Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘एसपी’त होणार ‘डिजिटल क्लास’

0
0

पुणे : प्राध्यापक विद्यार्थ्यांना मोबाइल किंवा टॅबमधून विविध प्रकारच्या असाइन्मेंट, प्रश्न आणि नोट्स देत आहेत. त्याच वेळी विद्यार्थी मोबाइल किंवा टॅबच्या मदतीने प्रश्नांची उत्तरे लिहून प्राध्यापकांना पाठवतात आणि त्याची तपासणी देखील होते. असे चित्र येत्या शैक्षणिक वर्षापासून एसपी कॉलेजमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘गुगल क्लासरूम’च्या माध्यमातून या नावीन्यपूर्ण प्रयोगाची सुरुवात होणार असून तो राबविण्यासाठी ‘गुगल’ने कॉलेजला मान्यता दिली आहे.

शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ (एसपी) कॉलेजमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘गुगल क्लासरूम’च्या प्रयोगाची सुरुवात होईल. कॉलेजने याबाबतची संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली असून या प्रयोगाची यशस्वी चाचणी घेतली आहे. केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ला आणि ‘ई-लर्निंग’ला पाठबळ देण्यासाठी हा प्रयोग राबविण्यात येईल.

‘गुगल क्लासरूम’मध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा असणारे कम्प्युटर, मोबाइल, टॅब अशी साधने असण्याची आवश्यकता आहे. या सुविधेत प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने लॉग-इन आयडी आणि पासवर्ड तयार करतील. त्यानंतर या सुविधेमध्ये प्राध्यापकांना त्यांचा ऑनलाइन पद्धतीने वर्ग तयार करावा लागेल. वर्ग तयार केल्यानंतर प्राध्यापकाला त्याच्या विद्याशाखेचे नाव टाकून या वर्गाला एक स्वरूप देता येईल. ई-मेल किंवा आयडीद्वारे विद्यार्थ्यांना या वर्गामध्ये सामावून घेता येईल. त्यानंतर उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या विकल्पांद्वारे विद्यार्थ्यांचा एक गट तयार करून त्यांना संबंधित विषयाच्या असाइन्मेंट देता येतील व वर्गात होणारी परीक्षा घेता येईल. एवढेच नव्हे, तर अभ्यासासाठी नोट्स, व्हिडिओ, ‘पीपीटी’ पाठवता येईल. तसेच, विविध प्रकारच्या सूचना देता येतील, असे कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अनिल दुसाने यांनी सांगितले.

या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना असाइन्मेंट, प्रश्न सोडवता येतील. तसेच, त्यांची तपासणी प्राध्यापकांनी करून विद्यार्थ्यांना पुन्हा सूचना सांगता येतील. याद्वारे प्राध्यापकांना गुण देता येतील. असाइन्मेंट देण्याची किंवा परीक्षेची शेवटची तारीख कोणती, विद्यार्थ्यांनी सूचना पाहिल्या, की नाही आदींची माहिती प्राध्यापकांना मिळेल. इतर विद्यार्थ्यांकडे ‘क्लास कोड’ असल्यास त्याला तो टाकून संबंधित प्राध्यापकांच्या वर्गात प्रवेश मिळेल, असे दुसाने यांनी सांगितले.

या प्रक्रियेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कॉलेजमध्ये असाइन्मेंट, परीक्षा आणि नोट्स देण्याची पारंपरिक पद्धतीही सुरू राहील. ही प्रक्रिया राबविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, नियामक मंडळाचे सदस्य सतीश पवार, केशव वझे, अनिल खुनसे यांनी पुढाकार घेतला, असे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांनी सांगितले.

व्हिडिओ चॅटद्वारे शिकवता येणार

प्राध्यापकांना हॅँगआउटचा वापर करून विद्यार्थ्यांसोबत ‘व्हिडिओ’ चॅटद्वारे शिकविता येईल. त्यामुळे एखादा अवघड विषय हव्या त्या वेळी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शिकविता येईल. दरम्यान, या सुविधेचा प्राध्यापकांना वापर करता येण्यासाठी त्यांची कार्यशाळा घेण्यात येईल. अशा प्रकारची सुविधा शहरात इतर कॉलेजांमध्ये सुरू करण्यासाठी एसपी कॉलेज मार्गदर्शन करणार आहे, असे डॉ. दुसाने यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘हिमोफेलिया’च्या पेशंटना अपंगत्व

0
0

पुणे : राज्यातील पुण्याच्या ससून हॉस्पिटलसह मुंबई, सातारा, नाशिक, ठाणे, अमरावती या सहा सरकारी हॉस्पिटलमध्ये ‘हिमोफेलिया’च्या पेशंटना सहा महिन्यांपासून ‘लाइफसेव्हिंग’ इंजेक्शन उपलब्ध नाहीत. औषधांअभावी राज्यातील दोन हजारांहून अधिक पेशंटना अपंगत्वाचा धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे, बाजारात औषधे उपलब्ध असली, तरी ती महागडी असल्याने खरेदी करणे अशक्य झाले आहे.

जागतिक ‘हिमोफेलिया’ दिन सोमवारी जगभर पाळण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या आजारांनी त्रस्त पेशंट मोफत औषधांच्या शोधात फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका १४ वर्षांच्या मुलाला ‘हिमोफेलिया’ झाला आहे. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये त्याला औषध उपलब्ध झाले नाही. मुलाच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची त्याची आर्थिक परिस्थिती नाही. पिंपरी चिंचवड येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारांसाठी दाखल केले असून ‘हिमोफेलिया सोसायटी ऑफ महाराष्ट्र, पुणे’ शाखेच्या वतीने काही इंजेक्शनचा त्या मुलांसाठी पुरवठा केला. या पेशंटला दहा इंजेक्शनची गरज असून सोसायटीला कायमस्वरूपी त्याला औषध पुरविणे अशक्य आहे,’ अशी वस्तुस्थिती सोसायटीच्या पुणे शाखेचे उपाध्यक्ष डॉ. सुनील लोहाडे यांनी ‘मटा’ला सांगितली.

सांध्यात रक्तस्त्राव झाल्यास रक्तातील ‘हिमोसेट्रिन’ हा ‘पिग्मेंट’ हे सांध्याच्या अवरणावर येते. सांधा खराब होण्याची प्रक्रिया सुरू होते. इंजेक्शन मिळाले नाही, तर सांधा खराब होण्याचे प्रमाण वाढत जाते. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील हिमोफेलियाच्या पेशंटना इंजेक्शन न मिळाल्याने महाराष्ट्रातील चार हजारांपैकी निम्म्याहून अधिक पेशंटना अपंगत्व आले आहे, याकडे डॉ. लोहाडे यांनी लक्ष वेधून औषधांअभावीची विदारक स्थिती कथन केली.

‘‘हिमोफेलिया’च्या पेशंटना शरीरात रक्तस्त्राव होतो. त्यासाठी ‘लाइफसेव्हिंग’ इंजेक्शन घ्यावे लागते. दहा हजारांमागे एकाला हा आजार असतो. या इंजेक्शनची बाजारात १५ हजार रुपयांपर्यंत किंमत आहे. इंजेक्शन महागडे असल्याने ९० टक्के पेशंटना ते परवडणारे नाही. एका पेशंटला दोन ते पाच एवढी इंजेक्शनची गरज असते. त्यामुळे राज्य सरकारने पुण्याचे ससून, मुंबई, सातारा, नाशिक, ठाणे, अमरावतीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये हे इंजेक्शन मोफत उपलब्ध केले. परंतु, सहा महिन्यांपासून खरेदीच्या प्रक्रियेत इंजेक्शन अडकल्याने ते उपलब्ध नाही,’ असे डॉ. लोहाडे यांनी स्पष्ट केले.

‘हिमोफेलिया’ म्हणजे काय?

शरिरात रक्त गोठणाऱ्या आठ किंवा नऊ क्रमांकांच्या घटकाची कमतरता असल्याने शरीरात कोठेही रक्तस्त्राव होतो. साधारणत सांध्यांमध्ये हा रक्तस्त्राव होतो. रक्तस्त्राव मेंदू, पोट, फुफ्फुसांमध्ये झाल्यास त्यात पेशंटचा जीव जाऊ शकतो.

साईडर चौकट

‘हिमोफेलिया’वर दृष्टिक्षेप...

४ हजार

महाराष्ट्रात नोंद झालेले पेशंट

१० ते १२ हजार

महाराष्ट्रात प्रत्यक्षात असलेले पेशंट

८००

पुणे, बीड, नगर, बारामती, वाईच्या पेशंटची संख्या

१७ हजार

देशात नोंद झालेले पेशंट

१ लाख

प्रत्यक्षात देशात पेशंट असण्याची शक्यता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात आणखी तीन दिवस उन्हाचा तडाखा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कमालीच्या उकाड्याचा तीव्र तडाखा संपूर्ण राज्याला बसला आहे. संपूर्ण राज्य कडाक्याच्या उन्हात होरपळत असून पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहणार आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट असून पुढील तीन दिवस राज्यात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागानुसार कमाल तापमान सरासरीपेक्षा पाच अंश किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास त्या ठिकाणी उष्णतेची लाट आहे, असे मानले जाते. सध्या संपूर्ण राजस्थानमध्ये उष्णतेची लाट असून काही भागात तीव्र उष्णतेची लाट आहे. गुजरातमध्येही अशीच परिस्थिती असून, राजस्थान व गुजरातमध्ये आणखी तीन ते चार दिवस उष्णतेची लाट कायम असेल. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे. तीही कायम राहणार असून पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उष्णतेची लाट राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस कंपन्यांना बडगा

0
0

पुणे : कागदोपत्री अस्तित्वात असणाऱ्या कंपन्या, बोगस कंपन्या किंवा प्राप्तिकर व अन्य विवरणपत्रे न भरणाऱ्या कंपन्यांविरोधात वाणिज्य व्यवहार मंत्रालयाने (कॉर्पोरेट अफेअर्स) कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे विभागात अशा ११ हजारहून अधिक कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आता त्यांना कर व अन्य विवरणपत्र भरून मान्यता टिकवावी लागेल; अन्यथा त्यांची मान्यता रद्द होण्याबरोबरच संचालकांना कारवाईलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

देशभरात अनेक बोगस कंपन्या असून त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वीच सूचित केले होते. त्यानंतर मंत्रालयातर्फे ही पावले उचलण्यात आली आहेत. कागदोपत्री अस्तित्वात असणाऱ्या कंपन्यांना आता त्यांचे अस्तित्व सिद्ध करावे लागणार आहे. वाणिज्य व्यवहार मंत्रालयाअंतर्गत सर्व कंपन्यांचे नियंत्रण ‘रजिस्ट्रार ऑफ कंपनीज’ कार्यालयाच्या माध्यमातून केले जाते. या कार्यालयातर्फे पुण्याबरोबरच देशभरात अशा प्रकारे कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याची यादी मंत्रालयाच्या वेबसाइटवरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुण्यातील परिस्थिती

‘रजिस्ट्रार ऑफ कंपनीज’च्या पुणे कार्यालयाने सात एप्रिल रोजी ही नोटीस प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ११ हजार २८५ कंपन्यांचा समावेश आहे. नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत उत्तर द्यावे, असेही या नोटिशीमध्ये म्हटले आहे. ‘रजिस्ट्रार ऑफ कंपनीज’ने प्रसिद्ध केलेल्या या यादीबाबत कोणालाही शंका किंवा हरकत असेल, तर संबंधितांना तीस दिवसांच्या आत त्यावर हरकत नोंदवता येणार आहे. पुणे विभागात पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि नगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

‘रजिस्ट्रार कार्यालयातर्फे काही निकषांच्या आधारे या कंपन्यांची यादी करण्यात आली आहे. कार्यालयाच्या मते या कंपन्या अस्तित्वात असूनही व्यवसाय करीत नाहीत. परंतु, यातील सर्वच कंपन्या बंद आहेत, असे नाही. काही कंपन्या व्यवसाय करीत आहेत. मात्र, त्यांनी विविध प्रकारचे विवरणपत्र भरलेले नाहीत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना दिलेल्या मुदतीत आपले अस्तित्व सिद्ध करावे लागणार आहे. तरच त्यांची नोंदणी कायम राहील,’ असे ‘इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मकरंद लेले यांनी सांगितले. 'कंपनीची नोंदणी रद्द झाल्यानंतर तिचे अस्तित्वच संपुष्टात येते. त्यामुळे एकदा नोंदणी रद्द झाल्यानंतर पुन्हा कंपनी पुर्नस्थापित करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे सर्वच संबंधित व्यावसायिकांनी ही यादी पडताळून पाहणे अत्यावश्यक आहे,' असे सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय सचिव पातळीवरून देखरेख

केंद्रीय स्तरावरूनच बोगस कंपन्यांविरोधात आक्रमक मोहीम उघडण्यात आली आहे. पुण्यासह देशभरात अशा कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या मोहिमेची देखरेख आणि पाठपुरावा थेट केंद्रीय सचिव पातळीवरून केला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही अर्थसंकल्प सादर करताना प्राप्तिकर भरणाऱ्या कंपन्यांची संख्या अत्यल्प असल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर या कारवाईकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. परिणामी, अशा कंपन्यांसाठी अस्तित्व सिद्ध करून कर भरा किंवा कारवाईला सामोरे जा, एवढेच पर्याय उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दैनंदिन पास सवलत पीएमपीकडून रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्षपदीची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्याकडून प्रवासीकेंद्रित निर्णय घेण्याची अपेक्षा केली जात असताना, दैनंदिन पासवरील सवलत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या आठ महिन्यांपासून अवघ्या ५० रुपयांत दिल्या जाणाऱ्या दैनंदिन पाससाठी प्रवाशांना आता पुन्हा ७० रुपये मोजावे लागणार असून, येत्या मंगळवारपासून (१८ एप्रिल) त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

रेनबो बीआरटीच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पीएमपीने गेल्या वर्षी १४ ऑगस्टपासून पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील आणि हद्दीबाहेरील प्रवाशांसाठी दैनंदिन पासची किंमत ७० रुपयांहून ५० रुपये केली होती. ही योजना मर्यादित कालावधीसाठी लागू करण्यात आली होती. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे पास शुल्कामध्ये देण्यात आलेल्या सवलतीचा कालावधी वाढविण्यात आला होता. यामध्ये पीएमपीच्या प्रवाशांची संख्या वाढणे अपेक्षित होते. मात्र, पीएमपी प्रशासनाच्या अपेक्षेप्रमाणे प्रवासी संख्येत वाढ झाली नसून, पासविक्रीच्या उत्पन्नातही घट झाली आहे, असा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. त्यामुळे उद्या, मंगळवारपासून (१८ एप्रिल) दैनंदिन पासची किंमत ५० रुपयांऐवजी पुन्हा ७० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात ही योजना केवळ एक महिन्यासाठीच असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर, योजनेचा कालावधी २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत वाढविण्यात आला होता. फेब्रुवारीनंतरही ती योजना सुरूच होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोक्यात गोळी झाडून युवतीची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे / बारामती

बारामती येथील सूर्यनगरी येथे एका १७ वर्षाच्या युवतीने गावठी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. युवतीने आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. कुटुंबातील व्यक्ती प्रेम करत नाहीत. राहणीमानावर सतत आक्षेप घेतात. त्यामुळे नैराश्यातून आत्महत्या करीत असल्याचे तिने म्हटले आहे. युवतीने आत्महत्येसाठी वापरलेले पिस्तूल कोठून आले, याचा पोलिस शोध घेत आहेत.

संध्या उर्फ सायली मानसिंग बळी (वय १७) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीमधील सूर्यनगरी येथील सुधागन अपार्टमेंटमध्ये बळी कुटुंब राहतात. सायलीचे वडील मानसिंग बळी सातारा जिल्ह्यातील बोरजायवाडी येथील मुळचे रहिवासी आहेत. ते सैन्यदलात हवालदार म्हणून कार्यरत असून, त्यांची नेमणूक सध्या सिक्कीम राज्यात आहे. गेल्या वर्षी सायली, तिची आई आणि भाऊ बारामतीत शिक्षणासाठी आले होते. यापूर्वी शिक्षणासाठी ते पंजाबमध्ये राहत होते.

सायलीची आई शनिवारी रात्री घराबाहेर गेलेली असताना नऊ वाजण्याच्या सुमारास सायलीने घरात असलेल्या गावठी कट्ट्यातून डोक्यात एक गोळी मारून घेतली. त्यामध्ये गोळी कपाळातून आरपार गेली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. गोळीच्या आवाजामुळे शेजारील रहिवाशांनी बळी यांच्या घरी धाव घेतली. त्या वेळी सायलीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच बारामती ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसाना घटनास्थळी एका गावठी पिस्तुल सापडले; तसेच सायलीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवलेली मिळाली. त्या चिठ्ठीत तिने कुटुंबाकडून प्रेम मिळत नाही. आपल्या राहणीमानावर आक्षेप घेतला जात असल्याचे नमूद केले आहे. रुई येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर सायलीचा मृतदेह तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायलीने ज्या गावठी कट्ट्याने गोळी मारून घेतली, तो कोणाकडून आणले याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत काळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उकाडा, अतिउकाडा, भयंकर उकाडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कमालीच्या उकाड्याचा तीव्र तडाखा संपूर्ण राज्याला बसला आहे. संपूर्ण राज्य कडाक्याच्या उन्हात होरपळत असून पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहणार आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट असून पुढील तीन दिवस राज्यात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, रविवारी पुण्यात हंगामातील उच्चांकी ४०.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान विभागानुसार कमाल तापमान सरासरीपेक्षा पाच अंश किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास त्या ठिकाणी उष्णतेची लाट आहे, असे मानले जाते. सध्या संपूर्ण राजस्थानमध्ये उष्णतेची लाट असून काही भागात तीव्र उष्णतेची लाट आहे. गुजरातमध्येही अशीच परिस्थिती असून, राजस्थान व गुजरातमध्ये आणखी तीन ते चार दिवस उष्णतेची लाट कायम असेल. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे. तीही कायम राहणार असून पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उष्णतेची लाट राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

रविवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील ब्रह्मपुरी येथे (४५.९ अंश सेल्सिअस) झाली. नगर येथे ४३.२, जळगाव येथे ४४.५, कोल्हापूर येथे ३६.५, महाबळेश्वर येथे ३३.९, मालेगाव येथे ४२.६, सातारा येथे ४०.९, सोलापूर येथे ४३.१, सांताक्रूझ येथे ३५.३, औरंगाबाद येथे ४१.४, नांदेड येथे ४४.५, अकोला व नागपूर येथे प्रत्येकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे असे उन्हाळ्याचे चार महिने असतात. मात्र, त्यापैकी एप्रिल आणि मे हे सर्वाधिक उकाड्याचे म्हणून ओळखले जातात. या दोन महिन्यांत काही वेळा उष्णतेची लाट निर्माण होते. त्यानुसारच सध्या एप्रिलमध्ये उष्णतेची लाट निर्माण झाली असून, त्याच्या झळा संपूर्ण राज्यभर जाणवत आहेत. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक शहरे वगळता राज्यात सर्वत्र पारा ४० अंशांच्या वर पोहोचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील अपघातात चिमुकलीचा नाहक बळी

0
0

म.टा. प्रतिनिधी, पुणे

बाणेर गावात भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने रस्त्याच्या दुभाजकावर उभ्या असलेल्या पाच जणांस उडविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अपघातानंतर कार खांबाला जाऊन धडकली. यामध्ये एका तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला असून एका मुलीसह चौघे जखमी आहेत. याप्रकरणी कार चालविणाऱ्या महिलेच्या विरोधात चतुःश्रुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हे फुटेज काळजाचा थरकाप उडवणारं आहे.

ईशा अजयकुमार विश्वकर्मा (वय तीन वर्षे) असे ठार झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. तिची आई पुजा अजयकुमार विश्वकर्मा (वय २४), निशा शेख, शाजिद शेख (वय- चार वर्षे) आणि सय्यद अली (वय २५, सर्व रा.धनकुडे हाईट्स, राम मंदीराजवळ, बाणेर) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कारचालक सुजाता जयप्रकाश श्रॉफ (रा. बाणेर) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख व विश्वकर्मा कुटुंबिय एकमेकांचे शेजारी आहेत. डिमार्टमध्ये खरेदी करून ते घरी परतत होते. बाणेर गावाच्या कामानीजवळ सहा आसनी रिक्षातून उतरून पाचजण रस्ता ओलांडत होते. एका बाजूचा रस्ता ओलांडून ते दुभाजकावर उभे होते. दुसऱ्या बाजूचा रस्ता ओलांडण्यासाठी वाहने जाण्याची वाट पहात होते. त्यावेळी सुजाता ही आय टेन कार भरधाव घेऊन बाणेर गावाकडे जात होती. तिचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार थेट दुभाजकावर चढली. दुभाजकावर उभ्या असलेल्या पाच जणांस उडवून कार खांबाला जाऊन धडकली. कारच्या धडकेने पाचजण दूरवर फेकले गेले. त्याच्याजवळील साहित्य अस्ताव्यस्त पडले.

अपघतानानंतर मोठा आवाज झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. तत्काळ कारखाली सापडलेल्यांना व इतरांना उचलून उपचारासाठी खासगी रुग्णालायत दाखल केले. यावेळी ईशाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तसेच, निशा हिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. विश्वकर्मा यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. अपघातानंतर सुजाता हिने भोवळ आल्यामुळे काही समजले नसल्याचे सांगितले. मात्र, ती फोनवर बोलत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांनी अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातांचे होणार सखोल विश्लेषण

0
0

संबंधित १७ घटकांची माहिती नोंदविणार ; पोलिसांना अंमलबजावणीचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशभरातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अपघातांचे सखोल विश्लेषण करण्याची नवीन योजना आखली आहे. या अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यात कोठेही झालेल्या अपघाताची माहिती एकाच ‘फॉरमॅट’मध्ये प्राप्त होणार असून, यामध्ये अपघाताचे ठिकाण, कारण व वेळ, वाहनाचा प्रकार, रस्त्याची अवस्था, हवामानाची परिस्थिती, वाहन चालक व प्रवाशांची माहिती यासह एकूण १७ विषयांची माहिती बारकाईने नोंदविली जाणार आहे.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अपघातांच्या अभ्यासासाठी नियमावली निश्चित करण्यासाठी दिल्ली व कानपूर येथील आयआयटीचे तज्ज्ञ, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी, विविध राज्यातील पोलिस व परिवहन विभागातीस वरिष्ठ अधिकारी, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अधिकारी यांची समिती स्थापन केली होती. या समितीने विविध मुद्द्यांचा अभ्यास करून नियमावली तयार केली आहे. यामध्ये प्रामुख्याने अपघात, संबंधित रस्ता, अपघातातील वाहन, ड्रायव्हर आणि अपघातग्रस्त व्यक्ती यांच्याशी संबंधित १७ मुद्द्यांचा समावेश केला आहे. या नियमावलीनुसार अपघातांची संकलित केलेली माहिती रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला वर्ष समाप्तीनंतर ३० दिवसांच्या आत पाठविण्याचे बंधन असणार आहे. या नियमावलीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाने पोलिस दलाला दिले आहेत. त्यासाठी सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणही नुकतेच देण्यात आले आहे. या नियमावलीनुसार, अपघाताच्या सर्वसाधारण माहितीची नोंद ठेवली जाईल.
...
या गोष्टींची होणार नोंद
...
० अपघाताचे क्षेत्र ग्रामीण आहे की शहरी याची नोंद
० अपघाताच्या वेळी असणारे हवामान
० रस्त्यांची अवस्था
० संबंधित रस्ता निवासी, औद्योगिक, शैक्षणिक किंवा खुला, यापैकी कोणत्या क्षेत्रातील आहे याची नोंद.
० प्रत्यक्ष अपघाताच्या ठिकाणी रस्ता सरळ, वळणाचा, उड्डाणपुलाचा किंवा आणखी कोणत्या प्रकारचा होता?
० चौक असल्यास त्याची रचना.
० अपघातातील वाहन, त्या वाहनाचे आयुर्मान, वाहनातील प्रवासी संख्या
० माल वाहतूक करणारे वाहन असल्यास वजन
० अपघात नेमका कसा झाला त्याची माहिती
० वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन असल्यास कोणत्या नियमांचे उल्लंघन केले त्याची माहिती.
० वाहन चालक, प्रवाशांनी हेल्मेट, सीट बेल्ट किंवा अन्य सुरक्षेचे उपाय योजले होते अथवा नाही.
० वाहन चालकाच्या लायसन्सबाबत माहिती
० अपघातग्रस्तांची वयानुसार माहिती नोंदविली जाणार आहे.
.................
अपघातक्षेत्राजवळील पोलिस स्टेशनमध्ये नोंद
पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून याच धर्तीवर गेल्या दोन वर्षांपासून अहवाल तयार केला जात आहे. आता या निर्णयानुसार प्रत्यक्ष अपघात झालेल्या ठिकाणच्या पोलिस स्टेशनमध्येही यानुसार नोंद ठेवली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टेमघर’चे काम होणार दोन महिन्यांत पूर्ण

0
0

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली पाहणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘टेमघर धरणातून होणारी पाण्याची गळती रोखण्याचे काम तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू असून येत्या दोन महिन्यांमध्ये या टप्प्याचे काम पूर्ण होईल,’ अशी माहिती सोमवारी देण्यात आली.
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी टेमघर धरणास भेट देऊन कामाची पाहणी केली. या वेळी मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, अधिक्षक अभियंता एच. टी. धुमाळ, तसेच सुनिल प्रदक्षिणे, वाय. के. चौगुले, मकरंद मॅकल, सचिन डोंगरे उपस्थित होते. गळती कमी करण्यासाठी व धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी तीन टप्प्यात काम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ड्रिलिंग आणि ग्राउटिंग करण्यात येणार आहे. या
पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू असून, येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात पीआयसीसी (पॉली आयराइट सिरॅमिक सिमेंटने प्लॅस्टर) करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात धरणाच्या मोनोलिथ क्रमांक ९ ते १७ ला पूर्णपणे सिमेंटचे अस्तरीकरण करण्यात येणार आहे.
या तीन टप्प्यात होणाऱ्या कामांतर्गत धरणाच्या दोन्ही बाजूकडील भराव काढणे, ग्राउटिंग करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. शिवतारे यांनी या वेळी धरणाच्या भिंतीवर सुरू असणाऱ्या ड्रिलिंग आणि ग्राउटिंगच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळा सुरू होण्याच्या आधी अधिकाधिक काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंगणे टेकडी होणार हरित

0
0

महाराष्ट्र मेट्रो रेल्वेचा वन विभागाला प्रस्ताव
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नागरी वन उद्यान योजनेअंतर्गत वन विभागाने वारजे टेकडी पाठोपाठ कर्वेनगर येथील हिंगणे येथील वनक्षेत्राचा विकास करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. अतिक्रमणापासून टेकडीला दूर ठेवण्यासाठी संरक्षित भिंतीचे कामही नुकतेच पूर्ण केले. येत्या पावसाळ्यात वृक्षारोपणाला सुरुवात करण्याचे वन विभागाचे नियोजन होते. मात्र, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने वन विभागाने जागा उपलब्ध करून दिल्यास आम्ही तिथे वृक्षारोपण करून देऊ, असा प्रस्ताव वन विभागाला दिला.
मेट्रोचे काम करताना संबंधित मार्गावर येणारी झाडे तोडली जाणार आहेत, त्यांची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडे लावण्याचे बंधन आहे. पुणे मेट्रोने २०१४ मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार या प्रकल्पासाठी सहाशेहून अधिक झाडे तोडावी लागणार आहेत. त्या बदल्यात महामेट्रोतर्फे ३ हजार ४२५ झाले लावण्यात येणार आहे. यासाठी वन विभागाबरोबरच खडकवासला, वारजे, पर्वती आणि हिंगणे टेकडीवर वृक्षारोपण करण्यासाठी महापालिका, वन विभाग आणि महसूल विभागाला प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
नव्याने लावण्यात आलेल्या झाडांचे चांगल्यापद्धतीने संगोपन करावे तसेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत पर्यावरणासाठी विशेष उपक्रम राबविण्यासाठी कॉर्पोरेशनचे अधिकारी जागेच्या शोधात होते. गेल्या महिनाभरात त्यांनी प्रस्तावित घटना स्थळांना भेटी दिल्या आहेत. त्यातूनच वन विभागाच्या टेकडीचा पर्याय पुढे आला आणि त्यांनी वनाधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्राथमिक पातळीवर या प्रस्तावाला वन विभागाने होकार दिला आहे. वन विभागाचे उपवनसंरक्षक सत्यजीत गुजर यांनी या सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दोन वेळा टेकडीची पाहणी केली आहे. टेकडीच्या एकूण वनक्षेत्रापैकी किती जागा मेट्रो कॉर्पोरेशन घेणार याची निर्णय अद्याप झालेला नाही.
...
आधी चर्चा मग करार
‘नागरी वन उद्यान या संकल्पनेअंतर्गत आम्हाला लोकांच्या सहभागातून वनक्षेत्राचा विकास करायचा आहे. मेट्रोने यात सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. महामेट्रोशी करार करण्यापूर्वी त्यांच्याकडून एकूण वृक्षारोपण, देखभाल, वन संवर्धन कायद्यानुसार सर्व निकषांबद्दल चर्चा झाल्यावर करार अस्तित्वात येईल,’ अशी माहिती सहायक वनसंरक्षक महेश भावसार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषणाच्या तयारीतील २१ जणांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
येरवडा मध्यवर्ती कारागृह आणि राज्यातील इतर कारागृहात अंडर ट्रायल आणि शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांवर अन्याय होत असून, कैद्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी कारागृहाबाहेर उपोषण करण्याच्या तयारीत असलेल्या २१ जणांना येरवडा पोलिसांनी सोमवारी सकाळी ताब्यात घेतले.
प्रोटेक्शन अँड राइट्स ऑफ अंडर ट्रायल जेल प्रिझनर महाराष्ट्रचे अध्यक्ष भाऊसाहेब अंधाळकर (६०, सदाशिव पेठ) मच्छिंद्र श्यामराव चौगुले (३२, खराळवाडी) राहुल अशोक पाटील (२६, रा. निगडी) अशोक निशिकांत चाळके (२५) यांच्यासह एकूण एकवीस उपोषणकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कारागृहातील अंडर ट्रायल आणि शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप अंधाळकर यांनी केला आहे. कैद्यांच्या मागण्या मान्य केल्या जाव्यात यासाठी त्यांनी सोमवारी येरवडा कारागृहाबाहेर उपोषण करण्याचे नियोजन केले होते. त्या दृष्टीने पोलिसांकडे उपोषणाची परवानगीसाठी अर्ज केला होता.
येरवडा कारागृह संवेदनशील असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून अंधाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना उपोषणाची परवानगी नाकारण्यात आली. तसे लेखी पत्र त्यांना देण्यात आले. मात्र, तरीही सोमवारी कारागृहाबाहेर उपोषणाच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून देण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी पिण्याचे पाणी, मग कर्जमाफी

0
0

शेतकऱ्यांची मागणी; राष्ट्रवादीच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची पाठ
म. टा. प्रतिनिधी, बारामती
केंद्र व राज्य सरकारने फक्त शेतकऱ्यासाठी घोषणाबाजी करू नये, तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक तलाठी कार्यालयात एक दिवसाचे आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. ‘मुळात कर्जच मिळत नाही तर कर्जमाफीचे आंदोलन कशासाठी? पिण्यासाठी पाणी नाही, तेव्हा पिण्यासाठी आधी पाणी द्या, मग कर्जमाफी द्या,’ अशी मागणी करून शेतकऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादीतर्फे कर्जमाफीसाठी ४९ तलाठी व मंडल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यत आले. संपूर्ण तालुक्यात मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात येणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नसल्याचे ‘मटा’च्या पाहणीत समोर आले आहे.
याबाबत बोलताना शेतकरी नीलेश देवकुळे म्हणाले, ‘बागायतदार शेतकऱ्यांना प्रथम हमी भाव हवा आहे. त्यानंतर कर्जमाफी हवी आहे. जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी नसल्याने कर्जाची परतफेड होणे कठीण असल्याने कोणत्याच बँका एक लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज देत नाही. राज्य व केंद्र सरकारने कर्ज माफी दिली तर गावातील तलाठी त्याच्या मर्जीतील शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळून देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कर्जमाफीचा फायदा गरीब शेतकऱ्यांना होत नाही.’ ‘राज्य सरकारला शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करावयाचा असल्यास पाच एकराची अट घालण्यात यावी, व एका तालुक्यातील एकाच शेतकऱ्याला कर्ज माफीचा झाली पाहिजे तरच गोरगरीब शेतकऱ्यांना कर्ज माफीचा फायदा होईल,’ असा विश्वास रितेश जाधव यांनी व्यक्त केला.
------------
कर्जमाफीपेक्षा पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन असते तर नक्कीच आम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असता. कर्जच मिळत नाही तेव्हा कर्जमाफीसाठी आंदोलन कशाला हवे? पिण्याचे पाणी जास्त महत्त्वाचे आहे.
- बकुळाबाई मासाळ, शेतकरी महिला
-----------
या पुढाऱ्यांना आत्ताच कर्जमाफीचा पुळका का आला? आम्हांला प्रथम कर्जमाफी नको आहे. पण पिण्यासाठी पाणी द्या. त्यासाठीच आंदोलनापासून आम्ही शेतकरी दूर राहिलो आहे.
- नेमाजी वायसे, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटबाजीमुळे नोकरीपासून वंचित

0
0

अंगणवाडी सेविका म्हणऊन निवड होऊनही नेमणूक नाही
म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
खेड तालुक्यातील कुडे बुद्रुक या गावातील गटबाजीमुळे एका आदिवासी समाजातील महिलेची अंगणवाडी सेविका म्हणून निवड होऊनही तिला हक्काच्या नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात या महिलेची अंगणवाडी सेविका म्हणून रीतसर निवड झाली होती. परंतु सत्ताधारी राजकीय पक्षाशी निगडित असलेल्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याचा या महिलेच्या नियुक्तीला टोकाचा विरोध आहे. त्यामुळे संबंधित महिलेला नियुक्ती मिळालेली नाही, असा आरोप करण्यात येत आहे.
याच विरोधामुळे ग्रामसभेत या महिलेच्या नावाला अद्यापही मान्यता मिळू शकलेली नाही. त्यामुळे जवळपास एक वर्षाचा काळ पूर्ण झाला असला तरी संबंधित महिलेला रुजू होता आलेले नाही. दरम्यान या महिलेची अंगणवाडी सेविका म्हणून झालेली निवड रद्द करून पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया राबवावी, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे.
या प्रकरणी खेड पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर मोठा दबाव आणला जात आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढल्याचे समोर आले आहे. निवड झालेल्या महिलेच्या जागी संबंधित पदाधिकाऱ्याच्या मर्जीतील दुसऱ्या महिलेला अंगणवाडी सेविका म्हणून संधी मिळावी, यासाठी हा सर्व खटाटोप सुरू असल्याचे समजते.
...
घटनाक्रम
...
२०२६-१७ मध्ये सुरेखा गणेश बांगर व मनीषा संतोष कानसकर या दोन महिलांनी अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज भरले होते. गुणतक्ता पडताळणी समितीच्या गुणपडताळणीमध्ये सुरेखा बांगर यांना मनीषा कानसकर यांच्यापेक्षा अधिक गुण असल्यामुळे अंगणवाडी सेविका या पदासाठी बांगर पात्र ठरल्या होत्या.बांगर बारावी पास आहेत. त्यानंतर खेड एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी कुडे बु।। ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांना ग्रामसभा घेऊन पात्र ठरलेल्या सुरेखा बांगर यांच्या निवडीस मान्यता देऊन ठराव सादर करण्याची सूचना वारंवार दिली. त्यासाठी तब्बल पाच ते सहा ग्रामसभा झाल्या. परंतु अंतर्गत राजकारणामुळे अद्यापही बांगर यांच्या नावाला ग्रामसभेने मान्यता दिलेली नाही. गटविकास अधिकाऱ्यांनीही याबाबत आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेने या प्रकरणात राजकीय दबावामुळे कोणतेही आदेश न देता केवळ बघ्याचीच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
...
जास्त गुण मिळालेल्या महिलेची अंगणवाडी सेविका म्हणून निवड झालेली आहे. परंतु अंतर्गत गटबाजीमुळे त्या महिलेला नियुक्तीचे आदेश देता आलेले नाहीत. याबाबत सरकारकडे मार्गदर्शन मागितलेले आहे.

- दत्तात्रय मुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंद्रा’चे पाणी मान्सूननंतर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी आंद्रा आणि भामा-आसखेडमधून पाणी आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यासाठी यंदाच्या मान्सूननंतरचा मुहूर्त लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काम सुरू करण्यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याच्या अनुषंगाने बैठकांच्या सत्रांवर भर दिला जात आहे.
शहराची वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणाचा वेग लक्षात घेऊन महापालिकेने आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून पाण्याचा स्रोत निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्या अनुषंगाने योजना तयार केली आहे. पहिल्या टप्प्यात, आंद्रा धरणातून ३६.८७ एमएलडी (दशलक्ष घनमीटर) आणि भामा-आसखेड धरणातून ६०.७९ एमएलडी पाणी आणण्यास राज्य सरकारने मार्च २०१४ मध्ये मंजुरी दिली आहे. या दोन्ही धरणांतून अनुक्रमे १०० आणि १६७ एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन आहे. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविल्याशिवाय योजनेच्या कामाला प्रारंभ न करण्याची भूमिका लोकप्रतिनिधी आणि प्रशासानाने घेतली आहे. त्यासाठी बैठकांचे सत्र चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पुण्यात बैठक झाली. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार महेश लांडगे, सुरेश गोरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे या वेळी उपस्थित होते.
स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय योजनेबाबत कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही. शेतकऱ्यांच्या सहमतीनेच प्रकल्प मार्गी लावू, अशी ग्वाही बापट यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘दोन्ही धरणांजवळील जलसंपदा विभागाची आणि खासगी जागा जॅकवेल, अप्रोच ब्रीज, विद्युत उपकेंद्र याकरिता आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची नवलाख उंब्रे येथील जागा बॅकप्रेशर टँकसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून घेण्याबाबत कार्यवाही चालू आहे. या प्रकल्पासंदर्भात ग्रामीण भागातील स्थानिक शेतकऱ्यांच्या पुनर्वसन, भूसंपादन मोबदला, आर्थिक मदत याबाबतच्या मागण्या आहेत. त्या पूर्ण केल्यानंतरच योजना मार्गी लावण्यात येईल. काम पूर्ण झाले, तरी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पाणीउपसा करणार नाही.’
आमदार लांडगे म्हणाले, ‘ही योजना एक ते दीड वर्षांत कार्यान्वित करण्याचे ध्येय आहे. त्यामुळे शहर आणि आळंदीलाही शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत करण्याबाबत प्राधान्य देणार आहोत.’
आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘पाणीयोजनेला शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र, योजनेपूर्वी त्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यादृष्टीनेच प्रशासन पाठपुरावा करीत आहे. जलसंपदा आणि महसूल विभागाने सहकार्य केल्यास महापालिकेला योजनेच्या अंमलबजावणीसाठी फार अडथळे येणार नाहीत. त्यामुळे आम्ही चर्चेच्या फेऱ्या चालू ठेवल्या आहेत. येत्या मान्सूननंतर योजनेच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ पालकमंत्री कोणाची शिफारस करणार ?

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेत पहिल्यांदाच बहुमताच्या जोरावर तब्बल ९८ जागा मिळवून सत्ताधारी झालेल्या भारतीय जनता पक्षाकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळावी, यासाठी प्रत्येकाने जोरदार फिल्डिंग लावली आहे. स्वीकृत सभासद म्हणून पर्वती विधानसभा मतदारसंघातून दोन जणांना संधी देण्याची शक्यता असून, कसबा विधानसभा मतदारसंघातून एक जणाला संधी देण्याचे पक्षाने निश्चित केले आहे. त्यामुळे पालकमंत्री गिरीश बापट कसब्यातून कोणाच्या नावाला प्राधान्य देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालिकेच्या सभागृहात स्वीकृत सभासद म्हणून भाजपकडून तीन जणांना संधी मिळणार आहे. स्वीकृत म्हणून संधी मिळावी, यासाठी भाजपकडून ४५ ते ५० जणांनी अर्ज केले आहे. यामध्ये अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी यांचा समावेश असून प्रत्येकाचे जोरदार फिल्डिंग लावली आहे. पक्षाकडून कोणाला संधी द्यायची याबाबत चर्चा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या शहरातील वरिष्ठ नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये काही नावांवर चर्चा झाली. पर्वती मतदारसंघातून दोन जणांना संधी द्यावी आणि कसबामधून एक स्वीकृत सदस्य घ्यावा, असे ठरविण्यात आले. शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह अन्य काही आमदार या वेळी उपस्थित होते.
पालिकेत स्वीकृत सभासद म्हणून शिक्षणमंडळाचे माजी सदस्य आणि पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रघू गौडा यांच्या नावाची शिफारस आमदार मिसाळ यांनी केली. तर माजी नगरसेवक गोपाळ चिंतल यांचे नाव खासदार संजय काकडे यांनी या बैठकीत लावून धरल्याचे कळते. ही दोन्ही नावे अंतिम मंजुरीसाठी प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात आली आहे. कसबा मतदारसंघातून माजी नगरसेवक अशोक येनपुरे, माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्यासह माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी यांच्या नावावर चर्चा झाली. मात्र, यावर एकमत न झाल्याने हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला.
स्वीकृत सभासदांची नावे निश्चित करण्यासाठी पालकमंत्री बापट मुंबईला जाण्याची शक्यता असून, मुख्यमंत्र्यांकडे बापट कोणाच्या नावाची शिफारस करणार याकडे लक्ष लागले आहे. माजी सभागृह नेते बीडकर यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावली असल्याने फडणवीस पालकमंत्री बापट यांनी सूचविलेल्या नावाला प्राधान्य देणार का, याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'शेतकऱ्यांसाठी पहिला बॉम्ब मंत्रालयात फोडू'

0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

‘शेतकऱ्यांच्या हितासाठी सदाभाऊ खोतांच्या डोळ्यातील पाणी आटू नये, म्हणून त्यांनी लाल दिवा फेकून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर यावे,’ असे भावनिक आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले. मात्र, शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी सुरू केलेल्या या आसूड यात्रेतून सरकार जागे झाले नाही, तर आम्ही बॉम्ब फोडण्याचे धोरण आखले आहे. मात्र, पहिला बॉम्ब मंत्रालयात फोडू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला.

शेतकरी, शेतमजूर, विधवा महिला व सैनिक यांच्यासाठी काढलेली आसूड यात्रा बारामतीत पोहोचल्यावर आमदार कडू यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे प्रमुख सतीशराव काकडे यांच्यासह प्रहार व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. ‘केंद्रात तब्बल १० वर्षे कृषी मंत्रालय सांभाळलेल्या शरद पवार यांनी स्वामिनाथन आयोगातील एकही शिफारस का स्वीकारली नाही,’ असा सवाल कडू यांनी उपस्थित केला. राज्यातील विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रा काढली, हे चांगले आहे. अजित पवार, विखे पाटील अथवा पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथम शेतकऱ्यांसमोर कान धरून उठाबशा काढून शेतकऱ्यांची माफी मागावी, असेही कडू म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्ट्रॉबेरीच्या गावात ‘पुस्तकांचे गाव’

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाबळेश्वरजवळील भिलार गावामध्ये साकारल्या जाणाऱ्या पुस्तकांचे गाव या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. प्रकल्पाची घोषणा होऊन दोन वर्षे उलटल्यानंतर प्रकल्पाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. त्यामुळे, स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेल्या भिलारमध्ये आता तब्बल १५ हजारांहून अधिक पुस्तके वाचकांची वाट पाहणार आहेत. महाराष्ट्र दिनी (१ मे) या प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे.
२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विनोद तावडे यांच्यावर सांस्कृतिक, शिक्षण आणि मराठी भाषा विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी आली. २७ फेब्रुवारी २०१५ साली झालेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात तावडे यांनी महाराष्ट्रात पुस्तकांचे गाव उभारणार असल्याची घोषणा केली. सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेवर या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली. ब्रिटन मध्ये असलेल्या ‘हे ऑन वे’ या गावाच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले. गेली दोन वर्षे गावाची निवड आणि इतर तरतुदी पूर्ण करण्यातच घालवल्यानंतर अखेर हा प्रकल्प पूर्णत्वाकडे चालला आहे. प्रकल्प साकारण्यासाठी तावडे यांनी एक समिती नेमली होती. प्रकल्पाचे स्थळ निश्चित करण्यापासून, तेथील ग्रामस्थांची परवानगी मिळवणे, पुस्तकांची संख्या निर्धारित करणे व पुस्तके निवडणे अशी सर्व जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली होती. कोणतेही गाव घेऊन तिथे पुस्तके नेऊन ठेवण्यापेक्षा जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात त्याठिकाणीच पुस्तकांचे गाव असावे, असा तावडे यांचा आग्रह होता. या प्रक्रियेला समितीने दोन वर्षे घेतली. अखेर आता भिलार गावात हळूहळू पुस्तके पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.
पुस्तकांचे गाव या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने गावातील २५ ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यामध्ये गावातील मंदिरे, स्थानिक नागरिकांची घरे, हॉटेल, लॉज, शाळा अशा ठिकाणी पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी ४५० ते ५०० पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. या ठिकाणांव्यतिरीक्त गावात इतरही काही ठिकाणी पुस्तके ठेवण्यात येतील. गावात आलेल्या पर्यटकांना सर्व ठिकाणी जाऊन ही पुस्तके वाचता येणार आहेत. त्यासाठी त्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
राज्य सरकारतर्फे नेमण्यात आलेल्या समितीने कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, क्रीडा विषयक लेखन, विज्ञानविषयक साहित्य, वैचारिक साहित्य, पुरस्कार विजेत्या साहित्यिकांची पुस्तके, बालसाहित्य, संत साहित्य, चरित्र, आत्मचरित्र अशा २५ हून अधिक वाङ्मय प्रकारांची निवड केली आहे. राज्यातील शंभराहून अधिक छोट्या मोठ्या प्रकाशकांकडून ही पुस्तके खरेदी करण्यात आली आहेत. प्रकल्पाचे टप्प्याटप्प्यात काम चालणार असल्याने पुढील टप्प्यात काही प्रकाशकांकडून आणखी पुस्तके खरेदी केली जाणार आहेत.
दोन वर्षांनतर का होईना, अखेर पुस्तकांचे गाव पूर्णत्वास येत आहे. ही संकल्पना ब्रिटनमधील गावाच्या संकल्पनेवर आधारलेली असली तरीही त्याचे मराठीकरण आणि महाराष्ट्रीकरण केले असल्याचे, प्रकल्पासाठी समन्वयक म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु पाश्चात्य देशात एखादा प्रकल्प उभा राहिल्यानंतर त्याची देखभाल करण्याचे काम उत्तमरित्या केले जाते. भिलार गावात साकारला जात असलेला हा प्रकल्प देशातला पहिला प्रकल्प म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळे, त्याची निगा राखणेही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यावर ते कितपत खरे उतरतात, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुस्तकांचे गाव हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ब्रिटनमधील ‘हे ऑन वे’ या गावाच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारला जात असला तरी मराठी भाषा आणि साहित्याला पोषक अशा स्वरूपाचा हा प्रकल्प आहे. देशातला हा पहिला प्रकल्प असून, वाचनसंस्कृती वाढवण्याच्या दृष्टीने ‘पुस्तकांचे गाव’ महत्त्वाचे ठरणार आहे.
-विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीनशे कोटींची देयके थकीत

0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे
शाळांमधील पोषण आहार योजनेसाठी धान्यपुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांची कोट्यवधींची देयके गेल्या काही महिन्यांपासून थकीत आहेत. तब्बल ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची देयके थकित असल्याने राज्यभरातील कंत्राटदार अडचणीत आले आहेत. सातत्याने जिल्हा परिषदेत खेटे घालणाऱ्या कंत्राटदारांना देयकांना होणाऱ्या विलंबाबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नसल्याने याबाबतचे गौडबंगाल आणखी वाढले आहे.
विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत पोषण आहार पुरविण्यात येतो. या केंद्र सरकारने पुरस्कृत केलेल्या योजनेसाठी केंद्राकडून ६० टक्के अनुदान देण्यात येते; तर उर्वरित ४० टक्के अनुदान राज्य सरकारकडून दिले जाते. ही योजना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येते.
काही महिन्यांपूर्वी नांदेड जिल्ह्यात एका प्राथमिक शाळेत पोषण आहारातून विषबाधेचा प्रकार घडला होता. त्या विद्यार्थ्यांना औषधोपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर विधानसभेत यासंबंधी तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पोषण आहार योजनेतील सर्वच कंत्राटदारांची देयके थांबविण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून या कंत्राटदारांची देयके थकित आहेत.
नांदेड जिल्ह्यात घडलेल्या विषबाधा प्रकरणामुळे सर्वांची देयके स्थगित करणे अत्यंत चुकीचे आहे. अन्न शिजवताना योग्य ती काळजी न घेण्यात आल्याने विषबाधा झाली असावी. त्याचा धान्य पुरवठादारांशी संबंध नाही. मात्र, सरसकट सर्वांचीच देयके स्थगित करण्यात आली आहेत. त्यामुळे आन्हाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. थकित देयकांमुळे व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे, अशी माहिती एका कंत्राटदाराने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
बहुतांश कंत्राटदारांची देयके नोव्हेंबर २०१६ पासून थकीत आहेत. त्यानंतरही त्यांनी धान्यपुरवठा सुरू ठेवला आहे. देयके मंजूर व्हावीत, यासाठी कंत्राटदार जिल्हा परिषदांच्या शिक्षण अधिकाऱ्यांचे व शिक्षण संचालनालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, कोणतेही स्पष्टीकरण न देता त्यांना परत पाठविण्यात येत आहे. त्याचवेळी वरपर्यंत लागेबांधे असलेल्या काही विशिष्ट कंत्राटदारांची देयके मात्र, मंजूर होत असल्याचेही सूत्रांकडून समजते.
‘राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून ही देयके देण्यात येतात. शासनाकडून नोव्हेंबर २०१६ पर्यंतचे अनुदान मिळाले आहे. त्यानंतर अनुदान न मिळाल्याने पुणे जिल्ह्यातील पोषण आहार कंत्राटदारांची देयके अदा झालेली नाहीत. अनुदान मिळताच देयके अदा केली जातील,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (प्राथमिक) मुश्ताक शेख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात स्वाइन फ्लूचे १२० बळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे गेल्यानंतरही स्वाइन फ्लूचा संसर्ग कमी होत नसल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. जानेवारीपासून ते आतापर्यंत राज्यात १२० जणांचा बळी गेल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. ६१३ जणांना आजाराची लागण झाली आहे.

राज्यात पुण्यापासून मुंबईपर्यंत आणि मराठवाड्यापासून ते विदर्भापर्यंत आणि कोकणातील सर्व भागांतही सध्या तापमान वाढत असल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील भिरा गावात आतापर्यंतचे उच्चांकी ताममान नोंदले गेले. अशा रणरणत्या उन्हातही स्वाइन फ्लूची लागण होत आहे आणि त्यामुळे अनेकांचा बळी जात असल्याने आरोग्य विभाग चिंताक्रांत बनले आहे.

‘राज्यात जानेवारी ते आतापर्यंत ६१३ पेशंटना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत १२० जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. विषाणूच्या रचनेत कोणताही बदल झाला नाही. परंतु, नागरिकांमध्ये दिवसेंदिवस रोग प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचा हा परिणाम दिसून येत आहे. त्याशिवाय मधुमेह, हृदयविकार, रक्तदाबासारखे आजार संलग्न असल्याने लागण होऊन संसर्ग वाढण्यात अधिक मदत होते,’ असे निरीक्षण आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी नोंदविले.
संसर्गग्रस्त ६१३ पेशंटपैकी १३ पेशंट बाहेरील राज्यांतील आहेत. आतापर्यंत ५.८६ लाख संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी लागण झालेल्या ८,४५९ जणांना टॅमी फ्लूचे उपचार देण्यात आले आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, नगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूमुळे पेशंट दगावले आहेत. आतापर्यंत उपचार घेऊन ३७६ जणांना बरे झाल्याने घरे सोडण्यात आले आहेत.
..
‘स्वाइन फ्लू’ची आकडेवारी
महिना............. बळींची संख्या
जानेवारी ........... ४
फेब्रुवारी ............. ७
मार्च .................... ७७
एप्रिल .....................३२

एकूण .................. १२०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images