Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डॉ. बहुलकर ‘भांडारकर’चे मानद सचिव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शताब्दी पूर्ण केलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदी ज्येष्ठ संशोधक डॉ. श्रीकांत बहुलकर यांची निवड करण्यात आली आहे. नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांची तर, उपाध्यक्षपदी अॅड. विनायक अभ्यंकर यांची आणि सनदी लेखापाल संजय पवार यांची कोशाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे.

संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यकारी मंडळामध्ये संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, माजी मानद सचिव डॉ. मैत्रेयी देशपांडे, भूपाल पटवर्धन, डॉ. सुधीर वैशंपायन आणि श्रीनिवास कुलकर्णी यांचा समावेश असून मानद सचिव आणि कोशाध्यक्ष पदसिद्ध सदस्य आहेत. संस्थेच्या वार्षिक सभेच्या अध्यक्षपदी अॅड. सदानंद ऊर्फ नंदू फडके यांची तर, उपाध्यक्षपदी प्रा. हरी नरके यांची निवड करण्यात आली. जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर आणि प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर संस्थेचे विश्वस्त आहेत.

संस्थेच्या शताब्दीनिमित्त यंदा प्रथमच कार्यकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून, २५ सभासदांची नियुक्ती महिन्याभरापूर्वीच झाली होती. या सभेत आगामी तीन वर्षांसाठी नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सभासदांमध्ये प्रा. प्रदीप आपटे, विश्वास चित्राव, प्रमोद जोगळेकर,

सुनील त्र्यंबके, प्रा. गणेश थिटे, प्रा. महेश देवकर, अनिरुद्ध देशपांडे, अरुण नाहर, राजाराम पाठक, विजय बेडेकर, दिलीप मंडलेकर, प्रा. रवींद्र मुळे, वसंत वैद्य, डॉ. शिल्पा सुमंत व अपूर्व सोनटक्के यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेट्रो विस्तारासाठी पुढाकार हवा

$
0
0

सविस्तर प्रकल्प अहवालासाठी सत्ताधारी भाजपकडून प्रयत्न सुरू ‌होणे गरजेचे

पुणे : शहराच्या बहुप्रतीक्षित मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून त्याचा विस्तार करण्याची मागणी सातत्याने होत असून, त्यासाठी विस्तारित मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याकरिता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या ‘टीम’ने तातडीने प्रयत्न सुरू करायला हवे. विस्तारित मार्गांच्या डीपीआरसाठी आतापासून प्रयत्न केले, तर कधीतरी दोन-तीन वर्षांनी मेट्रोच्या विस्तारित मार्गांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मेट्रोचा पहिला टप्पा प्रत्यक्ष कार्यान्वित होताना, पुढच्या टप्प्याचे काम सुरू होऊ

शकणार आहे.

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून केवळ प्रतीक्षेत असलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर, नाशिक फाट्यालगत या प्रकल्पाचे कामही सुरू झाले आहे. मेट्रोचा पहिला टप्पा पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट, तर दुसरा टप्पा वनाझ ते रामवाडी असा आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) २००९मध्ये सादर केलेल्या डीपाआरनुसार या दोन मार्गिका निश्चित करण्यात आल्या असल्या, तरी गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये शहराचा भौगोलिक विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे, पिंपरी-चिंचवडकरांनी तर काम सुरू झाल्यापासून निगडीपर्यंत मेट्रो करा, अशी जोरदार मागणी लावून धरली आहे. तर, रामवाडीचा मार्गही विमानतळ किंवा वाघोलीपर्यंत विस्तारण्यात यावा, असा आग्रह धरला जात आहे.

मेट्रोच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे (महामेट्रो) असून, सध्या तरी केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या डीपीआरनुसार मेट्रोचे काम होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, आता मेट्रोच्या पुढच्या टप्प्यासाठी नियोजन करण्याची सर्वांत मोठी जबाबदारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या भाजपच्या कारभाऱ्यांकडे आहे. या दोन्ही महापालिकांमध्ये सध्या भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. दोन्ही पालिकांमध्ये महापौर, पुण्यात आठ आमदार, पिंपरी-चिंचवडमध्ये दोन आमदार यासह पुण्याचे खासदार आणि केंद्रातील महत्त्वाचे मंत्रिपद अशी भरभक्कम ‘टीम’ हाती असल्याने मेट्रोच्या विस्तारित मार्गासाठी डीपीआर तयार करण्याचा निर्णय तातडीने घेण्याची गरज आहे. हा निर्णय लवकर घेऊन डीपीआर तयार करायचे काम त्वरेने दिले गेले पाहिजे. कोणत्याही मेट्रोचा डीपीआर तयार करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागतोच. त्यामुळे, डिसेंबर २०१८पर्यंत किंवा तत्पूर्वी काही महिने विस्तारित मार्गाचा डीपीआर तयार होईल. त्यानंतर, राज्य सरकार-केंद्र सरकार अशा मान्यतेचे सर्व सोपस्कार पुन्हा करावे लागतील. त्यात, २०१९मध्ये पुन्हा केंद्रात-राज्यात एकच सरकार आले तर ठीक; अन्यथा पुन्हा विस्तारित मार्गाचा डीपीआर भुयारी की एलिव्हेटेड यामध्ये रखडला जाऊ शकतो. तसे, झाल्यास २०२०-२१मध्ये ३१ किमीची मेट्रो कार्यान्वित झाली, तरी विस्ताराचा निर्णय झाला नसल्यास तेव्हाच्या शहरातील लोकसंख्येसाठी मेट्रोचे मार्ग अपुरेच पडतील.

निगडी-कात्रजचा डीपीआर नाही

राज्य सरकारने यापूर्वीच निगडी आणि कात्रजपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यास मान्यता दिली आहे; पण या मार्गांचा डीपीआर तयार झालेला नाही. त्यामुळे, एका बाजूला मेट्रोचे काम प्रगतीपथावर असतानाच, मेट्रोच्या विस्तारासाठी आत्तापासून नियोजन करायला हवे. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांनीही मेट्रोच्या विस्ताराची मागणी यापूर्वीच पालिका आयुक्तांकडे केली असून, विस्तारीकरणाला गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

राजकीय इच्छाशक्ती हवी

पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी नुकतीच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याशी मेट्रोच्या विस्तारीकरणाबाबत चर्चा केली. नागपूरमध्ये मेट्रोच्या ३८ किमीचे काम सुरू असतानाच, त्याच्या संभाव्य विस्तारीकरणाचे नियोजन केले जात आहे. त्याच धर्तीवर पुण्यातही राजकीय इच्छाशक्ती दाखवून आत्ताच मेट्रोच्या विस्ताराकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटसजवळ डेमू गाडीतून धूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दौंडवरून पुण्याच्या दिशेला निघालेली डेमू गाडी पाटस स्टेशनजवळ पोहोचल्यानंतर अचानकपणे गाडीतून धूर येऊ लागला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली. एप्रिल महिन्यात याच डेमू गाडीतून अचानकपणे जाळ निघाला होता. तर, आता धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये डेमूच्या सेवेबाबत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दौंड स्टेशनवरून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी डेमू गाडी पुण्यासाठी रवाना होते. नोकरदार व विद्यार्थी या गाडीने मोठ्या संख्येने प्रवास करतात. ही गाडी शुक्रवारी सकाळी दौंडवरून निघाल्यानंतर पाटस स्टेशनच्या जवळ पोहोचली असता, गाडीच्या चाकांच्या बाजूने अचानकपणे मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला. डब्यांमध्ये धूर आल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी डब्यामध्ये आपतकलीन परिस्थितीत डेमूच्या चालकाला गाडी थांबविण्याची सूचना करणारी साखळी ओढली. मात्र, त्यानंतरही गाडी थांबविण्यात आली नाही. अखेर प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर ही बाब गेटमनच्या निदर्शनास आली. त्यानंतर आउटरला गाडी उभी करण्यात आली. काही मिनिटांतच धूर बंद झाल्याने गाडी पुण्याच्या दिशेने रवाना करण्यास हरकत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गाडी रवाना झाली. दरम्यान, दौंड-पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल केडगाव स्टेशन येथे स्टेशन मास्टरकडे तक्रार दाखल केली.

दौंड शटलसाठी ठिय्या आंदोलन

दौंडवरून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी आणि पुण्यावरून बारामतीसाठी सायंकाळी पावणेसात वाजता शटलचा जुना रेक सोडण्यात यावा यासाठी दौंड-पुणे रेल्वे प्रवासी संघाने ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने २१ जुलैपर्यंत जुना शटलचा रेक सोडण्यास लेखी मान्यता दिली आहे. दौंड-पुणे रेल्वे प्रवासी संघाने २७ एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे दौंड-पुणे रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी जुन्या शटलच्या दोन फेऱ्या सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव दिला होता. त्यास दोन महिने उलटून गेले, तरी अद्याप कोणतीच दाखल घेतली गेली नव्हती. पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी संघाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. तसेच, २१ जुलै २०१७पर्यंत दौंड-पुणे जुना रेक धावेल असे पत्र त्यांना सुपूर्द केले. संघाचे कार्याध्यक्ष गणेश शिंदे, अय्युब तांबोळी, प्रदीप ससाणे, सुजित कदम, गणेश घटणेकर, प्रशांत काकडे, राहुल तोटे, गणेश खोडवे, दशरथ मगर, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झाडाला पक्षी चोच मारतात तेव्हा...’

$
0
0

पुणे ः ‘खूप आग्रह केल्यानंतर पक्षांना गाणं शिकवण्याचं झाडानं मान्य केलं एकाच अटीवर. तुमच्या गाण्यावरचे आभाळगाण्याचे संस्कार पुसले पाहिजे. झाडाच्या संकुचित हिरवेपणावर चोच मारत पक्षी मग आकाशाकडे झेपावले, झाडाकडे पुन्हा कधीच न येण्यासाठी...’

‘बाहेर कधी अश्रूंना पडताही आले नाही, दु:खाचा धाक असा की रडताही आले नाही. फुंकले कान नियतीने ग्रीष्माचे, मधुमासाचे, फुलताही आले नाही, झडताही आले नाही...’ अशा कविता आणि गझलांच्या रंगात शुक्रवारची सायंकाळ बहारदार झाली. निमित्त होते, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘एक कवी एक कवयित्री’ या काव्यमैफलीचे. ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे व कवयित्री हेमा लेले यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन काव्य प्रकारांची बरसात केली. परिषदेचे कार्यवाह अॅड. प्रमोद आडकर आणि उद्धव कानडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

‘मी प्राणप्रिया केली माया रुसताही आले नाही, मी टाळत होतो तरीही गाठले मला दु:खाने, पळताही आले नाही, आकाश खुणावत होते, पक्षांना उडताही आले नाही...’ या रणदिवे यांनी सादर केलेल्या गझलेला दाद मिळाली. ‘हरिवंशराय बच्चन यांच्या कविता वडील ऐकवत. वडिलांनी बोट धरून कवितेच्या जंगलात नेले आणि कवितेची भेट घडवली. कवितेचा कंटाळा यायला कवीच जबाबदार असतात. कवी भणंग असतात हे चुकीचे चित्र आहे. कवी रसिक असतात, त्यांच्याकडे पैसेही असतात. विक्षिप्त न होताही कवी होता येते,’ असे लेले म्हणाल्या.

‘समीक्षा अडसर’

‘कवितेचा प्रकार कोणताही असो त्यातला माणूस सच्चा असतो. मग कवी, गझलकार असे विभाग का पाडले जातात,’ असा सवाल रमण रणदिवे यांनी केला. सांकेतिक फूटपट्टी लाऊन समीक्षा करणाऱ्यांना कवींनी माफ करावे,’ असा टोला त्यांनी लगावला. ‘कवितेच्या प्रवासात समीक्षा अडसर आहे,’ अशी टीका हेमा लेले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्नल दुरुस्तीसाठी ६६ लाख मंजूर

$
0
0

स्मार्ट सिटीअंतर्गत तरतूद असतानाही पुन्हा खर्च

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटी योजनेतून पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड भागातील सिग्नल यंत्रणेचे सुसूत्रीकरण करून काही भागात नवीन सिग्नल बसविण्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. असे असतानाही पालिकेच्या वाहतूक शाखेने सिग्नल दुरुस्तीसाठी ६६ लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. परिणामी एकाच कामावर दोन वेळा पालिकेचा निधी खर्च होणार आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागाकडून सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी ७० लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रक (इस्टिमेट) तयार करण्यात आले आहे. यासाठी पालिकेकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये न्यूक्लीऑनिक्स ट्रॅफिक सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी ६६ लाख रुपयांत हे काम करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे हे काम या कंपनीला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सिग्नल यंत्रणेचे सुसूत्रीकरण केले जाणार आहे. दोनशे सिग्नलचे सुसूत्रीकरण यामध्ये केले जाणार असून काही ठिकाणी नवीन सिग्नल देखील बसविले जाणार आहेत. यासाठी सर्वसाधारणपणे ३०० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) या कंपनीला हे काम देण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. निविदेत काही त्रुटी आढळल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले नसले, तरी पुढील काही दिवसांत या प्रस्ताव मान्य केला जाणार आहे. याची संपूर्ण माहिती महापालिकेला असतानाही सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली ६६ लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यामागचा उद्देश नक्की का, असा प्रश्न विचारला जात आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हे संचालक आहेत. त्यांना या प्रस्तावाची माहिती असतानाही विनाकारण ६६ लाख रुपयांची उधळपट्टी करण्याचा निर्णय पालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणाच्या फायद्यासाठी घेतला, अशी चर्चा पालिकेत सुरू आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत प्रकल्प

स्मार्ट सिटी योजनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये ३६८ ट्रॅफिक जंक्शनवर आणि रहदारीच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा सुसूत्रीकरणाचा प्रकल्प तीन टप्प्यांत राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २० चौक, दुसऱ्या टप्प्यात ८० चौकांचा समावेश असून अखेरच्या तिसऱ्या टप्प्यात २६८ चौकांचा समावेश असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूररेषेतील बांधकामांचे सर्वेक्षण

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, पुणे
नदीपात्रातील बेकायदा बांधकामे तसेच अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पूररेषेत येत असलेल्या बांधकामांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तयार करण्याचे काम पालिकेने शुक्रवारपासून सुरु केले. दरम्यान, नदीपात्रातील ब्लू लाइनमध्ये (निळी पूररेषा) येत असलेले पत्राशेड काढण्यास या भागातील काही व्यावसायिकांनी सुरुवात केली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत नदीपात्रात झालेल्या बांधकामांचा अहवाल तयार करून त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान असलेल्या डीपी रोडलगतच्या नदीपात्रामध्ये मंगल कार्यालये आणि हॉटेलमालकांनी अतिक्रमण केले असल्याचे यापूर्वी वारंवार समोर आले होते. यावर कारवाई होत नसल्याने काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) दावा दाखल केला होता. यावर निकाल देताना कोर्टाने चार आठवड्याच्या आत याबाबत निर्णय घ्यावा, असे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. एनजीटीने दिलेल्या आदेशाची प्रत पालिकेला मिळाल्याने त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी तसेच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नदीपात्राची पाहणी केली. पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेश बनकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांच्यासह अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते. सकाळपासून दोन्ही विभागांनी पाहणी करत ब्लू लाइनमध्ये करण्यात आलेल्या बांधकामाचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
नदीपात्रालगत सुमारे २३ मिळकती आहेत. त्यापैकी १८ मिळकतदारांनी काही प्रमाणात पत्राशेड, कच्चे बांधकाम तर काही मिळकतदारांनी पक्क्या स्वरूपाचे बांधकाम केले असल्याचे आढळून आले आहे. या सर्व ‌मिळकतींची माहिती गोळा करून त्याचा अहवाल पालिकेच्या वकीलांमार्फत एनजीटीकडे सादर केला जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता बनकर यांनी सांगितले.
पुढील तीन ते चार दिवसांत हा अहवाल तयार होईल, त्यानंतर एनजीटीने दिलेल्या आदेशानुसार कारवाई केली जाणार असल्याचे बनकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालिकेचे अधिकारी पाहणी करण्यासाठी आल्याने काही मिळकतदारांनी ब्लू लाइनमध्ये उभारलेले शेड, बांधकाम काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

पालिका आयुक्तांची घोषणा हवेतच
एनजीटीचे आदेश मिळाल्यानंतर पुढील ४८ तासांत बेकायदा बांधकाम, पत्राशेड यांच्यावर कारवाई करून ती काढून टाकली जातील, अशी घोषणा पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केली होती. मात्र, ही घोषणा कागदावरच राहण्याची शक्यता आहे. नदीपात्रातील बांधकामांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तयार झाल्यानंतरच कारवाई होणार असल्याने यासाठी पुढील तीन ते चार दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यातच पालिकेला दोन दिवस सुट्टी आल्याने आता अहवाल आल्यानंतरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेच्या आरक्षणावर ‘एसआरए’चा घाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पर्वती येथील दीड हेक्टर क्षेत्रावर विकास आराखड्यात गेल्या २० वर्षांपासून प्राथमिक व माध्यमिक शाळेचे आरक्षण असतानाही त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचा (एसआरए) घाट घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेने साडेदहा कोटी रुपये भरून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली असताना हा प्रकार घडलाच कसा, याची चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल यांनी दिले आहेत.
पर्वती येथील तावरे कॉलनीतील सर्व्हे क्रमांक ४७ मध्ये हा आरक्षित भूखंड आहे. या भूखंडावर प्राथमिक-माध्यमिक शाळेचे आरक्षण आहे. हा भूखंड महापालिकेने ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी १५ ऑक्टोबर २०१३ रोजी विशेष भूसंपादन अधिकारी यांच्याकडे १० कोटी ४० लाख २६ हजार रुपये भरण्यात आले आहेत. याठिकाणी शाळा उभारण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.
दरम्यान, या भूखंडावर काही ठिकाणी पक्की घरे असल्याच्या आधारे विकसकाने या ठिकाणी ‘एसआरए’चा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठीचा आराखडा सादर करण्यात आला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त कुमार यांच्याशी संपर्क साधून त्यांना या प्रकाराची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे, असे नगरसेवक आबा बागूल यांनी सांगितले.
महापालिकेने या भूखडांच्या संपादनासाठी सुमारे साडेदहा कोटी रुपये भरले आहेत. या भूखडांवर शाळेचे आरक्षण आहे. असे असताना या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन कसे करण्यात येते, असे प्रश्न बागूल यांनी आयुक्तांपुढे उपस्थित केले होते. त्यावर आयुक्तांनी ‘एसआरए’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलून योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही अहवाल तत्काळ देण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगच्या प्रवेशांपासून वंचित?

$
0
0

पुणे : बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी त्यांना पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लागणार आहे. तोपर्यंत इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने हे विद्यार्थी या प्रक्रियेपासून वंचित राहण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे इंजिनीअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी पालकांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे (डीटीई) केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे पूर्वी दहावी-बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या परीक्षेस बसता येत होते. मात्र, त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जात होते. त्यांचे वर्ष वाचविण्यासाठी दोन वर्षांपासून जुलै महिन्यातच पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला; तसेच ज्यांना पुन्हा परीक्षा देऊन गुणवाढ हवी आहे, अशांसाठीही श्रेणीसुधार परीक्षा म्हणून हाच पर्याय उपलब्ध आहे. जुलै महिन्यात परीक्षा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस त्याचा निकाल जाहीर होतो. मात्र, तोपर्यंत इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगला प्रवेश घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे काही पालकांनी तंत्रशिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. चंद्रशेखर ओक यांना ई-मेल पाठवून या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. ‘आमच्या मुलाने इंजिनीअरिंगची सीईटी दिली असून, त्यात त्याला चांगले गुण आहेत. मात्र, काही कारणांमुळे थोड्या गुणांअभावी तो बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे त्याने पुरवणी परीक्षेचा फॉर्मही भरला आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्टअखेर लागणार आहे. इंजिनीअरिंगची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया मात्र १४ ऑगस्ट रोजीच संपणार आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षेत तो उत्तीर्ण झाला, तरीही त्याला इंजिनीअरिंगला प्रवेश घेता येणार नाही. प्रवेश प्रक्रियेतूनच बाहेर गेल्याने त्याला मॅनेजमेंट कोट्यातूनही प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे त्याचे वर्ष वाया जाण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे आम्ही ही विनंती केली आहे,’ असे एका पालकाने सांगितले.

‘प्रवेश प्रक्रियेच्या मुदतवाढीची मागणी करणार’
‘संपूर्ण देशातील इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया १४ ऑगस्ट रोजी संपवावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने पूर्वीच दिले आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या परवानगीशिवाय प्रक्रियेला मुदतवाढ देणे शक्य नाही. राज्य सरकारतर्फे पुढील आठवड्यात अन्य राज्यांसोबत सुप्रीम कोर्टात इंटरलॉकेटरी अर्ज दाखल करून या इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येणार आहे,’ असे ‘डीटीई’चे प्रभारी संचालक डॉ. चंद्रशेखर ओक यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘प्रवेश प्रक्रियेत ऐन वेळी काही अडचण आल्यास ही प्रक्रिया १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यासाठी अनेक राज्ये या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी करत आहेत. ती मान्य झाल्यास या विद्यार्थ्यांचीही समस्या सुटेल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौरांच्या प्रभागातच अतिक्रमणांचा विळखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रभागातच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमणे झाली असल्याचे समोर आले आहे. या भागात सतत अतिक्रमणे होत असून त्यावर किती वेळा कारवाई करायची, अशा शब्दांत विभागीय अतिक्रमण निरीक्षकांनी आपली हतबलता व्यक्त केल्याने नागरिकांना त्रासदायक ठरणारी अतिक्रमणे दूर होतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
शहराचा मध्यवर्ती पेठांचा भाग अशी ओळख असलेल्या महात्मा फुले मंडई परिसरात गेल्या काही दिवसांपासून पथारी व्यावसा‌यिकांनी रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. या भागात नागरिकांची सतत वर्दळ असल्याने या पथारी व्यावसायिकांचा मोठा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाबरोबरच कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाकडे याबाबत अनेकदा तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मंडई परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना थेट या भागात येता यावे, यासाठी मंडई चौकातील अतिक्रमणे दूर करून येथे बसस्टॉपदेखील उभारण्यात आला आहे. या भागात असलेल्या रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात पथारी व्यावसायिक आपले बस्तान मांडून बसत असल्याने पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
या भागात असलेल्या वाहनतळांच्या बाहेर चारचाकी वाहने तसेच हातगाड्या सर्रासपणे थांबत असतानाही याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण पालिकेकडून घेतले जाते. परिणामी या परिसरात सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खासगी वाहनांबरोबरच पालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्याही चौकातच उभे राहत असल्याचे दिसते. मंडईपासून बेलबाग चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुकान व्यावसायिकांनी दुकानाच्या बाहेरच आपली दुकाने थाटली आहेत. तसेच अनेक पथारी व्यावसायिक रस्त्यावरच बसत असल्याने सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत या भागात वाहतुकीचे तीनतेरा वाजतात. महापौर ‌टिळक यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक हेमंत रासने या भागातून प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याकडेही रस्त्यावर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत तक्रारी करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.

‘माझी ड्युटी संपली आहे’
या भागातील अतिक्रमणामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी तसेच नागरिकांच्या त्रासाबद्दल अतिक्रमण निरीक्षक राजेंद्र लोंढे यांना विचारले असता, कितीवेळा आम्ही कारवाई करायची, असे उत्तर देत माझी ड्युटी संपली असून विनाकारण त्रास देऊ नका, असे स्पष्ट करत उत्तर देणे त्यांनी टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशविरोधींना ताकद दाखवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (अभाविप) सदस्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी आंदोलने न करता विद्यार्थ्यांचे प्रत्यक्षात प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. प्रश्न सोडविताना कोणी देशविरोधी कारवाया करत असल्याचे आढळून आल्यास त्याला ‘अभाविप’ची ताकद दाखवून द्या,’ अशी भूमिका ‘अभाविप’च्या राष्ट्रीय मीडिया संयोजक साकेत बहुगुणा यांनी शुक्रवारी मांडली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महानगर शाखेच्या वतीने छात्रगर्जना कार्यक्रमाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले. या वेळी बहुगुणा बोलत होते. प्रदेश महामंत्री राम सातपुते, माजी महानगर अध्यक्ष प्रा. प्रसाद कोरडे, महानगर मंत्री प्रदीप गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात अभाविपचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत साठ्ये तसेच धनंजय कुलकर्णी, ए. पी. कुलकर्णी पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बहुगुणा म्हणाले, ‘अभाविप ही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणारी विद्यार्थी संघटना आहे. त्यामुळे संघटनेत काम करणाऱ्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी सदैव आग्रही राहण्याची आवश्यकता आहे. जेएनयू विश्वविद्यालय, हैदराबाद विद्यापीठ आदी विद्यापीठांमध्ये इतर संघटनेच्या विद्यार्थ्यांकडून ज्या देशविरोधी कारवाया सुरू आहेत, त्या थांबविण्यासाठी प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. केवळ प्रसिद्धी मिळण्यासाठी आंदोलने करू नका. विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घ्या.’ साठ्ये यांच्या हस्ते बॅडमिंटन खेळाडू पूजा बर्वे हिचा सत्कार करण्यात आला. गावडे यांनी उपक्रमांची माहिती दिली. प्रा. कोरडे यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनराज मानेंवर कारवाई न केल्यास आंदोलन

$
0
0

पुणे : राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांचे निलंबन करण्याचे आदेश शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात दिले. मात्र, अद्याप डॉ. माने त्यांच्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे डॉ. माने यांच्यावर निलंबनाची कारवाई तत्काळ व्हावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) राज्य सरकारला केली आहे. सरकारने तत्काळ कारवाई केली नाही; तर तावडे यांची गाडी अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘अभाविप’चे प्रदेश महामंत्री राम सातपुते यांनी दिला.
अभाविपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सातपुते बोलत होते. अभाविपचे राष्ट्रीय मीडिया संयोजक साकेत बहुगुणा तसेच महानगर मंत्री प्रदीप गावडे उपस्थित होते.
सातपुते म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गैरव्यवहाराप्रकरणी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांचे निलंबन करण्याचे आदेश ६ एप्रिलला दिले. त्याला आता दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, तरीही डॉ. माने हे आपल्या पदावर कार्यरत असून सरकारी निर्णय घेत आहेत. त्यामुळे तावडे यांनी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची आणि शिक्षण क्षेत्राची फसवणूक केली आहे. तावडे यांनी अधिवेशनात निलंबनाची घोषणा केली असल्यास त्याची अंमलबजावणी राज्य सरकार का करत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे डॉ. माने यांना सरकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. अभाविप हा प्रकार अजिबात खपवून घेणार नाही. सरकारने येत्या दोन दिवसांत डॉ. माने यांच्यावर निलंबन कारवाई केली नाही; तर तावडे यांची गाडी अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल.’ बहुगुणा यांनी अभाविपच्या देशात सुरू असणाऱ्या विविध कार्यक्रम व उपक्रमांची माहिती दिली. गावडे यांनी
प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैवऊर्जानिर्मितीत देश अव्वल

$
0
0

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन; कर घटवण्यासाठी प्रयत्नशील

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘यूपीए सरकारच्या काळात मागे पडलेल्या जैव ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रात देशाने पुन्हा आघाडी घेतली आहे. भारत लवकरच या क्षेत्रात जगाला मार्गदर्शन करील,’ असा आशावाद पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी व्यक्त केला. त्याचबरोबर या क्षेत्राला लागू झालेला १८ टक्के जीएसटी कमी करण्यासाठी जीएसटी कौन्सिलकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
खनिज तेल व नैसर्गिक वायू मंत्रालय, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) आणि राष्ट्रीय युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे (एनवायसीएस) आयोजित बायोएनर्जी उत्सव या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन प्रधान यांच्या हस्ते झाले. केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृ​षिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, केंद्र सरकारच्या जैवइंधन कृती समितीचे अध्यक्ष वाय. बी. रामकृष्ण आदी या वेळी उपस्थित होते. नॅशनल युवा को ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले.
यानिमित्त जैवइंधनावर चालणाऱ्या विविध वाहनांची रॅली काढण्यात आली. तसेच या परिसरात जैव इंधनाशी तसेच अपारंपरिक ऊर्जेशी संबंधित विविध प्रकल्प, संशोधन आणि वस्तूंचे प्रदर्शनही आयोजिण्यात आले आहे. ‘देशाने ऊर्जा सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी जैवइंधनाची निर्मिती वाढवणे गरजेचे आहे. जैव ऊर्जा सर्वांना परवडण्यासारखी असल्यामुळे तिच्या वापरावर भर देणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी त्यासाठी चार उद्दिष्टे निश्चित केली आहेत,’असेही प्रधान म्हणाले.
‘इथेनॉलच्या वापरामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल. परिणामी, इंधनाची आयात घटेल, त्यासाठी इथेनॉल वापराबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. देशातील हजारो गोशाळांमध्ये गोबरगॅस यंत्रणा बसविण्यात येईल. त्याद्वारे पाच किलोचे गॅस सिलिंडर भरून गरिबांना वितरण केले जाईल,’ असे गोयल यांनी सांगितले.
‘गावांचा विकास होण्यासाठी शेतीबरोबरच शेतीवर आधारीत जोडधंद्यांवर भर देणे आवश्यक आहे. शेतमालातून होणाऱ्या फायद्यापेक्षा शेतमालाच्या टाकाऊ पदार्थांपासून इंधननिर्मिती केल्यास अधिक फायदा होऊ शकतो. यासाठी शेतकऱ्यांनी धान्याचा पाला-पाचोळा, ऊसाची चिपाडे आदींचा ऊर्जानिर्मितीसाठी उपयोग करावा. केंद्राने राज्यात जैव ऊर्जा प्रकल्प राबविल्यास त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करील,’ असे पाटील म्हणाले.

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९४५मध्ये जैवइंधनाबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती. परंतु, त्यानंतर हा विषय मागे पडला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने पुन्हा या क्षेत्राला दिशा दिली. नंतर कॉँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात सरकारने जैवइंधनक्षेत्राला मरणःप्राय करून सोडले.
पियुष गोयल, केंद्रीय ऊर्जामंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघटनेच्या चौकशीला सामोरा जाणार : खोत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणूनच मी सरकारमध्ये काम करत आहे. राज्यघटनेने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या आधारे मी भूमिका मांडतो. संघटनेच्या २६ प्रश्नांवर मी विचार करत असून, चौकशी समितीला ठामपणे सामोरा जाणार आहे,’ या शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपली भूमिका मांडली. तसेच अशा किती समित्या आल्या आणि गेल्या अशा शब्दात त्यांनी संघटनेच्या नेतृत्त्वावरही निशाणा साधला.
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना खोत यांनी ही भूमिका मांडली.
‘माझी जडणघडण शेतकरी संघटनेतूनच झाली आहे. मी शेतकऱ्यांना विसरलो नाही. तरीही मला संघटनेने नोटीस बजावली आहे. काही वैयक्तिक कारणास्तव मी यापूर्वी संघटनेच्या समितीसमोर हजर राहू शकलो नाही. मात्र, २१ जुलै रोजी मी समितीसमोर उपस्थित राहून सर्व प्रश्नांची उत्तरे देईन,’ असेही खोत यांनी स्पष्ट केले.
या वेळी कृषिमूल्य आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष पाशा पटेलही उपस्थित होते. अजून मी कृषिमूल्य आयोगाच्या कार्यालयात गेलो नाही. परंतु, माझे काम सुरू झाले आहे. आता आंदोलन न करता मी शेतकऱ्यांसाठी शक्य तितके काम करणार आहे, असे पटेल म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या ऑक्टोबरपर्यंत रिंगरोडचे काम सुरू

$
0
0

टीपी स्कीम निश्चित करण्याचे ‘पीएमआरडीए’चे संकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडसाठी ऑक्टोबरपर्यंत पहिली नगररचना योजना (टीपी स्कीम) निश्चित करण्यात येणार असून, दोनशे हेक्टर जागेवर प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे संकेत ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते यांनी शुक्रवारी दिले. दोनशे हेक्टर जागेवरील टीपी स्कीममुळे १५ ते २० टक्के जागा ‘पीएमआरडीए’च्या ताब्यात येणार असून, त्यापैकी निम्म्या जागेवर परवडणाऱ्या घरांची योजना निर्माण होऊ शकते, असा दावा त्यांनी केला.
गित्ते यांच्यासह ‘पीएमआरडीए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच अहमदाबाद येथील रिंगरोडची पाहणी केली. अहमदाबादच्या धर्तीवर टीपी स्कीमद्वारेच रिंगरोडचा विकास करण्यास नुकतीच ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. ‘टीपी स्कीम’ विकसित करण्यासाठी ‘मार्स आणि प्रायमूव्ह इन्फ्रा’ यांची नुकतीच सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ऑक्टोबरपर्यंत पहिली ‘टीपी स्कीम’ तयार करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे गित्ते यांनी सांगितले.
सर्वसाधारण दोनशे हेक्टर जागेवर टीपी स्कीम राबवली जात असल्याचे दिसून येत असून, त्यातून ‘पीएमआरडीए’ला जागा उपलब्ध होणार आहे. त्यापैकी, निम्म्या जागेवर परवडणाऱ्या घरांची योजना निर्माण करता येईल, तर उर्वरित जागेच्या लिलावातून निधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत असून, त्यांच्यासाठी रिंगरोडच्या आसपास घरे निर्माण होऊ शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

प्रा-रूप मंजुरीचे अधिकार
टीपी स्कीम अंतिम करण्यापूर्वी त्याचे प्रा-रूप कसे असेल, याचा आराखडा सध्या राज्य सरकारला सादर करावा लागतो. त्यात बदल करून प्रा-रूप टीपी स्कीमला मंजुरी देण्याचे अधिकार ‘पीएमआरडीए’ला द्यावेत, असा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविला असल्याचे सूतोवाच किरण गित्ते यांनी केले. यामुळे, मंजुरीमध्ये जाणारा प्रशासकीय वेळ कमी होईल, असा दावा त्यांनी केला.

पीएमआरडीएच्या पहिल्या टप्प्यातील रिंगरोडसाठी तीन हजार ६०० कोटी रुपयांचे कर्ज जायकाच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते का, याची चाचपणी सुरू आहे. जायकाच्या अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा झाली असून, लवकरच त्यांना सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात येईल.
किरण गित्ते
आयुक्त, पीएमआरडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोक्यात वीट घालून जिवे मारण्याचा प्रयत्न

$
0
0

मैत्रिणीची ओळख न करून दिल्यावरून हाणामारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेल्यानंतर मैत्रिणीची ओळख करून न दिल्यामुळे तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली.
प्रणव विलास दातार (वय २५, रा. वारजे), अमोघ अजित रानडे (वय २६, सिटी प्राइड कोथरुड) आणि गुरुबिरसिंग धरमबिरसिंग लांबा (वय ३९, रा. निवेदिता टेरेस, वानवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पार्थ रोहित व्यास (वय २१, रा. विमाननगर) या तरुणाने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ व्यास, मित्र शंतनु राय आणि त्यांच्या दोन मैत्रिणी बुधवारी रात्री मुंढवा परिसरातील एका हॉटेलात जेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी प्रणव दातार, अमोघ रानडे आणि गुरुबिरसिंग लांबा हे तिघेही तेथे जेवण्यासाठी आले होते. त्या वेळी दातार पार्थजवळ आला. तुझ्या सहकाऱ्यांची ओळख करून दे, त्या नंतर तुला दारू पाजतो, असे म्हणाला. पार्थने त्याला नकार दिला. त्या नंतर प्रणव जागेवर जाऊन बसला. त्यानंतर तो आणि त्याचे मित्र पार्थ बाहेर पडण्याची वाट पाहत थांबले. गुरुवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास पार्थ आणि त्याचे मित्र-मैत्रिणी बाहेर जाण्यासाठी निघाले. त्यावेळी दातार आणि त्याच्या मित्रांनी मिळून पार्थला हाताने आणि पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात सिमेंट वीटने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पार्थ याच्यावर हॉस्पिटलवर उपचार सुरू आहेत. त्याने मुंढवा पोलिसात तक्रार दिल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) एम. जे. जगताप तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टंकलेखन परीक्षा काळाच्या पडद्याआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य परीक्षा परिषदेकडून गेल्या अनेक वर्षांपासून घेण्यात येणारी मॅन्युअल टायपिंग कोर्स अर्थात टंकलेखन आणि शॉर्टहँडची शेवटची परीक्षा ८ ते १२ ऑगस्टदरम्यान होणार आहे. परीक्षेसाठी राज्यभरातून २ लाख ६ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या परीक्षेनंतर टंकलेखनाचा खडखडाट कायमचा बंद होणार आहे. दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज करूनही सरकार टंकलेखनाचा अभ्यासक्रम बंद करीत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि टायपिंग इन्स्टिट्यूट चालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

मॅन्युअल टायपिंग परीक्षेसाठी १ लाख ९४ हजार ७२० आणि शॉर्टहँसाठी १२ हजार ७० अशा एकूण २,०६, ७८३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. अशी माहिती परीक्षा परिषदेचे सहायक आयुक्त राजेश क्षीरसागर यांनी दिली. परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी धोरणाप्रमाणे कम्प्युटर टायपिंगची परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याचे संस्थाचालकांनी सांगितले. सरकारने नवीन कम्प्युटर टायपिंग अभ्यासक्रमाचा कोर्स अधिकृत टायपिंग इन्स्टिट्यूटला लागू केला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून टंकलेखनाचा अभ्यासक्रम गोरगरीब आणि होतकरू तरुणांसाठी संजीवनी ठरला आहे. दहावी, बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांना हलाखीच्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. अशा वेळी किमान शिक्षण असतानाही व्यवसायाची आणि नोकरीची संधी प्राप्त करून देणारा अभ्यासक्रम म्हणून टंकलेखनाकडे पाहिले जाते. मात्र, कम्प्युटरचे युग आल्याने टंकलेखन अभ्यासक्रमाची अवस्था वाईट झाली. त्यामुळे टंकलेखन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा कम्प्युटरचा अभ्यास करणे क्रमप्राप्त झाले होते. त्यामुळे सरकारने मॅन्युअल टायपिंग यंत्रे आणि कम्प्युटर यांचा योग्य समन्वय ठेवून कम्प्युटर टायपिंग कोर्स अधिकृत टायपिंग संस्थांमद्ये लागू केला आहे. त्यामुळे आता ऑगस्टमध्ये होणारी मॅन्युअल टायपिंग परीक्षा शेवटची ठरणार आहे.

''टंकलेखन परीक्षेसाठी अजूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अर्ज करत असल्याने राज्य सरकारने हा कोर्स सुरू ठेवण्याबाबत पुर्नविचार करावा. कम्प्युटरवर टायपिंग शिकण्यासाठी टंकलेखन उपयुक्त अभ्यासक्रम आहे. सरकारने निर्णय घेतला तर कम्प्युटर आणि टंकलेखन कोर्स असे, दोन्ही कोर्स सुरू राहू शकतात.'' - मोहन कानडे, द न्यू पूना टायपिंग इन्स्टिट्यूट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंजवडी मेट्रोला केंद्राचे साह्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने २० टक्के निधी देण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी कंपनीची निवड अंतिम झाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळणार आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘आर्थिक व्यवहार विभागा’ने (डीईए) या प्रकल्पासाठी २० टक्के खर्च देण्याची तयारी दाखविली असल्याचा दावा ‘पीएमआरडीए’चे आयुक्त आणि विशेष कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी शुक्रवारी केला. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी साडेसात हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यापैकी दीड हजार कोटी रुपये केंद्राकडून उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ‘पीपीपी’ तत्त्वावरील मेट्रोचा अभ्यास करण्यासाठी पीएमआरडीएचे शिष्टमंडळ येत्या सोमवारी हैदराबाद येथील ‘एल अँड टी’च्या मेट्रोला भेट देणार आहे.

हिंजवडी मेट्रोसाठी तीन कंपन्या इच्छुक असून, यापुढील टप्प्यात त्यांच्याकडून आर्थिक निविदा मागविण्यात येतील. निविदांच्या माध्यमातून मेट्रोच्या खर्च उभारणीसाठी त्यांनी केलेली आर्थिक मांडणी अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारपुढे सादर करण्यात येणार आहे. सरकारने त्याला मान्यता दिल्यानंतर केंद्राकडून आर्थिक साह्य मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, असे गित्ते यांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेला चार ते सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित असला, तरी डिसेंबरपूर्वी मेट्रोचे काम सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साधारणतः शंभर एकर जागेचा व्यावसायिक वापर करून ‘पीपीपी’ तत्त्वावरील मेट्रोचा खर्च उभा करता येऊ शकतो. त्यादृष्टीने, माण येथील ५० एकर जागेसंदर्भात सध्या चर्चा सुरू असून, त्यासह शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील आणखी ५० एकर जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल, असे गित्ते म्हणाले.

राज्याचा भार ‘पीएमआरडीए’वर
पीपीपी तत्त्वावरील प्रकल्पासाठी केंद्र सरकारने २० टक्के निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवल्यानंतर राज्य सरकारनेही तेवढाच निधी देण्याची गरज असते. सध्या राज्याच्या तिजोरीवर कर्जमाफीचा बोजा असल्याने हा २० टक्के निधी पीएमआरडीएकडे उपलब्ध असलेल्या जागांच्या विकासातून उभा करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे किरण गित्ते यांनी सांगितले.

खर्च एका दृष्टिक्षेपात...
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो
एकूण खर्च : ७,५०० कोटी रुपये
केंद्राकडून २० टक्के निधी : १,५०० कोटी रुपये
राज्य, पीएमआरडीएचा हिस्सा : २,००० कोटी रुपये
खासगी कंपनीचा स्व-हिस्सा : सुमारे १,३०० कोटी रुपये
खासगी कंपनीकडून उभारण्यात येणारे कर्ज : २,७०० कोटी रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा हजार विद्यार्थ्यांची हजेरी बोगस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये तब्बल दहा हजाराचा फरक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पालिका शाळांच्या संदर्भात शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत ही बाब समोर आली आहे. पटसंख्येनुसार प्रशासनाने ९९ हजार विद्यार्थ्यांची डीबीटी कार्ड तयार केली होती. मात्र प्रत्यक्षात केवळ ८९ हजार विद्यार्थीच असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.

पालिकेचे शिक्षणमंडळ बरखास्त करुन संपूर्ण कारभार आता पालिकेमार्फत चालविला जाणार आहे. यंदाच्या वर्षीपासून प्रशासनाच्या वतीने हा कारभार चालविला जात असल्याने शाळांचा आढावा घेण्यासाठी उपमहापौर धेंडे यांनी बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, शिक्षणमंडळाचे प्रमुख दीपक माळी यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. मंडळाच्या शाळांमध्ये ९९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र या आकडेवारीत तफावत असून प्रत्यक्षात ८९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे स्पष्ट झाल्याचे उपमहापौर धेंडे यांनी सांगितले. शाळांमधील विद्यार्थ्यांचा नक्की आकडा समोर येण्यासाठी यापुढे बायोमॅट्रीक हजेरी करण्यात यावी अशा सुचना प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेचे वतीने सध्या इंग्रजी माध्यमाच्या ५३ प्राथमिक शाळा चालविल्या जातात. आपल्याकडे केवळ तीन इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे शिक्षणासाठी खासगी शाळांमध्ये जावे लागते. विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या अजून माध्यमिक शाळा सुरु करता येतील का यावर विचार करावा याबाबत बैठकीत चर्चा झाली.

महापालिकेच्या शाळांमधील सुमारे अडीच हजार विद्यार्थी हे पीएमपीच्या बसचा वापर करतात. त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद कमी असल्यामुळे त्याचे वर्गीकरण स्थायी समितीच्या माध्यमातून करावेत लागणार आहे. ज्या शाळांमध्ये जुन्या गणवेशाचे वापट करण्यात आले आहे असे गणवेश परत मागविण्यात आले आहेत. पालिका शाळांचा कारभार योग्य पध्दतीने चालावा यासाठी शिक्षण समिती अथवा शिक्षण मंडळ सुरु करावे याबाबात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहणार असल्याचेही धेंडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वेवर प्रवाशाला बेदम मारहाण करून लुटलं

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पिंपरी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला बेदम मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंकज सुनील कदम (वय २७) असे जखमी प्रवाशाचे नाव असून शुक्रवारी रात्री देहूरोड भागात ही दुर्दैवी घटना घडली. पंकज यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला जाण्यासाठी पंकज वाकड येथून स्कॉर्पिओ या खासगी गाडीत बसले. मात्र गाडीचालकासह चार व्यक्तींनी पंकजला धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्याच्याकडून मोबाईल तसेच पैसे काढून घेतले. त्यानंतर पंकजला बेदम मारहाण करून एक्स्प्रेस वेवर सोडून देत त्यांनी पळ काढला. पंकज यांनी तशाच अवस्थेत ४-५ किलोमीटर पायी चालत किवळे गाठलं, आसपासच्या परिसरातील नागरिकांनी जखमी पंकजची अवस्था पाहून त्याला खासगी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान याप्रकरणी देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवडा जेलमध्ये कैद्याकडून कैद्याची हत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला त्यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि एकाच्या जिवावरच बेतला.

दिनेश दबडे (वय ३५) हा हत्येच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तो आणि सुखदेव मेघराज महापूर (वय ४३) स्वयंपाकघरात काम करत होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यावरून चिडलेल्या दिनेशने सुखदेव महापूर याच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यात दगड घातला. यात सुखदेवचा जागीच मृत्यू झाला.

सुखदेव महापूर याला अपहरणाच्या गुन्ह्यात साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मागील सात महिन्यांपासून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. तो आणि दिनेश एकाच बराकीत राहत होते. या हत्येमागे नेमकं काय कारण आहे, याचा तपास तुरुंग अधिकारी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images