Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आजपासून ‘स्वराभिषेक’

0
0

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ला होणार सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये जगभरात नावाजलेल्या, प्रतिष्ठित अशा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज, बुधवारपासून प्रारंभ होत आहे.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६४ वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेच्या मैदानावर रंगणार आहे. त्यामुळे कानसेनांसाठी पुढील पाच दिवस स्वराभिषेकाचे ठरणार आहेत. महोत्सवाची सुरेल सुरुवात उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य एस. बल्लेश आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा बल्लेश यांच्या प्रसन्न सनईवादनाने होणार आहे.
महोत्सवाची सारी तयारी पूर्ण झाली असून, ८० हजार चौरस फुटांचा मांडव घालण्यात आला आहे. आठ ते दहा हजार श्रोते बसू शकतील, अशी त्याची रचना आहे. दोन वर्षांपूर्वी मेघमल्हार रंगल्याने महोत्सव पुढे ढकलावा लागला होता. त्यामुळे पावसाची शक्यता गृहित धरून संपूर्ण मांडव पत्र्यांनी आच्छादित करण्यात आला आहे. पाऊस आला तरी त्यामुळे महोत्सवात व्यत्यय येणार नाही. बाजूची व्यवस्थाही झाकण्यात आल्याने ऊन किंवा पावसाचा त्रास होणार नाही, अशी खबरदारी घेण्यात आल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, नवीन मराठी शाळा आणि महोत्सवाचे प्रवेशद्वार या दरम्यानच्या रस्त्याचे काम चालू असल्याने हा रस्ता पोत्यांनी झाकला आहे. या रस्त्यावर पावसाळ्याप्रमाणेच अवस्था असून, नारायण पेठेच्या बाजूचा रस्ता खोदून ठेवल्याने काही प्रमाणात त्रास करावा लागू शकतो.

आज महोत्सवात
उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य एस. बल्लेश आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा बल्लेश यांचे सनई वादन, गौरी पाठारे यांचे गायन, इमदादखानी घराण्याचे उस्ताद इमरत खान यांचे चिरंजीव आणि शिष्य उस्ताद इर्शाद खान यांचे ‘सूरबहार’ या सतारीशी मिळत्या-जुळत्या वाद्याचे सादरीकरण, पं. गणपती भट यांचे गायन
...
‘स्वररंगी आशा’तून उलगडणार स्वरप्रवास
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात यंदा ‘स्वररंगी आशा’ या कॅलेंडरमधून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा थक्क करणारा स्वरप्रवास उलगडला जाणार आहे.
प्रसिद्ध छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या कल्पनेतून ‘स्वररंगी आशा’ कॅलेंडर साकार झाले आहे. पाकणीकर यांनी गेली १४ वर्षे संगीतावरील विविध विषयांवरच्या कॅलेंडरची निर्मिती केली आहे. यंदा आशा भोसले यांना डोळ्यासमोर ठेवून कॅलेंडरची निर्मिती करण्यात आली आहे. सवाई महोत्सवाला येणाऱ्या रसिकांना या कॅलेंडरचे आकर्षण असते.
‘गेली ६८ वर्षे व्यापून राहिलेला अलौकिक स्वर म्हणजे आशा भोसले. आशा भोसले यांच्या सुरेल, दमदार वाटचालीला मानाचा मुजरा करण्यासाठी स्वररंगी आशा हे थीम कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत त्या अखंडपणे सात दशके गात आहेत. श्रीमती भोसले यांनी १९४८मध्ये चुनरिया या चित्रपटातून पार्श्वगायनाचा श्रीगणेशा केला. भोसले यांच्या अकरा हजार गाण्यांची नोंद झाली असून, तो एक विश्वविक्रम ठरला आहे. स्वररंगी आशा ही केवळ झलक आहे. दुःख, संघर्ष, साहस, यश, कीर्ती, संपत्ती आणि दिव्य संगीताची ही सदाबहार सप्तरंगी कहाणी असून, त्यांच्यातील स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा करण्याचा हा प्रयत्न आहे,’ असे पाकणीकर यांनी सांगितले.

अनुनाद या संस्थेने कॅलेंडरची सुबक मांडणी केली आहे. दिशा ऑफसेट यांनी आर्ट पेपरवर केलेली उत्तम छपाई, दर्जेदार बांधणी ही या कॅलेंडरची खास वैशिष्ट्ये आहेत. कॅलेंडरचे प्रकाशन सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात आज, बुधवारी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोगस प्रवेशांना अटकाव

0
0

एकसारखी कामकाज प्रणाली वापरण्याचे कॉलेजांना आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॉलेज स्तरावरील बोगस प्रवेश रोखण्यासाठी सर्व कॉलेजांची कामकाजाची प्रणाली एकसमान करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने दिला आहे. विभागाचे सहायक कुलसचिव उत्तम चव्हाण यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले असून नगर, नाशिक, आणि पुणे जिल्ह्यांतील सर्व कॉलेजांचा यात समावेश आहे.
कॉलेज पातळीवर मोठ्या प्रमाणात बोगस प्रवेश दिले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्व कॉलेजांना प्रवेश प्रक्रियेसाठी एकसारखी कम्प्युटर सिस्टीम उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता विद्यापीठाशी संलग्न कॉलेजे, शैक्षणिक संस्था या सर्वांना एकसारखी कम्प्युटर सिस्टीम वापरण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे कोणत्याही कॉलेजने विद्यार्थांचे प्रवेश किंवा अंतर्गत कामकाजासाठी निविदा प्रक्रिया राबवू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या सिस्टीमद्वारे कॉलेजांना सेवा पुस्तकांची माहिती, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांची विविध प्रकारची वर्गीकृत माहिती, स्कॉलरशिपकरिता कॉलेजांकडून सरकारला वेळोवेळी लागणारी आर्थिक बिले, विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली, शिक्षकांचे वेतन बायोमेट्रिक प्रणालीशी जोडणे, रिंअलटाइम वर्कलोड अपलोड करणे आदी माहिती सरकारला पुरविणे बंधनकारक केले आहे.

‘सर्व माहिती सरकारला मिळणार’
काही कॉलेजांमध्ये अंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात होती. त्यावर आता या प्रणालीमुळे अटकाव येणार आहे. त्याचा फायदा बोगस प्रवेश प्रक्रिया थांबविण्यासाठी होईल. सर्वच कॉलेजांची अंतर्गत माहिती सरकारला उपलब्ध होणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका निवडणकीची जबाबदारी बापटांकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पुणे महापालिकेसह अन्य महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचाही कार्यभार बापट यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली होती. त्यापाठोपाठ आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही सत्ता मिळविण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. ज्येष्ठ नेते बापट यांच्याकडे या निवडणुकांची सूत्रे देण्यात येणार आहेत. मात्र, बापट यांच्याकडे अन्य विविध खात्यांची जबाबदारीही आहे. त्या पार्श्वभूमीवर बापट यांच्याकडे असलेली विधिमंडळ कामकाज खात्याची जबाबदारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनापुरती ही व्यवस्था असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. दरम्यान, आपली प्रकृती ठणठणीत आहे, असे बापट यांनी नमूद केले आहे. ‘नगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजपने बाजी मारली असून यापुढील काळात जिल्ह्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकीतही भाजपचीच सत्ता आणण्यासाठी सर्व शक्ती एकवटून काम करण्यात येईल,’ असे बापट म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंगल ट्रेकिंगला प्रोत्साहन

0
0

प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी वन विभाग पर्यटकांची मदत घेणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जंगलांमधील वन्यप्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी वन विभागाने गिर्यारोहक आणि पर्यटकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जंगलातील पदभ्रमंतीला प्रोत्साहन, गावकऱ्यांना रोजगार आणि वनक्षेत्रात नियमित गस्त या तिहेरी उद्देशाने पुणे आणि कोल्हापूर वन विभागातर्फे जंगल ट्रेकिंगला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असलेला आशियातील सर्वांत मोठा वाघ जय असो की राज्यातील इतर व्याघ्र प्रकल्पांमध्ये झालेल्या शिकारी, जंगलातील गैरप्रकार शोधून त्याला आळा घालण्यासाठी हौशी निसर्गप्रेमी आणि पर्यटकांचा नेहमीच पुढाकार असतो. जंगलातील भटकंतीदरम्यान ही मंडळी सतर्क असल्याने वनाधिकाऱ्यांना सतत वन्यजीवांशी निगडीत घडामोडी कळतात. निसर्ग पर्यटक जंगलात गस्त आणि देखरेख करण्यासाठी उत्तम पर्याय ठरत असल्याचे समोर आले आहे. याची दखल घेऊन पुणे वन विभाग तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी निसर्गप्रेमींचे सहकार्य घेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विस्तीर्ण असून, एका बाजूने कोकणातील डोंगररांगांनी व्यापला आहे. प्रकल्पामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचा समावेश होतो. या भागात काही ठिकाणी परंपरागत शिकारी करणाऱ्या समूहाचे वास्तव्य आहे. शिवाय बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या टोळ्याही सक्रिय आहेत. दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या या वनक्षेत्रात गस्त घालणे सोपे नाही. तस्करांपासून जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही वनक्षेत्रात गिर्यारोहण मोहिमा आयोजित करण्याचे नियोजन केले आहे,’ अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी सांगितले.
वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार कोकणाकडे जाणाऱ्या काही मार्गांवर वन्यप्राण्यांच्या शिकारी होत असल्याचा संशय आहे. या मार्गावर वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय परिसरात गिर्यारोहकांचा वावर वाढल्यास चोरांवर नियंत्रण येईल. स्थानिक गावकऱ्यांशी आमची चर्चा झाली असून, रोजगार मिळणार असल्याने गिर्यारोहकांची राहाण्याची सोय आणि मार्गदर्शन करण्यास ते इच्छुक आहेत, असेही बेन म्हणाले.

‘भीमाशंकर’ ट्रेकला चांगला प्रतिसाद
दरम्यान, पुणे वन्यजीव विभागानेही स्थानिकांना रोजगार आणि शहरातील पर्यटकांना जंगलाकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने भीमाशंकर अभयारण्यामध्ये जंगल ट्रेकिंगला सुरुवात केली आहे. वेल्होळी ग्रामपरिसर विकास समितीच्या सहभागातून वनाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात भीमाशंकर अभयारण्यात वांद्रे ते भोरगिरी दरम्यान नुकताच ट्रेक आयोजित केला होता. सर्व वयोगटातील नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जंगलातील भटकंती दरम्यान खूप काही शिकायला मिळते. वनसंपदेबरोबरच, पक्षी निरीक्षणाच्या अनुभवातून निसर्गाचे आकर्षण वाढते. वन विभागातर्फे दरमहा भीमाशंकरमधील वेगवेगळ्या वाटांवर ट्रेक आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून गावकऱ्यांना रोजगार, जंगलात गस्त आणि पर्यटकांना ताज्या हवेत फिरण्याचा अनुभव मिळेल.
सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक, पुणे वन्यजीव विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारजे परिसरात गाड्यांची तोडफोड

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारजे परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये सोमवारी तुंबळ मारामारी झाली. त्यानंतर टोळक्यांनी येथील गाड्यांची तोडफोड केली. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील २२ ते २३ जणांवर गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी तेरा जणांना अटक करण्यात आली आहे.
अक्षय शिंदे (वय २६) याने दिलेल्या तक्रारीवरून सुजर चंद्रकांत टिपरे (वय २१), शुभम चंद्रकांत टिपरे (वय १८), निहाल रवींद्र शिंदे (वय१८), सुमीत गणेश आसनले (वय २०), कुशाल किसन पवार (वय १९, सर्व रा. वारजे) यांना अटक करण्यात आलीआहे. अजूनही पाच ते सहा जणांचा शोध सुरू आहे. बाळासाहेब लोंढे (वय ४७, रा. यशोदा निवास, वारजे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगेश विजय जडीतकर (वय १९), तुषार अनिल निर्मल (वय २१, रा. सहयोगनगर, वारजे), अनंतर दीपक गांडळे (वय १९, गोकुळनगर), अमित शहाजी ढगे (वय १८) बाजाली गुलाब मुळे (वय २१), संदीप रामसिंग राजपूत (वय २७) नारायण भीमराव हिंगे (वय २५), अजय भरत शिंदे (सर्व रा. वारजे) यांना अटक करण्यात आली आहे. तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन गटांमध्ये वादावादी सुरू होती. रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास सूरज टिपरे आणि त्याच्या साथीदारांनी यशोदीप चौकात जाऊन आरडाओरडा करीत दहशत निर्माण केली. त्यामध्ये त्यां शिंदेच्या दोन मोटारसायकलची तोडफोड केली. ही माहिती मंगेश जडितरकर, तुषारला मिळाली. त्यांनी साथीदारांना बोलावून घेऊन वारज्यातील चैतन्य चौकात हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली आणि लाकडी दांडक्याने कार, टेम्पोची तोडफोड केली.

पोलिसांचा धाकच नाही
वारजे परिसरात काही दिवसांच्या अंतराने दोन गटात मारामारीचे प्रकार सुरू आहेत. दोन महिन्यांपूर्वी वारज्यात अशाचप्रकारे दोन गटाच्या भांडणात गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. यात सुमारे १० ते १५ वाहनांची तोडफोड केली होती. किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वादातून थेट तोडफोड होत असल्याने सामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर धाक नसल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध कार्यक्रमांनी महामानवाला अभिवादन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६०व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. विविध पक्ष, संघटना, सामाजिक आणि सेवाभावी संस्थांद्वारे आयोजित कार्यक्रमांतून महामानवाच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
महापौर प्रशांत जगताप आणि उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी नगरसेविका लता राजगुरू, लक्ष्मी घोडके, क्षेत्रीय अधिकारी संजय गावडे उपस्थित होते.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शहर उपाध्यक्ष अजित दरेकर, मुख्तार शेख यांनी आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या वेळी हाजी नदाफ आणि विनायक मुळे यांनी डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि राज्यघटनेचा मसुदा याविषयी मार्गदर्शन केले. माजी नगरसेवक नारायण चव्हाण, नगरसेविका लता राजगुरू, सचिन आडेकर आदी या वेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागासवर्गीय विभाग आणि सुनेत्रा पवार सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रतिष्ठानच्या सिंहगड, खडकवासला, धायरी, कोथरूड, डेक्कन शाखांच्या वतीने नेत्रचिकित्सा शिबिर आणि अंधांना चष्मे आणि काठी वाटप करण्यात आले. औंध आणि वाघोली शाखेच्या वतीने व्यसनमुक्ती अभियान घेण्यात आले. उंड्री-पिसोळी, मांजरी आणि देवाची उरुळी शाखेतर्फे मुलींच्या मातापितांचे सत्कार करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन सोनावणे, भट राज, प्रदीप दिवेकर या वेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे स्टेशन जवळील आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या वेळी सोनू काळे, संतोष बनसोडे, पोपट कांबळे आदी उपस्थित होते. रिपब्लिकन जनशक्तीच्या पुणे शहर जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी अशोक माने, रवींद्र लोंढे, रविंद्र चाबूकस्वार उपस्थित होते. महाराष्ट्र जोशी संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कैलास हेंद्रे यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. सुरेखा हेंद्रे, श्रीकांत हेंद्रे, कैलास तापकीर, ज्ञानेश्वर माळी आदी उपस्थित होते.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चिटणीस राहुल तायडे यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी शंकर राठोड, अरूण वाघमारे, प्रकाश बर्गे, अनिल देशमुख आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागातर्फे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. अनिल पाटील, महेंद्र कांबळे, हर्षद शेख आदी उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीने अध्यक्ष बी. बी. जगताप यांच्या हस्ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. दलातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली होती. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष के. बी. मोटघरे यांनी हार अर्पण केला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दलित पँथर, एमआयएम, समता सामाजिक संस्था, भारतीय जनता पक्ष डेक्कन मॉडेल कॉलनी, संदीप चव्हाण आणि मित्रपरिवार, भीमशक्ती पुणे शहर, शौर्य प्रतिष्ठान अशा विविध संस्थातर्फे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. नूमवी प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मुख्याध्यापिका संजीवनी ओमसे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. ज्येष्ठ पर्यवेक्षक आ. वा. घोलप यांनी विद्यार्थ्यांना आंबेडकर यांनी दलितांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. सुनीता बुरकुले यांनीही मार्गदर्शन केले.
भारिप बहुजन महासंघातर्फे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या सभेला अॅड. वैशाली चांदणे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी अनिल गायकवाड, हनुमंत फडके, दीपक कदम, नरहर भोसले आदी उपस्थित होते.
साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा पुणेचे अध्यक्ष कृष्णा मोटघरे, ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा, नरेंद्र व्यास, शैलजा जगताप, संगीता अत्रे, जयश्री पाटील यांनी आंबेडकर यांचे सामाजिक सुधारणेतील योगदान आणि संपूर्ण जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडला. चंद्रकांत दरोडे विद्यालय, हुतात्मा राजगुरु विद्यालयातील विद्यार्थी उपक्रमात सहभागी झाले होते. बाबासाहेबांना आवडणारी पुस्तके व ग्रंथ, त्यांनी गाजविलेल्या सभांची क्षणचित्रे, त्यांचे योगदान असलेल्या स्वातंत्र्यलढयातील दुर्मिळ छायाचित्रे आणि त्यांच्या विविध वस्तू संग्रहालय सफरीच्या माध्यमातून पाहताना विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य जाणून घेतले.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालयात सुनील बोरोले यांच्या हस्ते आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. शहर उपाध्यक्ष शंकर शिंदे, वैजनाथ वाघमारे, पंडित कांबळे, अविनाश वेल्हाळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विश्व मैत्री यात्रे’चे आज शहरात स्वागत

0
0

हजार दिवसांमध्ये ७५ देशांमध्ये जाणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महात्मा गांधींच्या विचारांची प्रेरणा घेऊन वर्धा येथील ज्ञानेश्वर यवतकर, नगर येथील नितीन सोनवणे आणि अजय हापसे यांनी ‘विश्व मैत्री सायकल यात्रे’ची सुरुवात केली आहे. आज, बुधवारी (सात डिसेंबर) सायंकाळी सहा वाजता कोथरूड येथील महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या सभागृहात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सायकल यात्रा संयोजन समितीचे सदस्य अतुल पोटफोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘युध्दमुक्त, हिंसामुक्त, द्वेषमुक्त समाजाचे स्वप्न घेऊन ही यात्रा १०९५ दिवस ७५ देशांमध्ये ७५ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यात्रेची सुरुवात १८ नोव्हेंबर रोजी सेवाग्राम आश्रम वर्धा येथून झाली. आशिया खंडाचा प्रवास पूर्ण करून ही यात्रा अमेरिका, कॅनडा, लॅटिन अमेरिका, युरोप तसेच आफ्रिका खंडाचा प्रवास करणार आहे. पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे दोन ऑक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त या यात्रेचा समारोप होणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी सर्व्हे फाउंडेशन, बर्लिन-जर्मनी व दिल्ली येथील गांधी स्मृती दर्शन या संस्थांचे सहकार्य या उपक्रमास लाभले आहे,’ असे पोटफोडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोवर आज उमटणार अंतिम मोहोर?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो प्रकल्पावर आज, बुधवारी केंद्र सरकारकडून अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या प्रस्तावाला पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिली असून बुधवारी (७ डिसेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर डिसेंबर अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचे भूमिपूजन केले जाणार आहे.

केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर नगरविकास आणि अर्थ मंत्रालयानेही मेट्रोच्या प्रस्तावाला ‘ग्रीन सिग्नल’ दिला होता. त्यामुळे, मेट्रोचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर केव्हाही दाखल होईल, अशी शक्यता होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज, बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रोचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अर्थ मंत्रालयाच्या मान्यतेनंतर नगरविकास विभागाने मेट्रोचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला होता. पंतप्रधान कार्यालयानेदेखील या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर होईल, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली.

पंतप्रधान २४ डिसेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार असून, त्याचवेळी मेट्रोचे भूमिपूजन केले जाईल, असे भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बीडकर यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७मध्ये होणाऱ्या निवडणुकांची आचारसंहिता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मेट्रोचे भूमिपूजन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेच्या ट्रॅकवर फसलेल्या मेट्रोला या निमित्ताने गती मिळण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर राज्य सरकारने यापूर्वी निश्चित केल्यानुसार सुरुवातीच्या टप्प्यात नागपूर मेट्रोतर्फे पुण्याच्या मेट्रोचे काम केले जाणार आहे. त्यानंतर, राज्यातील सर्व प्रकल्पांसाठी महामेट्रो ही कंपनी अस्तित्वात आल्यानंतर मेट्रोचे काम त्यांच्यामार्फत केले जाईल. पुण्यात पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे ३१ किलोमीटरचे दोन मार्ग पहिल्या टप्प्यात विकसित केले जाणार आहेत. त्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट हा सुमारे पाच किलोमीटरचा मार्ग भुयारी असेल.

‘एनजीटी’समोरही आज सुनावणी

पुणे मेट्रोच्या नदीपात्रालगतहून जाणाऱ्या मार्गावर आक्षेप घेऊन त्याविरोधात ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा’कडे (एनजीटी) याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील, पुढील सुनावणी आज, बुधवारी होणार असून, सर्व पुणेकरांचे त्याकडेही लक्ष लागले आहे. नदीपात्रातून जाणाऱ्या मेट्रो मार्गामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. त्या संदर्भातील जैवविविधता समितीचा अहवाल ‘एनजीटी’समोर सादर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपंगांकडे काणाडोळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अपंग व्यक्तीला रस्त्यावरून चालण्यापासून सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमधून प्रवास करण्यापर्यंत सर्वच ठिकाणी सोयीचे वातावरण निर्माण करण्यात यंत्रणांना अपयश आले आहे. परिणामी, अपंग व्यक्तीला एकट्याने प्रवास करताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.

अपंग पुनर्वसन परिषद कायदा १९९२ आणि अपंग व्यक्ती समान संधी, हक्क संरक्षण व पूर्ण सहभाग कायदा १९९५ यामध्ये अपंगांना सार्वजनिक जीवनात सहजसाध्य सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. त्यामध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या अपंगांसाठी चौकांमध्ये ध्वनिवर्धक किंवा विशिष्ट शिट्टी वाजवून सिग्नल लागल्याची किंवा सुटल्याची सूचना करणे अपेक्षित आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये उदाहरणार्थ बसमध्ये, रेल्वेत चढताना दरवाजामध्ये हँडल लावलेले असावे. कमी पायऱ्या असाव्यात. बसमध्ये सीट राखीव असाव्या. रेल्वेत स्वतंत्र डबा असावा, आदी तरतुदी आहेत. रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या कडेला (ट्रॅकच्या बाजूस) खडबडीत फरशी बसविणे बंधनकारक आहे. जेणेकरून अंध व्यक्तींना प्लॅटफॉर्मवरून चालताना त्याचा फायदा होईल. सार्वजनिक वाहतुकीत अपंगांना अडथळाविरहित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशा विविध तरतुदी केल्या आहेत. मात्र, यातील बहुतांश तरतुदी केवळ कागदावर आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये अपंगांसाठी राखीव असलेल्या सीटवर बसण्यासाठी सामान्य माणसालाही कसरत करावी लागते. बहुतांश बसमध्ये राखीव सीट ड्रायव्हरच्या मागील बाजूस, म्हणजेच बसच्या पुढील चाकाच्यावर असते. त्यामुळे हे सीट अन्य सीटच्या तुलनेत अधिक उंच असते. बसमध्ये गर्दी असताना सामान्य प्रवाशांनाही त्या सीटवर बसणे अवघड होते किंवा बसलेल्या प्रवाशाला उतरताना अडचण होते. या परिस्थितीत अपंग व्यक्तीला त्या सीटचा काही उपयोग होत नाही. लोकलमध्ये अपंगांसाठी आरक्षित डबा आहे. मात्र, त्यामध्ये सामान्य प्रवासी अतिक्रमण करतात. तसेच, बहुतांश स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर ट्रॅकच्या बाजूला खडबडीत फरशी बसविलेली नसल्याचे दिसून येते. चौकांमध्ये ध्वनिवर्धकाद्वारे सूचना दिल्या जात नाहीत.


बसखरेदी करताना घ्या काळजी

‘पीएमपी’च्या अनेक बसच्या दाराचे हँडल तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच, बसमध्ये उभ्या राहणाऱ्या प्रवाशांसाठी असलेले हँडलही मोठ्या प्रमाणावर तुटल्याचे दिसून येते.

सध्या ‘पीएमपी’कडून नवीन बस खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या बसमध्ये अपंगांसाठी आवश्यक सुविधांचा समावेश केला पाहिजे.

बसमध्ये चढताना कमी पायऱ्या असाव्यात. दारामध्ये हँडल बसविलेले असावे. आरक्षित सीट उंचीवर नको. येणाऱ्या बस स्टॉपची माहिती देण्यासाठी बसमध्ये ध्वनी यंत्रणा हवी, आदी सुविधा पीएमपी प्रशासनाने दिल्या पाहिजेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्राची मंजूरी

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजूरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाला ऑक्टोबरमध्ये सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने मंजूरी दिली होती.

केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर नगरविकास आणि अर्थ मंत्रालयानेही मेट्रोच्या प्रस्तावाला ‘ग्रीन सिग्नल’ दिला होता. त्यामुळे, मेट्रोचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर केव्हाही दाखल होईल, अशी शक्यता होती.

असा असेल पुणे मेट्रोचा पहिला टप्पा

- पुण्यात दोन कॉरिडॉर उभारले जातील. १६.५९ किलोमीटरचा पहिला कॉरिडॉर (टप्पा) पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असा असेल. तो पूर्ण होण्यास चार वर्षे लागतील.

- या मार्गावर १५ स्थानके असतील. तर पाच किलोमिटर भुयारी मार्ग असेल. पुणे मेट्रोसाठी प्रवासभाडे किमान दहा रुपये आणि कमाल ५० रुपये असेल.

- दुसरा कॉरिडॉर (टप्पा) हा कोथरूड भागातील वनाज ते येरवडा भागातील रामवाडीपर्यंत असेल. १४.७ किलोमीटरच्या या मार्गावर सोळा स्थानके असतील.
मात्र हा संपूर्ण मार्ग जमिनीवर असेल. दुसरा कॉरिडॉर पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागेल.

मेट्रोसाठी १२ हजार २९८ कोटींचा खर्च

मेट्रोच्या या संपूर्ण प्रकल्पासाठी १२ हजार २९८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

- केंद्र सरकारचा २० टक्के हिस्सा (२,११८ कोटी रुपये)

- २० टक्के हिसा (२,४३० कोटी रुपये) महाराष्ट्र सरकारचा असेल.

- स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकांचा दहा टक्के (१,२७८ कोटी रुपये) असेल,
- तर ५० टक्के रक्कम (६,३२५ कोटी रुपये) कर्जातून उभारली जाईल.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) पुणे मेट्रोचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा कार्यभार देण्याची बागुल यांची मागणी

0
0

पुणे : महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘रेव्हेन्यू कमिटी’साठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे वेगळेच काम सोपविण्यात आले असून, त्यांना पुन्हा लेखा व वित्त विभागाचे कामकाज दिले जावे, अशी आग्रही मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केली.

महापालिकेचे उत्पन्नवाढीचे नवे स्रोत शोधणे, जमा व खर्चाचा योग्य पद्धतीने ताळमेळ साधणे, उत्पन्न स्रोतांमधील गळती शोधणे आणि उत्पन्नवाढीसाठी व्यवहार्य उपाययोजना करणे, यासाठी रेव्हेन्यू कमिटीची स्थापना केली आहे. त्यासाठी, उपायुक्त दर्जाचा अधिकारी असावा, याकरिता राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात आल्याचे बागुल यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, सरकारने तुषार दौंडकर यांनी प्रतिनियुक्तीवर वित्त व लेखा विभागात नेमणूक केली असली, तरी त्यांच्याकडे क्रीडा व भांडार विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. सुधारित आकृतीबंधानुसार लेखा व वित्त विभागात दोन मुख्य लेखा अधिकारी या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे, दौंडकर यांची नेमणूक लेखा व वित्त विभागासाठी झाली असताना, त्यांच्याकडे इतर कार्यभार देणे सर्वस्वी चुकीचे असल्याची टीका बागुल यांनी केली आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यासाठी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी नवे मार्ग शोधण्याकरिता, स्वतंत्र अधिकारी असणे गरजेचे असल्याने दौंडकर यांची नियुक्ती लेखा व वित्त विभागातच केली जावी, अशी मागणी बागुल यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमसंबंधातून भाची-काकाची आत्महत्या

0
0

पिंपरी : प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने २५ वर्षांच्या विवाहित तरुणाने अल्पवयीन प्रेयसीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणातील प्रेयसी प्रियकराच्या मेहुणीची मुलगी आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना देहूगाव येथे उघडकीस आली. यामुळे देहूगाव परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी मंगळवारी देहूरोड पोलिस ठाण्यात दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे आणि तिच्या मावशीच्या नवऱ्याचे म्हणजेच काकाचे प्रेमसंबंध होते. देहूगाव परिसरात ते राहत होते. मंगळवारी मुलगी घरातून आपल्या काकासोबत निघून गेली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नव्हती. त्यामुळे तिच्या नातेवाइकांनी बेपत्ता असल्याची तक्रार देहूरोड पोलिस ठाण्यात दिली होती. ती काकाबरोबर असण्याची शक्यताही तक्रार देताना कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. बुधवारी दुपारी दोघेही निघोजे ‘एमआयडीसी’मधील सिंटेल कंपनीच्या मागील बाजूस इंद्रायणी नदीच्याकडेला झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएमई’समोर ‘सब-वे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणि दापोडी ते निगडी प्रवास कमी वेळात होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर (सीएमई) ‘सब-वे’ उभारणार आहे. आठ कोटी ७९ लाख रुपयांच्या निविदा यासाठी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून यापूर्वी दापोडी ते निगडी या मार्गावर ग्रेड सेपरेटर बांधले. त्यामुळे वाहतुकीचा वेग सुधारला. परंतु नाशिक फाटा, दापोडी, फुगेवाडी या ठिकाणी सिग्नल असल्याने काही काळ थांबावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेकडून दापोडी येथील एक सिग्नल कमी करण्यात आला आहे. हे करताना दापोडीमधून बाहेर पडणाऱ्या आणि दापोडीत जाणाऱ्या वाहनांचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी एक किलोमीटरचा वळसा घालून दापोडीत जावे लागते.

तसेच ‘सीएमई’मध्ये ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे येथे एक सिग्नल तयार करण्यात आला. तो देखील या सब-वेमुळे बंद होणार आहे. मात्र, हा ‘सब-वे’ दापोडीकरांसाठी असल्याचे जरी सांगितले जात असले, तरी देखील हा ‘सब-वे’ उभारताना महापालिकेने केवळ ‘सीएमई’चाच विचार केल्याचे दिसून येते. कारण हा ‘सब-वे’ बरोबर सीएमई गेटसमोर असणार आहे. त्यामुळे दापोडी गावातून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना काही मीटर ‘नो एंट्री’तून जावे लागणार आहे. त्यामुळे भविष्यात अपघाताचा धोका हा कायम आहे.

‘सब-वे’ उभारताना जर तो सीएमई समोर न घेतल्यास आणि भविष्यात सीएमईकडून केंद्र आणि राज्य सरकारद्वारे यावर आक्षेप घेतल्यास संपूर्ण कामच ठप्प होऊ शकते, अशी भीती महापालिका प्रशासनाला वाटते. त्यामुळे हा ‘सब-वे’ सीएमई समोरून उभारण्यात येत असल्याचे बोलले जाते. ‘सब-वे’ची उंची किती असावी, तो कोठे उभारावा याबाबत सध्या तरी जो निर्णय प्रशासन स्तरावर झाला आहे, त्यावरून तरी तो फक्त ‘सीएमई’मधील वाहनांची वाहतूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

८ कोटींचा खर्च

‘सब-वे’ ग्रेड सेपरेटर एवढाच असणार आहे. दोन लेन पुण्याकडे जाणाऱ्या व दोन लेन निगडीकडे जाणाऱ्या असतील. याची लांबी पुण्याच्या बाजूला १९५ मीटर, तर निगडीच्या बाजूला १२५ मीटर व रुंदी २१ मीटर असणार आहे. यासाठी ८ कोटी ७९ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यासाठी १० महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या ‘सब-वे’वर महापालिकेतर्फे सुरक्षादलाशी संबंधीत रेखाचित्रे रेखाटली जाणार आहेत. दोपाडीकरांना वाहतुकीच्या कोडींतून सुटका मिळेल अशी आशा आहे.

बोपखेलकर वाऱ्यावरच

विशेष म्हणजे बोपखेलमधील नागरिकांचा रस्ता बंद करणाऱ्या ‘सीएमई’ समोरच महापालिका ‘सब-वे’ उभारत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘सब-वे’ दापोडीकरांसाठी उभारण्यात येत असून, दहा वर्षांपासून याची मागणी लावून धरल्याचे स्थानिक नगरसेवकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावर लूटमार करणाऱ्यांना अटक

0
0

पिंपरी : पुणे, नगर आणि औरंगाबादमध्ये महामार्गावरून जाणारी वाहने लुटणाऱ्या नगर जिल्ह्यातील टोळीला हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ५२ हजार रुपयांचे मोबाइल आणि एक दुचाकी जप्त केली आहे.

अजय भीमराज माळी, अजय भाऊसाहेब चव्हाण, सागर अर्जुन मोहिते आणि विजय भीमराज माळी (चौघे रा. वळणपिंपरी, ता. राहुरी, जिल्हा. नगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयस्वाल १५ जुलै २०१६ रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावरुन दुचाकीवरून जात होते. त्या वेळी आरोपींनी त्यांना अडवून मोबाइल फोन आणि दुचाकी चोरून नेली. त्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी जयस्वाल यांच्या मोबाइलच्या आयएमइआय नंबरच्या कॉल डिटेल्सची पडताळणी केली. त्या मोबाइलमध्ये विजय कोंडभर यांच्या नावाने असलेले सिमकार्ड अॅक्टिवेट असल्याचे निदर्शनास आले. त्याचा तपास केला असता आरोपींनी जयस्वाल यांचा मोबाइल विजय कोंडभर यांच्याकडे विक्रीसाठी दिल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीतील स्मशानभूमी म्हणजे जुगाराचा अड्डा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी येथील स्मशानभूमीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, राजरोसपणे तेथे जुगार खेळला जातो आणि दारूच्या पार्ट्याही होतात, असा आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष हिरानंद आसवानी यांनी केला आहे. संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकणार असल्याचेही आसवानी यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची बैठक बुधवारी तहकूब झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आसवानी म्हणाले, ‘एका अंत्यविधीसाठी पिंपरी स्मशानभूमीमध्ये गेलो असता तेथे घाण पसरली असल्याचे दिसले. दारूच्या बाटल्याही पडल्या होत्या. त्या वेळी चौकशी केली असता तेथे सुरक्षारक्षकच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तेथे टोळक्यांकडून गरीब मुलांना मारणे, धमकावणे अशा घटनाही घडल्याचे समजले. यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल. तसेच तेथे टोळक्यांनी पसरवलेल्या दहशतीला चाप बसविण्यासाठी मी पोलिस उपायुक्तांनाही पत्र लिहणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सनईच्या सुरावटींनी भरले रंग

0
0

६४व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’स मंजुळ स्वरांनी प्रारंभ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मारुबिहाग रागाच्या सादरीकरणाने झालेली सुरुवात आणि मंगलमयी सुरावटीने दरवळणारी सायंकाळ अशा भारावलेल्या वातावरणात सनई वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य एस. बल्लेश आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा बल्लेश यांच्या सनईवादनाने स्वरयज्ञाला प्रारंभ झाला आणि पहिल्याच जोडीच्या सादरीकरणाने रसिकांचे कान तृप्त केले.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६४व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ची सुरुवात बल्लेश पिता-पुत्रांच्या सनई वादनाने झाली. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेच्या मैदानावर रंगलेल्या या महोत्सवात मारुबिहागनंतर बल्लेश यांनी वरच्या स्वरांचा जोग राग सादर केला. वादनाची सांगता त्यांनी ‘याद पिया की आए’ या ठुमरीने केली. दाक्षिणात्य संगीतकारांच्या सिनेमांतून गाजलेल्या काही सुरावटी त्यांनी या वेळी या ठुमरीच्या मध्ये पेरल्या आणि वादन अधिक बहारदार केले.

सनई वादनानंतर जयपूर, ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेतलेल्या गौरी पाठारे यांचे गायन झाले. त्यांनी भीमपलास रागाने गायनास सुरुवात करून ‘बिरज में धूम मचाए कान्हा’ आणि ‘रंग डारुंगी’ या बंदिशी सादर केल्या. श्री रागातील छोटा ख्यालानंतर त्यांनी दादरा सादर करून मैफलीची सांगता केली. त्यांना सुधीर नायक यांनी हार्मोनियमची आणि रामदास पळसुले यांनी तबल्याची साथ केली. त्यानंतर उस्ताद इर्शाद खान यांच्या सूरबहार या वाद्याने खरोखरीच महोत्सवात बहार आणली. त्यांनी शुद्धकल्याण रागाने सादरीकरणास प्रारंभ करण्यापूर्वी २५ वर्षांच्या खंडानंतर ‘सवाई’त सादरीकरणाची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांना वसीम मिरजकर यांनी तानपुऱ्याची आणि पं. अरविंदकुमार आझाद यांनी तबल्याची साथ केली.

प्रख्यात धृपद गायक पद्मश्री पं. उमाकांत आणि रमाकांत गुंदेचा यांना वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, मानपत्र आणि ५१ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. दिग्गज कलाकारांच्या मुलाखतींचा समावेश असलेल्या ‘सुनता है गुरू ग्यानी’ या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी झाले. औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या ‘स्वररंगी आशा’ या दिनदर्शिकेचे प्रकाशनही या वेळी गायक श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते झाले. आशाताईंच्या रुपेरी आणि चंदेरी काळातील अलौकिक स्वरांचा मागोवा यात घेण्यात आला आहे. याप्रसंगी ख्यातनाम सुलेखनकार अच्युत पालवही उपस्थित होते.

संग्रहालय हवे...

वाराणसीतील घरातून सनईसम्राट उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या पाच चांदीच्या सनईंची चोरी झाल्याविषयी बल्लेश पिता-पुत्रांना विचारले असता, ते म्हणाले, ‘घरात जवळपास शंभर तरी सनया चांदीच्या असतील. त्यामुळे नेमकी ७०, ८० की ९० क्रमांकाची सनई चोरीला गेली, ते कळण्यास मार्ग नाही. बड्या कलाकारांच्या अशा मौल्यवान वाद्यांसाठी सरकारने संग्रहालय केले, तर ही अमूल्य वाद्ये टिकून राहाण्याची काही शक्यता आहे. वाद्यांचा इन्शुरन्स काढला, तरी फारसा फरक पडेल, असे वाटत नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसन्न स्वरांनी ‘सवाई’ला सुरुवात

0
0

संगीत पर्वणी ऐकण्यासाठी रसिकांची गर्दी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सनईचे मंगलमयी आणि प्रसन्न स्वर अलगद उमटत जातात तसा कमालीचा उत्साह वातावरणात भरून राहतो. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला बुधवारी अशा मंगलमयी वातावरणात सुरू झाली. आठवड्याचा मधला दिवस आणि कामाचा वार असूनही रसिकांनी आपल्या उपस्थितीने सवाईवरचे प्रेम प्रकट केले.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६४व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेच्या मैदानावर सुरुवात झाली. सुरुवातीस जयललिता, वीणा सहस्रबुद्धे, रमाकांत म्हापसेकर, शमशाद बेगम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

उद्घाटन सत्रापासून रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सायंकाळनंतर गर्दी वाढू लागली. आपले दैनंदिन काम करून रसिक सवाई अनुभवण्यासाठी सहभागी होत होते. मात्र यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचेच प्रमाण अधिक होते. वर्षानुवर्षे येणाऱ्या रसिकांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. तरुणाईचे प्रमाण पहिल्या दिवशी कमी असले, तरी उपस्थित तरुण तल्लीन होऊन स्वर कानात साठवत होते. सेल्फी काढून फेसबुकवर तो सवाईया नावाने पोस्ट करण्याची संधीही तरुण-तरुणींनी सोडली नाही.

वातावरणात गारठा वाढू लागला तसा कानसेनांनी आपला मोर्चा मागच्या बाजूला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे वळवला. गरमागरम पदार्थांवर ताव मारत व चहा, कॉफीचा आस्वाद घेत संगीत स्वर कानसेनांनी कानात साठवून घेतला. यंदा सवाई पाच दिवस असल्याने कानसेनांच्या आनंदाच्या ठेव्यात भरच पडली आहे. एक दिवस वाढला तर तो आम्हाला हवाच आहे, हे उत्साही रसिकांनी बुधवारी दाखवून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय ऑर्गन प्रथमच अमेरिकेत

0
0

Asawari.Chiplunkar@timesgroup.com
Tweet : asawariMT

पुणे : आडिवरे (जि. रत्नागिरी)येथे राहाणाऱ्या उमाशंकर उर्फ बाळ दाते यांना ऑर्गनचा कारखाना काढतो; म्हणून लोकांनी वेड्यात काढले होते. आज त्यांनीच तयार केलेले, नाट्यपदांसाठी सर्वसामान्यपणे वाजवले जाणारे ऑर्गन हे वाद्य प्रथमच भारतातून अमेरिकेत चालले आहे. बालगंधर्व यांच्या काळापासून आत्तापर्यंत भारतात आलेल्या ऑर्गन या युरोपमधून येत असत. मात्र, पूर्णपणे भारतीय बनावटीची आणि रत्नागिरीतील गावात राहून दाते यांनी तयार केलेली ऑर्गन प्रथमच भारतातून बाहेर चालली आहे, तीही डेव्हिड एस्टेस या सॅनफ्रान्सिस्कोच्या बँड वादकाच्या मागणीवरून.

भारतात ऑर्गन वाद्य वाजवता येणारे कलाकार अगदी हाताच्या बोटावर राहिलेले असतानाही दाते हे वाद्य टिकवण्याच्या प्रयत्नात आहेत. ऑर्गन बनवण्यासाठी वापरण्यात येणारे लाकूड जपले, तर शंभर वर्षे टिकणाऱ्या या वाद्याची निर्मिती भारतात फक्त दाते यांच्याकडेच होते. आत्तापर्यंत या वाद्यासाठीच्या पट्ट्या (रीड्स) फक्त भारताबाहेरच उपलब्ध होत्या. १९५०नंतर अमेरिकी रीड्सची निर्मितीही थांबली. त्याच शोधात जर्मनी आणि पॅरिसपर्यंत डेव्हिड हा बँडवादक पोहोचला. मात्र, दाते यांनी फेसबुकवर टाकलेली नव्या ऑर्गन निर्मितीसंदर्भातील पोस्ट त्याने पाहिली आणि त्यांचा माग घेत तो आडिवरेत पोहोचला. त्याने लिहिलेल्या पोस्टमुळे दाते यांच्या कामाची दखल नंतर एका युरोपियन मासिकानेही घेतली आणि आता डेव्हिडने दिलेल्या ऑर्डरमुळे पूर्णपणे भारतीय बनावटीची पहिली ऑर्गन अमेरिकेत चालली आहे.

त्यात ३६ प्रकारचे ध्वनी निघतात. खर्ज स्वरासाठी क्रमांक १६, स्त्री आवाजासाठी क्रमांक चार आणि पुरुष आवाजासाठी क्रमांक आठ असे अमेरिकन बँडच्या दृष्टीने सोयीचे तीन स्टॉप्स (स्टॉपर) यात आहेत. १५ दिवसांत तयार झालेली ही दाते यांनी तयार केलेली ५५वी ऑर्गन आहे. एक जानेवारी २०१७ रोजी ती जहाजाने अमेरिकेला रवाना होणार आहे. विमानातून जाण्याच्या दृष्टीने सोयीची अशी सर्वांत कमी वजनाची (१८ किलो) फोल्डिंगची ऑर्गन तयार करण्याचा रेकॉर्डही दाते यांचाच आहे. ते भारतातील ऑर्गन निर्मितीसाठीचे पेटंट मिळवण्याच्याही प्रयत्नात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलवरून करणार जगाची प्रदक्षिणा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जगभरात शांती आणि मैत्री प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने दोन ध्येयवेडे तरुण सायकलवरून जग पादाक्रांत करायला निघाले आहेत. देशोदेशीच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या समजावून घेण्यासाठी हे तरुण ७५ हजार किमीचा प्रवास करणार आहेत. वर्ध्यातील महात्मा गांधी आश्रमातून त्यांनी जगप्रवास सुरू केला असून बुधवारी हे तरुण पुण्यात पोहोचले आहेत.

नितीन सोनावणे आणि ज्ञानेश्वर यवतकर अशी या तरुणांची नावे असून सोनावणे हे इंजिनीअर आहेत, तर यवतकर यांनी हॉटेल मॅनेजमेंट केले आहे. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून सामाजिक कार्यासाठी दोघांनी झोकून दिले. सामाजिक संदेश घेऊन अनेक ठिकाणी यात्रा केल्यानंतर ते जगप्रवासाला निघाले आहेत. या प्रवासात ते एकूण ७५ देश फिरणार आहेत. त्यासाठी अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. २ ऑक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधींची १५०वी जयंती आहे. त्या दिवशी जगप्रवास पूर्ण करून पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे शांती आणि मैत्रीचा संदेश घेऊन जायचे, असा निर्धार या तरुणांनी केला आहे. दोन दिवस सोनावणे आणि यवतकर पुण्यात वास्तव्यास असून त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत.

दक्षिण आशियापासून हे तरुण प्रवासाला सुरूवात करणार आहेत. पुण्यातून सायकलीने मुंबईला गेल्यानंतर ते विमानाने थेट म्यानमारमधील रंगून येथे जाणार आहेत. तिथून ते दक्षिण आशियातील कोरिया, व्हिएतनाम, थायलंड असे देश करीत जपानमध्ये जाणार आहेत. तेथून ते थेट अमेरिकेत जातील. सॅनफ्रान्सिस्कोमधून त्यांचा पुढील प्रवास सुरू होईल. संपूर्ण अमेरिका फिरून ते मेक्सिको, क्युबा असे देश करीत पुन्हा अमेरिकेतून कॅनडात येथील. तेथून ते युरोपच्या दौऱ्याला जाणार आहेत. मग आफ्रिका खंडाचा प्रवास करत पश्चिम आशियात हे तरुण येतील आणि २ ऑक्टोबर २०१९पर्यंत पाकिस्तानात पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवारांच्या हस्ते ‘मेट्रो’चे भूमिपूजन

0
0

भाजप, सेनेच्या गटनेत्यांचा आक्षेप; मतदानाने प्रस्ताव मान्य

म. टा. प्रतिनिधी‌, पुणे

वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचा ठराव बुधवारी पक्षनेत्यांच्या बैठकीत मान्य करण्यात‌ आला.
महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मतदान घेऊन वरील विषयाला मान्यता ​देण्यात आली. या प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याची घोषणा भाजपच्या गटनेत्यांनी केल्याने भाजपसह शिवसेनेच्या गटनेत्यांनी या प्रस्तावाला विरोध केला.
दहा वर्षांपासून केवळ चर्चेमध्ये अडकलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाली. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात‌ पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. केंद्राने मेट्रोला मंजुरी दिली असून, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‌२४ डिसेंबरला प्रकल्पाचे भूमीपूजन होईल, असे भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. बुधवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत सभागृह नेते शंकर केमसे यांनी मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत करण्यात यावे, असा ठराव मांडला. त्याला विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते किशोर शिंदे यांनी अनुमोदन दिले.
मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमीपूजन करावे, अशी भूमिका घेऊन बीडकर, शिवसेनेचे अशोक हरणावळ यांनी विरोध केला. देशातील सर्व मेट्रो प्रकल्पांची उद्घाटने पंतप्रधानांच्या हस्ते झाल्याचे बीडकर यांनी सांगितले. मात्र, एकमत न झाल्याने मतदान घेऊन हा ठराव मान्य करण्यात आला. ‘शहरात मेट्रो प्रकल्प व्हावा, यासाठी पवार यांनी अनेकदा पाठपुरावा केला. प्रकल्पाची ६० टक्के रक्कम तिकीट आणि व जाहिरातींमधून गोळा होणार आहे. प्रकल्पासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेचा १० टक्के हिस्सा राहाणार असून, केंद्र आणि राज्य सरकारचा जेमतेम ३० टक्के हिस्सा असेल. प्रस्तावाला अद्याप अंतिम मान्यता मिळाली नसताना बीडकर मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा करतात, हे संकेतांना धरून नाही. पालिकेशी संबधित प्रकल्पांचे भूमिपूजन अथवा उदघाटनांचे प्रस्ताव पक्षनेत्यांच्या बैठकीत आणि महापौरांच्या अधिकारात ठरतात. पंतप्रधानांबद्दल आम्हाला आदरच आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानाच्या हस्ते करावे, असा कोणताही ठराव भाजपने दिलेला नाही. त्यामुळे राजकारण करू नये. संकेतांबाबत आमची अडवणुकीची भूमिका नाही,’ असे महापौरांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images