Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

यंदाच्या गुढीपाडव्याला कधी उभाराल गुढी?

$
0
0

सकाळी साडेआठ वाजता गुढी उभारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा गुढीपाडवा कॅलेंडरमध्ये २८ मार्चला (मंगळवार) दाखविण्यात येत असला तरी विविध पंचागकर्त्यांमध्ये मतभेद आहेत. पण महाराष्ट्रातील नागरिकांनी येत्या २८ मार्च रोजी सूर्योदयानंतर सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी गुढी उभारावी, असे आवाहन दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी केले आहे.

येत्या २८ मार्चला सूर्योदयानंतर ८ वाजून २७ मिनिटांपर्यंत अमावस्या असून प्रतिपदेची समाप्ती २९ मार्चला सूर्योदयापूर्वी पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी होते आहे. त्यामुळे २८ मार्च याच दिवशी अमावस्या समाप्तीनंतर नेहमीप्रमाणे गुढी उभारून पूजा करावी. देशात सूर्यसिद्धांत आणि दृकसूक्ष्म गणितपद्धती अशा दोन पद्धतींची पंचागे आहेत. गणित पद्धतीच्या भिन्नतेमुळे काही सण वेगवेगळ्या दिवशी येतात. संपूर्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, चंदिगड, हरियाना, उत्तर प्रदेश, कर्नाटकातील बऱ्याचशा भागात पंचागामध्ये आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचागातही सूक्ष्म गणित पद्धतीनुसार २८ मार्च रोजी गुढीपाडवा दिलेला आहे. या पूर्वी २८ मार्च १९९८, १९ मार्च २००७ आणि ६ एप्रिल २००८ या वर्षी देखील अमावस्या समाप्तीनंतर गुढीपाडवा आला होता. यानंतर १९ मार्च २०२६ मध्ये पुन्हा अशाच प्रकारे सकाळी अमावस्या समाप्तीनंतर गुढीपाडवा येईल, असे दाते यांनी सांगितले.

याबद्दल शारदा ज्ञानपीठ्मचे संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ म्हणाले, येत्या २८ मार्चला फाल्गुन अमावस्या सकाळी ८ वाजून २७ पर्यंत आहे. नागरिकांना ‘अमा-समाप्ती’ पूर्वी स्नान, देवपूजा करता येईल. मात्र सकाळी ८ वाजून २७ मिनिटानंतर पुनः अभ्यंगस्नान करून गुढीपूजन आणि पाडव्याची कृत्ये करावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माळीणवासियांचे घराचे स्वप्न अखेर साकार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

तब्बल २ वर्षे आणि ७ महिने पत्र्याच्या शेडमध्ये राहिल्यानंतर आता कुठे माळीण गावच्या रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घरात जायला मिळणार आहे. भूस्खलनामुळे २०१४ मध्ये माळीण गाव एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. त्या दु:खद आठवणी उराशी बाळगतच या दुर्घटनेतून वाचलेले गावकरी लवकरच नव्या टाऊनशीपमध्ये गृहप्रवेश करणार आहेत.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं माळीण गाव ३० जुलै २०१४ रोजी भोवतालच्या डोंगराने गिळलं. भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली सापडून १५१ गावकऱ्यांचा मृत्यू झाला. अनेक जखमी झाले. जे जिवंत राहिले त्यांना जवळच्या माळीण फाट्यावर निवारा केंद्रात तात्पुरता आडोसा देण्यात आला. पुनर्वसनासाठी नवी जागा शोधण्यात महिने गेले. चिंचवडी आणि झांब्रेवाडीतल्या जमीन मालकांनी जमीन देण्यास विरोध केला. अखेर माळीणजवळच्या आमडे गावातल्या आठ एकर जागेवर गावकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ६७ घरांची टाऊनशीप तयार करण्याचे ठरले. पण त्यातही खूप अडचणी आल्या. राज्य सरकारने एका घरासाठी २ लाख रुपये दिले, मात्र प्रत्यक्षात एका घराची किंमत ८ लाख रुपये होत होती. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सीएसआर फंडातून पैसे गोळा केले. यामुळे माळीणवासियांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले, अशी माहिती पुणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी दिली.



ऐसपैस, सुरक्षित घरे आणि एक 'टुमदार' शाळा

नव्या घरांच्या सुरक्षिततेसाठी जॉग्राफिकल सर्व्हे ऑफ इंडिया. सीओइपी कॉलेज, पुणेचे प्राध्यापर आदिंची मदत घेण्यात येऊन जागा निवडली. प्रत्येकाला पाणी, वीज, शौचालय, बाग आदि सुविधांसह १ बीएचके घर मिळाले आहे. घर आणि रस्त्यांव्यतिरिक्त एक तलाठी कार्यालय, बस स्टॉप आणि गुरांसाठी शेडही देण्यात आली आहे. मृत्युमुखी पडलेल्या माळीणवासीयांची आठवण ताजी राहावी यासाठी एक स्मृतीस्तंभही बांधण्यात आला आहे. याशिवाय एक प्रमुख आकर्षणाचं केंद्र ठरलीय ती जिल्हा परिषदेची नवी शाळा. दुर्घटनेतून बचावलेल्या ७१ मुलांना त्यांच्या शाळेची मंगळवारी सैरही घडवून आणण्यात आली.

अनेक अडचणींमुळे हा प्रकल्प संथगतीने सुरू होता. पण आता तो पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन झाल्यानंतर माळीणचे हे गावकरी आपल्या जुन्या आठवणींसह नव्या घरात, नव्या आयुष्याला सुरूवात करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्याचा स्वत:च्याच वडीलांकडून लैंगिक छळ

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

साडेपाच वर्षांच्या मुलाचा वडिलांनीच लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईनेच कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कोंढवा परिसरात ही घटना घडली असून पीडित तक्रार दाखल केलेल्या महिलेच्या पतीला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो दररोज घरी गोंधळ घालत असे. तिचा पती मुलासोबत अश्लील चाळे करत असल्याचे तिने सप्टेंबर २०१४ मध्ये पाहिले होते.त्यानंतर तिने असे न करण्याबद्दल पतीला खडसावले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा जून २०१५ मध्येही असाच प्रकार घडला.

त्या वेळीही महिलेने त्याला रागावत तेथून मुलाला घेऊन निघून गेली. मात्र, नोव्हेंबर २०१५ मध्ये मुलाने त्याच्या मावशीला या प्रकारांबाबत सांगितले. २०१६ मध्येही त्याने मुलाचा लैंगिक छळ केला. मुलाला मोबाईलमध्ये गेम खेळण्यास देऊन त्यात अश्लील व्हिडिओ दाखवत असे. याबाबत मुलाने त्याच्या आईला सांगितल्यानंतर ही बाब समोर आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. के. एच. संचेती यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

‘पुण्यभूषण फाऊंडेशन’ (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ २०१७ डॉ. के. एच. संचेती यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे, अशी माहिती ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली.

एक लाख रूपये रोख आणि बालशिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीचे पुण्यभूषण पुरस्कार्थी डॉ. के. एच. संचेती यांना गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे ठरविले आहे. जुलै महिन्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. या पुरस्काराबरोबर पाच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे. यामध्ये वसंत दत्तात्रय प्रसादे, मधुकर ताम्हसकर, निर बहादूर गुरुंग, गोविंद बिरादार, अनिल लामखाडे यांचा समावेश आहे.

याआधी ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ गायक दिवंगत पं. भीमसेन जोशी, राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे काका केळकर, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ.बानुबाई कोयाजी, सुप्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी. के. अय्यंगार, डॉ.रा.ना.दांडेकर, डॉ. मोहन धारिया, डॉ.जयंत नारळीकर, प्रतापराव गोडसे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, जयंतराव टिळक, डॉ. जब्बार पटेल, राहुल बजाज, डॉ. के. बी. ग्रँट, विख्यात नृत्यसाधिका डॉ. रोहिणी भाटे, डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. ह. वि. सरदेसाई, निर्मला पुरंदरे, सुधीर गाडगीळ, डॉ. सायरस पूनावाला, प्रतापराव पवार आणि भाई वैद्य या मान्यवरांना प्रदान करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी पालिकेच्या स्थायी मितीचा निर्णय मुंबईतून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ करीत भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर महापौर आणि सत्तारूढ पक्षनेता ठरविताना मुंबईमधून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या दोन महत्त्वाच्या पदानंतर महापालिकेतील स्थायी समिती सदस्यपदी पहिल्या टप्प्यात कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता हा निर्णयदेखील मुंबईतूनच होणार असल्याचे समजते. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात शहराचा कारभारी शहरातच हवा म्हणून करण्यात आलेल्या स्थानिक नेत्यांच्या पोस्टरबाजीला मुंबईस्थित नेत्यांनी सुरुंग लावल्याचे दिसून येते.
गुरुवारी (२३ मार्च) पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या सदस्यांची निवड होणार आहे. स्थायी समितीमध्ये १६ सदस्य असतात. भाजपचे १०, राष्ट्रवादीचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा १ नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त होऊ शकतात. भाजपचे संख्याबळ जास्त असल्यामुळे भाजपचा सदस्य स्थायी समितीचा अध्यक्ष होणार आहे. स्थायी समितीची नियुक्ती दोन वर्षाची असते. दर वर्षी आठ सदस्य समितीतून बाहेर पडतात. प्रथम वर्षी नियुक्ती झालेल्या सदस्याला एका वर्षानंतर ईश्वर चिठ्ठीने समितीतून बाहेर पडावे लागते.
महापौरपद आणि सत्तारूढ पक्षनेतापदी निवड करताना विधानसभा मतदारसंघानुसार मोठी ओढाताण झाली होती. स्थानिक नेत्यांनी यासाठी प्रतिष्ठाच पणाला लावली होती. मात्र, ऐन वेळेस पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुंबईवरून आणलेले पाकीट महापालिका सभागृहात उघडले आणि महापौरपदी नितीन काळजे यांनी निवड झाल्याचे घोषित झाले. आता याच पद्धतीने स्थायी समितीच्या सदस्यांची यादी असलेले पाकीट मुंबईवरून येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने संसदीय कामकाज मंत्री असलेले पालकमंत्री गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे हे मुंबईतच असणार आहेत. पालकमंत्री आणि स्थानिक नेत्यांमध्ये स्थायी सदस्यपदाची पहिली माळ कोणाच्या गळ्यात टाकायची याबाबत प्राथमिक चर्चा मागील आठवड्यात झाली होती. त्यानंतर अंतिम यादी या नेत्यांनी तयार केली असून, एकदा ही यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर ही यादी निश्चित केली जाणार असल्याचे समजते. बुधवारी (२२ मार्च) रात्री उशिरापर्यंत ही सगळी प्रक्रिया पार पडणार आहे.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे बुधवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी फायनल केलेली यादी पवार हे गुरूवारी घेऊन येणार असून, त्यानंतर नावे जाहीर केली जाणार आहेत. एकीकडे महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान, अजित पवार यांना घेरण्यासाठी शहराचा कारभारी आता शहरातच हवा अशा प्रकारचे पोस्टबाजी करण्यात आली होती. परंतु, अद्यापतरी शहरातील निर्णय घेण्याची मुभा स्थानिक नेत्यांना मिळालेली दिसत नाही.
स्थायी बरोबरीनेच स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. या ठिकाणीदेखील मोठी गटबाजी उफाळून येणार असल्याने स्थानिक नेत्यांनी याबाबत हात वर केले आहेत. स्वीकृतचा निर्णयही मुंबईतूनच होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या महापालिका वर्तुळात आहे.

पहिल्याच बैठकीत समन्वयाचा अभाव
महापालिकेतील विषय समित्यांवर भाजपचेच वर्चस्व राहणार आहे. समिती सदस्यनिवडीसंदर्भात भाजपच्या नगरसेवकांची बुधवारी (२२ मार्च) सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला सदस्य हजर राहण्यावरून हेवेदावे झाल्याचे समजते. तसेच महापौर हे चार वाजता या बैठकीला आले. दुपारी तीनची बैठक दीड वाजताच सुरू झाली आणि त्यातही गटतट दिसून आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पहिल्याच बैठकीत समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. के. एच. संचेती यांना पुण्यभूषण पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल, पुणे) यांच्या वतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांना जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी डॉ. संचेती यांना मानाच्या पुण्यभूषण पुरस्काराने गौरविले जाणार आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी बुधवारी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
एक लाख रुपये रोख आणि बालशिवाजीची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीचे पुण्यभूषण पुरस्कार्थी डॉ. संचेती यांना गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे ठरविले आहे. जुलै महिन्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. पुरस्काराबरोबर पाच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे. यामध्ये वसंत दत्तात्रय प्रसादे, मधुकर ताम्हसकर, निर बहादूर गुरुंग, गोविंद बिरादार, अनिल लामखाडे यांचा समावेश आहे.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, काका केळकर, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. बानू कोयाजी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी. के. अय्यंगार, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉ. मोहन धारिया, डॉ. जयंत नारळीकर, प्रतापराव गोडसे, चंदू बोर्डे, जयंतराव टिळक, डॉ. जब्बार पटेल, राहुल बजाज, डॉ. के. बी. ग्रँट, डॉ. रोहिणी भाटे, डॉ. बाबा आढाव, डॉ. श्रीराम लागू, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. ह. वि. सरदेसाई, निर्मला पुरंदरे, सुधीर गाडगीळ, डॉ. सायरस पूनावाला, प्रतापराव पवार आणि भाई वैद्य यांना पुण्यभूषणने गौरविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसएनडीटीच्या परीक्षेत गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात (एसएनडीटी) दूरशिक्षण (डिस्टन्स एज्युकेशन) विभागातील तृतीय वर्षाच्या बीएच्या इंग्रजी विषयाचा पेपर हा नियमित (रेग्युलर) अभ्यासक्रमावर आल्याचा प्रकार बुधवारी घडला. ऐन वेळी घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थिनींची भंबेरी उडाली. त्यानंतर तब्बल दीड तासाने विद्यार्थिनींना योग्य अभ्यासक्रमावर पेपर मिळाल्यानंतर परीक्षेला सुरुवात झाली. विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडत असताना दूरशिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख या प्रकारपासून अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. तसेच, असे प्रकार परीक्षेत वारंवार घडत असल्याचीच चर्चा केंद्रावर होती.
एसएनडीटी विद्यापीठाची सेमिस्टर परीक्षा सुरू आहे. ही सेमिस्टर परीक्षा नियमित आणि दूरशिक्षण एज्युकेशन अशा दोन्ही विभागांची आहे. विद्यापीठाच्या पौड फाट्याच्या परीक्षा केंद्रावर बुधवारी सकाळी अकरा वाजता दूरशिक्षण विभागात तृतीय वर्ष बीएच्या इंग्रजी विषयाचा पेपर होता. पेपर हा दूरशिक्षणच्या अभ्यासक्रमावर आधारित येणे अपेक्षित होते. मात्र, असे न होता तो पेपर नियमितच्या अभ्यासक्रमावर आला. त्यामुळे विद्यार्थिनींना सुरुवातीला पेपर अभ्यासक्रमाबाहेरील आल्याचे वाटले. मात्र, त्यानंतर विभागाकडून पेपर हा रेग्युलरच्या अभ्यासक्रमावर आल्याची माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली.
त्यानंतर मुंबईच्या विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातील परीक्षा विभागाने काही वेळाने ऑनलाइन पद्धतीने पुन्हा दूरशिक्षणच्या अभ्यासक्रमावर पेपर केंद्राकडे मेल केला. त्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून विद्यार्थिनींना देण्यात आली. या प्रकारामुळे सुमारे दीड तास उशीराने परीक्षा सुरू झाली आणि उशिराने संपली. या प्रकाराने विद्यार्थिनींची ऐन वेळी भंबेरी उडाली आणि वेळ वाया गेल्याने मनस्ताप सहन करावा लागला. परीक्षा केंद्रावर हा संपूर्ण प्रकार सुरू असताना दूरशिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख या प्रकारपासून अनभिज्ञ होते. दरम्यान, दोन्ही विभागाचे पेपर परीक्षेच्या अर्ध्या तासापूर्वी मुंबईच्या परीक्षा विभागाकडून संबंधित परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येतात. त्यानंतर पेपरच्या प्रिंट आउट काढून त्या पेपरच्या स्वरूपात विद्यार्थिनींना देण्यात येतात. त्यामुळे परीक्षेच्या काळात इंटरनेट नसणे, तांत्रिक अडचणी निर्माण होणे अशा विविध कारणांमुळे विद्यार्थिनींना अडचणींचा सामना करावा लागतो. परीक्षा केंद्रावर घडलेल्या या प्रकाराची तातडीने माहिती घेऊन त्याची माहिती परीक्षा विभागाला देण्यात येईल. तसेच, यापुढे असे प्रकार घडू न देण्यासाठी काळजी घेण्यात येईल, असे प्राचार्य डॉ. आनंद जुमळे यांनी सांगितले.

नेहमीच घडणारे प्रकार
दूरशिक्षण विभागाचा द्वितीय वर्ष बीएचा इंग्रजी विषयाचा मंगळवारी पेपर होता. हा पेपर सकाळी अकरा वाजता वेळेत सुरू झाला. मात्र, बहुतांश विद्यार्थिनींनी पेपर सुरू झाल्यावर उत्तरपत्रिकांवर चुकीची माहिती भरल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे विद्यार्थिनींना पुन्हा नव्या उत्तरपत्रिका देण्यात आल्या. या कारणाने पेपर सुमारे अर्धा तास उशिराने झाला. विद्यापीठाच्या परीक्षा काळात असे प्रकार नेहमीच घडतात. त्यामुळे परीक्षा केंद्रावर कॉलेजची परीक्षा सुरू असते की विद्यापीठाची हेच कळत नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीप्रदान सोहळ्यासाठी ऑनलाइन अर्ज करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा पदवीप्रदान समारंभ आयोजित केला आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून येत्या एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज विद्यापीठाच्या प्रशासनाने मागविले आहेत.
विद्यापीठाने विद्यापीठस्तरावरील पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभ वर्षातून दोन वेळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुसरा पदवीप्रदान समारंभ एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
या सोहळ्यात पदव्युत्तर पदवीची प्रमाणपत्रे देण्यात येणार असून पदवी प्रमाणपत्रांचे वितरण हे संबंधित कॉलेजांमध्ये करण्यात येणार आहे. येत्या एप्रिलपर्यंत विना विलंब शुल्कासह अर्ज करता येईल. तर, ५ ते १२ एप्रिल या कालावधीत विद्यापीठाकडून विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जातील. ऑनलाइन अर्जासोबत अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी www.unipune.ac.in या वेबसाइटवर संपर्क साधावा.

आधार क्रमांक नमूद करा
पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी करणे शक्य होणार आहे. सध्या आधार क्रमांक बंधनकारक केलेला नाही. परंतु, यापुढील काळात आधार क्रमांक सक्तीचा करण्यात येणार आहे, असे प्रशासनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तपासणीविना हॉस्पिटलची माहिती तयार

$
0
0

पालिकेच्या आरोग्य विभागाचा अजब प्रकार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील बेकायदा गर्भपात, सोनोग्राफी सेंटरचा पर्दाफाश करण्यासाठी हॉस्पिटलच्या तपासणीचे आदेश असताना तपासणी न करता थेट त्यांच्याकडूनच माहितीचा फॉर्म भरून मागितली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात आरोग्य खात्याने दिलेले फॉर्मचा नमुनाच आरोग्य खात्याने शहरातील डॉक्टरांना ई-मेलद्वारे पाठविल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात सुरू असलेल्या गर्भलिंग निदान तसेच गर्भपात केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य खात्याने जारी केले आहेत. आरोग्य खात्याने जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्या समितीमध्ये पुणे महागनरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट, गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र (पीसीपीएनडीटी), हॉस्पिटलमध्ये औषधांचे दुकानासाठी अन्न व औषध प्रतिबंधक कायद्यान्वये मान्यता मिळणे आवश्यक आहे. अग्निशमन नियमन कायद्यानुसार हॉस्पिटल, दवाखान्यात अथवा सोनोग्राफी केंद्रात अग्निशमन यंत्रणा बसविण्याबाबत परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्याचे प्रमाणपत्र, कोणत्या पॅथीची डॉक्टरांना पदवी आहे, त्याचे प्रमाणपत्र आहे का त्याशिवाय त्या पॅथीनुसार डॉक्टर पेशंटना औषधे लिहून देतात का याची शहानिशा करण्याचे हॉस्पिटल तपासणीचे आदेश दिले आहेत. अशा विविध प्रमाणपत्रांची तपासणी करून त्याचा अहवाल सरकारला संबंधित महापालिका अथवा आरोग्य यंत्रणेने देण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य खात्याकडून आरोग्य अधिकाऱ्यांना बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट, यासाठी हॉस्पिटल, दवाखान्यांची तपासणी करणे बंधनकारक केले आहे. परंतु, त्यासाठी अन्न व औषध प्रशासन, पोलिस, महसूल आणि आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांची संयुक्त पथक स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
परंतु, असे आदेश देऊन आठवडा उलटला तरी महापालिकेच्या आरोग्य खात्याने अद्यापही पथक स्थापन केलेले नाही. अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता नसल्याने त्यावर तोडगा म्हणून थेट शहरातील हॉस्पिटल, दवाखान्यांना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ई-मेल पाठविण्यात आला आहे. त्या ई-मेलद्वारे शहरातील दवाखान्यांसह हॉस्पिटलना फॉर्ममधील माहिती भरून मागितली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक डॉक्टरांनी महापालिकेच्या आरोग्य विभागात गर्दी करण्यास सुरुवात केली. अनेक डॉक्टरांकडे याबाबत विचारणा करता त्यांच्याकडून फॉर्म भरवून घेतली जात असल्याची माहिती मिळाली.
सरकारच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याच्या पालिकेच्या आरोग्य विभागाचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. हॉस्पिटल, दवाखान्याची थेट तपासणी न करता त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्याची युक्ती राबविल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हॉस्पिटलची तपासणी होणार नसेल तर या मोहिमेचा अर्थ काय असा सवाल उपस्थित होत आहे.
...
पथक स्थापनेसाठी पोलिसांसह अन्य विभागांनाही यापूर्वी पत्र पाठविली आहेत. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हॉस्पिटल, दवाखान्यांना फॉर्म पाठवून त्यांची माहिती मागविली आहे, हे खरे आहे. परंतु, पथक स्थापल्यानंतर त्यांची तपासणी केली जाईल. त्यानंतर पथकाच्या फॉर्मवर सह्या घेतल्या जातील.
- डॉ. एस. टी. परदेशी, प्रभारी आरोग्य प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अफूची विक्री करणाऱ्या तीन राजस्थानींना अटक

$
0
0

- साडेबारा लाखांची पाच किलो अफू जप्त
- रास्ता पेठेतील लॉजवर छापा टाकून कारवाई
म. टा. प्रतिनिधी, पुणे
अफूची विक्री करणाऱ्यासाठी आलेल्या तीन राजस्थानी व्यक्तींना रास्ता पेठेतील एक्सेल लॉजवर छापा टाकून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल साडेबारा लाख रुपये किंमतीचे पाच किलो अफू जप्त करण्यात आली आहे.
राणा सोनाराम पटेल (२३), रूपाराम बहेराराम पटेल (२५) आणि सर्व्हन केवलराम पटेल (२४, रा. जवेर, जोधपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील एक जण पूर्वी पुण्यात येऊन गेला असून, त्याने पूर्वी अंमली पदार्थाची विक्री केली आहे का याचा तपास सुरू आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.
दरोडा प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी शैलेश जगताप यांना काही जण पुण्यात अफूची विक्री करण्यासाठी गिऱ्हाइक शोधत आहेत, अशी महिती मिळाली. त्यानुसार, दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या पथकाने बनावट गिऱ्हाईकामार्फत आरोपींशी संपर्क साधला. आरोपींना खात्री झाल्यानंतर ते दोन दिवसांपूर्वी ट्रॅव्हल्सने पुण्यात अफिम घेऊन आले होते. रास्ता पेठेतील एक्सेल लॉड येथे राहत होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री या लॉजवर छापा टाकून तिघांना पकडण्यात आले आहे. या आरोपींनी जोधपूर येथून हे अमली पदार्थ आणले आहेत. त्यांच्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने गेल्या वर्षभरात सिंहगड रोड परिसरातून ५३ लाख रुपये किंमतीचे ३८० ग्रॅम वजनाचे हेरॉइन, विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पाच लाख रुपये किंमतीचे एमडी, बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन लाख ९७ हजार ६०० रुपये किंमतीचे कोकेन जप्त केल्याची माहिती पाटील यांनी दिली.
..
टोळीच्या प्रमुखाचा शोध सुरू
आरोपी राणा पटेल आणि आरोपी सर्व्हन पटेल हे जोधपूर जिल्ह्यात शेती करतात. आरोपी रूपाराम पटेल एका मेडिकल दुकानातील कर्मचारी आहे. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटच्या म्होरक्याने काही रक्कम आरोपींना देऊन अंमली पदार्थ पुण्यात घेऊन जाण्यासाठी गळ घातल्याची माहिती समोर आली आहे. तस्करी करणाऱ्या रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराची माहिती आरोपींकडून उपलब्ध झाली असून, पोलिस या रॅकेटच्या म्होरक्याचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपर तपासणीवर बहिष्कार कायम

$
0
0

सर्व मागण्या मान्य होण्यासाठी शिक्षकांचा पवित्रा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘ज्युनिअर कॉलेजमधील विभाग, तुकड्या व वर्ग यांची अनुदान पात्र यादीबाबतची आर्थिक तरतूद जाहीर करावी व शिक्षकांचा शंभर टक्के पगार तत्काळ सुरू करावा, या प्रमुख मागणींसह इतर मागण्या पूर्ण होईपर्यत बारावीच्या पेपर तपासणीच्या कामकाजावर बहिष्कार मागे घेतला जाणार नाही,’ असा पवित्रा महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. टी. एम. नाईक व शिक्षकांनी घेतला आहे.
समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाचा बुधवारी चौथा दिवस होता. याबाबत नुकतीच समितीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव रा. ग. गुंजाळ यांची भेट घेतली आणि त्यांना माहिती दिली. समितीने पत्रात नमूद केले आहे, की सन २०१४-१५ साली राज्यातील कायम विना अनुदानित शाळांचा ‘कायम’ हा शब्द काढून टाकण्यात आला. त्या वेळी विना अनुदानित शिक्षकांना सरकारच्या निर्णयानुसार शिक्षकांना स्वतंत्र पद्धतीने मानधन उपलब्ध करून देण्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, तीन वर्ष पूर्ण होऊन देखील याबाबतचा कोणताही निर्णय झाला नाही. या अनुदानास पात्र शिक्षकांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली नाही. या मागणीसाठी समितीने जवळपास १९९ आंदोलने केली आहेत. मात्र, याबाबत कोणताही निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला नाही.
त्यामुळे आर्थिक तरतूद जाहीर करणे, शिक्षकांचा शंभर टक्के पगार सुरू करणे, उर्वरित कॉलेजचे ऑफलाइन पद्धतीने मूल्यांकन करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आही समितीच्या मागण्या सरकारकडून पूर्ण होईपर्यत बेमुदत उपोषण सुरूच राहील. तसेच, पेपर तपासणीच्या कामकाज बहिष्कार कायम राहणार शिक्षकांनी असल्याचे स्पष्ट केले आहे. बुधवारी आमदार विक्रम काळे, सुधीर तांबे, नागो गाणार, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी उपोषणकर्त्यांसह प्रा. नाईक आणि शिक्षकांची भेट घेऊन मागण्यांची माहिती घेतली.
...............
शिक्षकांना धमकी
बारावी विविध विषयांच्या परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शिक्षकांना दिले जात आहेत. परंतु, समितीने पेपर तपासणीवरील बहिष्कार कायम असल्याचे सांगून तपासणीसाठी आलेले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पुन्हा विभागीय मंडळाकडे परत पाठवले. यावर विभागीय मंडळाकडून ‘पेपर तपासा नाही तर तुमची शिक्षण विभागाकडे मान्यता काढण्यासाठी तक्रार करू,’ अशी धमकी देण्यात येत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिस ‘सावजा’च्या शोधात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मेजर, असे बसून राहिले तर पन्नास पावत्या होणार का ?... आपण बंदोबस्त करायचा, वाहतुकीकडे लक्ष द्यायचे, की दंडाच्या पावत्या फाडत बसायचे?’ हा संवाद आहे, वाहतूक पोलिस शाखेतील दोन कर्मचाऱ्यांचा. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांना दंडाची रक्कम वसूल करण्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. त्यामुळे नो-एंट्री आणि एकेरी वाहतूक असलेल्या ठिकाणी पोलिस कर्मचारी ‘सावजा’च्या शोधात असल्याचे निदर्शनास येत आहे. बहुसंख्य पोलिस चौकात न थांबता वाहनचालक नियम कधी तोडतात, याच्या प्रतीक्षेत रस्त्याच्या एका कोपऱ्यात अथवा एकेरी वाहतुकीच्या ठिकाणी असल्याचे बहुसंख्य ठिकाणी दिसत आहे.

बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली, त्यांच्याकडून किती दंड वसूल केला गेला, हा विषय दर वर्षीच चर्चेचा ठरतो. तसेच, पोलिस दलामध्ये वाहतूक विभागांमध्ये दंड वसुलीबाबत काही प्रमाणात स्पर्धाही असते. त्यामुळे आपला विभाग दंड वसुलीत अग्रेसर ठेवण्यासाठी व वरिष्ठांची ‘शाबासकी’ मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी म्हणजेच, मार्च महिन्यात संबंध शहरात बेशिस्त वाहन चालकांवरील कारवाईला एकाएकी वेग आल्याचे दिसते. त्यामुळे हमखास नियमभंग होणाऱ्या ठिकाणी पोलिस कर्मचारी आवर्जून थांबलेले असतात, ते नियमभंग रोखण्यासाठी नाही, तर दंड वसूल करण्यासाठी.

गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन रस्ता) रस्त्यावर गोखले चौक ते फर्ग्युसन कॉलेजपर्यंत शनिवारी आणि रविवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा दुहेरी पार्किंग केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे कोंडीची परिस्थिती निर्माण होते. या वेळी वाहतूक पोलिस आगरकर रस्त्यावर दंड वसुलीमध्ये व्यस्त होते. मात्र, गोखले रस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत.

दंडवसुली करताना वाचला तरुणीचा जीव

गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्त्याने आगरकर रस्त्याकडे जाण्यासाठी रूपाली हॉटेलच्या समोरून उजवीकडे वळावे लागते. मात्र, अनेक वाहने आपटे रस्त्याने येऊन गोखले रस्त्याने काही अंतर उलटे दिशेने जाऊन आगरकर रस्त्याला जातात. त्या ठिकाणी वाहतूक पोलिस वाहनांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करतात. सोमवारी (ता. २०) या ठिकाणी एक तरुणी नो-एंट्रीतून आगरकर रस्त्याच्या दिशेने येत होती. त्या वेळी तिला थांबण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही त्या तरुणीने गाडी वेगाने घेत पोलिस कर्मचाऱ्याला हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने रस्त्याच्या मधोमध जाऊन तरुणीला अडविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुणीचा तोल जाऊन ती कोसळली. तिचे डोके फूटपाथवर जोरात आदळले. तिने हेल्मेट घातलेले असल्याने, ती बचावली. तिच्या कपाळाला व हनुवटीला किरकोळ जखम झाली. यानंतर तिच्याकडून दंड वसूल न करता सोडण्यात आले.

वाहतूक पोलिसांना ‘फ्लेक्स’ झोंबले

वाहतूक नियमन करायचे सोडून वाहतूक पोलिस घोळक्याने चौकांमध्ये दंडवसुली करत असल्याचे फ्लेक्स शहरात अनेक ठिकाणी लावून पोलिसांवर केलेली जाहीर टीका पोलिसांना चांगलीच झोंबली असून या प्रकरणी अज्ञातांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांविषयी खोट्या अफवा पसरविणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्याचा आरोप त्यात केला आहे. याबाबत पोलिस नाईक दत्तात्रेय नागरगोजे यांनी तक्रार दिली आहे. ‘कायदा सुव्यवस्थेचे वाजले बारा’, ‘वाहतूक पोलिस करत आहेत चौकाचौकात घोळक्याने पैसे गोळा’, ‘वाहतूक सुरळीत करा. लोकांना मोकळा श्वास घेऊ द्या’, ‘टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांचा बळी. या त्रासातून पुणेकरांची कोण सुटका करेल का?’…अशा आशयाचे फ्लेक्स टिळक चौक, समाधान चौक, मालधक्का चौक, संत कबीर चौकासह अन्य ठिकाणी लावण्यात आले आहेत. हे फ्लेक्स कोणी लावले आहेत हे स्पष्ट झालेले नाही. या फ्लेक्सबाजीचे पुणेकरांनी कौतुक केले आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. शहरात लावलेले हे फ्लेक्स वाहतूक पोलिसांच्या जिव्हारी लागले आहेत. बेकायदा फ्लेक्स लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार एस. बी. वाकसे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालहिंसाचारप्रकरणी समाज झोपलेलाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लहान मुलांवर होणाऱ्या हिंसाचारप्रकरणात पालक आणि एकंदरीतच समाजात जागरुकता नसल्याचे चित्र ‘युनिसेफ’तर्फे घेण्यात आलेल्या मतचाचणीतून समोर आले आहे. यामध्ये केवळ साडेतीन टक्के प्रकरणे पोलिसांपर्यंत गेली आहेत, तर २४ टक्के लोकांनी मुलांवरील हिंसेप्रकरणात कुठलीही भूमिका घेतलेली नाही.

‘युनिसेफ’ आणि ‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा’तर्फे बुधवारी पत्रकार भवन येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. या वेळी ‘युनिसेफ महाराष्ट्र’च्या सल्लागार डॉ. स्वाती महोपात्रा, कामिनी कपाडिया, संतोष शिंदे, अनुराधा नायर आदी उपस्थित होते. लहान मुलांवर होणारे हिंसाचार उजेडात आणण्यासाठी युनिसेफ, मुंबई स्माइल्स यांनी मिळून ‘प्ले इट सेफ’ ही मतचाचणी घेतली. याद्वारे मुलांना बोलते करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यातील आठ जिल्ह्यांमधील १३ ते १७ वयोगटातील सुमारे पाच हजार मुलांना प्रश्न देण्यात आले. त्यांनी कविता, गोष्टी सांगून त्यांचे अनुभव मांडावेत, असे सांगण्यात आले होते. या मतचाचणीत भाग घेणाऱ्या मुलांपैकी ४१.६३ टक्के मुले शाळेत जाणारी होती. ३८.९५ टक्के मुले शाळेत जात नव्हती. कस्तुरबा गांधी विद्यालयातील २.०४ टक्के, आश्रमशाळेतील ५.८, बालगृहातील ११०. ५ टक्के मुलांची मते जाणून घेण्यात आली. मतचाचणीत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना शाळा, स्वच्छतागृहे, स्वच्छ प्रकाश, वाचनालय, मैदाने, आरोग्यसेवा, पिण्याचे पाणी, अनुकूल सामाजिक परिसर हवा असे मत नोंदविले.

लहान मुलांवर होणाऱ्या हिंसाचाराचे तीव्र स्वरूपही या मतचाचणीतून समोर आले आहे. मुलांना घरात, शाळेत, समाजात हिंसाचाराला तोंड द्यावे लागते. मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाणही चिंताजनक असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. मुलांना सुरक्षा आणि सुरक्षित असल्याची भावना घरातून मिळते. मात्र, मुलांवरील हिंसाचाराला घरातून सुरुवात होते. आईकडून २५ टक्के, वडिलांकडून २१ टक्के मार बसण्याची भीती वाटते. २५ टक्के मुलांना थोबाडीत, तर १७ टक्के मुलांना वस्तूने मारहाण, कान पिरगळणे, लाथा खाव्या लागल्या. दोन टक्के मुलांना चटके देण्यात आले. ६८.२७ टक्के मुलांना घरी आनंदी वाटते. तर, ११. १६ टक्के मुलांना घरी दुःखी वाटत असल्याचे या मतचाचणीतून सांगितले. शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक छळ, हेळसांड अशा प्रकारच्या हिंसाचाराला मुलांना तोंड द्यावे लागत आहे. ‘मुलांवर होणारा हिंसाचार रोखण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे,’ असे युनिसेफच्या सल्लागारांकडून सांगण्यात आले.

शाळेत होणारा हिंसाचार

वस्तूने बडविणे : १६.६० टक्के

वर्गाबाहेर उभे करणे : १४.७७

थोबाडीत मारणे : ५.५७

कान पिरगळणे : ४.७५

शिक्षकांकडून होणारा मानसिक ​हिंसाचार : ५८.८५



जवळच्या लोकांकडून होणारा छळ

वडिलांकडून होणारा छळ : १० टक्के

भाऊ - ८.५

काका मामा - ७

आजोबा - ६

आई - ६

बहीण - ४

आजी - ३

आत्या, मावशी - ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा आयएफएस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आयुष्यभर पोलिस कर्मचारी म्हणून काम केलेल्या व्यक्तीला आपलादेखील मुलगा मोठा अधिकारी व्हावा, अशी असलेली इच्छा एका हवालदाराच्या मुलाने पूर्ण केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेतल्या जाणाऱ्या भारतीय वनसेवा विभागाच्या परीक्षेत त्याने नेत्रदीपक यश मिळवून देशात सातवा क्रमांक पटकावला आहे.

किरण जगताप असे या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील सुरेश जगताप पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात नियुक्त आहेत. किरणने कृषिशास्त्रात बीएस्सी केल्यानंतर दिल्ली येथे पुढील शिक्षणासाठी गेला. जानेवारी महिन्यात त्याची भविष्य निर्वाह निधी विभागात सहायक आयुक्त पदावर निवड होऊन तेथे रूजू झाला. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतर मंगळवारी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला. त्यात किरण हा भारतीय वनसेवेच्या परीक्षेत देशात सातवा आला. त्याच्या यशाने वडील, जगताप कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. पोलिस हवालदाराच्या मुलाने मिळविलेल्या यशाचे सर्व पोलिस दलाकडून कौतुक केले जात आहे.

किरण हा पहिल्यापासूनच हुशार विद्यार्थी होता. दहावीच्या परीक्षेत बोर्डामध्ये १४वा आला होता. तर, बारावीत बोर्डात १२वा आला होता. बीएस्सीमध्येही विद्यापीठात दुसऱ्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर दिल्लीत जाऊन त्याने केलेल्या कष्टाचे फळ त्याला झाले आहे. किरणच्या यशाने आम्हाला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया किरण याचे वडील सुरेश जगताप यांनी दिली. ते म्हणाले, ‘मी कामानिमित्त सतत घराबाहरे असताना त्याच्या आईने त्याच्याकडे लक्ष दिले. त्यामुळे त्याच्या या यशाचे श्रेय आईचे आहे. तो आता ‘आयएएस’ परीक्षेची तयारी करणार आहे.’

यशामध्ये आईचा मोलाचा वाटा : किरण जगताप

माझ्या या यशामध्ये आई, वडील, शिक्षक यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या यशामुळे मी समाधानी आहे. वडील नेहमी बंदोबस्तासाठी बाहेर असत. त्या वेळी आईने माझ्या अभ्यासाकडे लक्ष दिले. पाया पक्का करून अभ्यास करण्यासाठी तिने प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मी यशस्वी झालो, अशी भावना किरणने व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेकडो शिक्षकांना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भरतीबंदीचा आदेश शिक्षकांचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना लागू होत नाही. त्यामुळे २ मे २०१२नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाने मान्यता द्यावी, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे संकटात सापडलेल्या राज्यातील शेकडो शिक्षकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. शिक्षक सेनेच्या या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

शालेय शिक्षण विभागाने अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी राज्यात २ मे २०१२ सालाच्या सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील माध्यमिक, प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी व भरती करण्यास बंदी घातली होती. २०१२नंतर शिक्षकांची भरती करण्यात बंदी घालण्यात आली असली, तरी अनेक शाळांमध्ये विविध प्रवर्ग आणि मागास प्रवर्गातील अनुशेष असल्याने हा अनुशेष भरण्यासाठी संबंधित संस्थांनी जाहिरातीच्या माध्यमातून व स्पर्धेतून शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. मात्र, या नियुत्यांना भरती बंदीचे कारण समोर करून शिक्षणाधिकारी मान्यता देण्यास नकार देत होते.

मुंबई उच्च न्यायालयात या दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी ( ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या शाळेच्या माध्यमातून एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयाने निर्णय देऊन राज्यातील शाळांमध्ये अनुशेष पूर्ण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना तातडीने मान्यता देण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे २०१२नंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांच्या मान्यतेसाठी टाळाटाळ करणाऱ्या शिक्षण विभागाला न्यायालयाने मोठी चपराक दिली आहे. मात्र, आता न्यायालयानेच आदेश दिल्याने या अनुशेषांतर्गत शिक्षकांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्यांना आता शालेय शिक्षण विभागाला मान्यता द्यावी लागणार आहे. दरम्यान, सकारच्या १३ एप्रिल २०११च्या आदेशानुसार मागासवर्गीय अनुशेष पूर्ण करण्यासासाठी विशेष भरती मोहीम घेण्यात यावी, असे निर्देश दिले होते. ही विशेष भरती मोहीम १३ मार्च २०१३ सालापर्यंत वाढविण्यात आली होती. त्यामुळे २ मे २०१२चा भरतीबंदीचा आदेश लागू होत नसल्याने या नियुक्त केलेल्या शिक्षकांना मान्यता द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्यातील शेकडो मागासवर्गीय प्रवर्गातील शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हवामान बदलांसाठी ढगांची समज गरजेची

$
0
0

डॉ. आर. आर. माळी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘हवामान, वातावरण, त्यामधील बदल आणि पाण्याची उपलब्धता समजण्यासाठी ढगांची समज अत्यंत आवश्यक आहे. हवामानाचा अंदाज वर्तविताना ढगांचे निरीक्षण महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ढगांचा अभ्यास आवश्यक आहे,’ असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपकरणशास्त्र विभागाचे उपमहासंचालक डॉ. आर. आर. माळी यांनी सांगितले.
जागतिक हवामान संस्थेतर्फे (डब्ल्यूएमओ) १९६१ पासून दर वर्षी २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी परिस्थितीचा आढावा घेऊन दर वर्षी एक संकल्पना (थीम) निवडली जाते. यंदा ही संकल्पना ‘समज ढगांची’ अशी आहे. ‘डब्ल्यूएमओ’तर्फे आज ‘आंतरराष्ट्रीय क्लाउड अॅटलास’'चे प्रकाशन (डिजिटल आवृत्तीसह) करण्यात येणार आहे. त्यात ढगांच्या शेकडो प्रतिमांचा खजिना आहे. त्यात इंद्रधनुष्य, प्रभामंडल, बर्फ आणि गारांचाही समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर माळी यांनी ही माहिती दिली.
दोन हजार वर्षांपूर्वी अॅरिस्टॉटलने ढगांचे अध्ययन करून जलविज्ञान चक्रातील ढगांच्या भूमिकेविषयी प्रबंध लिहिला. मात्र, ल्युक हॉवर्ड या हौशी हवामान शास्त्रज्ञाने १९ व्या शतकात लंडनमधील हवामानाच्या अभिलेखांआधारे ढगांच्या क्युमुलस, स्ट्रटस आणि सिरस या तीन जाती ठरविल्या. पुढील काळात त्यावर अधिक अभ्यास झाला, असेही माळी यांनी स्पष्ट केले.
आपल्याकडे अतिप्राचीन काळापासून ढगांचा अभ्यास केला जातो. कवी कालिदासाच्या मेघदूतमध्ये ढग, ढगांचा प्रवास आपल्या जीवनाशी किती निगडीत आहे, याचे वर्णन आले आहे. ढग जलचक्र आणि संपूर्ण वातावरण प्रणाली चालविण्यास मदत करतात. ढगांचा अभ्यास केल्याने हवामानाच्या स्थितीचा अंदाज बांधणे, भविष्यातील बदलांच्या संकेतांसाठी आणि जल संसाधनाच्या उपलब्धतेच्या अंदाज घेणे शक्य होते, असे माळी यांनी सांगितले.

हवामान विभागात ‘ओपन डे’
जागतिक हवामान दिनानिमित्त शिवाजीनगर येथील भारतीय हवामानशास्त्र विभाग साडेदहा ते पाच या वेळेत सर्वांसाठी खुला राहील. या निमित्ताने शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, नागरिक यांना हवामान विभागाच्या कामकाजाची माहिती घेता येईल. ढगांची माहिती, हवामानाचा अंदाजाची पद्धत, त्यासाठीची उपकरणे, पर्जन्यमापक व विविध उपकरणे, हवामानाच्या नोंदी, भूकंपमापन यंत्र, मान्सून, एल निनो-ला निना, बर्फवृष्टी, उष्णतेची लाट आदीविषयीची माहितीही विद्यार्थ्यांना मिळू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षित उड्डाणांसाठी ‘कम्प्लिट एअरपोर्ट सिस्टिम’

$
0
0

हवामान विभागाची निर्मिती; यंत्रणेची चाचणी घेणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विमानाच्या सुरक्षित उड्डाणासाठी हवामानाची सर्वंकष आणि अचूक माहिती मिळणे आवश्यक असते. त्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे ‘कम्प्लिट एअरपोर्ट सिस्टिम’ विकसित करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा मेंगलोर विमानतळावर बसविण्यात येत आहे. यंत्रणेच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ती सर्व विमानतळांवर बसविण्यात येईल.
हवामान विभागातर्फे (आयएमडी) विमानतळांसाठी आवश्यक कम्प्लिट एअरपोर्ट सिस्टिम विकसित करण्यात आली आहे. त्यात सध्याच्या तापमानाची अचूक माहिती देणारी ‘करंट वेदर इन्स्ट्रुमेंट्स सिस्टिम’ आणि ‘दृष्टी’ या दृष्यमानतेसाठीच्या यंत्रणेचा समावेश आहे, अशी माहिती आयएमडी’च्या उपकरणशास्त्र विभागाचे उपमहासंचालक डॉ. आर. आर. माळी यांनी ‘मटा’ ला दिली.
‘सध्या काही विमानतळांवर या दोन्ही पैकी एक यंत्रणा स्वतंत्ररित्या कार्यान्वित आहे. मात्र, मेंगलोर विमानतळावर पथदर्शी प्रकल्प म्हणून या दोन्ही यंत्रणा एकत्रितरित्या बसविण्यात येत आहेत. त्यामुळे या विमानतळावर दोन्हीची सांगड असलेली कम्प्लिट एअरपोर्ट सिस्टिम उपलब्ध होणार आहे,’ असे डॉ. माळी म्हणाले.
दृष्टी ही यंत्रणा म्हणजे ट्रान्समीसोमीटर आहे. आतापर्यंत ही यंत्रणा आयात केली जात होती. मात्र, आता आयएमडी आणि एनएएलच्या माध्यमातून त्याचे देशातच उत्पादन केले जाते. आयात केलेल्या यंत्रणेसाठी ६० लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र, स्वदेशी यंत्रणेसाठी वीस लाख रुपयेच खर्च येतो. सध्या मेंगलोर विमानतळावर कम्प्लिट एअरपोर्ट सिस्टिम बसविण्यात येत आहे. हे काम एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण होईल. त्यानंतरच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ही यंत्रणा देशातील सर्व म्हणजेच सुमारे ७४ विमानतळांवर बसविण्यात येईल, असेही माळी यांनी स्पष्ट केले.

वैमानिकांना ‘दृष्टी’

करंट वेदर इन्स्ट्रुमेन्टेशन सिस्टिमचा वापर विमानतळाच्या परिसरातील वातावरणाचा वेध घेण्यासाठी होतो. याद्वारे वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, तापमान, आर्द्रता आणि हवेचा दाब दर्शविण्यात येतो. ही यंत्रणा धावपट्टीच्या दोन्ही बाजूस बसविण्यात येते. वैमानिकासाठी उड्डाण करताना किंवा विमान उतरवताना धावपट्टीवरील दृष्यमानता अत्यंत महत्त्वाची असते. त्यावरच विमान उतरवायचे की नाही, याचा निर्णय वैमानिक घेतो. तोच अंदाज देण्याचे काम 'दृष्टी' ही यंत्रणा करते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’चा अध्यक्ष उद्या स्पष्ट होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थायी समितीच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर येत्या बुधवारी (२९ मार्च) समितीच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यासाठी, उद्या शुक्रवारी (२४ मार्च) अर्ज भरता येणार असून, त्याच दिवशी अध्यक्ष कोण हे स्पष्ट होईल. स्थायी समितीसह इतर विषय समित्यांच्या अध्यक्षपदावर संधी मिळावी, यासाठी भारतीय जनता पक्षातील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड मंगळवारी करण्यात आली. यामध्ये, भाजपच्या १० सदस्यांना संधी मिळाली असून, बहुतेक ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे, आता स्थायी समिती अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. सुनील कांबळे आणि मुरलीधर मोहोळ या दोन सदस्यांच्या नावांची सर्वाधिक चर्चा असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपमध्ये आलेल्या राजाभाऊ बराटे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, अशी शक्यता आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उद्या, शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अर्ज भरता येणार आहेत. भाजपकडे पूर्ण बहुमत असल्याने त्याच दिवशी स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाला मिळणार हे स्पष्ट होईल.
स्थायी समितीसह शहर सुधारणा, विधी, क्रीडा आणि महिला व बालकल्याण या समित्यांवरील सदस्यांची निवड झाल्याने या समित्यांचे अध्यक्षपद कोणाला मिळणार, याबाबतही उत्सुकता आहे. स्थायी समितीवर अनुभवी सदस्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता असल्याने इतर विषय समित्यांची अध्यक्षपदावर नव्या सदस्यांना संधी दिली जाऊ शकते. सर्व विषय समित्यांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी संधी मिळावी, यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न सुरू आहेत. स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर पुढील महिन्याच्या सुरुवातीला इतर समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधारी अन् विरोधकांत जुंपली

$
0
0

प्रस्ताव पुढे ढकलण्याचा भिमालेंचा प्रयत्न अयशस्वी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोरेगाव पार्क (प्रभाग २१) मधील रमाई आंबेडकर उद्यानात माता रमाई यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याच्या प्रस्तावावरून पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत चांगलाच वाद रंगला. भाजपचे सभागृहात बहुमत असल्याने हा प्रस्ताव ​महिनाभरासाठी पुढे ढकलून सभा तहकूब करण्याचा प्रयत्न सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी केला. मात्र, विरोधी पक्षांनी त्याला कडाडून विरोध केल्याने अखेर सभागृहनेत्यांनी उपसूचना घेऊन हा विषय मान्य केला.
प्रभाग क्रमांक २१मधील पालिकेच्या रमाई आंबेडकर उद्यानामध्ये माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा बसविला जाणार आहे. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. फेब्रुवारीच्या कार्यपत्रिकेवर हा विषय होता. या भागातील स्थानिक नगरसेविका लता राजगुरु, प्रदीप गायकवाड यांच्यासह मनसेचे माजी गटनेते राजेंद्र वागस्कर आणि माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांनी हा ठराव दिला होता. पालिका निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्याने सर्वसाधारण सभा झाली नव्हती. पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतरची दुसरी सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. फेब्रुवारीच्या कार्यपत्रिकेवर ३५ विषय होते. यातील ३४ विषयांवर सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला. मात्र, आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याचा विषय पुकारण्यात आला नाही.
हा विषय पुढे घ्यावा असा हट्ट उपमहापौर नवनाथ कांबळे यांनी धरला. भाजप वगळता इतर सर्वांनी त्याला विरोध केला. विरोध होत असल्याचे लक्षात येताच, भिमाले यांनी घाईत सभेत तहकुबी मांडली. बहुमताच्या जोरावर भाजपला मनमानी करु देणार नाही, अशी भूमिका घेऊन विरोधकांनी महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरील मोकळ्या जागेत येऊन भाजपविरोधात घोषणा दिल्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मध्यस्थी करून कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना बोलाविण्याची उपसूचना देऊन हा विषय मान्य केला.

भाजप नगरसेवकांचे हट्ट
वडगाव बुद्रुक येथील कै. सुलोचना बबनराव कुदळे-पाटील जलतरण तलाव आणि व्यायामशाळा भाडेकराराने चालविण्यास देण्याचा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या हट्टामुळे एक महिना पुढे ढकलला. ‘मी नव्हतो, हे टेंडर मला मान्य नाही’ त्यामुळे हा प्रस्ताव पुढे ढकलावा, अशी मागणी जगताप यांनी केली. विशेष म्हणजे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी देखील हा हट्ट पुरवून विषय पुढे ढकलला. नगरसेवक धीरज घाटे यांनी जगताप यांना अनुमोदन दिल्याने हा विषय महिनाभर पुढे गेला आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना जलतरण तलावाचा उपयोग करता येणार नाही. प्रशासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा संबंधित ठेकेदारांने ३५ हजार रुपये अधिक रक्कम भाडे म्हणून देण्याची तयारी दाखविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षित प्रवासासाठी सर्वसमावेशक मेट्रो

$
0
0

हैदराबाद मेट्रोच्या माजी संचालकांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शहरात मेट्रो प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर इतर वाहतुकीच्या सेवांवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि सर्व सेवा मेट्रोशी जोडल्या जातील. त्याचा फायदा नागरिकांना होणार असून, सुरक्षित प्रवासासाठी मेट्रो सर्वसमावेशक करण्यावर सर्वाधिक भर देण्यात येणार आहे’, असे मत हैदराबाद मेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ यांनी बुधवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित ‘पुणे मेट्रो संवाद’ या उपक्रमांतर्गत गाडगीळ बोलत होते. महामेट्रोच्या स्टॅट्रेजिक प्लॅनिंग विभागाचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाच्या प्रमुख डॉ. दीपा जोशी या वेळी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय दर्जाची मेट्रो सेवा शहरात उपलब्ध होणार असल्याने या निमित्ताने इतर वाहतूक सुविधांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. मेट्रोचा प्रवास सहज करता यावा, यासाठी फीडर बससेवा, रिक्षा, इलेक्ट्रिक वाहने, सायकल अशा सर्व प्रकारच्या वाहनांसोबत मेट्रोला जोडून घेण्यात येईल. या सर्व सेवांसाठी वेगवेगळे तिकीट काढावे लागू नये म्हणून एकाच कार्डवर सर्व सुविधा पुरविण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत गाडगीळ यांनी दिले.
मेट्रो प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चापैकी ३० ते ३५ टक्के खर्च मेट्रोच्या उर्जेसाठी लागणार आहे. या उर्जेपैकी तब्बल ६५ टक्के ऊर्जा सौरउर्जेपासून निर्माण केली जाणार आहे. त्यासाठीची यंत्रणा मेट्रोचे डेपो आणि स्टेशन्सवर कार्यरत असेल, अशी माहिती सुब्रमण्यम यांनी दिली. या वेळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. ज्यामध्ये जिओग्राफिकल आणि टोपोग्राफिकल सर्व्हे कसा केला जातो. पहिल्या टप्प्यानंतर या मार्गावरील वाहतूक कशी वळवणार, हैद्राबाद मेट्रोपेक्षा पुणे मेट्रोचा खर्च का वाढला, पुण्यातील एतिहासिक वास्तुंची काळजी कशी घेणार, भुयारी मार्ग महाग का, मेट्रो स्टेशनवर वाहनांच्या पार्किंगची तसेच सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था कशी असेल, आदी प्रश्न उपस्थित करण्यात आले.

दोन्ही मार्ग २०२१पर्यंत पूर्ण
मेट्रोमार्ग हा पिंपरी चिंचवडमध्ये पुलावरून आणि रस्त्याच्या मधून जाणार आहे. तर, पुणे शहरात रेंजहिल्सपासून स्वारगेटपर्यंत भुयारी मार्ग होणार आहे. पुण्यातील दोन्ही मार्ग २०२१ पर्यंत पूर्ण होतील असेही गाडगीळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images