मिल्ट शेफ्टर हे त्याचे लेखक आहेत.

२००८ पर्यंत कोडॅक कंपनीची रिळे उपलब्ध होती. त्यामुळे चित्रपट रिळांच्या माध्यमातून तयार केला जायचा. २००८ नंतर जगात सर्वत्र डिजिटल चित्रपट तयार होऊ लागल्याने रिळांचा वापर कमी झाला व चित्रपटाची हार्ड डिस्क तयार केली जाऊ लागली. यामुळे कोडॅक कंपनीने रिळांची निर्मिती कमी केली. डिजिटल फोटोमुळे फिल्म आणि फिल्म असलेले कॅमेरेही बाद झाले.

सध्या जगातील संग्रहालयांसाठी रिळे तयार केली जातात. सध्याचे चित्रपट हार्ड डिस्कवर असल्याने, ते किती सुरक्षित हा प्रश्न आहे. व्हायरसमुळे हा माहितीचा साठा कधीही नष्ट होण्याची भीती आहे. ‘अॅम्पास’ने हीच बाब अधोरेखित केली आहे. या तुलनेत रिळांचे आयुष्य काही शतकांचे असल्याने ‘जुने ते सोने’ याउक्तीप्रमाणे तेच सुरक्षित माध्यम ठरले आहे. यापुढे नवीन चित्रपट जतन करायचे असतील तर जगातील संग्रहालयांना हार्ड डिस्कवरून चित्रपटांची रिळे तयार करावी लागतील व ती जतन करावी लागतील. यामुळे संग्रहालयांचे काम आणि खर्च वाढणार आहे.

देशातील एकमेव चित्रपट संग्रहालय असलेल्या पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ या केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत देशातील चित्रपटांचे डिजिटायजेशनचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी २०२१ पर्यंत ६०० कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. या संग्रहालयालाही देशातील नवीन चित्रपट जतन करण्यासाठी रिळांचाच आधार घ्यावा लागणार आहे.

रिळांचे महत्त्व कायम

रिळांमध्ये डिजिटल चित्रपटांचे रूपांतर करण्याबाबत माहिती देताना ऑस्कर अॅकॅडमीचे सदस्य व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे तांत्रिक सल्लागार उज्ज्वल निरगुडकर म्हणाले, ‘१९५० पूर्वी वापरण्यात येणाऱ्या नायट्रेट, त्यानंतरचे अॅसिटेट आणि १९९० नंतर वापरण्यात आलेले पॉलिस्टर असे रिळांमध्ये तीन प्रकार आहेत. काही रिळांना दोनशे वर्षे, तर काही रिळांना पाचशे वर्षे आयुष्य असते. माणसाच्या पाच ते दहा पट आयुष्य असल्याने चित्रपट रिळांच्या माध्यमातून अनेक वर्षे जतन होतो. डीव्हीडी, हार्ड डिस्क अशा स्वरूपातील माहितीला फारसे आयुष्य नसल्याने रिळांचेच महत्त्व कायम आहे.’ ‘सध्या रिळ केवळ संग्रहालयांसाठी दिल्या जातात. त्यामुळे ज्यांना आपला चित्रपट जतन करायचा असले, अशांना चित्रपटाची प्रत संग्रहालयाला द्यावी लागेल. डिजिटल माध्यमातील चित्रपट रिळांवर घेऊन तो जतन करण्याचे काम संग्रहालयांना करावे लागेल,’ असेही निरगुडकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या जवळपास वीस दिवसांपासून दडी मारून बसलेल्या जलधारांनी राज्यभरात दमदार पुनरागमन केले आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, कोकण परिसरात गुरुवारपासून दमदार पाऊस सुरू झाला असून, पुणे, नगरसह पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाची चांगली नोंद झाली आहे. नाशिक, कोकणात पावसाने कहर केला असला, तरी पाऊस परतल्याने शेतकरी सुखावले आहेत. पुणे शहर आणि परिसरात गुरुवारपाठोपाठ शुक्रवारी पावसाची हजेरी कायम होती. रात्री साडेआठपर्यंत २.६ मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली. पुढील दोन दिवसांत पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
नाशिकमध्ये पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीपातळीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कोकणात जोरदार पाऊस

कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गुरुवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. शुक्रवारी सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील पेडवेवाडीतील प्रज्ञा प्रभाकर माळकर (वय ३९) ही महिला ओढ्यात वाहून गेली. कणकवली-ओरोस दरम्यान गुरुवारी दुपारी रेल्वे रूळावर मातीचा ढिगारा आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक एक ते दीड तास बंद पडली होती. रायगड जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली.

नाशिकमध्ये पूरसदृश स्थिती

नाशिकमध्ये गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पूरसदृश परिस्थ‌िती पाहण्यासाठी नागरिकांनी गोदाघाटासह सोमेश्वर परिसरात गर्दी केली. हनुमानवाडीतील नाल्यात शाळकरी मुलगा वाहून गेल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. परंतु, या घटनेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. शुक्रवारी सकाळी आठ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार नाशिक शहरात २४ तासांत ७१.६ मिमी पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत ३८.८ मिमी पावसाची नोंद झाली.


पुण्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस

पुणे शहर आणि परिसरात गुरुवारपाठोपाठ शुक्रवारी पावसाची हजेरी कायम होती. शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत २६ मिमी पाऊस झाला. दुपारनंतर पुन्हा पावसाच्या एक-दोन हलक्या सरींनी हजेरी लावली. पुढील दोन दिवसांमध्ये अनुकूल स्थितीमुळे पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.


अतिवृष्टीचा इशारा

पुढील चोवीस तासात मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सातारा या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमपी’ आता एका क्लिकवर

$
0
0

पासपासून ‘ब्रेक डाउन’पर्यंत सर्वकाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दैनंदिन पासपासून पुणे दर्शन बसचे तिकीट आरक्षित करण्यापर्यंत, पीएमपीचे दैनंदिन उत्पन्न, प्रवासी, मार्गावरील बसची संख्या, ब्रेक डाउनची संख्या यापासून मार्गावरील बसचे ट्रॅकिंग करण्यापर्यंतच्या विविध गोष्टींचा अंतर्भाव पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या नवीन वेबसाइटवर करण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वी केवळ नावालाच असणारी वेबसाइट आता खऱ्या अर्थाने नागरिकांच्या फायद्याची झाली आहे.

पीएमपीची pmpml.org ही वेबासाइट नव्याने करण्यात आली असून, ती गुरूवारी सर्वांसाठी खुली करण्यात आली. वेबसाइट प्रवासी केंद्रीत आणि सुटसुटीत आहे. बसचे नियमित वेळापत्रक, ‘जर्नी प्लॅनर’, रात्रसेवा, पुणे दर्शन, एअरपोर्ट सर्व्हिस, डॅशबोर्ड आणि ‘सिटीझन कॉर्नर’ या महत्त्वाच्या पर्यायांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

पीएमपीमधील पारदर्शक कामाच्या दृष्टिने दररोज किती ट्रीपचे नियोजन करण्यात आले होते व प्रत्यक्षात किती ट्रीप झाल्या, दिवसभरात विक्री झालेल्या पासची संख्या, दैनंदिन प्रवाशांची संख्या, मार्गावरील बसची संख्या, प्रवाशांनी दाखल केलेल्या तक्रारी, त्यापैकी किती तक्रारी सोडविण्यात आल्या आदी माहितीचा ‘डॅश बोर्ड’ तयार करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टिने ‘पीएमपी ई-कनेक्ट’ अॅपमध्ये दिलेल्या सुविधांचाही या वेबसाइटवर समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती मुंढे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुशीडॅम परिसरात पर्यटकांना मज्जाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

मागील तीन दिवसांपासून लोणावळा खंडाळा परिसरासह मावळात मुसळधार व जोरदार पाऊस सुरू आहे. लोणावळा खंडाळा परिसरात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशीडॅमच्या पाण्यात मोठी वाढ होऊन डॅमच्या पायऱ्यांवरून पाण्याचा मोठा प्रवाह वेगाने वाहत आहे. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस प्रशासनाने शनिवारी सकाळपासून डॅमच्या पायऱ्यांवर जाण्यास मज्जाव केला होता. यामुळे या परिसरातील व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने व्यवसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

तब्बल दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने तीन दिवसांपूर्वी लोणावळा, खंडाळ्यासह मावळात दमदार हजेरी लावली आहे. यामुळे मावळात पावसाअभावी मंदावलेल्या भात लागवडीला पुन्हा वेग आला असून, बळीराजा कमालीचा सुखावला आहे. मागील ४८ तासांत लोणावळ्यात सुमारे ३१२; तर पवनाधरण क्षेत्रात २४१ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

शनिवारी पहाटेपासून लोणावळा व खंडाळा परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. विशेषतः भुशी डॅमच्या परिसरातील डोंगर पठारावर जोरदार पाऊस कोसळत असल्याने भुशीडॅमच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पाण्याचा प्रवाह डॅमच्या पायऱ्य‍ांवरून जोरात वाहत आहे. यामुळे अनेक पर्यटकांसाठी पायऱ्यांवर उभे राहणे धोकादायक बनले होते. पोलिस प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षेच्या कारणास्तव भुशीडॅमच्या पायऱ्यांवर जाण्यास मज्जाव केला होता. पोलिसांच्या या निर्णयामुळे पर्यटकांसह डॅमच्या बांध परिसरातील व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे जोरदार पावसामुळे शनिवारी पर्यटकांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याने लोणावळा, खंडाळा परिसरासह टायगर, लायन्स पॉइंट येथील व्यवसायावर परिणाम झाल्याची ओरड व्यावसायिक करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता तरी येऊ दे भान

$
0
0

हल्ली टीव्हीवर रिअॅलिटी शोचे पेव फुटले आहे. त्यात गायन, वादन, नृत्य असे सांगीतिक रिअॅलिटी शो आहेत, तसेच नाट्यसादरीकरण आणि विशेषतः विनोदी स्कीट सादर होत असलेले ‘कॉमेडी रिअॅलिटी शो’ही आहेत. सातत्याने वेगळे काहीतरी देण्याच्या नादात आणि अधिकाधिक प्रेक्षकांना आपल्या वाहिनीपर्यंत खेचण्याच्या स्पर्धेत या रिअॅलिटी शोमध्ये लहान मुलांचाही अंतर्भाव झाला आहे आणि सगळी अडचण नेमकी येथेच आहे.
अलीकडेच दिग्दर्शक शूजित सरकार यांनी लहान मुलांचा समावेश असलेले रिअॅलिटी शोज थांबवावेत, अशी कळकळीची विनंती वाहिन्यांना केली होती. ते म्हणाले, ‘स्वतःला क्रिएटिव्ह म्हणवून घेणारे लहान मुलाला टॅलेंटच्या नावाखाली स्पर्धेत उतरवतात. वाहिनी मुलांना व्यासपीठ देत असल्याचे सांगते, तर मग परीक्षक, जिंकणे-हरणे हे सगळे कशासाठी? त्यातही ‘बार्क रेटिंग’ मिळवण्याची धडपड आहेच. कलेचे परीक्षण करताना गुण, स्पर्धा यात मुलांना अडकवले जाते. त्या मुलाची कला बाजूला पडते आणि पालकही पैसा आणि प्रसिद्धीच्या मोहात अडकतात. हीच आयुष्याची रिअॅलिटी आहे, असे मुले समजू लागतात.’ वयात येण्याआधीच मुलांना आलेले शहाणपण घातक असल्याचे आणि याचा वाईट परिणाम जेव्हा जाणवेल, तेव्हा हे परीक्षक त्यांना सांभाळायला नसतील, असेही शूजित यांचे म्हणणे आहे.
शूजित यांच्या म्हणण्यावर अनेकांनी अत्यंत संयत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही हिंदी आणि मराठी सेलिब्रेटींचेही मुलांना व्यासपीठ मिळत असल्याचे आणि हे रिअॅलिटी शोज वाईट नसल्याचेच मत आहे. सुनिधी चौहान आणि श्रेया घोषाल यांसारख्या गायिका तर यातूनच पुढे आल्या आहेत. सरसकट सगळ्यांचे येथे येऊन नुकसानच होते, असे चित्र नसले, तरी सध्याची लहान मुलांच्या रिअॅलिटी शोजची परिस्थिती मात्र नक्कीच भयावह आहे आणि त्यावर पुनर्विचार करण्याची खरोखरीच गरज आहे.
‘द व्हॉइस इंडिया किड्स’, हिंदी आणि विविध प्रादेशिक भाषांतील ‘सारेगमप’, ‘सुपर डान्सर : डान्स का कल’, ‘लिटल मास्टर शेफ’, ‘डान्स इंडिया डान्स’, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, ‘इंडिया बनेगा मंच’, कॉमेडी रिअॅलिटी शो ‘छोटे मिया धाकड’ आणि ‘ढोलकीच्या तालावर : छोट्यांची अदाकारी... लै भारी’ हे शोज मुलांचे बालपण हिरावून घेत असल्याचेच चित्र आहे. लावणी हा लोककला प्रकारच मुळात जिथे शृंगार दर्शवतो, काही वेळा विरह रसही प्रदर्शित करतो, तिथे मुलांकडून या भावना मांडण्याची अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे? शृंगाराची भावना निर्माण होण्यासाठी आणि ती कळण्यासाठी ‘वयात येणे’, प्रेमात पडणे हे मुद्दे महत्त्वाचे नाहीत का? लावणी नृत्य हे ‘क्यूट’ कसे असू शकेल? ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘झोंबतो गारवा’, ‘माघाची थंडी माघाची’ यांसारखे लावणी सादरीकरण केवळ पढवले गेले; म्हणून मुलींनी सादर केल्यासारखे वाटते. यातील खरी भावना त्यांना कळणे शक्यच नाही आणि खरेतर ती या वयात त्यांना कळूही नये.
वाढीच्या वयातील काही वर्षे कलेसाठी झोकून देऊन मेहनत करावी लागते. तिचा ध्यास घ्यावा लागतो. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होता येत नाही. नृत्य, गायन, वादन किंवा नाट्य या कला शिकताना आणि त्याचा आस्वाद घेताना त्यातून मिळणारे मानसिक समाधान महत्त्वाचे असते. या रिअॅलिटी शोजमुळे मात्र मुलांमधील निर्व्याज कोमलता संपत चालली आहे. मुले ‘स्मार्ट’ होण्याच्या नादात त्यांना त्यांच्या वयाच्या मानाने अति कळू लागल्याचेही त्यांच्या पालकांच्या लक्षात येत नाही. ज्या गोष्टी आता त्यांना पूर्णपणे समजणार नाहीत आणि त्यांच्या कानावरही ते पडण्याची गरज नाही, त्या बाबी केवळ नाट्यसादरीकरणासाठी (एपिसोडीक स्कीटपुरत्या) त्यांच्याकडून पाठ करून घेतल्या जातात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची विचारसरणी, अलीकडेच नव्याने लागू झालेले जीएसटी, नोटाबंदी इथपासून गोमांसबंदी किंवा बाहुबलीपासून क्रिकेटच्या नव्या प्रशिक्षकाच्या वादापर्यंत कुठल्याही विषयांवरील स्कीट्स ‘स्मार्ट’ मुलांकडून वदवून घेतली जातात. अशा पद्धतीने मुले ‘अपडेट’ असण्याची खरोखरीच गरज आहे का, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
दैनंदिन आयुष्यात वाढलेली स्पर्धाच इतकी आहे, की पालकही आपल्या पाल्याला या दलदलीत ढकलत राहतात. एपिसोडगणिक ही मुले अधिकाधिक आगाऊ होत चाललेली दिसतात. त्यांची निरागसता तर यामुळे संपलेलीच आहे आणि त्यांना नको त्या वयात नको त्या गोष्टींना अधिक चकचकीतपणे सामोरे जावे लागते आहे. ज्या वयात घसरगुंडीवरून स्वच्छंदीपणे घसरत खाली यायचे आणि झोके घेत झुलायचे, त्या वयात ही मुले भयंकर स्पर्धेला सामोरी जात आहेत. आपल्यापेक्षा कुणी वरचढ ठरू नये, यासाठी चाललेल्या अटीतटीच्या स्पर्धेत त्यांची निरागसता हरवते आहे. या मुलांमध्ये दुसऱ्यावर कुरघोडी करण्याची भावना वाढते आहे. काही पालक या रिअॅलिटी शोजचा फायदा मुलांच्या कलागुणांना उत्तम व्यासपीठ मिळण्यासाठी होतो, असा विचार करतात, तर काही पालक मात्र स्पर्धेत कुठे थांबायचे, हा निर्णय घेता न आल्यामुळे पैसे कमावण्याचे साधन म्हणून मुलांचा उपयोग करतात. एपिसोडगणिक मुलांची वाढती प्रसिद्धी आणि लोकप्रियता ही संबंधित शो सुरू असेपर्यंतच, म्हणजेच क्षणिक असल्याचेही भान पालकांना राहत नाही. काही वेळा तर चक्क ही प्रसिद्धी तात्पुरतीच आहे, हे लक्षात घेऊनच कदाचित मुलांच्या नावाने नृत्य, गायन किंवा स्कीट सादरीकरणाच्या सुपाऱ्या घेतल्या जातात. हे बालकामगार म्हणून शोषण करण्यासारखेच नाही का?
झटक्यात मिळालेली प्रसिद्धी तरुण कलाकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही जिथे पचवता आलेली नाही, तेही जिथे वाहवत जाताना दिसतात, तिथे लहान मुलांनी हरल्यानंतर कोलमडून पडू नये आणि जिंकल्यानंतर हुरळून जाऊ नये, अशा अपेक्षा कशा काय ठेवणार? कलागुणांचा विकास होण्याचे वय असताना त्याच वयात त्यांना उत्तम परफॉर्मर असल्याप्रमाणे ते कलागुण सादर करण्यासाठी आग्रह केला जातो, तो रिअॅलिटी शोच्या माध्यमातून.
मुलांच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी, कलेतील बैठक तयार होण्यासाठी आणि त्यांना त्यातला आनंद स्वतःहून घ्यायचा कसा, हे कळण्यासाठी वेळ देणे गरजेचे असल्याचेच आपण सगळे विसरत चाललो आहोत. याविषयी सायकोथेरपिस्ट व रिलेशनशिप एक्स्पर्ट डॉ. मकरंद ठोंबरे म्हणाले, ‘या रिअॅलिटी शोजमधील धंदेवाईक दृष्टिकोन फार घातक आहे. मुले या वयात पालकांचे सगळे म्हणणे ऐकत असतात. कलेचा आनंद घेण्यापेक्षा त्यांच्यावर यशस्वी होण्याचेच दडपण वाढत जाते. मी कायम ‘बेस्ट’च असले पाहिजे, यातून त्यांचे लक्ष फक्त ‘रिझल्ट’कडे असते. ते प्रक्रियेचा आनंदच घेत नाहीत. यातूनच ईर्ष्या, मत्सर, द्वेष या अनारोग्यकारक भावना निर्माण होतात. मुलांच्या मनावरच नाही, तर शरीरावरही वाईट परिणाम होतात. स्वतःचा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी अनेकदा पालक मुलांना रिअॅलिटी शोच्या स्पर्धेत ढकलतात. मात्र, किती मुलांना स्वतःहून येथे जावेसे वाटते, हाही चिंतेचाच विषय आहे. त्यांच्या मनात स्वतःविषयी न्यूनगंड किंवा ‘आपणच सर्वांत भारी असल्याचा’ अहंगंडही निर्माण होऊ शकतो. हे सर्वच अत्यंत घातक आहे.’
या सगळ्यात लक्षात घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे रिअॅलिटी शोचे विजेते फारच कमी वेळा पुढे आले आहेत. रिअॅलिटी शोची परीक्षक होणे आवडत नसल्याविषयी प्रख्यात गायिका कौशिकी चक्रवर्ती एकदा म्हणाल्या होत्या, की रात्री उशिरा चालणाऱ्या शूटिंगदरम्यान केवळ एका गाण्यातील एखाद्याच कडव्याच्या सादरीकरणावरून संबंधित मुलाचे परीक्षण करणे योग्य नाही. अनेक मोठे स्टार्स किंवा सेलिब्रेटीही त्यांच्या मुलांचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण व्यवस्थित पूर्ण झाल्याशिवाय त्यांना या तात्कालिक प्रसिद्धीच्या जगात आणत नाहीत, यावरून तरी पालकांनी शहाणे होणे गरजेचे आहे. हे रिअॅलिटी शोज ‘फास्ट’ किंवा ‘जंक फूड’सारखे आहेत. केवळ चवीला चांगले म्हणून खाल्ले, तरी याने भूक मात्र भागत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गरज आहे प्रयोगशीलतेची!

$
0
0


बॉलिवूड हा शोबिझ बिझनेस आहे. हिरोचे रूबाबदार व्यक्तिमत्त्व आणि हिरोइनचे आरस्पानी सौंदर्य यावरच त्यांचे वर्तमान, भविष्य लिहिले जाते. हिंदी सिनेमा हा नेहमीच नायकप्रधान राहिला आहे. स्त्रीकेंद्रीत सिनेमांची कितीही लाट आली, तरी कालांतराने ती ओसरते आणि ‘हिरोइझम’चा जुना, यशस्वी ट्रेंड पुन्हा डोके वर काढतो. नेहमीप्रमाणे नायकप्रधान सिनेमांना चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळतो. मग त्या हिरोने वयाची चाळिशी-पन्नाशी का ओलांडलेली असेना. केवळ आपल्या नावाच्या ‘ब्रँड’वर थिएटरमध्ये गर्दी खेचून आणण्यात हिरो यशस्वी ठरतात. त्या वेळी पटकथा, सिनेमाची धाटणी, हिरॉइन या गोष्टी चाहत्यांसाठी दुय्यमच. म्हणून तर बॉलिवूडवर ‘खान्स’चे प्रस्थ अजूनही शाबूत आहे. वयाची पन्नाशी ओलांडूनही ‘खान्स’ मुख्य भूमिकेत झळकले, प्रेमकथा रंगवल्या तरी त्या चाहत्यांकडून स्वीकारल्या जातात, हे विशेष. मात्र, काळाची पावले आणि त्यानुसार आपल्यात होणारे बदल स्वीकारणे हिरोसाठी नेहमीच फायद्याचे ठरते. अन्यथा, अतिआत्मविश्वासापोटी म्हणा किंवा आहे ते वय न स्वीकारता तरुण, मुख्य भूमिकांचाच आग्रह धरल्यास म्हणा, स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखे आहे. ‘ट्यूबलाइट’ प्रदर्शित झाल्यानंतर सलमान खानच्या बाबतीत अशीच भीती निर्माण झाली आहे!
सलमान खान! या नावातच एक मोठा ब्रँड दडला आहे. दर वर्षी ईदला केवळ याच नावाचे ‘वेटेज’ थिएटरमध्ये चाहत्यांची गर्दी खेचून आणते. अॅक्शन असो, कॉमेडी असो किंवा लव्हस्टोरी असो, सलमानने आपल्या कारकिर्दीतील सगळ्याच भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. ‘प्रेम’ साकारून त्याने कितीतरी हिट सिनेमे देऊन या नावाला ‘ग्लॅमर’ मिळवून दिले. आशिक असावा तर असा अशी सुप्त इच्छा तरुणींच्या मनात घर करून राहिली. १९८९मध्ये आलेल्या ‘मैने प्यार किया’ या सिनेमापासून त्याचा ‘प्रेम’ सिलसिला सुरू झाला आणि ‘प्रेम रतन धन पायो’पर्यंत (२०१५) तो टिकून आहे. ‘अंदाज अपना अपना’, ‘नो एंट्री’, ‘हम साथ साथ है’, ‘पार्टनर’, ‘सिर्फ तुम’, ‘कही प्यार ना हो जाए’, ‘जुडवा’, ‘रेडी’, ‘चल मेरे भाई’ या सिनेमातील ‘प्रेम’ ब्रँडने सलमानला उंचीवर नेऊन ठेवले. हे सिनेमे त्याच्या करिअरमधील मैलाचे दगड समजले जातात.
सलमानमध्ये ‘हिरो मटेरिअल’ भरपूर आहे. मात्र, तारुण्याची रेषा पार केलेला, बेढब, थकलेला, चेहऱ्यावर काहीशा सुरकुत्या असलेला हिरो पाहायला आवडेल आपल्याला? नक्कीच नाही! तरीही सलमान खान, शाहरूख खान अजूनही मुख्य भूमिकेत चाहत्यांकडून सहज स्वीकारले जाताहेत. वयाची तब्बल पन्नाशी ओलांडूनही! या वयात हिरो म्हणून त्यांना स्वीकारणे चाहत्यांना गैर वाटत नाही, हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. मात्र, अभिनयाचे नाणे कितीही चमकणारे असो, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष वय बाजूला सारून चालत नाही. ‘वन्स अॅन अॅक्टर ऑल्व्हेज अॅन अॅक्टर’ असे म्हटले जात असताना वयाला अनुसरून भूमिका स्वीकारण्यातच नायकाचे खरे शहाणपण दडलेले असते आणि ‘ट्यूबलाइट’च्या निमित्ताने सलमानला हे शहाणपण लवकर सुचावे!
‘दबंग’नंतर सलमानने वेगळ्या धाटणीचा सिनेमा करायला सुरुवात केली. ‘जय हो’, ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’, ‘ट्यूबलाइट’ या सिनेमांमधून सामाजिक संदेश देण्यावर त्याचा भर असल्याचे स्पष्ट दिसून येते. रोमँटिक आणि अॅक्शन हिरो अशी इमेज सलमानने या सिनेमांतून बदलण्याचा प्रयत्न केला असला, तरी चाहत्यांना ती फारशी भावली नाही. संदेश देणारा एकच सिनेमा करून सलमान थांबला नाही, तर दर पुढच्या सिनेमात त्याची पुनरावृत्ती करत राहिला आणि चाहत्यांना तेच खटकलं. या सिनेमांप्रमाणेच ‘बॉडीगार्ड’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘सुलतान’मध्ये सलमान प्रचंड थकलेला दिसून आला. ‘प्रेम’ किंवा ‘चुलबुल पांडे’सारखा ‘चार्म’ त्याच्यात नव्हता. या सिनेमांची चर्चा झाली खरी; पण वयानुसार सलमानमध्ये झालेले बदल चाहत्यांना दुर्लक्षित करता आले नाहीत. वाढते वय न स्वीकारता केवळ आणि केवळ मुख्य भूमिकेतच झळकायचा सलमानचा आग्रहच त्याचे फिल्मी करिअरला संपवेल, अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहत नाही.
हिंदी इंडस्ट्रीची गणिते फार वेगळी आहेत. येथे हिरोइनने वयाची चाळिशी ओलांडली, तर तिचे करिअर आता संपुष्टात आले अशी चर्चा रंगते. मग तिने कितीही चांगल्या भूमिकांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला का असेना. ‘चेहऱ्यावर आता तिचे वय दिसते,’ असे ऐकत त्या मुख्य प्रवाहातून बाजूला सारल्या जातात. खरे तर, आपले वाढते वय त्या स्वतःच स्वीकारून मुख्य भूमिकांचा आग्रह सोडतात. पुरुषप्रधान संस्कृतीचाच हा एक दाखला. त्यांची अभिनयसंपन्नता पाहता याही वयात त्यांच्या या पात्रतेला न्याय देण्यासाठी आपल्याकडे हॉलिवूडप्रमाणे सिनेमांची निर्मिती होत नाही. हॉलिवूडमध्ये चाळिशी ओलांडलेल्या हिरोइनसाठी म्हणून खास सिनेमे लिहिले जातात आणि ते ऑस्करपर्यंत पोहोचतात. मेरिल स्ट्रीप, केट विन्स्लेट, ड्रू बेरीमोर, कॅमरोन डियाज, अँजेलिना जोली, ज्युलिया रॉबर्ट्स या अभिनेत्रींना तिथे अजूनही वलय आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या तब्बू, रवीना टंडन, माधुरी दीक्षित, जूही चावला, श्रीदेवी, मधू, काजोल, शिल्पा शेट्टी अशा हिरोइन मागेच आहेत. आपले आहे ते वय सहज स्वीकारून त्या दुय्यम भूमिकांकडे वळतात किंवा सिनेमांमधून ब्रेक घेतात.
हिरोच्या बाबतीत मात्र असे होत नाही. वय हा मुद्दा त्यांच्यासाठी कधीच महत्त्वाचा मानला जात नाही. दिग्दर्शक-निर्माते पन्नाशीतही त्यांचा प्रेमकथेसाठी विचार करतात. आपले वाढते वय स्वीकारायला हिरोला बॉलिवूडच परवानगी देत नाही हेच खरे. म्हणून तर आज सलमान खान मुख्य भूमिकेत टिकून आहे. आमिर खानही पन्नाशी ओलांडलेला. मात्र, नायक म्हणून प्रयोगशील असल्याने त्याच्या वाढलेल्या वयाकडे कधीच लक्ष जात नाही. उलट प्रत्येक सिनेमात त्याचे कौतुकच होते. ‘दंगल’मध्ये तीन मुलींचा बाप साकारण्याचे धाडस त्याने दाखवले. त्यासाठी काहीक वर्षे जबरी मेहनतही घेतली. वयाच्या एकाच टप्प्यावर असल्याने या समकालीन हिरोंना भूमिकांच्या बाबतीत एका रांगेत बसवावे लागतेच.
सलमानच्या बाबतीत भूमिकांमध्ये आता तोचतोचपणा जाणवायला लागला आहे. ‘ट्यूबलाइट’ आणि ‘बजरंगी भाईजान’मधला त्याचा लूक सारखाच वाटतो. दोन्ही सिनेमाची कथा वेगळी असली, तरी पात्र म्हणून त्याची देहबोलीही वेगळी नाही. अभिनयशैलीतही फरक जाणवत नाही. मुख्य भूमिकेच्या आग्रहापोटी नायक म्हणून अंगी असलेल्या प्रतिभेला सलमान जणू स्वतःच कुंपण घालतोय. खरे तरे, वयाच्या या टप्प्यावर आणि येथून पुढे त्याची इंडस्ट्रीत टिकण्याची, अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची कसोटी आहे. या कसोटीला पुरेपूर न्याय देण्यासाठी त्याला संधीही मिळू शकतात किंवा वेगळा विचार करून त्याने त्या स्वतः तयार कराव्यात. यासाठी त्याच्याकडे तशी ‘सुपरब्रेन’ असलेली माणसेही आहेत आणि त्याच्या नावावर पैसे लावणारे निर्मातेही. फक्त त्याने सिनेमात दुय्यम किंवा प्रयोगशील अशी सशक्त भूमिका स्वीकारायला तयार झाले पाहिजे. नायक प्रयोगशीलतेतून घडत असतो आणि त्यातूनच स्वतःचे भविष्यही लिहीत असतो. ‘सावध ऐका पुढल्या हाका,’ यानुसार सलमानने हे वेळीच जाणावे. अमिताभ बच्चनप्रमाणे! सद्यस्थितीत हिंदी सिनेमा बदलत असताना स्वतःच्याच नावाचा ‘ब्रँड’ म्हणून विचार करणे सलमानला परवडणारे नाही. अन्यथा, तोच त्याच्या नायकप्रधान यशोगाथेचा ‘व्हिलन’ ठरेल आणि तमाम चाहत्यांना हे मुळीच पचणार नाही!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुशी डॅम परिसरात पर्यटकांना मज्जाव

$
0
0

लोणावळा: लोणावळा खंडाळा परिसरात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशीडॅमच्या पाण्यात मोठी वाढ होऊन डॅमच्या पायऱ्यांवरून पाण्याचा मोठा प्रवाह वेगाने वाहत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस प्रशासनाने शनिवारी सकाळपासून पर्यटकांना डॅमच्या पायऱ्यांवर जाण्यास निर्बंध घातले आहेत.

मागील तीन दिवसांपासून लोणावळा खंडाळा परिसरासह मावळात मुसळधार व जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं भुशी ड‌ॅममधील पाण्याची पातळी वाढली असून डॅमच्या पायऱ्यांवरून पाण्याचे लोट वाहत आहेत. खबरदारी म्हणून पर्यटकांना पायऱ्यांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळं या परिसरात छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला असून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, पाण्याचा प्रवाह ओसरला की पर्यटकांना पायऱ्या जाण्याची मुभा दिली जाईल, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

तब्बल दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने तीन दिवसांपूर्वी लोणावळा, खंडाळ्यासह मावळात दमदार हजेरी लावली आहे. यामुळे मावळात पावसाअभावी मंदावलेल्या भात लागवडीला पुन्हा वेग आला असून, बळीराजा कमालीचा सुखावला आहे. मागील ४८ तासांत लोणावळ्यात सुमारे ३१२; तर पवनाधरण क्षेत्रात २४१ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी पहाटेपासून लोणावळा व खंडाळा परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेरक कथांमधून मिळाली जीवनदृष्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आपली स्वप्ने, इच्छा, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच जबाबदार नागरिक म्हणून आपण समाजाचे देणे लागतो. छोट्याशा प्रयत्नातूनही अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची, संकटग्रस्तांच्या जीवनाला उभारी देणे शक्य आहे, यासाठी गरजेची आहे इच्छाशक्ती आणि संवेदनशील मनाची... समाजातील विविध घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांनी पुणेकरांना समाजासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन केले. अन् त्यांच्या प्रेरणादायी कहाण्यांमधून नकळत श्रोत्यांना सकारात्मक जीवनाची नवी दिशा मिळाली.
निमित्त होते... ‘अमृतयात्रा’ प्रस्तुत ‘स्वयम्’चे... विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा जीवनप्रवास त्यांच्या शब्दात ऐकण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर होता. ग्रामीण भागातील मुलांना मराठीतून परदेशी भाषा शिकवून स्वतः ची ओळख निर्माण केलेल्या मनीषा पाठक, थॅलिसिमिया या रक्ताच्या गंभीर आजाराविषयी जनजागृती आणि या आजार झालेल्या मुलांचे पालकत्व घेणाऱ्या सुजाता रायकर, पारंपरिक कला आणि आधुनिक व्यवस्थापनशास्त्र यांचा सुंदर मेळ घालून ‘कॉर्पोरेट कीर्तन’ करणारे पुष्कर औरंगाबादकर यांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडला. श्रीमती पाठक यांनी ‘कैझल लिंग्वा’ या संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. थॅलिसिमिया या आजाराविषयी समाजामध्ये असलेले गैरसमज, या दुर्धर आजाराच्या उपचारांवर होणारा खर्च भागवताना गरीब कुटुंबाची होणारी परवड याचे विदारक चित्र रायकर यांनी मनोगतातून मांडले. त्यांनी सुरू केलेल्या ‘साथ’ या संस्थेची माहिती दिली.
‘परंपरेची कास धरून आधुनिक पद्धतीने तरुणांना मार्गदर्शनाची गरज आहे. नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या पिढीकडे संयम आणि अध्यात्माची बैठक असणे आवश्यक आहे,’ असे औरंगाबादकर म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक होते. ‘स्वयंम’चे नवीन काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंनिस’ करणार राज्यभर आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला चार वर्षे होऊनही मारेकरी पकडले गेलेले नाहीत. त्यासाठी सरकारला जाब विचारण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘जवाब दो’ आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. येत्या २० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, महिन्यात राज्यातील सर्व खासदार आणि आमदारांना निवेदन देण्यात येणार आहे.
येत्या २० ऑगस्टला डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला चार वर्षे पूर्ण होत आहेत. अद्याप त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. यासाठी राज्यस्तरावर महिनाभर ‘अंनिस’चे कार्यकर्ते सनदशीर मार्गाने आंदोलन करणार आहेत, अशी माहिती ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या व्यक्ती आणि संस्थांची माहिती मिळूनही मारेकऱ्यांना पकडण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारमध्ये नाही, असा आरोपही त्यांनी केला. हत्येचा तपास लवकरात लवकर पूर्ण करावा यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर जातपंचायत विरोधी सामाजिक बहिष्कार कायदा राज्य सरकारने लागू केला आहे. काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी गेल्या सह महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांकडे आम्ही वेळ मागत आहोत. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

जातपंचायत विरोधी कायदा लागू केल्याबद्दाल ‘अंनिस’ने राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या कायद्याचे स्वागत करणारे अधिवेशन समिती तर्फे घेण्यात येणार आहे. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समिती कार्यरत राहणार असून जेजुरी आणि मढी येथील जत्रेतही कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगड घाटरस्त्यावर दोनदा दरड कोसळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संततधार पावसामुळे सिंहगडाच्या घाटरस्त्यावर शुक्रवारी सकाळी आणि संध्याकाळी सातनंतर दरड कोसळली. घेरा सिंहगड समिती आणि वन कर्मचाऱ्यांनी दरड पडलेला भाग रिकामा केल्याने पुन्हा वाहतूक सुरळीत झाली आहे. मात्र पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता असून पर्यटकांनी घाटरस्त्यात कोठेही न थांबण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
सिंहगड घाट रस्त्यावर शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान दरड कोसळली. या वेळी त्या मार्गावर वर्दळ नसल्याने अपघात टळला. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काही वेळासाठी रस्ता बंद करण्यात आला होता. वन कर्मचारी आणि घेरा सिंहगड समितीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनस्थळाला भेट देऊन रस्त्यावरचे दगड दूर केले. संध्याकाळी देखील दुसऱ्या वळणावर पुन्हा दरड कोसळली.
दरडीमुळे रस्त्यावर आलेले दरड आणि मुरूम साफ करण्याचे काम सुरू आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने गडावर येतात, त्यामुळे शनिवारी सकाळी जेसीबी आणून आम्ही रस्ता मोकळा केला आहे. मात्र पावसाचा जोर पाहता काही वळणांवर पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी गडावर जाताना घाट रस्त्यात कोठेही थांबू नये असे आवाहन आम्ही केले आहे. गडाच्या पायथ्याला प्रवेश शुल्क देतानाच आम्ही पर्यटकांना सूचना देणार आहोत, अशी माहिती वनपाल हेमंत मोरे यांनी दिली.
गडावरील पार्किंग ‘फुल’ झाल्यानंतर पर्यटकांना घाटात जाण्यासाठी प्रवेश बंद करण्याची वेळ वन कर्मचाऱ्यांवर आली होती. पर्यटकांची वाढती गर्दी, दरड पडण्याचा धोका पाहता ऐन हंगामात सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवायचा की पर्यटकांच्य संख्येवर नियंत्रण ठेवायचे, याबद्दल वन विभागाचा विचार सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images