Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

युतीबाबत अनिश्चितता कायम

$
0
0

दोन्ही पक्षांकडून ‘वेट अँड वॉच’; अंतिम निर्णय पुढील आठवड्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या संभाव्य युतीसंदर्भात दोन्ही पक्षांकडून ‘वेट अँड वॉच’चे धोरण अवलंबले जात आहे. जागावाटपाचा निश्चित फॉर्म्युला काय असेल, पुढील चर्चा कधी होणार, कोणत्या जागा कोण लढवणार याबाबत अद्याप अनिश्चितता कायम असून, युतीचा अंतिम निर्णय कदाचित पुढील आठवड्यापर्यंत लांबणीवर पडू शकतो.
राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानंतर भाजप-शिवसेनेच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये सोमवारी रात्री चर्चेची पहिली फेरी झाली. यामध्ये, कोणताही निष्कर्ष निघाला नसला तरी सकारात्मक विचार केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले. संख्याबळाची चर्चा पुढील टप्प्यात केली जाईल असेही दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर, गेल्या दोन दिवसांत त्याबाबत पुढील हालचाली होतील, अशी अपेक्षा भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होती. मंगळवार आणि त्यापाठोपाठ बुधवारी भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पुन्हा बैठक होईल, असे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे काहीतरी निर्णय होईल, अशी कार्यकर्त्यांची भावना होती.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली असल्याने सर्व आमदारांशी चर्चा करून प्रस्ताव देण्यात येईल, असे भाजपने शिवसेनेकडे स्पष्ट केले होते. पहिले पाऊल पुढे कोणी टाकायचे यावरून खल सुरू आहे. भाजपला गेल्या पालिका निवडणुकीपेक्षा अधिक जागा हव्या आहेत, तर शिवसेनेनेही जागांचा कोटा वाढवून द्यावा, अशी थेट मागणी केली आहे. युतीबाबत नेमका निर्णय होत नसल्याने स्थानिक स्तरावरील दोन्ही पक्षाच्या इच्छुकांमध्येही घालमेल वाढत चालली आहे. प्रभागामध्ये नेमक्या किती जागा मित्रपक्षाला दिल्या जाणार, त्या कोणत्या असतील, आपण तयारी केलेली जागा दिली तर काय होईल, यासारख्या अनेक प्रश्नांनी सध्या स्थानिक कार्यकर्ता हैराण झाला आहे. त्यातच दोन्ही पक्षांकडून सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्यात येत असल्याने कार्यकर्ता मात्र हवालदिल झाला आहे.

आठवड्याअखेरीस बैठक होणार?
भाजप-शिवसेनेची पहिली बैठक गेल्या सोमवारी झाल्यानंतर दोन-तीन दिवसांत पुन्हा चर्चा होईल, असे संकेत पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. मंगळवार-बुधवारी परिस्थिती ‘जैसे थे’च होती, तर गुरुवारीही चर्चा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्यात कदाचित २० किंवा २१ जानेवारीला चर्चेची पुढील फेरी होईल, अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मंत्री’ काँग्रेसचा; फोटो वाजपेयींचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमधूनही विस्मरण झालेल्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना चक्क काँग्रेसच्या इच्छुकाने आपल्या पत्रकामध्ये मानाचे स्थान दिले आहे. संपूर्ण कोथरूड परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, शहरातील सर्वच प्रभागांमधून इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पाडली असली तरी, अद्याप उमेदवारीची घोषणा झालेली नाही. मात्र, मतदारांपर्यंत पोहोण्यासाठी कमी वेळ हाती राहिल्यामुळे अनेकांनी मतदारांशी गाठीभेटी आणि परिचय पत्रके वाटून संपर्क मोहीम हाती घेतली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा मंत्री यंदा प्रभाग क्रमांक १३ मधून (एरंडवणा) इच्छुक आहेत. त्यांच्या परिचय पत्रकावर महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, इंदिरा-राजीव गांधी, यशवंतराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्यासह माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाही फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी मंत्री यांनी याच परिसरात काँग्रेसकडून विजय मिळविला होता. यंदाही ते इच्छुक आहेत. याबाबत विचारले असता, ‘आपण वर्षानुवर्षे काँग्रेसचे कार्यकर्ते असून, पत्रकावर काँग्रेसचे चिन्ह छापले आहे. मात्र, वाजपेयी हे केवळ भाजपचेच नेते नाहीत तर भारतरत्न, माजी पंतप्रधान आणि थोर नेते म्हणून सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांना त्यांच्याविषयी आदर आहे. यापूर्वीही आपण हा आदरभाव वेळोवेळी व्यक्त केला आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्या नेत्यांनीही वाजपेयी यांना गौरविले होते. त्यामुळेच आपण पत्रकांत त्यांचा समावेश केला,’ असे मंत्री यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीच्या शक्यतेने प्रस्थापित विचलित

$
0
0

उपनगरांमध्ये पुन्हा पक्षांतराची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची शक्यता निर्माण झाल्यामुळे प्रस्थापित नेत्यांमधील अस्वस्थता वाढली आहे. विशेषतः उपनगरांमध्ये प्राबल्य असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची चलबिचल सुरू झाली असून, मनाप्रमाणे न घडल्यास त्यांच्याकडून पक्षांतराचा मार्ग स्वीकारला जाण्याची चिन्हे आहेत.
महापालिका निवणुकीच्या तोंडावर विविध पक्षांमधील नेते सध्या भारतीय जनता पक्षाची वाट धरीत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचाही समावेश आहे. उपनगरे आणि यापूर्वी शहरात समाविष्ट झालेल्या भागात राष्ट्रवादीचे प्राबल्य असून, तेथील अनेक वजनदार घराण्यांनी आपली सत्ता टिकवून ठेवली आहे. राष्ट्रवादीतूनही भाजपमध्ये इन्कमिंग सुरू झाले होते, मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची दखल घेऊन तातडीने पावले उचलली आणि काही संभाव्य पक्षांतरे रोखल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी या मातब्बर नेत्यांची समजूत काढण्याबरोबरच दबावतंत्राचाही वापर करण्यात आला. त्यामुळे गळतीला काहीसा ब्रेक लागला होता.
या पार्श्वभूमीवर पुन्हा दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली असून, दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चाही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उपनगरांमधील प्रस्थापितांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. यापैकी अनेक वजनदार नेत्यांना उमेदवारीची खात्री आहे; मात्र, चार सदस्यीय प्रभागांमध्ये अन्य उमेदवारही आपल्या पसंतीचे किंवा आपल्या गटाचे असावेत, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, आघाडी झाली तर, आपल्या पॅनेलमधील एक अथवा अधिक जागा मित्रपक्षाला सोडाव्या लागण्याची शक्यता असल्याने या नेत्यांची समीकरणे बिघडण्याची भीती आहे. आपल्या मनाप्रमाणे झाले नाही, तर पक्षांतराचीही शक्यता चाचपून पाहण्यात येत आहे.

भाजपचेही ‘मराठा तितुका?’
अनेक उपनगरांमध्ये मातब्बर मराठा घराण्यांचे प्राबल्य असून, नातीगोती आणि सग्यासोयऱ्यांचे राजकारणही मोठ्या प्रमाणात चालते. गेल्या काही दिवसांपासून अशा वजनदार मंडळींना भाजपमध्ये आणण्यासाठी पक्षाकडून जोरदार फील्डिंग लावण्यात येत आहे. खासदार संजय काकडे यांच्यासह शहरातील अन्य प्रमुख नेत्यांकडून संपर्क साधण्यात येत आहे. या समाजातील बडे नेते पक्षाकडे वळल्यास त्यांच्यासाठी पायघड्या घालण्यात येतील, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय केंद्रबिंदू डेक्कनच्या दिशेने

$
0
0

राजकीय पक्षांकडून कार्यालयांसाठी नव्या जागांचा शोध

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या मध्यवस्तीतील कार्यालयांचा ‘पत्ता’ बदलत असून, मुठा नदीच्या पलीकडे निवडणूक कार्यालय किंवा ‘वॉर रूम’ची निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. पेठांमध्ये होणारी वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपले बस्तान हलवल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे, राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू पेठांतून डेक्कनच्या दिशेने सरकला आहे.
भारतीय जनता पक्षाचे शहरातील मुख्य कार्यालय तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे टिळक रोडवर हिराबागेजवळ, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नारायण पेठेत केळकर रोडवर आहे. या तिन्ही पक्षांच्या कार्यालयाजवळ पार्किंगची पुरेशी सोय उपलब्ध नाही. निवडणुकीच्या निमित्ताने शहराच्या सर्व भागांतून पक्षाच्या शहर कार्यालयात येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. तसेच, त्यानंतरही निवडणूक होईपर्यंत सर्व सूत्रे शहर कार्यालयातूनच हलत असतात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या वाहनांमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या तिन्ही प्रमुख पक्षांनी निवडणूक कालावधीमध्ये तात्पुरत्या कार्यालयांची उभारणी केली आहे.
जंगली महाराज रोडलगत शिरोळे रोडवर असलेल्या हॉटेल सन्मानमध्ये सुमारे महिन्याभरापूर्वीच भाजपचे निवडणूक कार्यालय सुरू झाले आहे. याच ठिकाणी पक्षाने वॉर रूम सुरू केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतीच या कार्यालयाला भेट दिली होती. सर्व इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रियाही याच ठिकाणी झाली. पुढील टप्प्यातही पदाधिकाऱ्यांच्या बैठका, निवडणुकीची तयारी आणि इतर प्रक्रिया याच कार्यालयातून सुरू राहणार आहे.
भाजपपाठोपाठ मनसेने खास निवडणुकीसाठी भांडारकर रोडवर वॉर रूम सुरू केली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच वॉररूमचे उद्घाटन करण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे सर्व कामकाज याच ठिकाणाहून सुरू राहणार आहे. सोशल मीडिया, प्रचार साहित्य, माहिती-तंत्रज्ञान अशा विविध स्वरूपाची कामे आणि नियोजन येथून चालणार आहे. शहरात सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही हिराबागजवळच्या गिरे बंगल्यातून निवडणूक कार्यालय जंगली महाराज रोडलगतच्या ‘हॉटेल सेंट्रल पार्क’च्या परिसरात हलवले आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी विविध व्यवस्था निर्माण केल्या जात असून, येत्या एक-दोन दिवसांतच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होईल, असे संकेत आहेत.

काँग्रेस-सेनेचा गिरवला कित्ता
सर्व पक्षांची कार्यालये मध्य पेठांमध्ये असताना, केवळ काँग्रेसचे कार्यालय नदीच्या पलीकडे होते. १९४० पासून काँग्रेसचे कार्यालय याच जागेत असून, पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. शिवसेनेचे शहर कार्यालयही काही वर्षांपूर्वी डेक्कन जिमखाना बस स्थानकाजवळच्या पुलाची वाडी येथे सुरू झाले. त्यामुळे, काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांची कार्यालये सुरुवातीपासूनच डेक्कनच्या परिसरात स्थिरावली असताना, आता निवडणुकीच्या निमित्ताने इतर सर्व पक्षांनीही याच भागाची निवड केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवसंग्राम’चेही राजकीय निशाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याने संभाजी ब्रिगेडपाठोपाठ आता आमदार विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटनाही राजकीय पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्याची अधिकृत घोषणा येत्या शुक्रवारी (२० जानेवारी) पुण्यात होणार आहे.
महापालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या स्थापनेसाठी शनिवारवाड्यासमोरील प्रांगणात सायंकाळी पाच वाजता भव्य मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला राज्यभरातून संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे शहराध्यक्ष भरत लगड यांनी दिली. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्य सरकारच्या शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासह संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, सरचिटणीस विक्रांत आंब्रे, सचिव शेखर पवार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तुषार काकडे आणि इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित असतील.
महापालिका निवडणुकांप्रमाणेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसंग्राम सक्रिय होणार आहे. फक्त मराठा समाजातीलच नाही, तर सगळ्या समाजाच्या प्रतिनिधींना निवडणुकीत संधी दिली जाणार असल्याचा दावा भरत लगड यांनी केला. कचरा, पाणी, वाहतूक यासारख्या मूलभूत समस्या आणि इतर विकासकामांचे मुद्दे घेऊनच संघटना व पक्ष म्हणून आम्ही मतदारांसमोर जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमुख पक्षांचा आता युती-आघाडीवर भर

$
0
0

प्रभागांची बदललेली रचना स्वबळासाठी धोक्याची

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीच्या खूप आधापीसून स्वबळाची भाषा करणाऱ्या चारही प्रमुख पक्षांना आता स्वतंत्र लढण्याऐवजी एकत्र लढण्याचा साक्षात्कार होऊ लागला आहे. शहरातील प्रभागांच्या बदललेल्या परिस्थितीत एकट्याने लढणे अत्यंत धोकादायक असल्याची कुणकुण सर्वांनाच लागल्याने युती-आघाडीच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे.
दोन्ही बाजूंकडून पहिल्या फेरीत गुंतागुंतीचे सूत्र मांडण्यात आले असले, तरी ‘तुटेपर्यंत ताणणार नाही’, असे सांगत लवचिक धोरण अवलंबण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे, पालिका निवडणुकीत प्रथमच युती विरुद्ध आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळेल, अशी शक्यता वाढली आहे. केंद्रात आणि राज्यामध्ये २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे, महापालिकेमध्येही आपल्याला बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास भाजपला वाटत आहे. केंद्रात-राज्यात सत्तेवर असूनही शिवसेनेने अनेकवेळा भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती. शिवसेनेच्या भूमिकेमुळे महापालिका निवडणुका स्वबळावर लढवाव्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती. त्यादृष्टीने, भाजपच काय शिवसेनेनेही तयारी केली आहे. तर, दुसरीकडे पालिकेत सत्तेत असूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही वाद-विवादाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे, या दोन्ही पक्षांनीही आघाडीऐवजी स्वतंत्र लढण्याचे नियोजन केले होते.
चार सदस्यीय प्रभागांचा विस्तार खूप मोठा आहे. प्रभागांच्या हद्दींप्रमाणेच त्यातील मतदारसंख्याही किमान ६० हजारांच्या आसपास आहे. २०१२मध्ये झालेल्या दोन सदस्यीय प्रभागाच्या निवडणुकीत ३० हजार मतदारांपर्यंत पोहोचताना अनेकांची दमछाक झाली होती. मतदारांची संख्या आता दुपटीहून अधिक झाली असल्याने ठरावीक कालमर्यादेत एवढ्या मतदारांपर्यंत जायचे कसे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याऐवजी, प्रभागातील काही काही भागांमध्ये एकेका पक्षाचे प्राबल्य असल्याने त्याचा फायदा करून घेण्यासाठी युती-आघाडी करूनच निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी चर्चा सुरू झाल्या आहेत.
भाजप-शिवसेना युती आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी यांच्यात सध्यातरी जागा वाटपावरून नाराजीचे वातावरण असले, तरी पुढील काही दिवसांत ते निवळण्याची चिन्हे आहेत. युती-आघाडीसाठी आम्ही सकारात्मक असल्याची भावना, दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून व्यक्त केली जात असून, खासगीमध्येही जागांचा प्रश्न सामंजस्याने सोडवता येईल, असे सांगितले जात आहे. पालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास पुढील आठवड्यात सुरुवात होणार असली, तरी तत्पूर्वी युती-आघाडीबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याचे संकेत मिळत आहेत.

वेगवान निर्णयाची तयारी
कोणत्या प्रभागात कशा प्रकारचे आरक्षण पडले आहे, या आरक्षणावर निवडून येण्यास सक्षम उमेदवार कोणाकडे आहे, गेल्यावेळी झालेले जागावाटप, विधानसभा निवडणुकीत प्रभागात पडलेली मते अशा अनेक गोष्टींचा परामर्श सध्या घेण्यात येत असून, सगळ्याच पक्षांकडून आपलेच सूत्र बरोबर असल्याचा दावा केला जात आहे. युती-आघाडी होण्यापूर्वी ही खडाखडी आणखी काही दिवस चालण्याची शक्यता असली, तरी कार्यकर्त्यांना फार दिवस संभ्रमात ठेवण्याऐवजी पटकन निर्णय घेण्याबाबतचा प्रयत्न सर्व पक्षांकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीच्या मुलीची प्रेमभंगातून आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रेमभंग झाल्यानंतर प्रियकराचा विरह सहन न झाल्यामुळे अकरावीत शिकणाऱ्या मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार पेठेत घडला. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या चुलत भावाला अटक केली आहे.
मंगेश कैलास चव्हाण (वय १९), गणेश प्रकाश पवार (वय २०, दोघे रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्याग्रस्त मुलगी रविवार पेठेत कुटुंबीयांसोबत राहत होती. आत्महत्याग्रस्त मुलगी अकरावी कॉमर्सला शिकत होती. चार वर्षांपूर्वी तिच्याच शाळेत शिकणाऱ्या गणेशने तिची ओळख मंगेशसोबत करून दिली होती. त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही महिन्यांपूर्वी या दोघांच्या प्रेमाविषयी मुलीच्या कुटुंबीयांना कळाले. कुटुंबीयांनी दोघांची कशीबशी समजूत काढली. मात्र, त्यावेळी दोघांनीही लग्न करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर मंगेशची दुसऱ्या तरुणीशी ओळख झाली. त्यामुळे त्याने आत्महत्याग्रस्त मुलीशी बोलणे, भेटणे बंद केले. त्यावरून त्यांच्यात वादावादीही झाली. मंगेशचा विरह सहन न झाल्याने मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘मंगेश हा चैत्रालीसोबत (दुसऱ्या तरुणीसोबत) लग्न करणार आहे. मी त्याच्यासोबत चैत्रालीला पाहू शकत नाही. गणेश पवारने आमच्या दोघांमध्ये भांडणे लावली असल्याने मी त्याला कधीच माफ करणार नाही. गणेश माझ्या मृत्यूला तूदेखील कारणीभूत् आहेस,’ असा आशय असलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली‍.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लिव्ह लायसन्स’ची नोंदणी आता सक्तीची

$
0
0

नोंदणी महानिरीक्षकांचे पोलिसांना पत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विविध प्रकारच्या पडताळणीसाठी पोलिस ठाण्यांमध्ये नागरिकांकडून सादर करण्यात येणारे ‘लिव्ह लायसन्स’चे दस्त आता मुद्रांक विभागाकडे नोंदणी करण्याची सक्ती होत आहे. नोंदणी महानिरीक्षक डॉ. एन. राधास्वामी यांनी पोलिसांना पत्र पाठवून नोंदणी झालेल्या दस्तांच्याच आधारे पडताळणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नोटराइज्ड किंवा साध्या कराराचे दस्त आगामी काळात पडताळणीसाठी चालणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिस व्हेरिफिकेशनसाठी अनेकदा अर्ज करताना नागरिकांकडून ‘लिव्ह लायसन्स’ जोडण्यात येते. बऱ्याचदा हा दस्त मुद्रांक विभागाकडून नोंदणी केलेला नसतो. घरमालक, भाडेकरू त्यांच्यातील ‘लिव्ह लायसन्स’चे दस्त नोटराइज्ड करतात किंवा साध्या पद्धतीने सह्या करून करार करतात. त्यानंतर हे दस्त पोलिस व्हेरिफिकेशनसाठी सादर करण्यात येतात.
या दस्तांची मुद्रांक आणि नोंदणी विभागाकडे नोंदणी करण्यात येत नसल्याने राज्य सरकारचा महसूल बुडत आहे. महसूल वाढवण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक डॉ. एन. राधास्वामी यांनी पोलिस महासंचालकांना पत्र पाठवून नोंदणी न झालेल्या दस्तांबाबत माहिती दिली आहे. लिव्ह लायसन्स, भाडेकरार करताना पोलिस अधिकाऱ्यांनी त्याची नोंदणी करण्याचा आग्रह धरावा. काही लोक मिळकत भाड्याने देतात, मात्र लिव्ह लायसन्स दस्ताची नोंदणी न करता ते नोटराइज्ड करून आपल्याकडे ठेवतात, असा मजकूर पत्रात नमूद करण्यात आला आहे.

भाडेकराराची आवश्यकता नाही
पोलिस ठाण्यांमध्ये भाडेकरूंची माहिती देण्यासाठी भाडेकराराची आवश्यकता नाही, असा स्पष्ट उल्लेख भाडेकरूची माहिती देणाऱ्या अर्जावर करण्यात आला आहे. भाडेकराराची प्रत मागणे, ती नोंदणी झालेली नसल्यास संबंधिताला परत पाठवणे, असे प्रकार सर्रास पोलिस स्टेशनमध्ये होतात. पोलिसांना भाडेकरूच्या माहितीची गरज असते. त्यांनी करार केला आहे की नाही याची आवश्यकता नसल्याने भाडेकराराची गरज नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला राखीव सीटवर बसल्यास कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या सीटवर बसलेल्या पुरुषांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. अशा पुरुष प्रवाशांकडून शंभर दंड आकारला जाणार आहे.

पीएमपी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा आहे. ‘पीएमपी’च्या अनेक मार्गांवरील बसमध्ये सकाळी व सायंकाळी प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्याचे दिसून येते. या गर्दीमध्ये महिला प्रवाशांशी गैरवर्तन करण्याचे प्रमाण आजही जास्त आहे. या प्रकारांकडे सर्रासपणे डोळे झाक केली जाते. हे प्रकार कायमस्वरूपी थांबविण्यासाठी काहीच योजना नव्हती. सद्यपरिस्थितीत प्रत्येक बसमध्ये डाव्या बाजूच्या काही सीट महिलांसाठी राखीव आहेत. मात्र, त्या सीटवरही पुरुष प्रवासी बसतात. त्यांना विनंती केल्यानंतरही ते दाद देत नाही. वेळप्रसंगी वादाची परिस्थिती ओढावते. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पीएमपी प्रशासनाकडे प्राप्त झाल्याने, महिलांच्या राखीव जागेवर बसलेल्या पुरुष प्रवाशांकडून शंभर रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.

एखाद्या बसमध्ये महिलांच्या जागेवर बसलेल्या पुरुष प्रवाशाला महिलेने विनंती करूनही, तो न उठल्यास कंडक्टर एकदा त्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यानंतरही प्रवासी न उठल्यास त्याच्याकडून शंभर रुपये दंड आकारला जाईल. प्रवाशाने जागा न सोडल्यास संबंधित प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे केले. कंडक्टर व तिकीट तपासनीसांना याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती ‘पीएमपी’चे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षण आंदोलनांना पाठिंबा: हार्दिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनासह इतर समाजांच्या आरक्षणविषयक आंदोलनांनाही आपला पाठिंबा असून मला बोलाविले, तर मी येथे निश्चित येईल,’ असे पाटील समाज आरक्षण आंदोलनाचे फायरब्रँड नेते हार्दिक पटेल यांनी बुधवारी सांगितले.

या वेळी पटेल म्हणाले, ‘देशातील आरक्षण व्यवस्थेला माझा पाठिंबा असून गुजरातच्या पाटीदार समाजाला आरक्षण मिळवूनच देईन. हे आरक्षण मिळवण्यासाठी अहिंसेच्या मार्गांनी लढू. मात्र, त्याच वेळी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना माझ्या कडव्या विरोधाचा सामना करावा लागेल.’

माईर्स एमआयटीच्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या भारतीय छात्र संसदेत ‘जातीवर आरक्षण : सामाजिक न्याय की अन्याय’ या विषयावर पटेल बोलत होते. या वेळी जम्मू-काश्मिर विधानपरिषदेचे उपाध्यक्ष जहांगीर हुसेन, प्रा. हरि नरके, मराठा समाज मूक मोर्चाचे विनोद पाटील, प्रा. हरी नरके, माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, डॉ. रवी चिटणीस उपस्थित होते. या वेळी आमदार सोना देवी आणि रूपज्योती कुर्मी यांना ‘आदर्श आमदार’ म्हणून गौरविण्यात आले. कविता जोशी, रितू जस्वाल, सुदर्शन चौधरी, नजमा खान आणि भक्ती शर्मा या उच्चशिक्षित सरपंचांना ‘आदर्श युवा सरपंच’ पुरस्कार देण्यात आला.

पटेल म्हणाले, ‘पाटीदार समाजातील काही लोक श्रीमंत आहेत म्हणजे पूर्ण समाज श्रीमंत आहे असे नाही. त्यामुळे समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. अशातच वाढलेल्या कारखानदारीमुळे समाजातील भरपूर लोकांकडे आता जमिनी राहिलेल्या नाही. त्यामुळे त्यांना मजूरी करावी लागत आहे. अशा लोकांसाठी आम्ही आरक्षणाची मागणी करीत आहोत. आपल्या देशात जी आरक्षण व्यवस्था आहे. त्या आरक्षण व्यवस्थेला पाठिंबा आहे.’ ‘पाटीदार समाज एसी, एसटी आणि ओबीसी आदी समाजांच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. पाटीदार समाजाची सध्याची हलाखीची परिस्थिती पाहता समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे. आरक्षण मिळवण्यासाठी अहिंसेच्या मार्गांनी लढू. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आमच्या कडव्या विरोधाचा सामना करावा लागेल. महाराष्ट्रात आरक्षणासाठी सुरू असणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनासोबतच इतर समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असून गरज भसल्यास मी नक्की येईन.’

‘काँग्रेसची सत्ता असती तर?’

पटेल यांनी आपल्या भाषणात आरक्षणाला आणि समाजाच्या प्रमाणानुसार आरक्षण मिळण्याला पाठिंबा दिला. त्यानंतर प्रश्नोत्तरामध्ये ‘गुजरातमध्ये भाजपचे सरकार कमजोर करणे व बुडत्या काँग्रेसला ऑक्सिजन देण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा काढला आहे का,’ असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला. यावर, ‘गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता असती आणि मोर्चे निघाले असते, तर तुम्ही काय प्रश्न विचारला असता,’ असा प्रतिप्रश्न पटेल यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ पैसे खर्चात एक किलोमीटर अंतर

$
0
0

‘एआरएआय’कडून लिथिअम बॅटरीवरील दुचाकीचे अनावरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना केवळ २५ पैशांची वीज खर्च करून किमान एक किलोमीटर अंतर चालणारी दुचाकी येत्या काळात उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) विकसित केलेल्या संपूर्णतः भारतीय बनावटीच्या ‘लिथियम-आयन’ बॅटरीचा ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एआरएआय) दुचाकीमध्ये यशस्वीरीत्या वापर केला आहे. त्या दुचाकीची चाचणी यशस्वी झाली आहे.

अंतराळयानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या लिथियमचा वापर करून इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी तयार करण्याची घोषणा ‘एआरएआय’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभी करण्यात आली होती. ‘इस्रो’ने तयार केलेल्या बॅटरीचा ‘एआरएआय’ने दुचाकीमध्ये यशस्वी वापर केला. ‘एआरएआय’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सिम्पोझिअम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी’ (सिअॅट) या परिषदेत केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक खात्याचे सचिव संजय मित्रा यांच्या हस्ते या दुचाकीचे अनावरण करण्यात आले.

‘एआरएआय’चे अध्यक्ष राजन वडेरा, उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर, ‘एआरएआय’च्या संचालक रश्मी ऊर्ध्वरेषे, ‘नॅटट्रिप’ या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बंदोपाध्याय, ‘एसएई इंटरनॅशनल’चे मुरली अय्यर आणि ‘एसएई इंडिया’चे अध्यक्ष आर. के. मल्होत्रा, ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’चे सहसंचालक टी. मुकैया आदी या वेळी उपस्थित होते. ही बॅटरी वाहनांसाठी सुयोग्य ठरावी यासाठी ‘एआरएआय’ने विशेष प्रयत्न केले आहेत. ही दुचाकी प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात आली आहे. ‘इस्रो’ने तयार केलेल्या बॅटरीचे बिझनेस मॉडेलही ‘इस्रो’ने तयार केले आहे. आता गुंतवणूकदारांनी पुढाकार घेऊन त्यामध्ये गुंतवणूक करून सामान्य नागरिकांपर्यंत ते तंत्रज्ञान पोहोचवावे, असे आवाहन परिषदेचे मुख्य समन्वयक आनंद देशपांडे यांनी केले.

दरम्यान, ‘एआरएआय’च्या वतीने घेण्यात आलेल्या माहितीपट निर्मिती स्पर्धेत वेंकटसुब्रह्मण्यम आर. (बेंगळुरू), भूषण मंजुळे (पुणे), नचिकेत खासनीस (पुणे) यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक या वेळी जाहीर करण्यात आले.


बॅटरीवरील दुचाकीची वैशिष्ट्ये

- ही दुचाकी दोन तास चार्ज केल्यावर सुमारे ९० किलोमीटर धावली.

- दुचाकी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने धावू शकते.

- बॅटरीची क्षमता ५० अॅम्पिअर प्रतितास इतकी आहे.

- भविष्यात बॅटरीचा ‘चार्जिंग टाइम’ एक तासावर आणण्याचा मानस.

- एकदा चार्ज केल्यावर गाडी १०० ते १२० किलोमीटर चालावी या दृष्टीने प्रयत्न सुरू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी किती प्रवाशांचे बळी घेणार?: सिंधुताई

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

दिवसे न दिवस धोकादायक होत चाललेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बुधवारी रात्री भीषण अपघातात २० जणांचा जीव जाता जाता वाचला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक व्यवस्था असूरक्षित होत चालल्याने ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ या उर्से टोलनाक्यावरच्या आयआरबी कर्मचाऱ्यांवर प्रचंड संतापल्या. पैसे देऊनही या मार्गावरचा प्रवास सुरक्षित का नाही? अजून किती प्रवाशांचे बळी घेणार आहात? असे खडे बोल सुनावतानाच येत्या आठ दिवसात प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही तर हजारो नागरिकांना घेऊन या महामार्गावर आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

बुधवारी रात्री सिंधुताई मुंबईहून पुण्याला जात होत्या. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर त्यांच्या डोळ्यासमोरच भीषण अपघात होता होता टळला. या गाडीत लहानमुलांसह वीस महिलांचा समावेश होता. हे सर्व प्रवाशी थोडक्यात बचावले. पण हा सगळा प्रकार पाहून सिंधुताई मात्र प्रचंड अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या उर्से टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांना फैलावरच घेतले. आणखी किती प्रवाशांचे जीव घेणार आहात? मोठ्या गाड्यांनी टोल नाका अडवून ठेवला आहे. छोट्या गाड्या जाण्यासाठी तरी एक मार्गिका तरी ठेवा असं सांगतानाच आमच्याकडून टोलचे पैसे घेताना? कोणी अधिकार दिला तुम्हाला माणसं मारण्याचा? मोठ मोठी माणसं या एक्सप्रेसवेवर मृत्यूमुखी पडली, जखमी झाले. त्यांचे संसार उघड्यावर पडले. वीस माणसं आत्ता मेली असती. तुम्ही काय करता? असा सवालच सिंधुताईंनी केला.

कुणाला कुणाचा जीव घेण्याचा अधिका नाही. काय लावलं हे? तुम्हाला आठ दिवसाची मुदत देते. आठ दिवसात हा प्रश्न निकाली नाही काढला तर हजारो लोक घेऊन इथं बसेन असा इशाराही त्यांनी दिला. सिंधुताईंच्या या रुद्रावतारामुळे टोल नाक्यावर प्रचंड गर्दी जमली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी गोष्टी फेसबुकवर टाकल्यानं पत्नीचा खून

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

कुटुंबातल्या खासगी गोष्टी फेसबुकवर शेअर केल्याने संतापलेल्या एका उच्च शिक्षित इसमानं पत्नीचा खून करून स्वत: गळफास घेतल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील हडपसर येथे ही घटना घडली असून या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

राकेश गांगुर्डे व सोनाली गांगुर्डे अशी मृतांची नावं आहेत. हे दोघेही शिवसाई फेज एकमध्ये राहत होते. बुधवारी दिवसभर फोनवर संपर्क न झाल्यानं सोनालीचा भाऊ हर्षल पवार रात्री तिच्या घरी आला. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. राकेशनं सोनालीचा गळा दाबून खून केल्याचं उघडकीस आलं आहे.

राकेश हा एका आयटी कंपनीत कामाला होता. बी. ई. झालेली त्याची पत्नी मात्र घरीच असायची. ती तिच्या फेसबुकवरून घरातील अनेक खासगी गोष्टी मित्र-मैत्रिणींना शेअर करायची. त्या रागातूनच आपण हे कृत्य केल्याचं राकेशनं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. हडपसर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधे देण्याच्या बहाण्याने चार लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुलाच्या आजारावर आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहाण्याने एका कम्प्युटर इंजिनीअरची तीन लाख ३४ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैभव नाकील (रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दीपक आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव यांना दहा वर्षांचा आहे. त्याला मानसिक आजार आहे. सामान्य मुलांच्या तुलनेत त्याची आकलनशक्ती कमी आहे. काही दिवसांपूर्वी वैभव मुलाला घेऊन शंकरशेठ रस्त्यावरील कुमार पॅसिफिक मॉलमध्ये गेले होते. त्या वेळी दीपकने ‘माझ्या बहिणीच्या नात्यातील एकाला मानसिक विकार आहे. तुमच्या मुलावर आयुर्वेदिक उपचार केल्यास तो बरा होईल,’ वैभव यांना सांगितले. त्यानंतर त्याने वैभव यांचा पत्ता घेतला. मी बहिणीला घेऊन घरी येतो, असे सांगून तो तेथून गेला.
त्यानंतर एका महिलेला घेऊन दीपक वैभव यांच्या घरी गेला. ही आपली बहीण असून, ती आयुर्वेदिक औषध तयार करून देईल, असे सांगितले. त्यानंतर आरोपींनी वैभव यांना टिळक रस्त्यावरील एका आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात घेऊन गेले. तेथून त्यांनी आयुर्वेदिक वनस्पती व तेल घेतले. मात्र, वैभव यांना चार लाख रुपयांचे कच्चे बिल दिले. बिलानुसार वैभव यांनी एक लाख ३४ हजार रुपयांचे दोन धनादेश दिले. त्यानंतर आरोपींनी वैभव यांना एका सराफी दुकानात नेले आणि तेथे डेबिट कार्डद्वारे दोन लाखांची खरेदी केली. वैभव यांनी शहानिशा केल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक हर्षल कदम तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दादा आतातरी दादागिरी थांबवा: भारती चव्हाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

“चरित्र्य फक्त महिलांना नसते, तर पुरूषांनाही असते, हे नेते विसरले आहेत. या नेत्याच्या चारित्र्यावर बोलायचे म्हणजे अनेक दिवस कमी पडतील. त्यामुळे या नेत्याने चारित्र्याच्या कधीही गप्पा मारू नयेत. आया बहिणींचा कळवळा असल्यासारखे वागणाऱ्या या नेत्याने स्वतः आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे. परंतु चव्हाण यांनी यावेळी अजित पवार यांचे नाव घेण्याचे टाळले.

चव्हाण म्हणाल्या, हा नेता विनयभंग प्रकरणी विधानसभेत तावातावाने बोलताना आश्चर्य वाटते. पिंपरी-चिंचवडमध्ये तर रोज विनयभंग व राजकीय बलात्कार होतात, त्याला जबाबदार कोण?, याचे उत्तर या नेत्याने द्यावे. यापुढे या नेत्याने तसेच त्यांच्या बगलबच्च्यांनी, पिलावळांनी आणि दलालांनी चारित्र्याची भाषा केल्यास त्यांच्या चारित्र्याचा आलेख जनतेपुढे मांडला जाईल. माझ्या या म्हणण्यावर नेते स्वतः बोलणार नाहीत. त्यांच्या दलालांनी, पिलावळांनी किंवा महिलांचा वापर करून उत्तर देऊ नये. यावर नेत्याने स्वतः बोलावे. माझ्या बाबतीत त्यांच्या दलालांनी हस्तक्षेप करून तोंड उघडल्यास त्यांच्या नेत्याला सहा महिन्यांपूर्वी दिलेले पत्र आणखी एक पत्रकार परिषद घेऊन उघड करावे लागेल. तसे झाले, तर या नेत्याला आणि त्यांच्या पिलावळांना पिंपरी-चिंचवडमध्ये फिरणेही मुश्किल होईल. पक्षात राहून आजपर्यंत खूप मानहानी सहन केली आहे. यापुढे ते सहन केले जाणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल.”

पिंपरी-चिंचवड शहराचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कायम तोडा आणि फोडाचे राजकारण केले. स्थानिक पातळीवर सातत्याने गटबाजीला प्रोत्साहन दिले. महापालिकेत आपल्या दलालांना बसवून निष्ठावान कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली. ते सहन न झाल्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ असलेले अनेक दिग्गज मोहरे एकामोगामाग एक पक्षाबाहेर गेले. ज्यांनी सगळ्यांसाठी खड्डे खोदले, त्यांनी आज स्वतःसाठी मोठा खड्डा तयार करून घेतला. या खड्ड्यातच राज्यातील सत्ता गेली आणि मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न गाडले. काही मूठभर दलालांमुळे आज पक्षाची वाताहत झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती चव्हाण यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच दादा आतातरी दादागिरी थांबवा आणि पक्षाला एवढी मोठी गळती का लागली, याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

त्या म्हणाल्या, “आमचे नेते शरद पवार यांच्या कार्यपद्धतीच्या प्रभावामुळे पुलोद आघाडी, एस काँग्रेस पुन्हा काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षासाठी निःस्वार्थी भावनेने निष्ठेने आणि झोकून देऊन काम केले आहे. माझ्यासारख्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी पवार साहेबांच्या शब्दांवर आणि विश्वासावर पक्षासाठी उभे आयुष्य वेचले आहे. परंतु, पिंपरी-चिंचवडमधील अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना गेल्या काही वर्षांत बाजूला केले गेले आहे. याबाबत हे कार्यकर्ते खासगीत बोलत असतात, पण उघडपणे बोलायला घाबरतात. नेतृत्वाची दादागिरी, प्रत्येक शब्दातून होणारी अवहेलना आणि सत्तेच्या नशेतून आलेल्या मुजोरीमुळे निष्ठावान कार्यकर्ते खरे बोलण्यासाठी घाबरत आहेत. परंतु, पक्षाची आजची परिस्थिती पाहता आज माझ्यासारख्या कार्यकर्तीवर खरे बोलण्याची वेळ आली आहे.”

“या नेत्यांनी दलालांचे ऐकून माझ्यावर सातत्याने अन्याय केला. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून पवार साहेबांनी दिलेली जबाबदारी पार पाडत राहिली. शहराचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याकडून सातत्याने अपमानित होत असल्यामुळेच शहरातील पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर राहिले. कारण या नेत्याने पक्ष संघटना आणि महापालिकेतील सत्ता आपल्या दलालांच्या ताब्यात दिली आहे. या दलालांनी महापालिकेच्या माध्यमातून नेत्याला आर्थिक रसद पुरविण्याबरोबरच आणखी बरेचा काही पुरविले आहे. त्यामुळे या दलालांसारखे पक्षात अन्य कोणीच हुशार नाही, असा समज या नेत्याचा झाला आहे. या सर्वांची अवस्था डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजरासारखी झाली आहे. कोणीच आपणाला बघत नाही, असा समज करून घेतल्यामुळे पक्षाची आज ही अवस्था झाली आहे. आता हे सहनशीलतेच्या मर्यादेपलीकडे गेल्यामुळे बोलण्याची वेळ आली आहे.”

“माझा महापालिका निवडणुकीत अगदी थोडक्या मतांनी पराभव झाला होता. तो आमच्याच पक्षातील नेत्यांनी केला. या नेत्यांच्या अस्तित्वाला धक्का लागेल म्हणून माझा पराभव केला गेला. त्यावेळी पक्षाच्या नेत्याने आणि त्यांच्या दलालांनी पक्षनिष्ठा खुंटीला टांगली होती. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी आधीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केलेल्यांना या निवडणुकीत घरी बसवा, असे वक्तव्य केले आहे. ते पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला मान्य नाही. उलट यापूर्वी पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या आणि पक्षाची बदनामी करणाऱ्यांवर या नेत्याने एकापाठोपाठ एक पदांची खिरापत वाटली. हा नेता त्यांच्या बगलबच्च्यांना हा नियम लागू करत नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ तोडा आणि फोडाचे राजकारण केल्यामुळे गटबाजीला प्रोत्साहन मिळाले. स्वतःच्या हातात कायम सत्ता राहावी यासाठी स्थानिक पातळीवर एकमेकांमध्ये भांडणे लावली. त्यांच्यात एकी होऊ दिली नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ असलेले आझमभाई पानसरे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासारखे मोहरे पक्षातून गळून पडले.”

“शहराचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याने स्थानिकांसाठी खड्डे खोदले आणि त्यातून स्वतःसाठी मोठा खड्डा तयार केला. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता गेली आणि या खड्ड्यातच मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न गाडले गेले. आता पिंपरी-चिंचवडमधील सत्ता हातातून जाताना या नेत्याला बघावे लागत आहे. या नेत्याचे सगळेच राजकीय गणित चुकल्यामुळे आता शहरात २४ तास मुक्काम ठोकून सुद्धा हाती काहीच लागणार नसल्यामुळे बारामतीचा रस्ता धरावा लागेल, अशी राजकीय परिस्थिती त्यांनीच निर्माण केली आहे. लोकशाहीच्या जोरावर मिळविलेली सत्ता हुकूमशाहीच्या बळावर घालवावी लागेल, अशी स्थिती आहे. या नेत्याने पक्ष कार्यकर्त्यांना गाडून त्यांच्या छातीवर गुंड, चोर, खुनी, मटके आणि दारूवाले गुन्हेगार पक्षात आणून बसविले. या सर्वांना स्वतःच्या भौतिक सुखासाठी आणि पैशाच्या हव्यासापायी मोठे केल्यामुळे पक्ष गाडला गेला आहे. पैशाच्या तराजूत निष्ठावान कार्यकर्ते कमी पडले आणि गद्दारांना ताकद दिली गेली. त्यामुळे पक्षात विश्वास आणि निष्ठा शून्य झाली आहे.”

“शरद पवार यांनी लोकशाहीच्या तत्त्वावर उभारलेला पक्ष स्वतःच्याच घरातल्या लोकांनी हुकूमशाहीने कमकुवत केली. हुकूमशाहीने वागणारे शरद पवार यांच्या म्हणण्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवितात, ही वस्तुस्थिती आहे. पक्षासाठी राबणाऱ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना सतत अपमानीत करणे, अर्वाच्च्य भाषेत बोलणे, पदे देताना ज्येष्ठत्व डावलणे, माझ्यापेक्षा अन्य कोणालाच काही अक्कल नसल्याचे समजणे यांमुळे आज पक्षातील निष्ठावान बाहेर पडले आहेत. महिलांनाही अपमानित करणे, अर्वाच्च्य बोलणे, शिव्या देणे, ज्या महिलांच्या मुलांचे विवाह झाले आहेत, अशांना व्यासपीठावर अगं तुगं बोलणे, महिलांचे चारित्र्य हनन करणे हे शरद पवार यांच्या साच्यात आणि धोरणात बसत नाही. परंतु, पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व हे सर्व लिलया करत आहेत.”

“शरद पवार यांनी आयुष्यभर झिजून जी संघटना मोठी केली. पण या नेत्याला पक्षसंघटना आयती मिळाली. त्यांना पवार साहेबांनी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी सोसलेल्या यातनांची किंमत नाही. पवार साहेबांनी निर्माण केलेली पक्षाची प्रतिमा या नेत्याने धुळीला मिळविली आहे. त्यामुळेच आज पक्षाच्या अधोगतीला सुरूवात झाली आहे. आता विकासाच्या मुद्द्यावर महापालिका निवडणूक लढविणाऱ्यांनी स्वतःचा किती विकास केला, हेही जनतेला सांगावे. शहराचा विकास झाला की नाही हे प्रत्येक कामाची मूळ किंमत आणि दिलेला खर्च यातील तफावत पाहून शहरातील जनता ठरविणार आहे. जनता सुज्ञ आहे, याचे भान या नेत्याने ठेवावे. या नेत्याच्या दलालांनी महापालिकेचा बाजार केला, हे लपून राहिलेले नाही. या सर्वांनी पक्ष संघटनेच्या नावावर स्वतःची साम्राज्ये उभी केली आहेत. या दलालांच्या कारवायांमुळेच राष्ट्रवादी पक्ष बदनाम झाला. विरोधकांच्या अरेला कारे ने उत्तर देण्याऐवजी “दादा, आतातरी तुमची दादागिरी थांबवा”, असे सांगण्याची वेळ आली आहे. आपल्या गोंडस बाळावर संस्कार केले नाहीत, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तेवर पाणी सोडावे लागेल. आज त्यांच्या आजूबाजूला बसणारे उद्या कुठे असतील, याचा विचार या नेत्याने करावा. तसेच पक्षाला एवढी मोठी गळती का लागली, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजकीय फ्लेक्स जमीनदोस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्याने जागोजागी उभारण्यात‌ आलेले राजकीय नेत्यांचे बॅनर, फ्लेक्स तसेच जाहिरातफलक काढून टाकण्यात आले. भाजपच्या निवडणूक कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टरही बुधवारी दुपारी काढण्यात आले. चारच दिवसांपूर्वी शहरातील चौकाचौकात उभारलेले राष्ट्रवादी काँग्रेसचेही फ्लेक्स काढून टाकण्यात आले आहेत.
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर फ्लेक्स, होर्डिंग काढून टाकण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. पक्षाने केलेल्या विकासकामांची माहिती, त्यावरील नावे, घोषणा, आमदार, खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या बसथांब्यांवरील नावे झाकण्यास सुरुवात झाली आहे. आचारसंहिता लागू होऊनही कडक अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला.
जंगली महाराज रोडवर असलेल्या भाजप कार्यालयाच्या बाहेर मोदी यांचे पोस्टरही आचारसंहितेच्या कारणामुळे बुधवारी काढण्यात आले. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेर परवानगी न घेता लावण्यात आलेले जाहिरात फलक तसेच होर्डिंग काढली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ज्या चौकातील होर्डिंग काढणे शक्य होणार नाहीत, असे जाहिरात फलक तात्पुरते झाकून ठेवण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत.

पंपांवरील फलक झाकणार
आचारसंहिता लागू झाल्याने सत्तारूढ पक्षांना कल्याणकारी योजना तसेच, सवलतींची घोषणा करणारे फलक लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारवर सरकारी खर्चाने जाहिराती देण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. जेथे महापा‌लिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे, तेथील पेट्रोलपंप तसेच अन्य ​सार्वज​निक ठिकाणी लावण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे फोटो असतील तर ते काढून टाकण्याचेही आदेश आहेत. मात्र, अनेक ठिकाणी कारवाई झाली नसल्याचे चित्र आहे. त्या विषयी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना विचारले असता, ‘पेट्रोलपंपावर पंतप्रधानांचे छायाचित्र वापरून करण्यात आलेल्या जाहिराती झाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान वाढण्यासाठी मतदार जागृतीवर भर

$
0
0

पुणे, पिंपरीच्या आयुक्तांकडून उपक्रमांचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दोन्हीही महापालिका आयुक्तांनी विविध उपक्रम हाती घेण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील अडीच हजार सोसायट्यांमधील मतदान वाढविण्यासाठी जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुण्यातील मतदारांची मतदान न करण्याची मानसिकता जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातील निरीक्षणांनुसार मतदारांमध्ये जागृती करण्यात येणार आहे.
दोन्ही महानगरपालिकांमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, पिंपरीचे पालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी गुरुवारी संवाद साधला. पुणे आणि मुंबई येथील मतदार नेमक्या कोणत्या कारणांस्तवर मतदानास इच्छुक नसतात या संदर्भात गोखले इन्स्टिट्यूटकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये मतदारांमधील उदासीनतेबाबत निरीक्षणे नोंदवण्यात आली. या निरीक्षणांच्याआधारे जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कुणाल कुमार यांनी दिली. बालेवाडी, एनआयबीएम, विमाननगर येथील मतदानाचे प्रमाण अतिशय कमी असून, शहराच्या मध्यवस्तीत मतदानाचे प्रमाण मोठे असल्याचे कुमार म्हणाले.
पिंपरी-चिंचवडमधील सांगवी, पिंपळे सौदागर, चिंचवडच्या काही भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ब्रँड अँबेसिडर करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने जागृती करण्यात येत आहे. कमी मतदान होत असलेल्या अडीच हजार सोसायट्या, तसेच वस्त्यांमध्ये विशेष मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे वाघमारे यांनी नमूद केले.

सभास्थळांची नावे लवकरच
महापालिका निवडणुकीदरम्यान सभा घेण्यासाठी स्थळांची नावे लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. निवडणूक यंत्रणेने राजकीय पक्षांना सभास्थळांची नावे सुचवावीत, अशी विनंती केली होती. या सभा स्थळांबाबत पोलिस, निवडणूक यंत्रणा एकत्रितरित्या चर्चा करून निर्णय घेतील आणि सभास्थळांची नावे काही दिवसांत जाहीर करू, असेही कुमार म्हणाले.

आठ गुन्ह्यांमध्ये शिक्षा
गेल्या महापालिका निवडणुकीत आचारसंहिता भंगाचे १८१ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील १२६ गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत, तर, आठ गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली. उर्वरित ४४ गुन्ह्यांतील संशयितांची निर्दोष मुक्तता झाली. त्यातील एक गुन्हा तपासावर प्रलंबित आहे, असे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले. निवडणूक निर्णय ​अधिकाऱ्यांच्या मदतीला पोलिस अधिकारी असेल, असेही त्यांनी नमूद केले.

‘ट्रू वोटर अॅप’

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये मतदारांची संख्या ११.९९ लाख आहे. त्यातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये सर्वाधिक मतदार, प्रभाग क्रमांक २५मध्ये सर्वांत कमी मतदार आहेत. निवडणूक आयोगाने मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार यांच्यासाठी True Voter App विकसित केले आहेत. या अॅपच्या मदतीने मतदारांना मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र तसेच उमेदवाराने शपथपत्राद्वारे भरलेली माहिती पाहता येईल. उमेदवारांना या अॅपच्या मदतीने आपला दैनंदिन खर्च सादर करता येणार आहे, असेही वाघमारे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीसाठीचे अर्ज भरण्यास पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. औंध क्षेत्रीय कार्यालयाला दोन प्रभाग जोडण्यात आले असून, उर्वरित तिन्ही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी तीन प्रभाग असणार आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम अत्यंत पारदर्शी पद्धतीने पार पडावा यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात २७ जानेवारीपासून होणार आहे. येत्या शनिवारी (२१ जानेवारीला) नागरिकांनी नोंदविलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी होऊन अंतिम मतदारयादी जाहीर होईल. मतदारयादीवर सुनावणी घेणे, अर्ज भरणे, अर्ज माघारी घेणे, उमेदवारांना चिन्हवाटप करणे, उमेदवारांची यादी तयार करून प्रसिद्धी करणे आदी कामांसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेने प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन अधिकारी, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकारणातील अधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी, उपविभागीय अधिकारी इत्यादींचा त्यात समावेश आहे.
प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून १४ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयानुसार ४१ प्रभागांची विभागणी करण्यात आली आहे. औंध क्षेत्रीय कार्यालयाला दोन प्रभाग जोडण्यात आले असून, उर्वरित सर्व क्षेत्रीय कार्यालयांना तीन प्रभाग जोडल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांचे उमेदवारांचे अर्ज भरणे, छाननी करणे, अर्ज स्वीकृती आदी कामे अधिकारी करणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता आणि हिशेब तपासणी कक्षप्रमुख म्हणून पा‌लिकेतील करसंकलन आणि करआकारणी विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांची‌ नेमणूक करण्यात आली आहे.

प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी
क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक अधिकाऱ्याचे नाव हुद्दा
औंध ८, ९ अशोक पाटील उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर
घोले रोड ७, १४, १६ विजया पांगारकर एसआरए, पुणे
कोथरूड १०, ११, १२ धनाजी पाटील उपजिल्हाधिकारी, सातारा
वारजे, कर्वेनगर १३, ३१, ३२ नंदिनी आवाडे भाडे नियंत्रण न्यायाधिकरण
येरवडा १, २, ६ अजित देशमुख एमआयडीसी
नगर रोड ३, ४, ५ प्रशांत पाटील पीसीएमसी विकास प्राधिकरण
भवानी पेठ १८, १९, २० संजय पाटील उपजिल्हाधिकारी, सातारा
कसबा विश्रामबागवाडा १५, १७, २९ आरती भोसले जिल्हा पुनर्वसन अधिकारी
टिळक रोड ३०, ३३, ३४ वर्षा लांडगे उपजिल्हाधिकारी
सहकारनगर २८, ३५, ३६ हर्षलता गेडाम विशेष भूसंपादन अधिकारी
बिबवेवाडी २७, ३७, ४१ राणी ताटे पीसीएमसी नवनगर प्राधिकरण
धनकवडी ३८, ३९, ४० मोनिका सिंह ठाकूर राखीव उपजिल्हाधिकारी
हडपसर २१, २२, २३ सुभाष बोरकर उपजिल्हाधिकारी, जमाबंदी
कोंढवा,वानवडी २४, २५, २६ ज्योती कदम लाटे उपविभागीय अधिकारी, हवेली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तटकरेंच्या मुखातून भाजप बोलत आहे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार काँग्रेस कार्यकर्ते, नेत्यांनी घेतला आहे. तटकरेंच्या मुखातून भाजप बोलत असल्याची टीका करून तटकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करू नये, असा पवित्रा प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी घेतला आहे.
काँग्रेस भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत तटकरेंचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. ‘तटकरे यांनी चव्हाण यांच्याविरुद्ध तर्कहीन आणि दिशाभूल करणारी विधाने केली आहेत. चव्हाण यांनी आपल्या तीन वर्षांच्या कालावधीत पारदर्शक, लोकाभिमुख कारभार केला. राज्य सहकारी बँकेपासून राज्याच्या आर्थिक हिताचे निर्णय निर्भिडपणे घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक मंडळीची अडचण झाली आहे,’ अशी टीका अखिल भारतीय काँग्रेसचे महासमिती सदस्य गोपाळ तिवारी यांनी केली.
बालगुडे यांनी चव्हाण यांच्या टीकेचा समाचार घेण्यासाठी शहराध्यक्ष रमेश बागवे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये तटकरे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत आघाडीची बोलणी करू नये, असे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला आलेले अपयश त्यांना झोंबत आहे. चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या भ्रष्ट फायलींवर सह्या केल्या नाहीत, त्याचा काढण्यात येत असल्याचेही बालगुडे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आमच्यापैकी कोणालाही मत द्या’

$
0
0

उमेदवारीपूर्वीच इच्छुक एकत्रित मतदारांच्या दारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

युती-आघाडीचा लांबलेला तिढा आणि उमेदवारीसाठी तीव्र रस्सीखेच यांमुळे उमेदवारी जाहीर होणे शेवटच्या क्षणापर्यंत लांबणार आहे. त्यानंतर थोडक्या वेळात मतदारांपर्यंत कसे पोहोचणार, या विवंचनेत असणाऱ्या इच्छुकांनी आता उमेदवारीची वाट न पाहता प्रचाराला सुरुवात केली आहे. ‘आमच्यापैकी कोणालाही मत द्या,’ असे आवाहन करीत सर्वांनीच गाठीभेटींना एकत्रित सुरुवात केली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत युती-आघाडी होणार की नाही, यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. सर्वच पक्षांच्या नेत्यांची याबाबत केवळ चर्चाच सुरू असल्याने निर्णयाची वाट न पाहता सर्वच पक्षांतील इच्छुकांनी आपापल्या प्रभागात प्रचाराला सुरुवात केली आहे. युती, आघाडीची चर्चा अंतिम होऊन त्यानंतर तिकिटाचा निर्णय झाल्यास प्रचाराला अत्यंत कमी दिवस मिळतील यासाठी अनेक इच्छुकांनी आतापासूनच तिकीट मिळेल या आशेवर प्रचाराची रणधुमाळी आखली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, भाजपच्या युतीची तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करायची की नाही याची चर्चा सुरू आहे. पालिका निवडणुकीत आघाडी किंवा युती झाल्यास कोणत्या पक्षाने किती जागा लढायच्या याबाबत एकमत होत नसल्याने निर्णय अद्याप प्रलंबित आहे. पालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभागपद्धतीने होणार असल्याने प्रभागाची हद्द वाढली आहे.

त्यामुळे कमी वेळेत प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचे आव्हान प्रत्येक पक्षातील उमेदवाराला पेलावे लागणार आहे. पालिका निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार असून, २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ‘अजून तिकीट निश्चित झालेले नाही, पण आमच्यापैकी कोणीही उमेदवार असू शकतो. त्यामुळे आम्ही एकत्रित प्रचार करीत आहोत. आमच्यापैकी कोणलाही मत द्या,’ असे भावनिक आवाहन मतदारांना केले जात आहे. पॅनल तयार करून सोसायट्या, झोपडपट्टी तसेच घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यास उमेदवारांनी सुरुवात केली आहे. पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे गळ्यात घालून हे उमेदवार आपला प्रचार करत असल्याचे चित्र विविध भागात पहायला मिळत आहे.

वैयक्तिक प्रचारांवरही भर
सर्व इच्छुक एकत्र फिरू लागले असले, तरी त्यांच्यातील लढाई मतदारांपासून लपून राहिलेली नाही. जाहीरपणे अनेक ठिकाणी सर्व इच्छुक एकत्र येत असले, तरी वैयक्तिकरित्याही स्वतंत्र परिचयपत्रके मतदारांच्या घरी पोहोचविण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images