Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘ट्री हाउस’च्या शाळा तडकाफडकी बंद

$
0
0

संतप्त पालकांचे शाळेसमोर आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ट्री हाउस संस्थेने कोणतेही कारण न देता अचानक तीन पूर्व प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी आणि विद्यार्थी संघटनांनी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी गुरुवारी फर्ग्युसन कॉलेज रस्त्याजवळील शाळेसमोर आंदोलन केले.
ट्री हाउसच्या पूर्व प्राथमिक शाळेत पालकांनी सप्टेंबर महिन्यात सर्व शुल्क शाळेकडे जमा केले. सोमवारी पालकांना शाळेकडून दूरध्वनीद्वारे ट्री स्कूलच्या तीनही शाळा तांत्रिक करणास्तव बंद केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत पालकांनी चौकशी केली असता शाळेच्या जागेचे भाडे न भरल्यामुळे त्या बंद कराव्या लागत असल्याचे समजले. शाळा आर्थिक संकटात सापडल्याने काही शिक्षकांना काही महिन्यांपासून वेतनही देण्यात आलेले नसल्याचे समोर आले. फर्ग्युसन रस्ता येथील शाळाही अचानक बंद करण्यात आली असून, वडगावशेरी आणि सॅलिसबरी पार्क येथील शाळाही येत्या आठवड्यात बंद केल्या जाणार असल्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी पालकांनी आणि युवा सेनेने गुरुवारी शाळांसमोर येऊन आंदोलन केले. या प्रकाराची माहिती डेक्कन पोलिसांकडे देण्यात आली आहे. दरम्यान, शाळेने असा निर्णय घेताना पालकांना वर्षापूर्वी माहिती देणे गरजेचे होते. अचानक शाळा बंद करण्याच्या निर्णयाने पालक संभ्रमात आहेत. त्यामुळे या शाळेवर शिक्षण विभागाने कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्ष पालक संघाने केली आहे.

शहरात पूर्वी बोगस कॉलेजांचे पेव फुटत होते. आता मात्र, बोगस शाळांचे पेव फुटले आहे. ही गंभीर बाब आहे. ट्री हाउस शाळा अचानक बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वरित शाळा सुरू व्हावी, अशी आमची मागणी असून शिक्षण विभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
किरण साळी, शहराध्यक्ष, युवा सेना

आज तोडगा निघणार का?
ट्री हाउस शाळेच्या प्रशासनाने अचानक शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. पालकांनी पूर्ण शुल्क भरल्याने शाळा शैक्षणिक वर्षाच्या पूर्ण कालावधीत सुरू राहिली पाहिजे. त्यामुळे शाळा उर्वरीत काही महिने सुरू राहावी, अशी पालकांची मागणी आहे. शाळा सुरू राहण्यासाठी आज, शुक्रवारी संस्थेच्या कर्वे नगर शाळेत सकाळी ११ वाजता बैठक असल्याचे पालक राघवेंद्र मानकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ लॉकरमध्ये ११ कोटींची रोकड

$
0
0

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेतील बहुराष्ट्रीय कंपनीच्या लॉकर्सची तपासणी पूर्ण झाली असून, त्यात सुमारे अकरा कोटींची रक्कम असल्याचे उघड झाले होते. यापैकी नऊ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम बँकेतील लॉकरमधून तर उर्वरित सुमारे ९८ लाखांची रक्कम कंपनीच्या कार्यालयातून जप्त करण्यात आली आहे. मात्र, प्राप्तिकर विभाग आणि बँकेने या प्रकरणी मौन बाळगण्यातच धन्यता मानली आहे.

मंगळवारी दुपारपासून सुरू झालेला हा तपास गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास संपला. पर्वती शाखेत असलेल्या संबंधित कंपनीच्या सर्व लॉकर्सची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यात शंभर आणि २००० रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून एकूण ९ कोटी ८० लाख रुपयांची रोकड आढळली आहे. बँकेच्या पर्वती शाखेच्याच इमारतीत असलेल्या कंपनीच्या कार्यालयातून आणखी ९८ लाख रुपयांची रोकड आढळली. ही सर्व रक्कम वैध चलनातीलच असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

दरम्यान, गुरुवारी प्राप्तिकर विभाग आणि बँकेतर्फे फारशी माहिती देण्यात आली नाही. बँकेत पूर्वीपासूनच संबंधित कंपनीची खाती आहेत. मात्र, काही महिन्यांपूर्वीच त्यांना लॉकर देण्यात आले होते. हे लॉकरचे व्यवहार संबंधित कंपनीचे कर्मचारी करत होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर लॉकर १२ वेळा वापरण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले.

सीसीटीव्ही फूटेजही ताब्यात

प्राप्तिकर विभागाने बँकेमधील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. या फूटेजमध्ये संबंधित कंपनीशी संबंधित एकच व्यक्ती अनेकदा मोठी बॅग घेऊन लॉकर रुमकडे जाताना दिसत असल्याचे चित्रीकरण झाले आहे. त्याआधारे पुढील शोध घेण्यात येत आहे, असे प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निशन दलाचा इतिहास उलगडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अग्निशमन दलाचा इतिहास सांगणारे पहिले अग्निशमन संग्रहालय एरंडवणा भागात उभारण्यात आले आहे. उद्या (रविवार, १८ डिसेंबर) या संग्रहालयाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी महापौर प्रशांत जगताप, पालिका आयुक्त कुणाल कुमार, महाराष्ट्र अग्निशमन सेवाचे संचालक प्रभात रहांदगळे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक नगरसेवक अनिल राणे यांच्या पुढाकारातून हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. एरंडवणा येथील अग्निशमन केंद्राच्या जागेत हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयामध्ये पुणे अग्निशमन दलाच्या ताफ्यात १९५६ सालापासून अनेक वर्षे सेवा देणारी ‘रोल्स रॉइस’ कंपनीची डेनिस मेक मॉडेल फायर इंजिन बी. वाय. एल ७५७५ ही गाडी प्रमुख आकर्षण असणार आहे. तसेच भूकंप, पूर, आग, अपघात, दरड कोसळणे अशा नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तींमध्ये अग्निशमन दल विविध वस्तूंचा वापर करून नागरिकांच्या प्राणांचे व संपत्तीचे रक्षण करते, अशा वस्तूंचे प्रदर्शन व माहिती हे एक आकर्षण असणार आहे.
शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, नाट्यगृह, हॉस्पिटल, मॉल्स आणि खासगी कंपनीत काम करणारे कर्मचारी, नागरिक यांना अग्निशमन सेवेची माहिती देण्याकरिता सुसज्ज असा हॉल बांधण्यात आला आहे. याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना समोर ठेवून अग्निशमन दलाचे कार्य कसे चालते यासाठीचा एक लाइव्ह शो देखील तयार करण्यात आल्याची माहिती नगरसेवक राणे यांनी दिली. या संग्रहालयाचा समावेश पुणे दर्शनमध्ये करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
०००००
अग्निशमन सेवेची माहिती देण्याकरिता अग्निशमन संग्रहालयात सुसज्ज असा हॉल बांधण्यात आला आहे. अग्निशमन दलाचे काम कसे चालते यावर एक लाइव्ह शो तयार करण्यात आला आहे. या संग्रहालयाचा समावेश पुणे दर्शनमध्ये करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
- अनिल राणे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाध्यक्षांनी दिलीकविताप्रेमाची साक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मी टीकाकार नसेन, मी समीक्षकही नसेन. काही जणांच्या म्हणण्यानुसार मी प्रसिद्धही नाही. मी फक्त कवितेचा प्रियकर आहे. हे नाते मी आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही करीन,’ अशा भावना व्यक्त करून ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी त्यांच्या कविताप्रेमाची साक्ष दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. काळे यांचा सत्कार करण्यात आला. साहित्यविश्वातील परंपरेप्रमाणे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा पहिला सत्कार काळे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (मसाप) कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते स्वीकारला. त्या वेळी त्यांनी कवितेशी असलेले नाते उलगडले. ‘मसाप’चे विश्वस्त, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ कथाकार भारत सासणे, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, ज्येष्ठ लेखिका रेखा साने-इनामदार आदी या वेळी उपस्थित होते. अध्यक्षपदी निवडून देणाऱ्या सर्व साहित्य संस्था, साहित्यिक, प्राध्यापक यांच्याविषयी काळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी काळे म्हणाले, ‘कवितेचा अभ्यासक,आस्वादक नसतो, तर इथपर्यंत पोहोचलो नसतो. त्यामुळे कवितेचा आयुष्यभर ऋणी राहीन. कवितेशी संबंध जोडले म्हणून प्रतिष्ठा मिळाली. ज्येष्ठ कवींनी लिहून ठेवल्याप्रमाणे कवितेला मी माझी प्रियसी मानतो. मी कवितेचा समीक्षक आणि टीकाकार होण्यापेक्षा आस्वादक होण्याचा प्रयत्न केला.’ ‘चांगल्या प्रकारचा रसिक व्हावे, हीच अपेक्षा ठेवली. कारण रसिकांच्या अंतःकरणाचा स्पर्श झाल्याशिवाय कवितेला अंकुर फुटत नाही. कविता स्वतःहून जमावी लागते ती उसनी आणता येत नाही. ती प्रतिभा उपजतच असावी लागते,’ असेही काळे यांनी सांगितले.
‘साहित्य व्यवहारात बहुसंख्यांना माहिती असेल असाच अध्यक्ष असावा, हा निकष लावणे अत्यंत चुकीचे आहे. साहित्य व्यवहारातील जाणकारांनी संमेलनाच्या अध्यक्षाला निवडून दिलेले असते, तो बहुपरिचीत असो वा नसो त्याच्या प्रतिभेवर तो निवडून येतो,’ असे सांगून रेखा साने –इनामदार यांनी काळे यांच्यावर एका दैनिकातून प्रसिद्ध झालेल्या टीकेला उत्तर दिले. काळे यांची निवड ही साहित्यव्यवहारातील समीक्षेच्या स्थानाला अधोरेखित करणारी आहे. सध्या साहित्य व्यवहारात गटातटांचे राजकारण वाढले आहे. लोकांच्या अस्मिता प्रखर झाल्याने त्यांचे विचार टोकाला जात आहेत, आरडाओरड, भांडणे, सतत टीका हा त्याचाच एक भाग आहे, अशा शब्दांत इनामदार यांनी अप्रत्यक्षपणे गेल्या संमेलनाध्यक्षांच्या कारकिर्दीवर बोट ठेवले.
‘साहित्य व्यवहारामध्ये वाचकांना दृष्टी देण्याचे काम समीक्षक करतात. त्यांचे महत्त्व विसरून चालणार नाही. काळे यांच्या रूपाने एक सात्विक समीक्षक संमेलनाध्यक्ष म्हणून लाभला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संयुक्त महाराष्ट्राचा ठराव साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केला जातो. मात्र, त्यानंतर त्यावर काहीही होत नाही. ही परंपरा काळे यांनी मोडून काढावी. साहित्य महामंडळातील व्यवस्था बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत,’ अशी अपेक्षा ‘मसाप’चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली. उल्हास पवार, भारत सासणे यांनी काळे यांना शुभेच्छा दिल्या. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.
,.,
मी टीकाकार किंवा समीक्षक नसेन. काही जणांच्या मतानुसार प्रसिद्धही नाही. मी कवितेचा आस्वादक होण्याचा कायम प्रयत्न केला. मी फक्त कवितेचा प्रियकर आहे आणि हे नाते मी आयुष्यभर जपले आहे आणि जपेन.
- डॉ. अक्षयकुमार का‍ळे, अध्यक्ष, ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषांतर हे संस्कृतींमधील दुवा

$
0
0

डॉ. अॅलिडा अॅलिसन यांचे मत; भाषा फाऊंडेशनच्या बहुभाषिकतेवरील चर्चासत्राचे उद्घाटन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘भाषांतरित साहित्य हे दोन देशांमधील आणि दोन संस्कृतींमधील दुवा म्हणून काम करतात, मात्र त्या संस्कृतींमधील भावार्थ आणि संदर्भ जसेच्या तसे भाषांतराच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे,’ असे मत सॅन दियागो स्टेट युनिव्हर्सिटीतील इंग्लिश आणि तुलनात्मक साहित्य विभागातील प्राध्यापक डॉ. अॅलीडा अॅलीसन यांनी व्यक्त केले.
‘कथा यात्रा’च्या निमित्ताने भाषा फाऊंडेशन’ आणि साहित्य अकादमी यांनी आयोजित केलेल्या ‘समाज, साहित्य आणि बहुभाषिकता’ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्‍घाटनाच्या सत्रामध्ये डॉ. अॅलिडा अॅलिसन मुख्य वक्त्या म्हणून बोलत होत्या. लेखिका संगीता बहादूर, प्रसिद्ध भाषांतरकार उमा कुलकर्णी आणि भाषा फाउंडनच्या संस्थापक अध्यक्षा स्वाती राजे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी, पोलिश लेखक इसाक बॅशिविस सिंगर आणि चायनीज लेखक त्साओ वेनझुआन यांनी लिहिलेल्या आणि त्यांच्या इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेल्या साहित्याचा संदर्भ उपस्थितांना देऊन डॉ. अॅलिडा अॅलिसन यांनी भाषांतराचे महत्त्व विषद केले. त्या म्हणाल्या, ‘दुसऱ्या देशांतील आणि दुसऱ्या प्रदेशातील वाचकांना, जर त्या त्या ठिकाणाचे चित्र जसेच्या तसे उभे करण्यात भाषांतरित साहित्य यशस्वी ठरत असेल तरच ते भाषांतर उत्तम ठरते. त्यामुळे भाषांतरित साहित्यातही मूळ साहित्यातील ऐतिहासिक संदर्भ, उच्चार महत्त्वाचे असतात.’
संगीता बहादूर म्हणाल्या, ‘प्रत्येक भाषा आणि त्यातील शब्द, ही त्या ठिकाणाची संस्कृती दर्शवितात आणि बहुभाषिकता अनेक संस्कृतींमध्ये दुवा म्हणून काम करते. त्यामुळे बहुभाषिकता आणि त्यांचे सहअस्तित्व महत्त्वाचे आहे. मात्र, जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये आपले मूळ कायम ठेवावे लागेल.’
स्वाती राजे यांनी उमा कुलकर्णी यांची भाषांतर या विषयावर मुलाखत घेतली. त्यामध्ये कुलकर्णी यांनी शिवराम कारंथ यांच्या पुस्तकापासून सुरू झालेला भाषांतराचा प्रवास कथन केला. त्यांनी भाषांतरित केलेल्या ५५ कन्नड पुस्तकांविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘मला भाषांतराचे शास्त्र माहिती नाही. मात्र, अगोदर माझ्या समाधानासाठी मी भाषांतर केले आणि पुढे अनुभवातून आणि येणाऱ्या प्रतिक्रियांमधून शिकत गेले. भाषांतर करताना, त्या त्या भागांमधील संदर्भ समजून घेणे महत्त्वाचे असते, तरच वाचकाला मूळ साहित्याची अनुभूती मिळते.’
परिषदेच्या पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात संगीतातील बहुभाषिकता, बालसाहित्यातील बहुभाषिकता, भक्ती चळवळ, बाहेरच्या देशांतील साहित्य, विद्यार्थी आणि बहुभाषिकता, माध्यमे आणि बहुभाषिकता, बहुभाषिकता आणि आव्हाने अशा विविध विषयांवर, देश विदेशातील विविध वक्त्यांनी आपली मते व्यक्त केली. उज्ज्वला ताठे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सविता केळकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ट्री हाउस’वर कारवाई करा

$
0
0

भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ट्री हाउस संस्थेने कोणतेही ठोस कारण न देता शहरातील तीन पूर्व प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी आणि पालकांपुढे मोठा प्रश्न झाला आहे. त्यामुळे शाळेच्या प्रशासनाने पालकांच्या प्रश्नांचे निरसन करावे, शाळेचे वर्ग बंद करणार नाही, असे आश्वासन द्यावे अशी मागणी शुक्रवारी भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) केली. तर, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या आणि पालकांना मनस्ताप सहन करायला लावणाऱ्या ट्री हाउस शाळेवर शिक्षण विभागाने कारवाई करायची मागणी युवा सेनेने केली आहे.

ट्री हाउस संस्थेने फर्ग्युसन रस्त्याजवळील पूर्व प्राथमिक शाळा बंद केली आहे. त्याबाबत पालकांनी चौकशी केली असता शाळेच्या जागेचे भाडे न भरल्यामुळे त्या बंद कराव्या लागत असल्याचे समजले. शाळा आर्थिक संकटात सापडल्याने काही शिक्षकांना वेतनही देण्यात आलेले नसल्याचे समोर आले. शाळेचे शैक्षणिक वर्ष मार्च महिन्यापर्यत आहे. केवळ चार महिन्यांसाठी शाळा बंद केल्याने पालकांमध्ये मनस्तापाची भावना आहे. वडगावशेरी आणि सॅलिसबरी पार्क येथील शाळाही बंद केल्या जाणार असल्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे भाजयुमोने ट्री हाउस संस्थेकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी उपययोजना करण्याचे, पालकांच्या विविध शंकाचे निरसन करावे, शिक्षकांचे थकीत वेतन द्यावे, हायस्कूलचे वर्ग बंद करणार नाहीत अशा मागण्या केल्या आहेत. भाजयुमोतर्फे शहराध्यक्ष दीपक पोटे, सरचिटणीस पुनित जोशी, निहल घोडके, चंद्रकांत पोटे, प्रतिक देसर्डा व कार्यकर्त्यांनी मागण्याचे निवेदन संस्थेच्या संचालक संगीता राऊत यांना दिले आहे. तसेच, पालकांकडून शैक्षणिक वर्षाचे पूर्ण शुल्क घेऊन वर्षाचे केवळ चार महिने राहिले असताना शाळा बंद करणाऱ्या ट्री हाउस संस्थेवर व शाळाच्या ‍व्यवस्थापनावर शिक्षण विभागाने करवाई करावी. शहरात बोगस शाळांचे पेव फुटले आहे. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे विभागाने कारवाई न केल्यास युवा सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा युवा सेनेतर्फे शहराध्यक्ष किरण साळी यांनी दिला आहे.

युवासेनेतर्फे साळी यांनी शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांना निवेदन दिले. दरम्यान, पालकांनी शुक्रवारी शाळेसमोर आंदोलन केले. तसेच आज शनिवारी शिक्षण संचालक आणि संस्थेच्या अधिकाऱ्यांटी भेट घेणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेक इन इंडिया’ची घोषणा महत्त्वाची

$
0
0

डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इन इंडिया’ची घोषणा देशासाठी महत्त्वाची आहे. मात्र, येत्या काळात आपल्याला ‘इन्व्हेण्ट अँड मेक इन इंडिया’र्चा मंत्र घेऊन देशाला प्रगत करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे,’ असे मत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे (सीओईपी) आयोजित ‘ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, डिझाइन अॅन्ड रिसर्च' (एआयएमटिडीआर) या तीन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी डॉ. माशेलकर बोलत होते. उद्योजक अरुण फिरोदिया, आयआयटी खरगपूरचे माजी संचालक प्रा. अमिताभ घोष, परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. ए. के. चटोपाध्याय, सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा आदी या वेळी उपस्थित होते.

माशेलकर म्हणाले, ‘नवनिर्मिती आणि नवनव्या संशोधनाचा ध्यास मनाशी घेतल्यास आपल्या देशांतर्गत उत्पादननिर्मितीस मोलाचा हातभार लागेल. कष्ट आणि तल्लख बुद्धिमत्ता यांच्या संगमातून हे शक्य केल्यास आपण सर्वसमावेशक विकासाची शिडी वेगाने चढू शकू, यात शंका नाही. बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीतून देशात नवनिर्मितीची संस्कृती रुजू शकेल. त्यातूनच समाजातील वंचितांपर्यंत सर्व सुविधांचे वारे पोचू शकतील. ‘मेक इन इंडिया’ची घोषणा महत्त्वाची आहे. पण येत्या काळात आपल्याला त्याबरोबर ‘इन्व्हेण्ट अँड मेक इन इंडिया’चा मंत्र घेऊन काम करायचे आहे.’

फिरोदिया म्हणाले, ‘उत्पादननिर्मिती हा कोणत्याही राष्ट्राचा विकासाचा कणा असतो. भारतासाठीही तो कणाच आहे. मात्र, जगाच्या तुलनेत उत्पादन निर्मितीच्या बाबतीत आपण अजूनही कमी पडत आहोत. त्यात भरघोस वाढ व्हायला हवी. शैक्षणिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि उत्पादन ज्यांच्यासाठी बनविले जाते असे वापरकर्ते ग्राहक अशांनी एकत्र येत नव्या बदलांना सामोरे जायला हवे. महत्त्वाचे म्हणजे, निरनिराळ्या अनुभवांतून शिकण्याची कला आपण अवगत करून घ्यायला हवी. ‘वेस्ट टु वेल्थ’ हा मंत्र आपण जपल्यास भविष्यात गाजावाजा आपल्याच देशाचा आहे.’

जागतिक स्पर्धेच्या युगात गुणवत्ता आणि कमी किंमत या गोष्टींवर आधारित नवनव्या तंत्रज्ञानातील संशोधनाची आवश्यकता असल्याचे चटोपाध्याय यांनी सांगितले. डॉ. आहुजा यांनी स्वागत करून आपले मनोगत व्यक्त केले.

१८ डिसेंबरपर्यंत प्रदर्शन

एआयएमटिडीआरच्या निमित्ताने सीओईपीत औद्योगिक प्रदर्शन भरविण्यात आले असून, पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील नामवंत कंपन्यांचे ५० स्टॉल विद्यार्थी आणि संशोधकांना माहिती देण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यात ऑटोमेशन, प्रोग्रॅमिंग, इंडस्ट्रीयल इन्स्ट्रुमेंन्टस, विविध प्रकारचे टुल्स आणि मशिन्स आदींची माहिती उपलब्ध आहे. हे प्रदर्शन १८ डिसेंबरपर्यत विद्यार्थी व संशोधकांना पाहता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरभाडे भत्ता वाढला

$
0
0

पुणे, पिंपरी कँटोन्मेंटचा ‘एक्स वर्ग’त शहरात समावेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी प्रमुख शहरे आणि गावांचे पुनर्वर्गीकरण केले आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका; तसेच पुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंट बोर्ड यांचा समावेश ‘एक्स वर्ग’ शहरात झाल्यामुळे या ठिकाणी असलेल्या राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना या महिन्यापासून मूळ वेतनाच्या ३० टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे.

राज्य सरकारने याबाबतचा अध्यादेश काढला आहे. शहर आणि गावांच्या वर्गवारीप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळत असतो. पूर्वीची वर्गवारी रद्द करून केंद्र सरकारने एक्स, वाय आणि झेड असे तीनच वर्ग निश्चित केले आहेत. त्यानुसार एक्स वर्गवारीतील शहर आणि गावांमध्ये मूळ वेतनाच्या ३० टक्के, वाय शहरात २० टक्के आणि झेड शहरात दहा टक्के घरभाडे भत्ता देण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंट बोर्ड; तसेच देहू यांचा समावेश एक्स वर्गात करण्यात आला आहे. त्यामुळे या शहरांतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या ३० टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे. यापूर्वी पुणे शहरामध्ये मूळ वेतनाच्या २० टक्के घरभाडे भत्ता कर्मचाऱ्यांना मिळत होता.

मुंबई शहराचा समावेश पूर्वीपासून वर्ग एकमध्ये आहे. आता त्यास ‘एक्स वर्ग’ शहर असे संबोधण्यात येणार आहे. मुंबईनंतर नव्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड; तसेच कँटोन्मेंट बोर्डांचा समावेश झाला आहे. याबाबत राजपात्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष विनायक लहाडे म्हणाले, ‘संबंधित शहरांचा समावेश एक्स वर्गात करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी २८ सप्टेंबर रोजी बैठक झाली होती. त्यामध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय झाला आहे. या निर्णयाचा फायदा राज्य सरकारी आणि निमसरकारी सुमारे १८ ते २० हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. डिसेंबर महिन्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्गवारीनुसार घरभाडे भत्ता देण्यास एप्रिल २०१५ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.’

एक्स वर्ग शहरे

मुंबई : बृहन्मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, नवी​ मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महानगपालिका, अंबरनाथ नगरपरिषद, कुळगाव बदलापूर नगरपरिषद.

पुणे : पुणे, पिंपरी-​चिंचवड महापालिका, पुणे, खडकी​, देहूराड कँटोन्मेंट बोर्ड आणि देहू.

वाय वर्ग शहरे

नागपूर : नागपूर महानगरपालिका, डिंगडोह, वाडी.

नाशिक : नाशिक महानगरपालिका, एकलहरे, देवळाली कँटोन्मेंट बोर्ड, भगूर नगरपरिषद.

अमरावती : अमरावती महानगरपालिका.

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद कँटोन्मेंट बोर्ड.

भिवंडी : भिवंडी निजामपूर महानगरपालिका, खोनी.

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका.

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका, गांधीनगर.

वसई विरार : वसई विरार शहर महानगरपालिका.

मालेगाव : मालेगाव महानगरपालिका, भायगाव, दरेगाव, सोयगाव, द्याने, माळदे.

नांदेड : नांदेड, वाघाळा महानगरपालिका.

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका, माधवनगर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कथायात्रा महोत्सवाला सुरुवात

$
0
0

उत्सवाची यंदाची संकल्पना ‘पाणी’

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नाट्य, कथाकथन, संगीतिका, परिसंवाद, कार्यशाळा, पपेट शो, अभिवाचन, अनुभवकथन यांसारख्या अनेकविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या कथायात्रा महोत्सवाला बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सुरुवात झाली. ‘भाषा’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव पाणी या संकल्पनेभोवती गुंफण्यात आला आहे.

कथायात्रा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी एअरमार्शल भूषण गोखले, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, बालसाहित्यिक आणि सॅन दियागो स्टेट युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक डॉ. अॅलिडा अॅलिसन, प्रसिद्ध लेखिका संगीता बहादूर, प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, भाषा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा स्वाती राजे आदी मान्यवर उपस्थित होते. राजे यांच्या ‘फुगा’ आणि ‘न ऐकलेली गोष्ट’ या पुस्तकांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. महोत्सवाची सुरुवात अस्मिता ठाकूर आणि सहकारी यांच्या ‘सरितकथा’ या कथक बॅलेने झाली.

‘कोणत्याही संवादासाठी भाषा हे मुख्य माध्यम आहे. या माध्यमाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काम करणे महत्त्वाचे आहे,’ असे मत गोखले यांनी व्यक्त केले. ‘भाषा ही ऑक्सिजनसारखी झाली असून, तिचे अस्तित्व असूनही आपल्याला जाणवत नाही. भविष्यात या ऑक्सिजनसाठी लढण्याची वेळ येऊ नये म्हणून आज प्रयत्नशील असणे महत्त्वाचे आहे,’ असे डॉ. मोरे यांनी सांगितले.

दरम्यान, भाषा संस्था आणि फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे यांच्यातर्फे भरवण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चे प्रमुख डॉ. संतोष क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. भाषा संस्थेचे सचिव जयदीप राजे, ‘फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे’चे संस्थापक सदस्य सुनील कपाडिया, एम. बी. नांबियार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

........

विविध उपक्रम

पुढील दोन दिवस बालगंधर्व रंगमंदिर येथे कथायात्रा महोत्सव रंगणार आहे. यामध्ये नृत्य, नाट्य, कथाकथन, संगीतिका, परिसंवाद, कार्यशाळा, पपेट शो, अभिवाचन, अनुभवकथन यांसारख्या अनेकविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लहान मुलांबरोबरच मोठ्यांसाठी देखील ‘जलकथा’ साजरी केली जाणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांकरिता कॅशलेसव्यवहारांसाठी विशेष अॅप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशभरात डिजिटायझेशन होण्यासाठी शहरांपाठोपाठ खेडीदेखील डिजिटल करणे आवश्यक आहे. त्यासाठी आणि शेतकऱ्यांचा फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून ‘कॅशलेस अॅप’ हे मोबाइलवरील अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या साह्याने कॅशलेस व्यवहारापासून शेतमालाच्या विक्रीपर्यंत विविध गोष्टी साध्य होणार आहेत, अशी माहिती विद्याभूषण आर्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. वेल्हा तालुक्यातील दहा गावांमध्ये या अॅपचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी गावातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे शिक्षणही दिले जाणार आहे. www.acashless.com या वेबसाइटवर हे अॅप उपलब्ध आहे. वायुवा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विनामूल्य तयार केले आहे, असे आर्य यांनी सांगितले. या वेळी पुंडलिक वाघ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करड्या शिस्तीत सेनेच्या मुलाखती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एरवी राडा घालण्यात अग्रेसर असणारे शिवसैनिक शुक्रवारी मात्र करड्या शिस्तीत महापालिका निवडणुकीच्या ‘तिकिटा’साठी रांगेत उभे होते... ‘जय महाराष्ट्र’च्या घोषात आपल्या समर्थकांसह उपस्थित झालेले इच्छुक शिवसैनिक आपल्या पक्षनिष्ठेची महती सांगून यंदा संधी मिळाली पाहिजेच असा आग्रह धरत होते... साहेब गेली अनेक वर्ष पक्षाचे काम करतो आहे... अनेक केसेवर अंगावर घेतल्या आहेत... यावेळी मीच दुसरा कोणीच नाही...
शिवसेनेने आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास शुकवारपासून सुरुवात झाली. पुढील दोन दिवस या मुलाखती सुरू राहणार आहेत. या वेळी माजी मंत्री शशिकांत सुतार, डॉ. नीलम गोऱ्हे, शहरप्रमुख विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे, अजय भोसले, राधिका हरिश्चंद्रे, सुनील टिंगरे आदी उपस्थित होते.
आपणच कसे निवडून येऊ शकतो आणि आपल्यालाच कसे तिकीट मिळाले पाहिजे, हे आपल्या नेत्यांना पटवून देण्याचा आटापिटा इच्छुकांकडून करण्यात येत होता. भगवे फेटे घालून मुलाखतीसाठी आलेले उमेदवार आणि त्यांचे समर्थक जोरदार घोषणा देऊन ढोली-बाजाच्या ठेक्यावर मुलाखतस्थळी दाखल होत होते. शिवसैनिकांची जशी गर्दी वाढत होती, तशी क्वार्टरगेट परिसरात वाहतूक कोंडीत भर पडू लागली.
प्रभागनिहाय सुरू असलेल्या मुलाखतीदरम्यान उमेदवारांकडून आपल्या आकर्षक कार्यअहवालांच्या प्रती मुलाखत घेणाऱ्यांच्या समोर सादर करण्यात येत होत्या. आपला जनसंपर्क कसा दांडगा आहे, याची माहिती देताना,‘साहेब प्रभागात कोणालाही विचारा, माझेच नाव पुढे येईल,’ असे छातीठोकपणे सांगत होते. प्रभागातील सर्वच गटांमधील इच्छुकांची वाढती संख्या पाहता, मुलाखत घेणाऱ्या नेत्यांच्या चेहऱ्यावरही समाधान झळकत होते. पक्षश्रेष्ठीही उमेदवारांचे ऐकून घेऊन विजयी कसे होता येईल, याची गणिते, आडाखे समजून घेत होते. उमेदवारांची लढायची तयारी कितपत आहे, याचाही अंदाज बांधत होते. उमेदवारी मागणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती.

रुग्णवाहिका आणि शिवसैनिक
हॉटेल शांताई ते दर्शन हॉल या दरम्यानच्या रस्त्यावर ‘‘वायसीएमए’च्यासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शिवसैनिकांची वेढलेल्या वाढलेल्या संख्येमुळे चौकात मोठी कोंडी झाली होती आणि या कोंडीत रुग्णवाहिका अडकली. रुग्णवाहिकेला जागा करून देण्यासाठी शिवसैनिकांची धडपड सुरू होती. आपले शक्तिप्रदर्शन बाजूला ठेवून त्यांनी रुग्णवाहिकेला जाण्यासाठी जागा करून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनुष्यबाणाने कमावले, शिवसेनेने गमावले

$
0
0

धर्मेंद्र कोरे,जुन्नर

जुन्नर नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने पक्षाचे पालिकेतील पूर्वीचे विरोधी पक्षनेते मधुकर काजळे यांना नगराध्यक्षपदाचे तिकीट डावलले, अन् तरुणांचा चेहरा असलेल्या श्याम पांडे यांना नगराध्यक्षपदावर निवडून आणले. तिकीट कापल्याने व्यथित झालेल्या काजळे यांनी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष निवडणूक लढवून पांडे यांना कडवी झुंज दिली. एकटे मधुकर काजळे विरुद्ध शिवसेना पक्ष या लढतीत केवळ १४४ मतांनी पांडे विजयी झाले. परंतु सेनेच्या धनुष्यबाण चिन्हाने नगराध्यक्षपद कमावले असले, तरी शिवसेना पक्ष जुन्नरमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने टिकवून ठेवण्यामध्ये काजळे यांचे असलेले योगदान शिवसेना पक्षच काय, पण विरोधी पक्षही नाकारू शकत नाहीत.

नगरसेवकपदाच्या पाच जागांवर शिवसेनेला यश मिळाले. त्यामध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतील संख्येपेक्षा घट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेपेक्षा अधिक जागा मिळाल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रचारयंत्रणा राबवूनही शिवसेनेला पक्षीय बलाबल कमावता आले नाही. ही पीछेहाट म्हणावी लागेल. ‘आपली आघाडी’च्या माध्यमातून भाजपशी सलगी करून मनसे आमदार शरद सोनवणे यांना तीन जागा मिळवता आल्या. परंतु त्यांना या निवडणुकीत पाहिजे तेवढे मताधिक्य मिळवता आले नाही; पण गेल्या वेळी मनसेकडे असलेल्या दोन जागांमध्ये एका जागेची भर ते घालू शकले. हे पुसटसे यशदेखील नाकारता येणार नाही. भाजपने आघाडीतून काही उमेदवार कमळ चिन्हावर लढवले; मात्र एकही जागा भाजपला मिळवता आली नाही. ही नामुष्कीच म्हणावी लागेल.

काँग्रेसनेही उमेदवार उभे केले. परंतु एकच जागा काँग्रेसला मिळाली. गेल्या निवडणुकीतही काँग्रेसने एकाच जागेवर यश मिळवले होते. त्यामुळे फायद्या-तोट्याचे गणित काँग्रेसला लागू होत नसले, तरी अस्तित्वाचा भाग म्हणून काँग्रेसचे स्थान पालिकेत राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मतविभागणी भोवली. त्यांचे उमेदवार बाबा परदेशी यांना चांगले मताधिक्य मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र ‘राष्ट्रवादी’ने माजी नगराध्यक्ष किरण परदेशी यांना ऐन वेळी तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांनाही या निवडणुकीत चार अंकी मतांपर्यंत मजल मारता आली. परंतु त्यांच्या मतांमुळे बाबा परदेशी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘पॉकेटव्होट’ असलेली मते विभागली गेली आणि बाबा परदेशी यांना थेट तिसऱ्या क्रमांकावर यावे लागले. नगरसेवक पदावर कोणत्याही ठिकाणी ‘राष्ट्रवादी’त बंडखोरी झाली नाही. त्याचा काहीसा फायदा होऊन आठ जागा ‘राष्ट्रवादी’ला मिळाल्या.

काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अंबर परदेशी, तसेच अपक्ष उमेदवारी घेऊन निवडणूक रिंगणात असलेले माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कदम, अनिल मेहेर यांना फारशी मते मिळवता आली नाहीत. ‘आपली आघाडी’च्या वतीने रिंगणात असलेले अॅड. चंद्रकांत डहाळे यांना चार आकड्यांचा टप्पा गाठता आला. परंतु लोकसंपर्कासाठी त्यांना फारसा कालावधी न मिळाल्याने ते फारसे काही करू शकले नाहीत.

एकंदरीतच जुन्नरच्या निवडणुकीत मतविभागणीचा फटका कसा बसतो, याचा धडा सर्वच उमेदवारांनी अनुभवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नगरसेवक दिनेश दुबे आणि फिरोज पठाण यांनादेखील कमी मताधिक्याने निवडून यावे लागले आहे. याचा वेध घेता त्यांनादेखील आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारांवर तडीपारीचे अस्त्र

$
0
0

निवडणुकीच्या काळासाठी पुणे पोलिसांचे पाऊल

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

आगामी महापालिका निवडणुका सुरळीतपणे आणि शांततेत पार पडण्यासाठी पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर तडीपारीचे अस्त्र उगारले आहे. उपनगरातील येरवडा, हडपसर, खडकी भागातील रेकॉर्डवरील एकवीस गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये येरवडा परिसरातील गुन्हेगारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्थानिक पोलिस ठाण्यांकडून तडीपारीच्या प्रस्तावाची मोठी यादी परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्तांकडे सादर केली गेल्याचे समजते. त्यामुळे पुढील काळात तडीपारीची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षी पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. या निवडणुका सुरळीतपणे, शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपारीचे अस्त्र उगारण्यात आले आहे. परिमंडळ चारच्या उपायुक्त कल्पना बारवकर यांनी गेल्या काही महिन्यांत सुमारे एकवीस गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करून त्यांना शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. गणेशोत्सवानंतर पोलिसांनी दुपटीने तडीपारीची कारवाई केली आहे.

पोलिस उपायुक्त परिमंडळ चारच्या अंतर्गत खडकी विभागातील येरवडा, विश्रांतवाडी, खडकी, दिघी, विमानतळ आणि चंदननगर ही पोलिस ठाणी आणि वानवडी विभागात हडपसर, वानवडी, कोंढवा आणि मुंढवा अशी दहा पोलिस ठाणी आहेत. या सर्व ठाण्यांच्या हद्दीतील, निवडणुकीच्या काळात त्रासदायक ठरू शकतील आणि उपद्रवकारक असतील, अशा रेकॉर्डवरील एकवीस गुन्हेगारांना उपायुक्त बारवकर यांनी तडीपार केले आहे.

येरवडा भागातून सर्वाधिक नऊ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. खडकीतून चार, हडपसरमधून पाच, शिवाजीनगरमधून दोन आणि मांजरीतून एकाला शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. संबंधित पोलिस ठाण्याकडून हद्दीतील गुन्हेगारांची ‘कुंडली’ काढून निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी उपायुक्त कार्यालयाकडे तडीपार प्रस्तावाची मोठी यादी सादर करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत तडीपारीची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई चालू आहे. याशिवाय निवडणुकीच्या काळात उपद्रव करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या लहान-मोठ्या गुन्हेगारांवरदेखील पोलिसांची बारीक नजर राहणार आहे.
- कल्पना बारवकर, पोलिस उपायुक्त, परिमंडळ चार ,पुणे शहर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिलायन्स जिओवर मेहेरबानी कशासाठी?

$
0
0

सर्वपक्षीयांनी धरले प्रशासनाला धारेवर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरिकांचा मिळकतकर थकला तर, पालिका प्रशासन घरासमोर बँड वाजवून थकबाकी वसूल करते. असे असताना पालिकेने रिलायन्स जिओ कंपनीला दहा कोटी रुपयांची अनामत रक्कम भरण्यास सवलत कोणत्या आधारावर दिली, असा प्रश्न उपस्थित करून सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले.
या विषयी जोरदार चर्चा झाल्यानंतर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सारवासारव करून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पालिका जिओवर इतकी मेहेरबानी का करत आहे, असा प्रश्नही सभासदांनी केला. राज्य सरकारने जिओ कंपनीबरोबर केलेल्या करारानुसार रस्तेखोदाईच्या मोबदल्यात २ एमबीपीएस वेगाने इंटरनेट सेवा पालिकेला देणे आवश्यक होते. त्यासाठी जिओने पालिकेला १२३ कनेक्शन देण्याची तयारी दाखविली होती. जिओला दिलेले काम वेळेत पूर्ण न केल्याचे कारण पुढे करून दहा दिवसांपूर्वी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी कंपनीची शहरातील सर्व कामे थांबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही कंपनीने बाणेर, बालेवाडी भागात केबल टाकण्यासाठी रस्तेखोदाई केल्याचे समोर आल्याने पालिका प्रशासनाने कंपनीच्या मशिन जप्त केल्या. ही कारवाई मागे घेण्यासाठी जिओकडून विनंती करण्यात आली होती. त्यावर पा‌लिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जिओला पालिकेला इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी ३१ मार्च २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली. तसेच, २० कोटी रुपये अतिरिक्त शुल्क (अनामत) पालिकेकडे भरण्याचे आदेश दिले होते.
कंपनीने यापूर्वीच मोठ्या प्रमाणात अनामत रक्कम भरल्याचे स्पष्ट करून दंड कमी करण्याची विनंती केली. त्यावर सुनावणी घेऊन आयुक्तांनी दंडाची रक्कम १० कोटींवर आणली. आयुक्तांनी कोणत्या अधिकारात दहा कोटी रुपये स्वीकारण्याचा निर्णय घेतला अशी विचारणा करून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. सभागृह नेते शंकर केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते किशोर शिंदे, संजय बालगुडे, सुभाष जगताप यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेशनमध्ये जाण्यासाठी नवा रस्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारात प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांच्या रांगा आणि अरुंद रस्ता यामुळे संपूर्ण स्टेशन परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. येत्या काळात स्टेशनमध्ये वाहनांना प्रवेशासाठी मुख्य चौकातूनच रस्ता उपलब्ध करून दिला जाणार असल्याने येथील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
सद्यपरिस्थितीत, स्टेशनबाहेरील मुख्य चौकातून काही अंतर पुढे गेल्यानंतर डावीकडे असलेल्या प्रवेशद्वारातून (महात्मा गांधी पुतळ्यापासून) वाहने आत जातात. या ठिकाणी वाहने काटकोनात वळवावी लागतात. त्यामुळे वाहनाचा वेग मंदावून मागे वाहनांच्या रांगा लागतात. मुख्य चौकातून रस्ता उपलब्ध झाल्यानंतर वाहतुकीची परिस्थिती सुधारेल. तुकाराम शिंदे वाहनतळाजवळील चौकातून स्टेशनच्या आवारात प्रवेशासाठी एक लेन तयार केली जाणार आहे. ही लेन सध्याच्या रिक्षा स्टँडपर्यंत असणार आहे. रिक्षा स्टँडसाठी तिकीट आरक्षण केंद्राशेजारील पार्किंगच्या जागेत पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे नव्याने स्टँड उभारण्यात येत असून ते काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक (वाणिज्य) कृष्णात पाटील यांनी दिली.
रेल्वे स्टेशनच्या आवारातील दत्त मंदिराच्या मागील बाजूस पूर्वी दुचाकीचे वाहनतळ होते. या जागेवर रिक्षा स्टँड करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दौंडकरांचा मिश्र कौल

$
0
0

सत्तेचा कारभारी एक, अंकुश दुसऱ्याकडे

नरेंद्र जगताप, दौंड

नगरपालिकेत कुल-थोरात या दोन्ही गटांनी एकत्र सत्ता करण्याचा मिश्र कौल दौंडच्या मतदारांनी दिला आहे. सत्तेचा कारभारी एक, तर अंकुश दुसऱ्याकडे अशी परिस्थिती दौंड नगरपालिकेत झाली आहे. दौंडमध्ये नागरिक हित संरक्षण मंडळ, आरपीआय रासप आघाडीला नगराध्यक्षपद, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पीपल्स रिपब्लिकन आघाडी, बहुजन रयत परिषद आघाडीला सभागृहात बहुमत मिळाले. एका गटाची अवस्था ‘सिंह आला, पण गड आणि सेनापती गेला’ अशी झाली, तर दुसऱ्या गटाची अवस्था ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी झाली आहे. भारतीय जनता पक्षाने स्वबळाचा नारा दिला; पण त्यांची मजल पारंपरिक मतदारांच्या पलीकडे गेली नाही. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पानिपत झाले. मनसे, बसप आणि इतर पक्षांचे उमेदवार लढतीत खूप मागे राहिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर दौंडमधील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरलेच नाही, तेव्हाच कुल-कटारिया गटाचा सत्तेकडे जाण्याच्या वाटेतील मोठा अडथळा पार झाला. कुल-कटारिया यांनी महादेव जानकर यांची सभा न घेता स्वतः किल्ला लढवला व महत्त्वाचे पद स्वतःकडे राखले. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभा व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र अध्यक्षा चित्रा वाघ यांची पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मीनाक्षी पवार प्रचारात मागे पडल्या.

भाजपने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या जाहीर सभा घेतल्या. तसेच पुण्यातील भाजपच्या नगरसेविकांनी प्रभागफेरीही घेतली. एवढा प्रचार करून, तसेच राज्यात व केंद्रात सत्ता असूनही कमळ उमलले नाही. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या मदतीने पक्षाच्या चिन्हावर लढून पालिकेत प्रवेश केला. काँग्रेस पक्ष मात्र प्रचारापासून मतमोजणीपर्यंत ‘सायलेंट मोड’वरच राहिला.

तालुक्यातील प्रत्येक निवडणूक कुल-थोरात संघर्षाचा धागा पकडूनच होते. भले त्यांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात घेतलेला असो. भाजपच्या उपस्थितीने दोन्ही गटांची दमछाक झाली; मात्र भाजपच्या गटाला सत्तेचा दावेदार म्हणून पुढे येता आले नाही. कटारिया पितापुत्र व विद्यमान नगराध्यक्षा अंकुशा शिंदे यांचा पराभव नागरिक हित संरक्षण मंडळाला धक्का देणारा ठरला. माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे माजी नगरसेवक विलास शितोळे यांचा विजय ‘राष्ट्रवादी’साठी आनंददायी ठरला. ‘राष्ट्रवादी’चे बादशहा शेख सहाव्यांदा निवडून आले. सरनोत पती-पत्नीपैकी एक सभागृहात असतोच, ही परंपरा कायम राहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठवण टाक्यांना सरकारची स्थगिती

$
0
0

टेंडरमध्ये गैरव्यवहाराचा अनिल भोसलेंचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील समान पाणीपुरवठ्यासाठी (२४ बाय ७) राबविण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधान परिषदेत करण्यात आल्याने संपूर्ण चौकशी होईपर्यंत पुढील प्रक्रियेला स्थगिती देण्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केले. शहरात ८२ टाक्या बांधण्याचे काम यापूर्वीच सुरू झाले असून, सरकारच्या आदेशामुळे कामात खंड पडण्याची भीती आहे. शहरात साठवण टाक्या उभारण्याबाबतच्या निविदेत गैरव्यवहार झाले असून, चुकीच्या पद्धतीने सर्व प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली. टाक्यांच्या टेंडर प्रक्रियेला चुकीच्या पद्धतीने मुदतवाढ देण्यात आली असून, टाक्या उभारण्यात येणाऱ्या सर्व जागा अद्याप पालिकेच्या ताब्यात आल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कडे सभागृहाचे लक्ष वेधले. या प्रकरणाची चौकशी करून प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणीही त्यांनी केली. पुण्यातील काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे आणि अनंत गाडगीळ यांनीही लक्षवेधीवरील चर्चेत भाग घेतला. या सर्व प्रक्रियेची सविस्तर चौकशी करण्याची मागणी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. तर, संपूर्ण प्रक्रिया सदोष पद्धतीने राबवली गेल्याने त्याची चौकशी सीआयडीमार्फत केली जावी, अशी मागणी रणपिसे यांनी केली.
सदस्यांच्या मागणीनुसार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. तरीही, सदस्यांचे समाधान झाले नाही. संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करावा आणि मगच पुढील निर्णय घेण्यात यावा, अशी बाजू विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही मांडली. ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद असल्याचे समोर येत असल्याने त्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशा सूचना उपसभापतींनी केल्या. त्यानुसार, संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती देऊन चौकशी करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी जाहीर केले. तसेच, या प्रक्रियेत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले.

‘प्रक्रिया योग्य पद्धतीनेच’
विधान परिषदेत नगरविकास राज्यमंत्र्‍यांनी टाक्यांच्या प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा शेडगे यांनी त्याबाबत विचारणा केली असता, आमदार भोसले यांच्या लक्षवेधीवर नगरविकास राज्यमंत्र्‍यांनी आदेश दिले असले, तरी अद्याप पालिकेला कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याचा खुलासा पाणीपुरवठा विभागप्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी केला. तसेच, साठवण टाक्यांच्या सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली असल्याचा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिका केकचे वैविध्यपूर्ण प्रकार

$
0
0

‘मटा कल्चर क्लब’च्या सभासदांना मिळणार सवलत
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
डिसेंबर महिना खास असतो तो ख्रिसमसकरिता. याच ख्रिसमसच्या निमित्ताने केक पार्टीही उत्साहात आयोजित केल्या जातात. जर हाच केक आपल्या हाताने बनवलेला असेल, तर नक्कीच हा ख्रिसमस आपल्यासाठी स्पेशल होईल. याचकरिता खास केक बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या १८ डिसेंबर रोजी चिंचवडच्या तानाजीनगर येथील आनंदीबाई डोके सभागृहात रविवारी दुपारी ३ ते ५ या वेळात ही कार्यशाळा घेण्यात येईल.
सदर कार्यशाळेत एकूण चार प्रकारचे केक प्रत्यक्ष शिकवले जातील. तसेच आणखी काही केकच्या प्रकारांची माहितीही दिली जाणार आहे. या कार्यशाळेत चीज केक, एग्जलेस स्पंज केक, एग्जस्पंज केक आणि वाटी केक हे प्रकार शिकवले जाणार आहेत. शिवाय तयार झालेला केक दिसायलाही कसा सुंदर आणि आकर्षक असेल याचीही माहिती या कार्यशाळेत अनुभवता येईल.
घरच्या घरी केक कसा बनवता येईल यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वैशाली पावनसकर या ही कार्यशाळा घेणार आहेत. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून यासाठी प्रवेशमूल्य असणार आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सदस्यांना विशेष सवलत असणार आहे. अधिक माहितीसाठी ९९७५४०४०२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट महोत्सव यंदा पर्यावरणपूरक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील चित्रपटप्रेमींसाठी मेजवानी ठरणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पर्यावरण या संकल्पनेभोवती गुंफण्यात आला असून, त्यात जगभरातील २०० हून अधिक दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. १२ ते १९ जानेवारी दरम्यान हा महोत्सव पुणे आणि पिंपरी- चिंचवड येथील चित्रपट गृहांमध्ये रंगणार आहे. विविध विभागांमध्ये चित्रपटांची विभागणी करण्यात आली आहे.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या १५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी घोषणा केली. चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण या वेळी करण्यात आले. महोत्सवाचे उपाध्यक्ष समर नखाते, सचिव रवी गुप्ता, डॉ. मोहन आगाशे, विठ्ठल मणियार, डॉ. सतीश आळेकर, मकरंद साठे, अभिजित रणदिवे आदी उपस्थित होते.

महोत्सवाच्या मुख्य विभागात पर्यावरणावर आधारित आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. त्यामध्ये चित्रपट आणि माहितीपटांचा समावेश असेल. त्याचबरोबर सामाजिक जनजागृती विभागात देखील काही दर्जेदार चित्रपटांचा नजराणा पुणेकरांना मिळणार आहे. महोत्सवात यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच ग्रेशिया लॉर्का या स्पॅनिश कवी, नाटककार यांच्या साहित्यावर आधारित काही चित्रपटांचा नजराणा मिळणार आहे. भारत आणि स्पेन यांच्या संबंधांना या वर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने यंदाच्या महोत्सवात हे चित्रपट दाखवण्यात येतील शिवाय महोत्सवात काही स्पॅनिश नृत्यप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. ज्युरींनी निवडलेले आणि पुरस्कार मिळालेले चित्रपट चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहेत.

स्पर्धात्मक विभागामध्ये यंदा जागतिक चित्रपट, मराठी चित्रपट आणि फोक्सवॅगन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट अशा विभागांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या स्पर्धेमध्ये यंदा १४हून अधिक चित्रपट स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

‘सेव्ह द अर्थ, इट्स नॉट ओन्ली प्लॅनेट दॅट मेक्स फिल्म्स’अशी यंदाच्या चित्रपट महोत्सवाची थिम असून, चित्रपट आणि करमणुकीच्या माध्यमातून पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्याचे ध्येय आहे. पर्यावरणाशी संबंधित असे चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत, असे महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना केवळ ६०० रुपयांमध्ये हा महोत्सव पाहता येणार आहे. तर, इतर रसिकांना ८०० रुपयांमध्ये महोत्सव पाहता येईल. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली असून www.piffindia.com या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. २९ डिसेंबरपासून चित्रपटगृहांवर प्रवेशिकांची विक्री सुरू होणार आहे.

येथे रंगणार चित्रपट महोत्सव...

शहरातील सिटी प्राइड (कोथरूड), सिटी प्राइड( आर डेक्कन), सिटी प्राइड (सातारा रस्ता), मंगला मल्टीप्लेक्स, आयनॉक्स बंड गार्डन रस्ता, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) तसेच पिंपरी- चिंचवड येथील चित्रपटगृहांमध्ये एकूण १३ स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील काही चित्रपटगृहांमध्ये चित्रपट दाखवण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती झालीच तर राज्यासाठी होईल

$
0
0

पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम; डॉ. कोल्हे यांची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘युती झाली तर ती संपूर्ण महाराष्ट्रात आणि समविचारी पक्षाशीच... हा​ निर्णयही पक्षप्रमुखच घेतील,’ असे शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ अमोल कोल्हे यांनी स्पष्ट करून दोन्ही बाजूंचा सन्मान आणि आदर राखला गेला पाहिजे असे ठणकावले.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी डॉ. कोल्हे शहरात आले आहेत. या वेळी त्यांनी उमेदवार निवडीचे निकष, युती आणि शिवसेना, पक्षापुढील पर्याय याविषयी संवाद साधला. ‘‘विधानसभा निवडणुकांपासून शिवसेनेची ताकद वाढली आहे. पुण्यात सर्वच प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुकांशी संवाद साधण्यात येत आहे. उमेदवारी देताना पक्ष संघटनेतील सक्षम, निष्ठावान शिवसैनिकांचा विचार प्रामुख्याने करण्यात येईल. प्रभागाची माहिती, अभ्यासू आणि जनसंपर्क हे देखील निवडीचे प्रमुख निकष असतील. मुलाखती तीन दिवस चालणार आहेत. त्यानंतर आम्ही इच्छुकांची संभाव्य यादी पक्षसचिवांना सादर करू. त्यानंतर पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेतील. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेची पहिली यादी जाहीर होईल,’ असे कोल्हे म्हणाले. ‘युती झाली तरी ती संपूर्ण राज्यात होईल, हे. पक्षप्रमुखांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. युतीचा निर्णय तेच घेतील. युती समविचारी पक्षांशीच होईल,’ हे सांगतानाच कोल्हेंनी मनसेबरोबर युतीची शक्यता फेटाळून लावली.

‘मेट्रोच्या कार्यक्रमात ठाकरे हवेत’
पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ डिसेंबरला मुंबई आणि पुणे दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सहभाग आवश्यक आहे. युती असल्याने शिवसेनेलाही तेवढाच सन्मान मिळाला पाहिजे, अशी भूमिका आमदार डॉ. गोऱ्हे यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images