Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पदाधिकारी निधीला आयुक्तांकडून कात्री

$
0
0

आर्थिक शिस्तीसाठी वीस टक्क्यांची कपात प्र्रस्तावित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापौर, उपमहापौरांसह, सभागृह नेते, गटनेते यांच्यासाठीच्या पालिकेच्या अर्थसंकल्पातील निधीला आयुक्त कुणाल कुमार यांनी कात्री लावली आहे. पदाधिकाऱ्यांच्या निधीत २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांनी किमान निधी वापरावा, यासाठी ही ‘शिस्त’ लावण्यात आल्याची चर्चा आहे.
पालिकेचा २०१७-१८चा ५,६०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय आराखडा पालिका आयुक्त कुमार यांनी गुरुवारी स्थायी समितीकडे सादर केला. या आराखड्यात आयुक्तांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या खर्चात कपात केली आहे. पालिकेचा वाढता खर्च भागविण्यासाठी अतिरिक्त निधी जमा व्हावा, यासाठी मिळकतकरात १२ टक्के तर पाणीपट्टीत १५ टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. खर्च भागविण्याच्या तरतुदींचा भुर्दंड करवाढीच्या माध्यमातून पुणेकरांवर पडणार आहे. आयुक्तांच्या आराखड्यात प्रत्येक अर्थशीर्षासाठी (हेड) ठरावीक तरतूद केली जाते. पालिकेतील पदा​धिकाऱ्यांना दरवर्षी अर्थसंकल्पात विशिष्ट निधी दिला जातो. त्यामध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता यांच्यासह ‌विविध पक्षांचे गटनेते यांच्या चहापान खर्चासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महागाईत वाढ होत आहे. तरीही पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या निधीत वाढ करण्याऐवजी कपात करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. केवळ पदाधिकाऱ्यांच्या चहापानाच्या खर्चात कपात करुन न थांबता आयुक्तांनी जेंडर बजेट अंतर्गत सभासदांना प्रशिक्षण देणे, शहरामध्ये विविध महोत्सव, संमेलने तसेच सहप्रायोजकत्व घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीवरही आखडता हात घेतला आहे.

यंदाचा प्रस्तावित निधी (आकडे रुपयांत)

२०१६-१७चा निधी २०१७-१८चा निधी

महापौर ऐच्छिक खर्च २ लाख १.६० लाख

उपमहापौर ऐच्छिक खर्च ६०,००० ४८,०००

स्थायी समिती चहापान खर्च ६,००,००० ४,८०,०००

विरोधी पक्षनेते चहापान खर्च ६०,००० ४८,०००

सभागृह नेते चहापान खर्च ६०,००० ४८,०००

सभासद प्रशिक्षण ५,००,००० ००

उत्सव, महोत्सव खर्च ५. ७१ कोटी ९५.१५ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंबायोसिस विद्यापीठातर्फे उच्च शिक्षणविषयक परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आंतरराष्ट्रीय पातळीवर उच्च शिक्षणाची स्थिती काय, या शिक्षणाचा दर्जा कसा वाढवता येईल, देशात आणि जगात आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची निर्मिती कशी करता येईल, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ‘उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचे बदलते स्वरूप’ या विषयावर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे.या परिषदेत जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची निर्मिती, शिक्षणासाठी वातावरणनिर्मिती करणे, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, शिक्षणक्षेत्रात यशस्वी भागीदारीची उभारणी अशा विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिंबायोसिस संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी ही माहिती दिली. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, लिबरल आर्टस शाखेच्या अधिष्ठाता प्रा. अनिता पाटणकर, मीडिया, कम्युनिकेशन व डिझाइन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. अपर्णा हेब्बानी, डॉ. राजीव येरवडेकर आदी उपस्थित होते. विद्यापीठ आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटीतर्फे होणारी ही परिषद ८ ते १० एप्रिल दरम्यान विद्यापीठाच्या लवळे येथील शैक्षणिक संकुलात होणार आहे.
परिषदेत उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा सविस्तर विचार, संकल्पना तसेच विविध देशांमधील शिक्षणाची स्थिती आणि त्यांची रचना यावर सखोल चर्चा होईल. आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षणाचे फायदे आणि आव्हाने यावर या परिषदेचा मुख्य भर राहणार आहे. शिक्षण आंतरराष्ट्रीयीकरणासाठी योग्य वातावरणनिर्मिती करणे, सीमापार उच्च शिक्षण, देशातील आंतरराष्ट्रीयीकरण, यशस्वी भागीदाराची उभारणी अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत गुणवत्ता येण्यासाठी शैक्षणिक उपक्रम कोणते असावेत, क्रमिक अभ्यासक्रम आणि अभ्यासाला पूरक उपक्रम, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर आदींचा विचार या परिषदेत करण्यात येईल. परिषदेत ८ एप्रिलला ‘जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची निर्मिती’ या विषयावर ‘राउंड टेबल’ चर्चासत्र होणार असून त्यात जागतिक दर्जाचे शैक्षणिक तज्ज्ञ सहभागी होतील. या चर्चासत्रातून ठरविण्यात येणाऱ्या शैक्षणिक धोरणांची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना देण्यात येईल, असे डॉ. येरवडेकर यांनी सांगितले. परिषदेत सुमारे १०० विद्यापीठांचे कुलगुरु, देशविदेशातील वरिष्ठ प्राध्यापक, प्रशासक, शिक्षण संस्थांचे व सरकारी खात्यांचे प्रतिनिधी सहभागी होत असून विविध देशांच्या शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा आहे.

जावडेकरांच्या हस्ते उद्‍घाटन
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‍घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते येत्या ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्या लवळे येथील शैक्षणिक संकुलात होणार आहे. या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष वेद प्रकाश, प्रा. व्ही. एस. चौहान, ‘नॅक’चे संचालक डॉ. डी. पी. सिंग, ऑल इंडिया युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डी. एस. चौहान, सचिव प्रा. फर्कान कामर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. जावडेकर यांच्या हस्ते ‘ इंडियन नेटवर्क फॉर इंटरनॅशनलायझेशन ऑफ इंडिया’चे शैक्षणिक संस्थेचा शुभारंभ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचवीनंतर परीक्षा होणारच: जावडेकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने इयत्ता आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याच्या निर्णयात बदल करण्याचा पर्याय निवडला आहे. यापुढे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचीही मार्चमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. यात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लगेच जूनमध्ये परीक्षेला पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. मात्र या परीक्षेतही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राज्यांना देण्यात येणार आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षांचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र विधेयक तयार केले आहे. लवकरच हे विधेयक मंत्रिमंडळासमोर सादर होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील अडचणी समजून घेण्यासाठी जावेडकर यांनी शनिवारी वनभवनमध्ये जनसंवाद आयोजित केला होता. या वेळी त्यांनी पत्रकारांना इयत्ता आठवीच्या परीक्षेबद्दल विविध राज्यांमध्ये आलेले अनुभव शेअर केले.

ते म्हणाले, ‘शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) बदल व्हावा, अशी काही राज्यांची मागणी होती. त्यातून आठवी परीक्षा बदलाचा विचार समोर आला. बहुतांश राज्यांमध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांला आजही दुसरीचा धडा वाचता येत नाही, असे चित्र बघायला मिळते आहे. प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आठवीपर्यंत नापास न करण्याच्या निर्णयावर शासन पुनर्विचार करते आहे. यापुढे इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची मार्चमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत अपशयी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये पुन्हा एकदा संधी देणार आहोत. जूनमधील परीक्षेतही अनुतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसवायचे की वरच्या वर्गात पाठवायचे, याबद्दलचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आम्ही राज्यांवर देणार आहोत,’

दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीने आयोजित ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१७’या स्पर्धेच्या अंतिम फेरीबद्दलही जावेडकर यांनी माहिती दिली. हॅकेथॉन हा नवीन भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे. पुण्यामुंबई बरोबरच देशातील २६ शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येतो आहे. या मध्ये २ हजार ४०० कॉलेज सहभागी झाले आहेत. या उपक्रमात एकावेळी दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपण विश्वविक्रम नोंदवला आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी आम्ही केंद्र सरकारच्या विविध विभागांना त्यांचे तंत्रज्ञानाशी निगडीत समस्या विचारल्या होत्या. त्यांनी आमच्याकडे ५९८ समस्या पाठविल्या. उत्तरे विद्यार्थ्यांनी हॅकेथॉनच्या निमित्ताने शोधली आहेत. अंतिम फेरीत बाराशेहून अधिक संघ निवडले असून हे विद्यार्थी शनिवारी सलग ३६ तास त्यांच्या कल्पनावर आधारित उत्पादने तयार करणार आहेत. यातील विजेत्या विद्यार्थ्यांचे प्रयोग आम्ही प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. एवढेच नव्हे; तर या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन ‘स्टॉर्ट अप’साठी आर्थिक पाठबळही देणार आहोत, असे जावडेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वैयक्तिक सुरक्षा यंत्रणा, परिसराची सुरक्षा करण्यासाठी व्हिडिओ सर्व्हेयन्स प्रणाली, आरोग्य क्षेत्रामधील कनेक्टिव्हिटीसाठी ‘नेटवर्किंग’ प्रणाली, ‘डिजिटल’ राइट्स मॅनेजमेंट सिस्टीम्स, विद्यार्थी व नागरिकांसाठी इंटरनेटबाबत जागृती, अशा एकापेक्षा एक विषयांद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी उत्साहात सुरुवात केली. हे विद्यार्थी आता तब्बल ३६ तास सलग काम करत ‘आयटी’शी संबंधित विषयांवर नावीन्यपूर्ण संकल्पनांवर ‘प्रोटोटाइप’ तयार करणार असून इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने सांगितलेल्या समस्यांवर उपाय शोधणार आहेत.
‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१७’ च्या अंतिम फेरीचे आयोजन शासकीय अभियांत्रिकी कॉलेज (सीओईपी) करण्यात आले आहे. या फेरीचे उद्घाटन सकाळी आठच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे, सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, बहुराष्ट्रीय कंपनीचे अधिकारी मृत्युंजय सिंग, डॉ. बी. एन. चौधरी, प्रा. संदीप मेश्राम, डॉ. सुनील माने उपस्थित होते. मुंबईसोबतच देशातील इतर २६ शहरांमध्ये हॅकेथॉन होत आहे.
सीओईपीमध्ये होणाऱ्या फेरीत मंत्रालयाने सांगितलेल्या समस्यांवर देशभरातील नामवंत कॉलेजमधून आलेले विद्यार्थी विषयावर प्रोटोटाइप तयार करत आहेत. विद्यार्थी आणि मार्गदर्शक असे एकूण ३९० संबंधित विषयांवर प्रोटोटाइप करण्यासाठी तब्बल ५३ संघ आज, रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत अविरत प्रयत्न करणार आहेत. या प्रोटोटाइपचे परीक्षण सरकारी आणि बहुराष्ट्रीय आयटी कंपनीचे तज्ज्ञ करणार आहेत. या फेरीत अंध व्यक्तींना रस्त्यावर चालण्यासाठी मार्गदर्शक यंत्रणा, टेलिफोन आणि वृत्तपत्रांची बिले ऑनलाइन भरण्याबाबत, निविदा प्रक्रियेत लागणारी कागदपत्रे ऑनलाइन तयार करण्याबाबत, एखादी वस्तू निर्माण किंवा विकसित करतानाच्या प्रक्रियेचे डिझाइन, सायबर सुरक्षेच्या प्रयोगांमधील ‘टेस्टबेड’ची कमतरता दूर करणे अशा विविध नावीन्यपूर्ण विषयांवर विद्यार्थी प्रोटोटाइप तयार करत आहेत. या प्रोटोटाइपमधून उत्कृष्ट तीन प्रोटोटाइप निवडण्यात येणार असून त्यांना पारितोषिक दिले जाईल. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाला विविध २९ सरकारी मंत्रालये आणि विभाग यांच्याकडून ५९८ समस्या प्राप्त झाल्या होत्या. त्यावर मंत्रालयानुसार विद्यार्थी प्रोटोटाइप तयार करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यसंमेलन पुन्हा पुढे ढकलणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे यंदाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन वारंवार पुढे ढकलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता संमेलनाध्यक्षांचाही ‘पारा’ चढला आहे. नाट्यरसिकांना उन्हाच्या झळा पोहोचू नयेत, यासाठी त्यांनी संमेलन पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यंदाच्या संमेलनात खुद्द संमेलनाध्यक्षांनाच फारसा रस नसल्याचे चित्र आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने दोन वेळेला संमेलनाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. एकदा निवडणुकांचे कारण देत आणि दुसऱ्यांदा परीक्षेच्या कारणामुळे नाट्य संमेलन अखेर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे ठरले आहे. मात्र, सध्याच्या उन्हाची परिस्थिती पाहता एप्रिल महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यात संमेलन उस्मानाबादमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाट्यरसिकांना त्रास होऊ नये यासाठी संमेलन पुढे ढकलावे, अशी मागणी संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी केली आहे.

यंदा सावरकरांना संमेलनाध्यक्ष म्हणून एक वर्षाचा कालावधी मिळणार नाही. वारंवार विविध कारणांमुळे संमेलनाची तारीख पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे त्यांच्या हातात अवघे सात-आठ महिनेच येणार आहेत. इच्छा असूनही अनेक उपक्रम एवढ्या कमी कालावधीत राबविणे तसे शक्य नाही. नाट्य संमेलनाध्यक्षपदाची एकप्रकारे अवहेलनाच सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे.

‘नाट्य परिषद सक्रिय असली तरी नाट्यसंमेलनाध्यक्षांना फारशी किंमत दिली जात नाही. त्यांना हवे तसे कार्य करता येत नाहीत. संमेलनाध्यक्ष कोणताही तातडीचा निर्णय घेऊ शकत नाहीत. याला संपूर्ण व्यवस्था जबाबदार असून सरकारही उदासीन असल्याचे सावरकर यांनी सांगितले. नाट्य रसिकांना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाच्या झळा बसून संमेलनाचा उत्साह कमी होऊ नये, यासाठी संमेलन पुढे ढकलण्याची मागणी केली आहे,’ असे सावरकर यांनी नमूद केले.

नाट्य परिषद सक्रिय असली तरी नाट्यसंमेलनाध्यक्षांना फारशी किंमत दिली जात नाही. त्यांना हवे तसे कार्य करता येत नाहीत. संमेलनाध्यक्ष कोणताही तातडीचा निर्णय घेऊ शकत नाहीत. याला संपूर्ण व्यवस्था जबाबदार असून सरकारही उदासीन असल्याचे सावरकर यांनी सांगितले. नाट्य रसिकांना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाच्या झळा बसून संमेलनाचा उत्साह कमी होऊ नये. - जयंत सावरकर, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला पडला ‘सबका’ विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेत नवनिर्वाचित सभासदांना पालिकेच्या कामकाजाची माहिती मिळावी यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम पालिका प्रशासनाने सुरु केला आहे. मात्र पालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनाच केवळ हे प्रशिक्षण दिले जात असल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये १६२ पैकी जवळपास १०० नगरसेवक हे नव्याने निवडून आले आहेत. महापालिकेचे कामकाज कसे चालते, कोणत्या विभागाची काय जबाबदारी आहे, कोणत्या कामासाठी कोणत्या विभागाकडे पाठपुरावा करायचा याबाबतची माहिती या नवीन सभासदांना व्हावी, यासाठी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना पत्र पाठवून पक्षाच्या नवीन सभासदांचे प्रशिक्षण घेण्याची विनंती केली होती. यावर आयुक्त कुमार यांनी पालिकेत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यात यावे, असे आदेश काढले. मात्र पालिका प्रशसनाने सर्व पक्षांच्या नगरसेवकांना यासाठी आमंत्रित न करता सभागृह नेते भिमाले यांच्या पत्राचा आधार घेत पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनाच प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. पालिकेत सत्ता बदल झाल्यानंतर प्रशासनाची भूमिकाही बदलली असल्याचा आरोप यामुळे केला जात आहे.

पालिकेच्या कामकाजाची तसेच संबधित अधिकाऱ्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने हे प्रशिक्षण दिले जात आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने ३० मार्चपासून हे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली असून ६ एप्रिलपर्यंत पालिकेच्या संदर्भातील माहिती दिली जाणार आहे. वडके सभागृहात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात अधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिका प्रशासनाने या प्रशिक्षणासाठी केवळ सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना बोलाविल्याने इतर सर्वच पक्षांच्या सभासदांमध्ये नाराजी पसरली आहे. बहुमत मिळाल्याने सत्ताधारी भाजपने अशा पद्धतीने मनमानी कारभार सुरु केल्याचा आरोप अनेक सभासदांनी करुन यावर नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांचा संप मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात येईल. तसेच त्याबाबत मुख्यमंत्र्याकडे मागणी करण्याचे आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. त्यामुळे राज्यातील एक लाख अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बंद तूर्त मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आज, रविवारी होणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेत महिला कर्मचारी सहभागी होणार आहेत.

अर्थसंकल्प मांडताना अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनवाढीच्या निर्णयासाठी तसेच, अन्य मागण्यांसाठी १ एप्रिलपासून राज्यातील एक लाख अंगणवाड्यांतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. परंतु, श्रीमती मुंडे यांनी कृती समितीच्या नेत्यांची गुरुवारी भेटी घेतली. त्यावेळी आमदार नीलम गोऱ्हे, हुस्नबानू खलिफे, विद्या चव्हाण, सचिव विनीत सिंघल तसेच अंगणवाडी संघटना कृती समितीचे नेते नितीन पवार, एम. ए.पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, भगवान देशमुख उपस्थित होते.

अंगणवाडी महिलांचे मानधन अतिशय तुटपुंजे असल्याचे मुंडे यांनी मान्य केले.‘येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करून वित्त विभागाला सादर केला जाईल. तसेच त्यानंतर वित्त विभागाच्या अभिप्रायासह मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल,’ असे आश्वासन मुंडे यांनी दिले. त्या वेळी बंद मागे घेण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रस्ताव मंजूर करण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यासाठी मुंडे यांच्यासोबत राहू असे आश्वासन महिला आमदारांनी दिले. या आश्वासनामुळे बंद स्थगित करण्याचा निर्णय निर्णय कृती समितीने घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगिरी घसरल्यास वेतन रोखणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतयर पीएमपीचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी महत्त्वपूर्ण निर्णयांचा धडाका लावला आहे. कर्मचाऱ्यांना आदर्श आचारसंहिता घालून दिल्यानंतर, ब्रेक डाउन १० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचेही फर्मान सोडले. या पाठोपाठ कामगिरी खालावलेल्या अधिकाऱ्यांचे वेतनही थांबविण्याचा धाडसी निर्णय मुंढेंनी घेतल्याचे वृत्त आहे.

प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी मुंढे आग्रही असतात. त्यामुळे पीएमपीचा कारभार स्वीकारल्यापासून त्यांनी कामात शिस्त आणण्यासाठी पावले उचलली आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी कर्मचाऱ्यांची कामाची वेळ बदलून सकाळी पावणेदहा ते सायंकाळी पावणेसहा अशी जाहीर केली. दुसऱ्या दिवशी उशिरा आलेल्या १२० कर्मचाऱ्यांची बिनपगारी रजा जाहीर केली. शुक्रवारी चार तर, शनिवारी पाच कर्मचाऱ्यांचे उशिरा आल्यामुळे निलंबन केले. या कारवाईनंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे.

बसचे ब्रेक डाउन, संचलनातील बसची संख्या कमी असणे, दैनंदिन उत्पन्नातील घट आदींसाठी वरिष्ठ अधिकारी आणि डेपो मॅनेजर यांना जबाबदार धरून खराब कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतन थांबविण्यात येणार आहे. आगामी दोन ते चार दिवसांत अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून निर्णय घेतला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहनांसाठी पुन्हा स्मार्ट ‘आरसी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) देण्यास लागणारा विलंब आता लवकरच संपुष्टात येणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने पुन्हा एकदा ‘रोझ मार्टा’ या कंपनीकडे ‘स्मार्ट आरसी’चे कंत्राट दिले असून, या महिन्यातच त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. आरटीओकडून ‘पेपर आरसी’साठी शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, आता वाहन धारकांना ‘आरसी’च्या ‘स्मार्ट कार्ड’साठी शुल्क द्यावे लागणार आहे.

‘रोझ मार्टा’ कंपनीकडून राज्यातील आरटीओत नोंदणी होणाऱ्या वाहनांचे ‘आरसी’ दिले जात होते. मात्र, परिवहन विभागाने या कंपनीशी केलेला करार संपुष्ठात आल्यानंतर डिसेंबर २०१४ पासून वाहन धारकांना ‘पेपर आरसी’ देण्यात येत होती. परिवहन विभागाकडून स्वतः ‘पेपर आरसी’ची छपाई केली जात होती. मात्र, यामध्ये विभागाकडून वाहन धारकांना ‘आरसी’ देण्यास विलंब होत आहे. तसेच, मध्यंतरी ‘आरसी’ छपाईसाठी लागणारा कागद उपलब्ध होत नव्हता, त्यामुळे त्यामध्ये आणखी विलंब होत होता. या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिवहन विभागाने पुन्हा ‘स्मार्ट आरसी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

आता परिवहन विभागाने ‘आरसी’चे ‘स्मार्ट कार्ड’चे बनविण्याचे काम ‘रोझ मार्टा’ कंपनीला दिले असून त्यासंबंधीचा करारही केला आहे. या महिन्यात संबंधित कंपनीकडून कामकाज सुरू केले जाणार आहे. ‘स्मार्ट आरसी’चे शुल्क किती असेल, या बाबत अद्याप निर्णय झाला नाही. स्मार्ट कार्ड तयार करण्यापासून वाहन धारकाच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे ते पाठविण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर असणार आहे.

स्मार्ट कार्ड मिळेल

दोन वर्षांपूर्वी ‘स्मार्ट आरसी’ बंद झाल्यानंतर वाहन धारकांना ‘पेपर आरसी’ देण्यात आले आहे. त्यांना आता ‘स्मार्ट कार्ड’ हवे असेल, तर त्यासाठीचे शुल्क ‘आरटीओ’कडे भरून त्यांना ते दिले जाणार आहे. त्यामुळे ‘पेपर आरसी’मुळे नाराज असलेल्या वाहन धारकांना ‘स्मार्ट कार्ड’ घेता येणार आहे, अशी माहिती आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोमार्ग उभारणीसाठी विदेशी कंपन्या उत्सुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) राबविण्यात येणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गासाठी भारतासह चीन, फ्रान्स, इटली आणि जर्मनीच्या कंपन्यांचाही प्रतिसाद मिळाला आहे.

सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) आकाराला येणाऱ्या या प्रकल्पासाठी आणखी काही परदेशी कंपन्या उत्सुक असून, लवकरच त्यांचे प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मार्गासाठी पीएमआरडीएने मार्चमध्ये प्रकल्पाचे प्रस्ताव (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागवले होते. सुरुवातीच्या टप्प्यात बरेच प्रस्ताव दाखल झाले. त्यामध्ये भारतीय कंपन्यांसह काही परदेशी कंपन्यांचाही समावेश आहे. या संपूर्ण प्रस्तावाबाबत संबंधित कंपन्यांच्या शंका आणि अडचणी दूर करण्यासाठी शनिवारी पीएमआरडीएच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या मेट्रो मार्गासाठी १७ एप्रिलपर्यंत प्रस्ताव पाठवता येणार असून, जागतिक स्तरावरून आणखी काही कंपन्यांनी उत्सुकता दाखवल्याचे वृत्त आहे. येत्या काही दिवसांत त्यांचेही प्रस्ताव दाखल होतील, अशी अपेक्षा पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शिवाजीनगर ते हिंजवडी हा साधारणतः २२ किमीचा संपूर्ण उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग असून, या मार्गावर २३ स्टेशन असतील. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे शहरात विकसित करण्यात येणाऱ्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मेट्रो मार्गांसह या तिसऱ्या मार्गालाही प्राधान्य दिले जात आहे. या तिन्ही मार्गांसाठीचे इंटर-चेंज स्टेशन शिवाजीनगर येथील कोर्टासमोरच्या धान्य गोदामाच्या जागेत असेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पीय बैठकीत शिवाजीनगर-हिंजवडी मार्गासाठी ४५१ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहरातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गाचे काम येत्या महिन्याभरात सुरू होण्याची शक्यता असल्याने शिवाजीनगर-हिंजवडी मार्गाचे कामही वेळेत सुरू व्हावे, अशी अपेक्षा आहे. हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर आयटी कंपन्या असून, या कर्मचाऱ्यांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी २०२० पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या अॅपचे १२ लाख डाउनलोडिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

राज्यातील बारा लाख वीजग्राहकांनी महावितरणचे अॅप डाउनलोड केले असून, सव्वा कोटी ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी केल्याचे महावितरणककडून सांगण्यात आले.

महावितरणच्या मोबाइल अॅपला राज्यातील ग्राहकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अॅपमुळे महावितरणच्या कामकाजातही गतीमानता आणि पारदर्शकता आल्याचे दिसून आले आहे. याचा अनुभव लोकप्रतिनिधींनाही येत असून, शुक्रवारी विधान परिषदेत महावितरणच्या अॅपचे जाहीर कौतुक करण्यात आले. अॅपद्वारे ग्राहकांना विविध सेवा ऑनलाइन देणारी महावितरण ही देशातील विद्युत वितरण क्षेत्रातील पहिलीच कंपनी ठरली आहे. अॅपमुळे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीजजोडण्या, वीजबिले आणि भरणा आदींची माहिती मिळवणे तसेच वीजसेवांविषयी तक्रारी आणि अभिप्राय देणे शक्य झाले आहे. अॅपद्वारे आतापर्यंत ४८, ९६७ नवीन ग्राहकांना जोडणी देण्यात आली आहे.

आतापर्यंत १.२१ कोटी ग्राहकांनी आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली असून, ग्राहकांना मीटर रीडिंग, वीजबिल, ऑनलाइन बिल, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज, सद्यस्थिती, मीटर वाचन घेतल्याच्या तसेच, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे आदी सूचना एसएमएसद्वारे पाठविण्यात येत असल्याचे महावितरण प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅपवरून देण्यात येणाऱ्या वीजजोडण्या, वीजबिलांची माहिती, वीजबिल भरणा तसेच वीजसेवांविषयी तक्रारी आणि अभिप्राय आदी सेवांबद्दल वीजग्राहक समाधानी असल्याचे दिसून आले आहे. - डॉ. नीलम गोऱ्हे, विधान परिषद सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ खालापूरजवळ होणार आठपदरी बायपास

$
0
0

पुणे : लोणावळा ते खंडाळा या मार्गात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) खालापूर ते कुसगाव या दरम्यान सुमारे १३.३ किलोमीटर लांबीचा आठपदरी बायपास हायवे तयार करण्यात येणार आहे. या रस्त्यावर दोन बोगदे आणि दोन दरीपूल असणार असून ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर हा रस्ता बांधण्यात येणार आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे आणि राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतुकीमुळे लोणावळा ते खंडाळा या दरम्यान कायम वाहतुकीची कोंडी होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सुमारे चार हजार ७९७ कोटी रुपयांचा हा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना लोणावळा शहराबाहेरूनच जाता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा किमान अर्धा तास वेळ वाचणार आहे. या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) राज्य सरकारकडून तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे.

या रस्त्यावर आठपदरी बोगदे आणि दरीपूल तयार केले जाणार आहेत. पहिला बोगदा ८.९ किलोमीटर, तर दुसरा बोगदा १.६ किलोमीटर असणार आहे.

याशिवाय सुमारे ६५० मीटरचे दोन दरीपूल उभारले जाणार असल्याचे ‘एमएसआरडीसी’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

प्रवाशांना भरावा लागणार टोल

या रस्त्याच्या ‘डीपीआर’ला राज्य सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. पर्यावरण विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्यावर कामाला सुरवात होणार आहे. हा रस्ता येत्या पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या रस्त्याचा वापर करण्यासाठी सुमारे २५ वर्षे प्रवाशांना टोल द्यावा लागणार असल्याचे ‘एमएसआरडीसी’कडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरे, जमिनी महागणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बांधकाम व्यावसायिकांपासून सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिलेल्या रेडिरेकनरचे नवे दर (वार्षिक मूल्यदर तक्ते) राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने एक ए​प्रिलपासून लागू केले आहे. त्यानुसार राज्यात रेडिरेकनरमध्ये सरासरी ५.८६ टक्के वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ गेल्या सात वर्षांतील सर्वांत कमी असली, तरी लोकप्रतिनिधींची दरवाढ न करण्याची विनंती फेटाळून राज्य सरकारने ‘जोर का झटका धीरे से’ दिला आहे.

विभागनिहाय सरासरी वाढ पाहता राज्यात सर्वाधिक वाढ नाशिक विभागात (९.२० टक्के) केली आहे. त्यानंतर पुणे विभागाचा (८.५० टक्के) दुसरा क्रमांक लागतो. महापालिका क्षेत्रात नगर महापालिकेत सर्वाधिक म्हणजे ९.८२ टक्के, तर सर्वांत कमी दरवाढ नागपूर येथे (१.५० टक्के) झाली आहे.

पुणे महापालिका क्षेत्रात ३.६४ टक्के, तर पिंपरी ​चिंचवड महापालिका क्षेत्रात ४.४६ टक्के वाढ झाल्याने फ्लॅट आणि जमिनीच्या किमती स्थिर राहण्याची नागरिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. उलट पुणे जिल्ह्यात सरासरी ८.६० टक्के वाढ करताना पुणे ग्रामीण क्षेत्रात १५.३ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात मालमत्ता खरेदी करताना नागरिकांना आणखी खिसा खाली करावा लागणार आहे. राज्यात गेल्या वर्षी रेडिरेकनरमध्ये सरासरी सात टक्के वाढ झाली होती. मात्र, यंदा नोटाबंदी आणि बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे ५.८६ टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १.१४ टक्के दर कमी करून अंशतः दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राज्यातील सात विभागांपैकी नाशिक विभाग दरवाढीत ‘टॉप’वर राहण्यामागे तेथील विकास आराखडा कारणीभूत ठरला आहे. नाशिकचा विकास आराखडा मंजूर झाल्याने आतापर्यंतचा शेती झोन असलेला परिसर निवासी झाला आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे. पुणे विभागामध्ये गेल्या वर्षी सर्वाधिक म्हणजे ११ टक्के वाढ करण्यात आली होती. लोकप्रतिनिधींनीही विरोध नोंदवला होता. मात्र, राज्य सरकारने विरोध मोडीत काढून सरासरी साडेआठ टक्के दरवाढ केली आहे.

सरासरी वाढ

ग्रामीण क्षेत्र (४१ हजार ६७८ गावे) - ७.१३ टक्के

प्रभाव क्षेत्र (एक हजार ७८८ गावे) - ६.१२ टक्के

नगरपरिषद क्षेत्र (३५२) - ५.५६ टक्के

महापालिका क्षेत्र (२७) - ४.७४ टक्के

राज्याची सरासरी वाढ - ५.८६ टक्के


महापालिका आणि सरासरी वाढ (टक्के)

पुणे - ३.६४

पिंपरी-चिंचवड - ४.४०

बृहन्मुंबई - ३.९५

ठाणे - ३.१८

मिरा भाईंदर - २.६६

कल्याण-डोंबिवली - २.५६

नवी मुंबई - १.९७

उल्हासनगर - २.८८

भिवंडी-निजामपूर - १.७१

वसई-विरार - २.०३

पनवेल - ३.१७

सांगली-मिरज-कुपवाड - ४.७०

कोल्हापूर - ३.०

सोलापूर - ६.३०

नाशिक - ९.३५

मालेगाव - ६.१८

धुळे - ६.६९

जळगाव - ९.४५

नगर - ९.८२

औरंगाबाद - ६.२३

नांदेड-वाघाळा - ६.९४

लातूर - ५.३४

परभणी - ६.३९

नागपूर - १.५०

चंद्रपूर - ५.०

अमरावती - ६.०

अकोला - ३.०



राज्यातील ही गेल्या सात वर्षांतील सर्वांत कमी दरवाढ आहे. दरवाढ करताना झालेले व्यवहार आणि बाजारपेठेतील सद्यस्थिती यांचा आढावा घेऊन दर निश्चित केले आहेत. राज्यातील २७ महापालिका क्षेत्रांतील दोन हजार व्हॅल्यू झोनमध्ये शून्य टक्के वाढ दर्शविली आहे.

डॉ. एन. रामस्वामी, महानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'येरवडा' हे माझं पुण्यातील घर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगलेल्या अभिनेता संजय दत्त याने 'येरवडा' हे आपले पुण्यातील घर असल्याचे म्हटले आहे. ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबतर्फे आयोजित मि. इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेला प्रमुख पाहुणा म्हणून संजय दत्त उपस्थित होता. त्यावेळी त्याने 'येरवडा'चं त्याच्या आयुष्यात नेमकं काय स्थान आहे हे सांगितलं.

'नमस्कार पुणे' म्हणतच संजयने बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, 'मला पुण्यात येऊन खूप आनंद होत आहे. पुण्याविषयी मला वेगळीच आत्मियता आहे. पुण्यात माझे घर आहे. "येरवडा !" देवा शप्पथ सांगतो, पुण्याने खूप प्रेम दिले आणि आदराने वागवले, त्याबद्दल मी आभारी आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखक, निर्माता अजेय झणकर यांचे निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

सरकारनामा चित्रपटातून राजकीय संघर्ष गडद करणारे मराठीतील सुप्रसिद्ध लेखक, निर्माता अजेय झणकर (वय ५७) यांचे रविवारी खासगी हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. लेखक, पटकथा लेखक, गीतकार, दिग्दर्शक, निर्माता असे झणकर यांचे बहुआयामी व चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे. झणकर यांच्या पार्थिवावर रात्री उशीरा वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या वर्षीच्या अखेरपर्यंत कलात्मक कामात गुंग असलेले झणकर यांच्यावर गेल्या महिनाभरापासून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. झणकर यांच्या 'सरकारनामा' व 'द्रोहपर्व' या दोन कादंबऱ्यांनी मराठी साहित्यविश्वात वेगळे स्थान निर्माण केले. 'सरकारनामा' कादंबरीवर बेतलेला 'सरकारनामा' या चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. या चित्रपटाचे निर्माते, पटकथा लेखन तसेच चित्रपटातील 'अलवार तुझी चाहूल' या गाण्याचे गीतकार अशी बहुआयामी भूमिका त्यांनी बजावली. तसेच 'लेकरू' या चित्रपटाचे निर्माते व पटकथा लेखक झणकर हेच होते.

'वडगावच्या लढाईत इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान १७७९ सालीच पारतंत्र्यात गेला असता,' असे सांगणारी 'द्रोहपर्व' ही त्यांची कादंबरी गाजली. 'दोहपर्व' कादंबरीवर ‘सिंग्युलॅरिटी’ हा हॉलिवूड चित्रपट तयार झाला. मराठी लेखकाच्या साहित्यकृतीवर बेतलेला हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट ठरला. ‘बटरफ्लाइज ऑफ बिल बेकर’ या रहस्यप्रधान चित्रपटाचे दिग्दर्शन झणकर यांची कन्या सानिया झणकर यांनी केले होते. चित्रपटाची कथा झणकर यांची होती. हॉलिवूडमधील मॅनहटन महोत्सवात हा चित्रपट उल्लेखनीय ठरला होता.

झणकर यांचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्यांनी लेखनाचे विशेष पारितोषिक पटकाविल्यानंतर त्यांच्या लेखनप्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. झणकर यांनी जाहिरात क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. 'मार्केट मिशनरीज' संस्थेचे ते संस्थापक होते. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या मुंबई आवृत्तीसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील ८५० वाइन शॉप, बार बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सुप्रीम कोर्टाच्या एका दणक्यामुळे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दारूच्या दुकानांना बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने पुणे शहर आणि जिल्ह्यातील १६०० बार, वाईनशॉप, बिअरशॉपी बंद झाले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मुख्य रस्त्यांलगत असलेल्या ‘फाइव्ह स्टार’ हॉटेलसह ८५० परमिटरूम, वाईन शॉप बंद झाले आहेत.

दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयाचा थेट फटका ५० हजार नागरिकांच्या रोजगारावर झाला असून राज्य आणि केंद्र सरकारला ६०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागण्याची चिन्हे आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्याचा विचार करता मद्य विक्रीला एक हजार कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

नगर रोडवर ५०० मीटर अंतरावर असलेल्या सर्व फाइव्ह स्टार हॉटेलमधील मद्यविक्री बंद करण्यात आली आहे. स्वारगेट ते हडपसर, स्वारगेट ते कात्रज, कर्वे रोड, नाशिक रोड आणि नगर रोड या रस्त्यांवरील ५०० मीटर अंतराच्या आत असलेले तब्बल ८०० हून अधिक वाईनशॉप, बिअरशॉपी बंद करण्यात आल्या आहेत.

बारामती शहरामध्ये कोर्टाच्या या निर्णयामुळे एकच परमिट रूम सुरू ठेवणे शक्य झाले आहे. असाच काहीसा प्रकार नारायणगाव येथेही आहे. बहुतांश मद्यविक्री करणारे व्यवसाय हे मुख्य रस्त्यांलगत असल्याने महसुलावर त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. व्यावसायिकांना नव्याने मद्यविक्रीचा व्यवसाय थाटावा लागणार असून त्यासाठी जागांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

केवळ दारू दुकाने बंद न करता अशा दुकानांची माहिती देणारे महामार्गांवरील फलकही हटविण्याचे निर्देश सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठाने दिले आहेत.

शहरातील महामार्ग ‘ड्राय’

राज्य, तसेच राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूला पाचशे मीटर असलेल्या परिसरात दारूच्या दुकानांबरोबरच बार, रस्टॉरंट आणि पब १ एप्रिलपासून बंद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानुसार पुणे परिसरासह मध्यवर्ती पुण्यातील जुन्या महामार्गांवरील सर्व हॉटेल आणि बारचालकांनी शनिवारी सकाळपासूनच मद्यविक्री बंद केली. महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांबद्दल राज्य उत्पादन विभागाने कोणताही निर्णय न घेतल्याने शहरातील ७० टक्के हॉटेल, पब आणि फॅमिली रेस्टाँरटमध्ये हा नवीन नियम लागू झाला.

फेरविचारासाठी पत्र

मध्यवर्ती पुण्यातील जुन्या मार्गांबद्दल महापालिकेने पुनर्विचार करावा, असे पत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने महापालिका प्रशासनाला पाठविले आहे. महापा‌लिकेच्या हद्दीतून जाणारे मुंबई ते बेंगळुरू, (एनएच ४) आणि पुणे ते सोलापूर (हायवे क्रमांक ९) हे रस्ते महापालिका हद्दीत आहेत. ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळविले आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांबाबत मत द्यावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दारू दुकानांबाबत खबरदारीची सूचना

पिंपरी : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शहर-जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील वाइन शॉप, बार बंद झाले आहेत. परंतु, यामुळे शहरात सध्या सुरू असलेल्या दारू विक्रीच्या दुकानांवर मोठी गर्दी होऊन अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी, असे पत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पोलिस आयुक्तांना दिले आहे. एकाच दिवसात दारू खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहून बाय हँड हे पत्र पोलिस आयुक्तांकडे पाठविण्यात आले.

शहर-जिल्ह्यातून २६०० पैकी १६०० दारू विक्रीची दुकान बंद झाली आहेत. त्यामध्ये देशी-विदेशी दारू आणि परमिटरूम-बार यांचा समावेश आहे. महिन्याकाठी पुणे शहर-जिल्ह्यातून सुमारे दोन लाख लिटर दारूची विक्री होत होती. मागणी आणि पुरवठा याचा विचार करता एखादा बाका प्रसंग घडण्याची भीती ‘आहार’ या हॉटेल असोसिएशनने देखील वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूतील कलाच किनारा स्वच्छ करेल

$
0
0

जगात एखादी घटना घडली आणि तिचे प्रतिबिंब वाळूच्या शिल्पातून उमटले, की समजायचे सुदर्शन पटनायक यांचीच ती कलाकृती असणार. एक वेगळी कला साकारणाऱ्या आणि आपल्या अभिव्यक्तीतून मानवी संवेदना टिपणाऱ्या या मनस्वी कलाकाराला केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ किताब देऊन गौरविले आहे. या अनोख्या कलेविषयी व चळवळीविषयी सुदर्शन पटनायक यांच्याशी पुणे भेटीत चिंतामणी पत्की यांनी केलेली बातचीत.

या अनोख्या कलेची सुरुवात कुठून झाली?

आमच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. तो काळ कठीण होता. मी काम करून शिक्षण घेत होतो. चित्रकलेची आवड होतीच. काम करत असताना तेथील वातावरणाने कलेचे नकळत संस्कार झाले; पण परिस्थिती चांगली नसल्याने कला विकसित करण्यासाठी मी काहीही खरेदी करू शकत नव्हतो. या घुसमटीतून समुद्र किनाऱ्यावर जाऊ लागलो. वाळूत ओरखडे मारता मारता त्यातून चित्र रेखाटू लागलो आणि पुढे भव्य-दिव्य शिल्प आकारण्याचा मला ध्यासच लागला.

वाळूतून शिल्प हा पारंपरिक कलाप्रकार नसताना तो विकसित कसा केला?

- खरं सागू...समुद्र किनारा हाच मोठा कॅनव्हॉस आहे आमच्यासाठी. देशात सर्व ठिकाणी वाळू आहे. देशाला मोठा समुद्र किनारा लाभला आहे, नद्या आहेतच. आधी म्हटल्याप्रमाणे पुरी येथे किनाऱ्यावर काम सुरू केले. ही कला पारंपरिक नाही, हे खरेच; पण ती नैसर्गिक कला आहे. ही कला निसर्गामुळे घडते आणि बिघडतेही. आम्ही अथक प्रयत्नातून ती विकसित केली आहे. शिल्प तयार करण्यासाठी किनाऱ्यावर एक पृष्ठभाग तयार करावा लागतो. त्यावर आधी पिरॅमिड करतो व त्यावरून चित्र रेखाटायला सुरुवात करतो. अनेक तासांच्या परिश्रमानंतर शिल्प आकार घेते.

शिल्प पाण्यात वाहून जाईल, अशी टिंगल-टवाळी झाली का?

- ही कला टिकणारी नाही. शिल्प पाण्यात वाहून जाईल किंवा हवेने उन्मळून पडेल, अशी यथेच्छ टिंगल-टवाळी मी सहन केली; पण हार मानली नाही. तसे पाहायला गेले, तर कोणतीच गोष्ट कायम स्वरूपाची नसते. एखादी कलाही त्या क्षणापुरती असते; पण ती या ना त्या स्वरूपात जिवंत असते. एखादा गवई तान घेतो आणि आपली ब्रह्मानंदी टाळी लागते; पण तो एखादाच क्षण असतो ना, ती तान आपण पकडून तर नाही ठेऊ शकत. फार तर ध्वनिमुद्रित करून ठेऊ शकतो. या कलेचेही तसेच आहे. म्हणूनच छायाचित्रांतून शिल्पे आम्ही जपून ठेवतो. प्रेमाने केले, तर प्रत्येक काम अनंत काळ राहते. प्रत्येक कलेची स्वतंत्र ओळख आहे. आमची कला तर अगदीच वेगळी आहे.

आधी टिंगल, नंतर अभिनंदन हा प्रवास कसा होता?

जगन्नाथजींचा आशीर्वाद व कलाप्रेमींच्या शुभेच्छा यावरच ही वाटचाल करीत आहे. आमची टिंगल झाली, त्यानंतर ही कला एवढी लोकप्रिय होईल, असे वाटले नाही; पण प्रयत्न केले. आज जगभरातून या कलेचे कौतुक होत आहे. ही कला जगात पसरली आहे. तरुण कलाकार कला पुढे नेत आहेत. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाकडून एक अभ्यासक्रमही सुरू होत आहे. आम्ही आमच्या संस्थेतून विद्यार्थ्यांना शिकवतोय. हा प्रवास नक्कीच आनंददायी आहे. दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनीही गौरविले आहे. तो क्षण आयुष्यभराची ठेव आहे.

कलेतून काही सांगणे असते, ते नेमके कसे घडते?

जगात घडणाऱ्या चांगल्या–वाईट घटनांवर बारीक लक्ष असते. त्यातून विषय निवडले जातात आणि शिल्प आकारास येते. शिल्पातून काही सांगण्याचा प्रयत्न असतो. सामाजिक प्रश्नांवरील, घटनांवरील शिल्पांना लोकांनी कायमच उचलून धरले आहे. सीरियामधून निर्वासित कुटुंबातील किनाऱ्यावर वाहून आलेल्या मुलाचे शिल्प पाहून अनेकांचे मन विषण्ण झाले. गिनीज बुक रेकॉर्ड झाले आहे. प्रत्येक क्षणाला मी विचार करतो, की आपण वेगळे काय करू शकतो. २५ वर्षे हाच प्रयत्न करत आलोय. हजारो कलाकृती या प्रवासात केल्या आणि त्या सर्व छायाचित्रात बंद करून ठेवल्या, कारण हाच आमचा ठेवा आहे. शिल्प पूर्ण झाल्यानंतर लोकांना दाखविण्यासाठी ते खुले असते. काही दिवसांनंतर किनारा आहे तसा केला जातो. देवानंद, ओम पुरी, सत्यजित रे, एम. एफ. हुसेन...अशा अनेक दिग्गजांची शिल्पे रेखाटून त्यांच्या स्मृती जागविल्या आहेत. वाळू घरी आणून शिल्प करू शकतो; पण कॅनव्हॉस तो राहत नाही. किनाऱ्यावरील अनुभवच वेगळाच असतो.

स्वच्छ किनाऱ्यासाठी चळवळ छेडली आहे ना?

मी देशातील बहुतेक सर्व किनाऱ्यांवर काम केले आहे. महाराष्ट्राचा समुद्रकिनारा सुंदर आहे. लोकांमध्ये कलेतून जागृती करण्याचा प्रयत्न आहे. त्यातूनच स्वच्छ किनारा ही चळवळ सुरू झाली. त्याचा मला दूत म्हणूनही नेमले गेले आहे. आम्ही विचार करतोय, की लोकांनी किनाऱ्याचा आनंद घ्यावा; पण किनारा घाण करून नये. किनाऱ्यावरील वाळू घाण करण्यापेक्षा त्याच वाळूत कला निर्माण व्हावी. यातून कला व स्वच्छता हे दोन हेतू साध्य होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र दिनी मराठी अभिजात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार १ मे हा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधण्याची दाट शक्यता आहे. न्यायालयीन अडथळे दूर झाल्याने मराठी भाषेचा चार वर्षांपासून भिजत पडलेला प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. याबाबत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव कंवरजित सिंग यांनी पत्र पाठवले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबतची कृतिशील कार्यवाही सुरू झाल्याचे त्यात स्पष्टपणे म्हटले आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, यासाठी पंतप्रधान मोदी यांना एक लाख पत्रे पाठवण्याचा उपक्रम शाहूपुरी शाखेतर्फे सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर झालेल्या भेटीत हा प्रश्न उपस्थित केला होता. खासदार श्रीरंग बारणे यांनीही लोकसभेत या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या प्रश्नाची दखल घेतली होती. गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या या सर्व घडामोडीनंतर अभिजात भाषेचा विषय चांगलाच ऐरणीवर आला आहे.

साहित्य परिषद; तसेच शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. त्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून योग्य त्या कार्यवाहीसाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडे पत्र पाठवण्यात आले होते. कुलकर्णी यांना पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेतल्याचे पत्र आले होते. त्यानंतर आता थेट सांस्कृतिक खात्याच्या सचिवांचे पत्र प्राप्त झाल्याने अभिजात दर्जा मिळण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस मंत्रालयाच्या विचाराधीन होती. मात्र, या विषयावर मद्रास उच्च न्यायालयात आर. गांधी यांनी हरकत घेणारा अर्ज दाखल केला होता. तज्ज्ञांच्या अहवालात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट करून अर्ज फेटाळण्यात आल्याने न्यायालयीन अडथळे दूर झाले आहेत.

‘मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कोणतीच दखल घेतलेली नाही. तसेच, त्यांच्या कार्यालयाकडून उत्तर आलेले नाही. मुख्यमंत्री पंतप्रधानांना वारंवार भेटत असतात. तसेच राज्याचे प्रमुख म्हणून प्राधान्याने हा प्रश्न मार्गी लावावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती. दखल न घेतल्यास हा प्रश्न सोडविण्यात रस नाही, असे समजून येत्या महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी धरणे आणि बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा साहित्य परिषदेच्या शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी रविवारी दिला.

पठारे समिती अंधारातच

मराठीला अभिजात दर्जा देण्याच्या हालचाली सुरू असताना याबाबत महाराष्ट्र सरकारने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समितीच अंधारात आहे. केंद्रीय सचिवांचे पत्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आले, तरी या समितीशी कोणताही पत्रव्यवहार सरकारी पातळीवर झालेला नाही. पठारे यांच्याशी संपर्क साधला असता सरकारकडून आम्हाला काही कळविण्यात आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौर्याची साक्ष देणारी गुढी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारत-पाकिस्तान ताबारेषेवरून चुकून पाकिस्तानात दाखल झालेल्या चंदू चव्हाण यांचा यंदाचा गुढीपाडवा अविस्मरणीय ठरला. पुण्यातील काही तरुणांनी थेट चव्हाण यांच्या घरी जाऊन शौर्याची गुढी उभारून चव्हाण यांच्या कर्तृत्वाला सलाम केला. ही आठवण डोळ्यात साठवून चव्हाण यांनीही शौर्याच्या नव्या गाथेचा प्रारंभ केला.

पुण्यातील नगरसेवक आबा बागुल यांचे सुपुत्र अमित बागुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी धुळे येथील बोरविहीर या चव्हाण यांच्या गावी जाऊन गुढीपाडव्याचा सण साजरा केला. देशभक्तीने प्रेरीत अशा गावकऱ्यांसह चव्हाण कुटुंबीयांनी आणि बागुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा देऊन चव्हाण यांच्या घरी गुढी उभारली. या वातावरणाने संपूर्ण बोरविहीर गावात चैतन्य पसरले होते.

चंदू चव्हाण यांना पाकिस्तानी सैनिकांनी पकडून १२४ दिवस अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवले. त्यांचे आतोनात हाल केले. काळ्या कोठडीतून आपण पुन्हा निसटून जाऊ, ही आशाच चव्हाण यांनी सोडली होती. त्यांची सुटका झाली आणि त्यांना नव्या वर्षाच्या या सोहळा अनुभवता येत आहे.

सलाम तुमच्या कर्तृत्वाला! असा फलक गुढीवर लिहिण्यात आला होता. गुढी उभारल्यानंतर संपूर्ण गावामध्ये मिठाई वाटण्यात आली. या पूर्वीही २६/११च्या दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी अशोक कामठे, काश्मीर येथील कुपवाडा येथे शाहिद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या घरी शौर्य गुढी उभारण्यात आली होती.

तरुणांच्या दृष्टीने जवान चंदू चव्हाण हे शौर्याचे प्रतीक आहेत. पाकिस्तानमध्ये त्यांना तब्बल १२४ दिवस अतोनात यातनांना सामोरे जावे लागले, तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर मावळा डगमगला नाही. त्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही शौर्याची गुढी उभारली.

अमित बागुल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भक्तीकाव्ये संस्कृतीचा अभिजात भाग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भक्तीकाव्ये ही भारतीय संस्कृतीचा अभिजात भाग आहेत. भारतातील लोकशाहीचे प्रातिनिधिक उदाहरण गेल्या अनेक दशकांत प्रामुख्याने याच भक्तीकाव्यांमधून दिसून येत आहे, त्यामुळे ही भक्तीकाव्ये भाषांताराच्या माध्यमातून अधिक व्यापक व्हायला हवीत,’ अशी अपेक्षा प्रसिद्ध हिंदी कवी अशोक वाजपेयी यांनी व्यक्त केली.

पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि रझा फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित ‘भक्ती : मेनी व्हॉइसेस, मेनी वेज’ या कवी संमेलनाचे उद्घाटन वाजपेयी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. ‘पीआयसी’चे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, सदस्या लतिका पाडगांवकर, प्रिया छाब्रिया तसेच देशातील प्रसिद्ध अनेक कवी, भक्ती काव्यांचे अनुवादक आदी या वेळी उपस्थित होते.

वाजपेयी म्हणाले, ‘भक्तीकाव्याच्या माध्यमातून गेल्या अनेक दशकांत वैचारिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय घटनांचे विश्लेषण समाजातील प्रत्येक स्तरातील कवी करीत आला आहे. भक्तीकाव्य ही कोणत्याही जाहीरनाम्याशिवाय सुरू झालेली एक चळवळ असून भारतात गेल्या कित्येक वर्षांत काव्य क्षेत्रात चालत आलेल्या लोकशाहीचे दर्शन ती घडविते. देशात सध्या भक्ती आणि भक्तांची एक लाट आली आहे. त्यामुळे भक्तीकाव्याचे सर्वांना स्फुरण चढले आहे. मात्र, एकीकडे हे होत असताना भक्तीकाव्याची परंपरा त्याचा उगम आणि त्याचा परिणाम समजून घेण्याची गरज आहे. भक्तीकाव्ये ही त्या-त्या भागातील आणि मुख्यत: बोलीभाषेतील असल्याने त्यांचे आणखी व्यापक स्वरूप भाषांतराच्या माध्यमातून सर्वांसमोर येणे गरजेचे आहे.’

कवी संमेलनात नवव्या शतकातील तमिळ वैष्णव कवी नम्मलवार, १५व्या शतकातील अभिरामी भट्टर, संत मीराबाईंची भजने, रहीम अब्दुर रहिम यांचे दोहे, सुफी भक्तीगीत, काश्मिरी कवी लालदेड यांच्या रचना, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांचे अभंग यांसारख्या अनेकविध भक्तीकाव्यांचे सादरीकरण करण्यात आले. प्रिया छाब्रिया, राहुल सोनी, मुस्तनसिर दळवी, एच. एस शिवप्रकाश, रणजीत होस्कोटे, मंदार आणि दखशायनी कारंजकर व सुरेश छाब्रिया या कवींनी भक्तीकाव्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images