Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

स्मार्ट सिटीतही पादचारी दुर्लक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांतर्गत महत्त्वाच्या चौकांमध्ये विविध स्वरूपाची माहिती देण्याचे फलक लावण्यासाठी सुरू असलेल्या खोदाईदरम्यान महापालिकेच्या पथ विभागालाच अंधारात ठेवल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. महापालिकेतर्फे एका बाजूला पादचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर फूटपाथ तयार केले जात असताना, याच ठिकाणी स्मार्ट सिटीचे मोठे ‘खांब’ (पिलर) उभे राहणार असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होणार आहे.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे (पीएससीडीसी) शहराच्या वेगवेगळ्या भागांत नागरिकांसाठी उपयुक्त माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत. ‘स्मार्ट एलिमेंट्स’ या उपक्रमांतर्गत यामध्ये वाहतूक, हवामान याची माहिती दिली जाणार असून, काही ठिकाणी ‘वाय-फाय’ सुविधा दिली जाणार आहे. शहरातील तब्बल २७० ठिकाणी असे फलक बसविण्यात येणार असून, त्यापैकी १५३ ठिकाणे पथ विभागाच्या अंतर्गत येतात. यामध्ये, काही ठिकाणी रस्त्यावर, तर काही ठिकाणी थेट फूटपाथवरच स्मार्ट सिटीचे पिलर उभे राहणार आहेत. त्याच्या सविस्तर यादीला पथ विभागाने मान्यता दिली असली, तरी काही भागांत संपूर्ण फूटपाथच उखडण्यात आले आहेत.

शहरातील अनेक फूटपाथची दुरुस्ती, डागडुजी सध्या पालिकेतर्फे सुरू असून, काही भागांत नव्याने फूटपाथ बांधण्यात येत आहेत. स्मार्ट सिटीसाठी फूटपाथचा मोठा भाग बंद करण्यात आल्या असून, गर्दीच्या चौकात पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. शहरातील गर्दीच्या चौकांमध्ये अनेक ठिकाणी हे पिलर बसविण्यात येणार असल्याने त्यासाठी फूटपाथ खणल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे, महापालिकेने ‘पीएससीडीसी’ला फूटपाथवरील ‘डिझाइन’मध्ये बदल करावे, अशा सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी स्मार्ट सिटीचे हे काम रस्त्यावरच सुरू असल्याने भविष्यात वाढणाऱ्या वाहतुकीला त्याचा अडथळा निर्माण होण्याची भीती आहे.

स्मार्ट सिटीच्या माहिती फलकांसाठी काही जागा अडचणीच्या ठरू शकणार असल्याचे लक्षात आल्याने त्याचा पुनर्विचार करण्यात येणार आहे. त्याबाबत, संबंधित कंत्राटदारांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

- कुणाल कुमार, महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंजिनीअर तरुणीची प्रेमभंगातून आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यात कोंढव्यात राहणाऱ्या आयटी इंजिनीअर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेमभंगातून तिने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. बेंगळुरूला ती कामाला होती. काही कामा निमित्त ती पुण्यात आली होती.

आत्महत्या केलेल्या आयटी इंजिनीअर तरुणीचं नाव जुही नितीन गांधी (वय २३, रा. शांतीनगर सोसायटी, कोंढवा बु.) असं आहे. तिने कोंढव्यातील सुमा सिल्व्हर सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सतत फोन करूनही प्रियकर आपल्याशी बोलत नसल्याने जुही निराश होती. या निराशेतून तिने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. करमाळकर पुणे विद्यापीठाचे नवे कुलगुरू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नितीन करमाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. करमाळकर हे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख होते.

राज्यपाल आणि कुलपती चे. विद्यासागर राव यांनी आज प्रेस नोट काढून ही माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. वासूदेव गाडे यांच्या कुलगुरूपदाचा कार्यकाळ १५ मे रोजीच संपुष्टात आल्याने करमाळकर यांची नवे कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कुलगुरुपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यात करमाळकर यांची निवड करण्यात आली.

कुलगुरुपदासाठी एकूण ९० अर्ज आले होते. अर्ज छाननीनंतर एकूण ३६ उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले होते. डॉ. नितीन करमाळकर यांच्यासह प्रा. एम. राजीवलोचन, प्रा. भूषण पटवर्धन, प्रा. अंजली क्षीरसागर आदींचा या मुलाखतीच्या यादीत समावेश होता.

डॉ. करमळकर हे गेल्या २५ वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत आहेत. भूगर्भशास्त्र आणि भूरसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणशास्त्र विभागप्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. विद्यापीठाच्या अनेक समितींवर त्यांनी काम केलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलीस हवालदाराची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

तळेगाव येथे एका पोलीस हवादाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. संजय लक्ष्मण लांबकाने (४२) असे या हवालदाराचे नाव असून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

संजय लांबकाने हे आधी तळेगाव पोलीस ठाण्यात तर गेल्या दोन वर्षांपासून देहूरोड पोलीस ठाण्यात सेवा बजावत होते. गेल्या काही दिवसांपासून ते रजेवर होते. दरम्यान, दोन दिवसांपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंदच होता. आज दरवाजा उघडून पाहण्यात आले असता संज यांनी गळफास घेतल्याचे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.

याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार ग्रामपंचायतीच्या होणार निवडणुका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या १९ ग्रामपंचायतींपैकी अवघ्या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये आंबेगाव बुद्रुक, उंड्री, पिसोळी आणि नांदेड या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
ग्रामपंचायतींसाठी अर्ज माघारीचा बुधवारी शेवटचा दिवस होता. त्यामध्ये हवेली तालुक्यातील या चार ग्रामपंचायतींमधील २०३ उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. त्यामुळे १०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी १२ ग्रामपंचायतींनी यापूर्वी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी २६६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे १३७ उमेदवार राहिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच दिवसांत १२९ प्रकरणांना ‘अभय’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांसाठी ‘मार्च एंड’ची पर्वणी साधत अवघ्या पाच दिवसांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘अभय योजना’ अंतर्गत १२९ प्रकरणे निकाली काढली आहेत. या योजनेतर्गंत पालिकेच्या तिजोरीत २९ कोटी २० लाख रुपयांचा दंड जमा झाला, तरी बांधकाम व्यावसायिकांचाही करोडो रुपयांचा फायदा झाला आहे. पालिकेने या योजनेद्वारे दहा हजार ७०१ फ्लॅट दंड भरून नियमित केले आहेत.​
भोगवटापत्र मिळण्यापूर्वीच वापर सुरू केला अथवा अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना झालेल्या दंडाच्या रकमेत झालेल्या दंडात मोठी सवलत देणारी ‘अभय योजना’ महापालिका प्रशासनाने सुरू केली होती. ही योजना गत वर्षी एप्रिल ते आक्टोबर या कालावधीत राबविण्यात आली होती. त्यानंतर आक्टोबरमध्ये ही योजना बंद झाली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस पाच दिवसांसाठी ही योजना गोपनीय पद्धतीने कार्यान्वित करण्यात आली आणि त्याद्वारे सात कोटी १५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही योजना कुठलाही गाजावाजा न करता केवळ निरोपांच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.
बांधकाम व्यावसायिकांना दंडात सवलत देणारी ही योजना सुरू करण्यात आली तेव्हाही या योजनेवर मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. नागरिकांकडून एकीकडे तिप्पट कर, थकबाकी असेल तर त्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. तर दुसरीकडे बांधकाम व्यावसायिकांना दंड माफ करण्यासाठी पायघड्या घालण्यात आल्याचा माननियांकडून दावा करण्यात आला होता.
महापालिकेने ही योजना सुरू केली त्या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये ६८२ प्रकरणे निकाली काढण्यात आली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटी पाच दिवस अत्यंत गोपनीयपद्धतीने ही योजना लागू करण्यात आली. या पाच दिवसांत १२९ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्याद्वारे १२८५ अनधिकृत फ्लॅट नियमित करण्यात आले आहेत. ही योजना नेमकी कोणासाठी कार्यान्वित करण्यात आली, त्याद्वारे कोणाला फायदा झाला, याचाही खुलासा प्रशासाने करावा, अशी मागणी होत आहे.

अभय योजना आणून महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ही योजना बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी आणण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात विनापरवाना बांधकाम नियमित करण्यात आले आहे. हे बांधकाम २०१२ पूर्वीचे असून, त्याला २००५ च्या रेडीरेकनरप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. या दंडावरही मोठ्या प्रमाणात सवलतींची खैरात वाटून महापालिकेला नेमके काय मिळाले? गत महापालिका आयुक्त महेश झगडे यांनी अशा बांधकामांवर कारवाईची भूमिका घेत दंड वसूल करण्यास सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर ही अभय योजना आणून बांधकाम व्यावसायिकांच्या फायदा जोपासण्यात आला आहे.
- विशाल तांबे,
माजी स्थायी समिती अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ३० वर्षांहून अधिक कालावधी घालवल्याने इथल्या प्रश्नांची जाणीव आहे. प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणारच आहे. मात्र, त्यासोबत सुमारे साडेसहा लाख माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून विद्यापीठाची प्रतिमा सुधारणे. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणे, त्यांना उत्तम शिक्षण मिळण्यासाठी संलग्नित विभागांना ‘स्कूल’ या छत्राखाली आणून प्राध्यापकांची उणीव भरून काढणे आणि विद्यार्थी केंद्रीत कामकाज करणे,’ अशा गोष्टींना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
करमळकर यांनी पत्रकारांशी बुधवारी संवाद साधला. त्यावेळी ही माहिती दिली. डॉ. करमळकर म्हणाले, ‘ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १९८२ सालामध्ये भूगर्भशास्त्र विभागात एमएस्सी करण्यासाठी प्रवेश घेतला. तेव्हापासून विद्यापीठात कार्यरत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परिसराची आणि इथल्या प्रश्नांची जाणीव आहे. विद्यापीठातून शिक्षण घेतलेले सुमारे साडेसहा लाख विद्यार्थी देश-विदेशात विविध पदांवर कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांना एकत्र आणून अॅलुमिनी असोशिएशन बळकट करण्याची योजना आहे. कारण हे विद्यार्थीच विद्यापीठाचे दूत म्हणून काम करतील आणि विद्यापीठाची सार्वजनिक प्रतिमा सुधारण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. विद्यापीठात प्राध्यापकांची कमतरता आहे. यावर उपाय म्हणून बनारस हिंदू विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाप्रमाणे ‘स्कूल’ तयार करण्याची योजना आहे. या स्कूलमध्ये एकमेकांना संलग्नित असणाऱ्या विद्याशाखांना एका स्कूलखाली आणण्यात येईल. त्यामुळे ज्या विभागात प्राध्यापकांची कमतरता आहे, त्या विभागात प्राध्यापकांना पाठविण्यात येऊ शकते.’
डॉ. करमळकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना केवळ डिग्री मिळून फायदा होत नाही. त्यांना शिक्षणानंतर चांगली नोकरी मिळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध कशा होतील, यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. विद्यापीठातील विद्यार्थी आणि विशेषकरून विद्यार्थिनींची सुरक्षा महत्त्वाची असून त्याकडे लक्ष देण्यात येईल. विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटेल, असे वातावरण तयार करेल. तसेच, विद्यापीठात ज्या कमतरता आहेत. त्या पूर्ण भरून काढू.’

‘सॅटेलाइट कॅम्पसची गरज’
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कॅम्पस आता अधिकची विकासाची कामे करण्यासाठी कमी पडत आहे. दोन विभागांच्या स्थापनेमध्ये ठरावीक अंतर असले पाहिजे. मात्र, सध्याची स्थिती पाहता नव्या विभागांची अथवा सुविधांची निर्मिती करता येणार नाही. विद्यापीठात उंच इमारतींची निर्मिती करण्याला देखील बंधने आहे. त्यामुळे विद्यापीठाला एका नव्या कॅम्पसची आवश्यकता आहे. त्यासाठी भविष्यात सॅटेलाइट कॅम्पसची गरज आहे,’ अशी माहिती डॉ. करमळकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-शिर्डी नवीन बस आजपासून सुरू

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) शिवाजीनगर-शिर्डी मार्गावर नव्याने बांधणी केलेली स्टीलमधील परिवर्तन बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज, गुरुवारी सकाळी सहा वाजून १५ मिनिटांनी शिवाजीनगर स्टॅँड येथून ही गाडी सुटेल. शिर्डीवरून सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी पुण्याला येणारी गाडी सुटेल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली.
परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी यापुढे सर्व नवीन बांधणीच्या बस अ‍ॅल्युमिनीअम ऐवजी माइल्ड स्टीलमध्ये बांधून घेण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने पुण्यातील दापोडी येथे प्रायोगिक तत्त्वावर परिवर्तन श्रेणीतील नवीन परिवर्तन बस बांधण्यात आली असून, पुणे-शिर्डी मार्गावरील प्रवाशांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. इयत्ता पाचवीचा २१.४३ टक्के, तर आठवीचा १३.४५ टक्के निकाल लागला आहे. यंदाच्या मोठी निकालात घट झाली आहे. या परीक्षेचा अंतिम निकाल येत्या १५ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना हा निकाल परिषदेच्या http://mscepune.in/ या वेबसाइटवर पाहता येईल. विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव टाकून त्यांचा निकाल पाहता येणार आहे. तसेच, शाळांनादेखील युडायस क्रमांक टाकून पाहता येईल. २०१५मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अनुक्रमे ५६.९४ व ४२.९६ टक्के इतका लागला होता. त्या तुलनेत इयत्ता पाचवी व आठवीच्या परीक्षेचा निकाल कमी लागला आहे. पाचवीचा निकाल २१.४३ व आठवीचा १३.४५ टक्के निकाल लागला असून चौथी व सातवीच्या तुलनेत त्यात अनुक्रमे ३५.५१ व २९.५१ टक्के घट झाली आहे.

इयत्ता पाचवीच्या पाच लाख २६ हजार ५९७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यामधील एक लाख १२ हजार ८५६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा निकाल २१.४३ टक्के इतका लागला आहे. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी केवळ ५२ हजार ६५७ विद्यार्थी पात्र ठरले असून परीक्षेचा निकाल १३.४५ टक्के लागला आहे. या निकालाविषयी काही हरकती असल्यास विद्यार्थ्याना निकालाच्या छायांकित प्रतींसह ३१ मेपर्यंत परिषदेकडे अर्ज करता येणार आहे. तसेच, गुणपडताळणी करण्यासाठीही अर्जाची मुदत ३१ मे पर्यंत राहील. आलेल्या हरकतींचा विचार करून १५ जूनपर्यंत अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यावेळी शिष्यवृत्ती कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार, हे स्पष्ट होईल, असे परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीला लाखोंना फसवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विवाहविषयक वेबसाइटवरून एका आयटी इंजिनीअर तरुणीची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीला विमाननगर परिसरातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. त्याने अशा पद्धतीने आणखी काही तरुणींची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे.

श्रीकृष्ण अनंत केसरकर (वय २७, रा. हिवरापाडी, बीड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. केसरकर याने अमर अगरवाल असे नाव तरुणीला सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव येथील आयटी इंजिनीअर तरुणीने विवाहासाठी एका विवाहविषयक वेबसाइटवर नावनोंदणी केली होती. या साइटवरून अमर अगरवाल नावाच्या व्यक्तीबरोबर तिची ओखळ झाली. त्या व्यक्तीने अमेरिकेत नोकरी करीत असल्याचे सांगून तरुणीसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क वाढला. त्या वेळी अगरवाल याने तरुणीला अमेरिकेला येऊन त्याच्या नोकरीची खात्री करून घेण्यास सांगितले. त्यासाठी व्हिसा प्रोसेसिंगसाठी तिच्याकडून ९० हजार रुपये घेतले.

अगरवाल याने तरुणीला फोन करून गोव्यातील श्रीकृष्ण केसरकर याचा संदर्भ देऊन तो विवाहाच्या कार्यक्रमाचे नियोजन करीत असल्याचे सांगितले. विवाह व साखरपुड्याचा कार्यक्रमाचे कंत्राट त्याच्याकडे देण्यास व त्यासाठी बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार तरुणीने केसरकरच्या खात्यावर चार लाख २८ हजार रुपये भरले.

काही दिवसांनी अगरवाल याने भारतात आल्याचे सांगून तरुणीला एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलविले. तरुणी त्याला भेटली, तेव्हा तिला त्याचा संशय आला. त्यानुसार तिने त्याची सायबर सेलकडे तक्रार केली होती. तरुणीला अगरवाल हा विमानगर येथील एका हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन मोबाइल, दोन इंटरनेट हॉटस्पॉट, तीन डेबिट कार्ड, पॅन कार्ड जप्त करण्यात आले. त्याच्याकडे तपास केल्यानंतर अगरवाल हाच केसरकर असल्याचे समोर आले. त्याच्याकडून अशा पद्धतीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

फसवणूक करणाऱ्यावर खंडणीचा गुन्हा

श्रीकृष्ण केसकर याने बनावट नावाने प्रोफाइल बनविली होती. त्या माध्यमातून तो तरुणींना फसवत होता. त्याच्यावर यापूर्वी एका आयटी इंजिनीअरचे खंडणीसाठी अपहरण केल्याचा येथे गुन्हा दाखल आहे. त्याला त्यामध्ये अटक करण्यात आली होती. केसकर हा बारावी उत्तीर्ण असून त्यानंतर त्याने प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा अर्ध्यातूनच सोडून दिला. तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने त्याने फसवणूक करण्यास सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणकडे फ्यूजचा अभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातून सर्वांधिक १५ टक्के महसूल हा पुणे विभाग देत असताना, महावितरण मात्र विजेच्या मीटरमधील एक किट कॅट फ्यूज बसवून देऊ शकत नसल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. फ्यूज बसविण्याची जबाबदारी ही महावितरणची असून, फ्यूज नसल्याचे कारण सांगून महावितरण ग्राहकांनाच फ्यूज आणून देण्यास सांगते; तसेच ग्राहकांनी नकार दिल्यावर फ्यूज न लावताच वीजपुरवठा सुरू करण्यात येत असल्याचा अनुभव एका ग्राहकांना घ्यावा लागला आहे.

मेजर जनरल (निवृत्त) एस. सी. एन. जठार यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. त्यांच्या घरातील मीटरमधील किट कॅट फ्यूज गेल्याने वीजप्रवाह खंडित झाला. १२ मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर त्यांनी महावितरणकडे तक्रार नोंदविली. १३ मे रोजी पुन्हा तक्रार नोंदविण्यात आली. १५ मे रोजी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आले. त्यांनी संबंधित फ्यूज महावितरणकडे नसल्याने जठार यांना फ्यूज आणण्यास सांगितले. वास्तविक ही जबाबदारी महावितरणची होती. त्यानंतर फ्यूज नसल्याने फ्यूजविनाच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. याबाबत जठार यांनी महावितरणकडे तक्रार दिली आहे.

‘महावितरणला राज्यातून मिळणाऱ्या महसुलापैकी सुमारे १५ टक्के महसूल हा पुणे विभागाकडून मिळतो. तरीही, महावितरण एक फ्यूज ग्राहकांना देऊ शकत नाही. ही जबाबदारी महावितरणची असतानाही ग्राहकांना सुटे भाग आणण्यास सांगणे चुकीचे आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो वेळेत पूर्ववत न केल्यास नियमाप्रमाणे प्रत्येक तासाला ५० रुपये, याप्रमाणे रक्कम महावितरणने दिली पाहिजे; तसेच फ्यूजविना वीजपुरवठा सुरू करणे धोक्याचे आहे,’ असे सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे स्टेशनची स्वच्छतेत आघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्टेशनच्या स्वच्छतेबाबत केलेल्या सर्व्हेमध्ये पुणे स्टेशनने देशपातळीवर नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गेल्या वर्षी ‘ए-१’ दर्जाच्या स्टेशनमध्ये पुणे स्टेशन स्वच्छतेमध्ये शेवटच्या क्रमांकावर होते. मात्र, गेल्या वर्षभरात स्वच्छताविषयक राबविलेल्या विविध उपक्रम व योजनांमुळे पुणे स्टेशनने मोठे यश मिळविले आहे.

देशामध्ये ‘ए-१’ दर्जाची ७५ रेल्वे स्टेशन्स आहेत. तर, ‘ए’ दर्जाची ३३२ स्टेशन्स आहेत. या स्टेशनची दर वर्षी रेल्वे मंत्रालयाकडून स्वच्छता विषयक पाहणी केली जाते. त्या पाहणीचा अहवाल जाहीर केला जातो. यंदा ‘ए-१’ स्टेशनमध्ये पुणे स्टेशन नवव्या क्रमांकावर असून, ‘ए-१’ आणि ‘ए’ दर्जा या सर्व स्टेशन्समध्ये ४०७पैकी ७५ व्या क्रमांकावर आहे, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाने दिली. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेकडून देशातील रेल्वे स्थानकांच्या स्वच्छेतेबाबत सर्वेक्षण करून घेण्यात आले होते. गेल्या वर्षी झालेल्या पाहणीमध्ये ‘ए-१’ स्टेशनमध्ये पुणे स्टेशन ७५व्या स्थानी आणि एकूण स्टेशनमध्ये ३९१व्या स्थानी होते.

गेल्या वर्षभरापासून पुणे स्टेशन, तसेच पुणे विभागातील सर्वच स्टेशनवर मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच, यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमण्यात आले होते. या पथकाने स्टेशन परिसर, वेटिंग रूम, प्लॅटफॉर्म शेजारील भागातील सर्व परिसर स्वच्छ करण्याचे काम केले. याबरोबर कॉलेजचे विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था आदींनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला होता. भित्ती चित्रे, पोस्टर, बॅनर आदीच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे यश मिळाले आहे, अशी भावना पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांनी व्यक्त केली.

रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेली ‘टॉप १०’ रेल्वे स्टेशन्स

१) विशाखापट्टणम्

२) सिकंदराबाद जंक्शन

३) जम्मू तावी

४) विजयवाडा

५) आनंद विहार टर्मिनल

६) लखनौ जंक्शन

७) अहमदाबाद

८) जयपूर

९) पुणे जंक्शन

१०) बेंगळुरू सिटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांचा डिजिटल करभरणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या दीड महिन्यांत मिळकतकरापोटी महापालिकेच्या तिजोरीत ३०४ कोटी रुपये जमा झाले असून त्यातील ७८ टक्के रक्कम ही ऑनलाइन सेवेद्वारे भरण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील १३ किराणा दुकानांमध्ये मिळकतकर भरण्याची सुविधा उपलब्ध असून त्याद्वारे १९ जणांनी ७७ हजार रुपयांचा मिळकतकर भरला आहे.

अवघ्या दीड महिन्यांत मिळकतकरापोटी तीनशे कोटी रुपये जमा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मिळकतकर ऑनलाइन भरल्यास काही टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा उचलला आहे. रोख रक्कम भरण्याकडे नागरिकांचा कल कमी होत असून ऑनलाइन आणि चेकद्वारे ७८ टक्के रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली असल्याची माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख सुहास मापारी यांनी दिली.

महापालिकेकडून एप्रिल आणि मे महिन्यांत मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पाच ते दहा टक्क्यांपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे या दोन महिन्यांत नागरिकांकडून मिळकतकर भरण्यास प्राधान्य देण्यात येत असले, तरी या वर्षी नागरिकांनी मिळकतकर विभागाच्या योजनांना चांगला प्रतिसाद दिला आहे. पालिकेच्या तिजोरीत दिवसाला सरासरी चार कोटी रुपयांचा मिळकतकर जमा होतो. मे महिन्याचे आणखी पंधरा दिवस बाकी असून सरासरी ८० कोटी रुपये आणखी मिळतील, असा अंदाज आहे. या वर्षी मे महिन्याअखेर ३८० कोटी रुपये मिळतील, असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

आतापर्यंत नागरिकांनी भरलेल्या ३०० कोटी रुपयांमध्ये केवळ ६० कोटी रुपये हे रोख स्वरूपात भरण्यात आले आहेत. उर्वरित १३२ कोटी रुपये ऑनलाइन सेवेद्वारे, तर १०८ कोटी रुपये धनादेशाद्वारे भरण्यात आले आहेत, असे मापारी यांनी सांगितले.

दरम्यान, किराणा दुकानांमध्ये मिळकतकर भरण्यासाठी सोय उपलब्ध करण्यात आली असली, तरी त्यासाठी लागणारी गुंतवणूक किराणा व्यावसायिकांना परवडत नसल्याने या योजनेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळालेला नाही. ज्या व्यावसायिकांची आर्थिक क्षमता चांगली आहे, अशा व्यावसायिकांना मिळकतकर भरण्याची सुविधा सुरू करण्यास पालिका प्रोत्साहन देत आहे.

रॅनसमवेअरचा परिणाम नाही

शहरातील वेगवेगळ्या १६ बँकांच्या ऑनलाइन सेवेद्वारे मिळकतकर भरण्याची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. दिवसाला सरासरी चार कोटी रुपयांचा मिळकत कर महापालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे. महापालिकेने त्यासाठी स्वतःची संगणकप्रणाली उभी केली आहे. रॅनसॅमवेअर या व्हायरसचा कुठलाही परिणाम हा मिळकतकर भरण्यावर झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘पीएमपी’चे नऊ कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) गैरवर्तन करणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये पाच कायम कर्मचारी, तीन ड्रायव्हर आणि दोन बदली कंडक्टरचा समावेश आहे. ही कारवाई २९ मार्च ते १७ मे या कालावधीत गैरवर्तन करणाऱ्यांवर करण्यात आली आहे. तसेच, येत्या काळातही गैरवर्तन करणाऱ्यांवर तीव्र कारवाई केली जाईल, असा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला आहे.

कंडक्टर बाळासाहेब काटे यांनी पाच प्रवाशांकडून प्रवास भाडे स्वीकारून, त्यांना तिकीट न देता तिकिटांच्या १९५ रुपयांचा अपहार केला. तसेच, त्यांची झडती घेतली असता, खिशात पाच हजार रुपये आढळून आले. सुरेश ननावरे यांनी दोन महिला प्रवाशांकडून संपूर्ण प्रवास भाडे स्वीकारून, त्यांना निम्म्या पैशाचे तिकीट दिले. साहेबराव कांबळे यांनी वेळेपूर्वी बस मार्गस्थ करून प्रवाशांची गैरसोय केली व महामंडळाचे आर्थिक नुकसान केले. संदीप रणदिवे या बदली कंडक्टरने बसचा रूट बोर्ड खाली पाडून, बस पंक्चर असल्याचे खोटे रिपोर्टिंग केले. नरेंद भाट या कंडक्टरने ड्युटीवर असताना मद्यप्राशन केले होते. अशोक घुले या ड्रायव्हरने बस भरधाव चालवित असताना, त्यांच्या बसच्या पुढे जात असलेल्या एका दुचाकीस्वारास बसच्या पुढील डाव्या बाजूची धडक बसली. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. विनोंद सोंडेकर या बदली कंडक्टरने प्रवाशांकडून प्रवास भाडे ६० रुपये स्वीकारले. मात्र, प्रवाशाला तिकीटच दिले नाही. चंद्रकांत गर्जे या कंडक्टरने पाच प्रवाशांकडून १७५ रूपये स्वीकारून त्यांनी तिकिटे दिले नाही, आदी कारणांसाठी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे, अशी माहिती पीएमपी जनसंपर्क विभागाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयंरोजगार संस्थांना मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

घरोघरी कचरा गोळा करून तो संकलन केंद्रापर्यंत वाहून नेण्याच्या कामासाठी नेमलेल्या महिला स्वयंरोजगार संस्थांना चार महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

या निर्णयानुसार फ आणि अ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत भारतीय महिला स्वंयरोजगार सेवा संस्थेची, ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सावित्री महिला स्वंयरोजगार संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. या तिन्ही क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कचरा गोळा करण्यासाठी चार महिन्यांसाठी दोन कोटी १९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्राप्त निविदाधारकांपैकी सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेने निविदा रकमेच्या कमी दराने निविदा सादर केल्याने त्यांना कचरा गोळा करण्याचे काम देण्यात आले.

गेल्या दीड वर्षांपासून या तिन्ही संस्थांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत आहे. सुरुवातीला त्यांना साडेपाच महिने मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा चार-चार महिने मुदतवाढ दिली. या कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, ३१ जुलै २०१७नंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे आश्वासन समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिले आहे.
फौजदारीचा इशारा

साफसफाई व कचरा गोळा करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या पगारातून रक्कम कपात करून ती ‘पीएफ’ (भविष्य निर्वाह निधी) कार्यालयात न भरणाऱ्या संस्थाचालकांवर फौजदारी दाखल करण्याचा इशारा सावळे यांनी दिला आहे. महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत साफसफाई आणि स्वच्छतेची कामे ६८ संस्थांना विभागून दिले आहेत. त्यामध्ये सुमारे बाराशे कंत्राटी कामगार काम करीत आहेत. यातील अनेक संस्थांकडून कंत्राटी कामगारांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. या कामगारांच्या पगारातून ईएसआय, पीएफ रक्कम कपात केली जाते. परंतु, ती भरली जात नाही. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे नोंददेखील नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या खात्यावर ईएसआय, पीएफ रक्कम न भरणाऱ्या संस्थांची चौकशी चालू असून दहा संस्थांनी नियमाचे पालन केले नसल्याचे आढळून आले आहे. अशा संस्थांवर फौजदारी दाखल करणार असल्याचे सावळे यांनी स्पष्ट केले. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित ठेकेदारांनी कंत्राटी कामगारांचा पीएफ भरल्याची खातरजमा केल्यानंतरच बिल अदा करावे, असे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

आकुर्डीत उद्यान

केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत आकुर्डीतील प्रभाग क्रमांक १६ मध्ये उद्यान विकसित करण्यासाठी करण्यात येणार असून त्यासाठीच्या ८३ लाख २९ हजार रुपयांच्या खर्चाला बैठकीत मंजुरी देण्यात आली. या उद्यानात लँन्ड स्केपिंग, जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान आणि चारशे रोपांचे रोपण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निराशेतून मुलानेच केला वडिलांचा खून

$
0
0

बारामती : निराशेतून व गैरसमजुतीने आर्थिक मदत नाकारल्याने मुलानेच वडिलांचा खून केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. काटेवाडी (बारामती) येथील दिगंबर काटे यांच्या खुनाचा अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर काटे हे मुलगा अभय यास नेहमी दुय्यम वागणूक देत होते. निराशेतून व गैरसमजुतीने आर्थिक मदत नाकारल्याने मुलानेच वडिलांचा खून केला. मुलाने वडिलांचा काटेवाडी कन्हेरी रस्त्यावरील निरा डाव्या कालव्याच्या भराव्यावर धारदार सुऱ्याने गळा चिरुन खून केला आणि मृतदेह नीरा डाव्या कालव्यात टाकून दिला. खून वाटू नये; तसेच तो अपघात वाटावा यासाठी त्याने दिगंबर काटे यांच्याकडे असलेली मोटारसायकलदेखील नीरा डाव्या कालव्याच्या पाण्यात टाकून दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी अभयला अटक केली आहे. खून करण्यासाठी वापरलेला सुरा पोलिसांनी जप्त केला. त्याच्यावर कलम ३०२प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या गुन्हे शोध पथकातील शिवाजी निकम, बाळासाहेब भोई, संदीप मोकाशी, सुभाष डोईफोडे, संदीप कारंडे, अनिल काळे आदींच्या पथकाने खुनाचे कोडे उलगडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरुग्णालयात झडताहेत दारूच्या पार्ट्या

$
0
0

संदीप भातकर, येरवडा

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांची देखभाल आणि सेवा करण्याऐवजी पुरुष कर्मचारी ड्युटीवर असताना रुग्णालयाच्या आवारात दारूच्या पार्ट्या करीत असल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून मनोरुग्णालयातील विविध वॉर्डांतून पोती भरून दारूच्या बाटल्या जमा करण्यात आल्या आहेत. मद्यपान आणि पार्ट्या करताना कोणी कर्मचारी आढळून आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची; तसेच पोलिस कारवाई केली जाईल, असा आदेशच अधीक्षकांना परिपत्रकाद्वारे काढावे लागले आहेत. पण, तरीही अनेक ठिकाणी दारू आणि बीअरच्या बाटल्या रुग्णालय परिसरात पडलेल्या दिसून येतात.

गेल्या काही दिवसांपासून मनोरुग्णालय वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिले आहे. चपाती बनविणारे मशिन बंद असल्याने महिला रुग्णांना दररोज सात हजार चपात्या लाटाव्या लागत होत्या. तर, बॅटरीवरील वाहन बंद पडल्याने पुरुष रूग्णांना स्वयंपाकगृहातील जेवण विविध वॉर्डात घेऊन जावे लागत आहे. आता तर रुग्णालयातील कर्मचारी ड्युटीवर असताना मांसाहार आणि दारूच्या पार्ट्या करीत असल्याने विविध वॉर्डात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठे मनोरुग्णालय असे बिरुद मिरवणाऱ्या रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

मनोरुग्णालयात स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून विविध वॉर्डांच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत. एका आठवड्यात विविध वॉर्डांतून पोती भरून बाटल्या गोळा झाल्या आहेत. वॉर्ड क्रमांक १मधील बाहेरच्या ओढ्याजवळून पाच पोती बाटल्या सापडल्या आहेत. रुग्णालयाचे पर्यवेक्षक आणि उपअधीक्षक यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या रुग्णालयाच्या आवारात सापडल्याने प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली. अधीक्षकांनी सोमवारी (१५ मे) रोजी यासंदर्भात परिपत्रक काढले.

रुग्णालयात ड्युटीवर असताना कुणीही मांसाहार आणि दारूच्या पार्ट्या करू नयेत, रुग्णाला दारू देऊ नये. मद्यपान केल्याचे कोणी आढळून आल्यास त्याची वैद्यकीय तपासणी करून पोलिसांमार्फत कायदेशीर कारवाई आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा परिपत्रकातून देण्यात आला आहे. तसेच, मेजर पदावरील दोन अधिकाऱ्यांना अचानक वॉर्डांची तपासणी करून दररोज अहवाल देण्यास सांगितले आहे.

एवढे करूनही दारू पार्ट्या थांबण्याची शाश्वती नसल्याने दारू पिणाऱ्या आणि पार्ट्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती कळविणाऱ्या कर्मचाऱ्याच्या चांगल्या कामाची नोंद सेवा पुस्तकात घेण्याचे आमिष प्रशासनाकडून दाखविण्यात आले आहे.

- रुग्णालयातील पुरुष कक्षाच्या बाहेर स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आले.

- एका आठवड्यात प्रत्येक वॉर्डातून पोती भरून बाटल्या निघाल्या.

- वॉर्ड क्रमांक एकच्या बाहेरील ओढ्याजवळ पाच पोती बाटल्यांचा खच

- रुग्णालयातील पर्यवेक्षक आणि उपाधीक्षकांना दारूच्या पार्ट्या होत असल्याचे आढळले

दारू, बीअरच्या बाटल्यांसोबत मिनरल वॉटरच्या बाटल्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करिअर संधी शोधण्यासाठी‘एक्स्प्लोअर २०१७’ प्रदर्शन

$
0
0

येत्या शनिवारी, रविवारी आयोजन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सध्या करिअरसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्यातला नेमका कुठला पर्याय आपल्यासाठी योग्य आहे, हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांनाही भेडसावतो. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी करिअर कॉर्नरतर्फे एक्स्प्लोअर २०१७ या करिअर प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थी व पालकांना १०० हून अधिक करिअर पर्यायांची माहिती उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र टाइम्स या उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.
येत्या शनिवारी व रविवारी (२० व २१ मे) शिवाजीनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये (सीओईपी) ही कार्यशाळा होईल. सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत ‘सीओईपी’च्या मिनी ऑडिटोरिअममध्ये हे कार्यक्रम होतील. पूर्वनावनोंदणी करणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी ही कार्यशाळा मोफत खुली असेल. नावनोंदणीसाठी careerwiki.in/explore ही लिंक पाहावी, किंवा ९९१२६९१३८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‍घाटन होईल. ‘सीओईपी’च्या भाऊ इन्स्टिट्यूटचे सहसंस्थापक संजय इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. दोन दिवसांच्या या कार्यशाळेत इंजिनीअरिंग, डिझाइन, स्पर्धा परीक्षा अशा विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच त्यांच्या प्रश्नांनाही उत्तरे देतील. ही व्याख्याने दहा ते चार या वेळेत होतील, तर प्रदर्शन दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत सर्वांसाठी खुले असेल. ‘करिअरविषयी विद्यार्थी व पालकांच्या मनात असलेला संभ्रम या कार्यक्रमातून दूर होईल,’ असे करिअर कॉर्नरचे संस्थापक ह्रषिकेश हुंबे यांनी सांगितले.
----------
कार्यक्रम

२० मे, शनिवार

नावनोंदणी स. ९.३०

विषय : वक्ते : वेळ

यशस्वी करिअर कसे करावे : संजय इनामदार : १०.१५

इंजिनीअरिंगमधील करिअरसंधी : डॉ. सुनील खन्ना : ११

डिझाइन क्षेत्रातील करिअरसंधी डिझाइन : अग्निशिखा चौधरी : ११.४५

हॉटेल मॅनेजमेंटमधील करिअरसंधी : फिरोज पटेल : १२.४५

दहावी, बारावी नंतरचे करिअर : हृषिकेश हुंबे : २.००

लिबरल आर्टस व लॉमधील करिअर : श्रीनिवास आर्कस : ३.३०

एनडीए व संरक्षण दलातील करिअर संधी : - : ४.१५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांबू टेक्नॉलॉजीवर संशोधन

$
0
0

संशोधनासाठी सीओईपी प्रयत्नशील; ‘अॅप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी सेंटर’ची उभारणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
ग्रामीण आणि शहरी भागातील समस्यांवर उपाय करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील लहान व्यवसायांना तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यात नावीन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये (सीओईपी) ‘अॅप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी सेंटर’ उभारण्यात येणार आहे. हे सेंटर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. सेंटरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून या सेंटरमध्ये बांबू टेक्नॉलॉजीवर संशोधन करण्यात येणार आहे.
‘सीओईपी’चे उपप्राचार्य डॉ. बी. एन. चौधरी यांनी ही माहिती दिली. ‘सीओईपी’त सुरू होणारे हे सेंटर ‘इंटरडिसिप्लिनरी’ राहणार असून, सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात कार्यरत होणार आहे. त्यामुळे सेंटरमध्ये कॉलेजमधील पदवीसोबतच पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना संशोधन करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील स्थानिक समस्यांवर तंत्रज्ञानाने उपाय शोधणे आणि लहान व्यवसायांना तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यात नावीन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी सेंटर काम करणार आहे. या सेंटरची सुरुवात मेळघाटमधील संपूर्ण बांबू केंद्रासोबत सामंजस्य करार करून करण्यात येणार आहे. त्यामुळे हे सेंटर बांबू केंद्रासाठी बांबू टेक्नॉलॉजीवर संशोधन करणार आहे.
याबाबत डॉ. चौधरी म्हणाले, ‘बांबूचा वापर तंत्रज्ञान आणि इंजिनीअरिंगच्या साह्याने करण्यासाठी संशोधन सुरू होणार आहे. याची सुरुवात म्हणून बांबूबाबत तंत्रज्ञानाने संशोधन करून त्यापासून स्वच्छतागृहे तयार करण्यात येणार आहे. यासाठी लागणारे बांबू हे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातून आणण्यात येणार आहे. तंत्रज्ञान व इंजिनीअरिंगचा वापर करून स्वच्छतागृहे तयार करण्यात येतील आणि ती मेळघाटमध्ये तेथील नागरिकांसाठी पाठविण्यात येतील.’
‘देशातील ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात चुली आहेत. मात्र, त्या चुली शास्त्रशुद्ध असण्याबाबत अद्याप संशोधन नाही. तसेच, चुलींविषयी तंत्रज्ञानाच्या साह्याने अधिक संशोधन झालेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सो. व्हावी यासाठी चुलींवर संशोधन व्हावे यासाठी आयआयटी मुंबईमध्ये ‘चूल टेक्नॉलॉजी’चा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर येत्या काळी काळात या सेंटरमध्ये ‘चूल टेक्नॉलॉजी’वर संशोधन करण्यात येईल,’ असेही डॉ. चौधरी यांनी सांगितले.
सेंटरचे प्रमुख डॉ. आय. पी. सोनार म्हणाले, ‘या सेंटरमध्ये बांबूवर आणखी संशोधन करून त्याचा वापर बांधकाम, घरगुती आणि ‍व्यावसायिक स्वरूपात करण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन करण्यात येईल. बांबू टेक्नॉलॉजीबरोबरच कचऱ्याच्या समस्येवर देखील उपाय शोधण्यात येणार आहे.’
००..
सेंटर सर्वांसाठी खुले
‘सीओईपी’त सुरू होणारे ‘अॅप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी सेंटर’ मुख्यत्वे ग्रामीण भागातील विविध समस्यांवर काम करणार आहे. तसेच, तेथील एखाद्या लहान व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याला अधिक लोकांपर्यत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये तंत्रज्ञानाच्या साह्याने नागरी समस्यांवर उपाय शोधणे आणि पारंपरिक व्यवसायांना तांत्रिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी संशोधन होणार आहे. त्यामुळे सीओईपी किंवा इतर कॉलेजात शिकणारे विद्यार्थी या सेंटरच्या कार्यात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी भरपूर वाव आहे, अशी माहिती डॉ. चौधरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थसंकल्पावर विरोधकांची टीका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पालिकेच्या सर्वसाधारण सभेला सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने पुणेकरांना स्वप्न दाखविले आहे. स्थायी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ ‘सपनो के सौदागर’ असून, अर्थसंकल्प म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या पोळीवर तूप ओढण्याचा प्रकार असल्याची टीका विरोधकांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत केली.
सर्वसाधारण सभेतील चर्चेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांनी अर्थसंकल्पातील योजनांचा खरपूस शब्दात समाचार घेतला; तर भाजपच्या सभासदांनी सर्व सभासदांना समान न्याय देत समतोल विकास साधल्याचे सांगून अर्थसंकल्पाचे कौतुक केले. हा अर्थसंकल्प म्हणजे पुणेकरांच्या हाती पांढरी काठी देऊन वाटचाल करण्यास सांगितल्यासारखे आहे. केंद्राने आघाडी सरकारच्या योजना भाजपचा मुलामा लावून सुरू केल्या. त्याचप्रमाणे स्थायी समितीने योजना सादर केल्याची टीका सुभाष जगताप यांनी केली. पालिकेच्या गेल्या ५० ते ६० वर्षांच्या इतिहासात ३९ टक्के उत्पन्नामध्ये वाढ दाखविणारा अर्थसंकल्प पुणेकरांची फसवणूक करणारा आहे. करदात्यांना २ टक्के शास्तीकर लावून १३० कोटी वसूल केले जात आहेत; तर बिल्डरांना अभय योजना दिली जात आहे, अशी टीका आबा बागूल यांनी केली. अर्थसंकल्पात भाजपच्या सभासदांना झुकते माप देण्यात आल्याची टीका करत स्मिता कोंढरे, हमिदा सुंडके, अमृता बाबर, अश्विनी भागवत, योगेश ससाणे, वनराज आंदेकर यांनी निषेध व्यक्त केला. तर, अजय खेडकर, राणी भोसले, वनराज आंदेकर, गोपाळ चिंतल यांनी वास्तववादी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल स्थायी समिती अध्यक्षांचे अभिनंदन केले. पालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही अर्थसंकल्पात या गावांसाठी निधीची तरतूद का नाही, असा प्रश्न बाबूराव चांदेरे यांनी विचारला.

‘आता अर्थसंकल्पावर बोला’
भाजपचे स्वीकृत नगरसेवक गोपाळ चिंतल यांनी राजकीय अनुभव आणि अभ्यास यांच्या जोरावर कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत सर्व बाबींचा आढावा घेतला. विरोधी नगरसेवकांच्या आरोपांना त्यांनी खास शैलीत उत्तर दिले. तासभर भाषण झाल्यानंतर काही सभासदांनी ‘आता अर्थसंकल्पावर बोला,’ अशी टिपण्णी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images