Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वि. भा. देशपांडे यांचं निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ आपल्या लेखणीतून अधिक समृद्ध करणारे ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे (वय ७८) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. कोणतेही धार्मिक विधी न करता वैकुंठ स्मशानभूमीत साहित्यिक-कलावंतांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात कन्या विशाखा, जावई व नातू असा परिवार आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'विभा' आजारी होते. एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी दुपारी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी एरंडवणा परिसरातील राहत्या घरी तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेत ठेवण्यात आले होते. पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी रंगभूमीचा चालता बोलता कोश असलेले 'विभा' साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष होते. परिषदेची २००६ मध्ये कार्यकारिणी निवडून आली तेव्हा ते प्रमुख कार्यवाह होते; पण कार्याध्यक्ष गं. ना. जोगळेकर यांच्या निधनानंतर कार्याध्यक्षपदाची सूत्र त्यांच्याकडं आली. परिषदेच्या कठीण कालखंडात त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

पुण्यात २०१० मध्ये झालेल्या ८३व्या साहित्य संमेलनातून शिल्लक राहिलेला ८२ लाख रुपयांचा निधी साहित्य परिषदेला मिळवून देण्यात त्यांचा प्रमुख हातभार होता. ते साहित्य परिषदेत असताना साहित्य व नाट्य क्षेत्रातील मंडळींचा त्या ठिकाणी राबता असे. नाट्यकोश खंडासह अनेक ग्रंथांचे संपादन व लेखन करीत त्यांनी रंगभूमीचा इतिहास शब्दबद्ध केला. रंगभूमीचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या 'विभां'नी आपल्या समीक्षणातून रंगभूमीला एक वेगळे परिमाण प्राप्त करून दिले. साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड सातचे ते कार्यकारी संपादक होते.

परिषदेच्या २०११ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, तरी त्यांनी परिषदेत येणे टाळले नाही. पराभव झाला की लोक संस्थेत येणे टाळतात; पण परिषदेसह अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांना काठीचा आधार घेऊन ते उपस्थित असत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार लांडगे यांची सरशी

$
0
0

अंतिम क्षणी समर्थकाला महापौरपद देण्यात यशस्वी
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे पहिले महापौर नितीन काळजे होण्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांची सरशी झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लांडगे यांना झुकते माप दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापौरपदाची शर्यत काळजे यांनी जिंकली आहे. त्यामागे लांडगे यांच्या राजकीय रणनीतीचा मोलाचा वाटा आहे. महापालिकेत १२८ पैकी ७७ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. त्या दिवसापासून महापौरपद चिंचवड किंवा भोसरी विधानसभा मतदारसंघाकडे जाणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. गटनेतेपद भोसरी विधानसभा मतदारसंघातील एकनाथ पवार यांच्याकडे सोपविल्यानंतर आता चिंचवड विधानसभा मतदारसंघाकडे महापौरपद जाणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक शत्रुघ्न काटे किंवा भाजपचे निष्ठावंत नगरसेवक नामदेव ढाके यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती. परंतु, लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे काळजे यांच्या नावाचा आग्रह धरला. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनीही लांडगे यांची शिफारस उचलून धरीत पालकमंत्री गिरीश बापट यांना महापालिकेत पाठविले.
महापौरपदाच्या उमेदवारीविषयी निर्णय घेताना शहराध्यक्ष आमदार जगताप पालिकेत अनुपस्थित होते. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. अधिवेशनानिमित्त आमदार जगताप आणि लांडगे मुंबईत असल्याचा दावा गटनेते एकनाथ पवार यांनी केला. परंतु, पालकमंत्री आणि आमदार लांडगे पालिकेत येऊ शकतात. मग, जगताप का येऊ शकले नाहीत? याचा मात्र समाधानकारक खुलासा होऊ शकला नाही.
..
मित्राला वाढदिवसाची अनोखी भेट
आमदार महेश लांडगे यांचे जिवलग मित्र म्हणून नितीन काळजे यांची ओळख आहे. काळजे यांचा आज (१० मार्च) ४३ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आमदार लांडगे यांनी मित्राला महापौरपदाची अनोखी भेट दिल्याचे मानले जात आहे. काळजे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या तरुण समर्थकांनी महापालिकेत जल्लोष केला आणि ‘भारतीय जनता पक्ष जिंदाबाद’, ‘एकच वादा-महेशदादा’ अशा जोरदार घोषणा दिल्या.
...
पाणीप्रश्नाला प्राधान्य - काळजे
ग्रामदैवत वाघेश्वराची कृपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे आणि आमदार महेश लांडगे यांच्या आशीर्वादामुळे महापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळत असल्याचे काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कारकिर्दीत पाणीप्रश्न सोडविण्याच्या आणि शहरविकासासाठीच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
....
पिंपरीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू : बापट
‘पिंपरी-चिंचवडच्या विकासात एक दिवसही वाया घालवणार नाही. येथील पाण्यापासून स्वच्छतेपर्यंत, कचऱ्यापासून आरोग्यापर्यंतचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि कार्यातून जनतेची शाबासकी मिळवू,’ असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी दिले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी-चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आले. त्या वेळी बापट म्हणाले, ‘जनतेच्या विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहे. येत्या पाच वर्षात शहराचा नियोजनबद्ध विकास करणार आहोत. शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते ‘टीम’ म्हणून काम करतील. शहरासाठी सुनियोजित व्यवस्था आम्ही राबविणार आहोत. औद्योगिकनगरीतील महापौरपदासाठी नितीन काळजे यांच्या रूपाने युवा नेत्यास संधी देत आहोत. चऱ्होलीसारख्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ते गेली १५ वर्षे कार्यरत असून, या अनुभवातून ते पिंपरी-चिंचवडकरांच्या समस्या मार्गी लावतील, असा विश्वास वाटतो.’

ते म्हणाले, ‘पक्ष संघटनेतील कामकाजाचा अनुभव पाहून एकनाथ पवार यांची गटनेतेपदी निवड केली आहे. तर, शैलजा मोरे यांच्या रूपाने महिलेला उपमहापौरपदाची संधी देत आहोत. या निवडीतून आम्ही सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. भ्रष्टाचाराला कंटाळून पिंपरी-चिंचवडवासियांनी भाजपला दिलेला कौल सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.’
....
नितीन काळजे यांचा अल्परिचय
- पूर्ण नाव - नितीन प्रताप काळजे
- वय - ४३ वर्षे
- पत्ता - काळजेवाडी, चऱ्होली
- प्रभाग क्रमांक - तीन (कुणबी-ओबीसी प्रवर्ग)
- शिक्षण - दहावी पास
- व्यवसाय - व्यापार
- राजकीय पार्श्वभूमी - शेतकरी कुटुंबातील नितीन काळजे यांनी समाजकार्याचा वसा वडिलांकडून घेतला. ते २०१२ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. अविवाहित असलेल्या काळजे यांना शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान मिळणार आहे.

.....
शैलजा मोरे यांचा अल्पपरिचय
- पूर्ण नाव - शैलजा अविनाश मोरे
- वय - ५६ वर्षे
- पत्ता - निगडी-प्राधिकरण
- प्रभाग क्रमांक - १५ (सर्वसाधारण महिला प्रवर्ग)
- शिक्षण - नववीपर्यंत
- राजकीय पार्श्वभूमी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अविनाश मोरे यांच्यापासून राजकीय वारसा लाभलेल्या शैलजा मोरे यांनी २०१२ मध्ये महापालिकेची निवडणूक लढविली होती. परंतु, त्या वेळी अपयश आले. महापालिकेत प्रथमच पाऊल ठेवल्यानंतर त्यांच्यावर उपमहापौरपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यांचे चिरंजीव अनुप मोरे भारतीय युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिंपरीतही कराउपलोकपाल नियुक्त’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
मुंबईच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेवरही उपलोकपाल नेमण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते योगेश बहल यांनी केली आहे.
महापालिकेवर उपलोकपाल नेमण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत केले आहे. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपने पारदर्शक कारभार करून दाखवावा. त्यासाठी उपलोकपाल नियुक्त करण्यात यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही राहील, असे बहल यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘महापालिकेचा कारभार पारदर्शी पद्धतीनेच झाला पाहिजे. यासाठी विरोधी पक्ष म्हणून चोख भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस बजावेल.’
महापालिकेच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी’ने शहरात विकासकामे केली. मात्र, जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे, असे नमूद करून म्हणाले, ‘जनमताचा कौल आम्हाला मान्य असून, विरोधी पक्षनेता म्हणून सत्ताधाऱ्यांनी चुकीचे निर्णय घेतल्यास ते हाणून पाडले जातील. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखवत गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे, ती समर्थपणे पेलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. शहराच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका ठेवली जाईल. शहरातील विकास कामांचा वेग कायम राहील याची दक्षता घेण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रशासनाला सहकार्य केले जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील संशोधनाला सुपरकम्प्युटरचा आधार

$
0
0

५०० टेराफ्लॉप श्रेणीतील कम्प्युटरची आयसरमध्ये उभारणी

मयुरेश प्रभुणे, पुणे

देशातील सुपरकम्प्युटरची पंढरी मानल्या जाणाऱ्या पुण्यात लवकरच आणखी एका सुपरकम्प्युटरची वर्णी लागणार आहे. नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग मिशनअंतर्गत देशभरात बसवण्यात येणाऱ्या ७३ सुपर कम्प्युटरपैकी पहिला सुपरकम्प्युटर पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये (आयसर) येत्या सप्टेंबरपर्यंत बसवण्यात येणार आहे. ५०० टेराफ्लॉप श्रेणीतील या सुपरकम्प्युटरचा वापर पुण्यातील सर्व संशोधन संस्थांना त्यांच्या संशोधनासाठी करता येणार आहे.
केंद्र सरकारने डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया या अभियानांअंतर्गत दोन वर्षांपूर्वी नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग मिशन जाहीर केले. डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग संशोधन आणि शिक्षण क्षेत्राला करून देण्यासाठी या मिशनअंतर्गत देशभरात ७३ ठिकाणी सुपरकम्प्युटर बसवून त्यांना एकमेकांशी जोडण्याची योजना आखण्यात आली. या मिशनसाठी तब्बल ४५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, विज्ञान- तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय संयुक्तरित्या या मिशनचा खर्च करणार आहे. बेंगळूरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस आणि पुण्यातील सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंग (सी- डॅक) या संस्थांमार्फत देशभरात सुपर कम्प्युटरचे नेटवर्क निर्माण करण्यात येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या सप्टेंबरपर्यंत पुण्यातील आयसरसह देशात तीन संस्थांमध्ये ५०० टेराफ्लॉप श्रेणीचे सुपरकम्प्युटर बसवण्यात येणार आहेत. आयसरमधील सुपरकम्प्युटर पुण्यातील सर्व संशोधन संस्थांना वापरता येणार असून, हवामानशास्त्र, खगोलशास्त्र, जनुकीय विज्ञान, बायोइन्फॉर्मेटिक्स, त्याचप्रमाणे डिफेन्स क्षेत्रालाही या सुपरकम्प्युटरचा लाभ होणार आहे. देशातील प्रमुख सायन्स हब असणाऱ्या पुण्याला शक्तिशाली सुपरकम्प्युटर मिळाल्यामुळे येथील संशोधनालाही मोठी चालना मिळणार आहे.

पुण्यातील तिसरा शक्तिशाली सुपरकम्प्युटर
आयसरमधील सुपरकम्प्युटरमुळे जागतिक स्तरावर शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या ५०० टेराफ्लॉप श्रेणीचे पुण्यात तीन सुपरकम्प्युटर होतील. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरोलॉजीमधील (आयआयटीएम) आदित्य आणि सीडॅकचा परम युवा हे या श्रेणीतील दोन शक्तिशाली सुपरकम्प्युटर सध्या पुण्यात कार्यरत आहेत. याशिवाय आयुका, आयसर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि सी- डॅकया संस्थांचे ५०० टेराफ्लॉपपेक्षा कमी क्षमतेचे सुपरकम्प्युटरही संशोधनासाठी वापरात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना पकडले ‘स्पेशल २६ पथक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त असल्याचे सांगून वेगवेगळ्या लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा संशयितांना गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने गजाआड केले. या तिघांकडून भारत सरकार अशी नेमप्लेट असलेल्या आठ लाख रुपयांच्या दोन स्विफ्ट कार जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोहेब महमंद शेख (वय २२, रा. जनता वसाहत), आकाश नवनाथ जठार (वय २३, रा. अप्पर कोंढवा रोड, बिबवेवाडी), शंकर गुलाब मुजुमले (वय २९, रा. नऱ्हे गाव), गणेश दत्तात्रय मुजुमले (वय २७, रा. कोंढणपूर), विकास विलास गव्हाणे (वय २३, रा. कोंढणपूर, हवेली), रवींद्र सोनबा खाटपे (वय २२, रा. कोंढणपूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असल्याचे गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी सांगितले.
भास्कर विजय शिर्के हा पोलिस उपायुक्त असल्याचा बनाव करताना वाहतूक पोलिसांनी त्याला बुधवार चौकात ताब्यात घेतले होते. तो असंबद्ध बोलत असल्याने वाहतूक पोलिसांनी त्याला चौकशीसाठी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, शिर्के याने एका व्यक्तीला पोलिस असल्याचे सांगून डांबून ठेवले होते. त्या व्यक्तीकडून पैसे उकळल्याचे सांगण्यात येत होते. या व्यक्तीची माहिती गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलला मिळाली होती. या व्यक्तीने सांगितलेल्या माहितीनुसार शिर्के आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू झाला होता.
गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. व्ही. शिंदे यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी संजय जगताप यांना या संशयितांविरुद्ध माहिती मिळाली होती. त्यानुसार शिंदे यांच्या पथकाने नवले पूल परिसरात सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले. या संशयितांकडे चौकशी करण्यात आली असता त्यांनी विशेष शाखेचे पोलिस असल्याचे भासवण्यासाठी एकसारखे सफारी ड्रेस शिवले होते. तसेच त्यांचा प्रमुख साथीदार भास्कर विजय शिर्के हा पोलिस उपायुक्त असल्याचे बनाव करत होता. त्यालाही भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कम्प्युटर प्रणाली बनविणार प्रश्नपत्रिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात २०१८ मध्ये फेब्रुवारी- मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयाचा चार संच असणाऱ्या प्रश्नप्रत्रिकांचा वापर होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आता पुढचा निर्णय घेण्याचा तयारीत आहे. या चारही प्रश्नपत्रिका कम्प्युटर प्रणालीद्वारे तयार करण्याचा मंडळ विचार करीत असून त्यादृष्टीने प्रश्नपेढी तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी व प्रश्नपत्रिकेतील मानवी हस्तक्षेप दूर करण्यासाठी हा निर्णय मंडळ घेण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. अशातच बारावीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या पेपर सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी फुटून व्हॉट्स अॅपवरून व्हायरल होत आहेत. तसेच, परीक्षा केंद्रांवर पेपर फुटण्याचे प्रकार घडत आहेत. या एकंदरीत गोंधळात बारावी आणि दहावीच्या परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपीचे प्रकारदेखील आढळून आले आहेत. या सर्वांवर उपाय शोधण्यासाठी मंडळ उपाययोजना आखण्याची तयारी करत आहे. अशातच भारतीय शिक्षण मंडळाद्वारे पश्चिम महाराष्ट्राचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी, अध्यक्ष महेश दाबक, नारायण पाटील यांनी पेपररफुटीला आळा घालण्यासाठी काही सूचना शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांना केल्या होत्या. या सूचनांवर मंडळ आता विचार करत आहे. कुलकर्णी आणि म्हमाणे यांच्यात झालेल्या बैठकीत काही सूचनांना तत्वतः मान्यता मिळाली आहे.
सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका काढण्याचे काम हे मंडळाने ठरवून दिलेले तज्ज्ञ शिक्षक करत असतात. त्याऐवजी आता शिक्षकांना परीक्षेसाठी प्रत्येक विषयाच्या शास्त्रशुद्ध प्रश्नपेढ्या तयार करायच्या आहेत. त्यानंतर या प्रश्नपेढ्याच्या आधारे संगणकीय प्रणालीद्वारे प्रश्नपत्रिकेचे चार संच काढण्यात येतील. या प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येईल, अशी चर्चा म्हमाणे यांच्याशी झाली असून त्यांनी याला तत्वतः मान्यता दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान, पेपरफुटी रोखण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे आलेल्या सूचनांचा विचार करण्यात येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष म्हमाणे यांनी सांगितले आहे.

मानवी हस्तक्षेप दूर होणार
दहावी- बारावीच्या परीक्षेसाठी चार संचात प्रश्नपत्रिका काढण्यासाठी उत्तम दर्जाच्या अचूक अशा प्रश्नपेढ्या काढाव्या लागणार आहेत. त्यानुसार प्रश्नपेढ्या काढण्यासाठी शिक्षकांना मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या विशेष कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण शिक्षकांना येत्या जून-जुलै महिन्यात देण्यात येणार आहे, अशी चर्चा बैठकीत झाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. यामुळे प्रश्नपत्रिकेतील मानवी हस्तक्षेप आणि ढवळाढवळ दूर होणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमाशंकरच्या कचऱ्यातून इंधननिर्मिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
निसर्गासाठी धोकादायक ठरलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा समस्येवर मार्ग काढण्यासाठी भीमाशंकर अभयारण्याने पर्यावरणपूरक पर्याय निवडला आहे. जंगल परिसरात जमा होणारा प्लास्टिकचा कचरा भंगारात टाकण्याऐवजी त्यापासून गावकऱ्यांना इंधन मिळवून देण्याचा मार्ग वनाधिकाऱ्यांनी स्वीकारला आहे. पुण्यातील रुद्रा एन्व्हायर्न्मेंटल सोल्यूशन कंपनीने या कचऱ्याची जबाबादरी स्वीकारली असून गेल्या सहा महिन्यांत पाचशे किलो कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत भिमाशंकर अभयारण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्लास्टिक कचरा डोकेदुखी होऊन बसला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिराला दर वर्षी लाखो भाविक भेट देतात. या भाविकांबरोबरच अभयारण्यात येणारे अनेक पर्यटक जंगलात फिरताना पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांची पाकिटे कोठेही फेकतात. दर वर्षी वाढत असलेला हा कचरा वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरतो आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही वन्यप्राण्यांच्या विष्ठेतही प्लास्टिकचे तुकडे आढळून आले आहेत. यावर गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी वन विभागाकडून प्लास्टिक वापराबद्दल ग्रामस्थांमध्ये सातत्याने जागृती करण्यात येत आहे.
गावकऱ्यांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून कचरा वर्गीकरणास सुरूवात झाली आहे. वन विभागाचे कर्मचारी लोकसहभागातून दर ठराविक दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवून कचरा गोळा करून ठेवतात. रुद्रा एन्व्हायर्न्मेंटल सोल्यूशन कंपनीचे स्वयंसेवक येऊन हा कचरा घेऊन जातात. त्यांच्या जेजुरी येथील कारखान्यामध्ये या कचऱ्यापासून इंधन तयार केले जाते. गेल्या सहा महिन्यांत आम्ही पाचशे किलो कचरा कंपनीला दिला आहे. या उपक्रमाची घडी बसल्यावर कंपनीकडून कचऱ्यातून निर्माण होणारे ४० टक्के इंधन गावकऱ्यांना रॉकेलला पर्याय म्हणून देण्यात येणार आहे, असे अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी सांगितले.
भिमाशंकरमध्ये जमा होणारा कचरा हा मूळतच गावकऱ्यांकडून नव्हे तर पर्यटकांकडून होतो. पण जंगल वाचविण्यासाठी या कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने विघटन होणे आवश्यक आहे. त्यामुळे गावकऱ्यंना विश्वासात घेऊन आम्ही या उपक्रमाला सुरूवात केली आणि आता जागृती वाढते आहे. टप्प्याटप्याने आमच्याकडे जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढत जाईल, असा विश्वास कंपनीच्या मेधा ताडपत्रीकर यांनी व्यक्त केला.

महाशिवरात्रीला जनजागृती
महाशिवरात्रीच्या दिवशी वेगवेगळ्या राज्यांतून भाविक भिमाशंकर मंदिरामध्ये येतात. या वेळी मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. मात्र या वेळी यात्रेपूर्वीच आम्ही गावकऱ्यांना कचरा गोळा करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले होते. तसेच दर्शन मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या आकारातील जाळ्या ठेवल्या होत्या. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा जमा करण्यास यश आले, असे तुषार ढमढेरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वित्तीय संस्थांमधील माहिती ‘आरटीआय’च्या कक्षेतच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नागरी सहकारी बँक, सहकारी सोसायटी, पतसंस्था यासारख्या सहकारी वित्तीय संस्थांमधील माहिती ही माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेतच येत असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल औरंगाबाद हाय कोर्टाच्या खंडपीठाने नुकताच दिला आहे. दरम्यान, सहकारी संस्था जी माहिती सहकार कायद्यानुसार सहकार खात्याला देऊ शकतात, तीच माहिती अर्जदारांना माहिती अधिकार कायद्यानुसार मिळू शकणार असल्याचे सांगण्यात येते आहे.
जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनने औरंगाबाद हाय कोर्टात केलेल्या याचिकेवर खंडपीठाने सहकार क्षेत्रातील वित्त संस्थांतील माहितीसंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनने राज्य सरकार, सहकार सचिव, सहकार आयुक्त, सत्यशील अकोले आदींच्या विरोधात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि संगीतराव एस. पाटील यांच्या खंडपीठाने २६ फेब्रुवारी रोजी या याचिकेवर निकाल देऊन ती फेटाळली.
विधिमंडळांच्या कायद्यानुसार निर्माण होणारे अधिकार (अॅथॉरिटी) हे सार्वजनिक अधिकारात (पब्लिक अॅथॉरिटी) मोडतात. सहकारी संस्थांवर निबंधक (रजिस्ट्रार) तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेमणुका सहकारी सोसायटी कायद्यानुसार होतात आणि त्यांच्यावर या कायद्यानेच नियंत्रण ठेवण्यात येते. या सर्वांकडून ठेवण्यात येणारी माहिती खुली करण्यात मनाई करण्याची परवानगी देता येणार नाही, असा निकाल हाय कोर्टाने दिला.
‘माहिती अधिकार कायदा २००५ च्या कलम २ (एच) आणि आठ नुसार सहकारी वित्त संस्था या सार्वजनिक अधिकारात मोडत नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ३४ (ए) नुसार सहकारी वित्त संस्थांना गोपनीय माहिती खुली करण्याचे बंधन घालण्यात आलेले नाही. तसेच, सहकारी वित्त संस्था या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या सरकारकडून कुठलाही निधी घेत नसल्याने त्यांना सार्वजनिक अधिकारात मोडण्यात येऊ नये, असा युक्तिवाद असोसिएशनने केला होता. माहिती अधिकार कायद्याच्या कार्यकक्षेतून सहकारी वित्तसंस्थांना वगळावे, सहकारी वित्त संस्थाशी संबंधित माहिती ही संस्थेचे सभासद तसेच नागरिकांना देण्यापासून सहकार खात्यातील अधिकाऱ्यांना मनाई करण्यात यावी, बॅलन्स शिट, नफा-तोट्याबद्दलच्या बँक खात्यांची माहिती देण्यात येऊ नये, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.
महाराष्ट्र सहकारी सोसायटी कायद्यानुसार संस्थेतील गैरव्यवहारांबाबत ‘अधिकारी’ (अॅथॉरिटी) व्यक्तीसंबंधित व्यवहारांची चौकशी तसेच ऑडिट करू शकते. चौकशीत संस्थेचा तोटा झाल्याचे आढळले तर संबंधितांकडून तो तोटा वसूल करण्याचे अधिकार कायद्यानुसार आहेत. व्यवस्थापकीय समितीचे निलंबन असो की सदस्यांना काढून टाकण्याचे अधिकार या कायद्यात दिलेले आहेत. सहकारी संस्थांना त्यांच्याकडील माहिती ही संबंधित अधिकारी व्यक्तीला देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या अधिकारी व्यक्तींची नेमणूक महाराष्ट्र सहकारी सोसायटी कायद्यानुसार करण्यात येते. त्यामुळे या व्यक्तींकडे असलेली माहिती ही माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येते, असे कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे.

औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाचे वाचन केल्यास असे दिसते की, माहिती अधिकार हा सहकारी संस्थांना लागून नसला, तरी तो सहकार विभागास लागू आहे. सहकार कायद्यातील तरतुदींनुसार जी माहिती सहकार विभाग जमा करू शकते ती माहिती, माहितीच्या अधिकारात अर्जदारास देण्याचे आदेश सहकार विभाग संबंधित संस्थेस देऊ शकते.
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन

कुठली माहिती मिळू शकेल
- सभासदांची यादी
- चौकशी अहवाल
- ताळेबंद
- गुंतवणुकीची माहिती
- लेखाजोखा
- बैठकीचे इतिवृत्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड येथील करिष्मा सोसायटीत सातव्या मजल्यावरून पडून तीन वर्षांची चिमुरडी मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. निविता अभिजित पाटील असे या मुलीचे नाव असून, तिचा परवा म्हणजे बुधवारीच वाढदिवस झाला होता. ‘झोपेतून उठल्यानंतर निविताला घरातील कोणीही व्यक्ती आजूबाजूला न दिसल्याने ती घरच्यांना शोधत गॅलरीत आली असावी आणि तोल जाऊन खाली पडली असावी,’ अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अभिजित पाटील आणि त्यांची पत्नी तृप्ती हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. त्यांच्यासोबत दोन मुली, अभिजितचे वडील हिम्मतसिंह आणि अभिजित यांची आई असे सर्व जण करिष्मा सोसायटीतील बारा क्रमांकाच्या इमारतीत राहतात. निविता ही अभिजित यांची धाकटी मुलगी होती. ‘तृप्ती सकाळी सातच्या सुमारास नोकरीसाठी घराबाहेर पडतात, तर निविताची मोठी बहीण साडेसातच्या सुमारास शाळेत जाते. तिला व्हॅनमध्ये बसवून देण्यासाठी घरातील व्यक्ती दररोज सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येतात. ​बहुतांश वेळा अभिजित निविताला सोबत घेऊन मोठ्या मुलीली व्हॅनमध्ये बसवून देण्यासाठी सोसायटीच्या गेटवर येत असत,’ अशी माहिती स्थानिकांनी दिली.

ही घटना घडली, त्या वेळी तृप्ती नोकरीसाठी बाहेर पडल्या होत्या. निविताची आजी सोसायटीच्या आवारात प्राणायाम करण्यासाठी गेल्या होत्या. तिचे आजोबा नाशिकला गेले होते. घरात अभिजित आणि दोन्ही मुली होत्या. मोठ्या मुलीला व्हॅनमध्ये बसवून देण्यासाठी अगदी थोडाच वेळ लागणार असल्याने झोपलेल्या निविताला न उठवता अभिजित मोठ्या मुलीला घेऊन गेटवर गेले होते. त्याच वेळी सोसायटीच्या पार्किंगमध्ये वाहने धुण्याची कामे करणारा संतोष याला जमिनीवर काही तरी जोरात पडल्याचा आवाज आला. त्याने वळून पाहिले असता, नि​विता जमिनीवर पडली होती. तो निविताला उचलेपर्यंत तिचे वडील अभिजित तेथे आले होते. आपली मुलगी जमिनीवर पडल्याचे पाहून तत्काळ त्यांनी तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले.

अलंकार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे म्हणाले, ‘गॅलरीचा दरवाजा बंद नव्हता. निविता सकाळी झोपेतून उठल्यानंतर किंवा झोपेतच गॅलरीत आली असावी. घरात कोणाही नसल्याने ती घाबरली असावी. आपल्या बहिणीला वडील दररोज व्हॅनमध्ये बसविण्यासाठी खाली जातात, याची तिला माहिती होती. त्यामुळे कदाचित त्यांना पाहण्यासाठी ती गॅलरीतून डोकावत असावी. त्यांना पाहण्याच्या प्रयत्नात ती जमिनीवर पडली असावी,’ अशी शक्यता शिंदे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्युझिक-डान्सला परवानगी नाकारली

$
0
0

राजमाचीवरील होळीसाठी राज्यभरातून तरूण येण्याची शक्यता, फेसबुकवरून नोंदणी
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
होळी निमित्त लोणावळ्यानजिक असलेल्या राजमाची गावात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मुक्कामी पार्टीत डिजे आणि डान्सला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. रविवार आणि सोमवार (१२-१३ मार्च) होणाऱ्या या पार्टीसाठी खास फ्रान्स येथून डिजे आणि म्युझिक सिस्टीम मागविण्यात आली असून, फेसबुक आणि ऑनलाइनद्वारे याचे नियोजन सध्या सुरू आहे. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर वरील कारवाई करण्यात आली आहे.
राजमाची किल्यामुळे राजमाची गावाची वेगळी ओळख आहे. काही दिवसांपूर्वी याच किल्यावर मद्यपान करणे, तेथे तंबू टाकून राहणे यावरून वादंग झाला होता. त्यातूनच तरुणीला शिवप्रेमींकडून मारहाण तर तरुणीने गोंधळ घातला अशी परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा याच ठिकाणी होळी निमित्त आंतरराष्ट्रीयख्यातीच्या ‘ ट्रेक एन ट्रान्स होली फीट तलमस्का !’ (TREK N TRANCE HOLI feat TALAMASCA!') या पार्टीचे आयोजन करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
दोन हजार रुपये घेऊन या पार्टीत प्रवेश देण्यात येणार आहे. राज्यातील विविध भागातील तरुण-तरुणींकडून या पार्टीत जाण्याबाबत फेसबुक आणि ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात आल्याचे समजते. तसेच यासाठी फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे सर्व नियोजन सुरू होते. याबाबतची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना शुक्रवारी (१० मार्च) मिळाली. उच्चपदस्य अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्थानिक पोलिसांनी आयोजकांना याबाबत नोटीस बजाविली आहे. दरम्यान, पोलिसांकडून आयोजकांना नोटीस बजाविण्यात आल्यानंतर ‘पार्टी किल्यावर होणार नसून, पार्टीचे लोकेशन भिन्न ठिकाणी आहे. किल्याचे पावित्र्य राखण्यात येणार आहे.’ अशा आशयाची पोस्ट आयोजकांकडून फेसबुक पेजवर करण्यात आली आहे.
एकीकडे रंगपंचमी आणि धुलिवंदनाच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत. या दिवशी ‘रेन डान्स’ किंवा या ‘फोम डान्स’ला बंदी घालण्यात आली असून, धरण क्षेत्रातील पाण्यात जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले असतानाही आयोजित केलेल्या या पार्टीबाबात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
...
राजमाची गावातील पार्टीत ट्रेक करणे आणि जेवण इतकेच नियोजन असावे. अन्य कोणात्याही प्रकारचा संगीताचा कार्यक्रम अथवा डान्स येथे करण्यात येऊ नये अशी नोटीस आयोजकांना बजाविण्यात आली आहे. तसेच आज शनिवार (११ मार्च) पासून राजमाची गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
- अक्षय शिंदे, पोलिस उपअधीक्षक, लोणावळा
---------------
नागरिकांमध्ये संताप
तळेगाव-दाभाडे येथून काही अंतर पुढे गेल्यावर ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली दोन ठिकाणी डान्सबार चालतो. वडगाव आणि कामशेत पोलिसांकडून या दोन्ही बारकडे हेतूपुरस्सर डोळेझाक केल्याचा आरोप नेहमी होतो. मध्यंतरी पोलिस महासंचालकांच्या आदेशानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने येथे छापा मारला होता. परंतु त्याची टीप देखील स्थानिकांना लागल्याने हा छापा फसला होता. राजरोसपणे चालणाऱ्या या दोन बार नंतर आता राजमाची गावातच पार्टीचे आयोजन करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांकडून याबाबत संतप्त भावना व्यक्त केली जात आहे.
००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘थर्ड पार्टी’ इन्शुरन्स महागणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वाहन अपघातात महत्त्वाचा ठरणारा थर्ड पार्टी इन्शुरन्स आता महागणार आहे. येत्या आर्थिक वर्षात थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या हप्त्यामध्ये (प्रीमिअम) ५० टक्क्याने वाढ करण्याची शिफारस ‘इन्शुरन्स रेग्यूलेटर अ‍ॅण्ड डेव्हलपमेन्ट अ‍ॅथोरिटी’ने (आयआरडीए) केली आहे. रस्त्यांवरील अपघातांमध्ये दरवर्षी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, अपघातग्रस्त व्यक्तीच्या नातेवाइकांना इन्शुरन्सची रक्कम देण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘आयआरडीए’ने हप्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदी व परिवहन विभागाच्या आदेशानुसार सर्व प्रकारच्या दुचाकी, तिनचाकी, चारचाकी आणि अन्य प्रकारच्या सर्व वाहनांना इन्शुरन्स बंधनकारक आहे. देशभरातील इन्शुरन्स कंपन्यांवर नियमन ठेवण्याचे काम ‘आयआरडीए’कडून केले जाते. तसेच, दरवर्षी ‘आयआरडीए’ इन्शुरन्सच्या हप्त्याचा आढावा घेऊन त्यामध्ये वाढ केली जाते. यंदा ‘आयआरडीए’ने ५० टक्के वाढ करण्याची शिफारस केली आहे. दर वर्षी साधारणपणे १० ते २५ टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, यंदा प्रस्तावित केलेली वाढ खूप असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकारने विविध प्रकारच्या परिवहन शुल्कात वाढ केली आहे. त्यामध्ये सामान्य नागरिकांसह वाहतूकदारांना त्या वाढीचा फटका बसला आहे. त्यानंतर दुचाकी, चारचाकी, ट्रक बस अशा सर्वच वाहनांच्या ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’च्या हप्त्यामध्ये वाढ केल्यास आणखी भार वाढणार आहे. हा निर्णय म्हणजे वाहतूकदारांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. त्यामुळे ही शुल्कवाढ रद्द व्हावी, अशी मागणीचे पत्र केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. याबाबत सकारात्म निर्णय न झाल्यास देशभरातील वाहतूकदार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचा दिवस मोर्चांचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शुक्रवारचा दिवस शिक्षण विभाग ढवळून काढणारा ठरला. बारावीच्या प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकारावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) व एनएसयूआय या संघटनांनी बोर्डात आंदोलन करून काम ठप्प केले. छात्रभारती या संघटनेने विविध मागण्यांसाठी तसेच रोझरी शाळेच्या बाहेर पालकांनी आंदोलन केल्याने शिक्षण क्षेत्रात दिवसभर गोंधळाचे वातावरण होते. ‘शिक्षणमंत्री विनोद तावडे राजीनामा द्या,’ अशी जोरदार मागणी विविध आंदोलनातून पुढे आली.
बारावीच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी अभाविपने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांना घेराव घातला. संस्थेचे शिवाजीनगर भांबुर्डा येथील प्रवेशद्वार बंद केलेले असताना कार्यकर्त्यांनी गेटवर चढून कार्यालयात प्रवेश केला. म्हमाणे यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अभाविपचे प्रदेशमंत्री राम सातपुते, पुणे महानगरमंत्री प्रदीप गावडे तसेच महानगर सहमंत्री देवश्री खरे व इतर कार्यकर्त्यांनी या वेळी मंडळाच्या कारभाराचा निषेध केला. ‘व्हॉट्सअॅच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फुटणे हा मंड‍ळाच्या ढिसाळ कारभाराचा नमुना आहे. या सर्व प्रकारांमुळे परीक्षेच्या उद्देशालाच तडा गेला आहे,’ अशी टीका करत अभाविपच्या वतीने दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.
नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियातर्फे (एनएसयूआय) पुणे विभागीय बोर्डाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. ‘पेपरफुटीमुळे गोरगरीब व अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. हे प्रकार थांबवताना ते असाह्य ठरले आहेत. पेपर फुटीचे प्रकार थांबविण्यासाठी सरकारने तावडे व शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांचे राजीनामे घ्यावेत,’ अशी मागणी एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी केली. यावेळी संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष भूषण रणभरे, युवराज नायडू, आकाश काळे, संदेश टेंभुर्णे, आदित्य कांबळे, हितेश मकवाणी, अभिषेक राजर्स, अक्षय कुसलकर, निहाल पिल्ले यांनी घोषणाबाजी केली.
छात्रभारतीतर्फे भिडेवाडा ते शिक्षक संचालक कार्यालय असा शिक्षण हक्क मोर्चा काढण्यात आला. भिडे वाडा येथे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. भाई वैद्य, स्वप्नील मानव यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी सरकारच्या शिक्षण धोरणाचा तीव्र निषेध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाईवर चालले पॅपॉनचे गारुड

$
0
0

पुणे ः जादुई स्वरांनी हळूवारपणे मनाचा ठाव घेणारे ‘मोह मोह के धागे’ असो की प्रत्येकाला नकळत ठेका धरायला लावणारे ‘बत्तमीज दिल’...पॅपॉनने सादर केलेल्या सगळ्याच गाण्यांना उपस्थितांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. वेगवेगळ्या ढंगातील रॉक तर काही फोक म्युझिक प्रकारातील गाण्यांना पुणेकरांचा दणदणीत प्रतिसाद मिळाला.
निमित्त होते, महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पॅपॉन उर्फ अंगराग महंता याच्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टचे!.. लिबर्टी स्क्वेअर फिनिक्स मार्केट सिटी येथे शुक्रवारी सायंकाळी पॅपॉनचा हा लाइव्ह परफॉर्मन्स उपस्थित तरुणाईच्या गर्दीने अधिकच खुलला. आपल्या जादूई आवाजाने पॅपॉनने तरुणाईवर अक्षरशः गारुड घातले.
मूळचा आसामी गायक असलेल्या अन् अल्पावधीतच हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःचे वेगळी शैली निर्माण केलेल्या या कलाकाराचा लाइव्ह परफॉर्मन्स अनुभवण्यासाठी तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. त्याच्या दणदणीत रंगलेल्या गाण्यांसह शांत स्वरांतील गाण्यांनाही तरुणांची तुफान दाद मिळाली.
पॅपॉन मंचावर येण्यापूर्वी अमृतांश नावाच्या पुण्यातील बँडने एक अप्रतिम मेडले सादर केला. त्यात ‘मितवाँ’, ‘माईरी’, ‘बद्तमीज दिल’, ‘बँग बँग’ या गाण्यांचा समावेश होता. ‘पिया रे’, ‘जग घुमेया थारे जैसा ना कोई’, ‘तेरे बिन नहीं लगदा दिल मेरा’, ‘अगर तुम साथ हो’, ‘इलाही’ आणि ‘हम्मा हम्मा’ यांसारख्या गाण्यांच्या सादरीकरणानेही तरुणाईला डोलायला लावले.
अमृतांश बँडच्या सादरीकरणानंतर एक गमतीदार स्पर्धा उपस्थितांमध्ये घेण्यात आली. त्यात तरुणांना पॅपॉनने गायलेले मराठी गाणे ओळखायला सांगितले गेले. ‘पाहुनी घे रे मना’ हे पॅपॉनने गायलेले मराठी गाणे ज्यांनी ओळखले, त्यांना या वेळी बक्षीसही देण्यात आले. आर. जे. निकीनेही या वेळी काही अॅक्टिव्हिटीज घेत कार्यक्रमात जान आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यूपीआय’द्वारे १३ कोटींची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) या ‘अॅप’च्या गैरवापरातून पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथून सुमारे सोळाशे व्यवहारांद्वारे १३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. हे सर्व व्यवहार ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या ‘कूल अकाउंट’मधून झाले असल्याने या पाठीमागील सूत्रधार हा एकच असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, औरंगाबाद पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, या फसवणुकीतील प्रमुख सूत्रधार हा मलेशियाला पळून गेला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘यूपीआय’ अॅपचा वापर करून नोटाबंदीच्या काळातच बँकांना गंडा घालण्यात आल्याच्या प्रकाराने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे पोलिसांकडेही ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात ‘यूपीआय’च्या वापराद्वारे ६५० व्यवहारांतून सहा कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित एक कोटी तर औरंगाबाद शहर पोलिसांच्या अखत्यारित सहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत. दरम्यान, नाशिक पोलिसांकडेही अशाच प्रकारची तक्रार नोंदवण्यात येणार असून तेथे प्राथमिक चौकशीत सहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे बँकेच्या चौकशीत उघड झाले आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
पुणे शहरात ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या २३ वेगवेगळ्या शाखांतील ५० ग्राहकांच्या अकाउंटवरून ‘यूपीआय’च्या माध्यमातून सहा कोटी १४ लाख रुपयांची रक्कम काढण्यात आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे झोनल मॅनेजर निरंजन श्रीपाद पुरोहित (वय ५९, रा. बावधन) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
बँकेच्या प्राथमिक चौकशीत ‘यूपीआय’ची ‘अॅप’ची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या खासगी कंपनीवर ठपका ठेवण्यात आला आहे. या कंपनीच्या चुकीमुळे एवढी मोठी रक्कम लुटण्यात संशयितांना यश आले असल्याचे समजते आहे. ही ऑनलाइन लूटमार करण्यामध्ये नेमके कोण सामील आहे, ही रक्कम कशाप्रकारे काढण्यात आली, ही रक्कम कुठे काढण्यात आली या तपासासाठी पुणे पोलिसांची पथके कार्यरत झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यावरील हल्ल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
येरवडा जेलमधील अझिझुद्दीन शेख या कैद्यावरील कथित प्राणघातक हल्ल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शेख याच्यावरील हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी ‘एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती.
मुख्यमंत्री कार्यालयाने आमदार जलील यांच्या तक्रारीला उत्तर देताना चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे मेलद्वारे कळवले आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन कार्यवाही व्हावी, यासाठी हे पत्र गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठविण्यात आलेले आहे. त्यांना त्या संदर्भातील आवश्यक सूचनाही करण्यात आल्या आहेत, असे जलील यांनी म्हटले आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात कर्मचाऱ्यांनी शेख याला काठ्या, चामडी पट्टे आणि बुटांनी बेदम मारहाण केली असल्याचा दावा शेखच्या नातेवाइकांनी आमदार जलील यांच्याकडे केला होता. शेखच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेण्याची मागणी जलील यांनी केली होती. जलील यांच्या पत्रानुसार शेख हा १७ वर्षे आणि सहा महिन्यांपासून जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार शेख याची जेलमधील वर्तणूक चांगलीच राहिलेली आहे. त्याच्यावरील हल्ल्याची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी व्हावी आणि आरोपांमध्ये सत्यता आढळल्यास दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जलील यांनी केली आहे.
‘शेख याचा भाऊ शहाबुद्दीन यांना दोन वेळा येरवडा कारागृहामध्ये बोलविण्यात आले होते आणि कोणतीही तक्रार न करण्याबाबत धमकाविण्यात आले होते. अन्यथा गुप्त अहवालात शेखबद्दल प्रतिकूल मत देऊन त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू, अशी धमकी देण्यात आली होती. शहाबुद्दीन यांना १४ जानेवारी २०१७ आणि १६ जानेवारी २०१७ रोजी बोलविण्यात आले होते. त्यांच्या प्रवेशाची नोंद रजिस्टरमध्ये नव्हती. मात्र, ‘सीसीटीव्ही’मध्ये त्यांच्या प्रवेशाचा फूटेज उपलब्ध आहे,’ असे आमदार जलील यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


द्विभाषिक योजनेत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्याच्या शिक्षण विभागाने द्विभाषिक पुस्तक योजनेला दिलेली स्थगिती अखेर उठवली आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या समितीनेच निवडलेल्या ३५५ पुस्तकांचे पुन्हा पुनर्मूल्यांकन करण्याची वेळ विभागावर आली आहे. शाळांना आता पुनर्मूल्यांकनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या पुस्तकांचीच खरेदी करता येणार आहे. राज्य शासनाने ही योजना नव्याने कार्यान्वित केली असली, तरी ती अधिक गुंतागुंतीची असल्याचा आरोप प्रकाशकांनी केला आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून द्विभाषिक योजना स्थगित करण्यात आली होती. शाळांना योजनेच्या अंमलबजावणीसाठी मिळालेला निधी कुठल्याही पुस्तकांसाठी वापरू नये, अशा सूचना विद्या प्राधिकरणाकडून देण्यात आल्या होत्या. योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी स्थगिती आणल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे योजनेत बदल करत शिक्षण विभागाने ३५५ पुस्तकांचे पुनर्मूल्यांकन करत पुस्तकांना गुण दिले आहेत.
पुस्तकाचे मुखपृष्ठ- मलपृष्ठ, मांडणी, कागदाचा दर्जा, पुस्तकातील मजकूर, उपयुक्त मजकूर, वाचण्यासाठी प्रेरीत करणारा आशय अशा ११ निकषांवर गुणांकन करण्यात आले आहे. त्यापैकी ६० गुणांच्या वरील पुस्तकांचीच खरेदी करावी अशा, सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिवाय पुस्तकांची १ ली ते २ री, ३ ते ५ वी आणि ६ वी ते ८ वी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार १ ली ते २ री साठी ९० पुस्तकांची निवड झाली आहे. तर ३ री ते ५ वी साठी १२३ पुस्तकांचा संच असणार आहे. १५ पुस्तके ही ६० पेक्षा कमी गुण मिळाल्याने बाद झाली आहेत. उर्वरीत पुस्तके ही ६ वी ते ८ वी साठी देण्यात आली आहेत. द्विभाषिक योजनेसाठी शाळांना देण्यात आलेल्या निधीतून इयत्ता ६ वी ते ८ वी ची पुस्तके खरेदी करता येणार नाहीत, असे विद्या प्राधिकरणाच्या परिपत्रकात म्हटले असल्याने त्या पुस्तकांचीही खरेदी होणार नाही. शिवाय सर्व शाळांनी मार्च २०१७ अखेर पुस्तकांची खरेदी करणे अनिवार्य राहणार आहे, असे आदेशही देण्यात आले आहेत. परिक्षांच्या कालावधीत शाळा १५ दिवसात पुस्तकांची खरेदी कशी करणार?, ६० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या प्रकाशकांचे तसेच ६ वी ते ८ वीची पुस्तके छापलेल्या प्रकाशकांची नुकसान भरपाई कोण देणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, योजनेच्या या नव्या रूपाला प्रकाशकांनी प्रचंड विरोध केला आहे. राज्याबाहेरच्या प्रकाशकांना फायदा मिळावा, यासाठीच पुस्तकांची इयत्तांनुसार वर्गवारी करण्यात आली आहे. राज्याच्या बाहेरच्या प्रकाशकांनी १ ली ते २ री आणि ३ री ते ५ वी या इयत्तांसाठी सर्वाधिक पुस्तके दिली आहेत. ६ वी ते ८ वी या इयत्तांमध्ये मराठी प्रकाशकांची पुस्तके मोठ्या प्रमाणावर आहेत. योजनेची सुरूवात करताना टेंडरच्या प्रक्रियेत पुस्तकांचे इयत्तेनुसार वर्गीकरण करण्यात येईल, असे कुठेही नमूद केले नव्हते, तरीही शिक्षण विभागाने हा ‘प्रताप’ केला असल्याचा आरोप प्रकाशकांनी केला आहे. योजनेविरोधात प्रकाशक कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचेही समजते आहे.

पुस्तकाच्या टेंडर प्रक्रियेत कुठेही इयत्तावार वर्गीकरण करणार असल्याचे सांगण्यात आले नव्हते, तरीही वर्गीकरण करण्यात आले. शिवाय ६ वी ते ८ वी च्या पुस्तकांसाठी शाळांना निधी वापरता येणार नाही. त्यामुळे ती पुस्तके खरेदी केलीच जाणार नाहीत. अशा वेळी प्रकाशकांनी छापलेल्या हजारो प्रतींचे काय करायचे, असा प्रश्न आहे.
- राजीव बर्वे, अध्यक्ष, अखिल भारतीय प्रकाशक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सबनीसांचा मंडळाला ठेंगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
निधीसाठी संदेशांचा भडिमार करणारे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ठेंगा दाखविला आहे. सबनीसांनी महामंडळाला एक छदामही न देण्याचा पवित्रा घेतला आहे. ‘जोशींनी निधीसाठी मलाही खडा टाकून पाहिला; पण मी महामंडळाला मदत करणार नाही,’ अशी थेट भूमिकाच सबनीसांनी शुक्रवारी जाहीर केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे साहित्य संमेलनाध्यक्षांना वर्षभरासाठी एक लाख रुपये मानधन दिले जाते. पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेल्या सबनीस यांनी या मानधनाचा हिशेब शुक्रवारी परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांच्याकडे सुपूर्द केला. सबनीस यांना पिंपरीच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी पाच लाख रुपये मानधन दिले होते, त्याचाही हिशेब सबनीस यांनी सादर केला.
महाराष्ट्रातील साहित्यिक, पत्रकार, विविध साहित्य व सामाजिक संस्थांचे प्रमुख यांच्या व्हॉटसअॅपवर मदतीचे संदेश पाठविण्याची मोहीम जोशी यांनी आखली आहे. सरकारच्या कुबड्या घेण्यापेक्षा संमेलन लोकांच्या सहकार्यातून तसेच महामंडळाच्या निधीतून व्हावे, यासाठी जोशी हे रोज अनेकांना मोबाइलवर संदेश पाठवतात. वर्षभरात केवळ दोन लाख रुपये महामंडळाच्या खात्यात जमा झाल्याने त्यांच्या या मोहिमेस अल्प प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी जोशी यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केलेले असताना आता सबनीसांनीही त्यांना ठेंगा दाखवला आहे.
साहित्य परिषदेचे एक लाख, पाटील यांनी दिलेले पाच लाख या व्यतिरिक्त सबनीस यांना वर्षभरात विविध कार्यक्रमातून १२ लाख रुपये मानधन मिळाले आहे. या वैयक्तिक मानधनातून त्यांनी अनेक संस्थांना मदत केली आहे. त्यामुळे स्वखुशीने महामंडळाला काही रक्कम देणार का, असा सवाल पत्रकारांनी सबनीसांना केला असता, मदत देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘महामंडळाच्या निधीसाठी श्रीपाद जोशी यांनी मला खडा टाकून पाहिला होता. त्यांची भूमिका चांगली आहे; पण महामंडळालाच मदत केली पाहिजे असे नाही. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यासाठी काम करणाऱ्या गरजू संस्थांना आवश्यकतेनुसार मदत करत राहीन. तो माझ्या इच्छेचा भाग आहे,’ अशी भूमिका सबनीस यांनी मांडली. ‘सुरुवातीच्या काळात अध्यक्षीय भाषण न छापणाऱ्या महामंडळावर रोष कायम आहे का,’ हा प्रश्न त्यांनी हसून टोलविला.

माझे अध्यक्षीय भाषण लवकरच इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होणार आहे. डॉ. अ. नी. माळी यांनी या भाषणाचा इंग्रजी अनुवाद केला आहे. हे अनुवादित भाषण पुस्तकातून समोर येणार आहे. ‘संमेलनाध्यक्षाचे आत्मकथन’ हे पुस्तकही इंग्रजीत प्रसिद्ध करणार आहे.
- डॉ. श्रीपाल सबनीस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला गझलकारांचा उद्या मुशायरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
यू. आर. एल. फाउंडेशन मुंबई, टेक रेल अॅकॅडमी, पुणे आणि सुरेश भट गझलमंच, पुणे यांच्या वतीने गझलसम्राट सुरेश भट स्मृतिदिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (दि. १२) ‘गझलरंग’ या मराठी गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या मुशायऱ्यात शिल्पा देशपांडे, निर्मिती कोलते, मनीषा नाईक, स्वरूपा सामंत, स्वाती शुक्ल, श्वेता रानडे, पूजा फाटे, योगिता पाटील, ममता सकपाळ आणि मोनिका सिंग (उर्दू) या महिला गझलकार सहभागी होणार आहेत.
शाहीर सुरेशकुमार वैराळ मुशायऱ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. या वेळी ‘दिवे अत्तराचे’ या अल्बमचे प्रकाशन होईल. संगीतकार रवी दाते, अभिनेत्री सीमा देशमुख आणि भूषण कदम यांची मुख्य उपस्थिती असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅव्हल्सला अपघात; ११ जण ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सला झालेल्या भीषण अपघातात ११ जण ठार झाले आहेत. रात्री हा अपघात झाला. या अपघातात ५ महिला आणि ५ पुरुषांसह एका लहान मुलीचा समावेश असल्याचं सांगण्यात येतंय.

मुलुंडहून अक्कलकोटला ही ट्रॅव्हल्स चालली होती. यावेळी रस्त्यात रानडुक्कर अचानक आडवं आल्यानं त्याला वाचवण्यात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि ही ट्रॅव्हल्स डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात ११ जण ठार झाले, असं सांगितलं जातंय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इंडियन ओशन’ने केले मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिविधी, पुणे
जॅझ फ्यूजन आणि फोक संगीतासाठी प्रसिद्ध असणाऱ्या इंडियन ओशन बँडने स्टेजवर दमदार एंट्री घेताच एकच जल्लोष झाला. त्यानंतर ‘नदीया हैं हम बहने दो’, ‘तू किसी रेल से गुजरती है’, ‘मस्त कस्तुरी’ या गाण्यांनी उपस्थित युवा मनांना साद घातली आणि त्या तालावर तरुणांना मंत्रमुग्ध करणारा अनुभव या बँडने दिला. सुश्मीत सेन, राहुल राम आणि अमित किलम या गायक-संगीतकारांच्या गायकीला उपस्थितांची भरभरून दाद मिळाली.
‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे इंडियन ओशन बँडच्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टला संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विमाननगर इथल्या फिनिक्स मार्केट सिटीच्या लिबर्टी स्क्वेअरमध्ये शनिवारी संध्याकाळी रंगलेल्या या धमाकेदार संगीत मैफलीने उपस्थितांचा वीकेंड अविस्मरणीय ठरला. आशियातला सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार पटकावणाऱ्या या बँडचा लाइव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती.
बँडचे सदस्य केव्हा सादरीकरण करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यापूर्वी कॉन्सर्टची सुरुवात ‘मलंग’ बँडच्या सादरीकरणाने झाली. त्यांनी ‘दमा दम मस्त कलंदर’ हे लोकप्रिय गाणे सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. ‘तेरे नाम से जी लूं तेरे नाम से मर जाऊ, तेरी दिवानी’ या प्रसिद्ध गाण्यावर उपस्थितांनी जल्लोष केला. त्यानंतर ‘सैय्या’ या गाण्याने बहार आणली. त्यानंतर इंडियन ओशनचे सर्वेसर्वा सुश्मीत, राहुल आणि अमित स्टेजवर येताच चाहत्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
‘नदीया हैं हम बहने दो’ या गाण्यावर तरुणाईचा मूड पकडल्यानंतर ‘तंदानू तानानू’ हे प्रसिद्ध कन्नड गाणे सादर करत बँडने उपस्थितांना फोक साँग या प्रकारातल्या लोकप्रिय रचनेवर थिरकण्यास भाग पाडले. तबला आणि ड्रमच्या जुगलबंदीवरही जल्लोष झाला. ‘तू किसी रेल रे’, ‘मन कस्तुरी’ या गाण्यांनंतर सादर झालेल्या ‘अरे रूक जा रे बंदे’ या गाण्यासह हा गीत-संगीताविष्कार कळसाला भिडला. ‘अखिया हुडिक दिया’ हे गाणे आणि त्यानंतरच्या डफलीच्या तालाचे सादरीकरणाने मैफलीचा मूड पुन्हा ‘ट्रान्स म्युझिक’ वर आणला. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात उत्तरोत्तर ही मैफल रंगली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images