Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/ कात्रज

पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहितेने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये सासरच्या मंडळीकडून त्रास होत असल्याचे नमूद केले आहे.
भाग्यश्री सुरेश पवार (वय २५, रा. माऊलीनगर, चिंतामणी अपार्टमेंट) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी भाग्यश्रीच्या वडिलांनी पती सूरज पवार, दीर शरद विठ्ठल पवार, विठ्ठल पांडुरंग पवार, लक्ष्मी विठ्ठल पवार आणि इतरांच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री यांचा डिसेंबर २०१५मध्ये सुरेश विठ्ठल पवार यांच्यासोबत विवाह झाला. सुरेश बांधकाम व्यावसायिक असून, लोणीकाळभोर येथे राहण्यास आहे. भाग्यश्री यांचा इंजिनीअरिंगचा डिप्लोमा झाला आहे. पती सुरेश यांच्याकडून त्यांना सातत्याने माहेरहून पैसे आणण्यासाठी त्रास दिला जात होता. सुरेश यांचा लोणी काळभोरमध्ये मोठा बंगला आहे. मात्र, तो भाग्यश्री यांना पत्र्याच्या शेडमध्ये ठेवत होता. भाग्यश्री यांचे माहेर भारती विद्यापीठ परिसरात आहे. चारच दिवसांपूर्वी त्या माहेरी आल्या होत्या. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भाग्यश्री यांनी माहेरी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.

पहिल्या तक्रारीची दखल नाही
भाग्यश्री यांनी यापूर्वीही पोलिसांकडे तक्रार केली होती. पण, काहीच कारवाई न झाल्याचेही त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. शवविच्छेदनानंतर त्यांच्या माहेरच्या लोकांनी आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहाचे अंत्यविधी न करण्याची भूमिका घेऊन भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यासमोर ठिय्या धरला. मात्र, परिसरातील सामाजिक कार्यकर्तांनी समजूत काढल्यानंतर कुटुंबीयांनी माघार घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ एसटीसाठी ‘ई-टोल’

0
0

‘ई-टॅग’द्वारे होणार आकारणी; प्रवासाचा वेळ, इंधन वाचणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महामार्गांवरील टोल नाक्यावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगांमधून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची आता सुटका होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गांवरील टोल नाक्यावर सुरू केलेल्या ‘ई-टॅग’ प्रणालीचा अवलंब एसटी बसमध्ये केला जाणार आहे. त्यामुळे टोल नाक्यावरून जाताना बसला थांबण्याची गरजच उरणार नाही.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर ‘ई-टॅग’ ही ऑनलाइन टोल प्रणाली बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील ३५, तर पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील कुसगाव, तळेगाव, सर्डेवाडी (इंदापूर), पाटस आणि खेड-शिवापूर आदी टोल नाक्यांचा समावेश आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो बस दररोज महामार्गांवरून धावतात. या प्रत्येक बसला टोल द्यावा लागतो. त्यामुळे महामंडळाचे करोडो रुपये टोलसाठी खर्ची पडतात. एसटीला दरमहा पास दिला जात होता. मात्र, पास असूनही एसटी बसची गर्दीतून सुटका होत नव्हती. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी एसटीने ‘ई-टॅग’ प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वेळ आणि इंधन या दोन्ही गोष्टींची बचत होणार आहे.
ई-टॅग प्रणालीसाठी टोल नाक्यांवर स्वतंत्र मार्गिका आखण्यात आली आहे. एसटी बसच्या दर्शनी भागातील काचेवर विशिष्ट प्रकारचे स्टिकर चिकटविण्यात येणार आहे. स्टिकर असलेली एसटी या मार्गिकेतून जाताना स्टिकर यंत्रणेमध्ये स्कॅन केले जाईल. त्यानंतर त्याची नोंद तेथील कम्प्युटरवर केली जाईल. त्यासाठी एसटीकडून स्वतंत्र खाते उघडण्यात येणार असून, दरमहा ठरावीक रकमेचा भरणा केला जाईल. त्या खात्यातून पैसे वजा झाल्याचा संदेश तत्काळ विभाग नियंत्रक, लेखाधिकारी आणि आगार व्यवस्थापकांना जाईल. ई-टॅग प्रणालीचा अवलंब केल्यामुळे टोलच्या रकमेत दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात ‘ई-टॅग’ लावलेल्या बसची संख्या तुलनेने कमी असेल, मात्र नजीकच्या काळात महामार्गांवरून जाणाऱ्या सर्वच बसना टॅग बसविले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एसटी महामंडळाच्या धोरणात्मक निर्णयानुसार ही योजना राज्यभरात सर्वत्र अंमलात आणली जाणार आहे. त्यामुळे एसटीचा वेळ आणि इंधन या दोन्हीची बचत होईल.
नितीन मैंद, विभागीय नियंत्रक, एसटी पुणे विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य संमेलनाला निमंत्रणांचा दुष्काळ

0
0

Chintamani.Patki@timesgroup.com

Tweet : @chintamanipMT

पुणे : साहित्य संमेलन संपते ना संपते तोच पुढील संमेलनासाठीच्या निमंत्रणांची चर्चा सुरू होते. पुढील संमेलनासाठी कुठून निमंत्रण आले, असा प्रश्न हमखास विचारण्यात येतो. तसा प्रश्न यंदाही विचारण्यात येत आहे; पण या वेळी साहित्य महामंडळ निरुत्तर आहे. कारण पुढील संमेलनासाठी महामंडळाकडे एकही निमंत्रण आलेले नाही. पिंपरीचे संमेलन ‘भव्य दिव्य’ होते, तर डोंबिवलीचे संमेलन ‘पडले,’ अशी चर्चा असून, त्यामुळे इच्छुकांची कुचंबणा होत आहे. संमेलन आयोजित करणे म्हणजे तोंडाला फेस आणणारे ठरत आहे.

डोंबिवली येथील ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला; पण या वेळी पुढील संमेलनासाठीच्या निमंत्रणांची माहिती पुढे आली नाही. समारोपातील खुल्या अधिवेशनात विविध ठराव मांडले जातात, तसेच पुढील संमेलनांसाठी आलेली निमंत्रणे जाहीर केली जातात; मात्र यंदा महामंडळाकडे निमंत्रणच आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

साहित्य संमेलन भरवणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय नागपूर येथे आहे. हे कार्यालय तीन वर्षांसाठी पुण्यात असताना मोठ्या संख्येने निमंत्रणे येत होती. महामंडळाच्या पुण्याच्या कार्यालयीन कालावधीत सासवड, घुमान व पिंपरी या तीन ठिकाणी संमेलने झाली. तिन्ही संमेलनांवेळी पुढील संमेलनांसाठी मोठ्या संख्येने निमंत्रणे आली होती. ही निमंत्रणे महामंडळाने समारोपात जाहीरही केली होती. डोंबिवलीहून आलेले निमंत्रणही गेल्या वर्षी झालेल्या पिंपरीच्या संमेलनात जाहीर करण्यात आले होते.

दरम्यान, संमेलन आयोजित करणे आता अवघड होत चालल्याची प्रतिक्रिया साहित्य वर्तुळातून वारंवार व्यक्त होत आहे. सरहद संस्थेने पंजाबमधील घुमान येथे संमेलन यशस्वी करून दाखवले, तर पिंपरीचे संमेलन भव्य दिव्य झाल्याने हे शिवधनुष्य यापुढे कोण उचलणार या भीतीने इच्छुक छोट्या संस्थांच्या पोटात गोळा आला होता. डोंबिवलीच्या संमेलनाचे आयोजन चांगले असले, तरी रसिकच न फिरकल्याचे चित्र होते. खर्च आणि पैशांची जुळवाजुळव अवघड होत चाललेली असताना गर्दी कशी जमवायची, लोकांना धरून कसे आणायचे असे नवीन प्रश्न इच्छुक संस्थांना पडत आहेत.

..............

महामंडळ पुण्यात असताना संमेलनासाठी मोठ्या संख्येने निमंत्रणे येत होती. संमेलन संपतानाच निमंत्रण येत असल्याने ती आम्ही जाहीर करत असू. तीन वर्षांत कधीही कधी निमंत्रणांचा दुष्काळ जाणवला नाही.
- सुनील महाजन, माजी पदाधिकारी, साहित्य महामंडळ

............

पुढील साहित्य संमेलनासाठी एकही निमंत्रण महामंडळाला मिळालेले नाही. डोंबिवलीचे संमेलन झाले असले, तरी संमेलनाच्या उर्वरित कामातून व जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर पुढील संमेलनाचा विचार होईल. निमंत्रण पाठवण्यासाठीचा कार्यक्रम व मुदत लवकरच जाहीर केली जाईल.
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे: तीन हजार मतदारांचा मतदानावर बहिष्कार

0
0

सिद्घार्थ गडकरी । पुणे

राज्यसरकारने नेताजी नगरमधील नेताजी को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटीचा भूखंड म्हाडाच्या घशात घातल्यानं या सोसायटीतील लोक प्रचंड संतापले आहेत. सरकार आणि म्हाडाच्या या कृतीचा निषेध म्हणून या सोसायटीतील तीन हजार सभासदांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

राज्यसरकारने म्हाडाला दिलेला नेताजी नगर सोसायटीचा भूखंड पुन्हा सोसायटीला परत द्यावा आणि या भूखंडाबाबतचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा. जोपर्यंत सोसायटीला भूखंड परत दिला जात नाही, तोपर्यंत महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठरावही या सोसायटीनं मंजूर केला आहे. आम्ही राज्यकर्त्यांच्या विरोधात आमचा निषेध नोंदविण्याचं ठरवलं आहे. हा विषय नगरसेवकांच्या अख्त्यारितील नाही. हे आम्हालाही माहित आहे. पण प्रश्न तात्काळ निकाली निघावा म्हणून आम्ही आमचा आवाज लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहोत, असे या सोसायटीचे चेअरमन भास्कर भालेराव यांनी सांगितले.

११.५५ एकर भूखंडावर ही सोसायटी आहे. १९७४ मध्ये ही सोसायटी स्थापन करण्यात आली होती. या भूखंडावर नऊ इमारती बांधल्या असून त्यात ५८२ फ्लॅट्स आहेत. खाजगी मालकाकडून ७.६६ लाखात भूखंड विकत घेऊन महाराष्ट्र राज्य हौसिंग सोसायटी को-ऑपरेशन या नावाने ही सोसायटी बांधण्यात आली होती. हडकोकडून कर्ज घेऊन ही सोसायटी बांधण्यात आली होती. त्यानंतर ही सोसायटी म्हाडाला हस्तांतरित करण्यात आली होती. सोसायटी हस्तांतरण करताना भूखंडाचे मालकी हक्क म्हाडाला देण्यात आले होते. त्याला आक्षेप घेत सोसायटीतील सदस्यांनी कोर्टात धाव घेतली होती. सध्या हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. मात्र राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीवर या सोसायटीचे भवितव्य अवलंबून असल्यानं राजकारण्यानं त्यात लक्ष घालावं म्हणून या सोसायटीधारकांनी निवडणुकीवर बहिष्काराचं हत्यार उपसले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माहिती मिळणे ही विकासाची मूलभूत गरज’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सामान्य नागरिकांना माहिती मिळणे ही विकासाच्या दृष्टीने मूलभूत गरज आहे. ब्रिटिशांनी आणलेला गोपनीयता कायदा हा विकासाच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा होता. माहिती अधिकार कायद्यामुळे गोपनीयतेला धक्का बसला,’ असे मत राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी व्यक्त केले.

विश्व संवाद केंद्र आणि पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय पत्रकारिता प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी आणि पुणे मराठी ग्रंथालयाचे हेमंत कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

‘पत्रकारिता हे माहितीचे क्षेत्र आहे. ताजी बातमी हा वृत्तपत्राचा आत्मा आहे आणि माहिती हा बातमीचा आत्मा आहे. गोपनीयता कायद्यामुळे सर्वसामान्यांना माहिती मिळणे अवघड झाले होते. त्यामुळे हा कायदा देशाच्या विकासातील मोठा अडथळा ठरला,’ असे धारूरकर यांनी सांगितले. ‘माहिती अधिकार कार्यकर्ता हे संबोधन हळूहळू नकारात्मक होत चालले आहे. परंतु माहिती हे शस्त्र आहे. विधायक आणि विघातक अशा दोन्ही प्रकारे तिचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे चांगल्या व्यक्तींनी या क्षेत्रात येण्याची गरज आहे,’ असेही ते म्हणाले.

विजय कुवळेकर म्हणाले, ‘जी व्यक्ती काही चांगले काम करू इच्छिते, त्या व्यक्तीने माहिती अधिकार कायद्याचा वापर करायला हवा. काहीही माहिती नसताना अधिकारवाणीने बोलणे अलीकडे महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे एकीकडे तंत्रज्ञानाची प्रगती होत असताना ज्ञानाची अधोगती खरोखर होत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.’

‘राष्ट्रीय विचारांचा प्रसार करण्याचे काम विश्व संवाद केंद्राच्या माध्यमातून केले जाते. प्रकाशन, प्रबोधन आणि प्रशिक्षण या त्रिसूत्रीवर प्रामुख्याने विश्व संवाद केंद्र काम करते,’ याकडे विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम व्यावसायिकाला दणका

0
0

सहा लाख रुपये परत करण्याचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फ्लॅट खरेदीचा व्यवहार रद्द करूनही तक्रारदाराला पैसे परत न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने सहा लाख रुपये परत करावेत, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे, एस. के. पाचरणे यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणी भरत रमेश बोराडे (रा. अशोका नगर, खराडी) यांनी मंचाकडे दावा दाखल केला होता. त्यांनी अशोक सीताराम लोंढे, एस. के. डेव्हलपर्स व बिल्डर्स, एम. जी. रोड यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. विरुद्ध पक्षाचे बांधकाम व्यावसायिक यांनी सिसवाडी, हवेली येथे फ्लॅट बांधण्याचे ठरवले होते. तक्रारदारांनी या इमारतीतील दोन फ्लॅट एक हजार चौरस फूट खरेदीसाठी त्यांच्याबरोबर व्यवहार केला होता. तक्रारदारांनी त्यांना सहा लाख ४८ हजार रुपये दिले होते. त्यांना दोन वर्षांच्या आत ताबा देण्याचे कबूल केले होते; मात्र बांधकाम अपूर्ण असल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. त्यांना इमारतीचे काम करण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.

तक्रारदारांनी फ्लॅटखरेदीचा व्यवहार रद्द केला. त्यांनी सहा लाख ४८ हजार रुपये परत करण्याची मागणी केली. तक्रारदाराला विरुद्ध पक्षाने २४ हजार रुपयांचे दोन चेक दिले; मात्र उरलेली रक्कम परत​ दिली नाही. तक्रारदारांनी मागणी करूनही त्यांना रक्कम देण्यात आली नाही.

विरुद्ध पक्षातर्फे मंचापुढे लेखी जबाब दाखल करण्यात आला. ‘तक्रारदार दोन फ्लॅटची रक्कम पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्याने त्यांनी एका फ्लॅटच्या खरेदीचा व्यवहार रद्द केला होता. महसूल विभागाच्या धोरणात बदल झाल्यामुळे इमारतीचे बांधकाम थांबवावे लागले होते. त्यामुळे तक्रारदाराला फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. इतर इमारतीतील तेवढ्याच चौरस फुटांचा फ्लॅट देण्यास तयार आहोत,’ असे सांगण्यात आले. तसेच ‘सहा लाख रुपये देण्यास तयार आहोत, असे सांगण्यात आले.

मंचाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्यात येत असून, त्यांना ४५ दिवसांच्या आत सहा लाख रुपये परत करावेत. तसेच नुकसानभरपाईपोटी २० हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार रुपये द्यावेत, असा आदेश मंचाने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेएम रस्त्याचे रूपडे पालटणार

0
0

फुटपाथच्या पुनर्रचनेसह पथदिव्यांची नवी रचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथची पुनर्रचना..., सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅक..., मोठ्या प्रमाणात येणाऱ्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्था..., संभाजी उद्यानाच्या सीमाभिंतीवरही आकर्षक वेली-फुलांची रचना..., विशेष व्यक्तींसाठी आवश्यक सुविधा आणि पथदिव्यांची नवीन रचना... अशा सर्व बदलांसह जंगली महाराज रस्त्याचा संपूर्ण ‘मेकओव्हर’ करण्याच्या कामाला महापालिकेने नुकतीच सुरुवात केली आहे.

जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकापासून (मॉडर्न कॅफे) ते गरवारे पुलापर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर ही नवीन व्यवस्था कार्यान्वित केली जाणार असून, त्याचे पहिल्या टप्प्यातील काम झाशीच्या राणी चौकापासून नुकतेच सुरू झाले आहे. महापालिकेने नेमलेल्या ‘अर्बन प्लॅनर’च्या माध्यमातून या रस्त्याचा आराखडा नव्याने बनवण्यात आला असून, त्यानुसार वाहतुकीसाठीची रुंदी कायम ठेवत फुटपाथ आणि इतर सुविधांची पुनर्रचना केली जाणार आहे. शहरातील १५ रस्त्यांची पुनर्रचना करण्याचा पालिकेचा मानस असून, त्यानुसार जंगली महाराज रस्त्यावरील काम पहिल्यांदा सुरू झाले आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी दिली.

या रस्त्याच्या प्राथमिक स्वरूपाचे काम झाशी राणी चौकापासून सुरू करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून जंगली महाराज रस्त्यावरील फुटपाथमध्ये सुधारणा करण्यात आल्या नव्हत्या. काही ठिकाणी तो अधिक उंचीवर असल्याने ज्येष्ठ नागरिकांना अडचणी यायच्या. त्यामुळे संपूर्ण फुटपाथ आता सम पातळीवर तयार केला जाणार आहे. संभाजी उद्यान आणि बालगंधर्व रंगमंदिरामुळे या फुटपाथचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या ठिकाणी बसण्याची अनेकांना इच्छा असते. त्यामुळे नवीन पद्धतीची बैठक व्यवस्था केली जाणार आहे. त्याशिवाय या परिसरातून जाणाऱ्या पादचाऱ्यांना उद्यानाच्या शेजारून जात असल्याचा अनुभव घेता यावा, यासाठी सीमा भिंतीवरही वेली सोडण्यात येणार आहेत. काही भागांत नव्याने फुलझाडे आणि आकर्षक रोपे लावण्यात येणार आहेत, तर जंगली महाराज रस्त्यावरील पार्किंगच्या रचनेमध्येही काही बदल करण्यात येणार आहेत. विशेष व्यक्तींना सर्व सुविधांचा लाभ घेता, यावा, या दृष्टीने सर्व रचना केली जाणार आहे.

.................

‘बीआरटी’साठी स्वतंत्र लेन नाही

जंगली महाराज रस्त्यावर सध्या वाहतुकीसाठी ‘चार लेन’ उपलब्ध आहेत. रस्त्याच्या पुनर्रचनेनंतर रस्त्याच्या रुंदीत कोणताही बदल झालेला नाही. याच रस्त्यावरून भविष्यात जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) राबवण्याचा विचार असला, तरी त्यासाठी आळंदी किंवा नगररोडप्रमाणे स्वतंत्र मार्गिका तयार केली जाणार नसल्याचा निर्वाळा पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुकवरील मैत्री पडली महागात

0
0

पुणे : फेसबुकवरून मैत्री झालेल्या व्यक्तीने लग्नाच्या आमिषाने एका ५५ वर्षीय महिलेची एक लाख रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोमवार पेठेत राहणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार एडवर्ड आणि एका अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सधन कुटुंबातील आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले आहे. तक्रादार महिलेने तिचे फेसबुकवर अकाउंट उघडले होते. आरोपी एडवर्ड याने फेसबुकच्या माध्यमातून एप्रिल २०१६ मध्ये महिलेसोबत मैत्री केली. तिच्याशी ओळख वाढवली. दररोज दोघे फेसबुकवरून चॅटिंग करू लागले. एडवर्ड याने लंडन येथे अभियंता असल्याचे सांगितले. महिलेला स्वत:चे चांगले फोटो पाठवून देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही दिवसांनी महिलेला त्याने लग्नाची मागणीही घातली.

तक्रारदार महिलेला ऑक्टोबर महिन्यात एडवर्ड याने अज्ञात मोबाइल क्रमांकावरून रात्री बारा वाजता कॉल केला. ‘मी लंडनमधून भारतात आलो आहे. दिल्लीतील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हेल्थ कार्ड नसल्याने मला ताब्यात घेतले आहे,’ असे सांगितले. पैशांची गरज असून आरोपीने बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून ताबडतोब दुसऱ्या दिवशी दोन टप्प्यांत पैसे जमा केले. त्यानंतर आरोपी एडवर्ड याने महिलेशी संपर्क ठेवला नाही. काही दिवस वाट पाहून महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) सतीश चव्हाण अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कराचे जाळे विस्तारण्याचा प्रयत्न’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मंदी, जागतिकीकरणाचा उलटा प्रवाह, नोटाबंदी, चालू खात्यावरील वाढती तूट या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला होता. त्यात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक शिस्त दाखवली असून कडक उपायांऐवजी विविध मार्गांनी कराचे जाळे विस्तारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,’ असे मत अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी नुकतेच व्यक्त केले.

जनता सहकारी बँक व प्रबोधन मंचातर्फे ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०१७’ या विषयावर डॉ. गोविलकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, जनता बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर, मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार व उपाध्यक्ष किशोर शशितल उपस्थित होते.

डॉ. गोविलकर म्हणाले, ‘अर्थसंकल्पात २१ लाख ४७ हजार कोटी रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. यापैकी तब्बल ९४.५ टक्के रक्कम ही विविध प्रकारचे अनुदान, संरक्षण, व्याज व पेन्शन अशा बाबींवर खर्च होणार आहे. हे सर्व घटक अनुत्पादक आहेत. त्यामुळे उर्वरित साडेपाच टक्क्यांची तरतूद करताना अर्थमंत्र्यांनी लोकानुनय करणाऱ्या बाबी टाळण्याचा प्रयत्न केला आहे.’

‘गेल्या सात आठ तिमाहींमध्ये जगभरात भारताचीच अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे. मात्र, जागतिक मंदीचा परिणाम भारतावरही होत आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. तसे झाल्यास गुंतवणुकीवर परिणाम होईल व ही गुंतवणूक परत जाण्याचीही भीती आहे.’

डॉ. गोविलकर म्हणाले, ‘या अर्थसंकल्पात भांडवली म्हणजेच सरकारी खर्चात मोठी वाढ करण्यात आली आहे. सरकारी खर्च हे नागरिकांसाठी उत्पन्न ठरते. त्यामुळे नागरिकांची क्रयशक्ती वाढेल. आपल्या देशात कर भरणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. मात्र, परदेशवाऱ्या करणाऱ्यांची आणि महागड्या गाड्या वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नोटाबंदीनंतर सरकारकडे मोठा डेटाबेस तयार असून त्याआधारे करदात्यांची संख्या वाढविण्याचा निर्धार सरकारने केला आहे. त्याचदृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात कररूपाने मिळणाऱ्या महसुलाची टक्केवारी वाढविण्यात आली आहे.’

मराठे म्हणाले, ‘नोटाबंदीची प्रक्रिया ही रक्तशुद्धीकरणासारखी प्रक्रिया होती. यंदाच्या अर्थसंकल्पात नागरिकांना थेट पैसे देण्यापेक्षा त्यांच्यासाठी उत्पन्नाचे स्रोत तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. नोटाबंदी आणि जीएसटीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या अर्थसंकल्पात महागाई वाढेल, असे काहीही नाही. नागरिकांच्या कर चुकवेगिरीच्या मानसिकतेत बदल करून कररचनेत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जर्मनीतील संशोधनसंधींवर येत्या शनिवारी सेमिनार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यार्थ्यांना जर्मनीमधील संशोधनाच्या संधींविषयी माहिती देणारे विशेष सत्र येत्या शनिवारी (११ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आले आहे. जर्मनीमध्येच पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण केलेले तज्ज्ञ या सेमिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. नव्या पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

जर्मनीमध्ये इंग्रजीत शिक्षण देणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांची संख्या वाढल्याने उच्च शिक्षणासाठी जर्मनीमध्ये जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढते आहे. या संस्थांमध्ये राबवले जाणारे अभ्यासक्रम, जर्मनीसाठीची विद्यार्थी व्हिसा प्रक्रिया, शिष्यवृत्त्या आदी बाबींविषयी या सत्रात माहिती दिली जाईल.

उच्च शिक्षणाच्या जोडीने या सत्रात मुख्य भर असेल तो संशोधनातील संधींवर. जर्मनीमध्येच पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण केलेले डॉ. सागर पंडित आणि डॉ. सिरसा मित्रा हे पीएचडी अभ्यासक्रमांची माहिती देतील; तसेच त्यांचे वैयक्तिक अनुभवही कथन करतील. त्याचप्रमाणे डॉ. रामकुमार सुकुमार हे जर्मनीतील विद्यार्थी जीवनाविषयी माहिती देतील.

याशिवाय ‘जर्मन अॅकॅडेमिक एक्स्चेंज सर्व्हिस’चे (डाड) पुणे केंद्राचे मानद संचालक डॉ. ख्रिस्तोफ सेन्फ्ट, माहिती अधिकारी धनश्री देवधर आणि गिरिजा जोशी हे जर्मनीतील उच्च शिक्षण आणि शिष्यवृत्तींविषयी माहिती देतील. सिद्धेश शिंदे आणि आकाश हेडाऊ (व्हिसा प्रक्रियेसाठी ब्लॉक्ड अकाउंट), डॉ. अरविंद नातू आणि डॉ. सिद्धार्थ जबडे (जर्मनीतील करिअरसंधी) हेही मार्गदर्शन करतील. ‘फ्रँकफर्ट स्कूल ऑफ बिझनेस’च्या लॅरिसा वूड, ग्योटिंगेन युनिव्हर्सिटीच्या एलिझाबेथ सोंगेट याही उपस्थित या वेळी राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता सुरु, विवाह नोंदणी बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू असला, तरी क्षेत्रीय कार्यालयांमार्फत केली जाणारी विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू दाखल्यांचे वितरण अशी सर्व महत्त्वाची कामे सुरू असल्याचे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी दिले.

निवडणुकीच्या कामासाठी ही कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेण्यात आले नसून आचारसंहितेच्या नावाखाली ही कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत आयुक्त कुमार यांनी दिले. निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याचे कारण पुढे करून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर होणारी कामे करण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले होते. विवाहनोंदणी; तसेच जन्म-मृत्यू दाखले मिळविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात गेलेल्या नागरिकांना निवडणूक झाल्यानंतर या, असे उत्तर दिले जात होते. या प्रकारामुळे ‘आचारसंहिता चालू; कामे बंद’ असा अनुभव संपूर्ण शहरात नागरिकांना येत असल्याचे वृत्त सोमवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांबरोबरच महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयात हा अनुभव येत असल्याने अनेक कामे रखडल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या तर बहुसंख्य कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांना भेटावयास येणाऱ्या नागरिकांना ‘साहेब इलेक्शन ड्युटीवर गेले आहेत,’ असे सांगून वाटेला लावण्यात येत आहे.

दोन दिवसांपूर्वी विवाह नोंदणी करण्यासाठी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात गेलेल्या एका नागरिकाला निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच विवाहनोंदणी करता येईल, असे उत्तर त्यांना देण्यात आले होते. पालिकेच्या इतर क्षेत्रीय कार्यालयांमध्येही अशीच उत्तरे दिली जात आहेत. याबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना विचारले असता, क्षेत्रीय कार्यालयामार्फत केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या कामांना निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसत नाही. ही कामे महत्त्वाची असल्याने नियमित करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना यापूर्वीच देण्यात आलेले आहेत.

ही कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात गुंतविण्यात आलेले नाहीत. निवडणुकीच्या नावाखाली काम टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण आयुक्त कुमार यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या शहरात पाणी नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्वतीसह वडगाव, लष्कर, एसएनडीटी, नवीन होळकर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध पंपिंग स्टेशनमध्ये स्थापत्य/विद्युतविषयक अत्यावश्यक कामे करायची असल्याने उद्या, गुरुवारी (९ फेब्रुवारी) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. शुक्रवारी (१० फेब्रुवारी) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे :

पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती गाव, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, सहकार नगर, सातारा रोड परिसर, बिबवेवाडी परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणे, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठा नगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे क्र (४२, ४६) कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, पर्वती व पद्मावती टँकर भरणा केंद्र.

वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ.

चतुःशृंगी/एसएनडीटी/वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरुगणेश नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलर नगर, अतुल नगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड परिसर.

लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी.

नवीन होळकर : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी परिसर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्यवर उलगडणार अर्थसंकल्पाचा अर्थ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्रीय अर्थसंकल्पाचे पैलू उलगडून दाखविण्यात त्यातील अर्थ स्पष्ट करण्यासाठी; तसेच त्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बँकिंग आणि आर्थिक विषयातील तज्ज्ञ ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘पुणे सुपरफास्ट’ या व्यासपीठावर उद्या, गुरुवारी एकत्र येणार आहेत.

समाजातील कळीच्या प्रश्नांवर चर्चा घडवून विषय समजून सांगण्यासाठी वा उत्तर शोधण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे ‘पुणे सुपरफास्ट’ हा कार्यक्रम आयोजिला जातो. याच कार्यक्रम मालिकेत गुरुवारी अर्थसंकल्पावर तपशीलवार चर्चा करण्यात येणार आहे. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. येत्या जुलैपासून देशभरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणार आहे. या दोन्ही बाबी विचारात घेऊन यंदाचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. हा संबंध स्पष्ट करतानाच अर्थसंकल्पातील बारकावे उलगडून दाखविण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने हा परिसंवाद आयोजिला आहे.

‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, ‘कीर्तने आणि पंडित’ फर्मचे पार्टनर किशोर फडके, ‘गोविंद मिल्क्स’चे व्यवस्थापकीय संचालक राजीव मित्रा हे अर्थसंकल्पावर आपली मते मांडतील. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक आर. श्रीराम परिसंवादाचे संचालन करणार आहेत. या कार्यक्रमाला पुण्यातील बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. येत्या गुरुवारी (नऊ फेब्रुवारी) सायंकाळी हा कार्यक्रम असून, कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरपीआय ‘कमळा’वर लढणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिका निवडणुकीत अधिकाधिक नगरसेवक निवडणूक आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) उमेदवार भारतीय जनता पक्षाचे ‘कमळ’ चिन्ह वापरणार आहे. मात्र, निवडणुकीनंतर नगरसेवकांचा महापालिकेत स्वतंत्र गट राहणार असून आरपीआयचे महापालिकेत स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार आहे, अशी माहिती आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी मंगळवारी दिली.

आरपीआयने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कांबळे बोलत होते. पुणे शहराचे निरीक्षक एम. डी. शेवाळे, पिंपरी चिंचवडचे निरीक्षक नवनाथ कांबळे, युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, अशोक कांबळे आदी उपस्थित होते. निवडणुकीत भाजप आणि आरपीआय यांची युती आहे. मात्र, आरपीआयला अद्यापदेखील निवडणूक चिन्ह मिळालेले नाही. त्यामुळे गेल्या निवडणुकीसारखी स्थिती या वर्षी होण्याची भीती आहे. तसेच, चार नगरसेवकांचा एक प्रभाग झाला आहे आणि उमेदवारांना प्रचारासाठी कमी अवधी राहीला आहे. अशा परिस्थितीत अधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी आरपीआय ‘कमळ’ चिन्हाचा वापर करणार आहे, असे कांबळे यांनी सांगितले.

दरम्यान, प्रभाग क्रमांक २९मध्ये सत्यभामा साठे आणि प्रभाग क्रमांक २४मध्ये अभिजीत सोनवणे यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही. तसेच, पक्षातील इच्छुक उमेदवारांना निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने ते आता कमळ चिन्ह वापरण्याबाबत आक्षेप घेत आहे. कमळ चिन्ह वापरण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कळविण्यात आला आहे. त्यांची याबाबत कोणत्यात प्रकारची नाराजी नाही, असे कांबळे यांनी सांगितले.

स्वतंत्र पक्षाचे अस्तित्व राहणार

महापालिकेच्या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या आरपीआयच्या नगरसेवकांचा स्वतंत्र गट राहणार आहे. त्यामुळे महापालिकेत स्वतंत्र पक्ष म्हणून अस्तित्व कायम राहणार आहे. भाजप आणि आपरीआय या दोन्ही पक्षांच्या नेत्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीत आरपीआयचे ६ ते ८ नगरसेवक निवडून येणार असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठपैकी सात जागांवर काँग्रेसपुरस्कृत उमेदवार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेसच्या आठ उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून, त्यातील सात जागांवर काँग्रेसने आता उमेदवार पुरस्कृत केले आहेत. त्यात रवींद्र धंगेकरांचाही समावेश आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक १६ मध्ये जोरदार लढत होण्याची चिन्हे आहेत.
शहरातील आघाडीचे चित्र स्पष्ट झाले असून, प्रथमदर्शनी आघाडीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक मिळणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न देता काँग्रेसला मदत केल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक १९मध्ये काँग्रेसच्या एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. मात्र, तेथे काँग्रेसने दुसऱ्या उमेदवाराला पुरस्कृत केलेले नाही. काँग्रेसचे पूर्ण पॅनेल असलेल्या प्रभाग क्रमांक ६, ७, ८, १४, १७, १८, २० आणि २९ मध्ये पक्षाच्या बंडखोरांनी माघार घेतली आहे.

काँग्रेसने पुरस्कृत केलेले उमेदवार
प्रभाग क्रमांक ५ (अ) अश्विनी उकरंडे,
प्रभाग क्रमांक १६ (ब) रवींद्र धंगेकर,
प्रभाग क्रमांक २३ (क) सुजाता मिरेकर,
प्रभाग क्रमांक २३ (ब) ​मनीषा हुलारे,
प्रभाग क्रमांक २९ (क) गावडे,
प्रभाग क्रमांक ३६ (अ) सोनाली उजागरे,
प्रभाग क्रमांक ३७ (अ) अभिजित नाईक,
प्रभाग क्रमांक ४० (ब) अर्चना शहा

आघाडीतील ठ‍ळक क्षणचित्रे
- बाणेर-बालेवाडीच्या प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्यासमोर काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही. याच प्रभागात उर्वरित तिन्ही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लढत होणार आहे.
- रामबाग कॉलनी प्रभागात राष्ट्रवादीचे दीपक मानकर यांच्यासमोर काँग्रेसने तर, काँग्रेसचे उमेदवार चंदू कदम यांच्यासमोर राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही.
- रास्ता पेठ तसेच लोहियानगर कासेवाडी येथे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये लढत होणार आहे.
- प्रभाग क्रमांक ३५ मध्ये काँग्रेसचे उमेदवार आबा बागूल यांच्यासमोर राष्ट्रवादीचा उमेदवार नाही.
-सॅलिसबरी पार्क प्रभागात काँग्रेसचे युवराज शहा यांच्यासमोर राष्ट्रवादीचा उमेदवार नाही. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये यांच्यात लढत आहे.
- प्रभाग क्रमांक १६ ब कसबा पेठेत रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसचा अर्ज बाद झाला. परंतु, त्यांचा अपक्ष म्हणून भरलेला अर्ज कायम राहिल्याने काँग्रेसने त्यांना पुरस्कृत केले आहे.

कशी झाली आघाडी
- आठ प्रभागांमध्ये पूर्णपणे आघाडी. त्यातील दोन जागा काँग्रेसला, तर उर्वरित प्रभाग राष्ट्रवादीला.
- अप्पर इंदिरानगर प्रभागात काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादीला फायदा शक्य.
- काँग्रेसने सात प्रभागांमध्ये केवळ एकच उमेदवार दिला आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला मिळेल. - प्रभाग क्रमांक ११, १२, १५, ३६ आणि ४१ मध्ये दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार दिले आहेत. या ठिकाणी आघाडीमध्ये थेट लढत नाही. मात्र, प्रभाग क्रमांक १५ मध्ये राष्ट्रवादीचा एक अर्ज बाद झाला आहे.
- प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादीने तीन तर, काँग्रेसने एक उमेदवार दिला. उर्वरित तिन्ही जागांवर राष्ट्रवादीचे विद्यमान लढत आहेत. असाच काहीसा प्रकार प्रभाग क्रमांक २०, २१, २४ आणि २८ मधील मैत्रीपूर्ण लढतींमध्ये दिसून येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवडणूक रिंगणात हजारभर उमेदवार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीसाठीच्या मंगळवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत ७५१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे महापालिकेच्या १६२ जागांसाठी ११०२ उमेदवार आता नशीब आजमावणार आहेत. महापालिका प्रशासनाकडे आलेल्या एकूण उमेदवारी अर्जांपैकी १८५३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. काही प्रभागात पंचरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती पाहायला मिळणार आहेत.

इनामदारांचा दोन्ही ठिकाणी शड्डू
कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील तीन प्रभागांमध्ये ९१ उमेदवार रिंगणात असणार आहेत. यामध्ये विद्यमान नगरसेवक फारूक इनामदार प्रभाग क्रमांक २६ आणि २४ या ठिकाणाहून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले. कौसरबाग-महंमदवाडी (प्र. क्र. २६) प्रभागातून २९ उमेदवार, वानवडीतून प्रभाग क्रमांक २५ मधून २५ उमेदवार आणि रामटेकडी-सय्यदनगरमधून (प्र. क्र. २४) ३५ उमेदवार निवडणूक लढणार आहेत. या तिन्ही प्रभागात ११८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. इनामदार सध्याच्या महंमदवाडी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. सध्याच्या प्रभाग रचनेनुसार पक्षाने त्यांना कौसरबाग-महंमदवाडी प्रभागातून उमेदवारी जाहीर केली. पण, इनामदार स्वतः प्रभाग क्रमांक २४ मधून लढण्यास इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी कौसरबाग-महमंदवाडीतून पक्षातर्फे आणि रामटेकडी-सय्यदनगर येथून अपक्ष म्हणून अर्ज भरला. मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते अपक्ष अर्ज मागे घेतील, असे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने त्यांची दोन्ही ठिकाणी उमेदवारी निश्चित झाली आहे. रामटेकडी-सय्यदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आनंद अलकुंटे रिंगणात आहेत. त्यामुळे येथील लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, अभिजित शिवरकर यांनी प्रतिज्ञापत्रावर सही न केल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला होता. त्यावर त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, तेथे ती फेटाळण्यात आली.

साळुंखे-शेंडगे रिंगणात
कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयात अखेरच्या दिवशी ५१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे, आता तीन प्रभागातील १२ जागांसाठी ७८ उमेदवार रिंगणात असतील, हे स्पष्ट झाले. शनिवार-सदाशिव पेठ, रास्ता-रविवार पेठ आणि नवी पेठ-पर्वती या प्रभागांचा समावेश कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयात होतो. या प्रभागातून मंगळवारी ५१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये, भाजपचे नगरसेवक धनंजय जाधव, माजी नगरसेवक दत्ता सागरे यांच्यासह विविध पक्षांकडून भरलेल्या कार्यकर्त्यांच्या अर्जांचा समावेश आहे. रास्ता-रविवार पेठेत भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मनीष साळुंखे यांनी अखेरपर्यंत माघार घेतली नाही. नवी पेठ-पर्वती विभागात महायुतीच्या उमेदवाराविरोधात पक्षाच्या सरस्वती शेंडगे यांनाच ‘कमळ’ चिन्ह मिळाल्याने पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे.

ज्योत्स्ना कुलकर्णी यांची अखेर माघार
भारतीय जनता पक्षाने ऐनवेळी तिकीट कापले म्हणून आंदोलनाच्या पवित्रा घेतलेले जन्ननाथ कुलकर्णी यांची पत्नी जोत्स्ना यांसह ३३ अपक्ष उमेदवारांनी कोथरूडमधून माघार घेतली. कोथरूडमधील प्रभाग क्रमांक १०, ११ आणि १२ मधून आता ५८ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या काही उमेदरावांनी अर्ज भरणाच्या शेवटच्या दिवशी ऐनवेळी अन्य पक्षात प्रवेश करून अर्ज भरले होते. काहींनी अपक्ष निवडणूक लढण्याचा पर्याय स्वीकारला होता. शिवसेनेतून काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात आलेले बाळा टेमकर यांनी पत्नी विद्या यांना अपक्ष अर्ज भरायला लावला होता. कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी पाच जणांनी तर, मंगळवारी शेवटच्या दिवशी २८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ज्योत्स्ना कुलकर्णी आणि विद्या टेमकर यांनीही माघार घेतली. आता प्रभाग क्रमांक १०,११ आणि १२ मध्ये ५८ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

..

७८ उमेदवार रिंगणात

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २७ मधून अनुक्रमे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवक आरती साईनाथ बाबर यांनी आणि प्रभाग क्रमांक ४१ मधून आमदार योगेश टिळेकर यांचे बंधू चेतन टिळेकर यांनी अर्ज मागे घेतला. प्रभाग क्रमांक २७, ३७ आणि ४१ या तिन्ही प्रभागातून ४३ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता ७८ जण रिंगणात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक ४१ मधून भाजपने आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांचे बंधू चेतन टिळेकर यांनी माघार घेतली.

बोडके-लिमये यांची माघार

टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक ३० (दत्तवाडी जनता वसाहत), प्रभाग क्रमांक ३३ (वडगाव बुद्रुक धायरी) आणि प्रभाग ३४ (हिंगणे खुर्द सनसिटी) या प्रभागांतील ५७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका मनीषा बोडके आणि भाजपच्या माजी नगरसेविका अनुपमा लिमये यांचा समावेश आहे. उमेदवारी मागे घेतल्यानंतर तीन प्रभागांमध्ये ६८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. प्रभाग ३० मध्ये २३, प्रभाग ३३ मध्ये २१ आणि प्रभाग ३४ मध्ये २४ उमेदवार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे, सहायक निवडणूक अधिकारी गजानन गुरव आणि रवी पवार यांनी सांगितले.नगरसेविका बोडके यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग ३० मध्ये वैशाली चांदणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बोडके यांनी अर्ज मागे घेतला. लिमये यांची नाराजी दूर झाल्याने त्यांनी प्रभाग ३४ मधून माघार घेतली आहे.

..

आशा बिबवे यांची माघार

सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रभाग २८,३५ आणि ३६ मध्ये एकूण ९५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे, तिन्ही प्रभागात मिळून १५४ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. भाजपने प्रभाग २८ (क) मधून ऐनवेळी तिकीट नाकारलेल्या आशा बिबवे यांनी देखील माघार घेतली आहे. त्यांच्या ऐवजी राजश्री शिळीमकर यांना भाजपने एबी फॉर्म दिल्याने दिल्याने त्यांचा अर्ज अपक्ष म्हणून ग्राह्य धरला गेला. अखेर, त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचे ठरवले. मंगळवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने जवळजवळ ७५ अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामध्ये पक्षाने तिकीट न दिलेल्या अनेक बंडखोरांचा आणि ‘डमी’ फॉर्म भरलेल्या नेत्यांचा समावेश आहे.

..

१५४ उमेदवार रिंगणात

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात तीन प्रभागांमधून दाखल अर्जांपैकी १११ अर्ज कायम राहिले. ८२ उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १८,१९ आणि २० हे प्रभाग आहेत. यामध्ये अनुक्रमे खडकमाळ आळी, लोहियानगर, ताडीवाला रस्ता व ससून हॉस्पिटल हा भाग येतो. तीन प्रभागातून मिळून २६५ अर्ज भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडे दाखल झाले होते. अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये अपक्ष उमेदवारांचा भरणा अधिक आहे. प्रभाग. क्र. १८मध्ये ५१ तर १९मध्ये ३०उमेदवार रिंगणात आहेत. तसेच २० मधून ३० उमेदवार कायम राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी संजय पाटील यांनी दिली.

७७ अर्ज माघारी
वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या प्रभागातून एकूण ७७ अर्ज माघारी घेण्यात आले. प्रभाग १३ मधून १७, प्रभाग क्रमांक ३१ मधून ४१ आणि प्रभाग क्रमांक ३२ मधून १९ असे मिळून एकूण ७७ अर्ज माघारी घेण्यात आले आहेत. अर्ज माघारी घेण्यात आल्यानंतर आता प्रभाग १३ मधून २२, प्रभाग ३१ मधून २० आणि प्रभाग ३२ मधून ६१ असे मिळून ६१ उमेदवार रिंगणात आहेत.

समर्थक भिडले
निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच घोले रोड क्षेत्रीय कार्यालय वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तर, येथे दोन उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये हमरातुमरी आणि धक्काबुक्कीही झाली. शेवटी कलम १४४ लावून पोलिसांची जादा कुमक आणि दंगल निवारण पथक बोलावून परिसर रिकामा करावा लागला. दरम्यान, या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभागांमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या २२६ अर्जांपैकी ३७ अवैध ठरले. राहिलेल्या १८९ पैकी २९ अर्ज दुबार होते, तर उर्वरित १६० उमेदवारांपैकी ६० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता शंभर उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये भाजपच्या माजी नगरसेविका ज्योत्स्ना सरदेशपांडे, भाजपचे कार्यकर्ते सतीश बहिरट आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान केंद्रे वाढल्यामुळे पोलिसांसाठी कसरत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी चारचा प्रभाग झाल्यामुळे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे या मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त पुरविण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी बंदोबस्ताच्या नियोजनाला सुरुवात केली आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. अर्ज माघारी घेतल्यांनतर शहरातील प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा चार नगरसेवकाचा एक प्रभाग केला आहे. त्यामुळे मतदारांना चार वेळा मतदान करावे लागणार आहेत. त्यासाठी मतदानाची गती कमी होऊन मतदान केंद्रांबाहेर रांगा लागू शकतात. त्यामुळे निवडणूक आयागाने १२०० मतदारांऐवजी ८०० मतदारांचेच एक केंद्र तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे. त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देण्यासाठी पोलिसांची तयारी सुरू झाली आहे. मात्र, मतदार केंद्रांची संख्या वाढल्यामुळे बंदोबस्ताचे नियोजन करताना पोलिसांची तारेवरची कसरत सुरू झाली आहे. यासाठी उपलब्ध पोलिसांच्या संख्येवरून विशेष शाखेकडून नियोजन सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ५०१ इमारतींमध्ये सोळाशे केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. त्याची माहिती पोलिसांना दोन दिवसांपूर्वीच दिली आहे. मात्र, पुणे महापालिकेकडून अद्यापही याची माहिती देण्यात आलेली नसल्याने पोलिसांचे नियोजन खोळंबले असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी नुकतीच शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आढावा बैठक घेतली. त्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्याने पुण्यातील निवडणुकीसाठी बाहेरचा बंदोबस्त कमी मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना शहरातील उपलब्ध पोलिसांच्या बळावर नियोजन करावे लागणार आहे.

पुणे महापालिकेकडून माहितीबाबत दिरंगाई

पुणे महापालिकेच्या भोंगळपणाचा फटका उमेदवारांसह पोलिसांना बसत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील केंद्रांची संख्या, त्यासाठीचा पोलिस बंदोबस्त, अतिरिक्त कुमकची मागणी ही सर्व माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाला लवकर पाठवली, तर योग्य नियोजन करता येऊ शकते. मात्र, पुणे महापालिकेतील निवडणूक अधिकाऱ्यांकडून कोणत्याही कार्यवाहीसाठी प्रचंड वेळ लावला जात आहे. त्यांच्याकडून मतदार संख्या मतदान केंद्रांची संख्या, इमारतींची संख्या याची सविस्तर माहिती मागूनही अद्यापही देण्यात आलेली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांना बंदोबस्त मागण्यास व नियोजन करण्यास अडचणी येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश बीडकर, धंगेकर कार्यकर्त्यांसह भिडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या काही तासात मंगळवारी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात हाणामारी आणि धक्काबुकीचा प्रकार घडला. भाजपचे गटनेते, उमेदवार गणेश बीडकर आणि कॉँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे संबंधित कार्यालयात कलम १४४ लावून परिसर रिकामा करण्यात आला.
प्रभाग क्रमांक १६ क मध्ये कॉँग्रेसतर्फे अस्लम बागवान आणि रवींद्र धंगेकर दोघांनीही अर्ज दागल केले होते. त्यापैकी बागवान यांनी माघार घ्यावी आणि धंगेकर यांनी कॉँग्रेस पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, असा निर्णय कॉँग्रेसने घेतला. त्यानुसार बागवान अर्ज माघार घेण्यासाठी आले होते. त्याचवेळी बीडकरही तेथे आले. बीडकर यांनी बागवान यांना अर्ज मागे घेऊ नका, असे सांगण्याचा प्रयत्न केल्याचा दावा धंगेकर आणि समर्थकांनी केला. त्यामुळे बीडकर आणि धंगेकर यांच्यात निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच जुंपली.
दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. काही कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्याही एकमेकांवर भिरकवल्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात उमेदवारांव्यतिरिक्त इतरांना आत येण्यास मज्जाव केला होता. तरीही बीडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आत कसे सोडले, असा प्रश्न धंगेकर यांनी विचारला. त्याचवेळी पोलिसांनी धंगेकर यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी बीडकर यांनाही बाहेर जाण्यास सांगा, असे धंगेकरांनी सांगितल्याने वाद वाढत गेला. पोलिसांची कुमक आल्यानंतर सर्वांना बाहेर घालविण्यात आले. बाहेर आल्यानंतर या दोघांतील वाद आणखीनच वाढला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून सर्वांना पांगवल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या गोंधळामुळे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

माझ्या प्रभागातील एका महिला उमेदवाराच्या अर्ज माघारीसाठी मी आलो होतो. बागवान यांना मी काहीही सांगितले नाही. त्यावेळी धंगेकर यांनी मला उद्देशून अपशब्द वापरले. तसेच ते माझ्या अंगावर धावून आल्याने धक्काबुकीचा प्रकार घडला.
गणेश बीडकर, भाजप उमेदवार

सत्तेच्या जोरावर बीडकर सर्वांवर दबाव आणत आहेत. अर्ज मागे घेऊ नये, यासाठी बीडकर यांनी बागवान यांच्यावर दबाव आणला. बीडकर यांनी त्यांना फोन लावून देण्याचीही तयारी दाखवली. त्यावेळी मी बागवान यांना तुम्ही असे करू नका, आपल्याला निवडणूक लढवायची आहे, असे सांगितले. तरीही मला धक्काबुक्की करण्यात आली.
रवींद्र धंगेकर, कॉँग्रेस पुरस्कृत उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रॉस व्होटिंग’ची धास्ती

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजकीय पक्षांनी महापालिकेची निवडणूक पक्ष पद्धतीवर नेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले असले, तरी चार मते देण्याच्या पद्धतीमुळे प्रत्येक मतदाराला अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळेच सर्वच प्रभागांमधील उमेदवारांना ‘क्रॉस व्होटिंग’ होण्याची धास्ती सतावत आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये हेच अनुभव आले आहेत.

महापालिकेच्या निवडणुका सिंगल वॉर्ड पद्धतीने घेण्याच्या कायद्यात बदल करून चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. छोट्या एक सदस्यीय प्रभागात उमेदवारांची ताकद व त्यांचा संपर्क प्रभावी ठरतो. मात्र, चार सदस्यांच्या प्रभागात वैयक्तिक संपर्कावर मर्यादा येतात आणि त्या वेळी पक्षाचे चिन्ह प्रभावी ठरते, असे आढळून आले आहे. मात्र, बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये दुसराही अनुभव आला आहे.

गेल्या दशकात २००२मध्ये तीन सदस्य आणि २०१२मध्ये द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली. या निवडणुकांमध्ये अनेक प्रभागांमध्ये एक सदस्य वेगळ्या पक्षाचा आणि दुसरा सदस्य वेगळ्या पक्षाचा निवडून आल्याचे आढळून आले आहे. तसेच, ज्या प्रभागांमध्ये एकाच पक्षाचे दोन नगरसेवक विजयी झाले, त्यापैकी बहुतेक सर्वच प्रभागांमध्ये एका उमेदवाराला कमी मते आणि दुसऱ्या उमेदवाराला अधिक मते मिळाल्याचे आढळून आले आहे. एकापेक्षा अधिक मते देण्याचा चॉइस मतदारांच्या हाती लागल्यामुळे हे घडल्याचे समोर आले आहे.

अनेक नागरिक पक्षांच्या कामात स्वतः सक्रिय नसले, तरी त्यापैकी बहुसंख्य विशिष्ट राजकीय पक्षाचे पाठीराखे असतात. त्यामुळे ते पारंपरिक पद्धतीने त्या पक्षाच्या उमेदवारास मत देतात. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांशी अनेकांचे वैयक्तिक संबंध असतात. तसेच, पक्षांमधील गटबाजीमुळेही अनेकजण मतदानाचा निर्णय घेतात, असा अनुभव आहे. तसेच नव्या पिढीतील अनेक मतदारांवर राजकीय विचारसरणीचे संस्कार झालेले नसल्याने त्यांच्यापैकी अनेकजण पारंपरिक पद्धतीने एकाच पक्षाच्या व्होटबँकेत सहभागी होत नाहीत. अशा स्थितीत या मतदारांना चार मते देण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे अनेकजण काही मते एका पक्षाच्या उमेदवारांना, तर अन्य मते वेगळ्याच पक्षाच्या उमेदवारांना देण्याची शक्यता राजकीय पक्षांना सतावत आहे.

प्रभागांमध्ये संशयकल्लोळ

यापूर्वी प्रभाग पद्धतीमध्ये एकाच प्रभागात निवडून आलेल्या दोघा सदस्यांमध्ये पाच वर्षांत प्रचंड वाद झाल्याचे चित्र संपूर्ण शहरभरात आहे. त्यामुळे सहकारी उमेदवारांबाबत अनेकांच्या मनात अविश्वासाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर काही भागांमध्ये चारही उमेदवार एकत्र प्रचार करीत आहेत, तर काही भागांमध्ये अद्यापही सर्व उमेदवार एकत्र दिसलेले नाहीत. तसेच, काही भागांमध्ये विशिष्ट जागेपुरते विरोधकांशी साटेलोटे झाल्याची आणि गुपचूप एकट्याचाच प्रचार सुरू झाल्याचीही टीका करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच प्रभागांमध्ये संशयकल्लोळाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानापूर्वीच रंगतीय कोटींच्या उड्डाणाची चर्चा

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील एका बड्या राजकीय पक्षाने ‘एबी फॉर्म’ देताना प्रत्येक उमेदवारांकडून दोन लाख रुपयांचे चेक, ‘डिमांड ड्राफ्ट’ घेतल्याने या महापालिका निवडणुकीतील खर्चाची चर्चा रंगू लागली आहे. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी किमान ७० लाख ते काही कोटी रुपयापर्यंत खर्च अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना अंगठ्या, सोसायट्यांची रंगरंगोटी, ऑनलाइन रिचार्ज ते संक्रांतीच्या वाणाची शहरभरात लयलूट सुरू आहे.
निवडणूक खर्चाची कायदेशीर मर्यादा पाहिली तर तो खर्च अहवाल, पत्रके यांची छपाई आणि वितरण यातच संपणारी आहे. कार्यकर्त्यांच्या डोक्यावरील पक्षाची टोपी, अंगात उपरणे याचा खर्चही या मर्यादेबाहेरचा आहे. कार्यकर्त्यांचे जेवण, नाश्ता, एलईडी स्क्रीन, डिजिटल मीडियावरील खर्च, विविध मंडळे सांभाळण्याचा खर्च, कार्यकर्त्यांचा फौजफाटा, मतदारांची नावे शोधणारी टीम, त्याचे वितरण करणारे कार्यकर्ते, आदी खर्च लाखोंच्या घरात आहे. शहराच्या मध्यवस्तीत हा खर्च तुलनेने कमी होतो. या वेळी चार सदस्यीय प्रभाग झाल्याने आता या उमेदवारांनाही ‘सुट्टी’ नाही, अशी जोरदार चर्चा आहे.

खर्चासाठी कोअर टीम
चौघांचा प्रभाग असल्याने प्रत्यक्षातील खर्चासाठी चौघाही उमेदवारांनी किमान रक्कम काढली असून, त्याचा एकत्रित फंड केला आहे. हा फंड सांभाळणे आणि त्याचा खर्च करणे यासाठी चौघाही उमेदवारांच्या प्रतिनिधींची एक टीम कोअर टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम जुजबी खर्च या एकत्रित फंडातून करते. इतर प्रमुख खर्च करण्याचा निर्णय हा उमेदवार घेत आहेत. त्याशिवाय प्रत्येक उमेदवाराचा वैयक्तिक खर्च वेगळाच आहे.

हायफाय ते वायफाय सोसायट्या
सोसायट्यांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवून देण्याबरोबरच ‘वायफाय कनेक्शन’ची बंपर सोडत अनेक सोसायट्यांमध्ये निघाली आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी डिजिटल प्रचाराबरोबरच मतदारांची खरी गरज ओळखून त्यांच्या मदतीसाठी स्वतंत्र ‘सेल’ उघडले आहेत.

केबल कनेक्शन ते ऑनलाइन रिचार्ज
सोसायट्यांतील फ्लॅटधारकांनी नवीन शक्कल लढवून आपल्या घरातील ‘टीव्ही’चे केबल कनेक्शनचे पैसे असोत की​ रिचार्ज, उमेदवारांकडून त्याचा खर्च वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांनी मते मिळतील या आशेने मतदारराजाचे हट्ट पुरवण्याचा सपाटा लावला आहे. मतदारा राजा सांगेल ते रिजार्च करून देण्यास उमेदवार दारात उभे असल्याचे चित्र आहे.

हौसिंग सोसायट्यांचा रूबाब औरच

हौसिंग सोसायट्यांनी महापालिका निवडणुकीची पर्वणी साधून आपल्या सोसायटीच्या डागडुजीपासून रंगकामापर्यंतची कामे आटोपून घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही सोसायट्यांनी तर महापालिकेचा मिळकतकर भरून घेण्याचा पराक्रम केला आहे. उमेदवारही चाणाक्ष असल्याने त्यांनी हे सर्व खर्च करताना आपल्यालाच मतदान होईल ना, याची खबरदारी घेतली आहे. सोसायटीचे रंगकाम पूर्ण होण्यासाठी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा लागणार आहे. तोपर्यंत निवडणुकीचे निकाल हाती येऊन अमूक मतदान केंद्रावर आपल्याला किती मतदान झाले, याचे आकडे जाहीर होतील.

प्रमुख कार्यकर्त्यांना सोन्याची अंगठी
हक्काचा कार्यकर्ता ही संकल्पना संपुष्टात आल्याने आता प्रमुख कार्यकर्त्यांनाही आपल्याशी जोडून ठेवण्यासाठी काही ना काही प्रलोभने दाखवावी लागत आहेत. काही उमेदवारांनी प्रमुख कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी सुरू करतानाच आपलेसे करण्यासाठी काही युक्त्या योजल्या होत्या. या कार्यकर्त्यांच्या घरात जाऊन त्यांचा उचित मानपान करण्यात आला. या कार्यकर्त्यांच्या हातात किमान अर्धा तोळ्याची अंगठी घालून ‘मनबंधना’चा कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे. अशा प्रकारे विविध उमेदवारांनी वेगवेगळी प्रलोभने दाखवली आहेत.

‘संक्रांत वाणां’चा पाऊस
ज्या उमेदवारांनी निवडणूक येनकेन प्रकारे लढवायचीच असा निर्णय घेतला, त्यांनी जानेवारी महिन्यातच प्रचाराला सुरुवात केली. प्रचाराची पहिली फेरी सुरू करताना जानेवारीत संक्रांत वाण देण्याचा कार्यक्रम झाला. साड्या, मिक्सर, कुकर, ग्राइंडर, गृहोपयोगी वस्तू, चांदीच्या भेटवस्तू अशा विविध वस्तू वाटल्या आहेत.

उमेदवारी माघारीसाठी पैसे

उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी काही उमेदवारांनी पैसे घेण्याचा सपाटा लावल्याचे चित्र होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खर्च झाला असल्याचा बहाणा करण्यात आला. प्रमुख उमेदवारांनी ५० हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत पैसे देऊन उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी खर्च केला. त्याशिवाय पैसे देताना अर्ज माघार घेणाऱ्या उमेदवारांनी प्रचारात पैसे देणाऱ्या उमेदवाराबरोबर फिरण्याचे बंधन घालण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images