Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एकवीस कोटींच्या निविदेवर मेहेरबान

$
0
0

त्रुटी असूनही मंजूर करण्यावर पालिकेचा भर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारजे जलकेंद्र, खडकवासला ‘रॉ वॉटर’ पंपिंग, जुने वारजे जलकेंद्र, गणपती माथा पंपिंग तसेच बुस्टर पंपाच्या दैनंदिन देखभालीसाठी आलेल्या तीन निविदांमध्ये त्रुटी असतानाही एका कंपनीवर पालिका मेहेरबान झाल्याचे चित्र आहे. ही एकमेव कंपनी एकमेव निकषपात्र असल्याचा दावा करून २१.१९ कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
वारजे जलकेंद्र, खडकवासला ‘रॉ वॉटर’ पंपिंग, जुने वारजे जलकेंद्र, गणपती माथा पंपिंग तसेच बुस्टर पंपाच्या दुरुस्तीसाठी यापूर्वीच्या निविदांची मुदत एप्रिलअखेर संपत आहे. पुढील तीन वर्षांसाठी नव्याने ठेकेदार नेमण्यासाठी पालिकेने जाहिरात देऊन निविदा मागवल्या होत्या. या वेळी तीन कंपन्यांनी निविदा भरल्या. त्यातील कोणतीही कंपनी निकषांमध्ये पात्र ठरत नसल्याचा विद्युत विभागाचा दावा आहे. पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता (विद्युत) यांनी पाच एप्रिलला पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंन्यांना पत्र पाठवून, तिन्ही कंपन्यांच्या निविदांबद्दल माहिती दिली. त्यात कंपन्यांनी निकष पूर्ण केले नसल्याचे म्हटले आहे. विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण चौधरी यांनी अतिरिक्त (विशेष) यांना सात एप्रिलला पाठवलेल्या पत्रात निविदांची माहिती दिली. त्यात एका कंपनीने सादर केलेले रजिस्ट्रेशन ग्राह्य धरल्यास ती कंपनी पात्र होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा विभागाकडील यापूर्वीची निविदा एप्रिलअखेर संपत असल्याने कामाची निकड असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार एकतर नव्याने निविदा मागवणे किंवा एकमेव पात्र निविदेचे पाकीट उघडून पुढील आदेशाची विनंती केली होती. त्यानंतर निविदांना एकवेळ मुदतवाढ देण्यात आली होती. तेव्हाही याच कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. विद्युत विभागाने पुन्हा पाठवलेल्या पत्रानुसार या तिन्ही कंपन्या अपात्र असल्याचे म्हटले आहे.

निविदांना उशीर का?
वारजे जलकेंद्र, खडकवासला ‘रॉ वॉटर’ पंपिंग, जुने वारजे जलकेंद्र, गणपती माथा पंपिंग तसेच बुस्टर पंप यांच्या दुरूस्तीच्या कामांच्या निविदा एप्रिलअखेर संपत असल्याची माहिती प्रशासनाला होती. पाणीपुरवठा विभागानेही तशी नोंद केली होती.. त्यामुळे वेळीच निविदा काढण्यात आल्या असत्या तर, आतासारखी परिस्थिती निर्माण झाली नसती, असा दावा काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पक्क्या लायसन्ससाठी ‘सारथी ४.०’ प्रणाली

$
0
0

‘आरटीओ’कडून दोन मे पासून अंमलबजावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) वाहन चालविण्याचे पक्के लायसन्स काढण्यासाठी दोन मे पासून अद्ययावत ‘सारथी ४.०’ प्रणाली वापरली जाणार आहे. यामध्ये अर्जदारांना फॉर्मसोबत सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरुपात वेबसाइटवर अपलोड करावी लागणार असून, प्रत्येक कागदपत्राचा आकार एक एमबीपेक्षा अधिक नसावा, याची काळजी घ्यावी लागणार आहे.
आरटीओमध्ये ‘सारथी ४.०’ प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याच्या प्रक्रियेतही बदल झाला आहे. यापूर्वी ‘सारथी’ वेबसाइटवरून लायसन्ससाठी अपॉइंटमेंट घेतली जात होती. आता नवीन प्रणालीमध्ये लायसन्ससाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्यासाठीची वेबसाइट बदलण्यात आली आहे. नागरिक ‘परिवहन’च्या वेबसाइटवरून अपॉइंटमेंटसाठी अर्ज करू शकतात. ‘परिवहन’ वेबसाइट सुरू केल्यानंतर नागरिकांनी ऑनलाइनचा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर सारथी सर्व्हिसचा पर्याय निवडून ऑनलाइन अर्जाचा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर लायसन्सच्या प्रकारानुसार पर्याय निवडून पुढील प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसात जुन्या प्रणालीद्वारे अपॉइंटमेंट घेतलेल्या उमेदवारांना नवीन वेबसाइटद्वारे पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी परिवहनच्या वेबसाइटवर सारथी सर्व्हिसेसचा पर्याय निवडून ऑनलाइन अर्जाचा पर्याय निवडावा. त्यानंतर लर्निंग लायसन्स पर्यायवर क्लिक करून ‘होल्डिंग लर्निंग लायसन्स’वर क्लिक करून पुढील प्रक्रिया करावी. त्यानंतर संबंधितांना नवीन अपॉइंटमेंट क्रमांक मिळेल.

नागरिकांच्या अडचणींचे काय?
दहा एप्रिलपासून शिकाऊ लायसन्ससाठी ‘सारथी ४.०’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, ही प्रणाली नवीन असल्याने आणि त्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक बदल केल्याने अर्जदारांना ते हाताळणे अवघड गेले. तसेच, अनेक अर्जदारांचे अर्ज दाखल झाले नाहीत. त्यामुळे आता नागरिकांना अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही, याची काळजी आरटीओ प्रशासनाने घेतली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रणालीची वैशिष्ट्ये
- अर्जदारांना जेपीजी, जेपीईजी किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये कागदपत्रे अपलोड करता येतील.
- प्रत्येक कागदपत्राचा आकार एक एमबी पेक्षा अधिक नसावा.
- अर्ज नूतनीकरण, पत्ता, जन्मतारीख बदलताना देखील कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागणार.
- ही प्रणाली सर्व प्रकारच्या ब्राउजरवर कार्यान्वित होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेनेरिक औषधांसाठी कंपन्यांवर लगाम हवा

$
0
0

वैद्यकीय जगतातील तज्ज्ञांचे मत; औषधे उपलब्ध करण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वस्त म्हणून जेनेरिक औषधांची सक्ती केल्यानंतर पेशंटना दर्जेदार औषधे देण्यासाठी डॉक्टरांना चाप लावण्याऐवजी औषध कंपन्यांनाच चाप लावण्यात यावा, असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून लावण्यात येत आहे. जेनेरिक औषधांची सक्ती करण्यापूर्वी ती मुबलक प्रमाणात उपलब्ध करावीत, अशी सूचनाही तज्ज्ञांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टरांना जेनेरिक औषधे लिहिण्याची सूचना केली आहे. त्यानंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने परिपत्रक जारी करून डॉक्टरांना जेनेरिक औषधांचे प्रिस्क्रिप्शन देण्याची सक्ती केली आहे. या शिवाय औषधांची नावे ‘कॅपिटल लेटर’मध्ये लिहावीत, अशी सूचनाही केली आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांसह संघटनांनीही जेनेरीक औषधे उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
‘जेनेरिक औषधांच्या सक्तीबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राष्ट्रीय शाखेने गांभीर्याने दखल घेतली आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाणार आहे,’ असे राज्य आयएमए शाखेचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी सांगितले. ‘डॉक्टरांना जेनेरीक औषधे लिहिण्याची सक्ती करण्यापूर्वी ती औषधे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कंपन्यांकडून औषधांच्या भरमसाठ वाढविल्या जाणाऱ्या किमती कमी केल्या तर सामान्य पेशंटना दर्जेदार औषधे मिळतील,’ असेही डॉ. तांबे म्हणाले.
‘जेनेरिक औषधांच्या सक्तीचा निर्णय अर्धवट आहे. जेनेरिक नावांनी औषधे विकणे कंपन्यांना बंधनकारक केले पाहिजे. डॉक्टरवर जेनेरिक औषध लिहिण्याचे बंधन घालण्यापेक्षा जेनेरिक नावे मोठ्या आणि ठळक अक्षरात छापण्याचे बंधन हवे. काही दुकाने वगळता जेनेरिक औषधे उपलब्ध नाहीत. डॉक्टर्सनी जेनेरिक औषध लिहून दिले तरी औषधविक्रेते ती देऊ शकणार नाहीत. त्यामुळे जेनेरिक औषध निर्मितीची कंपन्यांवर सक्ती करा,’अशी मागणी जन आरोग्य अभियानाचे डॉ. अभय शुक्ला, डॉ. अभिजित मोरे यांनी केली.

औषधांच्या किमती कमी करायच्या असतील तर सध्याचे किंमत नियंत्रणाचे धोरण बदलायला हवे. सर्व आवश्यक औषधे व त्यांची रासायनिक घटकांच्या किमती नियंत्रणाखाली आणल्या पाहिजेत. उत्पादन खर्चावर १०० टक्के मार्जिन ठेवून कमाल किमती ठरविल्या पाहिजेत.
डॉ. अनंत फडके, जन आरोग्य अभियान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटी मार्गावर विजेचा लपंडाव?

$
0
0

बोर्ड प्रशासनाच्या चौकशीकडे पीएमपीकडून दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या बीआरटी मार्गावर काही दिवसांपासून वीज गायब झाली आहे. बोर्ड प्रशासनाने पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपीएएल) पाठपुरावा करूनही पीएमपीने बोर्डाच्या चौकशीला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे आता कॅन्टोन्मेंट प्रशासनावरच बीआरटी मार्गावरील देखभाल दुरूस्तीसाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे.
कँन्टोन्मेंटच्या शंकरशेट रस्ता ते फातिमानगरपर्यंत बीआरटी मार्ग जातो. हा मार्ग स्वारगेट ते हडपसर, स्वारगेट तसेच सोलापूरकडे जाण्यासाठी उपयुक्त ठरतो. हडपसर, मुंढवा भागातील आयटी कंपन्यांतील नोकरादारांना जाण्यासाठी हा मार्ग उत्तम पर्याय आहे. या मार्गावरून 'पीएमपी' बसबरोबरच राज्य परिवहन महामंडळाच्या बसचीही मोठ्या संख्येने ये-जा सुरू असते. काही दिवसांपासून या मार्गावर वीज नाही. त्यामुळे कँन्टोन्मेंटमधील बीआरटी मार्ग अंधारात आहे.
बीआरटी मार्ग अंधारात असल्याने त्या संदर्भात बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी सदस्यांना माहिती दिली. तसेच 'पीएमपी' प्रशासन या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे या मार्गाच्या देखभाल दुरूस्तीकडे कॅन्टोन्मेंटनेच लक्ष द्यावे, असे डॉ. यादव यांनी सुचविले. या प्रश्‍नासंदर्भात बोर्डाच्या सदस्यांनीही तक्रार नोंदविल्या. या मार्गावर वीज नसल्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता सदस्यांनी व्यक्त केली. 'बीआरटी' मार्गावरील बंद वीजपुरवठा सुरू करण्यासंदर्भात कँन्टोन्मेंटचे अभियंते 'पीएमपी' प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच कॅन्टोन्मेंट या मार्गाच्या देखभाल दुरूस्ती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याविषयी बोर्डाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे,' अशी माहिती बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राफिनपासून इलेक्ट्रिकल कंडक्टर

$
0
0

पुणेकर अमोघ किणीकरचे योगदान; क्वांटम कम्प्युटिंगसाठी उपयुक्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मूळचा पुणेकर आणि सध्या बेंगळुरूच्या ‘आयआयएससी’मध्ये शिकण घेणाऱ्या अमोघ किणीकरने (वय २३) ‘ग्राफिन’पासून तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिकल कंडक्टरचा शोध लावला आहे. या कंडक्टरमधून माहिती (डेटा) अथवा विद्युत प्रवाह कोणत्याही अडथळ्यांशिवाय आणि अपव्यय न होता काही क्षणांतच जाणार आहे. भविष्यात ‘ग्राफिन’चा वापर क्वांटम कम्प्युटिंगमध्ये करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्याच्या कम्प्युटरला एखादी गोष्ट करायला काही वर्षे लागणार असतील तर क्वांटम कम्प्युटिंगद्वारे ते काही क्षणात होईल.
‘ग्राफिन’पासून तयार करण्यात येणाऱ्या कंडक्टरच्या मदतीनश् माहिती किंवा विद्युतप्रवाहाचे आदानप्रदान हे जलद आणि अडथळ्यांशिवाय होऊ शकते, हे संशोधकांनी काही वर्षांपूवी सिद्ध केले. मात्र, अद्याप प्रत्यक्षात प्रयोग करण्यात आलेला नव्हता. साधारणतः २००४पासून हा प्रयोग प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयोग सुरू होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये (आयआयएससी) एमएससी फिजिक्सचे अध्ययन करणाऱ्या अमोघने प्रा. अरिंदम घोष आणि समन्वयक टी. फनिंन्द्र साई यांच्या मार्गदर्शनाखाली यशाला गवसणी घातली आहे.
‘कार्बन अणूंच्या षटकोनी आकाराच्या अनेक थरांपासून ग्राफिन तयार होते. या प्रयोगासाठी थरांमधून एक थर बाजूला काढण्यात आला होता. त्या थराच्या कडेला ‘झिगझॅग’ नावाचा एज (कडा) आहे. या एजमधून इलेक्ट्रॉन अतिजलद गतीने डेटा अथवा विद्युत प्रवाहाचे वहन करतात. त्यामुळे तो कंडक्टरमधून जात नाही. विशेष म्हणजे हे वहन कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांशिवाय आणि अपव्ययशिवाय होत असल्याचे दिसून आले. आतापर्यत ‘केमिकल बाँडिंग’द्वारे ग्राफिनच्या माध्यमातून विद्युत प्रवाह अथवा डेटा वहन करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, ते यशस्वी झाले नाहीत. आम्ही मात्र इलेक्ट्रिकल बाँडिंगद्वारे यशस्वी प्रयत्न केले. सध्या ग्राफिनचा वापर करता येणार नाही. मात्र, आणखी वीस वर्षांनी ग्राफिनचा वापर यशस्वीरित्या करता येईल,’ असे अमोघने सांगितले.
ग्राफिनचा वापर हा ‘क्वांटम कम्प्युटिंग’मध्ये करण्यात येणार असून, त्याची आता कुठे सुरुवात झाली आहे. हे संशोधन ‘नेचर नॅनोटक्नॉलॉजी’ या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. दरम्यान, धायरीत राहणाऱ्या अमोघचे वडील अनिल व्यावसायिक असून, आई श्वेता शाळेत नोकरी करतात.

‘कम्प्युटिंगचा वेग वाढणार’
सध्या क्वांटम कम्प्युटिंगची सुरुवात झाली आहे. ग्राफिनचा वापर त्यासाठी करण्यात येईल. ग्राफिनमुळे हाय परफॉर्मन्स सुपरकम्प्युटिंग (एचपीसी) क्षमता काही पटींनी वाढणार आहे. त्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत. सद्याच्या कम्प्युटरमध्ये सिलिकॉनचा वापर केला जातो. त्याऐवजी भविष्यात ग्राफिनचा वापर होईल. त्यादृष्टीने संशोधन करण्याची आवश्कता आहे. आपल्या शोधाचा उपयोग गुगल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम आदी कंपन्यांना होणार असल्याचे अमोघने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीतील लाचखोर स्टेनोला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी १२ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या स्टेनोला कोर्टाने २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी हा आदेश दिला. राजेंद्र सोपान शिर्के (वय ४५, रा. संध्यानगरी, जगताप डेअरी, पिंपळे निलख) असे कोठडी सुनावलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात एका बांधकाम व्यासायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून, त्यांच्या थेरगाव येथील ११ इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यापैकी सात इमारतींना महापालिकेकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला आहे. उर्वरित चार इमारतींचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देणे बाकी होते. तो दाखला देण्यासाठी शिर्के याने बांधकाम व्यावसायिकाकडे १२ लाख रुपयांची लाच मागितली होती. लाच घेताना सोमवारी शिर्केला अटक केली. शिर्केला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले. या गुह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिल प्रेमकुमार अगरवाल यांनी केली. ती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिंबर मार्केटमध्ये आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टिंबर मार्केट येथे मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत वेफर्सचा कारखाना, लाकडाची वखार, टायरचे गोडाउन आणि अंदाजे २५ ते ३० घरे जळून खाक झाली. आग भीषण असल्याने अग्निशमन दलाला ‘ब्रिगेड कॉल’ द्यावा लागला. आगीत चार ते पाच सिलिंडरचे स्फोट झाल्यामुळे आग वाढत होती. जवानांनी तिन्ही बाजूने पाण्याचा मारा करून एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. वेफर्सच्या कारखान्यापासून आग सुरू झाली असली तरी आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशामक दलाला मंगळवारी पहाटे पाच वाजून दहा मिनिटींनी आग टिंबर मार्केटमध्ये आग लागल्याचा फोन आला. एका मिनिटामध्येच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहचली. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केले होते. लाकडाच्या वखारी, दाटीवाटीने घरे आणि अरुंद रस्ता त्यामुळे आगीपर्यंत पोहचता येत नव्हते. पाइपचा पट्टा ओढून केंद्र प्रमुख प्रकाश गोरे व त्यांच्या जवानांनी आगीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. आगीवर पाण्याचा मारण्यास सुरुवात केली. मात्र, आगीचे स्वरूप पाहून गोरे यांनी ब्रिगेड कॉल दिला.

अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, नागरलकर, गिलबिले इतर केंद्राचे अधिकारी विजय भिलारे, राजेश जगताप, गजानन पात्रुडकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या व चार पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. अरुंद रस्ते असल्यामुळे तीन गाड्याचे विभाग करून तिन्ही बाजूने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. तसेच, नागरिकांच्या मदतीने घरातील सिलिंडर बाहेर काढण्यात आले. या वेळी चार ते पास सिलिंडरचे स्फोट झाले. त्यामुळे आग आणखीच भडकत होती. घरे लाकडाची असल्यामुळे आग झपाट्याने पसरत होती. २५ ते ३० जवान व अधिकाऱ्यांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत आगीत तब्बल २५ ते ३० घरे, वेफर्स कारखाना, टायरचे गोडाऊन जळून खाक झाले. या आगीमुळे २५ ते ३० कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहेत. टिंबर मार्केटमध्ये असलेल्या वेफर्सच्या कारखान्यापासून ही आग सुरू झाली. पहाटे तीन वाजल्यापासून हा कारखाना सुरू होतो. दिवसाला या ठिकामी सातशे ते आठशे किलो वेफर्स बनविली जाते. हा कारखाना बेकायदा असून या ठिकाणाहूनच आगीला सुरुवात झाली. त्यामुळे आगीत गरिबांची घरे जळून खाक झाली, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

कारखाना कोणाचा?

आगीची सुरुवात झालेला वेफर्सचा कारखाना कोणाचा आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. या कारखान्यात दहा ते बारा वर्षांच्या मुलांकडून काम करून घेतले जात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. पहाटे तीन वाजता फॅक्टरीत वेफर्सचे बनवण्याचे काम सुरू केले जात होते. आग लागताच कामगार पसार झाले असून, तर सायंकाळपर्यंत त्यांचा थांगपत्ताही पोलिसांना लागला नव्हता. त्यामुळे ही फॅक्टरी नेमकी कोणाची आहे, असा प्रश्न आता समोर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची ‘२०१९’ची तयारी

$
0
0

पक्षाचे महामंत्री जाणून घेताहेत देशाचा ‘मूड’

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतीय जनता पक्षाने (भाजप) आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी सुरू केली असून देशाचा ‘मूड’चीही चाचपणी करण्यात येत आहे. भाजपचे १२ राष्ट्रीय महामंत्री वेगवेगळ्या प्रातांच्या दौऱ्यांवर असून ते आपला अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना सादर करणार आहेत. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल जैन पुणे दौऱ्यावर असून ते पदाधिकारी, नगरसेवक, आमदार तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांशी चर्चा करत आहेत.

देशभरात राज्ये, महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप ​जिंकत असल्याचे वातारवण आहे. खऱ्या अर्थाने भाजपसाठी ‘अच्छे दिन’ सुरू झाले असले, तरी त्याच वेळी भाजपकडून २०१९ च्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या निवडणुका कदाचित २०१८ च्या अखेरीस होण्याचीही शक्यता असून त्यादृष्टीने संघटनात्मक पातळीवर सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. दिल्लीतील राजकीय वर्तुळात लोकसभा निवडणुका या २०१८ मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपने १२ राष्ट्रीय महामंत्र्यांना देशातील विविध प्रातांचा दौरा करण्याची जबाबदारी सोपवली आहे. या महामंत्र्यांनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राची जबाबदारी जैन यांच्यावर सोपवण्यात आली असून ते पुण्यात दाखल झाले आहेत. जैन यांनी रविवारी पक्षाचे पदाधिकारी, मतदारसंघाचे प्रमुख, विविध आघाड्यांचे प्रमुखांची चर्चा केली. ते सोमवारी पक्षाच्या नगरसेवकांशीही चर्चा करणार आहेत. त्याशिवाय शहरातील ​विविध मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. देशातील भाजपबद्दलचा ‘मूड’ जाणून घेणे हेही त्यातील एक प्रमूख कारण सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय महामंत्री सर्वसामान्यांच्या मनात भाजप, सरकार यांच्याबद्दल काय प्रतिमा आहे, याचाही अंदाज घेणार आहेत.

देशात दर वर्षीच वेगवेगळ्या स्तरावरील निवडणुका होत असतात. गेल्या अडीच ते तीन वर्षांत भाजपने बहुतांश निवडणुका जिंकल्या आहेत. तसेच आगामी ​लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीही सुरू केली आहे. भाजपला कसे रोखायचे, या विवंचनेत असलेल्या विरोधी पक्षांना काही कळायच्या आत भाजपने पुढील निवडणुकांची तयारी जोरात सुरू केली आहे. जैन हे भाजपचे महामंत्री/सरचिटणीस असतानाच दिल्लीतील राष्ट्रीय मुख्यालयाचे प्रमुखही आहेत. त्यामुळे त्यांना देशभराच्या राजकारणाचा चांगला आवाका आहे. जैन हे पुण्यात असल्याने संघटनेतील सगळेच पदाधिकारी सध्या ‘अलर्ट’ झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिनेश वाघमारेंच्या चौकशीची मागणी

$
0
0

खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘लाचप्रकरणी अटक केलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्टेनो राजेंद्र शिर्के केवळ मुखवटा असून, त्यामागील भ्रष्टाचाराचा खरा चेहरा आयुक्त दिनेश वाघमारे आहेत,’ असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी केला. आयुक्त वाघमारे यांच्या कारकिर्दीतील सर्व निर्णयांची चौकशी करावी, अशी मागणी बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात बारणे म्हणाले, ‘स्वीय सहायक आणि स्टेनो पदावर गेल्या बारा वर्षांपासून कार्यरत असलेल्या राजेंद्र शिर्के याला बांधकाम व्यावसायिकाकडून १२ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. यातून महापालिकेतील भ्रष्टाचार उघड झाला आहे. अनेकप्रकारे सामान्य नागरिकांची अडवणूक होते आणि पैशांची सर्रास मागणी कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत केली जाते. परंतु, याबाबत कोणीच काही बोलत नाही. शिर्के भ्रष्टाचाराचा म्होरक्या नसून, आयुक्त वाघमारे पाठीराखे आहेत.’

‘महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून, आतापर्यंत पालिकेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. बांधकाम व्यावसायिकांना वेठीस धरून राजरोसपणे पैशांची मागणी होत आहे. सायंकाळी सहानंतर बांधकाम विभाग आणि नगररचना विभागामध्ये चालू असलेली कामे ही भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू आहेत. येथे पैसे घेतल्याशिवाय कामेच होत नाहीत. प्रत्येकाचे विशिष्ट दर ठरलेले आहेत. अडवणूक करून छोट्या-मोठ्या त्रुटी काढून नागरिकांना त्रास देऊन पैशांची मागणी केली जाते. ही एक प्रकारची साखळीच आहे. पालिकेचे प्रमुख अधिकारी ते महापालिका आयुक्त सर्वजचण भ्रष्टाचारात सहभागी आहेत,’ असे बारणे यांनी सांगितले.

‘आयुक्त कार्यालयातील एखादा स्टेनो १२ लाख रुपयांची लाच मागू शकत नाही. आयुक्त वाघमारे यांनी गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. त्यांच्या सर्व संपत्तीची चौकशी व्हावी,’ अशी मागणी बारणे यांनी केली आहे.

‘नार्को चाचणी करावी’

‘राजेंद्र शिर्के याने इतकी लाच कोणाच्या सांगण्यानुसार स्वीकारली, असा प्रश्न उपस्थित करून भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी या प्रकरणी शिर्केची नार्को चाचणी करावी आणि आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्यात यावी,’ अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड एक वेळ पाणी

$
0
0

दोन मे पासून अंमलबजावणीचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने २५ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत येत्या दोन मे पासून शहरात दिवसाआड एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी दिली.

पाणीकपातीसंदर्भात महापालिकेत सर्वपक्षीय बैठक झाली. त्यानंतर घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना महापौर काळजे म्हणाले, ‘गेल्या वर्षी पवना धरणात याच दिवशी २६.६५ टक्के पाणीसाठा होता. तो आजमितीस ३८ टक्के आहे. यंदाचा पाऊस सरासरी इतका होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी शहराची वाढलेली लोकसंख्या आणि वाढलेला पाणीउपसा लक्षात घेतला पाहिजे. प्रत्यक्ष पावसाळा होऊन धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत उपलब्ध पाणी जपून वापरले पाहिजे. त्याअनुषंगाने पाणीबचत आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार आहे.’

‘पाणी वाचवा-पाणी वाढवा’ उपक्रमांतर्गत पालिकेने नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यामध्ये नागरिकांनी नळ अर्धा किंवा पाऊण उघडावा, पाणी शिळे होते हा गैरसमज मनातून काढून टाकावा, दोन नियंत्रणे (ड्युअल टॅप) असलेला फ्लशिंग टँक वापरावा, शॉवरचा वापर टाळावा, टाक्यांमधून पाणी ओव्हरफ्लो होणार नाही याची काळजी घ्यावी, पूर्व परवानगीने जुने कनेक्शन बदलावे, घरातील नळ, पाइप, फ्लश वेळेत दुरुस्त करावेत या बाबींचा समावेश आहे.

याशिवाय नळांना नोझल्स बसवावे, वॉशिंग मशिनचा वापर पूर्ण क्षमतेने करावा, कूपनलिकेच्या पाण्याची उधळपट्टी टाळावी, वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, घरातील फरशी धुण्याऐवजी पुसून काढावी, भांडी धुताना पाण्याचा पुर्नवापर करावा, बाथटबचा वापर करू नये, मोठ्या सोसायट्यांनी जलतरण तलाव बंद करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या पाणी आयोगाच्या माहितीनुसार आपण काय करतो, काय केले पाहिजे, पाण्याची किती बचत होते, याविषयी माहिती जाहीर करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टीत १५ टक्के वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापा‌लिकेचा अर्थसंकल्पीय आराखडा तयार करताना मिळकतकरात १२ टक्के वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावल्यानंतर मंगळवारी सर्वसाधारण सभेतही करवाढीचा निर्णय फेटाळण्यात आला. मात्र, शहरात समान पाणीवाटप योजनेसाठी गेल्या वर्षी सर्वसाधारण सभेने प्रत्येक वर्षी पाणीपट्टीत वाढ करण्यास मान्यता दिल्याने यंदाच्या वर्षी पाणीपट्टीत १५ टक्के वाढ केली जाणार आहे.
पालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्पीय आराखडा सादर करताना आयुक्त कुणाल कुमार यांनी मिळकत कराच्या सर्वसामान्य करामध्ये १२ टक्के वाढ करण्याचे प्रस्तावित केले होते. यामुळे पालिकेला ९८ कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळणार होते. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या खास सभेत करवाढीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. मिळकतकराची १७०० कोटी रुपयांची थकबाकी असता ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न न करता सर्वसामान्यांच्या डोक्यावर करवाढीचा बोजा कशाला टाकायचा, असा प्रश्न उपस्थित करत समितीच्या बैठकीत एकमताने ही करवाढ फेटाळण्यात आली.
स्थायी समितीने प्रशासनाने सुचविलेली करवाढ अमान्य केल्याने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आला होता. या प्रस्तावावर चर्चा करताना सभासदांनी स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. पालिका प्रशासनाने थकबाकीदारांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी विविध उपक्रमांचा अवलंब करावा, असे केल्यास पुढील काही वर्षे सर्वसामान्य पुणेकरांवर करवाढ लादावी लागणार नाही, अशी भूमिका बहुतांश सभासदांनी मांडली. या प्रस्तावावर चर्चा करताना दुबार दिली जाणारी मिळकतकराची बिले, चुकीच्या पद्धतीने होणारी वसुली, तसेच पाणीपट्टीच्या नावाखाली वेगवेगळ्या माध्यमातून घेतले जाणारे शुल्क यावर देखील सभागृहात चर्चा झाली‌. शहरात समान पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेसाठी पुढील पाच वर्षे प्रत्येक वर्षी पाणीपट्टीत वाढ करण्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यासाठी आला असताना नागरिकांकडून पाणीपट्टी घेत असताना किमान त्यांना पुरेसा पाणीपुरवठा होईल, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, काही भागात मुबलक पाणी तर काही भागात केवळ एक तास पाणी असा दुजाभाव चालणार नाही, प्रशासन सर्वांकडून पाणीपट्टी घेत असेल तर प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळेल, याची काळजी घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली.
राज्य सरकारने पाणीपुरवठा योजनेच्या कामाला दिलेली‌ स्थगिती उठविण्यासाठी महापौर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेत्यांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटावे, अशी मागणी सभागृहात करण्यात आली. गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण सभेने समान पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपट्टीत दर वर्षी काही टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने ही दरवाढ करण्याचा ठराव प्रशासनाने ठेवला होता. त्याला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.

हजार रुपयांमागे १५० रुपयांची वाढ
ज्या नागरिकांना गेल्या वर्षी एक हजार रुपये पाणीपट्टी भरावी लागत होती, त्यांना यंदाच्या वर्षी ११५० रुपये पाणीपट्टी भरावी लागणार आहे; तर दोन हजार रुपये पाणीपट्टी भरणाऱ्यांना २३०० रुपये पाणीपट्टी भरावी लागणार आहे. एक हजार रुपयांमागे प्रत्येकी १५० रुपये वाढ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद

$
0
0

पुणे ः जलकेंद्रातील दुरुस्तीच्या कामांसाठी गुरुवारी (२७ एप्रिल) शहरातील विविध ठिकाणांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुरवठा शुक्रवारी उशिरा सुरू होईल.
शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, मीठानगर, लुल्लानगर, साईबाबानगर, कौसरबाग, कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, साळुंखे विहार, उंड्री रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, रामटेकडी झोपडपट्टी, एसआरपीएफ गट क्रमांक एक आणि दोन, रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, भीमनगर, वटारेमळा, गणेशनगर, मिलिंदनगर, बी. टी. कवडे रस्ता, सोपानबाग, विवेकानंद रस्ता, सोलापूर रस्ता, मुंढवा, केशवनगर, मगरपट्टा सिटी, हडपसर, सातवनगर, गोंधळेनगर, तुकाई टेकडी, माळवाडी १५ नंबर, शिंदेवस्ती, सय्यदनगर, महंमदवाडी, हांडेवाडी, काळेपडळ, ससाणेनगर, मंतरवाडी, आझादनगर, संपूर्ण शिवरकर रस्ता, जगतापनगर, केदारीनगर, मानेवस्ती, क्लोव्हर व्हिलेज, गंगा सॅटेलाइट, वानवडी गाव, पुणे कँटोन्मेंट, घोरपडी, संपूर्ण पूर्वभाग परिसर, वडगाव शेरी, माळवाडी, साईनाथनगर, मारुतीनगर, गणेशनगर, आनंदपार्क, मतेनगर, सोमनाथनगर, खराडी, थिटेवस्ती, चौधरी वस्ती, चंदननगर, श्रीराम सोसायटी, ठुबे पठारेनगर, संपूर्ण कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, जेल रस्ता, गांधीनगर, येरवडा गाव, नगर रस्ता, हाउसिंग बोर्ड, आळंदी रस्ता येथे पाणी बंद राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलमाफीची किंमत ३,८०० कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या टोल नाक्यांवर स्कूलबस, एसटी, कार, जीप यांना दिलेल्या टोल माफीची किंमत ३८०० कोटी रुपये असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. राज्य सरकारने केलेली टोलमाफीची घोषणा फसवी असून, या माफीपोटी सरकारच्या तिजोरीतून, म्हणजेच राज्यातील सर्वसामान्य करदाच्यांच्या खिशातून रस्त्याच्या कंत्राटदारांना पुढील २५ वर्ष तिजोरीतून ३८०० कोटी रुपये भरपाई देणार आहे.

राज्य सरकारने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेले व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेले काही टोल नाक्यांवर स्कूलबस, एसटी, कार, जीप यांना टोल मधून वगळण्याचा निर्णय २०१५ मध्ये घेतला होता. यामध्ये सार्वजिनक बांधाकाम विभागाच्या अखत्यारितील १७ कंत्राटांचा समावेश होता. प्रत्यक्षात टोलमाफीचा हा निर्णय सरकारने घेतला असला, तरी या कंत्राटदारांना २०४० पर्यंत किंवा संबंधित कंत्राट संपुष्टात येईपर्यंत प्रतिवर्ष नुकसान भरपाई देण्याचे सरकारने मान्य केले आहे.

त्यामुळे पुढील किमान २५ वर्ष सरकारी तिजोरीतून या कंत्राटदारांना टोलचे पैसे दिले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीवरून ही गोष्ट समोर आली आहे, असे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले. टोलमाफीची घोषणा करून सरकारने श्रेय लाटले. पण, दुसरीकडे जनतेच्या खिशातून मिळविलेल्या कररूपी उत्पन्नातून हा टोल पुन्हा दिला जात आहे. पारदर्शी कारभाराचा आग्रह धरणाऱ्या सरकारने हे जाहीर का केले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवरील टोल वसुलीचे कंत्राटदाराचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानंतरही टोल वसुली थांबविण्यात आलेली नाही. त्या उलट एक एप्रिलपासून टोलवाढ करण्यास मान्यता दिली आहे. ‘पारदर्शक’ सरकारचा हा कारभार ‘अपारदर्शक’ आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वे वरही सरकारने ‘पारदर्शक’ टोलमाफी जाहीर करावी, असा मुद्दा मंचाने उपस्थित केला आहे.

त्या २६ टोलनाक्यांनाही भरपाई?

राज्य सरकारने ३१ मे २०१५ पासून राज्यातील ५३ टोल नाक्यांवर टोलमाफी जाहीर केली होती. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील २७ टोलनाके व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितील २६ टोलनाक्यांचा समावेश होता. सजग नागरी मंचाला माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेली माहिती फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाशी संबंधित २६ टोलनाक्यांच्या कंत्राटदारांनाही राज्य सरकार भरपाई देत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ चौकातील वाहनकोंडी सुटणार

$
0
0

दुहेरी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, एचसीएमटीआरची योजना प्रस्तावित

Suneet.Bhave@timesgroup.com
Tweet : @suneetMT

पुणे : औंध-बाणेरकडे जाण्यासाठी दुहेरी उड्डाणपूल, बाणेरकडून शिवाजीनगरकडे येण्यासाठी ग्रेड सेपरेटर, उच्च क्षमता अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यासाठी (एचसीएमटीआर) स्वतंत्र पूल आणि शिवाजीनगर-हिंजवडी उन्नत (एलिव्हेटेड) मेट्रोसाठी वेगळा मार्ग... परदेशातील आधुनिक शहराला शोभेल असा प्रकल्प गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषिजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशद्वार) साकारण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर होणार असून, त्यांची मान्यता मिळताच प्रकल्पाच्या माला गती मिळण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्णत्त्वास गेल्यानंतर आनंदऋषिजी चौकात सध्या होणाऱ्या कोंडीतून वाहनचालकांची कायमची सुटका होऊ शकेल. या चौकामध्ये काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला उड्डाणपूल वाढत्या वाहतुकीला सामावून घेण्यात अपुरा पडत असल्याने येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत होती.
गणेशखिंड रस्त्याने औंध-सांगवीपर्यंत जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) आणि याच रस्त्याने बाणेरमार्गे हिंजवडीपर्यंत मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. हे दोन्ही महत्त्वाचे प्रकल्प याच चौकातून जाणार असल्याने भविष्यकालीन नियोजन करताना त्याचाही अंतर्भाव करणे गरजेचे आहे. म्हणूनच, सर्व सेवांसाठी उपयुक्त असा एकात्मिक आराखडा तयार करण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांनी पुढाकार घेतला होता. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, पुढील काही दिवसांत त्याचे सविस्तर सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर होणार आहे.
आनंदऋषिजी चौकाच्या एकात्मिक आराखड्याअंतर्गत शिवाजीनगरकडून औंधकडे जाण्यासाठी दुहेरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे, औंधकडून येणाऱ्या वाहनांची कोंडीतून सुटका होणार आहे. सेनापती बापट रस्त्याने येणाऱ्या वाहनांना औंध-बाणेरकडे उतरणाऱ्या उड्डाणपुलावर थेट प्रवेश दिला जाणार आहे. बाणेरकडून येणाऱ्या वाहनांना चौकात थांबावे लागू नये, यासाठी बाणेर ते भोसलेनगरपर्यंत ग्रेड सेपरटेर तयार करण्यात येणार आहे. त्याशिवाय, महापालिकेच्या प्रस्तावित एचसीएमटीआर रस्त्यासाठी पूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, उड्डाणपुलांच्या खांबांवर (पिलर) मेट्रो उभारण्याचा प्रस्ताव असल्याने खर्चातही बचत होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पावर अखेरचा हात फिरविण्यात येत असून, अंतिम खर्चासह त्याचे सविस्तर सादरीकरण पुढील महिन्यात केले जाणार आहे.
या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवल्यास याच वर्षी प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामध्ये मेट्रोसाठीचे खांब उभारण्यात येणार असल्याने पालिकेसह पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) त्याच्या खर्चाचा भार उचलावा, अशी योजना आहे.

सध्याचे उड्डाणपूल पाडणार
नवा प्रकल्प राबविण्यासाठी आनंदऋषिजी चौकात सध्या अस्तित्वात असलेले औंध-बाणेरकडे जाणारे उड्डाणपूल पाडावे लागणार आहेत. या पुलांच्या स्लॅबचा उपयोग शहरातील इतर प्रकल्पांमध्ये करता येणार आहे. तसेच, नव्या प्रकल्पाचे काम करताना, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग कोणते असतील, याचीही चाचपणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार राष्ट्रपती झाले तर अधिक आनंद

$
0
0

सुशीलकुमार शिंदे यांची भावना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राष्ट्रपतिपदी राज्यातील व्यक्ती विराजमान झाली तर, त्याचा मला आनंद वाटेल. मात्र, त्यातही शरद पवार राष्ट्रपती झाले तर आनंद अधिक होईल,’ असे सांगून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी पवारांच्या निवडीला पाठिंबा दर्शवला. राजकीय जीवनात पराभव होत असतात. त्यामुळे, बावचळून जाण्याची गरज नाही असा टोलाही त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला.
शहरात आयोजित कार्यक्रमानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘राष्ट्रपतिपदाची निवडणूक सर्वसंमतीने व्हायला हवी. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन राष्ट्रपतींची निवड करायला हवी. पवारांसारखा अनुभवी नेता या पदावर विराजमान झाल्यास देशाला पहायला आवडेल,’ असे शिंदे यांनी सांगितले. गेल्या चाळीस वर्षांपासून मी राजकारणात आहे. येथे पराभव होतात. त्यामध्ये बावचळण्यासारखे काय आहे, असा खडा सवाल उपस्थित करून शिंदे यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारचा विरोध करायला काँग्रेस कमी पडली, या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचे मी समर्थन करीत नाही, असेही त्यांनी सांगितले.
छत्तीसगडमधील सुकमात झालेल्या नक्षलवादी हल्ल्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. ‘नक्षलग्रस्त भागात हेलिकॉप्टरच्या मदतीने गस्त घातली जावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मी गृहमंत्री असताना तसा प्रयत्न केला होता. या सरकारनेही नक्षलग्रस्त भागात हेलिकॉप्टरने गस्त घालणे गरजेचे आहे,’ असेही शिंदे म्हणाले.

‘काम थोडेच; गवगवा जास्त’
‘सत्ता येते आणि जाते. मात्र, सत्तेत असताना तुम्ही काय काम केले हे महत्त्वाचे असते. मी माझ्या कामाचा कधीही गवगवा केला नाही. काही व्यक्ती काम थोडेच करता आणि त्याचे गोडवे जगभर गातात,’ या शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉ. विनय थोरात यांना शिंदे यांच्या हस्ते गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. श्यामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर, नगरसेविका आणि संस्थेच्या सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे आदी या वेळी उपस्थित होते. ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही नीतीमूल्ये जपणारी संस्था आहे,’ अशा शब्दात शिंदे यांनी संस्थेचा गौरव केला. डॉ. थोरात यांच्या चित्रकलेचा गौरव करताना शिंदे म्हणाले की डॉक्टरच्या हसून बोलण्यामुळे अर्धा आजार बरा होतो. त्यामुळे डॉक्टरांनी हसतमुख राहिले पाहिजे. या वेळी शिरोळे, टिळक आणि डॉ. एकबोटे यांनीही मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कधी जाणार हे भविष्य पाहिले पाहिजे

$
0
0

सुशीलकुमार शिंदे यांचे मिश्कील वक्तव्य; मोडक पुरस्कारांचे वितरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राजकीय व्यक्तींच्या संपर्कात अनेक ज्योतिषी येतात. मलाही त्याचा षौक होता. आयुष्यात सगळे काही मिळवले; आता काय मिळवायचे म्हणून भविष्य पहायचे असा प्रश्न पडतो. आता कधी एकदा जातो, म्हणून भविष्य पाहिले पाहिजे,’ अशी एकापेक्षा एक मिश्कील वक्तव्ये करून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी उपस्थितांना पोट धरून हसण्यास भाग पाडले.
अभिनेते शाहू मोडक यांच्या जन्मदिनानिमित्त यंदाचा २३ वा शाहू मोडक स्मृती पुरस्कार वितरण समारंभ बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. त्या वेळी शिंदे बोलत होते. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात श्रीरंग महाजन (बालकलाकार), जिया वाडकर (गायन), सोहम गोराणे (तबलावादन), दत्तात्रय अत्रे (ज्योतिष), अमोल करचे (अंध क्रिकेटपटू) आदींचा शाहू मोडक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात रसिकांनी शिंदे यांचे मिश्कील व्यक्तिमत्व अनुभवले. वाडकर यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा देताना शिंदे यांना ‘जेव्हा तुझ्या बटांना, उधळी मुजोर वारा’ या गाण्याची आठवण झाली. ‘हे गाणे सुंदर आहे मी तुम्हाला ते गाण्याची फर्माइश करणार होतो. पण, आता समुद्रावरच्या वाऱ्याच्या गोष्टी करायचे आमचे दिवस गेले,’ असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. असे एकावर एक विनोदाची बरसात करून शिंदेंनी सभागृहाचा ताबा घेतला. ‘श्रध्देतून अंधश्रध्दा निर्माण केली जात असेल, तर ते चुकीचे आहे. भविष्य केवळ सूचना देण्याचे, दिशा दाखवण्याचे काम करते. विज्ञानाने भविष्याला कवेत घेतले आहे. त्यामुळे, कम्प्युटरवर कुंडली तयार करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मला, आता भविष्य पाहून काय मिळवायचेय? सगळे मिळवून झाले आहे,’ असेही शिंदे म्हणाले.
वाडकर म्हणाले. ‘आज माझ्या दोन्ही मुली माझ्या आजी-आजोबांचा वारसा पुढे चालवत आहेत. या वाटचालीत त्या यशस्वी होतील, एवढीच प्रार्थना करीन. पुणेकर रसिक गाण्याबाबत चोखंदळ आहेत. नवीन लोकांच्या गर्दीत जुने गायक मागे पडत आहेत.’ प्रतिभा मोडक यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

अमोलने उलगडला क्रिकेटप्रवास
लहान असताना बरोबरीच्या मुलांना क्रिकेट खेळताना पाहून मी एकटाच लाकूड आणि बाटलीने खेळत बसायचो. पुण्यात अंध शाळेत दाखल झाल्यानंतर क्रिकेटची आवड निर्माण झाली. त्यानंतर यथावकाश भारतीय संघात समावेश झाला. विश्वचषकातील पहिल्याच मॅचमध्ये आम्ही पाकिस्तानकडून हरलो. पण, फायनलमध्ये आम्ही त्यांना धूळ चारली, असे सांगून अंध क्रिकेटपटू अमोल करचे याने क्रिकेट प्रवास उलगडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून भाजपचे ‘चिंतन’

$
0
0

प्रदेश कार्यकारिणीला सुरुवात; पक्षांतर्गत गटबाजी कायमच

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला आज, बुधवारपासून (२६ एप्रिल) सुरवात होणार आहे. चिंचवड येथील कै. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात २७ एप्रिलपर्यंत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बैठकीचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, ऊर्जामंत्री पियुष गोयल, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.
केंद्र आणि राज्यातील अनेक मंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार-आमदार, जिल्हाध्यक्ष आणि व्हीव्हीआयपी आदी आठशे ते हजार प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांनीही शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. बैठकीसाठी उपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या राहण्यासाठी पिंपरी, काळभोरनगर, संत तुकारामनगर, वाकड येथील तारांकित हॉटेल बुक करण्यात आली आहेत. तसेच, यातायातसाठी सुमारे शंभर वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पस्तीस वर्षांनंतर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे. यापूर्वी १९८२मध्ये प्रदेशपातळीवरील बैठक झाली होती. यंदा पालिकेत कमळ फुलल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बैठक यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपकडून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात येत असून, विविध भागांत पक्षाचे झेंडे, नेत्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी बैठकीच्या पूर्वसंध्येला नियोजनाचा आढावा घेतला.

कडक बंदोबस्त तैनात
बैठकीदरम्यान विरोधी पक्षांकडून देण्यात आलेल्या आंदोलनांच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त राम मांडुरके, राजेंद्र भामरे, वैशाली जाधव-माने यांच्यासह २५ पोलिस निरीक्षक, ६० सहायक निरीक्षक/फौजदार, चारशे पोलिस कर्मचारी आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी आदी ६०० पोलिसांचा फौजफाटा दोन दिवस तैनात असणार आहे.

पक्षातील गटबाजी कायम
राज्यातील कानाकोपऱ्यातून भाजपचे पदाधिकारी बैठकीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होणार आहेत. मात्र, शहरातील पक्षांतर्गत गटबाजी अद्याप कायम असल्याचे दिसून आले. बैठकीच्या निमित्ताने केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या फलकांवरून महापौर नितीन काळजे आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचे फोटो गायब असल्याचे दिसून आले.

आघाडीतर्फे आंदोलन
विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते शहरात विविध मुद्यांवर आंदोलन करणार आहेत. त्याचबरोबर शहरातील स्थानिक पदाधिकारी तसेच काही सामाजिक संघटना देखील आंदोलन करणार आहेत.

आगामी काळातील पक्षाची ​दिशा ठरणार

राज्यातील महापालिकांमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीसाठी केंद्र, राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पक्षाची आगामी काळातील दिशा निश्चित होण्याची अपेक्षा आहे.
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी दुपारी ४ वाजता प्रदेश कार्यकारिणीचे औपचारिक उद्घाटन होईल. तत्पूर्वी, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक सकाळी ११ वाजता हॉटेल कलासागर येथे होणार आहे. राज्याच्या विविध भागांत भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर आगामी रणनीती काय असेल, याबाबत कार्यकारिणीत विचारमंथन होण्याची शक्यता आहे. पनवेलसह आणखी दोन महापालिकांची निवडणूक पुढील महिन्यात होणार आहे. त्यानंतर, वर्षभरात कोणत्याही महत्त्वाच्या निवडणुका नसल्याने नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठीची वाटचाल बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळ अवतरणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे बहुतेक सर्व मंत्री बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या नेत्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाबाबतही सूचक संदेश कार्यकर्त्यांना दिला जाईल, अशी अपेक्षा आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपला सत्ता मिळाली असून, त्यानंतर लगेच प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत असल्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये त्याविषयी उत्सुकता आहे.

महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा
कर्जमाफीच्या प्रश्नावरून सध्या विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा सुरू केली आहे. तसेच, तूर खरेदीवरूनही विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यामुळे, राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत प्रदेश कार्यकारिणीत चर्चा होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्नास हजार टन निर्यातीचे उद्दिष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हापूस आंब्यासह केशरची जागतिक बाजारपेठेत मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आंबा निर्यातीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यंदा राज्यातून ५० ते ७० हजार टन आंबा निर्यात करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.
अमेरिकेत २००६ पर्यंत आंब्याच्या आयातीवर बंदी होती. त्यानंतर अटींवर भारतीय आंब्यासाठी अमेरिकेची बाजारपेठ खुली झाली. यंदा अमेरिकेत १५०० टन, युरोपमध्ये ५,००० टन आणि जपानमध्ये १५० टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट आहे. दोन ते तीन दिवसांपासून आंबा निर्यातीला सुरुवात झाली आहे. आंब्यासह अन्य फळे आणि भाजीपालाही निर्यात करावा, असे आवाहन पणन मंडळातर्फे निर्यातदारांना करण्यात आले आहे.
आंबा निर्यातीसाठी मंडळाने वाशी, नवी मुंबई आणि गोरेगाव येथे विकिरण सुविधा, व्हेपर हिट ट्रीटमेंट आणि उष्णजल प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. या सुविधा नुकत्याच अद्ययावत करण्यात आल्या. अमेरिका, कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि जपान येथील निरीक्षकांच्या देखरेखीखाली आंब्याची निर्यात सुरू झाली आहे, अशी माहिती राज्य पणन मंडळाने दिली. इराणमध्ये आंबा निर्यातीसाठी तेथील शिष्टमंडळाने नुकतीच मुंबई येथील निर्यात प्रकल्पांना भेट दिली. त्यामुळ आंबा निर्यातीसाठी लवकरच इराणची बाजार पेठ उपलब्ध होईल, असा कयास आहे.

‘मॅग्नोनेट’ची हात
‘मॅग्नोनेट’अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांचा माल निर्यात करण्यात येणार आहे. निर्यातदार थेट शेतातून आंबा खरेदी करतात; त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळतात. या प्रक्रियेमुळे हाताळणी आणि वाहतुकीत होणारे आंब्याचे नुकसान कमी होण्यास मदत होते. शेतातून आंबा सुविधा केंद्रावर आल्यानंतर त्यावर संबंधित देशाच्या निकषांनुसार विविध प्रक्रिया करून तो निर्यातीसाठी सज्ज करण्यात येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात एटीएमचा खेळखंडोबा सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एटीएममधील खडखडाटाला २५ दिवस झाले तरीही शहरातील एटीएम अजूनही पूर्वपदाला येऊ शकलेली नाहीत. अजूनही खासगी बँकांची अनेक एटीएम बंदच असून, त्याचा फटका खातेदारांना बसत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांची बरीचशी एटीएम सुरू असून या एटीएमवरील व्यवहारांच्या संख्येत वाढ झाली आहे. एटीएमचा खेळखंडोबा अजूनही सुरूच असल्याने विविध बँकांचे ग्राहक त्रस्त झाले आहेत. शहरातील खासगी बँकांची एटीएम मंगळवारीही बंदच होती. बँकांना रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षित पतपुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती कायम राहिल्याचे सूत्रांकडून समजते.

नोटाबंदीनंतर बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. आता मात्र, बँकेतून पैसे काढण्यावर कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे खातेदार त्यांना हवी, तितकी रक्कम खात्यातून काढू शकतात. खासगी बँकांमधूनही खातेदार मोठ्या प्रमाणावर रक्कम काढत आहेत. त्यामुळे या बँकांना मिळणारी रोकड ही बँकेच्या शाखांमध्येच पाठवावी लागत आहे. परिणामी, त्यांची बहुतांश एटीएम बंद राहात आहेत. त्यातच अनेकदा रोकड मिळाल्यानंतर त्याचे वर्गीकरण होऊन त्याचे वाटप व्हायला दुपार किंवा सायंकाळ होत आहे. त्यानंतर एटीएममध्ये रोकड भरणाऱ्या गाड्या एटीएमला जाऊन रक्कम भरत आहेत. त्यानंतरच एटीएम सुरू होत आहेत. त्यामुळे सकाळच्या किंवा व्यवहारांच्या वेळेत एटीएम बंदच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सध्या बँकेतून किंवा एटीएममधूनही पैसे काढण्यावर कोणतीही मर्यादा नाही. एटीएममध्ये कोणत्याही बँकेचे एटीएम कार्डधारक पैसे काढू शकतात. कार्यान्वित असलेल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी रांगा लागत असल्याने तेथील रोकड संपुष्टात येत आहे. मात्र, बँकेच्या शाखेतून फक्त खातेदारच पैसे काढू शकत असल्याने काही बँका एटीएम बंद ठेवून शाखेत येणाऱ्या खातेदारांना प्राधान्य देत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेकडून रोकड पुरवठा नियमित होईपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

योग्य नियोजनाची गरज

सध्या महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पगाराची रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये तसेच एटीएमवर रांगा लागण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी बँकांनी आताच नियोजन करून अपेक्षित रकमेसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा केला तरच खातेदारांना पगाराच्या दिवशी पगाराची रक्कम एटीएममधूनही उपलब्ध होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्यात तिघांचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी/लोणावळा

पुण्यापासून जेमतेम २५ किलोमीटरवर असलेल्या सोमाटणे फाटा येथील धामणे गावात मंगळवारी (२५ एप्रिल) पहाटे फाले कुटुंबीयांच्या घरी सशस्त्र सात ते आठ दरोडेखोऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून, चौघे जखमी झाले. घरामधील कपाटातील किमती ऐवजासह महिलांच्या अंगावरील दागिने घेऊन ते पसार झाले. मावळ परिसरात गेल्या महिन्याभरात आठ जणांचे खून झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा दरोडा पडल्याने नागरिकांमधील असुरक्षिततेची भावना वाढली आहे.

नथू विठोबा फाले (वय ६५), छबुबाई नथू फाले (६०) हे पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा अत्रीनंदन उर्फ आबा नथू फाले (३१, तिघेही रा. धामणे, मावळ) हे तिघे दरोडेखोरांच्या हल्ल्यात ठार झाले. नथू फाले यांची सून तेजश्री अत्रीनंदन फाले (२६) ही गंभीर जखमी झाली आहे. फाले यांची सहा वर्षीय नात अंजली आणि अन्य इतर कुटुंबीय जखमी झाले आहेत.

फाले यांचे घर गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असून, त्यांचे शेत डोंगर परिसरात आहे. त्यांच्या घराशेजारी काही अंतरावर इतर दोन ते तीन घरे आहेत. दरोडा पडला तेव्हा एकूण सातजण घरात होते. फाले यांच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी धामणे गावातील दोन-तीन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कारमधून दरोडेखोर आले आणि त्यांनी फाले कुटुंबीय झोपेत असतानाच हल्ला केला. लोखंडी टिकाव, घण व चाकूसारख्या धारदार शस्त्राने त्यांनी हा हल्ला केला. फाले यांच्या घरातील कपाट फोडून त्यातील ऐवज व छबूबाई यांचा कान तोडून कानातील अलंकारासह इतर दागिने आणि सून, तसेच नातींच्या अंगावरील दागिने घेऊन ते पसार झाले. पोलिस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर अधीक्षक राजकुमार शिंदे आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नथू फाले हे मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ टाळकरी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images