Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालखीत अडथळा; भिडे गुरूजींविरुद्ध गुन्हा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानच्या संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पुण्याच्या डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करु लागले. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतला. यामुळे संभाजी भिडेंचे कार्यकर्ते व वारकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे माऊलींची पालखी गुडलक चौकात एकाच जागी थांबून राहिली. माऊलींच्या पालखीला पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला. मागील अनेक वर्षांपासून भिडे गुरुजींचे समर्थक हा प्रकार करत असल्याचा आरोप दिंडीतल्या प्रमुखांनी केला. या प्रकाराची दखल घेत डेक्कन पोलिसांनी भिडे गुरुजी आणि पालखीत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

भिडे गुरुजींच्या कार्यकर्त्यांकडून असा प्रकार नेहमी होत असल्याने वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी वारकऱ्यांची समजूत घातली व असा प्रकार आता यापुढे होणार नाही, असे लेखी हमीपत्र पोलिसांनी ज्ञानोबा माऊली पालखी प्रशासनाला दिल्याने यावर पडदा पडला. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांची पालखी मार्गस्थ झाली.

वारीत गोंधळ झाला नाही

आम्ही केवळ ज्ञानोबा, तुकोबांच्या दर्शनासाठी या वारीत सहभागी होत असतो. आमच्या कार्यकर्त्यांनी वारीत कोणताही गोंधळ केला नाही किंवा कोणत्याही तलवारीही त्या ठिकाणी नेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांनी दिलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बिले रोखून भाजपचा मलिदा खाण्याचा डाव’

$
0
0

विरोधी पक्षनेते योगेश बहल यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारांची सुमारे दीडशे कोटी रुपयांची दीड हजार बिले रोखून धरली असून, त्यातून मलिदा खाण्याचा हेतू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सोमवारी केला. महापौर आणि सभागृह नेते कळसूत्री बाहुले असून, कारभार सत्ताबाह्य केंद्र चालवत असल्याची टीकाही त्यांनी केली. मात्र, आम्ही पारदरर्शक कारभार करीत असून, राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही पराभवातून सावरलेली नाही असा दावा सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे.

बहल म्हणाले, ‘महापालिकेचे २०१६-१७चे बजेट भाजपने कायदे आणि नियमांना तिलांजली देऊन मंजूर केले आहे. नियमानुसार, बजेटच्या अंतिम स्वीकृतीचा अधिकार महासभेचा असतानादेखील नियमाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. अगोदर बजेट मंजूर करून नंतर चर्चा करण्याचा अजब कारभार भाजपच्या सत्तेत सुरू झाला आहे. आर्थिक वर्ष संपल्याचे सांगत ३१ मार्च २०१७नंतर ठेकेदारांची बिले स्वीकारली नाहीत. त्यामुळे ठेकेदारांची १५९ कोटी रुपयांची सुमारे दीड हजार बिले अडकली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मंजूर झालेल्या कामांचा मलिदा लाटायचा भाजप पदाधिकाऱ्यांचा विचार दिसून येतो.’

मंगला कदम म्हणाल्या, ‘भाजपचे आपल्याच नगरसेवकांना अज्ञानात ठेवण्याचे डावपेच आहेत. स्थायी समितीकडे ५०० उपसूचना आल्या होत्या. त्यापैकी १९ उपसूचना स्वीकारल्या. त्या नेमक्या कोणत्या आहेत हे जाहीर करणे गरजेचे आहे.’

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत ठेकेदारांना पोसण्याचे काम केले आहे. परंतु, आम्ही ठेकेदारांना पोसणार नाही. पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही काय करायचे ते बहल यांनी सांगण्याची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही पराभवाच्या गर्तेतून सावरली नाही. आम्ही कोणाच्याही रिमोट कंट्रोलनुसार काम करत नाही.’ बजेटला मुळातच उशीर झाला होता. उपसूचना स्वीकारल्या असत्या, तर दोन दिवसांचा जास्त अवधी लागला असता, असेही एकनाथ पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-राष्ट्रवादीत वाक् युद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या शाब्दिक चिखलफेक सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी होत आहे. पालिका तिजोरीचे पहारेकरी म्हणविणारेच तिजोरीचे लुटारू असल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केला आहे. तर, शितोळे पिसाळल्यासारखे वागत असल्याचा दावा भाजपचे शहर सरचिटणीस प्रमोद निसळ यांनी केला आहे.

महापालिकेच्या तिजोरीचे पहारेकरी म्हणवून घेणारेच लुटारू झालेले दिसत आहेत. त्या वेळी भ्रष्टाचाराचे आरोप करणारेच सत्तेत आल्यानंतर शंभर पटीने भ्रष्टाचार करण्यासाठी तयार होत आहेत. पंतप्रधान आवास योजनेत पैसे कसे खायचे याचे नियोजन करण्यात ते मग्न आहेत. ‘नवीन काम काढू, नवीन ताट वाढू, सर्व मिळून खाऊ पेढा लाडू’ असे स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे आणि त्यांच्या कमिटीचे नियोजन असल्याचा आरोप माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, ‘पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी छोट्या आकाराची घरे बांधण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर आला आहे. परंतु, यापूर्वी महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान प्रकल्पाअंतर्गत १३ हजार २५० घरकुल निर्मितीस मान्यता दिली. त्यापैकी १०७ इमारतीतील चार हजार ४९४ घरकुलांचे वाटपदेखील झाले आहे. परंतु, सध्याच्या स्थायी समिती अध्यक्षा त्या काळात प्रशासकीय अडचणी शोधून गोरगरीबांना घरे मिळू न देण्यासाठी व झोपडपट्टीवासियांना त्याच अवस्थेत ठेवण्यासाठी विनाकारण राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करीत होत्या. आता पंतप्रधान आवास योजना किती चांगली आहे, हे सांगताना त्यांना शहरातील गरिबांचा पुळका येत आहे.’

‘गेल्या वर्षी पालखी सोहळ्यात कथित मूर्ती घोटाळ्याच्या नावाखाली भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी केली. आता हेच सत्ताधारी पदाधिकारी पालखी सोहळ्यानिमित्त वाटण्यात येणाऱ्या ताडपत्रीत भ्रष्टाचार करून स्वत:ची खळगी भरण्याचा कार्यक्रम करीत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोसरी एमआयडीसीत फायबर कंपनीला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
एमआयडीसी भोसरी येथील सुवर्ण फायब्रोटेक या फायबर कंपनीला रविवारी (१९ जून) पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली.

आगीचे कारण अद्याप कळाले नसून कंपनीच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील पाठीमागच्या बाजूने आगीला सुरुवात झाली. या ठिकाणी काही रसायने होती. रसायनांमुळे आग पसरली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, संपूर्ण कंपनी खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आग नियंत्रणात आणण्यासाठी पिंपरी, राहटणी, एमआयडीसी भोसरी, प्राधिकरण, तळवडे, खडकी, पुणे तसेच टाटा मोटर्स कंपनीचा बंब अशा एकूण १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग नियंत्रणात आली. मात्र, धूर येत असल्याने, तसेच कंपनीत फायबर असल्याने आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यास दुसरा दिवस उजडला. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळीच काही काळासाठी थांबविण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आवास’ची उत्सुकता

$
0
0

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ९ हजार सदनिकांचा प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत उभारण्यात येणाऱ्या सुमारे साडेनऊ हजार सदनिकांच्या प्रस्तावावर सर्वसाधारण सभेतील निर्णयाबाबत लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रस्तावास प्रशासकीय मान्यता, बांधकाम परवानगी, पर्यावरण खात्याकडील ना हरकत दाखला, राज्य सरकारच्या केंद्रीय आणि संनियत्रण समितीची मान्यतेसाठी शिफारस यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय सभेमध्ये होणार आहे.

केंद्र सरकारने नागरी भागाकरीता प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पालिकेने सामील होण्याबाबत राज्य सरकारने डिसेंबर २०१५मध्ये पालिकेला कळविले. त्यानंतर योजनेतील बारकावे समजून घेण्यासाठी एप्रिल आणि मे २०१६मध्ये झालेल्या परिसंवादातही महापालिकेच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. त्यानंतर पालिकेला प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. तसेच म्हाडाच्या राज्यस्तरीय सुकाणू अभिकरण समितीनेही योजनेचा आराखडा तयार करून तो पुणे गृहनिर्माण क्षेत्र व क्षेत्र विकास मंडळाच्या कार्यालयाकडे सादर करण्यास सांगितले आहे. त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. प्रत्येक घरासाठी केंद्र सरकारकडून दीड लाख रुपये, राज्य सरकारकडून एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे. उर्वरित पाच लाख ७७ हजार रुपयांचा हिस्सा लाभार्थींचा असणार आहे. प्रत्येकी ३० चौरस मीटर चटई क्षेत्रापर्यंतची घरकुले देण्यात येणार आहेत. वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये असणारी व्यक्तीच योजनेसाठी पात्र ठरणार आहे. याशिवाय ‘सर्वांसाठी घरे’ योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार केला जाणार आहे. योजनेसाठी प्रकल्प सल्लागार म्हणून इनग्रेन आर्किटेक्ट अँड प्लानर यांची नेमणूक केली असून, त्यांच्यामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम चालू आहे.

प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे चऱ्होली (१,४४२), रावेत (१,०८०), डुडुळगाव (८९६), दिघी (८४०), बोऱ्हाडेवाडी (१,४००), वडमुखवाडी (१,४००), चिखली (१,४००), पिंपरी (५००), आकुर्डी (५००) या ठिकाणी योजना राबविण्याचे नियोजन आहे. यापैकी काही जागा पालिकेच्या पूर्णपणे ताब्यात असून, काही जागा सरकारी गायरान जमीन, खासगी मालक आणि एमआयडीसीच्या ताब्यात आहेत. त्या घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असताना स्वस्त घरकुल योजना राबविण्यात आली होती. ती अर्धवट राहिली. त्यानंतर केंद्र, राज्य आणि पालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यामुळे या पक्षाने पंतप्रधान आवास योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ही योजना पूर्णत्वास जाऊन प्रत्यक्ष लाभ मिळेल का, याबाबत लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारज्यात वाहनांची तोडफोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वारजे माळवाडी परिसरात रामनगर येथे गुंडाच्या टोळक्याने रविवारी परिसरात पार्किंग केलेल्या २५ ते ३० वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली. तोडफोड करताना अडविण्यासाठी आलेल्या एका नागरिकावर टोळक्याने वार केले.

एका गुन्ह्यात दोघांना अटक केल्यामुळे त्यांच्या साथीदारांनी हे कृत्य केले आहे. याप्रकरणी सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वारजे परिसरात असे प्रकार सुरू असून पोलिसांना या घटना रोखण्यात अपयश आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बाळू दत्तू आवटे (वय ४८, रा. रामनगर) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याबाबत तात्याबा श्रीरंग लंगर (वय ३४, रा. रामनगर, वारजे ) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून सोन्या शिंदे, नवनाथ ढेणे, वैभव भागवत व इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडीतील रामनगर परिसरात रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवर सात ते आठ जणांच्या टोळक्याने अचानक येऊन वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी पार्किंग करण्यात आलेल्या टेम्पो, दुचाकी, रिक्षा व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. काही वेळातच टोळके वाहनांच्या काचा फोडून तेथून पसार झाले. रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या वेळी अनेक जण बाहेरच गप्पा मारत बसले होते. त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला. वाहनांची तोडफोड सुरू असताना बाळू आवटे टोळक्याला अडवण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या हातावर कोयत्याने वार केले.

रामनगरमध्ये शनिवारी दगडफेकीचा किरकोळ वाद झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी रविवारी सायंकाळी दोघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोघांच्या साथीदारांनी दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शिवाजी चौकापासून गणपती माथा या रस्त्यावरील सर्वच वाहनांची तोडफोड करण्यात आली असून, यामध्ये २५ ते ३० वाहनांचे नुकसान झाले आहे. मात्र, अनेकांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केलेली नाही. ही सर्व वाहने सामान्य नागरिकांची आहेत. पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली असून त्यांच्याकडून काही जणांची नावे मिळाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखी सोहळ्यातून भाविकांचे सोने चोरीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी रोड येथील मॅगेझीन चौकात आली असता ७ भाविकांचे सुमारे साडे बावीस तोळे सोने चोरीला गेले. या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. रविवारी (१८ जून) हा सर्व प्रकार घडला आहे.

राधाबाई कांबळे (वय ४५, रा. देगुलुकर, नांदेड), अनिता गायकवाड (वय ४२, रा.सोलापूर) अशी अटक केलेल्या दोन संशयित महिलांची नावे आहेत. याप्रकरणी अजय महाजन (वय ४५, रा. खडकवासला) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिघीच्या मॅगेझीन चौकात आली. तेव्हा सात जणांच्या गळ्यातील दागिन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये २ लाख २५ हजार किमतीचे साडेबावीस तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. यामध्ये पुरुषांच्या गळ्यातील साखळ्या, महिलांचे मंगळसूत्र, गंठण आदीचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना संशयावरून अटक केली. त्यांना सोमवारी (१९ जून) शिवाजीनगर कोर्टात हजर केले असता कोर्टाने शुक्रवारपर्यंत (२३ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

चिंचवडमध्ये तरुणीवर वार

बोलत नसल्याच्या कारणावरून चिंचवड येथील पत्राशेड झोपडपट्टीमध्ये तरुणाने मैत्रिणीवर ब्लेडने वार केले. रविवारी (१८ जून) सायंकाळी ही घटना घडली असून, तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

ओंकार राऊत (वय २०, रा. पत्राशेड झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी व ओंकार एकाच भागात राहतात. त्या दोघांची मैत्री होती. मात्र, घरच्यांनी दोघांच्याही बोलण्यावर बंदी आणली. त्यामुळे मुलीने ओंकारशी बोलणे बंद केले. बोलणे बंद का केले, असे विचारत ओंकार याने रविवारी सायांकाळी ती एकटी असताना तिच्या दंडावर, पोटरीवर ब्लेडने वार केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाकारांची पंढरी

$
0
0


णे : लाखो नाटकांचे प्रयोग, संगीताचे कार्यक्रम, मातब्बर नेत्यांच्या सभा, दिग्गजांच्या भेटीगाठी ‘याचि देहि याचि डोळा’ अनुभवणारे बालगंधर्व रंगमंदिर सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. पाहता पाहता पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या गंधर्वनगरीने आजवर अनेक चांगले-वाईट अनुभव घेतले आहे. महाराष्ट्रातल्या कलाकार नेत्यांपासून ते पुणेकर रसिकांपर्यंत सर्वांनी या रंगमंदिराला भरभरून प्रेम दिले. ५० वर्षांपूर्वी या वास्तूचे लोकार्पण झाले. हे रंगमंदिर १९६१ साली आलेल्या पुरानंतर नव्याने वसणाऱ्या पुण्याची साक्ष देणारे ठरले. तत्कालीन कलारसिक, साहित्यिक, राजकीय नेत्यांनी आतोनात प्रयत्न करून ही वास्तू उभी केली त्याच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.
१९६१ साली पानशेतचे धरण फुटले आणि पुण्यात हाहाकार माजला. पुण्याचे वैभव पुराच्या पाण्यात वाहून गेले. पूर ओसरल्यानंतर एक नवे शहर बसवण्याचे आव्हान पुण्याच्या पालिका प्रशासनासमोर उभे राहिले. मग प्रयत्न सुरू झाले ते नव्याने शहर वसवण्याचे. पुण्याच्या डेक्कन परिसरात संभाजी उद्यानाला लागून एक जागा होती. त्यामध्ये मातंग समाजाची वस्ती राहात होती. पुरामुळे वस्तीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आणि प्रशासनाने या वस्तीचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. सेनापती बापट रस्त्यालगत मातंग समाजाच्या नागरिकांना जागा देण्यात आली. उद्यानाशेजारच्या जागेचा ताबा पालिकेला मिळाला. तेव्हा स्थानिक नगरसेवक भाऊसाहेब शिरोळे यांनी या जागेत महापालिकेचे नाट्यगृह असावे, असा आग्रह धरला. पालिका प्रशासनाने जागेची पाहणी करून नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला.. महापौर नानासाहेब गोरे यांनीही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली. तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कारळे यांनी प्रकल्पासाठी बजेट मंजूर केले. दर वर्षी टप्प्याटप्प्याने नाट्यगृहाच्या बांधकामासाठी बजेट दिले जात होते. सहा वर्षे नाट्यगृहाचे बांधकाम सुरू होते. त्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी खर्च केला गेला.

पुण्यामध्ये भरत नाट्य मंदिर, महाराष्ट्र मंडळातील रंगमंच, डेक्कन जिमखान्यात असलेला खुला रंगमंचासारखी काही जुनी छोटी नाट्यगृहे होती. ज्यामध्ये संगीत नाटकांचे प्रयोग आणि शास्त्रीय संगीताच्या मैफली होत असत. त्यामुळे शनिवार, सदाशिव, नारायण, नवी पेठ या भागातील मध्यमवर्गीयांना आणि डेक्कन परिसरातील नागरिकांना सोयीचे ठरावे यासाठी बालगंधर्वच्या निर्मितीचा प्रस्ताव समोर आला. आणि बालगंधर्वला हिरवा कंदील देण्यात आला.

बालगंधर्व रंगमंदिराची बांधणी करायचे ठरल्यानंतर महापालिकेने पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक माधव वझे हे देखील त्या समितीचे सदस्य होते. पु. ल. देशपांडे यांच्या देखरेखीखाली त्यांना हव्या त्या पद्धतीने बालगंधर्वची रचना केली जाईल, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. बी. जी. शिर्के यांच्या कंपनीला नाट्यगृहाच्या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली. शिर्के हे नाट्यगृहाच्या जागेच्या अगदी समोर राहत असत. त्यामुळे रात्रंदिवस त्यांचे या बांधकामाकडे लक्ष होते. बांधकाम सुरू होत असताना शिर्के आणि पु. ल. यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या दोघांनी या कामाला आपल्या घरातले कार्य असल्यासारखे महत्त्व दिले होते.

‘पुलं’च्या पुढाकारातून
रंगमंदिराला बालगंधर्वांचे नाव

२६ जून १९६८ रोजी झालेल्या भव्य उद्घाटन सोहळ्यात त्याचे लोकार्पण करण्यात आले. नाट्यगृहाला काय नाव द्यावे, याबद्दल अनेकवेळी चर्चा झाल्या; पण अखेर ‘पुलं’नीच बालगंधर्वांचे नाव सुचवले आणि ही गंधर्वनगरी बालगंधर्वांच्या नावाने लाकार्पित झाली. उद्घाटन सोहळ्याला आचार्य अत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते; पण तब्येतीच्या कारणाने ते उपस्थित राहू शकले नाहीत. अखेर पु. लं.च्या उपस्थितीत नाट्यगृहाचे उद्घाटन झाले. रंगमंदिरातील पहिलावहिला कार्यक्रमही पु. ल. देशपांडे यांनीच केला. बालगंधर्वांच्या संगीत नाटकांमधील गाण्यांच्या या कार्यक्रमात स्वतः पु. लं.नी निवेदन करत रंग भरले. मग खऱ्या अर्थाने बालगंधर्व हजारो कलाकारांची पंढरी झाली.


बालगंधर्व नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा ज्या दिवशी पार पडला; त्या वेळी मी नगरसेवक होऊन दहा दिवस झाले होते. पु. ल. देशपांडे यांनी या नाट्यगृहासाठी घेतलेली मेहनत डोळ्यांनी पाहिलेली आहे. बी. जी. शिर्के आणि त्यांच्या जोडीने त्यावेळच्या आशियामधील सर्वोत्कृष्ट नाट्यगृहांमध्ये मोडणाऱ्या बालगंधर्वची बांधणी केली. ‘स्त्री असून पुरुषासारखा पराक्रम करणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा आणि ‘पुरूष असून स्त्रीवेश धारण करत उभ्या महाराष्ट्राला कलेचे वेड लावणाऱ्या बालगंधर्वांच्या नावाचे रंगमंदिर असा योग आज एकाच ठिकाणी जुळून आला आहे.’ बालंगंधर्वच्या उद्घाटन प्रसंगी पु. लं. नी काढलेले हे उद्गार आजही कानात घुमतात.
-श्रीकांत शिरोळे,
तत्कालीन नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभिजात विनोदी चित्रपटांचा महोत्सव

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी चित्रपटांची प्रदीर्घ परंपरा ठसठशीत करण्यासाठी, चांगल्या विनोदाचा स्रोत दाखविण्यासाठी मराठी विनोदी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ‘ब्रह्मचारी’ या दुर्मिळ चित्रपटापासून ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चि. व चि. सौ. का’ अशा चित्रपटांचा आस्वाद चित्रपटप्रेमींना घेता येणार आहे. अंगविक्षेप हा विनोद नसून, अभिजात विनोद काय असतो, याकडे महोत्सवाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात येणार आहे. यासाठी निमित्त ठरले आहे ते ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार प्रा. द. मा. मिरासदार यांच्या नव्वदीचे.
द. मा. मिरासदार प्रतिष्ठान, आशय फिल्म क्लब आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्यातर्फे २२ ते २६ जून दरम्यान महोत्सव होणार आहे. द. मा. अर्थात दादांनी १४ एप्रिल २०१७ रोजी वयाची ९० वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त त्यांचा परिवार आणि विविध संस्थांच्या सहकार्याने वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. हा महोत्सव त्याचाच भाग आहे. विविध चित्रपटांच्या माध्यमातून त्या-त्या टप्प्यातील विनोदी परंपरेवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. मिरासदार यांचे जावई तसेच प्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकणी, संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, आशयचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महोत्सवाचे उद्घाटन २२ तारखेला सायंकाळी ५.३० वाजता प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधी दुपारी तीन वाजता ‘ब्रह्मचारी’; तर उद्घाटनानंतर ‘कायद्याचं बोला’ हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. शुक्रवारी दुपारी तीन वाजता ‘पेडगावचे शहाणे’ व त्यानंतर ‘अवघाची संसार’ तसेच शनिवारी सकाळी १० वाजता ‘सोंगाड्या’ व दुपारी तीन वाजता ‘गुळाचा गणपती’ हे अभिजात चित्रपट पाहता येतील. रविवारी सकाळी १० वाजता ‘धुमधडाका’, दुपारी तीन वाजता ‘वऱ्हाडी वाजंत्री’, सायंकाळी सहा वाजता ‘सवत माझी लाडकी’ हे चित्रपट दाखविण्यात येतील.
सोमवारी दुपारी तीन वाजता ‘चि. व चि. सौ.का’ हा चित्रपट दाखविण्यात येईल. त्यानंतर समारोप कार्यक्रमात मिरासदार हे चित्रपट निर्मितीतील विनोदी प्रसंग उलगडणार असून, त्यांचे भाषण ऐकणे हा आनंदाचा ठेवा असेल. या वेळी ‘चि.व चि. सौ. का’ चित्रपटातील कलाकारांशी गप्पांचा कार्यक्रम तसेच राजा परांजपे, दादा कोंडके, विश्वास सरपोतदार, स्मिता तळवलकर यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ‘एक डाव भुताचा’ चित्रपटाने समारोप होईल. महोत्सव सर्वांसाठी खुला असून मोफत प्रवेशिका आज, मंगळवारपासून संग्रहालय आणि ग्राहक पेठ येथे मिळतील.



विनोद हा माणसाचा स्थायीभाव आहे. चित्रपट बोलू लागला आणि अवघ्या एक-दोन वर्षांत तो सवयीने विनोदी बोलू लागला. मराठी माणसाच्या स्वभावाप्रमाणेच उपहासाचे गहिरे रंग, फजितीचे अनोखे ढंग चित्रपटांनी दाखविले. शंभर वर्षांच्या मराठी चित्रपटाने प्रदीर्घ हास्यपरंपरा निर्माण केली. हा महोत्सव त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे.
- रवींद्र मंकणी, अभिनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिपॉझिटची रक्कम लंपास करणारा अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ओएलएक्स या वेबसाइटवरून फ्लॅट भाड्याने द्यायचा असल्याची जाहिरात करून एका महिलेला फ्लॅट दाखविल्यानंतर ​तिने दिलेली डिपॉझिटची रक्कम लंपास केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टाने २१ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याने आणखी तिघांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
अमेय अनिल घोलप (रा. यशवंत निवास, प्रशांतनगर, नवी पेठ) याला अटक करण्यात आली आहे. तर अनिल घोलप, अमेय याच्या आई व पत्नीविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एका २४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना सात मे रोजी घडली. ओएलएक्स या वेबसाइटवर अमेय घोलप याने भाड्याने फ्लॅट उपलब्ध असल्याची जाहिरात दिली होती. फिर्यादी यांना भाड्याने फ्लॅट हवा असल्याने त्यांनी वेबसाइटवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला.
अमेय याने त्यांना घरभाड्यापोटी सात हजार रुपये महिना आणि डिपॉझिट स्वरूपात १५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून फ्लॅट दाखविला. फिर्यादी यांना फ्लॅट आवडल्यानंतर त्यांनी अमेयला १५ हजार रुपये दिले. मात्र, अमेयने फ्लॅट तसेच डिपॉझिट स्वरूपात भरलेली रक्कम परत केली नाही. याबाबत त्याच्याशी संपर्क केला असता त्याच्या घरच्यांनी मोबाइलवरून शिवीगाळ करत तुझ्याकडे बघून घेईन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तपासादरम्यान त्याने फिर्यादीसह अन्य तिघांची सुमारे ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी त्याला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यातील रक्कम जप्त करायची आहे. यामध्ये त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत का, तसेच त्याने हा गुन्हा का केला, त्याचा यामागे काय उद्देश होता याचा तपास करायचा आहे. त्याची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील अनंत चौधरी यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाशे कोटींच्या योजनांचा मागील दाराने प्रवेश

$
0
0

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ केलेल्या योजनांना ‘साइडट्रॅक’ करत, महापालिका आयुक्त आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (पीएससीडीसी) संचालक कुणाल कुमार यांच्या हट्टाखातर तब्बल सहाशे कोटी रुपयांहून अधिकच्या प्रकल्पांची ‘बॅकडोअर एन्ट्री’ योजनेमध्ये झाली आहे. या योजनांचा पालिकेलाही भुर्दंड बसला असून, त्यासाठी सरसकट खोदाई शुल्क माफ करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी स्पर्धेत पुण्याला दुसरा क्रमांक मिळाल्याने देशभरातील विविध शहरांच्या योजनांचा शुभारंभ गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात झाला. या वेळी पुण्यातील १४ योजनांची मुहूर्तमेढ पंतप्रधानांनी रोवली. गेल्या वर्षभरात त्यापैकी मोजक्या योजनाच कागदावरून प्रत्यक्षात उतरल्याचे दिसून आले आहे. या १४ योजनांपैकी अनेक योजना बाजूला सारत, गेल्या वर्षभरात वेगळ्याच योजनांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
‘स्मार्ट एलिमेंट्स’अंतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय आणि इतर सुविधांच्या निर्मितीसाठी सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शहरातील उद्यानांमध्ये कोणाचीही परवानगी न घेता, मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली. उद्यान विभागाला अंधारात ठेवत, आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारांमध्ये ही परवानगी दिली. तर, शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि चौकांमध्येही माहिती फलक बसविण्यासाठी खोदाई शुल्क माफ करत परवानगी देण्यात आली. सुमारे दीडशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढे रेटण्यासाठी सुरुवातीपासून आयुक्तांनी घेतलेली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. शहराच्या वेगवेगळ्या भागांतील मोकळ्या जागा विकसित करण्यासाठी ‘प्लेसमेकिंग’च्या योजनेचा अंतर्भाव असाच नव्याने करण्यात आला. त्या अंतर्गत बाणेर परिसरातील दोन जागांवर काम सुरू करण्यात आले असून, त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पाच वर्षांचा ठेका देण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात अद्ययावत सुविधा निर्माण करण्यासाठी ‘फायबर ऑप्टिक केबल’ टाकण्याच्या योजनेचा समावेश आयत्या वेळी समान पाणीपुरवठा योजनेत (२४ बाय ७) करण्यात आला. सुरुवातीला स्मार्ट सिटीतील ठराविक भागापुरती मर्यादित असलेली ही योजना संपूर्ण शहराच्या स्तरावर विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा सर्व भुर्दंडही पालिकेलाच सोसावा लागणार आहे.

अॅडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंटचे गौडबंगाल
स्मार्ट सिटीच्या १४ योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या; पण एका कंपनीला काम मिळावे, याकरिता शहरात अॅडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंटचे तब्बल २६५ कोटी रुपयांच्या कामाची एन्ट्रीही नव्यानेच झाली. स्मार्ट सिटीचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांनीच या प्रकल्पाबाबत शंका उपस्थित करून त्यातील काही त्रुटींकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे पुणे स्मार्ट सिटी कंपनीच्या गेल्या दोन बैठकांमध्ये त्यावर निर्णय होऊ शकला नाही. तसेच, त्यामध्ये काही त्रुटी असल्याचा साक्षात्कार आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे संचालक कुणाल कुमार यांना झाल्याने आता पुन्हा नव्याने त्याचा प्रस्ताव दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावांच्या समावेशामुळे पालिकेसमोर आव्हाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या हद्दीलगतच्या ३४ गावांचा समावेश पालिकेत झाल्यास त्यांना पाण्यासह इतर सुविधा देताना आव्हाने उभी राहणार असल्याचे स्पष्ट संकेत देत, त्याबाबत सर्वंकष विचार करून निर्णय घेऊ, अशी भूमिका पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी मांडली. त्यामुळे गावांच्या समावेशाबाबत कोर्टापुढे ‘सकारात्मक’ असल्याचे प्रतिज्ञापत्र देणारे सरकार अजूनही संभ्रमावस्थेत असल्याचे स्पष्ट होत आहे.
हद्दीलगतच्या गावांच्या पालिका समावेशावरून भाजपमध्ये दोन गट असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासल्याच्या आमदारांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गावांचा समावेश करण्याबाबत आग्रही भूमिका मांडली होती. परंतु, या गावांच्या समावेशाबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी पुन्हा विरोधी भूमिका मांडली. गावांच्या समावेशामध्ये अनेक अडचणी असल्याचे सांगत, त्यांनी या संबंधी निर्णय घेण्यासाठी येत्या बुधवारी (२१ जून) मुंबईत बैठक बोलावली असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘शहरामध्ये ३४ गावांचा समावेश करायचा झाल्यास, त्यांच्यासाठी अतिरिक्त पाणीसाठ्याची गरज भासणार आहे. महापालिकेच्या सध्याच्या बजेटमधून सर्व गावांमध्ये नागरी सुविधा पुरविताना ताण येण्याची शक्यता आहे. या गावांच्या विकासासाठी पाच हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्याची मागणी पालिकेने केली आहे. त्यामुळे, सर्वसमावेशक विचार करून मगच गावांच्या समावेशाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.’
पुणे महापालिकेच्या हद्दीलगतची ३४ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यासाठी मुंबई हायकोर्टाने सरकारला तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. ही मुदत जूनअखेरीस संपणार आहे. त्यामुळे या गावांच्या समावेशावर सरकारकडून शिक्कामोर्तब केले जाईल, अशी अपेक्षा असताना, त्याबाबत बैठका घेत पुन्हा चालढकल केली जात असल्याचे दिसून येत आहे. मुंबईच्या बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी आणि विविध खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

‘सकारात्मक’ सरकारमध्ये पालकमंत्र्यांची ‘नकारघंटा’
पालिका हद्दीलगतची ३४ गावे सध्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीमध्ये येतात. या गावांचा समावेश पालिकेत केला जाऊ नये, असे पत्र यापूर्वी पीएमआरडीएचे तत्कालीन अध्यक्ष म्हणून गिरीश बापट यांनी नगरविकास खात्याला पाठवले होते. त्या वेळी त्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. कालांतराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमआरडीएचे अध्यक्षपद पालकमंत्र्यांकडून काढून घेतले. निर्णय घेत नसल्याने कोर्टाने नुकतेच सरकारला फटकारले असूनही, पालकमंत्र्यांचा गावांचा समावेश न करण्याबाबतचा हट्ट कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामचुकार कर्मचाऱ्यांना आयुक्त लावणार शिस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेत‌ काम करणाऱ्या कामचुकार आणि उशिरा कामाला येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा निर्णय पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतला आहे. पालिकेत बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक असतानाही अनेक कर्मचारी याकडे दुर्लक्ष करून कामावर उशिरा येतात आणि वेळेपूर्वीच निघून जात असल्याचा प्रकार लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी आदेश काढले आहेत. बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई‍ करण्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर देण्यात आली असून त्याचा अहवाल पालिका प्रशासनाकडे पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी, अधिकारी आपापल्या विभागात हजर नसतात. पालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये हे कर्मचारी फिरत असल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे पालिकेच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये नकारात्मक निर्माण होते. कार्यालयीन शिस्तीसाठी पालिकेने सुरू केलेल्या बायोमेट्रीक हजेरीचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. मात्र, याचे पालन गांभीर्याने होत नसल्याचे देशभ्रतार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी यापुढील काळात प्रत्येक खात्यात प्रशासनाने ठेवलेल्या ‘आउट डोअर’ रजिस्टरमध्ये नोंद करणे बंधनकारक आहे. अशा पद्धतीची नोंद घेतली जात आहे की नाही, हे दर आठवड्याला तपासून ही नोंद प्रमाणित करावी, असे आदेश सर्व खातेप्रमुखांना देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या खात्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना तसेच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येताना आणि बाहेर जाताना बायोमेट्रीक नोंद करणे अनिवार्य आहे. बायोमेट्रीक नोंद केल्यानंतरही खात्यात ठेवलेल्या हजेरीपत्रावर कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी करणे गरजेचे आहे. जे कर्मचारी सतत उशिरा येतात, कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहतात, कामाव्यतिरिक्त इतर विभागांमध्ये फिरत असतात, अशा कर्मचाऱ्यांची वर्गवारी संबंधित विभागप्रमुखाने करून त्याचा अहवाल तयार करावा, असे आदेश देशभ्रतार यांनी दिले आहेत.

अतिरिक्त आयुक्तांच्या सूचना
- वाहतुकीच्या कोंडीमुळे कर्मचारी दहा मिनिटे उशिरा आल्यास त्याला दहा मिनिटांची सूट द्यावी.
- दोन वेळा लेखी ताकीद दिल्यानंतर तिसऱ्या वेळेस कर्मचारी उशिरा आल्यास एक दिवसाची रजा कापावी.
- कर्मचाऱ्यांवर वचक राहण्यासाठी विभागप्रमुखांनी अचानक तपासणी करावी.
- प्रत्येक आठवड्याला अहवाल तयार करावा.

‘आधी अद्ययावत मशिन द्याव्यात’
पालिकेने हजेरी नोंदविण्यासाठी बसविलेल्या अनेक मशिन खराब झाल्या असून त्यावर नोंदणी होत नाही. ज्या ठेकेदाराने या मशिन दिल्या होत्या, त्याची मुदत संपल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. काही कर्मचाऱ्यांची नोंद बायोमेट्रीकमध्ये होत नसल्याचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिका प्रशासनाने पहिल्यांदा बायोमेट्रीकसाठी अद्ययावत मशिन उपलब्ध करून द्याव्यात, त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमजान महिन्यात वारकऱ्यांची सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालख्यांसोबत पुण्यात दाखल झालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी नेहमीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक संस्था, गणेश मंडळे आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. चहापाण्यापासून अन्नदान, रेनकोट वाटप आणि वैद्यकीय सेवा अशा विविध प्रकारची मदत वारकऱ्यांना करण्यात आली.
एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी झाल्याने इतर धर्माविषयी आदर निर्माण होतो, या भावनेने मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांची सेवा केली. वारकऱ्यांची सेवा केल्याने पवित्र रमजान महिना अधिक पवित्र झाला.
श्री सत्ताविसा जैन सिटी ग्रुपतर्फे आरोग्य शिबिर घेण्याबरोबरच औषध वाटप, चष्मे वाटप करण्यात आले. नवयुवक तरुण मंडळातर्फे दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या वस्तू देण्यात आल्या. टिंबर मार्केट व्यापारी संघातर्फे अन्नपदार्थ तसेच रेनकोटचे वाटप करण्यात आले. इस्कॉन पालखीचे मंजितसिंग विरदी फाउंडेशनने स्वागत केले. नवसम्राट तरुण मंडळाने जीवनावश्यक वस्तू दिल्या. रमाबाई महिला विकास संस्थेने चहा व नाष्ट्याची व्यवस्था केली होती. लष्कर भागातील खाण्या मारुती मंदिर, हिंद बाल मित्र मंडळ, हिंद तरुण मंडळ, पुणे कॅन्टोन्मेंट रिक्षा संघटना, श्रीकृष्ण तरुण मंडळ, श्रीकृष्णा रिक्षा स्टँड, राजेश्वर तरुण मंडळ यांनी विविध सेवा पुरवल्या. रिझवानी मशिद तलवार ताबूत ट्रस्टतर्फे अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
डॉ. दुधभाते नेत्रालय व आदित्य फाउंडेशनतर्फे मोतिबिंदू तपासणी करण्यात आली तसेच मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. माजी नगरसेवक रामभाऊ गणपुले यांनी निवासाची व्यवस्था केली होती. पं. दीनदयाळ उपाध्याय नागरी पतसंस्थेतर्फे चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. याबरोबरच खडक पोलिस ठाणे, भोई प्रतिष्ठान, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, काँग्रेसचे प्रभाग ४१ चे अध्यक्ष आयाझ पठाण, सुकांता ट्रस्ट, जय आनंद ग्रुप, पद्मकृष्ण फाउंडेशन यांच्यातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले.

वारकऱ्यांनी घेतला शीरखुर्म्याचा आस्वाद
पुणे नवरात्र महोत्सवातर्फे आयोजित उपक्रमात वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुस्लिम बांधवांनी हिरीरीने पुढाकार घेतला. एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी झाल्याने इतर धर्माविषयी आदर निर्माण होतो, या भावनेने मुस्लिम बांधवांनी सेवा केली. पवित्र रमजान महिन्यात वारकऱ्यांच्या पायाला तेलाने मसाज करून वारकऱ्यांना पुढचा प्रवास सुखकर होण्याची प्रार्थना तरुणांनी केली. मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट व श्री समर्थ स्टॉलधारक संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष मुश्ताक पटेल यांनी रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित केला होता. वारकऱ्यांसाठी शीरखुर्म्याची व्यवस्था केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगठा लावा; धान्य मिळवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती
स्वस्त धान्य दुकानात असलेल्या बायोमेट्रिक प्रणालीवर ‘अंगठा लावा आणि धान्य मिळवा’ असा उपक्रम १ जुलैपासून बारामती तालुक्यात सुरू होणार असल्याने रेशन माफियांचा होणारा काळाबाजार रोखण्यास प्रशासनाला यश येणार असल्याचा विश्वास तहसील प्रशासनाने ‘मटा’कडे व्यक्त केला.
बारामती शहरासह संपूर्ण तालुक्यात वैयक्तिक १४७, सोसायट्या ५२, तर महिला बचत गट २९ अशा एकूण २२८ स्वस्त धान्य दुकानदारांना तहसील कार्यालयाकडून वेळेवर धान्यपुरवठा करण्यात येतो. रेशन दुकानदार महिन्याला आपला कोटा पूर्ण करून घेतात. मात्र काही दुकानदार लाभार्थ्यांना धान्य देण्याऐवजी त्याची विक्री काळ्या बाजारात करून वैयक्तिक स्वार्थ साधून घेतात. त्यामुळे एपीएल, बीपीएलधारकांसह अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थीही धान्यापासून वंचित राहत आहेत. यासंदर्भात महसूल विभागाकडे वारंवार तक्रारी येत असल्याने बारामती तहसील कार्यालयाने पाठपुरावा करून २०७ बायोमेट्रिक मशिन संबंधित दुकानदारांना दिल्या आहेत. मात्र, २१ दुकाने जाहीरनामा काढण्यासाठी प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले. बायोमेट्रिक मशिनच्या वापरासंबंधी जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांनी एक दिवसाची कार्यशाळा घेतली.
काही जुन्या रेशन दुकानदारांचा बायोमेट्रिक मशिनच्या वापरास विरोध होता. मात्र हा विरोध झुगारून तहसीलदार हनुमंत पाटील यांनी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करणार असल्याचे सांगितल्याने रेशन माफियांना चाप बसला आहे. तालुक्यातील सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकांनी कुटुंबप्रमुख, विशेषत: महिला कूपनधारकांनी आपल्या परिसरातील संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडे जाऊन तेथील बायोमेट्रिक यंत्रावर आपला अंगठा लावावा, जेणेकरून यापुढे बायोमेट्रिक यंत्रावर अंगठा दाखवल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांला धान्य मिळेल. या प्रणालीमुळे काळ्या बाजारावर अंकुश बसणार असून जे खरोखरच लाभार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत रेशनचे धान्य पोहोचणार असल्याचा विश्वास प्रशासनाला आहे.

बायोमेट्रिक मशिनच्या वापरामुळे गरजू लाभार्थींना वेळेत व नियमानुसार धान्यपुरवठा होणार आहे. दुकानदारांकडून लाभार्थींनी वेळेत धान्य घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
- हनुमंत पाटील, तहसीलदार, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाय, म्हशीचे दूध महागणार

$
0
0

पुणे

शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना त्यांना प्रति लिटरमागे तीन रुपयांनी वाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे गाईच्या दुधाचा दर २४ रुपयांवरून २७, तर म्हशीच्या दुधाचा दर ३३ वरून ३६ रुपये होणार आहे. यामुळे दुधाच्या विक्री दरातही आगामी काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा कमी दर मिळत असल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या होत्या. त्या दरम्यान शेतकरी संपावर गेले. संपावर असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी राज्य सरकारने विविध मुद्यांवर चर्चा केली. त्या चर्चेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्या वेळी सुकाणू समितीला राज्य सरकारने दरवाढ करण्याचे आश्वासन दिले होते.

पशु, दुग्ध व मत्स्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने दूध खरेदीतील दरवाढीला मान्यता दिली आहे. दूध उत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दरात वाढ केली. तरीही ग्राहकांचे हित लक्षात घेऊन दूध विक्री दरात वाढ केलेली नाही. महागाई निर्देशांक लक्षात घेता राज्यातील दूध खरेदी विक्री दराबाबत समितीची वर्षातून किमान एकदा बैठक आयोजित केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याशिवाय या बैठकीत दूध खरेदी आणि विक्री दर निश्चित करण्यात येणार आहेत.

या संदर्भात पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे म्हणाले, ‘राज्य सरकारने गाईच्या दुधाच्या खरेदी दरात तीन रुपयांनी वाढ केली आहे. म्हशीच्या दरातही तीन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे गाईच्या दुधाचा दर २४ रुपयांवरून २७ रुपये एवढा करण्यात आला आहे. म्हशीच्या दुधाचा खरेदी दर ३३ वरून ३६ रुपये केला आहे. राज्य सरकारने आता खरेदी दर वाढविला आहे; परंतु पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने यापूर्वीच खरेदी दरात वाढ केली असून, तीन रुपये वाढवून दिले होते. राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दर असलेल्या शेतकऱ्यांना दर वाढवून द्यावा लागणार आहे. त्यामुळे खासगी उत्पादकांचे दूध महागण्याची शक्यता आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांत पुन्हा बरसणार पाऊस

$
0
0

दोन दिवसांत पुन्हा बरसणार पाऊस

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलांमुळे मान्सूनच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला असून, राज्यातील त्याचा प्रवास मंदावला आहे. दोन दिवसांत अरबी समुद्रात अपेक्षित बदल घडल्यास मान्सूनचा प्रवास पुन्हा वेगात सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील दोन दिवसांत कोकणात मुसळधार पाऊस, तर पुण्यात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील मान्सूनची प्रगती सुरू असून केवळ वेग मंदावला आहे. मात्र, अरबी समुद्रात पोषक वातावरणाचे संकेत मिळाले असून यामुळे पुढील दोन दिवसांत पावसाला पुन्हा गती मिळणार आहे. यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. बुधवारनंतर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल; तसेच याच काळात कोकण भागातही चांगला पाऊस होईल, अशी माहिती पुणे हवामान विभागाच्या संचालिका सुनीता देवी यांनी दिली.
दरम्यान, कोकणातील काही भाग वगळता राज्यातील बहुतांश ठिकाणी सोमवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली. काही शहरांमध्ये तापमानातही किंचित वाढ नोंदवली गेली. राज्यातील सर्वाधिक ४१.८ अंश सेल्सिअस तापमान गोंदियामध्ये, तर नीचांकी १८ अंश सेल्सिअस तापमान महाबळेश्वरमध्ये नोंदविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे गुरुजींसह त्यांच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा

$
0
0

भिडे गुरुजींसह त्यांच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गात घुसून गोंधळ घातल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कदम यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून संभाजी विनायकराव भिडे गुरुजी, संजय विठ्ठल जठार, रावसाहेब देसाई, अविनाश मरकळे व त्यांच्या एक हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे रविवारी शहरात सायंकाळी आगमन झाले. या पालख्या संगम पूल येथून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर क्रमाने मुक्कामी स्थळावर मार्गस्थ होतात. प्रथम संत तुकाराम, त्यानंतर संत गब्बर शेख, संताजी महाराज जगनाडे आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी असा हा क्रम असतो. मात्र, या पालख्या फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले चौकात आल्यानंतर संभाजी भिडे गुरुजी संघटनेचे कार्यकर्ते क्रमाने मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांमध्ये घुसले. तसेच मोठमोठ्याने घोषणा देत होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. मोठमोठ्याने घोषणा आणि हातामध्ये तलवारी असल्याने त्यात आणखीनच गोंधळ उडाला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुखांनी सतत होणाऱ्या प्रकारामुळे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या चौकातच थांबवली. डेक्कन पोलिस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पालखी प्रमुखांनी हा प्रकार बंद झाल्याशिवाय पालखी पुढे मार्गस्थ होणार नाही, असा प्रवित्रा घेतला. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली.
झोन एकचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांनी पालखी प्रमुखांना यापुढे असा प्रकार होणार नसल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. या सर्व गोंधळात तब्बल अर्धा तास पालखी चौकात होती. यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता. त्यानंतर डेक्कन पोलिसांकडून रात्री उशिरा संभाजी भिडे गुरुजी व त्यांच्या एक हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी डेक्कन पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदवणे घाटातील बलात्काराचा प्रकार बनाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिंदवणे घाटात शुक्रवारी रात्री एका महिलेवर फॉर्च्युनर गाडीत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बनाव असल्याचे तपासात समोर आले आहे. पूर्ववैमनस्यातून महिलेला पैसे देऊन दोन तरुणांवर बलात्काराचा खोटा आरोप करून त्यांना तुरुंगात पाठविण्यासाठी डाव रचला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी हा बनाव उधळून लावला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण परिसरातील दादा गव्हाण व संदीप जगदाळे या गुंडांनी पूर्ववैमनस्यातून हा बनाव रचला होता. त्यांच्याच गावातील प्रकाश चव्हाण व अजय नवले यांना तुरुंगात पाठविण्यासाठी केडगाव परिसरातील महिलेला त्यांनी हाताशी धरले. फॉर्च्युनर मोटारीतून आलेल्या दोघांनी महिलेवर बलात्कार केल्याची साक्ष देणारे दोन तरुण गव्हाण व जगदाळे यांनी पैसे देऊन उभे केल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित महिलेनेही गव्हाण व जगदाळे यांच्या सांगण्यावरून खोटी तक्रार दिल्याची कबुली दिली आहे. देवदर्शन घेऊन नारायणपूरहून परतत असताना, मोटारीमधून आलेल्या दोघांनी घाटात बलात्कार केल्याची तक्रार संबंधित महिलेने केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरू होता. महिलेकडे तपास केला, त्या वेळी नावे सांगत असलेली व्यक्ती त्या दिवशी परिसरात नसल्याची माहिती मिळाली. अधिक तपासात हा सर्व बनाव असल्याचे आढळले.

चव्हाण व नवले यांच्याशी दादा गव्हाण यांचा काही वर्षांपासून वाद आहे. आठ दिवसांपूर्वी गव्हाण व जगदाळे यांनी त्या दोघांना ‘तुम्हाला लवकरच खडी फोडायला पाठवू’ अशी धमकी दिली होती. गव्हाण व जगदाळे यांनी या महिलेला मोटारीतून शिंदवणे घाटात फिरवून, प्रात्यक्षिक करून घेतले. विश्रांतवाडी- येरवडा परिसरातून दोन तरुणांना पैशाचे आमिष दाखवून त्यांनाही कटात सहभागी करून घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात आत्महत्येचा अंध विद्यार्थिनीचा प्रयत्न

$
0
0

विद्यापीठात आत्महत्येचा अंध विद्यार्थिनीचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या मनमानी कारभार आणि मानसिक छळाला कंटाळून अंध विद्यार्थिनीने सोमवारी दुपारी विद्यापीठातील कुलसचिव कार्यालयातून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी नागरिक आणि विद्यार्थी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.
विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात संबंधित विद्यार्थिनी गेल्या अडीच वर्षांपासून पीएचडी करत आहे. विद्यार्थिनीला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) राजीव गांधी फेलोशीप मिळते. या फेलोशिपला यूजीसी आणि विद्यापीठामार्फत फेलोशीप देण्यात येते. फेलोशिपला मान्यता मिळण्यासाठी संबंधित अर्जावर विभागप्रमुखांची सही लागते. त्यानंतर विभागप्रमुखाला संबंधित अर्जाची छाननी करून तो यूजीसीकडे पाठवावा लागतो. मात्र, या अर्जावर माजी विभागप्रमुख आणि सध्याचे विभागप्रमुख सही करत नव्हते; तसेच मला फेलोशीप मिळण्यात विविध कारणांनी
आडकाठी करत होते, असा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख मला विविध कारणांनी मानसिक त्रास देत असून, पीएचडी पूर्ण होणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. या संपूर्ण प्रकाराबाबत विद्यार्थिनीने कुलसचिव कार्यालयात तक्रार केली होती.
‘कार्यालयात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास तक्रारींबाबत विभागप्रमुख आणि कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांच्यासोबत माझी चर्चा सुरू होती. मात्र, त्या वेळी मला बोलण्याची संधी देण्यात आली नाही; तसेच तक्रार मागे घेण्याबाबत माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मला काहीच न सुचल्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी उपस्थित असणाऱ्या नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मला उडी मारण्यापासून रोखले. या संपूर्ण प्रकारात माझा मानसिक छळ झाला,’ असेही विद्यार्थिनीने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images