Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खासगी शाळांची आरटीईसाठी नोंदणी पूर्ण

$
0
0

वेबसाइटवर प्रवेश अर्ज उपलब्ध
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी असणाऱ्या राज्यातील खासगी शाळांची नोंदणी बुधवारी पूर्ण झाली. त्यामुळे आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या राज्यातील पालकांना आज गुरुवारी ९ ते शनिवारी २५ फेब्रुवारीपर्यत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी बुधवारी दिली
‘आरटीई’च्या २०१७ - १८ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या राज्यातील सर्व शाळांची नोंदणी बुधवारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे पालकांना गुरुवारी दुपारी एक वाजल्यापासून www.student.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन प्रवेश अर्ज उपलब्ध झाले आहेत. त्यासाठी पालकांना प्रथम वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर पालकांना पाल्याची माहिती भरायची आहे, अशी माहिती नांदेडे यांनी दिली आहे. या वेबसाइटवर पालकांसाठी मदत केंद्रांची यादी आणि अर्जाला लागणाऱ्या कागदपत्रांची यादी दिली आहे. या वेबसाइटवर केवळ नोंदणी करून अर्ज भरायचा असून, कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे जोडायची नाहीत अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मुश्ताक शेख यांनी दिली.
नांदेडे यांनी पालकांना आवश्यक त्याप्रमाणात प्रवेशप्रक्रियेबाबत मदत करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांना जिल्ह्यातील मदत केंद्रांची माहिती मिळण्यासाठी आ‍वश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सांगितले आहे. प्रवेश प्रक्रियेत पालकांना कोणत्याच प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आणि प्रत्येक अर्जाच्या नोंदी तपासण्याच्या सूचना देखील शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
००००
गुरुवारी (९ फेब्रुवारी) दुपारी एक वाजल्यापासून www.student.maharashtra.gov.in या वेबसाइटवर आरटीईसाठीचे प्रवेश अर्ज उपलब्ध झाले आहेत. त्यावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. येथे कोणतीही कागदपत्रे जोडायची नाहीत.
- मुश्ताक शेख, माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमा अधिकाऱ्यांना सक्तमजुरी

$
0
0

बेकायदा कमिशनप्रकरणी सीबीआय कोर्टाचा आदेश; ५५ लाखांचा दंड
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पॉलिसीचे बेकायदा कमिशन मिळवून दिल्याप्रकरणी नॅशनल इन्श्युरन्स कंपनीच्या दोन माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चौघांना तीन वर्ष सक्तमजुरी आणि एकूण ५५ लाख रुपयांचा दंड कोर्टाने सुनावला आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश डी. एम. देशमुख यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
संजीवकुमार धर (७५), ओमप्रकाश ग्रोव्हर (७७) या दोन माजी अधिकाऱ्यांसह डेव्हलपमेंट ऑफिसर सुलताना समद शेख उर्फ शुभांगी सदाशिव श्रीपाद (५०) आणि अब्दुल समद शेख (५५) यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. २० सप्टेंबर २००५ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
संजीवकुमार धर, ओमप्रकाश ग्रोव्हर हे एनआयसील कंपनीचे माजी अधिकारी आहेत. सुलताना शेख उर्फ शुभांगी श्रीपाद ही कंपनीत डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करते. त्यांनी अब्दुल शेख याच्याशी संगनमत करून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रकल बोर्ड वेल्फेअर कमिटीच्या सदस्यांची त्यांनी १६ डिसेंबर १९९७ रोजी दोन कोटी ४२ लाख रुपयांची पर्सनल अ‍ॅक्सिडेंट पॉलिसी (जनता पर्सनल अ‍ॅक्सिडेंट पॉलिसी) काढली.
शेखने तिचा नवरा अब्दुल शेख याने ही पॉलिसी मिळवून दिली अशी कागदपत्रे तयार केली. त्यानंतर त्यांनी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून अब्दुल शेख याला ३२ लाख ३० हजार ७०० रुपयांचे कमिशन बेकायदा मिळवून दिले. दरम्यान, त्यांनी ही पॉलिसी रद्द केली. त्यामुळे कंपनीचे नुकसान झाले. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.
त्यांच्याविरुद्ध आठ ऑगस्ट २००७ रोजी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. या गुन्ह्यातून वगळावे असा अर्ज चौघांनी केला होता. तो अर्ज तत्कालीन कोर्टाने मान्य करून त्यांना सोडले होते. मात्र, सीबीआयने हायकोर्टात अपील केले होते. तेव्हा सीबीआयच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर या चौघांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टातही त्यांचे अपील फेटाळण्यात आले.
त्यानंतर सात जानेवारी २०१६ पासून सीबीआय कोर्टात न्यायाधीश डी.एम. देशमुख यांच्या कोर्टात साक्षीपुरावे सुरू झाले. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद झाले. सीबीआयने चौघांविरुद्ध पुरावे सिद्ध केले. कोर्टाने धर, ग्रोव्हर आणि सुलताना शेख यांना तीन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी १५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अब्दुल शेख याला तीन वर्ष सक्तमजुरी आणि १० लाख रुपयांचा दंड सुनावला. सीबीआयचे वरिष्ठ सरकारी वकील मनोज चलाडन आणि विजयकुमार ढाकणे यांनी या प्रकरणी कामकाज पाहिले. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. मच्छिंद्रनाथ काडोळे यांनी तपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीआयसी अध्यक्षपदी डॉ. रघुनाथ माशेलकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
खजिनदारपदी रवी पंडित, सचिवपदी प्रभाकर करंदीकर यांची, मानद संचालकपदी प्रशांत गिरबने यांची निवड करण्यात आली आहे. या संचालक मंडळाचा कार्यकाळ हा २०१७ ते २०२२ पर्यंत असेल. पीआयसी ही संस्था राज्याबरोबरच देशातील एक ‘थिंक टँक’ म्हणून ओळखली जाते. ‘पीआयसी’च्या वतीने १००हून अधिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये विविध विषयांवरील व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, चित्रपट महोत्सव यांचा समावेश आहे. संस्थेच्या वतीने दर वर्षी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा व सोशल इनोव्हेशनच्या कार्यशाळांना राष्ट्रीय स्तरावर ओळखही प्राप्त झाली आहे. संस्थेला भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. हमीद अन्सारी, यशवंत सिन्हा, पी. चिदंबरम, डॉ. नंदन नीलेकणी, भारतरत्न सी. एन. आर. राव, प्रकाश जावडेकर यांसारख्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले आहे. याशिवाय देशभरातील विविध क्षेत्रातील ३००हून अधिक नामवंत व्यक्ती व ३९ संस्था या ‘पीआयसी’च्या सदस्य आहेत. इनोव्हेशन इंडिया, प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र, मेकिंग पुणे स्मार्टर, सॅनिटेशन टू ऑल, ई- वेस्ट, पुणे मॅक्स्मिमम सोलर सिटी अशी विविध प्रकाशने संस्थेच्या वतीने करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचपीसी प्रशिक्षणासाठी नवे अभ्यासक्रम

$
0
0

नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशनसाठी कुशल मनुष्यबळ तयार होण्यासाठी उपक्रम
Harsh.Dudhe@timesgroup.com
....................
@HarshDudheMT
पुणे : पहिल्या नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशनच्या (एनएसएम) वेगवान विकासासाठी देशात ‘हाय परफॉर्मन्स सुपरकम्प्युटिंग’चे (एचपीसी) प्रशिक्षण घेतलेल्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून देशातील आयआयटी, ट्रिपल आयटी, आयआयएससी, केंद्रीय विद्यापीठे, आयसर या शैक्षणिक संस्थांमध्ये पहिल्यांदाच ‘एचपीसी’चे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी ‘एनएसएम’ची स्थापना करण्यात आली आहे. सरकारने ‘एनएसएम’ची जबाबदारी प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) या दोन प्रमुख संशोधन व विकास (आर अॅँड डी) केंद्रांवर सोपवली आहे. सरकारने २५ मार्च २०१५ रोजी ‘एनएसएम’ला मान्यता दिली. सरकारने ‘एनएसएम’च्या उभारणीसाठी पाच वर्षांचा कालावधी निश्चित केला असून, त्यासाठी चार हजार ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ‘एनएसएम’मध्ये देशात विविध ठिकाणी एचपीसी सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्यानंतर या सुविधेचा वापर सामाजिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि संशोधन व विकासासाठी करण्यात येणार आहे. कालांतराने या सुविधेवर काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळ लागणार आहे.
‘एनएसएम’मध्ये गोष्टी टप्प्यांनुसार होत आहेत. मात्र सुविधेवर काम करण्यासाठी ‘एचपीसी’चे ज्ञान असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि त्याची उपलब्धता कमी प्रमाणात आहे. त्यामुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील आठ आयआयटी, आयआयएससी, नऊ एनआयटी, तीन ट्रिपलआयटी, चार केंद्रीय विद्यापीठ आणि तीन आयसर या शैक्षणिक संस्थांमध्ये २०१७ - १८ या शैक्षणिक वर्षांपासून पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. दोन वर्षांचा एमटेक अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. हे सर्व अभ्यासक्रम ‘एचपीसी’शी निगडित राहणार आहेत. या अभ्यासक्रमाची आखणी एनएसएम एक्सपर्च ग्रुपच्या अध्यक्षा प्रा. जया पनवलकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या तांत्रिक विभागाचे अतिरिक्त सचिव आर. सुब्रमण्यम, सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मूना, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी, ‘एनएसएम’चे समन्वयक आशिष कुवेळकर आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत अभ्यासक्रम, प्राध्यापक आणि शिकवण्याची पद्धती यावर चर्चा करण्यात आली.
‘भविष्यात ‘एनएसएम’च्या माध्यमातून देशाच्या विकासाठी तसेच नागरिकांना उपयोगी पडणाऱ्या विविध अॅप्लिकेशन्सची निर्मिती करण्यात येणार आहे. या अॅप्लिकेशन्सची निर्मिती करण्यासाठी सुमारे २० हजार कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे देशातील एकूण २९ नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील,’ असे पानवलकर यांनी सांगितले.
..........
देशात विविध प्रकारच्या ‘हाय परफॉर्मन्स सुपरकम्प्युटिंग’ची (एचपीसी) सुविधा वापरण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासोबतच देशात नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशनमध्ये काम करण्यासाठी विविध कम्प्युटर प्रणालींमधील तज्ज्ञांची गरज भासणार आहे. त्यामुळे ही मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी ‘एचपीसी’शी संबंधित अभ्यासक्रम मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या साह्याने नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये सुरू करण्यात येतील.
- प्रा. रजत मूना, महासंचालक, सी-डॅक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिचे डोके झाले पाच किलोने हलके

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
ब्यूटी पार्लर हा उद्योग विस्तारलेला असताना त्याचा सामाजिक कामासाठी व प्रबोधनासाठी कसा नेमकेपणाने उपयोग करता येतो, याचा वस्तुपाठ महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या एका ज्येष्ठ कार्यकर्तीने घालून दिला आहे. महाराष्ट्र अनिंसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी एका महिलेच्या डोक्यातील जट काढली आणि त्या महिलेचे डोके पाच किलोने हलके झाले.
अज्ञान आणि अंधश्रद्धेतून सुनंदा बोराडे यांच्या डोक्यात जट निर्माण झाली होता. ब्यूटी पार्लरचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या जाधव यांनी बोराडे यांची जटेच्या जोखडातून मुक्तता केली. बोराडे या मूळच्या सासवडजवळील (ता. पुरंदर) सोमर्डी गावच्या आहेत. सध्या त्या कात्रजजवळील मांगडेवाडी येथे वास्तव्यास असून कात्रज बसस्टॉपच्या मागील बाजूस त्यांचा भाजीविक्रीचा गाळा आहे. या कामातून डोक्यात घाण साठल्याने जट निर्माण झाली होती. जट म्हणजे यल्लम्मा देवीचा कौल असल्याचे सांगत आजूबाजूच्या लोकांनी त्यांना अंधश्रद्धेकडे नेले. जट वाढविल्यानंतर त्यांनी कर्नाटकातील सौंदत्ती येथे जाऊन यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले होते. या पार्श्वभूमीवर मनोज भोईटे या कार्यकर्त्याने त्यांचे प्रबोधन केले. त्यानंतर जाधव यांनी त्यांचे समुपदेश केले व जटेतून मुक्तता केली.
‘एका रात्री केसामध्ये गुंता झाला. राहू देत. ते यल्लम्मा देवीचे असते, असे आजूबाजूच्यांचे म्हणणे ऐकून जट वाढविली. दीड वर्षे वाढलेली जट काढून टाकण्याचा निर्णय मी घेतला. आता हलके वाटत आहे,’ अशी भावना बोराडे यांनी व्यक्त केली. ‘जटेमुळे केसावरून अंघोळ करणे तर दूरच, पण मला कुशीवर झोपता येत नव्हते. नंदिनीताई माझ्याशी बोलली तेव्हा मी हे ओझे काढून टाकण्याचे ठरविले,’ असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत पार्किंग, चोवीस तास पाणी

$
0
0

महापालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचा वचननामा
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी वचननामा जाहीर केला. यामध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची निर्मिती, शहराला २४X७ पाणीपुरवठा, मोफत पार्किंग सुविधा, बसथांब्यांवर मोफत वायफाय सेवा सुरू करणे, स्पर्धा परीक्षा केंद्रे उभारणे आदी आश्वासने देण्यात आली आहेत. याशिवाय शहर भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याचेही म्हटले आहे.
पक्षाच्या वचननाम्याचे प्रकाशन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते चिंचवड येथील एसकेएफ हॉलमध्ये करण्यात आले. शहराध्यक्ष सचिन साठे, सरचिटणीस पृथ्वीराज साठे, माजी महापौर कविचंद भाट, श्यामला सोनवणे, निगार बारस्कर, महिला विभागाच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, राजेंद्रसिंह वालिया, गौतम आरकडे या वेळी उपस्थित होते.
महापालिकेच्या निवडणुका भयमुक्त वातावरणात होण्याऐवजी सरकारी यंत्रणा नागरिकांना वेठीस धरत आहे, असा आरोप करून पाटील म्हणाले, ‘गेल्या अडीच वर्षांत शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. प्रशासन खिळखिळे बनले आहे. ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली जाहिरातबाजी चालू आहे. आठ लाख कोटींची गुंतवणूक आणि पाच कोटी रोजगार निर्मितीच्या भाजपच्या घोषणेचे काय झाले? हा केवळ इव्हेंट मॅनेजमेंटचा सोहळा असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. ‘माझा महाराष्ट्र कोठे आहे?’ असे शोधण्याची वेळ आली आहे. आचारसंहितेच्या काळात शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घ्या. अन्यथा, सत्तेतून बाहेर पडू असे सांगतात. परंतु, हा ठरवून चाललेला कार्यक्रम असल्याचे लक्षात येत आहे. या आयात-निर्यात प्रकारामुळे इतर पक्षांची ताकद वाढली नसून, ती सत्तेची सूज आहे. खरी संघटना काँग्रेसच आहे. राज्यात रोज कोणी तरी कोणाला अर्धवटराव, किंवा मूर्ख म्हणतात. सर्व प्राण्यांच्या उपमा देऊन झाल्या आहेत. निवडणुकीपुरतेच हे लुटुपुटूचे भांडण असून कल्याण-डोंबिवलीप्रमाणे हे निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येतील.’
ते म्हणाले, ‘अनधिकृत बांधकामांबाबत शंभर दिवसात निर्णय घेऊ, अशा भूलथापा देऊन मते मिळविणारे कुंटे समितीच्या अहवालाबाबत गप्प का आहेत? पिंपरी-चिंचवडमधील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते काही करू शकत नाही.’
शहरासाठी शासकीय कार्यालयांचे स्वतंत्र यंत्रणा उभारणार, समाविष्ट गावांचा विकास करणे, विकास आराखड्याचा जलद गतीने अवलंब करणे, पीएमपीएमएल बस स्टॉपवर मोफत वायफाय सेवा पुरवणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बससेवा मिळावी आदी ४४ मुद्द्यांचा समावेश वचननाम्यात करण्यात आला आहे. प्रास्ताविक शहराध्यक्ष साठे यांनी केले. विष्णू नेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. संग्राम तावडे यांनी आभार मानले.
....
वचननाम्यातील प्रमुख आश्वासने
- पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय
- शहरात सगळीकडे २४X७ पाणीपुरवठा
- झोपडपट्ट्यांचा सर्वांगिण विकास
- मागासवर्गीय कल्याणकारी निधी १० टक्के
- अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी ठोस पावले
- शहरात मोफत पार्कींग व्यवस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकपात्रीतून मराठी, स्पॅनिश, इंग्रजीचा संगम

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या प्रायोगिक रंगभूमीला बुरे दिन अशी चर्चा रंगलेली असतानाच एक शहरात एक अनोखा प्रयोग होऊ घातला आहे. मराठी, स्पॅनिश आणि इंग्रजी भाषेचा मेळ घालणारे ‘ओ फ्रिदा’ आणि थेस्पो स्पर्धेत विजेते ठरलेले हिंदी भाषेतील ‘भंवर’ या दोन एकपात्री नाटकांचा प्रयोग उद्या (शनिवार, ११ फेब्रुवारी) रात्री ९ वाजता टिळक स्मारक मंदीर येथे रंगणार आहे.
अभिनेता अभिषेक देशमुख याने ‘ओ फ्रिदा’ या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, कृतिका देव हिने मेक्सिकन चित्रकार फ्रिदा काहलो हिची भूमिका साकारली आहे. फ्रिदाचा चित्रकला क्षेत्रातला रोमांचकारी प्रवास, तिला आलेले अनुभव, तिच्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती, तिची प्रेमप्रकरणे याबद्दल हे नाटक भाष्य करते. तिला असलेल्या निकलांगत्वावर मात करत तिने उभारलेला आयुष्याचा कॅनव्हास या नाटकाच्या निमित्ताने पुणेकरांसमोर उलगडणार आहे. या नाटकाला अनेक आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात सहभागी होण्याचा बहुमान मिळालेला आहे. मराठी, इंग्रजी आणि स्पॅनिश अशा तीनही भाषांचा वापर करून या नाटकाची संहिता लिहिली गेली आहे.
या कार्यक्रमाची सांगता ‘भंवर’ या हिंदी नाटकाने होणार आहे. शिवराज वायचळ आणि विराजस कुलकर्णी यांनी या नाटकाचे लेखन केले असून, शिवराज वायचळ मुख्य भूमिकेत असणार आहे. एकट्या राहणाऱ्या आणि कायमस्वरुपी रात्रपाळी करणाऱ्या एका वॉचमनची हा कैफियत आहे. वॉचमन असूनही त्याची स्वतःची काही तत्व आहेत. रात्रीच्या वेळी बंद कंपनीच्या बाहेर कोणीही बघायला नसताना तो क्षणभर देखील विश्रांती घेत नाही. त्यातून त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊनही चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहणारा ‘भंवरसिंग’ शिवराज वायचळ साकारणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या थेस्पो नाट्य महोत्सवात या नाटकाने बाजी मारत विजेतेपद पटकावले होते. या दोन्ही नाटकांमधून एकपात्री अभिनयाचा एक अनोखा नमुना प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. प्रयोगासाठी देणगी प्रवेशिका आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सभा कुठे घ्यायच्या?

$
0
0

सभास्थानांच्या मनाईमागे सरकार आहे काय; मनसेची विचारणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील प्रमुख रस्ते-चौक आणि नदीपात्रात सभा घेण्यास मनाई करण्याच्या निर्णयामागेही राज्य सरकारचा हस्तक्षेप आहे काय, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे. शहरात सोयीस्कर जागा उपलब्ध नसल्याने राजकीय पक्षांनी सभा कोठे घ्यायच्या, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू झाली असून, पुढील टप्प्यात विविध पक्षांचे नेते पुण्याच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. मात्र, शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि चौकांसह नदीपात्रातही सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रचारसभा कोठे घ्यायच्या, असा प्रश्न राजकीय पक्षांना पडला आहे. दरम्यान, वाहतुकीस अडथळा येत असल्याने रस्त्यांवर सभा घेण्यावर निर्बंध आले आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये शिक्षणसंस्थांकडे मोठी मैदाने आहेत. मात्र, अनेक संस्था मैदाने राजकीय पक्षांना देत नाहीत किंवा त्याचे जबर भाडे आकारण्यात येते. त्यामुळे पक्षांपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यानंतर बाबा भिडे पुलाजवळ नदीपात्रात सभा घेण्यात येऊ लागल्या. त्यांना चांगला प्रतिसादही मिळू लागला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची सभा येथे झाली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सभा येथे झाल्या. मात्र, यंदा नदीपात्रात सभा घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. त्याचे लेखी कारणही त्यांनी दिलेले नाही. त्यामुळे यामागे काही राजकीय हस्तक्षेप आहे का, असा प्रश्न मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी विचारला आहे.
राज ठाकरे यांची सभा निवडणुकीला कलाटणी देऊ शकत असल्यानेच हे ठिकाण नाकारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे शहरातील मोठी मैदाने असलेल्या शिक्षणसंस्थांनी सभेसाठी मोठी रक्कम मागण्यास सुरवात केली आहे. हा सारा प्रकार हेतुपुरस्सर सुरू असल्याची शंकाही शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

कोपरा सभांना प्राधान्य
निवडणूक प्रचारासाठी शहराच्या विविध प्रभागांमध्ये कोपरा सभा किंवा छोट्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांच्या मोठ्या सभांचेही नियोजन राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी मोकळ्या जागा उपलब्ध होणे दिवसेदिवस दुरापास्त होत आहे. त्यामुळे पक्षांची पंचाईत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेनेच्या प्रचारासाठी उतरणार तगडी फौज

$
0
0

ठाकरे पितापुत्रांसह अमोल कोल्हे, शरद पोंक्षेही येणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवसेनेच्या निवडणूक प्रचारामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील, डॉ. अमोल कोल्हे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या नेत्यांसह ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षेही सहभागी होणार आहेत. या शिवाय युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रोड शोचेही आयोजन करण्यात आले आहे.
निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. मतदारांना भुरळ घालण्यासाठी स्टार प्रचारकांना रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेने युती तोडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे अधिकाधिक जागा जिंकण्याच्या उद्देशाने शिवसेनेने प्रचारासाठी तगडी फौज पुण्यात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचारादरम्यान विविध ठिकाणी कोपरा सभा, बैठका, नेत्यांच्या सभा घेण्यासंदर्भातील नियोजन सध्या सुरू आहे. शिवसेनेचे सातारा संपर्कप्रमुख आणि उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांच्या १० फेब्रुवारीला शहरात चार ठिकाणी सभा होणार आहेत.
पुणे जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याही सभा होणार आहे. हडपसर, मुंढवा, कोंढवा येथे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या वतीने नुकताच वचननामा जाहीर करण्यात आला. त्यामध्ये अनेक मूलभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

ठाकरेंची सभा बुधवारी
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची बुधवार (ता. १५) जाहीर सभा आयोजिण्यात येणारी सभा टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल येथे होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राणेंच्या उपस्थितीत आज काँग्रेसचा बिगुल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रक्रियेत सत्तेचा गैरवापर करून घटनेची पायमल्ली केल्याच आरोप करून काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पुणे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आज, शुक्रवारी काँग्रेसचे सर्व उमेदवार, प्रमुख पदाधिकारी घटनेच्या संरक्षणाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थित प्रचाराचे बिगुल वाजणार आहे.
रेश्मा अनिल भोसले यांचा भाजपचा अर्ज ग्राह्य धरून उमेदवारी वैध ठरविल्याच्या निर्णयाला काँग्रेसने हायकोर्टात आव्हान दिले आहे. हायकोर्टाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना करून त्यांची अपक्ष उमेदवारी ग्राह्य धरण्याच्या सूचना केल्या होत्या. भाजपतर्फे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाब टाकला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपची ही कृती राज्यघटनेची पायमल्ली करणारी असून, त्याविरोधात दंड थोपटण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी सर्व उमेदवार आणि पदाधिकारी घटनेच्या संरक्षणाची शपथ घेतील, अशी माहिती प्रवक्ते रमेश अय्यर यांनी दिली.
सिंहगडावर शपथ घेऊन भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली तर, सारसबागेतील गणपतीला स्मरून राष्ट्रवादीने प्रचाराचा नारळ फोडला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आपल्या प्रचाराचा शुभारंभ समताभूमी येथून करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश युवक अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, शहराध्यक्ष रमेश बागवे तसेच पदाधिकारी, उमेदवार उपस्थित राहणार आहेत.
..
चार पोलिस घेऊन बीडकरांचा प्रचार

घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात भाजपचे उमेदवार गणेश बीडकर आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात बुधवारी झालेल्या शाब्दिक चकमकीचे पडसाद अठ्ठेचाळीस तासांनंतरही उमटत आहेत. काँग्रेसने पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली असून, बीडकर चार पोलिस घेऊन प्रचार करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
बीडकर यांनी धंगेकर यांना शिवीगाळ करून प्रकरण चिघळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराचे ​व्हिडिओ शुटिंग होऊनही बीडकरांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. उलट ते चार पोलिस घेऊन प्रचार करत आहेत. भाजपकडून सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करण्यात येत असल्याची तक्रार काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शुक्ला यांच्याकडे केली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी यांच्या शिष्टमंडळाने शुक्ला यांची भेट घेतली.
घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात बुधवारी बीडकर विरुद्ध धंगेकर असा सामना रंगला होता. काँग्रेसचे उमेदवार अस्लम बागवान उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी गेले असता, बीडकर यांनी त्यांना अर्ज मागे न घेण्याविषयी चर्चा केली. बागवान धंगेकरांसाठी माघार घेत होते. या वेळी बीडकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर धंगेकरांना शिवीगाळ केल्याचा आरोप बागवेंनी केला.
बीडकर यांनी शिवीगाळ केल्याचे चित्रण असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे प्रभागातील मतदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा प्रकारच्या घटना इतर प्रभागांमध्ये होण्याची शक्यता आहे. भाजप सत्तेवर आल्यानंतर आपला उद्देश साध्य करण्यासाठी पोलिस यंत्रणेचा दुरूपयोग करत असल्याचे बागवे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडले बजेटचे अंतरंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘यंदाचा अर्थसंकल्प देशाचा समान विकास साधण्यावर भर देणारा आहे,’ असे मत ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांनी गुरुवारी व्यक्त केले. ‘ग्रामीण भारताचा विकास साधतानाच अर्थसंकल्पात रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

समाजातील कळीच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे ‘पुणे सुपरफास्ट’ हा कार्यक्रम आयोजिला जातो. याच कार्यक्रम मालिकेत गुरुवारी अर्थसंकल्पावर विशेष चर्चा आयोजिण्यात आली होती. या वेळी रवींद्र मराठे यांच्यासह ‘कीर्तने आणि पंडित फर्म’चे पार्टनर सीए किशोर फडके आणि ‘गोविंद मिल्क्स’चे व्यवस्थापकीय संचालक राजीव मित्रा यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींचे गमक उलगडून दाखवले. बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रासह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थित होते.

‘नुकताच सादर झालेला अर्थसंकल्प हा समान विकासाच्या दिशेने जाणारा असून, या अर्थसंकल्पात आर्थिक शिस्तीवर भर देण्यात आला आहे; त्याचबरोबर भांडवली खर्चात वाढ करण्यात आली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या दुप्पट वेगाने भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे. या अर्थसंकल्पापूर्वीच नोटाबंदीचाही निर्णय घेण्यात आला होता. बँकांच्या भांडवलवृद्धीसाठी दहा हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, थकित आणि बुडित कर्जांसाठी कोणतेही विशेष उपाय या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही,’ असे मराठे म्हणाले.

‘अडीच ते पाच लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असलेल्या व्यक्तींना प्राप्तिकरातून पाच टक्के सवलत देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे,’ असे फडके यांनी सांगितले. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पराग करंदीकर यांनी प्रास्ताविक केले. रिस्पॉन्स हेड राहुल बांबी यांनी स्वागत केले.


‘लघु, मध्यम उद्योजकांना मिळणार चालना’

‘ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठीही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठीही उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) चालना देणाऱ्या तरतुदी करण्यात आल्याने या क्षेत्राला चालना मिळेल,’ असे राजीव मित्रा यांनी सांगितले. अर्थसंकल्पावरील हा संपूर्ण कार्यक्रम goo.gl/5rll7t या लिंकवर पाहावयास मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचार खणणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘एके काळी करोडपती असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादीच्या काळात लखपती झाली. आता पुन्हा राष्ट्रवादीच्या हाती सत्ता दिली, तर ही महापालिका ‘रोडपती’ होईल,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्पेशल ऑडिट करण्याचाही इशारा त्यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत चिंचवड येथील मोरया गोसावी मैदानावर झाला. त्या वेळी ते बोलत होते. प्रचाराच्या प्रारंभीच त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडल्यामुळे येत्या काही दिवसांत चहूबाजूंनी तोफा धडाडणार, हे स्पष्ट झाले आहे. जनतेची साथ, समर्थन आणि विश्वास भाजपवर असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत असताना तो अभिशाप असल्याचा गैरसमज पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या मनात होता. त्यामुळे शहरांकडे दुर्लक्ष झाले. परंतु, नागरीकरण म्हणजे अभिशाप किंवा आव्हान न समजता संधी आहे. या अनुषंगाने केंद्र सरकार नियोजन करीत आहे. शहरांसाठी स्मार्ट सिटी, अमृत, चौदावा वित्त आयोग आदी योजना तयार केल्या आहेत. राज्य सरकारनेही गेल्या दोन वर्षांत ७० विकास आराखडे मंजूर करण्याचा विक्रम केला आहे.’

‘देश बदलत आहे. राज्यातही पारदर्शी काम चालू आहे. आता महापालिकेत एकहाती सत्ता द्या. पिंपरी-चिंचवडला आम्ही स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून देऊ. महाराष्ट्रातील प्रमुख आणि आधुनिक शहराचा दर्जा देण्याचा प्रयत्न करू,’ अशी आश्वासने मुख्यमंत्र्यांनी दिली.


‘एकहाती सत्ता द्या’

देश बदलत आहे. राज्यातही पारदर्शी काम चालू आहे. आता महापालिकेत एकहाती सत्ता द्या. तंगड्यात तंगडे घालून फसवू नका.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, चिंचवडमधील सभेत बोलताना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक माकड पुणेकरांना जेरीस आणते तेव्हा...

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुणेकरांना कोणाची दहशत आहे असं म्हणणं हे खरंतर धाडसाचं ठरेल. पण गेल्या काही दिवसांत खरंच पुणेकरांना दहशत घेतली आहे, तीही एका माकडाची! पुण्यात नांदेड सिटी नावाची टाऊनशीप त्या शेजारी नांदेड गाव, कोरडे बाग परिसर, धनगर वस्ती नावाची गावं आहेत. या ठिकाणी माकडांच्या एका टोळीने गेल्या काही दिवसांपासून हैदोस घातला आहे. यातल्या एका माकडाने तर लोकांना चावून-चावून हैराण केले आहे. हे माकड नुसते दूरवर पाहिले तरी लोक जीव घेऊन पळतात. ही दृश्ये परिसरातल्या अनेक सीसीटीव्हींमध्ये कैद झाली आहेत.

गेल्या एक ते दीड महिन्यात या माकडाने गावातील २५ ते ३० नागरिकांचा चावा घेतला आहे. गेल्या महिन्याभरापासून गावात आलेल्या या टोळीत १० ते १५ माकडं आहेत. पण त्यापैकी एक माकड गावातील नागरिक एकटे-दुकटे आढळले की त्यांचा पाठलाग करते. आठवडाभरात गावात माकडांची दहशत वाढली असून काल रात्री या माकडांनी पाच ते सहा लोकांचा चावा घेतला आहे. काही लोकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काहींना गंभीर चावा घेतल्याने ते ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावातील अनेक ठिकाणी हे माकड सीसीटीव्हीत कैद झाले आहे. काही ठिकाणी नागरिक तर काही ठिकाणी लहान मुलाना चावा घेतानाची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. स्थानिकांनी यासंबंधी वनविभागाकडे तक्रार केली आहे. वनविभाग या माकडाला पकडण्याचे प्रयत्न करत आहेत. पण अजून त्याला यश आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​आश्वासनपूर्ततेसाठी आढावा समिती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या सर्व भागांत २४ तास पाणीपुरवठा..., महत्त्वाच्या ५० मार्गांसह ‘बीआरटी’च्या दोन मार्गांवर पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) मोफत सेवा..., पुढील पाच वर्षांत ५० हजार घरांची उभारणी..., वारसा जतन आणि पर्यटनाला चालना..., अॅमेनिटी स्पेसचा वापर... खड्डेमुक्त रस्ते... यांसारख्या अनेक आश्वासनांच्या पूर्ततेची ‘ग्वाही’ देणारा जाहीरनामा भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी सादर केला. या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीसाठी नगरसेवक प्रयत्न करतीलच; पण त्याच्या अंमलबजावणीसाठी पक्षाने स्वतंत्र आढावा समिती स्थापन केली आहे.

महापालिका निवडणुकांकरिता पक्षाने शहरातील सर्व प्रभागांसाठी प्रा-रूप जाहीरनामा तयार केला होता. या जाहीरनाम्यावर प्राप्त झालेल्या सूचना लक्षात घेऊन संपूर्ण शहरासाठीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन शुक्रवारी पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर यांच्यासह शहराचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शहराच्या मेट्रो प्रकल्पापासून विकास आराखड्यापर्यंत (डीपी) अनेक महत्त्वाचे प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकारामुळे सुटले असून, आता महापालिकेमध्ये गतिमान आणि पारदर्शक कारभार करण्याची संधी पुणेकरांनी द्यावी, असे आवाहन बापट आणि गोगावले यांनी केले. ‘पुणेकरांच्या हितासाठी अनेक योजना मांडण्यात आल्या असून, पुढील सहा महिन्यांमध्ये बहुतेक योजनांचे काम सुरू करण्याचा विचार आहे,’ असे बापट यांनी सांगितले. ‘पुण्याच्या पाण्यात कोणतीही कपात करणार नाही,’ याचा पुनरुच्चार करतानाच, त्यावरून महापौरांनी केलेल्या राजकारणावर बापट यांनी टीकास्त्र सोडले.

जलद बस वाहतूक योजनेच्या (बीआरटी) कात्रज ते हडपसर या पथदर्शी मार्गावर नागरिकांना मोफत सेवा देण्यात येणार असून, त्याचा भार पालिकेवर येऊ नये, याकरिता उद्योजकांशी चर्चा सुरू असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले. तसेच, शहरातील ५० महत्त्वाच्या मार्गांवर सकाळी-सायंकाळी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

अंमलबजावणी आढावा समिती

पक्षाचा जाहीरनामा फक्त निवडणुकीपुरता न राहता, त्यातील योजनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आग्रही राहतील. त्याचबरोबर त्यांची अंमलबजावणी वेळेत आणि प्रभावी व्हावी, यासाठी जाहीरनामा अंमलबजावणी आढावा समिती स्थापन करण्यात आली आहे.

...................

प्रमुख आश्वासने

> ‘पीएमआरडीए’द्वारे प्रकल्पांना चालना
> नदीसुधारणा व पर्यावरणाची जपणूक
> झोपडीवासीयांना हक्काचे घर
> सर्वांसाठी आरोग्य सेवा
> नाना-नानी पार्क आणि विरंगुळा केंद्र
> महिलांसाठी उद्योग गट आणि पुरेशी स्वच्छतागृहे
> वारसा-पर्यटनाला चालना
> बाजार-मंडईसाठी व्यवस्था
> प्रभागात योग व अग्निशमन केंद्र
> शिक्षण मंडळाचा पारदर्शक कारभार
> डिजिटल-वाय-फाय पुणे


पूर्वीच्या प्रकल्पांचे ऑडिट करणार
करदात्यांच्या पैशातून सत्ताधाऱ्यांनी अनेक प्रकल्पांची उभारणी केली; पण यातील अनेक प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याची टीका केली जात आहे. त्यामुळे अशा संशयास्पद प्रकल्पांचे ‘ऑडिट’ करण्यात येणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी जाहीर केले. संबंधित प्रकल्पांसाठी उपलब्ध झालेल्या निधीचा योग्य विनियोग झाला का, याची छाननी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

....................

‘बीडीपी’तील टेकड्यांचे संरक्षण करायचे असेल, तर ०.८ टक्के बांधकामाला परवानगी द्यावीच लागेल. त्यावर अधिक चर्चा करायची असल्याने मुख्यमंत्र्यांनी हा विषय प्रलंबित ठेवला आहे. याबाबत सहमती घडवण्यासाठी निवडणुकीनंतर प्रयत्न केले जातील.
- गिरीश बापट, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता भंग झाल्याच्या नऊ तक्रारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या आचारसंहिता कक्षाकडे गेल्या दोन दिवसांत नऊ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील आठ तक्रारींची सोडवणूक प्रशासनाने केली आहे, तर एका तक्रारीचे निवारण केले जात असल्याचे या कक्षाचे प्रमुख विलास कानडे यांनी शुक्रवारी सांगितले.

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र आचारसंहिता कक्ष स्थापना केला आहे. यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सेवाही उपलब्ध करून दिली आहे. सावरकर भवन येथील निवडणूक विभागाच्या कार्यालयात हा कक्ष असून तेथे आजपर्यंत नऊ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील बहुतांश तक्रारी राजकीय नेत्यांच्या नावाचे फलक झाकले नसल्याच्या आहेत. याशिवाय वाहनांची संख्या जास्त असणे, नोंदणी नसलेली वाहने प्रचारात वापरणे, बोर्ड आणि बॅनर्स न झाकणे, प्रचारात शिवीगाळ, परवानगी न घेता पदायात्रा काढणे अशा तक्रारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झाल्या आहेत. काही तक्रारींची नोंद थेट पोलिसांकडे करण्यात आली असून, त्यातील गुन्हा नोंद झालेल्यांची माहिती महापालिकेकडे वर्ग करण्यात येत आहे, असे कानडे यांनी सांगितले.

निवडणुकीच्या काळात होणाऱ्या आचारसंहिताभंगाच्या तक्रारी वेबसाइट, व्हॉट्सअॅप या माध्यमांद्वारे, तसेच हेल्पलाइनद्वारे तक्रारी करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांना २४ तास तक्रारी नोंदवता येणार आहेत. नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबरोबरच काही पथके तयार करून शहरातील विविध भागांत जाऊन पाहणी केली जाणार आहे. या पथकातील लोकांना आचारसंहितेचा भंग होत असल्याचे लक्षात येताच तातडीने गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे कानडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनसे उमेदवाराला दिलासा

$
0
0

उमेदवारी देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कागदपत्रे दिलेली असताना ती न घेता उमेदवारी अर्ज बाद केलेल्या ‘प्रभाग क्रमांक दोन ड’मधील (फुलेनगर-नागपूर चाळ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराचा अर्ज सत्र न्यायालयाने मंजूर करून त्यांना उमेदवारी देण्याचा आदेश दिला आहे.

राजकुमार भुजंगराव ढाकणे असे मनसेच्या उमेदवाराचे नाव आहे. ढाकणे यांनी तीन फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरला होता. अर्जासोबत कागदपत्रेही जोडली होती; मात्र छाननीच्या वेळी त्यांच्या अर्जाबरोबर कागदपत्रे नव्हती. त्या वेळी त्यांनी ‘आता कागदपत्रे देतो,’ असे सांगितले. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी अजित देशमुख यांनी ‘दुपारी तीन वाजता घेतो,’ असे त्यांना सांगितले व त्यांना बाहेर काढले. त्यांनी पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा ‘कलम १४४ प्रमाणे तुमच्यावर गुन्हा दाखल करून अटक करतो,’ असे अधिकाऱ्याने सांगितल्याची माहिती ढाकणे यांनी दिली.

त्यानंतर त्यांनी अॅड. अयुब पठाण यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना रात्री साडेअकरा वाजता भेटले. त्यांनाही त्यांनी दाद दिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात ढाकणे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. त्याची साक्षांकित प्रत मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. शेवटी सायंकाळी पाच वाजता त्यांना प्रत देण्यात आली.

या निर्णयाविरोधात ढाकणे यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. ढाकणे यांच्यातर्फे अॅड. अयुब पठाण, अॅड. विजयकुमार ढाकणे, अॅड. संतोष पाटील यांनी काम पाहिले. त्यांचे म्हणणे ग्राह्य धरून कोर्टाने ढाकणे यांचा अर्ज मंजूर केला. त्यांना मनसेचे चिन्ह देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविषयी आपण जिल्हाधिकारी, शहर प्रमुख निवडणूक अधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य निवडणूक आयोग आणि शास्त्रीनगर पोलिस ठाण्यात कागदपत्रे गहाळ केल्याची तक्रार दिली असल्याचे राजकुमार ढाकणे यांनी सांगितले.
...............
येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोर्टाकडून मिळालेल्या आदेशाची माहिती दिली आहे. या आदेशात नेमके काय नमूद केले आहे याची शहानिशा महापालिकेच्या विधी सल्लागाराकडून करून घेतल्यानंतर यावर बोलणे उचित ठरेल.
- सतीश कुलकर्णी, महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंजीर, कापरे यांना उमेदवारी मिळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मतदारसंघातील दोन गणांतील महिलांचे अर्ज छाननीत बाद ठरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता; मात्र पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिला असून, या दोन्ही महिलांचे अर्ज मंजूर करून त्यांना उमेदवारी देण्याचा आदेश कोर्टाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला आहे. सत्र न्यायाधीश जे. डी. वडणे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार कावेरी कुंजीर (थेऊर गण) आणि संजीवनी कापरे (पेरणे गण) या दोन्ही महिलांच्या अर्जावर तीनपैकी एका ठिकाणी सही राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना छाननीत बाद ठरवले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरुद्ध त्यांनी पुणे जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश वडणे यांच्यासमोर शुक्रवारी या अर्जावर सुनावणी झाली. उमेदवारांच्या तर्फे अॅड. प्रताप परदेशी आणि अॅड. सी. के. भोसले यांनी बाजू मांडली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस दिली, तरी त्यात तुमचा अर्ज अपुरा आहे, असे म्हटले नव्हते. तसेच त्यांचा ऑनलाइन अर्ज योग्य आहे. अर्जात तीनपैकी केवळ एका ठिकाणी सही नव्हती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्जाची छाननी करताना कोणती काळजी घ्यायची याच्या मार्गदर्शक सूचना सुप्रीम कोर्टाने एका निकालात दिल्या आहेत. याचा दाखला वकिलांनी युक्तिवाद करताना कोर्टात दिला. त्यांचे म्हणणे ग्राह्य धरून कावेरी कुंजीर आणि संजीवनी कापरे या या दोघींना उमेदवारी देण्याचा आदेश देण्यात आला आहे. हे दोन्ही अर्ज बाद झाल्याने या दोन्ही गणांत राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह गोठवले गेले होते; मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे आता तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुतांश उमेदवारांचे उत्पन्न व्यवसायातून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापा‌लिकेच्या माध्यमातून समाजसेवा करण्यासाठी नगरसेवक झालेल्या, तसेच पालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या बहुतांश उमेदवारांच्या उत्पन्नाचा स्रोत हा व्यवसाय असून, काही माननीय शेती करत असल्याचे समोर आले आहे. शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौरपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गेल्या पाच वर्षांतील चार महापौरांपैकी दोन महापौरांचा व्यवसाय असून, दोन महापौर गृहिणी आहेत. सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, माजी स्थायी समिती अध्यक्ष यांच्या उत्पन्नाचा स्रोतही व्यवसायच आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६२ जागांसाठी सुमारे ११०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वेगवेगळ्या प्रभागांतून निवडणूक लढवणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी ६५ ते ७० टक्के उमेदवारांचे व्यवसाय असून, काही उमेदवार शेती करतात, तर काही खासगी नोकरीमध्ये आहेत. उमेदवारी अर्ज भरणाऱ्या बहुतांश महिला गृहिणी असून, पालिकेत यापूर्वी माननीय म्हणून काम करणाऱ्या महिला नगरसेविकांनी व्यावसायिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. काहींनी सामाजिक काम करत असल्याचे स्पष्ट करून २० ते २५ उमेदवारांनी काहीही करत नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

शहराचा प्रथम नागरिक म्हणून काम करणाऱ्या माजी महापौर चंचला कोद्रे, वैशाली बनकर या गृहिणी असून, त्यांच्यानंतर या पदावर विराजमान झालेले दत्तात्रय धनकवडे आणि प्रशांत जगताप हे व्यावसायिक आहेत. गेल्या टर्मच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांचा व्यवसाय आहे. महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी संभाळणारे अरविंद शिंदे, सभागृह नेते शंकर केमसे, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, मनसेचे गटनेते किशोर शिंदे, भाजपचे गटनेते गणेश बीडकर, शिवसेनेचे अशोक हरणावळ यांचेही व्यवसाय आहेत. माजी उपमहापौर सुनील गायकवाड, प्रसन्न जगताप यांच्या प्रतिज्ञापत्रात ते व्यापार करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे आणि संगीता देवकर यांचा शेती व्यवसाय असून, नारायण गलांडे, योगेश मुळीक, प्रकाश ढोरे, कर्णे गुरुजी, कैलास गायकवाड, अशोक मुरकुटे, श्रीकांत पाटील यांनीही आपला व्यवसाय शेती असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

०००००

‘काही नाही’

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये अनेक उमेदवारांनी उद्योग ‘काही नाही,’ असे लिहिले आहे. प्रभाग दहामधून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पुष्पा कनोजिया, प्रभाग १४मधून भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या ज्योत्स्ना एकबोटे यांच्यासह काही उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ‘काही नाही’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शा‍ब्दिक युद्धाला आता चढणार जोर

$
0
0

पुढच्या आठवड्यात प्रमुख नेत्यांच्या सभा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अर्ज माघारी आणि चिन्हांचे वाटप पूर्ण झाल्यानंतर आता प्रचारफेऱ्या, पदयात्रा या माध्यमातून निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे. राज्यातील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा पुढील आठवड्यात निश्चित होत असल्याने शा‍ब्दिक युद्धाला अधिक जोर चढण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी यंदा अत्यल्प दिवस असल्याने सर्वांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत प्रचार करता येणार असल्याने पुढील आठवडा सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्या दृष्टीने, राज्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा सोमवारपासून घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने होणार आहे. मुख्यमंत्र्यांची सभा १३ फेब्रुवारीला होणार असून, त्याचे ठिकाण शनिवारी रात्रीपर्यंत निश्चित होईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर बुधवारी (१५ फेब्रुवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी (१६ फेब्रुवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १५ फेब्रुवारीला होणार असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा त्यानंतर शहरात होणार असल्याचे समजते.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत गेल्या मंगळवारी संपली. त्यानंतर बहुतेक पक्षांनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ केला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षाच्या सर्व उमेदवारांना सिंहगडावर सुराज्याची शपथ दिली, तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘राष्ट्रवादी’च्या प्रचाराचा नारळ फोडला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत काँग्रेसनेही शुक्रवारी प्रचाराचा मुहूर्त केला आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठा कार्यक्रम घेण्यात आला नसला, तरी स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

.................

शरद पवार येणार का?

महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या समारोपासाठी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीच हजेरी लावली आहे. ‘पुण्याचा कारभारी बदला’ अशी हाक त्यांनी दहा वर्षांपूर्वी अशाच समारोपाच्या सभेतच दिली होती. गेल्या निवडणुकीतही त्यांनी तीन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात सभा घेतल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या सभांनंतर शरद पवार यांच्या सभा होणार का, याची उत्सुकता ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​जैविक संपत्तीच्या लुटीला लगाम

$
0
0

औषधनिर्मिती कंपन्यांना नफा गावकऱ्यांबरोबर ‘शेअर’ करावा लागणार

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com

Tweet : @chaitraliMT

पुणे : गावातील वनस्पती आणि जैविक घटकांची औषधे आणि प्रसाधनांमधून कोट्यवधी रुपये मिळवणाऱ्या कंपन्यांना त्यांचा नफा गावकऱ्यांबरोबर ‘शेअर’ करावा लागणार आहे. गावकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जैविक संपत्ती लुटणाऱ्या कंपन्यांना लगाम घालण्याचा निर्णय जैवविविधता प्राधिकरणाने घेतला आहे. एवढेच नव्हे, तर बाराशे कंपन्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटाबरोबरच उर्वरित महाराष्ट्रातील खेड्यांच्या लगतच्या जंगलांमध्ये मुबलक नैसर्गिक संपदा आहे. सध्या विविध विद्यापीठे, स्वयंसेवी संस्थांबरोबरच व्यावसायिक कंपन्या ग्रामस्थांच्या पारंपरिक ज्ञानाचा गैरफायदा घेत आहेत. नैसर्गिक संपत्तीच्या व्यावहारिक मूल्याबद्दल अनभिज्ञ असलेल्या गावकऱ्यांना अंधारात ठेवून कंपन्या या संपत्तीतून कोट्यवधी रुपये कमवत आहेत. या पार्श्वभूमीवर, जैविक संपत्तीच्या वापरावर बंधने आणि कंपन्यांच्या उत्पन्नातील काही वाटा गावकऱ्यांना मिळावा, यासाठी केंद्रीय जैवविविधता मंडळाने कंबर कसली आहे. केंद्रीय जैवविविधता मंडळातर्फे गावकऱ्यांना समन्यायी वाटप करण्यासंदर्भात कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याला जर्मन कॉर्पोरेशनचे आर्थिक सहकार्य मिळाले आहे. उपक्रमासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र आणि उत्तराखंड या दोन राज्यांची निवड झाली आहे.

या संदर्भात काही दिवसांपूर्वीच जर्मन कॉर्पोरेशनचे पदाधिकारी, महाराष्ट्र जैवविविधता प्राधिकरण, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय आणि चेन्नई जैवविविधता प्राधिकरणाची बैठक झाली. पुढील काही महिन्यांपासून विविध गावांमध्ये जनजागृतीसाठी प्रशिक्षण वर्ग आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. याची सुरुवात म्हणून ‘अॅप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाउंडेशन’च्या सहभागातून जैवविविधता मंडळाने नुकताच भीमाशंकर अभयारण्य परिसरातील गावकऱ्यांशी संवाद साधला.

‘आपल्याकडे जैवविविधता संवर्धनासाठी उत्तम कायदे आहेत; मात्र गावकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अनेक राष्ट्रीय-परदेशी औषध, सौंदर्यप्रसाधन कंपन्या जैविक संपत्तीची लूट करत आहेत. गावकऱ्यांच्या पारंपरिक माहितीच्या आधारे काही कंपन्यांनी स्वतःची उत्पादने तयार केली आहेत, तर काहींनी स्वतःच्या नावाने पेटंट घेतली आहेत. गावकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी राज्य जैवविविधता प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. जैविक साधनसंपत्तीच्या व्यावसायिक वापरातून मिळणाऱ्या फायद्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी आम्ही कृती आराखडा तयार करत आहोत,’ असे प्राधिकरणाचे अध्यक्ष विलास बर्डेकर यांनी सांगितले.

...

बाराशे कंपन्यांना नोटिसा

‘कोणत्याही उत्पादनामध्ये जैविक साधनांचा वापर करण्यापूर्वी जैवविविधता प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक आहे; मात्र आतापर्यंत कंपन्यांनी नियमाकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले होते. या कंपन्यांशी आम्ही संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यांत प्राधिकरणाने बाराशे कंपन्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. काही कंपन्यांनी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे. नोटिशीची दखल न घेणाऱ्या आठ कंपन्यांवर हायकोर्टामध्ये खटले दाखल केले आहेत,’ अशी माहिती मंडळाचे वरिष्ठ संशोधक डॉ. राहुल मुंगीकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images