Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांची उद्‍घाटने

$
0
0

खासदार आढळराव पाटीलांच्या हस्ते
विविध विकास कामांचे उद्‌घाटन
म. टा. प्रतिनिधी पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे रविवार (२५ डिसेंबर) खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे, संगीता पवार, नगरसेवक धनंजय आल्हाट, उद्यान अधीक्षक पी. एम. गायकवाड आदी उपस्थित होते.
यमुनानगर येथील पेव्हिंग ब्लॉक बसविणे, मीनाताई ठाकरे जलतरण तलावाजवळ लहान मुलांसाठी जलतरण तलावाचे उद्‌घाटन, छत्रपती संभाजीराजे क्रीडा संकुल येथे लॉन टेनिस कोर्ट व व्हॉलिबॉल मैदानाचे उद्‌घाटन, पिंपरीतील आंबेडकर चौकातील प्रवेशद्वार कमानीचे उद्‌घाटन, यमुनानगर येथील मुक्ताई उद्यान येथे ओपन जीमचे उद्‌घाटन करण्यात आले.
या वेळी बोलताना अढळराव पाटील म्हणाले, ‘नागरिक हा केंद्रबिंदू मानून विकासकामे झाली पाहिजेत. असे झाल्यास शहराचा खऱ्या अर्थाने विकास होईल. त्या शहरातील मैदाने, रस्ते, उद्याने ही सुनियोजित व शहराच्या सौंदर्यात भर पाडणारी असायला हवीत.’ या वेळी कार्यक्रमाचे प्रास्तावीक सुलभा उबाळे यांनी केले. आभार शिवाजी साळवे यांनी मानले.
..
अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन
शहरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी ४०० एकर जागेत १७२ उद्याने विकसित करण्यात आली आहेत. शहराचे हरित क्षेत्र ३० टक्के झाले आहे. यापुढेही आपले शहर हरित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्र. ४६ काळेवाडी, प्रभाग क्रमांक २२ चिंचवड गावठाण, प्रभाग क्र. २१ दळवीनगर, प्रभाग क्र. १६, आकुर्डी येथील प्रकल्पांचा समावेश आहे.
महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ४६ काळेवाडी येथे विकसित करण्यात आलेल्या ज्योतिबा उद्यान टप्पा क्र.२ चे उद्घाटन, प्रभाग क्रमांक २२, चिंचवड गावठाणमधील चापेकर चौक ते केशवनगर काळेवाडी काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन, प्रभाग क्र. २१ दळवीनगर मधील पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन व भाजी मंडई कामाचे भूमिपूजन, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १६, आकुर्डी येथील नवीन रुग्णालयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी माजी आमदार अण्णा बनसोडे, आझमभाई पानसरे, संजोग वाघेरे, योगेश बहल, शमीम पठाण, नगर सदस्य हनुमंत गावडे, स्थायी समिती सभापती हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी, मंगला कदम, आझमभाई पानसरे, संजोग वाघेरे, विमल काळे, सविता साळुंखे, सुजाता टेकवडे, नीता पाडाळे, नगरसदस्य विनोद नढे, आशा सूर्यवंशी, हनुमंत गावडे, ॲड. संदीप चिंचवडे, अश्विनी चिंचवडे आदी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण रुग्णालयात वर्षाला पाच लाख रुग्ण बाह्यरुग्ण विभागातून उपचार घेतात. त्या रुग्णालयावर असलेला ताण लक्षात घेता रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्यासाठी आकुर्डी येथील शंभर खाटांचे रुग्णालय महत्त्वाची कामगिरी करेल, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
आपण कितीही सावधगिरी बाळगली, तरी आयुष्यात प्रत्येकाला कधी तरी हॉस्पिटलची पायरी चढावी लागते. पिंपरी-चिंचवड शहराची वैद्यकीय गरज लक्षात घेऊन आकुर्डी येथे २४ तास सेवा देणारी अतिदक्षता विभागासह १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारून येथील नागरिकांना सर्वप्रकारच्या वैद्यकीय सेवा पुरविल्या जातील. या रुग्णालयामुळे यशवंतराव चव्हाण रुग्णालयास होणारा वाढता ताण कमी होण्यास मदत होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदाधिकाऱ्यांची हद्दपारी

$
0
0

निवडणूक काळात राजकीय गुंडगिरी मोडण्यासाठी पोलिसांची रणनीती

Rohit.Athavale

@timesgroup.com

Tweet - @AthavaleRohitMT

पिंपरी : निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर गलिच्छ शब्दात कंबरेखालचे आरोप भाजप-राष्ट्रवादीचे पदाधिकारी करू लागले आहेत. या कालावधीत शांतता कायम राहण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. परंतु, आता पदाधिकारीच हाणामाऱ्या करू लागल्याने या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून, या लोकांना निवडणूकीच्या काळात शहरापासून दूर कसे ठेवता येईल याची रणनीती पोलिस आखू लागले आहेत. वेळप्रसंगी गुन्हेगारांवर होणारी हद्दपारीची कारवाई राजकीय पदाधिकाऱ्यांवर देखील करण्यात येणार आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत एका भागात हाणामारी अथवा गंभीर घटना घडू शकते, अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यातून मग एखादा प्रभाग संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून शहरातील विविध भागात घडणाऱ्या हाणामारीच्या घटना पाहता पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

शहरात निवडणुकीच्या काळात शांतता कायम राहण्यासाठी सराईत गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. त्याच पद्धतीची कारवाई गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई पदाधिकाऱ्यांवर करण्यात येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर आजी-माजी नगरसेवक, महापालिकेतील पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय, कार्यकर्ते हाणामारी करू लागले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी अशांसाठी वेगळीच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

सत्ता काबीज करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यासाठी प्रत्येकजण दुसऱ्याला कमीपणा दाखविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातूनच अत्यंत गलिच्छ आरोप करण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली आहे. त्यातून हाणामारीचे प्रकार होत आहेत. गेल्या तीन दिवसात बालाजीनगर झोपडपट्टी, निगडी ओटास्कीम आणि पिंपरीगावात असे प्रकार समोर आले आहेत. यातील पिंपरी गावातील प्रकरण आपसात मिटवून घेतल्याचे सांगून पोलिसांकडे फिर्याद देण्यात आलेली नाही. परंतु हा वाद शमलेला नसून, त्याचा कधीही भडका उडू शकतो यात शंका नाही.

दुसरीकडे भाजप आपल्या संघ विचारसरणी आणि कार्यपद्धतीच्या अगदी उलट दिशेने वाटचाल करीत आहे. भाजपने देशासह राज्यातील कथित अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण उघड केली. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी कशाकशा प्रकारे सामान्यांची लूट केल्याचे सांगून काहूर उठवले. परंतु त्यांनी पातळी सोडली नव्हती. पिंपरीत मात्र, शहर भाजप वेगळ्याच पद्धतीने आरोप-प्रत्यारोपात मग्न आहे. या आरोपांमुळे घायाळ झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची उत्तर देताना दमछाक होत आहे. या सर्व प्रकाराचा पुढचा अध्याय म्हणून ‘फ्री स्टाइल’ हाणामारीच्या घटना सुरू झाल्या आहेत.
फटाक्यांवरून वाद
शहरातील चोऱ्यामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांचे तपास अर्धवट असतानाच आता राजकीय गुंडगिरीने तोंड वर काढले आहे. अगदी शाळकरी मुलांच्या भांडणाला देखील राजकीय झालर चढवून परस्परांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जातो आहे. रात्री बारा वाजले की इच्छुक उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते फटाके फोडून वाढदिवस साजरा करण्याचा फंडा वापरत असताना यावरून देखील वादाचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी अधिक सतर्क होण्याची आवश्यकता देखील व्यक्त होत आहे.
...
‘त्यांना हद्दपार करू’
‘निवडणुकीच्या काळात शहरात कायदा-सुव्यवस्था कायम राहण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक यांच्या बैठका घेऊन त्यांना योग्यत्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. या सगळ्याचा एक भाग म्हणून रेकॉर्डवरील आणि सराईत गुन्हेगारांच्या धरपकड करण्यात आली आहे. अनेकांना हद्दपार करण्यात आले असून, तसे प्रस्ताव देखील तयार आहेत. गेल्या काही घटना पाहता पदाधिकाऱ्यांचा गुन्ह्यात समावेश झाल्यावर त्यांना देखील निवडणुकीच्या काळात शहरापासून दूर ठेवण्यात येईल. पक्ष अथवा पद याचे पोलिसांना काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे अशा घटनांपासून पदाधिकाऱ्यांनी दूर राहून कार्यकर्त्यांना देखील यापासून परावृत्त करावे,’ असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा रास्ता रोको

$
0
0

पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध
म. टा. वृत्तसेवा, सासवड
‘पुरंदरसारख्या दुष्काळी तालुक्याला अगोदर गुंजवणी, पुरंदर उपसा सिंचन योजनांचे पाणी द्या, आमच्या हक्काच्या शेतजमिनी आधी पिकू द्या, मग विमानतळाच्या गोष्टी करा,’ या मागण्यांसाठी हजारो शेतकरी आणि परिसरातील नागरिकांना रास्ता रोको केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह मनसेने यात उडी घेतल्याने या आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या ‘पुरंदरेश्वरा’ या निवासस्थानी शेवटी मोर्चा नेण्यात आला.

अनेक वर्षे दुष्काळात खिचपत पडलेल्या या तालुक्यास पुरंदर उपसा-जानाई तर गुंजवणीचे पाणी देणे अपेक्षित असताना हा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा घाट घालून गोरगरीब शेतकरी कुटुंबीयांना रस्त्यावर आणण्याचा हा सरकारचा व लोकप्रतिनिधी यांचा कुटील डाव आहे. तो आम्ही हाणून पडू. वेळप्रसंगी सरकारशी दोन हात करून लढा देऊ असे विमानतळ विरोधकांनी ठणकावून सांगितले आणि निषेधाच्या घोषणा दिल्या. संभाजी ब्रिगेड, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेघा पाटकर, स्थानिक काँग्रेस आणि मनसेच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला. यापूर्वी अनेकवेळेस लेखी निवेदने, मोर्चा, उपोषण, रास्ता रोको करून शासनाकडे विरोध दर्शवून सुद्धा सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. विमान- प्राधिकरण शेतकऱ्यांच्या पॅकेजच्या गप्पा मारत आहे ही जुलूमशाही खपवून घेणार नाही असेही या वेळी सांगण्यात आले.
पुरंदर पंचायत समिती सदस्य दत्ता झुरंगे, कुंभारवळणचे सरपंच अमोल कामठे, उपसभापती देविदास कामथे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष संजय जगताप, महादेव टिळेकर, गणेश मेमाणे यांच्यासह अनेक नागरिक रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. रास्ता रोकोमुळे परिसरात सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ‘पुरंदर तालुक्यातील नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत काँग्रेस पक्षाकडून राजकारण करण्यात येत आहे.’ असा आरोप राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे.
ते म्हणाले, ‘या विमानतळाला काँग्रेसकडून विरोध केला जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवण्यात येत आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून राजकारण करण्यात येत आहे, तर राष्ट्रवादीचा विमानतळाला पाठिंबा आहे. विमानतळाला विरोध करणारे हे शेतकरी नसून ते जमिनींचे दलाल आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ई-बस्ता’वर अधिक पुस्तके

$
0
0

नववी ते बारावीची पाठ्यपुस्तके उपलब्ध
Harsh.Dudhe@timesgroup.com
...........
@HarshDudheMT
पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी व्हावे आणि विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके ई-बुकच्या माध्यमातून मोबाइल, टॅबलेट आणि लॅपटॉपमध्ये अभ्यास करता यावे यासाठीचे ‘ई-बस्ता’ वेब पोर्टल आणि अॅप अधिक माहितीपूर्ण होणार आहे. येत्या काही दिवसात ‘ई-बस्ता’वर इयत्ता नववी ते बारावीची पाठ्यपुस्तके ई-बुकच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना मोबाईल, टॅबलेट आणि लॅपटॉपवर एका क्लिकवर हव्या त्या विषयाचा आणि धड्याचा अभ्यास करता येणार आहे.
केंद्र सरकारने डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत ई-बस्ता या प्रकल्पाचा शुभारंभ केला. या प्रकल्पात पाठ्यपुस्तके ई-बुकच्या माध्यमातून मोबाइल, टॅबलेट आणि लॅपटॉपमध्ये विनामूल्य उपलब्ध करुन दिली जात आहे. प्रगत संगणन विकास केंद्राच्या (सी-डॅक) मुंबई केंद्राने वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप तयार केले आहे. यात ‘बालभारती’ची इयत्ता पहिली ते आठवीची सर्व विषयांची पुस्तके आठ माध्यमांतून सध्या उपलब्ध आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांना ती एका क्लिकवर पाहता येतात आणि आवश्यक त्या पानावर जाऊन त्याचा अभ्यास करता येतो. मात्र, आता पुस्तकांमध्ये भर पडणार आहे.
या श्रृंखलेत ‘ई-बस्ता’वर आता महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे तयार केली जाणारी इयत्ता नववी ते बारावीपर्यतची सर्व पुस्तके विविध भाषेत उपलब्ध होणार आहे. याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या काही दिवसात ही पुस्तकेते ई-बुकच्या माध्यमातून डिजीटल स्वरूपात ‘ई-बस्ता’च्या वेब पोर्टल आणि अॅपवर झळकणार आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्याहून अभ्यास करता येणार आहे.
‘नववी ते बारावी पर्यतची पुस्तके ‘ई-बस्ता’वर पुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासोबतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ई-बुकच्या स्वरुपात लवकरच ते उपलब्ध करुन देण्यात येतील,’ असे सी-डॅक मुंबईचे सहायक संचालक डॉ. एम. शशीकुमार यांनी ‘मटा’ला सांगितले.केंद्र सरकारच्या ‘ई-बस्ता’वर पुस्तके उपलब्ध होण्याबाबत ‘सी-डॅक’सोबत पत्रव्यवहार झाला आहे. त्यामुळे मंडळाकडून ती लवकर उपलब्ध होण्याबाबत आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.
.....
येत्या काळात अधिक पुस्तके उपलब्ध
ई-बस्ता (www.ebsta.in) या वेब पोर्टलवर ‘सीबीएससी’ सोबतच देशातील विविध राज्यातील मंडळांची शालेय पाठ्यपुस्तके ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. काही खासगी प्रकाशकांची पुस्तके विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. विज्ञान, वाणिज्य, कृषी, गणित, रसायनशास्त्र, व्यावसायिक प्रशिक्षण, राज्यशास्त्र आदी विषयांवर देखील पुस्तके उपलब्ध आहेत. याबरोबरच शिक्षण क्षेत्रातील नामवंत लेखकांची विविध विषयांवर लिहिलेली पुस्तके विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी आहेत. येत्या काळात यात अधिक भर पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरभास्कर महोत्सवाची पुणेकरांवर मोहिनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गायनासह बासरी, व्हायोलिन, सतार, सरोद व तालवाद्यांची जुगलबंदी स्वरभास्कर संगीत महोत्सवातून रसिकांना अनुभवता आली. महोत्सवातील स्वरांचा नजराणा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. कलाकारांचा स्वरमयी आविष्कार रसिकांनी कानात साठवून घेतला.

सूरश्री फाउंडेशनतर्फे भारतीय रागसंगीतातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला स्वरभास्कर संगीत महोत्सव नुकताच कोथरूड येथील आयडियल कॉलनीच्या मैदानावर रंगला. या महोत्सवात तरुण कलाकारांसह काही प्रसिद्ध गायक-वादकांची कला अनुभवण्याची पर्वणी कोथरूडकरांना साधता आली.

महोत्सवाचे उद्घाटन खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचा वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम या वेळी झाला. गायिका रेवा नातू यांना या वेळी ‘स्वरभास्कर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘सिम्बायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शशिकांत सुतार, तेंडुलकर यांच्या पत्नी स्नेहलता तेंडुलकर, उद्योजक प्रतापराव पवार व आयोजक श्याम देशपांडे या वेळी उपस्थित होते.

महोत्सवाची सुरुवात पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाने झाली. त्यानंतर बासरीवादक पं. रोणू मुजुमदार आणि व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांची जुगलबंदी रसिकांनी अनुभवली. दुसऱ्या दिवशी स्वीकार कट्टी आणि अभिषेक बोरकर यांच्या सतार आणि सरोदवादनाच्या जुगलबंदीचा आविष्कार रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. त्यानंतर रेवा नातू यांचे गायन रंगले. या दिवसाचा समारोप पं. रामदास पळसुले आणि पं. श्रीधर पार्थसारथी यांच्या तबला आणि मृदंगमच्या जुगलबंदीने झाला. या जुगलबंदीने रसिकांना ठेका धरायला लावला. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अपर्णा केळकर (गायन), उस्ताद शाहीद परवेझ (सतार) यांचे सादरीकरण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायोगॅस प्रकल्पांतून तुटपुंजी वीजनिर्मिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील ओल्या कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेने गेल्या काही वर्षांत बायोगॅस प्रकल्पांद्वारे वीजनिर्मिती करणारे प्रकल्प उभारले असले, तरी या सर्व प्रकल्पातून जेमतेम ८ टक्केच विजेची निर्मिती होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या २५ प्रकल्पातून एका महिन्यात निर्माण होऊ शकणाऱ्या युनिट्सची निर्मिती करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला आहे.
शहरातील अनेक बायोगॅस प्रकल्प पूर्णतः बंद अवस्थेत असल्याने या ठिकाणी गॅस आणि वीज निर्मिती होत नाही, असा आरोप सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आणि नागरिक चेतना मंचाच्या मेजर जनरल (निवृत्त) सुधीर जठार यांनी सोमवारी केला. एक ऑक्टोबर २०१५ ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीतील बायोगॅस प्रकल्पांच्या महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरूनच या प्रकल्पांतील अनेक त्रुटी आणि कमतरता समोर येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. एक घनमीटर गॅसपासून १.२ युनिट्स वीज निर्माण होते. म्हणजेच, पालिकेच्या कचरा प्रकल्पांतून दरमहा साडेचारलाख युनिट्स निर्माण होण्याची गरज आहे; पण या वर्षभरात पालिकेने चार लाख ४८ हजार युनिट्सची निर्मिती केली आहे. हे प्रमाण जेमतेच आठ टक्के असल्याने पुणेकरांच्या करातून उभारलेले या प्रकल्पांवर केलेल्या खर्चाचा अपव्यय होत असल्याचे सिद्ध होत आहे.
या सर्व प्रकल्पांतून १२५ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणे अपेक्षित असताना, कात्रजचे दोन, वानवडी, पेशवे पार्क आणि हडपसर हे पाच प्रकल्प बंदच आहेत. त्यामुळे, या ठिकाणी एक टनही कचरा पाठविण्यात आलेला नाही, अशी टीका त्यांनी केली. औंध, येरवडा आणि वडगावमधील दोन प्रकल्पांमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्माण केला जात असला, तरी या वर्षभराच्या कालावधीत एक युनिटचीही वीज निर्मिती झालेली नाही. तसेच, हडपसर, औंध या ठिकाणच्या प्रकल्पांमध्येही पूर्ण क्षमतेने कचरा पाठवला जात नाही. १२५ टनांची क्षमता असताना, हे सर्व प्रकल्प सरासरी ६० टक्के कचऱ्यावरच प्रक्रिया करू शकतात, हे महापालिकेनेच मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, महापालिकेच्या घनकचरा विभागाने या सर्व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा अहवाल दर आठवड्याला महापालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावा, अशी मागणी वेलणकर व जठार यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईशान्य भारतात‘लेक वाचवा’

$
0
0

फर्ग्युसन कॉलेजधील चार विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने आपण समाजासाठी काही तरी केले पाहिजे, या उद्देशाने फर्ग्युसन कॉलेजमधील चार विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला. पालकांकडून मिळणाऱ्या पॉकेटमनीतील पैसे वाचवून त्यांनी महिनाभर ईशान्य भारत फिरून ‘लेक वाचवा’ ही मोहीम राबविली. एवढेच नव्हे तर प्रयोगशाळा नसलेल्या खेड्यातील शाळांमध्ये मुलांना विज्ञान खेळांचे धडे दिले.
फर्ग्युसन कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विशाल सवाई, खंडे डोके, योगेश थोरात आणि विकास जाधव या चौघांनी कॉलेजच्या परीक्षा संपल्यावर तातडीने ईशान्य भारताच्या दिशेने प्रवास सुरू केला. राष्ट्रीय सेवा योजनेत काम करत असताना त्यांना ही कल्पना सुचली होती. ज्ञानप्रबोधिनी, रोइंगचे विजय स्वामी आणि जयंत यांनी त्यांना मार्गदर्शन केले. कधी खासगी वाहनांनी तर, कधी सार्वजनिक वाहनाने प्रवास करून त्यांनी वीस दिवसांत पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचलप्रदेश आणि सिक्किम या चार राज्यातील शहर आणि दुर्गम भागातील गावांमध्ये प्रवास केला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल लोवर दिबांग घाटीचे आयुक्त दीपक शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सामाजिक उद्देश घेऊन आलेल्या या विद्यार्थ्यांचे सर्व शाळा आणि कॉलेजमध्ये उत्साहात स्वागत झाले.
‘समाजातील मुलींचे स्थान, विविध क्षेत्रात महिलांनी केलेले उल्लेखनीय कार्य, कुटुंबातील त्यांचे योगदान असे दाखले देत आम्ही मुलींना वाचविण्याचे आवाहन केले. मोहिमेची सुरुवात कोलकाता रेल्वे स्टेशनवरून तर, शेवट भारत-चीनची सीमा असलेल्या बुम्ला पास येथे झाला. आसाममधील तिनसुकिया, तेजपूर, अरुणाचल प्रदेशातील लोवर दिबांग घाटी, बॉम्बडीला, तवांग आणि सिक्किममधील गेझिंग, नामची या भागात आम्ही जनजागृती केली. ठिकठिकाणी पथनाट्येही सादर करण्यात आली. तसेच, २५ शाळांना भेट देऊन विज्ञानाचे प्रयोग करून दाखवले. पूर्व पश्चिम आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये सांस्कृतिक पूल निर्माण हा आमचा उद्देश होता,’ असे विशालने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रिगेड कार्यकर्ते ‘शेकाप’त जाणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संभाजी ब्रिगेड संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, मराठा सेवा संघाचे समन्वयक शांताराम कुंजीर, श्रीमंत कोकाटे यांच्यासह ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करणार आहेत. बारा जानेवारीला पुण्यात शनिवारवाड्याच्या प्रांगणात हा सोहळा होणार आहे.
सुमारे वीस वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेडची स्थापना झाली. काही आठवड्यांपूर्वीच संघटनेने मुंबईत पक्षाची स्थापना केली. संघटनेच्या स्थापनेपासून कार्यात मोठा वाटा असलेले माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडत आहेत. गायकवाड यांनी आठ वर्षे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. संघटनेची विचारधारा पोहोचविण्याचे, बांधणीचे काम त्यांनी केले. तीन ते चार वर्षांपूर्वी त्यांनी संघटनेचा राजीनामा दिला होता.
शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत, सामान्यांपासून ते आरक्षणापर्यंतच्या विविध प्रश्नांसंदर्भात राज्यभर मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. त्यात गायकवाड आघाडीवर होते. पण, पुढेच काही झाले नाही. त्यामुळे संघटनेतून बाहेर पडलेल्या गायकवाड यांच्यासह त्यांचा मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. संभाजी ब्रिगेड आणि शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा आणि उद्दिष्ट एकच आहे. त्यामुळे शेकापमध्ये प्रवेश करण्यात येत आहे, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पुण्यात शनिवारवाड्याच्या प्रांगणात १२ जानेवारीला हा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यावेळी शेकापचे जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. गायकवाड यांच्यासह श्रीमंत कोकाटे, मराठा सेवा संघाचे समन्वयक शांताराम कुंजीर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अजय भोसले, सारिका भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुभाष जगतापांची बागुलांवर टीका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार झालेल्या नव्या प्रभागात आतापासूनच विकास करण्याचा माजी उपमहापौरांनी केलेला संकल्प त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. तळजाई येथे जैवविविधता उद्यान साकारण्यापूर्वी आबा बागूल यांनी यापूर्वी सहकारनगर भागात महापालिकेमार्फत उभारलेले प्रकल्प आधी सुरू करण्याची तसदी घ्यावी, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांनी त्यांना फटकारले आहे. तळजाई टेकडीवर यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड सुरू असून, बागूल यांनी केवळ निवडणुकांसाठी स्टंटबाजी सुरू केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
सध्याच्या रचनेनुसार तळजाई टेकडीचा परिसर जगताप यांच्या प्रभागात आहे; पण नव्या रचनेत बागूल आणि जगताप यांचा प्रभाग एक झाला आहे. त्यामुळे, गेल्या आठवड्यात बागूल यांनी तळजाई टेकडीच्या १०८ एकर परिसरात वसुंधरा जैवविविधता उद्यान साकारण्याची संकल्पना मांडली होती. तळजाईवरील विकासाच्या गप्पा मारण्याऐवजी बागूल यांनी त्यांच्या परिसरात पुणेकरांच्या करातून उभारलेले प्रकल्प आधी सुरू करावेत, असे आव्हान जगताप यांनी दिले आहे.
सहकारनगरमधील ओढ्यानजीकचे क्रीडासंकुल गेल्या १४ वर्षांपासून बंद आहे, मोठा गाजावाजा करून उभारलेले फुलपाखरू उद्यानही बंद आहे. फोर-डी सभागृह, डॉ. आंबेडकर क्रीडासंकुल, स्केटिंग ग्राउंड अशा विविध प्रकल्पांकडे लक्ष देण्यास बागूल यांनी अधिक वेळ द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, तळजाई टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जात असून, केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचे काम बागूल करत असल्याचे टीकास्त्र जगताप यांनी सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारीचे अर्ज ऑनलाइन

$
0
0

उमेदवारांच्या शक्तिप्रदर्शनावर येणार अंकुश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नगरपालिकांच्या निवडणुकांप्रमाणे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. ऑनलाइन भरलेले अर्ज सक्षम अधिकाऱ्यांकडे स्वीकारले जाणार असल्याने आता उमेदवारांकडून होणाऱ्या शक्तिप्रदर्शनावर अंकुश येणार आहे.
​जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका; तसेच पुणे ​जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी आणि गाजावाजा कमी करण्यासाठी राज्य ​निवडणूक आयोगाने ग्रामपंचायती आणि नगरपालिका निवडणुकांपासून ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्याप्रमाणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करावे लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
उमेदवारांकडून अर्ज भरताना गाजावाजा करण्यात येतो. बहुतांश उमेदवार वाजतगाजत मिरवणुका काढत असल्याने वाहतुकीची कोंडी होते; तसेच पैशांचा अपव्यय होतो. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने यावर कायमची बंधने घालण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचा पर्याय निवडला आहे. त्यानुसार उमेदवारांना घरबसल्या उमेदवारी अर्ज भरावा लागणार आहे. त्यानंतर त्याची प्रत काढून त्यासोबत कागदपत्रे जोडून ती सक्षम अधिकाऱ्यांकडे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे उमेदवारांकडून होणाऱ्या शक्तिप्रदर्शनावर अंकुश राहणार आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धत रद्द करून ऑनलाइनचा मार्ग अवलंबण्यात आला. त्यास सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काही ठिकाणी अर्ज भरताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, त्यासाठी मार्गदर्शक केंद्रे उघडण्यात आली होती. त्यामुळे ही प्रक्रिया सुरळीत झाली. त्याप्रमाणे महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्येही या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

नोंदणी क्रमांक मिळणार
उमेदवारांना अर्ज भरताना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागणार आहे. त्यामध्ये वैयक्तिक माहिती आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवाराला नोंदणी क्रमांक मिळणार आहे. संबंधित नोंदणी क्रमांक उमेदवारांना लक्षात ठेवावा लागणार असल्याचे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्न मोडल्याने तरुणीची बदनामी

$
0
0

फेसबुकवर अश्लील फोटो टाकणारा अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जमलेले लग्न मोडल्यामुळे तरुणी आणि तिच्या भावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्यावर अश्लील फोटो टाकून बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बदनामी करणाऱ्या तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
गौतम अशोक चिटपेल्ली (वय २८, रा. मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तरुणीने येरवडा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. २४ डिसेंबर २०१२ ते ६ मे २०१४ या कालावधीत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमचे तक्रारदार तरुणीशी लग्न जमले होते. त्यानंतर दोघांचा साखरपुडा झाला होता. साखरपुडा झाल्यानंतर आरोपीने तरुणीशी लग्नाअगोदर लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यात वादावादी होऊन लग्न मोडले. त्यामुळे चिडलेल्या गौतमने तरुणी आणि तिच्या भावाच्या नावाचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. त्याच्यावर तिचे अश्लील फोटो अपलोड केले. ते फोटो तरुणीच्या नातेवाइकांना आणि मित्रांना पाठवून बदनामी केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणीने येरवडा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार तपास करून आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी गौतमला कोर्टात हजर करण्यात आले. तपासासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील डी.एल. मोरे यांनी केली. कोर्टाने त्याला २७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

महिलेचा विनयभंग
पतीच्या फेसबुकवर फोटो पाठवल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला आरोपीच्या नातेवाइकांनी मारहाण करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार चंदननगर परिसरात घडला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. पीडित महिलेने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. चंद्रकांत विठ्ठलराव हरेलकर (वय ४५, रा. वडगांव शेरी), त्याचा भाचा स्वप्नील दिलीप घोलप (२५) आणि दोन नातेवाइक महिलांना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुम्हीही उचला खारीचा वाटा

$
0
0

अग्निशमन दलाच्या कामात सामान्यांना सहभागाची संधी

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
@KuldeepjadhavMT

पुणे : शहराच्या कोणत्याही भागात आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी सामान्य नागरिकही अधिकृतपणे सहभागी होऊ शकणार आहेत. महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसने राज्यासाठी उपक्रम जाहीर केला असून, पुण्यात त्याचा श्रीगणेशा होणार आहे. शहर फायरब्रिगेडकडून या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून, ओळखपत्र देऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी करून घेतले जाणार आहे.
शहराच्या एखाद्या भागात आगीची घटना घडल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत बहुतांश ठिकाणी स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असतात. मात्र, जवान दाखल झाल्यानंतर तेथून सामान्य नागरिकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव हटविले जाते. त्यांना कोणत्याच प्रकारचा हस्तक्षेप करू दिला जात नाही. त्यामुळे मदतीची इच्छा असणाऱ्यांचा हिरमोड होतो. कधी-कधी नागरिक आणि दलाच्या जवानांमध्ये वादही होतात. या प्रकारामुळे खरोखरीच फायरब्रिगेड दलाला होऊ शकणारी मदत मिळत नाही. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना प्रशिक्षित करून आपतकाली परिस्थितीत त्यांचा उपयोग करून घेण्यासाठी, तसेच गोल्डन अवर्समध्ये मदत मिळविण्यासाठी त्यांचा उपयोग करणे शक्य आहे.
पूर येणे, इमारत कोसळणे, आगीच्या घटना आदी शहरात उदभवणाऱ्या विविध आपत्तींमध्ये मदतकार्य करताना काय करावे, याचे प्रशिक्षण स्वयंसेवकांना दिले जाणार आहे. तसेच, फायरब्रिगेडच्या साधनांची माहिती आणि त्याचा वापर कसा करावा याबाबतची मा​हिती प्रात्यक्षिकांसह देण्यात येणार आहे. फायरब्रिगेडकडून जानेवारी महिन्यात इच्छुकांची नोंदणी करून प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. तसेच, दलाकडून शहराच्या विविध भागांनुसार या स्वयंसेवकांचा डेटा संग्रहित करून ठेवला जाणार आहे. एखाद्या भागात आपत्तीजनक परिस्थिती उदभवल्यास फायरब्रिगेडची टीम रवाना होत असतानाच, त्या स्वयंसेवकांनाही संबंधित घटनेची माहिती दिली जाईल, अशी माहिती फायरब्रिगेडचे मुख्याधिकारी प्रशांत रणपिसे यांनी ‘मटा’ला दिली.

ताण हलका करण्याचे प्रयत्न
दरम्यान, वाढत्या नागरिकरणाबरोबरच शहरातील आगींच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्या तुलनेत फायरब्रिगेडकडे जवानांची संख्या अपुरी आहे. शहराच्या लोकसंख्येचा विचार करता जवानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांच्या माध्यमातून फायरब्रिगेडवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे.

मार्च महिन्यापर्यंत या स्वयंसेवकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे ध्येय आहे. त्यानंतर फायरब्रिगेडच्या जाहीर कार्यक्रमात त्यांना सर्वांसमोर आणले जाईल. तसेच, या स्वयंसेवकांची विभागनिहाय माहिती संबंधित फायरब्रिगेड केंद्रांना सोपविली जाणार आहे.
प्रशांत रणपिसे, मुख्याधिकारी, फायरब्रिगेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

$
0
0

पश्चिम महाराष्ट्रात ३२.८४ कोटी रुपये थकित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

थकित वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे ७५ हजार १०९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे सुमारे ३२ कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी आहे.
वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यास महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरमहा वीजबिलांसह वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी मोहीम राबविण्याचे आदेश प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. त्यानुसार पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा या पाचही जिल्ह्यांत थकित वीजबिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वारंवार आवाहन करूनही थकित वीजबिल न भरणाऱ्या ७५ हजार १०९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या २३ दिवसांत खंडित करण्यात आला आहे.
वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी थकित देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. वीजबिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. थकित वीजबिले भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्रांसह www.mahadiscom.in ही वेबसाइट; तसेच Mahavitaran App या मोबाइल अॅपचा पर्याय उपलब्ध आहे.
वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेत २३ डिसेंबर रोजी सहा हजार ४३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यांच्याकडे सुमारे ८६ लाख ७१ हजार रुपयांची थकबाकी आहे. शून्य थकबाकीच्या संकल्पनेनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. खंडित करण्यात आलेल्या वीजजोडणीतून थकीत वीजबिलाचा भरणा न करता वीजवापर होत असल्यास संबंधित ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा थकबाकी दार थकबाकी
पुणे ३६१०५ २३ कोटी ३४ लाख
कोल्हापूर ९७९४ २ कोटी ५७ लाख
सांगली ५१८७ ९४ लाख ८८ हजार
सोलापूर १९१२४ ४ कोटी ५४ लाख
सातारा ४८९९ १ कोटी ३५ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातिव्यवस्था हाणून पाडणारे लेखन हवे

$
0
0

डॉ. मनोहर जाधव यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘लेखकाने समाजातील दांभिकतेवर प्रहार करून ठोस भूमिका मांडणे अपेक्षित आहे. देशीवादाची भूमिका बळावत असताना समाजाला दिशा देण्यासाठी अंतर्मुख, अस्वस्थ करणाऱ्या साहित्याची निर्मिती होण्याची गरज आहे. एकविसाव्या शतकातही होत असलेल्या जातिव्यवस्थेच्या समर्थनाची भूमिका हाणून पाडणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे,’ असे आग्रही मत प्रसिद्ध लेखक डॉ. मनोहर जाधव यांनी सोमवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान यांच्यातर्फे एस. एम. जोशी सभागृहात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष प्रकाश रोकडे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना ’प्रा. रा. ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार’, तर खडकी शिक्षण संस्थेला ’मूल्यसाधना पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. माजी अध्यक्ष डॉ. अश्विनी धोंगडे, स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, डॉ. विकास आबनावे, प्रकाश जवळकर, मंदाकिनी रोकडे, डॉ. भालचंद भागवत, शंकर आथरे, महेंद्र भारती, शिवाजी शिर्के, उद्धव कानडे उपस्थित होते. यावेळी ‘प्रकाशपर्व’ आणि ‘बौद्ध संस्कार विधी’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
‘समाजातील जातिआधा​रित, धर्माधारित, आर्थिक स्तरावरील भेदाभेद पाहून मन उद्विग्न होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता समाजामध्ये रुजत नाही, जातीअंत होत नाही, तोवर भारत पूर्णतः विकास साधू शकणार नाही. गतकाळाविषयी चर्वितचर्वण करण्यापेक्षा बदलत्या काळाचा स्वीकार करीत, त्याला अनुसरून सामाजिक भान ठेवत लेखकांनी आपल्या भूमिका ठामपणे मांडायला हवी,’ यावर डॉ. जाधव यांनी बोट ठेवले.
रोकडे म्हणाले, ‘आज विशिष्ट धर्माच्या आधारावर राष्ट्राची संकल्पना मांडली जात असून, देशात पुरोगामी विचारांच्या लोकांची हत्या होत आहे, ही गंभीर बाब आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय दहशतवादामुळे सामान्य माणूस भयभीत झाला आहे. या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल, तर साहित्यिक, विचारवंतांनी निर्भयपणे पुढाकार घेतला पाहिजे.’
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘विचाराच्या आधारे आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. सामान्यतः आपण परिवर्तनवादी असतो. मात्र, आपल्या जातीत किंवा धर्मात बंदिस्त राहतो. त्यामुळे आपल्या समतेच्या कक्षा रुंदावत ठेवल्या पाहिजेत.’

आपल्या हक्कांसाठी स्त्रिया पुढे येताहेत, आंदोलने करताहेत ही आनंदाची बाब आहे. परंतु, केवळ मंदिर, दर्ग्यात प्रवेश मिळवणे म्हणजे स्त्री-पुरुष समानता साधली असे नव्हे. महिलांनी आपल्यातील श्रेष्ठ-कनिष्ठ भेद बाजूला सारून परस्पर सामाजिक सुसंवाद वाढविला पाहिजे.
- डॉ. अश्विनी धोंगडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या यकृताने पुणेकराला जीवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नाशिकच्या एकोणीस वर्षीय ब्रेनडेड युवकाचे यकृत रुबी हॉस्पिटलमधील अडतीस वर्षीय व्यक्तीला मिळाल्याने त्यांना जीवदान देण्यात यश आले आहे. शहरातील हे ५९वे यकृतदान ठरले आहे. 'ग्रीन कॉरिडॉर'च्या माध्यमातून नाशिक ते पुणे हे अंतर अवघ्या सव्वातीन तासात पूर्ण करणे शक्य झाले.

‘नाशिक येथे राहणारा युवक पट्टीचा मोटारसायकलस्वार होता. नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथे दुचाकीवरून पडून त्याचा २४ डिसेंबरला अपघात झाला होता. त्यात तो ब्रेनडेड झाला. त्यानंतर त्याचे अवयवदान करण्यासाठी नातेवाइकांशी संपर्क साधण्यात आला. अनेक प्रयत्नानंतर नातेवाइकांनी अवयवदानास संमती दिली. त्यानंतर सोमवारी सकाळी नाशिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्याचे अवयव काढण्यात आले. दोन मूत्रपिंडे, यकृत आणि दोन डोळे आदी दान करण्यात आले. त्यापैकी यकृत पुण्यातील रुबी हॉस्पिटलला दान करण्यात आले’, ’अशी माहिती नाशिकचे ट्रान्सप्लांट समन्वयक डॉ. संजय रकिबे यांनी दिली. उर्वरित अवयव नाशिकच्या हॉस्पिटलमधील प्रतीक्षा यादीतील पेशंटना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

‘हॉस्पिटलमध्ये ३८ वर्षीय व्यक्ती यकृताच्या प्रतीक्षेत होती. नाशिकच्या युवकाचे यकृत मिळाल्याने त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत प्रत्यारोपण करण्यात आले. नाशिकहून सकाळी पावणेनऊला यकृत घेऊन अॅम्ब्युलन्स ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून पुण्यात ११ वाजून ५७ मिनिटांनी पोहोचली. नाशिक ते पुणे हे अंतर अवघ्या तीन तास १० मिनिटांत पार करण्यात यश आले. पुण्यातील हे ५९ वे यकृतदान ठरले आहे,’ अशी माहिती रुबी हॉस्पिटलच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जोशी यांनी दिली. रुबी हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मनीष वर्मा, डॉ. कमलेश बोकील यांच्या पथकाने प्रत्यारोपण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चाकणमधील एका घरात आढळले १२० साप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । पिंपरी

चाकण-खराबवाडी येथील सारा सिटीतील बंद फ्लॅटमधून पोलिसांनी ४० ते ५० घोणस, ६० ते ७० कोब्रा आणि २ बाटली सापांचे विष जप्त केले आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

रणजित पंढरीनाथ खरगे (३७) असं मुख्य आरोपीचं नाव आहे. खरगे हा मूळचा सांगली जिल्ह्यातील रहिवाशी आहे. त्याने चाकण खराबवाडी येथील सारा सिटीत एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्यामध्ये त्याने ४० ते ५० घोणस, ६० ते ७० कोब्रा (नाग) साप पकडून ठेवल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. यावरून चाकण पोलिसांनी सर्पमित्रांच्या मदतीने या फ्लॅटवर मंगळवारी (२७ डिसेंबर) सकाळी छापा टाकला आणि सर्व साप जप्त केले.

फ्लॅटची तपासणी केली असता हा आरोपी सापांचे विष काढून तो बंद बाटलीमध्ये विकत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. दोन बाटली सापांचे विष देखील पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणात अन्य कोणाचा हात आहे का, एवढे साप-नाग कोठून आणले, यात सरकारी यंत्रणेच्या कोणाचा सहभाग आहे का याचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था दगावली: पवार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। बारामती

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. 'नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशाची अर्थव्यवस्था दगावल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे' अशा शब्दात पवार यांनी नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीचे वर्णन केले आहे.

बारामतीत झालेल्या बालवैज्ञानिक प्रदर्शन कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी केंद्रीय विज्ञान मंत्री हर्षवर्धन आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर ५० दिवस होत आले आहेत, मात्र परिस्थिती आहे तशीच आहे. ही परिस्थिती अजूनही काही महिने अशीच राहील असे आपल्याला वाटत असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वात जास्त फटका कृषी क्षेत्राला बसला असल्याचेही पवार म्हणाले. केंद्र सरकारने सहकार क्षेत्र उध्वस्त करायला घेतले आहे असा थेट आरोपही पवार यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सनबर्न’मध्ये देशीविदेशी बँड्स

$
0
0

महोत्सवाची थीम ‘निसर्ग’
म. टा. प्रतिनिधी, पुणे
निसर्ग ही थीम घेऊन पुण्यात प्रथमच आयोजिण्यात आलेल्या सनबर्न संगीत महोत्सवात भारतीय कलावंतांसह आंतरराष्ट्रीय कलाकार संगीत नृत्य सादर करणार आहेत. नगर रोडवरील केसनंद येथे ‘सनबर्न हिल’ या ठिकाणी २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव होत आहे. ‘अन्गर फिस्ट’, ‘मिस के८’, ‘मॉन्टर कॅट आर्टिस्ट : पपेट’ अशा आंतरराष्ट्रीय बँडसह ‘झेडएन’, ‘शिव’, ‘तेरिमिको’, ‘लॉस्ट स्टोरीज’, ‘१८ ईस्ट’ अशा भारतीय बँडचे सादरीकरण हे या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे.
निसर्ग ही थीम असल्याने दहावा सनबर्न फेस्टिव्हल पुण्यात आयोजिण्यात आल्याची माहिती परसेप्ट लिमिटेडचे व्हॉइस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर हरिंद्र सिंग यांनी दिली. सनबर्न हा देशी-विदेशी कलावंत आणि संगीतनृत्य प्रेमींसाठी होणारा महोत्सव असून या ठिकाणी कोणतीही बेकायदेशीर गोष्ट होणार नसल्याचेही सिंग यांनी सनबर्न हिल इथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बुधवारपासून (२८ डिसेंबर) सुरू होणाऱ्या या महोत्सवासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या महोत्सव सुरू होण्यापूर्वी मिळणे अपेक्षित असून, सुरक्षाव्यवस्था, पार्किंग, आरोग्य, या सगळ्या गोष्टींची खातरजमा करूनच उपक्रमाची तयारी केल्याचे त्यांनी सांगितले.
सनबर्न महोत्सवासाठी यंदा पाच स्टेज उभारण्यात आले आहेत. तीसहून अधिक फूड स्टॉल, आवडत्या डीजेंना भेटण्यासाठी फॅन व्हीलेज, साहसप्रेमींसाठी बंजी जम्पिंग, फेरीस व्हील, व्हॉलीबॉल, वॉल क्लाइंबिंग, राहण्यासाठी तंबू व्यवस्था अशा विविध सोयी असणार आहेत. पन्नासहून अधिक देशातले दहा ते बारा लाख संगीतनृत्य प्रेमी या महोत्सवाला भेट देतील अशी अपेक्षा असून पुण्याच्या पर्यटनात चाळीस टक्क्यांनी वाढ होणे अपेक्षित आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
०००
विरोधाची कारणे अतार्किक
सनबर्न फेस्टिव्हलमध्ये धुम्रपानाला बंदी असून प्रौढ व्यक्तींनाच मद्यपानाची परवानगी दिली जाणार आहे. दोनशे टेलिव्हिजन कॅमेरे या ठिकाणी बसविण्यात आले असून, कोणताही गैरप्रकार होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. तसे आढळल्यास तात्काळ कारवाईची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे ड्रग्ज वगैरे घेणाऱ्यांना इथे स्थान नाही. गोवा राज्याला या महोत्सवाने आठशे कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे. महाराष्ट्र हे आमचेही घर आहे. महोत्सवाबाबत विविध प्रकारच्या अफवा कोणतीही खातरजमा न करता उठविण्यात आल्याने विरोधाची कारणे अतार्किक असल्याचे मतही हरिंद्र सिंग यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागडे तिकीट घेणाऱ्यांची चौकशी का नाही?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘नोटाबंदीनंतर बँकेत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरल्याच संबंधितांची चौकशी केली जाते. मात्र, ‘सनबर्न’चे ८८ हजार रुपयांचे तिकीट घेणाऱ्यांची चौकशी का नाही,’ असा प्रश्न हिंदू जनजागृती समितीने उपस्थित केला आहे. ‘सनबर्न’ फेस्टिव्हलमध्ये मोठ्या प्रमाणावर काळा पैसा वापरल्याचा आरोपही संघटनेने केला. या फेस्टिव्हलच्या तिकीट विक्रीतून कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न आयोजकांना मिळणार असून राज्य सरकारच्या तिजोरीत एक रुपयाही जाणार नसल्याचा आरोप संघटनेने या वेळी केला.
गोव्यात गेल्या काही वर्षांपासून होत असलेला ‘सनबर्न’ फेस्टिव्हल यंदा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. अंमली पदार्थ आणि मद्याचा गैरवापर होत असल्याने गोवा सरकारने या फेस्टिव्हलला परवानगी नाकारलेली असताना, पुण्यात मात्र केसनंद फाटा येथे बुधवारी, आजपासून हा महोत्सव सुरू होत आहे. या महोत्सवासाठी आठ ते ८८ हजार रुपये किमतीच्या लाखो तिकिटांची विक्री झाली आहे. पण, राज्य सरकारला त्यातून महसूल मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे, अशी माहिती सनातन संघटनेचे प्रवक्त अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत दिली. हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, चंद्रकांत वरघडे, शुभांगी आफळे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते या वेळी उपस्थित होते.
‘सनबर्न’च्या आयोजकांनी गोव्यात तिकीट विक्री कमी दाखवून सरकारला १० कोटी ८० लाख रुपयांऐवजी केवळ एक कोटी १६ लाख रुपये कर भरला होता. पुण्यातील फेस्टिव्हलमध्येही अशी करचुकवेगिरी होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे वर्तक यांनी सांगितले.
......
जबाबदार कोण?
गोव्यामध्ये या महोत्सवात झालेले गैरप्रकार माहिती असतानाही पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी ‘सनबर्न’साठी महाष्ट्रात पायघड्या घातल्या. या महोत्सवात गैरप्रकार घडल्यास, त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करून वर्तक यांनी जयकुमार रावल यांचा निषेध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ई-कचरा’ होणार संकलित

$
0
0

पुणे : विविध ठिकाणच्या नागरिकांकडे घरात वापरून खराब अथवा जुने झालेल्या कम्प्युटर्स, लॅपटॉप, मोबाईलच्या बॅटरी, त्याचे विविध छोट्या भागांचा ‘ई-कचरा’ आता प्रथमच संकलित केला जाणार आहे. मोबाइलची बॅटरी, कम्प्युटर्सच्या टाकाऊ साहित्यातून विविध प्रकारचे वायू बाहेर पडून त्याचा आरोग्याला धोका निर्माण होतो. या संदर्भात माहिती नसल्याने सामान्यांना इजा होण्याची शक्यता आहे.

नागरिकांकडे घरात तयार होणाऱ्या ‘ई-कचरा’ संकलनासाठी कम्प्युटर्स अँड मीडिया डिलर्स असोसिएशनने (सीएमडीए) पुढाकार घेतला असून, नव्या वर्षात या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. देशात सर्वाधिक ‘ई-कचरा’ हा जमा होणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा क्रमांक आठवा लागतो. पुण्यात आजमिताला दर वर्षी सुमारे २६ हजार मेट्रिक टन एवढा कचरा तयार होतो. शहरात जमा होणाऱ्या घनकचऱ्यापैकी ३० टक्के ‘ई कचऱ्या’चा समावेश असतो. ‘सीएमडीए’चे ३५०पेक्षा अधिक असलेल्या शहरातील सदस्यांमध्ये ‘ई-कचरा’ संकलनासंदर्भात जनजागृतीचे काम सुरू आहे.

‘शहरात जैव वैद्यकीय कचरा संकलित केला जातो. त्या प्रमाणे घरापासून विविध कार्यालयापर्यंत कम्प्युटर्स, लॅपटॉप, टॅब, मोबाईलचा सर्रास वापर होतो. बाजारात नव्या आवृत्तीचे कम्प्युटर्स, मोबाईल आले की जुने इलेक्ट्रॉनिक साहित्य भंगारात दिले जाते. बऱ्याचदा भंगारात दिलेल्या साहित्याची विल्हेवाट योग्य लावली जात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास अथवा आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता अधिक असते. कम्प्युटर्स, लॅपटॉप, यूपीएसची बॅटरी, अथवा मोबाइलच्या बॅटरी घरात ठेवल्यास त्यातून विविध प्रकारचे गॅसेस बाहेर पडण्याचा धोका असतो. त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते. नागरिकांना माहिती नसल्याने नागरिकांकडे तयार होणाऱ्या ‘ई-कचरा’ संकलनाची मोहीम ‘सीएमडीए’ने हाती घेतली आहे. त्याबाबत पालिकेच्या आरोग्य खात्याची चर्चा सुरू आहे,’ अशी माहिती सीएमडीएचे अध्यक्ष संजीव पठारे यांनी ‘मटा’ला दिली.

‘ई-कचऱ्या’चे नियम २०११ पासून बदलले असले तरी ‘ई-कचरा’ संकलन, त्याचा पुनर्वापराची समस्या अद्याप कायम आहे. सरकारी, खासगी कार्यालयापासून औद्योगिक कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या ‘ई-कचऱ्या’पेक्षा घरात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह साहित्यांमधून सुमारे पाचशे ते एक हजार मेट्रिक टन एवढा कचरा जमा होतो. त्याच्या संकलनाचेच मोठे आव्हान आहे. मोठ्या कंपन्या त्यांचा ‘ई-कचरा’ संकलन करून त्याची विल्हेवाट लावतात. त्यामुळे त्याची अडचण नाही. ‘सीएमडीए’ने त्यांच्या सदस्यांच्या माध्यमातून कचरा संकलनासाठी पुढाकार घेतला आहे. याकरिता प्रत्येक वॉर्डातील एक किंवा दोन कम्प्युटर्स विक्रेत्यांकडे ही सोय केली जाणार आहे. शहरात विविध भागात १०० ठिकाणी संकलन केंद्रे केली जाणार आहेत, अशी माहिती पठारे यांनी दिली.
.........
‘ई-कचऱ्या’चे दुष्परिणाम
0 कम्प्युटर्सच्या चिप, गोल्ड प्लेटेड घटकातील अॅसिडच्या संपर्कात आल्याने डोळ्यासंह त्वचेला इजा होण्याचा धोका.
0 अॅसिड्स, क्लोरीन, सल्फर डायऑक्साइडसारखे वायू मोबाइलच्या बॅटरीतून बाहेर पडत असल्याने त्यातून श्वसनविकार बळावण्याची शक्यता. मृत्यू होण्याचा धोका.
0 घरात ‘ई-कचरा’ साठल्यास त्यातून शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची भीती.
0 लहान मुलांना इजा होऊ शकते.
...
‘ई-कचरा’ म्हणजे काय ?
मोबाइल, कम्प्युटर्स, टॅब आदींच्या बॅटरी, स्क्रीन, यूपीएस, हार्डडिस्क, अॅडॉप्टर, पॉवर सप्लाय, मदर बोर्ड, चिप्स, टोनर्स, प्रिंटर्स, कार्टिजेस, वायर्स या साहित्य प्रकाराला इलेक्ट्रॉनिक कचरा अथवा ‘ई-कचरा’ असे म्हटले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images