Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रवाशांची ‘लटकंती’ कायम

$
0
0

बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गर्दी; मनस्तापात पडली भर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील ठेकेदारांच्या बसवरील चालकांनी गुरुवारपासून पुकारलेला बंद शुक्रवारीही कायम होता. चालकांच्या बहिष्कारामुळे पीएमपीच्या ताफ्यातील पाचशे ते साडेपाचशे बस सेवेतून कमी झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बहुतांश बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होती. काही मार्गावरील प्रवाशांना बसची प्रतीक्षा करीत ताटकळण्याची वेळ आली. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून जास्तीत जास्त बस मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला.
पीएमपी आणि ठेकेदारांमध्ये झालेल्या करारानुसार खासगी ठेकेदारांच्या ६५३ बस पीएमपीच्या ताफ्यात आहेत. या बसपैकी सुमारे पाचशे ते साडेपाचशे बस प्रत्यक्ष मार्गावर धावतात. काही बस देखभाल, दुरुस्तीसाठी राखीव ठेवल्या जातात. ‘थांब्यावर बस थांबविली जात नाही,’ या कारणावरून पीएमपी प्रशासनाने ठेकेदारांच्या बसला कोट्यावधी रुपयांचा दंड आकारला. हा दंड ठेकेदारांच्या देय रकमेतून कापून घेण्यात आला. त्यामुळे येथून पुढे नियम मोडणाऱ्या चालकानेच स्वतः दंड भरावा, अशी भूमिका ठेकेदारांनी घेतली. त्याला विरोध करण्यासाठी ठेकेदारांच्या चालकांनी गुरुवारपासून बंद पुकारला आहे.
गुरुवारी दुपारपासून पीएमपी प्रवाशांच्या मनस्तापात भरच पडत आहे. स्वारगेट, कात्रज, हडपसर, निगडी, मनपा भवन, शिवाजीनगर आदी ठिकाणच्या महत्त्वाच्या थांब्यांसह शहरातील महत्त्वांच्या मार्गांवर शुक्रवारही प्रवाशांचे हाल झाले. नेहमीपेक्षा अधिक वेळ प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर बस मिळाली तरी गर्दीचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील महत्वाच्या थांब्यांवर पीएमपीचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

मुंढेंच्या प्रयत्नांतून १००० गाड्या रस्त्यावर
ठेकदारांच्या चालकांनी पुकारलेल्या बंदचा पीएमपीच्या सेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी सर्व महत्त्वाच्या थांब्यांचा आढावा घेऊन पीएमपीच्या जास्तीत जास्त बस मार्गावर आणण्याची सूचना केली. गुरुवारी दुपारपासूनच पीएमपीने १२०० बस मार्गावर आणल्या होत्या. त्यासाठी प्रत्येक चालकाला दोन तासांचा ओव्हरटाइम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच, शुक्रवारी सकाळपासूनच बस आणि चालकांचे नियोजन करून सकाळच्या वेळेत एक हजार ३५ गाड्या मार्गावर आणल्या होत्या.

महापौरांना जेवणाचे निमंत्रण
मुंढे यांना राज्य सरकारने परत बोलवावे, अशी मागणी महापौर टिळक यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका पदाधिकारी आणि मुंढे यांच्यात गेल्या आठवडाभर तणावाचे वातावरण होते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीयांनी मुंढे यांच्यावर जोरदार टीका केली होती. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मुंढे यांच्या निर्णयावर टीका करताना उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या मुख्यालयात झालेली बैठक अत्यंत खेळीमेळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंढे यांनी महापौर टिळक यांना बैठक संपल्यानंतर घरी जेवण्यास येण्याचे ​निमंत्रण दिले. या वृत्ताला सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी दुजोरा दिला.

ठेकेदारांना १६ कोटींचा दंड
थांब्यांवर बस न थांबविल्यामुळे पीएमपीने ठेकेदारांना बजावलेल्या दंडाच्या आकारणीबाबत एका महिन्यात फेरविचार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पीएमपीने ठेकेदारांना मार्च ते १५ मे या तीन महिन्यांसाठी १६ कोटी ७८ लाख रुपये दंड आकारला आहे. ‘आयटीएमएस’च्या नियंत्रणासाठी नेमलेल्या कंपनीने सादर केलेल्या अहवालानुसार हा दंड आकारण्यात आला आहे. त्यानुसार ठेकेदारांच्या बस चालकांनी सोळा लाखांहून अधिक वेळा बसथांबा चुकविल्याचा पीएमपीचा दावा आहे. एकदा थांबा चुकविल्यानंतर शंभर रुपये दंड, आकारण्यात येतो. थांब्यावर आठ सेकंद गाडी थांबविणे अपेक्षित आहे. मात्र, काही थांब्यांवर बस उभी करण्यास जागा नसते. काही थांब्यांवर प्रवासीच नसतात, बस थांब्यांपासून काही अंतरावर उभ्या राहतात, अशावेळी देखील दंड आकारला जात असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणी ठेकेदारांनी हायकोर्टात धाव घेतली असून, त्यावर सोमवारी सुनावणी आहे. महापौर आणि मुंढे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर दंडाच्या रकमेबाबत पूर्नविचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘मेस्मा’अंतर्गत कारवाईचे आदेश !
पीएमपीच्या ताफ्यातील ठेकेदारांच्या चालकांनी गुरूवारपासून पुकारलेल्या संप थोपविण्यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम (मेस्मा) अंतर्गत कारवाई करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला होता. चालकांनी गुरुवारी दुपारनंतर सुरू केलेला संप शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. त्यामुळे पुणेकरांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या पार्श्वभूमीवर पीएमपी अंतर्गत बस सेवा पुरविणाऱ्या ठेकेदार, कामगार व कर्मचाऱ्यांच्या संपास मनाई केली. त्याबाबतचा अध्यादेश शुक्रवारी राज्य सरकारने आदेश काढला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौर-मुंढे शीतयुद्ध संपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापौर मुक्ता टिळक, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पालिकेतील सत्ताधारी; तसेच पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यातील शीतयुद्ध शुक्रवारी संपले. महापौर मुक्ता टिळक, भाजपचे पालिकेतील पदाधिकारी आणि मुंढे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत विद्यार्थी वाहतूक बस भाडेवाढ, बस ठेकेदार चालकांचा संपावर तोडगा निघाला. मुंढे यांनी महापौर टिळक यांना घरी जेवणाचे निमंत्रण देऊन वादावर पडदा पाडला.

महापौर मुक्ता टिळक यांनी विद्यार्थी भाडेवाढीबाबत चर्चा करण्यासाठी मुंढे यांना बैठकीसाठी बोलावले होते. या बैठकीस मुंढे अनुपस्थितीत राहिल्याने महापौरांचा अवमान झाला होता. या प्रकरणी सर्वच पदाधिकाऱ्यांनी मुंढे यांना राज्य सरकारने परत बोलवावे, अशी भूमिका घेतली होती. महापौर टिळक यांनीही जोरदार टीका केली होती. याच दरम्यान, मुंढे यांनी पीएमपीला बस पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांना १६.७८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. यामुळे या ‘पीएमपी’ चालकांनी संपाची भूमिका घेतली होती. हा तिढा सोडवण्यासाठी ठेकेदारांनी महापौर टिळक यांना शुक्रवारी विनंती केली.

महापौरांनी ​मुंढे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर महापौर, भाजपचे पदाधिकारी आणि मुंढे यांच्यात शुक्रवारी सायंकाळी बैठकीचे नियोजन ठरले. पीएमपीच्या मुख्यालयात ही बैठक सुमारे अडीच तास चालली. या वेळी महापौर टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले या बैठकीस उपस्थित होते. विद्यार्थी वाहतुकीसाठी वाढवलेला दर कमी करणे, ठेकेदारांच्या दंडाबाबत पुर्नविचार करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती सभागृह नेते भिमाले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चितळे’ दुपारीही सुरू...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुपारी एकच्या ठोक्याला कितीही गर्दी असली, तरी बंद होणारे चितळे बंधू मिठाईवाले यांचे दुकान शनिवारी दुपारी बंदच झाले नाही. या बदलाचे स्वागत करण्यासाठी अनेक ग्राहकांनी ठरवून दुपारी जाऊन दुकानात खरेदी केली. काळानुसार बदलत दुपारी १ ते ४ या वेळेत दुकान सुरू ठेवण्याचा निर्णय चांगला आहे, अशी प्रतिक्रिया पुणेकरांनी दिली.

आंबा बर्फी असो वा चक्का आणि बाकरवडी असो वा पेढे.. चविष्ट खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेले चितळे बंधू मिठाईवाले यांनी दुपारी दुकान बंद ठेवू नये, अशी मागणी ग्राहकांकडून वारंवार केली जात होती. ग्राहकांच्या आग्रहास्तव दुपारी दुकान बंद ठेवण्याची पुणेरी सवय मोडून पुण्यातील काही शाखा १ जुलैपासून दुपारी सुरू राहतील, असे चितळे बंधू यांचे इंद्रनील चितळे यांनी दोन महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर केले होते. त्यानुसार पुण्यातील डेक्कन जिमखाना, सहकारनगर आणि पौड रोड येथील चितळे बंधू मिठाईवाले यांच्या शाखा शनिवारी दुपारी बंद झाल्या नाहीत. दुपारी एक ते चार बंद हा नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरल्याने पहिल्याच दिवशी काही उत्साही नागरिक आवर्जून याच वेळेत दुकानात खरेदीसाठी गेले होते.

दुकान दिवसभर सुरू ठेवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करीत होतो. नाशिवंत पदार्थांची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याने आम्ही पहिल्या टप्प्यात काही दुकाने दुपारी सुरू ठेवण्याचा प्रयोग केला. तो यशस्वी झाल्यामुळे शनिवारपासून डेक्कन जिमखाना, सहकारनगर आणि पौड रोडवरील आमच्या शाखा दुपारी सुरू होत्या, अशी माहिती इंद्रनील चितळे यांनी दिली.

जीएसटीमुळे बाकरवडी महाग

जीएसटीचा परिणाम चितळे यांच्या बाकरवडीच्या दरावरही झाला आहे. बाकरवडीची किंमत वीस रुपयांनी वाढली असून यापुढे तीनशे रुपये किलो दराने मिळणार आहे. ‘नमकीन पदार्थांवर जीएसटी १२ टक्के, तर मिठाईवर ५ टक्के असल्याने मिठाईच्या दरात बदल होणार नाही. मात्र चिवडा, फरसाण, बाकरवडीच्या किमती वाढल्या आहेत,’ असे चितळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिकांनी अनुभवली मुग्ध स्वरबरसात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दिवसाची प्रसन्न सुरुवात होताना पावसाच्या हलक्या सरींनी नटलेले आल्हाददायक वातावरण, बहारदार गायकी आणि रसिकांनी तन्मयतेने दिलेली दाद असा योग ‘स्वरमल्हार’ महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जुळून आला. सकाळच्या सत्रात रंगलेल्या प्रसिद्ध गायिका मंजूषा पाटील, आरती अंकलीकर आणि उस्ताद राशीद खाँ यांच्या गायकीने महोत्सवाचे वातावरण आणखी प्रफुल्लित झाले आणि रसिकांनी मुग्ध स्वरबरसात अनुभवली.
व्हायोलिन अॅकॅडमीतर्फे गणेश कला क्रीडा मंच इथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवसाच्या सत्राचा श्रीगणेशा ‘सेरेनिटी’ संकल्पनेअंतर्गत प्रसिद्ध गायिका मंजूषा पाटील यांनी राग रामकलीने केला. त्यांच्या भावपूर्ण गायकीने हे सत्र रंगले. ‘उन संग लागी’ आणि ‘आज राधे तोरे बदन पर’ या रचना त्यांनी सादर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. त्यानंतर पाटील यांनी राग देसचे सादरीकरण केले. ‘सखी घन गर्जत अती घोरा’ ही गोड रचना गात त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) आणि रोहित मुजुमदार (तबला), रसिका वैशंपायन, शिरीन केळकर (तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली.
पाटील यांच्या भावपूर्ण गायकीनंतर रसिकांनी टाळ्यांच्या गजरात प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर यांचे स्वागत केले. राग जौनपुरी गात त्यांनी बहारदार गायकीचे दर्शन घडविले. जोगिया रागातली बंदिश त्यांनी अतिशय खुबीने सादर केली. त्यांच्या दमदार गायकीने मैफलीची रंगत वाढली. या बहारदार सादरीकरणाला आणखी गहिरेपण लाभले जेव्हा अंकलीकर यांनी ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर निर्मित राग आनंद मल्हारचे सादरीकरण केले. हे सादरीकरण रसिकांना खऱ्या अर्थाने शास्त्रीय संगीतातला आनंद देणारे ठरले. पं. रामदास पळसुले (तबला), तन्मय देवचके (तानपुरा) यांनी त्यांना साथसंगत केली. या बहारदार स्वरयात्रेचा समारोप प्रसिद्ध गायक उस्ताद राशीद खाँ यांच्या गायकीने झाला. राग बिलासखानी तोडी सादर करत त्यांनी या मैफलीची रंगत आणखी वाढवली. राग मधमाद सारंगचे सादरीकरण या मैफलीतला कळसाध्याय ठरले. त्यानंतर ‘का करु सजनी’ ही प्रसिद्ध आणि लोकप्रिय रचना गात या मैफलीचा समारोप केला. त्यांनी तितकीच समर्पक साथसंगत पं. विजय घाटे (तबला) यांनी केली. आनंद देशमुख यांनी निवेदन केले.

आज महोत्सवात
स्वरमल्हार महोत्सवाचा आज रविवारी (२ जुलै) समारोप होणार आहे. अखेरचे सत्र रात्री नऊ वाजता टिळक स्मारक मंदिरात रंगणार आहे. ‘उत्स्फूर्तता’ या संकल्पनेवर आधारित या सत्राची सुरुवात ‘राकेश अँड फ्रेंड्स’ या बँडच्या सादरीकरणाने होणार आहे. प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरासिया यांच्यासह जगप्रसिद्ध ड्रमर जिनो बँक्स, बेस गिटार प्लेअर सेल्डन डिसिल्व्हा, अॅकॉस्टिक गिटार वादक संजय दास, कथक नृत्य कलाकार शीतल कोलवालकर आणि की- बोर्ड प्लेअर संगीत हळदीपूर यांचे सादरीकरण होणार आहे. या चार दिवसीय महोत्सवाची सांगता पं. विश्वमोहन भट यांच्या मोहनवीणा वादनाने होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधखरेदीच्या अटींमध्ये बदल

$
0
0

प्रकारांचा स्पष्ट उल्लेख करण्याचे आयुक्तांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खुल्या बाजारातून औषधांच्या खरेदीवर ६० ते ९० टक्के सवलत मिळत असूनही पालिका मात्र केवळ १९ टक्के सवलत घेऊन औषधांची खरेदी करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. याची दखल घेऊन पालिका आयुक्तांनी औषधखरेदीची निविदा काढताना त्यामध्ये जेनरिक आणि ब्रँडेड असा स्पष्ट उल्लेख करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार यापूर्वी काढण्यात आलेल्या ​निविदेच्या अटीमध्ये त्याचा उल्लेख करण्यासाठी आठवड्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
पालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांची औषधखरेदी करते. ही खरेदी करताना बाजारात ६० टक्क्यांपासून ९० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत असताना पालिका मात्र केवळ १९ टक्के सवलत घेत असल्याची वस्तुस्थिती सजग नागरिक मंचाने समोर आणली होती. गेल्या वर्षी पालिकेने सहा कोटी रुपयांच्या औषधांची खरेदी केली होती. ही खरेदी करताना अनेक जेनरिक औषधांच्या किमती कमी असतानाही ती केवळ १९.१० टक्के सवलतीने खरेदी करण्यात आल्याचे सजग नागरी मंचाने उघडकीस आणले होते.
मंचाने ‘सिपझॉक्स टॅब​लेट’ खुल्या बाजारातून खरेदी केल्या, त्यावेळी त्यांना ही औषधे १०.८६ रुपयांना मिळाली. मात्र, पालिकेने याच गोळ्या ४५.३० रुपयांनी खरेदी केल्याचे उघड झाले. अशाप्रकारे तेरा प्रकारच्या औषधांचा आढावा घेतला असता ६० ते ९० टक्के सवलत मिळत असल्याचे उघड झाले होते. पालिकेतील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत मंचाचे विवेक वेलणकर यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन औषध खरेदीची निविदा जाहीर करतानाच त्यात जेनेरिक औषधे व ब्रँडेड औषधे असे दोन स्वतंत्र विभाग असावेत, असा बदल करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

पालिका आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी निविदेत बदल करण्यासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. तत्पूर्वी वर्षानुवर्षे याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मोठे नुकसान झाले आहे. याची चौकशी झालीच पाहिजे.
विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणवेश तपास सीबीआयकडे द्या

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘सीएम’ कडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशांचे वाटप केले जाऊ नये, अशा सूचना स्थायी समितीच्या बैठकीत देऊनही पालिका प्रशासन जुनेच गणवेश वितरित करीत आहे. या व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता असून, या प्रकाराची चौकशी सीबीआयकडून करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शिक्षणमंडळ बरखास्त होऊन त्याचा संपूर्ण कारभार पालिकेतर्फे चालविला जाणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत यंदा पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गणवेशाचा रंग बदलण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मागील वर्षीचे गणवेश देऊ नयेत, अशा सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या होत्या. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना जुनेच गणवेशांचे वाटप सुरू ठेवल्याचा आरोप माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी केला. गेल्या वर्षीच्या ठेकेदारावर मेहरबानी करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी जुनेच गणवेश देण्याचा ‘उद्योग’ करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला. विद्यार्थ्यांच्या गणवेशात बदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्यास यापूर्वी करण्यात आलेल्या गणवेश वाटपामुळे प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे. अशी स्थिती निर्माण झाल्यास संबधित अधिकाऱ्यांच्या पगारातून त्याची वसुली करावी, अशी मागणी तुपे यांनी केली.
पालिकेच्या शिक्षणमंडळाने २०१६-१७ या वर्षासाठी मफतलाल इंडस्ट्रियल लिमिटेड या कंपनीकडून ८४ हजार गणवेशांची खरेदी केली होती. मात्र, ते निकृष्ट असल्याचे समोर आल्यानंतर कोर्टाने फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या गणवेशांचे वाटप झालेच नाही. यंदापासून राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार सर्व विद्यार्थ्यांना डीबीटी कार्ड देण्यात आले असून, ३७ दुकानदारांमार्फत गणवेश दिले जाणार आहेत. दुकानदारांनी मफतलाल कंपनीकडूनच गणवेश घ्यावेत यासाठी अधिकारी प्रयत्नशील असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’च्या नावाखाली ग्राहकांची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी पुण्यात गोंधळ उडाल्याचे चित्र होते. हॉटेलचालकांनी खाद्यपदार्थांच्या बिलावर स्वतंत्ररित्या जीएसटी आकारण्यास सुरुवात केल्याने काही ठिकाणी ग्राहक व हॉटेलचालक यांच्यामध्ये खटके उडाल्याचेही प्रसंग घडले.

दरम्यान, हॉटेलचालकांनी जीएसटीसाठी पाच ते दहा टक्के दरवाढ केली आहे, तर बँकांमधील सेवा कर, मोबाइल व टेलिफोन बिलावरील सेवाकरात वाढ झाली आहे. पूर्वी मेन्यूच्या रकमेतच करांचा समावेश होता. आता हे कर रद्द होऊन फक्त जीएसटी भरावा लागणार आहे. त्यामुळे पदार्थांच्या किमतीतून कराचा भाग वगळणे अपेक्षित होते. तसे न करता अनेक व्यावसायिकांनी पूर्वीचेच दर कायम ठेवत त्यावर जीएसटीचीही आकारणी केली आहे. त्यामुळे ग्राहकांची लूट होत आहे. त्यावरून वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. अनेक ग्राहकांनी यावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

‘पूर्वी करांची रक्कम बिलात समाविष्ट केली जात होती. आता जीएसटी स्वतंत्र दर्शविण्यात येत आहे. काही हॉटेलचालकांनी आपल्या पूर्वीच्या मेन्यूच्या रकमेतून तत्कालिन करांची रक्कम कमी केली आहे. त्याचा फायदा ग्राहकांना होत आहे. मात्र, काही व्यावसायिकांनी ही रक्कम कमी केलेली नाही. आठवड्यात नवी मेन्यू कार्ड तयार होईल,’ असा दावा पुणे रेस्टॉरंट्स अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी केला. ‘ज्या हॉटेलची उलाढाल ७५ लाखापर्यंत आहे, त्यांच्याकडील दरांमध्ये कोणताही फरक फडलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही,’ असे पुणे रेस्टॉरेंट्स अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे सरचिटणीस किशोर सरपोतदार यांनी सांगितले.

बँकिंग महागले

सेवा कराचा समावेश आता वस्तू व सेवा करामध्ये (जीएसटी) झाल्याने बँकिंग सेवाही महागल्या आहेत. पूर्वी बँकांकडून १५ टक्के सेवा कर आकारला जात होता. आता हा दर १८ टक्के झाल्याने या सेवांसाठी तीन टक्के रक्कम अधिक मोजावी लागत आहे. त्यामुळे डिमांड ड्राफ्ट, आरटीजीएससारख्या सेवांसाठी बँकेत गेलेल्या ग्राहकांना शनिवारी अतिरिक्त रक्कम मोजावी लागली. तयार खाद्यपदार्थ, मिठाई विक्रेत्यांकडील किमतीतही वाढ झाली. तसेच काही ठिकाणी किरकोळ चहाविक्रेत्यांनीही आपल्याकडील दरात वाढ केल्याचे चित्र होते. मोबाइलच्या रिचार्जवर मिळणाऱ्या टॉकटाइममध्येही घट झाली. तर पोस्टपेडच्या बिलामध्ये पंधरा टक्के सेवाकराऐवजी १८ जीएसटी लागू झाला. त्यामुळे यासाठी ग्राहकांना खिसा अधिक हलका करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिद्दी स्नेहलला हवी मदत

$
0
0

Harsh.Dudhe @timesgroup.com
Tweet : @HarshDudheMT

पुणे : अप्पर इंदिरानगरमधील दोन छोट्या खोल्यांचं घर. शिवणकाम करणारी आई आणि दुकानात काम करणारे वडील. त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नात जेमतेम चालणारं घर. अशा प्रतिकूल परिस्थितीशी झगडत स्नेहल सचिन पवार हिने दहावीला ९३.६० टक्के गुण मिळविले आहेत. पहिलीपासून दहावीपर्यंत वर्गात सतत पहिल्या येणारी स्नेहल इंजिनीअर होण्याचे स्वप्न पाहत असून, ते प्रत्यक्षात येण्यासाठी समाजाकडून आर्थिक मदतीची गरज आहे.

‘आमची मुलगी हुशार आहे. मात्र, पैसे नसल्याने आम्ही तिला शिकवायला कमी पडतोय. तिचं शिक्षण पूर्ण करून तिला यशस्वी होताना पाहायचं आहे,’ असे स्नेहलचे वडील सचिन पवार सांगत होते. तिचे आणि तिचा लहान भाऊ यश या दोघांच्या शिक्षणासाठी ते धडपडत आहेत. बालाजीनगरमधील ज्ञान विकास शिक्षण संस्थेच्या व्यंकटेश विद्या प्रशाला या शाळेतून स्नेहल दहावी उत्तीर्ण झाली आहे.

अभ्यासात हुशार असणारी स्नेहल इतर उपक्रमांतही सक्रिय असते. शाळेतील वक्तृत्व स्पर्धा तिने गाजवली असून, सांस्कृतिक कार्यक्रमांतही ती नेहमी भाग घेत असे. कम्प्युटर इंजिनीअर होण्याची आणि नंतर तिला एमबीएही करायचे आहे. उच्च शिक्षणाबाबत इतक्या जागरूकपणे विचार करणाऱ्या स्नेहलला चिंता आहे, ती आर्थिक बाबीची. पैशाअभावी तिचे शिक्षण थांबू नये यासाठी समाजाने मदतीचा हात पुढे करण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साक्षीला व्हायचयं डॉक्टर!

$
0
0

Mustafa.Attar@timesgroup.com
Tweet : @mustafaattarMT

पुणे : धनकवडीच्या बालाजीनगर भागात दहा बाय दहाच्या आकाराच्या दोन खोल्या, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चहा विकणारे वडील, दुकान टाकायला पैसे नसल्याने घरातून चहा तयार करून देणारी आई, गरिबीशी लढणाऱ्या पालकांसमवेत साक्षी संजय गाटेलाही परिस्थितीशी झगडावं लागलं आणि दहावीत ९५.२० टक्के गुण मिळवून तिने शाळेत पहिला क्रमांक मिळविला. तिला डॉक्टर व्हायचे असून, त्यासाठी गरज आहे, ती समाजाच्या मदतीची.
धनकवडीच्या प्रेरणा विद्यालयाची ही विद्यार्थिनी. तिला दहावीत ९५.२० टक्के गुण मिळाले. साक्षीचे वडील संजय गाटे हे चहा विक्रेते. आई गृहिणी. बालाजीनगरमध्ये एका इमारतीत दहा बाय दहा आकाराच्या खोलीत या तिघांचं कुटुंब राहते. मूळचे तुळजापूर तालुक्यातील दहिवाडी या खेडेगावातील हे कुटुंब. गावात वडिलोपार्जित जमीन. पाणी, दुष्काळी परिस्थितीमुळे जमीन असूनही काही पिकत नाही. संजय गाटे यांचा एक भाऊ मजुरी करतो. नोकरीच्या शोधात गाटे पुण्यात धनकवडीला नऊ वर्षांपूर्वी आले. ‘धनकवडीच्या भाजी मंडईत काही काम मिळते का म्हणून नऊ वर्षापूर्वी चौकशी करीत होतो. परंतु, दोन ते तीन हजार रुपये पगाराची नोकरीमध्ये घर खर्च, एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च कसा भागेल या विचाराने नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. अखेर दुकानांमध्ये जाऊन चहा विकायचा निर्णय घेतला. माझ्या पत्नीने मला साथ दिली. सुरुवातीला चहाचा स्टॉल टाकायला पुरेसे पैसेही जवळ नव्हते. सुरुवातीला चहा विकला जावा म्हणून तो मोफत वाटला. नंतर नागरिकांना माहिती झाली. त्यानंतर आपोआप चहा विकला जाऊ लागला आणि संसाराची गाडी रुळावर आली,’ साक्षीचे वडील संजय यांनी त्यांचा संघर्ष मांडला.
‘घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने साक्षीनंतर अपत्य नको, असा निर्णय आम्ही पतीपत्नीने घेतला. साक्षीवरच लक्ष केंद्रित करून तिला चांगले शिकवायचे, पायावर उभे करायचे असा निर्धार केला. त्यामुळे साक्षीला चांगल्या शाळेत घातले. तुळजापूर तालुक्यात तिचे पहिलीचे शिक्षण झाले. त्यानंतर दुसरीपासून बालाजीनगरच्या शाळेत तिचे शिक्षण झाले. लहानपणापासूनच साक्षी हुशार होती. तिने पहिलीपासून पहिला क्रमांक सोडला नाही. दहावीतही तिने ९५.२० टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळविला. आमच्या कष्टाचे चीज झाले,’ या शब्दांत वडील संजय गाटे यांनी मुलीच्या यशाचे वर्णन केले.
आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करता आलं याचं समाधान व्यक्त करताना साक्षी म्हणते, ‘मी अभ्यासात हुशार होते. दहावीत चांगले गुण मिळावेत यासाठी कधीही आई-वडिलांनी दबाव टाकला नाही. मला त्यांच्या कष्टाचं चीज करायचं होतं. खरे तर मला डॉक्टर व्हायचे आहे. त्यासाठी कष्ट करण्याचीही माझी तयारी आहे. पण, घरच्या परिस्थितीचा अडथळा येत आहे. म्हणून मी एमबीए करायचा दुसरा पर्याय समोर ठेवला आहे. आर्थिक मदत मिळाली तर नक्कीच डॉक्टर व्हायला आवडेल. अहोरात्र कष्ट करणाऱ्या माझ्या आई-वडिलांचे पांग फेडावे. स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांचा मुलगा म्हणून त्यांचा आधार व्हावा. हीच माझी इच्छा आहे.’
दहावीत प्रथमच कोचिंग क्लास लावला होता. सकाळी तीन ते साडेतीन तास आणि संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर पुन्हा साडेतीन ते चार तास असा अभ्यास केला. परीक्षेच्या काळात रात्री उशिरापर्यंत आणि पहाटे लवकर उठून अभ्यास केला. आईने कधीच घरातले काम सांगितले नाही. त्यामुळेच तिच्या पाठिंब्यामुळे मी यश मिळवू शकले. आठवीनंतर पुस्तके, वह्या घेण्याची ऐपत नव्हती. अखेर शेजारच्या काकांनी माझी हुशारी पाहून खर्च उचलला. नवी कोरी पुस्तके, वह्या आणून दिल्या. त्याची मला जाणीव आहे, असेही साक्षीने सांगितले.

मुलीच्याच शाळेत विकला चहा...!
ज्या शाळेत मुलगी शिकत होती. त्याच शाळेत जाऊन तेथील शिपायापासून ते शिक्षकांना चहा विकण्याचे काम साक्षीच्या वडिलांनी केले. मुलगी शिकते तेथे चहा विकताना लाजल्यासारखे कधी झाले का असा प्रश्न विचारता, ‘शिक्षकांना माहिती होते की माझी परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे लाजण्याचा प्रश्न नव्हता,’असे साक्षीचे वडील म्हणाले. हेच साक्षीला विचारले असता, ती म्हणाली ‘वडिलांनी चहा विकला म्हणूनच, आज मी यश मिळवू शकले. त्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटतो.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साक्षीला व्हायचंय डॉक्टर!

$
0
0

Mustafa.Attar @timesgroup.com
Tweet : @mustafaattarMT

पुणे : धनकवडीच्या बालाजीनगर भागात दहा बाय दहाच्या आकाराच्या दोन खोल्या, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चहा विकणारे वडील, दुकान टाकायला पैसे नसल्याने घरातून चहा तयार करून देणारी आई, गरिबीशी लढणाऱ्या पालकांसमवेत साक्षी संजय गाटेलाही परिस्थितीशी झगडावं लागलं आणि दहावीत ९५.२० टक्के गुण मिळवून तिने शाळेत पहिला क्रमांक मिळविला. तिला डॉक्टर व्हायचे असून, त्यासाठी गरज आहे, ती समाजाच्या मदतीची.

धनकवडीच्या प्रेरणा विद्यालयाची ही विद्यार्थिनी. तिला दहावीत ९५.२० टक्के गुण मिळाले. साक्षीचे वडील संजय गाटे हे चहा विक्रेते. आई गृहिणी. बालाजीनगरमध्ये एका इमारतीत दहा बाय दहा आकाराच्या खोलीत या तिघांचं कुटुंब राहते. नोकरीच्या शोधात गाटे पुण्यात आले. ‘धनकवडीच्या भाजी मंडईत काही काम मिळते का म्हणून नऊ वर्षापूर्वी चौकशी करीत होतो. परंतु, दोन ते तीन हजार रुपये पगाराच्या नोकरीमध्ये घर खर्च, मुलीच्या शिक्षणाचा खर्च कसा भागेल या विचाराने नोकरी न करता दुकानांमध्ये जाऊन चहा विकायचा निर्णय घेतला. चहाचा स्टॉल टाकायला पुरेसे पैसेही जवळ नव्हते. कालांतराने चहाची गाडी चालू लागली आणि संसाराची गाडी रुळावर आली...’ संजय यांनी त्यांचा संघर्ष मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिद्दी स्नेहलला व्हायचेय इंजिनीअर

$
0
0

Harsh.Dudhe@timesgroup.com
Tweet : @HarshDudheMT

पुणे : अप्पर इंदिरानगरमधील दोन छोट्या खोल्यांचं घर. शिवणकाम करणारी आई आणि दुकानात काम करणारे वडील. त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नात जेमतेम चालणारं घर. अशा प्रतिकूल परिस्थितीशी झगडत स्नेहल सचिन पवार हिने दहावीला ९३.६० टक्के गुण मिळविले आहेत. पहिलीपासून दहावीपर्यंत वर्गात सतत पहिल्या येणारी स्नेहल इंजिनीअर होण्याचे स्वप्न पाहत असून, ते प्रत्यक्षात येण्यासाठी समाजाकडून आर्थिक मदतीची गरज आहे.
‘आमची मुलगी हुशार आहे. मात्र, पैसे नसल्याने आम्ही तिला शिकवायला कमी पडतोय. तिचं शिक्षण पूर्ण करून तिला यशस्वी होताना पाहायचं आहे,’ असे स्नेहलचे वडील सचिन पवार सांगत होते. तिचे आणि तिचा लहान भाऊ यश या दोघांच्या शिक्षणासाठी ते धडपडत आहेत. बालाजीनगरमधील ज्ञान विकास शिक्षण संस्थेच्या व्यंकटेश विद्या प्रशाला या शाळेतून स्नेहल दहावी उत्तीर्ण झाली आहे.
अभ्यासात हुशार असणारी स्नेहल इतर उपक्रमांतही सक्रिय असते. शाळेतील वक्तृत्व स्पर्धा तिने गाजवली असून, सांस्कृतिक कार्यक्रमांतही ती नेहमी भाग घेत असे. कम्प्युटर इंजिनीअर होण्याची आणि नंतर तिला एमबीएही करायचे आहे. उच्च शिक्षणाबाबत इतक्या जागरूकपणे विचार करणाऱ्या स्नेहलला चिंता आहे, ती आर्थिक बाबीची. पैशाअभावी तिचे शिक्षण थांबू नये यासाठी समाजाने मदतीचा हात पुढे करण्याची आवश्यकता आहे. अभ्यास आणि इतर उपक्रमांत सतत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या स्नेहलच्या कष्टाबद्दल, समंजसपणाबद्दल तिचे पालक आणि शिक्षक कौतुकाने सांगतात. ‘माझ्या शिक्षणासाठी नातेवाइकांकडून कर्ज काढू नका. मी लवकर शिकून मोठी होईल. नोकरी करून तुम्हाला हातभार लावीन,’ असे स्नेहल सतत म्हणत असल्याचे तिचे वडील सचिन पवार यांनी आवर्जून सांगितले.
पवार म्हणाले, ‘आम्ही मूळ सोलापूर जिल्ह्यातील.. वडिलांच्या नोकरीमुळे मुंबईत स्थायिक झालो. त्यानंतर काही कारणांनी साधारण २२ वर्षांपूवी मुंबईहून पुण्यात बालाजीनगरला स्थायिक झालो. साधारण आठ वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीत काम करत होतो. तेव्हा महिन्याला पुरेसे पैसे मिळत होते. मात्र, अचानक एका दिवशी कंपनी बंद पडली आणि नोकरी गेली. त्यानंतर पैसे नसल्याने कुटुंबाचे प्रचंड आर्थिक हाल सुरू झाले. पैसे मिळविण्यासाठी जिथे मिळेल तिथे नोकरी केली. या पैशातून संसार चालविण्यासोबतच स्नेहलच्या शिक्षणासाठी आवश्यक ती मदत केली. तिच्या शिक्षणाला पैसे कमी पडत असल्याने विद्याने शिवणकाम करून मला हातभार लावायला सुरूवात केली आहे. सहा महिन्यांपूर्वी बालाजीनगरमधून अप्पर इंदिरा नगरमध्ये राहायला आलो.’
‘आजपर्यंत स्नेहल अभ्यास कर, असं मी कधीच सांगितले नाही. याउलट भरपूर अभ्यास झाला असचं सांगत आलो. पैसे नसल्याने आम्ही तिला शिकवायला कुठेतरी कमी पडतोय, तिचं शिक्षण पूर्ण करून तिला यशस्वी होताना पाहायचं आहे. त्यासाठी सर्व प्रयत्न करणे सुरू आहे,’ असे सचिन पवार यांनी सांगितले. ‘आमच्या शाळेतील स्नेहल ही सर्वांत हुशार विद्यार्थीनी होती. तिला परीक्षेत ९२ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळतील हे माहिती होते. सर, मला अधिक माहितीसाठी हे पुस्तक मिळेल का, अशी सतत विचारणा करणारी ती शाळेतील एकमेव विद्यार्थिनी होती. एकदा शाळेच्या परीक्षेत तिला इतिहासात ४० पैकी ३५ गुण मिळाले. तेव्हा तिने मला पैकीच्या पैकीच गुण मिळाले पाहिजेत, कारण मी पूर्ण पेपर सोडविला आहे, असाच आग्रह तिने धरला होता. आम्ही परत पेपर तपासल्यावर एक प्रश्न तपासायचा राहून गेल्याचे लक्षात आले. यावरून तिच्या बुद्धिमत्तेची चुणूक लक्षात आली. शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये ती नेहमी अग्रेसर राहायची,’ असे स्नेहलच्या शाळेचे मुख्याध्यापक नितीन पोरे यांनी सांगितले.

स्नेहल खूप समजूतदार आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने तिने कधीच कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही. दहावीपर्यंत तिने एकही क्लास लावला नव्हता. मात्र, दहावीत विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयांची घरगुती शिकवणी लावली. आमची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिकवणी घेणाऱ्यांनी आम्हाला सवलत दिली. स्नेहलची पुढील शैक्षणिक वाट अधिक खडतर आहे. या पुढील शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागणार आहे. त्यामुळे तो आणायचा कसा, हा मोठा प्रश्न आहे.
विद्या पवार, स्नेहलची आई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून नागरिकांनी थांबवले शूटिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी

खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत विनापरवाना सुरू असलेल्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नगरसेविका वैशाली पहिलवान, त्यांचे पती कैलास पहिलवान आणि नागरिकांनी हस्तक्षेप करून हे शूटिंग थांबवले. त्यामुळे चित्रपटाच्या युनिटला अचानक ‘पॅकअप’ करावे लागले; तसेच शूटिंगसाठी आलेल्या अभिनेत्री तब्बूनेही तिथून काढता पाय घेतला.

कैलास पहिलवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी परिसरातील पुणे मुंबई रस्त्यावरील अंडी उबवणी केंद्र चौकातून रेंजहिल्सकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे बोगद्याखाली ‘पियानो प्लेयर’ हा चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात आले होते. अभिनेत्री तब्बू, राधिका आपटे आणि आयुष्यमान खुराणा हे या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. सदर सिनेमाच्या शूटिंगसाठी युनिटने वाहतूक शाखेची परवानगी घेतली होती. सकाळी साडेसहापासून त्यांनी पुणे मुंबई रस्त्यावरील अंडी उबवणी चौकापासून रेंजहिल्सकडे जाणारा रस्ता आणि सिंचन भवन चौकातून रेंजहिल्सकडे येणारा रस्ता शूटिंगसाठी बंद केला होता.

मात्र, सदर भाग हा खडकी कँटोन्मेंट बोर्ड, खडकी अॅम्युनिशन फॅक्टरीच्या अखत्यारीतील असल्याने त्यांची परवानगी घेणे गरजेचे होते. तसेच रेल्वे पुलाखाली शुटिंग होत असल्याने रेल्वेचीही परवानगी आवश्यक होती. मात्र, यापैकी कोणाचीही परवानगी न घेता ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक अडवल्याने, या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. त्याच वेळी स्थानिक नगरसेविका वैशाली पहिलवान, त्यांचे पती कैलास आणि परिसरातील नागरिक या ठिकाणी आले. त्यांनी अॅम्युनिशन फॅक्टरीच्या अधिकाऱ्यांनाही बोलावले. शूटिंगसाठी परवानगी घेतली आहे का, याबाबत विचारणा केली. त्या वेळी युनिटकडे परवानगी नसल्याने शूटिंग थांबवण्यात आले. या वेळी शूटिंगसाठी तब्बू आलेली होती. मात्र, नागरिकांचा संताप पाहता शूटिंग न करताच तब्बू तिथून निघून गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या बदलीच्या ‘ऑनलाइन’ प्रक्रियेत गोंधळ

$
0
0

सर्व्हर हँग होत असल्याने माहिती भरता येत नसल्याच्या तक्रारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदलीच्या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये सध्या गोंधळाचा धडा सुरु आहे. ऑनलाइन सर्व्हर अनेकदा हँग होत असल्याने बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांना अर्ज करताना अडचणी येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या बदली प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात शिक्षक बदली प्रक्रियेच्या विरोधात एक हजार ९१४ शिक्षकांची वैयक्तिक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. त्या याचिकेवर निर्णय देताना २४ मे रोजी कोर्टाने या शिक्षकांच्या वैयक्तिक बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर २५ मे रोजी औरंगाबाद हायकोर्टाने राज्यातील विविध २० याचिकांवर निर्णय देताना १६ जूनपर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले होते. हा निर्णय देताना राज्य सरकारने बदली प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने अवघड आणि सोपे क्षेत्रातील शाळांची यादी करणे आणि इतर प्रशासकीय काम सुरू ठेवले होते.

शिक्षकांना ऑनलाइन बदली प्रक्रियेत अर्ज करण्याची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सूचना केली. परंतु, ऑनलाइन अर्ज भरताना अनेक सर्व्हर हँग होत आहे. यामुळे अर्ज भरण्यासाठी खूप वेळ वाया जात आहे. तरीही अर्ज पूर्ण भरला जात नाही. ऑनलाइन प्रक्रियेसाठी मुख्याध्यापकांनी शाळा आणि शिक्षकांची माहिती भरली आहे. या प्रक्रियेतील कित्येक शाळांची माहिती सर्व्हर हँग होत असल्याने अर्धवट भरली गेली आहे. परिणामी अनेक शिक्षकांची नावे चुकली आहेत. ऑनलाइन प्रक्रियेत दीड वर्षापूर्वीचा माहितीसाठी आहे. काही शाळांची नावे नाहीत. या गोंधळामुळे शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्याच चित्र स्पष्ट झाले आहे. त्याकरिता शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, ‘विशेष संवर्ग, पती पत्नी, अवघड भाग आणि त्यानंतर इतर शिक्षकांची बदली होणार आहे. शाळा सुरू झाल्या आहेत. विशेष संवर्गातील शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहे. सर्व्हर हँग होत आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेत सध्या गोंधळ सुरू आहे. इतर शिक्षकांच्या बदल्या होणार की नाही याबाबत शंका आहे.’

कोट

ऑनलाइन शिक्षक बदलीचा अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. सर्व्हर हँग होत आहे. काही प्रमाणात तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.

नवनाथ वणवे, उपशिक्षण अधिकारी, जिल्हा परिषदसर्व्हर हँग होत असल्याने माहिती भरता येत नसल्याच्या तक्रारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदलीच्या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये सध्या गोंधळाचा धडा सुरु आहे. ऑनलाइन सर्व्हर अनेकदा हँग होत असल्याने बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांना अर्ज करताना अडचणी येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या बदली प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात शिक्षक बदली प्रक्रियेच्या विरोधात एक हजार ९१४ शिक्षकांची वैयक्तिक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. त्या याचिकेवर निर्णय देताना २४ मे रोजी कोर्टाने या शिक्षकांच्या वैयक्तिक बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर २५ मे रोजी औरंगाबाद हायकोर्टाने राज्यातील विविध २० याचिकांवर निर्णय देताना १६ जूनपर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले होते. हा निर्णय देताना राज्य सरकारने बदली प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने अवघड आणि सोपे क्षेत्रातील शाळांची यादी करणे आणि इतर प्रशासकीय काम सुरू ठेवले होते.

शिक्षकांना ऑनलाइन बदली प्रक्रियेत अर्ज करण्याची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सूचना केली. परंतु, ऑनलाइन अर्ज भरताना अनेक सर्व्हर हँग होत आहे. यामुळे अर्ज भरण्यासाठी खूप वेळ वाया जात आहे. तरीही अर्ज पूर्ण भरला जात नाही. ऑनलाइन प्रक्रियेसाठी मुख्याध्यापकांनी शाळा आणि शिक्षकांची माहिती भरली आहे. या प्रक्रियेतील कित्येक शाळांची माहिती सर्व्हर हँग होत असल्याने अर्धवट भरली गेली आहे. परिणामी अनेक शिक्षकांची नावे चुकली आहेत. ऑनलाइन प्रक्रियेत दीड वर्षापूर्वीचा माहितीसाठी आहे. काही शाळांची नावे नाहीत. या गोंधळामुळे शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्याच चित्र स्पष्ट झाले आहे. त्याकरिता शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, ‘विशेष संवर्ग, पती पत्नी, अवघड भाग आणि त्यानंतर इतर शिक्षकांची बदली होणार आहे. शाळा सुरू झाल्या आहेत. विशेष संवर्गातील शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहे. सर्व्हर हँग होत आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेत सध्या गोंधळ सुरू आहे. इतर शिक्षकांच्या बदल्या होणार की नाही याबाबत शंका आहे.’

..
ऑनलाइन शिक्षक बदलीचा अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. सर्व्हर हँग होत आहे. काही प्रमाणात तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.

नवनाथ वणवे, उपशिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्रचित पाठ्यपुस्तकाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण आणि लोणी काळभोर येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने (डीआयसीपीडी) सातवी आणि नववीच्या पुनर्रचित पाठ्यपुस्तकाच्या राज्यस्तरीय प्रशिक्षणास सुरवात करण्यात आली आहे. या प्रशिक्षणामध्ये नवीन पाठ्यक्रमाची क्षेत्रे, पाठ्यपुस्तक रचना आणि बालकेंद्रित अध्यापन पद्धती यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारित सातवी व नववीच्या पाठ्यपुस्तक प्रशिक्षणाचे आयोजन अनुक्रमे कर्वेनगर येथील पार्वतीबाई अध्यापक विद्यालय व कमिन्स कॉलेज येथे करण्यात आले आहे. २६ जून ते सहा जुलै या कालावधीत हे प्रशिक्षण होत आहे.
नववीच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन ‘डीआयसीपीडी’च्या प्राचार्या डॉ. कमलादेवी आवटे यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ. राजेश बनकर, अजयकुमार फुंदे आदी उपस्थित होते. बालभारतीच्या विशेषाधिकारी उज्ज्वला गोडबोले, महाराष्ट्र राज्य गणित अभ्यासगट निमंत्रित सदस्य विनायक गोडबोले, प्राजक्ती गोखले, पूजा जाधव यांनी गणित पाठ्यपुस्तकाविषयी मार्गदर्शन केले.
नवीन पाठ्यक्रमाची वैशिष्टे, घटक व क्षेत्रे, पाठ्यपुस्तक रचना, बालकेंद्रित अध्यापन पद्धती, ज्ञानाचे व्यावहारिक उपयोजन याचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना करण्यात आले. या प्रशिक्षणात पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतून सुमारे १४५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.
सातवीच्या प्रशिक्षणाच्या दिवशी विद्या प्राधिकरणाचे संचालक सुनील मगर यांनी प्रशिक्षणाच्या ठिकाणी भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला. २८ जून रोजी विज्ञान विषयाचे प्रशिक्षण झाले. त्यामध्ये या विषयाचे तज्ज्ञ पाटोळे, सुलभा विधाते, डॉ. प्रभाकर क्षीरसागर, जोग यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंजवडी मेट्रोसाठी तीन कंपन्या इच्छुक

$
0
0

आर्थिक आराखड्यानंतर पात्र कंपनीची निवड केली जाणार
‘पीएमआरडीए’तर्फे राबविला जाणार शिवाजीनगर-हिंजवडी प्रकल्प
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून विकसित करण्यात येणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी तीन कंपन्याचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या प्रस्तावाची छाननी ‘पीएमआरडीए’कडून केली जाणार असून, आर्थिक आराखडा सादर केल्यानंतर पात्र कंपनीची निवड केली जाणार आहे.
हिंजवडी येथे रोजगारासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असली, तरी त्यांच्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध झालेला नाही. त्यादृष्टीने, शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्प विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. सार्वजनिक-खासगी सहभागातून (पीपीपी) हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याची सर्व जबाबदारी ‘पीएमआरडीए’कडे सोपविण्यात आली आहे. ‘पीएमआरडीए’ने काही महिन्यांपूर्वी पीपीपी तत्त्वावर मेट्रो प्रकल्प विकसित करण्यास इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागवले होते. त्यासाठी देश-परदेशातील अनेक मोठ्या कंपन्यांनी उत्सुकता दाखवली असली, तरी ‘पीएमआरडीए’च्या निर्धारित मुदतीमध्ये तीन कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामध्ये, आयआरबी, आयएल अँड एफएस आणि टाटा रिअॅलिटी-सिमन्स यांनी ‘पीएमआरडीए’कडे प्रस्ताव दाखल केले आहेत.
‘पीएमआरडीएकडे दाखल झालेल्या तिन्ही प्रस्तावांची तांत्रिक छाननी केली जाणार आहे. प्रस्ताव दाखल करणाऱ्या सर्व कंपन्यांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर, संबंधित कंपन्यांकडून आर्थिक दर मागवून घेण्यात येणार असून, त्यांनी दिलेल्या दरांचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे,’ अशी माहिती ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
पीपीपी तत्त्वावर राबविल्या जाणाऱ्या मेट्रोच्या निकषांनुसार सरकारचे कमीत कमी अर्थसाह्य घेणाऱ्या अथवा सरकारला उत्पन्न मिळवून देणाऱ्या कंपन्या मेट्रोच्या कामासाठी पात्र ठरू शकतात. संबंधित कंपन्यांकडून आर्थिक प्रस्ताव मागवल्यानंतरच हे काम नक्की कोणाला मिळू शकते, याचा निर्णय घेता येणार आहे. या प्रक्रियेला किमान सहा महिन्यांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे, चालू वर्षात शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. हा संपूर्ण मार्ग सुमारे २३ किमीचा असून, त्या दरम्यान २३ एलिव्हेटेड स्टेशन असतील. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केला आहे.
................
शिवाजीनगर-हिंजवडी मार्ग तातडीने व्हावा
महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये प्रचारासाठी पुण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिलमध्ये शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे भूमिपूजन करणार असल्याचे आश्वासन दिले होते. या मेट्रो प्रकल्पाच्या मान्यतेसाठी आणखी काही अवधी जाणार आहे. शहरासाठी यापूर्वी मान्य झालेल्या मेट्रो प्रकल्पामध्ये (टप्पा-१) सरकारचा प्रमुख वाटा आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) माध्यमातून त्याचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे, शिवाजीनगर-हिंजवडीचे काम लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा परिषद अध्यक्षांना हवे संरक्षणासाठी ‘अंगरक्षक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशातील प्रत्येक व्हीआयपी आणि माननीयांच्या गाड्यांवरील लाल दिवा काढण्याचे आदेश देण्यात आले असताना पुणे जिल्हा परिषदेला ते प्राप्त झाले नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्याशिवाय जिल्हा परिषदेच्या (झेडपी) अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा असल्याने इतर ‘व्हीआयपीं’प्रमाणे स्वरंक्षणार्थ 'अंगरक्षक' देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. देशातील सर्व राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीय मंत्री, न्यायाधीश, सरकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाड्यांना लाल दिवे बसविण्यात आले होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सरकारी गाड्यांवरील लाल दिवे काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यात त्याची अंमलबजावणी झाली. परंतु, पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयास त्याबाबतचे कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. तरीही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या गाडीवरील लाल दिवा झाकून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासात अडचणी येत असल्याचे देवकाते यांचे म्हणणे आहे.

अशी आहे मागणी
‘वाहनावरील लाल दिवा झाकून ठेवल्याने सरकारी कार्यक्रमांसह बैठकांना जाताना प्रवासादरम्यान अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे वेळेवर उपस्थित राहणे शक्य होत नाही. पुणे जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता जुन्नर, आंबेगाव, खेड हे तालुके आदिवासी भागात आहेत. भोर, मावळ, मुळशी, वेल्हे हे तालुके अंत्यत दुर्गम व डोंगराळ भागात आहेत. या भागात सरकारी कामकाजानिमित्ताने प्रवास करताना रात्री प्रवास करण्याची वेळ येते. त्या वेळी सरकारी वाहनांवर लाल दिवा बसविण्यास तसेच सरकारी खर्चाने हत्यारासह पोलिस शिपाई अर्थात अंगरक्षक देण्यात यावा,’ अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी पत्राद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुद्रांक शुल्कासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

$
0
0

जिल्हा परिषद अध्यक्षांची भूमिका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
जिल्ह्यातील झालेल्या खरेदी विक्रीच्या व्यवहारानुसार जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या निधीवर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) डोळा ठेवला आहे. ‘पीएमआरडीए’ला हा निधी गेल्यास जिल्ह्याचा विकास खुंटण्याची शक्यता असल्याने या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते दाद मागणार आहेत.
जिल्ह्यातील खरेदी विक्री व्यवहारांच्या प्रमाणानुसार राज्य सरकारकडून एक टक्के मुद्रांक शुल्क जिल्हा परिषदेला देण्यात येतो. परंतु, ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत जिल्ह्यातील ११ शहरे आणि आठशे गावांचा समावेश आहे. या गावामध्ये पायाभूत सुविधा करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. पुणे जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडून मिळणाऱ्या एक टक्के मुद्रांक शुल्कापैकी अर्धा निधी नागपूरच्या धर्तीवर ‘पीएमआरडीए’ला द्यावा, अशी मागणी ‘पीएमआरडीए’ने नुकतीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीमुळे जिल्हा परिषद प्रशासन अस्वस्थ झाले आहे.
जिल्ह्यातील विविध गावांचा पायाभूत सुविधांसह अन्य गोष्टींचा विकास करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. सध्या उपलब्ध निधी अपुरा आहे. त्यात मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीत ‘पीएमआरडीए’ने वाटा मागितला आहे. तो वाटा सरकारने त्यांना दिल्यास जिल्ह्यातील विकासकामांना खीळ बसेल, अशी भीती जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठीच जिल्हा परिषदेच्या विविध पक्षांच्या गटनेत्यांनी सुद्धा या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे.
‘मुद्रांक शुल्कापैकी अर्धा निधी 'पीएमआरडीए'ला दिल्यास जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या विकास कामांवर परिणाम होणार आहे. यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजनांवर परिणाम होणार आहे. मुद्रांक शुल्काचा निधी कमी झाल्यास जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आर्थिकदृष्ट्या कमकुवत होणार आहे. मुद्रांक शुल्क विभागाकडे जिल्हा परिषदेला १८९ कोटी ५७ लाख ७५ हजार रुपये थकीत आहे. त्यामुळे सरकारकडे ही थकबाकी त्वरित जिल्हा परिषदेला द्यावी,’ अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी केली.
0000
मुद्रांक शुल्कातील जिल्हा परिषदेच्या वाट्यातील अर्धा टक्का निधी हा ‘पीएमआरडीए’ला देण्यात येऊ नये, या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहोत. त्यासाठी लवकरच त्यांची भेट घेणार आहोत.
- विश्वासराव देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिनेट’ नोंदणी प्रक्रियेला ११ जुलैपर्यंत मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर (अधिसभा) दहा पदवीधर सदस्य निवडून देण्यासाठी पदवीधरांची नोंदणी करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या पदवीधर नोंदणीसाठी नऊ दिवस शिल्लक राहिले असून, पदवीधरांना येत्या ११ जुलैपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे.
विद्यापीठातून पदवी घेतलेल्या विद्यार्थीच या नोंदणीसाठी पात्र असणार आहेत. या वेळी ऑनलाइन नोंदणीची सोय उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या
election.unipune.ac.in या निवडणूक पोर्टलवर फोटो, स्वाक्षरी, पदवी प्रमाणपत्र व रहिवासी पुरावा (आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / निवडणूक ओळखपत्र / शिधापत्रिका / पासपोर्ट किंवा वीजबिल यापैकी कोणताही एक पुरावा) अपलोड करावे लागते. त्यानंतर अर्ज व चलनाची प्रिंट काढून बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोणत्याही शाखेत २० रुपये भरून नगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील तालुकास्तरीय मतदान केंद्र असलेल्या कॉलेजमध्ये अर्ज जमा करून मतदार होता येणार आहे.
..
नोंदणीसाठी विशेष मोहीम
नोंदणीकृत पदविधारकांना ऑनलाईन नोंदणीत अडचणी येत आहेत. त्यामुळेच निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू इच्छिणाऱ्यांसाठी लोकरंग फाउंडेशन या संस्थेने विशेष हेल्पलाइन सुरू केली आहे. मतदारांना फक्त व्हॉट्सअॅप व ई-मेलद्वारे किंवा प्रत्यक्ष हजर राहून नोंद करण्याची सोय लोकरंग फाउंडेशनने केली आहे. त्यासाठी ९४२२४६२००३ या मोबाइल नंबरवर किंवा sachin.chobhe@gmail.com या ई-मेलवर माहिती पाठवावी. तसेच, कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित छायांकित प्रत नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील सुडके मळा येथील सक्षम अकादमी या संस्थेत पोहोच केल्यानंतर नोंदणीसाठी विनामूल्य सहकार्य केले जाईल, अशी माहिती सचिन चोभे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंगणे टेकडीचा कायापालट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वारज्यामाणेच हिंगणे येथील टेकडीचा कायापालट करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. लोकसहभागातून या वनजमिनीवर निसर्गप्रेमींना लवकरच नागरी वन उद्यान बघायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत राडारोडा आणि कचऱ्याने व्यापलेल्या या टेकडीवर वन कर्मचाऱ्यांनी सफाई केली आहे. या उजाड जागेवर स्थानिक झाडांची उद्याने, चालण्यासाठी पथ आणि लोकांना निवांत बसण्यासाठी पॅगोडे बांधण्यात येणार आहेत. वनविभागाच्या या अभिनव उपक्रमाचे उद्‍घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज (सोमवार, ३ जुलै) सकाळी होणार आहे.
हिंगण्यातील टेकडीवर अतिक्रमण होऊ नये यासाठी वनविभागाने हिंगण्यातील संरक्षित भिंतीचे काम नुकतेच पूर्ण केले. त्यानंतर आता या ठिकणी नागरी वन उद्यान बनविण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत वारजे टेकडीवर अतिक्रमण आणि कचऱ्याचे साम्राज्य होते. दोन वर्षांपूर्वी वनाधिकाऱ्यांनी टेकडीच्या एका बाजूचे सर्व अतिक्रमण हटवून कॉर्पोरेट कंपन्या, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून टेकडीचा परिसर स्वच्छ केले आणि येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले होते. तत्कालीन केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या नागरी वन उद्यानाचे उद्‍घाटन झाले होते. त्यानंतर या टेकडीचे रूप पालटले. या टेकडीवर आता बहुसंख्य नागरिक फिरण्यासाठी, व्यायामासाठी येतात. याच धर्तीवर हिंगणे येथील टेकडीचा कायापालट करण्यात येणार आहे. या ठिकाणी अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी नुकतीच संरक्षक या ठिकाणी अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी नुकतीच संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. राज्य भरात सध्या राबविण्यात येत असलेल्या चार कोटी वृक्ष लागवड महोत्सवाअंतर्गत आज (सोमवार) टेकडीवर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिंगणे येथे वृक्षारोपण करून नागरी वन उद्यानाच्या कामाला सुरुवात होते आहे.
..
असे असेल नागरी वन उद्यान
० हिंगणे येथील वनक्षेत्र सुमारे आठ हेक्टरमध्ये पसरलेले आहे.
० टेकडीचा विकास करताना आम्ही सर्व कामे पर्यावरणपूरक पद्धतीने होणार आहेत.
० हिंगणे टेकडीवरील उद्यानाला प्रवेशद्वार, विविध ठिकाणी जैववैविध्याची माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत.
० स्थानिक वृक्षांची लागवड
..
हिंगणे टेकडीवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी होणाऱ्या नागरी वन उद्यानाला प्रवेशद्वार बसविण्यात येणार आहे. जैवविविध्याचे माहिती देणारे फलक, वन तलाव, पॅगोडे बांधण्यात येणार आहेत. टेकडीवर स्थानिक वृक्ष लावण्यात येणार आहेत.
- महेश भावसार, सहायक वनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकार विभाग आयुक्तांविना

$
0
0

दोन महिन्यांपासून पद रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीत सहकार विभाग हा महत्त्वाचा असताना, राज्य सरकारने सहकार आयुक्त हे पद सुमारे दोन महिन्यांपासून रिक्त ठेवल्यामुळे या विभागाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. आयुक्तविना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यात येत नसल्याने ‘झिरो पेडन्सी’ झालेल्या या विभागात पुन्हा फायलींचा ढिगारा वाढू लागला आहे.

राज्य सरकारने एप्रिल महिन्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यानुसार तत्कालीन सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांची पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांच्या जागी जगदीश पाटील यांची नियुक्ती झाली. २४ एप्रिल रोजी दळवी यांनी सहकार आयुक्त पदाचा कार्यभार सोडल्यानंतर पाटील यांनी ११ मे रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते लगेच रजेवर गेले. दरम्यानच्या काळात कोकण विभागाचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी पाटील यांची नेमणूक झाली. तेव्हापासून हे पदही रिक्त आहे.

दळवी हे सहकार आयुक्त असताना, त्यांनी या विभागात ‘झिरो पेडन्सी’चा उपक्रम राबविला होता. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लागली होती. मात्र, आता आयुक्त नसल्याने फायलींचा ढिगारा वाढू लागला आहे.

राज्य सरकारने ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे. त्याच्या अंमलबजावणीत सहकार विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मात्र, राज्य सरकारने सहकार आयुक्त नेमले नसल्याने सध्या या विभागाची भूमिका केवळ बघ्याची झाली आहे. आयुक्त नसल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याचे या विभागातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशात १९०४ पासून सहकार चळवळ अस्तित्त्वात आहे. १९१२ नंतर सहकारी संस्थांचा कायदा करण्यात आला. त्या कायद्यानुसार सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांची नोंदणी सुरू झाली. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निबंधकाची नियुक्ती करण्यात आली, आणि त्यामधूनच सहकार विभागाची स्थापना झाली. सुरुवातीला केंद्र सरकारच्या अखत्यारीत सहकार हा विषय होता. स्वातंत्र्यानंतर सहकार हा विषय संबंधित राज्य सरकारांकडे ठेवण्यात आला. राज्य सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० हा कायदा केला. या कायद्यानुसार सहकारी संस्थांची नोंदणी, संस्थांच्या सभासदांचे हक्क व जबाबदाऱ्या, संस्थांची कर्तव्ये व विशेषाधिकार, राज्य सरकारचे संस्थांना विविध स्वरुपाचे आर्थिक व अन्य सहाय्य, संस्थांची मालमत्ता व निधी, संस्थांचे व्यवस्थापन, संस्थांच्या व्यवहाराचे लेखापरीक्षण, चौकशी, तपासणी व देखरेख, विवादांची सोडवणूक या विभागामार्फत होते. मात्र, आयुक्त नसल्याने या कामकाजावर परिणाम झाला आहे.
...
पुन्हा फायली प्रलंबित
सहकार खात्यात गेले दोन महिने आयुक्तपदी कोणत्याही अधिकाऱ्याची नेमणूक झालेली नाही. त्यामुळे या विभागाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. आयुक्तच नसल्याने कोणतेही महत्त्वाचे आणि धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे या विभागात पुन्हा फायली प्रलंबित राहू लागल्या आहेत. त्यातच सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीत सहकार विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. सहकार आयुक्तांअभावी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंबंधीचे कामही रेंगाळले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images