Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पीएमआरडीए करणार तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लवासा कॉर्पोरेशनला दिलेला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा राज्य सरकारने डिसेंबर २०१५ पासूनच रद्द केल्याचे स्पष्ट केले असून, त्यानंतर देण्यात आलेल्या सर्व परवानग्यांची फेरतपासणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) केली जाणार आहे. तसेच, लवासाचे कार्यालय आणि कागदपत्रे दस्तावेजही ‘पीएमआरडीए’कडून ताब्यात घेण्यात येणार आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या परिसरासाठी सरकारने ‘पीएमआरडीए’ची स्थापना केली. ‘पीएमआरडीए’ची हद्दवाढ करताना, त्यामध्ये लवासा आणि आसपासच्या सर्व परिसराचा समावेश करण्यात आला होता. लवासामधील बांधकाम परवानग्या आणि पर्यावरणाचे उल्लंघन करून सुरू असलेल्या विकासाविरोधात स्वयंसेवी संस्थांनी आवाज उठविला होता. त्यामुळे लवासाचा नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द करण्याची मागणी केली जात होती. हा दर्जा रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारने मे महिन्यामध्ये केली होती. त्या संदर्भातील अधिकृत आदेश नगरविकास विभागाने नुकतेच काढले आहेत. त्यात पीएमआरडीएची हद्दवाढ अंमलात आल्यापासून म्हणजेच, चार डिसेंबर २०१५ पासून लवासाचे नियोजन प्राधिकरणाचे सर्व अधिकार रद्द झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
लवासाचे नियोजन प्राधिकरणाचे अधिकार डिसेंबर २०१५ पासून रद्द झाल्याने त्यानंतर गेल्या दीड वर्षांत या ठिकाणी कोणकोणते बांधकाम झाले? ते नियमानुसार झाले आहे का? या सगळ्याची फेरतपासणी केली जाणार आहे. संबंधित बांधकामासाठी लवासाला ‘पीएमआरडीए’ची परवानगी घ्यावी लागणार असून, सरकारी नियमांनुसारच बांधकामांना मान्यता मिळणार आहे. लवासाचे सर्व कागदपत्रे/दस्तावेज पीएमआरडीएकडून ताब्यात घेण्यात येतील, असे संकेत पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्याने दिले तिघांना जीवनदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नाशिकच्या ब्रेनडेड तरुणाने त्याचे हृदय, यकृत आणि मूत्रपिंड दान केले असून त्यामुळे तिघांना जीवनदान मिळाले आहे. त्याचे हृदय रुबी हॉल क्लिनिक, यकृत डेक्कनच्या सह्याद्री रुग्णालयात; तर मूत्रपिंड दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अशा तीन ठिकाणच्या रुग्णांवर गुरुवारी प्रत्यारोपित करण्यात आले आहे. रूबीतील २९ वर्षीय तरूणीवर गुरूवारी हृदय प्रत्यारोपण करण्यात आले आहे. नाशिकवरून विमानाने हे हृदय लोहगाव विमानतळावर १ तास ८ मिनिटांत तर तेथून रुबीत केवळ सहा मिनिटांत पोहोचले.
पुण्यातील २९ वर्षीय एमबीए झालेल्या उच्चशिक्षित तरुणीला वयाच्या तिसऱ्या वर्षापासून हृदयाचा ‘कार्डियोमायोपॅथी’ हा आजार होता. तिने हृदय मिळण्यासाठी दीड महिन्यापूर्वी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडे (झेडटीसीसी) नोंदणी केली होती. नाशिकच्या रुग्णाचे हृदय विमानाने लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर रस्त्याने रुबी हॉल क्लिनिकला आणण्यात आले. हे विमान नाशिकवरून सकाळी ११ वाजता निघाले आणि लोहगाव विमानतळावर १२ वाजून ८ मिनिटांनी पोहोचले. त्यानंतर ग्रीन कॉरिडॉरद्वारे केवळ ६ मिनिटांमध्ये ते रुबीत पोचले. दुपारी चार वाजता या तरुणीवर ते यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्यात आल्याची माहिती रुबीच्या अवयव प्रत्यारोपण समितीच्या समन्वयक सुरेखा जोशी यांनी दिली. यकृताच्या आजारामुळे ग्रस्त असलेल्या मुंबईतील ४६ वर्षीय उद्योजक असलेल्या रुग्णाला त्यामुळे जीवदान मिळाले. ही शस्त्रक्रिया लिव्हर ट्रान्स्प्लान्ट सर्जन डॉ. बिपीन विभुते यांच्या पथकाने केली. तर, मूत्रपिंड मंगेशकर रुग्णालयातील ५६ वर्षीय रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नथूसिंह राठोड यांचा सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लष्करप्रमुखांच्या निवडीवरून पंतप्रधान पं. नेहरू यांनाही खडे बोल सुनावण्यास मागे-पुढे न पाहणाऱ्या लेफ्टनंट जनरल नथूसिंह राठोड यांचा पुतळा राजस्थानात बसविण्यात येणार आहे. हा पुतळा साकारण्याचे काम सध्या पुण्यात सुरू आहे. प्रसिद्ध शिल्पकार अभिजित धोंडफळे पहिले लेफ्टनंट जनरल नथूसिंह राठोड यांच्या पुतळ्यावरून अंतिम हात फिरवत आहेत. राजस्थानमधील फतेहगड येथे हा पुतळा बसविण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यानंतर भारताचा लष्करप्रमुख निवडण्यासाठी बैठक आयोजिण्यात आली होती. या बैठकीत भारतीय अधिकाऱ्यांकडे फारसा अनुभव नसल्याचे सांगत पंतप्रधान पं. नेहरू यांनी एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याला लष्करप्रमुख करावे, असा प्रस्ताव मांडला होता. त्याच वेळी एका अधिकाऱ्याने (नथूसिंह राठोड) उभे राहून ‘आपल्याकडे देश चालवायचाही अनुभव नाही, मग आपण एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्यालाच पंतप्रधान करायचे का,’ असा भेदक सवाल केला. त्यानंतर नेहरू यांनीच त्यांना ‘तुमची लष्करप्रमुख व्हायची तयारी आहे का,’ अशी विचारणा केली. ही आयती चालून आलेली संधी नाकारत नथूसिंह यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल करिअप्पा हेच या पदासाठी योग्य आहेत, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवहन महामंडळ बसवणार ‘सीसीटीव्ही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रत्येक आगारात आणि बस स्टँडमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ‘सावध रहा मोहीम’ सुरू केली असून, त्या अंतर्गत एसटी आगार आणि बस स्टँडमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे. लवकरच कॅमेरे बसविण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
राज्यात शहरीभागापासून छोट्यातल्या छोट्या खेड्यापर्यंत एसटीकडून प्रवासी सेवा दिली जाते. त्यामुळे एसटीच्या स्टँडवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन काही लोक चोरी, महिलांशी छेडछाड, फसवणूक असे प्रकार घडतात. त्यामुळे एसटीचा प्रवास सुरक्षित असला, तरी एसटी स्टँडवर सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ‘सावध राहा मोहीम’ सुरू केली आहे. रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल, परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम आदी
या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भांडारकर’मध्ये संशोधकांची वानवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाभारत आणि संस्कृतीचे संशोधन करणारी संस्था अशी ख्याती असलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरावर शंभरी पार करताना संशोधक शोधण्याची वेळ आली आहे. ‘संस्कृतीचा गाढा अभ्यास करणाऱ्या संशोधकांची खाण’ असे भांडारकर संस्थेबद्दल बोलले जाते; मात्र देशात संशोधकच उरले नसल्याने आंतरराष्ट्रीय संशोधकांची मदत घेऊन संशोधनाचे अवघड काम तसेच विविध प्रकल्प यापुढे केले जाणार आहेत.
भांडारकर संस्थेने गुरुवारी शंभर वर्षे पूर्ण केली. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ही बाब समोर आली. या वेळी बोलताना संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक आणि संस्थेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी संशोधकांबाबत खंत व्यक्त केली. संस्थेच्या नवीन कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
‘संस्कृत, पाली, प्राकृत या अभिजात भाषा तसेच वैदिक, बौद्ध, जैन व हिंदू या धर्मांचा अत्यंत सजगतेने अभ्यास होत होता. या अभ्यासाला आता उतरती कळा लागली आहे,’ असे टीकास्त्र बहुलकर यांनी सोडले. ‘सर्व संस्कृतींचा अभ्यास होणे आवश्यक आहे. भारतात असा अभ्यास करणारे संशोधक उपलब्ध नसल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधकांना बरोबर घेऊन हे काम यापुढील काळात पुढे नेले जाईल,’ अशी माहिती त्यांनी दिली.
डॉ. रा. ना. दांडेकर, विष्णू सीताराम सुखठणकर, श्रीपाद बेलवलकर, भारतरत्न पा. वा. काणे, दत्तो वामन पोतदार असे अनेक दिग्गज संशोधक गेल्या शंभर वर्षांत भांडारकर संस्थेत होऊन गेले. याच संस्थेला शंभर वर्षांनंतर संशोधकांची कमतरता जाणवू लागली आहे. पौर्वात्य संस्कृतीचा अभ्यास करणारे संशोधक घडत नसल्याने तसेच संस्कृती संशोधनाच्या पातळीवर उदासीनता असल्याने संशोधक मिळत नसल्याचे बोलले जात आहे. भांडारकर संस्थेत सध्या संशोधक येतात, मात्र त्यांचे प्रमाण कमी आहे. यामध्ये तरुणांचेही प्रमाण कमीच आहे. अनेक वर्षांपासून संस्थेशी जोडल्या गेलेल्या व्यक्ती चिकाटीने संशोधनाचे काम करत आहेत. काही परदेशी संशोधकही संस्थेत येत असतात.

शताब्दी समारोप बैठकांनी
अभ्यासक आणि थोर समाजसेवक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि हितचिंतकांनी ६ जुलै १९१७ रोजी भांडारकर संस्था स्थापन केली. गेल्या वर्षी शताब्दी वर्षाच्या सुरुवातीला देखणी जुनी इमारत नयनरम्य विद्युत रोषणाईने उजळून निघाली होती. गुरुवारी शंभर वर्षे पूर्ण होताना मात्र तसे कोणतेच वातावरण संस्थेत नव्हते. पदाधिकाऱ्यांच्या बैठकांनीच समारोप करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शताब्दीचा समारोप करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी संस्थेत यावे यासाठी यापुढील काळात प्रयत्न करण्यात येतील, असे सदस्यांनी सांगितले. शताब्दीनिमित्त संस्थेने हजारो दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेन, ई-ग्रंथालय, आभासी संग्रहालय, आधुनिक सभागृह असे विविध उपक्रम व प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात दाखवलेली पहिली फिल्म पुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशात पहिल्यांदा फिल्म दाखवली ती तारीख होती ७ जुलै १८९६. आज, शुक्रवारी या घटनेला बरोबर १२१ वर्षे पूर्ण होत आहेत. १२१ वर्षांपूर्वी सहा फिल्म दाखविण्यात आल्या आणि या माध्यमाची भारताला ओळख झाली. पडद्यावर हलते चित्र पाहणे हा अनुभव तेव्हाच्या भारतीयांसाठी एक चमत्कारच होता. हा चमत्कार घडला कसा, कोणत्या फिल्ममुळे हे शक्य झाले, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या... असा हा रंजक प्रवास चित्रपटप्रेमींना अनुभवता येणार आहे. चित्रपट व इतिहासप्रेमी, संस्कृतीचे अभ्यासक अशा सर्वांसाठी ही संधी कलासंपन्नतेचा अनुभव देणारी ठरणार आहे.

देशात फिल्मचे प्रदर्शन होण्याच्या घटनेला १२१ वर्षे होत असल्यानिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने एक खास कार्यक्रम उद्या, शनिवारी आयोजिला आहे. संग्रहालयाच्या थिएटरमध्ये सायंकाळी पाच वाजता दुर्मिळ फिल्म दाखविल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे ज्या फिल्मने देशात चित्रपटाचे युग अवतरले, ती फिल्मही दाखविली जाणार आहे. दुर्मिळ फिल्म पाहण्याची ही तितकीच दुर्मिळ संधी असेल.

‘फिल्म दाखवायला सुरुवात झाल्याचा दिवस साजरा करण्याचा हा प्रयत्न आहे. पुनर्प्रत्ययाचा आनंद यामधून घेता येईल. लुमिअर्स ब्रदर्स यांनी काढलेली फिल्म जगात पहिल्यांदा पॅरिस येथे दाखविण्यात आली, ती तारीख होती २८ डिसेंबर १९८५. यानंतर अवघ्या सहाच महिन्यांत मुंबईमधील व्हॅटसन हॉटेलमध्ये ही फिल्म दाखवली गेली. फिल्ममधील धावती रेल्वे पाहून लोक रडले होते आणि पळत सुटले होते कारण ती अंगावर येईल, असे लोकांना वाटले होते, असा पॅरिसमधील प्रसंग सांगितला जातो. अशा अनेक फिल्म या दिवशी दाखविणार असून काही ३५ एमएम प्रकारामध्ये असतील,’ असे संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ‘मटा’ला सांगितले.
पहिली फिल्म दाखविण्यासाठी केलेल्या जाहिरातीचे कात्रण उपलब्ध असून फिल्मसाठी एक रुपया प्रवेशशुल्क आकारण्यात आले होते.

''तिसरा दिल्ली दरबार १९११ साली कोरोनेशन पार्क दिल्ली येथे भरला होता. किंग जॉर्ज व क्वीन मेरी उपस्थित होते. या दरबारामध्ये कोलकाताऐवजी दिल्ली राजधानी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चार्ल्स अर्बन यांनी या सोहळ्याचे केलेले चित्रीकरण लंडन येथे १२ फेब्रुवारी १९१२ रोजी दाखविण्यात आले होते. इटलीतील बलोनिया येथील संग्रहालयाकडून ही पाच मिनिटांची फिल्म आपल्याला मिळाली आहे. ती या निमित्ताने दाखविण्यात येणार आहे.'' - प्रकाश मगदूम, संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जठार यांच्यावर गुन्हा दाखल करा

$
0
0

बनावट जातीचा दाखला प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

महापालिकेच्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर कळस धानोरी या प्रभाग क्रमांक एकमधून विजयी झालेल्या नगरसेविका किरण जठार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी दिला आहे. राज्य निवडणूक आयोगानेही याची चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोगाला द्यावा, अशा सूचना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना पत्र पाठवून केली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधील अ गटातून (अनुसूचित जाती) या आरक्षित जागेवर किरण जठार यांनी निवडणूक लढवली. निवडणुकीचा अर्ज दाखल करताना त्यांनी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कार्यालयाकडून जातीचा दाखला मिळविला होता. हा दाखला मिळविण्यासाठी सादर केलेल्या अर्जासोबत त्यांनी १९५० पूर्वीचा जातीचा पुरावा म्हणून आजोबा लक्ष्मण गंगाराम कसबे यांचा पुणे महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेचा दाखला जोडला होता. या जातीच्या दाखल्याची आधारे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर केला आहे.
हा दाखला बनावट असल्याची तक्रार हुलगेश चलवादी, दिलीप ओरपे आणि रेणुका चलवादी यांनी जिल्हा प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडे केली होती. दक्षता समितीने नेताजी शाळेतील शाळा सोडल्याचे रजिस्टर तपासणी केले असता, अशी कोणतीही नोंद असल्याचे आढळून आले. तसे पत्र शाळेकडून तक्रारदार चलवादी यांनाही देण्यात आले. त्यामुळे जठार यांनी खोटी कागदपत्रे सादर केल्या प्रकरणी जठार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी मोरे यांनी तहसील कार्यालयाला दिले असून ही बाब पालिकेला कळविली आहे.
...
उपजिल्हाधिकारी अथवा संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून बनावट जातीचा दाखला सादर केल्याप्रकरणी कोणतीही नोटीस किंवा पत्र मिळालेले नाही. त्यामुळे या विषयावर काहीही बोलणार नाही.
किरण जठार, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवसृष्टीसाठी पालिकेची सभा बोलवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड येथील नियोजित शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यासाठी मेट्रो प्रकल्पाची अडचण येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकल्प तत्काळ मार्गी लावण्यासाठी पालिकेची खास सर्वसाधारण घेण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे दिला आहे.
राज्य सरकार आणि पालिका प्रशासन नियोजित शिवसृष्टी प्रकल्पाच्या उभारणीत वेळकाढूपणा करत आहे. शिवसृष्टी उभी करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोध नाही. मुंबईत शिवस्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच धर्तीवर छोटे शिवस्मारक पुण्यात व्हावे, अशी पूर्वीपासून मागणी आहे. त्यासाठी पालिकेत ठरावही झाले आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीला गती येण्यासाठी आम्ही खास सर्वसाधारणसभेची मागणी केली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी सांगितले.
खास सभेच्या मागणीसाठी स्थायी समितीतील विरोधी पक्षाच्या चारही सदस्यांनी लेखी मागणी केली आहे. तसे पत्र महापौरांना देण्यात आले आहे. महापौरांनी पुढील पंधरा दिवसांत ही सभा घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली. कोथरूड येथील कचरा डेपोच्या २८ एकर पाच गुंठे या जागेत शिवसृष्टी उभारण्याची संकल्पना आहे. या ठिकाणी भूमिगत मेट्रो स्टेशन झाल्यास त्याचा फायदा पर्यटकांना होईल. याबाबत राज्य सरकार आणि महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसृष्टी उभारण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला आहे. मात्र, त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही, असे मानकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देसाई दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भूमाता रणरागिणी ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आणि त्यांचे पती प्रशांत देसाई यांच्या विरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी तसेच लूटमार आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मारहाण करून सोनसाखळी तसेच पैसे काढून घेऊन जातीवाचक उल्लेख केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

विजय अण्णा मकासरे (३३, रा. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. मकासरे यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. परंतु, हा प्रकार हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण हिंजवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२७ जून) सकाळी साडेअकरा वाजता बालेवाडी येथील व्हीनस ग्रॅनाइटजवळ मकासरे आपल्या होंडा अमेज गाडीतून तृप्ती देसाई यांच्या सोबत जात होते. तेव्हा प्रशांत देसाई, सतीश देसाई, कांतीलाल गवारे आणि इतर दोघांनी आपली गाडी मकासरे यांच्या गाडीसमोर आणली. या वेळी तृप्ती देसाई यांनी मकासरे यांच्या मोबाइलमध्ये सार्व काही रेकॉर्ड असून, तो मोबाइल घेण्याची सूचना वरील पाच जणांना केली. त्यांचे ऐकून प्रशांत देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मकासरे यांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली.

प्रशांत देसाई यांनी आपल्या गळ्यातील सव्वा तोळ्याची सोन्याची साखळी आणि २७ हजार रुपये काढून घेतले, त्यासाठी त्यांना तृप्ती देसाई यांनी मदत केली. तसेच, आमच्याविरोधात गेल्यास तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करीन अशी धमकीही श्रीमती देसाई यांनी दिली. त्यानंतर जातीवाचक शब्दांचा उल्लेख केला, असा आरोप मकासरे यांनी केला आहे. मकासरे यांच्या फिर्यादीवरून जातीवाचक उल्लेख, मारहाण, रस्ता आडवणे, लूटमार आदी स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी सहायक आयुक्त विक्रांत पाटील तपास करीत आहेत.

''मकासरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तृप्ती देसाई, त्यांचे पती प्रशांत देसाई व इतरांवर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. गुन्ह्यांची तीव्रता पाहता तपासासाठी सर्व आरोपींना अटक करण्याची तजवीज करण्यात आली आहे.'' - गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त

''आमच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही. आमच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले आहे. जेथे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे, त्या हिंजवडीत गुन्हा दाखल न करता चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, हा प्रकार संशयास्पद आहे. हा आरोप म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर असून, पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद वाटत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. तसेच फिर्यादीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत.'' - तृप्ती देसाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोलाची कढी बोलाचाच भात

$
0
0

अतिक्रमण कारवाईची गर्जना हवेतच विरली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची पालिका प्रशासनाची गर्जना हवेतच विरली आहे. जंगली महाराज रस्त्यावरील अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करून फूटपाथ व्यापल्याने पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश पथारी व्यावसायिकांनी रस्त्यावरच दुकान थाटल्याने वाहनांना ये-जा करण्यासाठी कमी रस्ता शिल्लक राहत आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी या रस्त्यावर वाहतुकीचे तीन-तेरा वाजल्याचे दिसून येत आहे.
पालिकेच्या मुख्य इमारतीपासून अवघ्या काही अंतरावर सर्व नियमांना छेद देऊन सर्रास अतिक्रमणे होत असल्याने अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षमतेविषयी शंका निर्माण होत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराला स्मार्ट बनविण्यासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार विशेष प्रयत्नशील आहेत. शहर सुंदर व्हावे, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. फूटपाथवर तसेच बेकायदा पद्धतीने व्यावसायिकांनी केलेली बांधकामे, पत्रा शेड, होर्डिंग यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी यापूर्वीच संबंधित विभागांना दिले आहेत. मात्र, त्यांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.
जंगली महाराज मंदिरासमोर असलेल्या मोबाइल दुकानदारांबरोबरच बहुतांश दुकानदारांनी अतिक्रमण करून फूटपाथ बळकावला आहे. या चौकात अनेक खाद्यपदार्थांच्या हातगाड्या असल्याने नागरिकांची मोठी गर्दी होते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबरच नोकरदार मंडळीही परिसरात राहत असल्याने सकाळी आणि संध्याकाळी गर्दी होते. त्यातच बहुतांश नागरिक रस्त्याच्या कडेलाच गाड्या उभ्या करतात. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. वाढत्या अतिक्रमणांबाबत अनेकदा पालिकेकडे तक्रार करुनही कारवाई होत नाही. याबाबत अतिक्रमण विभागाच्या प्रमुख संध्या गागरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकतला नाही.

अतिक्रमण खाते आरंभशूर
पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दोन दिवसांपूर्वी नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन कॉलेज रोड) दुकानदारांनी साइड मार्जिन, फ्रंट मा‌र्जिनमध्ये उभारलेल्या पत्राशेड तसेच फूटपाथवर थाटलेल्या दुकानांवर कारवाई करून आपली पाठ थोपटून घेतली. मात्र अतिक्रमणाची गाडी पुढे गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच पुन्हा दुकाने थाटण्यात आली. अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांना ‘अर्थपूर्ण’ मदत होत असल्याने या रस्त्यावरील अनेक मोठ्या हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड कोटींचे दागिने लंपास

$
0
0

लोणावळा : लोणावळ्याजवळील वलवण गावच्या हद्दीतील बस थांब्यावर थांबलेल्या खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या हैदराबाद येथील सराफ व्यापाऱ्याची सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग दोन चोरट्यांनी पळवल्याची घटना बुधवारी (५ जुलै) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. पंकजकुमार मनसाराम कुमार गुप्ता (वय-३६, रा. श्रीनगर कॉलनी हैदराबाद, तेलंगणा) यांनी या प्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. महंमद युसूफ खलिद (वय ४७), गोविंद पुरुषोत्तम आगरवाल (वय ४१, दोघेही रा. हैदराबाद) अशी चोरट्यांची नावे असून, त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजकुमार दोन कामगारांसह बुधवारी ऑरेंज कंपनीच्या बसमधून १ कोटी ६० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन मुंबईला जात होते. दरम्यान, वलवण येथील हॉटेल एन एच૪ येथे चहापानासाठी थांबले असता चोरट्यांनी त्यांची बॅग पळवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटिसा दिल्याने आत्महत्येचा इशारा

$
0
0

चाकण परिसरातील शेतकरी संतप्त; जमीन ताब्यात घेणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चाकण परिसरातील सहा गावांमधील जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळासाठी​ (एमआयडीसी) ताब्यात घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्याने बाधितांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दिला असून, जमिनी ताब्यात घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे योगेश पांडे, रामशेठ गोरे, पांडुरंग केदारी, सुदाम काचोले, संतोष परदेशी, अनिल देशमुख, बाळासाहेब पडवळ, वारकु पडवळ, बाबासाहेब पवार, दिनेश मोहिते, बाळासाहेब मोहिते आदी उपस्थित होते.
चाकण परिसरातील आंबेठाण, वाकी खूर्द, रोहकल, गोनवडी, बिरदवाडी आणि बोरदरा या गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी ‘एमआयडीसी’ आणि कॅनॉलसाठी संपादन करण्याबाबत नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. या जमिनींवर २००२ मध्ये शिक्के मारण्यात आले आहेत. मात्र, अद्याप जागा ताब्यात घेण्यात आलेली नाही. मात्र, चार जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी जिल्हा प्रशासनाने जमिनी ताब्यात देण्याबाबत नोटिसा बजावल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. हे शिक्के उठविण्याची एकमुखी मागणी या वेळी करण्यात आली.
सक्तीने भूसंपादन केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा या वेळी शेतकऱ्यांनी दिला. फास घेण्यासाठी आणलेले दोर राव यांना दाखविण्यात आले. ‘या शेतकऱ्यांच्या जमिनींवर शिक्के मारण्यात आले आहेत. त्यामुळे जमिनीच्या वापरापासून शेतकरी वंचित आहेत. पाच वर्षे झाल्याने शेतकऱ्यांच्या सातबारावरील शिक्के पुसून टाकावेत,’ असे पांडे म्हणाले. ‘बिरदवडी येथे सुमारे ७० लाख रुपये हेक्टर, रोहकल येथे ८५ लाख रुपये हेक्टर, आंबेठान येथे ८५ लाख रुपये हेक्टर, वाकी खुर्द येथे ९५ लाख रुपये हेक्टर, गुनवडी येथे एक कोटी रुपये हेक्टर आणि चाकण येथे एक कोटी हेक्टर असा दर शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास विरोध आहे,’ असेही पांडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या फेरीत दहा हजार प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात व्यवस्थापन, संस्था अंतर्गत, अल्पसंख्याक आणि बायफोकल आदी कोट्यांतर्गत १०,२३१ विद्यार्थ्यांनी कॉलेजांमध्ये प्रवेश घेतला. अकरावीच्या कोट्यांतर्गत प्रवेशाची पहिली फेरी गुरुवारी पार पडली. यामध्ये २१, ७४१ जागा रिक्त राहिल्या. मात्र, त्यापैकी नामवंत कॉलेजांनी किती जागा केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीला प्रत्यार्पण केल्या, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ज्युनियर कॉलेजांमध्ये ऑनलाइन अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राबविली जात आहे. यंदा अकरावीसाठी २६७ महाविद्यालयांच्या एकूण ९६, ८२० प्रवेश जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी काही जागा व्यवस्थापन, संस्था अंतर्गत, अल्पसंख्याक आणि बायफोकल या कोट्यासाठी राखीव ठेवल्या जातात. अकरावीच्या पहिल्या फेरीला सुरुवात करण्यापूर्वी कोट्यांतर्गत प्रवेशाची प्रक्रिया राबविली गेली. एकूण २६७ कॉलेजांमध्ये व्यवस्थापन कोटयांतर्गत ४,५७० जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी ९११ जागा भरल्या गेल्या. संस्था अंतर्गत प्रवेशासाठी १४,४५४ जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी ६, ९९६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. अल्पसंख्याक कोट्यांतर्गत ४, ८९६ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २,२१६ जागा भरण्यात आल्या आहेत.
बायफोकलअंतर्गत ७ हजार ८८१ जागा उपलब्ध होत्या त्यापैकी १०८ भरल्या गेल्या. चारही कोट्यातील मिळून एकूण २१ हजार ७४१ जागा रिक्त राहिल्या आहेत. दरम्यान,कोट्यांतर्गत १७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर लगेच रद्द केले जातील.
अकरावी केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी १० जुलै रोजी जाहीर होणार आहे. या गुणवत्ता यादीकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुण वाढविण्यासाठी पालकांची पळापळ

$
0
0

Prasad.Panse@timesgroup.com
Tweet : @PrasadPanseMT

पुणे : साहेब फक्त तीन गुणांचाच प्रश्न आहे, तरच तो इंजिनीअरिंगला प्रवेश घेऊ शकेल...पीसीएममध्ये फक्त एक टक्का वाढला तरी, आमची मुलगी पुढे जाऊ शकते. गुणपडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनातही गुण वाढले नाहीत.. आता काय करायचे... असे प्रश्न घेऊन काही उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित पालक राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे उंबरठे झिजवत आहेत.

दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेतील काही अर्ज अजून प्रलंबित आहेत. काही विद्यार्थ्यांनाच उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मिळाल्या आहेत तसेच. त्यांची गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. काहींच्याच गुणांमध्ये बदल झाला आहे. ज्यांच्या गुणांमध्ये बदल झालेला नाही, असे विद्यार्थी व पालक बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेत आहेत.

‘नियमांनुसार अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणपडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. त्या दरम्यान परीक्षकांची चूक झाल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्यात आले आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईलच. गुणपडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनानंतरही ज्यांच्या गुणात काही फरक पडलेला नाही, त्यांना तसे कळविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना मिळालेल्या गुणपत्रिकेवरील गुणच अंतिम राहणार आहेत. त्यानुसारच त्यांना प्रवेश घ्यावा लागेल. तरीही काही पालक किंवा विद्यार्थी गुण वाढवून देण्यासंबंधी मागणी करत आहेत. त्यांची समजूत काढून त्यांना परत पाठवावे लागते,’ असे मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष व सचिव बी. के. दहिफळे यांनी सांगितले.

काही उच्चविद्याविभूषित आणि प्रतिष्ठित व्यावसायिक पालकही भेटून गाऱ्हाणे घालत आहेत. आमच्या मुलाची चूक झाली. दोनच गुण त्याला कमी पडत आहेत. पीसीएममधले दोन गुण वाढले तर, तो पुढे शिकून डॉक्टर होऊ शकेल. पुनर्मूल्यांकनानंतर गुण वाढत नाहीत, आता काय करायचे, असे प्रश्न पालक विचारत आहेत.

‘पालकांचा दुराग्रह चुकीचा’

’पालकांकडून विशिष्ट अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांवर सक्ती करण्यात येत असण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यार्थी त्यासाठी आवश्यक किमान गुणच मिळवू शकत नसेल, तर पालकांनी दुराग्रह धरणे चुकीचे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांचा कल जाणून घेऊनच योग्य त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा निर्णय घ्यावा,’ असेही दहिफळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी

$
0
0

गॅस शवदाहिनी भ्रष्टाचार प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
गॅस शवदाहिनी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांच्यासह चार अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेने पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपरी वाघेरे, वाकड आणि दापोडी या ठिकाणच्या स्मशानभूमींसाठी पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर प्रशासनाने चौकशीसाठी सहआयुक्त दिलीप गावडे, मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि उपशहर अभियंता आयुबखान पठाण यांची त्रिसदस्यीय समिती गठीत केली. या समितीने ४०४ पानांचा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. त्यावरून तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले. तसेच अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

त्यांच्या खुलाशानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, उपअभियंता मनोहर जावरानी, कनिष्ठ अभियंता विकास घारे, लेखाधिकारी किशोर शिंगे आणि उपलेखापाल उषा थोरात यांच्याबाबत खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करात सूट देऊनही बारामतीकर उदासीन

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, बारामती
पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर (रेन वॉटर हार्वेस्टिंग) होण्यासाठी नगरपालिकेने जाहीर केलेल्या योजनेला नागरिकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. प्रोत्साहनात्मक बाब म्हणून मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय होऊनही बारामतीकर पाणी पुनर्वापराबाबत उदासीन असल्याचे दिसून आले. मात्र, त्याबाबत जनजागृती करण्यास प्रशासनच कमी पडल्याची कबुली प्रशासनाने ‘मटा’ला दिली.
आगामी काळातील नियोजन करण्यासाठी आता प्रत्येक नागरिकाने पावसाळ्यापूर्वी आपल्या घराच्या छतावर पडलेले पावसाचे पाणी वाहून नदी-नाल्यावाटे वाहून जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. पाण्याच्या बचतीसाठी शहरातील इमारती आणि बंगलेधारकांनी पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने फक्त कागदावरच केल्याने बारामतीकरांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. पावसाच्या पाण्याच्या पुनर्वापरासाठी पालिकेने दोन वर्षे आवाहन करूनही त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शहरातील नवीन बांधकामांसाठी ही यंत्रणा सक्तीची करण्यात आली नसल्याची माहिती नुकतीच समोर आली. मात्र, राज्य सरकारने नगरपालिका अधिनियम १९६५ कलम १२७ ‘ब’ नुसार शहरातील इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले असल्याचे ‘मटा’च्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.


नगरपालिकेच्या जनहिताच्या सर्व योजनांबाबत जनजागृती होण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी केला जाणारा खर्च, हा खर्च नसून ती भविष्यकाळाची गुंतवणूकच आहे.
- मंगेश चितळे,
मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका बारामती

तीस वर्षांपूर्वी आमच्या घराला रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतले आहे. प्रत्येक वर्षी भर उन्हाळ्यात परिसरात सर्व कुपनलिका कोरड्या पडतात; मात्र आमच्या (बोरवेलला) कुपनलिकेला ५० फुटावर पाणी असते. जलपुनर्भरण गरजेचे असल्याचे प्रखरपणे दिसून आले.
- अॅड. शिरीष कुलकर्णी, अशोकनगर, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजपुरवठा नसल्याने तळेगाव पाण्याविना

$
0
0

महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांनी काळे फासले

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
सोमाटणे पंप हाउसवरील वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून तळेगावकरांना पाणीप्रश्न भेडसावत आहे. त्याबद्दल वारंवार विनंती, तसेच तक्रारी करूनही महावितरण कंपनीचे अधिकारी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी निषेध मोर्चा काढून महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले.

वीज पुरवठा पुढील दोन दिवसांत पूर्ववत केला नाही, तर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा तळेगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी दिला आहे.

उपनगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा समितीचे सभापती सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि जनसेवा विकास समितीने आयोजित केलेल्या मोर्चामध्ये भाजपचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, सत्तारूढ पक्षनेते सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेविका शोभा भेगडे, मंगल जाधव, काजल गटे, नीता काळोखे, रजनी ठाकूर, अनिता पवार, नगरसेवक संदीप शेळके, अरुण भेगडे, अमोल शेटे, संग्राम काकडे, अजय भेगडे, अशुतोष हेंद्रे, अरुण भेगडे, तसेच भाजप आणि जनसेवा विकास समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडांच्या पानांवर कवितांचे दवबिंदू…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘कौतुक झाडांचं करावं, ती पाखरांसारखी नंतर उडून जात नाहीत, तुमच्यासाठी फक्त एक निरभ्र आकाश ठेवून...’ ही कविता सादर झाली ती बंदिस्त सभागृहात नव्हे, तर झाडांच्या सहवासात. लेखक, कवी, कलावंत यांनी झाडे लावली, हाताला मातीचा सुगंध आला आणि झाडे, पाऊस यांवरच्या कवितांचे एक-एक शब्द शुक्रवारी झाडांच्या पानांवरील दवबिंदू झाले.

कलेच्या माध्यमातून कोणताही संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवता येतो, या विचारातून वृक्षारोपण आणि पाऊस व वृक्ष यावर आधारित कविसंमेलन असा भन्नाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी वसुंधरा वाचनालयातर्फे चित्तरंजन वाटिका, मॉडेल कॉलनी येथे हा उपक्रम आयोजिला होता. भल्या सकाळी अनेक मंडळींनी या अभिनव उपक्रमामध्ये सहभागी होऊन वृक्षारोपण केले आणि कविता सादर केल्या. डॉ. अनिल अवचट, डॉ. अरुणा ढेरे, प्रदीप निफाडकर, ज्योत्स्ना चांदगुडे, मनोहर सोनवणे, धनंजय तडवळकर, विश्वास वसेकर, भाग्यश्री देसाई, बंडा जोशी, वैशाली मोहिते, प्रभा सोनवणे, संगीता बर्वे असे कवी, लेखक, कलावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. नगरसेविका स्वाती लोखंडे, नीलिमा खाडे उपस्थित होते. या वेळी लावण्यात आलेल्या झाडांना गदिमा, विंदा, मर्ढेकर, साहिर, कैफी व दुष्यंतकुमार अशा थोर कलावंतांची नावे देण्यात आली. या कार्यक्रमातून राज्याच्या वन महोत्सवाचा सांगता दिन साजरा करण्यात आला.

दुसऱ्या कवीची कविता

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कवीने दुसऱ्या मोठ्या कवीची कविता वाचली. कौतुक झाडांचं करावं, ही द. भा. धामणस्कर यांची कविता निफाडकर यांनी सादर केली. कोंफले फिर फूट आयी शांख पर, कहना उसे, वो न समझा है, न समझेगा, मगर कहना उसे... फरहत शहजाद यांचे असे शेर, गझला, कविता यामधून ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. ना. घ. देशपांडे, पु. शि. रेगे, ग्रेस या ख्यातनाम कवींच्या कविता सादर झाल्या. वृक्षांनी भरलेल्या चित्तरंजन वाटिकेत कवितांची गर्दी यानिमित्ताने अनुभवता आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीतील छुपी बेकारी देशासाठी घातक : पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

‘सध्या शेतीचे क्षेत्र कमी होऊन अनेक शेतकरी अल्पभूधारक बनले आहेत. त्यामुळे भविष्याचा विचार करून शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीव्यतिरिक्त अन्य व्यवसायाच्या संधी शोधल्या पाहिजेत. शेतीतील छुपी बेकारी घातक आहे,’ असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे येथील मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा, तसेच मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचा २१वा वर्धापन दिन कार्यक्रम शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी ते बोलत होते. माजी खासदार नानासाहेब उर्फ विदुरा नवले, माजी विधानसभा सभापती दिलीप वळसे पाटील, मदन बाफना, जालिंदर कामठे, आमदार बाळा भेगडे, माजी आमदार कृष्णाराव भेगडे, दिगंबर भेगडे, वसंत खांडगे, चंद्रकांत सातकर, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे, संतोष खांडगे आदी उपस्थित होते.

‘तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी कंपनी बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. तळेगाव दाभाडे मिसाइल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नसल्याने अस्वस्थता आहे. या प्रश्नी शरद पवार यांनी यामध्ये केंद्र पातळीवर लक्ष घालून सहकार्य करावे,’ अशी विनंती बाळा भेगडे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जादुई’ चित्रकलेची विद्यार्थिनींना सफर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅनव्हासवरच्या रेघा आणि त्यामध्ये केलेली मुक्त रंगांची उधळण एकत्र जुळवत एक चित्र तयार होते… अगदी थोड्या वेळात रेषा आणि रंगांचा आधार घेऊन चेहरा साकारला जातो अगदी हुबेहूब! आणि समोर बसलेला माणूस थक्क होतो. तो कॅनव्हास जणू आरसा आहे की काय असेच वाटू लागते. चित्रकलेच्या या जादूचा अनुभव शुक्रवारी ‘एसएनडीटी’च्या विद्यार्थिनींनी घेतला. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांनी व्यक्तिचित्रणाचा तास रंगवून चित्रकलेची एक अनोखी सफर विद्यार्थिनींना घडवली.

‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) बॅचलर इन व्हिज्युअल आर्टस’च्या चित्रकला मंडळाचे उद्‌घाटन बहुलकर यांच्या हस्ते झाले. बहुलकर यांनी व्यक्तिचित्रे कशी रेखाटावी आणि त्याचे महत्त्व काय हे विद्यार्थिनींना सांगितले. त्यांनी काही व्यक्तिचित्रेही रेखाटली. त्यांच्या या कार्यशाळेला विद्यार्थिनींचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘हंस’ मासिकाच्या हेमा अंतरकर, चित्रकार प्रा. सुधाकर चव्हाण, डॉ. सुभाष पवार, प्राचार्य डॉ. आनंद जुमळे, विभाग प्रमुख डॉ. राजेत्री कुलकर्णी उपस्थित होते.

बहुलकर मास्तरांनी अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने व्यक्तिचित्रणाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. त्या वेळी त्यांनी स्वतः काही व्यक्तिचित्रे रेखाटली. प्रत्येक चित्रानंतर विद्यार्थिनींचे आवाक झालेले चेहरे बहुलकर मास्तरांना भरभरून दाद देत होते. ‘देशाला चित्रकलेची फार मोठी परंपरा आहे आपल्याकडील चित्रकला ही अभिजात आहे. आज चित्रकला विषयक लेखनाचे आणि चित्रांचेही डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. तरुण लेखकांनीही चित्रकला याविषयावर लिहिले पाहिजे. चित्रकला विषयाचे वाचक जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यासाठी चित्रकलेच्या संदर्भातील लेखन करणे गरजेचे आहे,’ असे बहुलकर यांनी सांगितले.

‘सृजनाची निर्मिती हवी’

चित्रकला एक वेगळी दुनिया आहे. त्या जादूई दुनियेची सफर लोकांना घडवणे ही चित्रकारांची जबाबदारी आहे. कलेचा पुरेपूर आनंद घेऊन ती समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तरुण चित्रकारांनी करायला हवा. कलेमध्ये सृजनाची निर्मिती करता यायला हवी.

- सुहास बहुलकर, ज्येष्ठ चित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>