Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

स्वीकृत सदस्य होणार आठ?

0
0

संख्यावाढीसाठी राज्य सरकारच्या पातळीवर हालचाली
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांसह ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून पालिकेत प्रवेश करण्याची संधी मिळणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येत कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यामध्ये पाच स्वीकृत सदस्य करून घेता येत असले, तरी त्यामध्ये आणखी तीन सदस्यांची भर घालून आठ सदस्य करून घेण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या पातळीवर हालचाली सुरू असल्याचे समजते.
महापालिका कायद्यानुसार प्रत्येक महापालिकेतील स्वीकृत सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. या सदस्यांना मतदानाचा अधिकार वगळता इतर नगरसेवकांप्रमाणे सर्व अधिकार असतात. महापालिकेतील संख्याबळानुसार प्रत्येक पक्षाला ठराविक ‘कोट्या’नुसार स्वीकृत सदस्यांची निवड करता येते. येत्या १४ मार्च रोजी विसर्जित होणाऱ्या सभागृहात राष्ट्रवादीचे दोन, तर काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य होता.
स्वीकृत सदस्यांची सध्याची पाच हीच संख्या कायम ठेवण्यात आली, तर भाजपचे तीन सदस्य होऊ शकतात. तर, राष्ट्रवादीचा एक सदस्य होऊ शकतो. तर, उर्वरित एक सदस्य कोणाचा करायचा, याचा निर्णय आयत्यावेळी घेण्यात येईल, अशी शक्यता आहे. सरासरी ३० नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य या धोरणातच बदल करण्याबाबत विचार-विनिमय सुरू आहे. स्वीकृत सदस्यत्वासाठीचे सरासरी २० नगरसेवकांची संख्या निश्चित करून त्यानुसार त्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास, पुणे महापालिकेतील स्वीकृत सदस्यांची संख्या आठपर्यंत जाऊ शकते. यामध्ये, भाजपच्या वाट्याला पाच सदस्य येऊ शकतात. तर, राष्ट्रवादीला दोन सदस्यांना संधी देता येईल. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यापैकी एखाद्या पक्षाचा सदस्य दुसऱ्या पक्षाच्या मदतीने होऊ शकतो.
स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळण्यासाठी आता बऱ्याच जणांकडून पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेमध्ये स्वीकृत सदस्यांना विविध समित्यांमध्ये स्थान देता येऊ शकते; पण त्यांना महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी देता येत नाही.
...............
गणेश बीडकरांना संधी?
भारतीय जनता पक्षाचे तब्बल ९८ नगरसेवक निवडून आले असले, तरी सभागृहाचा किंवा ते चालविण्याचा अनुभव असणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. भाजपचे सुमारे ७० नगरसेवक पहिल्यांदाच सभागृहात पाऊल टाकणार आहेत. विरोधी पक्षांकडे सभागृहातील कामाचा अनुभव असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, स्वीकृत सदस्य म्हणून भाजपकडून पक्षातील ज्येष्ठांनाच झुकते माप दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर निवडणुकीत पराभूत झाले असले, तरी त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्यासह माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, माजी गटनेते अशोक येनपुरे, माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी, गोपाळ चिंतल, शाम सातपुते, ज्योत्स्ना सरदेशपांडे यांच्यापैकी कोणाला संधी दिली जाणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हुशार माणसांवर लोकांचा गाढ विश्वास

0
0

निवडणुकीनंतर प्रथमच पवारांची राजकीय कोपरखळी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मैत्री अनेकांशी असते. राजकारणात बोट धरून आलो असे जे असे सांगतात ते काही खरे नसते. माणसं बोलायला हुशार असतात. त्यांच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवतात आणि हे पुणेकरांनी सिद्ध केले आहे,’ या शब्दांत पुणे महापालिकेतील दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्मिक शब्दांत टिप्पणी केली.
शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ गायिका डॉ. अनुराधा पौडवाल यांना राम कदम कलागौरव पुरस्कार प्रतिभा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी सुधीर गाडगीळ यांनी पवार यांच्यासह प्रतिभा पवार, अनुराधा पौडवाल यांची मुलाखत घेतली. या वेळी व्यासपीठावर महापौर प्रशांत जगताप, ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, विजय राम कदम, फत्तेचंद रांका, संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स, प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया आदी उपस्थित होते. एक लाखांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. या वेळी आदर्श कार्यकर्ता पुरस्कार नीलेश जेधे यांना प्रदान करण्यात आला.
‘राज्य आणि केंद्रामध्ये महाराष्ट्र वेगळे राज्य आहे. पुणे महापालिकेची नुकतीच निवडणूक झाली. त्या निवडणुकीच्या निकालानंतर आमचे अंकुश काकडे यांनी एका कट्ट्यावर विविध पक्षांतील मित्रांना चहा दिला. निवडणुका, राजकारणात संघर्ष हा व्यक्तिगत हिताचा असू नये. तो जनतेच्या हिताचा असावा,’ असा सल्ला पवार यांनी दिला. सार्वजनिक क्षेत्रात काम करताना ज्या कोणालाही भेटलो. त्यानंतर त्याचे नाव कम्प्युटरमध्ये लिहून ठेवायचे हे सूत्र मी पाळले. त्यामुळे दुसऱ्यांना सुखावह देणाऱ्या गोष्टी कराव्यात हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे हितावह आहे, असे पवार म्हणाले.
पवार यांच्या मनात नेमके काय चालंलय हे प्रतिभा पवार यांना तरी कळंत का या प्रश्नावर श्रीमती पवार यांनी नाही असे स्पष्ट केले. पवार यांनी पत्नीच्या उत्तराचा धागा पकडून ‘गुगली बॉलरच्या मुलीशी आपण लग्न केले आहे. त्यावेळीदेखील आपली विकेट गेली होती. आता ही तिने नाही असे उत्तर देऊन आपली विकेट काढली,’ असे सांगताच सभागृहात हास्याचे कारंजे उडाले.‘'माझ्या पत्नीने नेसलेली प्रत्येक साडी मी स्वतः खरेदी केली आहे. त्यामुळे आठवड्यातील सहा दिवस मी हिंडायला मोकळा असतो,’ असे सांगताच सभागृहात पुन्हा खसखस पिकली.
दरम्यान, अनुराधा पौडवाल यांनी आपल्या वडिलांना नसलेली गायनाची आवड ते गायनाचा प्रवास उलगडला. प्रवीण तरडे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी पौडवाल यांनी काही चित्रपटांतील गाणी सादर केली.
.
पवारांच्या पुस्तकखरेदीचे रहस्य
‘'पुस्तकांच्या नोंदी कधी ठेवत नाही. पुस्तकातील एखादी ओळ आवडली की त्या खाली लाल रेघ ओढतो. पुस्तक निवडणे अवघड काम आहे. त्यासंदर्भात चांगले वाचक असेलल्या व्यक्तींशी आपण संवाद साधतो. महाराष्ट्रात शक्यतो पुस्तक खरेदीसाठी जात नाही. राज्याबाहेर कोठे गेलो तर एकटाच पुस्तकाच्या दुकानात जातो. तेथे नवी पुस्तके कोणती आली आहेत याची माहिती घेतो. त्यावेळी महाराष्ट्रातील काही पुस्तक विक्रेते नवीन आलेल्या पुस्तकांची आपल्याकडे यादी पाठवितात. त्या यादीतील हवी ती पुस्तके निवडतो आणि ऑफिसमधील व्यक्तींना आणायला सांगतो,’ या शब्दांत पवारांनी पुस्तकांच्या आवडीनिवडीचे रहस्य उलगडले. किशोरी आमोणकर, पं. भीमसेन जोशी आवडते गायक असल्याचे सांगून यशवंतराव चव्हाण यांची इंग्लंडच्या पंतप्रधानांची ओळख, लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे अफाट वाचन, ग. दि. माडगूळकर, ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवळकर, तसेच पी. सावळाराम यांची ठाण्याच्या संमेलनात झालेली निवड यासंदर्भातील विविध आठवणींना पवारांनी उजाळा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपरफुटीची चौकशी दक्षिण मुख्यालयाकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लष्करभरतीच्या प्रश्नपत्रिका फुटीची चौकशी आता लष्करातर्फे केली जाणार आहे. लष्कराच्या पुण्यातील दक्षिण मुख्यालयातर्फे या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आर्मी रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे रविवारी उघड झाले होते. जनरल ड्युटी, टेक्निकल क्लार्क आणि ट्रेडसमन पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, प्रश्नपत्रिका फुटल्याचे लक्षात आल्यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्वरित धडक कारवाई करून निवृत्त सैनिकासह, क्लास चालक आणि एजंट अशा १८ व्यक्तींना अटक केली होती. त्यामुळे सहा केंद्रांवरील परीक्षा रद्द करण्याची नामुष्की लष्करावर ओढवली होती. तसेच या प्रकरणात लष्करातील व्यक्तींचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर लष्करातर्फे ही चौकशी करण्यात येणार आहे.
पुण्यातून ही प्रश्नपत्रिका फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे हे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयांतर्गत येत असल्याने त्याची चौकशी दक्षिण मुख्यालयातर्फे करण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींकडे ही प्रश्नपत्रिका कशी व कोठून आली, प्रश्नपत्रिका फोडण्यात अन्य कोणाचा सहभाग होता, याची चौकशी केली जाईल, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ अँजिओप्लास्टी १.२० लाखांत

0
0

स्टेंट बसविण्यासाठी खर्चात ४० टक्क्यांनी कपात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्टेंटच्या किमती आवाक्यात आल्याने अँजिओप्लास्टीचा खर्च दीड ते दोन लाखांनी घटला आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये १.२० लाख रुपयांमध्ये अँजिओप्लास्टी करणे शक्य झाले आहे.

केंद्र सरकारने किंमत घटविल्याने चांगल्या दर्जाचे स्टेंट तीस हजार रुपयांमध्ये उपलब्ध झाले आहेत. शिवाय उच्च वर्गीयांना हवे असणारे महागडे स्टेंटही उपलब्ध आहेत. त्यामुळे गरिबांसह श्रीमंतांचाही फायदा होणार आहे. केंद्र सरकारने स्टेंटच्या किमती कमी केल्या आहेत. साडेसात हजार आणि तीस हजार रुपये असे दोन प्रकारचे स्टेंट उपलब्ध झाले आहेत. ‘पूर्वी स्टेंट बसविण्यासाठी गरीब पेशंटांना अँजिओप्लास्टीचा खर्च दीड ते दोन लाख रुपये येत होता. आता या खर्चात ४० टक्क्यांनी कपात झाली आहे. स्टेंट बसविण्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये आता पेशंटला सुमारे १.२० लाख रुपये मोजावे लागणार आहेत,’ अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ आणि कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडियाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. शिरीष साठे यांनी दिली.

स्टेंटसह अँजिओप्लास्टीचा खर्च पूर्वी ९० हजार रुपये येत होता. आता ऑपरेशनचा साधारण खर्च तोच राहील. मात्र स्टेंटच्या किमती कमी झाल्याने एकूण खर्च कमी होईल. स्वस्तात स्टेंट उपलब्ध होणार असल्याने गरीबांना त्याचा फायदा होईल. त्याशिवाय श्रीमंतांसाठी आवश्यक प्रिमियर स्टेंट उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांनाही फायदा होईल, असा विश्वास डॉ. साठे यांनी व्यक्त केला.
हॉस्पिटल असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष डॉ. बोमी भोट म्हणाले,की ‘रुबी हॉस्पिटलमध्ये ३० हजार रुपयांमध्ये स्टेंट उपलब्ध आहेत. सरकारने जाहीर केलेल्या दरात स्टेंट देत आहोत. पूर्वी स्टेंटवगळून अँजिओप्लास्टीचा खर्च ६० ते ६७ हजार रुपये होता. स्टेंटसह संपूर्ण खर्च दोन लाखांपर्यंत जात होता. स्टेंटच्या किमती कमी झाल्याने 'अँजिओप्लास्टीचा खर्च १.२०लाखांपर्यंत येऊ शकतो.’ स्टेंटच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे अँजिओप्लास्टीचा खर्च कमी झाला आहे. परंतु, स्टेंटच्या किमतींवर विमा कंपन्यांची नजर होती. आता ३० हजार रुपयांपर्यंतचे स्टेंट उपलब्ध आहेत. सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने आदेश दिले आहेत, असे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. धनजंय केळकर यांनी स्पष्ट केले.

स्टेंटच्या किमती कमी झाल्याने त्याचा सामान्य गरीब पेशंटना फायदा होईल. त्याबाबत सरकारचे कौतुक करावे लागेल. पण, श्रीमंतांना हवे असणारे स्टेंट उपलब्ध होत नसल्याने पुण्याबाहेर अथवा देशाबाहेर पेशंट पाठवावे लागतील. त्यासंदर्भात यापूर्वीच आम्ही सरकारशी बोलणी केली. पण सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात हृदयरोग तज्ज्ञांमध्ये नाराजी आहे.
डॉ. एम. एस. हिरमेठ, हृदयरोग तज्ज्ञ व अध्यक्ष, कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणे-दौंड’ की ‘दौंड-पुणे’

0
0

गाडीचा निर्णय होईना; दौंड उपनगरीय सेवेची अद्याप प्रतीक्षाच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बहुप्रतिक्षीत पुणे-दौंड उपनगरीय रेल्वे सेवा ‘पुणे-दौंड’ की ‘दौंड-पुणे’ अशी सुरू करावी, याबाबत रेल्वे प्रशासन आणि प्रवासी संघटनांमध्ये खल सुरू आहे. हा निर्णय झाल्यानंतर त्या गाडीचे वेळापत्रक निश्चित होऊन मार्च महिन्याच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या चार दशकांपासून पुणे-दौंड लोकल सेवेची फक्त चर्चाच आहे. ती चर्चा पुणे-दौंड मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. त्यानंतर इमू (इलेक्ट्रीक मल्टिपल युनिट) ऐवजी डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) गाड्यांच्या यशस्वी चाचण्या या मार्गावर घेण्यात आल्या. त्यानंतर लवकरच ही सेवा सुरू होईल, असे वाटले होते. मात्र, अद्याप सेवेची प्रतीक्षाच आहे. महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची आचारसंहिता आणि वेळापत्रक निश्चितीमुळे ही गाडी अद्याप रुळावर आली नसल्याचे समजते.
ही गाडी पुणे ते दौंड याप्रमाणे सुरू करावी, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर, दौंड-पुणे रेल्वे प्रवासी संघटनेच्या मते ही गाडी ‘दौंड-पुणे’अशी सुरू झाली पाहिजे. विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विकास देशपांडे यांनी तशी कल्पना रेल्वे प्रशासनाला दिली आहे. तसेच, देशपांडे यांनी ‘दौंड-पुणे’ या गाडीचे वेळपत्रक तयार करूनही सादर केले आहे. दौंड-पुणे अशी गाडी धावल्यास पहाटे पाच वाजता पहिली गाडी दौंडवरून सुटेल. या वेळी दौंडवरून पुण्याला नोकरीसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याउलट पुण्यावरून-दौंडला जाणाऱ्यांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे, असे मत देशपांडे यांनी नोंदविले आहे. रेल्वे प्रशासनाकडून त्यावर विचार सुरू आहे.

प्रभूंच्या हस्ते कंदील?
गाडी पुणे-दौंड की दौंड-पुणे हे निश्चित झाल्यानंतर तातडीने ही सेवा सुरू होईल. तसेच, मार्चमध्ये तिसऱ्या आठवड्यानंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्याच हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखविला जाण्याची शक्यता रेल्वेतील सूत्रांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थसंकल्पीय सूचना केरात

0
0

राज्य सरकारच्या विभागांची उदासीनता उजेडात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोठा गाजावाजा करून अर्थसंकल्पात सहभाग घेण्यासाठी नागरिकांकडून मागविण्यात आलेल्या तीन हजार सूचनांना राज्य सरकारने केराची टोपली दाखविली आहे. खुद्द सरकारनेच माहितीच्या अधिकारात ही माहिती दिल्याने विविध विभागांची यासंदर्भातील उदासीनता समोर आली आहे.
वित्त विभागाचे अवरसचिव सु. मु. ऐगळीकर यांनी पुण्यातील सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांना ही माहिती दिली. राज्य सरकारने डिसेंबर २०१५ मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग घेण्याची योजना आखली होती. त्यानुसार नागरिकांकडून ‘नाविन्यपूर्ण सूचना’ या योजनेअंतर्गत विविध खात्यांच्या कामांबाबत सूचना मागविण्यात आल्या. त्यानुसार नागरिकांकडून तीन हजार ११४ सूचना करण्यात आल्या होत्या. त्यांची छाननी करून २०१६ च्या अर्थसंकल्पात त्याचा समावेश होणे अपेक्षित होते. मात्र, यासंदर्भात सरकारच्या पुढील कार्यवाहीला मुहूर्तच लाभला नाही. नागरिकांकडून मिळालेल्या सूचना संबंधित विभागांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आल्या. विभागांनी निवडलेल्या सूचना शिफारशींसह यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीपुढे सादर करण्यासाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात आल्या.
या समितीची पहिली बैठकच दोन जून २०१६ रोजी, म्हणजे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर झाली. त्यामुळे या सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश होऊ शकला नाही आणि नागरिकांचा थेट सहभाग कागदावरच राहिला. त्यामध्येही या विभागांची उदासीनता दिसून आली आहे. सरकारच्या ३० विभागांपैकी फक्त नऊ विभागांनी एक हजार सूचनांची छाननी करून आपले अभिप्राय कळविले. त्यामध्ये वित्त, जलसंपदा आणि कृषि विभागांनी अभिप्राय पाठविले. त्यानंतर तीन हजार ११४ सूचनांपैकी फक्त आठ सूचना स्वीकारार्ह असल्याचे त्यामध्ये कळविण्यात आले. तसेच विभागांकडून शफारशींसह मिळालेल्या उर्वरित सूचना समितीसमोर सादर करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या १८ मार्च रोजी यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र, या समितीच्या पुढील बैठकीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात तरी नागरिकांच्या थेट सहभागाची योजना प्रत्यक्षात येणार का, याबाबत शंका आहे. राज्य सरकारकडून वेगवान कार्यवाहीच्या घोषणा वारंवार करण्यात येत आहेत. अशा काळात सरकारी विभागांची उदासीनता धक्कादायक असून नागरिकांचा सहभाग घेण्याची घोषणाही कागदावरच राहत असल्याची टीका वेलणकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी तसे बोललोच नाही

0
0

चंद्रकांत पाटील यांचा बार असोसिएशनकडे खुलासा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पुण्याला खंडपीठाचे आमिष दाखवावे लागले असे वक्तव्य आपण केले नसून, ते आपल्या तोंडी घालण्यात आले आहे,’ असा खुलासा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे बार असोसिएशनचे अॅड. राजेंद्र दौंडकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे केला आहे. पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील वकिलांनी आयोजित केलेली निषेध सभा त्यानंतर मागे घेण्यात आली.
कोल्हापूर येथील सर्वपक्षीय बैठकीत मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापूराला द्यावे, जमले तर पुण्यालाही द्यावे असा उल्लेख ठरावात आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या सूचनेवरून मुख्यमंत्र्यांनी पुण्याचा उल्लेख केला आहे. मात्र, ते नाव म्हणजे केवळ आमिष दाखविल्यासारखे आहे. मूळ मागणी कोल्हापूरचीच आहे, असे वक्तव्य पाटील यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
या प्रकाराचा निषेध करण्यासाठी पुणे बार असोसिएशनच्या सभासदांनी सोमवारी सभा आयोजित केली होती. मात्र, ही माहिती समजताच पाटील यांनी फोनवरून अॅड. दौंडकर यांच्याशी संपर्क साधला. अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य आपण केलेले नाही. ते माझ्या तोंडी घालण्यात आले आहे. त्यासंदर्भात तशी प्रेसनोट लगेच देतो असेही पाटील यांनी स्पष्ट केले. पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणच्या खंडपीठाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे बार असोसिएशन आणि कोल्हापूर बार असोसिएशनच्या सदस्यांच्या संयुक्त बैठकीचा प्रस्तावही आपण मांडल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पाटील यांचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली सभा रद्द करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रेनडेड तरुणाचे चौघांना जीवनदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील बावीस वर्षीय ब्रेनडेड युवकाने दिलेल्या अवयवांमुळे मुंबईतील एकोणतीस वर्षाच्या तरुणासह चौघांना जीवनदान मिळाले आहे. आतापर्यंत पुण्यातून दहा हृदयांचे दान करण्यात आले आहे.
‘काही दिवसांपूर्वी बावीस वर्षांच्या तरुणाचा अपघात झाला होता. दोन दिवसांपूर्वी कर्वे रस्त्यावरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हा युवक ब्रेनडेड झाला. त्याच्या आई-वडिलांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीला त्याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर त्या युवकाचे हृदय, दोन मूत्रपिंड, यकृत, दोन डोळे देखील काढण्यात आले. ते यकृत रायपूरच्या ४२ वर्षांच्या व्यक्तीला बसविण्यात आले. त्या व्यक्तीला यकृताचा आजार होता. एक वर्षापासून त्यांच्या पोटातून पाणी काढण्यात येत होते. डोळ्यांतून रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे दोन महिन्यांपासून सह्याद्रीमध्ये हा रुग्ण उपचार घेत होता. आतापर्यंत सह्याद्री हॉस्पिटलमधून ३८ यकृत प्रत्यारोपण कऱण्यात आले आहे,’अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. बिपीन विभुते यांनी दिली.
डॉ. विभुते यांच्यासह डॉ. मनीष पाठक, डॉ. राहुल सक्सेना, डॉ. अभिजित माने आणि डॉ. राहुल तांबे यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. केतन पै, डॉ. अद्वैत कोथरूडकर, मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. अनिल गोडबोले यांनी ६१ वर्षाच्या पेशंटला मूत्रपिंड प्रत्यारोपण केले. एक मूत्रपिंड जहांगीर हॉस्पिटलमधील पेशंटला देण्यात आले.
‘सह्याद्री हॉस्पिटल ते लोहगाव विमानतळापर्यंतचे अंतर २० मिनिटांत ग्रीन कॉरिडॉरद्वारे कापण्यात आले. डोक्याला दुखापत झाल्याने डोळे खराब झाले होते. त्यामुळे त्याचे रोपण करण्यात आले नाही. दोन वर्षांत पुण्यातून दहावे हृदय बाहेर पाठविण्यात आले. त्यात मुंबई, चेन्नई, दिल्ली आदी शहरांचा समावेश आहे. सर्वाधिक हृदय रुबी हॉस्पिटलमधून पाठविण्यात आले आहे,’ अशी माहिती प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी) समन्वयक आऱती गोखले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टॅक्सी, कॅबला ‘सेंट्रल लॉक’ नको

0
0

महिलांच्या सुरक्षेसाठी टॅक्सी पॉलिसीमध्ये शिफारस; केंद्र सरकारकडून मान्यता

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
Tweet : @kuldeepjadhavMT

पुणे : खासगी टॅक्सी आणि कॅबमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने ही सेवा देणाऱ्या वाहनांमध्ये ‘सेंट्रल लॉक’ प्रणाली न बसविण्याची शिफारस केंद्र सरकारडे करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ‘टॅक्सी पॉलिसी’साठी नेमलेल्या समितीने ही शिफारस केली असून, समितीचा अहवाल मंत्रालयाने स्वीकारला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ‘टॅक्सी पॉलिसी’ निश्चित करण्यासाठी या विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती. त्यामध्ये रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाच्या सहसचिव, उपसचिव आणि दिल्ली, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व तेलंगना या राज्यांच्या परिवहन आयुक्तांचा समावेश होता. या समितीने मंत्रालयाला डिसेंबर २०१६ मध्ये अहवाल सादर केला. मंत्रालयाने तो अहवाल स्वीकारला आहे. तसेच, सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना तो अहवाल पाठविला असून, टॅक्सी परवाना देताना अहवाल विचारात घेण्यात यावा, अशी सूचना केली आहे.
देशातील बहुतांश शहरांमध्ये खासगी टॅक्सी आणि कॅबने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वाढत्या सेवेमुळे टॅक्सी चालविणाऱ्यांबरोबरच कॅबच्या माध्यमातून मोठमोठ्या कंपन्याही या क्षेत्रात उतरल्या आहेत. गेल्या काही वर्षात टॅक्सी, कॅबने प्रवास करणाऱ्या महिलांवर बलात्कार आणि त्यानंनतर त्यांचा खून केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर सिटी टॅक्सी पॉलिसी तयार करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या समितीने वाहनांच्या ‘लॉकिंग’ प्रणालीमध्ये बदल करण्याची सूचना केली आहे.
‘सेंट्रल लॉक’ प्रणालीमुळे सर्व दरवाजांचे नियंत्रण ड्रायव्हरला प्राप्त होते. ड्रायव्हर सीटच्या बाजूला असलेल्या दरवाजाला त्याचे नियंत्रण असते. त्याने बटण चालू केल्यास, मागे बसलेल्या प्रवाशांना दरवाजा उघडायचा असल्यास, ड्रायव्हरने तो ‘स्वीच’ बंद केल्याशिवाय दरवाजा उघडता येत नाही. या प्रणालीमुळे आपतकालीन परिस्थितीत महिला प्रवाशांना स्वतःची सुटका करून घेणे किंवा मदतीसाठी प्रयत्न करणे शक्य होत नाही.

परवाना देतेवेळी तपासणी व्हावी
सध्या मोठ्या प्रमाणात टॅक्सी आणि कॅबद्वारे सेवा दिली जाते. यातील असंख्य वाहनांना ‘सेंट्रल लॉक’ प्रणाली अस्तित्वात आहे. त्यामुळे या वाहनांचे परमिट नूतनीकरण करताना वाहनांची तपासणी करून ती निकामी करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. तसेच, नवीन वाहनांना टॅक्सी परवाना देताना त्याची पाहणी करणे अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर ठाण्यांना अखेर मुहूर्त

0
0

पुढील आठवड्यात मुख्यालयात कार्यरत होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि ‘व्हाइट कॉलर’ गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी पुढील आठवड्यापासून सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात येत आहे. शिवाजीनगर मुख्यालयात सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात येणार आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, आयुक्तालयात स्वातंत्र्यदिनी सुरू करण्यात आलेल्या ‘सायबर लॅब’ला सायबर पोलिस ठाण्याचा दर्जा देण्यात आला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार राज्यात नव्याने ४३ सायबर पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यातही सायबर पोलिस ठाणे सुरू होत आहे. राज्य सरकारने वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच तपासाचा वेग वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात, आयुक्तालयात सायबर पोलिस ठाणे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे पोलिसांचा सायबर सेल मुंबई खालोखाल राज्यात सर्वांत मोठा आहे. यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि फौजदारांची फौज कार्यरत आहे. पुणे पोलिसांनी दिल्ली, झारखंड येथील अनेक टोळ्यांना गजाआड करून फसवणुकीचे गुन्हे रोखण्यात यश मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुढील महिन्यांत सायबर पोलिस ठाणे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
सायबर गुन्ह्यांमध्ये सुमारे १४१ टक्क्यांनी झालेली वाढ पाहता, ती नियंत्रणात आणण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सायबर पोलिस ठाणे सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन होता. प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलिस ठाणे सुरू करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील, आयुक्तालयातील तंत्रज्ञानयुक्त केंद्राचे रुपांतर सायबर पोलिस ठाण्यात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनी राज्यातील सर्व जिल्हे, पोलिस आयुक्तालयांमध्ये ३४ सायबर लॅब सुरू केल्या होत्या. या लॅबचे रूपांतर सायबर पोलिस ठाण्यात करण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारच्या ५४ सायबर लॅब असून, त्यातील ३४ लॅब जिल्हास्तरावर, नऊ आयक्तालयांमध्ये तर सात परिक्षेत्र कार्यालयांमध्ये कार्यरत होतील.

सायबर क्राइमचे वाढते प्रस्थ
राज्यात सायबर क्राइमचा विळखा वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद या प्रमुख शहरांना या समस्येने ग्रासले आहे. मोठ्या शहरांबरोबरच द्वितिय श्रेणीतील शहरांमध्येही सायबर क्राइम हातपाय पसरत असल्याचे दिसून आले आहे. वाढत्या नेटबँकिंगमुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ही प्रकरणे निकाली काढून पीडितांना न्याय देण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने सायबर पोलिस ठाणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसएफआय’कडून ‘अभाविप’विरोधी एल्गार

0
0

विनोद तावडेंच्या विरोधात घोषणाबाजी; पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ (एसएफआय) आणि ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (एबीव्हीपी) या दोन विद्यार्थी संघटनांमधील संघर्षात वाढच होत आहे. त्यातच निदर्शने करण्यासाठी ‘एसएफआय’ला पोलिसांनी सोमवारी परवानगी नाकारली. मात्र, काही वेळातच परवानगी मिळाल्याने विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी ‘एबीवीपी की गुंडागर्दी नही चलेगी’, ‘एबीवीपी मुर्दाबाद’, ‘विनोद तावडे होश मे आओ’, ‘विनोद तावडे मुर्दाबाद’, ‘भारतीय लोकशाही झिंदाबाद’ या घोषणांनी विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला. ‘अभाविपच्या मोर्चाला परवानगी मिळते; पण आम्हाला कायदा सुव्यवस्थेचे कारण दाखवले जाते,’ असे सांगून विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांविषयीच्या काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यावरून ‘एसएफआय’ आणि ‘अभाविप’च्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ‘अभाविप’चा निषेध करण्यासाठी ‘एसएफआय’तर्फे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, पोलिसांनी सोमवारी सकाळी आंदोलन करण्यास मज्जाव केला. विद्यापीठातील अनिकेत कँटिनजवळ ‘एसएफआय’च्या कार्यकर्त्यांची संख्या वाढू लागल्याने तसेच त्यांनी विनंती केल्याने परवानगी देण्यात आली.
‘कुलगुरूंच्या संमतीविना पोलिस विद्यापीठात येऊ शकत नाहीत. विद्यापीठाची स्वायत्तता आणि विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी पोलिसांनी विद्यापीठात येऊ नये. सरकार पोलिसांवर दबाव टाकून संघटनांवर कारवाई करत आहे,’ असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. ‘या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्रसिद्ध करून अभाविपच्या विद्यापीठाबाहेरील कार्यकर्त्यांवर कारवाई करावी,’ अशी मागणी ‘एसएफआय’ने केली. यापुढेही हल्ले होण्याची शक्यता गृहीत धरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी, असे कुलगुरूंना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

परिसरात पडसाद नाहीत
विद्यापीठात एका ठिकाणी एसएफआयचे आंदोलन सुरू असताना परिसरात त्याचे काहीच पडसाद दिसत नव्हते. विद्यापीठाचे कामकाज सुरळीत सुरू होते. तसेच, अन्य भागात पोलिस बंदोबस्त नसूनही प्रवेशद्वारापाशीही गोंधळाची कोणतीच खूण जाणवत नव्हती. ‘अभाविपच्या मोर्चाला पोलिस परवानगी देतात. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो तरी कायदा सुव्यवस्थेचे कारण देऊन तासभर आधी परवानगी नाकारली जाते. अभाविपच्या मोर्चाने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही का,’ असा सवाल सोमनाथ निर्मळ, विलास साबळे यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानोबा-तुकोबांची मराठी अमर : विश्वास पाटील

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘जगातील पहिल्या दहा भाषांत मराठी आहे, त्यामुळे मराठीच्या भवितव्याची काळजी करण्याचे कारण नाही. व्यवहारी जगाच्या छातीवर ती त्रिशूळ घेऊन लढेल. ज्ञानोबा-तुकोबांची मराठी अमर आहे,’ असे नमूद करीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी ‘मटा मैफल’ची सोमवारी सांगता केली. ‘मराठीच्या भवितव्याची काळजी करण्याचे कारण नाही,’ असे सांगतानाच ‘जग आहे, तोपर्यंत मराठी असेल,’ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे स. प. महाविद्यालयात आयोजिलेल्या ‘मटा मैफल’ची तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांनंतर सुरेख सांगता झाली. पाटील यांनी मराठीविषयी आशावाद व्यक्त करतानाच तरुण लेखकांनी लिखाणासाठी काय केले पाहिजे, याचा कानमंत्र दिला; तसेच आपला लेखनप्रवास त्यांनी उलगडला. ‘मटा’ने आयोजिलेल्या गूढकथा, प्रेमकथा आणि लघुत्तम कथा स्पर्धेच्या, तसेच कविता स्पर्धेच्या विजेत्यांना या वेळी पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

‘वाचणारे वाढले आहेत; पण सशक्त लिहिणारे कमी झाले आहेत. लिहिणारे दमदार हात उरलेले नाहीत,’ अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. ‘उत्तम लिहिण्यासाठी उत्तम वाचन असणे आवश्यक आहे. उत्तम वाचण्याबरोबर जीवनानुभव महत्त्वाचा आहे. जे जे उत्तम, ते ते सुंदर व ते ते मंगल याचा वसा घेतला पाहिजे. साने गुरुजी, अत्रे, पुलं, हरी नारायण आपटे, ना. सी. फडके अशा लेखकांचा संस्कार होणे आवश्यक आहे,’ याकडे लक्ष वेधून पाटील यांनी काय वाचावे याबाबत मार्गदर्शन केले.

तरुण लेखकांना कानमंत्र देताना ते म्हणाले, ‘मराठी भाषा प्रवाही आहे. शब्दांत बदल झाला की घोटाळा होतो. लेखकाने विषयाप्रमाणे भाषेचा पोत बदलला पाहिजे. लेखकाने आपण वावरतो तो परिसर लिखाणात टिपला पाहिजे. लघुकथा, कादंबरी चितारताना विषयाशी एकरूप झाले पाहिजे. जीवनात घडणाऱ्या चांगल्या-वाईट प्रसंगांना उतरविण्यासाठी लेखकाकडे कोवळे मन हवे. आजूबाजूचे विषय लेखकाला ढूसण्या देत असतात. त्यासाठी आपण दोन पाऊले पुढे गेले पाहिजे. भारतातील उत्तमोत्तम साहित्य वाचलेच पाहिजे.’

तत्पूर्वी, शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष एस. के. जैन यांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वरिष्ठ सहसंपादक श्रीधर लोणी यांनी प्रास्ताविक केले. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे विशेष प्रतिनिधी सिद्धार्थ केळकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील मतमोजणीत गोंधळ?

0
0

Chaitanya.Machale@timesgroup.com
Tweet : @ChaitanyaMT
Suresh.Ingale@timesgroup.com
Tweet : @sureshingaleMT

पुणे : महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस झाल्यानंतरही ‘स्मार्ट’ पुणे महापालिकेला झालेले मतदान व मोजलेले मतदान यांचा मेळ घालता आलेला नाही. पालिकेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या झालेल्या मतदानाची आकडेवारी आणि मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आलेल्या मतदानाचा तपशील यांमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे ४१ प्रभागांमध्ये तफावत आहे. १४ प्रभागांमध्ये मतदानापेक्षा कमी मते मोजणीच्या वेळी आढळून आली आहेत.

गेल्या आठवड्यात झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागांत झालेले मतदान आणि उमेदवारांना मिळालेली मते यांची माहिती महापालिकेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या आकडेवारीत गोंधळ असून, चौदा प्रभागांमध्ये निवडणूक रिंगणातील उमेदवार आणि ‘नोटा’ला पसंती असलेल्या मतांची संख्या प्रत्यक्ष मतदानापेक्षा ६८५ पर्यंत कमी भरली आहे. ही मते कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उर्वरित प्रभागांमध्ये प्रत्यक्ष मतदानापेक्षा निकालातील मतदानाचे आकडे अधिक असून, एका प्रभागातील मतदानामध्ये तब्बल ५५५ ने वाढ झाली आहे. सर्वच प्रभागांमध्ये हा गोंधळ दिसत असल्याने ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन’बाबत (ईव्ही‌एम) घेत असलेल्या शंका खऱ्या आहेत काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ईव्हीएमद्वारे मतदान करताना प्रत्येकाला चार मते द्यावी लागत होती. प्रत्येक गटातील मशिनवरील बटन दाबल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही, असे आधी स्पष्ट केले गेले आहे. त्यामुळे प्रत्येक गटासाठी झालेल्या मतदारांची संख्या एकसारखी असणे आवश्यक असतानाही निकालात ही संख्या वेगवेगळी दाखविल्याने उमेदवारांत गोंधळ निर्माण झाला आहे. ताडीवाला रोड ससून हॉस्पिटल या प्रभाग क्रमांक २० मध्ये ३० हजार ५८४ मतदान झाल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये या प्रभागातील अ गटातील सर्व उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज ही २९ हजार ८९९ आहे. ब गटातील उमेदवारांच्या मतांची बेरीज ३० हजार ५९६ आहे. यामुळे अ गटातील ६८५ मते कोठे गेली आणि ब गटात १२ मते कशी वाढली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी या प्रभाग क्रमांक १२ मधील ड गटात ५२८ मते आणि बावधन कोथरूड डेपो या प्रभाग क्रमांक १० मधील अ, क आणि ड गटातील ३४१ मते कमी झाली आहेत. तर प्रभाग क्रमांक १३ हॅपी कॉलनी एरंडवणे या प्रभागातील चारही गटातील मते ३८९ मतांनी कमी झाली आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात झालेल्या मतदानापेक्षा मोजण्यात आलेली मते कमी आणि अधिक झाल्याचे समोर आल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी बँकांचा एक दिवसाचा संप

0
0

पुणेः सरकारी बँकांच्या खासगीकरणाला विरोध तसेच बँक कर्मचाऱ्यांविरोधात असलेल्या धोरणाच्या विरोधात देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसाचा संप पुकारला आहे. भारतीय मजदूर संघप्रणित दोन संघटना वगळता इतर संघटना यात सहभागी होणार आहेत.

युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइज युनियनने हा संप पुकारला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या चार आणि अधिकाऱ्यांच्या तीन संघटना सहभागी होणार आहेत. भारतीय मजदूर संघ प्रणित नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या संपात सहभागी होणार नाहीत. ‘सरकारचे बँकांविषयीचे धोरण बँकिंग क्षेत्राला संपवणारे आहे. त्याला विरोध दर्शविण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे,’ अशी माहिती बँक कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास उटगी यांनी दिली. ‘ज्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे, त्या अप्रस्तुत असल्याने एनओबीडब्ल्यू आणि नोबोने यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे नोबोचे सरचिटणीस मधू सातवळेकर यांनी सांगितले. महाराष्ट्र बँकेच्या लोकमंगल या मुख्यालयासमोर सकाळी दहा वाजता निदर्शने करण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहिणीची बदनामी केली म्हणून मेव्हण्याचा खून

0
0

पुणेः बहिणीची बदनामी केल्याच्या कारणावरून वडगावमध्ये मेव्हण्याचा खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तिघांना अटक केली.

अशोक रामबाबू सिंग (वय ३५, रा. गोयलगंगा कॅम्पस, मूळ बिहार) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सिंग याचा मेव्हणा मिथुन बिगू सिंग (वय १८), धीरज राम सिंग (वय २१) आणि रुपेश राम आशिष सिंह (वय २३, रा. सर्व रा. गोयलगंगा कॅम्पस, मूळ बिहार) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि मयत मूळचे बिहारचे आहेत. पुण्यात ते बिगारी कामे करतात. सध्या ते गोयलगंगा कॅम्पस येथे राहण्यास होते. मिथुनच्या बहिणीसोबत अशोकसिंगचे लग्न झाले आहे. लग्नानंतर अशोक पत्नीला त्रास देत होता. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. तसेच, अशोक हा मिथुनच्या बहिणीची बदनामी करत होता. त्यामुळे मिथुन आणि अशोक यांच्यातही वादावादी झाली होती. गोयलगंगा कॅम्पसच्या पाठीमागे असणाऱ्या मोकळ्या जागेत मिथुन आणि अशोक रविवारी रात्री मद्यपानासाठी बसले होते. मद्यपानानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर चिडून आरोपींनी अशोकच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जवळच्या कॅनॉलमध्ये टाकला. सोमवारी सकाळी पोलिसांना कॅनॉलमध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळाली. सिंहगड रोड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू जगताप, उपनिरीक्षक गिरीश सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मकरंद विचारतोय, कोणी तूर घेता का तूर...?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘तुरीचा तुटवडा होता आणि दर चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन घेतले. आता उत्पादन निघाल्यावर ‘नाफेड’ने तुरीची खरेदीच बंद केली आहे. त्यामुळे खासगी व्यापारी भाव पाडून तूर खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांनी करावे तरी काय,’ असा प्रश्न नाम फाउंडेशनचे संस्थापक व अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी उपस्थित केला. देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाल्यानंतरही शेतकऱ्यांना आपण न्याय देऊ शकलो नाही, ही मोठी शोकांतिका आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘मानवता पुरस्कार’ संस्थात्मक कार्यासाठी नाम फाउंडेशनला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी अनासपुरे बोलत होते. एक लाख रुपये आणि स्मृतिचन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर, वैयक्तिक पुरस्कार जीवरक्षक राजेश काची यांना प्रदान करण्यात आला. पंचवीस हजार रुपये आणि स्मृतिचन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहन कदम आदी या वेळी उपस्थित होते.

मी भारतीय नागरिक असून, गेल्या काही वर्षांपासून ‘इंडिया’मध्ये राहत आहे. एकीकडे महासत्तेची स्वप्ने पाहिली जात आहेत. तर, दुसरीकडे बसपाससाठी पैसै नाहीत म्हणून विद्यार्थिनी आत्महत्या करतात. हुंड्यासाठी आई-वडीलांना जमीन विकायची वेळ येऊ नये, म्हणून मुली प्राण त्यागतात. भारतातील ही परिस्थिती नाहीशी झाली पाहिजे, अशी अपेक्षा अनासकर यांनी व्यक्त केली.

देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू शेती आहे. मात्र, शेतकरी आजही गरीब आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांनी योगदान देणे महत्वाचे आहे. आजच्या शिक्षणात संस्कार लुप्त होत चालले आहेत. स्वार्थ वाढल्यामुळे ‘मी’ आणि ‘माझे’ या पलीकडे जाऊन माणूस विचार करायला तयार नाही. अशा स्वार्थी लोकांच्या संवेदना जागृत होण्याची गरज असल्याचे मत राणे यांनी व्यक्त केले.

भारती मेडिकल फाउंडेशनच्या वतीने भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांनी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश नामसाठी मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द केला. या प्रसंगी डॉ. पतंगराव कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. राजेंद्र उत्तुरकर आणि डॉ. ज्योती मंडलिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हिंदी येत असेल तरीही, बँका किंवा मार्केटिंग कंपन्यांकडून येणाऱ्या फॉन कॉलवर मराठी भाषेतच बोलले पाहिजे. असे केल्यास मार्केटिंग कंपन्यांना कॉल सेंटरमध्ये मराठी तरुणांना नोकरी देणे भाग पडेल, असे आवाहन अनासपुरे यांनी केले.

राणे कोणालाच ऐकत नाहीत!

‘काँग्रेस नेत्यांच्या बैठकीमध्ये नारायण राणे बोलायले लागल्यानंतर कोणालाच ऐकत नाही. त्यांना कोणीही थांबवायचा प्रयत्न केला, तरी ते थांबत नाहीत. त्यांना फक्त मी थांबवू शकतो,’ अशी टिप्पणी डॉ. पतंगराव कदम यांनी केली. त्यावर राणेंसह उपस्थितांमध्ये हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंडमध्ये राष्ट्रवादीला एकतर्फी कौल

0
0

नरेंद्र जगताप, दौंड

जिल्हा परिषदेच्या सहापैकी पाच व पंचायत समितीच्या बारापैकी अकरा जागा जिंकून आल्याने दौंड तालुक्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाला. माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. एवढा एकतर्फी कौल मिळाल्याने तालुक्यातील बंद पडत चाललेल्या घड्याळाची टिक टिक पुन्हा सुरू झाली आहे; तर रासप-भाजप-आरपीआय महायुतीला केवळ एक जागा मिळाल्याने तालुक्यात कमळ कोमेजले.

गेली काही वर्ष अच्छे दिन येतील या आशेवर एका मागोमाग एक निवडणुकीत दौंड तालुक्यातील जनता बारामतीकरांच्या विरोधातील बंडखोरी उचलून धरत होती. मात्र, हा घड्याळाच्या विरोधातील हे वातावरण आमदार अॅड. राहुल कुल यांना टिकवून ठेवता आले नाही. शिवसेनेची एका गणात दखल घेण्याजोगी लढत झाली. अपक्षांच्या एका गटाने लक्षणीय मते मिळवली.

दौंड तालुक्यातील प्रत्येक निवडणूक ही कुल आणि थोरात या दोन गटांतच होते. तालुक्यात तिसरा पर्याय निर्माण झालेला नाही. जो तिसरा किंवा चौथा पर्याय असतो त्यांना या दोन्ही गटांशी जुळवून घेणे अपरिहार्य होते. या निवडणुकीत राज्यातील सत्तेत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात आणि देशात विजयरथ चौखूर उधळलेला भाजप यांच्यासह आरपीआयचा एक गट यांची महायुती होती. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, बसपा, बहुजन मुक्ती पार्टी, लोक जनशक्ती पार्टी, स्वाभिमानी पक्ष, व अपक्ष असे विरोधी स्वतंत्रपणे लढत होते. महायुतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश बापट, राम शिंदे, महादेव जानकर यांनी प्रचार केला. राष्ट्रवादी काँग्रेससाठी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचार सभा घेतल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसने भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा कारभार, नोटाबंदी, शेतमालाचे भाव आणि ‘न आलेले अच्छे दिन’ हा प्रचाराचा मुद्दा केला; तर महायुतीने नऊशे कोटींची विकास कामे, भीमा पाटस पुढील हंगामात चालूच होणार व संभाव्य विकास योजना यांचा मुद्दा केला होता. बाकीच्या पक्षांनी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल, या विचाराने मतदारांशी संपर्क साधला होता.

थोरात यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, पंचायत समिती, दौंड नगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक, दूध संघावर समर्थक अशी सत्तास्थाने आहेत; तर अॅड. राहुल कुल यांच्याकडे आमदार पद, भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची सत्ता व दौंड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अशा सत्ता आहेत. भविष्यात तिसऱ्या गटाचे प्रबळ होणे दृष्टीपथात नसल्याने आगामी लढतीदेखील दोनच व्यक्तींच्या गटात होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात इव्हीएम मशिनची अंत्ययात्रा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (इव्हीएम) केलेल्या घोटाळ्यामुळेच भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्याचा आरोप करून निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी मंगळवारी इव्हीएमची अंत्ययात्रा काढली. ‘पारदर्शक’ कारभाराचा दावा करणाऱ्या भाजप सरकारविरोधात सर्वपक्षीय उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

गेल्या गुरुवारी पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात, पालिकेतील १६२ जागांपैकी तब्बल ९८ जागा मिळाल्याने भाजपला प्रथमच पुण्याची एकहाती सत्ता मिळाली. परंतु, इव्हीएममध्ये झालेल्या घोटाळ्यामुळेच भाजपला यश मिळाल्याचा आरोप केला जात आहे. दोनच दिवसांपूर्वी सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी एकत्र येऊन त्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता. लोकशाही बुडविण्यासाठी इव्हीएमची मदत घेण्यात आल्याने मंगळवारी सर्वपक्षीय उमेदवारांनी मशिनची अंत्ययात्रा काढली.

जंगली महाराज रोडवरील झाशीच्या राणी चौकापासून ते भाजपच्या निवडणूक कार्यालयापर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात आली. भाजप कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. ‘मतांची चोरी हीच का तुमची पारदर्शकता’, ‘इव्हीएमच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटला’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप वगळता इतर पक्षांकडून लढणारे उमेदवार मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वकोश पेनड्राइव्हवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत तयार करण्यात आलेले विश्वकोशाचे खंड पेनड्राइव्हवर देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात इंटरनेटची सुविधा नसलेल्या ठिकाणी पेनड्राइव्हमार्फत विश्वकोशाचे सर्व खंड सहजरीत्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या कार्यक्रमात राज्य सरकारतर्फे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मराठी विश्वकोशाचे सर्व खंड असलेला पेनड्राइव्ह लाँच करण्यात आला. ग्रंथाली प्रकाशन या संस्थेमार्फत हा पेनड्राइव्ह राज्यभर वितरीत केला जाणार आहे. वाचकांसाठी पेनड्राइव्ह अल्पदरात उपलब्ध करण्यात येणार आहे. यापूर्वीही विश्वकोशाचे खंड ‘सीडी’मार्फत वितरित करण्यात आले होते. तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असल्यामुळे सीडीचा वापर सध्या फारसा केला जात नाही. त्यामुळे, विश्वकोशाची सीडी प्रकाशित करूनही त्याची फारशी विक्री झालेली नाही. त्यावर उपाय म्हणून पेनड्राइव्हचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. मात्र, अनेकदा इंटरनेटची व्यवस्था नसल्याने त्याचा फारसा वापर होत नाही. राज्याच्या ग्रामीण भागामध्ये आणि प्रामुख्याने शाळांमध्ये ही अडचण येते. यावर मात करण्यासाठी मराठी भाषा विभागाने पेनड्राइव्हचा मार्ग स्वीकारला आहे.

पेनड्राइव्हद्वारे विश्वकोश वितरित करण्यासाठी मराठी भाषा विभागाने ग्रंथाली प्रकाशनाबरोबर एक वर्षाचा करार केला आहे. या कराराप्रमाणे पेनड्राइव्हचे दर ठरवण्यात येणार असून ते नाममात्र असावेत, तसेच पेनड्राइव्हमध्ये वाचकांच्या दृष्टीने अद्ययावत सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पेनड्राइव्हमधील माहिती सुरक्षित असावी, ग्रंथालीने ग्राहकांना वेळोवेळी तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत केलेले खंड उपलब्ध करून देण्यात यावेत, अशा सूचना मराठी भाषा विभागाने दिल्या आहेत.

विश्वकोशाच्या पेनड्राइव्हची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या बुकगंगाचे संचालक मंदार जोगळेकर म्हणाले, ‘पेनड्रइव्ह वर मराठी विश्वकोशाचे २० खंड, परिभाषा कोश, मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ देण्यात येणार आहेत. पेनड्राइव्हमध्ये देण्यात आलेल्या सुविधेमुळे विश्वकोश अपडेट करता येणार आहे. इंटरनेटच्या आधारे पेनड्राइव्ह अपडेट होऊ शकतील. विश्वकोशासंदर्भात देण्यात आलेली सगळी माहिती युनिकोड स्वरूपात आहे.’

‘पेनड्राइव्हचा होणार फायदा’

मराठी विश्वकोशाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या मागणीचा विचार करताना कोशाच्या २० खंडांच्या प्रती प्रकाशित करण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे, वाचकांना संपूर्ण विश्वकोश त्वरीत उपलब्ध व्हावा, यासाठी पेनड्राइव्हचा मार्ग स्वीकारला आहे.

- दिलीप करंबेळकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगला चित्रभान जागविणारा वर्ग

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कलादालनात सर्वत्र चित्रे लागली होती; पण उपस्थितांचे डोळे वेगळ्याच ठिकाणी खिळले होते... त्यात विद्यार्थी होते; तसेच चित्रप्रेमी होते. चित्राची निर्मितीप्रक्रिया कशी असते आणि चित्र काढताना कलाकाराचे भावविश्व कसे असते हे जाणून घेता येत होते. कारण एक ज्येष्ठ चित्रकार कुंचल्याने चित्र चितारत होते आणि उपस्थित चित्रप्रेमी चित्रकाराचा हा आविष्कार डोळ्यात साठवून ठेवत होते. प्रदर्शनात खऱ्या अर्थाने चित्रभान जागवले जात होते. चित्रभान जागविणारे हे ज्येष्ठ चित्रकार म्हणजे रवी परांजपे!

बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात इतर वेळी चित्रांचे प्रदर्शन भरलेले असते. चित्रप्रेमी येतात आणि चित्रे डोळ्यात साठवून निघून जातात. मंगळवारचा दिवस यास अपवाद होता. येणाऱ्यांची पाऊले थबकत होती, कारण रवी परांजपे यांना चित्र काढताना बघता येणार होते. ते काढत असलेले चित्र पाहता येणार होते आणि त्याबरोबरीने त्यांचे विचारही ऐकायला मिळणार होते. ही सारी अनुभूती चित्रप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी मंगळवारी घेतली. निमित्त होते, साई चित्रकला महाविद्यालयाच्या प्रदर्शन व पारितोषिक समारंभाचे!

साई चित्रकला महाविद्यालयातर्फे आयोजित चित्रकला प्रदर्शनामध्ये रवी परांजपे यांच्या कुंचल्यांची जादू अनुभवता आली. दुपारी चार ते सहा अशा दोन तासाच्या बैठकीत परांजपे यांनी तैलरंगातील चित्र चितारले. ‘चित्र काढताना जागा का ठेवली आहे, रंगाचा वापर कसा करायचा, निर्मितीमागचा विचार काय आहे,’ अशी माहिती देऊन परांजपे यांनी समोर बसलेल्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यांचे चित्रभान वाढविले. ‘कंबोडियामध्ये पूरस्थितीतील खांबावरचे घर’ हे चित्र त्यांनी काढले. परांजपे सर चित्र काढत आहेत आणि माहितीही देत आहेत, हा सुखद क्षण विद्यार्थ्यांनी अनुभवला. आपले कुतूहल जागे करून विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्नही विचारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images