Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सेलिब्रेशनसाठी डान्स फ्लोअर सज्ज...

$
0
0

Aditya.Tanawade@timesgroup.com
Tweet: @AdityaTanawade

पुणे : नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईकडून वेगवेगळ्या पार्टीचे प्लॅन सुरू झाले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी डान्स-गाण्यांवर धमाल करत, मौज-मस्तीचे नियोजन झाले असून त्यासाठी शहरात विविध ठिकाणी डान्स फ्लोअर सज्ज झाले आहेत. शहरातल्या अनेक भागात तरुणांना आकर्षित करण्यासाठी विविध पब आणि हॉटेल्सकडून आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. त्यामुळे यंदाच्या न्यू इयर सेलिब्रेशनला तरुणाई ‘चिल’ होण्यासाठी उत्सुक आहे, एवढे नक्की.

पुण्यात ३१ डिसेंबरची अख्खी रात्र सेलिब्रेशन करायचा ट्रेंड वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन पुण्यातील अनेक उच्चभ्रू वस्त्यांमध्ये असलेले पब्स तरुणांना आकर्षक ऑफर देत आहेत. त्यामध्ये कपल ऑफर्स, ग्रुप ऑफर्स, पार्टी विथ लिकर अँड डिनर अशा अनेक प्रकारच्या ऑफर्स आहेत. त्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या सवलती हॉटेलांनी देऊ केल्या आहेत. त्यामुळे थर्टी फर्स्टची संपूर्ण रात्र एन्जॉय करण्याची तयारी करणाऱ्यांनी आतापासूनच पबमध्ये बुकिंग करायला सुरुवात केली आहे. पबमध्ये वाजणाऱ्या गाण्यांचा बाहेरच्या नागरिकांना फारसा त्रास होत नसल्याने आणि पोलिसांचाही त्रास नसल्याने तरुणाईची सर्वाधिक पसंती पबना मिळत आहे.

पुण्याच्या चारही दिशांना बार कम पब पसरले आहेत. चांदणी चौकाच्या पुढे पौडकडे जाताना काही पब आहेत. पुण्याबाहेर पार्टी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे. पुण्यात देखील जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर काही पब आहेत. हे पब आकाराने छोटे असले, तरी छोटे-छोटे ग्रप नक्की पार्टी करू शकतात. या शिवाय सेनापती बापट रस्ता आणि कोरेगाव पार्क या परिसरात असलेल्या काही फाइव्ह स्टार आणि सेव्हन स्टार हॉटेलांमध्येही नामवंत पब आहेत. एरवी, शनिवारी-रविवारी तुडुंब भरणाऱ्या या पबमध्ये खास ३१ डिसेंबरच्या रात्रीचे तरुणांच्या पसंतीचे कार्यक्रम ठरवण्यात आले आहेत. त्यासाठी काहींनी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या डीजेंना बोलावले आहे. त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांनी लावलेल्या गाण्यांवर थिरकण्यासाठी तरुणाई ३१ तारखेला रात्री मोठ्या प्रमाणावर गर्दी करणार आहे.

बॉलिवूड नाईट, डिस्को, जॅझ, पॉप, इंटरनॅशनल साँग्स अशा तरुणांना थिरकायला लावणाऱ्या विविध संगीत प्रकारांवर आधारित गाणी पबमध्ये वाजवण्यात येणार आहेत. साधारण रात्री आठ वाजता पार्टी सुरू झाली की अगदी पहाटेपर्यंत सलग स्पीकरवर वाजत राहतील एवढी गाण्यांची तयारी झाली आहे. त्यासाठी पबचे डीजेसुद्धा सध्या मेहनत घेत आहेत. विविध प्रकारच्या गाण्यांच्या हँगओव्हरमध्ये तरुणाई यंदा झिंगणार आहे.

पब आणि डिस्को यांच्यासह तरुणाईची हुक्का पार्लरलाही पसंती आहे. ज्या तरुणांना धांगडधिंगा फारसा आवडत नाही आणि जे हुक्क्याचे शौकिन आहेत, अशा तरुणांसाठी हुक्का पार्लर देखील सज्ज झाली आहेत. राज्यात हुक्का पार्लरवर बंदी असली, तरी छुप्या प्रकारांनी का होईना, हुक्का पार्लर ३१ डिसेंबरच्या रात्री बक्कळ पैसे कमावणार आहेत. शिवाय पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अनेकांनी घरीच हुक्क्याचा बेत आखला आहे. एकूणच गेल्या वर्षाला निरोप देण्यासाठी यंदा तरुणाई अभी तो पार्टी शुरू हुई है... असे म्हणत जुन्या वर्षाला बाय बाय म्हणणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युधिष्ठिराची ‘एंट्री’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गजेंद्र चौहान या केवळ नावावरूनच ‘एफटीआयआय’मध्ये गोंधळ होत असे. चौहान संस्थेत आले तेव्हाही प्रचंड गोंधळ झाला होता. रविवार मात्र काहीसा वेगळा होता. चौहान यांची रविवारी संस्थेत एंट्री झाली, पण तसा काहीच गोंधळ झाला नाही. त्यांच्याकडे ना विद्यार्थ्यांचे लक्ष होते ना संस्थेचे. त्यांची ‘प्रतिमा’ संस्थेत असतानाही वातावरण शांत शांतच होते. नाही म्हणायला ही प्रतिमा पाहायला बाहेरून आलेले लोकच काय ती चर्चा करत होते. कारण ही प्रतिमा होती गजेंद्र चौहान यांच्यापेक्षाही महाभारतातील युधिष्ठिराची!

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) महाभारतावरील चित्रपट महोत्सव सध्या सुरू आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) यांच्यातर्फे आयोजित या महोत्सवात रविवारी सकाळी महाभारत ही गाजलेली मालिका चित्रपट स्वरूपात दाखविण्यात आली. या मालिकेतून गजेंद्र चौहान यांनी ‘एफटीआयआय’मध्ये युधिष्ठिर म्हणून एंट्री केली, पण काहीच प्रतिक्रिया उमटली नाही.

महाभारत पाहायला आलेले रसिक हे युधिष्ठिर, गजेंद्र चौहान व ‘एफटीआयआय’चा वाद अशीच सांगड घालून चर्चा करत होते. काहीजण चौहान यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन का केले, ही माहिती घेत होते. ‘महाभारत’ मालिका म्हणजे दूरदर्शनच्या सुवर्ण काळात रमण्याचा अनुभव. पण संस्थेचे विद्यार्थी इकडे फिरकलेच नाहीत. सुट्टीमुळे प्रशासन, कर्मचारी वर्ग अध्यक्षांच्या अभिनय वर्गाला गैरहजर होता. संचालक भूपेंद्र कँथोला यांनी फेरफटका मारून आपले कर्तव्य बजावले.

दुसरीकडे मालिका सुरू असताना अनेक तांत्रिक अडचणी आल्यामुळे रसिकांचाही हिरमोड झाला. त्यामुळे युधिष्ठिर असणाऱ्या चौहानांनाही नीटसे ‘अभिव्यक्त’ होता आले नाही. केंद्र सरकारने चौहान यांची अध्यक्ष म्हणून निवड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते. आतापर्यंत प्रत्यक्षात एकदाच संस्थेत आलेल्या चौहान यांना ‘गो बॅक चौहान’ अशी घोषणाबाजी ऐकावी लागली होती. रविवारी त्यांनी संस्थेत प्रवेश केला, पण काहीच प्रतिक्रिया उमटली नाही.

रसिकांची संख्या घटली

‘एनएफएआय’च्या चित्रपटगृहाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे महोत्सव ‘एफटीआयआय’मध्ये घ्यावा लागत आहे. दिवसभर उपस्थित राहणारा रसिक मधल्या वेळात बाहेर गेला तर पुन्हा आत येताना त्याला सुरक्षेचे सर्व सोपस्कार पार पाडावे लागत आहेत. यामुळे कंटाळलेल्या रसिकांचे प्रमाण तीन दिवसांत घटले आहे. ‘एफटीआयआय’चे सभागृह जुनाट असल्याने बसण्यासाठी आरामदायी व्यवस्था येथे नाही. चित्रपट दाखविण्याची पद्धतही साध्या प्रोजेक्टरवर असल्यामुळे वारंवार अडचणी येत आहेत. पाण्याची व्यवस्था नसल्याने तहान लागली तर थेट बाहेर जावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीच्या ज्येष्ठ नागरिकाला पुण्यात लुटले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यात मुलाला भेटण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या ज्येष्ठ नागरिकाची पुण्यात लुटल्याचा प्रकार औंध परिसरातील कोटक महिंद्रा बँकेसमोर शुक्रवारी सकाळी घडला. या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सहायक निरीक्षक तानाजी भोगम यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून दुचाकीवरील दोन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर. सी. पुरी (वय ७७, रा. दिल्ली) हे मूळचे दिल्लीचे आहेत. त्यांचा मुलगा पुण्यात एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करतो. तो कुटुंबासह पुण्यात औंध परिसरात राहतो. पुरी हे मुलाला भेटण्यासाठी अधून-मधून पुण्यात येत असतात. काही दिवसांपूर्वी ते मुलाकडे आले होते. शुक्रवारी सकाळी ते मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. सव्वाआठच्या सुमारास ते परत घरी निघाले होते. त्यावेळी ते नागरस रोडवरील कोटक महिंद्रा बँकेसमोर आले असता दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. पुरी यांना तक्रार द्यायची नव्हती. मात्र, पोलिसांनी फिर्याद देऊन दोघांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे हे अधिक तपास करत आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नौदल अकादमीचा होणार विस्तार’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘नौदलासाठी अधिकारी घडविणाऱ्या केरळमधील भारतीय नौदल अकादमीचा विस्तार करण्यात येत आहे. अधिकाधिक छात्रांना एकाचवेळी प्रशिक्षण देणे शक्य होता यावे, यासाठी हा विस्तार करण्यात येत आहे. त्याचबरोबर नौकांवर महिला अधिकाऱ्यांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्याबाबतही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे,’ अशी माहिती अकादमीचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल सुनील भोकरे यांनी ‘मटा’ शी बोलताना दिली.
एका कार्यक्रमानिमित्ताने शहरात आलेल्या भोकरे यांच्याशी ‘मटा’ ने संवाद साधला. नौदलाला सध्या अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. नौदलात दाखल होऊ इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी नौदल अकादमी ही देशातील एकमेव अकादमी आहे. अधिकाधिक अधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देता यावे, यासाठी अकादमीतील पायाभूत सुविधा वाढविण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने अकादमीचा विस्तार करण्यात येईल, असे भोकरे यांनी स्पष्ट केले.
‘नौदलातील युद्धनौका तसेच पाणबुड्यांचा निर्धारित वेळापत्रकानुसार विकास करण्यात येत आहे. अणु-पाणबुड्यांची निर्मिती नौदलासाठी अत्यंत महत्त्वाची असून, त्याही निर्धारित वेळापत्रकानुसार नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होतील. त्यामुळे नौदलाचे सामर्थ्य आणखी वाढेल,’ असेही भोकरे यांनी सांगितले.
लष्करात लढाऊ तुकड्यांमध्ये महिलांचा समावेश होणार आहे. तर हवाई दलात महिला वैमानिकांची पहिली महिला अधिकाऱ्यांची तुकडी हवाई दलात दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर युद्धनौकांवरही महिला अधिकाऱ्यांच्या समावेशाबाबत विचारले असता भोकरे म्हणाले, ‘नौदलात महिलांना करिअरसाठी अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत. सध्या नौदलात दिशादर्शन, हवामानअंदाज, लॉजिस्टिक्स, नेव्हल आर्किटेक्चर, निरीक्षण आदी क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. नौका व युद्धनौकांवर महिला अधिकाऱ्यांसाठी आवश्यक सुविधांची निर्मिती करावी लागणार आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्यांसाठी ‘अॅक्शन प्लॅन’

$
0
0

हल्ले रोखण्यासाठी पोलिस, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्थांना सहभागी करणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कधी भक्ष्याच्या शोधात तर, कधी रस्ता चुकल्याने मानवी वस्तीत शिरणाऱ्या बिबट्याला हाताळण्यासाठी पुणे वन विभागाने राज्यस्तरीय ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी आराखड्यामध्ये प्रथमच पोलिस, महसूल विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. मुख्य प्रधान वन संरक्षकांकडून आराखड्याला हिरवा कंदिल मिळाला असून, पुढील आठवड्यात शासकीय अध्यादेश जाहीर होणार आहे.
पुण्यामध्ये दोन दिवसांपूर्वी बिबट्या आल्यामुळे पुन्हा एखादा ‘बिबट्या -मनुष्य संघर्षा’चा विषय ऐरणीवर आला आहे. महिनाभरात पुणे वन विभागाने ग्रामीण भागात वस्तीत आलेल्या तीन बिबट्यांना निसर्गात सोडले. गेल्या दोन ते तीन वर्षांत मानवी वस्तीतील बिबट्याचा वावर वाढला, असून काही प्रसंगांमध्ये जीवितहानीही झाल्याचे दिसून आले आहे.
मुख्यतः जुन्नरमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने सहा महिन्यांपूर्वी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) नितीन काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती नेमली होती. यामध्ये वन्यजीव विभागाचे मुख्यवनसंरक्षक सुनील लिमये, उपवनसंरक्षक विठ्ठल धोकटे, बिबट्या अनाथालयाचे पशू वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अजय देशमुख आणि वन्यजीव संशोधक डॉ. विद्या अत्रेय यांचा समावेश होता. या समितीने बिबट्याचा कृती आराखडा तयार केला आहे.
‘आराखड्यामध्ये बिबट्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी योग्य कार्यवाही कशी करावी, हे सांगणारी ‘प्रमाणित कृती मानके’ (स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर) निश्चित केली आहे. याशिवाय शासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांकडून आपत्कालीन परिस्थितीत कोणती कार्यवाही अपेक्षित आहे, याचे विवेचन केले आहे. बिबट्यांचा मानवी क्षेत्रातील वावर हा विषय संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज आहे. यासाठी केवळ गावकरी नव्हे तर लोकप्रतिनिधी, शासकीय विभागाचे अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागृती झाली पाहिजे. योग्य पावले उचल्यास बिबट्यांमुळे होणाऱ्या अनेक दुर्घटना टाळता येऊ शकतात. यासाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आम्ही सर्व समावेशक जबाबदाऱ्या मांडल्या आहेत,’ असे विद्या अत्रेय यांनी सांगितले. सर्व विभागांकडून मिळालेले सहकार्य आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कोणत्याही जीवित हानीशिवाय बिबट्या पकडता येऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण कोंढव्यामध्ये अनुभवायला मिळाले असेही अत्रेय म्हणाल्या.
मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये म्हणाले की, ‘राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान यांच्याकडे आम्ही कृती आराखडा सादर केला आहे. त्यांनीही त्याला मान्यता दिली आहे. आराखड्याचा शासन निर्णय करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पुढील आठ ते पंधरा दिवसांमध्ये तो निर्णय जाहीर होईल. अहवालाची दखल उत्तराखंडमधील वन विभागानेही घेतली आहे. त्यांची टीम नुकतीच अभ्यास दौऱ्यासाठी पुण्यात आली होती. जुन्नर मॉडेल उत्तराखंडमधील बिबट्यांसाठी राबविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.’

आराखड्यातील महत्त्वाचे मुद्दे
- बिबट्याकडून पशुधनाची हानी अथवा मनुष्यास वारंवार इजा पोहोचल्यास उपनवसंरक्षकाने त्या क्षेत्रास संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करावे.
- पोस्टर्स, होर्डिंग, लघुपटांच्या माध्यमातून वन विभागाने सातत्याने विविध क्षेत्रात जागृती करावी.
- महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यकाळा घेऊन शक्य असल्यास जुन्नर येथील बिबट निवारा केंद्रात अभ्यास दौरे आयोजित करावेत.
- निसर्गात सोडण्यास सक्षम नसलेल्या वन्यप्राण्यांसाठी राज्यात विविध ठिकाणी ‘वन्यप्राणी संघर्ष व्यवस्थापन केंद्र’ स्थापन करावीत.
- बिबट्याप्रवण क्षेत्रात वन विभागाने वन्यप्राणी संघर्ष व्यवस्थापन घटक समिती स्थापन करून सदस्यांना आवश्यक प्रशिक्षण आणि साहित्य द्यावे.
- समितीतील सदस्यांना आपत्कालीन परिस्थिती बिबट्याला हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे.
- जुने लोखंडी पिंजरे कालबाह्य करून त्याजागी फायबर बोर्डाचे पिंजरे वापरावेत.
- जनजागृतीसाठी गावांमध्ये वन मजूर आणि लोकसहभागातून तत्काळ कृती गट तयार करावेत.
- दर थोड्या दिवसांनी उपवनसंरक्षकांनी ग्रामीण भागात मॉक ड्रील घ्यावेत.
- पकडलेल्या बिबट्याची ओळख पटावी यासाठी त्याला ‘मायक्रो चीप’ बसवावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन खुनांचे गूढ उकलेना

$
0
0

मारूंजी, वाघोली, बावधनमधील घटना; पोलिस अपयशी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि परिसरात गेल्या काही वर्षांत झालेल्या तीन सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या खुनाचे गूढ अद्याप कायम आहे. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. तीनपैकी दोन सॉफ्टवेअर इंजिनीअरचे खून मारूंजी आणि वाघोलीत एकाच आठवड्यात झाले होते. तिसरी घटना बावधन परिसरात सहा वर्षांपूर्वी घडली.
अभिषेक शरदचंद्र रॉय (वय २१, रा. वाघोली, मूळ रा. भोपाळ), वरुण सुभाष सेठी (वय ३४, रा. हिंजवडी, मूळ रा. पंजाब) आणि दर्शना देविदास टोंगारे (रा. बावधन) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. या तिघांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांनी विविध पद्धतीचा वापर केला. तांत्रिक पद्धतीने तपास करूनही उकल होऊ शकलेली नाही.
वाघोलीत राहणारा अभिषेक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. खुनाच्या दुसऱ्या दिवशीच तो नोकरीवर रूजू होणार होता. वाघोलीत दोन मित्रांसोबत तो राहात होता. १ जून २०१४च्या पहाटे दोन व्यक्तींना त्याच्यावर हल्ला करून पळून जाताना त्याच्या मित्रांनी पाहिले होते. या गुन्ह्याचा पुणे ग्रामीण पोलिसांना अद्याप तपास लावता आलेला नाही. या गुन्ह्याचा तपास लागावा म्हणून अभिषेकचे वडील अजूनही पाठपुरावा करत आहेत.
हिंजवडी-मारूंजी रस्त्यावर २९ मे २०१४ रोजी वरुण सेठी या सॉफ्टवेअर इंजिनीअरचा खून झाला. वरुणही काही दिवसांपूर्वीच एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून रूजू झाला. तो घर शोधण्यासाठी मारूंजी परिसरात गेला होता. तेथून परत येताना त्यांच्यावर वार करून खून केल्याचे आढळून आले. या गुन्ह्याचा हिंजवडी पोलिसांनी विविध पद्धतीने केला. सर्व फोन कॉलची तपासणी केली. तसेच, खून झाला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पडताळून पाहिले. मात्र, मारेकऱ्यांचा शोध पोलिसांना अद्याप घेता आलेला नाही. बावधन परिसरातील दर्शना टोंगारे या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा जुलै २०१०मध्ये खून करण्यात आला. बावधन परिसरातील शिंदे पेट्रोल पंपासमोर वर्दळ असलेल्या गल्लीत रात्री साडेनऊच्या सुमारास भोसकून खून करण्यात आला. चाकूसारख्या धारदार हत्याराने दर्शनाच्या छातीवर जोरदार वार करून हल्लेखोर फरार झाले होते. या गुन्ह्याचा तपास हिंजवडी पोलिसांनी केला. पण, आरोपीचा शोध लावता आला नाही.
त्यानंतर या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. पण, त्यांनाही आरोपींना शोधण्यात अपयश आले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीच्या खुनाप्रकरणी पोलिस बेंगळुरूला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दोन दिवसांपूर्वी तळवडे येथील केबीसी चौकात सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीच्या खूनप्रकरणी पोलिसांना कुटुंबाकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तरुणीच्या अंगावरील दागिने चोरीला गेले नसून, हा खून खासगी कारणावरून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपीच्या शोधासाठी देहूरोड पोलिसांचे पथक बेंगळुरू येथे गेले आहे.
अंतरा देवानंद दास (वय २३, रा. प्राधिकरण, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंतरा कामावरून शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरी निघाली होती. तळवडे येथे केबीसी चौकात आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने तिच्यावर वार करून खून केला. त्यावेळी तिला सत्येंद्र सिंपी आणि एका कार चालकाने जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ओळखपत्रावरून तिची ओळख पटली.
पोलिसांनी तिच्या पालकांना सर्व प्रकार कळविला. त्यानुसार अंतराचे वडील पुण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अंतराचे शिक्षण पश्चिम बंगालमध्ये झाले असून, तिला जुळी बहीण आहे. सहा महिन्यांपूर्वीच ती पुण्यात आली होती. तळवडे येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला लागली होती. प्राधिकरण येथे पेइंग गेस्ट म्हणून ती राहत होती. पुण्याला येण्यापूर्वी ती बेंगळुरूला प्रशिक्षणासाठी गेली होती. अंतराच्या अंगावरील दागिने चोरीला गेले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तिच्या खुनामागे वेगळेच कारण असल्याचा पोलिसांना संशय आहे. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. त्यानुसार एक पथक बेंगळुरूला गेले आहे.
अंतराला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्याने एका तरुणाला शस्त्र घेऊन जाताना पाहिल्याचे सांगितले आहे. मात्र, त्याचा चेहरा दिसला नसल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचे काम सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेलिब्रेशन नाताळचे; स्वागत नववर्षाचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आकर्षक रोषणाईऩे सजविण्यात आलेली दुकाने, सांताक्लॉजची टोपी, मास्क अन् हातात रंगबेरंगी फुगे घेऊन शॉपिंग मॉल परिसरात फिरणारी चिमुकली मुले, मित्रमैत्रिणींच्या ग्रुपसह भटकंतीसाठी बाहेर पडलेली तरुण मंडळी, चॉकलेटचे बटवे घेऊन ठिकठिकाणी फिरणारे सांताक्लॉज, पाश्चात्य खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये खवय्यांनी केलेल्या गर्दीमुळे कॅम्प परिसरासह फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोडवर ख्रिसमस सेलिब्रेशनची धमाल पाहायला मिळाली.
संध्याकाळच्या आल्हाददायक वातावरणामुळे बाहेर पडलेल्या कुटुंबांनीही रात्री उशिरापर्यंत भटकंती केली. ख्रिसमसच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या स्वागताची चाहूल अनुभवायला मिळाली. ख्रिसमस ख्रिश्चन बांधवांचा सण असला तरी, गेल्या काही वर्षात या सणाने सर्वच समाजावर भुरळ घातली आहे.
डिसेंबर महिना सुरू झाला की लहान मुलांसह ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना ख्रिसमसचे वेध लागतात. यंदा ख्रिसमस रविवारी आल्यामुळे शहरातील कॅम्प, कोरेगाव पार्क, मध्यवर्ती पुण्यातील पेठा, कोंढवा, औंध जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोडवरील हॉटेल, बेकरी आणि शॉपिंग मॉलमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शांततेचे प्रतीक असलेल्या चांदण्या, बेल्स, सांताकॉजच्या प्रतिकृती, आकर्षक आकारातील दिवे, ख्रिसमस ट्री आदी वस्तूंनी दुकाने सजविण्यात आली होती. या सजावटीचे फोटो मोबाइल कॅमेऱ्यात टिपण्याची संधी तरुणांनी सोडली नाही. कॉलेजचे मित्रमैत्रिणींचे ग्रुप सांताक्लॉजची टोपी घालून रोषणाई केलेल्या ख्रिसमस ट्री बरोबर सेल्फी काढण्यात मग्न होते.
कॅम्पबरोबरच डेक्कन परिसरातील नामांकित बेकऱ्यांमध्ये प्लेन केकसह पायनॅपल, हनी, मावा, फ्रूट केक, पेस्ट्रीज, कुकीज घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. चॉकेलट आणि भेटवस्तूंच्या दुकानातही तरुणांची गर्दी झाली होती. ऐन थंडीतही आईस्क्रिम खाण्याचाही आनंद तरुणांनी लुटला. संध्याकाळनंतर रस्त्यांवर सेलिब्रेशनचा रंग चढत गेला. रात्री दहाच्या दरम्यान उत्साही तरुणांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले.

केक कापून येशू जन्मोत्सव
येशू ख्रिस्ताच्या जयंतीसाठी आकर्षक रोषणाईने सजविलेल्या चर्चमध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ख्रिस्त बांधवांनी रात्री आठ वाजता वॉच नाइटची उपसाना केली. शनिवारी रात्री बारानंतर येशूच्या जन्मोत्सवाला सुरुवात झाली. केक कापून नागरिकांनी येशूचा जन्म साजरा केला. प्रार्थनेनंतर केक आणि मिठाई देऊन बांधवांनी एकमेकांना शुभेच्या दिल्या. चर्च ऑफ दी होली नेम कॅथेड्रलतर्फे येशूख्रिस्ताच्या देखाव्याची रॅली काढण्यात आली होती. शनिवारी रात्री रेव्हरंड शरद गायकवाड, सुधीर गायकवाड, अनिल इनामदार, अजित फरांदे, सुरेंद्र लोंढे आदींनी उपस्थितांना भक्तिसंदेश दिला. रविवारी सकाळी ६ ते ८ या वेळेत सामूहिक भक्ती झाली. येशूच्या स्मरणार्थ बांधवांना भाकरी आणि द्राक्ष रस देण्यात आला, असे चर्चचे सहसचिव सुधीर चांदेकर यांनी सांगितले. चर्च ऑफ द होली नेम कॅथड्रल, पंचहौद, सेंट मेरी चर्च, सेंट मॅथ्य्जू चर्च, चर्च ऑफ दी होली एंजल्स, सेंट मेरी चर्च खडकी अशा शहरातील विविध चर्चमध्ये धर्मगुरूंनी संदेश देऊन लोकांना शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरापर्यंत ख्रिस्त बांधवांची चर्चमध्ये वर्दळ सुरू होती, तर काही उत्साही बांधवांनी कुटुंबीय, आप्तेष्टांसाठी आपापल्या घरी स्नेहमेळावे आयोजित केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहकारी संस्थांचे व्यवहार कॅशलेस करा

$
0
0

पणनमंत्री सुभाष देशमुख यांची सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी सहकारी संस्था, साखर कारखाने, बाजार समित्या यांच्यातील व्यवहार अधिक पारदर्शक होण्यासाठी ते कॅशलेस करण्यासाठी प्रयत्न करा,’ अशी सूचना राज्याचे पणन व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली.
सहकार- पणन विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘अटल महापणन विकास अभियानाच्या’ उदघाटनप्रसंगी देशमुख बोलत होते. या वेळी राज्यातील सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक, पणन विभागाचे अधिकारी, पणन महासंघाचे अधिकारी, पणन मंडळाचे अधिकारी, खरेदी विक्री संघांचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.
‘विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी गावांमधील गरज ओळखून ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. शेतीउत्पादन विक्री व्यवस्थेत मार्गदर्शन, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी. पीक कर्ज परतफेडीची शेतकऱ्यांना सवय लावायला हवी. कृषी मालाची विक्री ही सहकारी विभागाची नैतिक जबाबदारी असून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती का सुधारली नाही याची कारणे शोधली पाहिजेत. विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. कीटक नाशकांचा खर्च कमी झाला पाहिजे. माती परीक्षण करावे तसेच शेतमाल विक्रीसाठी प्रयत्न करावेत. गावांमध्ये माल साठवणुकीसाठी प्रयत्न केले पाहिजेत,’ असे आवाहन देशमुख यांनी केले.
‘राज्यस्तरावर पणन विषय दुर्लक्षित राहिला आहे. खरेदी विक्री संघटनाच्या बळकटीसाठी पहिल्यांदाच लक्ष देण्यात येत आहे. हरियाणा, पंजाब येथील पणन संघाची उलाढाल १० ते १२ हजार कोटींची आहे. महाराष्ट्र राज्य पणन संघाची उलाढाल ९५० कोटी रुपये असून, त्यात वाढ होण्याची संधी आहे,’ असे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.
पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक एन. नवीन सोना यांनी प्रास्तविक केले. पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी अटल महापणन विकास अभियानाची माहिती दिली. डॉ. राजाराम दिघे, गणेश शिंदे, खरेदी विक्री संघाच्या प्रतिनिधींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आशिष दराड यांनी केले. पणन महासंघाचे सरव्यवस्थापक ए.जी.पवार यांनी आभार मानले.

कोणत्याही खरेदी-विक्री संघाच्या विक्रीचा प्रस्ताव सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी पाठवू नये. अडचणीतील संघ पुन्हा प्रस्थापित होतील यासाठी संघांचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. कामकाज अधिक परिणामकारक होण्याची गरज आहे. पणन क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव देशात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

सुभाष देशमुख, पणन व सहकार मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समता, ममतेमुळे समरसतेचा प्रचार

$
0
0

भिकुजी इदाते यांचे मत; नाशिककरांना पुरस्कार प्रदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘समरसतेमध्ये समता आणि ममता या दोन मोठ्या अर्थांच्या शब्दांचा मिलाफ आहे. समता आणि ममतेसाठी काम करणारी मंडळी समाजात उभी राहिली की, समरसतेचा प्रसार आणि प्रचार होतो,’ असे मत राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष भिकुजी उर्फ दादा इदाते यांनी रविवारी व्यक्त केले.
सामाजिक समरसता मंचाद्वारे आयोजित कार्यक्रमात इदाते यांच्या हस्ते माजी उपमहापौर सुरेश नाशिककर यांना ‘संत गाडगेबाबा समरसता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, रोख रुपये पंचवीस हजार, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या वेळी इदाते बोलत होते. मंचाचे पश्चिम क्षेत्र संयोजक डॉ. सुनील भडंगे, सहसंयोजक प्रांताचे रमेश पांडव, पुणे महानगर अध्यक्ष नंदकुमार राऊत, रमेश महाजन, प्रा. श्यामला घोणसे, कमला नाशिककर, विजय गावडे आदी उपस्थित होते.
इदाते म्हणाले, ‘समरसता हा अतिशय प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे यासाठी काम करणारी माणसे ही खऱ्या अर्थाने समाजकार्य करणारी माणसे आहेत. देशात समरसतेचा प्रचार कारायचा झाल्यास समता आणि ममतेसाठी काम करणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे. अशी माणसे सामाजात उभी राहिली की, समाजात समसरता निर्माण होईल. सुरेश नाशिककर यांनी रक्ताचे पाणी करुन हे काम चोख पद्धतीने केले आहे.’ दरम्यान, समाजात समरसता वाढत असल्याचे इदाते यांनी सांगितले.
नाशिककर म्हणाले, ‘संत गाडगे महाराजांचे विचार लोकांपर्यत पोचवायचे यासाठी मंदिरात कीर्तन व्हावे, अशी इच्छा होती. मनात आत्मविश्वास असल्यानेच अनेक मंदिरात कीर्तन करून त्यांचे विचार लोकांपर्यत पोहोचणे शक्य झाले. तसेच, कीर्तनकारांच्या ओठी संत गाडगे महाराज यांचे नाव यावे. हा देखील उद्देश होता. गाडगे महाराजांच्या विचारांतून आणि कीर्तनातून समरसतेचे काम करत आलो. मला मिळलेला पुरस्कार आई-वडील आणि माझ्यासोबत काम करणाऱ्यांना समर्पित करतो.’' प्रा. घोणसे यांनी मनोगत व्यक्त केले. पांडव यांनी प्रास्ताविक केले.

मी राजकारण सोडून सामाजिक कार्यात स्वतःला गुंतवून घेतले आहे. गोपीनाथ मुंडे असताना मला आमदारकीचे तिकीट मिळत होते. मात्र, ऐनवेळी माघार घेतल्याने आमदार झालो नाही. अन्यथा मुंडे यांच्यासोबत मंत्री झालो असतो.
- सुरेश नाशिककर, माजी उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’कडूनही चौकशी

$
0
0

टाकी टेंडरच्या योजनेला आणखी खीळ बसण्याची चिन्हे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात समान पाणीपुरवठा करण्यासाठी (२४ बाय ७) बांधण्यात येणाऱ्या टाक्यांच्या उभारणीला राज्य सरकारने स्थगिती दिल्यानंतर आता स्थायी समितीनेही टाक्यांच्या टेंडर प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीवरही कारवाई केली जावी, अशा स्पष्ट सूचना समितीने प्रशासनाला केल्या आहेत. त्यामुळे, पहिल्यापासूनच वादात अडकलेल्या या योजनेच्या प्रगतीत आणखी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहराच्या वेगवेगळ्या भागांत होणारा अपुरा आणि असमान पाणीपुरवठ्यावर मात करण्यासाठी ही २४ बाय ७ ची योजना आखण्यात आली आहे. त्या अंतर्गत नव्याने ८२ पाणी साठवण टाक्या बांधण्यात येणार असून, त्यानंतर संपूर्ण शहरातील जलवाहिन्यांचे जाळे बदलण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक कुटुंबाला वॉटर मीटरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. या संपूर्ण योजनेच्या पारदर्शकतेबाबत सुरुवातीपासून शंका उपस्थित केल्या जात आहेत. टाक्यांचे पालिकेने काढलेले टेंडर रद्द करून ठरावीक कंपनीच्या फायद्यासाठी पुन्हा टेंडर काढण्यात आले होते.
या टाक्यांचे काम एकाच कंपनीला मिळाल्याने त्याबाबत स्थानिक स्तरावर तक्रारी केल्या गेल्या, तर काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांनीही लक्षवेधीद्वारे टाक्यांच्या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. अखेर, राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल मिळेपर्यंत योजनेला स्थगिती देण्याचे जाहीर केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहनेते बंडू केमसे यांनीही टाक्यांच्या टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला होता. स्थायी समितीने त्याला मान्यता दिली असून, या संदर्भात सल्लागार कंपनी म्हणून काम करणाऱ्या कंपनीची चौकशी केली जावी अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाट्यगृहांमुळे होतो कला, साहित्यप्रसार’

$
0
0

येरवड्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने दोन नाट्यगृहे उभारलेले पुणे राज्यातील पहिलेच शहर ठरले आहे. भावी पिढीला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण आदी समाजसुधारकांच्या कार्याची माहिती होण्यासाठी त्यांच्या नावाने नाट्यगृहे उभारली जात आहेत. त्यामुळे, नागरिकांमध्ये इतिहास, साहित्य आणि कलेचा प्रसार होतो,’ असे मत मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.
येरवडा येथील गुंजन चौकात विमानतळ रस्त्यावरील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे ई-लर्निंग स्कूल आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिराचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महापौर प्रशांत जगपात, उपमहापौर मुकारी अलगुडे, खासदार वंदना चव्हाण, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार बापू पठारे, स्थानिक नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक किशोर विटकर, महेंद्र पठारे,नगरसेविका मीनल सरवदे, उषा कळमकर आणि मीना परदेशी आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रातील उपेक्षित ,दलित आणि गरिबांसाठी आयुष्यभर आपले जीवन वाहून घेण्याची जबाबदारी क्रांतिवीर लहुजी वस्ताद आणि अण्णा भाऊंनी उचलली. अण्णा भाऊ उपेक्षित आणि दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप आग्रही होते. अण्णा भाऊंचे शिक्षण कमी असले तरी जबरदस्त लेखणीमुळे विषयाचे सविस्तर विश्लेषण करून ते लोकांना जागृत करीत असता.’ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णा भाऊंनी कविता आणि पोवाड्याच्या माध्यमातून कामगारांना एकत्र आणण्याचे काम केले. या चळवळीत त्यांचे योगदान मोठे होते. महापालिकेने येरवड्यात त्यांच्या नावाने अतिशय देखणी वास्तू उभारली असल्याचा गौरव पवार यांनी केला.
या वेळी पवार यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. प्रास्तविक महापौर प्रशांत जगपात यांनी केले. आभार रावसाहेब खंडागळे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगेश तेंडुलकर बनले सांताक्लॉज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एरव्ही आपल्या कुंचल्याच्या फटकारांमधून मोठ्या मोठ्या राजकारण्यांच्या तोंडचे पाणी पळवणारे एक पांढऱ्या दाढीतले व्यंगचित्रकार अचानक सांताक्लॉज होऊन आले आणि त्यांनी क्षणात चिमुकल्यांच्या मनात घर केले. पाहता पाहता त्यांनी सर्वांना चॉकलेट्स देऊन नाताळच्या शुभेच्छा दिल्या. मुलांसोबत ‘जिंगल बेल’ या गाण्यावर ठेका धरला. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे हे रूप मनाला मोहवून टाकणारे होते.

नाताळ सणाच्या निमित्ताने मैत्र युवा फाउंडेशनच्यावतीने जीवधारा शाळेतील विशेष मुलांसाठी ख्रिसमस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अचानक सांताच्या वेशात तेंडुलकर आले आणि त्यांना पाहून निरागस मुलांनी एकच जल्लोष केला. आपल्या लाडक्या सांताकडून चॉकलेट, आवडत्या वस्तू घेण्यासाठी मुलांमध्ये धडपड झाली. तेंडुलकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांना हवे ते चॉकलेट देऊन त्यांना आपलेसे केले. ख्रिसमस ट्री, बेल, फुग्यांनी सजवलेले सभागृहही त्या वेळी आनंदाने झुलत होते.

मैत्र युवा फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, जीवन धारा मतीमंद शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता शिंदे, यश पंडित आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात तेंडुलकर यांच्या हस्ते विशेष मुलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

‘निसर्ग प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देत असतो. निर्सगाची भाषा समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने जे मिळेल ते काम केले पाहिजे. चांगल्या कामासाठी कौतुकाची गरज नसते. एक महत्त्वाचे चांगले काम आपोआप आपले मार्ग शोधते. निरपेक्षपणे काम करणारी माणसे समाजात खूप कमी आहेत. अशा माणसांची समाजाला खरी गरज आहे,’ असे मत मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत देशपांडे यांनी केले. मुलांना विविध खेळणी, खाऊ, कपड्याचे वाटप या वेळी मैत्र युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.

कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता माणसाने काम करत राहिले पाहिजे. माझ्या छोट्याशा प्रयत्नांनी या चिमुकल्यांच्या डोळ्यात आनंद दिसणार असेल, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. निरपेक्ष भावनेने हे सगळे केले पाहिजे. - मंगेश तेंडुलकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांचे अप्रकाशित पत्र सापडले

$
0
0

डॉ. केदार फाळके यांचे संशोधन

Prasad.Pawar@timesgroup.com

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय आणि राजकीय धोरणांवर प्रकाश टाकणारे आणि ‘स्वराज्य’ या राजांच्या संकल्पनेत सामावलेला सामान्य माणसाचा विचार अधोरेखित करणारे खुद्द शिवछत्रपतींचेच अस्सल आणि अप्रकाशित पत्र उजेडात आले आहे. शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. केदार फाळके यांना धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात हे पत्र मिळाले असून, इतिहास अभ्यासकांसाठी हा अनमोल ठेवा ठरणार आहे.

फाळके यांनी शिवछत्रपतींच्या कार्यावर पीएचडी मिळवली आहे. रामचंद्रपंत अमात्य लिखित आज्ञापत्रावर ते अभ्यास करत आहेत. या अभ्यासासाठी धुळे येथील दफ्तरखान्यात शोध घेत असताना त्यांना हे अस्सल मुद्राधारी पत्र मिळाले आहे. १८ ऑगस्ट १६७३ म्हणजेच राज्याभिषेकापूर्वी वर्षभर सातारातर्फेचे सुभेदार अबाजी मोरदेव यांना हे पत्र शिवरायांनी पाठवले आहे. पाली (जि. सातारा) येथील पाटीलकी वतनासंबंधात कान्होजी खराडे आणि काळभर यांच्यातील वादावर दिलेला निवाडा या पत्रातून समोर आला आहे. विशेष म्हणजे, जेधे शकावलीनुसार सातारा हे २७ जुलै १६७३ मध्ये स्वराज्यात दाखल झाले. त्यानंतर पुढच्याच महिन्यातले (१८ ऑगस्ट) हे पत्र असल्याने स्वराज्यात दाखल झालेल्या प्रदेशाची प्रशासकीय व्यवस्था लावण्याबाबत महाराज किती दक्ष होते, हे यातून दिसून येत आहे. पत्राबाबत बोलताना डॉ. फाळके म्हणाले, ‘हे पत्र राज्याभिषेकापूर्वीचे आहे. पाटीलकी वतनासंबंधात खराडे आणि काळभर यांच्यात वाद सुरू होता. ही बाब छत्रपतींच्या कानी गेल्यावर त्यांनी सातारा तर्फेचे सुभेदार अबाजी मोरदेव यांना हे पत्र पाठवले आहे. खराडे यांना समज द्यावी तसेच त्यांची घोडी किंवा माणसे पालीमध्ये असतील तर त्यांना बाहेर घालवावे आणि गावातल्या पिकांची लावणी, संचणीची कामे काळभरांकडून करून घ्यावीत असा आदेश राजांनी मोरदेव यांना दिले आहे.’

या पत्रावर दोन ओळींनंतर ‘श्री शिवनरपती हर्षनिदान, महादेव मतिमत प्रधान’ असा प्रधानाचा शिक्का असून पत्राच्या शेवटी ‘मर्यादेयं विराजते’ ही छत्रपतींची मोर्तब मुद्रा आहे. पत्रातले हस्ताक्षर हे भारत इतिहास संशोधक मंडळात असणाऱ्या महाराजांच्या १७ जुलै १६७३ या दिवशी दिलेल्या अस्सल कौलनाम्यातल्या हस्ताक्षरासारखे आहे. पत्राच्या शेवटी ‘परवानगी हुजूर’ ही अक्षरे अन्य व्यक्तीच्या हातची आहेत. पत्राच्या मागे ‘सुरू सुद’ असा पत्रनोंदणीचा तत्कालीन शेरा असून, त्याखाली पैवस्तीची म्हणजेच पत्र पोहोचल्याची तारीख अरबी कालगणनेत दिली आहे. जी ८ सप्टेंबर १६७३ या इंग्रजी तारखेशी जुळते. महाराजांची आजवर सुमारे २७० पत्रे मिळाली आहेत. या पत्रातले अक्षराचे वळण, भाषाशैली, वाक्यरचना, शब्द हे महाराजांच्या अन्य पत्रांसारखेच आहेत, अशी माहिती डॉ. फाळके यांनी दिली.

रयतेचे राजे आणि प्रशासकीय व्यवस्था

या पत्रात असणाऱ्या वादाचा निकाल पाली येथे महाराजांच्या उपस्थितीत १ फेब्रुवारी १६७६ मध्ये झाला. त्यापूर्वी तीन वर्षे हा वाद सुरू असल्याचे या पत्रामुळे समोर आले आहे. न्यायाच्या बाजूने ठामपणे उभे राहणारे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे या पत्रातून समोर येतात. सातारा स्वराज्यात आल्यावर केवळ २४ दिवसांतले हे पत्र आहे. दक्ष प्रशासकीय कारभाराचा हा दाखला आहे. या पत्रावर आणखी अभ्यास सुरू असून, त्यासाठी डॉ. वि. आ. चितळे, शरद कुबेर, प्रा. डोंगरे आणि रमण चितळे यांनी सहकार्य केल्याचे डॉ. केदार फाळके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६३ हजार कैद्यांची ‘व्हीसी’ हजेरी

$
0
0

तंत्रज्ञानामुळे पोलिस यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मोठी मदत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मनुष्यबळावरील ताण कमी करण्यासाठी राज्यातील तुरुंग आणि कोर्ट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) जोडण्यात आले आहेत.त्यानंतर कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१५मध्ये ६३ हजार कैद्यांना कोर्टासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेवरील ताण कमी होण्यात मदत झाली आहे.

राज्यात नऊ मध्यवर्ती तुरुंग, २९ जिल्हा आणि अकरा खुले तुरुंग, एक महिला तुरुंग, खुली कॉलनी, वसाहत असे एकूण ५४ तुरुंग आहेत. राज्यातील तुरुंगामध्ये २९ हजार ८०६ कैदी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये २१ हजार ५२१ कैदी हे न्यायालयीन आहेत. त्यामुळे त्यांना तारखांना कोर्टात हजर करावे लागते. कोर्टात हजर करण्यासाठी त्यांना मोठे मनुष्यबळ लागते, तसेच काही वेळेला कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना आरोपी पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी, तसेच मनुष्यबळावरील ताण कमी करण्यासाठी राज्यातील जिल्हा कोर्ट आणि तुरुंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने जोडण्यात आले. त्यानुसार कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर करण्यास सुरुवात झाली.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा सुरू केल्यानंतर २०१४मध्ये ६३ हजार ७२६ कैद्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले. २०१३मध्ये हा अकडा ४० हजारांवर होता. त्यामध्ये पुढील वर्षी २३ हजारांनी वाढ झाली. २०१५मध्येही ६३ हजार कैद्यांना विविध कोर्टांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले आहे. राज्यात ठाणे तुरुंगातून १७ हजार ७१३ कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे. त्यानंतर नागपूर (९,००६), मुंबई (५,८४८), औरंगाबाद (४,८४१), चंद्रपूर जिल्हा तुरुंग (४,५३७) आणि येरवडा (३,९८०) कैद्यांना हजर करण्यात आले आहे.

येरवड्यात ‘व्हीसी’चा वापर कमी

राज्यात सर्वांत मोठे येरवडा मध्यवर्ती कारागृह आहे. या तुरुंगात राज्यात सर्वाधिक ४ हजार १२९ कैदी आहेत. ठाणे, नागपूर, मुंबई मध्यवर्ती तुरुंगातून कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याचे प्रमाण चांगले आहे. मात्र, येरवडा तुरुंगातून कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. येरवडा तुरुंगात पहिल्यांदा ही सुविधा सुरू करण्यात आली होती. पण, त्याचा प्रभावी वापर होत नसल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोलण्याची संधी पवारांना नाकारली

$
0
0

मेट्रो ​भूमिपूजन कार्यक्रमावरून ‘राष्ट्रवादी’त नाराजी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला बोलावूनही भाषण करण्याची संधी नाकारणाऱ्या भारतीय जनता पक्षाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. काँग्रेसनेही भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करून पवारांना अपमानित केले जात असेल तर जनतेला दिलेली आश्वासने कशी पाळणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी झाले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्य व्यासपीठावर होते. पवार यांना भाषण करण्याची संधी दिली जाईल, असे सांगितले जात होते. परंतु, मोदी यांच्यासह केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू याच नेत्यांची भाषणे झाली. त्यामुळे, भाजपने पवारांना निमंत्रित करूनही त्यांचा अनादर केल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये पसरली आहे. पवार यांचा रविवारी शहरात कार्यक्रम होता; पण यावेळी त्यांनी कोणतेही भाष्य करणे टाळले. तसेच, इतर नेत्यांनीही जाहीरपणे त्याबाबत मतप्रदर्शन केले नसले, तरी पवार यांचा मान भाजपने ठेवणे गरजेचे होते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस संयमाची भूमिका घेतली असताना, काँग्रेसने मात्र पवार यांना भाजपने दिलेली वागणूक चीड आणणारी असून, जनता त्यांना मतपेटीतून उत्तर देईल अशी टीका करण्यात येत आहे. पवार यांना भाषणाची संधी देऊन ती नाकारणारा भाजपसारखा पक्ष जनतेला दिलेली आश्वासने कधी पूर्ण करणार, असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, पुणे मेट्रोला दोन वर्षे उशीर का केला, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

पवार यांना भाषणाची संधी दिली जाईल, असे आश्वासन भाजपने कधीही दिले नव्हते; पण ते कार्यक्रमात व्यासपीठावर असतील, हे स्पष्ट केले होते. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात किती भाषणे असावीत, याचे काही नियम असतात. त्यानुसार, पंतप्रधानांखेरीज केवळ दोन व्यक्तींना बोलता येणार होते.
गिरीश बापट, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिप्सी माहितीपटाला स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव आणि ज्येष्ठ लेखक ज्ञानेश्वर मुळे यांच्यावर आधारित ‘जिप्सी’ या माहितीपटाला दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. या माहितीपटाची निर्मिती ‘युनिक अॅकॅडमी’ने केली असून, दिग्दर्शन धनंजय भावलेकर यांचे आहे.

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन २८ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. मुळे याआधी जपान, रशिया, सीरिया , मॉरिशस आणि न्यूयॉर्क येथे भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अभ्यासाची नेमकी दिशा काय असावी, हे कळावे हा माहितीपटाचा उद्देश असून, मुळे यांचा संपूर्ण प्रवास या माहितीपटात उलगडण्यात आलेला आहे.

प्रतिकूल परिस्थितीमध्ये निराश न होता संकटांवर मात कशी करावी, असा सकारात्मक संदेश हा माहितीपट देतो. आतापर्यंत अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या माहितीपटाचे स्क्रीनिंग झालेले आहे. वेगवेगळ्या स्तरावर हा माहितीपट दाखवला जात आहे. माहितीपटाचे चित्रीकरण मुंबई , पुणे, कोल्हापूर, दिल्ली आणि न्यूयॉर्क येथे झाले आहे. माहितीपटात माजी राज्यपाल, डॉ. डी. वाय. पाटील, पत्रकार विजय नाईक, भानू काळे, विनोद शिरसाठ यांनी आपले विचार मांडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. गुरव यांच्या गायनाने रसिक झाले मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

झुमरा तालातील ‘एरी माही को’... अध्धा तीन तालातील ‘आली रे मतु जागी सारी रैना... बैरन जागी..’ या बंदिशींचे बहारदार सादरीकरण आणि संत तुकाराम महाराजांचा ‘तीन शीर सहा हात’ हा अभंग...अशा मैफलीतून रसिकांनी पं. कैवल्यकुमार गुरव यांच्या गायकीचा सुरेल अनुभव घेतला. ‘दिगंबरा दिगंबरा,’ ‘राम मिलनरो घणो उमावो’ या भजनांच्या तालावर रसिकांनी ठेका धरला.

नारायण पेठ मुंजोबा बोळातील श्रीमत् जगद्गुरू श्री शंकराचार्य मठातर्फे दत्तजयंतीनिमित्त पं. गुरव यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. श्री श्री विद्याभिनव शंकरभारती स्वामी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे विश्वस्त अॅड. पराग एरंडे, किशोर जोशी, श्रीनिवास मोडक, यश रामलिंगे, प्रसाद लिमये, अशोक मानकर या वेळी उपस्थित होते.

आलाप तानांमधील अप्रतिम लयकारी, गायनातून प्रकट होणारे आर्त भाव अशा वातवरणात पं. कैवल्यकुमार यांनी आपल्या गायकीची मोहिनी रसिकांवर घातली. राग जयजयवंतीने मैफलीला सुरुवात करण्यात आली. यानंतर यमन रागातील अध्धा तीन तालातील ‘मोहे दरस दीजो,’ द्रुत एकतालातील ‘पिहरवा तोहे घर ना जाने ना दुंगी’ या बंदिशींनी मैफलीला उत्तरोत्तर रंग चढत गेला. ‘निंदिया आयी रे पिया’ या भैरवीने मैफलीची सांगता झाली. सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), भरत कामत (तबला), चारुहास दामले, आदित्य जोशी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

...............

सुरेल आवाजासाठी केवळ रियाज न करता तानपुरा लावून ओंकार म्हणावा. त्यामुळे आवाजाला गोलाई येते. तसेच स्वराला वलय येते, स्वराला वलय आले की स्वरसिद्धी प्राप्त होते. स्वरसिद्धी प्राप्त झाली की स्वरसमाधी मिळते.
- पं. कैवल्यकुमार गुरव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्वदेण्याची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘नागरिक वैयक्तिक स्वच्छता पाळतात, स्वतःचे घरही नियमित स्वच्छ ठेवतात, मग आपला परिसर स्वच्छ ठेवण्यामध्ये नागरिक उदासीन का आहेत, नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य देण्याची गरज आहे,’ असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
मध्य रेल्वे आणि वन विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वन्यजीव जागृती अभियानाअंतर्गत पुणे रेल्वे स्टेशनच्या ‘व्हिआयपी’ कक्षात रेखाटलेल्या चित्राचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या वेळी पुणे रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बी. के. दादाभॉय, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर, वन्यजीव अभ्यासक अनुज खरे उपस्थित होते.
सिक्कीम येथील नागरिक सार्वजनिक स्वच्छतेबद्दल खूप पुढे आहेत. ते जागरूक असल्याने रस्त्यावर थुंकणे आणि कचरा फेकणे टाळतात. पुण्यातील नागरिकांचीही मानसिकता बदलली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडकी खून प्रकरणी आणखी तिघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वडकी येथे जमिनीचा वाद व जुन्या भांडणाच्या कारणावरून माजी महाराष्ट्र केसरी दत्तात्रय गायकवाड याच्यासह आठ जणांनी कोयता, तलवार व लोखंडी सळ्यांचा वापर करून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून गायकवाड यांच्या चुलतभावाने सुपारी देऊन हा खून घडविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी ३ जणांना अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.
या प्रकरणी मेघराज विलास वाहळे (२३, रा. भुकूम, खाटपेवाडी, ता. मुळशी), शंकर विजय भिलारे (२४, रा. कर्वेनगर, साईबाबा मंदिरासमोर, पुणे, मूळ - वरवडे, ता. आंबेगाव) दत्तात्रय महादेव पाडाळे (२३, रा. म्हाळुंगे, ता. हवेली) या तिघांना अटक करण्यात आली असून, लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा समांतर तपास करीत असताना त्यांना खरे खुनी दुसरेच असल्याचे निदर्शनात आल्यानंतर त्यांनी २५ डिसेंबरला मेघराज विलास वाहळे यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचे कॉल डिटेलची तपासणी केल्यावर पोलिसांना त्याची खात्री पटली़ शिवाजी गायकवाड यांचा पुतण्या पप्पू ऊर्फ सुनील दत्तात्रय गायकवाड याने खुनाची सुपारी दिली होती व त्याने शिवाजी यांचा खून केल्यावर माझा भाऊ अनिल गायकवाड, उत्तम गायकवाड यांच्यासह १३ जणांनी ९ सप्टेंबर २०१५ रोजी हेमंत प्रकाश गायकवाड (३२, रा. वडकी) याचा जुन्या वादाच्या कारणावरून सुपारी देऊन त्याच्यावर पिस्तुलांतून चार गोळ्या झाडून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्या वेळी रामदास गुलाब मोडक (रा. वडकी) याने दिलेल्या फिर्यादीवरून १३ जणांना अटक करण्यात आली होती. याच्याविरुद्ध दाखल असलेल्या खुनाच्या मोका केसमधील साक्षीदाराविरुद्ध गुन्हा दाखल होऊन मोक्याची केसकमकुवत होऊन त्याचे भाऊ जेलमधून सुटण्यास मदत होईल व त्याने वरील तिघांना ठराविक रक्कम देण्याचे कबूल करून काही आगाऊ रक्कम दिली. यानंतर पप्पू ऊर्फ सुनील दत्तात्रय गायकवाड याच्या सांगण्यावरून शिवाजी दामोदर गायकवाड याच खून केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images