Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डॉ. नितीन उनकुले यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
योगाचे प्रशिक्षक, ध्यानसाधक डॉ. नितीन उनकुले (वय ६०) यांची शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालविली. शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. शनिवारी त्यांचा वाढदिवस होता. त्यांनी साठीत पदार्पण केले होते.
सुमारे तीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी योग, ध्यानसाधनेचा अभ्यास केला. त्यावर सातत्याने ते चिंतन करीत होते. योगाचे ज्ञान स्वतःजवळ न ठेवता त्यांनी समाजातील घटकांना उपयोग करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. योगा, ध्यानसाधनेमुळे विविध आजारांवर मात करता येईल काय, यावर ते प्रयोग करीत राहिले. हृदयविकारांपासून ते मेंदूविकारापर्यंतच्या अनेक पेशंटना जीवदान देण्यात मोलाची भूमिका त्यांनी बजावली. मानसिक आजार, ताणतणाव, पोटाचे विकार, मानेचे विकार, वाढता लठ्ठपणा कमी करणे, श्वसनाचे आजार यासारख्या आजारावर त्यांनी योगा थेरपीचे मार्गदर्शन केले होते.
लोणावळा येथील कैवल्यधाम योगा संस्थेतून डॉ. उनकुले यांनी योगाचे धडे घेतले होते. तसेच फ्रान्स विद्यापीठातून त्यांनी पीएच. डी. देखील संपादन केली होती. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ते योगाचे धडे देत होते. शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीत त्यांनी कैवल्य योग संस्था सुरू केली होती. ‘बदलती जीवनशैली’ या विषयावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांच्यासह गेल्या २२ वर्षांपासून अनेक ठिकाणी त्यांनी योगाचे धडे दिले. योगासंदर्भात त्यांच्या नावावर १४ पेक्षा अधिक पुस्तके आहेत. सिम्बायोसिस सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे ते सदस्य होते. तसेच सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे ते विश्वस्त होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सीएम ते पीएम’च्या घरापर्यंत आसूड यात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतमालाला हमीभाव मिळावा यासारख्या विविध मागण्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घरापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगरपर्यंत शेतकऱ्यांची आसूड यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेला ११ एप्रिलपासून नागपूरपासून प्रारंभ होणार आहे.
आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्या वेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, प्रमोद कुदळे आदी उपस्थित होते. ‘सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू केला जाईल, शेतकऱ्यांना हमी भाव देण्यात येईल, अपंगाच्या समस्या सोडविल्या जातील, यासारखी विविध आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. केंद्रापासून राज्यात सत्ता आल्यानंतरही त्यांनी या आश्वासनांची पूर्तता केली नाही. या करिता शेतकऱ्यांची आसूड यात्रा काढण्यात येत आहे. नागपूरला ही यात्रा सुरू होणार असून त्यात ५० ते ६० हजार शेतकरी सहभागी होतील. नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, औरंगाबाद, सूरत, वडनगरपर्यंत ही यात्रा काढली जाईल. सुमारे नऊ दिवसांच्या या यात्रेची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर येथील निवासस्थानासमोर केली जाणार आहे,’ असे आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
कापूस, तूर, कांदा यासारख्या शेतमालाला दर नाही. केंद्र, राज्य सरकार आणि बाजार भाव यांच्यामध्ये तफावत आहे. केंद्राने निर्यात बंदी लागू केली आहे. कमी दराने शेतमाल खरेदी करण्यात येत असून जादा दराने तोच शेतमाल आयात केला जात आहे. शेतमालावरील निर्यात बंदी उठविण्यात यावी, अंत्योदय योजनेत अपंगासह अन्य घटकांचा समावेश करावा, माजी सैनिकांच्या समस्या यासारख्या समस्यांसाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. आत्महत्या केलेल्या साडेतीन लाख शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माझी कविता ओठी हाच सन्मान’

$
0
0

यशवंत-वेणू पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
आजवर अनेक वेळा संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी मला विचारणा झाली. परंतु अध्यक्षाचे कौतुक हे त्या भाषणापुरतेच होते. त्याहून अधिक कौतुक मला माझ्या कवितांनी मिळवून दिले. माझ्या कविता अगदी देश परदेशातील मराठी भाषिकांच्या ओठी आहेत, हाच मोठा सन्मान असल्याचे समाधान ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी यशवंत- वेणू पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल होते.
कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार श्री शिवछत्रपती शिवाजीराजे प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र जाधव यांना; तर यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्कार बांधकाम उद्योजक सुदाम भोरे, यशवंतराव चव्हाण ग्रामभूषण पुरस्कार आदर्श सरपंच शशिकांत मोरे यांना प्रदान करण्यात आला.
या वेळी महानोर म्हणाले, ‘यशवंतरावांनी माणसं जोडली. माझ्यासारख्या साध्या शेती करणाऱ्या कवीला त्यांनी जवळ केलं. कोणत्याही क्षेत्रात काम करताना माणसातला माणूस जिवंत असावा, हा आदर्श मला यशवंतरावांकडून मिळाला.’ यशवंतरावांसोबतच्या आठवणी त्यांनी उपस्थितांना सांगितल्या.
जब्बार पटेल म्हणाले, ‘कवीचा पहिला वाचक त्याची पत्नी असते. त्यामुळे सुलोचनाताईंना महानोरांच्या कवितेचं श्रेय द्यायला पाहिजे. गदिमा आणि महानोरांची चित्रपटातील गाणी या खऱ्या कविता आहेत. त्याला साहित्यमूल्य आहे त्यामुळे त्या आजही आवडीने ऐकल्या जातात.’ त्यांनी चित्रपटाच्या वेळी महानोरांकडून लिहून घेतलेल्या कवितांच्या आठवणी सांगितल्या.
तसेच कवी दुर्गेश सोनार, रवी पाईक, भरत दौंडकर, तुकाराम धांडे, संगीता झिंजुरके यांनी आपल्या कविता सादर केल्या. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले आणि सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेद, होमिओपॅथीचे पुण्यात संशोधन केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
होमिओपॅथी, आयुर्वेद तसेच अभियांत्रिकीच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला असून पुण्यात संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणारआहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हे संशोधन केंद्र सुरू होणार असून पेशंटना उपयोगी ठरणारी होमिओपॅथीची औषधे विकसित करण्यावर यात भर दिला जाणार आहे.
‘अभियांत्रिकीचे वर्कशॉप हे सांगली येथे असणार आहे. तर होमिओपॅथी, आयुर्वेदाचे केंद्र हे पुण्यात धोंडूमामा साठे होमिओपॅथी कॉलेजमध्ये असेल. या दोन्ही क्षेत्रातील तज्ज्ञांना संशोधन करता यावे. तसेच संशोधनाची वृत्ती वाढीस लागावी, या हेतूने हे संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ५० लाखांचा निधी उभारण्यात आला आहे. होमिओपॅथी, अॅलोपॅथी, आयुर्वेदाच्या संशोधनातून पेशंटना स्वस्त दरात उपचार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,’ अशी माहिती सोसायटीचे सचिव श्रीराम कानिटकर यांनी दिली. या वेळी डॉ. प्रदीप सेठिया, डॉ. संतोष काकडे, डॉ. शंतनू कानडे आदी उपस्थित होते. सोसायटीच्या एमबीए आणि पीजीडीएचएम अभ्यासक्रमाच्या वतीने येत्या ८ एप्रिलला ‘करिअर इन हेल्थकेअर मॅनेजमेन्ट’वर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यात संस्थेच्या वतीने पुण्यात टेक्नॉलॉजी एक्स्प्लोरेटरी अँड सायन्स पार्क, विधी महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. त्या संदर्भात प्रशासकीय विभाग, हॉस्पिटल क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले तज्ज्ञ या परिसंवादात मार्गदर्शन करणार आहेत, असे डॉ. संतोष काकडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायफ्रेन रोपला ‘ब्रेक’ ?

$
0
0

संपूर्ण मार्गावर ‘दुभाजक’ बसविण्याची प्रक्रिया सुरू

Kuleddp.Jadhav@timesgroup.com

पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि अपघात रोखण्यासाठी बसविण्यात येणाऱ्या ‘बायफ्रेन रोप’ला राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ब्रेक लावण्यात आल्याचे समजते. गेल्या वर्षी या संपूर्ण मार्गावर ‘बायफ्रेन रोप’ बसविण्यासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या महामंडळाने आता ‘थाय बीम’ (जाड पत्र्याचा दुभाजक) बसविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंबंधीचे देखील टेंडर प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे ‘बायफ्रेन रोप’ बसविण्याचा निर्णय मागे घेतला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर डिसेंबर २०१२ मध्ये अवजड वाहनाने दुभाजक ओलांडून झालेल्या अपघातात अभिनेते अक्षय पेंडसे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे बंधू तन्मय पेंडसे यांनी एक्स्प्रेस-वेवर सुरक्षेच्या मुद्द्यांचा पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन एप्रिल २०१५ मध्ये राज्य रस्ते विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स्प्रेस वेवर ‘बायफ्रेन रोप’ लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जून २०१६ मध्ये पनवेल येथे झालेला भीषण अपघात आणि बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या गाडीला झालेल्या अपघातानंतर ‘बायफ्रेन रोप’ बसविण्याची टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी चार कंपन्यांनी टेंडर सादर केले होते.
एक्स्प्रेस वेवर दुभाजक तोडून समोरच्या लेनमध्ये वाहन जाण्याचे किंवा दुभाजकावर आदळून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणांची पाहणी करून एक्स्प्रेस-वेवर २५ किलोमीटर अंतरावर बायफ्रेन रोप बसविण्याचे ठरले होते. हा रोप धोकादायक वळण, तीव्र उतार व चढ अशा अपघातप्रवण क्षेत्रामध्ये बसविला जाणार होता. त्यानुसार काही भागामध्ये हा रोप बसविण्यातही आला. त्यानंतर झालेल्या अपघातामध्ये काही ठिकाणचा रोप तुटला होता. हा रोप बसविण्याचा खर्च व त्याच्या देखभाली खर्च आवाक्याबाहेर असल्याने महामंडळाने ‘बायफ्रेन रोप’ऐवजी ‘थाय बीम’ बसविण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

वर्षभरात काम उरकणार
राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या महिन्यात रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी ‘थाय बीम’ आणि रस्त्याच्या कडेला ‘डब्ल्यू’ आकारातील ‘बीम’ बसविण्याबाबतचे टेंडर प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये एक्स्प्रेस वेच्या संपूर्ण ९६ किमी अंतरावर ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार हे ‘बीम’ बसविण्याचा उल्लेख आहे. त्यासाठी अंदाजे ६७ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित असून ,१२ महिन्यात ते काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचीही प्रक्रिया आता सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडिरेकनर दरांमध्येही पारदर्शकता आणावी

$
0
0

चर्चासत्रादरम्यान तज्ज्ञांची प्रतिक्रिया

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पारदर्शक कारभाराचा आग्रह धरणाऱ्या राज्य सरकारने आता रेडिरेकनरचे (वार्षिक बाजार मूल्य) दर ठरविण्याच्या पद्धतीत पारदर्शकता आणावी. रेडिरेकनरचे नवीन दर लागू करण्यापूर्वी त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवाव्या; तसेच यंदा रेडिरेकनरचे दर स्थिर ठेवावेत, अशा सूचना रेडिरेकनरविषयक चर्चासत्रात करण्यात आल्या.
अवधूत लॉ फाउंडेशनच्या वतीने या चचर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राला प्राप्तिकर खात्याच्या पुणे विभागाचे आयुक्त संदीप गर्ग, नगररचना मूल्यांकन विभागाचे सहायक संचालक विजय शेंडे, ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र पवार, ‘सिस्कॉम’ या ग्राहक संघटनेचे राजेंद्र धारणकर, अधिवक्ता परिषदेचे प्रमोद बेंद्रे, फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. चंदन फरताळे, मार्गदर्शक श्रीकांत जोशी आदी उपस्थित होते.
कटारिया म्हणाले, ‘रेडिरेकनरच्या दरात दर वर्षी वाढ करण्यात येते; पण त्यामध्ये पारदर्शकता नसते. राज्य सरकारने याचा विचार करून पारदर्शकता आणायची असल्यास रेडिरेकनर ठरविण्याच्या प्रक्रियेत अधिकाऱ्यांबरोबरच अभ्यासकांचाही समावेश करावा.’
‘सरकारला महसूल मिळविण्याचा हा एकच विभाग नाही. लोकांना स्वस्त घरे मिळावीत, हे सरकारकडून सांगण्यात येते; पण सरकारकडूनच दरवाढ केली जाते,’ असे पवार म्हणाले.
बेंद्रे म्हणाले, ‘ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांचा विचार करून सुवर्णमध्य काढला गेला पाहिजे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करून अभ्यासपूर्ण पद्धतीने रेडिरेकनरचे दर ठरले पाहिजेत. यंदाची स्थिती पाहता दर स्थिर ठेवले पाहिजेत.’
धारणकर म्हणाले, ‘एखाद्या निर्णयाचा परिणाम नागरिकांवर होणार असल्यास त्याची पूर्वकल्पना नागरिकांना दिली गेली पाहिजे. रेडिरेकनरच्या दरांची पूर्वकल्पना नागरिकांना देऊन सूचना घेतल्या पाहिजेत.’
‘रेडिरेकनरमुळे घरांच्या किमती वाढत असल्याचा गैरसमज पसविण्यात येत आहे. बाजारातील मंदी ही रेडिरेकनरमुळे नाही, तर मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यामुळे निर्माण झाली आहे. बांधकाम व्यावसायिकांनी दर कमी केल्यास नागरिकांना घरे मिळू शकतील,’ असे शेंडे यांनी सांगितले.

रेडिरेकनरचे दर हे पारदर्शक व शास्त्रीय पद्धतीनेच ठरविले जातात. तांत्रिक माहिती असलेले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून; तसेच वर्षभरात झालेल्या व्यवहारांवरून दर ठरविले जातात.
विजय शेंडे, सहायक संचालक, नगररचना मूल्यांकन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाराजांचे पुनर्वसन शिक्षण मंडळावर

$
0
0

भाजपच्या ‘पारदर्शी’ कारभाराकडे पुणेकरांचे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेच्या शिक्षणमंडळाचा कारभार कायम ठेवण्याचा घाट राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून घातला जात आहे. महापालिकेच्या निवडणुकीत बहुमत मिळविणारे आणि आपल्या ‘पारदर्शी’ कारभाराचा गाजावाजा करणारे राज्य सरकार शिक्षण मंडळाच्या बरखास्तीचा अध्यादेश रद्द करून पुन्हा मंडळाचा कारभार हाकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या शिक्षण मंडळावर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची निवड केली जावी, असा सर्वसाधारण संकेत आहे. मात्र, संकेत डावलून राजकीय नेत्यांच्या मर्जीतील नेत्यांचीच निवड गेली अनेक वर्षे शिक्षणमंडळावर केली जाते. निवडणुकीत पराभूत झालेला नगरसेवक तसेच तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्याची नाराजी दूर करण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून पुनर्वसन केले जात होते. शिक्षणमंडळाच्या माध्यमातून केली जाणारी शालेय साहित्य खरेदी, गणवेश, शिक्षक भरती, सहल यामध्ये अनेक घोटाळे झाल्याचे समोर आले होते. शिक्षण मंडळाला दिलेल्या स्वायत्ततेचा गैरवापर होत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने विधिमंडळात ठराव करून केंद्र सरकारच्या शिक्षण हक्क कायद्याची (आरटीई) अंमलबजावणी करुन राज्यातील सर्व महापालिकांमधील शिक्षण मंडळे बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता.
राज्य सरकारने १ जुलै २०१३ च्या राजपत्रातून सर्व नगरपरिषदा आणि महापालिकांची शिक्षण मंडळे बरखास्त केल्याचे आदेश जाहीर केले आहेत. सर्व शिक्षण मंडळाचे पालिकेत विलीनीकरण होऊन पालिकेतील इतर समित्यांप्रमाणे एक समिती (शिक्षण समिती) म्हणून कामकाज करेल, असे जाहीर केले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेच्या शिक्षणमंडळाच्या सदस्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची‌ भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. शहरातील आमदारांनी यामध्ये पुढाकार घेऊन सदस्यांबरोबर तावडे यांची भेट घेतल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या मंडळाच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होइपर्यंत शिक्षणमंडळाचा कारभार सुरु राहील, त्यानंतर शिक्षणमंडळ पालिकेत विलीन होईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार यंदाच्या वर्षीचा शिक्षणमंडळाचा स्वतंत्र अर्थसंकल्प तयार न करता पालिकेच्या अर्थसंकल्पात समावेश करण्याचा निर्णय पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतला आहे.

भाजपकडून तयारी सुरू
महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक म्हणजे ९८ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे शिक्षणमंडळावर देखील भाजपचे वर्चस्व राहणार असल्याचे लक्षात येताच शिक्षणमंडळे बरखास्त न करता पक्षाचे नाराज पदाधिकारी तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची वर्णी मंडळावर लावण्याची तयारी भाजपने आरंभली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भलिंग निदानाचे मोठे रॅकेट कार्यरत?

$
0
0

पोलिसांचा संशय; डॉक्टरला पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, दौंड

दौंड तालुक्यात गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला झालेल्या अटकेमुळे पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांत गर्भलिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बिरोबाची वाडी येथे फिरते गर्भलिंगनिदान केंद्र चालवणाऱ्या डॉक्टरसह दोघांना १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

म्हैसाळ येथील कन्याकांड उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. त्या पाठोपाठ यवतमध्ये फिरते गर्भलिंगनिदान केंद्र चालविणाऱ्या टोळीवर यवत पोलिसांनी छापा घातला आणि लिंगनिदान सुरू असतानाच डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे, संतोष विजय औतारी, हेमंत बबन आटोळे यांना बिरोबाची वाडी येथे तीन महिलांचे सोनोग्राफी मशिनच्या साह्याने गर्भलिंगनिदान करताना ताब्यात घेतले होते, तर सोमनाथ होले फरार झाला आहे.

या गुन्ह्यातील संबंधितांना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणाची व्याप्ती दोन-तीन जिल्ह्यांत असल्याने या टोळीला कोण कोण मदत करते, कोण साथीदार व एजंट आहेत, सोनोग्राफी यंत्र कुठून आणले; तसेच गर्भलिंगनिदान झाल्यानंतर गर्भपात कुठे आणि कसा होत होता, याचा तपास करण्यासाठी यवत पोलिसांच्या वतीने पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.
पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले, की दोन-तीन पातळ्यांवर तपास सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच संपूर्ण माहिती देता येणार नाही. या टोळीचे फिरते गर्भलिंगनिदान केंद्र होते. मध्यस्थांमार्फत ग्राहक शोधून खेडोपाडी अज्ञात ठिकाणी मोठी रक्कम स्वीकारून हा गोरखधंदा चालत असे.

इतरही शहरांत पाळेमुळे

दौंडसह अकलूज, बारामती, फलटण, म्हसवड या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्भलिंगनिदानाचे हे रॅकेट काम करीत होते. त्यांचे एजंटही विविध भागांमध्ये काम करीत होते. त्यांच्यामार्फत या टोळीकडे दूरदूरच्या परिसरातून दाम्पत्ये गर्भलिंग निदानासाठी येत असत, अशी माहिती तपासात समोर आली आहे. प्रथम गर्भलिंगनिदान आणि नंतर स्त्रीभ्रूण हत्या अशी कामे येथे सुरू असल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दारूड्या शिक्षकाने पत्नीचा केला खून

$
0
0

बारा वर्षाच्या मुलाने अनुभवला थरार; वानवडीतील प्रकार

म . टा. प्रतिनिधी, हडपसर

बारा वर्षाच्या मुलासमोर दारूच्या नशेत शिक्षक पतीने शिक्षिका असलेल्या पत्नीचा धारदार चाकूने खून केल्याचा प्रकार घडला. उघड्या डोळ्याने हा प्रकार पाहणाऱ्या मुलाने नराधम बापाला कुलूप फेकून मारले आणि आरडाओरडा करीत तेथून पळ काढला. ही घटना वानवडीतील आझादनगर येथे रविवारी पहाटे घडली .
स्नेहा सुनील कदम (वय ३५ रा. मनूचंद्र सहकारी गृहनिर्माण सोसायटी, आझादनगर, वानवडी) असे मयत शिक्षिकेचे नाव आहे. या बाबत सुनील दत्तात्रय कदम (वय ४० मूळ रा. पाथर्डी, जि. नगर, सध्या रा. लोणीकाळभोर, हवेली, जि. पुणे ) याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षिकेचे वडील बाबासाहेब केसू चव्हाण ( वय ५९, रा. ससाणेनगर, हडपसर ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि सुनील यांचा २०००मध्ये विवाह झाला. त्यांना बारा वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे. स्नेहा वानवडी येथील महापालिकेच्या शाळेत, तर सुनील पिंपळे सांडस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहे. या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असत. याबाबत २०१२मध्ये सुनील यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ते विभक्त राहत होते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून सुनील मुलांच्या भेटीच्या निमित्ताने यायचा. ११ फेब्रुवारीला सुनील, स्नेहा आणि मुले फिरायलाही गेले होते. रात्री आठच्या सुमारास त्यांना सोडून तो निघून गेला. रविवारी पहाटे तो पुन्हा दारू पिऊन आला. त्यानंतर काही वेळाने दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. सुनील दारू पिऊन आल्याने स्नेहाने त्याला बाहेर झोपण्यास सांगितले. मात्र, त्याने जबरदस्तीने दरवाजा ढकलून आत प्रवेश केला आणि खिशातील धारदार चाकूने दोनवेळा स्नेहाच्या छातीत वापर केले. भांडणांचा आवाज आल्याने जागा झालेल्या मुलाने हा प्रकार पाहिला आणि जवळील कुलूप वडिलांच्या दिशेने भिरकावले.
दरम्यान, स्नेहाने मदतीसाठी आरडाओरडा केला. ते पाहून सुनीलने घरातील दुसरा चाकू स्नेहाच्या हातात ठेवला. ज्या चाकूने वार केला, तो चाकू खिशात ठेवून पळ काढला. आवाज ऐकून आलेल्या शेजाऱ्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्नेहाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनतळाच्या जागी अनधिकृत बाग

$
0
0

तक्रारी करूनही पालिकेचे दुर्लक्षच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इमारतीच्या मूळ ‘प्लॅन’मध्ये वाहनतळ दाखवण्यात आले असताना, त्या ठिकाणी अनधिकृतरित्या बाग उभारण्यात आली. या बद्दल वारंवार तक्रारी करूनही महापालिकेतर्फे कोणतीही कारवाई केली जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. या अनधिकृत बागेमुळे रहिवाशांना इमारतीमधील पार्किंगऐवजी बाहेर रस्त्यावर वाहने उभी करण्याची वेळ आली आहे.
मार्केट यार्ड परिसरातील ‘नीलकमल’ या तीन मजली इमारतीमध्ये तीन सदनिका आहेत. इमारतीचा ‘प्लॅन’ मंजूर करताना तळमजल्यावर वाहनतळ दाखवण्यात आले होते. मात्र, दोन सदनिकाधारकांनी वाहनतळाच्या जागेतच बाग बनवली. त्यामुळे, वाहनांच्या पार्किंगसाठी जागा असूनही रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. इमारतीतील रहिवासी आणि ‘मेरे अपने’ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रुणवाल यांनी पालिकेच्या बांधकाम विभागाकडे याबाबत रितसर तक्रार दाखल केली आहे. मात्र, त्याबाबत कारवाई कोणी करायची, यावरून बांधकाम विभाग आणि उद्यान विभाग यांच्याकडून टोलवाटोलवी सुरू आहे.
बाग हटवण्याचे काम उद्यान विभागाचे असल्याचा दाखला बांधकाम विभागाकडून दिला जात आहे. तर, संबंधित बागेमध्ये मोठी झाडे नसल्याने बांधकाम विभागालाच कारवाईचे अधिकार असल्याचे पत्र उद्यान खात्याने दिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कारवाईबाबत एकमेकांकडे बोट दाखविले जात असून, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे गाऱ्हाणे रुणवाल यांनी मांडले. तक्रार निवारण दिन आणि लोकशाही दिनामध्ये हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ‘वाहनतळाच्या जागेचा वापर वाहनांसाठीच केला जावा’, अशा आशयाचे पत्र बांधकाम विभागाकडून देण्यात आले. तरीही, अद्याप परिस्थिती जैसे थेच असल्याकडे रुणवाल यांनी लक्ष वेधले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

’यूपीआय’प्रकरणी पाच जणांना अटक

$
0
0

आरोपींकडून साडेसहा लाख रुपये जप्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’च्या (यूपीआय) अॅपचा गैरवापर देशभरात करण्यात आल्याचे चौकशीअंती उघड झाले आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या खात्यांमधून ३९० संशयितांनी २६ कोटी रुपये गायब केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, सायबर सेलने या प्रकरणी पाच संशयितांना अटक केली आहे.
‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या २३ वेगवेगळ्या शाखांतील ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) वापरणाऱ्या ५० ग्राहकांच्या खात्यात रक्कम नसतानाही बँकेतून सहा कोटी १४ लाख रुपये काढल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. निरंजन श्रीपाद पुरोहित (वय ५९, रा. बावधन) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सायबर सेलचे ​वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार तपास करीत आहेत.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत राजेश सत्यनारायण काबरा (वय ४७, रा. भोसले गार्डन), पंकज राजेंद्र पिसे (वय २८, रा. रायकर मळा, धायरी), अशोक बबन हांडे (वय ४९, रा. पिंपळगाव जोगा, जुन्नर), दिनेश सयाजी मोढवे (वय ४१, रा. मढ, जुन्नर) आणि संतोष प्रकाश शेवाळे (वय ३७, रा. शिक्रापूर) यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील आनंद लाहोटी, विनोद नायकोडी, महेंद्र डोमसे, गणेश डोमसे आणि स्वप्नील विश्वासराव आदी संशयित अद्याप फरारी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सहा लाख ३० हजार रुपये जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली.
बँकेने ‘यूपीआय’धारक पन्नास बँक खात्यांची चौकशी केली असता, या खात्यांमध्ये एक दमडाही नसताना सहा कोटी १४ लाख रुपयांचे व्यवहार झाले असल्याचे निर्दशनास आले. या खातेधारकांनी बँक खात्यांमध्ये रक्कम नसताना ‘यूपीआय अॅप’द्वारे रक्कम मागवून घेतली आणि ती रक्कम ‘आरटीजीएस’द्वारे दुसऱ्या बँक खात्यांमध्ये वर्ग केली. त्यानंतर तत्काळ रक्कम वर्ग झालेल्या बँक खात्यांमधून रक्कम काढून घेण्यात आली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

औरंगाबाद येथून सुरुवात
रिझर्व्ह बँक आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्या आदेशानुसार देशात राष्ट्रीयीकृत; तसेच खासगी बँकांतील खातेधारकांसाठी ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) हे अॅप सुरू करण्यात आले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने हे अॅप मेसर्स इन्फ्रासॉफ्ट टेक्नॉलॉजिस लिमिटेड या कंपनीकडून घेतले. अॅपच्या वापरातून खात्यात एक रुपयाही नसताना संशयितांनी हजार रुपये हस्तांतरत केले. पैसे नसतानाही खात्यावर रक्कम हस्तांतर झाल्याचे लक्षात येताच त्याने पैसे पाठवण्याचा गोरखधंदा सुरू केला. ही माहिती त्याने मित्रांना सांगितली आणि त्यानंतर अॅपचा वापर करून पैसे काढण्यास सुरुवात झाली.

सरकारी योजनेचा घेतला आधार
यूपीआयचे अॅप डाउऊनलोड केल्यानंतर बँक खात्याला लिंक असलेला मोबाइल नंबर महत्वाचा असतो. संशयितांनी अडाणी बँक खातेदारांचा फायदा उचलून त्यांच्या खात्यावर पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गंत पाच हजार रुपये दरमहा जमा होणार असल्याचे आमिष दाखवले आणि त्यांचे खात्याशी संबंधित सगळी माहिती मिळवली. या खात्यांवरून पैसे काढण्यास सुरुवात झाली. पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांत पन्नास बँक खात्यांमधून ६७२ व्यवहार झाले आहेत. कमाल एक लाख रुपयांपर्यंत रक्कम काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकाने केला बलात्कार

$
0
0

जिवे मारण्याची धमकी देऊन स्वतःच्या घरी डांबले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारजे परिसरात प्रवास करणाऱ्या महिलेवर अंधाराचा फायदा घेऊन रिक्षातच बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर, संबंधित रिक्षाचालकाने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन घरी नेऊन पुन्हा बलात्कार केला. चार दिवस घरात डांबून ठेवून मित्रालाही तिच्यावर अत्याचार करण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

या बाबत ३३ वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार दिलीप अण्णा जाधव (वय ३३, रा. गोकुळनगर, वारजे), संतोष श्यामराव धोत्रे (वय ३०, रा. गोसावी वस्ती, कर्वे नगर) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता कोल्हापूरची असून, तिच्या पतीचा पुण्यात व्यवसाय आहे. त्या दोघांमध्ये घटस्फोटाची केस सुरू आहे. त्या कामानिमित्त २४ फेब्रुवारीला ही महिला रात्री पुण्यात आली. कर्वे नगर भागात जाण्यासाठी तिने रिक्षा केली. त्यावेळी जाधव याने महिलेची विचारपूस करून सर्व माहिती दिली. ती पुण्यातील नसल्याचे कळल्यानंतर त्याने कर्वेनगरवरून रिक्षा थेट गोकुळनगर येथील अंधारातील कच्च्या रस्त्याने नेली. त्यानंतर तेथे तिच्यावर बलात्कार केला. तिला ठार मारण्याची धमकी देऊन घरी नेऊन गच्चीवरही तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितले तर खून करेल, अशी धमकीही दिली.

त्यानंतर त्याने पीडितेला चार दिवस घरामध्ये डांबून ठेवले. झालेला प्रकार विसरून जा, माझ्या मित्राला त्याची बायको सोडून गेली आहे, त्याच्यासोबत तुझे लग्न लावून देतो, असे त्याने तिला सांगितले. काही दिवसांनी तो तिला घेऊन धोत्रेच्या घरी गेला. धोत्रेनेही लग्नाची तयारी दर्शवून तिच्यावर दोन ते सहा मार्च दरम्यान बलात्कार केला. ही महिला कोल्हापूरला परतल्यानंतर धक्क्यातच होती. कुटुंबीयांनी चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल दोघांना अटक केली. त्याना कोर्टाने १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीत नेत्यांची गावे शौचालयांविना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

स्वच्छ भारत अभियानात बारामती तालुक्यातील केवळ ७७ गावे हगणदारीमुक्त झाली आहेत. मात्र, तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या विविध संस्थांत महत्त्वाची पदे भूषवलेल्या पुढाऱ्यांचीच तब्बल २२ गावे शौचालयांविना असल्याचे ‘मटा’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

गावे हगणदारीमुक्त करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवीत आहे. जर गाव हगणदारीमुक्त झाले तर त्या गावाला पुरस्कारदेखील देण्यात येतो. तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींनी सरकारच्या अभियानास प्रतिसाद देऊन गावात शंभर टक्के शौचालये बांधली. तरीही उरलेल्या २२ गावांनी स्वच्छ भारत अभियानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. घरोघरी शौचालये नसल्याने गावकऱ्यांना उघड्यावर शौचास जावे लागते. यास गावकऱ्यांच्या उदासीनतेबरोबरच स्थानिक पुढाऱ्यांनीही आपल्या गावांकडे केलेले दुर्लक्ष कारणीभूत ठरले आहे.

विशेष म्हणजे या २२ गावांतील नागरिकांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सदस्य, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य यांसह विविध सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हाइस चेअरमन अशी विविध पदे भूषविलेली आहेत. यातील काही जण आजही या संस्थांचे सदस्य आहेत. मात्र, तालुका व जिल्हा पातळीवर चमकणारी नेत्यांची फळी आपापली गावे हगणदारीमुक्त करण्यात सपशेल अपयशी ठरली आहेत.

नेत्यांनी गावांत शौचालये बांधण्यास पुढाकार घ्यावा, यासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना आवाहन केले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही बारामतीत बैठक घेऊन लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांचे प्रबोधन केले होते. त्यानंतरही चित्र पालटले नाही.

हगणदारीमुक्त गाव मोहीम ही फक्त कागदपत्रावरच आहे. गावाच्या विकासासाठी उपलब्ध होणारा निधी वापरण्यात आलेला नाही. पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकारी यांच्यासह बालविकास प्रकल्प अधिकारी, कृषी अधिकारी, सर्व विभागांचे विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, केंद्रप्रमुख, आरोग्य व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांना शौचालय बांधकामासाठी एक-एक गाव दत्तक देण्यात आले आहे. मात्र, या नेत्यांकडून यासाठी पुढाकार घेतलेला नाही.

ही गावे शौचालयांविना

देऊळगाव रसाळ, ढाकाळे, ढेकळवाडी, गुणवडी, जळगाव सुपे, कऱ्हावागज, खांडज, कारखेल, कोऱ्हाळे बु, कुतवळवाडी, लोणी भापकर, मोराळवाडी, मुढाळे, मुर्टी, निंबोडी, निरावागज, पळशी, पारवडी, पिंपळी, शिर्सुफळ, सोनगाव, झारगडवाडी

स्वच्छ भारत अभियानास आता जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे बारामती तालुका लोकसहभागातून व पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्याने लवकरच हागणदारीमुक्त करण्यात यशस्वी ठरू.

– प्रमोद काळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बारामती

आम्ही सरकारला साथ देण्यास तयार आहोत. मात्र, आमच्या भागातले पुढारीच हागणदारीमुक्त गाव योजनेबाबत उदासीन आहेत. निवडणुकीच्या काळातच त्यांना विकासाचा मुद्दा आठवतो; पण त्यानंतर मूलभूत प्रश्नांकडे ते पाठ फिरवतात.

- जिनेंद्र देवकाते, रहिवासी, निरावागज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वर शून्य अंश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या अनेक भागांत सध्या दिवसा कडक उन आणि रात्री थंडी असे वातावरण असून, महाबळेश्वरजवळील वेण्णा लेक येथे रविवारी शून्य तापमान नोंदविण्यात आले. लेकमधील पाणीही गोठले होते. पुण्यातही दिवसा ऊन्हाचा कडाका जाणवत असून, रात्री मात्र चांगलाच गारठा आहे.

वातावरणातील बदलांमुळे नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, तापाचे प्रमाण वाढले आहे. पुढील काही दिवस नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगितले. पुण्यात सोमवारी कमाल तापमान २९.७ अंश सेल्सिअस तापमान होते. रात्री हेच तापमान १४.२ होते. सायंकाळी गार वारे वाहात असून, रात्री मात्र चांगलीच थंडी जाणवत आहे. महाबळेश्वरमध्ये सोमवारी कमाल तापमान २५.२ तर किमान तापमान १२.६ इतके नोंदविण्यात आले. महाबळेश्वरमध्ये दिवसाही गारठा जाणवत होता. महाबळेश्वरपासून जवळच असलेल्या वेण्णालेक परिसरात किमान तापमान शून्य नोंदविण्यात आले. या परिसरात हिमकणही साठले होते. तलावातील पाणीही गोठले होते. अनेक वाहनांवरही हिमकण साचले होते. महाबळेश्वरमध्ये सोमवारी राज्यातील सर्वांत नीचांकी तापमान नोंदविण्यात आले. नगरमध्येही दिवसा ऊन्हाचा कडाका आणि रात्री थंडी असे वातावरण आहे. नगरमध्ये आज कमाल तापमान ३१ होते तर किमान तापमान १३.२ होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायकोशी बोलतो म्हणून दिले चटके

$
0
0

तरुणाचे अपहरण करून ठेवले डांबून; चौघे अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बायकोशी बोलतो म्हणून तरुणाचे अपहरण करून त्याला डोणजे परिसरात नेऊन मारहाण करण्यात आली. घरात डांबून ठेवून त्याच्या हातावर चटके दिल्याचा प्रकार सिंहगड रोड परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

संतोष ज्ञानेश्वर बिरामणे (वय ३२, रा. आंबेगाव पठार), ज्ञानेश्वर शंकर बिरामणे (वय ५५, रा. बिबवेवाडी), नवनाथ सुरेश नलावडे (वय २७, रा. बिबवेवाडी) आणि शेखर राजेंद्र नलावडे (वय २७, रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी नांदेडगाव येथील २६ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष बिरामणे आणि तक्रारदाराची ओळख आहे. पीडित तरुण रिक्षा चालवितो. तर, आरोपी हा मालट्रक चालवितो. तक्रारदाराने बिरामणे यांच्या घरी खानावळ लावली आहे. तक्रारदार आपल्या पत्नीसोबत सतत बोलतो या संशयावरून त्यांच्यात वाद झाले.त्यामुळे बिरामणे यांनी चिडून आठ मार्चला रिक्षातून तरुणाचे अपहरण केले. त्याला डोणजे गावाच्या अलीकडे अंधारात नेण्यात आले. तेथे शिवीगाळ करून सळईने मारहाण करण्यात आली.

तेथून त्याला बिबवेवाडीत नेण्यात आले. दिवसभर त्याला घरात डांबून ठेवले. त्यानंतर त्याच्या डाव्या हाताच्या पंजावर चटके दिले. हा प्रकार कोणाला सांगू नको, अशी धमकीही दिली. सुटका झाल्यानंतर तरुणाने सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक डी. आर. कोळपे यांच्या पथकाने चौघांना अटक केली. त्यानंतर कोर्टाने १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यमंत्री कांबळे यांनी केले घूमजाव

$
0
0

वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने वादग्रस्त विधान मागे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का?... मी दलित आहे... एकेकाचं थोबाड रंगवलं असतं...’ हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर सोमवारी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ते मागे घेतले. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्टिकरण त्यांनी दिले.

भारतीय जनता पक्षाचे पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैनिकांच्या पत्नींबद्दल वादग्रस्त विधानाची धग कुठे शमते नाही तेच, राज्यमंत्री कांबळे यांचे लातूर येथील वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले. सामाजिक न्याय विभागातील दलालांची दलाली बंद केल्याने सरकारच्या बदनामीसाठी आंदोलन केली जात असल्याची टीका करताना त्यांनी थेट जातीचाच आधार घेतला.

भाषणात जोरदार टोलेबाजी करताना त्यांनी ‘घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का? मी दलित आहे. एकेकाचं थोबाड रंगवलं असतं,’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासमोरच हे सर्व घडले. त्यांनी ‘होळी असल्याने मंत्री जे काही बोलले ते कोणी मनावर घेऊ नये,’ अशी सारवासारवही केली.

कांबळे यांनी केलेल्या वक्तव्याचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने निषेध केला. ‘शूरवीर ब्राह्मण वीरांचा इतिहास कांबळे विसरलेले दिसत आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आता पुण्याच्या महापौर या ब्राह्मण झाल्यामुळे कांबळे यांना झालेली पोटदुखी या निमित्ताने बाहेर पडली आहे. कांबळे यांच्या गणेश कला क्रीडा मंदिराशेजारी असलेल्या कार्यालयाबाहेर ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येणार आहे,’ असे महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट संग्रहालयाला मिळेना ‘प्रोजेक्शनिस्ट’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
चित्रपटगृहांमधून प्रोजेक्शनिस्ट कायमचे ‘पडद्याआड’ गेलेले असल्याने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफएआय) कुशल प्रोजेक्शनिस्ट मिळालेला नाही. सेवानिवृत्त झालेल्या प्रोजेक्शनिस्टची मुदत वाढवून काम पुढे रेटले जात आहे. संग्रहालयाचे प्रोजेक्शनिस्ट या महिन्याच्या अखेरीस ‘पुन्हा’ निवृत्त होत आहे. त्यामुळे चित्रपटाची रिळ हाताळायची कशी व चित्रपट दाखवायचा कसा, हे प्रश्न संग्रहालय आणि पुण्यातील चित्रपट चळवळीपुढे निर्माण झाले आहेत. निवृत्त प्रोजेक्शनिस्टलाच पुन्हा मदत वाढवून देत वेळ मारून नेली जाण्याची दाट शक्यता आहे.
प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे चित्रपट चळवळीचे महत्त्वाचे केंद्र आहे. ‘एनएफएआय’च्या चित्रपटगृहात शंभर वर्षांपूर्वीच्या चित्रपटांना लागणारी सर्वांत जुनी अशी मौल्यवान यंत्रसामुग्री कार्यान्वित आहे. चित्रपट प्रदर्शनासाठी ३५ एमएम प्रोजेक्टर, तसेच ‘डीएलपी प्रोजेक्टर’ (डिजिटल लाइट प्रोसेसिंग) उपलब्ध आहेत. जुन्या काळच्या काही चित्रपटांसाठी प्रदर्शनासाठी लागणारे १६ एमएम आणि आठ एमएम क्षमतेचे प्रोजेक्टरदेखील या ठिकाणी आहेत. त्या माध्यमातून दुर्मिळ चित्रपटांचे प्रक्षेपण शक्य होते. डिजिटल, डीव्हीडी, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह या माध्यमातून आज सर्वत्र चित्रपटांचे प्रक्षेपण केले जात असताना वरील तीन प्रकारच्या प्रोजेक्टरच्या सहाय्याने प्रक्षेपण कालबाह्य झाले आहे. चित्रपट बाजारपेठेला अशा कुशल मनुष्यबळाची गरज नसल्याने हा वारसा पुढे नेणारे तंत्रज्ञ निर्माण होत नसल्याचे चित्र आहे. त्याचा फटका संग्रहालयाला बसला आहे.
‘संग्रहालयात गेली ४० वर्षे प्रोजेक्शनिस्ट म्हणून काम करणारे पी.ए. सलाम म्हणजे चित्रपटांचा चालता बोलता इतिहास आहेत. ते गेल्यावर्षी सेवेतून निवृत्त झाले. त्यांना दिलेली मुदतवाढही आता संपत आहे. दुसरे प्रोजेक्शनिस्ट रशीद बाणेदार हे देखील या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यामुळे संग्रहालयाची डोकेदुखी वाढली आहे,’ अशी प्रतिक्रिया खास सूत्रांनी ‘मटा’ला दिली.
संग्रहालयामध्ये १८ ते १९ हजार चित्रपटांच्या एकूण १ लाख ३२ हजार रिळांचे जतन करण्यात आले आहे. एखादा चित्रपट दाखविताना त्याच्या रिळ हाताळाव्या लागतात. आजच्या डिजिटल प्रोजेक्शनिस्टला हे काम जमत नसल्याने एप्रिलमध्ये चित्रपट दाखवायचे कसे, या विचाराने संग्रहालयातील अधिकारी, कर्मचारी बुचकळ्यात पडले आहेत. संग्रहालयात नेहमी महोत्सवांचे आयोजन करणाऱ्या विविध फिल्म क्लबसमोरील देखील अडचणी वाढल्या आहेत.



संग्रहालयाच्या स्थापनेपासून जी भरती प्रक्रिया आहे, ती बदलणे आवश्यक आहे. संग्रहालय केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असल्याने याबाबत मंत्रालयाची मान्यता घ्यावी लागते. प्रक्रिया बदलण्याचे काम सुरू असून मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला आहे. आत्ता भरती केल्यास त्यास मान्यता मिळू शकत नाही. त्यामुळे नवीन भरती होत नाही, तोपर्यंत आहे त्या प्रोजेक्शनिस्टची मुदत वाढविली जाईल. जुन्या तंत्रज्ञानाची माहिती असलेले प्रोजेक्शनिस्ट कमी आहेत.
- प्रकाश मगदूम, संचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकाराम बीजेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘आम्हीं जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा’ या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अमृतरुपी अभंगाचे साक्षीदार होण्यासाठी श्री क्षेत्र देहू येथे भाविकांची मंगळवारी अलोट गर्दी झाली होती. तळपत्या उन्हातही भक्तीच्या वर्षावाने रंग भरले अन् तुकाराम बीजेचा सोहळा उपस्थितांनी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला.
श्री संत तुकाराम महाराजांच्या ३६९व्या बीजोत्सव सोहळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक सहभागी झाले होते. ‘जय जय रामकृष्ण हरि’ भजनाच्या सुरावटीनेच गाव जागा झाला. इंद्रायणीकाठच्या राहुट्यांमधून हरिनामाचा गजर ऐकू येऊ लागला. मुख्य मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. काकड आरती, मुख्य मंदिर आणि शिळा मंदिरात परंपरेप्रमाणे महापूजा झाल्या. या वेळी संस्थानचे अध्यक्ष शांताराम महाराज मोरे, विश्वस्त अभिजित मोरे, अशोक दामोदर मोरे, अशोक निवृत्ती मोरे, जालिंदर मोरे, सरपंच सुनीता टिळेकर उपस्थित होत्या. वैकुंठगमन मंदिरातील महापूजा पंचायत समितीच्या सदस्या हेमलता काळोखे, माजी सरपंच कांतिलाल काळोखे यांच्या हस्ते झाली.
सोमवारी रात्रीपासूनच भाविक दर्शनबारीच्या रांगेत उभे होते. दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे खुले झाल्यानंतर ‘पुंडलिका वर दे...’चा घोष झाला. टाळ-मृदंगच्या साथीत भजन गात भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. येथील दर्शन झाल्यानंतर बीजेच्या साेहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांची पावले गोपाळपुऱ्याच्या दिशेने धावू लागली. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्य मंदिरातील पालखीत संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवण्यात आल्या. तुतारीवादकाने इशारा करताच पालखीने वैकुंठगमन मंदिराकडे प्रस्थान ठेवले. पालखी पावणेबाराच्या सुमारास नांदुरकीच्या झाडाखाली ठेवण्यात आली. या ठिकाणी परंपरेप्रमाणे तुकोबारायांचे वंशज बापूमहाराज मोरे देहूकर यांचे कीर्तन झाले. त्यांनी महानिर्वाण प्रसंगावरील ‘घोटवीन लाळ, ब्रम्हज्ञानी हाती’ अभंगावर निरुपण केले. कीर्तनसेवा समाप्त होताच भाविकांनी हरिनामाचा गजर करीत नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली आणि नतमस्तक होऊन तुकोबारायांना अभिवादन केले. भर दुपारी तळपत्या उन्हातही भाविकांचा भक्तीरूपी वर्षाव झाला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने संत तुकारामनगर येथील तुकोबारायांच्या पुतळ्यास पालिकेचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी आणि भक्ती-शक्ती चौकातील पुतळ्यास सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे यांनी पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले.
पालकमंत्री गिरीश बापट यांनीही देहूत जाऊन श्रींचे दर्शन घेतले. हवेलीच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते महाआरती झाली. सोहळ्यानिमित्त गावात आरोग्यसेवा उपलब्ध होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट, प्राधिकरण व्यापारी असोसिएशनच्या वतीने गाथामंदिर देहू येथे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणीचा उपक्रम राबविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांनी धोरणात्मक निर्णय घ्यावेत

$
0
0


पुणे : शहराचा कारभार अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. विकासकामांच्या ठिकाणी नगरसेवकांची नावे लिहू नयेत, फ्लेक्सबाबत शहरात कडक कारवाई करावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने आयुक्तांना दिला आहे.
शहराच्या विकासासाठी महापालिका आयुक्त कुमार यांनी धोरणात्मक निर्णय घ्यावेत, असे पत्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहे. येत्या १५ मार्चपासून
महापालिका आयुक्तांनी नवनिर्वाचित सदस्यांचा महापालिकेतील कार्यकाल सुरु होत आहे. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सुमारे १०० सभासद नव्याने निवडून आलेले आहेत. या सभासदांना अजून कामकाजाचा अनुभव नाही. त्यामुळे अगोदरच आयुक्तांनी काही धोरणात्मक घ्यावेत, असे या पत्रात नमूद केले आहे. महापालिकेने शहरात विकास कामे केल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी ते काम प्रभागातील नगरसेवकांच्या निधीतून, प्रयत्नाने झाल्याचे लिहिले जाते. त्यावर नगरसेवकांची नावे लिहू नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. गेली दहा वर्षे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला आपल्या काळात हा प्रकार रोखता आला नाही. मात्र आता सत्तेपासून दूर होत विरोधी पक्षात राष्ट्रवादी गेली असल्याने असे प्रकार रोखण्यासाठी पक्षाने सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. विकासकामांच्या ठिकाणी नगरसेवकांची नावे लिहू नये, असा सल्लाही राष्ट्रवादीने आयुक्तांना दिला आहे. नगरसेवकांच्या सूचनेनुसार केल्या जाणाऱ्या वार्डस्तरीय कामांमध्ये सूसूत्रता नसते. त्यामुळे सूसूत्रता आणण्यासाठी आयुक्तांनी निर्णय घ्यावा. विकास कामांना कामांना राजकीय पक्षांचे रंग देऊ नयेत. महापालिका गेली अनेक वर्ष खाजगी जागेत करत असलेले कामे योग्य नसून त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. विकासासाठी निधीची कमतरता असतानाही खाजगी ठिकाणी काम करणे योग्य नसल्याचे पत्रात म्हटले आहे. शहरात फ्लेक्सबाबत कडक कारवाई करण्याची गरज असून ती सर्वच राजकीय पक्षांवर केली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुक्का पार्लरला अभय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
शहरात सध्या हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत. फ्लेवर हुक्का म्हणून गुडगुडीचा आवाज काढत मंद प्रकाशात तरुणाई रात्र-रात्र या हुक्का पार्लरमध्ये नशेत धुंद झालेली दिसत आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्क, एमजी रोड, कात्रज-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील काही ढाबे, तर पिंपरी-चिंचवडमधील पिंपळेसौदागर येथील कोकणे चौक, रावेत कॉर्नर, पौड, लोणावळा येथे शहरातील मोठे हुक्का पार्लर पोलिसांच्या आर्शीवादानेच जोमात सुरू असल्याची टीका होत आहे.
काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद केली होती. यामध्ये काही बड्या धेंडांचादेखील समावेश होता. परंतु त्यानंतर पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित परिसरात मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे पोलिसांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विभागाला यावर कारवाईचे अधिकारच नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्वांचेच सध्या फावते आहे.
कॉलेज तरुण-तरुणी संध्याकाळ होताच या हुक्का पार्लरवर गर्दी करतात. पौड घाटातील तळ्यानजिक असलेल्या एका हॉटेलवर तर अर्ध्या-एक तासांच्या वेटिंगनंतर फ्लेवर हुक्का मिळतो. दोन अडीचशे रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत विकला जाणारा हा हुक्का आरोग्यास हानिकारक तर आहेच, परंतु येथील मंद प्रकाशात इतरही गंभीर गुन्हे घडत असतात.
आकुर्डी डी. वाय. पाटील कॉलेज परिसराला लागून असलेल्या रावेत भोंडवे कॉर्नर येथील तीन बड्या हुक्का पार्लरवर फ्लेवर हुक्क्यासह गांजा विक्रीदेखील केली जात असल्याचे बोलले जाते. परंतु देहूरोड पोलिसांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याकडे हेतूपुरस्सर डोळेझाक होत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी येथील काही स्थानिक नागरिकांनी थेट विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरेपाटील यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र, त्यानंतरही पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई झालेली नाही.
ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित येणाऱ्या पुणे-बेंगळुरू हायवेवर तर हुक्का बरोबरीने विनापरवाना दारुविक्रीदेखील होत आहे. रावेत कॉर्नर येथील काही हॉटेलमध्ये सर्रास दारु मिळत असल्याने राज्यासह विविध ठिकाणांहून शिक्षणासाठी आलेली तरुणाई या ठिकाणी रात्री गोळा झालेली असते. मात्र, पोलिसांकडून या हॉटेलवर कधीही कारवाई झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images