Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिक्षण मंडळ बरखास्तीची चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या सभागृहाची मुदत बुधवारी (१५ मार्चला) संपत असल्याने पालिकेच्या शिक्षण मंडळाचे देखील अस्तित्व संपुष्टात येणार असल्याची चर्चा महापालिकेत सुरू होती. अडीच वर्षापूर्वीच हायकोर्टाने शिक्षणमंडळे बरखास्त करण्याचा निर्णय दिला असून, पालिकेच्या चालू वर्षाच्या मुख्य अर्थसंकल्पात शिक्षणमंडळाच्या अर्थसंकल्प समाविष्ट करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून १६ मार्चपासून पालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या शिक्षणमंडळाचे अस्तित्व आपोआपच संपुष्टात येणार असल्याची जोरदार चर्चा मंगळवारी संपूर्ण दिवसभर पालिकेत रंगली होती. शिक्षणमंडळात होत असलेल्या भ्रष्टचाराच्या प्रकरणाची दखल घेत २०१३ मध्ये हायकोर्टाने राज्या‌तील सर्व शिक्षणमंडळे बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिक्षण मंडळाकडील सर्व अधिकार महापालिका आयुक्तांकडे सोपविण्यात आले होते. दरम्यान, सर्वच राजकिय पक्षांच्या विनंतीवरून राज्य शासनाने महापालिकेचे सध्याचे सभागृह अस्तित्वात असेपर्यंत सर्व कारभार शिक्षण प्रमुखांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ पाहील, असे आदेश दिले आहेत. १५ मार्चला सभागृहाची मुदत संपत असल्याने आपोआपच शिक्षणमंडळाचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याची चर्चा सुरु आहे.
महापालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात आता शिक्षणमंडळाच्या अर्थसंकल्पाचा समावेश करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले. महापौर, उपमहापौर निवडणुकीनंतर लवकरच स्थायी समितीची निर्मिती होईल. त्यानंतर प्रशासनाने तयार केलेला अर्थसंकल्प मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर मांडण्यात येईल. शिक्षण मंडळाच्या सर्व खर्चांना मंजुरी स्थायी समितीकडूनच देण्यात येईल. शिक्षण मंडळाच्या संचालनासाठी नगरसेवकांचा समावेश असलेली ‘शिक्षण समिती’ स्थापन करायची की स्थायी समितीनेच हे काम पाहायचे, याचा निर्णय नवीन सभागृहावरच अवलंबून राहणार असल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. दरम्यान, आगामी वर्षापासून विद्यार्थ्यांसाठीच्या साहित्यांचे टेंडरद्वारे खरेदी करण्याऐवजी गणवेश, शालेय साहित्याची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावरच करण्याची योजना आखण्यात आली आहे.
..
ही तर अफवा : आयुक्त कुमार
महापालिकेचे सभागृहाची मुदत संपुष्टात येत असल्याने शिक्षणमंडळ बरखास्त होणार आहे, ही अफवा असल्याचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. हायकोर्टाचा निर्णय आणि शासनाचा आदेश याप्रमाणे शिक्षणमंडळाबाबत कारवाई केली जाणार आहे. काही गैरसमज झाल्याने शिक्षणमंडळ बरखास्त होणार असल्याची चर्चा‍सुरु असल्याचा खुलासा आयुक्त कुमार यांनी व्हॉटअप वरुन केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वैयक्तिक राजकारण टाळून बेरजेचे राजकारण करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पुणे महापालिकेत काँग्रेसचे नऊ नगरसेवक निवडून येणे ​हा नीचांकी आकडा आहे. या निवडणुकीत कुठे तरी जाऊन दोघा-तिघांनी आघाडी केली आणि तीही मैत्रीपूर्ण. अशी कुठे आघाडी करतात का? एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकारणाने काँग्रेसचे प्रचंड नुकसान केले आहे. वैयक्तिक अजेंडा राबवण्याचे टाळा आणि बेरजेचे राजकारण करा,’ अशा स्पष्ट शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी काँग्रेसजनांची खरडपट्टी काढली.
... निमित्त होते दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे. काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार यांनी शहर काँग्रेसमधील नेते, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या वेळी उल्हास पवार म्हणाले, ‘महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव जिव्हारी लागला आहे आणि हे दुर्दैव आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे एकेकाळी ८२ नगरसेवक होते आणि ही संख्या आता नऊपर्यंत खाली आली आहे. काँग्रेसमधील गटबाजी काँग्रेसच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण आहे.’
‘मुंबई आणि इतर ठिकाणी काँग्रेसमध्ये गटबाजी होती. मात्र, तेथील नेत्यांनी निवडणुकीत पुण्याच्या तुलनेने चांगली कामगिरी केली. पुण्यात महापालिकेत असलेली ठराविक मंडळी आपलाच अजेंडा राबवतात. पक्ष कसा मजबूत होईल, याकडे त्यांचे लक्ष नाही. केवळ आपल्या हिताचे राजकारण करण्यात येते.’ असेही ते म्हणाले.
काँग्रेसमधील गटबाजी ही आजची नाही. जहाल आणि मवाळ नेत्यांमधील वादातून सुरत काँग्रेसमध्ये एकमेकांवर खुर्च्या फेकल्या होत्या. मात्र, त्या मतभेदांनंतरही बेरजेचे राजकारण करण्यात आले. यशवंतराव चव्हाण यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी गटबाजी बाजूला ठेवून बेरजेचे राजकारण केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर त्यावर कोणाला चिंतन करावसे वाटत नाही, ही शोकांतिका असल्याची टीका पवार यांनी केली.
...
महापौर बंगल्यावरील बैठकीला कोणाची परवानगी?
महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या नगरसेवकांना महापौर बंगल्यावर मंगळवारी रात्री बैठकीसाठी बोलावले होते. काँग्रेसच्या नगरसेवकांना या बैठकीचे निमंत्रण कोणाच्या आदेशाने देण्यात आले? परस्पर निर्णय घेणारे हे कोण हायकमांड आहेत? पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही, याची जबाबदारी कोणाची? काँग्रेसमध्ये कोण कोणाला वाली नाही, कोणी काहीही करतो, पक्षाचे वाटोळे करण्यात येत आहे. या पराभवाचे कोणी आत्मचिंतन करणार आहे की नाही, अशी टीका काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने करून पालिकेतील काँग्रेसच्या राजकारणावर भाष्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज ठरणार पुण्याचे महापौर, उपमहापौर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज, बुधवारी निवडणूक होणार असून, आजवरच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार आहे. महापालिकेत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले असल्याने महापौरपदी मुक्ता टिळक आणि उपमहापौरपदी नवनाथ कांबळे यांच्या निवडीच्या औपचारिकेतवर बुधवारी शिक्कामोर्तब होणार आहे.
गेल्या बुधवारी भाजपच्या मुक्ता टिळक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा लोणकर आणि शिवसेनेच्या संगीता ठोसर यांनी महापौर निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. नवनाथ कांबळे यांच्यासह काँग्रेसकडून लता राजगुरू आणि शिवसेनेकडून विशाल धनवडे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे. भाजपकडे ९८ नगरसेवकांचे बहुमत असल्याने दोन्ही पदांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय ही निव्वळ औपचारिकता आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीतून मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने आयत्यावेळी माघार घेतली. त्यामुळे, बुधवारी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले होते. परंतु, महापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेने दोन्ही पदांसाठी उमेदवार उभे केले असून, निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाकडून बुधवारीच घेतला जाईल, असे संकेत शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी दिले. महापौर निवडीच्या प्रक्रियेला बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरुवात होणार आहे. सुरुवातीला महापौरांची निवड केली जाणार आहे. माघारीसाठी १५ मिनिटे मुदत दिली जाणार असून, महापौरांची निवड झाल्यावर उपमहापौर निवडण्यात येईल. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील.

...............


महापालिकेतील पक्षीय बलाबल
भारतीय जनता पक्ष : ९७
राष्ट्रवादी काँग्रेस : ३९
शिवसेना : १०
काँग्रेस : ९
मनसे : २
अपक्ष : ४
एमआयएम : १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबल डक्टसाठी आणखी २२५ कोटींचा खर्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) योजनेच्या जलवाहिन्यांसाठी तब्बल सतराशे कोटी रुपये खर्च केले जात असताना, आता जलवाहिन्यांची खोदाई करतानाच ‘केबल डक्ट’साठी आणखी २२५ कोटी खर्च करण्याचा घाट घालण्यात आला आहे. जलवाहिन्यांसाठी कर्जरोखे उभारण्याचा प्रस्ताव असून, डक्टचा सर्व भार महापालिकेलाच उचलावा लागणार आहे. शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत ‘वाय-फाय’ सुविधांच्या निर्मितीसाठी हे डक्ट आवश्यक असल्याचा दावा केला जात असला, तरी ठराविक कंपनीच्या फायद्यासाठी हा प्रकार सुरू झाल्याची टीका केली जात आहे.
समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात तब्बल सोळाशे किमीच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी, शहराच्या सर्वच भागांत मोठ्या प्रमाणावर खोदाई केली जाणार आहे. ही खोदाई करतानाच, केबल टाकण्यासाठी स्वतंत्र डक्ट तयार करण्याची योजना आयुक्त कुणाल कुमार यांनी आखली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत संपूर्ण शहरात वाय-फाय सुविधा पुरविण्यासाठी हे डक्ट आवश्यक असल्याचा दावा केला जात आहे. डक्टचे सर्व काम महापालिकेलाच करावे लागणार असून, त्यासाठी तब्बल सव्वादोनशे कोटी रुपये खर्च होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जलवाहिन्यांच्या कामासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद करणे शक्य नसल्याने कर्जरोख्यांद्वारे हा निधी उभा करण्याची योजना आहे. त्या संदर्भातला सविस्तर प्रस्ताव लवकरच नवनियुक्त सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. असे असताना, पालिकेच्या बजेटमधून आणखी २२५ कोटी रुपये खर्च करण्याची गरज काय, अशी विचारणा केली जात आहे. जलवाहिन्या आणि डक्टची कामे एकावेळी व्हावी, यासाठी टेंडरमध्ये दुरुस्ती करण्यात आली असून, त्याची मुदत वाढवण्याचा प्रकारही केला गेला आहे.
...
स्मार्ट सिटीचा भार पालिकेवर
स्मार्ट सिटीसाठी निवडण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी या भागांत वाय-फाय सुविधा देण्याची योजना होती. ही योजना आता संपूर्ण शहरात राबविण्याचा घाट घालण्यात आला असून, त्याकरिताच जलवाहिन्यांच्या खोदाईसोबत डक्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक, डक्टसाठीचा खर्च स्मार्ट सिटी कंपनीकडून केला जाणे अपेक्षित असताना, त्याचा भार पालिकेवर टाकला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यूपीआय’ घोटाळा प्रकरणी अडीचशे खाती गोठवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’च्या (यूपीआय) अॅपचा गैरवापर करून बँक ऑफ महाराष्ट्राची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयितांची धरपकड सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी २५० संशयित बँक खाती गोठवली आहेत. या अकाउंटमधून ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या २६ कोटी रुपयांवर डल्ला मारण्यात आला आहे. या ‘डिजिटल कांडा’तील प्रमुख सूत्रधाराने ११ कोटी रुपये लांबवले असून तो फरारी झाला आहे.
‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या खात्यामधून ३९० संशयितांनी २६ कोटी रुपये गायब केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’सह आणखी काही बँकांना ‘यूपीआय’च्या गैरवापराचा फटका बसला असला, तरी त्यांनी याबाबत कु​ठलीही तक्रार दिलेले नाही. या ‘डि​जिटल कांडा’तील प्रमुख सूत्रधार हा औरंगाबाद येथील असून, त्याच्या अटकेनंतरच आणखी किती बँकांची फसवणूक झाली, हे उघड होणार आहे.
‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या २३ वेगवेगळ्या शाखांतील ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) वापरणाऱ्या ५० ग्राहकांच्या खात्यात रक्कम नसतानाही बँकेतून सहा कोटी १४ लाख रुपये काढल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. निरंजन श्रीपाद पुरोहित (५९, रा. बावधन) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सायबर सेलचे ​वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार तपास करीत आहेत.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत राजेश सत्यनारायण काबरा (४७, रा. भोसले गार्डन), पंकज राजेंद्र पिसे (२८, रा. रायकर मळा, धायरी), अशोक बबन हांडे (४९, रा. पिंपळगाव जोगा, जुन्नर), दिनेश सयाजी मोढवे (४१, रा. मढ, जुन्नर) आणि संतोष प्रकाश शेवाळे (३७, रा. शिक्रापूर) यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील आनंद लाहोटी, विनोद नायकोडी, महेंद्र डोमसे, गणेश डोमसे आणि स्वप्नील विश्वासराव आदी संशयित अद्याप फरारी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे दहा लाख रुपये जप्त केले आहेत.
पुणे शहरातील प्रमुख सूत्रधार काबरा हे वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक आहे. त्यांचा औषध विक्रीचा ​व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या आप्तांच्या ११ बँक अकाउंटचा वापर करत पैसे मिळवले आहेत. ही रक्कम एक कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. या पैशांचा वापर त्यांनी देणी चुकती करणे, व्यवसायात वापरण्यासाठी केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.
हा डिजिटल घोटाळा सर्वप्रथम औरंगाबाद येथून सुरू झाला असून, येथील प्रमुख सूत्रधार गायब आहेत. यातील एका सूत्रधाराकडे फसवणुकीतील ११ कोटी रुपये असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या फसवणुकीची व्याप्ती वाढत असून आणखी किती बँकांना त्याचा फटका बसला, याचा शोध घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सोनोग्राफी केंद्रांची झाडाझडती

$
0
0

आजपासून १५ एप्रिलपर्यंत राज्यात तपासणी मोहिमेला वेग येणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बेकायदा गर्भपात, लिंगनिदान रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. राज्यातील सर्व गर्भपात केंद्रे, सोनोग्राफी केंद्रे तसेच हॉस्पिटलची आज, बुधवारपासून १५ एप्रिलपर्यंत कडक तपासणी करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे बेकायदा लिंगनिदान आणि गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीला आला. डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे हा होमिओपॅथीचा डॉक्टर गेली कित्येक वर्षे बेकायदा गर्भपात करीत असल्याचे उघडकीस आल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य खात्याने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात राज्यातील सर्व उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांना आदेश देण्यात आले आहेत.
ही मोहीम राबविण्यासाठी राज्यातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांची जिल्हा पातळीवर समिती स्थापन करण्यात यावी. त्याबाबत बैठकांचे आदेश आरोग्य खात्याचे अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिले आहेत. ही मोहीम शहर तसेच ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या समित्यांमार्फत मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात पुणे जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक, पुण्यासह पिंपरी चिंचवडचे आरोग्य अधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
‘जिल्ह्यातील सर्व गर्भपात केंद्र, सोनोग्राफी केंद्रांसह हॉस्पिटलची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी तालुकानिहाय तेरा समित्या स्थापन केल्या आहेत. त्या समित्यांमध्ये महसूल, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्रत्येकी एक अधिकारी सहभागी होईल,’ अशी माहिती मुठे यांनी दिली.

राज्यात सर्व ठिकाणी बेकायदा सुरू असलेले गर्भपात, लिंगनिदान रोखण्यासाठी तपासणी मोहीम १५ एप्रिलपर्यंत राबविण्याचे आदेश आहेत. एखाद्या ठिकाणी कोणी दोषी आढळल्यास संबंधितांची माहिती त्या पथकाकडून वरिष्ठांना दिली जाईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

राजेंद्र मुठे , निवासी जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवजयंतीनिमित्त आज वाहतुकीत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज, बुधवारी शहरात काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमुळे अनेक रस्ते सायंकाळनंतर पूर्ण आणि अंशत: बंद केले जाणार आहेत. वाहनचालकांनी मिरवणूक मार्ग वगळून पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस शाखेने केले आहे.
मुख्य मिरवणूक भवानी पेठेतील भवानी माता मंदिरापासून सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे. ही मिर‍वणूक पुढे रामोशी गेट चौकातून उजवीकडे वळून, नेहरू रस्त्याने ए. डी. कॅम्प चौक, संत कबीर चौकातून डावीकडे वळून नाना चावडी चौक, नानापेठ पोलिस चौकी, अल्पना टॉकीज, हमजेखान चौक, सतरंजीवाला चौक, सोन्या मारूती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौक आणि जिमामाता चौकातून पुढे लालमहाल येथे मिरवणूक संपेल.
दरम्यान, लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद केल्यानंतर टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी नेहरू रस्त्याने पॉवर हाउस चौक, अपोलो टॉकीज, फडके हौद, जिजामाता चौकातून पुढे जावे. देवजीबाबा चौकातून मिठगंज पोलिस चौकीकडून स्वारगेटकडे येणाऱ्या वाहनांनी दारूवाला पूल, अपोलो सिनेमा, पॉवर हाउस चौकातून नेहरू रत्याचा वापर करावा. गणेश रस्त्यावरील वाहतूक बंद केल्यानंतर जिजामाता चौकाकडे जाण्यासाठी देवजीबाबा चौक, हमजेखान चौक आणि लक्ष्मी रस्त्याचा वापर करावा. नेहरु रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे पॉवर हाउसकडून सेव्हन लव्हज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी क्वॉर्टर गेट चौक, जुना मोटार स्टॅण्ड मार्गे किंवा पॉवर हाउस ते समर्थ पोलिस ठाणे, शांताई हॉटेल, क्वार्टर गेट मार्गाने सेव्हन लव्हज चौकाकडे जावे. गाडगीळ पुतळा ते जिजामाता चौक दरम्यानची वाहतूक बंद झाल्यानंतर स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कुंभारवेस, फडके हौद चौकातून जावे.
कॅम्पातील खान्या मारूती चौकातून शिवजयंतीची मिरवणूक सायंकाळी पाच वाजता सुरू होईल. पुलगेट चौक, भोपळे चौक, सेंट्रल स्ट्रिट पोलिस चौकी, महात्मा गांधी रस्त्याने कोहिनूर चौकातून उजवीकडे वळून भोपळे चौकातून पुढे मिरवणूक जाईल. खडकीमधील शिवजयंती मिरवणुकीस सायंकाळी खडकी बाजारातील शिवाजी महाराजांच्या पुतळयापासून सुरुवात होईल. कॅन्टॉन्मेंट हॉस्पिटल चौक, श्रीराम मंदीर, आसुडखाना, आंबेडकर चौक, बँक ऑफ महाराष्ट्रमार्गे शिवाजी पुतळा येथे मिरवणूक संपेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधुनिक इव्हीएमसाठी ‘सी-डॅक’चा पुढाकार

$
0
0

कोठूनही कुठेही मतदान करता येणार; केंद्राला धाडला प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका आणि पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाअंती इव्हीएमचा मुद्दा चांगलाच गाजला. या पार्श्वभूमीवर येत्या काही वर्षांमध्ये मतदारांना सोयीच्या आणि सुरक्षित मतदान केंद्रातून स्वतःच्या मतदार संघात मतदान करता येणार आहे. यासाठी प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) पावले उचलली आहेत. ‘नेक्स्ट जनरेशन इव्हीएम’ अशा नावाने ही प्रणाली विकसित करण्याचा ‘सी-डॅक’चा मानस आहे. तसा प्रस्तावही ‘सी-डॅक’ने केंद्र सरकारला पाठविला आहे.
‘सी-डॅक’चे महासंचालक प्रा. रजत मूना यांनी मंगळवारी ही माहिती दिली. प्रा. मूना यांची आयआयटी भिलाईच्या संचालकपदी नेमणूक झाली असून, येत्या सोमवारी ते नव्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यानिमित्ताने प्रा. मूना यांनी संस्थेने केलेल्या कामांची आणि योजनांची माहिती दिली. ‘सी-डॅक’ पुणेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी आणि वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
सध्या मतदाराला ज्या मतदान केंद्रात नाव नोंदवले आहे, तेथेच जाऊन मतदान करावे लागते. अन्य केंद्रातून आपल्या केंद्रात मतदान करण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. ही समस्या दूर करण्यासाठी सी-डॅक ‘नेक्स्ट जनरेशन इव्हीएम’ ही संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी उत्सुक आहे. तसा प्रस्तावही केंद्राला पाठविण्यात आला आहे. ही प्रणाली अस्तित्वात आल्यास मतदाराला कुठूनही कोठेही मतदान करता येणार आहे. या प्रस्तावाला सरकारची मान्यता मिळाल्यानंतर या प्रणालीचे प्रारूप तयार करण्यात येईल. सर्व राजकीय पक्ष आणि केंद्र सरकारचे पाठबळ मिळाल्यास ही प्रणाली विकसित होऊ शकते, असे प्रा. मूना यांनी सांगितले. या प्रणालीसाठी देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती करावी लागेल, असेही ते म्हणाले.

‘सहा सुपरकम्प्युटर बसविणार’

केंद्र सरकारच्या नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशनला (एनएसएम) यंदा प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यत देशातील प्रमुख आयआयटी आणि आयसरमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सहा सुपरकम्प्युटर बसविण्यात येणार आहेत. त्यातील चार सुपरकम्प्युटरचा वेग ५०० टेराफ्लॉप आणि दोन सुपरकम्प्युटरचा वेग १ पिटाफ्लॉप राहणार आहे. हे सुपरकम्प्युटर ‘लिक्विड कुलिंग’ तत्वावर कार्यरत राहतील. त्यामुळे त्यांच्या देखभालीसाठी किमान विजेचा वापर होणार आहे, असे प्रा. मूना म्हणाले. दरम्यान, जगभर असे ‘अॅप्लिकेशन’ विकसित करणारे सुपरकम्प्युटर अस्तित्वात नसल्याचा दावाही त्यांनी केला. येत्या दोन वर्षांत सुपरकम्प्युटिंगमध्ये जगात देशाचा क्रमांक पहिल्या दहात येईल, असा विश्वास व्यक्त केला.

इव्हीएममध्ये छेडछाड अशक्यच : प्रा. मूना
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये इव्हीएम मशिनशी छेडछाड झाल्याची केवळ चर्चा आहे. हे उपकरण मतदानासाठी वापरण्यापूर्वी त्याची तीन प्रकारे चाचणी घेण्यात येते. त्यामध्ये सुरुवातीला इव्हीएम मशीनवर राजकीय पक्ष, निवडणूक विभाग आणि मशिन तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांसमक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात येते. तसेच, शेवटच्या टप्प्यात मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी निवडणूक अधिकारी, उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर मशिनची चाचणी घेण्यात येते. या उपकरणात इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सर्किट नाही. त्यामुळे बाहेरून एखाद्या यंत्राद्वारे किंवा रिमोटद्वारे छेडछाड करून मतांमध्ये वाढ करणे शक्य नाही, असेही इव्हीएम निर्मितीच्या तांत्रिक समितीच्या सदस्यपदी काम केलेल्या प्रा. मूना यांनी नमूद केले. याबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी सध्या उपलब्ध आणि भविष्यातील उपकरणाला वोटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) लावण्यात येईल. त्यामुळे मतदाराने मशिनवर मतदान केल्यानंतर उमेदवाराचे नाव आणि चिन्ह असलेली चिठ्ठी मशिनमध्ये जमा होईल. आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत या मशिनचा वापर होईल, असेही मूना म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोनशे चित्रांतून शिवरायांना मानवंदना

$
0
0

मराठीदेशा फाउंडेशनचा पुढाकार; दुर्मिळ ठेवा उलगडणार

Prasad.Pawar@timesgroup.com
Tweet : @PrasadPawarMT

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आग्र्याहून सुटका, अफजलखानाचा वध, सुरतेचा छापा, लाल महालात शास्ताखानाला शिकवलेला धडा या गोष्टींचीच उजळणी होते. त्या पलिकडचे कुटुंबवत्सल, राजनीतीधुरंधर, पर्यावरणप्रेमी, आरमाराचे प्रणेते महाराज चटकन समोर येत नाहीत. याच विचारातून नव्या पिढीसमोर छत्रपतींच्या व्यक्तित्त्वाचे सर्वांगीण पैलू यावेत, या हेतूने पुण्यातील मराठीदेशा फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. शिवछत्रपतींच्या विविध पैलूंना संदर्भांची जोड देऊन चित्रांच्या माध्यमातून पुढे आणण्याचे काम आरंभण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, देशभर शिवछत्रपती हा विषय घेऊन प्रदर्शनांचे आयोजनही करण्यात येणार आहे. राज्याचा तेजस्वी इतिहास आणि महाराज घरोघरी पोहोचावेत हा त्यामागील हेतू आहे. चित्रकार दिनेश काची, विश्वनाथ खिलारी आणि प्रमोद मोर्ती यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. या उपक्रमात इतिहासातील संदर्भ घेऊन महाराजांचे आजवर फारसे समोर न आलेले पैलू चित्रमय स्वरूपात मांडले जाणार आहेत. आज्ञापत्रातून जसे वेगळे शिवरूप समोर येते तसेच अस्सल ऐतिहासिक साधनांतून महाराजांचे कुटुंब, राजनीती, व्यवस्थापन, आरमार आणि पर्यावरणाविषयीची काळजी, दुर्गबांधणी आणि सैन्यव्यवस्था या विषयीचे विचार कळतात. तेच समोर ठेवून ही चित्रे साकारली जात असल्याचे रवी पवार यांनी सांगितले.
‘महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात अनेक गोष्टी केल्या. मात्र आपण त्यांना काही मर्यादित घटनांपुरतेच बंदिस्त केले आहे. त्या पलिकडेही महाराज आहेत. त्यांचे कुटुंब, मुले, कन्या, आज्ञापत्र आणि इतर दस्तऐवजातून समोर येणारे पैलू या चित्रांमध्ये दिसतील. तंजावरच्या (तमिळनाडू) सरस्वती महालात तसेच मायनाक भंडारी यांच्या वंशजांकडेही अस्सल दस्ताऐवज मिळाले आहेत. त्याचेही जतन होणार असून, चित्र स्वरुपात हा ठेवा शिवप्रेमींसमोर उलगडणार आहे. देशभरात आणि देशाबाहेरही या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. त्यातून जमणारा निधी सह्याद्रीतील ग्रंथदिंडी आणि दुर्गसंवर्धनासाठी दिला जाईल,’ अशी माहिती फाउंडेशनच्या दामोदर मगदूम यांनी दिली.

इतिहासप्रेमींनी सहभागी व्हावे
ऐतिहासिक संदर्भ वापरून शिवाजी महाराजांचे विविध पैलू चित्रांच्या माध्यमातून समोर आणण्याच्या या उपक्रमात इतिहासप्रेमींनाही सहभागी होता येणार आहे. चित्रे आणि विषयासाठी आर्थिक स्वरूपाची मदतही देता येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२१०५१८८९, ७७०९५४२५७३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरजातीय विवाहांना नव्या कायद्याचे कोंदण

$
0
0

जोडप्यांना मिळणार संरक्षण; सरकारकडून समिती गठीत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे सामाजिक मानहानी, कौटुंबिक त्रास आ​णि ऑनर किलिंगपासून संरक्षण कण्यासाठी ‘अॅट्रॉसिटी’च्या धर्तीवर ‘आंतरजातीय विवाह कायद्या’ची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नवीन कायद्याच्या निर्मितीसाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे.
राज्यात गेल्या काही वर्षात ऑनर किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः सैराट या चित्रपटानंतर हा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चिला गेला. सध्या मुस्लिम, पारशी आणि ख्रिश्‍चनांचे विवाहाचे कायदे स्वतंत्र आहेत.या शिवाय अन्य समाजातील विवाह हिंदू विवाह कायदा १९५५ आणि विशेष विवाह कायद्यांतर्गत नोंदविले जातात. या दोन्ही कायद्यांमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्यांच्या संरक्षणासाठी विशेष तरतुदी नाहीत. महिला-मुलींना संरक्षण देणे, आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक बहिष्कार, अवहेलना यापासून पुरेसे संरक्षण देण्यासाठी स्वतंत्र आंतरजातीय विवाह कायद्याची आवश्यकता होती. त्यामुळे अशा जोडप्यांना विशेषतः मुलींना पूर्ण संरक्षण देऊन जातीय सलोखा आणि समानता प्रस्थापित करण्यासाठी कायद्याचा आधार घेण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली चौदा जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. हा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. समितीच्या उपाध्यक्षपदी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मंगलाप्रभात लोढा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे सचिव, विधी, न्याय विभागाचे सचिव, समाजकल्याण आयुक्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक, राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे अध्यक्ष, विधी सदस्य, महिला प्रतिनिधी व पत्रकार आदींचा त्यात समावेश आहे.

सध्याचा कायदा अपुरा
तत्कालीन कोल्हापूर संस्थानमध्ये १९१९ च्या दरम्यान आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह शास्त्रसंमत नसल्याने ते बेकायदा ठरवले जात असत. या विवाहांमुळे महिलांची अधिक ससेहोलपट होत होती. छत्रपती शाहू महाराजांनी असे विवाह कायदेशीर ठरविणारा आणि धर्मातील रुढींना फाटा देऊन, ज्यांना नोंदणी पद्धतीने विवाह करावयाचा असेल, त्यांना तसे कायदेशीर स्वातंत्र देणारा कायदा अस्तित्वात आणला. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष विवाह कायदा कोल्हापूर संस्थांनमध्ये अस्तित्वात आणला. सध्याच्या परिस्थितीत हा विशेष विवाह कायदा परिपूर्ण वाटत नाही. मात्र, त्या कायद्याच्या आधारे नवीन आंतरजातीय विवाह कायदा तयार करावा, अशी सूचना सरकारने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युत्या, आघाड्या मोडीत

$
0
0

टीम मटा, पुणे

राज्यात कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मंगळवारी झालेल्या पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुकीत पारंपरिक युती आणि आघाडी बाजूला सारून स्थानिक राजकारणाची सरशी झाल्याचे पाहायला मिळाले. एकमेकांना रोखण्यासाठी काँग्रेस-शिवसेना, राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र आल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. विशेषतः मराठवाड्यात काही ठिकाणी काँग्रेसने भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेची हातमिळवणी केल्याचे पाहायला मिळाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील नऊपैकी चार पंचायत समित्यांमध्ये भाजप, तर एका ठिकाणी शिवसेनेची सत्ता निश्चित होती. पंचायत समिती सभापती निवडणुकीसाठी संख्याबळ कमी आहे, तेथे शिवसेना-भाजप एकत्र येणार, की नाही, याची चर्चा होती. ‘स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घ्या,’ असा निरोप वरिष्ठांकडून आला आणि त्यानंतर दोन पंचायत समित्यांची समीकरणे एकदम बदलली. औरंगाबाद पंचायत समितीत भाजपचे ७ आणि शिवसेनेचे ३ असे दहा संख्याबळ होते. त्यात दोन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्याने युतीची सत्ता सहजपणे आली असती. आठवडाभरापासून काँग्रेसचे शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघातील ही पंचायत समिती काहीही करून ताब्यात घ्यायची असा चंग काँग्रेसने बांधला होता. अगदी शेवटच्या क्षणी शिवसेना राजी झाली आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेसला यश मिळाले.

परभणीत तर भाजपने काँग्रेसला पाठिंबा दिला. पंचायत समितीत एकूण २० सदस्य असून त्यापैकी काँग्रेसच्या आठ सदस्यांना भाजपच्या दोन सदस्यांनी पाठिंबा दिल्याने या ठिकाणी काँग्रेसच्या लताबाई शिवाजी बेले या सभापती झाल्या, तर भाजपचे गिण्यानदेव दंडवते यांची उपसभापती म्हणून निवड झाली. या ठिकाणी शिवसेनेचे आठ असून त्यांच्या गळाला भाजपचा एक सदस्य लागला होता.

बीड जिल्ह्यामध्ये काकू-नाना विकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि भाजप यांच्या पाठिंब्यावर शिवसंग्राम पक्षाचा उमेदवार सभापती पदावर निवडून आला. तर, गेवराई तालुक्यामध्ये माजी आमदार बदामराव पंडित आणि आमदार अमरसिंह पंडित यांनी हातमिळवणी करत, भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. लातूर जिल्ह्यामध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपचे वर्चस्व कायम राहिले. तर, एकेकाळी बालेकिल्ला असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या हातामध्ये एकाही पंचायत समितीचे पद राहिलेले नाही.

जालना तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेससोबत युती करत आगामी काळात जिल्हा परिषदेच्या राजकारणाचे स्पष्टपणे संकेत दिले आहेत. तर अपेक्षेप्रमाणे भोकरदन, जाफ्राबाद, परतूर आणि मंठा या चार पंचायत समितीत्या भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. बदनापूर शिवसेनेने स्वबळावर जिंकली. अंबड आणि घनसावंगी राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत.

अमरावतीतही काँग्रेसने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली आहे. यातून त्यांनी दहापैकी तीन पंचायत समित्या ताब्यात घेतल्या आहेत. दोन पंचायत समित्यांवर अपक्षांनी बाजी मारली. चांदूर बाजार येथे प्रहार तर अचलपूर पंचायत समितीवर सत्ता स्थापनेत भाजपला अपयश आले. अहमदनगरमधील अकोल्यात राष्ट्रवादीने भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला साथ दिली.

कोकणातील आठपैकी पाच ठिकाणी शिवसेनेने सभापतिपद मिळवले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन ठिकाणी विजय मिळवला. चिपळूणमध्ये राष्ट्रवादीने सभापतिपद मिळवले आणि शिवसेनेचा उपसभापती निवडून आला.

नाशिकमध्ये राष्ट्रवादीची भाजपला साथ

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांसाठी सभापती, उपसभापतींची मंगळवारी निवड करण्यात आली. पंधरापैकी चौदा ठिकाणी बिनविरोध निवड झाली. सात पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकला. राष्ट्रवादीने चार, माकप आणि भाजपने प्रत्येकी दोन समित्यांवर सत्ता मिळवली. चांदवडमध्ये भाजपला राष्ट्रवादीने साथ दिली, तर देवळ्यात राष्ट्रवादीला शिवसेनेने सत्तेसाठी पाठिंबा दिला. मालेगावात अपक्ष आणि राष्ट्रवादीने भाजपला साथ दिल्याने शिवसेनेची चौदा वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी काळजे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे नितीन काळजे यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. याच पक्षाच्या शैलजा मोरे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला.

महापौरपदासाठी भाजपचे काळजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे श्याम लांडे यांचे, तर उपमहापौरपदासाठी मोरे आणि राष्ट्रवादीच्या निकिता कदम यांचे अर्ज होते. त्यामुळे पिठासीन अधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत महापौर निवडीच्या प्रक्रियेला सकाळी ११ वाजता प्रारंभ झाला. तत्पूर्वी भाजपच्या नगरसेवकांनी सकाळी चिंचवड येथे महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर केशरी रंगाचे फेटे घालून भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला. महिला नगरसेविकांनी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या आणि फेटे घातले होते. आमदार महेश लांडगे आणि महापौरपदाचे उमेदवार काळजे यांनी बैलगाडीमध्ये बसून पालिकेत प्रवेश केला.

सभागृहात महापौर निवडीच्या प्रक्रियेत सर्वप्रथम उमेदवार अर्ज वैधता तपासण्यात आली. महापौरपदासाठी दोनच उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. माघारीच्या मुदतीत राष्ट्रवादीचे लांडे यांनी माघार घेतली. तर, उपमहापौरपदासाठी मोरे यांच्याविरोधातील कदम यांनी माघार घेतली. त्यामुळे काळजे आणि मोरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या दोघांचेही सभागृहात बाके वाजवून स्वागत करण्यात आले. मावळत्या महापौर शकुंतला धराडे यांनी महापौरपदाची सूत्रे काळजे यांच्याकडे सुपूर्द केली.

महापौर निवडीनंतर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते योगेश बहल, मंगला कदम, सीमा सावळे, अश्विनी चिंचवडे, आशा शेंडगे, माई ढोरे, नीता पाडाळे, प्रियांका बारसे यांची अभिनंदनपर भाषणे झाली. शहरात ऐतिहासिक परिवर्तन घडल्यामुळे भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान मिळाल्याबद्दल काळजे यांनी उपस्थितांची आभार मानले.

पुण्याच्या महापौरांची आज निवड

पुणे शहराच्या महापौर-उपमहापौर पदासाठी आज, बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारणसभेत निवडणूक होणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली होती. त्याप्रमाणेच पुण्यातही राष्ट्रवादी भाजपला ‘बाय’ देणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, पुण्यात निवडणूक लढविणार असल्याचे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी आज अपेक्षेप्रमाणे भाजपच्या मुक्ता टिळक विराजमान झाल्या असून पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महानगरपालिकेवर 'कमळ' फुललं आहे. मुक्ता टिळक या लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं 'न भुतो' कामगिरी करून स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. भाजपचे ९८ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे आजच्या महापौरपदाची निवडणूक ही केवळ औपचारिकताच होती. मुक्ता टिळक यांची उमेदवारी जाहीर झाली, तेव्हाच त्यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली होती. त्यावर आज महापालिका सभागृहात शिक्कामोर्तब झालं.

भाजपच्या सर्व नगरसेवकांनी महापालिकेत उपस्थित राहून मुक्ता टिळक यांना आपलं मत दिल्यानं ९८ मतांसह त्यांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा लोणकर यांना ५२ मतं मिळाली. शिवसेनेच्या उमेदवार संगीता ठोसर यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि या निवडणुकीत सेनेचे नगरसेवक तटस्थ राहिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या निवडणुकीवर बहिष्कारच टाकला.

मुक्ता टिळक यांनी विमलाबाई गरवारे प्रशाला आणि फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आहे. मानसशास्त्र विषयातून एमए झालेल्या मुक्ताताईंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातून जर्मनचे शिक्षण घेतले आहे. एवढेच नाही तर, मार्केटिंग विषयातून त्यांनी एमबीएही पूर्ण केले आहे. यासह, पत्रकारितेचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला आहे. त्यामुळे, उच्चविद्याविभूषित महिलेला पुण्याच्या महापौरपदी संधी मिळाल्याने शहराचा विकासही वेगाने होईल, अशी पुणेकरांची अपेक्षा आहे.

मुक्ता टिळक यांच्याबद्दल...

>> मुक्ता टिळक या जयंतराव टिळकांचा पुतण्या शैलेश टिळक यांची पत्नी आहेत.

>> सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक १५ मधून त्या निवडून आल्यात.

>> मुक्ता टिळक चौथ्यांदा नगरसेवक म्हणून विजयी झाल्या असून यंदा पुण्यातून सर्वाधिक मतांनी निवडून आल्या आहेत.

>> याआधी पुणे महापालिकेत भाजपच्या गटनेत्या म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. तसंच, स्थायी समितीच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपकडून कायदेभंग?

$
0
0

महापौर-उपमहापौर निवडणुकीत ध्वनी-वायू प्रदूषण

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
महापौर आणि उपमहापौर निवडीच्या दिवशी मंगळवारी (१४ मार्च) फटाके आणि ढोलताशा वाजवून महापालिका मुख्य इमारतीत जल्लोष करण्यात आला. सरकारी कार्यायलयाच्या आवारात ध्वनी आणि वायू प्रदूषण होईल असे कृत्य करण्यास बंदी असताना भाजपकडून पहिल्याच दिवशी कायद्याचा भंग करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला करून भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता आणली. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडीच्या दिवशी जल्लोष होणार हे सर्वज्ञात होते. मोठ्या उत्साहात पालकमंत्री गिरीष बापट आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी महापालिकेत प्रवेश केला. सुमारे दोन तास ढोल-ताशा वाजवत महापालिकेची संपूर्ण इमारत आणि परिसर दणाणून सोडण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात फटाकांची आतषबाजी देखील करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेतून मिरवणूक देखील काढण्यात आली होती. या मिरवणुकीत खासदार-आमदार देखील सहभागी झाले होते.

महापौर आणि उपमहौरांच्या निवडीच्या वेळेस महापालिका इमारतीत फटाके फोडणे आणि ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार असून याद्वारे नियमंभग होऊ शकतो, अशी कल्पना शहरातील ‘अपना वतन’ या संस्थेने आयुक्त दिनेश वाघमारे यांना दिली होती. परंतु, आयुक्तांसह प्रशासनाने याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप ‘अपना वतन’ने केला आहे. तर ध्वनी आणि वायू प्रदूषण करणाऱ्यांबाबत महापालिका प्रशासनाकडून दुसऱ्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडे कोणतीही तक्रार देण्यात आली नव्हती.

पोलिसांची भूमिका काय?

सहायक पोलिस आयुक्त/उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची मुंबई हायकोर्टने ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी नियुक्ती केली आहे. महापालिका प्रशासनाने मंगळवारी झालेल्या दोन्ही प्रकारच्या प्रदूषणाबाबत तक्रार दिलेली नाही. त्यामुळे हायकोर्टाने नियुक्त केलेल्या सहायक पोलिस आयुक्तांकडून आता याबाबत काय भूमिका घेतली जाते हे कारवाईनंतरच स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डिपेक्स’ प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्‍घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्थेतर्फे डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विशेष सहकार्याने पिंपरीतील एच. ए. मैदानावर १७ ते २० मार्च दरम्यान राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान सृजनशीलतेचे व नवनिर्मितीचे दर्शन घडणार आहे. यंदा प्रदर्शनाचे २८वे वर्ष असून पिंपरी-चिंचवडमध्ये हे प्रदर्शन प्रथमच होत आहे.

‘अभाविप’चे महाराष्ट्र प्रदेश मंत्री राम सातपुते, ‘डिपेक्स’ स्वागत समितीचे सचिव दीपक पांचाळ व ‘डिपेक्स’च्या निमंत्रक प्रा. सरिता बलशेटवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

एच. ए. मैदानावरील ‘डिपेक्स’च्या प्रांगणाचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामनगर असे नामकरण करण्यात आले आहे. डिपेक्सचे उद्‍घाटन उद्या (शुक्रवारी) संध्याकाळी सहा वाजता संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) संशोधन व विकास अस्थापनेचे संचालक डॉ. व्ही. व्ही. परळीकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ २० मार्चला (सोमवारी) संध्याकाळी सहा वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘अभाविप’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष छगनभाई पटेल उपस्थित राहणार आहेत.

यंदा ‘डिपेक्स’साठी सुमारे आठशे प्रकल्प आले होते. त्यापैकी निवडक २७० प्रकल्प प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनात परिसंवादांचे आयोजनही करण्यात आले आहे. शनिवारी (१८ मार्च) सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत ‘लव्ह भारत, सर्व्ह भारत’ या विषयावरील परिसंवाद होईल. दुपारी तीन ते साडेचार दरम्यान ‘प्रथम’ या भारतीय बनावटीच्या संशोधन उपग्रहाविषयी परिसंवाद होणार असून त्यात मुंबई आयआयटीची प्रथम टीम सहभागी होईल.

रविवारी (१९ मार्च) सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत ‘स्टार्ट अप इंडिया’ या विषयावरील परिसंवादात नवी दिल्ली येथील स्टुडंट स्टार्ट अप समितीचे अध्यक्ष संजय इनामदार मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी तीन ते साडेचार दरम्यान ‘संरक्षण क्षेत्रातील संधी’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यास डीआरडीओचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशीनाथ देवधर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच २० मार्चला (सोमवार) इन्स्टिट्युशनल बिल्डिंग फॉर नॅशनल रिसर्जन्स या विषयावरील परिसंवादात मुंबई आयआयटीचे प्रा. आशिष पांडे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बजेटपूर्वी विश्वासात घ्या’

$
0
0

महापौरांची पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बजेट तयार करण्यापूर्वीच त्यात महत्त्वाच्या कामांचा प्राधान्याने समावेश करा, अशी सूचना नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांना केली.

महापौर कक्षात पाणीपुरवठा, स्थापत्य, ड्रेनेज, विद्युत विषयक कामकाजाबाबत अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. पक्षनेते एकनाथ पवार, शहर अभियंता अंबादास चव्हाण, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर आणि संबिधित विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. सुमारे दीड तासांच्या बैठकीत महापौरांनी नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रशासनाचे धोरण याविषयी सविस्तर चर्चा केली. आवश्यक सूचना केल्या.

पुढील वर्षासाठी करण्यात आलेली अर्थसंकल्पीय तरतूद, शहराचा विकास, त्याबरोबर ग्रामीण भागाचाही विकास या मुद्यांवर जास्तीत जास्त भर द्यावा, असे काळजे यांनी स्पष्ट केले. बैठकीत विकासकामे ग्रामीण भागापर्यंत आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत. आपापल्या पदाच्या माध्यमांतून नागरी हिताची कामे प्राधान्याने करण्याकडे लक्ष द्यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

बजेटमधील तरतुदीप्रमाणे निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करून दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्याबाबतही काळजे यांनी भर दिला. शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला असल्यामुळे त्याअंतर्गत महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

विभागवार बैठका घेणार

काळजे म्हणाले, ‘पहिलीच बैठक असल्यामुळे अधिकाऱ्यांची फारशी तयारी नव्हती. परंतु, शहरात समान पाणीपुरवठ्याबाबत कठोर सूचना देण्यात आल्या. महापालिकेचे बजेट लवकरच सादर होणार आहे. त्या वेळी सभेमध्ये सदस्यांच्या उपसूचना घेण्यापेक्षा अगोदरच बैठक घेऊन महत्त्वाच्या कामांचा समावेश करावा. यापुढील काळात विभागवार बैठका आयोजित करून कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. नागरिकांच्यादृष्टीने आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत, याबाबत आग्रह धरला जाणार आहे. त्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणार आहे. नागरिकांनी विश्वासाने भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता दिली आहे. या सत्तेचा वापर जनतेच्या हितासाठीच व्हायला हवा, याचीही आठवण करून देण्यात आली.’

पालिकेचे वाहन नको : पवार

सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पदभार स्वीकारताच महापालिकेचे वाहन वापरणार नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘माझ्याकडे स्वतःची गाडी आहे. त्यामुळे मी माझ्या खासगी गाडीचा वापर करणार आहे. महापालिकेच्या खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने मी निर्णय घेतला आहे. या माध्यमातून भारतीय जनता पक्षाकडून सकारात्मक संदेश जनतेपर्यंत जाणार आहे. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. या सकारात्मक निर्णयाचे अन्य पदाधिकारी अनुकरण करतील, अशी खात्री वाटते.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेच्या खूनप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड
दौंड तालुक्यातील पारगाव येथे महिलेला जाळून तिचा खून करण्यात आला आहे. या खूनप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात पतीसह चौघा जणांविरोधात संगनमत करून जाळून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलावती बबन बोत्रे (वय ५३, रा. पारगाव, ता. दौंड) असे जाळून खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना (२ मार्च) रोजी सकाळी घडली आहे. या खूनप्रकरणी पती बबन रामचंद्र बोत्रे, अनिल परशुराम बोत्रे, रवींद्र परशुराम बोत्रे (पुतणे), कांताबाई परशुराम बोत्रे (जाऊ, सर्व रा. पारगाव, ता. दौंड) या चौघांविरोधात कलावती यांना संगनमत करून जाळून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेचा भाऊ राजेंद्र दिनकर कुंजीर (वय ४१,रा. वाघापूर, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यवत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चारही अरोपींना अटक करण्यात केली आहे. खुनामागील कारण समजू शकले नसून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संततीप्राप्तीच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक

$
0
0

जुन्नर : संततीप्राप्तीसाठीच्या औषधोपचाराचे आमिष दाखवून एका महिलेची पाच लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी जुन्नरमधील प्रशांत गवळी या डॉक्टरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वाघाच्या बनावट कातडे विक्रीच्या आरोपावरून देखील या डॉक्टरवर काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. गवळी याच्याकडे संततीप्राप्तीसाठीच्या उपचारासाठी फिर्यादी महिला डिसेंबर २०१३ मध्ये गेली होती. त्या वेळी आयुर्वेदिक औषधे देतो असे सांगून वेगवेगळ्या रकमेचे
धनादेश त्यांच्याकडून घेतले. एकंदरीत पाच लाख ४१ हजार रुपये त्याने यासाठी घेतले. परंतु फिर्यादीने संततीसाठी वैद्यकीय तपासणी २०१४ मध्ये केल्यानंतर तपासणी अहवाल चुकीचा आल्याचे ध्यानात येताच, आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने संबंधित महिलेने फिर्याद दिली. गवळीकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचा आरोपदेखील फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्याचे फौजदार बुद्धभूषण गायकवाड तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ कलाकारांचा मानधनाचा प्रश्न मार्गी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
साहित्य, नाट्य, नृत्य, संगीत आणि लोककलांमधील ज्येष्ठ कलाकारांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मानधनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जिल्हा स्तरावरील मानधन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष विक्रम गोखले यांनी २०१४ व २०१५ या वर्षांमधील प्रलंबित अर्जांच्या मानधन वितरणाला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या मानधनाच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या निर्देशानुसार राज्याच्या सामाजिक कल्याण विभागातर्फे ज्येष्ठ कलाकारांना मानधन देण्यात येते. राज्याच्या प्रत्येक जिल्हा परिषदांमार्फत कलाकारांची निवड करण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुणे जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली मानधन समितीच्या अनेक बैठका गेल्या वर्षभरात पार पडल्या. परंतु समितीतील काही सदस्यांनी मानधनासाठी कलाकारांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने मानधनाची प्रक्रिया रखडली होती. आता मात्र सर्व सदस्यांचे मत विचारात घेऊन सामंजस्याने मानधनाचा प्रश्न सोडवण्यात आला असल्याचे, मानधन समितीतील सदस्यांमार्फत सांगण्यात
आले आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये मिळून जिल्हा परिषदेकडे ७३३ कलाकारांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी छाननी करण्यात आलेले तीनशेहून अधिक अर्ज नुकत्याच झालेल्या बैठकीत विक्रम गोखले व इतर सदस्यांच्या समोर ठेवण्यात आले. त्यापैकी पात्र अर्जांवर त्वरित कारवाई करून संबंधित कलावंतांना मानधन पोहोचेल, अशी व्यवस्था करण्याचे ठरवण्यात आले आहे. मानधन देताना वयोमानाचा मुद्दा सर्वांत आधी विचारात घेतला जाणार असून वयाने ज्येष्ठ अशा कलावंतांना प्राधान्याने मानधनासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर सध्याची अर्थिक परिस्थिती पडताळून उर्वरित कलाकारांना मानधन देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. कलाकारांच्या कार्यानुसार त्यांचे अ, ब आणि क या वर्गामध्ये विभाजन करण्यात आले असून, त्यांना अनुक्रमे वर्षाला १६८००, १४४०० आणि १२००० असे मानधन देण्यात येणार आहे.
कलाकारांच्या मानधनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून पात्र अर्जांची सर्व छाननी पूर्ण झाली आहे. लवकरच मानधनासाठी पात्र असलेल्या अर्जांवर मानधन समितीचे अध्यक्ष विक्रम गोखले यांची स्वाक्षरी घेण्यात येणार असून त्या नंतर संबंधित कलाकारांना मानधन सुरू करण्याची व्यवस्था करणार असल्याची माहिती, मानधन समितीचे सचिव व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी दिली आहे. मानधनासंदर्भातील गोखले यांच्या या निर्णयामुळे अखेर तीन वर्षांपासून रखडलेला मानधनाचा मुद्दा मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. लवकरच कलाकारांना मानधन देण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होईल, अशी आशा वृद्ध कलावंतांकडून केली जात आहे.

इतके दिवस मानधन समितीच्या बैठकीमध्ये मानधनासाठी कलाकारांच्या निवडीनरून उखाळ्या-पाखाळ्या काढणे सुरू होते. समितीतील वाद कुठेतरी थांबवणे गरजेचे होते. अखेर त्याप्रमाणे समितीतील सर्व सदस्यांचे मत विचारात घेऊन लवकरात लवकर वृद्ध कलावंतांना प्राधान्याने मानधन देण्यास सुरूवात करावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. मानधनाची रक्कम संबंधित कलाकाराकडे तातडीने पोहोचेल, अशी व्यवस्था करण्यासाठी जिल्हा परिषदेला सांगण्यात आले आहे.
- विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते व मानधन समितीचे अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेफ्टी एक्सलन्स’पुरस्कारांचे वितरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
औद्योगिकीकरणामुळे वाढत चाललेली असुरक्षितता आणि पर्यावरणाचे असंतुलन याबाबत जनजागृती करणाऱ्या विविध कंपन्यांमधील अधिकाऱ्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी ‘सेफ्टी एक्सलन्स पुरस्कार’ समारंभ नुकताच पार पडला. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (एनआयपीएम) आणि आरुष फायर सिस्टीम यांनी या समारंभाचे आयोजन केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘एनआयपीएम’च्या पुणे विभागाचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी आणि सुरक्षातज्ज्ञ राजेंद्र हेंद्रे उपस्थित होते.
युवराज तोरावणे, रूपेश कुमार एन. बोरावकर, परिक्षित पोतदार, मोहन पाटील, वैभव बागूल, यू. डी. कुलकर्णी, दत्तात्रय पाटील, सिद्धीलिंगप्पा या अधिकाऱ्यांनी सुरक्षाविषयक क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सेफ्टी एक्सलन्स पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. कुलकर्णी आणि हेंद्रे यांनी मार्गदर्शन केले. या समारंभाला टाइम्स फाउंडेशनचा पाठिंबा होता. फाउंडेशनचे टिकमसिंह शेखावत, अर्जुन जाधव, रूपेश कदम, डॉ. आमोद मरकळे आणि कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. योगेश रांगणेकर आणि दिलिका झरकर यांनी
सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images