Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मनसेची यादी रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रस्थापित पक्षांप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार यादीलाही गुरुवारी उशिरापर्यंत मुहूर्त लागला नाही. पक्षाच्या नेत्यांसोबत स्थानिक पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. इतर पक्षांमध्ये आउटगोइंग-इनकमिंग जोरात असल्याने तसेच आघाडीच्या निर्णयामुळे मोठे मासे गळाला लागण्याच्या शक्यतेने ही यादी लांबल्याची चर्चा होती.
पक्षाचे नेते बाळा नांदगावकर आ​णि रिटा गुप्ता गुरुवारी दुपारी पुण्यात दाखल झाले. त्यानंतर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीला नांदगावकर, अनिल शिदोरे, गुप्ता या प्रदेश पदाधिकाऱ्यांसह शहराध्यक्ष अजय शिंदे, हेमंत संभूस, गटनेते किशोर शिंदे, बाळा शेडगे, राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर, प्रशांत कनोजिया आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दुपारी दोनपासून सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यादीला उशीर होत असल्याने त्यामागे काय कारण असेल, अशी चर्चा जोरात होती.
मनसेचे शिक्षण मंडळ सदस्य राम बोरकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर इतर अनेक पक्षांमध्येही मोठ्या प्रमाणावर इनकमिंग- आउटगोइंग झाले. त्यामुळे या घडामोडींमधून काही इतर पक्षांमधील बडे मासे आपल्या गळाला लागतील, या आशेनेच यादी लांबविण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
दरम्यान, यादी जाहीर होत नसल्याने अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती कार्यालयात गर्दी केली होती. या कार्यकर्त्यांना तसेच इतर कार्यकर्त्यांना फोन करून अर्ज भरून ठेवण्यास सांगण्यात येत होते. आयत्या वेळी ए-बी फॉर्म दिले जातील, तोपर्यंत अर्ज भरून, इतर तयारी करून ठेवा, असे सांगितले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यादी नाही तरीही उमेदवारी अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शिस्तबद्ध’ पक्ष आणि ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने गुरुवारी अनेक इच्छुकांना थेट ‘एबी फॉर्म’चे वितरण केले; पण उमेदवारांची अंतिम यादी शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर केली नाही. एबी फॉर्म मिळालेल्या बहुतेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, काही वादग्रस्त ठिकाणी आज, शुक्रवारी सकाळी उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ दिले जातील असे स्पष्ट करण्यात आले.
केंद्र आणि राज्यातील सत्तेनंतर भारतीय जनता पक्षाला महापालिकेतही झेंडा फडकवायचा आहे. त्याची तयारी अनेक दिवसांपासून सुरू असून, इच्छुकांची सर्वाधिक संख्या भाजपकडेच आहे. त्यामुळे, कोणत्या प्रभागातून कोणता उमेदवार द्यायचा, याविषयी अनेक दिवसांपासून खल सुरू होता. शहरातील सर्व आमदारांनी आपल्या भागातील काही नावांसाठी विशेष आग्रह धरला होता, तर शहर संघटनेने काही वेगळ्या नावांची शिफारस केली होती. त्यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तोडगा काढण्यात आला. त्यानंतर, भाजपकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, यादी जाहीर न करता थेट संबंधित प्रभागातील उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ देण्यात आले. पक्षाकडून ‘एबी फॉर्म’ मिळताच, अनेक उमेदवारांनी गुरुवारी अर्ज भरण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून येते. काही उमेदवारांनी ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरून ठेवले आहेत.
पक्षाकडे इच्छुकांची मोठी संख्या असल्याने यादी जाहीर केल्यानंतर होणारी बंडखोरी टाळण्यासाठी फक्त संबंधित उमेदवारांनाच गुरुवारी सकाळपासून अधिकृतरित्या निरोप देण्यात आले. त्याची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे देण्यात आली होती. पक्षाकडून संकेत मिळाल्यानंतर अनेकांनी गुरुवारी अर्ज भरून ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. यामध्ये, काही वादग्रस्त ठिकाणच्या उमेदवारांना मात्र अद्याप ‘निरोप’ देण्यात आलेले नाहीत. एखाद्या प्रभागात चारपैकी दोनच जागांवरील उमेदवार निश्चित झाले असल्यास, उर्वरित दोन्ही जागांवरील उमेदवार निश्चित होईपर्यंत ‘एबी फॉर्म’ रोखून ठेवण्यात आले आहेत. या सर्वांना आज, शुक्रवारी सकाळीच अंतिम निरोप देण्यात येतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

राज्यभरात यादी नाही
ज्यातील १० महापालिकांसाठी निवडणूक होत असली तरी, एकाही ठिकाणी भाजपने अधिकृतरित्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. उमेदवारांची नावे अंतिम झाल्यानंतर प्रदेश कार्यालयाकडून संपूर्ण यादी शहर कार्यालयाकडे पाठविण्यात येते. त्यानंतर, शहर कार्यालयाकडून ती प्रसिद्धीमाध्यमांकडे दिली जाते. यंदाची निवडणूक त्याला अपवाद ठरली असून, प्रदेशाने शहराध्यक्षांकडे यादी दिली असली तरी प्रसिद्धीसाठीचा निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात आला नाही. पुण्याप्रमाणेच इतर शहरांमध्येही हीच परिस्थिती असल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ...तर पालिका गुंडांच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘राज्यातील युती सरकारमधील भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेकडूनच गुंडांचे मुख्यमंत्री अशी भाषा करीत आहे. त्यामुळे ही मंडळी जर सत्तेत आली तर, पालिका गुंडांच्या ताब्यात जाईल,’ या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाजपची टर उडवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारे माजी आमदार अण्णा बनसोडे आणि महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांची सभेत अनुपस्थिती जाणवत होती.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ गुरुवारी (२ फेब्रुवारी) पवार यांच्या हस्ते नारळ फोडून पिंपरी येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी महापौर शकुंतला धराडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, हनुमंत गावडे, मंगला कदम, योगेश बहल, प्रकाश रेवाळे, आर. एस. कुमार, वैशाली घोडेकर, वसंत लोंढे, राजू मिसाळ, जगदीश शेट्टी, मयूर कराटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
‘राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. हिंजवडीतील इंजिनीअर मुलीचा यांच्या कारभारामुळे बळी आहे. आम्ही शहराचा विकास केला आहे. शहरातील जनता विकासाच्या बाजूनेच कौल देईल. या प्रसंगी शहराचा अधिक विकास करण्याचा विश्वास मी जनतेला देतो,’ असे पवार म्हणाले. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि आझम पानसरे हे त्रिकुट सत्तेसाठी एकत्र आल्याची टीका पवार यांनी केली. ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रसने सर्व जातीधर्माच्या कार्यकर्त्यांना पदे दिली आहेत. भाजपने सत्ता आल्यावर १०० दिवसात शहरातील अधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटल्याचे सांगून शहरात साखर वाटली, फलकबाजी करून ढोल पिटले. माणसे इकडची तिकडे गेली पण प्रश्न जैसे थेच आहेत. आत्ता अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे आश्वासन देणारे कुठे गेले आहेत,’ असा सवालही त्यांनी केला.

पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट झाला आहे. पिंपरीपेक्षा काकणभर जास्त विकास झालेले शहर दाखवा. युती सरकारमधील मंत्री एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचारामुळे राजीनामा द्यावा लागला. पंकजा मुंडे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. भाजप म्हणजे ओठावर राम आणि पोटात नथुराम अशी काहीशी स्थिती आहे.
अजित पवार

जुलूस कमिटीकडून निषेध
पिंपरी-चिंचवड जुलूस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेपासून हाकेच्या अंतरावर पिंपरी चौकात काळेझेंडे दाखवून घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीने अल्पसंख्याक समाजाला काहीच दिले नाही. मराठा कार्ड चालेल असे सांगून आमच्या समाजावर अन्याय झाला. उमेदवारी दिली गेली नाही, असा आरोप उलेमा कौन्सिल आणि पिंपरी-चिंचवड जुलूस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्ज भरण्याची लगबग वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारजे - कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये गुरुवारपर्यंत एकूण ४० अर्ज दाखल झाले होते. राजेश बराटे आणि विजय खळदनगर यांच्या अर्जाचा यात समावेश आहे. गुरुवारपर्यंत कोणत्याही प्रमुख पक्षाच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग १३, प्रभाग ३१, प्रभाग ३२ आदींचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक १३ मधून ८, प्रभाग क्रमांक ३१ मधून १५, प्रभाग क्रमांक ३२ मधून १६ अर्ज दाखल झाले आहेत.

मानकर-जाधव यांचे अर्ज
कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १०, ११ आणि १२ मधून १६ इच्छुकांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रभाग १० मधून ४, ११ मधून ९ आणि १२ मधून २ उमेदवारांनी अर्ज भरले. यामध्ये विद्यमान नगरसेवक दीपक मानकर आणि नगरसेविका अश्विनी जाधव यांचा समावेश होता. दिवसभरात १६ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले.

अलगुडे-खाडेंचे अर्ज दाखल
घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात ३४ अर्ज सादर झाले. प्रभाग क्रमांक ७ मधून दहा, १४ मधून १५ आणि १६ मधून ९ अर्ज सादर झाले. अर्ज सादर केलेल्यांमध्ये उपमहापौर मुकारी अलगुडे, नगरसेविका नीलिमा खाडे आदींचा समावेश होता. काही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीनुसार स्वतःचा मतदार क्रमांक लिहून आणल्याने संभ्रम निर्माण झाला. त्याऐवजी सर्व उमेदवारांनी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीतील क्रमांक अर्जात नोंदवावा. तसेच ऑनलाइन भरलेल्या अर्जाच्या व प्रमाणपत्रांच्या दोन प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.

औंधमध्ये ३० अर्ज
औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ८ (औंध, बोपोडी) आणि प्रभाग ९ (बाणेर, बालेवाडी, पाषाण) मधील ३० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रभाग ९ मधून २३ तर, प्रभाग ८ मधून ७ उमेदवारांनी अर्ज भरले. शिवसेनेचे विद्यमान सनी निम्हण, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहिणी चिमटे यांच्यासह माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांचा समावेश आहे. काँग्रेसचे नगरसेवक कैलास गायकवाड, भाजपकडून ज्योती कळमकर, सागर बालवडकर, सुरेखा बांगर, विशाल गांधीले यांनी अर्ज भरले.

लायगुडे, पवार, गदादेंचा अर्ज
प्रभाग क्रमांक ३० (जनता वसाहत- दत्तवाडी) आणि प्रभाग क्रमांक ३३ (वडगाव बुद्रुक-वडगाव धायरी) येथून प्रत्येकी १५ तर, प्रभाग ३४ (हिंगणे खुर्द - सन सिटी) या प्रभागातून आठ ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरणाऱ्यांमध्ये नगरसेवक राजू लायगुडे, काँग्रेसचे माजी नगरसेवक शंकर पवार यांनी भाजपकडून, मनसेच्या विद्यमान नगरसेविका युगंधरा चाकणकर यांनी मनसेकडून प्रभाग ३३ मध्ये दोन अर्ज भरले आहेत. मनसेच्या नगरसेविका प्रिया गदादे आणि त्यांचे बंधू प्रेमराज गदादे या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक ३३मध्ये चाकणकर यांनी ब आणि क या दोन ठिकाणी अर्ज भरले आहेत. या प्रभागात भाजपकडून लायगुडे, हरिदास चरवड, अतुल चाकणकर, अपर्णा पोकळे, हेमा उर्फ राजश्री नवले यांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब रायकर यांनी अर्ज भरला आहे. प्रभाग क्रमांक ३४ मध्ये मनसेचे वीरेंद्र सैंदाणे, भाजपच्या स्नेहल कुदळे, जयसिंग दांगट, शिवसेनेचे पल्लवी पासलकर यांनी अर्ज दाखल केले आहेत.

बागूल-भिमाले यांचेही अर्ज
सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २८,३५ आणि ३६ मधून १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये माजी उपमहापौर आबा बागूल, भाजपचे विद्यमान नगरसेवक श्रीनाथ भिमाले, मानसी देशपांडे यांचा समावेश आहे. या शिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. मनसे आणि शिवसेनेकडून एकही अर्ज दाखल झाला नाही.

बिबवेवाडीतही अर्ज दाखल
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २७मध्ये पाच तर, प्रभाग क्रमांक ३७ मध्ये ९ अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक ४१ मधून २२ अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक २७ ब मधून स्मिता महादेव बाबर, २७ क मधून माजी नगरसेवक भरत चौधरी यांच्या पत्नी सीमा चौधरी यांनी अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक ३७ मध्ये बाळा ओसवाल, गौरव घुले तसेच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दिनेश धाडवे यांची पत्नी रुपाली धावडे यांनी अर्ज भरले. प्रभाग क्रमांक ४१ मधून गंगाधर बधे यांनी स्वतःसह कुटुंबातील तिघांचा अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक २७ कोंढवा खुर्द- मिठानगर भागातून पाच जणांनी अर्ज दाखल केले . प्रभाग क्रमांक २७ ब मधून स्मिता महादेव बाबर यांनी तर, २७ क मधून माजी नगरसेवक भरत चौधरी यांच्या पत्नी सीमा चौधरी यांनी अर्ज दाखल केला आहे.

बागवे यांचा अर्ज
अर्ज दाखल करण्यास कमी कालावधी राहिल्याने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात गुरुवारी धावपळ उडाल्याचे दिसून आले. १८,१९ आणि २० या तीन प्रभागातून मिळून ३९ अर्ज गुरुवारपर्यंत दाखल झाले. त्यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचा समावेश आहे.

टिंगरेंनी भरला अर्ज
येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १,२ आणि ६ या प्रभागांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार सुनील टिंगरे यांनी प्रभाग २ ड मधून सकाळी अर्ज सादर केला . प्रभाग १ ड मधून अनिल टिंगरे, शशिकांत टिंगरे, मंगेश परांडे आणि गणेश पाटील यांनी अर्ज भरला. प्रभाग दोनमधून भाजपकडून इच्छुक असलेले माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे, अलका खाडे आणि मारुती सांगाडे यांनी अर्ज सादर केले. प्रभाग दोनमधून माजी नगरसेविका निर्मला हिरे यांनी अर्ज भरला.

कळकमकरांचा अर्ज
नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात ३७ इच्छुकांनी अर्ज सादर केले. यामध्ये नगरसेविका उषा कळमकर यांनी प्रभाग ३ बमधून, सुमन पठारे यांनी प्रभाग ४ ब, शिवसेनेचे नितीन भुजबळ आणि नारायण गलांडे यांनी ५डमधून, मनसेचे मोहनराव शिंदे ३ डमधून आणि काँग्रेसचे योगेश देवकर यांनी ५ क मधून अर्ज भरले आहेत.

प्रमुख उमेदवारांचे अर्ज
कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तीन प्रभागांतून गुरुवारी २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. गुरुवारी उशिरापर्यंत अधिकृतरित्या कोणत्याही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली नसली, तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, मनसेच्या नगरसेविका रुपाली पाटील, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, श्याम मानकर, दत्ता सागरे, पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

येरवडा, नगररोडमधून ७७ अर्ज

पुणे महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी येरवडा क्षेत्रीय कार्यालयात ४० तर, नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात ३७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. कळस–धानोरी प्रभागातून भाजपच्या तीन इच्छुक उमेदवारांनी ‘एबी’फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. भाजपच्या एका इच्छुक उमेदवाराने पाच हजारांची चिल्लर सुरक्षा ठेव म्हणून जमा केली. प्रभाग क्रमांक एकमधून भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या धनंजय जाधव यांनी पाच हजारांची अनामत रक्कम एक, दोन, पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांच्या माध्यमातून निवडणूक कार्यालयात जमा केली. पण, अनामत रक्कम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा न करता तळमजल्यावर जमा करावयाची आहे, हे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला.

वीस प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढती
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या प्रभागांमध्ये आघाडीचा निर्णय होऊ शकला नाही, तेथे मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्यात आला आहे. या मैत्रीपूर्ण लढती होताना दोन्ही पक्षांच्य काही विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले जाणार आहे. शहरातील ४१ प्रभागांपैकी १८ ते २० प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. आघाडीचा निर्णय न होऊ शकलेल्या सर्वच प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मैत्रीपूर्ण लढती होणारे प्रभाग
प्रभाग क्रमांक ५ - वडगाव शेरी-कल्याणीनगर
प्रभाग क्रमांक ६- येरवडा
प्रभाग क्रमांक ७- पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी
प्रभाग क्रमांक ८- औंध बोपोडी
प्रभाग क्रमांक ९- बाणेर-बालेवाडी पाषाण
प्रभाग क्रमांक १३- एरंडवणे-हॅपी कॉलनी
प्रभाग क्रमांक १४- डेक्कन जिमखाना मॉडेल कॉलनी
प्रभाक क्रमांक १७- रास्ता पेठ-रविवार पेठ
प्रभाग क्रमांक १९- लोहियानगर-कासेवाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात्यावरच्या गाण्यांतून उलगडले महिलांचे भावविश्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जात्यावरची गाणी सादर करून आणि निरनिराळ्या म्हणींचा वापर करत महिलांनी त्यांच्या भावनांचा पट पुणेकरांसमोर उलगडला. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत
‘साठवण सांस्कृतिक वारशाची’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सहभागी तरुणी आणि महिला कलाकारांनी महाराष्ट्राची परंपरा दर्शवणारे विविध खेळ, लोकसंगीत आणि लोकनृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर केला. त्यांनी सादर केलेली जात्यावरची गाणी आणि निरनिराळ्या म्हणींना रसिकांची भरभरून दाद मिळाली.

वसुधा गोडसे, मोनाली तापकिरे, कीर्ती ताम्हाणे, सुषमा भांडवलकर, श्रावणी ताम्हाणे, ज्योती चौधरी, सुरेखा लहारे, ईशा गोडसे, श्रावणी भुजबळ, मोनाली तापकिरे, सूक्ष्मा भांडवलकर या कलाकारांनी महाराष्ट्राची लोकसंस्कृती उलगडली. त्यांनी सादर केलेल्या पारंपरिक लोकसंगीतातून महिलांचे भावविश्व उलगडले. पूर्वीच्या काळात शरीर आणि मन दोन्ही सुदृढ ठेवण्यासाठी महिला एकत्र जमून वेगवेगळे कार्यक्रम करत असत. मग त्यात झिम्मा-फुगडीपासून अगदी लोकसंगीतापर्यंत अनेक प्रकार सादर केले जात असत. तशाच काहीशा कार्यक्रमाची झलक कलाकारांनी रसिकांना दाखवली. घनश्याम सुंदरा या गाण्यातून मांडलेली महिलांची दिनचर्या, गायनातून आणि नाट्यातून दाखवलेले पारंपरिक सण, सणांच्या रीती, परंपरा, त्यांचे महत्त्व रसिकांची दाद मिळवून गेले. जात्यावरच्या गाण्यांनी आणि म्हणींच्या सादरीकरणातून कलाकार महिलांनी मराठी भाषा किती समृद्ध आणि प्रगल्भ आहे, याची प्रचिती दिली. जात्यावरच्या गाण्यांमधून महिलांच्या भावनांचे होत असलेले आदानप्रदान, एकमेकींच्या समस्या जाणून घेण्यासाठी होणारे प्रयत्न आणि मैत्रीण म्हणून दिलेल्या आधाराची आठवण करून देऊन या महिला कलाकारांनी प्रेक्षकांना जुन्या काळाची सफर घडवली. भारतीय विद्याभवनचे नंदकुमार काकिर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनापती बापट रस्त्याला आता पुस्तकांचे ‘वरदा’न

$
0
0

‘वरदा बुक्स’तर्फे सुरू झाले पुस्तकांचे देखणे दालन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सेनापती बापट रस्ता परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आता वाचनाची भूक भागवण्यासाठी वाहतूक कोंडीतून मार्ग काढत पेठेत यावे लागणार नाही. उंचच उंच इमारती व चकचकीत रस्ता अशी ओळख असलेल्या सेनापती बापट रस्त्यावर एक आलिशान, सुसज्ज व देखणे असे पुस्तकांचे दालन सुरू झाले आहे. वरदा प्रकाशनातर्फे ‘वरदा बुक्स’ या नावाने हे दालन सुरू झाले असून, या दालनात इतर प्रकाशनांचीही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

सेनापती बापट रस्त्यावरील वेताळ बाबा चौकात वरदा प्रकाशनातर्फे ‘वरदा बुक्स’ हे आलिशान दालन संचालक गौरव गौर व अपर्णा गौरव गौर यांनी सुरू केले आहे. हनुमंत अनंत भावे यांनी ४२ वर्षांपूर्वी संहिता व वरदा प्रकाशन सुरू केले. अपर्णा गौर या त्यांच्या कन्या आहेत. अपर्णा गौर व गौरव गौर हे गेली सहा वर्षे प्रकाशनाचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. तसेच केदार केळकर हे व्यवस्थापक आहेत.

‘सेनापती बापट रस्त्यावर ‘क्रॉसवर्ड’ दालन होते; पण ते बंद झाले. या रस्त्यावर आता पुस्तकांचे एकही दालन नाही. पुस्तक घेण्यासाठी नागरिकांना अप्पा बळवंत चौकात जावे लागते. या भागात वाहतूक कोंडीची समस्या आहे. त्यामुळे येथील नागरिकांसाठी पुस्तक दालन गरजेचे होते. नागरिकांची वाचनाची भूक व पुस्तक दालनाची मागणी लक्षात घेऊन हे दालन गेल्या महिन्याच्या अखेरीस सुरू केले आहे,’ असे गौर दाम्पत्याने ‘मटा’ला सांगितले.

………

सुसज्ज दालन

या सुसज्ज दालनात पुस्तकांचे विविध विभाग, तसेच इतर प्रकाशनांची पुस्तके उपलब्ध आहेत. वाचकांच्या मागणीनुसार पुस्तक उपलब्ध करून देणे, विशेष सवलत व सभासद नोंदणी अशा विविध योजना लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. वरदा प्रकाशनाची दोन हजार व इतर प्रकाशनांचीही पुस्तके या ठिकाणी उपलब्ध असतील. प्राचीन महाराष्ट्र - श्री. व्यं.केतकर, भारतीय समाजशास्त्र – श्री. व्यं. केतकर, लोकमान्य टिळक चरित्र - न. चिं. केळकर, या वरदा प्रकाशनाच्या पुस्तकांसह दुर्गा भागवतांचे साहित्यही या ठिकाणी उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उज्ज्वल भवितव्यासाठी वेदांचे संरक्षण आवश्यक’

$
0
0

पुणे : ‘झाडाच्या मुळाचे रक्षण केल्यास पाने, फळे, फुले असे सर्व काही आपणास मिळते. त्याचप्रमाणे मुखोद्गत पद्धतीने जतन करण्यात येत असलेल्या वेदज्ञानाचे संक्षरण करणे देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहे. देशसेवा हीच ईश्वरसेवा आहे. प्रत्येक नागरिकाने सात्विक परंपरेचे उगमस्थान असलेल्या वेदज्ञानाचे संरक्षण करणे गरजेचे आहे,’ असा संदेश कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती यांनी दिला.

वेदमहर्षी विनायकभट्ट घैसास गुरुजी जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभात त्यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे आपला संदेश दिला. ‘वेद म्हणजे देशाच्या ज्ञानराशी, तपोराशी आहेत. देशात सभ्यता, मानसन्मान, सात्विक संस्कृती, शांतता, सुरक्षितता राहण्यासाठी वेद महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वेदांचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे,’ असे शंकराचार्यांनी आपल्या संदेशात म्हटले.

सुधीर मोघे, विवेक धूपकर, अंजली देशपांडे, यशोधन साखरे यांचा डॉ. जयंत अभ्यंकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कृष्ण आर्वीकर यांनी गेल्या वर्षभरात झालेल्या कार्याचा आढवा घेतला. यशोधन साखरे यांनी सादर केलेल्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिक कार्यक्रमांचा वीकेंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या पुण्यात फेब्रुवारी महिना रसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानीचा ठरणार आहे. या महिन्यात पुण्यात नामवंत कलाकारांच्या ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ होत आहेत. त्यात सर्वाधिक कार्यक्रमांचा धडाका चार आणि पाच फेब्रुवारी या दोन दिवशी असल्याने हा सांस्कृतिक वीकेंड ठरणार आहे. ज्येष्ठ गायक हरिहरन, पंकज उदास, विशाल शेखर, अवधूत गुप्ते, नकाश अझीज यांचे कार्यक्रम या दिवशी होत आहेत.

शनिवारी सकाळी नऊ वाजता ‘किडझी’तर्फे ‘इन्क्रेडिबल महाराष्ट्र : किडझी अॅन्युअल कॉन्सर्ट २०१६-१७’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. औंध येथील पं. भीमसेन जोशी ऑडिटोरिअममध्ये होणाऱ्या या कॉन्सर्टची थीमच वेगळी आहे. शनिवारची संध्याकाळ विशेष ठरणार आहे ती ज्येष्ठ गायक पंकज उदास यांच्या ‘एक एहसास : अ रोमँटिक इव्हिनिंग विथ पंकज उदास लाइव्ह’ आणि ‘विशाल शेखर लाइव्ह कॉन्सर्ट’ या दोन कार्यक्रमांनी. तरुणाईची अचूक नस पकडणाऱ्या विशाल शेखर यांचा लाइव्ह कार्यक्रम एसएसपीएमएस ग्राउंडवर सायंकाळी पाच वाजता होत आहे. ज्यांनी गायलेल्या रचना आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत त्या उदास यांची मैफल विमाननगरच्या फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये सायंकाळी सात वाजता होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार-गायक अवधूत गुप्ते आणि अभिजित कोसंबी यांचा म्युझिकल नाइट हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात रात्री साडेनऊ वाजता होणार आहे.

रविवारी (दि. ५) प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या गझल गायकीचे पैलू उलगडणारी ‘मायरा : s म्युझिकल इव्हिनिंग विथ हरिहरन’ ही कॉन्सर्ट होत आहे. आयएलएस लॉ कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांना साथ केलेला संगीतकार गायक नकाश अझीझ याची लाइव्ह कॉन्सर्ट रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता बालेवाडी इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट येथे होत आहे.

...

सोनू निगम आणि श्रेया घोषाल

फेब्रुवारी महिन्यात ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’चा सिलसिला सुरूच राहणार आहे. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (११ फेब्रुवारी) आणि गायक सोनू निगम (२४ फेब्रुवारी) यांच्याही लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंडितजींकडून घेतले तेवढे कमीच

$
0
0

भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त आज, शनिवारी टिळक स्मारक मंदिर येथे रात्री नऊ वाजता ‘वंदू स्वरभास्करा’ हा कार्यक्रम होणार आहे. पंडितजींचे शिष्य ‘आनंद गंधर्व’ आनंद भाटे पंडितजींना आदरांजली म्हणून त्यांच्या काही गाजलेल्या निवडक रचना सादर करणार आहेत. त्या निमित्ताने आसावरी चिपळूणकर यांनी भाटे यांच्याशी साधलेला संवाद...

.........

- पंडितजींकडे गायनाचे शिक्षण घेताना गाणे आणि इंजिनीअरिंगचे शिक्षण हे दोन्ही कधी एकमेकांच्या आड आले नाही?

- मी जे ऐकत होतो, ते भीमसेनजींचे गाणे होते. ती शैली मला आवडत होती. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच विशिष्ट घराण्याचे शिकायचे असे ठरवले नव्हते; पण जे शिकत गेलो, ते किराणा घराण्याचेच शिकलो. भीमसेनजींपूर्वीच्या माझ्या गुरूंनी मला विशिष्ट घराण्याचे शिक्षण दिले नाही आणि फक्त तंत्रपारंगत केले. तेच माझ्या फायद्याचे ठरले. मला पंडितजींनी गाणे आणि इंजिनीअरिंग असे दोन्ही सुरू ठेवायला नुसते प्रोत्साहनच दिले नाही, तर त्यांना त्याचे कौतुक होते. त्यांच्याच मनाच्या मोठेपणामुळे खरे तर मी इंजिनीअरिंग करू शकलो; मात्र त्यामुळे मी बाहेरच्या मैफली आणि महोत्सवांच्या दौऱ्यांवर त्यांच्यासह तंबोरा साथीला जात नसे. ती साथ मी फक्त पुण्यातच केली.

- पणजोबांकडूनच गाणे तुमच्याकडे आले; त्यांच्या गायनाचा तुमच्यावर कितपत प्रभाव आहे?

- भाटेबुवा हे माझे पणजोबा असल्याने मी काही त्यांना पाहिले नाही; पण आमच्या घरात प्रत्येकालाच गाता येते. भाटेबुवांची ‘नाट्यकला प्रवर्तक संगीत मंडळी’ नावाची कंपनी होती. ते बालगंधर्वांचे समकालीन होते. ते हिंदी नाटके करायचे. त्यांचे एकमेकांकडे जाणे-येणे होते. नाट्यसंगीताची आवड तिथूनच आली. ‘बाजूबंद खुल खुल जाए’ ही रचना ते उत्तम सादर करायचे.

- भीमसेनजींकडे शिकण्यापूर्वीही तुम्ही ज्या गुरूंकडे शिक्षण घेतले, त्यांच्याविषयी काही...

- माझे सुरुवातीचे शिक्षण चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे झाले. त्यांनी माझे लहान वय समजून घेऊन मला बालगंधर्वांची गाणी शिकवली. विशिष्ट नाट्यगीत कुठल्या रागावर आधारित आहे, हे सांगितले; तरीही ते नाट्यगीत नाट्यगीतासारखेच शिकवायचे. शास्त्र आणि लालित्याचे मिश्रण असलेली गंधर्व गायकी त्यांनी उत्तम पद्धतीने शिकवली. त्यानंतर एक- दोन वर्षातच मी यशवंतबुवा मराठे यांच्याकडे संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण सुरू केले. ते संस्कृत विद्वान होते. त्यांच्याकडे लोक वेदान्त वाचून समजून घ्यायला यायचे. माणूस किती सज्जन असू शकतो, याचे उदाहरण म्हणजे मराठेबुवा.

- पंडितजींविषयीची काही आठवण?

- स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी हे कुणाशीच ‘मी कुणीतरी खूप ग्रेट गायक आहे,’ असे कधीच वागायचे नाहीत. कुणी फार ओळखीचे नसेल, तरीही त्यांच्याशी दोन शब्द नीट बोलायचे. ते सर्वांसाठी उपलब्ध असायचे. त्यांची कलेशी अपंरपार निष्ठा होती आणि ते संगीताशी पूर्ण प्रामाणिक होते. ते कधीही शिष्यांना रागवायचे नाहीत. ‘मी सांगतो ते शिष्यांनी प्रामाणिकपणे घ्यावे,’ इतकेच त्यांचे म्हणणे असे. कार्यक्रम छोटा असू दे किंवा मोठा, गाण्यात आणि सादरीकरणात ते अजिबात फरक पडू द्यायचे नाहीत. त्यांचे संपूर्ण राहणे-वागणेच शिष्यांसाठी मोठी शिकवणी होती.

- ‘वंदू स्वरभास्करा’ची कल्पना कशी सुचली? त्यात कोणत्या गायनप्रकारांचा तुम्ही समावेश करणार आहात?

- भीमसेनजींनी गायनाचे कैक प्रकार लीलया हाताळले आहेत. त्या प्रत्येक प्रकारात त्यांनी उंची गाठली आहे. त्यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त त्याची पुन्हा एकदा आठवण व्हावी, या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात मी शास्त्रीय गायनासह ठुमरी, कानडी भजने, ‘राम श्याम गुणगान’, संतवाणी आणि भीमसेनजींचे काही स्वरचित राग आणि बंदिशी सादर करणार आहे. ‘सौभाग्यदा लक्ष्मी बरम्मा’, ‘रम्य ही स्वर्गाहुनि लंका’ यांसारख्या लोकप्रिय रचनांचाही यात समावेश असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारदारही झाला आरोपी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एखाद्या गुन्ह्यातील तक्रारदार दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी व्हायच्या घटना तशा विरळाच असतात; मात्र शहरात सध्या तशी एक घटना घडली आहे. शहरातील एका प्रेमी युगलाला खंडणीप्रकरणी अटक केल्याच्या गुन्ह्याने चांगलीच कलाटणी घेतली असून, खंडणीची तक्रार देणारा तक्रारदार कासवाची तस्करी करत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

इम्रान उस्मान शेख (रा. मार्केटयार्ड) असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. वन अधिकारी सागर घुले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संशयित शेख कर सल्लागार करतो. शेख याच्याकडे नोकरीस असलेल्या एका महिलेच्या मुलीने आणि तिच्या प्रियकराने शेखला फोन करून खंडणीसाठी धमकावले होते. त्या दोघांनी शेखला पोलिस असल्याचा बनाव केला होता. ‘तुम्ही आणि तुमची पत्नी कासवाची विक्री करत असून, त्यात तुम्हाला अटक करू. अटक टाळण्यासाठी चाळीस लाख रुपये द्या,’ अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली होती. या प्रकरणी शेखने दिलेल्या तक्रारीनुसार त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी त्या दोघांनी दिलेल्या धमकीची खातरजमा केली असता शेख खरेच कासवाची तस्करी करत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या पथकाने शेख याच्या घरातून चॉकलेटी रंगाचे एक कासव जप्त केले आहे. त्यानुसार पोलिसांनी शेखविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दरम्यान, तो कासवांची विक्री करतो का, तसेच हे कासव कुठून आणले, याबाबत पोलिस त्याच्याकडे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगळे पूल महिनाभर बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेंगळे पुलाची दुरुस्ती करण्यासाठी पुलावरील वाहतूक शुक्रवारी मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पूल २८ फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करून वाहतूक कोंडी टाळावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

डेंगळे पूल ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेने या पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. हा पूल शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. डेंगळे पुलाचे फाउंडेशन पिलर, तसेच बीमच्या मजबुतीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असून, ते पुढीलप्रमाणे आहेत.

या पर्यायी रस्त्यांचा वापर करा

- पालिका भवनाकडून येणाऱ्या वाहनांनी डेंगळे पुलाकडे न वळता शिवाजीनगर कोर्टामार्गे जावे.

- शिवाजीनगर कोर्ट आवाराकडून येणाऱ्या वाहनांनी कामगार पुतळा चौक अथवा शिवाजी पुतळा चौक येथून इच्छित स्थळी जावे.

- कसबा पेठ अथवा गावठाणातून येणाऱ्या वाहनचालकांनी शाहीर अमरशेख चौकातून अथवा गाडीतळ पूल चौकातून इच्छित स्थळी जावे.

- शाहीर अमर शेख चौकातून कुंभारवेस येथून डेंगळे पुलाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी आरटीओ चौक, संचेती चौकाचा वापर करावा.

- गाडीतळ पुतळा चौकातून कुंभारवेस येथून डेंगळे पुलाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी शाहीर अमर शेख चौकाचा वापर करून इच्छित स्थळी जावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राचे दुर्ग येणार जगाच्या नकाशावर

$
0
0

‘युनेस्को’चे सदस्य आणि युरोपीय तज्ज्ञांचा आजपासून दौरा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग, भुईकोट अशा सर्व प्रकारच्या गडांनी समृद्ध असणाऱ्या महाराष्ट्राचे दुर्ग आता जगाच्या नकाशावर दिमाखात झळकणार आहेत. ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा समितीचे सदस्य आणि युरोपीय तज्ज्ञांनी आजपासून १७ फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्रातील गडकोटांच्या दौऱ्याचे आयोजन केले आहे. देदीप्यमान इतिहास असणाऱ्या महाराष्ट्रातील गडांचे युरोप, तसेच राजस्थान येथील गडांप्रमाणे संवर्धन व्हावे आणि गडपर्यटन (फोर्ट टुरिझम) ही संकल्पना रुजावी, यासाठी हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

जागतिक वारसास्थळांमध्ये महाराष्ट्रातील गडकोटांना नामांकन मिळवून देण्यापूर्वी राज्य सरकार, पुरातत्त्व खात्याचे अधिकारी, तसेच संस्थांना याबाबत मार्गदर्शन व्हावे, या हेतूने ‘फोर्ट्रेस’ या युरोपातील वारसास्थळे जपणाऱ्या अग्रगण्य संस्थेने या दौऱ्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी आज, शनिवारपासून १७ फेब्रुवारीपर्यंत या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सल्लागार, तसेच युनेस्को आणि ‘इकोफोर्ट’च्या सदस्या डॉ. शिखा जैन यांनी ‘इकोफोर्ट’, ‘इकोमोस इंडिया’ यांच्या सहकार्याने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या दौऱ्यात स्वित्झर्लंड, जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्स येथील तज्ज्ञांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील गडकोटांची पाहणी केल्यावर हे तज्ज्ञ ‘फोर्ट टुरिझम सर्किट्स ऑफ युरोप’ या विषयावर सादरीकरण करणार आहेत. या सादरीकरणात युरोपातील गडांचे जतन, ऐतिहासिक आणि पारंपरिक महत्त्व जपतानाच पर्यटनाच्या दृष्टीने झालेला त्या गडांचा विकास याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र सरकारसह येथील यंत्रणेला गडांचा विकास नेमका कसा करावा याची दिशा मिळावी, तसेच जागतिक नकाशावर महाराष्ट्रातील किल्ले ठळकपणे समोर यावेत, या हेतूने उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. डॉ. जैन यांच्यासह ‘एमटीडीसी’च्या वल्सा नायर, ‘आर्किऑलिजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या पश्चिम विभागाचे संचालक नांबीराजन, ‘इंटरनॅशनल सायंटिफिक कमिटी’चे सदस्य असलेले जर्मनीचे डॉ. हन्स रुडॉल्फ, डॉ. एडमंड स्फोर, ‘ब्रिटिश फोर्ट्रेस स्टडी ग्रुप’चे माजी अध्यक्ष आणि इंटरनॅशनल फोर्ट्रेस कौन्सिल, ग्रेट ब्रिटनचे अध्यक्ष डिव्हीड बसेत या तज्ज्ञांचा दौऱ्यात समावेश आहे. अर्चना देशमुख या दौऱ्याच्या समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. महाराष्ट्रातील इतर प्रमुख गडांचे दृकश्राव्य सादरीकरण या तज्ज्ञांसमोर केले जाणार आहे.

युरोपीय तज्ज्ञ येथे भेट देणार

रायगड (रायगड), प्रतापगड, अजिंक्यतारा (सातारा), सिंधुदुर्ग (सिंधुदुर्ग), जाधवगड (पुणे), दौलताबाद किल्ला, अजिंठा-वेरूळ, होळकरांनी केलेली पाणीव्यवस्था (औरंगाबाद), अहमदनगर किल्ला, एलिफंट टोंब (नगर), धोमचे मंदिर, वाई, मेणवली वाडा (सातारा), संगम माहुली, लिंब-शेरी विहीर (सातारा), तेरेखोल, शापोरा, अॅग्वाद, राइस मागोस, काबो, मार्मागोवा (गोवा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्तीसाठी खात्याला जोडा आधार क्रमांक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारच्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्तींचा लाभ घेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक शिष्यवृत्ती जमा होणाऱ्या बँकेच्या खात्याशी तातडीने जोडावा, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त के. एस. आढे यांनी केले आहे. बँकेच्या खात्याशी आधार क्रमांक जोडलेला असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्याने शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे आढे यांनी जाहीर केले आहे.

सरकारतर्फे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारची शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा परतावा देण्यात येतो. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर तो आवश्यकतेनुसार कागदपत्रे जोडून शाळा अथवा कॉलेजला सादर करणे आवश्यक असते. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती त्याच्या बँक खात्यावर, तर शिक्षण शुल्काची रक्कम कॉलेजच्या बँक खात्यावर परस्पर जमा केली जाते.

यापुढे विद्यार्थ्यांना ही रक्कम मिळवण्यासाठी आधार क्रमांक खात्याला जोडावा लागणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची आणि आधार कार्डाची छायांकित प्रत बँकेत जमा करायची आहे. त्यानंतर बँकेकडून खात्याला आधार क्रमांक संलग्नित केल्याची पावती घेऊन ती शिष्यवृत्तीला जोडायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मादाय उपायुक्तांना आली जाग

$
0
0

चित्रपट महामंडळाची त्वरित चौकशी करण्यासाठी धावाधाव

Aditya.Tanawade@timesgroup.com

Tweet : @AdityaMT

पुणे : आठ महिन्यांपूर्वी चित्रपट महामंडळाच्या चौकशीचे आदेश मिळूनही चौकशी सुरू न करणारे धर्मादाय उपायुक्त अखेर खडबडून जागे झाले आहेत. चित्रपट महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात त्वरित चौकशी करण्याची नोटीस धर्मादाय उपायुक्त सुरेंद्र वडगावकर यांनी काढली आहे. चौकशी लांबवणाऱ्या धर्मादाय उपायुक्तांना ‘मटा’च्या वृत्तातून फटकारल्यानंतर उशिराने का होईना, पण शहाणपण सुचले आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०१० ते २०१५ या कालावधीतील संचालक मंडळाने आर्थिक गैरकारभार केला असल्याचा संशय धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी व्यक्त केला होता. त्यांनी सहा मे २०१६ रोजी चित्रपट महामंडळाच्या चौकशीचे आदेश उपायुक्त सुरेंद्र वडगावकर यांना दिले; मात्र सहआयुक्तांपासून अगदी थोड्या अंतरावर बसणाऱ्या धर्मादाय उपायुक्त वडगावकरांना तो आदेश मिळालाच नसल्याची कबुली त्यांनी दिली. धर्मादाय आयुक्तालयाच्या कार्यालयात काढलेला आदेश त्याच कार्यालयात आठ महिने उलटूनही उपायुक्तांच्या टेबलवर आला नाही. यामध्ये काहीतरी काळेबेरे असल्याची बाब लक्षात आल्यानंतर ‘मटा’ने धर्मादाय आयुक्तालयातील ढिसाळ कारभाराविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अखेर धर्मादाय उपायुक्तांना तो ‘आदेश’ सापडला असून, त्यांनी चित्रपट महामंडळाच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नेमणूक केल्याचे समजते आहे. त्यामुळे आता आयुक्तालयाला पुढील तीन महिन्यांच्या आत चौकशी करून, चित्रपट महामंडळात गैरव्यवहार करण्यात आले अथवा नाही याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यानंतर पुढील चौकशी सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, चौकशीच्या सुरुवातीच्या टप्प्यात महामंडळाच्या विरोधात याचिका दाखल केलेल्या अर्जदारांना नोटीस पाठवण्यात येणार असून, त्यांच्याकडून महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भातील पुरावे गोळा करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या पुराव्यांमार्फत महामंडळाच्या चौकशीचे आदेश काढण्यात येतील, अशी माहिती धर्मादाय आयुक्तालयातील सूत्रांनी दिली आहे. पुढील तीन महिन्यांच्या आत ही चौकशी पूर्ण करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे आता चित्रपट महामंडळाच्या चौकशीला वेग येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कोल्हापूर विभागातील धर्मादाय उपायुक्तांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावला नाही आणि चौकशी पुन्हा रखडवली तर त्यांची तक्रार राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे करणार असल्याचे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी सांगितले. ‘चित्रपट महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारांसंबंधी दोषींवर कारवाई झाली पाहिजे. त्या दृष्टीने चौकशीसाठी सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाईल,’ असे यमकर म्हणाले.

............

कोल्हापूर विभागातील धर्मादाय उपायुक्तांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावला नाही आणि चौकशी पुन्हा रखडवली, तर त्यांची तक्रार राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे करणार आहोत. चित्रपट महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारांसंबंधी दोषींवर कारवाई झाली पाहिजे. त्या दृष्टीने चौकशीसाठी सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाईल.
- धनाजी यमकर, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीच्या निर्णयामागे कदम, पवारांचा हात

$
0
0

दोन्ही काँग्रेसच्या सर्व्हेंचाही मोठा वाटा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सत्तारूढ पक्षांनी किमान शंभर जागांवर आघाडी करण्याच्या घेतलेल्या निर्णयामागे अनेक घडामोडी कारणीभूत आहेत. इतकेच नव्हे तर या दोन्ही पक्षातील नेत्यांनी केलेल्या सर्व्हेमुळे दोन्ही पक्ष आघाडीसाठी तयार झाल्याचे समजते. त्यातही आघाडी करण्यासाठी युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी पुढाकार घेऊन पालकमंत्री अजित पवार यांच्याशी केलेली चर्चा आघाडीतील मुख्य धागा ठरला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याचा निर्णय झाल्यानंतर अवघ्या काही तासांत तिढा सुटला आणि बुधवारी रात्री आघाडी अस्तित्वात आली. काँग्रेसने १०० जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादीने १३२ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सुरुवातीपासून आघाडीची भूमिका घेतली होती. प्रसंगी त्यांना पक्षातील अनेकांनी विरोध केला. पण, कधी नव्हे ते पवार यांनी सामोपचाराची भूमिका घेऊन आघाडीचे महत्त्व पटवून दिले. इतकेच नव्हे तर पवार यांनी कदम यांच्या घरी जाऊन काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखविली. पवार यांची ही भूमिका अनेकांना बुचकळ्यात टाकणारीच होती.
दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये गेल्या दहा दिवसांत चर्चेच्या तीन फेऱ्या झडल्या. दहा जागांवर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद होते. एकमेकांनी दिलेले प्रस्ताव मान्य होत नव्हते. अशा अवस्थेत काँग्रेसने शेवटचा प्रस्ताव दिल्यानंतरही पाच दिवस उलटले होते. काँग्रेसची मुंबईत प्रदेश निवड समितीची बैठक सुरू होती. या दरम्यान पवार यांनी आघाडी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि कदम यांच्याशी संपर्क साधला. कदम पुण्यात दाखल झाल्यानंतर आघाडीची पुन्हा बैठक झाली. कदम, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादीकडून अजित पवार, खासदार वंदना चव्हाण आणि महापौर प्रशांत जगताप यांनी चर्चा केली. चर्चा सुरू असताना काँग्रेसने अनेकदा भूमिका आणि जागांची संख्या बदलली. एक वेळ अशी होती की राष्ट्रवादी काँग्रेसने आता सर्व भागांमध्ये उमेदवार उभे करावेत इथपर्यंत तयारी केली होती. तरीही पवार यांचा आघाडीचा आग्रह कायम होता. अखेर आघाडी करायची यावर एकमत झाल्यानंतर काही ठिकाणी वेळ पडली तर, मैत्रीपूर्ण लढत करू असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आश्वस्त केले. प्रभाग​निहाय चर्चा करण्यात आली. ज्या प्रभागावर एकमत होत नाही, त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत हा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारे अवघ्या अर्ध्या तासांच्या बैठकीत मैत्रीपूर्ण लढती कुठे करायच्या याचा निर्णय झाला. काँग्रेसने ही यादी प्रदेशकडे पाठवली. मुंबईत आणखी दोन प्रभागांमधील मैत्रीपूर्ण लढतींमध्ये वाढ झाली आणि आघाडी आकाराला आली.

पवारांचे जातीने लक्ष
आघाडीचा निर्णय होईपर्यंत पवार यांनी यंदा प्रथमच इतके लक्ष घातले. पिंपरी चिंचवड महापालिकेची उमेदवार यादी प्रसंगी बाजूला ठेवून, पवार यांनी पुण्यामध्ये लक्ष घातले. वंदना चव्हाण यांना सर्वाधिकार देताना त्यांनी मागे राहून नेत्यांशी व इच्छुकांशी बोलण्याची भूमिका घेतली. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आघाडी करण्यात यश येत नसल्याने त्यांनी अशोक चव्हाणांशी संपर्क साधला. तोपर्यंत विश्वजित कदम हे पडद्यामागे होते. पण, पवार-चव्हाण चर्चेनंतर कदम यांनी निर्णायक पुढाकार घेऊन आघाडी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्वपक्षीय विद्यमानांच्या उमेदवारीला कात्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांच्यासह भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व पक्षांनी अनेक विद्यमान नगरसेवकांच्या उमेदवारीला ‘कात्री’ लावल्याने पंचवीसपेक्षा अधिक नगरसेवक नव्या सभागृहात दिसणार नाहीत. तर, पुन्हा सभागृहात येण्यास इच्छुक असलेल्या काही माजी नगरसेवकांना ‘उमेदवारी’ देण्यात आलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने अनेक विद्यमान नगरसेवकांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे सतीश म्हस्के, रेश्मा भोसले, विजया कापरे, शिवलाल भोसले, सुवर्णा पायगुडे, रोहिणी चिमटे, दिनेश धाडवे या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे, यापैकी काहींनी दुसऱ्या पक्षांचा आधार घेतला आहे. भारतीय जनता पक्षाने अशोक येनपुरे, दिलीप काळोखे, धनंजय जाधव, प्रतिभा ढमाले यांची तिकिटे कापली आहेत. प्रा. मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर आमदार झाल्याने पुन्हा सभागृहात येणार नाहीत. तसेच, मनीषा घाटे, मोनिका मोहोळ, मनीषा चोरबेले, विष्णू हरिहर, बापू कांबळे यांच्याऐवजी त्यांच्या कुटुंबात तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे, हे नगरसेवकही पुन्हा सभागृहात दिसणार नाहीत.
काँग्रेसने अभय छाजेड, सुधीर जानजोत, सुनंदा गडाळे, मिलिंद काची, कविता शिवरकर, शशिकला आरडे, लक्ष्मी घोडके यांना संधी नाकारली आहे. यापैकी, काहींनी पूर्वीच राजीनामा दिला आहे, तर सनी निम्हण, शीतल सावंत, बंडू गायकवाड यांच्यासारखे काही जण अन्य पक्षांतून नशीब आजमावत आहेत.
शिवसेनेचे योगेश मोकाटे, प्रशांत बधे यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. तर, मनसेच्या अनेक नगरसेवकांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे. नीलम कुलकर्णी कोणत्याच पक्षाकडून लढत नसल्याने त्या सभागृहात पुन्हा दिसणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तत्काळ तिकिटासाठी प्रयत्न​

$
0
0

शेवटपर्यंत प्रयत्न करण्यासाठी सर्वपक्षीयांची अहमहमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय पक्षांना गळती लागली. आपल्या पक्षातून तिकीट मिळाले नाही, तर दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळविण्याची अहमहमिका शेवटपर्यंत सुरूच होती. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत पुन्हा संधी मिळावी, यासाठी विरोधी पक्षातून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. शुक्रवारी दिवसभर सर्व पक्षांमध्ये जोरदार उलथापालथी सुरू होत्या.
पालिकेच्या निवडणुकांची चाहूल लागल्यापासूनच पक्षांतराचे प्रमाण वाढले होते. युतीमध्ये फाटाफूट, तर आघाडीमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याने ‘तिकीट’ मिळाले नसल्यास अन्य पक्षांचा पर्याय खुला होता. हे लक्षात घेऊनच यंदा प्रथमच कोणत्याच राजकीय पक्षाने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत उमेदवारी याद्या जाहीर करणे टाळले. थेट उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या जात होत्या, तर काहींच्या हातात ‘एबी फॉर्म’ देण्यात आले.
उमेदवारी अर्ज भरण्यास दुपारी तीनपर्यंतच मुदत असल्याने शुक्रवारी सकाळपासूनच अनेक इच्छुकांकडून सातत्याने विचारणा केली जात होती. पक्षातून आपल्याऐवजी दुसऱ्याच कोणालातरी संधी देण्यात आल्याचे समजताच, अनेकांनी इतर पक्षांमधून काही वाव आहे का याची चाचपणी सुरू केली. त्यामध्ये, काहींना यशही प्राप्त झाले. अनेक ठिकाणी उमेदवारांच्या शोधात असलेल्या पक्षांना आयते उमेदवार प्राप्त झाले. निवडणुकीपूर्वी पक्ष बदलणाऱ्यांना आयत्यावेळी डावलण्यात आल्याने अशांनी इतर पक्षांचा आधार घेतल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या शिवलाल भोसले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजू पवार यांनी शिवसेनेकडून, शिवसेनेत गेलेल्या सविता साळुंखे यांनी पुन्हा मनसेतून, भाजपमध्ये गेलेल्या राजाभाऊ गोरडे यांच्या पत्नीने राष्ट्रवादी काँग्रेसमधून अर्ज भरला. माजी नगरसेवक अविनाश अविनाश साळवे यांनीही शिवसेनेतून निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे.

राष्ट्रवादीला जोरदार धक्का
राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांचे तिकीट ऐनवेळी रद्द करण्यात आले. त्यामुळे, रेश्मा भोसले भाजपकडून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा शुक्रवारी सकाळपासूनच सुरू झाली. पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी (प्रभाग क्र ७) मधून यापूर्वीच भाजपच्या सतीश बहिरट यांनी अर्ज दाखल केला होता. तरीही, रेश्मा भोसले यांनी सुरुवातीला अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आणि थोड्याचवेळात त्यांना भाजपचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ही प्राप्त झाला. त्यामुळे, या प्रभागातून रेश्मा भोसले भाजपच्या उमेदवार असतील. राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांनीच पक्षाला जोरदार धक्का दिला असल्याने त्याची चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरपीआय’ घेणार भाजपचे कमळ हाती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांच्यात पुणे महापालिका निवडणुकीसाठी अखेर ‘युती’ झाली. दोन्ही पक्षातील फॉर्म्युल्यानुसार १६२ जागांपैकी केवळ दहा जागांवर आरपीआयची बोळवण करण्यात आली आहे. या शिवाय आरपीआयच्या वाट्याला आलेल्या जागा ‘कमळ’ चिन्ह वापरून लढविण्याचा निर्णय आरपीआयने घेतला आहे. आरपीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
पावणेतीन वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना यांच्यासह आरपीआयची महायुती झाली होती. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना स्वतंत्ररित्या लढल्यानंतर आरपीआयने भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या निवडणुकीत आरपीआयला १६२ पैकी २० जागा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यावर चर्चा सुरू होती. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर काही बैठका झाल्यानंतर कोणताही तोडगा न निघाल्याने गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरपीआयच्या नेत्यांशी चर्चा झाली. त्यामध्ये १५० जागांवर भाजपने, तर १२ जागांवर आरपीआयने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, शुक्रवारी भाजपने आरपीआयला दहा जागा देऊन त्यांची बोळवण केली. मुख्यमंत्र्यांनी बारा जागांचा शब्द दिलेला असतानाही केवळ दहा जागाच देण्यात आल्याने आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराची पसरली आहे.
आरपीआयच्या उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू नये, भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्याचा इशारा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिला आहे. आरपीआयचे उमेदवार पालिकेची निवडणूक कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढणार आहेत, का या विषयी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांना विचारले असता, ‘पालिका निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. आरपीआयला स्वत:चे असे चिन्ह नाही. निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारीला चिन्हाचे वाटप होणार आहे. त्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला सारखेच चिन्ह मिळणार नाही. त्यामुळे कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढविणार आहोत,’ असे ते म्हणाले.
आरपीआयचे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह उमेदवार यांच्याबरोबर यापूर्वीच चर्चा करुन कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन अर्जासाठी उमेदवारांची धावपळ

$
0
0

वेबसाइट बंद पडल्याने बसली पाचावर धारण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वच राजकीय पक्षांनी शुक्रवारी शेवटच्या टप्प्यात उमेदवार बदलल्याने अनेकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची वेळ आली. मात्र, दुपारच्या सत्रात निवडणूक आयोगाची वेबसाइट बंद पडल्याने उमेदवारांच्या पोटात गोळा आल्याचे चित्र होते. अगदी शेवटच्या तासांत ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रत निवडणूक आयोगाला सादर करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पळापळ सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र ​नवनिर्माण सेनेने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी बदलल्याचे दिसून आले. काही पक्षांनी तर दोन उमेदवारांना एकच ‘एबी फॉर्म’ देऊन वेळ मारून नेली. ‘एबी फॉर्म’ मिळाला असला तरी, ऑनलाइन अर्ज न भरल्याने उमेदवारांची पळापळ झाली होती.
शिवसेनेने शेवटच्या टप्प्यात दहा ते बारा उमेदवारांना अचानक उमेदवारी दिली. मनसेकडूनही अशाचप्रकारे उमेदवारी देण्यात आली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याने तेथे उमेदवारी न मिळालेले अनेक इच्छुक शिवेसना आणि मनसेच्या दारात तिकिटांसाठी उभे राहिले. हीच संधी साधून या दोन्ही पक्षांनी अनेक ठिकाणी उमेदवारी दिली. या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरताना वेबसाइट बंद पडल्याचा फटका बसला. मात्र, अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये वेबसाइट सुरू झाल्याने अनेकांची ‘लॉटरी’ लागली.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक प्रभागांमध्ये थेट लढत आहे. या पक्षांचे खुल्या आणि इतर मागास प्रवर्गात कोणते उमेदवार असतील, याकडे अनेकांचे लक्ष होते. विजयाचे प्रबळ दावेदार असणाऱ्यांची समोरासमोर लढत टाळण्यासाठी खुल्या आणि इतर मागास प्रवर्गाचा आधार घेत होते. ऑनलाइन अर्ज भरताना प्रवर्ग भरणे ​अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्ज, ‘एबी फॉर्म’ मिळवून वेळेत त्याच्या प्रती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर सादर करण्यासाठी पळापळ करणारे उमेदवार अनेक क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारात दिसले.
निवडणूक आयोगाने ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत इच्छुकांचे प्रशिक्षण घेतले होते. यावेळी आयोगाने शेवटच्या दिवशी ऑनलाईन अर्ज भरण्याची वाट पाहू नका. शेवटच्या दिवशी वेबसाइट बंद पडू शकते, अशी स्पष्ट सूचना दिली होती.

पंचवीस टक्केच अर्ज
प्रत्येक इच्छुकांकडून किमान दोन ऑनलाइन अर्ज भरण्यात आले आहेत. अर्ज भरताना अनामत रक्कम जमा करण्याचे बंधन नव्हते. त्याचा फायदा इच्छुकांनी उचलला आणि ऑनलाइन अर्ज मोठ्या प्रमाणात भरले. ऑनलाइन अर्जांच्या तुलनेत प्रत्यक्षात २५ टक्केच अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सादर झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कुठे गेली तुमची पारदर्शकता?

$
0
0

भाजपच्या इच्छुकांमध्ये असंतोषाची लाट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोणी बड्या नेत्याचा समर्थक म्हणून उमेदवारी... तर कोणी बड्या नेत्यांच्या कुटुंबातील म्हणून उमेदवारी...कोणी बाहेरून आला म्हणून उमेदवारी...!
‘गुणवत्तेवरच तिकीट मिळेल,’ ‘निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही,’ अशी भाषा करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात भाजपच्या इच्छुकांमध्ये शुक्रवारी असंतोषाची लाट उफाळून आली. उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्षात यंदा इच्छुकांची संख्या मोठी होती. सुमारे नऊशे इच्छुकांमधून १६२ जणांनाच उमेदवारी देणे शक्य असल्याने इतरांची नाराजी ओढविण्याची अपेक्षा पूर्वीपासून व्यक्त करण्यात येत होती. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत अनेक इच्छुकांना बेसावध ठेवून उमेदवारी रद्द करण्यात आली. अनेक ठिकाणी जाहीर झालेल्या यादीत ऐनवेळी बदल करण्यात आले असून, काहीजणांना उमेदवारी निश्चित झाल्याचा निरोप दिल्यानंतरही एबी फॉर्म न देता परस्पर इतरांना देण्यात आले. त्यामुळे इच्छुकांच्या असंतोषाला तोंड फुटले. त्यामध्ये काहीजणांनी स्वतः किंवा कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळविण्यासाठी इतर पक्षांशी संपर्क साधला, तर काहीजणांनी थेट पक्ष कार्यालयापुढे उपोषण सुरू केले.
काहींनी यापूर्वी आश्वासने देणाऱ्या नेत्यांच्या नावाने खडे फोडण्यास सुरुवात केली. मात्र, अखेरच्या दिवसापर्यंत पक्षाने झाकली मूठ न उघडल्याने अनेक इच्छुकांची कोंडी झाली. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी नाराज इच्छुकांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. या पूर्वी पक्षात इनकमिंग सुरू झाले, तेव्हा पक्षात अशीच अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन नेत्यांकडून देण्यात आल्याने अनेकजण निर्धास्त झाले होते. मात्र, ऐनवेळी पक्षाने दिलेल्या धक्क्याने पुन्हा नाराजी निर्माण झाली. अनेकांनी तर पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्जही सादर केले आहेत. मात्र, उमेदवारीचे अधिकृत पत्र नसल्याने त्यांची पंचाईत झाली.
आमदार-खासदारांच्या जवळचे म्हणून काहींना उमेदवारी देण्यात आली, तर कोणी बड्या नेत्यांचे नातेवाइक म्हणून त्यांची तिकिटे कापण्यात आली, अशा चर्चांना शुकवारी दिवसभर ऊत आला. या या पार्श्वभूमीवर इच्छुक आणि कार्यकर्त्यांना आपला पक्ष शिस्त पाळणारा आहे, असे नेत्यांकडून सांगण्यात येत होते.

इच्छुक सैरभैर; नेते ‘नॉट रिचेबल’
कोणत्याही प्रभागात उमेदवारीच्या शर्यतीमध्ये नसलेलीही अनेक नावे पुढे आली, तेव्हा अनेकांना धक्काच बसला. त्यामध्ये कोणी एखाद्या शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत मदत केली, म्हणून थेट महापालिकेची उमेदवारी दिल्याचेही किस्से कानोकानी झाले. काहीजणांना मध्यरात्री- पहाटेपर्यंत उमेदवारी मिळाल्याची खात्री वरिष्ठांकडून देण्यात आली होती.मात्र, पहाटेनंतर त्यांच्या नेत्यांचे फोन ‘नॉट रिचेबल’ झाल्याने इच्छुक सैरभैर झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images